Showing posts with label . आरोग्य मित्र. Show all posts
Showing posts with label . आरोग्य मित्र. Show all posts

Monday, 27 April 2026

जन आरोग्य समिती (JAS)” व “रुग्ण कल्याण समिती (RKS)” या समित्या आरोग्य संस्थांमध्ये रुग्णकेंद्रित

 त्याचप्रमाणे जन आरोग्य समिती (JAS) व रुग्ण कल्याण समिती (RKS) या समित्या आरोग्य संस्थांमध्ये रुग्णकेंद्रित सेवासेवेची गुणवत्ता व निधीच्या पारदर्शक वापरासंबंधी लक्ष ठेवण्याची भूमिका बजावतात.

ग्रामीण भागासाठी कार्यरत असलेल्या "ग्राम आरोग्‍य पोषण पाणीपुरवठा स्‍वच्‍छता समिती (VHNSC)" मध्ये अशासकीय सदस्य म्हणून  ग्रामपंचायत सरपंचग्रामपंचायत सदस्य (प्राधान्याने महिला)बचत गटतरुण मंडळवन सुरक्षा समितीमहिला मंडळ,  सामाजिक संस्थागरोदर व स्तनदा मातातीनवर्षा पर्यंतचे मुल असलेली माता व शासकिय रुग्णालयात आरोग्‍य सेवा घेणारे किंवा बरे झालेले दिर्घकालीन आजाराचे रुग्ण  यांचा सदस्य म्हणून समावेश असणे अपेक्षित आहे.

शहरी भागासाठी कार्यरत असलेल्या "महिला आरोग्य समिती (MAS)' मध्ये समाजकल्याणसामाजिक बांधिलकी व नेतृत्व कौशल्य असलेल्या स्थानिक झोपडपट्टी भागातील जास्तीत जास्त वीस महिला सदस्यांचा समावेश अपेक्षित आहे.

ग्रामीण भागातील आरोग्य उपकेंद्रा अंतर्गत "जन आरोग्य समिती" कार्यरत आहे. या समितीमध्ये ग्रामपंचायतीचे सरपंचग्राम आरोग्य पोषण पाणीपुरवठा स्वच्छता समिती (VHNSC) अध्यक्ष/महिला सदस्य,  महिला बचत गट अध्यक्ष,  शालेय आरोग्यदूतयुवाकेंद्र युवा  प्रतिनिधीक्षयरोगमुक्त नागरिकतसेच एक किंवा दोन मुलानंतर नसबंदी केलेला पुरुष यांचा विशेष निमंत्रित म्हणून समावेश अपेक्षित आहे.

Wednesday, 15 April 2026

जपानी मेंदूज्वराची वैशिष्ट्ये आणि धोका

 जपानी मेंदूज्वराची वैशिष्ट्ये आणि धोका

महाराष्ट्रात जपानी मेंदूज्वर या आजाराबाबत आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून लसीकरण व नियंत्रण उपाययोजनांना गती देण्यात आली आहे. हा आजार प्रामुख्याने डासांद्वारे पसरतो आणि मेंदूवर परिणाम करून गंभीर गुंतागुंतझटके तसेच मृत्यू होण्याची शक्यता निर्माण करतो. या आजाराचा मृत्यूदर जास्त असून वाचलेल्या रुग्णांमध्ये न्यूरोलॉजिकल समस्या उद्भवू शकतात.

 

Monday, 13 April 2026

व्यसनमुक्त समाजनिर्मितीसाठी सामूहिक प्रयत्नांची गरज

 व्यसनमुक्त समाजनिर्मितीसाठी सामूहिक प्रयत्नांची गरज

-विधानसभा अध्यक्ष  ॲड. राहुल नार्वेकर

नशामुक्त व गरीबीमुक्त समाज घडविण्याचा संकल्प केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला अधोरेखित

व्यसनमुक्तीच्या कार्यकर्त्यांचा सन्मान समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचे गौरवोद्गार

राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार वितरण कार्यक्रम

 मुंबईदि. २६ :व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी शासनाबरोबरच प्रत्येक नागरिकसंस्था आणि समाजघटकांनी जबाबदारी स्वीकारून एकत्रित प्रयत्न करणे अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी केले.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे सन २०२० ते २०२५ या पाच वर्षातील राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार वितरण सोहळा झाला. यावेळी  विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर  बोलत होते.

