Showing posts with label Arogya Mitra. Show all posts
Showing posts with label Arogya Mitra. Show all posts

Tuesday, 20 August 2024

मंकीपॉक्सला घाबरू नका; सतर्क रहावे

 मंकीपॉक्सला घाबरू नकासतर्क रहावे

आरोग्य विभागाकडून मार्गदर्शक सूचना जारी

            मुंबईदि. २० जगभरात काही ठिकाणी मंकीपॉक्स आजाराची साथ दिसून आल्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने मंकीपॉक्सच्या साथीला जागतिक स्वास्थ्य आणीबाणी घोषित केले आहे. मंकीपॉक्स संसर्गाचा वेग आणि रोगाची तीव्रता लक्षात घेता केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहे.  त्याचा अवलंब करण्याचे आदेश सर्व राज्यांना दिले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने मंकीपॉक्स सर्वेक्षणप्रतिबंध आणि नियंत्रण उपाययोजना करण्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

            मंकीपॉक्सच्या आजाराबाबत जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या सूचनेनुसार  केंद्र सरकारने उच्चस्तरीय बैठक घेऊन प्रतिबंध  व उपाययोजना राबविण्याबाबत सूचना दिल्या आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांना मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. यामध्ये सर्व विमानतळेबंदरे आणि आरोग्य युनिट्सना सतर्क करणेचाचणी प्रयोगशाळा तयार करणेतपासणीसाठी आरोग्य सुविधा तयार करणेमंकीपॉक्सचा एखादा रुग्ण सापडल्यास तत्काळ उपाययोजना करण्यात याव्यात याचा सामावेश आहे. यानुसार राज्याने याबाबत सर्वेक्षणप्रतिबंधक मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत.

नागरिकांनी आरोग्य विभागाच्या सूचनांचे पालन करावे

- आरोग्य सेवा आयुक्त अमगोथू श्रीरंगा नायक

            मंकीपॉक्स या संसर्गजन्य आजाराला घाबरून न  जाता नागरिकांनी सतर्क रहावे व सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. तसेच या आजाराबाबत संशयित रुग्ण आढळल्यास किंवा काही लक्षणे आढळल्यास त्वरित शासकीय आरोग्य केंद्राशी संपर्क साधावाअसे आवाहन आरोग्य सेवा आयुक्त अमगोथू श्रीरंगा नायक यांनी केले आहे.

            मंकीपॉक्स या आजाराविषयी काळजी घेण्यात येत असून जिल्ह्यातील आपल्या कार्यक्षेत्रात मंकीपॉक्स सर्वेक्षणप्रतिबंध आणि नियंत्रण उपाययोजना करण्याबाबतचे निर्देश आरोग्य उपसंचालकआरोग्य अधिकारीमहापालिकांचे आरोग्य अधिकारीजिल्हा आरोग्य अधिकारीजिल्हा शल्य चिकित्सक यांनाही आयुक्त श्री. नायक यांनी निर्देश दिले आहेत.

*मंकीपॉक्स म्हणजे काय?*

            मंकीपॉक्स हा आजार ओर्थोपोक्स या डीएनए प्रकारच्या विषाणूमुळे होतो. काही प्रकारच्या खारी आणि उंदरांमध्ये हा विषाणू आढळतो. हे प्राणी या विषाणूचे नैर्सगिक स्त्रोत आहेत. अंगावर पुरळ उमटण्यापूर्वी १ ते २ दिवसापासून ते त्वचेवरील फोडांवरील खपल्या पडेपर्यत किंवा ते पूर्णपणे मावळेपर्यतबाधित रुग्ण इतर व्यक्तींसाठी संसर्गजन्य असतो. मंकीपॉक्स हा प्रामुख्याने माणसापासून माणसाला होणारी लागण जसे कीथेट शारीरिक संपर्कशरीर द्रवलैंगिक संपर्क किंवा जखमघाव यातील स्रावबाधित व्यक्तीने वापरलेल्या कपडयांमार्फतजर खूप वेळ बाधित व्यक्तीचे संपर्क आला तर श्वसन मार्गातून बाहेर पडणाऱ्या मोठ्या थेंबा वाटे संसर्ग होऊ शकतो. त्याचप्रमाणेप्राण्यांपासून माणसालाही मंकीपॉक्सची लागण होऊ शकते. बाधित प्राणी चावल्यामुळे किंवा बाधित प्राण्याचे मांस न शिजवता खाण्यामुळे देखील या आजाराचा संसर्ग होऊ शकतो.

*संशयित रुग्णाची लक्षणे –*

•          मागील ३ आठवड्यात मंकीपॉक्सबाधित देशांमध्ये प्रवास करुन राज्यात आलेल्या व्यक्तींच्या शरीरावर अचानक पुरळ उठणे

•          सुजलेल्या लसिका ग्रंथी

•          ताप

•          डोकेदुखी

•          अंगदुखी

•          प्रचंड थकवा

•          घसा खवखवणे आणि खोकला

*मंकीपॉक्स न होण्यासाठी घ्यावयाची काळजी-*

•          संशयित मंकीपॉक्स रुग्णास वेळीच विलग करणे.

•          रुग्णांच्या कपड्यांशी अथवा अंथरुणा पांघरुणाची संपर्क येऊ न देणे.

•          हातांची स्वच्छता ठेवणे.

•          आरोग्य संस्थांमध्ये मंकीपॉक्स रुग्णावर उपचार करताना पीपीई किटचा वापर करणे.

• नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शासनातर्फे देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करणे.

००००

Saturday, 29 June 2024

"असे ही डॉक्टर आजही पुण्यात आहेत

 *✴️✴️"असे ही डॉक्टर आजही पुण्यात आहेत"✴️✴️*.                                                   आज मी आई ला एका प्रसिद्ध प्रथितयश डॉक्टरांकडे घेऊन गेलेलो. तिला पोटाचा त्रास होत होता, डॉक्टरांकडून चेकअप झाल्यावर त्यांच्या कॅबिन मधुन बाहेर येऊन फी देण्यासाठी रीसेप्शनिस्ट च्या टेबलापाशी येऊन थांबलो, तर मॅडम म्हणाल्या"फी ऐच्छिक आहे. इच्छा असेल तेवढी द्या, नाही दिली तरी चालेल".                                                        माझ्यासाठी हा कौतुक मिश्रित सुखद धक्काच होता...                                                           आजकाल स्पेशालिस्ट डॉक्टरांची फी 500 ते 1000 रुपये नक्कीच असते तिथं ह्यांनी ऐच्छिक फी ची पाटी लावली होती. पैशाला प्राधान्य न देता पेशंट बरा करण्याचं ध्येय आणि मनाचा मोठेपणा असल्या शिवाय हे शक्य नाही. मॅडमच्या परवानगीने मी हा फोटो काढला आणि योग्य ती फी देऊन एक नवीन अनुभव घेऊन बाहेर पडलो.                          Godbole Hospital 1301, Sadashiv Peth,  Near Bharat Natya Mandir   Pune - 411030,

Monday, 22 April 2024

Science doesn't wait for miracles,

 Glasses for blind babies. Science doesn't wait for miracles, it does miracles. Every viewer gets excited by enjoying these innocent babies! A big thanks to those scientists who made it possible. LET’S KEEP OUR WORLD 🌍 A HAPPY PLACE TO LIVE IN 😊


Friday, 12 April 2024

खजूरात असलेल्या गुणधर्मामुळे त्याला पुर्ण आहार म्हणतात.

