Showing posts with label . आरोग्य मित्र. Show all posts
Showing posts with label . आरोग्य मित्र. Show all posts

Tuesday, 17 March 2026

ई-हेल्थ व प्राथमिक आरोग्य सेवांना गती

 ई-हेल्थ व प्राथमिक आरोग्य सेवांना गती

राज्याच्या ई-संजीवनी टेलिमेडिसीन सेवेमध्ये एआय आधारित Clinical Decision Support System (CDSS) समाविष्ट करण्यात येणार आहे. यामुळे डॉक्टरांना अचूक निदान व रुग्णांच्या तक्रारींचा संक्षिप्त आढावा घेणे सुलभ होणार आहे. मधुमेही रुग्णांसाठी मधुनेत्रा’ या एआय प्रणालीद्वारे डोळ्यांच्या तपासणीस मदत होणार असून आवश्यकतेनुसार तज्ज्ञांकडे रुग्णांना संदर्भित करता येणार आहे.

हेल्थ वाणी’ या एआय आधारित संवाद सहाय्यकाच्या माध्यमातून आशाएएनएम यांसारख्या अग्रिम आरोग्य कर्मचाऱ्यांना मोबाईलवरच प्रशिक्षणमार्गदर्शन व प्रमाणित माहिती सहज उपलब्ध होणार आहे.

Sunday, 15 March 2026

राज्य शासनाने योजनेतील उपचारांच्या संख्येत 1356 वरून 2399 पर्यंत वाढ केली आहे

 मंत्री आबिटकर पुढे म्हणाले कीराज्य शासनाने योजनेतील उपचारांच्या संख्येत 1356 वरून 2399 पर्यंत वाढ केली आहे तसेच उपचारांच्या दरामध्येही वाढ केली आहे. रुग्णालय अंगीकरणाची प्रक्रिया संपूर्णपणे ऑनलाईन पारदर्शक आणि विहित कालमर्यादेत पार पाडण्यात येत आहे. रुग्णालयांनी गुणवत्ता विषयक निकष पूर्ण केल्यास अतिरिक्त प्रोत्साहन रक्कम देण्यात येत आहे. रुग्णालयांच्या दाव्यांची अदायगी कमीत कमी कालावधीत आणि नियमितपणे केली जात आहे. गेल्या सुमारे एक वर्षात घेतलेल्या सुधारणात्मक निर्णयांमुळे रुग्ण संख्येतउपचारांत आणि त्यावरील खर्चातही चांगली वाढ झाली आहे. या बाबी विचारात घेऊन महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना अधिक चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी शासन कटिबद्ध असून यामध्ये जास्तीत जास्त खाजगी रुग्णालयांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात येत आहे.

Saturday, 14 March 2026

स्थानिक स्तरावर योजनेतील उपचार उपलब्ध होणेसाठी लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे

 योजनेच्या जिल्हा समन्वयकानी स्थानिक लोकप्रतिनिधी यांचेशी समन्वय साधून काम  करावे. लोकप्रतिनिधींनी योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीवर प्रभावी पर्यवेक्षण ठेवावे. जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील जनआरोग्य समितीच्या नियमीत बैठका घेण्यासाठी लोकप्रतिनिधीनी पुढाकार घ्यावा. योजनेमध्ये सर्व शासकीय रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रे सहभागी झालेली असल्याने स्थानिक स्तरावर योजनेतील उपचार उपलब्ध होणेसाठी लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे असे आरोग्यमंत्र्यांनी आवाहन केले.


वैद्यकीय सुविधेचा लाभ सर्वसामान्य गरीब व मध्यमवर्गीय रुग्णांना मिळण्यासाठी नामांकित खासगी रुग्णालयांचा या योजनेत

 मुंबईसारख्या महानगरात उपलब्ध असलेल्या प्रगत वैद्यकीय सुविधेचा लाभ सर्वसामान्य गरीब व मध्यमवर्गीय रुग्णांना मिळण्यासाठी नामांकित खासगी रुग्णालयांचा या योजनेत सहभाग वाढणे आवश्यक  आहे. त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांना अत्याधुनिक उपचार सहज उपलब्ध होणे शक्य होईल. योजना अधिक प्रभावी राबवण्यासाठी शासनाकडून आवश्यक ते सर्व सहकार्य दिले जाईलतसेच खाजगी व धर्मादाय रुग्णालयांनीही सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन पुढाकार घ्यावाअसे आवाहन मंत्री आबिटकर यांनी केले.

