Showing posts with label . आरोग्य मित्र. Show all posts
Showing posts with label . आरोग्य मित्र. Show all posts

Sunday, 27 April 2025

गार पाण्याचे दुष्परिणाम*

 *गार पाण्याचे दुष्परिणाम*



गार पाणी पिण्याचे दुष्परिणाम खालीलप्रमाणे आहेत:


 *पचनक्रिया मंदावते:*

 गार पाणी प्यायल्याने पचनक्रिया मंदावते. त्यामुळे अन्न पचायला वेळ लागतो आणि अपचन, गॅस, ॲसिडिटी यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.


 *घसा खवखवणे:*

 गार पाणी प्यायल्याने घसा खवखवण्याची समस्या उद्भवू शकते. थंड पाणी प्यायल्याने घशातील रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, ज्यामुळे घसा खवखवतो.


 *हृदयावर परिणाम:*

गार पाणी प्यायल्याने हृदयाची गती कमी होते. यामुळे हृदयावर ताण येतो आणि हृदयाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.


 *डोकेदुखी:*

 गार पाणी प्यायल्याने डोकेदुखी होऊ शकते. थंड पाणी प्यायल्याने मेंदूतील रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, ज्यामुळे डोकेदुखी होते.


 *शरीरातील पोषक तत्वे कमी होतात:* 

गार पाणी प्यायल्याने शरीरातील पोषक तत्वे कमी होतात. गार पाणी प्यायल्याने शरीरातील रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, ज्यामुळे शरीराला आवश्यक पोषक तत्वे मिळत नाहीत.


 *वजन वाढणे:* गार पाणी प्यायल्याने वजन वाढू शकते. गार पाणी प्यायल्याने शरीरातील चरबी पचायला वेळ लागतो, ज्यामुळे वजन वाढते.


 *रोगप्रतिकारशक्ती कमी होते:* 

गार पाणी प्यायल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी होते. थंड पाणी प्यायल्याने शरीरातील पांढऱ्या रक्तपेशींची संख्या कमी होते, ज्यामुळे शरीराला रोगांशी लढणे कठीण होते.


 *सांधेदुखी:* 

गार पाणी प्यायल्याने सांधेदुखी वाढू शकते. थंड पाणी प्यायल्याने सांध्यांमधील रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, ज्यामुळे सांध्यांमध्ये वेदना होतात.


 *सर्दी आणि खोकला:*

 गार पाणी प्यायल्याने सर्दी आणि खोकला होऊ शकतो. थंड पाणी प्यायल्याने घशातील श्लेष्मा जाड होतो, ज्यामुळे सर्दी आणि खोकला होतो.


 *मासिक पाळीतील समस्या:*

 मासिक पाळीच्या दरम्यान गार पाणी प्यायल्याने महिलांना अधिक त्रास होऊ शकतो. थंड पाणी प्यायल्याने गर्भाशयातील रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, ज्यामुळे मासिक पाळीत अधिक वेदना होतात.


 *अन्नातील पोषक तत्वे शोषण्यास अडथळा:*

 गार पाणी प्यायल्याने शरीराला अन्नातील पोषक तत्वे शोषण्यास त्रास होतो. थंड पाणी प्यायल्याने पचनक्रिया मंदावते, ज्यामुळे शरीराला अन्नातील पोषक तत्वे शोषण्यास त्रास होतो.


 *शरीरातील ऊर्जा कमी होते:* 

गार पाणी प्यायल्याने शरीरातील ऊर्जा कमी होते. थंड पाणी प्यायल्याने शरीरातील चयापचय क्रिया मंदावते, ज्यामुळे शरीराला ऊर्जा कमी मिळते.


*इतर काही माहिती:*

 * आयुर्वेदानुसार, गार पाणी पचनसंस्थेसाठी हानिकारक आहे.

 * विशेषतः जेवल्यानंतर गार पाणी पिणे टाळावे.

 * उन्हाळ्यात माठातील थंड पाणी पिणे चांगले.


कृपया वाचून झाल्यावर आपल्या जवळ जी मित्रमंडळी असतील त्या सर्व लोकांना पाठवा...

*माहिती आवडली तर इतर ग्रुप वर शेअर करा 🙏*

=================

*(कॉपी पेस्ट)*


 *आयुर्वेदिक घरगुती उपाय व आरोग्य विषयक नवनवीन माहिती रोज आपल्या मोबाईल वर मिळवण्यासाठी खालील लिंकला टच करा व ग्रुप मध्ये join व्हा👇किंवा 9545473658 ह्या नंबर वर join me असा मेसेज करा*



https://chat.whatsapp.com/FmfxsLDoHRoFrDll0eiFpi



👆👆👆👆👆👆👆👆



*ही 

अपघातग्रस्त रुग्णांसाठी एक लाख रुपयांपर्यंतचे कॅशलेस उपचार -,रुग्णालयांची माहिती, बेडची उपलब्धता आणि तक्रारी नोंदविण्यासाठी स्वतंत्र मोबाईल ॲप विकसित करण्याचा निर्णय

 अपघातग्रस्त रुग्णांसाठी एक लाख रुपयांपर्यंतचे कॅशलेस उपचार

-         सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

रुग्णालयांची माहितीबेडची उपलब्धता आणि तक्रारी नोंदविण्यासाठी

स्वतंत्र मोबाईल ॲप विकसित करण्याचा निर्णय

 

मुंबईदि १८ : रुग्णांना वेळेवर दर्जेदार तसेच कॅशलेस उपचार मिळावेत यासाठी रुग्णालयेसोसायटीचे अधिकारी व अंमलबजावणी संस्थांना कठोर दक्षता बाळगावी. यात गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. तसेच अपघातग्रस्त रुग्णांसाठी एक लाख रुपयांपर्यंतचे कॅशलेस उपचार अंगीकृत व अन्य तातडीच्या रुग्णालयांमधून देण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने कार्यवाही करावीअसे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.

राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या वरळीमुंबई येथील मुख्यालयात आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनांच्या कामकाजाचा आढावा मंत्री श्री. आबिटकर यांनी घेतला. यावेळी आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटेराज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब चव्हाणउपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.दयानंद जगतापसार्वजनिक आरोग्य विभागाचे सहसचिव अशोक आत्रामसहायक संचालक डॉ.रवींद्र शेटे आदि उपस्थित होते.

बैठकी दरम्यान मंत्री श्री.आबिटकर यांनी या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. यामध्ये योजनेतील अंगीकृत रुग्णालयांची संख्या १७९२ वरून ४१८० पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत ही निवड प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबविण्याचे त्यांनी आदेश दिले.

या योजनेतील उपचार संख्येत वाढदरामध्ये सुधारणाअवयव प्रत्यारोपणासारखे महागडे उपचार समाविष्ट करणेतसेच प्राथमिक आरोग्य सेवाही योजनेत समाविष्ट करण्यासाठी अभ्यास समिती गठित करण्यात आली असून एक महिन्याच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश मंत्री श्री.आबिटकर यांनी यावेळी दिले. जनतेसाठी योजनेतील रुग्णालयांची माहितीबेडची उपलब्धता आणि तक्रारी नोंदविण्यासाठी स्वतंत्र मोबाईल ॲप विकसित करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. प्रत्येक अंगीकृत रुग्णालयाने दर महिन्याला एक आरोग्य शिबिर आयोजित करून किमान पाच रुग्णांवर कॅशलेस उपचार करावेतअशा शिबिरात लोकप्रतिनिधींना सहभागी करून घेऊन त्याची पूर्वप्रसिद्धी करावीअसे मंत्री श्री.आबिटकर यांनी यावेळी सांगितले.

योजनेच्या अंमलबजावणीसाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरावर समित्या स्थापन करून त्यांच्या बैठका त्वरित आयोजित करण्यात याव्यात. तसेच आयुष्मान कार्ड वाटप मोहिमेस गती देण्यासाठी आशा वर्करअंगणवाडी सेविकारेशन दुकानदार आणि नागरी सेवा केंद्रांच्या माध्यमातून वाटप करण्याची योजना आखण्यात आली आहे. या कार्यासाठी त्यांना मिळणाऱ्या मानधनात वाढ करण्याचे निर्देशही मंत्री. श्री.आबिटकर यांनी यावेळी दिले.

रुग्णालयांना मार्च महिन्यापासून सुमारे १,३०० कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आल्याचे सांगूनयापुढेही आवश्यक निधी वेळोवेळी दिला जाईल. या महत्त्वाकांक्षी योजनेची अंमलबजावणी पूर्ण पारदर्शकपणे केली जावी आणि कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार सहन केला जाणार नाहीअसे स्पष्ट निर्देश आरोग्यमंत्री श्री.आबिटकर यांनी यावेळी दिले.

000

*रुग्ण हक्क परिषद मुंबई प्रदेश* संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण, एक सत्कार्य करा जास्तीजास्त मित्र नातेवाईक यांना शेअर pl

 *📢अत्यंत महत्त्वाची सूचना*

                


*रुग्ण हक्क परिषद मुंबई प्रदेश*

 संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण


1) हिंदुजा हॉस्पिटल

2) कोकिलाबेन हॉस्पिटल

3) जसलोक हॉस्पिटल

4) दि. बॉम्बे हॉस्पिटल 

5) लीलावती हॉस्पिटल

6) ब्रीच कँडी हॉस्पिटल

7) केईएम हॉस्पिटल

8) टाटा हॉस्पिटल

9) नानावटी हॉस्पिटल

10) दि. बांद्रा होली फॅमिली हॉस्पिटल

11) हिरानंदानी हॉस्पिटल

12) होली स्पिरिट हॉस्पिटल


          या किंवा अश्या महागड्या पंचतारांकित चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील, गरीब  रुग्णांचे सर्व बिल माफ करून दिले जाईल. *यासाठी संपर्क - सौ. वीणा सोनार, दादर, मुंबई - 400028 केव्हाही संपर्क साधा. मो.* 7028982041


 *आवश्यक कागदपत्रे-*

1) 2 फोटो

2) आधार कार्ड

3) रेशन कार्ड

4) उत्पन्नाचा दाखला

5) हॉस्पिटलचे इस्टिमेट

6) रोग निदान झाल्याचे रिपोर्ट


*🙏🙏कृपया ही पोष्ट जास्तीत जास्त ग्रुप वर शेयर करून आपल्या समाज बांधवांपर्यंत पोहचवावी ही विनंती.*


*धन्यवाद*



🙏 कोणाला वैद्यकीय आर्थिक मदत हवी असल्यास

 खालील ट्रस्टशी संपर्क साधा...