 *खजूर*


खजूरात असलेल्या गुणधर्मामुळे त्याला पुर्ण आहार म्हणतात. अनेक पोषक गुणधर्मामुळे हे फळ उपासात वापरले जाते. खजूरा बद्दल उष्ण असल्याचा एक चुकीचा समज आहे.पण आयुर्वेदाच्या मतानुसार तो शीतल गुणधर्म असलेला पदार्थ आहे.

*खजूराचे गुण

हे मधूर, पौष्टिक, बलवर्धक, श्रमहारक ,पित्तशामक, वीर्यवर्धकआणि  शीतल गुणधर्म वाला आहे.  यात जीवनसत्त्वे, प्रथिने, फायबर, कार्बोहायड्रेट आणि शर्करा असल्यामुळे त्याला संपूर्ण आहार म्हणतात.

*खजूरातील घटकः

मिनरल्स ,कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस, जस्त, सोडियम.जीवनसत्त्वे- व्हिटॅमिन बी-6, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन के, नियासिन, रिबोफ्लेविन, थायामिन इ.घटक खजूरात असतात.


*दररोज किती खजूर खावेत

सामान्य पणे तीन ते चार खजूर रोज खाणे योग्य तर डायबेटीस पेशंट ने रोज दोन खजूर खायला हरकत नाही. अर्थात ज्याची शुगर नियंत्रित आहे त्यांनीच.


*खजूर खाण्याचे फायदे.

*वातपित्त शमक वात आणि पित्त कमी करते

 *बल शक्ती प्रदान करते.

*बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते

*हृदयाचे आरोग्य सुधारते

*कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

*हाडांचे आरोग्य सुधारते.

रक्तदाब नियंत्रित ठेवते.

*स्त्री आणि पुरुष दोघांची लैंगिक शक्ती वाढवते.

*मेंदूच्या आरोग्यास प्रोत्साहन देते.

*थकवा (अशक्तपणा) दूर करते.अशक्तपणासाठी सर्वोत्तम.

*वजन वाढण्यास प्रोत्साहन देते,तसेच वजन आटोक्यात ठेवण्यास खजुराचा उपयोग होतो. 

*मूळव्याध प्रतिबंधित करते.

*सूज येण्यावर प्रतिबंधित करते.

*निरोगी गर्भधारणेसाठी फायदेशीर.

*तुमच्या त्वचेसाठी आणि केसांसाठी सर्वोत्तम.

*आतड्यांसंबंधी समस्या,

*रातांधळेपणाची समस्या रोखण्यासाठी देखील प्रभावी आहेत.

*आहारातील साखरेचं प्रमाण कमी करण्यासाठी खजुराचा उपयोग होतो. 

*आहारातील साखरेचं प्रमाण कमी करण्यासाठी खजुराचा उपयोग होतो. 

*खजूरातून शरीराला पोटॅशियम, मॅग्नेशियम, काॅपर, मॅगनीज, लोह ही खनिजं आणि ब हे जीवनसत्व मिळतं. 

*खजुरात असलेल्या फ्लेवोनाॅइडस या ॲण्टिऑक्सिडण्टसमुळे मधुमेह, अल्झायमर आणि कर्करोगाचा धोका कमी होतो. खजुरात असलेल्या कॅरेटोनाॅइड या ॲण्टिऑक्सिडण्टसमुळे ह्दयाचे आणि डोळ्याचे आरोग्य चांगलं राहातं. खजुराचा फायदा मेंदूविकासासाठे होतो. 

*खजुराचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. म्हणजे खजूर खाल्ल्याने रक्तातील साखर लगेच वाढत नाही. साखर नियंत्रित ठेवण्यास फायदा होतो.

*खजुरामध्ये असलेल्या कॅल्शियम आणि फाॅस्फरसचा फायदा हाडांचं आरोग्य सुधारण्यासाठी होतो. हाडं मजबूत ठेवण्यासाठी खजुराचा उपयोग होतो. खजूर नियमित खाल्याने हाडांच्या विकाराचा धोका टळतो.

*नियमित खजूर खाल्ल्याने हिमोग्लोबीनचं प्रमाण वाढतं ॲनेमियाचा धोका टळतो.

  आशा आहे आपणास आजची ही पोस्ट आवडेल.

*ही सर्वसाधारण माहिती असून आपापल्या प्रकृती नुसार व तज्ञांच्या सल्ल्याने प्रयोग करावा.*

Wednesday, 10 April 2024

जर तुम्हीही जेवणानंतर "बडीशेप" खात असाल, तर आवश्य वाचा

 *जर तुम्हीही जेवणानंतर "बडीशेप" खात असाल, तर आवश्य वाचा.* 


           बडीशेपला सर्व मसाल्यांचा राजा म्हटलं जातं, भारतातील बहुतांश लोक जेवण झाल्यानंतर बडीशेप खाणे पसंद करतात. अनेक जणांना तर बडीशेप शिवाय जेवण झाल्यासारखेच वाटत नाही. बडीशेपमुळे पचन सुधारण्यास मदत होते, सोबतच तोंडाला येणारी दुर्गंधी देखील कमी होते. बडीशेप मध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत जे आपल्याला निरोगी आयुष्य प्रदान करू शकतात. कदाचित आपल्याला माहीत नसेल, मात्र जे लोक नियमित बडीशेपचे सेवन करतात. त्यांचं आरोग्य आणि रोग प्रतिकार शक्ती बडीशेप न खाणाऱ्या व्यक्तीपेक्षा किती तरी पटीने अधिक असते, हे संशोधनातून सिद्ध झालेले आहे.


बडीशेप ही केवळ स्वयंपाक घरातील एक मसाला नाही, यामध्ये कॅल्शिअम, सोडिअम, फॉस्फरस, आयर्न आणि पोटॅशिअम यांसारखे तत्व आरोग्यासाठी अतिशय चांगले असतात. बदाम आणि बडीशेप एकत्र वाटून, दररोज जेवणानंतर त्याचे एक चमचा सेवन केल्यास स्मरणशक्ती चांगल्या प्रकारे वाढते. तर मित्रांनो आज आपण बडीशेप चे असेच फायदे पाहणार आहोत.


१) बडीशेप खाण्याचा सर्वात मोठा फायदा आहे, तो म्हणजे तुमच्या त्वचेच्या तक्रारी दूर होतात. दररोज बडीशेप खाल्यास आपल्या आरोग्याला चांगला फायदा होतो, आपल्या चेहऱ्यावर जर पिंपल्स, मुरुम येत असतील, तर हे मुरुम देखील दूर होऊ शकतात.