मुंबई महानगर परिसरातील नामांकित खासगी रुग्णालयांनी एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेत सहभाग घ्यावा

 मुंबई महानगर परिसरातील नामांकित खासगी रुग्णालयांनी एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेत सहभाग घ्यावा :

·         सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांचे आवाहन

 

मुंबई दि.13 : मुंबई महानगर परिसरातील नामांकित खासगी रुग्णालयांनी राज्य शासनाच्या एकत्रित आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत अधिक सक्रियपणे सहभागी व्हावेअसे आवाहन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.

मुंबई महानगर परिसरातील नामांकित खासगी रुग्णालयांनी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत सहभाग घ्यावा यासाठी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक पार पडली. यावेळी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकरआमदार ज्ञानेश्वर म्हात्रेआमदार शांताराम मोरेआमदार सुलभा गायकवाडआमदार चंद्रकांत पाटीलआमदार अभिजित पाटीलआमदार मनिषा चौधरीआमदार दिलीप लांडेआमदार संजय उपाध्याय

Thursday, 12 March 2026

कर्करोग उपचाराबाबत राज्याने त्रिस्तरीय (एल 1, एल 2 आणि एल 3) व्यवस्था

 कर्करोग उपचाराबाबत राज्याने त्रिस्तरीय (एल 1, एल 2 आणि एल 3) व्यवस्था तयार केली आहे. एल 1 स्तरावर टाटा मेमोरियल हॉस्पीटल सारखी विशेष संस्था ठेवण्यात आली आहेतर एल 2 स्तरावर सुमारे 10 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये कर्करोग उपचार सुविधा विकसित केल्या जात आहेत. L3 स्तरावर इतर रुग्णालयांमध्येही उपचार व्यवस्था मजबूत केली जात आहे. त्यामुळे राज्यात कर्करोगावरील उपचार अधिक प्रभावीपणे उपलब्ध होतीलअसा विश्वास मंत्री मुश्रीफ यांनी व्यक्त केला.

            याशिवाय हाफकीन इन्स्टिट्युट येथे पुन्हा मोठ्या प्रमाणावर लस उत्पादन सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. संस्थेच्या कामकाजाबाबत करण्यात आलेल्या तक्रारींची चौकशी करून आवश्यक ती कारवाई केली जाईलअसेही त्यांनी स्पष्ट केले.

Wednesday, 11 March 2026

सांधेदुखी म्हणजे नक्की काय?

 आजकाल आपण पाहतो की, वयाची चाळीशी ओलांडली की घराघरात गुडघेदुखी, कंबरदुखी आणि सांधेदुखीचे रुग्ण आढळतात. पूर्वी हा त्रास ६०-७० वर्षांनंतर व्हायचा, पण आता तरुणांनाही 'कॅल्शियम'च्या कमतरतेमुळे हाडे ठिसूळ होण्याचा त्रास होत आहे. याचे मुख्य कारण काय? तर आपल्या शरीरातील हाडांना वंगण (Lubrication) पुरवणारा 'ग्रीस' सारखा द्रव पदार्थ सुकणे. आपल्या शरीरातील सांधे म्हणजे एखाद्या मशीनच्या बेरिंगसारखे असतात. जर त्यातील ऑईल संपले, तर दोन हाडे एकमेकांवर घासली जातात आणि प्रचंड वेदना होतात. पण काळजी करू नका! ऑपरेशनची वेळ येऊ नये यासाठी आपल्या स्वयंपाकघरात एक असा 'हाडांचा खुराक' तयार करता येतो, जो नैसर्गिकरित्या वंगण वाढवतो.


सांधेदुखी म्हणजे नक्की काय? 


साध्या भाषेत सांगायचे तर, दोन हाडांच्या मध्ये 'कार्टिलेज' नावाचा एक मऊ थर असतो. जेव्हा आपण चुकीचा आहार घेतो किंवा शरीरात पोषक घटक कमी होतात, तेव्हा हा थर झिजतो. यामुळे हाडे एकमेकांवर आदळतात, सूज येते आणि चालताना 'कट-कट' असा आवाज येतो. यालाच 'संधिवात' किंवा 'ओस्टियोआर्थराइटिस' म्हणतात.


जालीम उपाय: 


५ वस्तूंचा 'शक्तीसंगम' हा उपाय इतका प्रभावी आहे की, याला आयुर्वेदात 'अस्थि वज्र' (Bone Strengthener) म्हटले जाते. यासाठी तुम्हाला ५ गोष्टी लागतील:


१. मेथी दाणे (Fenugreek Seeds): ५० ग्रॅम

का? मेथी दाणे हे हाडांमधील सूज आणि युरिक ॲसिड कमी करण्याचे काम करतात.

