Showing posts with label आरोग्य मित्र. Show all posts
Showing posts with label आरोग्य मित्र. Show all posts

Monday, 14 September 2026

दुभंगलेले ओठ व टाळू असलेल्या बालकांना मिळणार मोफत सर्वसमावेशक उपचार · राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र, बजाज फायनांस आणि ‘स्माईल ट्रेन इंडिया’ यांच्यात तीन वर्षांचा सामंजस्य करार pl share

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून बालकांच्या चेहऱ्यावर फुलणार हसू

·         दुभंगलेले ओठ व टाळू असलेल्या बालकांना मिळणार मोफत सर्वसमावेशक उपचार

·         राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र, बजाज फायनांस आणि स्माईल ट्रेन इंडियायांच्यात तीन वर्षांचा सामंजस्य करार

            मुंबई, दि. ११ : प्रत्येक बालकाच्या चेहऱ्यावर हसू फुलावे आणि त्याचे जीवन आनंददायी व्हावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस यांच्या संकल्पनेतून दुभंगलेले ओठ व टाळू या जन्मजात विकाराने ग्रस्त बालकांना आता दर्जेदार व सर्वसमावेशक उपचार मोफत उपलब्ध होणार आहेत. 

            मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने  राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र, बजाज फायनान्स आणि स्माईल ट्रेन इंडियायांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. हा  करार तीन वर्षांसाठी लागू राहणार आहे.

            जन्मजात दुभंगलेले ओठ व टाळू यामुळे  निरागस बालकांच्या चेह-यावरील हसू मावळून जाते. आपल्या मुलाच्या चेह-यावर एकदा तरी तरी हसू बघावे यासाठी बालकांच्या आई-वडिलांची होणारी तगमग आणि त्यासाठी त्यांचे रुग्णालयाचे उंबरठे झिजवणे डोळ्यात पाणी आणते . शिवाय त्याचा उपचार खर्च मोठा असल्याने तो प्रत्येकच पालकाला परवडणारा नाही.  याची जाणिव असणा-या मुख्यमंत्र्यांनी दूरदृष्टीने  विचार करून अशा पालकांना मोठा दिलासा दिला आहे. आता राज्यातील एकही बालक दुभंगलेले ओठ व टाळू असलेले राहणार नाही याची काळजी राज्याचा पालक या नात्याने मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे.

            या सामंजस्य कराराद्वारे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत (आरबीएसके) तपासणीमध्ये आढळलेल्या अशा बालकांना जिल्हा नोडल अधिकाऱ्यांच्या औपचारिक संदर्भपत्राद्वारे स्माईल ट्रेन इंडियाच्या मान्यताप्राप्त रुग्णालयांमध्ये उपचारासाठी पाठविण्यात येईल. संबंधित जिल्ह्यांना विशिष्ट भागीदार रुग्णालयांशी जोडण्यासाठी दोन्ही संस्था समन्वयाने काम करणार आहेत.

            दुभंगलेले ओठ व टाळू यांच्या उपचारांविषयी अधिक माहितीसाठी १८००१०३८३०१ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

            या उपक्रमांतर्गत बालकांना शस्त्रक्रिया, रुग्णालयातील वास्तव्य, औषधे, पोषणविषयक सेवा, दंतव्यंगोपचार, वाचा उपचार तसेच गरजेनुसार प्रवासाची सुविधा मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहे. रुग्णांचे भोजन, निवास आणि प्रवासावरील खर्चही स्माईल ट्रेन इंडियाकडून करण्यात येईल. शस्त्रक्रियापूर्व तपासण्या आणि उपचारांशी संबंधित शस्त्रक्रियेनंतरच्या गुंतागुंतीवरील खर्चाची जबाबदारीही संस्थेकडे राहणार आहे.

            बालकांची ओळख व उपचाराची आवश्यकता निश्चित करण्यासाठी स्माईल ट्रेनची भागीदार रुग्णालये, आरबीएसके पथके आणि जिल्हा प्रारंभिक हस्तक्षेप केंद्रांच्या (डीईआयसी) समन्वयाने तपासणी शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. दुभंगलेले ओठ व टाळू असलेल्या बालकांची ओळख पटविण्यासंदर्भात शासकीय आरोग्य कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रशिक्षण व मार्गदर्शनही दिले जाईल.

            उपचारासाठी रुग्ण पाठविणे, त्यांच्या नोंदी ठेवणे आणि जिल्हा नोडल अधिकाऱ्यांशी समन्वय साधण्यासाठी प्रत्येक मान्यताप्राप्त रुग्णालयाचा प्रकल्प संचालक नोडल अधिकारी म्हणून काम करणार आहे. संबंधित जिल्ह्याचे जिल्हा शल्यचिकित्सक शस्त्रक्रियेपूर्वी रुग्णालयातील शस्त्रक्रियागृहाच्या सुविधा आणि भूलतज्ज्ञांची उपलब्धता यांची खातरजमा करतील.

 

राज्यातील या १५ रुग्णालयांमध्ये होणार उपचार

या करारांतर्गत राज्यातील १५ मान्यताप्राप्त रुग्णालयांत या व्याधीवर  उपचार उपलब्ध होतील :

१. आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, वर्धा

२. आनंदऋषीजी हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटर, अहिल्यानगर

३. आस्था प्लास्टिक सर्जरी हॉस्पिटल, जळगाव

४. बेंबडे हॉस्पिटल, छत्रपती संभाजीनगर

५. एलिट कॉस्मो क्लिनिक अँड प्लास्टिक सर्जरी हॉस्पिटल, सोलापूर

६. लहाने हॉस्पिटल, लातूर

७. मीरा एनएक्स हॉस्पिटल, मुंबई

८. एमआरआर चिल्ड्रन्स हॉस्पिटल, ठाणे

९. पूना हॉस्पिटल, पुणे

१०. सहयोग हॉस्पिटल, गोंदिया

११. श्रीराम हॉस्पिटल, अकोला

१२. शुश्रूषा सिटिझन्स को-ऑपरेटिव्ह हॉस्पिटल, मुंबई

१३. स्वामी विवेकानंद मेडिकल मिशन हॉस्पिटल, नागपूर

१४. वेदांत हॉस्पिटल प्रा. लि., नाशिक

१५. वेस्टर्न इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोसायन्सेस (विन्स), कोल्हापूर.

           

 

            कार्यक्रमाच्या प्रगतीचा नियमित आढावा घेण्यासाठी दोन्ही संस्थांच्या प्रतिनिधींची संयुक्त समिती स्थापन करण्यात येणार आहे. तसेच आरोग्य सेवा आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक यांच्यामार्फत या प्रकल्पाचे नियमित त्रयस्थ मूल्यमापन करण्यात येईल.

000


 



Wednesday, 5 November 2025

जनहितार्थ आरोग्य सेवा pl share

 *📢अत्यंत महत्त्वाची सूचना*

                

जनहितार्थ आरोग्य सेवा 

*रुग्ण हक्क परिषद मुंबई प्रदेश*

 संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण


1) हिंदुजा हॉस्पिटल

2) कोकिलाबेन हॉस्पिटल

3) जसलोक हॉस्पिटल

4) दि. बॉम्बे हॉस्पिटल 

5) लीलावती हॉस्पिटल

6) ब्रीच कँडी हॉस्पिटल

7) केईएम हॉस्पिटल

8) टाटा हॉस्पिटल

9) नानावटी हॉस्पिटल

10) दि. बांद्रा होली फॅमिली हॉस्पिटल

11) हिरानंदानी हॉस्पिटल

12) होली स्पिरिट हॉस्पिटल


          या किंवा अश्या महागड्या पंचतारांकित चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील, गरीब  रुग्णांचे सर्व बिल माफ करून दिले जाईल. *यासाठी संपर्क - सौ. वीणा सोनार, दादर, मुंबई - 400028 केव्हाही संपर्क साधा. मो.* 7028982041


 *आवश्यक कागदपत्रे-*

1) 2 फोटो

2) आधार कार्ड

3) रेशन कार्ड

4) उत्पन्नाचा दाखला

5) हॉस्पिटलचे इस्टिमेट

6) रोग निदान झाल्याचे रिपोर्ट


*🙏🙏कृपया ही पोष्ट जास्तीत जास्त ग्रुप वर शेयर करून आपल्या समाज बांधवांपर्यंत पोहचवावी ही विनंती.*


*धन्यवाद*



🙏 कोणाला वैद्यकीय आर्थिक मदत हवी असल्यास

 खालील ट्रस्टशी संपर्क साधा...


 🙏सर रतन टाटा ट्रस्ट बॉम्बे हाऊस, होमी मोदी स्ट्रीट, मुंबई 400 001 कॉल: 022-66658282


 🙏रिलायन्स फाउंडेशन (पूर्वी अंबानी पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट) 222 मेकर चेंबर्स IV, 3रा मजला, नरिमन पॉइंट, मुंबई - 400021 कॉल करा: 022-44770000, 022-30325000


 🙏अमिरीलाल घेलाभाई चॅरिटेबल ट्रस्ट 71, गीतांजली, 73/75, वाळकेश्वर रोड, मुंबई - 400006


 🙏आशा किरण चॅरिटेबल ट्रस्ट C/o Radium Keysoft Solutions Ltd, कॉल करा: 022-26358290 101, रायगड दर्शन, इंडियन ऑइल कॉलनी समोर, जेपी रोड, अंधेरी (w) मुंबई 400 053


 🙏अस्पी चॅरिटेबल ट्रस्ट C/o अमेरिकन स्प्रिंग अँड प्रेसिंग वर्क्स प्रा.  Ltd P.O.  बॉक्स क्र. 7602, आदर्श गृहनिर्माण संस्था.  रोड, मालाड (प), मुंबई ४०० ०६४ ,


 🙏ऑरेड चॅरिटेबल ट्रस्ट 1-बी-1 गिरीराज, अल्टामाउंट रोड मुंबई 400 026, कॉल करा: 022-23821452, 022-24926721


 🙏B.  अरुणकुमार अँड कंपनी 1616, प्रसाद चेंबर्स, ऑपेरा हाऊस, मुंबई - 400004


 🙏बी डी बांगुर ट्रस्ट C/o कार्बन एव्हरफ्लो लि. बखावर, दुसरा मजला, नरिमन पॉइंट मुंबई 400021


 🙏बॉम्बे कम्युनिटी पब्लिक ट्रस्ट (बीसीपीटी) 5 वा मजला रीजेंट चेंबर्स, नरिमन पॉइंट, मुंबई 400021, कॉल करा: 022-22845928 / 022-22836672


 🙏बुर्हानी फाउंडेशन 276 डॉ. डी.एन. रोड लॉरेन्स आणि मेयो हाऊस फोर्ट मुंबई-400001


 🙏शताब्दी सेवा ट्रस्ट सेंचुरी बाजार, वरळी, मुंबई - 400025


 🙏सेंटर फॉर रिसर्च अँड डेव्हलपमेंट श्रेयस चेंबर्स, तळमजला, 175-डॉ.  डी.एन. रोड, फोर्ट, मुंबई - 400 001


 🙏मुख्यमंत्री मदत निधी, महाराष्ट्र शासन मंत्रालय, सहावा मजला नरिमन पॉइंट, मुंबई - ४००२०


🙏श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट प्रभादेवी, मुंबई - ४०० ०२८, दूरध्वनी.  ०२२-२४३७३६२६ : वैद्यकीय जाहिरात फॉर्म वेबवर उपलब्ध आहे.

