Showing posts with label कला-क्रीडा. Show all posts
Showing posts with label कला-क्रीडा. Show all posts

Saturday, 29 June 2024

कोणताही खेळाडू शासकीय सेवेच्या लाभापासून वंचित राहणार नाही याची काळजी घेणार

 कोणताही खेळाडू शासकीय सेवेच्या लाभापासून

वंचित राहणार नाही याची काळजी घेणार

-उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

 

            मुंबईदि. 29 : राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धांमध्ये महाराष्ट्राचे अनेक खेळाडू उत्तम कामगिरी करीत आहे. महाराष्ट्राचा नावलौकिक वाढविण्याऱ्या या खेळाडूंना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार शासकीय नोकरी देण्यासाठीचे निकष निश्चित करण्याबाबतचा निर्णय नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. महाराष्ट्राचे नाव राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचाविणारा कोणताही खेळाडू या निर्णयाच्या लाभापासून वंचित राहू नये यासाठी आवश्यकता असल्यास निकषांमध्ये आणखी मुद्दे समाविष्ट करण्यात येतीलअसे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिले.

            उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी पॉईंट ऑफ इन्फर्मेशनच्या माध्यमातून सदस्य हिरामण खोसकर यांच्याकडून खेळाडू कविता राऊत हिला उपजिल्हाधिकारी किंवा जिल्हा उपअधीक्षक पदावर नोकरी देण्याबाबत उपस्थित करण्यात आलेल्या मुद्द्यासंदर्भात माहिती दिली. उपमुख्यमंत्री श्री. पवार पुढे म्हणाले कीराज्यातील विविध खेळांनाखेळाडूंना शासनाकडून नेहमीच प्रोत्साहन देण्यात येत आहे. ज्या खेळाडूंनी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयस्तरावर उत्तम कामगिरी करूनपदक प्राप्त करून राज्याचा लौकिक वाढविला आहेत्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे. त्याचे निकषही निश्चित करण्यात आले आहेत. सभागृहातील सदस्यांच्या भावना लक्षात घेऊन या निकषांमध्ये आणखी काही मुद्दे समाविष्ट करण्याबाबत निश्चित विचार करण्यात येईलअशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

Sunday, 26 May 2024

*असं एका पायावर उभं राहता येत का तो बघण्याचा प्रयत्न 60 वर्ष वयावरील प्रत्येक व्यक्तीने करायला हवा म्हणजे आपण फिट आहोत की नाही हे कळेल - ऋतुजा दिवेकर.* 😍 *All senior citizens must watch this health related video +very.*


 *असं एका पायावर उभं राहता येत का तो बघण्याचा प्रयत्न 60 वर्ष वयावरील प्रत्येक व्यक्तीने करायला हवा म्हणजे आपण फिट आहोत की नाही हे कळेल - ऋतुजा दिवेकर.* 😍 *All senior citizens must watch this health related video +very.*

Friday, 5 April 2024

कंठी स्वरेश होता, शब्दी सुरेश होता उलटवून हरती बाजी, तो जगला नरेश होता गाजलेल्या मराठी गझल ♻

 अमरावतीतील कर्‍हाडे ब्राह्मणांचं एक सुखवस्तू घराणं. त्यातील रंगनाथचा एक मुलगा श्रीधर डॉक्टर झाला. पण तो बहिरा होता आणि दुसरा मुलगा वेडा होता. श्रीधरचं लग्न झालं. बायको शांता ही अतिशय मनमिळाऊ होती. तिला कवितांची खूप आवड. श्रीधर-शांताला लग्नानंतर १५ एप्रिल १९३२ रोजी मुलगा झाला. उभयंतांनी मुलानं सूर्यासारखं चमकावं म्हणून हौशीनं नाव ठेवलं सुरेश! हळूहळू सुरेश मोठा होत होता. पण तो अडीज वर्षांचा झाल्यावर त्याला पोलिओची बाधा झाली व त्यात त्याचा उजवा पाय अधू झाला. श्रीधर स्वत: डॉक्टर असूनही काहीही करू शकले नाहीत कारण त्याकाळी पोलिओवर रामबाण उपायाची लस वा औषधच उपलब्ध नव्हती.

अधू पायामुळे सुरेश शालेय जीवनात कुठलेही मैदानी खेळ खेळू शकला नाही. शालेय शिक्षण संपता संपता मॅट्रिकला पण नापास झाला. डॉ. श्रीधर हताश झाले व नकळत सुरेशला घरात दुय्यम दर्जाची वागणूक सुरू झाली. मग दुसर्‍यांदा मॅट्रिकला बसून पास झाला, तर पुढे इंटरमिजिएटला पण नापास झाला. तिथेही परत परीक्षेला बसून पास झाला तर बी.ए. ला चक्क दोनदा नापास झाला. तिसर्‍यांदा परीक्षेला बसून तिसर्‍या श्रेणीत पास झाला व मग पोटासाठी खेड्यापाड्यातील शिक्षकाची नोकरी धरली. पण तीही एकामागून एक सुटतच होती. पण एक गोष्ट मात्र सुरेशकडे कायम टिकून होती ती म्हणजे जिद्द आणि आईकडून आलेली कवितांची आवड. कुठेतरी आत कविता रुजली व फुलत होती. समकालीन मित्रांचे सुखेनैव संसार फुलत असताना लोखंडी पेटीवर वही ठेऊन कंदीलाच्या पिवळ्या प्रकाशात सुरेश तळपत होता. असेच एकदा अमरावतीला सुरेश गेला असताना प्रा. मधुकर केचे त्याला स्टेशनवर भेटले व स्वत: यशस्वी वाटेवर आरूढ असल्याने उपहासाने सुरेशला म्हणाले, कवी म्हणून तू संपलास. आता फक्त मास्तरकीच कर. पण सुरेश मोठ्या आत्मविश्वासाने म्हणाला, ते अजून ठरायचंय!


१९६१ साली सुरेश २९ वर्षांचा असताना नागपूरच्या नागविदर्भ प्रकाशनाकडून त्याचा पहिला काव्यसंग्रह प्रकाशित झाला. रूपगंधा व त्याला दिलीप चित्रे यांच्यासोबत विभागून राज्यशासनाचे दुसरे पारितोषिक मिळाले आणि पहिलं पारितोषिक कुसुमाग्रजांना. यानंतर मात्र दांभिक नातेवाईक, हिणवणारे समकालीन सुरेशला ओळख देऊ लागले. यानंतर पुढचा काव्यसंग्रह मौज प्रकाशनातर्फे प्रकाशित व्हायला १३ वर्षांचा काळ जावा लागला व त्यातही सुरेशने ‘रंग माझा वेगळा’ हे दाखवून देत केशवसुत पारितोषिक पटकावले. बीएला दोनदा नापास झालेल्या सुरेशचा ‘रंग माझा वेगळा’नंतर ३ विद्यापिठांत एम.ए.साठी अभ्यासक्रमात क्रमिक पुस्तक म्हणून ठेवला गेला. १९८३ साली सुरेशने स्वत:च प्रकाशक व्हायचं ठरवलं व एल्गार हा काव्यसंग्रह प्रसिद्ध केला.


शिक्षणात गती नसलेल्या सुरेशने आईकडून काव्याप्रमाणेच संगीताची आवड पण उचलली होती. मैदानी खेळ पायाच्या अधूपणाने न खेळू शकणार्‍या मुलाला डॉ. श्रीधर यांनी बाजाची पेटी आणून दिली. पुढे त्याची संगीतातील आवड व प्रगती बघून संगीतातील शिक्षणासाठी प्रल्हादपंतांकरवी घरी त्याला संगीत शिकवणी सुरु केली.

पुढे शालेय जीवन संपता संपता पायातील कमजोरीवर मात करण्यासाठी सुरेश जिद्दीने व्यायाम करू लागला.मवेळ बराच लागला पण दंडबैठका—डिप्स यासारख्या व्यायामामुळे तो हाडापेराने मजबूत झाला. नंतर नंतर तर पायात पण चांगलीच शक्ती आल्याने सुरेश सायकल पण चालवू लागला. वडिलांनी मग त्याला रॅले कंपनीची सायकल महाविद्यालयात जाण्यासाठी आणून दिली.


