Showing posts with label उद्योग. Show all posts
Showing posts with label उद्योग. Show all posts

Monday, 9 September 2024

नागपूर मिहान प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडवण्यास शासनाचे प्राधान्य तातडीने पाऊले उचलण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निर्देश

 नागपूर मिहान प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडवण्यास शासनाचे प्राधान्य

तातडीने पाऊले उचलण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निर्देश

 

मुंबई दि.९ : नागपूर येथील महत्वाकांक्षी अशा मिहान प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडविण्यास शासनाचे प्राधान्य असून मिहान प्रशासनाने तातडीने पाऊले उचलावित, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

नागपूर येथील मिहान प्रकल्पाबाबत सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीला मृद व  जलसंधारण मंत्री संजय राठोड, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आशिष जैस्वाल, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे, सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी, गृहनिर्माण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव वल्सा नायर-सिंग, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ.श्रीकर परदेशी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, की मिहान प्रकल्पांतर्गत विकसित भूखंडासाठी आकारण्यात येणारे विकास शुल्क हे जनतेला परवडेल असे करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी. मिहान प्रकल्पासाठी आवश्यक निधी उपलब्धता होण्यासाठी सुधारित प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीसमोर सादर करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. मिहान परिसरातील ग्रामपंचायत क्षेत्रात बांधण्यात आलेले व्यापारी संकुले ही त्या ग्रामपंचायतींना हस्तांतरीत करावी, यामुळे संबधित ग्रामपंचायतींना उत्पन्नाचे साधन उपलब्ध होईल. तसेच पुनर्वसन काळातील मिहान भागातील ग्रामपंचायतींना पाठवलेले पिण्याच्या पाण्याचे बिल संबधित यंत्रणांनी कमी करावेत,असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सांगितले, की मिहान परिसरात असणाऱ्या म्हाडा वसाहतीतील रहिवाश्यांना त्या परिसराच्या बाहेर जागा उपलब्ध करुन देत त्यांचे स्थलांतर करावे. तसेच मिहान प्रकल्पबाधित कुटुंबाच्या पुनर्वसनासाठी विकसित भूखंड वाटप लवकरात लवकर करावे. मिहान परिसरातील ग्रामपंचायतींना करवसुलीचे अधिकार नसल्याने उत्पन्नाचे साधन राहिलेले नाही, या ग्रामपंचायतींना उत्पन्नाचे साधन मिळण्यासाठी एमआयडीसीकडून वापरण्यात येणारे सूत्र वापरण्यात यावे, अशा सूचना उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या.

Thursday, 24 August 2023

धर्मादाय रुग्णालयांची माहिती आता ‘आरोग्य आधार’ ॲपवर

 धर्मादाय रुग्णालयांची माहिती आता ‘आरोग्य आधार’ ॲपवर


- मंत्री डॉ. तानाजी सावंत


            मुंबई, दि. २३ :- आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांना धर्मादाय रुग्णालयात सवलतीच्या दराने वैद्यकीय सेवा दिल्या जातात. या रुग्णालयांची अद्ययावत माहिती रुग्णांना ‘आरोग्य आधार’ या ॲपद्वारे तत्काळ मिळणार असल्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी सांगितले.


            धर्मादाय रुग्णालयांतर्गत सुविधा रुग्णांपर्यंत पोहोचविणे, हॉस्प‍िटल रजिस्ट्रेशन पोर्टलचे सादरीकरण, एनएचएम पीआयपी २०२३-२४ सद्यस्थितीतील प्रगतीचा आढावा, आरोग्य संस्थांच्या बृहत आराखड्याचे सादरीकरण संदर्भात बैठकीचे मंत्रालयात आयोजन करण्यात आले होते, यावेळी मंत्री डॉ. सावंत बोलत होते.


            मंत्री डॉ. सावंत म्हणाले की, धर्मादाय रुग्णालयाच्या कार्याबाबत आदर्श कार्यप्रणाली तयार करताना पारदर्शी काम व्हावे, यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. धर्मादाय रुग्णालयाची माहिती तत्काळ उपलब्ध व्हावी यासाठी, ‘आरोग्य आधार’ ॲप रुग्णांच्या सेवेत येणार आहे. या ॲपद्वारे रुग्णांना जवळचे धर्मादाय रुग्णालय, तिथे उपलब्ध असलेल्या सुविधा, उपलब्ध खाटांची संख्यांची माहिती तसेच तत्काळ खाट राखीव करता येणार आहे. वॉर रुम, आरोग्यदूत, धर्मादाय रुग्णालय आणि व्यवस्थापनाला यासंदर्भात माहिती एकाच वेळी मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले.


            राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत तालुकास्तरावर आरोग्य सुविधेसाठी तालुका किंवा जिल्ह्यातील लोकसंख्येनुसार जिल्हा रुग्णालय, कर्करोग रुग्णालय, केमोथेरपी डे-केअर सेंटर, रेडिओ थेरपी ट्रिटमेंट युनिटसाठी प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी दिले.


            तसेच नर्सिंग होम ॲपमध्ये रुग्णालय आणि डॉक्टरांच्या प्रमाणपत्रांची त्रयस्थ पडताळणी करण्यात यावी. पदवीच्या सत्यतेची तपासणी करण्यात यावी, असे निर्देशही मंत्री डॉ. सावंत यांनी दिले.


            भौगोलिक माहिती प्रणालीद्वारे प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, सामान्य रुग्णालय, महिला व बाल आरोग्य केंद्र यांची मोजणी करण्यात आली आहे. केवळ अंतर आणि जिल्हा यानुसार केंद्रांची मागणी न करता जिल्ह्यातील लोकसंख्येनुसार आरोग्य केंद्र आणि उपकेंद्राची मागणी करण्यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही मंत्री डॉ. सावंत यांनी दिले.


            बैठकीस आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, आयुक्त धीरजकुमार, धर्मादाय आयुक्त श्री. महाजन यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.


०००

Saturday, 22 July 2023

अस्थमा / दमा.....*

 *अस्थमा / दमा.....*


अस्थमा किंवा दमा हा त्रास बऱ्याच लोकांना असतो. विशेषतः थंडीमध्ये आणि पावसाळ्यामध्ये आभाळ भरून आल्यावर दम्याचे अटॅक येतात. दमा सहजासहजी बरा होऊ शकत नाही. परंतु दमा नियंत्रित करता येतो. धूर, धूळ, हवा प्रदूषण इत्यादीची अ‍ॅलर्जी, सतत सर्दी, खोकला, मानसिक तणाव, जागरण, अतिश्रम, रक्ताची कमतरता, आनुवंशिकता ही दमा होण्याची मुख्य कारणे आहेत.


*दमा/अस्थमाच्या पेशंटनी पुढील काळजी घ्यावी...*


*१. दम्याचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी कफ वाढवणारा आहार दही, दूध, ताक, साबुदाणा, केळी हे पदार्थ खाऊ नयेत. 


*२. थंड पदार्थ खाणे टाळावे. खूप तहान लागली तरी थंड पाणी, पेये याचा मोह टाळावा.


*३. धूम्रपान करू नये. हे व्यसन असेल तर दम्याचा धोका वाढतो. 


*४. एसी किंवा कूलरमध्ये झोपू नये. रात्री जागरण करणे, थंड हवेत फिरणे टाळावे.  


*५. पोट नेहमी साफ राहील असे पहावे. मैदा, त्याचे पदार्थ, बटाटे, शिळे अन्न, हॉटेलचे जेवण टाळावे.


*दमा/अस्थमासाठी काही घरगुती उपाय...*


*१. थंडीमध्ये सुंठ व मध किंवा आल्याचा रस व मध एकत्र करून चाटण करावे. 


*२. दम्याचा जोरात अ‍ॅटॅक आल्यास खडीसाखर, खिसमिस आणि दालचिनी चावून खावे. अ‍ॅटॅक कमी होतो. 


*३. छातीला तीळाचे तेल लावून शेक घ्यावा. यामुळे छातीतील कफ नाहीसा होतो. ही गोष्ट रात्री झोपण्यापूर्वी किंवा सकाळी आंघोळ करण्यापूर्वी करणे चांगले. 


*४. रात्री झोपण्यापूर्वी किंवा सकाळी पुढील काढा घ्यावा. दोन ते तीन कप पाणी घेऊन त्यात तुळस व अडुळशाची दोन पाने घाला. पाणी उकळू द्यावे. हा काढा घेतल्यास दमा कमी होतो.


*५. छातीतील व गळ्यातील कफ सुटण्यासाठी दालचिनी दुधात उकळून घ्यावी. त्यात थोडा मध टाकून प्यावे. 


*६. एक ग्लास गरम पाण्यात एक चमचा मीठ टाकून ते पाणी दिवसभर एक एक घोट प्यावे. पिल्यास कफ पातळ होऊन बाहेर पडतो. हृदयरोग असल्यास हा उपाय करू नये. 


*७. मोहरीच्या तेलात मीठ टाकून छातीला चोळावे. गरम पाण्याने शेकावे. कफ पातळ होऊन सुटतो.


*८. आहारात दुधी भोपळा, लसूण, पडवळ,, चवळी इ. भाज्यांचा समावेश करावा. कोबी गरम पाण्यात टाकून त्याची वाफ घ्यावी. 


*९. प्राणायाम तसेच इतर व्यायाम प्रकृती प्रमाणे करावे. सकाळी व संध्याकाळी मोकळ्या हवेत फिरावे. दीर्घश्वसन करण्याची सवय लावून घ्यावी.


*डॉ. सुनील ,*


Tuesday, 18 July 2023

वनवा सलग दहा ते पंधरा वर्षे नाही लागला तर🔥*

 *🔥वनवा सलग दहा ते पंधरा वर्षे नाही लागला तर🔥*

*💦पाण्याबद्दल एक महत्व पूर्ण लेख💦*


🌳🌴🏞️🌄🌅


*डोंगर आणि झाडाशिवाय जमीनीत पुरेसे पाणी साठवणे अशक्य आहे*

🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀 


1) डोंगर हे जमिनीतील पाणीसाठ्याचे बाह्य कवच असते. उन्हाळ्यात डोंगराचे बाह्य आवरण तापते.माञ भूपृष्ठापर्यंत उष्णता पोहचू न शकल्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन होत नाही.या उलट डोंगर फोडला तर उष्णता थेट पोहचते व डोंगराच्या पोटातील ओलावा संपुष्टात येतो. 


