Sunday, 9 August 2026

राजधानीत मराठी चित्रपटांचा नवा अध्याय दिल्ली मराठी चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन

 राजधानीत मराठी चित्रपटांचा नवा अध्याय

दिल्ली मराठी चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन

 

नवी दिल्ली, दि. 7 : मराठी चित्रपटसृष्टीला राष्ट्रीय व्यासपीठ मिळवून देणाऱ्या दिल्ली मराठी चित्रपट महोत्सव – 2026’ चे उद्घाटन  खासदार विनोद तावडे यांच्या हस्ते  झाले. या कार्यक्रमात महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या संयुक्त विद्यमाने नवी दिल्लीत कार्यान्वित करण्यात येणाऱ्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळाचेही उद्घाटन झाले.

 

डॉ आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर येथे आयोजित या उदघाटन सोहळ्यास खासदार तावडे  अन्य मान्यवर उपस्थित होते.

 

१२ कोटी भाविकांच्या सुरक्षित व सुलभ दर्शनासाठी वाहतूक, निवास, स्वच्छता, आपत्ती व्यवस्थापन आणि डिजिटल सुविधा

 १२ कोटी भाविकांच्या सुरक्षित व सुलभ दर्शनासाठी वाहतूक, निवास, स्वच्छता, आपत्ती व्यवस्थापन आणि डिजिटल सुविधा याबाबत सविस्तर नियोजन सादर करण्यात आले, त्याबाबत ते म्हणाले, नाशिक रिंग रोड, साधुग्राम उभारणी, रेल्वे स्थानकांचा विकास, ,५०० विशेष एसटी बसेस तसेच विस्तृत पार्किंग व्यवस्थेची कामे गतीने पूर्ण करण्यावर भर देण्यात यावा.

 

            मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'डिजिटल कुंभ' संकल्पनेअंतर्गत कृत्रिम बुद्धिमत्ता, 'कुंभदूत' एआय सहाय्यक, डिजिटल ट्विन, स्मार्ट पार्किंग, हरवलेल्या व्यक्तींचा शोध, तसेच एकात्मिक कमांड अँड कंट्रोल सेंटरच्या माध्यमातून गर्दी आणि सुरक्षा व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्याचे निर्देश दिले.

महानगर गॅस कंपनीने गॅस जोडणीच्या कामांसाठी नाशिक महानगरपालिकेशी समन्वय साधून प्रलंबित गॅस कनेक्शनची

 महानगर गॅस कंपनीने गॅस जोडणीच्या कामांसाठी नाशिक महानगरपालिकेशी  समन्वय साधून प्रलंबित गॅस कनेक्शनची  कामे तातडीने पूर्ण करावीत. सिंहस्थ कुंभमेळा हा राज्याच्या प्रतिष्ठेचा विषय असून, सर्व विभागांनी वेळबद्ध नियोजन, परस्पर समन्वय आणि जबाबदारीची जाणीव ठेवून काम करावे तसेच कुंभमेळ्याची तयारी वेळेत पूर्ण होईल यासाठी सर्वांनी दक्षता घ्यावी, असेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

३४ हजार ७३२ कोटींच्या विकास आराखड्याला गती; सर्व कामे वेळेत पूर्ण करावीत

 ३४ हजार ७३२ कोटींच्या विकास आराखड्याला गती;

सर्व कामे वेळेत पूर्ण करावीत

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

·         कुंभमेळ्याच्या कामात दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही; विभागांनी जबाबदारीने काम करा

 

            मुंबई, दि. ७ : नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची तारीख निश्चित असून, सर्व विभागांनी विकास आरखड्यातील कामे नियोजित वेळेत, गुणवत्तापूर्ण आणि पारदर्शक पद्धतीने पूर्ण करावीत. कामे पुढे ढकलण्याची वृत्ती दूर करुन कुंभमेळ्याच्या ३४ हजार ७३२ कोटी रुपयांच्या विकास आरखड्यातील कामांना गती द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

 

            सह्याद्री अतिथीगृह येथे नाशिक सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे,अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, राहुल ढिकले, सरोज अहिरे, हिरामण खोसकर, नाशिकच्या महापौर हिमगौरी आहेर, नगराध्यक्ष त्रिवेणी तुंगार, मुख्य सचिव राजेश अग्रवाल यासह वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित होते.