अभ्यासात गती नसलेला सुरेश आकाशदिवा, पतंग, कॅलिडोस्कोप, पेरिस्कोपसारख्या हस्तकलेच्या वस्तू बनवण्यात वाकबगार होता. तसंच तो काचा कुटून पतंगाचा मांजा बनवी. सुरेशला बेचकी छान बनवता येई व त्यातही त्याचा नेम अचूक असे. या व्यायामाचा फायदा पुढे जेव्हा सुरेशने काव्यगायनाच्या मैफिली करायला सुरुवात केली तेव्हा मांडी घालून तासन् तास बसण्यासाठी झाला. सुरेशने केवळ शारीरिकच नव्हे तर शैक्षणिक कमतरतेमुळे त्याला दिल्या गेलेल्या दुय्यम वागणुकीला आपल्या जिद्दीच्या बळावर मात केली आणि तथाकथित साहित्यिकांना व दांभिकांना आपल्या कवितांद्वारे चोख उत्तर दिले.


कधीतरी पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना सुरेशचा काव्यसंग्रह एका खोपटवजा दुकानात सापडला. तो वाचून प्रभावित होऊन त्यांनी सुरेशला शोधून काढलं आणि त्याच्या अनेक गाण्यांना चाली लावून अजरामर केलं. ‘मालवून टाक दीप’ ते पार ‘केंव्हातरी पहाटे’पर्यंत मंडळी अशा या तळपत्या सूर्याचा — सुरेशचा म्हणजेच कवीवर्य सुरेश भट यांचा आज स्मृतिदिन आणि म्हणून हे सगळं आठवण्याचं व सांगण्याचं कारण.


रूपगंधा, रंग माझा वेगळा, एल्गार यानंतर भटसाहेबांनी गझलेची बाराखडी, काफिला, झंझावात, रसवंतीचा मुजरा, सप्तरंग, निवडक सुरेश भट आणि हिंडणारा सूर्य ही पुस्तकं प्रसिद्ध केली. त्यांना मानाचा सप्रेम मुजरा! त्यांच्याबाबत बोलायचं तर ओठी असं येतं :


कंठी स्वरेश होता, शब्दी सुरेश होता

उलटवून हरती बाजी, तो जगला नरेश होता

गाजलेल्या मराठी गझल  ♻

✒ 

तरुण आहे रात्र अजुनी राजसा निजलास का रे ?

एवढ्यातच त्या कुशीवर तू असा वळलास का रे ?

अजुनही विझल्या न गगनी , तारकांच्या दीपमाला

अजुन मी विझले कुठे रे ? हाय ! तू विझलास का रे ?

सांग, ह्या कोजागरीच्या , चांदण्याला काय सांगू ?

उमलते अंगांग माझे.. आणि तू मिटलास का रे ?

बघ तुला पुसतोच आहे , पश्चिमेचा गार वारा

रातराणीच्या फुलांचा , गंध तू लुटलास का रे ?

उसळती हुदयात माझ्या , अमृताच्या धुंद लाटा

तू किनार्‍यासारखा पण , कोरडा उरलास का रे ?

                      (सुरेश भट)

मालवून टाक दीप , चेतवून अंग अंग

राजसा किती दिसात , लाभला निवांत संग

त्या तिथे फुलाफुलात , पेंगते अजून रात

हाय तू करू नकोस , एवढयात स्वप्नभंग

दूर दूर तारकांत , बैसली पहाट न्हात

सावकाश घे टिपून , एक एक रूपरंग

गार गार या हवेत , घेऊनी मला कवेत

मोकळे करुन टाक , एकवार अंतरंग

ते तुला कसे कळेल , कोण एकटे जळेल

सांग का कधी खरेच , एकटा जळे पतंग

काय हा तुझाच श्वास , दरवळे इथे सुवास

बोल रे हळू उठेल , चांदण्यावरी तरंग

                 (सुरेश भट)

आताच अमृताची बरसून रात गेली

आताच अंग माझे विझवून रात गेली

मजलाच, हाय, माझे जपता न भान आले

मजलाच ऐनवेळी उधळून रात गेली

उरले जराजरासे गगनात मंद तारे

हलकेच कूस माझी बदलून रात गेली

अजुनी सुगंध येई दुलईस मोगर्‍याचा..

गजरा कसा फुलांचा विसरून रात गेली ?

                 (सुरेश भट)

सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या , तुझेच मी गीत गात आहे

अजुन ही वाटते मला की , अजुन ही चांद रात आहे

कळे ना मी पाहते कुणाला , कळे ना हा चेहरा कुणाचा

पुन्हा पुन्हा भास होत आहे , तुझे हसू आरशात आहे

सख्या तुला भेटतील माझे , तुझ्या घरी सूर ओळखीचे

उभा तुझ्या अंगणी स्वरांचा , अबोल हा पारिजात आहे

उगीच स्वप्नांत सावल्यांची , कशास केलीस आर्जवे तू

दिलेस का प्रेम तू कुणाला , तुझ्याच जे अंतरात आहे

                           (सुरेश भट)

केव्हातरी पहाटे , उलटून रात गेली

मिटले चुकून डोळे , हरवून रात गेली

कळले मला न केव्हा , सुटली मिठी जराशी

कळले मला न केव्हा , निसटून रात गेली

सांगू तरी कसे मी , वय कोवळे उन्हाचे ?

उसवून श्वास माझा , 

स्मरल्या मला न तेव्हा , माझ्याच गीतपंक्ती

मग ओळ शेवटाची , सुचवून रात गेली !

                  (सुरेश भट)

रंगुनी रंगांत साऱ्या रंग माझा वेगळा!

गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा!

कोण जाणे कोठुनी ह्या सावल्या आल्या पुढे;

मी असा की लागती ह्या सावल्यांच्याही झळा!

राहती माझ्यासवे ही आसवे गीतांपरी;

हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा!

कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो

अन् कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा ?

सांगती 'तात्पर्य' माझे सारख्या खोट्या दिशा :

'चालणार पांगळा अन् पाहणारा आंधळा !'

माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी :

माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा !

                     (सुरेश भट)

मलमली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे

मोकळ्या केसात माझ्या तू जीवाला गुंतवावे

लागुनि थंडी गुलाबी शिरशिरी यावी अशी ही

राजसा माझ्यात तू अन् मी तुझ्यामाजी भिनावे

तापल्या माझ्या तनूची तार झंकारुन जावी

रेशमी संगीत स्पर्शाचे पुन्हा तू पेटवावे

रे तुला बाहूत माझ्या रुपगंधा जाग यावी

मी तुला जागे करावे तू मला बिलगून जावे

                     (सुरेश भट)

भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले !

एवढे मी भोगिले की मज हसावे लागले !

ठेविले आजन्म डोळे आपुले मी कोरडे

पण दुज्यांच्या आसवांनी मज भिजावे लागले !

लोक भेटायास आले काढत्या पायांसवे

अन्‌ अखेरी कुशल माझे मज पुसावे लागले !

गवसला नाहीच मजला चेहरा माझा कधी

मी कशी होते मलाही आठवावे लागले !

एकदा केव्हातरी मी वचन कवितेला दिले;

राखरांगोळीस माझ्या गुणगुणावे लागले !