2) पाणी जमिनीत दोन प्रकारे साठले जाते. *एक मृत साठ्याचे पाणी*

*दुसरे जिवंत साठ्याचे पाणी* 


       मृत साठ्याचे पाणी हे दहा फुटावर पाझरते तर जिवंत साठ्याचे पाणी दहा ते १०० व त्यापेक्षा अधिक पाळीवर आढळते.

       जेेंव्हा पाऊस पडतो तेंव्हा नदी नाल्याचे पाणी मृत साठ्याच्या स्वरूपात जमिनीत साठले जाते.जे कि एकदा उपसले कि संपून जाते. आणि जोपर्यंत ओढे वगळ वहात असतात तोपर्यंतच विहीर व बोअरला पाणी असते. 


       तर जिवंत साठ्याचे पाणी आज तरी भूगर्भातून संपलेले आहे. कारण जिवंत पाणी खोलवर जाण्यासाठी नैसर्गिक यंञणा हवी असते. 


3) एक पाण्याचा थेंब खडकातून पाझरून भूगर्भात जाण्याठी एक वर्षाचा कालावधी लागतो.म्हणजेच दहा फुटावर जाण्याठी दहा वर्ष लागतात. 


4) एक झाड एका दिवसाला ५० फुटावर दहा लिटर पाणी जमिनीत घेऊन जाते. कारण झाडं हे जमिनीच्या वर जेवढ्या उंचीपर्यंत असेल तेवढीच खोलवर त्याची मुळे असतात.म्हणून झाडं हे निसर्गाची बिनाखर्चाची पाईपलाईन आहे, 


5) एक कडूनिंबाचे झाडं दहा हजार लिटर पाणी एकुण पावसाळ्यात जमिनीत घेऊन जाऊ शकते.याचा अर्थ आपल्या परिसरात किमान ३० झाडं निंब, चिंच, जांबळ, अंबा, मोह, अर्जुन या वर्गातील नक्कीच असतील. म्हणून मृत साठ्याचे पाणी पाझरत रहात असावे. 


6) एक वडाचे किंवा पिंपळाचे मोठे झाडं एका हंगामासाठी एक कोटी लिटर पाणी जमिनीत घेऊन जाते.आणि ते ही पन्नास फुटाच्या ही खाली. वडाची व पिंपळाचे मुळे पाषाणालाही भेदून ८०० ते १००० फुटावर पोचतात. 


      एक कोटी लिटर म्हणजे एका विहीरीचा शंभर वेळा उपसा करावा एवढे पाणी. याचा गणितीय हिशोब सांगायचा झाला तर ३५ एकर शेतीचे रब्बी हंगामाचे भरणपोषण होते आणि वर्षभर बागायतीसाठी १५ एकरला पुरेल एवढे जिवंत साठ्याचे पाणी एक वड किंवा पिंपळ पुरवतो. 


      *म्हणून आपल्या शेताच्या शेजारी मोकळी पडीक जागा असेल तर किमान एक असा महावृक्ष लावा.* 


         आपण एक बोअरवेलसाठी एक लाख खर्च करतो. एका विहीरीसाठी पाच लाख खर्च करतो.पण पाण्याचा कुठलीच शाश्वती नाही'. 


           कारण आपली नियत ही धुर्त असते, डोंगर संपुष्टात आणण्याची,डोंगारावरील झाडं तोडण्याची, बांध संपवून बोडके करण्याची म्हणून पाणी तरी कुठून येणार? 


6) पाण्याचे दुर्भिक्ष हे मानव निर्मित आहे. देवाला दोष देण्यात अर्थ नाही.खरे दोषी आपण व आपला स्वार्थ आहे. 


           हवा ही ऊर्जा आहे.

           पाणी हे अमृत आहे

          तर माती ही जननी आहे.

        तर झाडं हे जीवनदायी आहेत. 


झाड नसेल तर हवा रोगट होते. पाणी विषासमान होते आणि माती वांझ होवून शापीत होते.

         

7) झाडांचं मूल्य समजून घ्या... आणि दहा रूपयाचं फक्त एक झाडं शेत असेल तर शेतात नाहीत तर माळरानावर,डोंगरावर कुठे ही जगविण्याची जबाबदारी घ्या.... 


       या शिवाय दुसरा कुठलाच पर्याय शिल्लक नाही. तुम्ही गावाचे, शहराचे, देशाचे, समाजाचे आणि स्वहिताचे जर काही देणं लागत असाल तर एवढचं साध काम करा. 


          झाडं मानसाचं मन, मस्तिष्क व जीवन हिरवंगार करत असतात. 


8) एक सदैव लक्षात असु द्या. झाडांची पाणी पाठवण्याची व वाहण्याची क्षमता त्यांच्या 

वयावर व प्रकारावर अवलंबून असते. शक्यतो देशी झाडे लावा.


🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺


*(

Monday, 17 July 2023

निरोगी आयुष्यासाठी पाणी पिणे किती महत्त्वाचे आहे

 निरोगी आयुष्यासाठी पाणी पिणे किती महत्त्वाचे आहे हे आपण याआधी पाहिले आहे. आज आपण पाणी पिण्याच्या योग्य वेळा कोणत्या व त्याने काय फायदे होतात ते पाहू.


१. *सकाळी उठल्या उठल्या लगेच: १ ग्लास पाणी*

याने आपला मेंदू आणि शरीर स्लिप मोड मधुन ग्रीड मोड मध्ये येतात. आपले अंतर्गत अवयव शुद्ध आणि स्वच्छ होतात.


२. *जेवणाआधी ३० मिनिटे: १ ग्लास पाणी*.

यांनी आपली पचनक्रिया सुधारते आणि कॅलरी इंटेक कंट्रोल मध्ये राहतो.


३. *व्यायामाच्या आधी व नंतर: १ ग्लास पाणी*.

व्यायामाच्या आधी प्यालेले पाणी आपल्या शरीराला व्यायामासाठी वॉर्मअप सारखे तयार करते.


व्यायामानंतर प्यालेले पाणी आपल्याला डीहायड्रेशन पासून वाचवते.


हेवी व्यायाम केल्यावर किंवा गर्म्याच्या दिवसात जास्त पाणी प्यावे.


४. *आंघोळीच्या आधी: १ ग्लास पाणी*.

कोमट पाणी प्याल्याने आपल्या रक्तवाहिन्या प्रसरण पावतात आणि आपले ब्लड प्रेशर कमी करण्यास मदत होते.


५. *झोपायच्या आधी: १ ग्लास पाणी*.

झोपण्याआधी जर आपण हायड्रेटेड असलो तर हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस कमी होतात. कारण घट्ट रक्त हार्ट अटॅकचे मुख्य कारण आहे.


६. *जेव्हा तुम्ही खूप थकलेले असाल: १ ग्लास पाणी*.

पाणी आपल्या मेंदूला पावर अप करते. Noggin's Fluids ची पातळी वाढते आणि आपल्या cognitive functions मध्ये सुधारणा होते.


जेव्हा तुम्हाला एखादे प्रेसेंटेशन द्यायचे असेल त्याआधी १ ग्लास पाणी प्या.


जेव्हा झोप येत असेल आणि झोपणे शक्य नसेल तेव्हा पण एक ग्लास पाणी प्या.


आहेत ना अनेक फायदे योग्य वेळी पाणी पिण्याचे?


*डॉ. प्रमोद ढेरे,*



Thursday, 13 July 2023

ऑयली त्वचा (Oily Skin) साठी उपाय कसा करावा :*

 *👉ऑयली त्वचा (Oily Skin) साठी उपाय कसा करावा :*


1) बेसन, तांदळाचे पीठ, दही आणि हळद मिक्स करून लेप बनवून लावल्यामुळे स्कीन चे ऑईली पण समाप्त होते आणि चेहऱ्यावर चमक येते. हा उपाय face वरून काळे दाग आणि पिंपल्स दूर करण्यासाठी देखील फायदेशीर होतो.


2) मध, पुदिना रस आणि लिंबू रस यांचा देखील oily skin पासून सुटका मिळवण्यासाठी वापर केला जाऊ शकतो.


3) हळद, मुलतानी माती आणि चंदन यांचा लेप चेहऱ्यातील मॉश्चराइज ओढून घेतो आणि स्कीन ऑईल फ्री होते. या घरगुती उपाया मुळे स्कीन टाईट होते. यामुळे तुम्ही नेहमी फ्रेश दिसाल. हा लेप लावल्यावर 30 मिनिटांनी चेहरा धुवावा.


4) चेहऱ्यावर कच्चा बटाटा किंवा काकडी चोळल्यामुळे देखील फायदा होतो.


👉चेहरा गोरा आणि सुंदर कसे बनवायचे :


1) एलो वीरा ज्यूस, एप्पल साइडर विनिगर आणि हळद, या तीन वस्तू मिक्स करून चेहऱ्यावर लावल्याने त्वचेचा सावळे पण दूर होतो.


2) गोरा रंग मिळवण्यासाठी हळद आणि लिंबूरस वापरणे उत्तम आहे. हा उपाय तेलकट त्वचेच्या लोकांसाठी उत्तम आहे.


3) दुधा ची मलाई, बेसन आणि हळद मिक्स करून एक लेप बनवा. हा लेप चेहऱ्यावर व्यवस्थित लावा. ऑईल स्कीन वाल्यांनी हा उपाय करू नये. ड्राय स्कीन वाले करू शकतात.


4) मध, गुलाबाच्या पाकळ्या आणि दुध यांचा लेप रंग उजळण्या साठी आणि चेहऱ्यावर चमक आणण्यासाठी वापरा.


5)बाहेरून आल्यावर त्वरित चेहरा स्वच्छ धुवावा कारण त्वचेच्या रोम छिद्रात मळ जमा होऊ शकतो.


6) पपई चेहऱ्याचा रंग उजळण्यासाठी फायदेशीर आहे. कच्ची पपई dead skin cells दूर करण्यासाठी उपयोगी आहे.


 👉तुळशीची पाने बारीक वाटून याचा लेप चेहऱ्यावर लावल्यामुळे चेहरा टवटवीत होतो.


👉अननस आणि पिकलेले टोमाटो चेहऱ्यावर face pack बनवून लावल्याने हळूहळू गोरे पण येईल.


👉वाफ घेतल्याने छिद्रात साठलेले तेल, माती आणि डेड स्कीन सेल्स सहज निघून जातात. हा skin care चा सर्वात उत्तम आणि सोप्पा उपाय आहे.


👉दही, आवळा पावडर, हळद आणि बेसन मिक्स करून एलोवीरा ज्यूस आणि थोडा लिंबूरस मिक्स करून फेशियल पैक तयार करा. यास चेहऱ्यावर लावा. या उपायाने काळे दाग दूर होतील आणि skin moisturize होईल.