कार्यक्रमास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले,  सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट,  माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रेसामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव डॉ हर्षदीप कांबळे तसेच विभागाच्या आयुक्त दिपा मुधोळ-मुंडे,  कीर्तनकार सत्यपाल महाराज उपस्थित होते.

विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर म्हणाले कीसमाजात परिवर्तन घडविण्याचे काम सामाजिक न्याय विभाग प्रभावीपणे करत असूनलोकोपयोगी उपक्रमांमुळे सकारात्मक संदेश समाजात पोहोचत आहे. या सोहळ्यात  १०० हून अधिक व्यक्ती आणि १३ संस्थांचा गौरव होत असूनहे कार्य राष्ट्रनिर्मितीला बळ देणारे आहेअसे त्यांनी नमूद केले. व्यसन ही केवळ वैयक्तिक नव्हे तर सामाजिक आणि राष्ट्रीय समस्या आहे. व्यसनामुळे आर्थिक नुकसानउत्पादकतेत घटआरोग्य व्यवस्थेवर ताणगुन्हेगारीत वाढकुटुंबव्यवस्थेचे विघटन आणि शिक्षणातील गळती वाढतेअसेही त्यांनी सांगितले.

Friday, 10 April 2026

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष पुढाकाराने बालकांच्या असंसर्गजन्य आजारांवर प्रभावी नियंत्रणासाठी सामंजस्य करार

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष पुढाकाराने

बालकांच्या असंसर्गजन्य आजारांवर प्रभावी नियंत्रणासाठी सामंजस्य करार

 

मुंबईदि. 10 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष पुढाकाराने राज्यातील सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याच्या दिशेने राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने बालकांमधील असंसर्गजन्य आजारांवर (एनसीडी) प्रभावी नियंत्रणासाठी नागपूर येथील एम्सबालरोग विभागासोबत महत्त्वपूर्ण सामंजस्य करार (एमओयू) केला आहे.

Thursday, 9 April 2026

केंद्र शासनाने ही मुदतवाढ काही अटींसह दिली असून त्यानुसार खरेदी केलेला मका मानवी उपभोगासाठी योग्य

 मंत्री भुजबळ यांनी सांगितले कीकेंद्र शासनाने ही मुदतवाढ काही अटींसह दिली असून त्यानुसार खरेदी केलेला मका मानवी उपभोगासाठी योग्य असल्याचे गुणवत्ता प्रमाणपत्र आवश्यक राहणार आहे. तसेच खरेदी केलेला साठा पुढील खरेदी हंगाम सुरू होण्यापूर्वी वितरण करणे बंधनकारक असेलजेणेकरून पुनर्वापर (recycling) टाळता येईल.

Wednesday, 8 April 2026

अवयवदान ही केवळ वैद्यकीय प्रक्रिया नसून ती एका कुटुंबाकडून दुसऱ्या कुटुंबाला मिळणारी नवी

 अवयवदान ही केवळ वैद्यकीय प्रक्रिया नसून ती एका कुटुंबाकडून दुसऱ्या कुटुंबाला मिळणारी नवी आशा आहे. हे पुण्याईचे आणि नवजीवन देण्याचे कार्य असल्याचा दृष्टिकोन समाजात रुजवला गेला पाहिजेअवयवदान चळवळ अधिक लोकाभिमुख करण्याची गरज असूनदात्यांची संख्या वाढविण्यासाठी राज्यभर जनजागृतीसमुपदेशन आणि संस्थात्मक यंत्रणा उभारणे आवश्यक असल्याचे मंत्री श्री आबिटकर यांनी सांगितले.