२. बाभळीचा डिंक (Edible Gum/Gond): ५० ग्रॅम

का? डिंक हा हाडांमधील 'ग्रीस' म्हणजेच नैसर्गिक वंगण वाढवण्यासाठी जगातील सर्वोत्तम पदार्थ आहे.

३. अळशी (Flax Seeds): ५० ग्रॅम

का? अळशीमध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड्स असतात, जे हाडांना लवचिकता देतात.

४. सुंठ पावडर (Dry Ginger Powder): २ चमचे

का? सुंठ ही नैसर्गिक 'Painkiller' आहे, जी शरीरातील कुठल्याही भागातील वेदना खेचून घेते.

५. खारीक पावडर (Dry Dates Powder): १ कप

का? हाडांना मजबुती देण्यासाठी आणि नैसर्गिक कॅल्शियमचा पुरवठा करण्यासाठी.


मिश्रण कसे बनवाल? (कृती) 


स्टेप १: मेथी दाणे, अळशी आणि डिंक वेगवेगळे मंद आचेवर थोडे भाजून घ्या.

स्टेप २: भाजलेले घटक थंड झाल्यावर मिक्सरमध्ये त्याची बारीक पावडर करून घ्या.

स्टेप ३: या पावडरमध्ये सुंठ पावडर आणि खारीक पावडर नीट एकत्र करा.

स्टेप ४: हे मिश्रण एका कोरड्या काचेच्या बरणीत भरून ठेवा.

स्टेप ५: चवीसाठी हवे असल्यास तुम्ही यात थोडा सेंद्रिय गूळ किंवा साजूक तूप वापरून लाडूही वळू शकता.


कसे आणि कधी घ्यायचे? 


* रोज सकाळी उठल्यावर कोमट पाण्यासोबत किंवा कोमट दुधासोबत १ मोठा चमचा हे मिश्रण घ्या.

 * यानंतर १ तास चहा किंवा कॉफी पिणे टाळा जेणेकरून शरीराला पूर्ण पोषण मिळेल.

याचे फायदे (Magic Results): * वंगण वाढेल: २१ दिवसात गुडघ्यातील 'कट-कट' आवाज बंद होऊन नैसर्गिक ग्रीस वाढू लागेल.

 * कॅल्शियमचा साठा: तुमची हाडे आतून लोखंडासारखी मजबूत होतील आणि थकवा जाणवणार नाही.

 * सूज गायब: सांध्यांवरील सूज उतरून तुम्ही पुन्हा पूर्वीसारखे चालू-फिरू शकाल.

 * कंबरदुखीवर रामबाण: फक्त गुडघेच नाही, तर मान आणि कंबरदुखीमध्येही त्वरित आराम मिळेल.


कोणी घ्यावे? 


ज्यांना सांधेदुखीचा जुनाट त्रास आहे, ज्यांना जिने चढताना त्रास होतो किंवा ज्यांची हाडे कमकुवत आहेत, त्यांनी हा उपाय किमान २ महिने करावा.


डॉक्टरांचा सल्ला: हा एक घरगुती आयुर्वेदिक उपाय आहे. जर तुमचे आधीच काही गंभीर उपचार सुरू असतील, तर तुमच्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.


आपले शरीर हीच आपली खरी संपत्ती आहे. हा साधा पण प्रभावी उपाय करा आणि महागड्या शस्त्रक्रिया टाळून स्वतःच्या पायावर पुन्हा उभे राहा. ही माहिती गरजू लोकांपर्यंत नक्की पोहोचवा, कदाचित तुमच्या एका शेअरमुळे कोणाचे तरी दुखणे कायमचे दूर होईल!

Saturday, 7 March 2026

राज्यव्यापी एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा शुभारंभ

 राज्यव्यापी एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा शुभारंभ

 

गर्भाशयमुख कर्करोग प्रतिबंधासाठी राष्ट्रीय ह्युमन पॅपिलोमा व्हायरस (एचपीव्ही) लसीकरण मोहिमेचा राज्यव्यापी  शुभारंभ महिला दिनानिमित्त होत आहे. 14 वर्षे पूर्ण झालेल्या परंतु 15 वर्षे पूर्ण न झालेल्या मुलींना गार्डसिल-4’ या लसीचा एक मोफत डोस देण्यात येणार आहे. राज्यातील एकूण 9 लाख 84 हजार 414 मुलींना या मोहिमेचा लाभ मिळणार असून लसीकरण पूर्णपणे मोफत व पालकांच्या संमतीने ऐच्छिक स्वरूपात होणार आहे.