 कृपया तपशीलांसाठी त्यांची वेबसाइट पहा.


 🙏दामोदर आनंदजी चॅरिटी ट्रस्ट 66, वाजू कोटक मार्ग, G.P.O जवळ, मुंबई -400001


 🙏डायमंड ज्युबली ट्रस्ट आगा हॉल, नेस्बिट रोड, समोर.  सेंट मेरी हायस्कूल मुंबई 400010, कॉल करा: 022-23775294, 022-23778923


 🙏धर्म विजय ट्रस्ट C/O किलाचंद देवचंद अँड कंपनी न्यू ग्रेट इन्शुरन्स भवन, 7, जमशेदजी टाटा रोड, मुंबई - 400020


 🙏धरमदास त्रिकमदास कपूरवाला 46, रिज रोड, रेखा क्रमांक 2, 4था मजला, मुंबई - 400006


 🙏धीरुभाई अंबानी फाउंडेशन रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड रिलायन्स सेंटर, 19, वालचंद हिराचंद मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई 400 038. दूरध्वनी : 022-30327000


 🙏धिरजलाल टॉकचंद चॅरिटेबल ट्रस्ट शैलेश निवास, सुभाष लेन दफ्तरी रोड, मालाड (पू), मुंबई - 400097


 🙏धिरजलाल मोरारजी अजमेरा चॅरिटी ट्रस्ट 37 - ए, सारंग स्ट्रीट, मुंबई - 400003


 🙏दीपचंद गार्डी चॅरिटेबल ट्रस्ट उषा किरण, दुसरा मजला, अल्टामाउंट रोड, मुंबई - ४००००६


 🙏दिवालीबेन मोहनलाल चॅरिटेबल ट्रस्ट खटाऊ हवेली, पहिला मजला, 95-K.  ओमेर पार्क, भुलाभाई देसाई रोड, मुंबई ४०० ०२६


 🙏एकता चॅरिटेबल ट्रस्ट 4/444, पंचरत्न, ऑपेरा हाऊस, मुंबई -400004


 🙏एसके चॅरिटेबल ट्रस्ट C/O कॅप्रिहन्स इंडिया लि., शिवसागर इस्टेट, 'डी' ब्लॉक, दुसरा मजला, डॉ. ए.बी. रोड, वरळी, मुंबई - 400018


 🙏एक्सेल प्रोसेस प्रा.  लि. चॅरिटेबल ट्रस्ट 117/118, मथुरदास वासनजी रोड, चकाला, अंधेरी (पू), मुंबई - 400093


 🙏फजलभॉय चॅरिटेबल ट्रस्ट लिबर्टी सिनेमाजवळ, मरीन लाईन्स, मुंबई -४००२०


 🙏गाला फाउंडेशन वाकोला म्युनिसिपल मार्केटच्या मागे, नेहरू रोड, वाकोला, सांताक्रूझ (ई) मुंबई


 🙏गरवारे फाउंडेशन ट्रस्ट चौपाटी चेंबर्स, मुंबई - 400007


 🙏गोकाक फाउंडेशन फोर्ब्स बिल्डीजी., फोर्ब्स स्ट्रीट, मुंबई - 400023


 🙏गुडलास नेरोलॅक पेंट्स लि. (ट्रस्ट) नेरोलॅक हाउस, ए.जी. कदम मार्ग, लोअर परेल, मुंबई - 400013


 🙏गोविंद दत्तात्रय गोखले चॅरिटेबल ट्रस्ट कल्पतरू हेरिटेज, 5 वा मजला, 129, M.G.  रोड मुंबई 400 023, कॉल करा: 022-22673831


 🙏हरेंद्र दवे मेमोरियल ट्रस्ट C/O जन्मभूमी, 3रा मजला, जन्मभूमी मार्ग मुंबई 400 001


 🙏हेल्पिंग हँड चॅरिटेबल ट्रस्ट 3, विदर्भ सम्राट को-ऑप Hsg.  सोसायटी 93-सी, व्ही.पी.रोड, विलेपार्ले (पश्चिम) मुंबई - 400 056 दूरध्वनी: 022-6147448


 🙏हिरानंदानी फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट ऑलिंपिया, सेंट्रल एव्हेन्यू, हिरानंदानी बिझनेस पार्क पवई, मुंबई 400076


 🙏हर्डिलिया चॅरिटेबल फाउंडेशन एअर इंडिया बिल्डिंग, 13वा मजला नरिमन पॉइंट मुंबई 400 031, कॉल करा: 022-22024224


 🙏हिराचंद गोवर्धनदास 222, मेकर चेंबर्स 1V 3रा मजला, नरिमन पॉइंट मुंबई 400 021


 🙏H.  एम. मेहता चॅरिटी ट्रस्ट मेहता हाऊस, 4 वा मजला, अपोलो स्ट्रीट, खुशरू दुभाष मार्ग, मुंबई - 400001


 🙏H.  S. C. ट्रस्ट रेडी मनी मॅन्शन, वीर नरिमन रोड, मुंबई - 400023


 🙏जमनालाल बजाज फाउंडेशन बजाज भवन 2रा मजला, जमनालाल बजाज मार्ग, 226 नरिमन पॉइंट, मुंबई 400 021, कॉल करा: 022-22023626


 💝 उपर सांगते सर्व जरुरतमंद आणि गरीब कुटुंबांना मेडीकली मदत करते


  डायलिसिस @ मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात फक्त 200/- मध्ये करता येते.  एकूण 22 डायलिसिस मशिन्स बसवण्यात आल्या.  कृपया.  हे fwd करा जेणेकरून इतरांना फायदा होईल.  धन्यवाद.

 कृपया तुमच्या ग्रुपमध्ये पास करा हा सर्व डायलिसिस रुग्णांसाठी उपयुक्त संदेश आहे

 प्राप्त झाल्याप्रमाणे फॉरवर्ड केले.. 👆🏼☝🙏

Wednesday, 29 October 2025

तुम्ही आजारी नाही, फक्त वय वाढत

 तुम्ही आजारी नाही, फक्त वय वाढत आहे.🌹


अनेक आजार हे प्रत्यक्षात आजार नसतात.

ते वाढत्या वयानुसार शरीरात दिसणारी नैसर्गिक चिन्हे असतात.

बीजिंगमधील एका रुग्णालयाच्या संचालकांनी वयोवृद्धांसाठी दिलेल्या पाच सल्ल्यांकडे लक्ष द्या. 


तुम्ही आजारी नाही, फक्त वय वाढत आहे.

तुम्हाला वाटणारी अनेक “लक्षणे” ही प्रत्यक्षात शरीर वृद्ध होत असल्याची नैसर्गिक चिन्हे आहेत.


1️⃣ स्मरणशक्ती कमी होणे

हे अल्झायमर नाही. ही मेंदूची स्वतःला जपण्याची एक पद्धत आहे.

घाबरू नका मेंदू जुना होत आहे, आजारी नाही.

तुम्ही चावी कुठे ठेवली हे विसराल, पण स्वतः शोधून काढू शकत असाल, तर ते विस्मरण (डिमेन्शिया) नाही.


2️⃣ चालण्याचा वेग कमी होणे किंवा पाय अस्थिर होणे

हे पक्षाघात नाही, तर स्नायू कमकुवत होण्याचे परिणाम आहेत.

उपाय औषध नाही अधिक हालचाल हा उपाय आहे.


3️⃣ झोप न येणे

हा आजार नाही, मेंदू आपली लय बदलत आहे.

झोपेची रचना बदलते आहे. झोपेच्या गोळ्यांवर अवलंबून राहू नका 

त्याने पडणे, विस्मरण, अशक्तपणा वाढतो.

सर्वोत्तम झोपेचे औषध: दिवसा सूर्यप्रकाशात वेळ घालवा,

आणि नियमित दिनक्रम पाळा.


4️⃣ अंगदुखी

हे संधिवात नाही, तर वृद्धत्वामुळे मज्जातंतू कमकुवत होण्याची नैसर्गिक प्रतिक्रिया आहे.


5️⃣ हातपाय सर्वत्र दुखतात असे अनेक जण सांगतात.

“हे संधिवात आहे का? हाडांची वाढ आहे का?”

हाडे कमकुवत होतात, पण ९९% अंगदुखी हा आजार नाही.

मज्जासंवेदना मंद होतात आणि त्यामुळे वेदना अधिक जाणवतात 

याला सेंट्रल सेंसिटायझेशन म्हणतात.

ही वृद्धावस्थेतील सामान्य स्थिती आहे.

वेदनाशामक औषधे उपाय नाहीत.

उपाय: हलका व्यायाम, फिजिओथेरपी, पायांना गरम पाण्याचा शेक,

हलकी मालिश औषधांपेक्षा प्रभावी आहेत.


6️⃣ वैद्यकीय तपासणीत दिसणारी काही “असामान्य” मूल्ये

तीही आजार नसतात मानके जुनी असल्यामुळे ती अशी दिसतात.


7️⃣ जागतिक आरोग्य संघटनेने सुचवले आहे की

वयोवृद्धांसाठी तपासणीची मानके शिथिल करावीत.

थोडासा जास्त कोलेस्ट्रॉल त्रासदायक नाही 

असे लोक जास्त जगतात!

कारण कोलेस्ट्रॉल हार्मोन्स व पेशींच्या भिंती बनवण्यासाठी आवश्यक असतो.

खूप कमी असल्यास प्रतिकारशक्ती कमी होते.

चीनमधील मार्गदर्शक तत्वांनुसार वृद्धांसाठी रक्तदाबाचे लक्ष्य <१५०/९० आहे,

तर तरुणांसाठी <१४०/९०•

वृद्धत्वाला आजार म्हणून पाहू नका; बदलांना रोग लक्षणे म्हणून ओळखू नका.


8️⃣ वृद्ध होणे हा आजार नाही 

ते जीवनाचा नैसर्गिक प्रवास आहे.


वयोवृद्ध आणि त्यांची मुले यांच्यासाठी काही सूचना:

1️⃣ प्रत्येक अस्वस्थता म्हणजे आजार नाही, हे लक्षात ठेवा.

2️⃣ भीती ही वृद्धांची सर्वात मोठी शत्रू आहे. तपासणी अहवालांचा किंवा जाहिरातींचा गुलाम होऊ नका.

3️⃣ मुलांचे कर्तव्य फक्त आई-वडिलांना रुग्णालयात नेणे नाही 

त्यांच्यासोबत फिरा, उन्हात बसा, बोला, जेवा,

आणि भावनिक नाते टिकवा.


वय वाढणे शत्रू नाही;

ते जगण्याचेच दुसरे नाव आहे.

स्थिर बसणे हेच खरे शत्रू आहे!


🌿 आरोग्यदायी रहा! ☘️


एका ब्राझिलियन कॅन्सर-तज्ज्ञाचे विचार:

1️⃣ वृद्धत्व अधिकृतरीत्या ६०व्या वर्षी सुरू होते आणि ८० पर्यंत टिकते.

2️⃣ “चौथी अवस्था”  ८० ते ९० वयदरम्यान.

3️⃣ “दीर्घायुष्य” ९० पासून मृत्यूपर्यंत टिकते.