 🙏सर रतन टाटा ट्रस्ट बॉम्बे हाऊस, होमी मोदी स्ट्रीट, मुंबई 400 001 कॉल: 022-66658282


 🙏रिलायन्स फाउंडेशन (पूर्वी अंबानी पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट) 222 मेकर चेंबर्स IV, 3रा मजला, नरिमन पॉइंट, मुंबई - 400021 कॉल करा: 022-44770000, 022-30325000


 🙏अमिरीलाल घेलाभाई चॅरिटेबल ट्रस्ट 71, गीतांजली, 73/75, वाळकेश्वर रोड, मुंबई - 400006


 🙏आशा किरण चॅरिटेबल ट्रस्ट C/o Radium Keysoft Solutions Ltd, कॉल करा: 022-26358290 101, रायगड दर्शन, इंडियन ऑइल कॉलनी समोर, जेपी रोड, अंधेरी (w) मुंबई 400 053


 🙏अस्पी चॅरिटेबल ट्रस्ट C/o अमेरिकन स्प्रिंग अँड प्रेसिंग वर्क्स प्रा.  Ltd P.O.  बॉक्स क्र. 7602, आदर्श गृहनिर्माण संस्था.  रोड, मालाड (प), मुंबई ४०० ०६४ ,


 🙏ऑरेड चॅरिटेबल ट्रस्ट 1-बी-1 गिरीराज, अल्टामाउंट रोड मुंबई 400 026, कॉल करा: 022-23821452, 022-24926721


 🙏B.  अरुणकुमार अँड कंपनी 1616, प्रसाद चेंबर्स, ऑपेरा हाऊस, मुंबई - 400004


 🙏बी डी बांगुर ट्रस्ट C/o कार्बन एव्हरफ्लो लि. बखावर, दुसरा मजला, नरिमन पॉइंट मुंबई 400021


 🙏बॉम्बे कम्युनिटी पब्लिक ट्रस्ट (बीसीपीटी) 5 वा मजला रीजेंट चेंबर्स, नरिमन पॉइंट, मुंबई 400021, कॉल करा: 022-22845928 / 022-22836672


 🙏बुर्हानी फाउंडेशन 276 डॉ. डी.एन. रोड लॉरेन्स आणि मेयो हाऊस फोर्ट मुंबई-400001


 🙏शताब्दी सेवा ट्रस्ट सेंचुरी बाजार, वरळी, मुंबई - 400025


 🙏सेंटर फॉर रिसर्च अँड डेव्हलपमेंट श्रेयस चेंबर्स, तळमजला, 175-डॉ.  डी.एन. रोड, फोर्ट, मुंबई - 400 001


 🙏मुख्यमंत्री मदत निधी, महाराष्ट्र शासन मंत्रालय, सहावा मजला नरिमन पॉइंट, मुंबई - ४००२०


🙏श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट प्रभादेवी, मुंबई - ४०० ०२८, दूरध्वनी.  ०२२-२४३७३६२६ : वैद्यकीय जाहिरात फॉर्म वेबवर उपलब्ध आहे.

 कृपया तपशीलांसाठी त्यांची वेबसाइट पहा.


 🙏दामोदर आनंदजी चॅरिटी ट्रस्ट 66, वाजू कोटक मार्ग, G.P.O जवळ, मुंबई -400001


 🙏डायमंड ज्युबली ट्रस्ट आगा हॉल, नेस्बिट रोड, समोर.  सेंट मेरी हायस्कूल मुंबई 400010, कॉल करा: 022-23775294, 022-23778923


 🙏धर्म विजय ट्रस्ट C/O किलाचंद देवचंद अँड कंपनी न्यू ग्रेट इन्शुरन्स भवन, 7, जमशेदजी टाटा रोड, मुंबई - 400020


 🙏धरमदास त्रिकमदास कपूरवाला 46, रिज रोड, रेखा क्रमांक 2, 4था मजला, मुंबई - 400006


 🙏धीरुभाई अंबानी फाउंडेशन रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड रिलायन्स सेंटर, 19, वालचंद हिराचंद मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई 400 038. दूरध्वनी : 022-30327000


 🙏धिरजलाल टॉकचंद चॅरिटेबल ट्रस्ट शैलेश निवास, सुभाष लेन दफ्तरी रोड, मालाड (पू), मुंबई - 400097


 🙏धिरजलाल मोरारजी अजमेरा चॅरिटी ट्रस्ट 37 - ए, सारंग स्ट्रीट, मुंबई - 400003


 🙏दीपचंद गार्डी चॅरिटेबल ट्रस्ट उषा किरण, दुसरा मजला, अल्टामाउंट रोड, मुंबई - ४००००६


 🙏दिवालीबेन मोहनलाल चॅरिटेबल ट्रस्ट खटाऊ हवेली, पहिला मजला, 95-K.  ओमेर पार्क, भुलाभाई देसाई रोड, मुंबई ४०० ०२६


 🙏एकता चॅरिटेबल ट्रस्ट 4/444, पंचरत्न, ऑपेरा हाऊस, मुंबई -400004


 🙏एसके चॅरिटेबल ट्रस्ट C/O कॅप्रिहन्स इंडिया लि., शिवसागर इस्टेट, 'डी' ब्लॉक, दुसरा मजला, डॉ. ए.बी. रोड, वरळी, मुंबई - 400018


 🙏एक्सेल प्रोसेस प्रा.  लि. चॅरिटेबल ट्रस्ट 117/118, मथुरदास वासनजी रोड, चकाला, अंधेरी (पू), मुंबई - 400093


 🙏फजलभॉय चॅरिटेबल ट्रस्ट लिबर्टी सिनेमाजवळ, मरीन लाईन्स, मुंबई -४००२०


 🙏गाला फाउंडेशन वाकोला म्युनिसिपल मार्केटच्या मागे, नेहरू रोड, वाकोला, सांताक्रूझ (ई) मुंबई


 🙏गरवारे फाउंडेशन ट्रस्ट चौपाटी चेंबर्स, मुंबई - 400007


 🙏गोकाक फाउंडेशन फोर्ब्स बिल्डीजी., फोर्ब्स स्ट्रीट, मुंबई - 400023


 🙏गुडलास नेरोलॅक पेंट्स लि. (ट्रस्ट) नेरोलॅक हाउस, ए.जी. कदम मार्ग, लोअर परेल, मुंबई - 400013


 🙏गोविंद दत्तात्रय गोखले चॅरिटेबल ट्रस्ट कल्पतरू हेरिटेज, 5 वा मजला, 129, M.G.  रोड मुंबई 400 023, कॉल करा: 022-22673831


 🙏हरेंद्र दवे मेमोरियल ट्रस्ट C/O जन्मभूमी, 3रा मजला, जन्मभूमी मार्ग मुंबई 400 001


 🙏हेल्पिंग हँड चॅरिटेबल ट्रस्ट 3, विदर्भ सम्राट को-ऑप Hsg.  सोसायटी 93-सी, व्ही.पी.रोड, विलेपार्ले (पश्चिम) मुंबई - 400 056 दूरध्वनी: 022-6147448


 🙏हिरानंदानी फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट ऑलिंपिया, सेंट्रल एव्हेन्यू, हिरानंदानी बिझनेस पार्क पवई, मुंबई 400076


 🙏हर्डिलिया चॅरिटेबल फाउंडेशन एअर इंडिया बिल्डिंग, 13वा मजला नरिमन पॉइंट मुंबई 400 031, कॉल करा: 022-22024224


 🙏हिराचंद गोवर्धनदास 222, मेकर चेंबर्स 1V 3रा मजला, नरिमन पॉइंट मुंबई 400 021


 🙏H.  एम. मेहता चॅरिटी ट्रस्ट मेहता हाऊस, 4 वा मजला, अपोलो स्ट्रीट, खुशरू दुभाष मार्ग, मुंबई - 400001


 🙏H.  S. C. ट्रस्ट रेडी मनी मॅन्शन, वीर नरिमन रोड, मुंबई - 400023


 🙏जमनालाल बजाज फाउंडेशन बजाज भवन 2रा मजला, जमनालाल बजाज मार्ग, 226 नरिमन पॉइंट, मुंबई 400 021, कॉल करा: 022-22023626


 💝 उपर सांगते सर्व जरुरतमंद आणि गरीब कुटुंबांना मेडीकली मदत करते


  डायलिसिस @ मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात फक्त 200/- मध्ये करता येते.  एकूण 22 डायलिसिस मशिन्स बसवण्यात आल्या.  कृपया.  हे fwd करा जेणेकरून इतरांना फायदा होईल.  धन्यवाद.

 कृपया तुमच्या ग्रुपमध्ये पास करा हा सर्व डायलिसिस रुग्णांसाठी उपयुक्त संदेश आहे

 प्राप्त झाल्याप्रमाणे फॉरवर्ड केले.. 👆🏼☝🙏

Friday, 25 April 2025

अवयवदानास नवे आयाम,अवयवादात्यांचा महाराष्ट्र दिनी सत्कार ,pl shareजिवंत अवयव दान परवानगी प्रक्रिया सुलभ

 अवयवदानास नवे आयाम

– आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

  • अधिकाधिक गरजू रुग्णांना जीवनदान
  • अमरावतीकोल्हापूरनाशिक आणि सोलापूर येथे नवे प्रादेशिक अवयव प्रत्यारोपण समन्वय केंद्र
  • जिवंत अवयव दान परवानगी प्रक्रिया सुलभ
  • अवयवादात्यांचा महाराष्ट्र दिनी सत्कार

 

मुंबईदि. 24 : राज्यातील अवयवदान आणि प्रत्यारोपण प्रक्रियेला अधिक गतीपारदर्शकता आणि परिणामकारकता मिळवून अधिकाधिक गरजू रुग्णांना जीवनदान देता येणार असल्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले.

 

आरोग्य भवन येथे सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री श्री. आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली अवयव प्रत्यारोपणविषयी बैठक झाली. यावेळी आमदार श्रीमती देवयानी फरांदेसार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव डॉ.निपुण विनायकआरोग्य सेवा संचालक डॉ.नितीन अंबाडेकरवैद्यकीय शिक्षण सहसंचालक डॉ.पल्लवी सापळेवैद्यकीय अधिकारीमानवी अवयव प्रत्यारोपण तसेच विधी व न्याय विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

 

मंत्री श्री.आबिटकर यांनी अमरावतीकोल्हापूरनाशिक आणि सोलापूर येथे नवे प्रादेशिक अवयव प्रत्यारोपण समन्वय केंद्र (Zonal Transplant Coordination Center-ZTCC) स्थापन करण्याच्या सूचना दिल्या. शासकीय रुग्णालयांमध्ये विशेष केंद्रांची निर्मिती आणि त्या ठिकाणी समन्वयकांची नियुक्ती करण्यात येईल. अवयव प्रत्यारोपणासाठी आवश्यक रुग्णालय नोंदणी प्रक्रियेचा तातडीने निर्णय घेण्यात येईल. त्याचबरोबर विभागीय प्राधिकरण समित्यांनी जिवंत अवयव दान परवानगी प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करण्याच्याही सूचना मंत्री श्री.अबिटकर यांनी दिल्या.

 

 यावेळी अवयव प्रत्यारोपण करणाऱ्या डॉक्टर आणि समन्वयकांसाठी कार्यशाळा आयोजित कराव्यात. 'शासकीय रुग्णालयामध्ये अवयव दानाची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागामार्फत चालू करण्यात आलेला फेलोशिप इन क्रिटीकल मेडीसीनहा पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे नियोजन सुयोग्यरित्या करण्यात यावी अशी सूचनाही मंत्री श्री. अबिटकर यांनी दिल्या.