 

Tuesday, 7 April 2026

बालकांच्या कर्करोग उपचारांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचा पुढाकार • मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष, बीपीसीएल फाऊंडेशन आणि टाटा मेमोरियल सेंटर यांच्यात सामंजस्य करार

 बालकांच्या कर्करोग उपचारांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचा पुढाकार

•       मुख्यमंत्री सहाय्यता कक्षबीपीसीएल फाऊंडेशन आणि

टाटा मेमोरियल सेंटर यांच्यात सामंजस्य करार

 

मुंबईदि.६ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष पुढाकाराने मुख्यमंत्री सहाय्यता कक्षभारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) फाऊंडेशन आणि टाटा मेमोरियल सेंटर यांच्यात बालकांच्या कर्करोगाच्या उपचारासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे.

 

या प्रकल्पाची प्रभावी आणि पारदर्शक अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता कक्ष बीपीसीएल फाउंडेशन आणि टाटा मेमोरियल सेंटर यांच्यात हा त्रिपक्षीय सामंजस्य करार करण्यात आला आहे. या कराराद्वारे सर्व संबंधित घटकांमध्ये समन्वय राखला जाईल आणि प्रकल्पाच्या अंमलबजावणीस गती मिळणार आहे  तसेचप्रस्तावात नमूद केलेल्या कार्यक्षेत्र आणि जबाबदाऱ्यांना सर्व संबंधितांनी मान्यता दिली असूनअंतिम सामंजस्य कराराध्ये ठरविण्यात येणाऱ्या अटी व शर्तींचे पालन करण्याबाबत सहमती दर्शविण्यात आली आहे.

Wednesday, 1 April 2026

माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ या अभियानाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे उपचारांपेक्षा प्रतिबंधावर भर

 माझं गावआरोग्यसंपन्न गाव’ या अभियानाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे उपचारांपेक्षा प्रतिबंधावर भरहे आहे. ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्यविषयक सामाजिक वर्तणुकीत सकारात्मक बदल घडवून आणणे आणि त्यांच्यात आरोग्यदायी जीवनशैली रुजवणे हे या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट आहे. यामध्ये फक्त आजारांवर उपचार करण्यापेक्षा ते होऊ नयेत यासाठी सार्वजनिक स्वच्छताशुद्ध पाणीपुरवठासांडपाणी व्यवस्थापन आणि पोषण यासारख्या मूलभूत घटकांवरही विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे. संसर्गजन्य आजारांसोबतच बदलत्या जीवनशैलीमुळे उद्भवणारे असंसर्गजन्य आजारमाता-बाल आरोग्य आणि मानसिक आरोग्य यासारख्या विषयांनाही या मोहिमेत सामावून घेण्यात आले आहे. या अभियानात ग्रामपंचायतीपासून ते जिल्हा परिषदेच्या आरोग्य यंत्रणा सक्रियपणे सहभागी होणार आहेत. गावागावात स्वच्छतेचा आणि आरोग्याचा जागर करून आरोग्यदायी गाव ही संकल्पना राबवण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असणार आहे.

Tuesday, 31 March 2026

माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ या अभियानाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे उपचारांपेक्षा प्रतिबंधावर भर

 माझं गावआरोग्यसंपन्न गाव’ या अभियानाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे उपचारांपेक्षा प्रतिबंधावर भरहे आहे. ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्यविषयक सामाजिक वर्तणुकीत सकारात्मक बदल घडवून आणणे आणि त्यांच्यात आरोग्यदायी जीवनशैली रुजवणे हे या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट आहे. यामध्ये फक्त आजारांवर उपचार करण्यापेक्षा ते होऊ नयेत यासाठी सार्वजनिक स्वच्छताशुद्ध पाणीपुरवठासांडपाणी व्यवस्थापन आणि पोषण यासारख्या मूलभूत घटकांवरही विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे. संसर्गजन्य आजारांसोबतच बदलत्या जीवनशैलीमुळे उद्भवणारे असंसर्गजन्य आजारमाता-बाल आरोग्य आणि मानसिक आरोग्य यासारख्या विषयांनाही या मोहिमेत सामावून घेण्यात आले आहे. या अभियानात ग्रामपंचायतीपासून ते जिल्हा परिषदेच्या आरोग्य यंत्रणा सक्रियपणे सहभागी होणार आहेत. गावागावात स्वच्छतेचा आणि आरोग्याचा जागर करून आरोग्यदायी गाव ही संकल्पना राबवण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असणार आहे.

