Showing posts with label खट्टा-कट्ट. Show all posts
Showing posts with label खट्टा-कट्ट. Show all posts

Saturday, 27 April 2024

*वाचनात आलेले छानसे असे काही.

 *वाचनात आलेले छानसे असे काही....* 

👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼


लंडनच्या एका चर्चमधे ‘अल्फ्रेड डनहिल’(Alfred Dunhill) नांवाचा एक माणूस ‘सफाई कामगार’ म्हणून काम करत होता. चर्चची जमीन रोज झाडून काढणे, टेबल्स व बेंचेस पुसणे, तसेच चर्चमधले छोटेसे स्टेज व बोलण्याचा स्टँड चकाचक साफ ठेवणे हे त्याचे मुख्य काम होते. तसेच तो चर्चचा केअरटेकर पण होता. 


चर्चमध्ये काम करणाऱ्या माणसाचे कमीत कमी शालेय शिक्षण तरी पूर्ण असावे, असा या चर्चचा नियम होता. डनहिल तर अशिक्षित होता. त्याचे शालेय शिक्षण पूर्ण झालेले नव्हते. त्यामुळे त्याला लिहिता वाचता येत नव्हते. त्या चर्चचा जो मुख्य पाद्री म्हणजेच फादर होता, त्याला चर्चचे काही नियम धाब्यावर बसवण्याची सवय होती. म्हणूनच डनहिलसारखा एक अशिक्षित माणूस त्या चर्चमधे काम करू शकत होता. 


डनहिलने पण बरीच वर्षे, म्हणजे उतारवय होईपर्यंत तेथे काम केले. वृद्धत्वामुळे चर्चचा जुना प्रमुख निवृत्त झाला व त्याजागी एक तरूण माणूस चर्चचा प्रमुख म्हणून आला. तो चर्चच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणारा होता. जेव्हा त्याला कळले की डनहिलचे शालेय शिक्षण पूर्ण झालेले नाही, तेव्हा त्याने डनहिलला नोटीस पाठवली व सहा महिन्यांच्या आत शालेय शिक्षण पूर्ण करून तसा दाखला आणण्यास सांगितले. 


डनहिलला जाणवले की त्याच्या या उतारवयात सहा महिन्यात शालेय शिक्षण पूर्ण करणे शक्य नाही. तुम्ही उतारवयातील कुत्र्याला नवीन ट्रिक्स शिकवू शकत नाही. त्यामुळे राजीनामा देण्याशिवाय गत्यंतर नाही हे त्याच्या लक्षात आले. पुढे काय करायचे हा मोठा प्रश्न होताच.


एके दिवशी दुपारी डनहिल विचार करत पायी फिरायला बाहेर पडला व चालत लंडनच्या प्रसिद्ध बॉन्डस्ट्रीटवर आला. त्याला सिगारेट ओढायची तल्लफ आली म्हणून त्याने सिगारेटचे दुकान शोधायला सुरूवात केली. त्याला आख्ख्या बॉन्ड स्ट्रीटवर कोठेही सिगारेटचे एकही दुकान आढळले नाही. 


शेवटी बाजूच्या एका छोट्या गल्लीत सिगारेटचे एक छोटेसे दुकान आढळले. 'आपण बॉन्ड स्ट्रीटवर जर सिगारेटचे दुकान टाकले तर ?' डनहिलच्या मनात आले. लगेच त्याच्या मनात बिझनेसचा प्लॅन पक्का झाला.

त्याने चर्चच्या नोकरीचा राजीनामा दिला व बॉन्ड स्ट्रीटवर स्वतःचे एक छोटेसे सिगारेटचे दुकान चालू केले. बघता बघता त्याचे दुकान लोकप्रिय झाले व धंदा तुफान चालू लागला. 


त्याने बघितले की त्याच्या दुकानात येणाऱ्या  ग्राहकांपैकी बरेच ग्राहक हे बॉन्ड स्ट्रीटच्या पलिकडच्या बाजूने येतात. लगेच त्याने पलीकडच्या बाजूला दुकान टाकले. बघता बघता त्याच्या दुकानांची संख्या दोनाची चार करत, तीन वर्षात सोळा झाली. 

अल्फ्रेड डनहिल कंपनी इंग्लंडमधला आघाडीचा टोबॅको ब्रॅन्ड झाला. 


पुढे त्याने स्वतः मशीनवर सिगारेट्स बनवायला सुरूवात केली व *‘डनहिल’* या ब्रॅन्डखाली सिगारेट्स विकायला सुरूवात केली व तो पाच वर्षात लक्षाधीश झाला.


त्याच्या सिगारेट्ससाठी सतत तंबाखूचा पुरवठा व्हावा, त्यासाठी अमेरिकेतील दोन तंबाखू उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांबरोबर करारनामा (agreement) करायला तो स्वतः अमेरिकेला गेला. या करारामुळे त्या दोन अमेरिकन शेतकऱ्यांचे नशीब तर फळफळलेच, पण तो करार हा एक महत्वाचा सार्वजनिक समारंभच ठरला. कारण या समारंभासाठी गव्हर्नर व सिनेटर जातीने उपस्थित होते. 


या करारावर इतरांनी सह्या ठोकल्या. पण डनहिलने मात्र आपला हाताचा अंगठा उमटवला, कारण त्याला सही करायला येत नव्हती. 

हे पाहून गव्हर्नर चांगलेच प्रभावित झाले व डनहिलला म्हणाले, 


‘सर... हे खरोखरच अप्रतिम आहे. तुमचे काहीही शिक्षण झालेले नसताना देखील तुम्ही एवढे प्रचंड यश मिळवलेत. जर तुमचे शिक्षण झाले असते तर काय झाले असते ?’ 


डनहिलने त्यांना मिस्किलपणे उत्तर दिले, ‘मला जर लिहिता वाचता आले असते, तर अजूनही मी चर्चमधे झाडू मारण्याचे व फरशा पुसण्याचे काम करत राहिलो असतो.’ 


*आज सुद्धा ‘डनहिल’ हा जगप्रसिद्ध सिगारेट ब्रॅन्ड आहे.*


*अन् ही खरी गोष्ट आहे.*

Monday, 23 October 2023

डालडाचा डब्बा ...!!

 डालडाचा डब्बा ...!!


दिवाळी ज्या महिन्यांत असायची त्या महिन्याच्या वाण सामानाच्या यादींत एरवी न येणारे काजू, बेदाणे , बदाम पिस्ते ह्याबरोबरच डालडाचा एक मोठ्ठा डब्बा हमखास असायचा. दिवाळीत डालडाला अनन्य साधारण महत्व असायच.

तेल आणि तूप ह्यामधला तो प्रकार, त्याचा तो दंडगोलाकृती आकाराचा पत्र्याचा डबा, पिवळा रंग आणि त्यावरच ते ताडाच का खजुराच्या हिरव्या झाडाच रेखाचित्र......!


एरवीही घरोघरी डालडा असायचाच, त्याचा छोटा डबा रिकामा झाला की त्याच हमखास टमरेल व्हायच आणि दिवाळीत आलेला मोठा डबा रिकामा झाला की त्याची तुळशीची कुंडी व्हायची. तुळशीच लग्न लागून गेलं की त्या कुंडीतली ती तुळसाबाई बिचारी सुकून जायची आणि लाल मातीने भरलेली ती डालडाच्या डब्याची कुंडी हळुहळू गंजत जायची....!