अवयवदानासाठी जनजागृतीसन्मान व सामाजिक सहभाग असल्याने राज्यभर जागृती मोहीम राबवून जनतेत अवयवदानाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण करण्याबद्दल मंत्री श्री.आबिटकर यांनी सांगितले. 1 मे महाराष्ट्र दिनीजिल्हास्तरावर अवयवदाते आणि त्यांच्या कुटुंबीयांचा पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सन्मान करण्यात यावा असे त्यांनी यावेळी सांगितले.

अतितातडीच्या परिस्थितीत अवयवदान व शवविच्छेदन प्रक्रियेत समन्वय साधण्यासाठी आवश्यक सुधारणा करण्याची सूचनाही मंत्री श्री.आबिटकर यांनी यावेळी केली.

Thursday, 24 April 2025

*उंबर (औंदुंबर) - एक आध्यात्मिक वृक्ष

 *उंबर (औंदुंबर) - एक आध्यात्मिक वृक्ष*

       उंबर जिथे आहे तिथे श्री. दत्तगुरुंचा वास असतो,असे हिंदू धर्मात मानले जाते. याच्या औषधी गुणांमुळेच उंबराच्या वृक्षाला आध्यात्मिक महत्व आहे. तेव्हा हा वृक्ष आपल्याला अमाप अशी निसर्गदत्त, औषध योजना बहाल करतो.


◼️उंबराच्या सालीचा काढा करून , त्यांत, वेलची, खडीसाखर टाकून सरबत करावे, कँसर सारख्या रुग्णाच्या अंगाचा जो दाह होतो, त्यावर आराम पडतो. दिवसांतून तीनदा घ्यावे. औंदुबरावलेह हे प्रसिद्ध औषध पित्तज विकारांवर प्रसिध्द आहे.


◼️जखम झाल्यस याच काढ्याने धुतल्यास, ती वेगाने बरी होते. अतिसाराच्या वेळी रक्त पडल्यास हाच काढा घ्यावा. गर्भाशयाची सूज कमी करण्यासाठी, रक्तप्रदर, श्वेतप्रदर, मासिकधर्म जास्त जात असेल, तर सालिचा काढा, पोटातून देतात. गर्भपात, होउ नये म्हणून, गर्भाचे पोषण निट व्हावे म्हणून, याच्या सालिचा काढा घेतात.


◼️भस्मक नावाचा रोग आहे त्यांत सारखी भूक लागते. पोट भरल्याची जाणीव होत नाही. तेव्हा, उंबराची साल दूधांत घोटून द्यावी. कावीळीत, उंबराचे पिकलेले अर्धे पान विड्यातून देतात. ज्वरदाह, तीव्र तापात, पिकलेले उंबर द्यावे,गोवर, कांजण्या, अतिसार, उन्हाळी, मधुमेह, या सर्व रोगांवर उंबराचे फळ, पाने, फुले उपयोगात आणली जातात.


◼️किटकदंश, विंचूदंश झाल्यास झाडाची पाने वाटून लावल्यास, दाह, वेदना, कमी होतात. तोंडातले अल्सर, व्रण, छाले, यावर उंबराच्या पानावर असे  बुडबडे वर दिसतात. ते काढून  त्याचि चटणी मधातून चाटण म्हणून द्यावे. तोंडाचा दाह कमि होतो..


◼️अंगात उष्णता, कडकी असल्यास उंबराची दोन फळे रोज सकाळी खडीसाखरेसोबत खावीत.


◼️तृष्णेचा आजार बरा होतो. जेव्हा खुप तहान, तहान होते, जीव कासावीस होतो, तेव्हा उंबराची साल, वा कच्ची फळे पाण्यात कुस्करून सरबत करून द्यावे


◼️डांग्या खोकल्यावर उंबराचा चिक टाळूवर लावावा ताबडतोब थांबतो. 


◼️किडनि स्टोन (मूतखडा) - उंबराच्या जुन्या झाडाच्या खोडाला खाच द्यावी व तिथेच एक भांडे अडकावे रात्रभर रस झिरपून भांड्यात गोळा होईल, तो सकाळी  पिण्यास घ्यावा. किडनी स्टोन वितळून मूत्रावाटे बाहेर पडतात.


◼️उंबर फळ दूधांत शिजवून खाल्ल्यास पचनसंस्था मजबूत होते, पोटाचे सर्व विकार बरे होतात. विशेषतः हे थंड गुणधर्माचे असल्यानेच, आम्लपित्त, मळमळ, पोटात दाह, अल्सर, सारखे आजार याच्या सेवनाने बरे होतात.


तेव्हा आपल्या परीसरात याचे झाड असणे आवश्यक आहे. अतिशय, उपयोगी, औषधी गुणधर्माचा हा वृक्ष कायम चिरतरुण ठेवतो.


*विशेष सुचना :- हा मेसेज वेळात वेळ काढून ईतरांच्या माहीतीत भर पडावी म्हणून पुढे शेअर करावा*


*ह्या व अशा निशुल्क माहीती साठी आरोग्य मधुमेह मुक्ती  हा ग्रुप जॉईन करा*


*

 *

Monday, 21 April 2025

मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र मिशन यशस्वीतेसाठी शासन कटीबद्धविदर्भात वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड संस्थेचे सहकार्य

 मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र मिशन यशस्वीतेसाठी शासन कटीबद्ध

-          मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विदर्भात वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड संस्थेचे सहकार्य

 

मुंबईदि. 20 : नागरिकांचे आरोग्य प्राधान्यक्रमावर ठेवून नागरिकांच्या आरोग्य विषयक अनेकविध योजना शासनामार्फत सुरू करण्यात आल्या आहेत. वयस्क लोकांमध्ये मोतीबिंदूमुळे येणारी दृष्टिहीनता टाळण्यासाठी मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र मिशन यशस्वी करण्यासाठी राज्य शासन कटीबद्ध आहे. शासनाचे हे मिशन पूर्णत्वास नेण्यासाठी वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड या संस्थेने सर्वतोपरी सहकार्यासाठी पुढाकार घेतला आहेही कौतुकास्पद बाब आहेअसे मत मुख्य 

मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. 

मोतीबिंदूमुळे येणारी दृष्टिहीनता आणि त्यावर उपाययोजना म्हणून २०१७ पासून मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र मिशन सुरू आहे.  शासनाने हाती घेतलेल्या या मिशनची २०१८ मध्ये नव्याने सुरवात करण्यात आली आहे. येत्या २०२७ पर्यंत हे मिशन यशस्वीपणे राबविण्याच्या दृष्टिने विदर्भात वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (WCL) ही संस्था इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय (आयजीएमसी)नागपूर यांना मदत करत आहे. डब्ल्युसीएल या संस्थेच्या माध्यमातून आयजीएमसीनागपूर यांनी गेल्या वर्षभरात साधारण चार हजार मोतीबिंदूच्या शस्त्रक्रीया केल्या आहेत. तसेच शासनासोबत केलेल्या कराराच्या माध्यमातून मुख्यमंत्री यांच्या मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र मिशन स्वप्नपूर्तीसाठी वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडने संपूर्ण विदर्भात विविध उपक्रम राबवून यापुढील तीन वर्षात दरवर्षी साधारण चार हजार मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यासाठी देखील ही संस्था सहकार्य करणार आहे. 

ही संस्था विदर्भातील ग्रामीण भागामध्ये शिबीर घेऊन ज्यांना मोतीबिंदू आहे त्या रुग्णाचे निदान करून त्यांना रुग्णालयामध्ये पोहोचवून त्यांच्यावर मोफत उपचार करतील. तसेच या मार्फत रुग्णालयांना आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देतील. डब्ल्यूसीएल संस्थेचे मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र मिशनच्या यशस्वीतेसाठी शासनाला असलेले सहकार्य पाहून इतर स्वयंसेवी संस्था देखील या कामात पुढाकार घेतीलअसा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

00000000


Saturday, 19 April 2025

दुर्घटना पीड़ितों को एक लाख रुपये तक कैशलेस इलाज,pl share and save अस्पतालों की जानकारी, बेड की उपलब्धता और शिकायत दर्ज करने के लिए स्वतंत्र मोबाइल ऐप विकसित करने का निर्णय

 दुर्घटना पीड़ितों को एक लाख रुपये तक कैशलेस इलाज

– सार्वजनिक स्वास्थ्य मंत्री प्रकाश आबिटकर

अस्पतालों की जानकारीबेड की उपलब्धता और शिकायत दर्ज करने के लिए

स्वतंत्र मोबाइल ऐप विकसित करने का निर्णय

मुंबई, 18 अप्रैल: मरीजों को समय पर गुणवत्तापूर्ण और कैशलेस इलाज मिल सकेइसके लिए अस्पतालोंसोसायटी अधिकारियों और कार्यान्वयन एजेंसियों को सतर्क रहना होगा। इस प्रक्रिया में कोई गड़बड़ी करने वालों पर सख्त कार्रवाई की जाएगी। साथ ही दुर्घटना में घायल मरीजों को एक लाख रुपये तक का कैशलेस इलाज संबद्ध और अन्य आपातकालीन अस्पतालों से उपलब्ध कराने के लिए सार्वजनिक स्वास्थ्य विभाग को कार्यवाही करने के निर्देश सार्वजनिक स्वास्थ्य और परिवार कल्याण मंत्री श्री प्रकाश आबिटकर ने दिए हैं।

श्री आबिटकर ने मुंबई के वर्ली स्थित राज्य आरोग्य हमी सोसायटी मुख्यालय में आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना और महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना की प्रगति की समीक्षा की। इस बैठक में आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समिति के अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटेराज्य आरोग्य हमी सोसायटी के मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब चव्हाणउपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दयानंद जगतापसार्वजनिक स्वास्थ्य विभाग के सहसचिव अशोक आत्रामसहायक संचालक डॉ. रविंद्र शेटे और अन्य अधिकारी उपस्थित थे।

बैठक के दौरान मंत्री श्री आबिटकर ने योजनाओं के प्रभावी कार्यान्वयन के लिए कई महत्वपूर्ण निर्णय लिए। इनमें संबद्ध अस्पतालों की संख्या को 1792 से बढ़ाकर 4180 करने का निर्णय शामिल था। यह चयन प्रक्रिया जिला कलेक्टरों की अध्यक्षता में पारदर्शी रूप से की जाएगी।

योजना में इलाज की संख्या बढ़ानेदरों में सुधार करनेअंग प्रत्यारोपण जैसे महंगे इलाज को शामिल करनेऔर प्राथमिक स्वास्थ्य सेवाओं को भी योजना में जोड़ने के लिए एक अध्ययन समिति गठित की गई हैजिसे एक महीने के भीतर अपनी रिपोर्ट प्रस्तुत करनी होगी। आम जनता को योजना से जुड़े अस्पतालों की जानकारीबेड की उपलब्धता और शिकायत दर्ज करने के लिए एक स्वतंत्र मोबाइल ऐप विकसित करने का निर्णय भी लिया गया है।