4️⃣ वृद्धांचे सर्वात मोठे संकट म्हणजे एकटेपणा.

जोडप्यातील एक जण आधी जातो, आणि वैधव्य हे कुटुंबासाठीही ओझं वाटू शकतं.

म्हणून मित्रांशी नातं टिकवा, भेटत राहा 

मुलं आणि नातवंडांवर ओझं बनू नका 

(जरी ते सांगत नसले तरी).


माझा वैयक्तिक सल्ला:


आपले जीवन आपल्या हातात ठेवा 

कधी बाहेर पडायचं, कोणासोबत रहायचं,

काय खायचं, काय घालायचं,

कोणाला फोन करायचा, केव्हा झोपायचं, 

काय वाचायचं, काय अनुभवायचं

हे सगळं तुम्हीच ठरवा.

नाहीतर तुम्ही इतरांवर ओझं बनाल.


विल्यम शेक्सपियर म्हणाले

“मी नेहमी आनंदी असतो, 

कारण मी कुणाकडून काही अपेक्षा करत नाही.”

अपेक्षाच सर्वात मोठी वेदना आहे.

प्रत्येक समस्येचं समाधान असतं 

फक्त मृत्यूचं नाही.


प्रतिक्रिया देण्यापूर्वी... खोल श्वास घ्या.

बोलण्यापूर्वी... ऐका.

टीका करण्यापूर्वी... स्वतःकडे पाहा.

लिहिण्यापूर्वी... विचार करा.

आक्रमण करण्यापूर्वी... समर्पण करा.

मरायच्या आधी... आयुष्य पूर्णपणे जगा!


सर्वोत्तम नातं ते नसतं जिथे व्यक्ती परिपूर्ण असतो,

तर ते असतं जिथे व्यक्ती जीवनाला सुंदर व आनंदी बनवायला शिकलेला असतो.

इतरांच्या कमतरता बघा, पण त्यांच्या गुणांचे कौतुक करा.

तुम्हाला आनंदी व्हायचं असेल तर 

इतरांना आनंद द्या.

काही मिळवायचं असेल, तर आधी काही द्या.

स्वतःभोवती प्रेमळ, हसरे, सकारात्मक लोक ठेवा 

आणि तुम्ही स्वतः तसे बना.

जीवन कठीण झालं तरी, डोळ्यात अश्रू असले तरी,हसतमुखाने उठा आणि म्हणा

“सगळं ठीक होईल, कारण आपण प्रवासात प्रगती करत आहोत!”


लहानशी चाचणी 😄:


जर तुम्ही हा संदेश कुणालाही पाठवला नाही,

तर याचा अर्थ तुम्ही एकटे आणि थोडे दुःखी आहात 😜

हा संदेश तुम्हाला प्रिय असलेल्या लोकांना पाठवा 

ते तुम्ही कधीही विसरणार नाही! ❤️

Monday, 21 July 2025

मुख्यमंत्री सहायता निधी आता परदेशातून निधी स्वीकारता येणार pl share

 आता परदेशातून निधी स्वीकारता येणार

 मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीला परदेशातून निधी स्वीकारण्यासाठी आवश्यक असलेली एफसीआरए (फॉरेन काँट्रीब्युशन रेग्यूलेशन अँक्ट) मान्यता नुकतीच प्राप्त झाली आहे. यामुळे परदेशातील दानशूर व्यक्ती, संस्था, सीएसआर कंपन्यांकडून थेट आर्थिक मदत स्वीकारता येणार आहे. उल्लेखनिय बाब अशी की, मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष, महाराष्ट्र हे एफसीआरए प्रमाणपत्र मिळवणारे देशातील पहिलेच राज्य ठरले आहे. या परदेशी निधीचा वापर गरजू रुग्णांच्या उपचारासाठी करण्यात येणार आहे.

Saturday, 19 July 2025

८०वर्षांची जुनी भिंत!*,या पुस्तकातील 60 ते 80 वर्षे वयाच्या लोकांना सुखी माणसं बनवण्याच्या 44 गोष्टी: 👇

 *८०वर्षांची जुनी भिंत!*


आपल्याकडे सुद्धा average  आयुष्मान 80 च्या आसपास गेले आहे असे वाटते. त्यामुळे आता आपल्याला 80 वर्षे आनंदात जगायचे असल्यास काय करायला पाहिजे ते माहित करून घ्या. मानसोपचारतज्ज्ञ हिदेकी वाडा यांनी *८०-वर्ष-जुनी भिंत* नावाचे पुस्तक प्रकाशित केले. पुस्तक प्रकाशित होताच, त्याची विक्री ५,००,००० प्रतीं पेक्षा जास्त झाली, जी सध्या सर्वाधिक विक्री होणारे पुस्तक ठरले. जर हाच दर कायम राहिला तर या पुस्तकाची विक्री १० लाख प्रतींपेक्षा जास्त होईल, ज्यामुळे ते या वर्षी जपानमधील सर्वाधिक विक्री होणारे पुस्तक बनेल.


या पुस्तकातील 60 ते 80 वर्षे वयाच्या लोकांना सुखी माणसं बनवण्याच्या 44 गोष्टी: 👇


1. *चालत राहा.*

2.चिडल्यावर खोल श्वास घ्या.

3.शरीर आखडत नसेल ,इतपत व्यायाम करा.

4.उन्हाळ्यात एसी वापरत असाल तर ,भरपूर पाणी प्या.

5."डायपर" वापरल्याने हालचाली सोप्या होतात.

6.जास्त वेळा चालल्याने शरीर आणि मेंदू अधिक ऊर्जावान राहतो.

7. *विसरणे हे वयामुळे नसून मेंदूचा दीर्घकाळ वापर न केल्यामुळे होते.*

8.जास्त औषधं घेण्याची गरज नाही.

9.रक्त दाब आणि साखर पातळी कृत्रिमरीत्या कमी करण्याची गरज नाही.

10.एकटे असणे म्हणजे एकाकीपणा नव्हे, तर आनंदी वेळ घालवणे.

11.आळशी असणे लाजिरवाणे नाही.

12.वृद्धांसाठी वाहन चालवणे धोका दायक ठरू शकते, त्यामुळे परवाना न घेण्याचा विचार करा.

13. *आवडते तेच करा, जे नकोसे वाटते ते करू नका.*

14.वय झालं तरीही सर्व नैसर्गिक इच्छा कायम राहतात.

15.घरात बसून राहू नका.

16.जे हवे ते खा, किंचित जाडसर राहणे ठीक आहे.

17.प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक करा.

18.ज्यांना तुम्ही नकोसं समजता, अशा लोकांना टाळा.

19.सतत टीव्ही पाहू नका.

20. *रोगाशी अखेर पर्यंत लढण्यापेक्षा त्याच्या सोबत जगायला शिका.*

21."गाडी डोंगरावर गेली तरी वाट सापडते" हा जादूई मंत्र लक्षात ठेवा.

22.ताजे फळे आणि सॅलड खा.

23.आंघोळ 10 मिनिटांत पूर्ण करा.

24.झोप येत नसेल तर जबरदस्ती करू नका.

25.आनंदी गोष्टी केल्याने मेंदू सक्रिय राहतो.

26.मनातलं बोलून टाका, जास्त विचार करू नका,कसं बोलू वगैरे ?

27.लवकरात लवकर "फॅमिली डॉक्टर" ठरवा.

28.फार सहनशील राहू नका, थोडेसे "वाईट म्हातारे", व नट खट होण्यास हरकत नाही.

29.कधी कधी आपलं मत बदलायला व हट्ट सोडायला हरकत नाही.

30.आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यातील "डिमेन्शिया" हा देवाने दिलेला आशीर्वाद आहे.

31. *शिकणं थांबलं की ,माणूस खरंच म्हातारा होतो.*

32.कीर्तीचा हव्यास सोडा, जे आहे ते पुरेसं आहे.

33.निरागसपणा हा वृद्धांचा विशेषाधिकार आहे.

34.जितक्या समस्या, तितकं आयुष्य रंजक!

35.सूर्यप्रकाशात बसल्याने आनंद मिळतो.

36. *दुसर्‍यांसाठी चांगल्या गोष्टी करा.*

37.आजचा दिवस निवांत जगा.

38.इच्छा हाच दीर्घायुष्याचा स्रोत आहे.

39.नेहमी सकारात्मक राहा.

40.मोकळा श्वास घ्या.

41.जीवनाचे नियम तुमच्या हातात आहेत.

42.प्रत्येक गोष्ट शांतपणे स्वीकारा.

43.आनंदी माणसं नेहमी प्रिय असतात.

44.हसण्याने नशीब उजळतं.


ही माहिती आपल्या सर्व ज्येष्ठ मित्रांपर्यंत जरूर शेअर करा !

Thursday, 17 July 2025

खरंतर, स्ट्रोक येण्याच्या आधी काही लक्षणं दिसतात आणि याचं प्रतिबंधही करता येतो. सावधन रहा सतर्क रहा ,pl share

 एक चांगले काम करा


आपण सर्वजण हळूहळू वयस्कर होत आहोत, त्यामुळे प्रत्येकाने याकडे लक्ष द्यावे. कृपया एक मिनिट काढून हे वाचा. हे तुमच्यासाठी, तुमच्या कुटुंबासाठी किंवा मित्रांसाठी उपयुक्त ठरू शकते.


एका जुन्या वर्गमित्रांच्या भेटीत, एका महिलेला भाजी पार्टीदरम्यान पाय घसरून पडले. तिच्या मित्रांनी डॉक्टरकडे जायचा सल्ला दिला, पण तिला काहीच झालं नाही असं ती म्हणाली. तिने नवीन चपला घातल्यामुळे एक वीट ठेचली गेली, एवढंच. मित्रमैत्रिणींनी तिला स्वच्छ केलं, जेवण दिलं आणि ती पुढचा वेळ आनंदात घालवत राहिली.


परंतु त्या संध्याकाळी ६ वाजता तिच्या पतीने कळवलं की तिला हॉस्पिटलमध्ये भरती केलं आणि स्ट्रोकमुळे तिचं निधन झालं.


जर स्ट्रोकची लक्षणे ओळखता आली असती, तर आज ती आपल्यासोबत असती.


खरंतर, स्ट्रोक येण्याच्या आधी काही लक्षणं दिसतात आणि याचं प्रतिबंधही करता येतो.

एका न्यूरो सर्जनने सांगितले की, जर त्याला स्ट्रोक झालेल्या रुग्णापर्यंत ३ तासांत पोहोचता आलं, तर त्याचे दुष्परिणाम पूर्णपणे उलटवता येतात.


गुपित एवढंच की स्ट्रोकची लक्षणे ओळखा आणि ३ तासांत उपचार सुरू करा.

हे फार अवघड नाही. पण यासाठी तुम्हाला S, T, R या तीन गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील.


S, T, R लक्षात ठेवा – हे स्ट्रोक ओळखण्याचे तीन पायऱ्या आहेत.


जर आपल्या आजूबाजूच्या लोकांना स्ट्रोकची लक्षणे ओळखता आली नाहीत, तर रुग्णाचे मेंदूचे गंभीर नुकसान होऊ शकते.


फक्त तीन सोप्या प्रश्न विचारा:


S: (Smile) – रुग्णाला हसायला सांगा.