२) शरीरातील हार्मोन्सची पातळी चांगली ठेवण्यासाठी, तसेच त्वचा थंड ठेवण्यासाठी झिंक, कॅल्शियम आणि सेलेनियम हे घटक उपयोगी असतात. नेमके हेच घटक बडीशेप मध्ये मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्यामुळेच आपल्या शरीरातील हार्मोनची पातळी चांगली राहते. तसेच पिंपल्स पासून देखील आपला बचाव होतो.

 

३) रक्ताचे शुद्धीकरण होण्यास मदत, बडीशेप मध्ये विशिष्ट प्रकारचे तैलीय घटक असतात. त्यामुळे आपल्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी ही बडीशेप मोठी उपयोगी ठरते. रक्त शुद्धीकरणाचे काम फार चांगल्याप्रकारे होते.


४) चौथा फायदा तो म्हणजे आपल्या डोळ्यांसाठी, डोळ्यांचे आरोग्य जर चांगले राखायचे असेल, जर सुंदर डोळे हवे असतील, तर आपल्या आहारामध्ये व्हिटॅमिन A, अमिनो ॲसिड आणि अँटीऑक्सिडेंट हे घटक असायला हवेत. मित्रांनो या बडीशेप मध्ये हे तीनही घटक अतिशय मोठ्या प्रमाणात आहेत आणि म्हणूनच जे लोक बडीशेपचं सेवन करतात, त्यांच्या डोळ्यांच आरोग्यही चांगलं राहतं.


 ५) अपचन, गॅसेस म्हणजेच ॲसिडिटीच्या तक्रारींवर उपयुक्‍त, बडीशेप मध्ये जे घटक आहेत, हे घटक आपण खाल्लेल्या अन्नाचं पचन होण्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत आणि त्यामुळेच बडीशेप खाल्ल्यामुळं आपण खाल्लेल्या अन्नाच चांगल्या प्रकारे पचन होतं आणि परिणामी आपल्याला ॲसिडिटीचा त्रास होत नाही.


६) शेवटचा एक फायदा आहे तो म्हणजे आपल्या हृदयाशी निगडित तक्रारी. आजकाल हार्ट ॲटॅक येण्याचं प्रमाण हे खूप वाढलं आहे. हार्ट अटॅक येण्यामागे एक प्रमुख कारण आहे, आपल्या शरीरातील रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी प्रमाणापेक्षा जास्त वाढणे. मित्रांनो बडीशेप जर आपण रोज खाल्ली तर आपल्या हृदयाशी निगडित जे आजार आहेत, ते दूर होण्यास मदत होऊ शकते. बडीशेपमध्ये पोटॅशिअम नावाचा एक महत्त्वपूर्ण घटक आहे आणि या पोटॅशिअममुळेच आपल्या शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत चालतो, हे कदाचित तुम्हाला माहिती नसेल आणि म्हणूनच तर बडीशेप जर आपण दररोज खाल्ली, तर आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते. परिणामी हृदय रोग, हार्ट ॲटॅक येण्याची शक्यता कितीतरी पटीने कमी होते.

Thursday, 4 April 2024

कलही केलेली भांडी🍵* डायबिटिस वर लेख

 भांड्यांची कल्ही डोक्याला!


हे वाचा.

*कलही केलेली भांडी🍵*

डायबिटिस वर लेख


*कथिलाचे पाणी*


‘सार्थ भावप्रकाश’ या आयुर्वेदावरील ग्रंथात एक श्लोक आहे. त्याचा अर्थ पुढे देत आहे. ‘कथिल हे हलके, रुक्ष, उष्ण असून मधुमेह, कफ, कृमी, पांडुरोग व दम यांचा नाश करते. ते पित्तवर्धक असून डोळ्याला हितकारक आहे.


ज्याप्रमाणे सिंह हत्तीच्या समुदायाचा नाश करतो त्याप्रमाणे कथिल मधुमेहाचा नाश करते.ते सेवन केले तर सर्व इंद्रिये शुद्ध होऊन देहाला सुख लाभते.


’ हा अर्थ वाचल्यावर एक विचार आला ‘हल्ली बऱ्याच लोकांना डायबेटीस (मधुमेह) का आहे?२०-२५ वर्षांपूर्वी एवढा नव्हता. कारण पूर्वी कल्हई केलेली भांडी स्वयंपाकासाठी वापरली जात होती.तेव्हा स्टेनलेस स्टील, aluminum, कोटिंग केलेली भांडी नव्हती.


पितळ्याच्या भांड्याला कल्हई करून वापरली जात होती.त्यामुळे कल्हईच्या भांड्यातील स्वयंपाकामुळे नकळत कथिल धातू शरीराला मिळत होता. आता ती भांडी नसल्याने कथिल शरीराला मिळत नाही.


म्हणून मी प्रयोग म्हणून कथिल आणले व स्टीलच्या भांड्यात पाणी घेऊन उकळले आणि ते पाणी पिऊ लागलो. चार दिवसात आम्हा घरातील सर्वांना संडासला साफ होऊ लागली. शरीरातील घाण बाहेर फेकली जात आहे अशी जाणीव झाली.


Ø हे पाणी माझेकडे येणाऱ्या एका मुलीला दिले. तिलापण तसाच अनुभव आला आणि तिच्या पिंपल्स कमी झाल्या.


Ø एका बाईंचे पोट बेंबीखाली मोठे झाले होते.पोट कडक झाल्याने त्यांना खाली वाकता येत नव्हते. मी त्यांना कल्हईच्या भांड्यात पाणी उकळून पिण्यास सांगितले. एक महिन्यांनी त्या भेटल्यावर मला म्हणाल्या, “मला संडासला साफ होते आहेच आणि पोट ही मऊ झाले आहे त्यामुळे मी आता पुढे वाकू शकते.” या बाईंची तीन मोठी ऑपरेशन्स झाली आहेत.


Ø माझ्या पत्नीला डायबेटीस आहे. हे पाणी प्यायला सुरवात केल्यापासून पत्नीच्या शौचात फरक पडलाच परंतु पूर्वी चार जिने चढताना तिसरा जिना चढल्यावर थांबत असे, आता न थांबता जिना चढते. मधुमेह चेक केल्यावर १०० ने कमी झाला.


(म्हणजे आमच्या पूर्वजांना हे पूर्वी पासूनच माहीत होते. त्यांनी समाजाचे हित बघितले स्वतः पैसा कमवला नाही, म्हणून काय ते अडाणी होते का?)


अरविंद जोशी BSc.

९४२१९४८८९४

Tuesday, 2 April 2024

कापुराचे झाड*कोणा कोणाला हवे

 🛟🫁🫀💓🫀🫁🛟                                            *कापुराचे झाड*

--एक कापूरचे झाड अर्धा किलो मीटरच्या रेडिअसमधील हवा शुद्ध करते.. 

आता हे झाड शेतात लावणार आहे, कारण हे फार मोठे होते जवळपास ८० ते ९० फुट उंच व मुळे खोलवर जातात व पसरतात

इंग्रजांनी त्यांच्या फायद्या साठी आपली ही महाकाय झाडे तोडायला लावली व चहा आणी रबराची शेती केली, लोकांना कापुराचे झाड असते हे ही माहीत नाही हे दुर्भाग्य... 