☝️शरीराची बाहेरील सुंदरता वाढवण्यासाठी आवश्यक आहे कि तुम्ही शरीराच्या आतून देखील निरोगी असले पाहिजे. वर सांगितलेले ब्युटी चे घरगुती उपाय करण्या सोबतच आवश्यक आहे तुम्ही हे उपाय देखील केले पाहिजेत.


👉पौष्टिक भोजन खावे ज्यामुळे शरीराला आवश्यक पोषक तत्व मिळतील आणि त्वचा निरोगी राहील. यासाठी तळलेले, मसालेदार, फास्ट फूड खाण्याच्या एवजी विटामिन आणि मिनरल्स असलेले पदार्थ आहारात घ्यावेत.


👉पोटाच्या आजारा पासून स्वताला वाचवा. सकाळी पोट सोफ्ट करण्यासाठी गरम पाण्यात थोडासा लिंबूरस, मध आणि अद्रक रस मिक्स करून प्यावे.


👉रोज 3 ते 4 लीटर पाणी प्यावे ज्यामुळे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर निघून जातील.


👉वेळेवर भोजन करावे.


👉रोज व्यायाम करावा.

तणाव मुक्त राहावे आणि चांगली झोप घ्यावी.


👉खाण्यापिण्याच्या वाईट सवयी पासून वाचावे.


👉जर तुम्ही पिंपल्स ने हैराण आहे तर कांदा आणि लसून यांची पेस्ट बनवून यामध्ये कडूलिंबाची पाने मिक्स करून पेस्ट बनवा. आता हे मिश्रण थोडी हळद मिक्स करून फेस वर लावा. याच्या व्यतिरिक्त तुम्ही वाफ घेऊ शकता ज्यामुळे pimples दूर होतील.




Tuesday, 11 July 2023

शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाच्या अनुषंगाने१३ जुलै रोजी वाहतुकीत बदल

 शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाच्या अनुषंगाने१३ जुलै रोजी वाहतुकीत बदल

            पुणे, दि. १० : पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथे १३ जुलै रोजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत ‘शासन आपल्या दारी’ व जेजुरी विकास आराखडा भूमीपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी लाभार्थी राज्य परिवहन महामंडळाच्या बसने व अन्य वाहनांने मोठ्या प्रमाणात उपस्थित राहणार असल्याने वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाहतुकीत बदल करण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जारी केले आहेत.


            वाहतुक कोंडी होऊ नये म्हणून १३ जुलै रोजी पहाटे ५ वाजेपासून ते सायं. ८ वाजेपर्यंत पुणे ते पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग क्र. ९६५ आणि पुणे ते बारामती या मार्गावरील जड, अवजड व इतर वाहतूक बंद करुन अन्य पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.


            जेजुरी पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण हद्यीतील वाहतूक : सातारा, फलटण, लोणंद, बारामती येथून पुणे येथे जाण्याकरीता जेजुरी सासवडकडे येणारी जड, अवजड व इतर - वाहतुक पूर्णपणे बंद करुन त्यावरील वाहने ही निरा-मोरगाव-सुपा ते केडगाव चौफुला मार्गे पुणे-सोलापूर महामार्ग क्रमांक ६५ वरुन पुणे या मार्गे वळविण्यात येणार आहेत. पुण्याकडून बारामतीकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद करुन बेलसर- कोथळे- नाझरे सुपे-मोरगाव रस्ता मार्गे बारामती-फलटण- सातारा या मार्गे वळविण्यात येणार आहे.


            वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण हद्यीतील वाहतूक: बारामती व नीरा बाजूकडून जेजुरी मार्गे पुणे बाजुकडे जाणारी जड, अवजड व इतर वाहतूक पूर्णपणे बंद करुन ती मोरगाव- सुपा- केडगाव चौफुला मार्गे पुणे- सोलापूर महामार्ग क्रमांक ६५ वरुन पुणे या मार्गे वळविण्यात येणार आहे. 


            सासवड पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण हवीतील वाहतूक: पुणे बाजूकडून जेजुरी मार्गे फलटण - सातारा बाजुकडे जाणारी जड, अवजड व इतर वाहतूक पूर्णपणे बंद करुन सासवड- नारायणपूर-कापूरहोळ मार्गे सातारा - फलटण किंवा सासवड-वीर फाटा-परींचे- वीर- वाठार मार्गे लोणंद या मार्गे वळविण्यात येत आहे.


            वाहतुकीस लावलेले निर्बंध १३ जुलै रोजीच्या ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमासाठी येणाऱ्या वाहनांसाठी शिथील राहतील. नागरिकांनी वाहतूकीत केलेल्या बदलाची नोंद घेवून सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.


00

Sunday, 2 July 2023

आहार सेवनाविषयीचे नियम 📌

 📌 आहार सेवनाविषयीचे नियम 📌


🍎अन्न नेहमी ताजे व गरम जेवावे.असे अन्न स्वादिष्ट तर असतेच शिवाय लवकर व चांगले पचते.फारच थंड वा फारच गरम अन्न मात्र कधीच खाऊ नये.


🍎अगदी कोरडे अन्न वा तेलातुपाने नुसते माखलेले अन्न खाऊ नये.अगदी कोरडे अन्न म्हणजे रुक्ष अन्न खावयास तर त्रास होतोच पण पचावयास देखील त्रास होतो.


🍎अन्नाचे प्रमाण भूक व पचनशक्ती यांच्या अनुमानाने योग्य तेवढे जर ठेवले तर त्रिदोषांना कोठेही न बिघडवता तीनही दोषांचे योग्य असे पोषण करण्यास ते सक्षम ठरते.


🍎भूक लागल्याशिवाय जेवू नये.भूक लागणे हे आधीचे जेवण पचले आहे असे समजण्याचे साधन आहे.


🍎आधी खाल्लेले अन्न नीट पचल्याखेरीज जेवू नये.अन्यथा अन्नपाचक रसांना,आतड्यांना ताण येतो व पचनसंस्था बिघडते.


🍎दोन परस्परविरोधी अशा प्रकारचे अन्न एकाच वेळी व एकामागून एक असे खाऊ नये.अशाने रोगाला आमंत्रण मिळते.


🍎अस्वच्छ जागी बसून जेवू नये.याने जंतुसंसर्ग वाढतो.


🍎खूप भराभर असे जेवू नये.अशाने ठसका लागण्याचा संभव निर्माण होतो व अन्नाचा तिटकारा वाटण्याची शक्यता निर्माण होते.


🍎अति सावकाश रेंगाळत देखील जेवू नये.असे केल्यास जेवण तर गार होतेच शिवाय पचन मंदावते,भूक नीट भागत नाही व जेवणाचे समाधान होत नाही.


🍎जेवताना टीव्ही, मोबाईल,लॅपटॉप,व्हिडीओ गेम्स हे काटेकोरपणे टाळावे.यामुळे जेवणात लक्ष राहत नाही.


🍎यासाठी जेवणासारखी अत्यंत महत्वाची गोष्ट पूर्णपणे लक्ष देऊन स्वतःसाठी काय योग्य आणि काय अयोग्य याचा विचार करून प्रसन्न मनाने करावी.


📚संदर्भ-- डॉक्टर मी काय खाऊ?


📝माहिती संकलन👇

डॉ.स्वाती पाटील

होमिओपॅथ|बॅच फ्लॉवर रेमेडी थेरपिस्ट|आहारतज्ज्ञ.



*सर्व ग्रुप मेंबर ना विनंती,* 

*तुम्ही ज्या दुसऱ्या इतर ग्रुप वर कार्यरत आसाल,* 

 *त्या सर्व ग्रुप वर आरोग्य विषयक माहिती फॉरवर्ड करा 🙏🏻*


_*

पांढरे केस काळे करूया*

 *पांढरे केस काळे करूया* 


काल पासून आपण केस विषयावर चर्चा करत आहोत. आज आपण केस का पिकतात, अकाली पांढरे का होतात.याचे नेमके कारण समजून घेऊया. व केस परत नँचरल काळे करायचे असतील तर काय उपाययोजना यांचा अभ्यास करुया.चला तर मंडळी सुरू करुया.

अनेक लोकांना माहिती नसते केस पांढरे का होतात.आणि एकदा का हे केस पांढरे झाले की मग निरनिराळे उद्योग लोक सुरू करतात. मग अनेक कलर,डाय चोपडून त्या केसांना काळे केले जाते कलर केले जातात. पण मुळ समस्येच्या मुळाचा शोधच कुणी घेत नाही परिणाम स्वरूप हळूहळू सारेच केस पांढरे होतात डाय लावले जातात व केस झडणे,गळणे या समस्या जन्म घेतात.

१)मेलानीन,मेलांजीन-केस काळे राहण्यासाठी रक्तात मेलानीन नांवाचे एक रसायन असते.ज्याचे प्रमाण कमी झाले की केस पिकतात. यासाठी शंभर ग्रँम बदाम, शंभर ग्रँम मनुके,दहा ग्रँम मिरी एकत्रित करून मिक्सरमध्ये फिरवून गोळ्या करा.रोज सकाळी चार संध्याकाळी चार रात्री चार खात जा.याने बल,विर्य,पुष्टी सह केस पिकायचे थांबतील.

२)आहारात गाजरज्युस,टाँमँटो ज्युस,अंड्यातील पिवळा बलक,स्ट्राँबेरी, रासबेरी,स्पिरुलिना म्हणजे खाण्यायोग्य शेवाळ अथवा याची कँप्सुल याचा समावेश करा.मेलानीन च प्रमाण नियंत्रित राहून केस पांढरे होणं कमी होईल.

३)रोज चमचा भर काळेतीळ व काळा गुळ खात जा.केसांसाठी ची रंगद्रव्य टिकून राहतात.

आता पाहू काळे करण्याचे पर्याय.

१) केस धुताना तुरटी लावावी डोक्यावर.अथवा थंड अथवा कफ कारक प्रकृती वाल्या मंडळींनी तिळाच्या तेलात तुरटीची पावडर मिक्स करून केसांना लावावी.तर गरम उष्ण प्रकृती वाल्या मंडळींनी खोबरेल तेलात मिक्स करून लावावी.

२)आवळ्याच्या गराची पेस्ट केसांच्या मुळांपासून डाय सारखी लावावी.

३)वरचेवर खोबरेल तेलात लिंबू पिळून लावत जावे यातील बायोटीनीन केसात शुष्कता न येऊन देता ओलावा निर्माण करतं व केस पांढरे होणे कमी होते.