 

            मुख्यमंत्री म्हणाले की, सध्याची कुंभमेळ्यातील कामांची परिस्थिती समाधानकारक नसून प्रत्येक विभागाने अधिक वेगाने आणि समन्वयाने काम करण्याची गरज आहे. बैठकीत देण्यात आलेल्या सर्व सूचनांची तातडीने अंमलबजावणी करावी. एक महिन्यानंतर पुन्हा आढावा बैठक घेण्यात येईल. त्या बैठकीपर्यंत कामामध्ये गुणात्मक आणि प्रत्यक्ष प्रगती दिसली पाहिजे. त्यामुळे पुढील बैठकीची तयारी आजपासूनच सुरू करावी.

सिक्योरिटी ऑपरेशंस सेंटर का उद्घाटन

 

सिक्योरिटी ऑपरेशंस सेंटर का उद्घाटन

कार्यक्रम में केंद्रीय गृह एवं सहकारिता मंत्री अमित शाह ने शहरी सहकारी बैंकों की साइबर सुरक्षा के लिए सिक्योरिटी ऑपरेशंस सेंटर (SOC) का दूरस्थ माध्यम से उद्घाटन किया।

इस अवसर पर भारतीय रिजर्व बैंक के पूर्व उप-महाप्रबंधक जी. पी. मिस्त्री द्वारा लिखित ऑपरेशनल रिस्क मैनेजमेंट अ प्रैक्टिकल गाइड टू अर्बन को-ऑपरेटिव बैंक्स पुस्तक का विमोचन भी किया गया।

सहकार सीबीएस प्रणाली से सफलतापूर्वक जुड़ने वाले प्रथम छह शहरी सहकारी बैंकों के प्रतिनिधियों का सम्मान किया गया।

राष्ट्रीय सेवा बंडल के अंतर्गत कोर बैंकिंग सर्विसऔर संबंधित सेवाओं का भी शुभारंभ किया गया। राष्ट्रीय फॉरेंसिक विज्ञान विश्वविद्यालय और NUCFDC के बीच समझौता ज्ञापन पर हस्ताक्षर किए गए।

कार्यक्रम का प्रास्ताविक राष्ट्रीय शहरी सहकारी वित्त एवं विकास निगम के अध्यक्ष ज्योतिंद्र मेहता ने किया, जबकि NUCFDC के मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभात चतुर्वेदी ने आभार व्यक्त किया।

साइबर सुरक्षा और डिजिटल धोखाधड़ी की रोकथाम पर जोर

 

साइबर सुरक्षा और डिजिटल धोखाधड़ी की रोकथाम पर जोर

केंद्रीय मंत्री अमित शाह ने कहा कि देश में डिजिटल लेन-देन तेजी से बढ़ रहा है, लेकिन इसके साथ डिजिटल धोखाधड़ी के मामले भी बढ़ रहे हैं। इसलिए ऑनलाइन बैंकिंग को सुरक्षित बनाने के लिए फॉरेंसिक तकनीक की सहायता लेना आवश्यक है।

भारतीय रिजर्व बैंक ने म्यूल हंटरजैसे कई उपक्रम शुरू किए हैं। राष्ट्रीय फॉरेंसिक विज्ञान विश्वविद्यालय के साथ हुए समझौता ज्ञापन के माध्यम से साइबर सुरक्षा, डिजिटल धोखाधड़ी की रोकथाम, डिजिटल फॉरेंसिक, बैंकिंग सुरक्षा तथा कर्मचारियों के प्रशिक्षण के लिए आवश्यक सुविधाएं उपलब्ध होंगी।

उन्होंने यह भी बताया कि शहरी सहकारी बैंकों के लिए सिक्योरिटी ऑपरेशंस सेंटर (SOC) की शुरुआत की गई है।

महाराष्ट्र बनेगा शहरी सहकारी बैंकिंग का केंद्र

 