मंत्री श्री आबिटकर ने निर्देश दिया कि प्रत्येक संबद्ध अस्पताल को हर महीने कम से कम एक स्वास्थ्य शिविर का आयोजन करना चाहिएजिसमें कम से कम पाँच मरीजों का कैशलेस इलाज किया जाए। इन शिविरों में जनप्रतिनिधियों को शामिल कर पूर्व-प्रचार भी किया जाए।

योजना के बेहतर कार्यान्वयन के लिए जिलास्तर पर पालकमंत्रियों की अध्यक्षता में समितियों का गठन कर शीघ्र बैठकें आयोजित की जाएं। साथ हीआयुष्मान कार्ड वितरण अभियान को गति देने के लिए आशा वर्करआंगनवाड़ी सेविकाराशन दुकानदार और नागरिक सेवा केंद्रों के माध्यम से वितरण की योजना बनाई गई है। इस कार्य के लिए उनके मानधन में वृद्धि करने के भी निर्देश दिए गए हैं।

मंत्री ने बताया कि मार्च माह से अब तक लगभग 1300 करोड़ रुपये की राशि अस्पतालों को वितरित की गई है और भविष्य में भी आवश्यकतानुसार निधि दी जाएगी। उन्होंने स्पष्ट कहा कि इस महत्वाकांक्षी योजना का क्रियान्वयन पूर्ण पारदर्शिता के साथ होना चाहिए और किसी

अपघातग्रस्त रुग्णांसाठी एक लाख रुपयांपर्यंतचे कॅशलेस उपचार pl shareरुग्णालयांची माहिती, बेडची उपलब्धता आणि तक्रारी नोंदविण्यासाठी स्वतंत्र मोबाईल ॲप विकसित करण्याचा निर्णय

 अपघातग्रस्त रुग्णांसाठी एक लाख रुपयांपर्यंतचे कॅशलेस उपचार

-         सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

रुग्णालयांची माहितीबेडची उपलब्धता आणि तक्रारी नोंदविण्यासाठी

स्वतंत्र मोबाईल ॲप विकसित करण्याचा निर्णय

 

मुंबईदि १८ : रुग्णांना वेळेवर दर्जेदार तसेच कॅशलेस उपचार मिळावेत यासाठी रुग्णालयेसोसायटीचे अधिकारी व अंमलबजावणी संस्थांना कठोर दक्षता बाळगावी. यात गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. तसेच अपघातग्रस्त रुग्णांसाठी एक लाख रुपयांपर्यंतचे कॅशलेस उपचार अंगीकृत व अन्य तातडीच्या रुग्णालयांमधून देण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने कार्यवाही करावीअसे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.

राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या वरळीमुंबई येथील मुख्यालयात आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनांच्या कामकाजाचा आढावा मंत्री श्री. आबिटकर यांनी घेतला. यावेळी आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटेराज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब चव्हाणउपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.दयानंद जगतापसार्वजनिक आरोग्य विभागाचे सहसचिव अशोक आत्रामसहायक संचालक डॉ.रवींद्र शेटे आदि उपस्थित होते.

बैठकी दरम्यान मंत्री श्री.आबिटकर यांनी या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. यामध्ये योजनेतील अंगीकृत रुग्णालयांची संख्या १७९२ वरून ४१८० पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत ही निवड प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबविण्याचे त्यांनी आदेश दिले.

या योजनेतील उपचार संख्येत वाढदरामध्ये सुधारणाअवयव प्रत्यारोपणासारखे महागडे उपचार समाविष्ट करणेतसेच प्राथमिक आरोग्य सेवाही योजनेत समाविष्ट करण्यासाठी अभ्यास समिती गठित करण्यात आली असून एक महिन्याच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश मंत्री श्री.आबिटकर यांनी यावेळी दिले. जनतेसाठी योजनेतील रुग्णालयांची माहितीबेडची उपलब्धता आणि तक्रारी नोंदविण्यासाठी स्वतंत्र मोबाईल ॲप विकसित करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. प्रत्येक अंगीकृत रुग्णालयाने दर महिन्याला एक आरोग्य शिबिर आयोजित करून किमान पाच रुग्णांवर कॅशलेस उपचार करावेतअशा शिबिरात लोकप्रतिनिधींना सहभागी करून घेऊन त्याची पूर्वप्रसिद्धी करावीअसे मंत्री श्री.आबिटकर यांनी यावेळी सांगितले.

योजनेच्या अंमलबजावणीसाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरावर समित्या स्थापन करून त्यांच्या बैठका त्वरित आयोजित करण्यात याव्यात. तसेच आयुष्मान कार्ड वाटप मोहिमेस गती देण्यासाठी आशा वर्करअंगणवाडी सेविकारेशन दुकानदार आणि नागरी सेवा केंद्रांच्या माध्यमातून वाटप करण्याची योजना आखण्यात आली आहे. या कार्यासाठी त्यांना मिळणाऱ्या मानधनात वाढ करण्याचे निर्देशही मंत्री. श्री.आबिटकर यांनी यावेळी दिले.

रुग्णालयांना मार्च महिन्यापासून सुमारे १,३०० कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आल्याचे सांगूनयापुढेही आवश्यक निधी वेळोवेळी दिला जाईल. या महत्त्वाकांक्षी योजनेची अंमलबजावणी पूर्ण पारदर्शकपणे केली जावी आणि कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार सहन केला जाणार नाहीअसे स्पष्ट निर्देश आरोग्यमंत्री श्री.आबिटकर यांनी यावेळी दिले.

000

संजय ओरके/विसंअ

फक्तं झोपेसाठी

 झोप शांत लागण्यासाठी उपाय :


झोपण्यापूर्वी पाय धुवून घ्या. पायाच्या तळव्यांचा मसाज करणे चांगले असते.

झोपताना सैल आणि आरामदायक कपडे घालावेत, ज्यामुळे शरीरात हवेचा संचार होईल.


झोपण्यापूर्वी काही वेळ दीर्घ श्वसन करा. तसेच ध्यान अवश्य करा.


दक्षिणेकडे पाय करून झोपू नका. गुरू, देवता, त्यांच्या मूर्ति, चित्र, वस्तू तसेच आदराच्या स्थानाकडे पाय करू नये.


स्वयंपाक घरात झोपू नये. तसेच बेडरूममध्ये खाद्यपदार्थ ठेवू नये.


बेडरूममध्ये ताजी खेळती हवा यायला हवी याकडे लक्ष द्या.


कधीही अंधाऱ्या, दमट आणि ओलसर खोलीत झोपू नये.


झोपताना डोकं थोडं उंच ठेवा. त्याकरिता पातळ उशीचा वापर करा.


उन्हाळ्यात छतावर किंवा मोकळ्या आकाशाखाली झोपू शकता. मात्र थंडी किंवा पावसाळ्यात नको.


थेट सूर्यप्रकाशात झोपणे योग्य नाही. मात्र वातावरण चांगले असल्यास टिपूर चांदण्याखाली तुम्ही झोपू शकता.


दुपारी का झोपू नये | दिवसा झोपणे योग्य आहे का? 


आयुर्वेदानुसार दिवसा झोपल्याने शरीरातील कफ वाढतो. रक्ताभिसरणात अडथळे येतात. त्यामुळे डोकं जड वाटतं, श्वास घ्यायला त्रास होतो. आळस, सर्दी-खोकला, डोकेदुखी, अपचन, खाज, फोडं, घश्याचा त्रास, रक्ताची कमतरता इत्यादी आजार संभवतात. या सर्व कारणांमुळे दुपारी झोपू नये. तरीही काही व्यक्तींना दुपारी झोपण्याची गरज असते. त्यांच्या बद्दल जाणून घेऊया.


दुपारी फक्त ह्यांनीच झोपावे :


दुपारी जेवण झाल्यावर लगेच झोपू नये. मात्र न झोपता केवळ पडून रहावे असे जरूर वाटते. जड जेवणानंतर थोडा वेळ विश्रांती घेणे आरोग्यासाठी चांगले असते. मात्र बसून थोडी डुलकी घेणे (५-१०मिनिटे) जास्त योग्य असते. दुपारच्या जेवणानंतर असे केल्याने वात, कफात संतुलन साधले जाते.

लहान मूल व वृद्ध व्यक्ती.


रात्र पाळी करून येणारी व्यक्ती.

जे अति शारीरिक वा मानसिक काम करतात असे लोक.


ज्यांना वेदना, मार, आघात, क्षय आदी व्याधी आहेत असे लोक.


ज्यांना अतिशय तहान लागते, तसेच डायरिया, पोटदुखी, श्वासाचे विकार, उचक्या, किंवा मासिक पाळीत खूप वेदना होतात.


ज्यांना क्रोध, भय, उदासीनता घेरून असते.

मोठ्या प्रवासानंतर, खूप जड वजन उचलल्यानंतर, अति संभोगानंतर, जास्त मद्यपान केल्यानंतर, खूप वेळ गायन किंवा अभ्यास केल्यानंतर.


पंचकर्म चिकित्सेनंतर.

उच्चतम तापमान असते अश्या दाहक उन्हाळ्यात दिवसा थोडी झोप घेणे योग्य असते.


दुपारी कोणी झोपू नये?


कफकारक प्रकृतीच्या व्यक्ती.

शरीरात कफाचे संतुलन बिघडले असल्यास.

अतिशय स्थूल व्यक्तींनी.


जर शरीरात विषाक्त तत्व वाढलेले असल्यास दुपारी झोपू नये.


निद्रानाश उपाय | गाढ निद्रेसाठी अजून काही उपाय :


पूर्णपणे आच्छादलेली सुंदर शय्या.

खोलीत मंद सुगंधाचा दरवळ आणि मधुर संगीत.


स्वच्छ, शांत, मोकळी आणि आरामदायी खोली.


योग्य वेळेत झोपण्याची आणि जागे होण्याची सवय.


तेलाने अभ्यंग मालिश करून स्वतःला शिथिल करा.