४)आठवड्यात दोन वेळा कढीपत्त्याची पाने पावडर करुन खोबरेल तेलात मिक्स करून माँलीश करुन लावा.

५)चमचा भर चहापावडर व चमचाभर नँचरल काँफी एकत्र करून कपभर पाण्यात उकळून ते पाव कप होईपर्यंत आटवून आठवड्यात एकदा ते दोनदा माँलीश करून चोळा.केस नँचरल काळे व्हायला लागतील सुकल्यानंतर धुवून टाका.

६)पांढऱ्या कांद्याची पेस्ट करून केसांच्या मुळाशी लावत जा केसांना चोळत जा.माँलीश करा.

७)आयुर्वेदिक दुकानात मिळणारी नँचरल मेहंदीपावडर,तमालपत्र एकत्रित कपभर पाण्यात उकळून केसांना डायप्रमाणे पेस्ट करून लावा केस काळे राहतील

८)शिकेकाई रात्री भिजवून सकाळी उकळून गार झाल्यावर केसांना पेस्ट प्रमाणे लावा.

वरील उपाय आलटून पालटून करा 


केस धुण्यासाठी तुम्ही केमिकल विरहित नँचरल शांपू वापरू शकता. उद्याच्या भागात आपण केसांच्या विविध समस्या व त्यावरील आयुर्वेदिक औषधे या वर काय आहेत ते पाहू.

वैद्य. गजानन




Thursday, 29 June 2023

सर्व लोक कापुराचा उपयोग धार्मिक कार्यात करतात, पण काही आरोग्यदायक उपयोग पण आहे.*

 *सर्व लोक कापुराचा उपयोग धार्मिक कार्यात करतात, पण काही आरोग्यदायक उपयोग पण आहे.*

 

जर एखाद्या ठिकाणी मुका मार लागला असेल तर स्नायूंना सूज येऊन तो भाग फुगल्याप्रमाणे वाटू लागतो. सूज आल्यामुळे त्या भागातून प्रचंड वेदना जाणवतात. अशावेळी सूज आलेल्या भागावर तुम्ही कापूर लावू शकता. कारण कापरामध्ये दाह आणि जळजळ कमी करण्याची क्षमता असते. कापराची पूड करून तेलासोबत त्या भागावर लावा आणि काही मिनीटे तो भाग बांधून ठेवा. असं नियमित केल्यामुळे हळूहळू त्या भागावरची सूज कमी होते.


त्वचेवरील रॅशेस कमी होतात 

त्वचेच्या समस्यांमध्ये आणखी एक मोठी समस्या जाणवते ती म्हणजे त्वचेवरील रॅशेस. उष्णता, घाम, सतत पाण्यात काम करणे, अस्वच्छता अशा अनेक कारणांमुळे त्वचेवर रॅशेस येऊ शकतात. त्वचेवरील पुरळ कमी करण्याचा एक सोपा मार्ग म्हणजे कापराचा वापर करणे. कारण कापरामुळे तुमच्या त्वचेवरील पुरळ आणि लालसरपणा लगेच कमी होतो. यासाठी पाण्यात थोडं कापराचं तेल मिसळा आणि पुरळ आलेल्या भागावर लावा. ज्यामुळे त्या भागावरील पुरळ हळू हळू कमी होईल. यासोबतच जाणून घ्या पुरळ घरगुती उपाय, असे कमी करा अंगावरील रॅशेस

भाजलेली त्वचा बरी होते.

कापराचे फायदे अनेक आहेत कारण कापरामध्ये वेदना कमी करणारे आणि त्वचेचा दाह कमी करणारे गुणधर्म असतात. म्हणूनच अनेक मलम अथवा क्रिममध्ये कापराचा वापर केला जातो. तुम्ही त्वचेवरील भाजलेली जखम बरी करण्यासाठी त्वचेवर कापराचे तेल लावू शकता. व्हॅसलीनमध्येही कापराचा अंशतः वापर केलेला असल्यामुळे ते वापरण्यासही काहीच हरकत नाही. व्हॅसलीन मुळेही त्वचेच्या अनेक समस्या बऱ्या होतात. याशिवाय कापूर तेलात मिसळून लावण्यामुळे त्वचेची जळजळ लगेच कमी होते. 

आर्थ्राटीसवर उपचार :

जर तुम्हाला आर्थ्राटीस असेल तर सांध्याच्या दुखण्यामुळे तुम्ही पुरते बेजार होता. आर्थ्राटीसमुळे साधं उठणं आणि बसणं अशा दैनंदिन क्रिया करणंदेखील कठीण जाऊ शकतं. मात्र कापूर तुमच्या या त्रासावर वरदान ठरू शकतो. यासाठी तेलामध्ये कापूर मिसळा आणि सांध्यावर त्याने मालिश करा. कापरातील थंडाव्यामुळे तुमच्या सांधेदुखीवर आराम मिळतो. दाह आणि वेदना कमी झाल्यामुळे तुम्हाला तुमची दैनंदिन कामे व्यवस्थित करता येऊ शकतात. यासोबतच जाणून घ्या आर्थ्रायटिसच्या रुग्णांसाठी आहार.


नखांचे फंगस कमी होते

कापूर हे एक परिणामकारक निर्जंतूक करणारे साधन असल्यामुळे याचा वापर तुम्ही तुमच्या नखांच्या फंगसवरही करू शकता. कापरामुळे अनेक प्रकारच्या त्वचेच्या समस्या आणि बुरशी नष्ट होतात. यासाठीच जर तुमच्या नखांना फंगस होत असेल. तर तेलात कापूर मिसळा आणि त्या तेलाने नियमित नखांना मालिश करा. 

शांत झोप लागण्यास मदत 

निद्रानाश हा आजकाल अनेकांना जाणवणारी आरोग्य समस्या आहे. अपुरी झोप मिळण्यामागे अनेक कारणं असू शकतात. कारण चिंता, काळजी, नैराश्य, आरोग्य समस्या अशा अनेक कारणांमुळे तुम्हाला रात्री उशीरापर्यंत झोप लागत नाही. झोप लागण्यासाठी सतत गोळ्या घेणं आरोग्यासाठी मुळीच योग्य नाही. यासाठीच या समस्येला बरं करण्यासाठी कापराचा वापर करा. कापरामुळे तुमचे मन शांत होते आणि तुम्हाला शांत झोप लागते. कापराचे तेल उशीवर टाकून त्या मंद सुवासात झोपण्याचा प्रयत्न करा. 

सर्दी खोकला बरा होतो.

सर्दी खोकला हे संसर्गजन्य विकार संक्रमित व्यक्ती अथवा वातावरणातील बदलांमुळे होत असतात. सर्दी खोकला बरा करण्यासाठी तुम्ही कापराचा वापर करू शकता. कारण कापरामध्ये वातावरण निर्जंतूक करणारे गुणधर्म असतात. यासाठीच विक्स वेपोरेबमध्येही कापराच्या तेलाचा वापर केला जातो. तुम्ही घरात कापूर जाळून, कापराच्या तेलाचा अथवा विक्स वेपोरेबचा वापर करून तुमची सर्दी बरी करू शकता. 

एक्नेवर घरगुती उपचार.

कापूर त्वचेसाठी अतिशय उत्तम असतो. त्यामुळे कापराचा फायदे तुम्ही तुमच्या त्वचेवरील एक्ने अथवा पिंपल्स कमी करण्यासाठी नक्कीच करू शकता. कापराच्या तेलामुळे तुमच्या त्वचेतील पिंपल्समुळे निर्माण झालेले डाग, काळसरपणा, लालसर लाली आणि दाह कमी होतो. यासाठीच नारळाच्या तेलात कापूर मिसळा आणि तुमच्या पिंपल्सवर लावा. याचे कोणतेही दुष्परिणाम तुमच्या त्वचेवर होत नाहीत. कापराचा वापर केल्यामुळे तुमच्या त्वचेला थंडावा मिळतो. 


केसांची वाढ चांगली होते 

केस गळणे ही एक गंभीर समस्या आहे. कारण केस गळण्यामागे आणखी अनेक कारणे आणि आरोग्य समस्या कारणीभूत असू शकतात. त्यामुळे जर तुमचे प्रमाणाबाहेर आणि सतत केस गळत असतील तर त्यावर योग्य उपचार करायला हवेत. कापराच्या तेलाने केस गळणे कमी करून केसांच्या वाढीसाठी प्रयत्न करू शकता. यासाठी तुमच्या रेग्युलर तेलात कापराचे तेल मिसळा आणि केसांवर उपचार करा. 

लहान मुलांना केसात उवा झाल्या तर त्या कमी करणे ही पालकांसाठी एक समस्याच असते. कारण लहान मुले इतर लहान मुलांच्या सतत संपर्कात येत असतात. उवा आणि लिखा या एकमेकांच्या संपर्कातून संक्रमित होत असतात. ज्यामुळे लहान मुलांच्या डोक्यात उवा होणे ही गोष्ट न थांबवता येण्यासारखी आहे. मात्र यावर तुम्ही कापराचा उपचार करू शकता. कारण उवांवर कापराचे चांगला परिणाम होतो. उवा कमी करण्यासाठी नारळाच्या तेलात कापूर भिजवा आणि ते तेल केसांना लावा. का

Tuesday, 27 June 2023

मूत्रसंस्थेचे आजार.....*

 *मूत्रसंस्थेचे आजार.....*


लघवी अडकणे, लघवी बंद होणे, वारंवार लघवी होणे, उन्हाळी, लघवीतून पू येणे, लघवीत रक्तयेणे, पोटात दुखणे, चेहरा सुजणे ही मूत्रसंस्थेच्या आजाराची वेगवेगळी लक्षणे आहेत.


लघवी अडकणे आणि बंद होणे या दोन लक्षणांमध्ये महत्त्वाचा फरक आहे.


लघवी बंद होणे (किंवा कमी होणे) म्हणजे मूत्रपिंडाचे काम बंद पडणे किंवा कमी होणे, यामुळे लघवी कमी तयार होते किंवा बंद होते.


*लघवी अडकणे...*

'लघवी अडकणे' म्हणजे लघवी नेहमीप्रमाणे तयार होते पण मूत्रनलिकेच्या अडथळयांमुळे ती मूत्राशयात अडकून पडते. लघवी अडकली असेल तर बेंबीखालच्या ओटीपोटात तडस लागते. लघवी अडकली आहे असे वाटते. यामुळे ओटीपोटाच्या भागात फुगार वाटतो. लघवी अडकण्यामागचे आजार अनेक प्रकारचे असतात. 