                   (सुरेश भट)

Wednesday, 29 November 2023

शिल्पी राज के गाने 'मेहरी के सारा सुख चाही' में माही श्रीवास्तव ने उड़ाया गर्दा

 



सर्वेश सिंह, शिल्पी राज के गाने 'मेहरी के सारा सुख चाही' में माही श्रीवास्तव ने उड़ाया गर्दा








भोजपुरी म्यूजिक वर्ल्ड में सिंगर सर्वेश सिंह और शिल्पी राज का जुगलबंदी में एक और नया भोजपुरी सांग 'मेहरी के सारा सुख चाही' आडियंस के बीच आ गया है। इस गाने के वीडियो में पॉपुलर अदाकारा माही श्रीवास्तव ने गजब का ठुमका लगाकर गर्दा उड़ा दिया है। यह मजेदार गाना वर्ल्डवाइड रिकॉर्ड्स भोजपुरी के ऑफिसियल यूट्यूब चैनल पर रिलीज किया गया है। जिसका रिच लेबल पर पिक्चराइजेशन किया गया है। लोकेशन और कॉस्ट्यूम पर भी काफी ध्यान दिया गया है। 

इस गाने के वीडियो में माही श्रीवास्तव की शादी सर्वेश सिंह से तय होती है लेकिन किसी कारणवश शादी टूट जाती है। फिर सर्वेश की शादी कहीं और तय होने लगती है तो माही श्रीवास्तव हीरो पुक मोटर बाईक से पिंक कलर के लहंगा चोली पहने अक्ट्रेक्टिव लुक में एंट्री करती हुई दिख रही हैं, उनके पीछे सहेलियों की फौज भी आ रही है। वह सर्वेश के पास आती है और  कहती है कि 'ठुकरा के देखवनी ना छोड़ा, बनल रिश्ता के जनि अब तोड़ा, कवन कमी बा हमरा में बालम, बिन बतवले मुँहवा ना मोड़ा... चाहत ताड़s खुश रहल जिनगी में दुख चाही... तो सर्वेश सिंह कहते हैं कि 'फर्ज में ना कवनो चूक चाही, मेहरी के सारा सुख चाही...'


इस गाने को अपनी सुरीली आवाज में वायरल सिंगर सर्वेश सिंह और शिल्पी राज ने मधुर आवाज गाया है, जोकि सुनने में बड़ा प्यार लग रहा है। वहीं एक्ट्रेस माही श्रीवास्तव ने गजब का ठुमका लगाया है। यह गाना हर किसी के दिल को छू लेने वाला है।
वर्ल्डवाइड रिकॉर्ड्स प्रस्तुत भोजपुरी सांग 'मेहरी के सारा सुख चाही' के निर्माता रत्नाकर कुमार हैं। सिंगर खुशबू तिवारी केटी ने इस गाने के गीतकार पवन राजा हैं। संगीतकार राज गाजीपुरी हैं। वीडियो निर्देशक विझेल, कोरियोग्राफर गोल्डी जायसवाल, डीओपी राजन वर्मा हैं। इस गाने का आल राइट्स वर्ल्डवाइड रिकॉर्ड्स के पास है।


Mahi Srivastava makes waves in Sarvesh Singh, Shilpi Raj's song 'Mehri Ke Sara Sukh Chahi'


In Bhojpuri music world, another new Bhojpuri song 'Mehri Ke Sara Sukh Chahi' has reached the audience in the jugalbandi of singer Sarvesh Singh and Shilpi Raj. In the video of this song, popular actress Mahi Srivastava has created a stir with her amazing dance. This funny song has been released on the official YouTube channel of Worldwide Records Bhojpuri. Which has been picturized on Rich Label. A lot of attention has also been paid to location and costume.

In the video of this song, Mahi Srivastava's marriage is fixed with Sarvesh Singh but due to some reason the marriage gets broken. Then when Sarvesh's marriage gets fixed somewhere else, Mahi Srivastava is seen entering Hero Puk motor bike in an attractive look wearing a pink colored lehenga choli, an army of friends is also coming behind her. She comes to Sarvesh and says 'Thukra ke dekhwani na chhoda, banal rishta ke jani ab toda, kawan kami ba hamara mein balam, bin batwale muhva na moda... Chahat taad khush rahal zingi mein sadh chahi... So Sarvesh Singh says that 'I did not want any mistake in duty, I wanted all the happiness of marriage...'


This song has been sung melodiously by viral singers Sarvesh Singh and Shilpi Raj in their melodious voices, which sounds very loving. Actress Mahi Srivastava has done an amazing dance. This song is going to touch everyone's heart.
Ratnakar Kumar is the producer of Bhojpuri song 'Mehri Ke Sara Sukh Chahi' presented by Worldwide Records. Singer Khushboo Tiwari KT has written this song and the lyricist is Pawan Raja. The music director is Raj Ghazipuri. Video director is Vijhel, choreographer is Goldie Jaiswal, DOP is Rajan Verma. All rights of this song are with Worldwide Records.

राज्य शासनातर्फे लातूर, बुलढाणा, सांगलीत होणार क्रीडा स्पर्धा

 राज्य शासनातर्फे लातूरबुलढाणासांगलीत होणार क्रीडा स्पर्धा

- क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे

 

            मुंबईदि. २८ : राज्यात शासनातर्फे सन २०२३-२४ या वर्षात होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज करंडक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा लातूर येथेछत्रपती शिवाजी महाराज करंडक व्हॉलिबॉल स्पर्धा बुलढाणा येथेखाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा लातूर येथे आणि भाई नेरुरकर राज्यस्तरीय खो-खो स्पर्धा सांगली येथे होणार आहे. क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी ही माहिती दिली आहे.

            मंत्रालयातील दालनात विविध विषयांवर आज आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी क्रीडा विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल (दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे)आयुक्त सुहास दिवसे यांच्यासह मंत्रालयीन वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

            मंत्री श्री. बनसोडे म्हणाले कीमहाराष्ट्राच्या क्रीडा संस्कृतीची जोपासना व वाढीकरीता राज्यातील प्रतिभावंत खेळाडूंना खेळाकडे आकर्षित करण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. या स्पर्धेतील प्रतिभावंत खेळाडूंना संधी मिळावी म्हणून स्पर्धाच्या आयोजनाकरिता शासनाने प्रति खेळ ७५ लाख रुपये एवढी तरतूद केली आहे. प्रतिखेळ ७५ लाख निधीमधून खेळाडूमार्गदर्शकव्यवस्थापकपंच तथा तांत्रिक पदाधिकारी  यांच्यासह खेळाडूंना रोख रकमेची बक्षिसे देण्यात येणार आहेत.

            स्थानिक आयोजन समितीस या स्पर्धाच्या आयोजनासाठी प्रति खेळ रु.७५.०० लाख उपलब्ध करुन देण्यात येणार असून यशस्वी आयोजनासाठी शासन निधी व्यतिरिक्त अधिक निधीची आवश्यकता भासल्यास आयोजन समितीस  निधी उभारण्यास शासनाने मंजुरी दिली असल्याचे मंत्री श्री. बनसोडे यांनी सांगितले. सर्वसाधारण धोरण ठरविणेसनियंत्रण करणेस्पर्धास्थळ निश्चित करणे तसेच स्पर्धेसाठी आर्थिक तरतूद उपलब्ध करुन देण्यासाठी क्रीडा व युवक कल्याण मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीचे गठन करण्यात आलेले आहे.

            या स्पर्धांच्या यशस्वी आयोजनासाठी संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक आयोजन समिती गठित करण्यात आली असूनसंबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कार्याध्यक्षसंबंधित विभागाचे विभागीय उपसंचालक हे कोशाध्यक्षसंबंधित खेळाच्या राज्य संघटनेचे सचिव हे आयोजन समितीचे सचिव आणि जिल्हा क्रीडा अधिकारी हे संयुक्त सचिव म्हणून काम पाहणार असल्याचे मंत्री श्री. बनसोडे यांनी यावेळी  सांगितले.

Tuesday, 28 November 2023

श्रीबाळकृष्णाचे डोळे मिटून पुन्हा उघडतात.यांच्या या ऊत्कृष्ठ कलेस शतशः

 बडोदा येथील कलाकार श्री.राजेन्द्र


दिंडोरकर यांनी ही नयन मनोहर रांगोळी काढली आहे, श्रीबाळकृष्णाचे डोळे मिटून पुन्हा उघडतात.यांच्या या ऊत्कृष्ठ कलेस शतशः                                                                         💐🙏🙏🙏💐

Tuesday, 21 November 2023

असे मनोधैर्य वाढवीनारे पंतप्रधान आपल्याला मिळाले

 असे मनोधैर्य वाढवीनारे पंतप्रधान आपल्याला मिळाले आपण खरंच खूप नशीबवान आहोत.🚩🚩🚩🇮🇳🇮🇳


Monday, 13 November 2023

राज्य कला प्रदर्शनासाठी ऑनलाईन पद्धतीने कलाकृती पाठविण्याचे आवाहन

 राज्य कला प्रदर्शनासाठी ऑनलाईन पद्धतीने

कलाकृती पाठविण्याचे आवाहन

 

        मुंबईदि. 13 : राज्य कला प्रदर्शनाचे यंदाचे 63 वे वर्ष आहे. येत्या 20 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत जहांगीर आर्ट गॅलरी येथे होणाऱ्या प्रदर्शनासाठी राज्यातील कलाकारांकडून ऑनलाईन पद्धतीने कलाकृती मागविण्यात येत असल्याची माहिती प्रभारी कला संचालक राजीव मिश्रा यांनी दिली आहे.