महाराष्ट्र बनेगा शहरी सहकारी बैंकिंग का केंद्र

महाराष्ट्र में 449 सहकारी बैंक हैं और देश के सहकारी बैंकिंग क्षेत्र में राज्य का महत्वपूर्ण योगदान है। महाराष्ट्र के साथ-साथ गुजरात, गोवा और कर्नाटक में भी बड़ी संख्या में शहरी सहकारी बैंक कार्यरत हैं।

इसलिए शहरी सहकारी बैंकिंग क्षेत्र के अम्ब्रेला संगठन का मुख्यालय महाराष्ट्र में होना अधिक उपयोगी होगा। उन्होंने कहा कि अम्ब्रेला संगठन के माध्यम से देश के सभी शहरी सहकारी बैंकों को एक साथ लाने का उद्देश्य है।

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने वर्ष 2047 तक विकसित भारत का सपना देखा है। सहकारिता से समृद्धिका अर्थ केवल बैंक या संस्था की समृद्धि नहीं, बल्कि बैंक के ग्राहक को भी समृद्ध बनाना है। शहरी सहकारी बैंकिंग क्षेत्र को आधुनिक, सुरक्षित, पारदर्शी और वैश्विक स्तर पर सक्षम बनाने की दिशा में अम्ब्रेला संगठन के माध्यम से आज एक महत्वपूर्ण शुरुआत हुई है, ऐसा केंद्रिय मंत्री  ने कहा।

एसएनसीयू व बालकांवरील उपचारांसाठी सर्वतोपरी उपाययोजना; आवश्यक सुविधा तातडीने उपलब्ध करणल्ल्ल्ल

 एसएनसीयू व बालकांवरील उपचारांसाठी सर्वतोपरी उपाययोजना; आवश्यक सुविधा तातडीने उपलब्ध करणल्ल्ल्ल

 

मुंबई, दि. ८ : राज्यातील नवजात बालकांना वेळेवर, दर्जेदार आणि अत्याधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी, तसेच एस एन सी यू  मधील उपचार अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्यात येतील, अशी ग्वाही आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.

एनआयसीयू व बालकांवरील उपचार या विषयावर आरोग्य भवन येथे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस आमदार बापूसाहेब पठारे, आरोग्य सेवा (प्राथमिक) संचालक डॉ .विजय कंदेवाड तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यावेळी नवजात बालकांच्या उपचारासाठी उपलब्ध सुविधा, मनुष्यबळ, वैद्यकीय उपकरणे तसेच महानगरपालिका रुग्णालयांमधील विद्यमान परिस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. राज्यातील कोणत्याही बालकाला उपचाराअभावी अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी आवश्यक असलेल्या सर्व उपाययोजना तातडीने राबविण्याच्या सूचना आरोग्यमंत्र्यांनी दिल्या.

बालकांच्या उपचारासाठी आवश्यक पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी नगरविकास विभाग तसेच वैद्यकीय शिक्षण विभागाशी योग्य  कार्यवाहीसाठी संबंधित विभागांना तातडीने पत्र पाठविण्याचे निर्देशही आरोग्यमंत्री श्री. आबिटकर यांनी दिले.

राज्यातील बालआरोग्य सेवा अधिक सक्षम, प्रभावी आणि सर्वसमावेशक करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना प्राधान्याने राबविण्यात येतील, असा विश्वासही आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी यावेळी व्यक्त केला.

 

०००००००००


 

Saturday, 8 August 2026

देशात डिजिटल व्यवहार मोठ्या प्रमाणावर वाढत असताना डिजिटल फसवणुकीचे प्रकारही वाढत

 देशात डिजिटल व्यवहार मोठ्या प्रमाणावर वाढत असताना डिजिटल फसवणुकीचे प्रकारही वाढत आहेत. त्यामुळे ऑनलाइन बँकिंग सुरक्षित करण्यासाठी फॉरेन्सिक तंत्रज्ञानाची मदत घेणे आवश्यक आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने म्यूल हंटरसारखे उपक्रमही सुरू केले आहेत. राष्ट्रीय फॉरेन्सिक विज्ञान विद्यापीठासोबत आज झालेल्या सामंजस्य करारामुळे सायबर सुरक्षा, डिजिटल फसवणूक प्रतिबंध, डिजिटल फॉरेन्सिक, बँकिंग सुरक्षेसह कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध होतील. यावेळी शहरी सहकारी बँकांसाठी सुरक्षा संचालन केंद्राचीही सुरुवात करण्यात आली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