Saturday, 28 February 2026

रुग्णालयांनी दरपत्रक व रुग्ण हक्कांची माहिती प्रदर्शित करणे अनिवार्य

 रुग्णालयांनी दरपत्रक व रुग्ण हक्कांची माहिती प्रदर्शित करणे अनिवार्य

- राज्यमंत्री मेघना साकोरे- बोर्डीकर

 

मुंबई,दि. 28 : आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचारांचे दरपत्रक व रुग्णांच्या हक्कांची नोंदणी दर्शनी भागात लावणे अनिवार्य आहे. ज्या रुग्णालयांकडून हे नियम पाळले जात नाहीत. अशा रुग्णालयांवर कारवाई केली जाईलअसे आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला सांगितले.

राज्यात आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचारांचे दरपत्रक जाहीर करण्याबाबत शंकर जगताप यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला.

राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या राज्यात 1 जुलै 2024 पासून प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा फुले जन आरोग्य योजना एकत्रितपणे  राबवली जात आहे. योजनेअंतर्गत राज्यातील सुमारे अडीच कोटी कुटुंबांनाम्हणजेच 12 कोटी 50 लाख नागरिकांना रुपये 10 लाखांपर्यंतचा मोफत आरोग्य विमा कवच देण्यात आले आहे.

यापूर्वी या योजनेअंतर्गत 1369 रोगांवर उपचार उपलब्ध होतेआता ती संख्या 2299 पर्यंत वाढविण्यात आली आहे. तसेचनोंदणीकृत रुग्णालयांची संख्या 2000 वरून 4933 पर्यंत वाढली असून येत्या काळात ती 6947 रुग्णालयांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे. मुंबई आणि एमएमआर रिजनमधील मल्टीस्पेशालिटी रुग्णालये अजूनही योजनेत सामील नसल्याने त्यांना सहभागी करून घेण्यासाठी शासन पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. या रुग्णालयांचा अतिरिक्त उपचार खर्च शासन उचलण्याबाबतही विचार सुरू असल्याचे राज्यमंत्री बोर्डीकर यांनी सांगितले.

या चर्चेत विधानसभा सदस्य राहुल पाटीलअतुल भातखळकर वरुण सरदेसाईहेमंत ओगलेमनीषा चौधरी यांनी सहभाग घेतला.

Thursday, 19 February 2026

सर जे जे रुग्णालय नव्याने सुरू करण्यात आलेल्या प्रमुख सुविधा pl share

 नव्याने सुरू करण्यात आलेल्या प्रमुख सुविधा

१. अत्याधुनिक न्यूरोसर्जरी ऑपरेशन थिएटर

मेंदूतील गाठी (ब्रेन ट्यूमर) व आघातजन्य शस्त्रक्रिया

मेंदूतील रक्तस्राव व मणक्यांशी संबंधित विकारांवरील उपचार

गंभीर डोक्याच्या दुखापतींचे आपत्कालीन व्यवस्थापन

सुरक्षित न्यूरोसर्जिकल हस्तक्षेपासाठी आधुनिक तंत्रज्ञान

२. ईएनटी (कान-नाक-घसा) ऑपरेशन थिएटर

काननाक व घसा विकारांवरील शस्त्रक्रिया

टॉन्सिलेक्टॉमी शस्त्रक्रिया

कर्णपटल दुरुस्ती

आपत्कालीन ईएनटी सेवा

३. बाल शस्त्रक्रिया ऑपरेशन थिएटर

अर्भक व बालकांसाठी विशेष शस्त्रक्रिया सेवा

जन्मजात विकृतींचे सुधारात्मक उपचार

हर्निया व अस्थिरोग विषयक शस्त्रक्रिया

बालस्नेही पायाभूत सुविधांसह आपत्कालीन सेवा

४. वॉर्ड क्रमांक ११ व १८ चे आधुनिकीकरण

वैद्यकीय व शस्त्रक्रिया रुग्णांसाठी सुधारित सुविधा

शस्त्रक्रियेपूर्व व शस्त्रक्रियेनंतरची सेवा अधिक सक्षम

निरीक्षणतपासणी व पुनर्वसनासाठी सुसज्ज व्यवस्था

५. केंद्रीय निर्जंतुकीकरण सेवा विभाग (सीएसएसडी)

शस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या उपकरणांचे प्रगत निर्जंतुकीकरण