जर हसताना ओठ एक बाजूला झुकत असतील, तर ही शक्यता असते.


T: (Talk) – रुग्णाला एक सोपं वाक्य बोलायला सांगा (सुसंगत आणि स्पष्ट).

उदा. “आजचा दिवस खूप छान आहे.”


R: (Raise) – दोन्ही हात वर उचलायला सांगा.

जर एक हात खाली पडला, तर ते एक लक्षण असू शकते.


नोट:

अजून एक लक्षण म्हणजे – रुग्णाला जीभ बाहेर काढायला सांगा.

जर जीभ वाकडी असेल किंवा एका बाजूला झुकलेली असेल, तर स्ट्रोकची शक्यता आहे.


वरील चारपैकी एकही कृती रुग्ण करू शकत नसेल, तर तात्काळ अॅम्ब्युलन्स किंवा रुग्णालयाशी संपर्क साधावा आणि सर्व लक्षणे वैद्यकीय पथकाला सांगावीत.

हा संदेश अत्यंत संवेदनशील आणि जागरूकता वाढवणारा आहे.

Thursday, 3 July 2025

शासकीय रुग्णालयांमध्ये सिटीस्कॅन आणि एमआरआय मशीन खरेदीसाठी निधी उपलब्ध करून देणार,pl share

 शासकीय रुग्णालयांमध्ये सिटीस्कॅन आणि एमआरआय

मशीन खरेदीसाठी निधी उपलब्ध करून देणार

-         उपमुख्यमंत्री अजित पवार

वैद्यकीय शिक्षण विभागाकडील खरेदी शासन नियमानुसारच - वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

 

मुंबईदि. ३ :  राज्यातील सर्वसामान्य गरीब रुग्णास आरोग्याच्या अत्यावश्यक व  दर्जेदार सुविधा मिळाव्यात यासाठी राज्य शासन आवश्यक निधी उपलब्ध करून देईल. नियोजन समितीच्या निधीतून राज्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये सिटीस्कॅनएमआरआय मशीन खरेदी करण्यासाठी राज्यस्तरावरून नियमावली करून देण्यात येईल. या नुसार सिटीस्कॅनएमआरआय मशीन खरेदी करण्यासाठी ज्या जिल्ह्यांचा प्रस्ताव प्राप्त होईल त्यास मान्यता दिली जाईलअसे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सांगितले.

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणालेसिटीस्कॅनएमआरआय मशीन खरेदीसाठी जिल्हा नियोजन समितीचा काही निधी राखीव ठेवण्यात येईल. राज्यात सिटीस्कॅन आणि एमआरआय मशीन अभावी रुग्णांवरील उपचारास बाधा निर्माण होणार नाही याची दक्षताही घेतली जाईल.

सदस्य संजय पोतनीस यांनी या संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य सर्वश्री अमित देशमुखनिलेश राणेनाना पटोलेसाजिदखान पठाण आणि अजय चौधरी यांनी उपप्रश्न विचारून सहभाग घेतला.

राज्यातील आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विषयक सुविधा अधिक बळकट करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडील खरेदी शासन नियमानुसारच करण्यात येत असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी यावेळी  सांगितले. ते म्हणालेवैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालयांनी पाठवलेल्या यंत्र सामग्री व अन्य आरोग्य विषयक सुविधांच्या खरेदीच्या प्रस्तावाची वरिष्ठ स्तरावर तपासणी करण्यात येऊन त्यानंतर ई निविदा प्रक्रिया राबवून खरेदी करण्यात येते.

मंत्री श्री. म्हणालेवैद्यकीय शिक्षणाच्या दर्जावर भर देण्यात येत आहे. वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आवश्यक प्राध्यापककर्मचारी व तांत्रिक पदांची भरती केली जाणार आहे. सिंधुदुर्गभंडारा या जिल्ह्याना भेट देऊन तेथील रुग्णालयवैद्यकीय महाविद्यालयातील सुविधेचा आढावा घेतला जाईलअसेही वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. मुश्रीफ यांनी यावेळी सांगितले.

Thursday, 24 April 2025

राज्य कामगार विमा योजनेतील रुग्णालये होणार अत्याधुनिक

 राज्य कामगार विमा योजनेतील रुग्णालये होणार अत्याधुनिक

 सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

 

मुंबईदि. 24 : राज्यातील कामगार विमा योजनेंतर्गत येणाऱ्या सर्व रुग्णालयातील पायाभूत सुविधा आणि यंत्रसामग्री आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात यावाअसे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.

 

राज्य कामगार विमा योजनेच्या मुख्य कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत मंत्री श्री. आबिटकर बोलत होते. या वेळी वैद्यकीय संचालक डॉ. शशी कोळूणूरकरसंचालक (प्रशासन) सोहम वायाळउपसंचालक सचिन देसाई तसेच राज्यातील विविध राज्य विमा रुग्णालयांचे वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

 

मंत्री श्री.आबिटकर म्हणालेराज्यातील रेशन दुकानदारपतसंस्था व शिक्षक यांनाही कामगार विमा योजनेचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात. तसेच रुग्णालयातील रुग्णसंख्या वाढवण्यासाठी आरोग्य अधिकाऱ्यांनी शिबिरे आयोजित करावीत आणि सुविधा वाढवण्याचे प्रयत्न करावेत. याचबरोबर रुग्णालयांचा दर्जा वाढविण्यासाठी नवीन योजना तयार कराव्यात. शासनाकडून साहित्य व यंत्रसामग्री पुरवण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल. रिक्त पदे भरण्यासाठीही तातडीने कार्यवाही केली जाईल तसेच डायलिसिससारख्या आधुनिक सुविधा निर्माण करण्यावर भर दिला जाणार असूनवैद्यकीय अधिकाऱ्यांनी जबाबदारीने व जलदगतीने काम करावेअसे निर्देशही त्यांनी दिले. कामगारांची नोंदणी करताना येणाऱ्या अडचणी शोधून त्या सोडवण्यासाठी उपाययोजना सुचवण्यात याव्यात व जनजागृतीसाठी उपक्रम राबवावेत.

एक महिन्यानंतर या सूचनांचा पुन्हा आढावा घेतला जाईल. कामात प्रगती न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. रुग्णालयांचा दर्जा वाढवण्यासाठी नवीन योजना तयार करण्यात याव्यात.

Thursday, 17 April 2025

कढीपत्त्यापासून तयार केलेला चहा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे !!

 *कढीपत्त्यापासून तयार केलेला चहा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे !!* 


बहुतेक लोक विविध पदार्थांमध्ये कढीपत्ता भरपूर वापरतात. कढीपत्ता जेवणाची चव वाढवण्याचे काम करतो. सांबर, डाळ, भाज्या इत्यादींमध्ये कढीपत्ता प्रामुख्याने वापरला जातो.


एवढेच नाही तर लोक कढीपत्त्याचा रसही पितात. पण, आणखी एक गोष्ट आहे, जी तुम्ही या पानापासून बनवू आणि पिऊ शकता आणि ती म्हणजे कढीपत्त्यापासून बनवलेला हेल्दी चहा. होय, कढीपत्त्यापासून तयार केलेला चहा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. कढीपत्त्यात अनेक प्रकारचे पोषक तत्व देखील असतात, जे अनेक प्रकारच्या शारीरिक समस्यांपासून बचाव करतात.


*जाणून घेऊया कढीपत्त्याचा चहा पिण्याचे काय फायदे आहेत आणि तो बनवण्याची पद्धत कशी आहे.* 


*कढीपत्त्यातील पोषक घटक -*

कढीपत्त्यात लोह, फॉस्फरस, कॅल्शियम, व्हिटॅमिन ए (कॅरोटीन), व्हिटॅमिन सी इत्यादी अनेक प्रकारचे पोषक घटक असतात. व्हिटॅमिन सी रोगप्रतिकार शक्ती मजबूत करते. त्यामुळे कढीपत्त्याचा चहा पिणे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते.


*कढीपत्ता चहाचे फायदे -* 

1. कढीपत्ता दक्षिण भारतात जास्त वापरला जातो. मात्र, आता बहुतांश लोकांनी त्याचा वापर सुरू केला आहे. कढीपत्त्याचा उपयोग फक्त फोडणी देण्यासाठीच केला जात नाही, तर या औषधी वनस्पतीपासून बनवलेला एक कप चहा देखील आपल्याला अनेक आरोग्यदायी फायदे देतो.


2. कढीपत्त्याचा चहा प्यायल्याने पचनक्रिया निरोगी राहते. त्यात सौम्य रेचक गुणधर्म आणि पाचक एंजाइम असतात, जे आतड्याची हालचाल सुधारतात. यामुळे पचनक्रियाही सुधारते.


बद्धकोष्ठता, गॅस, जुलाब आदी समस्याही कढीपत्त्याचा चहा प्यायल्याने कमी होतात.


3. जर तुम्हाला मधुमेह असेल आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवायची असेल तर तुम्ही कढीपत्ता चहाचे सेवन करू शकता. कढीपत्ता चहा रक्तातील साखरेची पातळी वाढवत नाही, साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी प्रभावी आहे.


4. कढीपत्त्यात उच्च पातळीचे फिनॉलिक्स आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात, जे मुक्त रॅडिकल्समुळे त्वचेच्या नुकसानापासून संरक्षण करतात. अँटिऑक्सिडंटमध्ये असलेले घटक शरीराला संसर्ग, जळजळ इत्यादीपासून सुरक्षित ठेवण्यासाठी देखील प्रभावी आहेत. आजारांपासून दूर राहायचे असेल तर एक कप कढीपत्त्याचा चहा नियमित घ्या.


5. तुम्ही गरोदरपणातही या चहाचे सेवन करू शकता. हा चहा प्यायल्याने तुम्हाला उलट्या, मळमळ, मॉर्निंग सिकनेस यासारख्या समस्यांचा त्रास होणार नाही. जर तुम्हाला मोशन सिकनेस असेल तर प्रवासापूर्वी आणि प्रवासादरम्यान हा चहा प्या, तुम्हाला उलट्या, मळमळ असा त्रास होणार नाही.


6. कढीपत्त्याचा सुगंध किंवा वास मज्जातंतूंना आराम देण्यास मदत करू शकतो. तणाव दूर करून मन आणि मेंदू शांत होतो. दिवसभर काम करून थकवा जाणवत असेल तर थकवा आणि तणाव दूर करण्यासाठी एक कप कढीपत्ता चहा प्या.


कढीपत्ता चहा कसा बनवायचा -


कढीपत्त्याचा चहा बनवण्यासाठी सुमारे 20-25 ताजी कढीपत्ता पाने घ्या. त्यांना पाण्याने स्वच्छ करा. चहाच्या भांड्यात एक कप पाणी घाला आणि गॅसवर ठेवा. पाणी उकळायला लागल्यावर गॅस बंद करा.


आता त्यात कढीपत्ता टाका. थोडावेळ असेच झाकून ठेवा. गोडवा हवाच असल्यास थोडा गुळ वापरा, साखर नको. काही मिनिटांतच पाण्याचा रंग बदलू लागेल. चहा एका कपमध्ये गाळून घ्या आणि गरमागरम पिण्याचा आनंद घ्या.