हे झाड भारतातुन जवळपास नाहीसे झाल्यातच जमा आहे , लोकांनी कापुराचे झाड आवर्जुन मोकळ्या जागेत लावावे व आपल्या इथे नामशेष होत चाललेल्या झाडाला पुनर्जीवन द्यावे... 

एक कापूरचे झाड अर्धा किलो मीटरच्या रेडिअसमधील हवा शुद्ध करते, शुद्ध कापुराचे फायदे सगळ्यांना माहीत आहेतच, पूजेला आपण जो कापूर वापरतो, तो खरा कापूर नाहीच, त्याचा तोटाच जास्त, भीमसेनी कापूर हा शुद्ध व तो ह्या झाडापासून मिळवता येतो.

*रोप ऍमेझॉन* वरून मागवता येते, *हिरवे पुण्य नर्सरी, नाशिक* येथे मिळेल..


*Akash Ahale :* 

*कापूर रोपे बुकिंग फॉर्म  - हिरवेपुण्य नर्सरी.* 


* कापूर रोपे बुकिंग साठी खाली दिलेल्या लिंक वर तुमची माहिती भरा आणि पेमेंट करा. 

* रोपे विक्री १५ जून पासून.  

* रोपे लहान असल्या कारणाने ज्यांना नर्सरीत येऊन रोपे नेता येतील त्यांनी नर्सरीतून न्यावे. 

* ज्यांना बसने डिलेव्हरी हवी आहे त्यांना डिलेव्हरी चार्जेस जादा लागतील व ते पार्सल बुकिंगच्या वेळेवर कळवण्यात येतील.


रोप किंमत *₹१५०/-* प्रति रोप ..                  

रोपाची उंची ६ इंच ते १ फूट 


पुणे आणि उर्वरित महाराष्ट्र ह्या परिसरात रोप हवे असल्यास ह्या नंबर वर कॉल करा -  

*अमृता पारेख:*

 *०८३२९२०८८८२* 

मुंबई - कोंकण परिसरात आणि इतर भारतीय राज्यात रोप हवे असल्यास ह्या नंबर वर कॉल करा *चिरंतन पारेख :*

*०९६७३९१७७७१* 


*हिरवेपुण्य नर्सरी -*

एम. एस. इ. बी. सब-स्टेशन जवळ, पाथर्डी रोड इंदिरानगर नाशिक - ४२२००९..

*ऑफिस क्र: ०२५३२९७००१८*       

*मोबा : ०९६७३९१७७७१*                


*कृपया हा मेसेज  इतर ग्रुपवर शेयर करा*

Tuesday, 26 March 2024

उसाच्या रसाचे फायदे*

 🎋🎋🎋🎋🎋🎋🎋🎋🎋

        *उसाच्या रसाचे फायदे*


*उसाच्या रसात शक्यतो बर्फ टाकू नये.उसाचा रस पिताना स्वचछते संबंधी लक्ष द्यावे.*


*१. उसाचा रस आपली पचनशक्ती वाढवतो. यामुळे पचनसंस्था सुरळीत होते.*


*२. पोटाशी संबंधित अनेक आजार बरे करण्यास उसाचा रस आपली मदत करतो. यामुळे पोट साफ होते व बद्धकोष्ठतेसारखे अनेक विकार बरे होतात.*


*३. पित्ताचा त्रास असणाऱ्यांनीही उसाचा रस प्यायला पाहिजे. त्यामुळे पित्त दूर होते.*


*४. उसाचा रस प्यायल्याने हृदयाशी संबंधित अनेक रोगांपासून आपण स्वतःला वाचवू शकतो. हा प्यायल्याने हृदयविकाराचा झटका येण्याच्या शक्यता कमी होते.*


*५. उसाच्या रसाने शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते. शरीरातील धमन्यांचे कार्य सुरळीत होऊन त्यांच्यातील मळ बाहेर पडतो व शरीर स्वच्छ होते.*


*६. जर तुम्ही कमी पाणी पीत असाल तर उसाचा रस नक्की प्या. उसाच्या रसाने शरीरातील द्रव्याचे प्रमाण वाढते. याने शरीरातली पाण्याची कमतरता भरून येईल व किडनी स्टोन सारख्या आजारांपासून तुम्ही स्वतःला वाचवू शकता.*


*७. उन्हामुळे हात, पाय, डोळे यांची जळजळ होत असेल तर उसाचा रस घ्यावा.*


*८. ज्यांना रोज गाडीवर उन्हातून फिरावे लागते. त्यांनीही उन्हापासून बचाव करण्यासाठी रोज दोन वेळा उसाचा रस प्यावा.*


*९. उन्हामुळे येणारा थकवा दूर होण्यासाठीही उसाच्या रसाचा चांगला उपयोग होतो.*


*१०. नाकातून रक्त येणे, लघवीला आग होणे, जळजळ होणे असे त्रास होणाऱ्यांनी रोज उसाचा रस प्यावा.*


    *​!!हे ईश्वरा सर्वांच आरोग्य चांगलं ठेव!!​*


संकलक अज्ञात। 


सोर्स व्हाट्सअप। 

।।।।।।

Sunday, 24 March 2024

निसर्ग सुंदर थळ अलिबाग हेलथ फौंडेशन समता फौंडेशन मुंबई

l: श्रीबाग लायन्स क्लब

  निसर्ग सुंदर थळ

अलिबाग हेलथ फौंडेशन

 समता फौंडेशन मुंबई


लायन्स क्लब अध्यक्ष लायन संजय रावळे

माजी अध्यक्ष लायन ऍड कला पाटील

संस्थापिका लायन ऍड निहा राऊत

लायन विजय वनगे ZC

 CEO  health foundation  Shubhada Kudatalkar

निसर्ग सुंदर थळ अध्यक्ष अवधूत सप्रे  योगेश घरत


डॉ साग School Kala Patil: Dr Sagar

Harshad Gore

Siddhi patil

Sujit patil

Prachiti ( lab sta School Kala Patil: ला.अनिल म्हात्रे

ला प्रवीण सरनाईक

ला महेंद्र पाटील

ला पैठणकर विद्याधर

ला ऍड भूपेंद्र पाटील

ला ऍड के डी पाटील

ला भैरवी रावळे

Friday, 22 March 2024

दिलखुलास’, ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात 'महिलांचे आरोग्य' या विषयावर डॉ. आरती रोजेकर यांची मुलाखत

 दिलखुलास’‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात

'महिलांचे आरोग्यया विषयावर डॉ. आरती रोजेकर यांची मुलाखत

 

            मुंबईदि. 22 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलासआणि 'जय महाराष्ट्रकार्यक्रमात 'महिलांचे आरोग्यया विषयावर हिंदुजा रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. आरती रोजेकर यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.