 

या कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते शहरी सहकारी बँकांसाठी सायबर सुरक्षेसंदर्भातील सिक्युरिटी ऑपरेशन्स सेंटर (SOC) चे दूरस्थ पद्धतीने उद्घाटन करण्यात आले.भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी उप-महाव्यवस्थापक जी. पी. मिस्त्री यांनी लिहिलेल्या 'ऑपरेशनल रिस्क मॅनेजमेंट अ प्रॅक्टिकल गाईड टू अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स' या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

सहकार सीबीएस प्रणालीशी यशस्वीरीत्या जोडल्या गेलेल्या प्रथम सहा शहरी सहकारी बँकांच्या प्रतिनिधींचा सत्कार यावेळी करण्यात आला. राष्ट्रीय सेवा बंडलअंतर्गत 'कोर बँकिंग सर्व्हिस' आणि संबंधित सेवांचे लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. नॅशनल फॉरेन्सिक सायन्सेस युनिव्हर्सिटी आणि एनयूसीएफडीसी यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक नागरी सहकारी वित्त विकास महामंडळाचे अध्यक्ष ज्योतिंद्र मेहता यांनी केले तर एनयूसीएफडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभात चतुर्वेदी आभार यांनी मानले.

महाराष्ट्रासह गुजरात, गोवा आणि कर्नाटक या राज्यांमध्ये देशातील मोठ्या प्रमाणावर शहरी सहकारी बँका कार्यरत

 महाराष्ट्रात ४४९ सहकारी बँका असून देशातील सहकारी बँकिंग क्षेत्रात महाराष्ट्राचे मोठे योगदान आहे. महाराष्ट्रासह गुजरात, गोवा आणि कर्नाटक या राज्यांमध्ये देशातील मोठ्या प्रमाणावर शहरी सहकारी बँका कार्यरत आहेत. त्यामुळे शहरी सहकारी बँकिंग क्षेत्राच्या अंब्रेला संस्थेचे मुख्यालय महाराष्ट्रात असणे अधिक उपयुक्त ठरेल. देशातील शहरी सहकारी बँकांना अम्ब्रेला ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून एकत्र आणण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.

 

 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २०४७ पर्यंत विकसित भारताचे स्वप्न पाहिले आहे. सहकारातून समृद्धीचा अर्थ केवळ बँक किंवा संस्थेची समृद्धी नसून, बँकेच्या ग्राहकाला समृद्ध करणे हा आहे. शहरी सहकारी बँकिंग क्षेत्राला आधुनिक, सुरक्षित, पारदर्शक आणि जागतिक स्तरावर सक्षम करण्यासाठी अम्ब्रेला ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून आज महत्त्वपूर्ण सुरुवात झाली आहे, असे केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शाह यांनी यावेळी सांगितले.

देशाच्या आर्थिक विकासात या बँकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. छोटे दुकानदार, व्यापारी, कुटीर उद्योग, एमएसएमई, स्थानिक व्यावसायिक, महिला बचत गट

 केंद्रिय मंत्री अमित शहा म्हणाले की, देशातील सुमारे १,४०० अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकांमध्ये जवळपास सहा लाख कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. देशाच्या आर्थिक विकासात या बँकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. छोटे दुकानदार, व्यापारी, कुटीर उद्योग, एमएसएमई, स्थानिक व्यावसायिक, महिला बचत गट तसेच मध्यमवर्गीयांच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी छोट्या कर्जांची आवश्यकता असते. मोठ्या बँकांना अनेकदा या गरजा पूर्ण करणे शक्य होत नाही; मात्र तालुका पातळीवरील अर्बन को-ऑपरेटिव्ह बँका ही भूमिका प्रभावीपणे पार पाडू शकतात. कर्जाची रक्कम जितकी कमी तितकी त्याची परतफेडीची शक्यता अधिक असते. कोणत्याही हमी किंवा तारणाशिवाय कर्ज देण्याची मर्यादा आता अडीच लाख रूपयांवरून पाच लाख रुपये करण्यात आली आहे. या योजनेतील तब्बल ९९.७८ टक्के कर्जे व्याजासह परतफेड झाली आहेत. यावरून छोट्या कर्जदारांची कर्जफेडीची क्षमता स्पष्ट होते, असे त्यांनी नमूद केले.