*विशेष सुचना :- हा मेसेज वेळात वेळ काढून ईतरांच्या माहीतीत भर पडावी म्हणून पुढे शेअर करावा*


*ह्या व अशा निशुल्क माहीती साठी आरोग्य मधुमेह मुक्ती  हा ग्रुप जॉईन करा*


*(कॉपी पेस्ट)*


 *

Tuesday, 15 April 2025

आरोग्य संदेश

 *नमस्कार*🙏🏻


1)तहान लागेल तेव्हाच पाणी प्या.


2)शाबुदाणा,शेंगदाणे,वरी,दही हे सगळे पित्त वाढवणारे पदार्थ खाऊन उपवास करू नयेत... खरा उपवास म्हणजे लंघन..पोटाला विश्रांती देणे..


3)जेवणाच्या वेळा नियमित असाव्यात..दुपारी १२ पर्यंत आणि रात्री ८ पर्यंत जेवण करावे.


4)दोन्ही जेवणानंतर शत पावली( Actual १०० steps च अपेक्षित आहेत .व्यायाम नव्हे )घालावी. म्हणजे अन्न पुढे सरकण्यास आणि पचनाला मदत होते.


5)लोणचे,पापड,अति तिखट,तेलकट, खारट अन्न पदार्थ खाऊ नयेत.


6)रात्री च्या वेळी दही खाऊ नये.


7)रोज ४५ मिनिटे चालण्याचा व्यायाम करावा.


8)मधल्या भुकेच्या वेळेत त्या त्या ऋतूमध्ये उपलब्ध असणारे फळ,राजगिरा लाडू,साळीच्या लाह्या,खजूर हे खावे...फरसाण,बिस्कीट,शेव हे सर्व पित्त वाढवणारे पदार्थ आहेत.


9)आपण जिथे राहतो तिथे ज्या स्थानिक भाज्या पिकतात,फळे मिळतात ते खावे..फळे नुसतीच खावीत, दुधात घालून,दह्यात मिक्स करून खाऊ नयेत...फळांची मूळ चव आणि गुणधर्म बदलतात अशाने..


10)जेवणात २ चमचे तुपाचा समावेश जरूर  असावा.तुपाने कोलेस्टेरॉल वाढत नाही..तूप हे दुधावर अनेक संस्कार केल्यानंतर तयार होते त्यामुळे पचनासाठी चांगले असते..


11)संडास,लघवी ,उलटी ,शिंक या वेगांचे धारण कधीही करू नये..लागल्यास लगेच जावे.


12)पाळीच्या दिवसात स्त्रियांनी लोणचे खाल्ले तर रक्त स्त्राव वाढण्याची शक्यता असते कारण लोणच्यात तेल,मीठ,तिखट यांचा जास्त वापर असतो आणि त्यामुळे स्त्री शरीरातील पित्त वाढते पर्यायाने रक्त सुध्दा वाढते..म्हणून लोणचे खाऊ नये.


13)दूध आणि फळं एकत्र करून खाऊ नये..विरुद्ध आहार आहे..त्याचे पचन होत नाही.आणि अनेक आजारांची निर्मिती त्यातून होते.


14)कधीही पोटाला तडस लागेपर्यंत खाऊ नये..वायू च्या संचरणासाठी पोटात जागा ठेवावी.


15) शिळे अन्न, processed food, preservatives असलेले पदार्थ शक्यतो टाळावेत..जितका आहार ताजा खाल्ला जाईल  तितके शरीराचे पोषण चांगले होईल...आपल्या शरीराचा संपूर्ण डोलारा हा आपण खात असलेल्या आहारावर च अवलंबून असतो...


16)व्यक्ती तितक्या प्रकृती त्यामुळे सगळ्यांना सरसकट एक च औषध लागू पडत नाही..वय,वजन,प्रकृती,रुग्णाची नाडी परीक्षा ,पूर्वी होऊन गेलेले आजार अशा अनेक गोष्टींवर treatment अवलंबून असते..


Health is Wealth

वैद्य स्वप्ना कुलकर्णी



🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺


*

Sunday, 30 March 2025

गुढीपाडव्याला श्रीखंडच का खावे?" आयुर्वेद आणि श्रीखंड काय संबंध*

 *"गुढीपाडव्याला श्रीखंडच का खावे?" आयुर्वेद आणि श्रीखंड काय संबंध*


मराठी वर्षाची सुरुवात चैत्र महिन्यात गुढीपाडव्याच्या दिवसाने होते.हिंदू कालदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवसाला गुढीपाडवा साजरा केला जातो. या दिवशी घरोघरी बांबू, रेशमी वस्त्र,तांब्या, आंब्याची डहाळी, कडुनिंबाची कोवळी पाने, बत्ताशाची माळ यासारख्या शंभर टक्के नैसर्गिक आणि आरोग्यास पूरक असलेल्या गोष्टी वापरून गुढी उभारून त्याची पुजा केली  जाते.  बत्ताशाचा प्रसाद वाटला जातो आणि कडुनिंबाची चटणी खाल्ली जाते... असे म्हटले जाते की जी गोष्ट पूर्ण वर्षभर करायची असेल, ती वर्षाच्या पहिल्या दिवशी नक्कीच करावी..  म्हणूनच काय ते गुढीपाडव्याच्या दिवशी आहारात आपण गोडा पासून ते कडू पर्यंत सर्व चवीचा समावेश केलेला असतो...


या दिवशी गुढीला श्रीखंड पुरी चा  नेवेद्य आवर्जून दाखवला जातो.. आज आपण या श्रीखंड बद्दल थोडंसं जाणून घेऊया. आयुर्वेदात श्रीखंडला "रसाला" किंवा "शिखरिणी" म्हणतात. श्रीखंड या पदार्थाला पौराणिक संबंध सुद्धा आहे. महाभारतामधील भीम जेव्हा बल्लव, या नावाने स्वयंपाक करीत होता. तेव्हा हा खाद्यपदार्थ सर्वप्रथम तयार केला. या पदार्थांच्या सेवनामुळे श्रीकृष्णाला झोप आली. श्रीच्या दैनंदिन व्यवहारात यामुळे खंड पडला, म्हणूनच हा पदार्थ श्रीखंड म्हणून ओळखला जातो.


"आता गुढी पाडव्याला श्रीखंडच का खायचे?"

उन्हाळ्यातील उष्णतेचा सामना करताना थकवा येऊ नये, शरीरशक्‍ती टिकून राहावी यासाठी श्रीखंड हे रसायना प्रमाणे काम करते. म्हणजेच काय तर उन्हाळ्यात कडक उन्हामुळे ज्याचे शरीर अगदी शुष्क बनले आहे, ज्यांना उत्साह नाही,ज्यांना शरीराची पुष्टी हवी असेल त्यांना श्रीखंड हे अगदी उत्तम होय.  श्रीखंड हे पचायला थोडे जड असते, शिवाय हा थोडा आंबवलेला पदार्थ आहे, या दृष्टीने आयुर्वेदाने श्रीखंडाला लागणारे घटक व ते बनविण्याची कृती व्यवस्थित सांगून ठेवली आहे. पण आजकाल बरेच जण आयुर्वेदिक विधी न वापरता श्रीखंड बनवतात   यामुळे श्रीखंड बाधते..


"आता आयुर्वेदानुसार श्रीखंड कसे बनवावे हे आपण पाहू या"


प्रथम छान दही लावावे ते कधीही आंबट असू नये. चांगले दही लागल्यानंतर सूती अथवा तलम वस्त्रात बांधून पुरचुंडी तयार करून ते 7-8 तासा साठी टांगून ठेवावे. जे काही जल रहीत दही तयार झाले आहे त्याला आपण चक्का म्हणतो. 

 

आयुर्वेदिक श्रीखंड मध्ये चक्का हा खडीसाखर (मिक्सर ला बारीक करून घेणे)बरोबर फेटायचा आणि फेटायच्या भांड्याला कापराने धुपवलेले जाते आणि श्रीखंड पचविण्यासाठी लागणारा अग्नी मधरूपाने समाविष्ट असतो, श्रीखंडाच्या अन्नशुद्धीसाठी त्यात तूप हि टाकलेले असते. नंतर त्यात दालचिनी, नागकेशर, वेलची, मिरीपावडर, तमालपत्र, सुंठ याची पावडर करून मिसळले जाते. वरून थोडं केसर दूध घाला म्हणजे तुमचे आयुर्वेदिक श्रीखंड तयार होते. वरील विधी वरून हे लक्षात येते कि श्रीखंड जरी कफ वाढविणारे असले तरी त्याबरोबरीने अशा पदार्थांची योजना केलेली आहे त्यामुळे श्रीखंड कफवर्धक ठरत नाही.

 

थोडक्यात काय तर गुढीपाडव्याच्या परंपरेचा आरोग्य अर्थ जाणून घेवून हा सण साजरा केला पाहिजे म्हणजे येणारे नवीन वर्ष सुख,समृद्धीने युक्त आणि आरोग्याने परिपूर्ण नक्कीच होईल.


 !!अवधूत चिंतन  श्रीगुरुदेव दत्त  !!

Saturday, 29 March 2025

*🟥आजारी पडण्यापुर्वी पुढील गोष्टी फक्त आयुर्वेदच करु शकतो.*

 *🟥आजारी पडण्यापुर्वी पुढील गोष्टी फक्त आयुर्वेदच करु शकतो.*

(खाली अनेक उपाय दररोज करा म्हणून नमुद केलेले आहे परंतु ते आपण जसे जमेल तसे, परंतु वर्षभरात किमान 4 ते 6 वेळा व प्रत्येक वेळेस किमान 21 दिवस सलग केल्यास तुम्हास डाॅक्टर कडे जाण्याची गरजच पडणार नाही)


*◾कॅन्सर होण्याची भीती वाटते*-नियमित कडीपत्त्याचा रस प्या.


*◾हार्ट अँटॅकची भीती वाटते* - नियमित अर्जुनासव किँवा अर्जुनारिष्ट प्या.


*◾मुळव्याध होण्याची भीती वाटतेय* - दररोज सकाळी हिरव्या पानफुटीची पाने खा.


*◾किडनी फेल होण्याची भीती वाटतेय*- दररोज सकाळी कोथिंबीरीचा रस अनुषापोटी प्या.


*◾पित्त होण्याची भीती वाटतेय* -नियमित आवळा रस प्या.


*◾सर्दी होण्याची भीती वाटतेय* - नियमित कोमट पाण्यात हळद टाकुन प्या.


*◾टक्कल पडण्याची भीती वाटतेय*- वडाच्या पारंब्या खोबरेल तेलात उकळुन गाळुन आँघोळीपुर्वी डोक्याला मालिश करा.


*◾दात लवकर पडण्याची भीती वाटतेय* - फ्रिज/कुलरमधील पाणी कधीच पिऊ नका.


*◾डायबेटीस होण्याची भीती वाटते-* तणावमुक्त जीवन जगा, व्यायाम करा. जागरण टाळा. साखर खाणे बंद करा. गुळ खा.


*◾भीतीमुळे झोप येत नाही*-रात्रि जेवणापुर्वी 2 तास आधी अश्वगंधारिष्ट ग्लासभर पाण्यात प्या.


*◾काही आजार नसला तरी, अनुलोमीलम 15 मी कपालभाती 15 मी सुर्यनमस्कार 12 आर्वतन रोज करा.*


*🟩आरोग्य संवाद स्वतःसाठी एवढं तरी करा.*


◾रिकाम्या पोटी हातपाय प्रेस करा, गरम करा.