डाएटीशियन नांवाच्या प्रजातीचा तेंव्हा उगम झालेला नव्हता त्यामुळे सर्वसामान्य माणसं पानांत पडेल ते अन्न सुखाने खात होती. “कॅलरी” नावांच कांही परिमाण समोर आलेल्या अन्न पदार्थांची मजा घेत चवीने खायच्या ऐवजी त्याचा विचका करायची “Diet Consciousness” चिकित्सा संपूर्णपणे अपरिचीत होती त्यामुळे सणासुदीला डालडांत तळलेल्या टम्म पुऱ्या आणि घरच्या दह्याचा (मलमलच्या फडक्यांत बांधून रात्रभर लोंबत ठेवललेली ती गठडी...) चक्का बनवून त्यांत साखर, केशर, वेलची, जायफळ आणि चारोळ्या घालून तयार केलेलं अस्सल श्रीखंड - पुरीच जेवण हादडून सगळी मंडळी दुपारची मस्त ताणून देत असत...तब्येतीत जगत असत.


शाळेतल्या सहलीला जातांना सकाळी लवकर उठून आई बटाट्याची पिवळी भाजी, डालडात तळलेल्या पुऱ्या आणि एका छोट्या डबीत घातलेलं लिम्बाच लोणच असा डबा तयार करायची ... त्याच्या वासानेच सकाळी सकाळी सातच्या आत भुकेचा लोळ पोटांत उठायचा....!


दिवळींत घरांतले मोठ्ठाले डबे भर भरून मेसुरपाक (कां म्हैसूरपाक ) , कडक बुंदीचे लाडू , जिलेबी वगैरे पदार्थ सर्रास डालडा वापरून बनवले जायचे आणि ते छान लागायचे....हे खाऊन कुणाच बेली फॅट वगैरे वाढल्याच्या तक्रारी कधी चुकुनही ऐकलेल्या नव्हत्या ना कधी ‘डालडा खाऊ नका हो... मराल’ !! असा कुठल्या डॉक्टरने धमकीवजा सल्ला दिला होता....थोडक्यांत काय डालडा हा खाद्य जीवनाचा आणि संस्कृतीचा एक अविभाज्य भाग होता.


१९३० साली प्रथमच तुपाला पर्याय म्हणून हे Hydrogenated Vegetable Fat डच व्यापारी भारतांत घेऊन आले....हळूहळू त्याचा प्रसार होऊ लागला कारण भारतांत तूप न परवडणारी जनता तेंव्हाही अस्तित्वांत होती. डाडा अॅण्ड कंपनी नामक एका डच कंपनीकडे ह्याचे सगळे व्यापारी हक्क होते.....ह्या वस्तूला हिंदुस्थानात जबर मागणी असणार आहे हे ओळखून त्यावेळच्या Lever Brothers ह्या कंपनीने Hindustan Vanaspati Manufacturing Company नांवाने एक कंपनी सुरु करून Hydrogenated Vegetable Fat भारतातच बनविण्यासाठी मुंबईच्या शिवडीला एक कारखाना टाकला. डाडा अॅण्ड कंपनीकडून सगळे हक्क विकत घेतले पण डाडा कंपनी आपलं नाव Product Brand Name मध्ये असावं म्हणून अडून बसली तर Levers आपल्या नावांतल “L” अक्षरावर अडून बसले शेवटी Da Da च्या मध्ये L घालून DALDA (डालडा) हे सोपं सुटसुटीत Brand Name तयार झालं आणि १९३७ सालापासून सर्वसामान्य भारतीयांच्या खाद्य जीवनांत डालडा येऊन बसला तो कायमचा...!


अजूनही डालडाच अस्तित्व आहे पण त्याची पूर्वीची ती शान राहिलेली नाही. हल्ली डालडाला वनस्पती ऑइल म्हणतात.. प्लास्टिकच्या थैलीत तो मिळतो....डालडाचा तो प्रसिद्ध पत्र्याचा दंड गोलाकृती पिवळ्या रंगाचा डब्बा हल्लीच्या पिढीला माहितही नसणार. त्यामुळे त्याचे दिवळीतले महत्व सुद्धा आता इतिहास जमा झाले आहे.


रेडिमेड कपड्यांसारखे रेडिमेड लाडू करंज्याची पार्सलं दादरच्या रानडे रोडवर, दिवाळीच्या मोसमांत ठायी ठायी मिळतात. अगदी अमेरिकेत सेटल झालेल्या लेकरांना ही पार्सलं घरपोंच मिळण्याची व्यवस्था सुद्धा अगदी सहजी होते. अमेरिकेतली पिढी त्यालाही घरचा फराळ मानून धन्य आहे ही त्यांतली जमेची बाजू.. !


एरवी घरांतल्या आया-बहिणीने अपार कष्ट करून बनवलेल्या फराळाला असलेली त्यांच्या हाताची चव, त्यांच्या मायेचा, प्रेमाचा आपुलकीचा दरर्वळ, त्यांतली स्निग्धता ती कशी काय एक्सपोर्ट करणार ? असो.. जे कांही शिल्लक आहे तेही नसे थोडके.. बाकी सारे कालाय तस्मै नम:


प्रदीप अधिकारी.

जिवन गाणे

 मस्तक थोडं वाकवून बघा अहंकार मरून

जाईल.

डोळ्यांना थोडं ओलं करून बघा दगडी मन ही वितळेल.

वाणीवर थोडं संयम ठेऊन बघा दुःखाच काळ निघुन जाईल..

इच्छा थोड्या कमी करून बघा आनंदाचं

जग दिसू लागेल.

विष आणि शब्द एकाच ताकदीचे आहेत. विषाचा एक थेंब शरीरात शिरला की, जीवन संपवतो. आणि गैरसमजूतीचा एक शब्द कानात शिरला की, भली भली नाती संपवतो.

        ,, *सुप्रभात,*

Saturday, 16 September 2023

मोगऱ्याचं फूल ओंजळीत घेतलं की त्याचा गंध मनाला, शरीराला प्रसन्न करून जातो.

 *माणसं मनातली......* 🌹

मोगऱ्याचं फूल ओंजळीत घेतलं की त्याचा गंध मनाला, शरीराला प्रसन्न करून जातो.

सहवासातील माणसाचं देखील असंच असतं.

काही माणसं काही क्षणातच मनाला खूप आवडतात, आपली होऊन जातात.

तर, काही कितीही सहवासात राहिली, तरी त्यांची आतून ओढ नसतेच...

चेहरा बघण्यापेक्षा नेहमीच समोरच्याच्या मनात उतरून बघावं. शोधूनही तिथं माणूसपण सापडत नसेल, तर त्याचं सुंदर दिसणंही मग किळसवाणं वाटतं...

शरीराची सुंदरता वया बरोबर संपते, तर मनाची सुंदरता शेवटपर्यंत टिकून राहाते. शरीराला वय असतं, मनाला ते कधीच नसतं...