 

महाराष्ट्रात ४४९ सहकारी बँका असून देशातील सहकारी बँकिंग क्षेत्रात महाराष्ट्राचे मोठे योगदान आहे. महाराष्ट्रासह गुजरात, गोवा आणि कर्नाटक या राज्यांमध्ये देशातील मोठ्या प्रमाणावर शहरी सहकारी बँका कार्यरत आहेत. त्यामुळे शहरी सहकारी बँकिंग क्षेत्राच्या अंब्रेला संस्थेचे मुख्यालय महाराष्ट्रात असणे अधिक उपयुक्त ठरेल. देशातील शहरी सहकारी बँकांना अम्ब्रेला ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून एकत्र आणण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.

 

महाराष्ट्रात होणार राष्ट्रीय शहरी सहकारी वित्त व विकास महामंडळाचे मुख्यालय अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकिंग क्षेत्राला अंब्रेला संस्थेमुळे मिळणार नवसंजीवनी

  

महाराष्ट्रात होणार राष्ट्रीय शहरी सहकारी वित्त व विकास महामंडळाचे मुख्यालय

 

अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकिंग क्षेत्राला अंब्रेला संस्थेमुळे मिळणार नवसंजीवनी

 


 

मुंबई, दि. ८ : अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकिंग क्षेत्राला आधुनिक, पारदर्शक, विश्वासार्ह आणि तंत्रज्ञानाधिष्ठित बनविण्यासाठी अंब्रेला ऑर्गनायझेशनमहत्त्वाची भूमिका बजावणार आहे. या माध्यमातून देशातील प्रत्येक तहसीलपर्यंत अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकिंगचे जाळे विस्तारण्याला मोठी चालना मिळेल, असा विश्वास केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी आज व्यक्त केला.  देशातील अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकिंग क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेत त्यांनी राष्ट्रीय शहरी सहकारी वित्त व विकास महामंडळाचे मुख्यालय दिल्लीहून महाराष्ट्रात हलवण्यात येईल अशी घोषणा केली.

 

बीएसई इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर, मुंबई येथे आयोजित सहकार नव-क्रांती मेळावा' कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय सहकार राज्यमंत्री कृष्णपाल गुर्जर, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, पणन मंत्री जयकुमार रावल, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त विकास महामंडळाचे अध्यक्ष ज्योतिंद्र मेहता, केंद्रीय सहकार मंत्रालयाचे सचिव डॉ. आशीष कुमार भूटानी तसेच अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

 

केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा म्हणाले की, देशातील प्रत्येक अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेने, अगदी एका शाखेच्या बँकेनेही अंब्रेला ऑर्गनायझेशनचे सदस्यत्व घ्यावे. सदस्यत्व घेतल्यानंतर सुरक्षा संचालन केंद्राशी (सिक्युरिटी ऑपरेशन सेंटरशी) जोडले जावे. यामुळे बँकांमधील ठेवीदारांचा विश्वास वाढण्यास मदत होईल आणि बँकिंग क्षेत्र अधिक सुरक्षित होईल. अंब्रेला संस्था बँकिंग क्षेत्रात करण्यात येत असलेल्या नवीनतम सुधारणांची माहिती तसेच म्यूल हंटरसारख्या अनेक आवश्यक सॉफ्टवेअर सुविधा देखील या माध्यमातून उपलब्ध करून दिल्या जातील. या अंब्रेला संस्थेच्या मदतीने कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रमही आयोजित करता येतील, जे कर्मचाऱ्यांसाठी अत्यावश्यक ठरणार आहे.  स्पर्धात्मक बँकिंग क्षेत्रात इतरांच्या बरोबरीने उभे राहण्यासाठी तसेच जनता आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा विश्वास संपादन करण्यासाठी अंब्रेला संस्था मार्गदर्शक ठरणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

भारतीय ज्ञानपरंपरा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम घडविणारे राष्ट्रीय शैक्षणिक केंद्र नाशिकमध्ये उभारणार