Wednesday, 25 March 2026

ठाण्यात ‘मॅन-सिक’ मानसिक आरोग्य जनजागृती उपक्रम उत्साहात संपन्न “मौन सोडू, संवाद साधू”च्या माध्यमातून मानसिक आरोग्याबाबत जागृती तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून गैरसमज दूर


 ठाण्यात ‘मॅन-सिक’ मानसिक आरोग्य जनजागृती उपक्रम उत्साहात संपन्न

 

 मौन सोडू, संवाद साधूच्या माध्यमातून मानसिक आरोग्याबाबत जागृती

 तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून गैरसमज दूर

ठाणे, दि. 25 (विमाका) :- नागरिकांमध्ये मानसिक आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला ‘मॅन-सिक’ हा सार्वजनिक जनजागृती उपक्रम ठाणे महानगरपालिका सभागृह येथे उत्साहात व यशस्वीपणे पार पडला.

जिल्हा माहिती कार्यालय, ठाणे तसेच ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमास ठाणे जिल्हा पत्रकार संघ, ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ, वेसाक इंडिया आणि रिझोनांझ कम्यूनिकेशन्स  यांचे सहकार्य लाभले.

या कार्यशाळेस प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले ठाणे प्रादेशिक रुग्णालयाचे  मानसोपचारतज्ञ डॉ. अमोल भुसारे यांनी मार्गदर्शन केले. मौन सोडू, संवाद साधू तसेच जाणिवेतून जागृतीकडे या संकल्पनांवर आधारित या कार्यक्रमात मानसिक आरोग्याविषयी खुले व सकारात्मक संवाद घडवून आणण्यावर विशेष भर देण्यात आला. कार्यक्रमादरम्यान ‘मॅन-सिक  सिनेमॅटिक इनिशिएटिव्ह’ अंतर्गत सादर करण्यात आलेल्या लघुपटांनी उपस्थितांच्या मनावर प्रभाव टाकत मानसिक आरोग्याबाबत सहानुभूती आणि जाणीव निर्माण केली.

तसेच तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित संवादात्मक सत्रांमधून मानसिक आरोग्याशी संबंधित विविध पैलूंवर सखोल चर्चा करण्यात आली. या चर्चांमुळे मानसिक आरोग्याबाबत समाजात प्रचलित असलेले गैरसमज दूर होण्यास मदत झाली.

या उपक्रमाच्या माध्यमातून समाजात मानसिक आरोग्याबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होऊन अधिक संवेदनशील, जागरूक आणि कलंकमुक्त वातावरण निर्माण करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

या कार्यक्राचे सूत्रसंचलन कोकण विभागीय माहिती कार्यालयाच्या सहायक संचालक (माहिती) संजीवनी जाधव-पाटील यांनी केले.

कार्यक्रमास रेझोनासचे कम्युनिकेशनचे समीर निगुडकर, वैभव सावंत, राज्य अधिस्वकृतीचे सदस्य संजय पितळे नागरिक, पत्रकार, विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

*****

Tuesday, 24 March 2026

एआय आधारित व्हलनरेबिलिटी मॅपिंगद्वारे निवडण्यात आलेल्या ११,०९१ जोखीमग्रस्त गावे व शहरी वॉर्डमध्ये विशेष तपासणी मोहीम