शेवटी काय, आपण व्यक्तीच्या स्वभावाच्या प्रेमात असतो, शरीर तर निमित्त मात्र असतं.

माणसाच्या स्वभावात गोडवा, शालीनता, प्रामाणिकपणा, आणि विनयशीलता असेल, तर त्याची काही क्षण जरी सोबत मिळाली तरी ती हवीहवीशी वाटते...

म्हणूनच बाहेर लक्ष दिव्याची सुंदर आरास असूनही, देवघरातील समईच्या तेजापुढं आपण नतमस्तक होतो...

आयुष्यात अशी माणसं कधी भेटली तर त्यांच्यावर जीवापाड प्रेम करावं!!

आपल्या आवडत्या माणसाचं आपल्या सोबत असणं, ही आयुष्यातील सगळ्यात मोठी कमाई...

ती प्रत्येकाच्या वाट्याला येतेच असं नाही.

आजकाल अशी माणसं भेटतात तरी कुठे?

नशिबानं कधी भेटलीच तर हळुवार जतन करून ठेवावीत...

  कदाचित, पुन्हा भेटतील ,न भेटतील?

Sunday, 27 August 2023

गणितात अशी कोणती संख्या आहे ज्या संख्येला १ ते १० पर्यंतच्या सर्व संख्यांनी नि:शेष भाग जातो.*

 *गणितात अशी कोणती संख्या आहे ज्या संख्येला १ ते १० पर्यंतच्या सर्व संख्यांनी नि:शेष भाग जातो.*


*अशी कोणतीही संख्या नाही असेच बहुतांश जणांचे म्हणणे होते.*


 *पण हा एक आकडा खूपच विचित्र आहे आणि जगातील सर्व गणितज्ञांना धक्का बसला आहे.*


*ही संख्या भारतीय गणितज्ञांनी त्यांच्या अविचल बुद्धिमत्तेने शोधून काढली.*


 *ही संख्या २५२० पहा.*


 *ही अनेक संख्यांपैकी एक असल्याचे दिसते,*


 *…. तथापि, प्रत्यक्षात तसे नाही,*


*२५२० ही अशी संख्या आहे, ज्याने जगभरातील अनेक गणितज्ञांना आश्चर्यचकित केले आहे.*


 *२५२० या संख्येला १ ते १० पर्यंतच्या कोणत्याही संख्येने नि:शेष भाग जातो.*


 *सम किंवा विषम:*


 *हे खरोखर आश्चर्यकारक आणि अशक्य असल्यासारखे वाटते.*


 *आता, खालील तक्ता पहा;*


 *२५२० ÷ १ = २५२०*


 *२५२० ÷ २ = १२६०*


 *२५२० ÷ ३ = ८४०*


 *२५२० ÷ ४ = ६३०*


 *२५२० ÷ ५ = ५०४*


 *२५२० ÷ ६ = ४२०*


 *२५२० ÷ ७ = ३६०*


 *२५२० ÷ ८ = ३१५*


 *२५२० ÷ ९ = २८०*


 *२५२० ÷ १० = २५२*


 *२५२० या संख्येचे रहस्य [ ७ × ३० × १२ ] च्या गुणाकारात लपलेले आहे.*


*भारतीय हिंदू वर्षाच्या संदर्भात, या २५२० क्रमांकाचे कोडे सोडवले आहे.*


 *हे या संख्येचे गुणांक आहेत.*


 *आठवड्याचे दिवस (७),*


 *महिन्याचे दिवस (३०)*


 *आणि वर्षातील महिने (१२)*


 *[ ७ × ३० × १२ = २५२० ] हे काळाचे वैशिष्ट्य आणि प्रभुत्व आहे.*


 *महान गणिती ज्याने ते शोधले होते;*

*श्री श्रीनिवास रामानुजम.* 

🙏🙏🌹🌹

Monday, 31 July 2023

मैत्रिणी हा श्वास असतो , मैत्रिणी हा ध्यास असतो*

 . *': मैत्रिण :'*


*मैत्रिणी हा श्वास असतो , मैत्रिणी हा ध्यास असतो*

 

*एखादी चंचल असते , तर एखादी शांत असते , एखादी बोलकी तर एखादी अबोल*

  

*एखादीचं हास्य स्मित असतं तर एखादीचं हास्य खळखळून असतं*

 

*एखादीला साडीच आवडते तर कोणाला ड्रेस, तर कोणाला Western Out Fit*


*एकत्रित जेवायला जातील , पण घरातील सगळ्यांच खाण्याचं करून निघतील .*


*सगळ्याच एकमेकीस सांगतील आज मी निवांत ताव मारणार आहे , पण गप्पा टप्प्याच्या नादात थोडेच खातील* 


*कोणी धैर्यवान असतात तर कोणी भागूबाई असतात* 


*कोणी नोकरीत,कोणी व्यावसायिक. कोणी छान गृहिणी ,*


*कोणी तानसेन तर कोणी कानसेन. आवड प्रत्येकाची वेगवेगळी* 


*आनंद घेतात क्षणभर अन दुःख विसरतात मणभर* 


*जीवन रुपी प्रवासात गरज असते मैत्रिणींच्या कळपाची कारण त्यांच्या सहवासात ऊब मिळते माहेरच्या माणसांची* 😊😊

Monday, 24 July 2023

राष्ट्रीय पालक दीन,

 [ जुलैचा चौथा रविवार "राष्ट्रीय पालक दिन" या निमित्तानं आपण "पालकांचं अर्थात आई-वडिलांचं" स्मरण करून त्यांचं आपल्या जीवनातील स्थान अबाधित ठेवू या 🌹🌹🙏🙏 खरं तर हा मालिकेतील संवाद....पण आपल्या सगळ्यांना आत्मपरीक्षण करायला लावणारा आणि ह्रुदयस्पर्शी 👌👌👍👍 कटू सत्य राजे maharajrn ना सुद्धा ह्या अग्निदियांतून जावे लागले आहे


Monday, 17 July 2023

*उंबरा •••* उंबरठा

*उंबरा •••*  


उंबरा म्हणजे लाकडी दाराच्या चौकटीत खालच्या बाजूस बसविलेले जाड,रुंद आणि सपाट लाकूड.*दाह शमन करणारा आणि दीर्घकाळ पाण्यात टिकून रहाणारा वृक्ष म्हणजे (औदुंबराचा) उंबराचा वृक्ष.* म्हणूनच पूर्वीच्या काळात घराचा उंबरा हा उंबराच्या खोडापासून बनत असे.या वृक्षाच्या नावावरुनच दाराच्या चौकटीत बसवायच्या या लाकडाचं नाव उंबरा असे पडले असावे.उंबराचा वृक्ष हा कृतिका नक्षत्राचा आराध्यवृक्ष आहे आणि त्याच्या औदुंबर या नावाने त्याला शुभ असे धार्मिक अधिष्ठानही प्राप्त झालेले आहे.