*लघवी अडकणे...*

लघवी अडकणे ही गंभीर तक्रार आहे. बहुतेक वेळा त्यावर उपचारासाठी डॉक्टरकडेच जावे लागते. लघवी अडकण्याच्या कारणाचे निदानही आवश्यक असते. रोगनिदानासाठी काही बाबतीत क्ष-किरण चित्राची किंवा सोनोग्राफीची गरज पडते.


आयुर्वेद लघवी अडकली असेल तर ती मोकळी करण्यासाठी तात्पुरता उपाय म्हणून बेंबीखालच्या भागावर (म्हणजे फुगलेल्या मूत्राशयावर) गरम पाण्याने किंवा कपडयाने शेक द्यावा. शेक देण्यासाठी पळसाची फुले गरम करून वापरली जातात. याचाही उपयोग होतो. पळसफुलांचा रस (500मि.ली.) + हिरडापावडर (5 ग्रॅ) + गूळ (300 ग्रॅ) + धायटीची फुले (35 ग्रॅ.) यांचे एकत्रित आसव करून ठेवावे. हे आसव पोटातून दिल्यास लघवी मोकळी होण्यास मदत होते. हे आसव दीड ते दोन चमचे द्यावे व ओल्या फडक्याने मूत्राशयावर शेक द्यावा. लघवी बाहेर पडत नसल्यास वेळीच तज्ज्ञाकडे पाठवावे.

 

*लघवी बंद होणे...*

तरुण-प्रौढ वयात दररोज सुमारे एक ते दीड लिटर लघवी तयार होते. हवामानाप्रमाणे व पाणी पिण्याच्या प्रमाणानुसार लघवीचे प्रमाणही बदलते. हिवाळयात लघवीचे प्रमाण जास्तअसते कारण घामाचे प्रमाण कमी असते. याउलट उन्हाळयात लघवी कमी होते.र् साधारणपणे तरुण- प्रौढ व्यक्तींमध्ये रोज एक लिटर हे लघवीचे किमान प्रमाण धरले जाते. टाकाऊ पदार्थ, युरिया, इत्यादी योग्य प्रमाणात शरीराबाहेर पडण्यासाठी एवढी लघवी तयार व्हावीच लागते. मूत्रपिंडाच्या निरनिराळया आजारांत हे प्रमाण कमी होत जाते व बंदही पडू शकते. हे अचानक घडू शकते किंवा हळूहळू (काही दिवस, महिने) होऊ शकते. हळूहळू आपली लघवी बंद होत आहे, हे बऱ्याच रुग्णांच्या लवकर लक्षात येत नाही.


https://chat.whatsapp.com/IGqdOIrrEqOIxJvdxCZ5DM


दररोज 24 तासांत मिळून अर्धा लिटरपेक्षा कमी लघवी तयार होत असेल तर 'लघवी बंद' होत आहे असे धरावे. याची कारणेही अनेक आहेत. लवकर इलाज झाला तर पुढचे नुकसान टळू शकते. सोबतच्या तक्त्याप्रमाणे कारणांचे तीन मुख्य गट पडतात. कारण काही असले तरी लघवी बंद किंवा कमी होणे ही अत्यंत गंभीर बाब असते. त्यासाठी ताबडतोब डॉक्टरकडे पाठवणे आवश्यक आहे. पहिल्या गटातील शुष्कतेचे कारण असल्यास जीवनजल त्वरित चालू करावे. लगेच सलाईन देण्याची सोय असल्यास आणखी चांगले.


*आयुर्वेद...*

लघवी बंद होणे (म्हणजे मूत्रपिंडाचे काम बंद पडणे) ही अगदी गंभीर गोष्ट आहे.


याबरोबरच आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून काही उपाय करण्यासारखे आहेत. यासाठी आधी पचनसंस्थेचे कार्य सुधारणे आवश्यक समजले जाते. सुंठ, मिरी, पिंपळी, आले यांपैकी एखादा पदार्थ वापरून पचन सुधारता येते. दीड ग्रॅम त्रिकटू चूर्ण (सुंठ, मिरे, पिंपळी) एक चमचा मधाबरोबर दिवसातून तीन -चार वेळा द्यावे. लहान मुलांमध्ये त्रिकटू चूर्ण अर्धा ग्रॅम इतकेच द्यावे. दही, मिठाई, मांसाहार व उडीद पूर्ण वर्ज्य करावेत.


मूत्रपिंडाचे कामकाज सुधारण्यासाठी पुनर्नवा उपयुक्तआहे. पुनर्नव्याच्या मुळयांचा काढा (30-50 ग्रॅम मुळया 1 लिटर पाण्यात भिजवून 200 मि.ली. होईपर्यंत आटवावे.) 30-50 मि.ली. काढा दिवसातून तीन वेळा द्यावा. याऐवजी पुनर्नवासव औषधाच्या दुकानात तयार मिळते, ते 20 मि.ली. मात्रेत दिवसातून तीन वेळा द्यावे.


*लघवी बंद होणे-कमी होणे, जास्त लघवी होणे...*

'जास्त लघवी होणे याचा अर्थ नेहमीपेक्षा जास्त होणे. उदा. मोसमाप्रमाणे नेहमी 24 तासांत मिळून दीड ते दोन लिटर लघवी होते. मात्र आता ती 2 ते 3 लिटर किंवा जास्त होत असेल तर ती 'जास्त' आहे असे म्हणता येईल. हिवाळा, जास्त पाणी किंवा द्रवपदार्थ पिणे ही जास्त लघवी होण्याची सामान्य कारणे आहेत.


ही सामान्य कारणे सोडून 'मधुमेह' हे जास्त लघवी होण्याचे प्रमुख कारण आहे.


एकूण लघवी जास्त होत असेल तर नेहमीपेक्षा 'जास्त वेळा' म्हणजे परत परत लघवी होण्याची प्रवृत्ती होते.


*वारंवार लघवी होणे...*

'वारंवार' थोडी थोडी लघवी होत राहणे आणि 'जास्त' लघवी होणे यात फरक आहे. सर्वसाधारणपणे मूत्राशय, मूत्रनलिका यांत जंतुदोष असेल तर वारंवार लघवी लागते. मूत्राशय किंवा मूत्रनलिकेतील आवरणाचा चरचरीत लघवीमुळे दाह होत असेल तर लघवीस वारंवार लागते. मात्र यात एका वेळी लघवी 10-20 मिली. होते; जास्त होत नाही.


गरोदरपणात गर्भाशयाच्या वाढीमुळे मूत्राशयावर दाब येतो. पहिल्या तिमाहीत यामुळे वारंवार लघवी होते.


*लघवी वारंवार होत असेल तर तज्ज्ञाकडून तपासणी होणे आवश्यक असते. मधुमेह किंवा इतर गंभीर कारण नसल्यास यावर साधा उपाय असा...*

गूळ आणि एक-दोन चमचे हळदपूड एकत्र करून पाण्याबरोबर पोटात घ्यायला सांगावे. बऱ्याच जणांना याचा उपयोग होतो.


*उन्हाळी...*

वारंवार लघवी होत असेल तर त्याबरोबर बहुधा उन्हाळी (लघवीस जळजळ) होते. अशा वेळी लघवी गढूळ दिसते. कधीकधी रक्तामुळे लघवी थोडी लाल- तपकिरी दिसते.


उन्हाळी म्हणजे गरमपणा. उन्हाळीची मुख्य कारणे म्हणजे एकतर लघवी तीव्र अथवा चरचरीत असणे. मूत्रनलिकेतील आवरणाचा (अस्तराचा) दाह होत असल्यास साध्या लघवीमुळेही जळजळ होते. मात्र पाणी पिण्याचे प्रमाण गरजेच्या मानाने कमी असल्यास लघवी कडक किंवा जळजळीत होते. त्यामुळे आवरणाचा दाह होतो. अशी लघवी गडद पिवळी किंवा कधी लालसर दिसते.


ताप असेल तर मूळ जंतुदोषावर जंतुविरोधी औषध द्यावे लागते. एरवी उन्हाळीचा उपचार म्हणजे भरपूर पाणी पिऊन लघवी सौम्य-पातळ करणे.


जास्त पाणी पिऊन लघवी सौम्य केल्यास हा त्रास लगेच थांबतो. याबरोबरच खाण्याचा सोडा लिंबू-पाण्यात मिसळून द्यावा किंवा सोडामिंटच्या गोळया द्याव्यात. असल्यास फेनॅडिनच्या गोळया- (पूर्ण नाव फेनॅझोपायरिडिन) घ्याव्यात. या औषधाने लघवीची आग हमखास कमी होते.


*आयुर्वेद...*

उन्हाळीसाठी 100 मि.ली. पाण्यामध्ये 25 ग्रॅम धने भिजत ठेवून हे पाणी 12-12 तासांनी गाळून प्यायला द्यावे. याबरोबर चंद्रकलावटी आणि चंद्रप्रभावटी (250 मि.ग्रॅ) 2 गोळया 2 वेळा याप्रमाणे एक-दोन आठवडे द्यावे.


*लघवीतून 'पू' येणे...*

लघवीतून धातू म्हणजे वीर्य जाणे हा शब्दप्रयोग लोकांमध्ये प्रचलित आहे. लघवीतून 'धातू जाणे' हा शब्दप्रयोग 'पू जाणे' यासाठीच वापरला जातो. 'वीर्य' व 'पू' दिसायला सारखेच असल्याने हा गैरसमज तयार झाला असावा. लघवीतून वीर्य जाऊ शकत नाही. कारण वीर्य फक्त लैंगिक क्रियेनंतर जाते. इतर वेळी नाही. झोपेत वीर्यस्खलन (स्वप्नदोष) होणे ही एक स्वतंत्र बाब आहे आणि याचा लघवीशी संबंध नाही. हा शब्दप्रयोग अर्थातच पुरुषांबाबतच वापरला जातो.


लघवीवाटे 'पू'येण्याची कारणे म्हणजे (अ) मूत्राशयाचा जंतुदोष होऊन 'पू' तयार होणे व तो लघवीवाटे बाहेर पडणे. हे कारण असेल तेव्हा सर्वच लघवी गढूळ दिसते. (ब) दुसरे कारण म्हणजे मूत्रनलिकेचा जंतुदोष होणे. स्त्रियांमध्ये आणि पुरुषांमध्ये मूत्रनलिकादाहाची काही कारणे समान तर काही वेगवेगळी असतात. लिंगसांसर्गिक जंतुदोष, संभोगानंतर काही वेळा येणारा जंतुदोष, इत्यादी कारणे समान आहेत. स्त्रियांमध्ये मासिक पाळीत स्वच्छता न पाळणे, योनिदाहातून येणारा जंतुदोष, इत्यादी वेगवेगळी कारणे असतात. (क) पुरुषांमध्ये वीर्यकोशाचा किंवा प्रॉस्टेट ग्रंथीचा जंतुदोष असेल तर पू येत राहतो.