संसर्ग प्रतिबंध व नियंत्रण प्रणाली बळकट

ऑपरेशन थिएटरसाठी निर्जंतुक साहित्य पुरवठा

रुग्णालयीन स्वच्छता व सुरक्षिततेत वाढ

६. रक्तपेढी आधुनिकीकरण

रक्त साठवण व वितरण अधिक सक्षम

आपत्कालीन रक्तपुरवठा उपलब्धता

रक्त तपासणी व घटक विभाजन सुविधा

रक्तदात्यांच्या नोंदणी व प्रक्रियेत सुधारणा

७. शैक्षणिक व प्रशिक्षण सुविधा

७ वा मजला सभागृह — शैक्षणिक कार्यक्रमपरिसंवाद व संस्थात्मक उपक्रम

C.B.M.E. स्किल लॅब — सिम्युलेशन आधारित आधुनिक वैद्यकीय प्रशिक्षण

 

वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय सुरासे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

0000

सर जे जे रुग्णालय येथे अत्याधुनिक आरोग्य सुविधांचे लोकार्पण भाग १

 सर जे जे रुग्णालय येथे अत्याधुनिक आरोग्य सुविधांचे लोकार्पण

 

मुंबईदि.१८: महाराष्ट्र शासनाच्या पुढाकारातून सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत मुंबई येथील सर जे. जे. रुग्णालय समूहात विविध अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांचे लोकार्पण करण्यात आले. या नव्या सुविधा रुग्णसेवेची गुणवत्ता वाढविण्यासोबतच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील शैक्षणिक व नैदानिक प्रशिक्षण अधिक सक्षम करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहेत.

समारंभात बोलताना मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रुग्णसेवा बळकटीकरणासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांमुळे रुग्णांच्या उपचाराच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा होईलअसे त्यांनी सांगितले.

वैद्यकीय शिक्षण विभागाचे मुख्य ध्येय गुणवत्तापूर्ण वैद्यकीय शिक्षणासोबत उत्कृष्ट व परवडणारी आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे हे असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

Wednesday, 18 February 2026

रजोनिवृत्ती क्लिनिकद्वारे महिलांना अखंडित आरोग्य सेवा द्यावी

 रजोनिवृत्ती क्लिनिकद्वारे महिलांना अखंडित आरोग्य सेवा द्यावी

- आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर-साकोरे

मुंबई, दि. 18 : देशातील पहिले रजोनिवृत्ती (मेनोपॉज) क्लिनिक महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात सुरू असून या क्लिनिकद्वारे राज्यातील महिलांना अखंडित सेवा द्यावी, या अनुषंगाने महिलांची आरोग्य तपासणी करण्याचे निर्देशही आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर-साकोरे यांनी दिले.

मुंबई येथे राज्यमंत्री बोर्डीकर-साकोरे यांच्या अध्यक्षतेखाली रजोनिवृत्ती (मेनोपॉज) क्लिनिकबाबत आढावा बैठक झाली. बैठकीस आरोग्य संचालक डॉ. नितीन अंबाडेकर तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

महिलांच्या आरोग्याला प्राधान्य देत आरोग्य विभागाने राज्यात रजोनिवृत्ती क्लिनिक उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी सुरू केली आहे. 14 जानेवारी 2026 रोजी सुरू झालेल्या या उपक्रमास अल्पावधीतच राज्यभरातून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे राज्यमंत्री बोर्डीकर-साकोरे यांनी यावेळी सांगितले.

 उपक्रमांतर्गत राज्यातील सर्व जिल्हा रूग्णालये, उपजिल्हा रूग्णालये, महानगरपालिका रूग्णालये तसेच निवडक ग्रामीण रूग्णालयांमध्ये रजोनिवृत्ती क्लिनिक सुरू करण्यात आले असून दर बुधवारी रजोनिवृत्ती बाह्य रूग्ण सेवा सुरू करण्यात आली आहे. 14 जानेवारी 2026 पासून 18 फेब्रुवारी 2026 पर्यंत राज्यात 580 ठिकाणी रजोनिवृत्ती क्लिनिक कार्यरत असून, सुमारे 31,288 महिलांनी या सेवांचा लाभ घेतला आहे. यापैकी 30,034महिलांना उपचार देण्यात आले असून, 82 प्रकरणे पुढील तपासणीसाठी शिफारस समितीकडे पाठविण्यात आली आहेत.

या क्लिनिकच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी स्वतंत्र मनुष्यबळ, औषध पुरवठा, क्लिनिकसाठी स्वतंत्र कक्ष, तसेच गोपनीयता आणि सुविधा उपलब्धतेचे मूल्यांकन करण्याचे निर्देश राज्यमंत्री बोर्डीकर-साकोरे यांनी दिले. तसेच तज्ज्ञ डॉक्टर, ‘एनएचएम’ अंतर्गत इम्पॅनल डॉक्टर आणि सेवाभावी तज्ज्ञांची मदत घेऊन क्लिनिकची संख्या वाढवण्यावर भर देण्याचेही निर्देश दिले.