साक्षात दत्त निवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे.२१ गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरु माऊली दत्तांनी साधना केली. *औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील.* तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतील.*या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होते.*


काही वर्षे पाठीमागे गेल्यास घरातील गृहिणी रोज सकाळी उंबऱ्याची पुजा न चुकता करायची.*उंबरठ्यावर नृसिंहलक्ष्मीचे स्थान असते.तर चौकटीवर गणेशाचे स्थान असते. घरात कोण,कसे, काय घेऊन जातेय त्यावर त्याचे ध्यान असते.*


उंबरठा किती अर्थ होता त्या उंबरठ्याला...उंबरठा म्हणजे, दाराच्या चौकटीवर बसवलेली एक लाकडाची पट्टी.पण,किती अर्थ होता या लाकडी पट्टीला. चौकटी बाहेर पाऊल टाकायला पुर्वी कुणीही धजत नसे.सातच्या आत घरात हा पुर्वीच्या लोकांचा प्रघात होता.आता तर कुणी बाराच्या आतही घरात येत नाही. पुर्वी बायका म्हणायच्या कि आमच्या उंबरठ्याचा गुण आहे, *आमच्या घराचा उंबरठा ओलांडून लेक घरात आली कि तीला आमचे गुण लागलेच म्हणून समजा. हाच उंबरठा प्रतिष्ठेचा प्रतिक मानला जायचा.* ज्या घराला उंबरठा नाही ते काय घर म्हणावं का..? ज्या घराला उंबरठा नाही तेथे कुणाचाच पायपोस कुणाला नसतो असे म्हणतात.आओ जाओ घर तुम्हारा.*सणवार आला कि उंबरठा सारवला जायचा त्याच्या आजूबाजूला सुबक अशी रांगोळी काढली जात असे.* दारावर तोरण बांधले जायचे. तेच फ्लॅट संस्कृतीमध्ये लाकडी उंबरठा कालबाह्य झालाय.आता बैठकीच्या खोलीतूनच सगळे किचन दिसते. काहीच आडपडदा नको. कोणीही उपटसुंभ येतो व वहिनी वहिनी करत घरातच घुसतो. ना मानसन्मान ना मर्यादा किती सुधारलो ना आपण ?


*नववधू घराच्या उंबरठ्यावर ठेवलेले माप लांघत घरात प्रवेशते.* उंब-याला गृहित धरत आपण बरेचसे शुभ अशुभ संकेत मानतो. घरातल्या उंब-याच्या खूप साऱ्या भूमिका असल्या तरीही उंबरा असते एक मर्यादा.*उंबरा असते एक सीमारेषा.उंबरा म्हणजे आपल्याला भानावर आणणारी नेमकी गोष्ट..!* 


*बाहेरुन घरात येणाऱ्यांसाठी आपला इगो चपलांच्या सोबत बाहेर काढून ठेवायची जागा म्हणजे उंबरा. प्रवेशात असलेल्या घरातल्या चालीरीतींना मान देत आपण वागायचं आहे हे उंबऱ्याची वेस ओलांडतानाच मनात बिंबवून यायचं असतं आणि घरातून बाहेर पडत असताना त्या घराने आपल्यावर केलेले संस्कार बाहेर पडल्यावरही आपण विसरणार नाही हे लक्षात आणून देणारी जागा म्हणजे उंबरा.*


उंबरा म्हणजे आत्मभान जागृत ठेवणारं स्थान.उंबऱ्याबाहेर पडल्याशिवाय जग काय आहे हे कळत नाही हे म्हणतात ते अगदी खरं आहे. *उंबरठे झिजवल्या शिवाय यश पदरात पडत नाही हे सुद्धा खरंच.* पण उंबरठे झिजवताना आपल्यावर आपल्या उंबऱ्याने केलेले संस्कार लक्षात ठेवले तर निसरड्या जागांचा सामना करणं सोपं होत असतं. अजून एक गोष्ट इथे नमूद करायलच हवी. ती म्हणजे उंबऱ्याच्या बाहेर पडण्यासाठी फार मोठं धैर्य लागतं आणि बाहेरच्या जगात वावरण्यासाठी मर्यादेचं फार मोठं भान लागतं.हे भान जे कोणी जपतं त्याचं आयुष्यात नेहमीच सुंदर होत असतं.


*उंबरा म्हणजे लक्ष्मण रेषा.जे जे अपवित्र असेल,वाईट असेल त्या वस्तू असतील,विचार असतील त्यांना उंबऱ्याच्या आत थारा नाही.* मग ते काहीही असु शकते. भ्रष्टाचाराचा पैसा असेल, कुलक्षणी मित्र असतील, व्यसनांसाठी लागणारे साहित्य असेल,वाईट विचार असतील त्यांना उंबऱ्याच्या आत स्थान नाही. *म्हणूनच जे वाईट प्रवृत्तीचे कोणी आले तर उंबऱ्याच्या बाहेरूनच निरोप दिला जायचा.* म्हणून पुर्वीच्या घरांना ओसऱ्या असत. चहापाणी,गप्पा बाहेरच व्हायच्या. घरातील गृहलक्ष्मीला सुद्धा कधी बाहेर जायचे आणी कधी नाही हे कोण आलंय याचे भान असायचे. आता काय भावोजी भावोजी करत असेल त्या अवतारात बाहेर.घरातील संस्कार,जेष्ठांचे वर्तन,मुलांचे वळण हेच त्या घराचे व्यक्तीमत्व ठरवते.*उंबरा म्हणजे मर्यादा. जशी नदीला दोन काठांची मर्यादा असते,सागराला किनाऱ्याची मर्यादा असते तसेच घराला उंबऱ्याची मर्यादा असते.* ज्यावेळी नदी,सागर मर्यादा ओलांडतात तेव्ह जलप्रलय येतो. *तसेच उंबऱ्याची मर्यादा ओलांडली की कुटुंबावर संकट ठरलेले आहे.*

म्हणूनच आपण आपली संस्कृती जपली तर पुढील पिढी त्यातून आदर्श घेईल.

*एकुणच काय मर्यादा प्रभू श्रीरामांनी पाळली, आपण ती ध्यानात ठेऊ,उंबरा ओलांडताना मर्यादेचं भान ठेऊ.*


लेखक - अज्ञात

कथा चालू होती

 😂 कथा चालू होती.


कथाकार म्हणाला - "मी तीन प्रकारच्या लोकांना सर्वात दुर्दैवी मानतो.


नवीन कपडे असताना जुने कपडे घालणारा पहिला.


दुसरे, ज्याच्या घरात गव्हाचे डबे भरलेले असतात तो उपाशी राहतो.


असे बोलून कथाकार शांत झाला आणि त्याच्या डोळ्यात पाणी आले.


भक्तांनी विचारले, आता तिसऱ्या दुर्दैवी व्यक्तीबद्दल सांगा, प्रभु.


मग कथाकार भरल्या गळ्याने म्हणाला -


तिसरा माणूस तो आहे जो पैसा असूनही बायकोच्या भीतीने पिऊ शकत नाही!


हे ऐकून सर्वच भक्त रडू लागले!