◾भरपूर टाळ्या वाजवा.


◾हातापायाचे तळवे जेथे दुखत असतील तेथे पंपिंग करून दाब द्या.


◾पायाखाली लाटणे घेऊन त्यावर तळवे फिरवा. (अँक्युप्रेशर करा)


◾आठवड्यातून एकदा तरी तेलाने सर्व शरीराला माँलिश करा.


◾नियमित प्राणायाम करा. (भस्त्रिका, कपालभाती व अनुलोम विलोम)


◾सकाळी एक / दोन ग्लास कोमट पाणी प्या.


◾सकाळी जास्तच नाष्टा करा. ८ ते ९ या वेळेत.


◾दुपारी मध्यम आहार घ्या. १ ते २ या वेळेत.


◾संध्याकाळी गरज असेल तरच जेवा. किंवा हलका आहार घ्या. ७ ते ८ या वेळेत.


◾नाभिचक्र मूळ जागी ठेवा.


◾पाय गरम, पोट नरम, डोके शांत ठेवा.


◾एकाचवेळी भरपेट खाऊ नका.


◾चौरस आहार घ्या.


◾जास्तीत जास्त शाकाहारी रहा.


◾Black Tea च प्या.


◾जेवणात कोशिंबीर (कच्चे) खा.


◾ध्यानधारणा करा.


◾सकारात्मक वर्तन / विचार ठेवा.


◾सत्य बोला. समाजसेवा करा.


◾भरपूर ऐका मात्र कमी बोला.

◾नैसर्गिक जीवन जगा.


◾गरज असेल तर घरगुती औषधे (आजीबाईचा बटवा) घेणे.


◾पोट साफ ठेवणे.


◾वात, पित्त व कफ प्रवृत्ती ओळखून उपचार करा.


साभार : @ravindra2962

फळे खाण्याचे फायदे*

 🍉🍉🍉🍉🍇🍇🍇🍇

*फळे खाण्याचे फायदे*


स्ट्रॉबेरी :


वयस्कर दिसण्यापासून संरक्षण देते


चेरी :


नसांचे कार्य सुरळीत करते


द्राक्ष :


रक्ताभिसरणाचे कार्य चांगले होते


अननस : सांधेदुखीपासून आराम देतो


ब्लूबेरी :


हृदयरोगांपासून बचाव करते


कलिंगड :


हृदयरोगांपासून बचाव करते


संत्री :


त्वचा आणि दृष्टीसाठी उपयुक्त ठरते


सफरचंद : संसर्गाचा प्रतिकार करण्यास मदत करतं


*कलिंगड खाण्याचे फायदे*


कलिंगड वजन कमी करण्यासाठी सर्वात उत्तम फळ आहे.


कलिंगडात पाणी आणि फायबर भरपूर प्रमाणात असल्यामुळे अपचन आणि गॅसची समस्या दूर होते.


कलिंगडात पोटॅशियम आणि मॅग्नेशिअम असल्याने रक्तदाब वाढत नाही.


कलिंगडामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहते. त्यामुळे हृदयरोग होण्याचा धोका कमी होतो.


कलिंगडात लोयकोपिन अधिक प्रमाणात असते, त्यामुळे त्वचा चमकदार होण्यास मदत होते.


कलिंगड सगळ्या प्रकारच्या आम्लदोषांवर उपयोगी आहे.


कलिंगडाचे नियमित सेवन डोळ्यांसाठी फायदेशीर ठरते.


*कॉपी पेस्ट*


*   9970329295 ह्या नंबर वर 



Sunday, 23 March 2025

उन्हाळ्यात रक्तदात्यांनी रक्तदानाच्या सर्वश्रेष्ठ कार्यात सहभागी व्हावे

 उन्हाळ्यात रक्तदात्यांनी रक्तदानाच्या सर्वश्रेष्ठ कार्यात सहभागी व्हावे

 सार्वजनिक आरोग्यमंत्री मंत्री प्रकाश आबिटकर

 मुंबईदि. 20 : रक्तदानाच्या चळवळीत महाराष्ट्र अग्रेसर आहे. उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये रक्तपेढीमध्ये रक्ताचा साठा कमी प्रमाणात असतो.त्यामुळे गरजू रुग्णांना उन्हाळ्याच्या कालावधीत देखील रक्त पुरवठा सुरळीतपणे उपलब्ध होण्यासाठी रक्तदात्यांनी उन्हाळ्यात देखील रक्तदानाच्या सर्वश्रेष्ठ कार्यात सहभागी व्हावेअसे आवाहन सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले आहे.

             मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात राज्य रक्त संक्रमण परिषद संचलित जे. जे. महानगर रक्तकेंद्र यांच्यावतीने स्वैच्छिक रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिराला दिलेल्या भेटी दरम्यान सार्वजनिक आरोग्य मंत्री श्री.आबिटकर यांनी आवाहन केले. यावेळी आरोग्य सेवा संचालनालयाचे संचालक डॉ. नितीन अंबाडेकरराज्य रक्त संक्रमण परिषदेचे सहायक संचालक महेंद्र केंद्रेभायखळासर जे.जे. महानगर रक्तकेंद्राचे वैद्यकीय संचालक डॉ. हितेश पगारे यांच्यासह संबंधित डॉक्टर्स व रक्तदाते उपस्थित होते.

            आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर म्हणालेउन्हाळ्याच्या दिवसांमध्ये महाविद्यालयांना सुट्ट्या असतात. त्यामुळे स्वैच्छिक रक्तदान शिबिरांचे प्रमाण काहीसे कमी असल्याने रक्त संकलन कमी होतेपरंतु उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कॅन्सर पेशंटहिमोफिलियाथॅलेसेमियासिकलसेल तसेच गर्भवती महिला या सगळ्यांना रक्ताची अत्यंत आवश्यकता असते. उन्हाळ्याच्या कालावधीत गरजू रुग्णांची रक्ताची निकड लक्षात घेताजास्तीत जास्त रक्तदात्यांनी उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये रक्तदानासाठी पुढाकार घ्यावाअसे आवाहन मंत्री श्री. आबिटकर यांनी केले.

Wednesday, 19 March 2025

कुष्ठ रुग्णांसाठी कार्यरत स्वयंसेवी संस्थांच्या अनुदानात वाढ करणार

 कुष्ठ रुग्णांसाठी कार्यरत

स्वयंसेवी संस्थांच्या अनुदानात वाढ करणार

- सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर

 

मुंबईदि. १९ : राज्यात कुष्ठ रुग्णांच्या रुग्णालयीन सेवा व पुनर्वसनासाठी स्वयंसेवी संस्था कार्यरत आहे. या स्वयंसेवी संस्थांना शासन प्रति महिना प्रति कुष्ठरुग्ण याप्रमाणे अनुदान देत असते. रुग्णालय तत्वावरील स्वयंसेवी संस्थांना प्रति कुष्ठरुग्ण दरमहा ६ हजार २०० रुपये आणि पुनर्वसन तत्वावरील स्वयंसेवी संस्थांना दरमहा प्रती कुष्ठरुग्ण रुपये ६ हजार इतके अनुदान शासनाकडून वाढविण्यात येणार आहेअशी माहिती सार्वजनिक व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

राज्यात कुष्ठरोग निर्मूलनबाबत सदस्य डॉ नितीन राऊत यांनी प्रश्न उपस्थित केला होता या प्रश्नाच्या चर्चेमध्ये सदस्य मनीषा चौधरीसुलभा खोडके यांनीही सहभाग घेतला.

या प्रश्नाच्या उत्तरात अधिक माहिती देताना आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर म्हणालेसध्या रुग्णालय तत्त्वावरील संस्थांना दरमहा प्रती कुष्ठ रुग्ण रुपये २ हजार २०० रुपये आणि पुनर्वसन तत्त्वावरील स्वयंसेवी संस्थांना दरमहा प्रति कुष्ठरुग्ण रुपये २ हजार इतके अनुदान शासनाकडून देण्यात येते. यामध्ये वाढ करण्यात येत आहे. कुष्ठरोग निर्मूलन मोहीम अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी तसेच कुष्ठ रुग्णांच्या रुग्णसेवेसाठी या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या स्वयंसेवी संस्थांच्या बैठकीचे आयोजनही करण्यात येईल. या बैठकीत संस्थांच्या अडचणीमोहिमेतील उणिवा आणि सूचना जाणून घेण्यात येतील.

राज्यात अती जोखमीच्या लोकसंख्येत कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र अर्थात कुसुम ही मोहीम सन २०२३ पासून दरवर्षी राबविण्यात येत आहे. कुष्ठरोगाविषयी समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियानही राबविण्यात येते. राज्यातील आरोग्य विभागाच्या विविध कल्याणकारी योजनाउपक्रम यांची जनजागृती मोठ्या प्रमाणावर करण्यात येणार आहे. राज्यातील कुष्ठरोगाचे सर्वेक्षण वाढल्यामुळेच रुग्णसंख्या वाढलेली दिसून येत आहे. या सर्व रुग्णांना बहुविध औषधोपचाराखाली आणण्यात आले आहेअसेही सार्वजनिक आरोग्य मंत्री अबिटकर यांनी सांगितले.

*धर्मशास्त्र सांगते, गंध ही केवळ धर्माची नाही तर मनुष्याच्या अस्तित्त्वाची खूण आहे;,pl share

 *अंघोळ झाल्यावर कपाळ मोकळे ठेवू नये आपले पूर्वज सांगत असत, त्याला शास्त्राधार काय होता ते जाणून घेऊया.*


*धर्मशास्त्र सांगते, गंध ही केवळ धर्माची नाही तर मनुष्याच्या अस्तित्त्वाची खूण आहे;*


*वाचा गंध लावण्याचे फायदे!*


अलीकडेच आंतरराष्ट्रीय स्तरावर बुद्धिबळ खेळणाऱ्या आर. प्रज्ञानंधा या भारतीय खेळाडूला परदेशात मुलाखतीच्या दरम्यान विचारण्यात आले, 'तू कपाळावर ही विभूती का लावतोस?'  त्यावर सोळा वर्षीय प्रज्ञानंधा म्हणाला, 'माझी आई मला सांगते म्हणून!'


मित्रांनो, सोळा वर्षीय प्रज्ञानंधाच्या जागी आपण असतो, तर कदाचित आपणही हेच उत्तर दिले असते. कारण बालपणापासून आपल्यावरही हा संस्कार आपल्या आई आजीने घातला आहे.  त्यानुसार आपण कपाळाला गंध लावतोसुद्धा! मात्र ते का लावावे? किंवा ते लावल्याने होणारे फायदे कोणते? की ती केवळ धार्मिक खूण आहे, याबद्दल सविस्तर जाणून घेऊ. 