वरील काही निद्रानाशासाठी उपाय आहेत. आयुर्वेदिक वैद्याच्या सल्ल्यानुसार, व्यक्तीगत पातळीवर चांगली झोप येण्यासाठी नैसर्गिक (हर्बल) उपाययोजना केली जाऊ शकते


केवळ माहिती साठी


*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*


🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺


*VSUcAAWrj

Sunday, 13 April 2025

वारंवार तोंड येण्याची कारणे, लक्षणे आणि उपचार* *तोंड येण्याची कारणे*

 *वारंवार तोंड येण्याची कारणे, लक्षणे आणि उपचार*


*तोंड येण्याची कारणे*


◼️कुपोषण


◼️आहारदोष किंवा चुकीची आहारपद्धती आणि जीवनशैली


◼️जीवनसत्त्व नायसीन, रायबोफ्लॅवीन. फोलेट अ‍ॅसिड, जीवनसत्त्व सायनोक्लोमाइनच्या कमतरता


◼️दात, जीभ, हिरडया आणि तोंडाची पुरेशी स्वच्छता नसणे,


◼️दीर्घकाळ अँटिबायोटिक औषधाचे सेवन करणे,


◼️कॅन्सरच्या औषधाचा दुष्परिणाम होणे


◼️तंबाखूम दारू, गुटखा याचं सेवन करणे


◼️मानसिक ताणतणाव


◼️अपुरी झोप


◼️अति मसालेदार, तिखट अन्नपदार्थाचं सेवन करणे


◼️कमी प्रतिकारशक्ती


◼️जीवनसत्त्वांची कमतरता


◼️वारंवार टुथपेस्ट बदलणे


◼️कधी कधी काही स्त्रियांना मासिक पाळीपूर्वीदेखील तोंड येतं. पण ते मर्यादित काळासाठी असतं.


*तोंड येणं म्हणजे नेमकं काय होतं?*


तोंड येतं तेव्हा जीभ, गालाचा आतील भाग, टाळू, हिरडया, जिभेच्या कडा, ओठाची आतली बाजू पूर्णत: लाल होते. काही वेळेला पांढरट, पिवळसर गोल जखमा तयार होतात. इतकंच नाही तर कधी कधी घशाच्या आत किंवा जिभेवर पांढरट थर जमा होतो. अशा वेळी तोंडातून गरम वाफा निघाल्याचं जाणवतं. जिभेच्या कडा खडबडीत होतात. तिथेही फोड येतात. कधी कधी ताप येतो किंवा अंगात कणकण जाणवते.


 पचनसंस्थेवर ताण पडून शौचाच्या तक्रारीही निर्माण होतात. त्याचबरोबर भूक मंदावणे, प्रतिकार शक्ती कमी होणे, इतर आजरावर सामोरे जावे लागतं. यासारख्या तक्रारी वारंवार तोंढ येण्याचे दिसून येतं. वारंवार तोंड आल्यामुळे अपचन, जुलाब, मोठया आतडयाचे विकार, मानसिक ताणतणाव अशा प्रकारांना सामोरं जावं लागतं.


थोडक्यत शरीरातील ब गटातील जीवनसत्त्वांचं प्रमाण कमी झालं की त्याचा मज्जा पेशींवर परिणाम होतो. त्वचा, ओठ, गालाचा आतील भाग, जीभ आणि घसा असे पचनसंस्थेतील महत्त्वाचे पाचकरस करणा-या ग्रंथी तसंच रक्त तयार करणा-या ग्रंथींचं जीवनसत्त्व बी गटामुळे होत असतं. मात्र या जीवनसत्त्वांच्या अभावाने खंड पडतो. आणि त्यांचं कार्य बिघडतं त्यामुळे तोंड येतं.


*तोंड येऊ नये म्हणून काय कराल?*

◼️तोंडाची आंतरबाहय़ स्वच्छता

◼️पान, तंबाखू, गुटखा यांसारख्या घातक घोष्टींचं सेवन पूर्णपणे बंद करावं

◼️आहारात जीवनसत्त्व आणि चोथायुक्त पदार्थाचा समावेश करावा.

◼️भरपूर पाणी प्यावं. दिवसभरातून किमान आठ ते दहा ग्लास पाणी पिणं आवश्यक आहे

◼️पुरेशी झोपही आवश्यक आहे. रात्रीच्या जागरणाने शरीरात उष्णता वाढते. त्यामुळेही तोंड येतं. म्हणून किमान सहा ते सात तास झोपणं आवश्यक आहे.

◼️तणावरहीत जगणं आवश्यक आहे. कोणत्याही गोष्टीचा मनावर ताण आल्याने त्याच्या परिणाम आपल्या प्रकृतीवर होतो.

◼️तोंड आलेल्या ठिकाणी ग्लिसरीन लावावं. आणि लाळ थुकून टाकावी. तोंडात कात धरल्यानेही आराम पडतो. मात्र त्वरित आराम न पडल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.


*शरीराला आवश्यक जीवनसत्त्व कोणती?*

» बी १ अर्थात थायमिन

» रायबोफ्लेवीन

» नायसीन


*ही जीवनसत्त्व कोणत्या पदार्थातून मिळतील?*


*थायमिन :* सर्व प्रकारची तृणधान्य, हातसडीचा तांदूळ, कोंडयासकट गहू, मोड आलेली कडधान्य, ज्वारी आणि बाजरी.


*रायबोफ्लेवीन :* दूध, तृणधान्य, डाळी यातून अधिक प्रमाणात मिळतं.


गर्भावस्थेतील स्त्रिया, थायरॉड ग्रंथीचे आजार, संतती नियमनाच्या गोळ्यांचे सेवन करणाऱ्यांना या जीवनसत्त्वाची अधिक गरज असते.


*नायसीन :* संमिश्र आहार. तृणधान्य आणि दूध.


वारंवार तोंड येत असेल तर त्याची वर नमूद केल्याप्रमाणे बरीच कारणे आहेत..


तोंड अगदी लहान बाळाचे ही येते . दूध पिल्यानंतर तोंडाची व्यवस्थित स्वच्छता नाही केली तर.. 

किंवा एखादी व्यक्ती काही कारणास्तव औषधे घेत असेल तर, एखाद्या व्यक्तीला मानसिक त्रास असेल तर अशी विविध कारणे असतात.


*

उन्हाळ्यात घ्याव्या ची काळजी,pl share


 

Saturday, 5 April 2025

उष्माघातापासून दूर राहण्यासाठी स्वत:मध्ये करा ‘हे’ पाच बदल.....*

 *उष्माघातापासून दूर राहण्यासाठी स्वत:मध्ये करा ‘हे’ पाच बदल.....*


आता उन्हाळ्यात तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. अशात शरीराला पाण्याची कमतरता जाणवणे, स्ट्रोक, खूप जास्त घाम येणे, थकवा जाणवणे इत्यादी समस्यांचा त्रास होतो. अशात भरपूर पाणी पिणे, सुती कपडे घालणे आणि नीट योग्य तो पोषक आहार घेणे गरजेचे आहे.


इन हाउस आयुर्वेदिक सल्लागार डॉ. अश्विनी कोन्नूर यांनी उन्हापासून संरक्षण करण्यासाठी काही प्रभावी मार्ग सांगितले आहेत.


*आहाराकडे लक्ष द्या...*

तु्म्ही जे काही खाता, त्याचा थेट परिणाम तुमच्या ऊर्जेवर दिसून येतो. उन्हाळ्यात पचायला हलक्या असणाऱ्या अन्नाचा आहारात समावेश करणे कधीही चांगले असते. उष्ण वातावरणात शरीराची पचनक्रिया मंदावते. त्यामुळे शारीरिक क्रिया सुरळीत ठेवण्यासाठी हलका पोषक आहार घ्यावा. उदा. दही, पांढरा भात, सॅल्मन मासा तुम्ही खाऊ शकता. आंबट व तिखट पदार्थ खाणे टाळा.


*भरपूर फळे आणि भाजीपाला खा...*

फळे आणि भाजीपाल्यामध्ये खूप जास्त प्रमाणात जीवनसत्त्वे, पोटॅशियम, फोलिक अॅसिड व मिनरल्स असतात. हे घटक शारीरिक क्रिया सुरळीत ठेवण्यास मदत करतात. त्यामध्ये चांगले फॅट्स असतात; जे हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले असतात. उदा.

काकडी, बेरी, टरबूज,

सायट्रिक अॅसिड समृद्ध फळे, अॅव्होकॅडो.


*जास्तीत जास्त द्रव पदार्थांचे सेवन करा...*

उन्हाळ्यात जास्तीत जास्त द्रव पदार्थांचे सेवन करणे खूप गरजेचे आहे. द्रव पदार्थ आपल्या शरीरातील पाण्याची पातळी भरून काढतात आणि आपले शरीर थंड ठेवण्यास मदत करतात. उन्हाळ्यात अल्कोहोल घेणे टाळले पाहिजे. त्याऐवजी फळांचा रस, लिंबू पाणी, ताक, नारळ पाणी, ग्रीन टी हे द्रव पदार्थ सहज उपलब्ध असतात आणि त्याचे अनेक फायदेही दिसून येतात.


*व्यायामामध्ये बदल करा...*

उन्हाळ्यात शरीरावर ताण पडणार नाही, याची काळजी घ्या आणि त्यानुसार व्यायामप्रकार निवडा. खूप जास्त तास व्यायाम करणे आणि खूप जास्त धावणे टाळा. त्याऐवजी प्राणायाम करा.


*शीतली प्राणायाम...*

 या प्राणायामामध्ये तोंडावाटे हवा आत घेऊन नाकावाटे सोडली जाते. त्यामुळे शरीराला थंडावा मिळतो.


*सदांता प्राणायाम...*

 या प्राणायामामध्ये दातांद्वारे हवा आत घेऊन नाकावाटे बाहेर सोडली जाते.


त्याशिवाय तुम्ही वृक्षासन, अर्धकटी चक्रासन, कोनासन, त्रिकोणासन, मार्जारासन, बद्धकोनासन, वज्रासन, शशांकासन, चक्रासन, नवासन, योग निद्रा इत्यादी आसन प्रकार तुम्ही करू शकता.


*जीवनशैलीमध्ये बदल करा...*

उन्हाळ्यात रात्र लहान असते. त्यामुळे दिवसा तुम्ही थोडा आराम करू शकता. त्याशिवाय फिकट रंगाचे सुती कपडे, चंदन, फुलांपासून बनविलेले अत्तर यांचा वापर करा. घराबाहेर पडण्यापूर्वी किमान ५० एसपीएफ (Sun Protection Factor) असलेले सनस्क्रीन वापरा. जर कडाक्याचे ऊन असेल तर सनकोट, तसेच छत्री वा टोपीचा वापर करा.


*ह्या व अशा निशुल्क माहीती साठी आरोग्य  मधुमेह मुक्ती हा ग्रुप जॉईन करा*


माहिती आवडली तर इतर ग्रुप वर शेअर करा📲*


*(कॉपी पेस्ट)*


 *आयुर्वेदिक घरगुती उपाय व आरोग्य विषयक नवनवीन माहिती रोज आपल्या मोबाईल वर मिळवण्यासाठी खालील लिंकला टच करा व ग्रुप मध्ये join व्हा👇किंवा 


Wednesday, 2 April 2025

🌾🍞 गव्हाच्या पदार्थांना कायमचे बायबाय करू...👋✋, भाकरी खा भाकरी

 🍪चला #भाकरीकडे वळा. 🍪... सुंदर व महत्वाचा लेख... 👇 


🌾🍞 गव्हाच्या पदार्थांना कायमचे बायबाय करू...👋✋



https://chat.whatsapp.com/Bxl4h9OxH0t2m3mdam2sHl


मी गहू खायचा बंद केला आणि माझं वजन ३० पौंडांनी कमी झालं...