 या मोहिमेअंतर्गत एआय आधारित व्हलनरेबिलिटी मॅपिंगद्वारे निवडण्यात आलेल्या ११,०९१ जोखीमग्रस्त गावे व शहरी वॉर्डमध्ये विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. पारंपरिक लक्षणांवर आधारित तपासणीऐवजी जोखीमग्रस्त लोकसंख्येची सक्रीय तपासणी करण्यावर भर देण्यात येणार आहे. नि-क्षय पोर्टलवरील एआय विश्लेषणाच्या आधारे सूक्ष्म नियोजन व रूट मॅपिंग करण्यात आले असूनवृद्धमधुमेहीकुपोषितपीएलएचआयव्हीक्षयरुग्णांचे संपर्कस्थलांतरित व झोपडपट्टीतील नागरिकांची १००% तपासणी सुनिश्चित केली जाणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित हाताने वापरता येणारे क्ष-किरण यंत्रणांद्वारे जलद तपासणी करून संशयित रुग्णांना तत्काळ एनएएटी चाचणीसाठी पाठविण्यात येणार आहे. दुर्गम व आदिवासी भागांमध्ये नि-क्षय मोबाईल युनिटद्वारे सेवा पोहोचविण्यात येतील.

Saturday, 21 March 2026

बदलत्या जीवनशैलीमुळे जगभरातील लोकांना स्थूलपणाचा तसेच त्यासोबत येणारा उच्च रक्तदाब, मधुमेहासारख्या

 बदलत्या जीवनशैलीमुळे जगभरातील लोकांना स्थूलपणाचा तसेच त्यासोबत येणारा उच्च रक्तदाबमधुमेहासारख्या आजारांचा सामना करावा लागत आहे. त्यावर 'पौष्टिक तृणधान्यरामबाण उपाय ठरू शकतात. आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षामुळे देशभर तृणधान्याबाबत जागरूकता निर्माण झाली आहे. विशेषतः सामान्य ग्राहकांमधूनही मागणी वाढत आहे. यामुळे राज्यात तृणधान्यापासून उत्पादने तयार करणारे नवउद्योजक मोठ्या प्रमाणात तयार झाले आहेत. या उत्पादनांची प्रसिद्धीग्राहकांमध्ये जागरुकता व बाजार साखळी तयार करणे यावर भर देण्यात येणार असल्याचे मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले.

Friday, 20 March 2026

राज्यात महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये आयुष्मान भारत योजना समाविष्ट pl share

 राज्यात महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये आयुष्मान भारत योजना समाविष्ट केल्यानंतर उपचारासाठी समाविष्ट आजारांची संख्या वाढविण्यात आली असून त्यानुसार उपचार पॅकेजेसमध्येही वाढ करण्यात आली आहे. योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी एआय,च्या माध्यमातून तक्रारींचे परीक्षण करून तत्काळ कारवाई केली जात असल्याचेही मंत्री आबिटकर यांनी सांगितले.

तसेच योजनांच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवण्यासाठी लोकप्रतिनिधींच्या सहभागातून समिती स्थापन करण्यात आली असून पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली दर तीन महिन्यांनी जिल्हास्तरावर आढावा बैठक घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

योजनेंतर्गत रुग्णांकडून अतिरिक्त पैसे घेतल्याचे आढळल्यास संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्यात येईल. वारंवार चुका करणाऱ्या रुग्णालयांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची कार्यवाहीही करण्यात येईलअसेही मंत्री आबिटकर यांनी स्पष्ट केले.

Tuesday, 17 March 2026

ई-हेल्थ व प्राथमिक आरोग्य सेवांना गती

 ई-हेल्थ व प्राथमिक आरोग्य सेवांना गती

राज्याच्या ई-संजीवनी टेलिमेडिसीन सेवेमध्ये एआय आधारित Clinical Decision Support System (CDSS) समाविष्ट करण्यात येणार आहे. यामुळे डॉक्टरांना अचूक निदान व रुग्णांच्या तक्रारींचा संक्षिप्त आढावा घेणे सुलभ होणार आहे. मधुमेही रुग्णांसाठी मधुनेत्रा’ या एआय प्रणालीद्वारे डोळ्यांच्या तपासणीस मदत होणार असून आवश्यकतेनुसार तज्ज्ञांकडे रुग्णांना संदर्भित करता येणार आहे.