*लघवीतून रक्त येणे...*

मूत्रसंस्थेत मूत्रपिंडापासून मूत्रनलिकेपर्यंत कोठेही जखमेने रक्तस्राव झाला तर लघवीत रक्त उतरते. दुसरे म्हणजे रक्तातच रक्तस्रावाची प्रवृत्ती तयार झाली (उदा. सर्पदंश, चुकीचे रक्तशरीरात दिले जाणे, इ.) तर लघवीत रक्तदिसते.


लघवीत उतरणाऱ्या रक्ताचे प्रमाण आणि रक्तस्राव झाल्यानंतर गेलेला वेळ यावर लघवीचा रंग अवलंबून असतो.


रक्ताचे प्रमाण अगदी थोडे असेल तर लघवीचा रंग बदलत नाही. पण सूक्ष्मदर्शी यंत्राने तपासणी केल्यास तांबडया पेशी आढळून येतात. रक्तस्राव ताजा असेल तर लघवीचा रंग कमीअधिक लालसर असतो. मात्र ठेवल्यावर थोडया वेळाने त्याचा रंग तपकिरी होतो.


लघवीतून रक्त येण्याची कारणे अनेक आहेत. मूत्रपिंडास मार लागून रक्तस्राव होणे, मूत्रपिंडाचा जंतुदोष, मुतखडे, मूत्रसंस्थेचा कर्करोग, मूत्राशयाला अपघातात मार लागणे, इत्यादी वेगवेगळी कारणे असतात. याचे निदान रुग्णालयातच होणे आवश्यक आहे.


मुतखडयामुळे लघवीतून रक्तस्राव होत असल्यास, तात्पुरता उपाय (रक्तस्राव कमी करण्यासाठी) म्हणून अडुळसा पानांचा रस (20 ते 30 मि.ली.) दर 2-3तासांनी द्यावा. अडुळसा रसाबरोबर खडीसाखरही द्यावी.


*मूत्रसंस्थेच्या आजारामुळे पोटात दुखणे...*

मूत्रसंस्थेच्या अनेक आजारांमध्ये पोटात दुखते. प्रत्येक आजाराप्रमाणे पोटात दुखण्याची जागा व स्वरूप वेगवेगळे असते.


मूत्रपिंडात आजार असेल तर 'पोटात दुखते. पचनसंस्थेचे आजारात बेंबीच्या बाजूला दोन-तीन इंचावर दुखणे असते. पाठीकडून तपासल्यास शेवटची बरगडी संपते तेथे हे दुखणे आढळते. आजाराच्या तीव्रतेप्रमाणे हे दुखणे मंद किंवा तीव्र असू शकते. मूत्रवाहिन्यांमध्ये खडा असल्यास त्याच्या जागेप्रमाणे दुखणे असते. मूत्रवाहिनीत खडा असेल तर कळ पोटातून जांघेकडे किंवा लघवीच्या जागेकडे जाते. याबरोबर उलटी, घाम, अस्वस्थता, लघवीत रक्त उतरणे यांपैकी तक्रारी आढळतात.


मूत्राशयाचा आजार असेल तर बेंबीच्या खालच्या भागात दुखते. जंतुदोष असेल तर जळजळ किंवा कळ असते. लघवीस अडथळा असेल तर कळ येते. ही कळ मूत्रनलिकेत आल्यासारखे वाटते. मूत्रनलिकेतील जळजळ किंवा कळ प्रत्यक्ष मूत्रनलिकेतच जाणवते. पोटात दुखण्याची जागा, स्वरूप व इतर तक्रारी यांवरून आजाराचे निदान होऊ शकते. यासाठी पचनसंस्थेच्या प्रकरणात 'पोटात दुखणे' हा तक्ता पाहा.


*शीघ्रगती/तीव्र मूत्रपिंड दोष तीव्र मूत्रपिंड दोष म्हणजे काय...*

मूत्रपिंडातील पेशींचा तीव्र विनाश किंवा झीज जी पुन्हा पुन्हा होऊ शकते, त्याला तीव्र मूत्रपिंड दोष असे म्हणतात.


*याची कारणे कोणती...?*

कमी रक्तदाबामुळे मूत्रपिंडाला कमी प्रमाणात रक्तपुरवठा होतो. उलटी, अतिसार, जास्त रक्तस्त्राव (शस्त्रक्रिया केल्यानंतर), भाजणे या वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये मूत्रपिंडाला कमी रक्तपुरवठा होतो.


रोगप्रतिबंधक औषधे किंवा रंग किंवा प्रमाणापेक्षा जास्त प्रथिन यामुळे मूत्रपिंडाला इजा झाल्यास. जेन्टामायसिन सारखी प्रतिबंधक औषधे मूत्रपिंडाला सरळ इजा करू शकतात तर औषधांची ऍलर्जी ज्याला Interstitial मूत्रपिंड दाह म्हणतात, मूत्रपिंडाला इजा करतात (उदा. सल्फा औषधे) कर्करोग, मुतखडा, प्रोस्टेट ग्रंथींची वाढ यामुळे मूत्रप्रवाहात अडथळा निर्माण होतो.


*तीव्र मूत्रपिंडदोष प्राणघातक आहे काय...?*

होय. ही गंभीर परिस्थिती आहे. रूग्णालयात असलेल्या या रोगाच्या रूग्णांचं मृत्यूचं प्रमाण ५०% पेक्षा जास्त आहे.


*हा रोग झाला आहे हे कसे समजते...?*

जेव्हा मूत्रोत्सर्जानाचे प्रमाण अचानक खूप कमी होते आणि क्रिटेनीन वाढते तेव्हा मूत्रपिंडदोष आहे हे लक्षात येते. अति उलट्या होत असतील तर रूग्णात Volume Depletion ची चिन्ह आणि लक्षणे आढळतात.


*यावर काही उपचार आहे काय...?*

Volume Depleted रूग्णांमध्ये फ्लुइडस्‌ रक्त देऊन रक्तदाब वाढविला पाहिजे. विरूध्द परिणाम करणारे औषध शोधून काढून त्याचा वापर थांबविला पाहिजे. काही रूग्णांमध्ये डायलेसिस (सच्छिद्र पडदा वापरून द्रवामधील स्फटिक पदार्थ आणि द्रवभाग निरनिराळे करणे) करावे लागते, जे बहुतेक वेळा तात्पुरते असत.


*जुनाट मूत्रपिंड दोष म्हणजे काय...?*

मूत्रपिंडाचे कार्य हळुहळू मंदावण्यांच्या क्रियेमुळे या दोषाचे निदान होते. याची कारणे पुढीलप्रमाणे:


*मूत्रपिंडातील महत्वाच्या कार्यगटाचा दाह...*

 हा मूत्रपिंडाचा संसर्गजन्य रोग नाही. कमी प्रमाणात लघवी, लाल रंगाची लघवी, लघवीत प्रथिन, अंगाला सूज येणे ही याची लक्षणे होत. उच्च रक्तदाबात बर्‍याच वर्षापर्यत कोणतेही लक्षण दिसत नाही.


*उच्च रक्तदाब...*

 बरीच वर्ष अनियंत्रित असलेला उच्च रक्तदाब मूत्रपिंडातील रक्तपेशींना हानिकारक ठरतो आणि मूत्रपिंड दोष निमाण होतो.


मधुमेहामुळे मूत्रपिंडाची रक्त गाळण्याची आणि निरूपाची आणि निरूपयोगी पदार्थ लघवीवाटे बाहेर टाकण्याची क्षमता कमी होते. साखरेचे जास्त प्रमाण मूत्रपिंडाद्वारे जास्त रक्त गाळते. काही काळ ही परिस्थिती राहिल्यामुळे आणि मूत्रपिंंडाला अधिक कार्य करावे लागल्यामुळे गाळण्याची प्रक्रिया दोषपूर्ण होते.


*जुनाट मूत्रपिंड संसर्ग...* बराच काळ संसर्ग राहिल्याने मूत्रपिंडाच्या रचनेला हानी पोहचते. यामुळे मूत्रपिंडाची रक्त गाळण्याची क्षमता कमी होते.


*मुतखड्यासारखा अडथळा...*

मूत्रप्रवाहामध्ये मुतखड्यासारखे अडथळा निर्माण होऊन तो Nephrons ना हानिकारक ठरतो. त्यामुळे हळुहळू पण शेवटी त्याचा परिणाम जुनाट मूत्रपिंडदोष निर्माण होण्यात होतो.

बरीच औषधे मूत्रपिंडाला हानी पोहचवितात. Aspirin, lbuprofen ही औषधे आणि Sulpha drugs आणि जेन्टामायसिन ही रोगप्रतिबंधक औषधे सगळ्यात घातक आहेत.




*जर माझ्या मूत्रपिंडात जुनाट दोषाचे निदान झाले तर मी डॉक्टरांकडे केव्हा-केव्हा जायला पाहिजे...?*

मूत्रपिंडाचा जुनाट दोष असणार्‍यांनी मूत्रपिंड तज्ञांकडून तपासणी करून घेणे महत्वाचे आहे. या रूग्णांना कमीत कमी तीन महिन्यातून एकदा तपासले पाहिजे. माझ्या डॉक्टरांनी मला २४ तासातील लघवी द्यायला सांगितले. 


*ही कोणत्या तपासणीसाठी वापरली जाते...?*

लघवीत किती प्रमाणात प्रथिनं जात आहेत याचे अचूक निदान करण्यासाठी.२४ तासात किती क्रिटेनीन बाहेर टाकले गेले हे पाहण्यासाठी, 


*क्रिटेनीन खालील सूत्राचा उपयोग करून मोजले जाते...*

*Cr Clearance = (U x V )/p U: Con of creatinine in urine,

*V: Volume of urine,

*P: Plasma creatinine.


यावरून मूत्रपिंडाच्या कार्याची कल्पना येते.


*क्रिटेनीनची अशी एखादी पातळी आहे का, की तेव्हा डायलेसीस सुरू करावे लागेल...?*

नाही. रक्तजल क्रिटिनीनची पातळी ही स्नायू सम्मुचयाची (Mass) परावर्तन आहे. ही प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगळी असू शकते. कुपोषीत व्यक्तींमध्ये ही पातळी कमी असू शकते.