एका प्रसिद्ध कार्डिआॅलजिस्ट तज्ञाने हे समजावून सांगितलं आहे की, आहारातून गहू काढून टाकल्यामुळे तुमचं आरोग्य “सुधारू” शकतं.  


कार्डिआॅलजिस्ट विल्यम डेव्हिस, एमडी, यांनी अँजिओप्लास्टी आणि बायपास सर्जरीद्वारे बिघडलेली हृदयं दुरुस्त करण्यापासून आपल्या करिअरला सुरुवात केली. त्याचे हे मनोगत खाली लिहलेले आहे.


“मी त्याचंच प्रशिक्षण घेतलं होतं आणि सुरुवातीला मला तेच करायचं होतं,” 


ते सांगतात. पण हृदयविकारासंबंधी उत्कृष्ट सेवा पुरवूनदेखील जेव्हा त्यांच्या आईचा १९९५ मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला, तेव्हा साहजिकच त्यांना स्वतःच्या व्यवसायाबद्दल वारंवार चिंता वाटू लागली.


“मी रुग्णाचं हृदय दुरुस्त करायचो, पण तो रुग्ण पुन्हा त्याच समस्या घेऊन माझ्याकडे परत यायचा. माझे उपचार एखाद्या बँड-एड सारखे होते, त्यात आजाराचं ‘कारण’ शोधून काढण्याचा काही प्रयत्न नसायचा.”


म्हणून मग त्यांनी आपल्या प्रॅक्टिसचा रोख एका खूपच अज्ञात वैद्यकीय प्रांताकडे – प्रतिबंधाकडे – वळवला आणि पुढची १५ वर्ष त्यांच्या रुग्णांच्या हृदयविकाराची कारणं तपासण्यात घालवली.


त्यातून जे काही शोध लागले ते त्यांच्या न्यूयॉर्क टाईम्स बेस्ट-सेलिंग “व्हीट बेली” ह्या पुस्तकात उघड केले आहेत. आपल्या बऱ्याच शारीरिक समस्या, हृदयविकार, मधुमेह आणि लठ्ठपणा ह्या आपल्या गहू खाण्यामुळे उद्भवतात असं ह्या पुस्तकात म्हटलं आहे.


आहारातून गहू काढून टाकल्यामुळे “आपलं आयुष्य बदलू शकतं.”


“व्हीट बेली” काय आहे?


गव्हामुळे तुमच्या रक्तातली साखर अत्यंत नाटकीय पद्धतीने वाढते. खरं तर स्निकर्सच्या एका बार मुळे रक्तातली साखर जेवढी वाढेल, त्यापेक्षा जास्त गव्हाच्या ब्रेडच्या दोन स्लाईसेस मुळे वाढते.


“जेव्हा माझ्या रुग्णांनी गहू खाणं बंद केलं, तेव्हा त्यांचं वजन, विशेषतः पोटावरून, खूप मोठ्या प्रमाणात घटलं. गहू सोडल्यानंतर पहिल्या महिन्यात लोकांचा जाडेपणा खूप इंचांनी कमी होऊ शकतो.”


गहू आणि बऱ्याचशा इतर आरोग्यविषयक समस्यांचा संबंध लागू लागतो.


रुग्णांपैकी ऐंशी टक्के रुग्णांना मधुमेह किंवा मधुमेहा पूर्वीची स्थिती होती. मला माहिती होतं की, इतर कशाही पेक्षा गव्हामुळे रक्तातली साखर खूप जास्त वाढते, म्हणून मग मी म्हणालो, “आपण तुमच्या आहारातून गहू काढून टाकूया आणि त्याचा तुमच्या रक्तातल्या साखरेवर काय परिणाम होतो ते पाहूया.”  ३ ते ६ महिन्यांनंतर ते माझ्याकडे परत येत, आणि तेव्हा त्यांच्या रक्तातली साखर खूपच कमी झालेली असे.


पण त्यांच्या ह्या इतर प्रतिक्रिया सुद्धा असत:


“मी आहारातून गहू काढून टाकला आणि माझं वजन ३८ पौंडांनी कमी झालं.” किंवा, “माझा दमा इतका बरा झाला की, मी माझे दोन इन्हेलर्स फेकून दिले.”


किंवा “गेली २० वर्षं अर्धशिशीमुळे माझं डोकं जे रोज दुखायचं, ते तीन दिवसांत दुखायचं बंद झालं.” “माझ्या छातीतली जळजळ आता थांबली.”


“माझा इरिटेबल बाउल सिंड्रोम सुधारला, माझा अल्सरेटिव्ह कोलायटिस, माझा रुमटॉइड आर्थ्रायटिस, माझा मूड, माझी झोप…” आणि अजून काही, आणि अजून काही”.


जर गहू कशापासून बनलेला आहे हे बघितलं, तर त्यात अॅमलोपेक्टिन ए चा समावेश होतो, जे केमिकल फक्त गव्हातच आढळून येतं, आणि जे रक्तातल्या लहान एलडीएल पार्टिकल्सचं प्रमाण खूप वाढवतं – जे की हृदयविकाराचं सर्वात मुख्य कारण आहे.


जेव्हा आहारातून गहू काढून टाकला जातो, तेव्हा ह्या लहान एलडीएल ची पातळी ८० ते ९० टक्क्यांनी खाली येते.


गव्हामध्ये खूप जास्त प्रमाणात ग्लायडिन असतं, जे एक भूक वाढवणारं प्रथिन आहे. गहू खाल्ल्यामुळे सर्वसाधारण व्यक्तीचा कॅलरी इन्टेक दिवसाला ४०० कॅलरीजने वाढतो.


ग्लायडिनचे अफू सारखे गुणधर्म देखील असतात ज्यामुळे त्याचं “व्यसन” लागू शकतं. अन्नविषयक शास्त्रज्ञांना हे जवळजवळ २० वर्षांपासून माहीत आहे.


गहू-मुक्त आहार करणं हे ग्लूटन-मुक्त आहार करण्यासारखंच आहे का..?


"ग्लूटन" हा गव्हाचा फक्त एक घटक आहे.


गव्हातून ग्लूटन काढून टाकलं तरी गहू तितकाच वाईट असेल कारण त्यात अजूनही ग्लायडिन आणि अॅमलोपेक्टिन ए, तसंच इतर अनेक अनुचित घटक असतील.


ग्लूटन-मुक्त उत्पादनं ४ प्राथमिक घटकांपासून बनलेली असतात: कॉर्न स्टार्च, राईस स्टार्च, टॅपिओका स्टार्च किंवा पोटॅटो स्टार्च. आणि हे ४ सुकवलेले, पावडरच्या स्वरूपातले स्टार्च असे पदार्थ आहेत जे रक्तातली साखर अजूनच जास्त वाढवतात.


मी लोकांना अस्सल अन्नाकडे परतण्यास प्रोत्साहित करतो. जसे फळं, भाज्या, कठीण कवचाची फळं आणि बिया, अनपाश्चराईज्ड चीज, अंडी आणि मांस.


हायब्रिडायजेशन सारख्या उत्पादन वाढवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या अनेक तंत्रांमुळे ७० आणि ८० च्या दशकात गव्हाचं स्वरूप खरोखर बदललं. गव्हाचा दाणा अधिक छोटा आणि अधिक पुष्ट झाला आणि त्यात ग्लायडिनचे प्रमाण वाढले (जो एक प्रभावी असा भूक वाढवणारा घटक आहे.)


आज आपण जो गहू खातो तो १०० वर्षांपूर्वी खाल्ल्या जाणाऱ्या गव्हासारखा नाहीये.


तुम्ही दररोज ब्रेड/ पास्ता/ चपात्या खायचं बंद केलंत, आणि चिकन आणि भाज्यांसोबत भात खाऊ लागलात, तरीसुद्धा तुमचं वजन कमी होईल कारण तांदूळ रक्तातली साखर गव्हाइतकी वाढवत नाही, आणि त्यात अॅमलोपेक्टिन ए आणि ग्लायडिन सारखे भूक वाढवणारे घटक नसतात. गव्हामुळे जशी कॅलरी इन्टेक मध्ये वाढ होते तशी तांदळामुळे होणार नाही.


काही विदेशी संस्कृतींमधले लोक जे गहू खात नाहीत ते यामुळेच अधिक सडपातळ आणि निरोगी असतात. प्रत्येकाने गहू खाणं थांबवलं पाहिजे. ही एक अशी गोष्ट आहे जी, मला पक्कं  आहे की तुमचं आयुष्य बदलून टाकेल.


आपल्या जेवणामध्ये प्रामुख्याने पुरी, चपाती, नान किंवा पराठ्याचा समावेश असतो. रोज तेच खाता ना मग आता ज्वारीच्या भाकरीची चव चाखा. ज्वारीची भाकरी ही पचण्यास अतिशय सोपी असते. ती मध्यम तीव्रतेच्या फ्लेमवर भाजली जाते आणि आरोग्याच्यादृष्टीने अतिशय गुणकारी ठरते. त्यामुळे रोज नाही पण आठवड्यातून किमान दोन-तीन वेळा तरी ज्वारीच्या भाकरीचा आहारात समावेश करावा. रजोवृद्धीच्या काळात ज्वारीची भाकरी आणि ज्वारीपासून बनवलेले पदार्थ खाल्ल्यास हार्मोन्सचे असंतुलन होण्याची समस्या निर्माण होत नाही. ज्वारीचे पदार्थ खाल्ल्याने ब्रेस्ट कॅन्सर नियंत्रणात राहतो, असे अभ्यासावरून सिद्ध झाले आहे. ज्वारीच्या भाकरीचे अनेक गुणधर्म आहेत, ज्यामुळे आपणास नक्कीच फायदा होणार आहे. त्यामुळे शक्‍यतो ज्वारीचा आहारात समावेश करुन घ्याच.


* जेवणात का खावी  भाकरी… ?


ज्वारीमध्ये कार्बोहायड्रेट्‌सचे प्रमाण जास्त असल्याने शरीरास पटकन ऊर्जा मिळते. कमी खाऊनही पोट भरल्याची जाणीव होते. ज्वारीमध्ये असणाऱ्या अमिनो ऍसिड्‌समधून शरीरास मुबलक प्रोटीन्स मिळतात. तसेच फायबर्स असल्याने सहज पचन होते. बद्धकोष्ठतेचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी ज्वारीची भाकरी खाण्याची सवय लावून घ्यावी. त्यामुळे मूळव्याधाचा त्रास होत नाही. तसेच ज्यांना किडनी स्टोनचा त्रास टाळायचा असेल त्यांनी नक्कीच ज्वारीची भाकरी आहारात आणावी. ज्वारीतील पोषणतत्त्वामुळे किडनी स्टोनला दूर ठेवता येते.


ज्वारीमध्ये असणाऱ्या निऍसिनमुळे रक्तातील कॉलेस्ट्रॉलची पातळी कमी होते. तसेच ज्वारीमधील फायटो केमिकल्समुळे हृद्यरोग टाळता येतात. ज्वारीमधल्या पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि मिनरल्समुळे ब्लडप्रेशर नियंत्रणात राहते. भाकरीत लोह मोठ्या प्रमाणात असते. ऍनिमियाचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी ज्वारीची भाकरी खाल्ल्यास त्यांना फायदा होतो. लाल पेशींची वाढ होण्यास मदत होते.