*'देह देवाचे मंदिर' असे आपण म्हणतो. ज्याप्रमाणे मंदिरात सर्वत्र ईश्वर व्यापून उरलेला असतो, त्याप्रमाणे देहातील रोमारोमात होणारे स्फुरण हे ईश्वरीभावाकडे खेचणारे असते. हृदय, यकृत, मेंदू, मूत्रपिंड ही स्थाने तंदुरुस्त असतील, तरच देह तंदुरुस्त राहतो. हे अवयव म्हणजे देहमंदिराचे स्तंभ आहेत.*


*या देहात भगवंत नित्य वास करतो. या देहस्थित मूर्तीस गंध लावणे, म्हणजे छोटीशी देवपूजाच आहे. ज्या संसारी माणसांना पूजेसाठीदेखील वेळ नसतो, त्यांनी किमान स्नान झाल्यावर कपाळावर गंध लावून अंतरात्म्याची पूजा जरूर करावी.*


*गंध लावण्यामागे रहस्य म्हणजे, गंध लावताना अंगुलीस्पर्श होतो. ही अंगुली मध्यमाच असावी, म्हणजे मधले बोट असावे. त्या बोटाचा थेट हृदयाशी संबंध आहे. अंगुलीतून प्रवाहित होणारी स्पंदने थेट हृदयाला जाऊन भिडतात.*


गंध लावण्याचे व्यावहारिक कारण म्हणजे, गंध लावणारा मनुष्य सहसा पापकर्मास प्रवृत्त होत नाही. कारण तो देवाचे अस्तित्व मानणाऱ्यांपैकी एक असतो. सकाळी कपाळावर गंध लावून केलेली मानसपूजा दिवसभर, आपण देवाच्या साक्षीने काम करत आहोत याची जाणीव देत राहते. जणू काही, आपल्या प्रत्येक घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवणारा तो सीसीटीव्ही कॅमेरा असतो आणि त्याचा ऑपरेटर हृदयसिंहासनावर विराजमान झालेला असतो. आपण कोणाच्या निगराणीत आहोत, हे कळल्यावर जसे वाईट कृत्य करण्यास धजावत नाही, त्याप्रमाणे `माझ्याकडे देव माझा पाहतो आहे' ही जाणीव गंधाद्वारे सातत्याने होत राहते. 


गंध लावणाऱ्या व्यक्तीकडे समाजदेखील संस्कृतीरक्षक या भूमिकेतून पाहतो. ही केवळ धार्मिक खूण नाही, तर स्वत:च्या अस्तित्वाची स्वत:ला करून दिलेली जाणीव असते. म्हणून हिंदूधर्माने आणि आर्यसंस्कृतीने तिलकविधीला धर्मात स्थान दिले आहे.


पूर्वीपासून स्त्री-पुरुष कपाळावर गंध लावीत असत़ त्याची जागा आता टिकल्यांनी घेतली. परंतु, गंध लावण्यामागे शास्त्रीय कारणेदेखील आहेत. गंध केवळ सुगंधी म्हणून नाही, तर अनेक औषधी गुणांनी परिपूर्ण असे चंदन, हळद, अष्टगंध, गुलाल, कृष्णचंदन इ. विविध पदार्थांनी युक्त असते. आपले मस्तक शांत राहावे, गंध दरवळत राहावा आणि कपाळावरील दोन भुवयांच्या मध्ये स्थित असलेले चक्र कार्यरत व्हावे, यासाठीदेखील गंध लावले जाते. 


तिलकधारी व्यक्तीचा भक्तिभाव, मनाची निर्मळता, सात्विकता, सोज्वळता इ. सद्गुणांचे दर्शन गंधातून घडते. कोणाही सुवासिनीने हळद-कुंकाची लावलेली दोन बोटं तिच्या चेहऱ्यावरचे तेज वाढवतात. कीर्तनकार, प्रवचनकार, व्याख्याते, गुरुजी, पुरोहित मंडळी अबीर, चंदन किंवा अष्टगंधाचा टिळा लावतात. तो पाहता त्यांच्याही चेहऱ्यावरचे सात्विक भाव उठून दिसतात. पूर्वीदेखील लढाईला जाण्यापूर्वी आणि विजयश्री मिळवून परत आल्यावर मधल्या करांगुलीने कपाळावर खालून वरच्या दिशेने गंधाचे बोट उमटवले जाई. त्याला विजयतिलक म्हटले जात असे. त्यालादेखील बहुमान होता. बहीण भावाला, पत्नी पतीला, आई मुलांना गंध लावून त्यांच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करते. यशस्वी व्यक्तीचेही औक्षण करून त्याला उत्तरोत्तर यश मिळत राहावे म्हणून गंध लावले जाते. एवढेच काय, तर नवीन वस्तू आणि नवीन वास्तू यांनादेखील गंध लावून पूजन केले जाते. 


*अशा रितीने गंध लावून आपण आपल्या अस्तित्वाची ओळख ठेवावी आणि अंत:पुरातील देवाची पूजा करून त्याच्या साक्षीने सत्कार्य करीत राहावे*


*विशेष सुचना :- हा मेसेज वेळात वेळ काढून ईतरांच्या माहीतीत भर पडावी म्हणून पुढे शेअर करावा*



Monday, 10 March 2025

पुणे शहरात कर्करोग रुग्णालय उभारण्याचे शासनाच्या विचाराधीन

 पुणे शहरात कर्करोग रुग्णालय उभारण्याचे शासनाच्या विचाराधीन

- वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ

 

मुंबईदि. 6 : पुणे शहरजिल्हाच नव्हेतर राज्यात कर्क रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. कर्करोगाला नियंत्रित करण्यासाठी शासन विविध पातळ्यांवर प्रयत्न करीत आहे. कर्क रुग्णास कमी खर्चात उपचार मिळण्यासाठी शासनाच्यावतीने पुणे शहरात कर्करोग रुग्णालय उभारण्याचे शासनाच्या विचाराधीन आहेअशी माहिती वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली.

पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे शहरातील ससून रुग्णालय गोरगरिबांचे मोठे अशास्थान आहे. या ठिकाणी दरवर्षी 5.50 लाख इतके रुग्ण बाह्य रुग्ण म्हणून येताततर आंतर रुग्ण 60 हजारपेक्षा जास्त दाखल होतात. या रुग्णालयात दाखल होणारी रुग्ण संख्या लक्षात घेता येथे रुग्ण नोंदणी ऑनलाइन पद्धतीने करण्याचा शासनाचा विचार असल्याचेही वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले.

ससून रुग्णालयाबाबत सदस्य सुनील कांबळे यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. या सूचनेच्या चर्चेमध्ये सदस्य सिद्धार्थ शिरोळेभीमराव तापकीरनाना पटोले यांनी सहभाग घेतला.

राज्यमंत्री श्रीमती मिसाळ म्हणाल्याससून रुग्णालयात औषधांची कमतरता नसून 12 कोटी 84 लाख रुपयांची औषधी खरेदी करण्यात आली आहे. तसेच जिल्हा नियोजन समितीकडे अधिकची औषध खरेदीसाठी पैशांची मागणी करण्यात आली आहे. या रुग्णालयात उपकरणांचा पुरवठा करण्यात आलेला आहे. रुग्णालयात 155 अति दक्षता विभागातील खाटा आहेत. बाल रुग्णांसाठी यामधील काही खाटा राखीव ठेवण्यात येत वेगळा कक्ष सुद्धा ससूनमध्ये कार्यान्वित करण्यात आला आहे.

ससून रुग्णालयाच्या विविध प्रश्नांवर अधिवेशन संपल्यानंतर पुणे शहरातील लोकप्रतिनिधींच्या दौऱ्याचे आयोजन करून त्यांच्या समवेत बैठक घेण्यात येईल. ससून रुग्णालयातील वर्ग 4 ची रिक्त पदे भरण्यासाठी जिल्हा निवड समितीकडे मागणी पत्र पाठवून पदभरती बाबत कार्यवाही करण्यात येत आहे. ससूनमध्ये व्हील चेअर उपलब्ध असून उपयोग करण्यासाठी मनुष्यबळची व्यवस्था करण्यात येत आहे. ससूनमध्ये स्वच्छतेची काम होत नसल्यास संबंधित कंत्राटदाराची चौकशी करण्यात येईल. रुग्णासोबत रुग्णालयात येणाऱ्या नातेवाईकांची चांगली व्यवस्था करण्यात येईल. रुग्णालयाच्या माध्यमातून दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यात येईलअसेही राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले.

सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये केमोथेरपीची सुविधा उपलब्ध करणार

 सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये केमोथेरपीची सुविधा उपलब्ध करणार

-         सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर

 

मुंबईदि.६ : राज्यासह देशांमध्ये कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. कर्करुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता चांगल्या प्रकारची उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये कर्करोगावरील केमोथेरपी उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेअसे सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी आज विधानसभेत विभागावरील पुरवणी मागण्यांच्या चर्चेला उत्तर देताना सांगितले.

राज्यमंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्यावर्ग ३ व ४ ची रिक्त पदे ग्रामविकास विभागामार्फत भरण्यात येणार आहेत. त्याचबरोबर कंत्राटी स्वरूपातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे भरण्यासाठी जिल्हा पातळीवर अधिकार देण्यात आले आहेत. राज्यात कर्क रुग्णालयांची मागणी लक्षात घेता याबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल. नुकत्याच जाहीर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात प्रत्येक जिल्ह्यामध्ये कर्क रुग्णालय उभारण्याची तरतूद करण्यात आली आहे. महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत रुग्णालय सूचीबद्ध करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहेत.

 कुपोषणामुळे होणारे बालमृत्यू तसेच माता मृत्यू थांबवण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग, आदिवासी विकास विभाग व महिला आणि बाल विकास विभाग समन्वयाने काम करेल. राज्यातील आरोग्य व्यवस्था बळकट करून रुग्णांना दर्जेदार सुविधा देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे राज्यमंत्री श्रीमती बोर्डीकर यांनी सांगितले.