            रेखारंगकलाशिल्पकलाउपयोजित कलामुद्राचित्रण व दिव्यांग या विभागासाठी राज्याचे रहिवाशी असलेल्या कलावंतांकडून ऑनलाईन स्वरूपात कलाकृती मागविण्यात येत आहे.  कला संचालनालयाच्या www.doa.maharashtra या संकेतस्थळावर ऑनलाईन स्वरूपात कलाकृती सादर करण्याचे आवाहन प्रभारी कला संचालक राजीव मिश्रा यांनी केले आहे. प्रदर्शनातील पारितोषिकपात्र कलाकृतींना प्रत्येकी 50 हजार याप्रमाणे एकूण 15 पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी 22620231/32 या क्रमांकावर संपर्क साधावा.

Thursday, 2 November 2023

महापर्व छठ की महिमा को दिखाती भोजपुरी फिल्म छठ के बरतिया का ट्रेलर को एक दिन में मिले 1 मिलियन व्यूज

 महापर्व छठ की महिमा को दिखाती भोजपुरी फिल्म छठ के बरतिया का ट्रेलर को एक दिन में मिले 1 मिलियन व्यूज


भक्त और भगवान के बीच के रिश्ते को दर्शाती भोजपुरी फिल्म छठ के बरतिया के ट्रेलर को मिले इतने व्यूज

वर्ल्डवाइड रिकार्ड्स से रिलीज स्मृति सिन्हा और माही श्रीवास्तव स्टारर भोजपुरी फिल्म छठ के बरतिया के ट्रेलर को 1 दिन में एक मिलियन व्यूज

एआरके वर्कस चैनल रत्नाकर कुमार प्रस्तुत भोजपुरी फिल्म छठ के बरतिया का बेहतरीनट्रेलर वर्ल्डवाइड रिकार्ड्स के ऑफिशियल यूट्यूब चैनल से रिलीज होने के बाद से सोशल मीडिया में धमाल मचा रहा है। ट्रेलर को रिलीज हुई महज एक ही दिन हुआ है और इसे दर्शकों ने सर आंखों पर बैठा लिया है जी हां ट्रेलर को एक दिन में एक मिलियन से ज्यादा व्यूज और 9 हजार से ज्यादा लाइक्स मिल चुके हैं। वही ट्रेलर दर्शकों को बहुत ही ज्यादा पसंद आ रहा है। छठ के बरतिया के ट्रेलर की चर्चा हर तरफ हो रही है। क्योंकि इसमें सभी कलाकारों ने अपना 100 परसेंट दिया है। जो कि ट्रेलर में नजर आ रहा है।
फिल्म के ट्रेलर में दिखाया गया है कि एक नई नव विवाहिता नारी को अपने पति से ससुराल में जितना प्यार मिलता है, उससे कहीं ज्यादा ससुराल के घरवालों का अत्याचार सहन करना पड़ता है। नवविवाहिता के क़िरदार में स्मृति सिन्हा को जब-जब अधिक कष्ट मिलता है, तब तब छठ माता किसी न किसी भेष में उसकी सहायता करती हैं। ट्रेलर में दिखाया गया है कि एक वक़्त ऐसा भी आता है जब छठ माता की परम भक्त स्मृति सिन्हा जिंदगी और मौत से जूझ रही है तब जीवनदान देने के लिए छठी मइया खुद यमराज और भगवान से भीड़ जाती हैं। कुल मिलाकर फिल्म की कहानी छठी मइया के महिमा से परिपूर्ण है। 
लिंकः  https://youtu.be/XWbkFOKRgYk
फिल्म का यह ट्रेलर देखने के बाद छठ माता के भक्तों की श्रद्धा और बढ़ जाती है। फिल्म के कलाकारों की बात की जाए तो स्मृति सिन्हा ने शादी से पहले और शादी के बाद नवविवाहिता का रोल दिल से निभाया है। छठी मइया के भिन्न-भिन्न किरदार में माही श्रीवास्तव खूब जँची हैं। पति के किरदार में अंशुमान मिश्रा, ससुराल के घर वालों के किरदार में समर्थ चतुर्वेदी और रितु पांडेय आदि सभी कलाकारों ने बेहतरीन अभिनय किया है, जोकि सजीव लग रहा है। जब फिल्म का ट्रेलर इतना दिल को छू लेने वाला है तो पूरी फिल्म कितनी मर्मस्पर्शी होगी।
फिल्म का ट्रेलर अपने आप मे बहुत ही शानदार तरीके से काटा गया है। इस ट्रेलर को फैंस वर्ल्डवाइड रिकार्ड्स के ऑफिसियल चैनल पर जाकर देख रहे हैं। इसकी शूटिंग उत्तर प्रदेश से लेकर मुंबई में की गई है। वही फिल्म 10 नवंबर को सिनेमाघरों में दस्तक देने को तैयार है।

निर्माता कुलदीप श्रीवास्तव ने कहा कि ये छठ के बरतिया छठी मईया के ऊपर बनने जा रही है, जिसमें आपको छठ के व्रत की महिमा के बारे में सम्पूर्ण जानकारी दी जाएगी। ये कहानी पृरी तरह से धार्मिक परिवेश में बनाई गई है। इस व्रत को करने के लिए लोगों विदेश से भी देश में आते हैं। ये फिल्म दर्शकों को सिनेमा हॉल में आने को मजबूर कर देंगी। क्योंकि इसकी कहानी दर्शकों को बहुत पसंद आएगी।

फिल्म के निर्माता कुलदीप श्रीवास्तव और निवेदिता कुमार हैं, वही इसके निर्देशक कन्हैया एस विश्वकर्मा, कॉन्सेप्ट व प्रोजेक्ट डिजाइनर देव पाण्डेय ने किया है। फिल्म का प्रचार प्रसार ब्रजेश मेहर और रामचंद्र यादव कर रहे हैं। फिल्म में स्मृति सिन्हा, अंशुमन मिश्रा, माही श्रीवास्तव, समर्थ चतुर्वेदी, रितु पाण्डेय प्रतिभा साहु, शुभकिशन शुक्ला, अनामिका तिवारी, अंजली तिवारी, अशोक गुप्ता सहित कई कलाकार हैं।
फिल्म के डीओपी जगविंदर सिंह हुंदल (जग्गी पाजी), लेखक सभा वर्मा, संकलन गुरजंट सिंह,, संगीत साजन मिश्रा, गीत प्यारे लाल यादव (कवि जी), सभा वर्मा, शेखर मधुर, नृत्य सोनू प्रीतम, कला राम बाबू ठाकुर, पार्श्व संगीत राजेश प्रसाद, मारधाड़ दिनेश यादव, साउंड मिक्सिंग कृष्णा कुमार विश्वकर्मा, मुख्य सहायक निर्देशक राम कनोजिया, कुलदीप मिश्रा, निर्माण प्रबंधक मनोज पाण्डेय, विवेक जैसवाल, पोस्ट प्रोडक्शन 3 स्टूडियो डी आई मनिंदर सिंह (बंटी), प्रोमो विकास पवार, वी एफ एक्स रितेश दफ्तरी है।
[02/11, 09:19] Brajesh Mehar: The trailer of Bhojpuri film Chhath Ke Baratiya, showing the glory of the great festival Chhath, got 1 million views in a day.

The trailer of Bhojpuri film Chhath Ke Baratiya, depicting the relationship between a devotee and God, got so many views.