हेल्थ वाणी’ या एआय आधारित संवाद सहाय्यकाच्या माध्यमातून आशाएएनएम यांसारख्या अग्रिम आरोग्य कर्मचाऱ्यांना मोबाईलवरच प्रशिक्षणमार्गदर्शन व प्रमाणित माहिती सहज उपलब्ध होणार आहे.

Sunday, 15 March 2026

राज्य शासनाने योजनेतील उपचारांच्या संख्येत 1356 वरून 2399 पर्यंत वाढ केली आहे

 मंत्री आबिटकर पुढे म्हणाले कीराज्य शासनाने योजनेतील उपचारांच्या संख्येत 1356 वरून 2399 पर्यंत वाढ केली आहे तसेच उपचारांच्या दरामध्येही वाढ केली आहे. रुग्णालय अंगीकरणाची प्रक्रिया संपूर्णपणे ऑनलाईन पारदर्शक आणि विहित कालमर्यादेत पार पाडण्यात येत आहे. रुग्णालयांनी गुणवत्ता विषयक निकष पूर्ण केल्यास अतिरिक्त प्रोत्साहन रक्कम देण्यात येत आहे. रुग्णालयांच्या दाव्यांची अदायगी कमीत कमी कालावधीत आणि नियमितपणे केली जात आहे. गेल्या सुमारे एक वर्षात घेतलेल्या सुधारणात्मक निर्णयांमुळे रुग्ण संख्येतउपचारांत आणि त्यावरील खर्चातही चांगली वाढ झाली आहे. या बाबी विचारात घेऊन महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना अधिक चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी शासन कटिबद्ध असून यामध्ये जास्तीत जास्त खाजगी रुग्णालयांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात येत आहे.

Saturday, 14 March 2026

स्थानिक स्तरावर योजनेतील उपचार उपलब्ध होणेसाठी लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे

 योजनेच्या जिल्हा समन्वयकानी स्थानिक लोकप्रतिनिधी यांचेशी समन्वय साधून काम  करावे. लोकप्रतिनिधींनी योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीवर प्रभावी पर्यवेक्षण ठेवावे. जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील जनआरोग्य समितीच्या नियमीत बैठका घेण्यासाठी लोकप्रतिनिधीनी पुढाकार घ्यावा. योजनेमध्ये सर्व शासकीय रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रे सहभागी झालेली असल्याने स्थानिक स्तरावर योजनेतील उपचार उपलब्ध होणेसाठी लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे असे आरोग्यमंत्र्यांनी आवाहन केले.


वैद्यकीय सुविधेचा लाभ सर्वसामान्य गरीब व मध्यमवर्गीय रुग्णांना मिळण्यासाठी नामांकित खासगी रुग्णालयांचा या योजनेत

 मुंबईसारख्या महानगरात उपलब्ध असलेल्या प्रगत वैद्यकीय सुविधेचा लाभ सर्वसामान्य गरीब व मध्यमवर्गीय रुग्णांना मिळण्यासाठी नामांकित खासगी रुग्णालयांचा या योजनेत सहभाग वाढणे आवश्यक  आहे. त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांना अत्याधुनिक उपचार सहज उपलब्ध होणे शक्य होईल. योजना अधिक प्रभावी राबवण्यासाठी शासनाकडून आवश्यक ते सर्व सहकार्य दिले जाईलतसेच खाजगी व धर्मादाय रुग्णालयांनीही सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन पुढाकार घ्यावाअसे आवाहन मंत्री आबिटकर यांनी केले.

मुंबई महानगर परिसरातील नामांकित खासगी रुग्णालयांनी एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेत सहभाग घ्यावा

 मुंबई महानगर परिसरातील नामांकित खासगी रुग्णालयांनी एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेत सहभाग घ्यावा :

·         सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांचे आवाहन

 

मुंबई दि.13 : मुंबई महानगर परिसरातील नामांकित खासगी रुग्णालयांनी राज्य शासनाच्या एकत्रित आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत अधिक सक्रियपणे सहभागी व्हावेअसे आवाहन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.