000

Tuesday, 4 March 2025

*👉पाणी पिणे वाढवा* पाण्याचे महत्व ----- १) शरीराचा ७०% भाग पाण्याने बनलेला आहे. २) दिवसभरात ३ ते ३.५० लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. ३) कोमट पाणी पिणे फायद्याचे आहे. ४) सकाळी अनोशापोटी एक ते दोन ग्लास कोमट पाणी पिणे अमृता समान आहे. ५) रक्ताभिसरण व्यवस्थित होते. ६) B. P. संतुलित राहतो. ७) बद्धकोष्ठता नष्ट होते. ८) आळसपणा कमी होतो. ९) डोक्यावरील केस गळत नाहीत. १०) स्किनचे प्राँब्लेम्स होत नाहीत. ११) तारूण्य टिकून राहते. १२) शरीर आतून स्वच्छ होते. १३) किडनी स्टोन होत नाहीत. १४) अन्नपचन चांगले होते. १५) मेंदूला योग्य प्रकारे रक्त पूरवठा होतो. १६) जेवणापूर्वी पाणी प्यायल्यास शरीर बारीक होते. १७) जेवणानंतर लगेच पाणी जास्त प्यायल्यास शरीर जाड होते. पोट सुद्धा वाढते. १८) जेवणामध्ये एक ते दोन घोट पाणी प्यायल्यास शरीर मध्यम राहते. १९) जेवणानंतर ३० ते ४५ मिनिटांनी आवश्य तेवढे पाणी प्यावे. २०) आपण गरम / मध्यम गरम जेवण घेतो. म्हणून जेवतेवेळी कोमटच पाणी पिणे आवश्यक आहे. अन्यथा पचनशक्ती कमजोर होईल. फ्रिजचे पाणी / बर्फाचे थंड पाणी केव्हाच पिऊ नका. तर माठातील प्या. २१) तहान लागली की पाणी प्यावेच. २२) जास्तच तहान लागली की मात्र गुळ पाणी प्यावे. २३) क्षारयुक्त पाणी शरीराला घातक आहे. ते चेक करून घ्या. अन्यथा आजार होतील. २४) आजारपणात गरम पाणी प्यावे. २५) रात्री जास्त पाणी पिऊ नये. २६) पाणी नेहमी बसूनच प्यावे. अन्यथा उतार वयात गुढघे दुखीचा त्रास नक्कीच होईल. २७) पाणी चवीचवीने म्हणजेच तोंडात जास्तवेळ फिरवून पिणे. त्यामुळे पाण्यात लाळ मिसळून ती पोटात जाते आणि रोगप्रतिकारकशक्ती वाढते. २८) जेव्हढी तहान तेव्हढेच पाणी प्यावे. जास्त प्रमाणात पाणी प्यायल्यास पचनशक्ती कमजोर होते. अधिक ऊर्जा खर्च होते. तसेच किडनीलासुद्धा त्रास होऊ शकतो. # *आरोग्य संदेश* # पाणी म्हणजेच आपले जीवन. करा आरोग्यासाठी भरपूर सेवन. *वरील माहिती आपण पूर्ण वाचल्याबद्दल धन्यवाद.....🙏 ह्या माहितीचा फायदा आपल्याबरोबर इतरांनाही होणं गरजेचे आहे त्यासाठी आपल्या मोबाईल मध्ये असणाऱ्या सर्व ग्रुप वर हि माहिती पाठवा.* *ह्या व अशा निशुल्क माहीती साठी आरोग्य मधुमेह मुक्ती हा ग्रुप जॉईन करा* ================= *------------------------------* *दवा ना खाना* *सही समय पर सही खाना, खाना.....* *🌺🌺🌺🌺🌺 *(कॉपी पेस्ट)* *आरोग्य आणि समर्थ social foundation च्या मधुमेह मुक्ति व व्यसनमुक्ती कार्याची नवीन अपडेट्स मिळविण्यासाठी आजच जॉईन व्हा आम्हाला🙂* *join होण्यासाठी 9130328672 ह्या नंबर वर Join Me असा what's up मेसेज करा* *किंवा लिंकला टच करा व join व्हा* *-------------------------* https://chat.whatsapp.com/J1wjhGKNuZt39QeDrLk6bv *------------------------* *आरोग्य दृष्ट्या कोणीही हा मेसेज शेअर करू शकता*

 *👉*👉पाणी पिणे वाढवा* 


पाण्याचे महत्व -----

१) शरीराचा ७०% भाग पाण्याने बनलेला आहे.

२) दिवसभरात ३ ते ३.५० लिटर पाणी पिणे आवश्यक आहे.

३) कोमट पाणी पिणे फायद्याचे आहे.

४) सकाळी अनोशापोटी एक ते दोन ग्लास कोमट पाणी पिणे अमृता समान आहे.  

५) रक्ताभिसरण व्यवस्थित होते.     

६) B. P. संतुलित राहतो.

७) बद्धकोष्ठता नष्ट होते.

८) आळसपणा कमी होतो.

९) डोक्यावरील केस गळत नाहीत.

१०) स्किनचे प्राँब्लेम्स होत नाहीत.

११) तारूण्य टिकून राहते.

१२) शरीर आतून स्वच्छ होते.

१३) किडनी स्टोन होत नाहीत.

१४) अन्नपचन चांगले होते.

१५) मेंदूला योग्य प्रकारे रक्त पूरवठा होतो.

१६) जेवणापूर्वी पाणी प्यायल्यास शरीर बारीक होते.

१७) जेवणानंतर लगेच पाणी जास्त प्यायल्यास शरीर जाड होते. पोट सुद्धा वाढते.

१८) जेवणामध्ये एक ते दोन घोट पाणी प्यायल्यास शरीर मध्यम राहते.

१९) जेवणानंतर ३० ते ४५ मिनिटांनी आवश्य तेवढे पाणी प्यावे.

२०) आपण गरम / मध्यम गरम जेवण घेतो. म्हणून जेवतेवेळी कोमटच पाणी पिणे आवश्यक आहे. अन्यथा पचनशक्ती कमजोर होईल. फ्रिजचे पाणी / बर्फाचे थंड पाणी केव्हाच पिऊ नका. तर माठातील प्या.

२१) तहान लागली की पाणी प्यावेच.  

२२) जास्तच तहान लागली की मात्र गुळ पाणी प्यावे.

२३) क्षारयुक्त पाणी शरीराला घातक आहे. ते चेक करून घ्या. अन्यथा आजार होतील.

२४) आजारपणात गरम पाणी प्यावे.  

२५) रात्री जास्त पाणी पिऊ नये.

२६) पाणी नेहमी बसूनच प्यावे. अन्यथा उतार वयात गुढघे दुखीचा त्रास नक्कीच होईल.

२७) पाणी चवीचवीने म्हणजेच तोंडात जास्तवेळ फिरवून पिणे. त्यामुळे पाण्यात लाळ मिसळून ती पोटात जाते आणि रोगप्रतिकारकशक्ती वाढते.

२८) जेव्हढी तहान तेव्हढेच पाणी प्यावे. जास्त प्रमाणात पाणी प्यायल्यास पचनशक्ती कमजोर होते. अधिक ऊर्जा खर्च होते. तसेच किडनीलासुद्धा त्रास होऊ शकतो.

      # *आरोग्य संदेश* #

पाणी म्हणजेच आपले जीवन.

करा आरोग्यासाठी भरपूर सेवन.

*वरील माहिती आपण पूर्ण वाचल्याबद्दल धन्यवाद.....🙏 ह्या माहितीचा फायदा आपल्याबरोबर इतरांनाही होणं गरजेचे आहे त्यासाठी आपल्या मोबाईल मध्ये असणाऱ्या सर्व ग्रुप वर हि माहिती पाठवा.*


*ह्या व अशा निशुल्क माहीती साठी आरोग्य मधुमेह मुक्ती हा ग्रुप जॉईन करा*

=================

*------------------------------*

         *दवा ना खाना*

*सही समय पर सही खाना, खाना.....*

*🌺🌺🌺🌺🌺


*(कॉपी पेस्ट)*

*आरोग्य आणि समर्थ social foundation च्या मधुमेह मुक्ति व व्यसनमुक्ती कार्याची नवीन अपडेट्स मिळविण्यासाठी आजच जॉईन व्हा आम्हाला🙂*

*join होण्यासाठी 9130328672 ह्या नंबर वर Join Me असा what's up मेसेज करा* 

*किंवा लिंकला टच करा व join व्हा*

*-------------------------* 


https://chat.whatsapp.com/J1wjhGKNuZt39QeDrLk6bv

*------------------------*

*आरोग्य दृष्ट्या कोणीही हा मेसेज शेअर करू शकता*


पाण्याचे  महत्व  -----

१) शरीराचा ७०% भाग पाण्याने बनलेला आहे.

२)  दिवसभरात ३ ते ३.५० लिटर पाणी पिणे  आवश्यक आहे.

३)  कोमट पाणी पिणे फायद्याचे आहे.

४)  सकाळी अनोशापोटी एक ते दोन ग्लास  कोमट पाणी पिणे अमृता समान आहे.  

५)  रक्ताभिसरण व्यवस्थित होते.     

६)  B. P.  संतुलित राहतो.

७)  बद्धकोष्ठता नष्ट होते.

८)  आळसपणा कमी होतो.

९)  डोक्यावरील केस गळत नाहीत.

१०)  स्किनचे प्राँब्लेम्स होत नाहीत.

११)  तारूण्य टिकून राहते.

१२)  शरीर आतून स्वच्छ होते.

१३)  किडनी स्टोन होत नाहीत.

१४)  अन्नपचन चांगले होते.

१५)  मेंदूला योग्य प्रकारे रक्त पूरवठा होतो.

१६)  जेवणापूर्वी पाणी प्यायल्यास शरीर  बारीक होते.

१७)  जेवणानंतर लगेच पाणी जास्त प्यायल्यास शरीर जाड होते. पोट सुद्धा वाढते.

१८)  जेवणामध्ये एक ते दोन घोट पाणी  प्यायल्यास शरीर मध्यम राहते.

१९)  जेवणानंतर ३० ते ४५ मिनिटांनी आवश्य तेवढे पाणी प्यावे.

२०)  आपण  गरम / मध्यम  गरम  जेवण  घेतो. म्हणून जेवतेवेळी कोमटच पाणी पिणे  आवश्यक आहे. अन्यथा पचनशक्ती कमजोर  होईल. फ्रिजचे पाणी / बर्फाचे थंड पाणी  केव्हाच पिऊ नका. तर माठातील प्या.

२१)  तहान  लागली  की  पाणी  प्यावेच.  

२२)  जास्तच  तहान  लागली  की  मात्र  गुळ  पाणी  प्यावे.

२३)  क्षारयुक्त पाणी शरीराला घातक आहे. ते चेक करून  घ्या. अन्यथा आजार  होतील.

२४)  आजारपणात  गरम  पाणी  प्यावे.  

२५)  रात्री  जास्त  पाणी  पिऊ  नये.

२६)  पाणी नेहमी बसूनच प्यावे. अन्यथा  उतार  वयात गुढघे दुखीचा त्रास नक्कीच होईल.

२७)  पाणी चवीचवीने म्हणजेच तोंडात  जास्तवेळ फिरवून पिणे. त्यामुळे पाण्यात  लाळ मिसळून ती पोटात जाते आणि  रोगप्रतिकारकशक्ती वाढते.

२८) जेव्हढी तहान तेव्हढेच पाणी प्यावे. जास्त प्रमाणात पाणी प्यायल्यास पचनशक्ती कमजोर होते. अधिक ऊर्जा खर्च होते. तसेच किडनीलासुद्धा त्रास होऊ शकतो.

      #  *आरोग्य  संदेश*  #

पाणी  म्हणजेच  आपले  जीवन.

करा आरोग्यासाठी भरपूर  सेवन.

*वरील माहिती आपण पूर्ण वाचल्याबद्दल धन्यवाद.....🙏 ह्या माहितीचा फायदा आपल्याबरोबर इतरांनाही होणं गरजेचे आहे त्यासाठी आपल्या मोबाईल मध्ये असणाऱ्या सर्व ग्रुप वर हि माहिती पाठवा.*


*ह्या व अशा निशुल्क माहीती साठी आरोग्य मधुमेह मुक्ती हा ग्रुप जॉईन करा*

=================

*------------------------------*

         *दवा ना खाना*

*सही समय पर सही खाना, खाना.....*

*🌺🌺🌺🌺🌺


*(कॉपी पेस्ट)*

*आरोग्य आणि समर्थ social foundation च्या मधुमेह मुक्ति व व्यसनमुक्ती कार्याची नवीन अपडेट्स मिळविण्यासाठी आजच जॉईन व्हा आम्हाला🙂*

*join होण्यासाठी 9130328672 ह्या नंबर वर  Join Me असा what's up मेसेज करा* 

*किंवा लिंकला टच करा व join व्हा*

*-------------------------* 


https://chat.whatsapp.com/J1wjhGKNuZt39QeDrLk6bv

*------------------------*

*आरोग्य दृष्ट्या कोणीही हा मेसेज शेअर करू शकता*

Featured post

Lakshvedhi