🌹🌹🌹🌹🌹 *चिंतन* 🌹🌹🌹🌹🌹
*भगवंताचे नाम मनापासून घ्यावे. अखंड चालणा-या नियमाने जो नाम घेतो त्यास संकटे त्रास देत नाहीत. भगवंतासाठी नाम घेणे म्हणजे मनापासून नाम घेणे. येथे एक अडचण येते ती अशी की, व्यवहारामधे आपण एखादे कर्म केले, की त्याचे फळ काय मिळते इकडे आपले लक्ष असते. किंबहुना ते फळ मिळावे म्हणूनच आपण ते कर्म करतो. भगवंताचे नाम घेताना ही सवय आड येते. पण अध्यात्मामध्ये ही सवय मोडावी. नाम घेतच रहावे असे वाटणे, हेच नाम घेण्याचे फळ समजावे. नाम घेण्याची वासना शिल्लक उतरून इतर वासना विराम पावतात म्हणजे पूर्णकाम. पूर्णकाम होऊन जो नित्यनेमाने नाम घेतो त्यावर संकटे आली तरी त्याचे नाम खंडित होत नाही. नामाला नित्याचे मोजमाप असावे. पण नामाला आरंभ केल्यावर मनाला भगवंताच्या दर्शनात, पूजनात, संभाषणात व प्रार्थनेत गुंतून ठेवावे. अंतकाळी ही सवय अतिशय उपयोगी पडते. अंतकाळी जीव भगवंताला बरोबर घेऊनच जातो.*
🌹🌹🌹🌹🌹🔥🌹🌹🌹🌹🌹