 भारतीय ज्ञानपरंपरा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम घडविणारे

राष्ट्रीय शैक्षणिक केंद्र नाशिकमध्ये उभारणार

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

केंद्रीय संस्कृत विद्यापीठासाठी १६.८० हेक्टर जमिनीचा ७/१२ उतारा विद्यापीठाला सुपूर्द

मुंबई, दि. ७ : भारतीय ज्ञानपरंपरेला आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाची जोड देत नाशिकला देशातील अग्रगण्य शैक्षणिक केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. केंद्रीय संस्कृत विद्यापीठाच्या नाशिक परिसरामुळे संस्कृत, कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा सायन्स आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या शिक्षणाला नवी दिशा मिळणार असून, हा प्रकल्प राज्याच्या शैक्षणिक विकासातील महत्त्वाचा टप्पा ठरेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

 

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते केंद्रीय संस्कृत विद्यापीठ, दिल्लीच्या प्रस्तावित नाशिक परिसरासाठी आरक्षित करण्यात आलेल्या १६.८० हेक्टर (सुमारे ४१.५१ एकर) जमिनीचा ७/१२ उतारा विद्यापीठाच्या प्रतिनिधींना सुपूर्द करण्यात आला. यावेळी केंद्रीय संस्कृत विद्यापीठाचे कुलसचिव प्रा. आर. जी. मुरलीकृष्ण, मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश इंदापवार, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम,नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

 

कर्जमुक्ती योजनेच्या लाभ वितरणास प्रारंभ; प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळणार

 कर्जमुक्ती योजनेच्या लाभ वितरणास प्रारंभ; प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

·         पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील ६.२२ लाख पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांमध्ये ५,०२८ कोटींची रक्कम जमा

 

मुंबई, दि. ७ : राज्यातील प्रत्येक पात्र शेतकऱ्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळणार असून, शेतकरी सक्षम, शेती समृद्ध आणि महाराष्ट्र अधिक प्रगत करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने ही महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केली आहे. शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या दिशेने हा महत्त्वपूर्ण निर्णय  घेतला असून, योजनेच्या पहिल्या टप्प्यात ६.२२ लाख पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांमध्ये ५,०२८ कोटींची रक्कम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते थेट ऑनलाइन हस्तांतरित करण्यात आली.

 

सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कर्जमुक्ती योजनेच्या ऑनलाईन लाभ वितरणास प्रारंभ करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्रा, मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी, सहकार विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे तसेच सहकार आयुक्त दीपक तावरे उपस्थित होते. तसेच सर्व पालकमंत्री, जिल्हाधिकारी आणि सहकारी संस्थांचे निबंधक दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

 

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पहिल्या टप्प्यात आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या ६.२२ लाख शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांमध्ये ५,०२८ कोटींची रक्कम थेट जमा करण्यात आली आहे. राज्य शासनाने सर्व बँकांना कर्जमुक्तीचा लाभ मिळालेल्या पात्र शेतकऱ्यांना तातडीने खरीप पीक कर्ज उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत, जेणेकरून शेतकऱ्यांना नव्याने शेतीसाठी आवश्यक आर्थिक बळ मिळेल.

 

ही योजना पूर्णपणे ऑनलाइन असून, शेतकऱ्यांना कुठेही अर्ज करण्याची आवश्यकता नाही. योजनेतील पात्र लाभार्थ्यांची यादी संबंधित बँकांनी महाआयटीने विकसित केलेल्या पोर्टलवर अपलोड केली असून,  ग्रामपंचायत कार्यालये, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था तसेच संबंधित बँक शाखांमध्येही प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीतील प्रत्येक शेतकऱ्याला एक विशिष्ट क्रमांक देण्यात आला आहे. हा क्रमांक घेऊन शेतकऱ्यांनी आपले सरकार सेवा केंद्रावर ॲग्रीस्टॅकवरील नोंदणी करून आधार प्रमाणीकरण करावे. एवढीच सहज आणि सोपी प्रक्रिया असल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