हॅपी गटारी 😆😆

Tuesday, 11 July 2023

पुणे तथे काय उणे

 शेजारच्या घरातून साजूक तूप-जिऱ्याच्या फोडणीचा सुगंध येत होता. कॅलेंडरमध्ये पाहिलं. आज चतुर्थी आहे हे समजलं. मग मी एक मध्यम आकाराचा डबा घेतला. त्यात अर्धा डझन केळी घालून शेजारच्या काकूंकडे गेलो. गावाकडची स्पेशल गावठी केळी खास तुमच्यासाठी आणलीत असं सांगितलं. तब्बेतीची चौकशी केली. काकू बारीक दिसत आहेत असंही सांगितलं. काकू खुश झाल्या. घरी परतलो आणि सोफ्यावर पाय पसरून फेसबुक वाचू लागलो. अपेक्षेप्रमाणे पाचच मिनिटात बेल वाजली. मी आनंदाने दार उघडलं. काकू डबा परत द्यायला आल्या होत्या! मी स्मितहास्य करत डबा घेतला. दार बंद करून खमंग साबूदाणा खिचडी खायला सज्ज झालो. डबा उघडताच निराश झालो. काकूंनी दोन मोठी उकडलेली रताळी घालून डबा परत केला होता. कोकणातील युक्त्या पुण्यात चालत नाहीत याचा पुनःप्रत्यय मिळाला. 


एका नव्याने पुण्यात गेलेल्या कोकणी माणसाची व्यथा

😂😂😂

Sunday, 25 June 2023

शॉर्ट कट रे बाबनु

 😊😇 रडल्यानंतर मन मोकळं होवो ना होवो पण.. नाक मात्र नक्की मोकळं होत..😂  


जिथे मारामारी करणं शक्य नाही.. तिथे टोमणे तरी मारूनच यायचं.. सोडायचं नाही अजिबात..😂 


गाढ झोपेत काहीच ऐकू न येणाऱ्या लोकांना.. "तिकडे सरक" हा शब्द कसा काय ऐकू जातो..? 😂 


आपल्या सोबत गाडीवर मागे बसलेली व्यक्ती फक्त Hmm Hmm करत असतो.. त्याला काहीच ऐकू येत नसतं..😂 .  


जर तुम्हाला तुमचं घर लहान वाटत असेल.. तर एखाद्या दिवशी फरशी पुसून बघा..😂 


होमिओपॅथीची औषधं घेण्यातली मजा काही औरच...

औषधाच्या बाटलीतून ४ गोळ्या काढाव्या म्हटलं तर साबुदाण्याच्या ६ गोळ्या बाहेर पडतात. त्यातल्या पुन्हा २ गोळ्या परत टाकायला गेलो तर ४ गोळ्या बाटलीत परत जातात... 😂

या गदारोळात रोग्याचं लक्ष आजारावरून दूर होतं आणि तो लवकर बरा होतो...


😂खरं पाहिलं तर जगातला कुठलाच मनुष्य शाकाहारी नसतो ...

कारण , 

थोडं बहुत डोकं तर प्रत्येक जण खात असतो.

😛😛😛😛😛😛


🌹 नोटा कागदापासून बनतात, कागद लाकडापासून बनतो आणि लाकूड झाडापासून मिळतं .......

याचा अर्थ असा की पैसे झाडाला लागतात. 😜😜👍👍


🌹 विवाहित माणसाला त्याच्या जीवनात किमान दोन खर्च तरी करावेच लागतात...

१. बायको गोरी असेल तर..

Sun Screen...

आणी

२. सावळी असेल तर...

Fair & Lovely.....

😝😝😝😝😜


🌹 म्हणतात की, जो हसला, त्याचं घर बसलं !!

पण .........

ज्याचं घर वसलं, त्याला विचारा......

की तो मग केव्हा हसला??

😄😄😄😛😛😛


🌹 बायकोला समजून घेणं म्हणजे :~

32 GB चा 

Video Download करणं.

आणि ..........

31.5 GB Download

झाल्यावर Error मेसेज दिसणं !!!!

😝😝😝😝


🌹 जगात केवळ तेच लोक साधेभोळे असतात, ज्याच्या मोबाइल मध्ये पासवर्ड नसतात.

😛😛😛😛😛😛


🌹 कांही लोक whatsapp वर फक्त

दोनच स्टेटस पोस्ट करतात....

पहिलं:-- good morning....

दूसरं:-- good night .....

असं वाटतं..... जणू whatsapp च्या दुकानाचं शटर उघडायची आणि बंद

करायची जबाबदारी यांच्यावरच सोपवली असावी...... आणि मालाच्या खरेदी - विक्रीची जबाबदारी आपली.

😜😜😜😒😒


🌹एक सर्व्हेनुसार, आजही आपल्या देशात......

'तू प्यार है, किसी और का, तुझे चाहता कोई और है'

हे गाणं वाजल्यावर १० पैकी ८ मुलं इमोशनल होऊन जातात ...

💔💔😂😂😝😝


🌹 माणूस सर्वात अधिक खुश तेव्हा होत असतो, जेव्हा रेल्वे फाटक बंद होत असतं त्याच्या आधीच तो आपली गाडी फाटका पलिकडे काढून घेतो.......

आई शप्पथ सांगतो की त्याला आॕलिंपिक रेस जिंकल्याचं समाधान मिळत असतं.

😂😂😂😂


🌹 अजून पर्यंत हे समजलं नाही की 

OK च्या ऐवजी K आणि GOOD MORNING च्या ऐवजी GM लिहिणारे, आयुष्याचे २ सेकंद वाचवून काय करत असतील ?

आणि .....ह्या hmmm ...वाल्यांनी तर फारच त्रास दिला आहे, असं वाटतं की आपण म्हशीशीच बोलतोय ! 

😜😜😃😛


🌹So confusing 😳

आई बाप आपल्या मुलीसाठी सुयोग्य स्थळ शोधताना दोन गोष्टींकडे लक्ष देतात...

पहिली म्हणजे मुलगा खात्या पित्या घरातला असावा.....

आणि दूसरी

तो पिणारा - खाणारा नसावा ....

हे कसं काय बुवा ....?? 

😳😄😂😂


गळ्यात मंगळसूत्र पडलेलं असेल तर मुलीचं लग्न झालेलं आहे.....

आणि

चेहरा पडलेला असेल तर मुलाचं लग्न झालेलं असावं ,,,,

😂😜😂😜😂😭😜


🌹जीवन चांगलं जगायचं असेल तर हसणं आवश्यक आहे. ।।।🌹

🙏🤗🙏🤗🙏🤗🙏

Saturday, 24 June 2023

पहिला नशा पेहेला खुमा

 *"भाव अत्तराचे आज पार कोसळले,* 

*थेंब पावसाचे जेव्हा मातीत मिसळले".*    

                         

*मिजास अत्तरांची क्षणात विरून गेली..* 

*पहिलीच सर जेव्हा,* 

*मातीत जिरून गेली..!!!* 



*पहिल्या पावसाच्या शुभेच्छा !*


⛈️🌧️🌨️💦

Sunday, 18 June 2023

स्त्री-पुरुषांमध्ये मैत्री असावी का ?-


स्त्री-पुरुषांमध्ये मैत्री असावी का ?-----

का? नसावी ----

स्त्री-पुरुषांची मैत्री म्हटली की अनेकांच्या पोटात गोळा येतो एका वेगळ्या नजरेने बघितले जाते