            महिलांनी सर्वच क्षेत्रात आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. महिलांचे आरोग्य चांगले राहिले तर त्याचा परिणाम निश्चितपणे देशाच्या सर्वांगीण विकासासाठी होणार आहे. दैनंदिन जीवनात महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावीआहार कसा असावा तसेच विशिष्ट आजार झाल्यावर काय काळजी घेणे आवश्यक आहेताणतणावाच्या परिस्थितीत आपले मानसिक आरोग्य कसे सांभाळावे याविषयी स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. रोजेकर यांनी 'दिलखुलासआणि जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून माहिती दिली आहे.

            'दिलखुलासकार्यक्रमात डॉ. रोजेकर यांची मुलाखत शनिवार दि. 23सोमवार दि. 25 आणि मंगळवार दि.26 मार्च 2024 रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआरया मोबाईल ॲपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहेतर जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत मंगळवार दि. 26 मार्च 2024 रोजी दुपारी 7.30 वाजता महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ऐकता येणार आहे. निवेदक सुषमा जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे.

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक

एक्स - https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

Monday, 18 March 2024

*शास्त्रात ताकाची तुलना अमृताशी केलेली आहे

 *"ताक"*

*शास्त्रात ताकाची तुलना अमृताशी केलेली आहे. ताक हे शरीरातील घातक पदार्थ मूत्रावाटे बाहेर काढून शरीरात रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करते. ताकाचे नियमित सेवन केल्याने शरीर बलवान होते. महत्वाचे म्हणजे तीन दिवस इतर काहीही न खाता ताक पीत राहल्यास आपल्या शरीराचे पंचकर्म आपोआप होते आणि शरीरातील चरबी निघून जाते, इतकेच नव्हे तर चेहऱ्यावरील काळे डाग जावुन चेहरा तरतरीत व तेजस्वी होतो.*

*ताकात विटामिन ” B 12 ” , कैल्शियम , पोटेशियम आणि फास्फोरस सारखे तत्व असतात जे शरीरासाठी फारच फायद्याचे असतात. ज्याचे पोट साफ होत नाही आणि पोटातून आवाज येतात त्यांनी ताक पिल्याने असे आजार नाहीसे होतात. ताक प्यायल्यानंतर शरीराची झीज 90 % भरून निघून शरीरातील उष्णता त्वरित कमी होऊन अतिशय शांत झोप लागते. साधारण माणसाने सुध्दा दररोज ताक पायल्याने शरीरातील उष्णता लगेच कमी होते आणि ताकत प्रचंड प्रमाणात वाढते.*


*ताक पिण्याचे हे 10 प्रकारचे फायदे जाणून घेऊया आणि कोल्ड्रिंक पिणे थांबूया . . .*


*1) ताक प्यायल्याने लठ्ठपणा कमी होतो.*

*2) वारंवार लघवीचा त्रास होत असेल तर ताकात मीठ टाकून प्यावे. त्रास कमी होतो.*

*3) दह्याचे पाणी अथवा ताकाने गुळण्या केल्यास तोंड येणे बरे होते.*

*4) ताकात ओवा टाकून प्यायल्यास पोटातील जंतू मरुन जातात.*

*5) ताकात गुळ टाकून प्यायल्यास लघवी करताना होणारी जळजळ बंद होते.*

*6) थोडी जायफळ पूड ताकात टाकून प्यायल्यास डोकेदुखी कमी होते.*

*7) रिकाम्या पोटी ताक प्यायल्याने पोटदुखी बरी होते.*

*8) ताकात साखर आणि काळी मिरी टाकून प्यायल्यास पित्ताचा त्रास कमी होतो.*

*9) लहान मुलांना दात येतेवेळी त्यांना दररोज 4 चमचे असे दिवसभरातून 2-3 वेळा दिल्यास दात येताना मुलांना होणारा त्रास कमी होतो.*

10)महत्वाचे म्हणजे *तीन दिवस इतर काहीही न खाता ताक पीत राहल्यास* आपल्या शरीराचे पंचकर्म आपोआप होते. 

*ज्यांनी ह्या पूर्वी पैसे देवुन पंचकर्म केलेलं आहे त्यांनी हा प्रयोग करून पहा, तेव्हा लक्षात येईलच.*

*तुमची तब्बेत ठीक तर होईलच पण पैसाही वाचेल. असे सहा महिन्यात एक वेळ करा, आपणास होणारे भावी मोठे आजार पण टळतील. त्यामुळे होणारा त्रास व औषधी खर्चही वाचेल.*


*चला तर मग 🥛 ताक पिण्यास सुरुवात करूयात. आज पासून Cold Drinks बंद करूया..*

*हि माहिती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचवावी  यासाठी शेअर करायला विसरू नका.*


 **डॉ. शिल्पा टाले ND (MD)AM* 

 *वेद योग निसर्गोपचार आरोग्य मंदिर नागपूर*

Tuesday, 27 February 2024

*विनंती साखर सोडा

 *विनंती साखर सोडा*

डॉ. म्हणतात लापरवाही वगळता कोणीही कर्करोगाने मरणार नाही. *सर्वप्रथम साखर खाणे कमी करावे शरीरात साखर नसल्यास, कर्करोगाच्या पेशीचा नैसर्गिक मृत्यू होतो.*

साखर तयार करण्याचा सर्वांत पहिला कारखाना भारतात इंग्रजांनी सन १८६८ मध्ये सुरु केला.

 "त्याआधी *भारतीय लोकं शुद्ध देशी गुळाचेच सेवन करत होते* आणि कधीही आजारी पडत नव्हते."

*साखर हे एक प्रकारचे विष आहे जे अनेक रोगांना निमित्त ठरते . हे कसे काय  घडते याबद्दल आपण जरा माहिती घेऊ या...*

(१) साखर बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये *गंधकाचा सर्वाधिक वापर केला जातो. गंधक म्हणजे काय तर फटाक्यांमधील मसाला.!*

(२) गंधक हा अत्यंत जड धातू असून *एकदा का गंधक शरीरात गेले की ते शरीराबाहेर पडतच नाही.*

(३) साखर ही कॉलेस्ट्रॉल वाढवते. *कॉलेस्ट्रॉल वाढल्यामुळे हृदयविकाराचा झटका येतो.*

(४) साखरेमुळे शरीराचे *वजन अनियंत्रित वाढते व त्यामुळे अंगी स्थूलपणा येतो.* 

(५) साखर ही *रक्तदाब वाढवते.*

(६) साखर ही *मेंदूला झटका येण्याचे एक मुख्य कारण आहे.*

(७) साखरेतील गोडपणाला आधुनिक चिकित्सा पद्धतीत सुक्रोज म्हटले जाते. *माणसे व जनावरे हे दोघेही सुक्रोज पचवू शकत नाहीत.*

(८) साखर तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये *तेवीस हानीकारक रसायने वापरली जातात.*

(९) साखर ही *मधुमेह होण्याचे एक मुख्य कारण आहे.*

(१०)  साखर हे *पोटातील जळजळीचे एक मुख्य कारण आहे.*

(११)  साखर ही *शरीरातील ट्राइ ग्लिसराइड* वाढवते.

(१२)  साखर हे *अर्धांगवायुचा किंवा पक्षाघात झटका* अथवा *लकवा* होण्याचे एक मुख्य कारण आहे.