राजधानीत प्रथमच आयोजित करण्यात आलेला दिल्ली मराठी चित्रपट महोत्सव हा मराठी

 दिल्ली मराठी प्रतिष्ठानचे संस्थापक वैभव डांगे यांनी प्रास्ताविकात सांगितले की, राजधानीत प्रथमच आयोजित करण्यात आलेला दिल्ली मराठी चित्रपट महोत्सव हा मराठी चित्रपटसृष्टीला राष्ट्रीय व्यासपीठ मिळवून देणारा ऐतिहासिक उपक्रम ठरणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार, तंत्रज्ञ आणि निर्मात्यांचे भारतीय चित्रपटविश्वातील योगदान उल्लेखनीय असून, दिल्लीतील मराठी बांधवांना एकत्र आणत मराठी संस्कृतीचा वारसा जपण्याचे कार्य दिल्ली मराठी प्रतिष्ठान सातत्याने करत आहे. या पुढील काळात प्रतिष्ठानच्या माध्यमातून मराठी चित्रपटासाठी एक हक्काचे व्यासपीठ निर्माण केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. दिल्ली मराठी प्रतिष्ठानचे विवेक गार्गे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

 

दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या शुक्रवार, शनिवार आणि रविवारी दिल्ली मराठी चित्रपट महोत्सव' नियमितपणे आयोजित करण्यात येईल, असे यावेळी  जाहीर करण्यात आले. तसेच महाराष्ट्र सदनामध्ये वर्षभर दर महिन्याला एका शनिवारी मराठी चित्रपटांचे नियमित प्रदर्शन आणि चित्रपट रसास्वाद उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

पदभरती, पदोन्नतीला गती देण्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश

 पदभरती, पदोन्नतीला गती देण्याचे

सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश

मुंबई, ता. ८ : राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ तातडीने उपलब्ध करून देण्याबरोबरच प्रलंबित पदभरती आणि पदोन्नतीच्या प्रक्रियांना गती देण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले. आरोग्य भवन येथे आयोजित बैठकीत आस्थापना विषयक विविध बाबींचा सविस्तर आढावा घेत त्यांनी विभागातील कामकाज अधिक गतिमान, पारदर्शक आणि परिणामकारक करण्यावर भर दिला.

आरोग्य विभागाच्या कामकाजाचा थेट परिणाम सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित असल्याने कोणत्याही स्तरावर दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही. प्रशासनातील निर्णय प्रक्रिया अधिक गतिमान करून नागरिकांना वेळेत आणि दर्जेदार आरोग्यसेवा मिळेल, यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

 

विविध संवर्गांतील रिक्त पदांचा यावेळी आढावा

आरोग्य विभागातील गट-क व गट-ड संवर्गातील नवीन पदभरतीच्या सद्यस्थितीचा, तसेच विविध संवर्गांतील रिक्त पदांचा यावेळी आढावा घेण्यात आला. आवश्यकतेनुसार मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना मंत्री आबिटकर यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. पदभरतीची प्रक्रिया अनावश्यक विलंबाविना पूर्ण करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

 

पदोन्नतीची प्रक्रिया वेगाने पूर्ण करा

अधिपरिचारिका संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या विविध अडचणी, परिविक्षाधीन कालावधीची पूर्तता, पदोन्नती आदी विषयांवरही बैठकीत चर्चा झाली. कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचे प्रस्ताव अनावश्यक प्रलंबित राहणार नाहीत, याची दक्षता घेऊन पदोन्नतीची प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवाकालात योग्य संधी आणि पदोन्नती मिळणे आवश्यक असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.  राष्ट्रीय आरोग्य अभियानातील (NHM) कर्मचाऱ्यांच्या समावेशनासंदर्भातील बाबींचाही आढावा घेण्यात आला. आरोग्य सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांचा नियमांनुसार आणि सकारात्मक दृष्टिकोनातून विचार करून आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

पदभरती, पदोन्नतीला गती देण्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश मुंबई, ता. ८ :

 पदभरती, पदोन्नतीला गती देण्याचे

सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश

मुंबई, ता. ८ : राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ तातडीने उपलब्ध करून देण्याबरोबरच प्रलंबित पदभरती आणि पदोन्नतीच्या प्रक्रियांना गती देण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले. आरोग्य भवन येथे आयोजित बैठकीत आस्थापना विषयक विविध बाबींचा सविस्तर आढावा घेत त्यांनी विभागातील कामकाज अधिक गतिमान, पारदर्शक आणि परिणामकारक करण्यावर भर दिला.