नोंदी स्वतंत्रपणे ठेवण्यासाठी लाईन लिस्ट व रेकॉर्ड व्यवस्थापनाची व्यवस्था करून, भविष्यात आवश्यक मदत व उपचार सुलभ व्हावा, हा त्यामागील उद्देश असल्याचे असल्याचे सांगून या क्लिनिकसंदर्भात व्यापक जनजागृती व प्रसिद्धीसाठी स्थानिक स्तरावर प्रचार करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.


000

Saturday, 7 February 2026

*लार दुनियाँ की सबसे अच्छी औषधि है,,।

 *लार दुनियाँ की सबसे अच्छी औषधि है,,।*


इसमें औषधीय गुण बहुत अधिक है। किसी चोट पर लार लगाने से चोट ठीक हो जाती है। लार पैदा होने में एक लाख ग्रन्थियों का काम होता है। जब कफ बहुत बढ़ा हुआ हो तभी आप थूक सकते हैं अन्यथा लार कभी नहीं थूकना चाहिए। सुबह की लार बहुत क्षारीय होती है। इसका PH 8.4 के आस-पास होता है।


पान बिना कत्था, सुपारी और जर्दे (तम्बाकू) का खाना चाहिए जिससे कि उसकी लार को थूकना न पड़े। कत्था और जर्दा कैंसर करता है इसलिए इसे लार के साथ अन्दर नहीं ले सकते हैं। गहरे रंग की वनस्पतियाँ कैंसर, मध् गुमेह, अस्थमा, जैसी बीमारियों से बचाती हैं। पान कफ और पित्त दोनों का नाश करता है। चूना वात का नाश करता है। जिस वनस्पति का रंग जितना ज्यादा गहरा हो वह उतनी ही बड़ी औषधि है।


देशी पान (गहरे रंग वाला जो कसेला हो) गेहूँ के दाने के बराबर चूना मिलाएं, सौंफ मिलाएं, अजवाइन डालें, लौंग, बड़ी इलायची, गुलाब के फूल का रस (गुलकन्द) मिलाकर खायें।


ब्रह्म मुहूर्त की लार अथवा सुबह उठते ही मुँह में जो लार होती है, वह बाकी के समय से ज्यादा फायदे-मन्द होती है। इसलिए सुबह उठते ही ये लार अन्दर जानी ही चाहिए।


शरीर के घाव जो कि किसी दवा से ठीक नही हो रहे हों, उन परं सुबह उठते ही अपनी बासी मुँह की लार लगानी चाहिए। 15-20 दिन में घाव भरने लगता है और 3 महीने के अन्दर घाव पूरी तरह ठीक हो जायेगा। गैंगरिन जैसी बीमारी 2 साल में ठीक हो जायेगी। जानवर अपना सब घाव चाट-चाट कर ठीक कर लेते हैं।


लार में वही 18 पोशक तत्व होते हैं जो कि मिट्टी में होते हैं। शरीर पर किसी भी प्रकार के दाग-धब्बे हो, सुबह की लार लगाते रहने से 1 साल के अन्दर सब ठीक कर देती है। एक्जिमा और सोराइसिस जैसी बीमारियों को भी सुबह की लार से ठीक कर सकते हैं। 1 साल के अन्दर परिणाम मिल जाते हैं।


सुबह की लार आँखों में लगाने से आँखों की रोशनी बढ़ती है और आँखों के चश्में उतर जाते हैं। आँखें लाल होने की बीमारी सुबह की लार लगाने से 24 घण्टे के अन्दर ठीक होती है। सुबह-सुबह की लार, आँखें टेढ़ी हो अर्थात आँखो में भेंगापन की बीमारी हो, को सही कर देती है।


आँखों के नीचे के काले धब्बों के लिए रोज सुबह की लार (बासी) लगायें। सुबह उठने के 48 मिनट के बाद मुँह की लार की क्षारीयता कम हो जाती है।


जितने भी टूथपेस्ट है सब एंटी-एल्क्लाइन है। इसमें एक केमिकल होता है, सोडियम लारेल सल्फेट जो लार की ग्रंथियों को पूरी तरह से सुखा देता है।


नीम की दातून चबाते समय बनने वाली लार को पीते रहना चाहिए।,


निवेदन: पोस्ट को ज्यादा से ज्यादा शेयर करे।


यह एक सामान्य जानकारी है कृपया डाक्टर से सलाह अवश्य ले,,,

Friday, 30 January 2026

एकत्रित आयुष्यमान भारत योजनाफ्री कॉल सेंटर सेवा सुरू करण्यात आली असून १५५३८८ / १८००२३३२२०० तसेच १४५५५ / १८००१११५६५ pl share

 योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आणि तक्रार निवारणासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा संनियंत्रण व तक्रार निवारण समिती’ कार्यान्वित करण्यात आली आहे. तसेच या कामाचा आढावा घेऊन मार्गदर्शन करण्यासाठी पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय जन आरोग्य संरक्षण कार्यकारिणी’ गठित करण्यात आली आहे.