मुंबई महानगर परिसरातील नामांकित खासगी रुग्णालयांनी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत सहभाग घ्यावा यासाठी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक पार पडली. यावेळी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकरआमदार ज्ञानेश्वर म्हात्रेआमदार शांताराम मोरेआमदार सुलभा गायकवाडआमदार चंद्रकांत पाटीलआमदार अभिजित पाटीलआमदार मनिषा चौधरीआमदार दिलीप लांडेआमदार संजय उपाध्याय

Thursday, 12 March 2026

कर्करोग उपचाराबाबत राज्याने त्रिस्तरीय (एल 1, एल 2 आणि एल 3) व्यवस्था

 कर्करोग उपचाराबाबत राज्याने त्रिस्तरीय (एल 1, एल 2 आणि एल 3) व्यवस्था तयार केली आहे. एल 1 स्तरावर टाटा मेमोरियल हॉस्पीटल सारखी विशेष संस्था ठेवण्यात आली आहेतर एल 2 स्तरावर सुमारे 10 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये कर्करोग उपचार सुविधा विकसित केल्या जात आहेत. L3 स्तरावर इतर रुग्णालयांमध्येही उपचार व्यवस्था मजबूत केली जात आहे. त्यामुळे राज्यात कर्करोगावरील उपचार अधिक प्रभावीपणे उपलब्ध होतीलअसा विश्वास मंत्री मुश्रीफ यांनी व्यक्त केला.

            याशिवाय हाफकीन इन्स्टिट्युट येथे पुन्हा मोठ्या प्रमाणावर लस उत्पादन सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. संस्थेच्या कामकाजाबाबत करण्यात आलेल्या तक्रारींची चौकशी करून आवश्यक ती कारवाई केली जाईलअसेही त्यांनी स्पष्ट केले.

Wednesday, 11 March 2026

सांधेदुखी म्हणजे नक्की काय?

 आजकाल आपण पाहतो की, वयाची चाळीशी ओलांडली की घराघरात गुडघेदुखी, कंबरदुखी आणि सांधेदुखीचे रुग्ण आढळतात. पूर्वी हा त्रास ६०-७० वर्षांनंतर व्हायचा, पण आता तरुणांनाही 'कॅल्शियम'च्या कमतरतेमुळे हाडे ठिसूळ होण्याचा त्रास होत आहे. याचे मुख्य कारण काय? तर आपल्या शरीरातील हाडांना वंगण (Lubrication) पुरवणारा 'ग्रीस' सारखा द्रव पदार्थ सुकणे. आपल्या शरीरातील सांधे म्हणजे एखाद्या मशीनच्या बेरिंगसारखे असतात. जर त्यातील ऑईल संपले, तर दोन हाडे एकमेकांवर घासली जातात आणि प्रचंड वेदना होतात. पण काळजी करू नका! ऑपरेशनची वेळ येऊ नये यासाठी आपल्या स्वयंपाकघरात एक असा 'हाडांचा खुराक' तयार करता येतो, जो नैसर्गिकरित्या वंगण वाढवतो.


सांधेदुखी म्हणजे नक्की काय? 


साध्या भाषेत सांगायचे तर, दोन हाडांच्या मध्ये 'कार्टिलेज' नावाचा एक मऊ थर असतो. जेव्हा आपण चुकीचा आहार घेतो किंवा शरीरात पोषक घटक कमी होतात, तेव्हा हा थर झिजतो. यामुळे हाडे एकमेकांवर आदळतात, सूज येते आणि चालताना 'कट-कट' असा आवाज येतो. यालाच 'संधिवात' किंवा 'ओस्टियोआर्थराइटिस' म्हणतात.