The trailer of Smriti Sinha and Mahi Srivastava starrer Bhojpuri film Chhath Ke Baratiya released from Worldwide Records got one million views in 1 day.

The excellent trailer of Bhojpuri film Chhath Ke Baratiya presented by ARK Works Channel Ratnakar Kumar is making waves on social media after its release from the official YouTube channel of Worldwide Records. Only a day has passed since the trailer was released and the audience has taken it seriously. Yes, the trailer has received more than one million views and more than 9 thousand likes in a day. The audience is liking the same trailer very much. The trailer of Chhath Ke Baratiya is being discussed everywhere. Because all the artists have given their 100 percent in this. Which is visible in the trailer.
It is shown in the trailer of the film that a newly married woman has to endure more atrocities from her in-laws than the love she gets from her husband in her in-laws' house. Whenever Smriti Sinha faces much trouble in the role of a newly married woman, then Chhath Mata helps her in some guise or the other. It is shown in the trailer that there comes a time when Chhath Mata's ardent devotee Smriti Sinha is struggling between life and death, then Chhath Maiya herself rushes to Yamraj and God to give her life. Overall, the story of the film is full of the glory of Chhathi Maiya.
After watching this trailer of the film, the devotion of the devotees of Chhath Mata increases further. Talking about the cast of the film, Smriti Sinha has played the role of a newlywed before and after marriage with all her heart. Mahi Srivastava has looked great in different roles of Chhathi Maiya. Anshuman Mishra in the role of husband, Samarth Chaturvedi and Ritu Pandey in the role of in-laws etc. all the actors have done excellent acting, which looks lifelike. When the trailer of the film is so heart touching, how touching will the entire film be.
The trailer of the film itself has been cut in a very brilliant manner. Fans are watching this trailer on the official channel of Worldwide Records. Its shooting has been done from Uttar Pradesh to Mumbai. The same film is ready to hit the theaters on November 10.

Producer Kuldeep Srivastava said that this Chhath Baratiya is going to be made on Chhathi Maiya, in which you will be given complete information about the glory of Chhath fast. This story has been made in a purely religious environment. People from abroad also come to the country to observe this fast. These films will force the audience to come to the cinema hall. Because the audience will like its story very much.

The producers of the film are Kuldeep Srivastava and Nivedita Kumar, its director is Kanhaiya S Vishwakarma, concept and project designer Dev Pandey. Brajesh Mehar and Ramchandra Yadav are promoting the film. The film has many actors including Smriti Sinha, Anshuman Mishra, Mahi Srivastava, Samarth Chaturvedi, Ritu Pandey, Pratibha Sahu, Shubhakishan Shukla, Anamika Tiwari, Anjali Tiwari, Ashok Gupta.
Film's DOP Jagwinder Singh Hundal (Jaggi Paaji), Writer Sabha Verma, Compilation Gurjant Singh, Music Sajan Mishra, Lyrics Pyare Lal Yadav (Kavi Ji), Sabha Verma, Shekhar Madhur, Dance Sonu Pritam, Art Ram Babu Thakur, Background Music Rajesh Prasad, Action Dinesh Yadav, Sound Mixing Krishna Kumar Vishwakarma, Chief Assistant Director Ram Kanojia, Kuldeep Mishra, Production Manager Manoj Pandey, Vivek Jaiswal, Post Production 3 Studio DI Maninder Singh (Bunty), Promo Vikas Pawar, VFX Ritesh It is an office.









गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या फिल्म बाजार विभागासाठी महाराष्ट्र शासनाकडून तीन मराठी चित्रपटांची निवड; सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा*

 गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या फिल्म बाजार विभागासाठी महाराष्ट्र शासनाकडून तीन मराठी चित्रपटांची निवडसुधीर मुनगंटीवार यांची घोषणा*

 

मुंबई,  दि.  १ नोव्हेंबर २०२३: 

 

यंदाच्या गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या फिल्म बाजार विभागासाठी महाराष्ट्र शासनाकडून *ग्लोबल आडगाव,  गिरकी आणि बटरफ्लाय* या तीन मराठी चित्रपटांची निवड केली असल्याची घोषणा आज सांस्कृतिक कार्य मंत्री श्री.  सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. या तीनही चित्रपटांच्या चमूचे ना. श्री मुनगंटीवार यांनी अभिनंदन केले आहे. 

 

दरवर्षी गोवा आतंरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 'फिल्म बाझारया गटात मराठी चित्रपट महाराष्ट्र शासनाकडून पाठवले जातात. या चित्रपटांची निवड करण्याकरता पाच सदस्यांची तज्ज्ञ समिती नेमण्यात आली होती. या समितीने केलेल्या शिफारसीनुसार ग्लोबल आडगाव,  गिरकी आणि बटरफ्लाय हे तीन चित्रपट निवडण्यात आले आहेत. या तीनही चित्रपटाचा प्रत्येकी एक प्रतिनिधी शासनातर्फे गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या फिल्म मार्केट विभागासाठी सहभागी होण्याकरता चित्रपटांसोबत पाठविण्यात येणार आहे. 

 

शासनाने महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या  माध्यमातून जाहिरातीद्वारे गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील 'फिल्म बाजारया विभागात राज्य सरकारकडून पाठविण्याकरता इच्छुक चित्रपटांचे प्रवेश मागविले होते.  त्यानुसार एकूण २९ चित्रपटांचे प्रस्ताव प्राप्त झाले होते.  श्रीमती किशोरी शहाणे ,  श्री प्रसाद नामजोशी,  श्री हर्षित अभिराज,  श्री. समीर आठल्ये आणि श्री संदीप पाटील यांच्या समितीने परीक्षणाअंती त्यापैकी ग्लोबल आडगाव,  गिरकी आणि बटरफ्लाय या तीन चित्रपटांची निवड केली. 

 

निवड झालेल्या चित्रपटांच्या चमूंचे ना. श्री.  सुधीर मुनगंटीवार यांनी अभिनंदन केले असून या चमूंना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.

 

Thursday, 26 October 2023

37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंना

 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंना

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते क्रीडा ध्वजप्रदान

 

            मुंबईदि. 25 :- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गोव्यात 26 ऑक्टोबरपासून सुरु होत असलेल्या ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राचे नऊशे खेळाडू सहभागी होत असून यावेळीही आपले खेळाडू उत्तम कामगिरी करतील. सर्वाधिक पदके जिंकून राज्याला अव्वल स्थान मिळवून देतीलअसा विश्वास उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनचे अध्यक्ष अजित पवार यांनी आज व्यक्त केला. राज्यातील खेळाडूंना राष्ट्रीयआंतरराष्ट्रीय पदके जिंकण्यासाठी अत्याधुनिक प्रशिक्षणासह सर्वतोपरी मदत करण्यात येत असून यापुढे खेळांडूच्या तयारीसाठी निधीची अडचण भासणार नाहीअसेही त्यांनी स्पष्ट केले.

            गोवा येथे होत असलेल्या ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जात असलेल्या ९०० खेळाडू व २०० मार्गदर्शक अशा एकूण ११०० सदस्यांच्या महाराष्ट्राच्या पथकाकडे क्रीडाध्वज हस्तांतर करण्याचा सोहळा तसेच शुभेच्छापर निरोप देण्याचा कार्यक्रम उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या उपस्थितीत मंत्रालयात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी उपमुख्यमंत्री श्री. पवार बोलत होते. यावेळी क्रीडा मंत्री संजय बनसोडेक्रीडा आयुक्त सुहास दिवसेमहाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनचे महासचिव नामदेव शिरगावकरउपाध्यक्ष प्रदीप गंधेमहाराष्ट्र कबड्डी संघाचे सचिव बाबूराव चांदेरे आदींसह स्पर्धेत सहभागी होण्यासाठी रवाना होत असलेले खेळाडूक्रीडा संघटनांचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.

            उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले कीसहभागी सर्वच खेळाडूंकडून महाराष्ट्राला पदकांची अपेक्षा आहे. मात्र, अपेक्षांच्या दबावाखाली न येता खेळाडूंनी त्यांचा नैसर्गिक खेळ खेळावा आणि सर्वोत्तम कामगिरी करावी. त्यासाठी महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक संघटनेनेराज्य शासनराज्यातील साडेतेरा कोटी नागरिकांच्या वतीने उपमुख्यमंत्र्यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

             उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले कीमागच्या वेळी३६ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी ८०० खेळाडू आणि अधिकाऱ्यांचे पथक पाठविले होते. त्यावेळी ३९ सुवर्ण३८ रौप्य८३ कांस्य अशी १४० पदके मिळाली होती. यावेळी आपले पथक मोठे आहे. यावेळी आपली तयारीही चांगली आहे. खेळाडूंमध्ये आत्मविश्वासही आहे. त्यामुळे ३६ व्या क्रीडा स्पर्धेपेक्षा३७ वी क्रीडा स्पर्धा आपल्याला अधिक पदके मिळवून देणारीराज्याच्या गौरवात भर टाकणारी असेल. महाराष्ट्राने सर्वाधिक पदके जिंकूनपहिला क्रमांक मिळवलेला असेल. त्यावेळी विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सर्वजण पुन्हा एकत्र येऊअसा विश्वास उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी व्यक्त केला.

            राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जात असलेले खेळाडू महाराष्ट्राचे प्रतिनिधी म्हणून जात आहेत. तिथे राज्याला मान खाली घालावी लागेल, अशी कुठलीही चुकीची गोष्ट तिथे घडणार नाही, याची शपथकाळजी सर्वांनी घ्यावी. महाराष्ट्राच्या खेळाडूंनी आपल्या खेळातूनखिलाडूपणातूनवागण्यातूनक्रीडा रसिकांची मने जिंकण्याचे काम करावे. राज्यासाठी पदके जिंकणे आणि खिलाडूपणे वागणेया दोन्ही गोष्टी सारख्याच महत्वाच्या आहेत. याची जाणीवही त्यांनी खेळाडूंना करुन दिली.

            महाराष्ट्राने सुरुवातीपासून खेळ आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे धोरण स्वीकारले आहे. गावागावांत क्रीडा संस्कृती रुजावी यासाठी राज्याचं स्वतंत्र क्रीडा धोरण आहे. प्रत्येक जिल्ह्याततालुक्यात क्रीडा संकूल असले पाहिजे. खेळाडूंना सर्व सोयीसुविधा मिळाल्या पाहिजेत. खेळाडूंना शासकीयनिमशासकीयमहामंडळांच्या सेवेतखासगी कंपन्यांमध्येही नोकऱ्या मिळाल्या पाहिजेतयासाठीही शासनाचा सातत्याने प्रयत्न राहिला आहे. या प्रयत्नांना यशही मिळत आहेअसेही उपमुख्यंत्री श्री. पवार म्हणाले.

आशियाई स्पर्धेत देशाची आणि महाराष्ट्राची उज्ज्वल कामगिरी

            चीनमध्ये नुकत्याच झालेल्या19 व्या आशियाई स्पर्धांमध्ये देशाच्या आणि आपल्या राज्याच्या खेळाडूंची कामगिरी सरस ठरली. आशियाई स्पर्धांमध्ये भारताने२८ सुवर्ण३८ रौप्य४१ ब्राँझअळी एकूण १०७ पदके जिंकली. यात महाराष्ट्राचे मोलाचेमहत्वाचे योगदान होते.  आशियाई स्पर्धेतभारताने जिंकलेल्या 28 सुवर्णपदकांपैकी 15 सुवर्णपदके महाराष्ट्राच्या खेळाडूंनी जिंकली आहेत. याशिवाय महाराष्ट्राला 7 रौप्य5 कांस्य पदकं मिळाली आहेत. क्रीडा क्षेत्रातला देशाचा आणि राज्याचा हा विजयरथ पुढे नेण्याचे काम यापुढील काळातराष्ट्रीय स्पर्धेत खेळणाऱ्या खेळाडूंना करायचे आहेयाची जाणीव ठेऊन तुम्ही तयारी केली पाहिजे. चांगले खेळले पाहिजेअसेही उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले.

आशियाई पदक विजेत्यांच्या बक्षीसात भरघोस वाढ

            राज्य सरकार सातत्याने खेळ आणि खेळाडूंच्या पाठिशी राहिले आहे. चीनमधल्याआशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलेल्याराज्याच्या खेळाडूंना १ कोटी रुपयांचे आणि मार्गदर्शकाला १० लाख रुपयांचं बक्षीस देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. त्याचा शासन आदेश निर्गमित केला आहे. आशियाई स्पर्धेतल्या रौप्यपदक विजेत्या खेळाडूला ७५ लाख रुपये आणि मार्गदर्शकाला ७ लाख ५० हजार रुपये मिळणार आहेत. कांस्यपदक विजेत्या खेळाडूला ५० लाख आणि मार्गदर्शकाला ५ लाख रुपयांचे रोख बक्षीस देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.  स्पर्धेत भाग घेणाऱ्या सहभागी खेळाडूंनाचांगली तयारी करता यावी म्हणूनप्रोत्साहनपर १० लाख रुपये देण्याचा निर्णयही आपण घेतला आहेअशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

            आशियाई क्रीडा स्पर्धेतील सांघिक क्रीडा प्रकारात सुवर्ण पदकाची कमाई केलेल्या खेळाडूस ७५ लाखमार्गदर्शकास ७ लाख ५० हजाररौप्यपदक विजेत्या खेळाडूस ५० लाखमार्गदर्शकास ५ लाख तर कांस्यपदक विजेत्या खेळाडूस २५ लाखमार्गदर्शकास २ लाख ५० हजार रूपये देण्यात येणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.

            राज्यात क्रीडा विद्यापीठ सुरु करण्यात आले आहे. पुण्यामध्ये ऑलिम्पिक भवन उभारण्यात येत आहे. अलिकडच्या काळात जलतरणनेमबाजी सारख्या खेळातंही महाराष्ट्राचे खेळाडू चमकत आहेत. जागतिक पातळीवर भालाफेकीचं सुवर्णपदक जिंकणाऱ्या नीरज चोप्राच्या पूर्वजांचे संबंधही महाराष्ट्राशी जोडलेले आहेतही बाब अभिमानास्पद आहे. महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्राला गती देण्यासाठीइथल्या क्रीडा संस्कृतीची मुळं अधिक घट्ट करण्यासाठी आपले प्रयत्न सुरु आहेत. खेळाडूंना सन्मान आणि खेळांना प्रोत्साहन देण्याच्या कामात आम्ही कुठेही कमी पडणार नाहीअशी ग्वाहीही त्यांनी दिली.

----------------------०००००------------------------

शैलजा पाटील/विसंअ/

Wednesday, 25 October 2023

बर्लिन स्पेशल ऑलिम्पिकमध्ये पदकांची लयलूट करणाऱ्या खेळाडूंचा राज्यपालांनी केला सत्कार

 बर्लिन स्पेशल ऑलिम्पिकमध्ये पदकांची

लयलूट करणाऱ्या खेळाडूंचा राज्यपालांनी केला सत्कार

 

            मुंबई, दि. 25 : बौद्धिक दृष्ट्या दिव्यांग व्यक्तींसाठी बर्लिन येथे झालेल्या 'स्पेशल ऑलिम्पिक'मध्ये देशासाठी पदकांची लयलूट करणाऱ्या महाराष्ट्रातील २० खेळाडू व प्रशिक्षकांचा राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते बुधवारी (दि. २५) राजभवन मुंबई येथे सत्कार करण्यात आला.

            बौद्धिक दिव्यांग मुलामुलींनी ऑलिम्पिकमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात पदक प्राप्त करणेहा राज्यासाठी तसेच देशासाठी बहुमान आहे, असे राज्यपालांनी यावेळी सांगितले.

            पूर्वी ऑलिम्पिकसारख्या स्पर्धांमध्ये भारत पदकतालिकेत खालच्या क्रमांकावर राहत असे. परंतुयावर्षी झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताने पदकांचे शतक पार केले आहे. आज भारत खेळामध्ये आघाडीवर येत आहे आणि त्यात दिव्यांग खेळाडू देखील आघाडीवर आहेतही अभिमानास्पद गोष्ट आहेअसे राज्यपालांनी सांगितले.