(१३) *कृपया आपणास जितके शक्य होईल तितके साखर सोडून गुळाचा वापर आजच्या आज करणे सुरू करा.*

*आपण कितीही व्यस्त असलात तरी, कृपया हे वाचण्यासाठी वेळ काढलात त्या बद्दल धन्यवाद.*🙏🌹

*वरील हितकारक माहिती आपल्या ओळखीची लोकं, आपले मित्र, नातेवाईक आणि इतर गटांना अवश्य पाठवा.*🙏🇮🇳

Monday, 26 February 2024

हिमोफिलिया रुग्णांना आता गतिमान व दर्जेदार उपचाराची सुविधा

 हिमोफिलिया रुग्णांना आता गतिमान व दर्जेदार उपचाराची  सुविधा

- आरोग्य मंत्री प्रा. डॉ तानाजी सावंत

आरोग्य मंत्र्यांच्या हस्ते २७ जिल्ह्यांतील हिमोफिलिया डे-केअर सेंटर्सचे उद्घाटन

आता राज्यातील  सर्व जिल्ह्यांत हिमोफिलिया डे केअर सेंटर

 

            मुंबईदि. २६ :- हिमोफिलिया हा गंभीर अनुवंशिक आजार असून या आजारामध्ये रक्त गोठवण्यासाठी फॅक्टर्स आवश्यक असतात. आतापर्यंत नऊ जिल्ह्यांमध्ये ही सेवा उपलब्ध होती. मात्र आता नव्याने २७ हिमोफिलिया डे-केअर सेंटर्स कार्यान्वित झाल्याने राज्यातील सर्व जिल्ह्यांत ही सेवा मोफत उपलब्ध झाली असून रुग्णांना दर्जेदार आणि गतिमान आरोग्य सेवा मिळणार आहेअसे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ.तानाजी सावंत यांनी आज केले. 

               हिमोफिलिया रुग्णांना रक्त गोठविण्यासाठी आवश्यक असलेले सर्व फॅक्टर्स राज्यातील सर्व जिल्ह्यांत उपलब्ध करून देण्यासाठी नवीन २७ हिमोफिलिया डे-केअर सेंटरचे आज (दि. २६ फेब्रुवारी) आरोग्य मंत्री प्रा. डॉ. सावंत यांच्या हस्ते मंत्रालयीन दालनात दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उद्घाटन करण्यात आले.

            या कार्यक्रमाला आमदार समीर कुणावर आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकरआरोग्य सेवा आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियान संचालक धीरज कुमारसंचालक डॉ. नितीन अंबाडेकरसहाय्यक संचालक डॉ. महेंद्र केंद्रेसहसंचालक डॉ. विजय बाविस्कर उपस्थित होते. तर  सर्व जिल्ह्यांतील जिल्हा शल्य चिकित्सकजिल्हा आरोग्य अधिकारीनवीन हिमोफिलिया सेंटर्सचे अधिकारी कर्मचारीरुग्ण दूरदृष्य प्रणालीद्वारे  उपस्थित होते.

            कार्यक्रम प्रसंगी आरोग्य मंत्री प्रा. डॉ. सावंत यांनी हिमोफिलिया रुग्णांशी संवाद साधला. ही सेवा जिल्हा स्तरावर घराजवळ  उपलब्ध करून दिल्याबद्दल रुग्णांनी आरोग्य मंत्र्यांचे आभार मानले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना श्री. म्हैसकर यांनी या उपक्रमाविषयी महिती दिली.

            हिमोफिलिया डे केअर सेंटर या उपक्रमाबाबत जिल्हास्तरावर जनजागृती करण्याच्या सूचना देत आरोग्य मंत्री डॉ. सावंत म्हणाले,  सेंटरच्या बाहेर संपूर्ण तपशीलवार माहिती असणारा फलक लावण्यात यावा.  याबाबत समाज माध्यमे तसेच प्रसारमाध्यमांमधून जनजागृती करावी. सेंटरमधील औषध साठ्याची  उपलब्धतेनुसार ताबडतोब मागणी नोंदवावी.  या ठिकाणी औषधांचा तुटवडा कुठल्याही परिस्थितीत निर्माण होणार नाहीयाची काळजी घ्यावी.

            राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सन २०१३ पासून हिमोफिलिया रुग्णांसाठी एकूण ९ हिमोफिलीया डे- केअर सेंटर्स सुरू आहेत. मात्र आता आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या पुढाकाराने राज्यातील सर्व जिल्ह्यांत ही सेवा सुरु करण्यात आली आहे. हिमोफिलिया आजाराच्या रुग्णांमध्ये रक्तातील रक्त गोठविणाऱ्या फॅक्टर्सच्या कमतरतेमुळे स्नायूसांध्यांमध्येदातामधूननाकपुड्यातून तसेच मेंदूत रक्तस्त्राव होतो. फॅक्टरच्या कमतरतेच्या तिव्रतेमुळे वारंवार रक्तस्त्राव होऊ शकतो. ही फॅक्टर्स इतर औषधांच्या तुलनेने महागडी आहेत. रक्तस्त्राव होत असलेल्या परिस्थितीत रुग्णांना उपचारासाठी प्रवास करावा लागतोही बाब लक्षात घेऊन आरोग्य मंत्री प्रा. डॉ. सावंत यांनी या आजाराने ग्रस्त रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक असलेले फॅक्टर्स सर्व जिल्ह्यांमध्ये उपलब्ध करुन देण्याबाबत निर्णय घेतला. त्यानुसार उर्वरित सर्व जिल्ह्यांत नवीन २७ हिमोफिलिया डे-केअर सेंटर्स सुरु करण्यात आले आहेत.

            हिमोफिलिया हा गंभीर अनुवंशिक आजार असून या आजारामध्ये रक्त गोठवण्यासाठी आवश्यक असलेले सर्व फॅक्टर्सच्या कमतरतेमुळे रक्तस्त्राव होतो. हा आजार वाय गुणसूत्राच्या दोषामुळे होत असल्याने प्रामुख्याने पुरुष हे या आजाराने ग्रस्त आढळतात. मात्र स्त्रिया या आजाराच्या वाहक आढळतात. राज्यात अशा आजाराचे अंदाजे ४,५०० रुग्ण आहेत.

            रायगडपालघरधुळेबीडपुणेसोलापूरनंदुरबारकोल्हापूरजळगांवसिंधुदुर्गरत्नागिरीजालनापरभणीसांगलीहिंगोलीबुलढाणानांदेडलातुरधाराशीवअकोलावाशिमयवतमाळवर्धाभंडारागोंदियाचंद्रपूरगडचिरोली या जिल्ह्यांत नवीन हिमोफिलिया डे-केअर सेंटर्स कार्यान्वित झाल्यामुळे रुग्णांना त्यांच्या स्वतःच्या जिल्ह्यातच मोफत व वेळेत उपचार उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे आता सर्व जिल्ह्यांतील रुग्णांना याचा लाभ होणार असून सहज उपचार मिळणार आहे.