* ज्वारीचे फायदे –


1) ज्वारीत असणाऱ्या तंतुमय पदार्थांमुळे पोट साफ राहते.

2) ज्वारी पचनास सुलभ असल्यामुळे आजारी व्यक्तीस दूध भाकरी फायदेशीर ठरते.

3) ज्वारीमुळे पोटाचे विकार कमी होतात.

4) रक्तवाहिन्यांतील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी ज्वारी उपयुक्त आहे.

5) हृदयासंबंधित आजारात ज्वारी अतिशय उपयोगी आहे.

6) शरीरातील इन्शुलिनची उत्पादकता कायम, योग्य प्रमाणात व कार्यक्षम ठेवण्यास मधुमेह असणाऱ्यास, तसेच इतरांनाही ज्वारीचा वापर उपयुक्त ठरतो.

7) शरीरातील अतिरिक्त चरबी, वजन कमी करण्यासाठी, कातडीचे आजार, जठरातील आम्लता कमी करण्यास उपयोगी.

😎 महिलांच्या गर्भाशयाचे आजार, प्रजोत्पादन संस्थेचे विकार असणाऱ्यांना ज्वारी उपयोगाची आहे.

9) ज्वारीत काही घटक कर्करोगावर नियंत्रण आणतात.

10) शौचास साफ होणे, कावीळ रुग्णास उपयोगी आहे.


ज्वारीच्या पिठाची भाकर, थालीपीठ, धपाटे, उपमा, खानदेशात कळण्याच्या (ज्वारी व उडीद एकत्र दळून केलेले पीठ) पिठाची भाकरी, ज्वारीचे पापड, बिबडे, पाने, लाह्या, लाह्यांच्या जाडसर पिठाचे गोड पदार्थ, ज्वारी पीठ आंबवून केलेले धिरडे असे अनेक पारंपरिक पदार्थ आवर्जून आवडीने तयार केले जातात.


ज्वारीपासून रवा, लाह्या, पीठ, मिश्रधान्य पीठ, कळणा पीठ, हुरडा, पोहे, पास्ता, पापड, केक, बिस्कीट, कुकीज, ब्रेड, बन, बाल आहार, सिरप व साखर ( गोड ज्वारीपासून ) भरडा, मोड आणून बनविलेले पीठ (मालट फ्लोअर) हे पदार्थ तयार करता येतात. ज्वारीमधील पोषकद्रव्ये पाहता ज्वारीचा आहारात उपयोग केल्यास आहारातील पोषक मूल्यांचे संतुलन योग्य ठेवण्यास मदत होते. ज्वारीचे पीठ, रवा, शेवया, पास्ता, बेकरीचे पदार्थ, पोहे, लाह्या तयार करण्याचे तंत्र कृषी विद्यापीठ, अन्न तंत्र विभाग, प्रक्रिया विभाग, संशोधन केंद्रांनी विकसित केले आहे.


* तुम्हाला माहित नसलेले भाकरीचे प्रकार जाणून घ्या :-


भाकरी करणे हा महाराष्ट्र, कर्नाटक आणि इतर काही राज्यातील अनेक स्त्रियांच्या रोजच्या जीवनशैलीचा भाग आहे. सांज-सकाळ भाकऱ्या थापून त्यांच्या हाताला इतकी सवय झालेली असते, की' हातासरशी त्या भाकऱ्यांबरोबर, इतर दोन-चार प्रकार ही करुन टाकतात. पण तरी ते तंत्र सोपे नाही. नवीन शिकणाऱ्या व्यक्तीस, ते जमणे जरा कठिणच आहे. तरी ते काम सोपे पण नाहीच.


आपल्याकडे भाकरीसाठी ज्वारी, बाजरी, मका, पटणी, नाचणी, तांदूळ अशी धान्ये वापरली जातात. या सर्व धान्यात ग्लुटेन अगदीच कमी असल्याने, या पिठाला चिकटपणा असा नसतोच, त्यामूळे उकड काढली तरच या भाकऱ्या लाटता येतात, नाहीतर त्या थापूनच कराव्या लागतात. त्यापुर्वी पिठ चांगले मळून घ्यावे लागते, तसेच तव्यावरच्या भाकरीवर नेमक्या वेळी आणि नेमकेच पाणी, फिरवावे लागते. त्यात अजिबात चूक होऊन चालत नाही. त्यामानाने खालील प्रकार सोपे आहेत.


भाकरीच्या पिठात थोडे उडीद पिठ किंवा कणीक मिसळून, थोडाफ़ार चिकटपणा आणता येतो, या युक्ती प्रमाणेच आणखी काही उपाय योजले जातात, यातले काही पारंपारीक आहेत. भाकरी करताना नवी व्यक्ती, पुर्ण आकाराची भाकरी करायला जाते. आणि तिथे अनेकदा फसते.  ८/९ इंच व्यासाची भाकरी करण्यापेचा ३/४ इंचाची भाकरी करणे, जास्त सोपे जाते. तवा मोठा

असेल, अशा २/३ भाकऱ्या एकाचवेळी भाजता येतात.


* १) ओतलेली भाकरी :-


हा करायला अगदी सोपा प्रकार आहे. गोव्यात यासाठी तांदळाचे पिठ वापरतात. पण कणीक वा इतर पिठे वापरुन ही करता येते. एक कांदा व एक भोपळी मिरची अगदी बारीक चिरून घ्या. त्यात मीठ घाला. भोपळी मिरची (सिमला मिरची) जरा तिखट असतेच पण हवी तर यात एखादी हिरवी मिरची चिरून घाला. थोड्या वेळाने हे चुरुन त्यात तांदळाचे (किंवा इतर ) पिठ घालून सरसरीत भिजवा. कणीक सोडून इतर पिठे वापरायची असतील तर नावाप्रमाणेच ओतता येईल, इतपत पाणी घाला. (कणकेसाठी थोडे वेगळे तंत्र वापरावे लागेल) गावठी तांदळाचे किंवा मोदकासाठी खास मिळते ते पिठ वापरले तर जास्त चांगले. आता पिठात चमचाभर तेल टाकून ढवळा. मग बिडाचा किंवा नॉन स्टीक तवा तापत ठेवा. त्यावर तेलाचा पुसटसा थर द्या आणि मग हे पिठ ओता. साधारण अर्धा सेमी जाड असू द्या. झाकण न ठेवता

मंद आचेवर दोन्ही बाजूने गुलाबी भाजा. कणीक वापरल्यास, थालिपिठापेक्षा थोडे सैल भिजवा. फॉइलचा एक तूकडा घ्या. त्याला तेलाचा पुसटसा हात लावून, त्यावर पाण्याच्या हाताने हे मिश्रण थापा. मग फ़ॉइलसकट पण भाकरी तव्यावर आणि फ़ॉइल वर येईल, अशी टाका. थोड्याच वेळात फ़ॉइल सुटी होईल, ती काढून घ्या आणि भाकरी भाजा. याच फ़ॉइलवर दुसरी भाकरी थापता येईल. पुढच्या सर्वच प्रकारासाठी हे तंत्र वापरता येईल.


* २) गाजराची भाकरी :-


गाजराचे तूकडे करुन कूकरमधे उकडून मऊ करुन घ्या. त्यातले पाणी बाजूला करुन, गाजरे कुस्करून घ्या. कुसकरून गुठळ्या मोडल्या नाहीत तर एकदा ब्लेंड करुन घ्या. एक वाटी गर झाला तर त्यात लाल मिरच्यांचे बारीक तुकडे (फ़्लेक्स) अर्धा टिस्पून टाका, त्यात मीठ टाका आणि साधारण वाटीभर कुठलेही पिठ मिसळा. पिठ थोडे कमी-जास्त लागेल पण पिठ सैलसरच असू द्या. लागल्यास बाजूला ठेवलेले पाणी वापरा. आता वरच्या फ़ॉइलच्या तंत्राने भाकऱ्या करा. या भाकरीला अप्रतिम रंग येतो, त्यातले चिली फ़्लेक्सही सुंदर दिसतात.


* ३) कांदा भाकरी :-


मोठा कांदा किसून घ्या. त्यात थोडे मीठ मिसळा. थोडी जिरेपूड टाका. आणि मग त्यात पिठ भिजवा. आता वरच्या फ़ॉइलच्या तंत्राने भाकऱ्या करा. कवडी दही, मिरची आणि हि भाकरी, फ़क्कड बेत जमतो.


* ४) बटाटा भाकरी :-


बटाटा बारीक किसणीने किसून घ्या. त्यात मीठ मिसळा, म्हणजे काळा पडणार नाही. मग एका बटाट्याला, एक टेबलस्पून घट्ट पण आंबट दही, एक टिस्पून जिरे आणि

आवडीप्रमाणे हिरवी वा लाल मिरची टाका. (मिरचीचे लोणचे वापरल्यास जास्त चांगले.) त्यात तांदळाचे पिठ मिसळून, सैलसर भिजवा. या पिठाची भाकरी तव्यावर डावेने पिठ पसरुन करता येते. (तितपत पिठ पातळ ठेवा)

हि भाकरी कुरकुरीत होते.


* ५) वांग्याची भाकरी :-


भरताचे वांगे, भरतासाठी भाजतो तसेच भाजून घ्या. मग ते सोलून त्या गरात हिरवी मिरची, एखादा कांदा घालून, मिक्सरमधून एकजीव करुन घ्या. मीठ व तेल घालून

त्यात पिठ ( ज्वारीच्या पिठाने चांगली चव येते, पण बाकीची पिठे चालतात,) मिसळा. हे पिठ मात्र चपातीच्या पिठाप्रमाणे घट्टसर हवे. याच्या लाटूनही भाकऱ्या करता येतात. लसणाच्या चटणीसोबत सुंदर लागतात.


* ६) लसणाच्या पातीची भाकरी :-


मुंबईत थंडीत पातीचा लसूण मिळतो, पण तो घरी करणे अगदी सोपे आहे. नाही तरी या दिवसात घरातल्या साठवणीच्या लसणाला कोंब येतातच. अशा पाकळ्या सुट्या करुन मातीत खोचल्या, कि ते कोंब वाढू लागतात. या साठी अगदी करवंटीचा उपयोग केला, तरी चालतो. १०/१५ दिवसात वीतभर पाती वाढतात. यासाठी तांदळाची उकड काढावी लागते. एक वाटी पिठ मोजून तयार ठेवावे. वरच्या पाती कात्रीने बारीक कापून घ्या. एक वाटी पाणी उकळत ठेवा, त्यात मीठ, थोडा हिंग आणि एक टिस्पून तेल टाका. पाण्याला उकळी आली कि त्यात तांदळाचे पिठ पसरुन टाका. झाकण ठेवून एक वाफ़ येऊ द्या. मग गॅस बंद करा. दोन मिनिटाने त्यात लसणाच्या पाती (त्या कमी असल्या तर, थोडा लसूण बारीक चिरुन) टाका. पाण्याचा हात लावून मळून

घ्या. मग फॉइलच्या तंत्राने भाकऱ्या करा. साजूक तूपासोबत छान लागतात.