जालीम उपाय: 


५ वस्तूंचा 'शक्तीसंगम' हा उपाय इतका प्रभावी आहे की, याला आयुर्वेदात 'अस्थि वज्र' (Bone Strengthener) म्हटले जाते. यासाठी तुम्हाला ५ गोष्टी लागतील:


१. मेथी दाणे (Fenugreek Seeds): ५० ग्रॅम

का? मेथी दाणे हे हाडांमधील सूज आणि युरिक ॲसिड कमी करण्याचे काम करतात.

२. बाभळीचा डिंक (Edible Gum/Gond): ५० ग्रॅम

का? डिंक हा हाडांमधील 'ग्रीस' म्हणजेच नैसर्गिक वंगण वाढवण्यासाठी जगातील सर्वोत्तम पदार्थ आहे.

३. अळशी (Flax Seeds): ५० ग्रॅम

का? अळशीमध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड्स असतात, जे हाडांना लवचिकता देतात.

४. सुंठ पावडर (Dry Ginger Powder): २ चमचे

का? सुंठ ही नैसर्गिक 'Painkiller' आहे, जी शरीरातील कुठल्याही भागातील वेदना खेचून घेते.

५. खारीक पावडर (Dry Dates Powder): १ कप

का? हाडांना मजबुती देण्यासाठी आणि नैसर्गिक कॅल्शियमचा पुरवठा करण्यासाठी.


मिश्रण कसे बनवाल? (कृती) 


स्टेप १: मेथी दाणे, अळशी आणि डिंक वेगवेगळे मंद आचेवर थोडे भाजून घ्या.

स्टेप २: भाजलेले घटक थंड झाल्यावर मिक्सरमध्ये त्याची बारीक पावडर करून घ्या.

स्टेप ३: या पावडरमध्ये सुंठ पावडर आणि खारीक पावडर नीट एकत्र करा.

स्टेप ४: हे मिश्रण एका कोरड्या काचेच्या बरणीत भरून ठेवा.

स्टेप ५: चवीसाठी हवे असल्यास तुम्ही यात थोडा सेंद्रिय गूळ किंवा साजूक तूप वापरून लाडूही वळू शकता.


कसे आणि कधी घ्यायचे? 


* रोज सकाळी उठल्यावर कोमट पाण्यासोबत किंवा कोमट दुधासोबत १ मोठा चमचा हे मिश्रण घ्या.

 * यानंतर १ तास चहा किंवा कॉफी पिणे टाळा जेणेकरून शरीराला पूर्ण पोषण मिळेल.

याचे फायदे (Magic Results): * वंगण वाढेल: २१ दिवसात गुडघ्यातील 'कट-कट' आवाज बंद होऊन नैसर्गिक ग्रीस वाढू लागेल.

 * कॅल्शियमचा साठा: तुमची हाडे आतून लोखंडासारखी मजबूत होतील आणि थकवा जाणवणार नाही.

 * सूज गायब: सांध्यांवरील सूज उतरून तुम्ही पुन्हा पूर्वीसारखे चालू-फिरू शकाल.

 * कंबरदुखीवर रामबाण: फक्त गुडघेच नाही, तर मान आणि कंबरदुखीमध्येही त्वरित आराम मिळेल.


कोणी घ्यावे? 


ज्यांना सांधेदुखीचा जुनाट त्रास आहे, ज्यांना जिने चढताना त्रास होतो किंवा ज्यांची हाडे कमकुवत आहेत, त्यांनी हा उपाय किमान २ महिने करावा.


डॉक्टरांचा सल्ला: हा एक घरगुती आयुर्वेदिक उपाय आहे. जर तुमचे आधीच काही गंभीर उपचार सुरू असतील, तर तुमच्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.


आपले शरीर हीच आपली खरी संपत्ती आहे. हा साधा पण प्रभावी उपाय करा आणि महागड्या शस्त्रक्रिया टाळून स्वतःच्या पायावर पुन्हा उभे राहा. ही माहिती गरजू लोकांपर्यंत नक्की पोहोचवा, कदाचित तुमच्या एका शेअरमुळे कोणाचे तरी दुखणे कायमचे दूर होईल!

Featured post

Lakshvedhi