            यावेळी राज्यपालांच्या हस्ते क्रीडा प्रशिक्षक व युनिफाईड पार्टनर्स यांचा देखील सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला प्रभाग संचालक डॉ. भगवान तलवारेतसेच बर्लिन स्पेशल ऑलिम्पिकमधील सुवर्णरजत व कांस्य पदक विजेते उपस्थित होते. 

            स्पेशल ऑलिम्पिक मध्ये भारतातून १९४ खेळाडू सहभागी झाले होते. त्यांनी देशासाठी २०२ पदके जिंकली. महाराष्ट्रातील खेळाडूंनी या स्पर्धेत २० पदके जिंकलीअसे स्पेशल ऑलिम्पिक भारतच्या महाराष्ट्र अध्यक्षा डॉ मेधा सोमैया यांनी यावेळी सांगितले. स्पेशल ऑलिम्पिक मध्ये ८ वर्षांपासून ८० वर्षापर्यंत स्पर्धक सहभागी होऊ शकतातअसे त्यांनी सांगितले.   बर्लिन येथे स्पेशल ऑलिम्पिक स्पर्धा जून महिन्यात झाल्या.

**

Maha Governor felicitates medallists from Berlin Special Olympics

 

      Mumbai, 25th Oct : Maharashtra Governor Ramesh Bais felicitated 20 athletes and coaches from Maharashtra who bagged medals for the country in the 'Special Olympics' at Raj Bhavan Mumbai on Wednesday (25th). The Special Olympics were held for the intellectually challenged persons in Berlin in June 2023.

      Speaking on the occasion, the Governor said the divyang sports persons have done the State and the nation proud by bagging more than 200 medals in the Special Olympics.

      He said there was time when India stood at the bottom of the medal table in events like the Olympics. He said, India has now crossed the century of medals in the recently concluded Asian Games held in China.

      According to Dr Medha Somaiya, Maharashtra State President of Special Olympic Bharat, 194 athletes from India participated in Special Olympics. Together they won 202 medals for the country. She said the Divyang athletes from Maharashtra won 20 medals in this competition. She informed that contestants from 8 years to 80 years of age participate in the Special Olympics. The Special Olympic Games were held in Berlin in the month of June.

      The Governor also felicitated Sports coaches and Unified Partners on this occasion. Area Director Dr Bhagwan Talware, parents, Sports Director and recipients of Special Olympic gold, silver and bronze medallists were present.

0000

Saturday, 21 October 2023

आशियाई क्रीडा स्पर्धेत पदकविजेत्या राज्यातील खेळाडूंच्या रक्कमेत दहापट वाढ

 आशियाई क्रीडा स्पर्धेत पदकविजेत्या

राज्यातील खेळाडूंच्या रक्कमेत दहापट वाढ

- क्रीडा मंत्री संजय बनसोडे

           

            मुंबई, दि. २० : राज्याचे नाव उज्ज्वल केलेल्या राज्यातील खेळाडूंना व त्यांच्या मार्गदर्शकांना प्रोत्साहनपर बक्षीस देऊन त्यांचा गौरव करण्यासाठी आशियाई क्रीडा स्पर्धेतील(एशियन गेम्स) पदक विजेते खेळाडू आणि मार्गदर्शकांना देण्यात येणाऱ्या पारितोषिक रकमेत दहापट वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले.

            मंत्री श्री. बनसोडे म्हणाले कीचीन मध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या खेळाडूस १ कोटी रुपयेमार्गदर्शकास १० लाख रुपयेरौप्य पदक विजत्या खेळाडूसाठी ७५ लाख रुपयेमार्गदर्शकास ७ लाख ५० हजार रुपयेकांस्य पदक प्राप्त खेळाडूस ५० लाख रुपयेमार्गदर्शकास ५ लाख रुपये रोख असे बक्षीस देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. तसेच स्पर्धेत भाग घेणाऱ्या सहभागी खेळाडूंना प्रोत्साहनपर १० लाख रुपये देण्यात येणार आहे.

            आशियाई क्रीडा स्पर्धेतील(एशियन गेम्स)सांघिक क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक प्राप्त खेळाडूस ७५ लाखमार्गदर्शकास ७ लाख ५० हजाररौप्यपदक विजत्या खेळाडूस ५० लाखमार्गदर्शकास ५ लाख तर कास्य पदक विजेत्यास २५ लाखमार्गदर्शकास २ लाख ५० हजार रुपये देण्यात येणार असून याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असल्याचे मंत्री श्री. बनसोडे यांनी सांगितले.

            यापूर्वी सुवर्ण पदकासाठी १० लाख रुपये, मार्गदर्शकास २ लाख ५० हजार रुपयेरौप्यपदकासाठी ७.५ लाख रुपयेमार्गदर्शकास १ लाख ८७ हजार रुपयेकांस्यपदकासाठी ५ लाख रुपयेमार्गदर्शकास १ लाख २५ हजार रुपये दिले जात होते. आता आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी नेत्रदीपक कामगिरी करुन जागतिकस्तरावर पदकांचा इतिहास रचला. त्यात राज्याच्या खेळाडूंचे मोठे योगदान आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री देंवेद्र फडणवीसउपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रोख रकमेत वाढ करण्याचा निर्णय घेतला, असे मंत्री श्री. बनसोडे यांनी सांगितले.

            उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री श्री.पवार यांनी आठ दिवसांपूर्वी क्रीडा व युवक कल्याण विभागाचा आढावा घेतला होता. त्या बैठकीत पंजाबहरियाणामध्यप्रदेश राज्याप्रमाणे आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडूंच्या रकमेत वाढ करण्यावर चर्चा झालीत्याप्रमाणे निर्णय घेण्यात आला असल्याचे  मंत्री श्री बनसोडे यांनी यावेळी सांगितले.

00000

Thursday, 19 October 2023

एकदा काय झालं’ चित्रपटाला सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

 ‘एकदा काय झालं’ चित्रपटाला सर्वोत्तम मराठी  चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

नर्गिस दत्त राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार द कश्मीर फाइल्स ला प्रदान

                सामाजिक विषयासाठी  थ्री टू वन ला पुरस्कार

वहिदा रेहमान दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित

                     ‘राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते सन्मानित

 

            नवी दिल्ली, 17 : 69 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्‍कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज प्रदान करण्यात आले. ‘एकदा काय झालं’ या चित्रपटाला सर्वोत्तम मराठी चित्रपटाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

            नर्गिस दत्त राष्ट्रीय एकात्मता श्रेणीतील पुरस्कार, द कश्मीर फाइल्स या चित्रपटास, तर सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपटांच्या श्रेणीत थ्री टू वन या मराठी सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.

        विज्ञान भवनात 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूरकेंद्रीय राज्यमंत्री डॉ. एल. मुरूगनमाहिती व प्रसारण विभागाचे सचिव अपूर्व चंद्रा आणि पर्यवेक्षक समितीचे अध्यक्ष मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.  आज प्रदान झालेले पुरस्कार वर्ष 2021 चे आहेत. कोरोना महामारीमुळे वर्ष 2021 मधील पुरस्कारांचे वितरण आज करण्यात आले.

‘एकदा काय झालं’ या चित्रपटाला सर्वोत्तम मराठी चित्रपटाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यासोबतच ‘गोदावरी’, ‘थ्री टू वन’, ‘रेखा’, ‘या मराठी चित्रपटांनाही विविध श्रेणींमध्ये सन्मानित करण्यात आले. फिचर फिल्ममध्ये विविध 32 श्रेणीत पुरस्कार पुरस्कार प्रदान करण्यात आले, तर नॉन फिचर फिल्ममध्ये विविध 24 श्रेणींमध्ये पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत.