००००

निलेश तायडे/विसंअ/

 


Sunday, 18 February 2024

सार्वजनिक आरोग्य विभागाची 19 फेब्रुवारी ते 4 मार्च दरम्यान विशेष मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोहीम पंधरवड्यात 1 लाख शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट

 सार्वजनिक आरोग्य विभागाची 19 फेब्रुवारी ते 4 मार्च दरम्यान विशेष

मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोहीम पंधरवड्यात 1 लाख  शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट

 

            मुंबई दि. 18:   राष्ट्रीय अंधत्व व दृष्टी क्षिणता नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत दि. 19 फेब्रुवारी ते 4 मार्च 2024 दरम्यान राज्यभरात विशेष मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोहीम राबविण्यात येणार आहे.  या कालावधीत 1 लाख मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट आरोग्य विभागाने ठेवले आहे. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.  शासकीय रुग्णालयमान्यता प्राप्त स्वयंसेवी संस्था रुग्णालय येथे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्या जाणार असून नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावाअसे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाने केले आहे.

            या मोहिमेंतर्गत 1 लाख शस्त्रक्रिया करण्यासाठी आरोग्य विभागाने जिल्हानिहाय नियोजन केले असून संबंधित आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जबाबदारी देण्यात आली आहे. केंद्र शासनामार्फत राष्ट्रीय नेत्र ज्योती अभियान’ ही विशेष मोहीम जून2022 पासून राबविण्यात येत आहे. या मोहिमेत 50 किंवा त्याहून अधिक वयाच्या लोकांमध्ये अंधत्व आणि एसव्हीआय कारणीभूत असलेल्या मोतीबिंदू शस्त्रक्रियांचा अनुशेष पूर्णपणे भरून काढण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. या कार्यक्रमांतर्गत 2022 ते 2025 या तीन वर्षात 23 लाख मोतीबिंदू शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट आहे. आरोग्य विभागाच्या या मोहिमेमुळे  नागरिकांना मोफत शस्त्रक्रियेचा लाभ घेता येणार आहे. 

            सन 2022-23 मध्ये राज्यात मोतीबिंदू शस्त्रक्रियेचे 112.51 टक्के उद्दिष्ट साध्य करण्यात आले आहे व 2023-24 या आर्थिक वर्षात डिसेंबर2023 पर्यंत एकूण उद्दिष्टाच्या 67.30 टक्के मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. सन 2023-24 या आर्थिक वर्षातील मोतीबिंदू शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट पूर्ण करण्याकरिता दि. 19 फेब्रुवारी ते दि.04 मार्च 2024 या कालावधीत जिल्हास्तरावर विशेष मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोहीम राबविण्यात येणार आहे. या  उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी शासकीय आरोग्य संस्थांसहअशासकीय स्वंयसेवी संस्था तसेच खासगी संस्थांचे सहकार्य घेण्यात येणार आहे. याविषयी किंवा इतर आरोग्यविषयक सल्ला घेण्यासाठी नागरिकांनी 104 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.


Saturday, 10 February 2024

ऑर्थोपेडिक डॉक्टरांचे 60 वर्षे आणि त्यावरील वृद्धांसाठी अनावृत्त पत्र.....

 ऑर्थोपेडिक डॉक्टरांचे 60 वर्षे आणि त्यावरील वृद्धांसाठी अनावृत्त पत्र.....

आजकाल मी वृद्धांना हाडांची घनता मोजण्याचा सल्ला देत नाही, कारण त्यांना नक्कीच ऑस्टिओपोरोसिस (osteoporosis) असेल आणि वाढत्या वयाबरोबच त्याचे प्रमाण निश्चितपणे अधिकाधिक गंभीर होत जाईल आणि फ्रॅक्चरचा धोका नक्कीच वाढेल !


एक सूत्र आहे:


फ्रॅक्चरचा धोका = बाह्य नुकसान शक्ती / हाडांची घनता.


वृद्धांसाठी छेदातली(denominator) किंमत म्हणजे हाडांची घनता वयपरत्वे कमी होत चालली आहे, त्यामुळे फ्रॅक्चरचा धोका निश्चितपणे वाढेल.


म्हणून, फ्रॅक्चर टाळण्यासाठी वृद्धांसाठी सर्वात महत्वाचे उपाय म्हणजे अपघाती जखम टाळण्यासाठी शक्य ते सर्व करणे !


अपघाती इजा कशी कमी करावी?


मी सारांशित केलेल्या तथाकथित रहस्याची सात पात्रे आहेत, ती अशीः


"सावध रहा, सावध रहा, पुन्हा सावध रहा"!


मी त्यासाठी सुचवत असलेल्या विशिष्ट उपायांमध्ये खालील उपाय प्रामुख्याने समाविष्ट आहेत -


1.उंचावरल्या वस्तू काढण्या- ठेवण्यासाठी खुर्चीवर किंवा कोणत्याही स्टूलवर कधीही उभे राहू नका.


2. पावसाळ्याच्या दिवसात शक्यतो बाहेर जाणे टाळण्याचा प्रयत्न करा.


3. घसरणे टाळण्यासाठी आंघोळ करताना किंवा शौचालय वापरताना विशेष काळजी घ्या.


4. विशेषत: महिलांसाठी सर्वात महत्त्वाचे - बाथरूममध्ये भिंतीचा किंवा इतर गोष्टींचा आधार घेऊन अंडरगारमेंट्स घालू नका,  नका. हे त्यांच्या नितंबाचे सांधे घसरण्याचे आणि फ्रॅक्चरचे सर्वात महत्वाचे कारण आहे. आंघोळ केल्यानंतर तुमच्या चेंजिंग रूममध्ये परत या. खुर्चीवर किंवा पलंगावर आरामात बसा आणि नंतर अंडरगारमेंट्स घाला.


5. टॉयलेटला जाताना, बाथरूमचा मजला कोरडा आणि निसरडा नसल्याची खात्री करा. शक्यतो फक्त कमोड वापरा. कमोडच्या सीटवरून उठताना हाताने व्यवस्थित आधार घ्या. आंघोळ करताना शक्यतो स्टूल किंवा खुर्चीवर बसून करा.


6. मध्यरात्री उठताना, उठण्यापूर्वी 3-4 मिनिटे बेडवर बसा; प्रथम खोलीतील लाईट्स चालू करा आणि नंतर उठा.


7. किमान रात्री (शक्य असल्यास दिवसाही)  कृपया शौचालयाचा दरवाजा आतून बंद करू नका. शक्य असल्यास शौचालयात अलार्म बेल लावा आणि कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत  कुटुंबातील सदस्यांची मदत मागवण्यासाठी ती आठवणीने दाबा. 


8. ज्येष्ठांनी पँट वगैरे घालण्यासाठी खुर्चीवर किंवा पलंगावर बसणे आवश्यक आहे.


9. चुकून खाली पडल्यास जमिनीचा आधार मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या हातांचा वापर केला पाहिजे. हिप जॉइंट, पायाचे हाड किंवा मानेला फ्रॅक्चर होण्यापेक्षा हाताला आणि मनगटाला फ्रॅक्चर होणे कधीही परवडते. 