 

रुग्णांना माहिती मिळावी किंवा सेवा मिळण्यात अडचण आल्यास संपर्क साधण्यासाठी २४ तास कार्यरत टोल फ्री कॉल सेंटर सेवा सुरू करण्यात आली असून १५५३८८ / १८००२३३२२०० तसेच १४५५५ / १८००१११५६५ हे क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

Wednesday, 28 January 2026

देशातील पहिल्या रजोनिवृत्ती क्लिनिक्सची महाराष्ट्रात सुरुवात

 देशातील पहिल्या रजोनिवृत्ती क्लिनिक्सची महाराष्ट्रात सुरुवात

- आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

महिलांच्या आरोग्य सेवेत राष्ट्रीय आदर्श

 

मुंबईदि. २७ : महिलांच्या आरोग्याला प्राधान्य देणाऱ्या दूरदर्शी उपक्रमांतर्गत महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. राज्यात शासकीय रुग्णालये व शहरी आरोग्य केंद्रांमध्ये विशेष रजोनिवृत्ती  क्लिनिक्स सुरू करण्यात आली आहेत. सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाला राज्यभरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

रजोनिवृत्ती हा स्त्रीच्या आयुष्यातील नैसर्गिक व संवेदनशील टप्पा असूनया काळात शारीरिकभावनिक व हार्मोनल बदल मोठ्या प्रमाणावर जाणवतात. हार्मोनल असंतुलनहाडांचे विकारझोपेच्या तक्रारीहृदयविकाराचा धोका तसेच मानसिक आरोग्याशी संबंधित समस्या यांसारख्या बाबींकडे सार्वजनिक आरोग्यव्यवस्थेत विशेष लक्ष देवून शासनाने रजोनिवृत्ती-केंद्रित आरोग्य सेवांना संस्थात्मक स्वरूप देत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

या रजोनिवृत्ती क्लिनिक्समध्ये महिलांसाठी एकाच छताखाली सर्वसमावेशक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यात येत असूनत्यामध्ये तज्ज्ञ वैद्यकीय सल्ला, मानसिक आरोग्य समुपदेशन, हार्मोनलहाडे व हृदयाच्या आरोग्याची तपासणी, आवश्यक उपचारऔषधे तसेच जीवनशैलीविषयक मार्गदर्शन यांचा समावेश आहे.

या सेवांचा लाभ घेतलेल्या महिलांनी समाधान व कृतज्ञता व्यक्त केली असूनहा उपक्रम आवश्यकसन्मानजनक आणि महिलांना सक्षम करणारा असल्याची भावना व्यक्त केली आहे.

विशेष बाब म्हणजेराज्यव्यापी व संघटित स्वरूपात रजोनिवृत्ती काळजी कार्यक्रम सुरू करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले असूनत्यामुळे इतर राज्यांसाठी  हा एक राष्ट्रीय आदर्श निर्माण झाला आहे. मकर संक्रांतीच्या दरम्यान या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली असूनमहिलांसाठी ही एक अर्थपूर्ण व आरोग्यकेंद्रित भेट ठरली आहे.

Tuesday, 13 January 2026

राज्यातील गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना महागड्या वैद्यकीय उपचारांचा लाभ

 त्रिपक्षीय करार

राज्यातील गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना महागड्या वैद्यकीय उपचारांचा लाभ देता यावायासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या पुढाकारातून त्रिपक्षीय करार लवकरच करण्यात येणार आहे. यात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षकॉर्पोरेट कंपनीरुग्णालय आणि काही प्रमाणात रुग्णांचे योगदान अपेक्षित असणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षात वर्षभरात केलेल्या सुधारणा प्रत्यक्ष रुग्णांपर्यंत पोहोचल्या. ऑनलाइन प्रक्रिया सोपी करणेजिल्हा कक्षांची स्थापना आणि इतर नवीन उपक्रमांमुळे हजारो रुग्णांना वेळेवर मदत मिळत आहे. आर्थिक अडचणीमुळे कोणाचाही उपचार थांबू नयेहा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संकल्प पूर्ण क्षमतेने प्रत्यक्षात उतरतो आहे.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून लाभ,जिल्हा कक्षाची स्थापना

 जिल्हा कक्षाची स्थापना

            मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून लाभ मिळवण्यासाठी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना पूर्वी मुंबईत यावे लागत असे. त्यामुळे वेळ आणि पैसा खर्च होत होता. ही अडचण कायमची दूर करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार जिल्हा कक्षाची स्थापना करण्यात आली.