आम्ही 21व्या शतकात वावरत असताना सुद्धा आमचे विचार मनुवादी विचारसरणीचेच आहेत,

खरंतर हा विषय गहन च आहे

लिहिण्याच धाडस करत आहे

किती पर्यंत जमेल माहित नाही,

 आज ही समाजव्यवस्थेत स्त्री पुरुषाच्या मैत्रीला कुटुंबात व समाजात मोकळे असे स्थान नाही ,

स्त्री पुरुष मैत्री म्हणजे फक्त शारीरिक संबंधच, असे आम्ही गृहीतच धरले आहे,

हाच विचार रूढ केला आहे,

'राधा 'आणि कृष्णाची '' मैत्री आम्ही स्वीकारली, कान्हा वर प्रेम व भक्ती करणारी '' मिरा" ही आम्ही स्वीकारली,

परंतु स्त्री पुरुषाची मैत्री म्हटलं की भुवया उंचावतात, त्यातल्या त्यात ते जर, विवाहित असतील तर मग बघायलाच नको,

मानवी संस्कृतीच्या इतिहासात स्त्री एक स्वतंत्र व्यक्तीमत्व असलेली मानव आहे, या विचाराशी परीचित व्हायला गेल्या शेदिडशे वर्षात सुरूवात झाली आहे. स्त्रीला एक मानव म्हणून स्विकारणे, तीला एकसमान समजणे तरी अजूनही रूजलेले नाही. 


स्त्री पुरूष यांच्यातील सबंधाचा विचार केवळ नरमादी वा केवळ एकच नात्याच्या अनुषंगाने करणारे लोक, निव्वळ संकुचित वा बुरसटलेले नव्हे तर ते मानव या अर्थाने उत्क्रांतही झालेले नसतात. स्त्रीयांना स्वतंत्र बुद्धी असते ही बाबच अनेकांना मान्य नसते असे लोक कोणत्याही स्त्रीपुरूषांना एकाच नात्याने पाहत असतात. 


लिओ टॉलस्टॉय म्हणताच ' nothing is so necessary for man, as to the company of intellectual women'. टॉलस्टॉय ने स्त्रींयाबाबतच लिहीलं कारण त्यावेळी स्त्रीया बुद्धीमान नसतात ,असा समज होता. प्रत्येक यशस्वी पुरूषाच्या वा स्त्रीच्या मागे पुरूष वा स्त्री असते. जरूरी नव्हे की ती स्त्री पत्नीच असेल वा तो पुरूष तीचा पतीच असेल! हा आधुनिक, स्त्रीपुरूष समतावादी, मुक्त, स्वतंत्रतावादी असू शकतात

मुळात मैत्रीचा पाया शारीरिक नसुन मानसिक भावनिक आणि वैचारिकतेचा आधारावर उभा असतो, हे आम्ही लक्षातच घेत नाही,

शारीरिक भुके पेक्षा ही बौद्धिक आणि मानसिक भुकेसाठी ते एकत्र येऊ शकत नाही का?

प्रत्येक नात्याला' एक मर्यादा असते 'हे तर आम्ही मान्य करतो,

पती -पत्नीशी जे बोलू शकत नाही' 

किंवा पत्नी - पतीशी जे बोलू शकत 'नाही परंतु आपल्या मित्रा शी नक्कीच बोलते हे हक्काचं विश्वासाचे नाते नाही का,?

मैत्री मध्ये समविचारांची देवाण-घेवाण विचार विनिमय संकटात एकमेकांना सहाय्य एकमेकावर आढळ विश्वास एकमेकांसाठी झोकुन देण्याची भावना अपार मायेची प्रेमाची श्रृंखला मी पनाचा व अहंकाराचा लवलेशही नसतो, एकमेकांचे हितचिंतक असतात.

ती त्याची मैत्रीण अगदी सहजतेने स्वीकारते तसेच त्यांने ही अगदी सहजतेने तिच्या मित्राला स्वीकारले पाहिजे. दोन्ही नात्यात सहजता असेल ना तर कुठेच प्रॉब्लेम येत नाही. परंतु तसे होत नाही,

 पती आपल्या पत्नीला म्हणत असतो की मी तुझ्यावर खूप प्रेम करतो

परंतु प्रेम म्हणजे काय हे अनेक पतीला समजलेलच नसते, तिने जर सांगितलं की आज माझ्या मित्राचा फोन आला होता ,आम्ही भेटणार आहोत, तेव्हा त्याचा चेहरा बघा त्याच्या प्रतिक्रिया काय आहे, बायकोचा मित्र म्हटला की त्याची तळपायाची आग मस्तकाला जाते, तेंव्हा त्याचे प्रेम कुठे गेल, म्हणजेच काय त्याचं प्रेम किती स्वार्थी विचाराच आहे ,तो जर खरं प्रेम करत असता त्याने खुशीने विचारलं पाहिजे अरे वा माझ्यासोबत पण त्याची ओळख करून दे,, असे मात्र होत नाही हेच तिच्यासाठीही लागू होते 

परंतु सहजतेने दोघांनीही समजून घेतल्यास

 दोघांच्याही वैवाहिक जीवनाला यत्किंचितही धक्का लागणार नाही ,

आता तरी 

या नात्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणे खूप महत्त्वाचे आहे,


🌹 ( *भाग 2)* 

 *स्त्री-पुरुषाची मैत्री असावी का ? का असू नये* ?


2 दिवसा पुर्वी याच विषयावर पोस्ट लिहीली होती अनेकांनी खूप चांगल्या प्रतिक्रया आल्या अनेकांनी सूचना ही केल्या काहींनी आमच्या मनातील भावना तुम्ही व्यक्त केल्या आहेत असे सांगीतले, या विषयावर वर्ध्या वरुन ऐका मैत्रिणीने पोस्ट सेंड केली माझे काम सोपे केले,

मित्रानो!

आयुष्याच्या कोणत्याही स्टेज ला कोणीतरी आपलं असणं.. हक्काचं असणं... आपल्या पाठीशी असणं... समजून घेणारं असणं... खूप मॅटर करतं... मग ते एखद्या स्त्री ला असो वा पुरुषाला...

 

लग्न झाल्यावर... पहिली काही वर्षे खूप मस्त आनंदी जातात... दिवस ढळू नये अन रात्र सरु नये अशी अवस्था.... असते 

एकमेकांची खूप काळजी करणं... कौतुक करणं.. खूप प्रेम करणं... खूप छान दिवस असतात.... नाही का त्यात रुसवे फुगवे ही असतात.. मनवणं ही असतंच ... 

भांडणा नंतरचा समेट होणं अजुन गोड असतं....

यात २-३ वर्षे निघुन जातात... 

मग बाळाची चाहुल लागते.. 

त्या सर्व घडामोडी मधे १२-१५ वर्षे अशीच निघुन जातात... 

मुलांना मोठं करणं... त्यांच्या शाळा सुरु होतात... 

ही मधली १०-१५ वर्षे खूप धावपळीत निघुन जातात.. 

पहिल्या २-३ वर्षांची अनुभवलेली नवलाई संपलेली असते... अन ही मधली १५ वर्षे सुसाट निघुन गेलेली असतात..

स्त्री ३५-४० शीत आलेली असते.. मुलांच्या घराच्या जबाबदारीतुन थोडी बाहेर आलेली असते..... 

थोडी स्वतः कडे लक्ष देवु लागते... 