10. तुमच्यासाठी शक्य असेल त्या प्रमाणात व्यायाम (किमान चालण्याचा तरी) करण्याचे मी जोरदार समर्थन करतो.


11. विशेषतः महिलांसाठी.. तुमचे वजन मर्यादेत ठेवण्यासाठी खूप गंभीर व्हा. त्यासाठी आहारावर नियंत्रण ही सर्वात महत्त्वाची गुरुकिल्ली आहे. 'उरलेले' संपवण्यासाठी भुकेपेक्षा जास्त खाणे टाळा. वजन नियंत्रणात ठेवणे तुमच्या डोक्यात आणि तुमच्या मनावर आहे. पोट भरेपर्यंत जेवण्यापेक्षा अर्धे पोट भरून खाणे बंद करणे केव्हाही चांगले.


12. बाथरूमच्या नॉन-स्लिप फ्लोअरवर विशेष लक्ष द्या. मुख्यत्वेकरून  पायऱ्या चढताना- उतरताना हँडरेल्स वापरा. कारण तुमची एक घसरण तुम्हाला किमान दहा वर्ष त्रास देईल !


            या उपयांसोबतच   ज्येष्ठांसाठी व्हिटॅमिनरुपी औषधीऐवजी आहारातील पूरक आहार (उदा. दुग्धजन्य पदार्थ, सोया उत्पादने आणि सीफूड, विशेषत: लहान कोळंबीचे कातडे, ज्यात कॅल्शियम जास्त असते) यांचाही पुरस्कार मी नेहमीच करत असतो.


दुसरे म्हणजे बाहेरची कामे योग्य प्रकारे करणे, कारण सूर्यप्रकाशातील अतिनील(ultraviolet) किरणांमुळे त्वचेतील कोलेस्टेरॉलचे व्हिटॅमिन डी मध्ये रूपांतर होते. कॅल्शियमच्या आतड्यांतील शोषणास प्रोत्साहन देण्यासाठी हे फायदेशीर आहे आणि त्यामुळे ऑस्टियोपोरोसिस पुढे ढकलला जाऊ शकतो.


माझा हा संदेश(मेसेज) थोडा लांबड लावलेला वाटू शकतो, परंतु ज्येष्ठांसाठी आणि ज्येष्ठांची मनापासून काळजी घेणाऱ्या माझ्या तरुण मित्रांसाठीही साठी तो अत्यंत उपयुक्त आहे, हे नक्की.



*डॉ. श्रीजल शहा*,

*ऑर्थोपेडिक आणि जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन*


{विशेष सूचना : कृपया हा मेसेज आपल्या इतर ग्रुप्मध्ये अवश्य पाठवा.}

Wednesday, 24 January 2024

मौखिक आरोग्यविषयक जनजागृती व्हावी - मंत्री हसन मुश्रीफ सुसज्ज फिरते दंत चिकित्सालयाचे लोकार्पण

 मौखिक आरोग्यविषयक जनजागृती व्हावी

- मंत्री हसन मुश्रीफ

सुसज्ज फिरते दंत चिकित्सालयाचे लोकार्पण

 

            मुंबईदि.२३ : मौखिक आजारांचा प्रार्दुभाव वाढत आहे. तंबाखूजन्य पदार्थ सेवनामुळे कर्करोगाचे रुग्ण दिसत आहेत. यासाठी जनजागृती महत्त्वाची असून मौखिक आरोग्यविषयक जनजागृती व्हावी, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्यविशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले

            फिरते दंत रुग्णालय हे शासनाच्या निधीतून झाले असून या रुग्णालयास जिल्हा नियोजन समिती,मुंबई शहर यांनीही सहकार्य केले आहे. मंत्री श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते सुसज्ज फिरते दंत चिकित्सालयाचे लोकार्पण आणि या चिकित्सालयाच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन दंत वैद्यकीय महाविद्यालयात झाले.

            यावेळी वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त राजीव निवतकरसंचालक डॉ. दिलीप म्हैसेकरसहसंचालक डॉ. विवेक पाखमोडे महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. वसुंधरा भट, सहयोगी प्राध्यापक व विभागप्रमुख संध्या डॉ.चव्हाण यांची उपस्थिती होती.

            मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले की, नाविन्यपूर्ण आधुनिक सुविधा असलेले सुसज्ज फिरते दंत रुग्णालय स्टेट ऑफ आर्टस् या आधुनिक संकल्पनेवर आधारित आहे. त्यामुळे थेट जनतेपर्यंत पोहोचवून आधुनिक सेवा प्रदान करणे सहज शक्य होईल.

            प्राथमिक मौखिक आरोग्य सुविधा तसेच उत्तम उपचार  अधिकाधिक सुलभ करून फिरते दंत चिकित्सालयाद्वारे जनतेपर्यंत पोहोचून सेवेचा अभाव असलेल्या दुर्गम भागांमध्ये जास्तीत जास्त सेवा पुरवावी व मौखिक रोगांचे प्रमाण कमी करावे. तसेच जनतेस मौखिक आरोग्याबद्दल संवेदनशील करणे,  तंबाखू व्यसनामुळे वाढणारे मौखिक कर्करोग यावर जनतेस जागरुक करून मौखिक कर्करोगावर नियंत्रण आणणे हे सामाजिक दंत शास्त्र विभाग,शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय मुंबई यांनी करावे.

शासकीय दंत महाविद्यालय व रुग्ण्यालयमुंबई  येथील सामाजिक दंत शास्त्र विभाग अधिक अधिक जनतेपर्यंत पोहोचून सेवा प्रदान करण्यासाठी शासन पूर्ण सहकार्य करेल, असेही मंत्री श्री. मुश्रीफ यांनी यावेळी सांगितले.

                                                सुसज्ज फिरते दंत चिकित्सालयाची माहिती  

            दंतचिकित्सालयात आधुनिक पद्धतीच्या दोन दंत खुर्च्या व यंत्रणा असून  रुग्ण सेवेसाठी तत्पर आहे. फक्त मौखिक तपासणी व उपचार या करिताच नव्हे, तर आधुनिक उपचार पद्धती यंत्रणा जसे की पोर्टेबल एक्सरे युनिटकर्करोग तपासणीत्वरित आरोग्य चाचणी सुविधा यांनी सुसज्ज आहे. ज्यामुळे रुग्णांचे जागीच निदान करून त्वरित उपचार सेवा देणे सोपे होईल. दातांची कीड यावर उपचार व प्रतिबंधहिरड्यांचे आजार यावर उपचार, रूट कॅनॉल उपचारमौखिक कर्करोग तपासणीव्हीडिओद्वारे रुग्णांचे मौखिक आरोग्य संबंधित जागरूकतातंबाखू व्यसन  समुपदेशन या सेवा पुरविल्या जातील.

            यावेळी श्री.निवतकरडॉ. पाखमोडेडॉ. भट यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.संध्या चव्हाण यांनी केले. सूत्रसंचालन अब्रार सय्यद यांनी केले, तर आभार प्रियांका मचाले यांनी मानले.


Featured post

Lakshvedhi