हिंदीमधील सर्वोत्कृष्ट सिनेमा सरदार उधम

हिंदीमधील सर्वोत्कृष्ट सिनेमा सरदार उधम ठरला. ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये, 'सरदार उधमचित्रपटाला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटसर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफीसर्वोत्कृष्ट कॉस्च्युम डिझायनरसर्वोत्कृष्ट निर्मिती डिझाइन आणि सर्वोत्कृष्ट ऑडिओग्राफी: री-रेकॉर्डिंग या श्रेणींत राष्ट्रीय पुरस्कार जिंकले आहेत.  सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार पुष्पा  या तेलुगु चित्रपटासाठी अल्लू अर्जुन यांना प्रदान करण्यात आला.

 सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार यावेळी दोन अभिनेत्रींना प्रदान करण्यात आला. गंगूबाई काठियावाडी या चित्रपटासाठी आलिया भट, तर मिमी या चित्रपटसाठी क्रिती सेनॉन यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून सन्मानित करण्यात आले. उत्कृष्ट सहअभिनेत्याचा पुरस्कार मिमी या हिंदी सिनेमासाठी पंकज त्रिपाठी तर सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचा पुरस्कार पल्लवी जोशी यांना द कश्मीर  फाइल्स या चित्रपटासाठी प्रदान करण्यात आला.

सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म पुरस्कार रॉकेट्री : द नांबी इफेक्ट अंतराळ वैज्ञानिकावर आधारित चित्रपटाला प्रदान करण्यात आला. तर, शेरशाह चित्रपटाला विशेष ज्युरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संपूर्ण मनोरंजन या श्रेणीतील  पुरस्कार आरआरआर या तेलुगु सिनेमाला पुरस्कार प्रदान करण्यात आला. नर्गिस दत्त राष्ट्रीय एकात्मता श्रेणीतील पुरस्कार द कश्म‍ीर फाइल्स या हिंदी सिनेमाला सन्मानित करण्यात आले.

एकदा काय झालं - सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा बहुमान

प्रादेशिक भाषांमधील सर्वोत्कृष्ट चित्रपटांना या कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले. यात मराठी भाषेसाठी ‘एकदा काय झालं’ या चित्रपटाला सर्वोत्तम चित्रपटाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले असून रजत कमल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. वडील आणि मुलाच्या नात्यातील नितांत सुंदर आणि हळवा प्रवास चित्रपटातून दाखविण्यात आलेला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक सलील कुलकर्णी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. पुरस्काराचे स्वरूप रजत कमल आणि 1 लाख रूपये रोख आहे.

निखिल महाजन यांना ‘गोदावरी’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार

'गोदावरी या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या चित्रपटाचे दिग्दर्शक व आघाडीचे सिने-दिग्दर्शक निखिल महाजन यांनी हा पुरस्कार स्वीकारला. पुरस्काराचे स्वरूप स्वर्ण कमळ 2 लाख 50 हजार रोख असे आहे. याआधी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्येही 'गोदावरीसिनेमाला गौरवण्यात आले आहे. 

'गोदावरीहा कौटुंबिक सिनेमा आहे. प्रत्येक कुटुंबाला जोडणारा असा हा सिनेमा आहे. नाशिकमध्ये राहणाऱ्या निशिकांतच्या हसत्या खेळत्या कुटुंबातील चढउतार तसेच परंपरारूढी आणि भावना यांचे सुंदर मिश्रण ‘गोदावरी’मध्ये दाखवण्यात आले आहे. नाशकातील गोदावरी नदी हा या सिनेमाचा मुख्य दुवा आहे.

नॉनफिचर मध्येही मराठी चित्रपटांची मोहर

नॉनफिचर चित्रपटांमध्येही मराठी मोहर बघायला मिळाली. नॉन फिचर फिल्म श्रेणीतील सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार थ्री टू वन’  या हिंदी आणि मराठी दोन्ही भाषेत असणाऱ्या चित्रपटला  प्रदान करण्यात आला.  थ्री टू वन या सिनेमाची निर्मिती एफटीआयआय ची असून दिग्दर्शक हिमांशू प्रजापती यांनी हा पुरस्कार स्वीकारला. पुरस्काराचे स्वरूप रजत कमल आणि प्रत्येकी 50,000 हजार रूपये रोख आहे.

 रेखा या मराठी नॉन फिचर फिल्मला विशेष परीक्षक श्रेणीतील पुरस्कार प्रदान करण्यात आला. या चित्रपटाचे दिग्दर्शन शेखर बापु रणखांबे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. पुरस्काराचे स्वरूप रजत कमल आणि 1 लाख रूपये रोख आहे.

एंडेन्जर्ड  हेरिटेज वर्ली आर्टला सर्वोत्कृष्ट प्रमोशनल डॉक्युमेंटरी चित्रपटाचा पुरस्कार

एंडेन्जर्ड  हेरिटेज वर्ली आर्ट या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट प्रमोशनल डॉक्युमेंटरी फिल्मचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या चित्रपटाचे दिग्दर्शक  हेमंत वर्मा यांनी हा पुरस्कार स्वीकारला. पुरस्काराचे स्वरूप रजत कमळ व  50 हजार रोख असे आहे. वारली  महाराष्ट्रातील एक जमात आहेजी डहाणू आणि जव्हारच्या आसपासच्या भागात राहते. लग्नाच्या निमित्ताने हे लोक आपल्या घराच्या भिंतींना गेरूने प्लास्टर करतात आणि तांदळाच्या पिठाने चित्रे काढतात. या चित्रांवर आधारित हा चित्रपट आहे. याचे निर्मातादिग्दर्शकलेखक आणि संपादक हेमंत वर्मा आहेत. हेमंत वर्मा हे हरियाणातील भिवानी शहरातील रहिवासी असून गेल्या 35 वर्षांपासून ते मुंबईत राहत आहेत.

      वहिदा रेहमान यांना दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार

भारतीय चित्रपटसुष्टीला 66 वर्षे दिलेल्या अतुलनीय योगदानबद्दल ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान यांना  53 व्या दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्काराने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सन्मानित करण्यात आले.

सहा दशकांच्या कारकिर्दीत वहिदा रेहमान यांनी 90 हून अधिक चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. प्यासा, कागज़ के फूल, चौदवी का चाँद , साहेब बीबी और गुलाम, गाईड, खामोशी आदी चित्रपटांमधील त्यांच्या भूमिकांचे समीक्षकांनी कौतुक केले. आपल्या अभिनय सामर्थ्याच्या जोरावर त्यांनी अनेक पुरस्कार पटकावले आहेत. गाइड (1965) आणि कमलमधील (1968) भूमिकांसाठी त्यांना फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला आहे. रेश्मा आणि शेरा (1971) या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले. वर्ष 1972 मध्ये त्यांना पद्मश्री, तर वर्ष 2011 मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.  पुरस्काराचे स्वरूप स्वर्ण कमळ, रुपये 10 लाख, शाल व प्रशस्ती पत्र असे आहे.

गाईड’, ‘बीस साल बाद’, प्यासा’, ‘कागज के फूल’ चित्रपटांचा आनंद घेण्याची प्रेक्षकांना संधी

    ज्येष्ठ अभिनेत्री, वहिदा रेहमान यांना 53व्या दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्काराचे औचित्य साधून राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ आणि राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (एनएफडीसी-एनएफएआय) यांच्या मार्फत वहिदा रहमान रेट्रोस्पेक्टिव्ह’ चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. नवी दिल्लीच्या महादेव मार्ग येथील फिल्म डिव्हिजन ऑडिटोरियम येथे 18 ते 21 ऑक्टोबर 2023 दरम्यान दररोज सायंकाळी 6 वाजता या चित्रपटांचे प्रदर्शन करण्यात येईल. यामध्ये बुधवार, 18 ऑक्टोबर रोजी गाइड (1965), गुरुवार, 19 ऑक्टोबर रोजी बीस साल बाद (1962), शुक्रवार, 20 ऑक्टोबर रोजी प्यासा (1957), तर शनिवार, 21 ऑक्टोबर रोजी कागज के फूल (1959) या चित्रपटांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. चित्रपट पाहण्यासाठी प्रवेश विनामूल्य असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर प्रवेशिकांचे वाटप करण्यात येईल, अशी माहिती आयोजकांनी दिली आहे.

0000000

Featured post

Lakshvedhi