पती राजा ही थोडा घरच्या मुलांच्या अन बायकोच्या व्यापातुन बाहेर पडलेला असतो... त्याचे मित्र.. ऑफिसमधल्या किंवा ऑफिस बाहेरच्या मैत्रीणी.. पत्नी पेक्षा ही त्याला जवळच्या वाटू लागतात मग दोघांमध्ये प्रत्येक विषयावर एकमेकाचा शेअरिंग होत राहत वाढदिवसाचे एकमेकांना गिफ्ट एकमेकांचे शॉपिंग पार्ट्या... आउटींग मस्त सुरु असतं ...

हळु हळु बायकोकडे दुर्लक्ष झालेलंच असतं...

थोडं गृहीत धरणं ओघानेच आलेलं असतं.... 

बघेल तिचं ती काय ते.. बघेल मुलांचं... बघेल घरचं... आपण पैसा देतोय ना... मग झालं...

सुख म्हणजे अजुन काय हवं हिला.. 

घर.. मुलं ... नवरा... जॉब असेल तर जॉब... हे सर्व आपलं जग मानणारी स्री मात्र काहीतरी शोधत असते...

वयाच्या या स्टेज वर काहीतरी निसटुन गेलंय.. निसटुन चाललंय आपल्या हातातून याची जाणीव तिला क्षणोक्षणी होवु लागते... 

रितेपणा आलेला असतो... मित्र मैत्रीणी असल्या तर ठीक.. 

पण जिने नवरा... मुलं.. घर च सर्वस्व मानलंय तीच्या रीते पणाला मर्यादा च नसतात...

नवरा त्याच्या विश्वात दंग... मुलं त्यांच्या विश्वात ... दंग झालेले असतात 

मग हिने करायचं काय? 

नवऱ्याला आपलं काय चुकतंय हेच कळत नसतं... अन हिला सांगता येत नसतं... 

मनापासुन वाटत असतं कोणीतरी अशी व्यक्ती हवी.. जी आपल्याला व आपल्या भावनाना समजून घेइल.. आपल्या हक्काची असेल... माझे मुड्स त्याला कळतील ... माझं शांत रहाणं त्याला कळेल.. माझी चिडचिड तो सहन करेल... मला समजावेल.. 

या अपेक्षा खूप भयानक असतात...

नवरोबाला कधीही न कळणाऱ्या... 

त्याने तिला कधीच च गृहीत धरलेलं असतं... अन हिची मात्र घुसमट होत असते... 

आयुष्य असंच संपणार की काय अशी भिती मनात... वाटत असते ,

मग सुरु होतो खेळ चौकटीतला अन चौकटी बाहेर चा... 

आशा परिस्थितीमध्ये

एखाद्याला मित्र -मैत्रीण भेटते तिला समजून घेणारी.. पण तेंव्हा खरं युद्ध सुरु असतं तिच्या मनात, जिला मित्र मिळालाय ...

' हे योग्य आहे का ? आपण पाप करतोय का? समाज काय म्हणेल? कोणाला काही कळालं तर ?' वगैरे वगैरे.....

सगळीकडुन च घुसमट...


करायचं काय? 


समाजाने अधोरेखीत च केललं आहे .. की स्त्री अन पुरुषामधे कधीच चांगली.. निस्वार्थी.. निर्मळ मैत्री होवू च शकत नाही... 


मग भेटण्यात बोलण्यात चोरटेपणा येतो... 

कधी कधी या सगळ्यात ती वहावत जाते .. तर कधीतरी कोणी तरी स्वतः ला सावरुन घेते...


पण विषय हा आहे की तिने करायचं काय ? 


घरात जे हक्काचं आहे... ज्यांच्या साठी उभं आयुष्य खर्ची घातलंय ... स्वतः च्या इच्छा अपेक्षा ज्यांच्यासाठी मारल्यात... ज्यांच्या मुळे अन ज्यांच्या साठी स्वतः चं शरीर बेढब करुन घेतलंय ... त्या कोणालाच तीचं काही पडलं नसेल... तीला नक्की काय हवय हेच त्याना कळत नसेल तर तीने जावं कुठे? 


कोणाकडुन अपेक्षा कराव्यात? की करुच नयेत? 

तडफड तडफड अन नुसती तडफड....

 कोणीतरी कुटुंबातील व्यक्ती बोलते या बाबांच्या सत्संगला जाऊया का?

तिला बरे वाटते मग ती सत्संग ला जायला लागते बुवा, बाबा ,महाराज, अतिशय चतुर असतात स्त्रियांच्या मनातील द्विंधा

ते ओळखून असतात अध्यात्माच्या गोष्टी तिला ते बरोबर अडकवतात ,तू गेल्या जन्माची "राधा व मी गेल्या जन्माचा कृष्ण" आपली भेट,, देवानेच घडून आणली, आशा तिला थापा मारत असतो

मग आसाराम बापू सारखे बाबा समाजामध्ये कितीतरी आहेत मग अनेक स्त्रिया या बाबांना बळी पडतात, मुळात ती धार्मिक नव्हतीच,, चौकटीच्या बाहेर जाऊन मित्र जर जोडला तर समाज नाव ठेवेल बाबा बुवा सत्संग हा अस्थेचा भक्तीचा व सुरक्षित मार्ग वाटतो इकडे कोणी संशयाने आणि बघत नाही एरवी नवरोबा पत्नीस डॉक्टर कडे घेऊन गेल्यानंतर डॉक्टर चेक करत असताना हा बाहेर बसून कासावीस होतो इतका वेळ हा काय तपासतो आहे डॉक्टर

परंतु पत्नी सत्संग जात आहे तेव्हा मित्र मैत्रिणी सांगत असतो माझी पत्नी भक्ती मार्गाला लागली, सत्संग च्या नावाखाली तिकडे फक्त शोषणच असते 

 ... त्याला हिच्या मनात काय चाललंय याचं देणं घेणं नसतं...

नात्यामधे तोच तोच पणा आलेला असतो... फक्त एकमेकांच्या आयुष्यात असण्याची सवय झालेली असते ... 

ती हरलेली असते... मेंटली थकलेली असते.. 

Physical satisfaction पेक्षा स्त्री ला mental satisfaction खुप आवश्यक असतं हे नवरोबाला कळतच नसतं... किंबहुना बहुतांशी पुरुषांना कळलेलंच नसतं... 

खूप फरफट होते तिची यात.... मनात खूप मोठी उलथापालथ होत असते... अन ज्याने समजुन घ्यायला हवं तो आपल्या च विश्वात रममाण... त्याला या कसल्याचा गंधच नसतो...

अन मग सुरु होतो एकाकीपणाचा खेळ...