आरोग्य विभागाच्या कामकाजाचा थेट परिणाम सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित असल्याने कोणत्याही स्तरावर दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही. प्रशासनातील निर्णय प्रक्रिया अधिक गतिमान करून नागरिकांना वेळेत आणि दर्जेदार आरोग्यसेवा मिळेल, यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

एसएनसीयू व बालकांवरील उपचारांसाठी सर्वतोपरी उपाययोजना; आवश्यक सुविधा तातडीने उपलब्ध करण

 एसएनसीयू व बालकांवरील उपचारांसाठी सर्वतोपरी उपाययोजना; आवश्यक सुविधा तातडीने उपलब्ध करण

 

मुंबई, दि. ८ : राज्यातील नवजात बालकांना वेळेवर, दर्जेदार आणि अत्याधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी, तसेच एस एन सी यू  मधील उपचार अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्यात येतील, अशी ग्वाही आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.

एनआयसीयू व बालकांवरील उपचार या विषयावर आरोग्य भवन येथे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस आमदार बापूसाहेब पठारे, आरोग्य सेवा (प्राथमिक) संचालक डॉ .विजय कंदेवाड तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यावेळी नवजात बालकांच्या उपचारासाठी उपलब्ध सुविधा, मनुष्यबळ, वैद्यकीय उपकरणे तसेच महानगरपालिका रुग्णालयांमधील विद्यमान परिस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. राज्यातील कोणत्याही बालकाला उपचाराअभावी अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी आवश्यक असलेल्या सर्व उपाययोजना तातडीने राबविण्याच्या सूचना आरोग्यमंत्र्यांनी दिल्या.

बालकांच्या उपचारासाठी आवश्यक पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी नगरविकास विभाग तसेच वैद्यकीय शिक्षण विभागाशी योग्य  कार्यवाहीसाठी संबंधित विभागांना तातडीने पत्र पाठविण्याचे निर्देशही आरोग्यमंत्री श्री. आबिटकर यांनी दिले.

राज्यातील बालआरोग्य सेवा अधिक सक्षम, प्रभावी आणि सर्वसमावेशक करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना प्राधान्याने राबविण्यात येतील, असा विश्वासही आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी यावेळी व्यक्त केला.

 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या पहिल्या टप्प्यात विभागनिहाय माहिती

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या पहिल्या टप्प्यात विभागनिहाय माहिती

अमरावती विभागात १ लाख ५८ हजार १४६  शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात १,३७२.१७ कोटींचा लाभ,

नाशिक विभाग- १ लाख ४० हजार ८९ शेतकऱ्यांना १,२०९.३९ कोटी रुपये,

छत्रपती संभाजीनगर विभाग- १ लाख ३० हजार ९३४ शेतकऱ्यांना ९३२.६१ कोटी रुपये,

पुणे विभाग- १ लाख ४ हजार ६१ शेतकऱ्यांना ८६०.९७ कोटी रुपये,

नागपूर विभाग- ७० हजार २९० शेतकऱ्यांना ५४४.७१ कोटी रुपये,

कोकण विभागातील १८ हजार ६८७ शेतकऱ्यांना १०८.८६ कोटीं रुपयांचा लाभ.

0000

महाराष्ट्रात कंत्राटदार जन्मालाच आले नाहीत का?’; नाशिक कुंभमेळ्यातील गुजरातच्या कंत्राटदारांवरून राज ठाकरेंचा सरकारला सवाल.

 

महाराष्ट्रात कंत्राटदार जन्मालाच आले नाहीत का?’; नाशिक कुंभमेळ्यातील गुजरातच्या कंत्राटदारांवरून राज ठाकरेंचा सरकारला सवाल.           उत्तर:हो., फक्त ते पत्रा चाल , माहीम वरळी मधील मुंबई मध्ये अडकून पडले आहेत आणि भागीदारी गुजराथी, मारवाडी बरोबर, प्यार का वडा फिफ्टी फिफ्टी.

Featured post

Lakshvedhi