Saturday, 10 January 2026

डोके आणि मानेचा कर्करोग हा गंभीर व गुंतागुंतीचा आजार असून तो तोंडाची पोकळी, घसा, आवाज

 दिलखुलास’ कार्यक्रमात डॉ. हितेश सिंघवी यांची विशेष मुलाखत

 

मुंबईदि. 5 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित आकाशवाणीवरील लोकप्रिय कार्यक्रम दिलखुलास’ मध्ये मुख व डोके-मान कर्करोग : लक्षणेनिदान आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना’ या विषयावर विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. या मुलाखतीत मुख व डोके-मान कर्करोग शस्त्रक्रिया (ऑन्कोसर्जरी) तज्ज्ञ डॉ. हितेश सिंघवी यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.

 

ही विशेष मुलाखत 7 ते 12 जानेवारी 2026 या कालावधीत दररोज सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर तसेच ‘News on AIR’ या मोबाईल अॅपवर प्रसारित होणार आहे. मुलाखत निवेदिका सुचिता गरूडे यांनी घेतली आहे.

           

डोके आणि मानेचा कर्करोग हा गंभीर व गुंतागुंतीचा आजार असून तो तलाळ ग्रंथीनाकसायनस तसेच लिम्फ नोड्स अशा डोके-मान विभागातील विविध अवयवांवर परिणाम करतो. जागतिक पातळीवर हा आजार मोठे आव्हान ठरत असून दरवर्षी मोठ्या प्रमाणात रुग्णांची वाढ होत आहे. या कर्करोगाचा रुग्णांच्या बोलण्यावरगिळण्यावरश्वसनावर तसेच चेहऱ्यावर व त्यांच्या दैनंदिन जीवनमानावर खोलवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या आजाराचे लवकर निदान अत्यंत महत्त्वाचे असून त्याद्वारे उपचार अधिक परिणामकारक ठरतात आणि संभाव्य गुंतागुंतींचा धोका कमी करता येतो. या पार्श्वभूमीवरमुख व डोके-मान कर्करोगाची प्राथमिक लक्षणेवेळेवर करण्याच्या तपासण्या तसेच या आजारापासून संरक्षणासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना याविषयी सविस्तर व शास्त्रशुद्ध माहिती डॉ. हितेश सिंघवी यांनी दिलखुलास’ कार्यक्रमात दिली आहे.

Sunday, 4 January 2026

“जन आरोग्य संरक्षण कार्यकारिणी” गठीततास कार्यरत टोल-फ्री कॉल सेंटर सेवा सुरू करण्यात आली असून. नागरिक या क्रमांकांवर संपर्क साधू शकतात — १५५३८८ / १८००२३३२२००, १४५५५ / १८००१११५६५ pl share

 योजनेची प्रभावी अंमलबजावणी आणि तक्रार निवारणासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा सनियंत्रण व तक्रार निवारण समिती तसेच पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली जन आरोग्य संरक्षण कार्यकारिणी गठीत करण्यात आली आहे. नागरिकांना योजनांविषयी माहिती सहज उपलब्ध व्हावी यासाठी २४ तास कार्यरत टोल-फ्री कॉल सेंटर सेवा सुरू करण्यात आली असून. नागरिक या क्रमांकांवर संपर्क साधू शकतात  १५५३८८ / १८००२३३२२००१४५५५ / १८००१११५६५

प्रत्येक अंगीकृत रुग्णालयात दर्शनी भागात योजना कक्ष (किऑस्क) स्थापन करणे बंधनकारक असून या कक्षात नागरिकांना मार्गदर्शन करण्यासाठी आरोग्यमित्र नियुक्त करण्यात आले आहेत. उपचार व सुविधा मिळण्यात अडचण आल्यास तक्रारींचे तात्काळ निवारण करण्याची जबाबदारी जिल्हा समन्वयकक्षेत्रीय व्यवस्थापकअंमलबजावणी सहाय्य संस्था आणि जिल्हा वैद्यकीय अधिकारी यांच्यावर निश्चित करण्यात आली आहे. त्यांच्या संपर्क क्रमांकांची माहिती प्रत्येक रुग्णालयात स्पष्टपणे प्रदर्शित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


Featured post

Lakshvedhi