* ७) फ़णसाची भाकरी :-


८/१० फ़णसाच्या गऱ्यातील बिया काढून घ्या. रसाळ (बरका) फ़णस असेल तर गरे मिक्सर मधून काढा, कापा असेल तर गरे वाफ़वून घ्या आणि मग मिक्सरमधून काढा. मग त्यात मिठाचा कण आणि तांदळाचे पिठ मिसळा. यात थोडे नारळाचे दूध घातले तर छान.

मग वरच्या तंत्रानेच भाकऱ्या करा.


* ८) शेपूची भाकरी :-


वरच्या लसणाच्या पातीच्या तंत्राने शेपूच्या भाजीच्या भाकऱ्या चांगल्या होतात. भाजी अगदी बारीक कापायची नाही, म्हणजे भाकरीवर छान नक्षी दिसते. या भाकरीवर कच्चे तेल घालून खाल्ले तर चांगले लागते.


* ९) ऊसाच्या रसातली भाकरी (दशमी) :-


ऊसाचा रस एक वाटी ( रसात आले, लिंबू घातलेले नसावे ) पाव वाटी नारळाचे दूध, असे एकत्र करावे त्यात ज्वारीचे किंवा तांदळाचे पिठ मिसळावे. मिठाचा कण टाकावा. हे पिठ जरा पातळच भिजवावे. पारंपारीक प्रकारात केळ्याच्या पानावर थापून दशम्या करतात. खालीवर केळीचे पान ठेवून तव्यावर ठेवायची. थोड्या वेळाने परतायची. दशमी तयार झाली, कि पान सुटे होते.

जाड फॉइल वापरुनही करता येते.


* १०) गुळाची भाकरी :-


अर्धी वाटी गूळ, पाऊण वाटी पाण्यात कुस्करून विरघळवून घ्यावा. मग ते पाणी गाळून घ्यावे. त्यात थोडे तेल टाकून, नाचणीचे किंवा बाजरीचे पिठ भिजवावे. या भाकऱ्या थापायला सोप्या जातात, पण भाजताना काळजी घ्यावी लागते, कारण त्या लवकर करपतात. या भाकरीसोबत साजूक तूप चांगले लागते.


* ११ ) सोया चंक्सची भाकरी :-


एक वाटी सोया चंक्स किंवा मीन्स कोमट पाण्यात अर्धा तास कोमट पाण्यात भिजत घालावेत, मग ते पिळून घ्यावेत. त्याला १ टिस्पून आले लसूण पेस्ट लावावी. थोड्या तेलावर एक कांदा बारीक चिरून परतून घ्यावा. त्यावर १ टिस्पून टोमॅटो प्यूरे किंवा २ टिस्पून केचप टाकावा. मग त्यावर मिन्स किंवा चंक्स बारीक करून घालावेत व वाफ़ येऊ द्यावी. आवडीप्रमाणे, तिखट

व गरम मसाला घालावा. मग ते मिश्रण थंड झाले की त्यात कणीक घालून मळावे. याच्या छोट्या छोट्या भाकऱ्या कराव्यात. डब्यात न्यायला या सोयीच्या आहेत. मुलांना पण देता येतील.


१२) केळ्याची भाकरी :-


जास्त पिकलेले केळे किंवा उकडलेले राजेळी केळे यांचा गर वापरुन, फ़णसाच्या भाकरी प्रमाणेच भाकरी करता येते...


*माहिती आवडली तर इतर ग्रुप वर शेअर करा 🙏*


*ह्या व अशा निशुल्क माहीती साठी आरोग्य मधुमेह मुक्ती  हा ग्रुप जॉईन करा*


*(कॉपी पेस्ट)*


 *आयुर्वेदिक घरगुती उपाय व आरोग्य विषयक नवनवीन माहिती रोज आपल्या मोबाईल वर मिळवण्यासाठी खालील 


Saturday, 29 March 2025

सिकलसेल व जनुकीय आजारांवर अधिकाधिक संशोधन भर आवश्यक,वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी जनुकीय आजार तसेच स्टेम सेल आणि वृद्धत्वाशी निगडीत

 सिकलसेल व जनुकीय आजारांवर अधिकाधिक संशोधन भर आवश्यक

-  राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

 

Ø  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची उपस्थिती

Ø  एम्स नागपूरचा पहिला दीक्षांत समारंभ उत्साहात

 

नागपूरदि. 29 - वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी जनुकीय आजार तसेच स्टेम सेल आणि वृद्धत्वाशी निगडीत आजारांवर अधिकाधिक संशोधन करण्याची गरज आहे. उपचार पद्धती त्या दिशेने आखल्या पाहिजेतअसे प्रतिपादन राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आज केले.

 

मिहान परिसरात आयोजित अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या पहिल्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. याप्रसंगी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी,  खासदार डॉ. अजित गोपछडेखासदार श्यामकुमार बर्वेएम्स नागपूरचे अध्यक्ष डॉ. अनंत पांढरेकार्यकारी संचालक डॉ . प्रशांत जोशी यांच्यासह वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नातून पूर्वी केवळ दिल्लीत असलेले एम्स आता तामिळनाडूझारखंड या राज्यात तसेच नागपूरसह अनेक शहरात स्थापन झाले आहे. दिल्लीच्या एम्समध्ये रुग्णांच्या नातेवाईकांना तसेच सहाय्यकांना निवासाची सोय मिळावी म्हणून शेल्टर हॉल सुद्धा निर्माण करण्यात आले आहेत. एम्स नागपूरच्या स्थापनेपासून सर्वात आधी पदवी घेऊन बाहेर पडलेली पहिली तुकडी म्हणून आपली या संस्थेच्या इतिहासात नोंद केली जाईल. वैद्यकीय विद्यार्थ्यांनी आपले शिक्षण कधीच थांबवू नये. त्यांनी या क्षेत्रातील नियतकालिकांचा अभ्यास करून यातील नव नवे संशोधन समजून घेत आपले ज्ञान अद्ययावत करावे असे आवाहन त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना केले.

 

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर एम्समध्ये हृदय, यकृत तसेच अवयव प्रत्यारोपणाबाबत आणि पूर्व विदर्भात प्रामुख्याने असणाऱ्या थॅलसेमियासिकलसेल या आजारावर अत्याधुनिक उपचार उपलब्ध होणे आवश्यक असल्याचे सांगितले. बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशन सारख्या शस्त्रक्रियांना देखील राज्य शासनाच्या योजनेतून एम्समध्ये सवलत मिळावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

दीक्षांत समारंभाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे संबोधित केले. 2018 मध्ये एम्स नागपूरला मिहान येथे सुमारे 200 एकर जमीन महाराष्ट्र शासनाने उपलब्ध करून दिली. गेल्या वर्षात एम्स नागपूरने आरोग्य क्षेत्रामध्ये एक महत्वाची भूमिका बजावली आहे. येत्या काळातही ही संस्था वैद्यकीय क्षेत्रात मोलाचे योगदान देईलअसे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यावेळी म्हणाले.

                                                                 

Sunday, 16 March 2025

आरोग्य तपासणीपासून विद्यार्थी वंचित राहणार नाही यासाठी

 आरोग्य तपासणीपासून विद्यार्थी वंचित राहणार नाही यासाठी

ॲप विकसित करावे

- शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

 

मुंबईदि. १० : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आरोग्य तपासणीची अत्यंत आवश्यकता आहे. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (आरबीएसके) च्या माध्यमातून शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याची आरोग्य तपासणी करण्यासाठी शालेय शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्य विभागाच्या समन्वयाने वर्षभराची दिनदर्शिका तयार करावी आणि शाळांना पूर्वकल्पना देऊन पालकांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करावीअसे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिले. आरोग्य तपासणीपासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही यासाठी ॲप विकसित करावेअशी सूचनाही त्यांनी केली.

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत शालेय शिक्षण मंत्री श्री.भुसे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीस सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकरशालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीत सिंह देओलआरोग्य सेवा आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानचे संचालक अमगोथू श्री रंगा नायकआरोग्य सेवा संचालक डॉ. नितीन अंबाडेकरराष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या अतिरिक्त संचालक डॉ.कमलापूरकरउपसंचालक रेखा गायकवाड आदी प्रत्यक्ष तर शिक्षण विभागाचे आयुक्त सचिंद्र प्रताप सिंहनाशिक विभागीय आयुक्त प्रवीण गेडामनाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल आदी दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

शालेय शिक्षण मंत्री श्री.भुसे म्हणालेआरोग्य तपासणीपूर्वी विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना शाळेमार्फत सूचना देता येईल तसेच विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीच्या वेळी पालक त्यांच्यासोबत उपस्थित राहतील यासाठी विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीसाठी दिनदर्शिका तयार करण्यात यावी. तपासणीच्या दिवशी सर्व विद्यार्थी उपस्थित राहतीलयाची जबाबदारी शिक्षण विभागाने घ्यावी. विद्यार्थ्यांच्या नियमित तपासणीव्यतिरिक्त तो केव्हाही आजारी पडला तरीही त्याला ‘आरबीएसके’च्या माध्यमातून उपचार मिळावेत तसेच प्राथमिक तपासणीनंतर ज्या विद्यार्थ्यांना पुढील उपचाराची आवश्यकता असेल त्यांना संपूर्ण उपचार मिळतील याची दक्षता घ्यावी. यासाठी विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीसाठी नाशिक जिल्ह्याने तयार केलेल्या तसेच दमण येथे तयार करण्यात आलेल्या ॲपचा आरोग्य व शिक्षण विभागाच्या समन्वयातून अभ्यास करण्यात यावा. यातील चांगल्या बाबींचा समावेश करुन राज्यस्तरावर विद्यार्थ्यांच्या तपासणीसाठी ॲप तयार करण्यात यावेअशा सूचना श्री. भुसे यांनी यावेळी दिल्या.

विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेचा जिल्हानिहाय आढावा घेण्याची सूचना करुन श्री.भुसे यांनी प्रलंबित प्रकरणे तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश दिले. त्याचप्रमाणे या योजनेबाबत जागृती निर्माण करुन दुर्देवाने विद्यार्थ्याचा अपघात घडल्यास शिक्षकांनी स्वत:हून अशा विद्यार्थी आणि पालकांना मदत मिळेलयासाठी प्रयत्न करावेतअसेही त्यांनी सांगितले.

सार्वजनिक आरोग्य मंत्री श्री.आबिटकर यांनी यावेळी विद्यार्थ्यांचे आरोग्य ही अत्यावश्यक बाब असून यासाठी ‘आरबीएसके’च्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी होईलयाची आरोग्य विभागाने दक्षता घेण्याची सूचना केली.

0000

Featured post

Lakshvedhi