कितीतरी रात्रा तिने जागून काढलेल्या असतात त्याची वाट पाहत त्याच्या सोबत जेवणासाठी थांबलेली असते घड्याळाकडे पाहत, रात्री उशिरा नवराबा येतो मैत्रिणीबरोबर बाहेरच पार्टी करुन, ही जागी असल्याचे पाहून तो विचारतो' तू अजून झोपली नाहीस ' तिला हुंदका' येतो पण ती आतल्याआत तीआवंढा गिळते ,

तो तिला मिठीत घेऊन झोपण्याचा प्रयत्न करत असतो परंतु त्याच्या तोंडाचा वेगळाच दर्प व शरीराचा स्प्रे मारल्याचा वास ती घेत असते हा अनोळखी वास असतो तो केव्हाच झोपी गेलेला असतो, ही मात्र त्याच्या कुशीत जागीच असते प्रेमाला वंचित झालेली असते भूतकाळातल्या आठवणी जागवत,

शरीराने व मनाने ति केव्हाच दूर गेलेली असते, त्याच्यात उरले होते फक्त पती-पत्नीचं नाते, हे नात समाजाने दिले होते, या नात्यात 'ना भावना' होती, ना '' आकर्षण, प्रेम तर आटलच होतं,


अशा वेळी तिने काय करावे ,

तुम्हाला काय वाटते ??


नक्किच प्रतिक्रिया द्या

Friday, 2 June 2023

वाचता वाचता ही माहिती मिळाली.

 वाचता वाचता ही माहिती मिळाली.


1. गरम पाणी गार पाण्यापेक्षा लवकर गोठते.

2. मोनालिसाच्या चित्राला *भुवया* नाहीत.

3. "The quick brown fox jumps over the lazy dog" हया इंग्रजी वाक्यात *इंग्रजीचे सर्व अक्षर* आलेले आहेत.

4. *जीभ* हे आपल्या शरीरातील सर्वात जास्त मजबूत स्नायू आहे.

5. मुंग्या अजिबात झोपत नाहीत.

6. "I am." हे इंग्रजीतील *सर्वात संक्षिप्त पूर्ण वाक्य* आहे.

7. कोका कोला हे शीत पेय मूलतः हिरव्या रंगाचे होते.

8. जगात सर्वात जास्त ठेवले जाणारे नाव *मोहम्मद*

9. जेव्हा चन्द्र बरोबर आपल्या डोईवर येतो तेव्हा आपले वजन नेहमी पेक्षा जरासे कमी भरते.

10. वाळवंटातील उडणाऱ्या वालुकणापासून बचावासाठी *उंटाला तीन पापण्या* असतात.

11. "abstemious" आणि "facetious" हे फक्त दोनच शब्द आहेत ज्यात *इंग्रजीचे स्वर क्रमबध्द* आले आहेत.

12. सर्व खण्डांची इंग्रजीतील नावे ज्या अक्षराने सुरू होतात त्यात अक्षराने संपतात.

13. अमेरिकेत दरमाणसी दोन क्रेडिट कार्डस् आहेत.

14. TYPEWRITER हा इंग्रजी टंकलेखन यंत्रावरील एकाच ओळीतील कळदाबून टाईप होणारा सर्वात लांब शब्द आहे. 

15. उणे चाळीस डिग्रीला सेल्सीअस व फॅरेनहाईट दोन्ही उणे चाळीसच असतात.

16. चाॅकलेट खाल्याने कुत्र्याचा मृत्यू होवू शकतो. कारण चाॅकलेटमधील थिओब्रोमाईड या रसायनाचा कुत्र्याच्या हृदयावर व नर्व्हससिस्टिमवर विपरित परिणाम होतो.

17. स्त्रिया तेवढ्याच वेळात पुरुषां पेक्षा दुप्पटवेळा पापण्या ब्लिंक करतात.

18. आपलाच श्वास रोखून आपण आत्मघात करू शकत नाही.

19. ग्रंथालयातून सर्वात जास्त चोरले गेलेले पुस्तक "गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकाॅर्ड" तशी नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकाॅर्ड मध्ये नमूद आहं.

20. डुकराना आकाशाकडे पाहता येत नाही.

21. "sixth sick sheikh's sixth sheep is sick" हे इंग्रजीतील सर्वात उच्चारणास अवघड वाक्य मानले जाते. 

22. "Rhythm" हा इंग्रजीतील स्वर रहीत सर्वात लांब शब्द आहे.

23. आपण खूप जोरात शिंकलो तर बरगडी फ्रॅक्चर होवू शकते व जर शिंक दाबली तर डोक्यातील वा मानेतील रक्तवाहीनी फुटून मृत्यू ओढवू शकतो.

24. पत्त्यातील चारही राजे महान राज्यांचे चित्र आहेत. 

- इस्पिक - राजा डेव्हिड

- चिलावर - अलेक्झांडर

- बदाम - चार्लेमॅग्ने

- चौकट - जुलियस सिझर

25. आपल्या जिभेने आपल्याच भुवया चाटणे अशक्य आहे.

26. 11,11,11,111 × 11,11,11,111 = 12,34,56,78,98,76, 54, 321

27. ज्या पुतळ्यातील घोड्याचे दोनही पाय हवेत असतात त्याचा स्वार युध्दात मरण पावलेला असतो, तर एक पाय हवेत असेल तर स्वाराचा युध्द-जखमांमूळे मृत्यू झालेला असतो व जर घोड्याचे चारही पाय जमीनीवर असतील तर स्वाराचा नैसर्गिक मृत्यू झालेला असतो.

28. गोळीरोधक जाकेट, आगनिरोधक, कारचे वायपर व लेसर प्रिंटर्स हे सर्व स्त्रीयांनी शोधलेली साधने आहेत.

29. *मध* हे एकमेव खाद्यान्न चीरकाल टिकते.

30. मगरीला आपली जीभ बाहेर काढता येत नाही.

31. साप तीन वर्षांपर्यत झोपू शकतो.

32. सर्व विषुवृत्तिय अस्वल डावरे असतात.

33. विमानात द्यावयाच्या सॅलड मधून प्रत्येकी केवळ एक ओलिव्ह कमी करुन अमेरिकन विमान कंपनीने 1987 मध्ये 40,000 डाॅलर्स वाचवले होते.

34. फुलपांखरे पायांनी चव अनुभवतात. 

35. हत्ती हा एकमेव प्राणी आहे जो उडी मारु शकत नाही.

36. मागल्या 4000 वर्षांमध्ये एकही प्राणी मानसाळला गेलेला नाही. 

37. मृत्युपेक्षा कोळ्याला घाबरणाऱ्यांची संख्या मोठी आहे.

38. Stewardesses हा इंग्रजी टंकयंत्रावर डाव्याहाताने टाईप केलेला सर्वात लांब शब्द आहे.

39. मुंग्या विष प्राशना नंतर नेहमी आपल्या उजवीकडे कलतात व मरतात.

40. विज दाहिनीचा शोध एका दंतवैद्याने लावला आहे.

41 रक्ताचा तीस फुट फव्वारा मारु शकेल इतका फोर्स हृदय निर्माण करते. 

42. उंदिरांची संख्या अकल्पित प्रमाणात वाढते; अगदी दोन उंदीर अठरा महिन्यात दहालाख होवू शकतात. 

43. इअरफोन एकतास वापरल्यास कानात नेहमीपेक्षा 700पट विषाणू वाढतात.

44. सिगारेटलायटरचा शोध आगपेटीच्या आधी लागलेला होता.

45. बोट-ठशांप्रमाणेच प्रत्येकाचे जीभ-ठसेसुध्दा वेगवेगळे असतात.


ही पोस्ट मला इंग्रजीतील मिळाली.

Featured post

Lakshvedhi