*या रूग्णांना (CRF) कोणत्या प्रकारचा आहार द्यावा...?*

६ ग्रॅम प्रथिनं/kg शरीराच्या वजनाच्या प्रमाणात एका दिवसाला घेतली पाहिजेत. माफक प्रमाणात प्रथिनांवर घातलेले बंधन (CRF) मध्ये होणार्‍या वाढीचा वेग मंदावते, असे दिसून आले आहे.


*मूत्रपिंड दोष असणार्‍या रूग्णांना जीवनसत्व देण्याची गरज आहे काय...?* होय. त्यांच्या आहारात जीवनसत्व ब, क आणि फोलिक ऍसिड असले पाहिजे. ज्यांना Renal Osteodystrophy वर उपचार चालू आहेत. अशांसाठी जीवनसत्व ड राखून ठेवावे. रक्तातील कॅल्शियम कमी झाल्यामुळे ही परिस्थिती निर्माण होते, ज्यामुळे PTH नामक संप्रेरकाच्या स्त्रावाला उत्तेजित करते, हे संप्रेरक हाडांवर परिणाम करते. अशाप्रकारच्या रोग्यांमध्ये कॅल्शियम कमी प्रमाणात आणि फॉस्फरस जास्त प्रमाणात असते. त्यांचा उपचार कॅल्शियमचा पुरवठा करून केला पाहिजे.


*पोटॅशियम घेण्यावर काही बंधने आहेत का...?*

रूग्णाने पोटॅशियम घेण्याबाबत जागरूक असले पाहिजे. केळी, टमाटे, संत्री, फळांचे रस इ. ज्यात पोटॅशियम जास्त असते, ते पदार्थ खाण्याचे टाळावे.


*माझ्या मूत्रपिंडात जर दोष असेल, तर मला किती पाणी किती पाणी प्यायचे परवानगी आहे...?*

डॉक्टरांच्या सांगण्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तीची पाण्याची गरज वेगवेगळी असते. मूत्रपिंड दोष असणार्‍या रूग्णांमध्ये Volume expansion आणी Contraction दिसून येते. म्हणून त्यांनी नेहमी डॉक्टरांकडे जाणे आवश्यक आहे. साधारणपणे दिवसाला १-१.५ लिटर एवढ्या माफक प्रमाणात पाण्यावर बंधन 


*रक्तदाबावर नियंत्रण ठेवणे कितपत महत्वाचे आहे...?*

रक्तदाब नियंत्रित ठेवणे अतिशय महत्वाचे आहे. रक्तदाब नियंत्रित असल्यास रोगाची वाढ मंदावते असे अभ्यासावरून दिसून आले आहे.


*(CRF) मध्ये रक्तातील लालपेशी कमी होण्याचे कारण काय...?*

Erythropoeitin चा कमी उत्पादनाशी हे संबंधित आहे. Erythropoeitin अस्थिमज्जांना लाल रक्तपेशी उत्पादित करण्यास उत्तेजित करते.


*ऍनिमियासाठी काही उपचार आहे काय...?*

लाल रक्तपेशी वाढविण्यासाठी Erythropoeitin चे इंजेक्शन घ्यावे. हे इंजेक्शन घ्यायला सुरूवात करण्याआधी लोहाचे प्रमाण पाहणे महत्वाचे आह्ते.


*या रोगाच्या (Chronic Renal Failure) शेवटच्या स्थितीत कोणते उपचार उपलब्ध आहेत...?* 

खालील उपचार पध्दती उपलब्ध आहेत.

*१) हेमोडायलेसीस,

*२) पेरीटोनियल डायलेसीस,

*३) मूत्रपिंडारोपण.


*मूत्रपिंड दोष असणार्‍या रोग्यांमध्ये डायलेसीस केव्हा सुरू करावे...?*

जेव्हा मूत्रपिंडाचे कार्य नेहमीपेक्षा २५% कमी होईल हे क्रिटेनीन Clearance चे मापन करून निश्‍चित झाल्यानंतर लगेचच डायलेसीस सुरू करावे असा आताच्या तज्ञांचा सल्ला आहे. शिसारी येणे, उलट्या होणे किंवा फुफ्फुसामध्ये द्रवपदार्थ साठून राहणे, अशा लक्षणांची वाट पाहून नये जे मूत्रपिंडदोषाच्या अंतिम स्थितीत दिसतात.


*मूत्रपिंडातील ग्लोमेरूल्सचा दाह म्हणजे काय...?*

खालील वैशिष्ट्यांवरून हा रोग ओळखू येतो.

*१) कमी प्रमाणात मूत्रोत्सर्जन - oliguria

*२) लघवीत रक्ताचे प्रमाण ज्यामुळे लघवीचा रंग धुरकट होतो

*३) लघवीत लाल रक्तपेशी

*४) मूत्रोत्सर्जन व्यवस्थित न झाल्याने हाता - पायांवर सूज. 


*या रोगाची कारणे कोणती...?*

खालीलपैकी कोणत्याही कारणामुळे मूत्रपिंडातील गोमेरूल्सचा दाह होऊ शकतो. 

*१) संसर्ग: सूक्ष्म जीवाणूंची एक जात (Streptococi), Hep C,

*२) त्वचाक्षय आणि रक्तवाहिनीचा दाह, 

*३) LgA Nephropathy. 


*या रोगावर उपचार कोणते...?*

*१) मीठ आणि पाण्याच्या सेवनावर नियंत्रण ठेवणे 

*२) मूत्रोत्सर्जनास उत्तेजन देणार्‍या औषधांचा वापर, त्यामुळे तरल पदार्थ साचून राहणार नाही. 

*३) रक्तदाब कमी करणारे घटक, जशी गरज असेल त्याप्रमाणे साधारणपणे Steroids किंवा इतर घटक वापरत नाहीत.


*मूत्रपिंडातील ग्लोमेरूल्सच्या दाहाचे पुनर्वसन कशात होत किंवा रोगभविष्य कोणते...?*

ज्या कारणांमुळे हा दाह होतो. त्यावर अवलंबून असते. सूक्ष्म जीवाणूंच्या संसर्गात जर याचे स्थान दुय्यम किंवा गौण असेल तर रोगभविष्य चांगले आहे.


*IGA Nephropathy म्हणजे काय...?*

ग्लोमेरूल्समध्ये इम्युनोग्लोबिन (IGA) कमी झाल्यामुळे ही स्थिती निर्माण होते. १९६८ मध्ये Berger आणि Hinglais यांनी प्रथम याच वर्णन केले होते. म्हणून हा रोग Bergers Disease म्हणून ओळखला जातो आणि मूत्रपिंडातील ग्लोमेरूल्सचा दाह हा रोग जगार सगळीकडे दिसून येतो. पुरूषांमध्ये सामान्यपणे दिसून येतो.


*मूत्रपिंडदाह होण्याची कारणे कोणती...?*

अजूनही या रोगाचे निश्‍चित कारण सांगणे म्हणजे जुगार खेळण्यासारखे आहे. काही जीवाणूच्या संसर्गात हा दुय्यम असेल जो एखाद्या संसर्गाला दाद न देणार्‍या पध्दतील जास्त रोगप्रतिबंधक पदार्थ निर्माण करण्यास उत्तेजन देतो आणि शेवटी हे पदार्थ मूत्रपिंडात जमा होतात, असे एक कारण असू शकते. 


*रोगनिदानासाठी मूत्रपिंडाची बायप्सी करणे गरजेचे आहे काय...?*

होय. निदान निश्‍चित करण्यासाठी बायप्सी केली जाते.


*या रोगात रूग्ण कसा दिसतो...?*

बर्‍याचशा रूग्णांमध्ये लहान किंवा मोठ्या प्रमाणात लघवीत रक्त दिसून येते आणि ते प्रथिन स्फटिकाशी (Protein Urea) संबंधित असते. काही रूग्णांमध्ये रक्तदाब वाढलेला असतो.


*IGA Nephropathy वर उपचार करता येतात का...?* बर्‍याच प्रकारच्या उपचारपध्दती वापरल्या गेल्या आहेत. उदा. Steroids, Face Oil इ. यातील प्रत्येकाने स्वतंत्र असे फायदेशीर परिणाम दिसून आले की ज्यामुळे हा रोग नियंत्रित करता येतो. ज्या पुरूष रूग्णांना उच्च रक्तदाब आहे आणि ज्यांच्यात मूत्रपिंडाचा रोग बळावतो आहे त्यांच्यावर हे उपचार करून पहावेत.


*त्वचाक्षय (Lupus) मूत्रपिंड दाह म्हणजे काय...*?

या रोगार त्वचा, सांधे, मज्जासंस्था, मूत्रपिंड आणि रक्त यावर परिणाम होतो. यात स्थानिक रक्तसंचयामुले लाली येते याला Systemic Lupus Erythmatosus (SCE) म्हणतात. जेव्हा मूत्रपिंडावर याचा परिणाम होतो तेव्हा त्याला त्वचाक्षय मूत्रपिंड दाह असे म्हणतात.


सर्व प्रकारच्या मुत्रविकारात गोपियुष प्रभावीपणे ऊपयुक्त आहे.


*त्वचाक्षय मूत्रपिंडदाहासाठी काही उपचार आहेत काय...?*

होय. मूत्रपिंडाची बायप्सी आणि पेशीसमूहाचे वर्गीकरण करून या रोगावरील उपचारांसाठी मार्गदर्शन केले जाते. जेव्हा रोगोपचार करावयाचा असतो तेव्हा बहुतांशी Steroids चा वापर केला जातो आणि बर्‍याच वेळा मूत्रपिंडरोगतज्ञ Cyclophosphamide ही वापरातात. या रूग्णांना हे घटक/औषधे साधारणपणे ६ ते १२ महिन्यापर्यंत घ्यावे लागते.


*‘मला त्वचाक्षय मूत्रपिंडादाह असल्याचे निदान झाले आहे’. मला डायलेसीस करावे लागेल काय...?*

रोगामध्ये ज्यांच्या पेशीसमूहाच्या रचनेत जास्त बदल झालेला नाही ते बायप्सी केल्यानंतर उपचाराला चांगला प्रतिसाद देतात. ज्यांच्या पेशीसमुहाच्या रचनेत बदल झाला आहे त्यांच्या बाबतीत तेव्हा प्रतिसाद मिळत नाही. फक्त काही रूग्णच डायलेसीस किंवा रोपणासाठी जातात.


*त्वचाक्षय मूत्रपिंडदाह असणारा, डायलेसीसवर असणार्‍या रूग्णाला मूत्रपिंड रोपण करता येते काय...?*

होय. या प्रकारच्या रूग्णावर मूत्रपिंड रोपण शस्त्रक्रिया करता येते, आणि एकदा रोपण केल्यानंतर हा रोग पुन्हा उद्‌भवण्याची शक्यता फार कमी असते.


*डॉ. सुनील इनामदार.*


🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺


Monday, 26 June 2023

उच्च रक्तदाबात*

 *उच्च रक्तदाबात*


१) उच्च रक्तदाब चक्कर येतात, डोकं घर घर फिरायला लागतं, शारीरिक श्रम करण्याची क्षमता नसल्या सारखी होते. रोग्याला झोप येत नाही. 


२) तीन ग्रॅम मेथीदाणा पूड सकाळ-सायंकाळ पाण्यासोबत घ्यावी. 15 दिवस पूड घ्यावी याने नक्कीच आराम पडतो. ही पूड मधुमेहीच्या रोग्यांसाठीपण फायदेशीर आहे. 


३) कणीक व बेसन सम मात्रेत घेऊन त्याच्या पोळ्या तयार करून त्या खूप चावून चावून खाल्लयाने 10 दिवसातच उच्च रक्तदाबात आराम मिळतो.


४) टरबुजाच्या बियांची गिरी आणि खसखस सम मात्रेत घेऊन वेग वेगळे वाटून एका बरणीत भरून ठेवावे. उपाशी पोटी रोज एक चमचा हे घ्यावे.


५) जेवणानंतर नेमाने रोज ताक घ्यावे.


६) उच्च रक्तदाबाच्या रोग्यांसाठी पपीता फायदेशीर ठरतो, म्हणून रोज त्याचे सेवन केले पाहिजे. 


७) 5 तुळशीचे पानं आणि 2 कडू लिंबाच्या पानांना वाटून 20 ग्रॅम पाण्यात घालून उपाशी पोटी हे पाणी प्यावे. 


८) गार पाण्याने अंघोळ करण्याऐवजी कोमट पाण्याने अंघोळ करावी, त्याच सोबत मीठ व जास्त प्रमाणात साखरेचा वापर करणे टाला




Tuesday, 20 June 2023

निरोगी रहा, उत्तम आरोग्यासाठी टिप्स

 १) आंघोळ करत असताना तोंडात पाणी घेऊन आंघोळ करणे – सर्दी, खोकला, ताप येत नाही.


२) पाय उत्तरेस व डोके दक्षिणेला करून झोपले तर लकवा (पॅरालीसीस) येत नाही.


३) रोज एक आंब्याचे पान खाल्ले तर मुखदुर्गंधी निघून जाते व अपचन होत नाही.


४) रोज एक ग्लास ताक प्यायले तर हार्ट अटॅक येत नाही.


५) स्मरण शक्ती साठी रोज एक पेरू सलग १५ दिवस खाणे, मुलांना देणे.


६) वर्षातून एकदा सलग १५ दिवस गाजराचा रस घेतला तर कॅन्सर होत नाही.


७) रोज ४ सीताफळाची पाने खाणे आणि ३ किलोमीटर चालणे – पहिले १ किलोमीटर रेगुलर चालणे हात पुढे व मागे – पोटावरची चरबी निघून जाते , दुसरे किलोमीटर कॅटवॉक सारखे चालणे एक रेषेत पाय पडले पाहिजेत, आतड्याला पीळ पडला पाहिजे – अपचनाचा त्रास होत नाही, पोटावरची चरबी निघून जाते, स्वादुपिंड काम करू लागते व शुगरचा त्रास होत नाही आणि तिसरे किलोमीटर आर्मी परेड सारखे चालणे.


८) रोज एक चमचा पांढरे तीळ खाणे – हाडे मजबूत होतात.


९) ऐकू न येणे- चमचाभर कांद्याचा रस काढणे, एक थेंब मध टाकणे, कोमट पाण्यात घेऊन वस्त्रगाळ करणे व कानात टाकणे कानात कापूस टाकणे. ३ दिवस करणे किंवा ६ ते ७ दिवस करणे. १५ दिवस करणे


१0) शरीरशुद्धी साठी वर्षातून एकदा सलग ३ दिवस काही न खाता पिता फक्त ताजे ताक च पिणे. रात्री झोपताना थोडेसे पाणी चालेल. पहिल्या दिवशी काही होत नाही, संध्याकाळी थकवा जाणवल्या लागतो, लूझ मोशन सारखे होते. दुसऱ्या दिवशी पान त्रास होतो. तिसऱ्या दिवशी पूर्णपणे झोपून राहायला लागते. ४ थे दिवसापासून ८ दिवसापर्यन्त वरण भात खाणे – हिरवी मिरची ८ दिवस खाऊ नये.


११) जुलाबासाठी- चमचाभर मेथीचे दाणे अर्धा ग्लासात कोमट पाण्यात गिळणे.


१२) नाकाचे हाड वाढणे- ५ रिटा ३ काप पाण्यात टाकून १ चमचा सुंठ पावडर टाकणे आटवून एक कप करणे, वस्त्रगाळ करणे, काचेच्या बाटलीत ठेवून व रोज रात्री झोपताना २-२ थेम्ब नाकात ८ दिवस घालणे.


१३) मुळव्याधासाठी- अर्धा लिंबू व त्याच्यात सैंधव मीठ – ४ ते ५ चमचे टाकणे व लोणचे चाखल्यासारखे चाखणे. १० मिनिटात थांबते. वर्षातून ७ दिवस सकाळी व संध्याकाळी करणे. पोटपण सुटणार नाही.


१४ ) वर्षातून फक्त एकदा शुद्ध संजीवनी १५ दिवस पिणे (250 मिली लिटर ) किंमत रुपये १२६०/- .फक्त फुलांचा व फळांचा रस आहे. सरबता सारखेय आहे. पथ्य काही नाही. कितीही काम केले तरी थकवा येत नाही कंबर दुखी, गुडघे दुखी, BP चा त्रास निघून जाईल. उष्णतेचा, मुळव्याधाचा, केस गळतीचा त्रास निघून जातो.


15) लिंबू घेऊन त्याच्यावर खायचा सोडा टाकणे व दागिन्यांमुळे आलेल्या डागावर १ मिनिट चोळणे व तिसऱ्या मिनिटाला धुवून काढणे. सलग ७ दिवस केले तर डाग पूर्णपणे निघून जातात.


१६) ५ ते ६ चमचे दुघ घेऊन त्याच्यात लिंबू पिळायचा व अर्धा तास ठेवणे व चेहऱ्याला लावणे. आठवड्यातून एकदा करणे. कातडी गोल्डन रंगाची होते.


१७) तुळशीच्या पानांचा रस रात्री लावला व सकाळी धुतला तर ब्युटी parlour ला जायची जरूर नाही. मेकअप करायची गरज नाही. चेहऱ्यावरचे सगळे काळे डाग निघून जातात.


१८) पोटाच्या आजारावर – वावडिंग चमचाभर वाटीभर पाण्यात रात्री भिजत घालणे, सकाळी उठल्यावर कडक पाण्यात उकळवून गाळून चमच्याने देणे.


१९) कानाच्या पडद्याला भोक – उसाचे कांडे घेणे, त्याला जाळात टाकून गरम करायचे व चमचाभर रस घेणे व एक थेम्ब मध टाकायचे, वस्त्रगाळ करणे व कानात टाकायचे, कापूस लावायचा.


२०) हात पायाला घाम येणे – सुपारीचे एक खांड – सकाळी व संध्याकाळी खाणे – १५ दिवस खाणे.


२१) लहान मुलांची छाती भरते, सर्दी झाली तर- अर्धा चमचा मोहरी घेऊन चेचायची व एक थेम्ब मध घालायचे – त्याच फक्त १ मिनिटं बाळाला वास द्यायचा.


२२) तुरटीच्या पाण्यात सलग ८ दिवस अंघोळ (३ महिन्यातून एकदा – असे वर्षातून ४ वेळा ) केले तर हात पायाला खाज येणार नाही, खरूज, नायटा गजकर्ण होणार नाही.

Cp....👆👆


*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*



_*(

Saturday, 17 June 2023

व्यायाम व योगा करण्याचे फायदे.....*

 *व्यायाम व योगा करण्याचे फायदे.....* 


*1) व्यायाम केल्याने सुदृढ दीर्घायुष्य लाभते...*🙂🙂

व्यायाम करणारी व्यक्ती तुलनेने अधिक काळ जगते कारण व्यायामामुळे शरीरातील वृध्दत्वाकडे जाणारी प्रक्रिया मंद होत असते. अशा व्यक्तींचे जीवन केवळ दीर्घच असते असे नव्हे तर ते तुलनात्मकरित्या वेदनांपासून मुक्त आणि अनेक प्रकारच्या पीडांपासून दूर असते.


*2) नितळ त्वचा, चमकदार केस आणि निरोगी नखे...*🙂🙂

व्यायाम करणार्‍यांच्या शरीरात रक्तप्रवाह वेगाने वाहत असतो आणि त्याचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष परिणाम शरीरावर होतातच पण ते त्वचा, केस, आणि नखांवर प्रतिबिंबित होत असतात. नियमित व्यायाम करणार्‍यांचे केस भराभर वाढतात व त्याच्यावर उत्तम चकाकी असते. अशा व्यक्तींची त्वचा नितळ असते आणि नखांची वाढसुध्दा निरोगीपणे होत असते.


*3) शरीरातील अवयवांचा एकमेकांशी उत्तम समन्वय साधला जातो...*🙂

आपल्या शरीरामध्ये मेंदू, हृदय, हात, पाय इत्यादी अनेक अवयवांची जोडी (दोन) असते – डावे आणि उजवे. त्यांच्यात जेवढा चांगला समन्वय असेल तेवढा जीवनाचा दर्जा चांगला असतो. नियमितपणे व्यायाम केल्याने डाव्या आणि उजव्यामध्ये चांगला समन्वय साधला जातो.


*4) शरीराची कार्यक्षमता वाढते...*🙂

नियमितपणे व्यायाम करणार्‍यांच्या शरीरातील चयापचय क्रिया उत्तम चालत असते आणि त्यामुळेच त्यांची उर्जा पातळी चांगली असल्यामुळे त्यांच्यावर कामाचा कितीही भार पडला तरी तो त्यांना सहन होतो आणि ते उत्तम कार्यक्षमतेने काम करू शकतात.


*5) मन सकारात्मक राहते...*🙂

व्यायाम करणार्‍यांची विचार करण्याची पध्दत सकारात्मक असते त्यामुळे त्यांची उत्पादकताही चांगली असते. कमी उर्जेमध्ये आणि कमी वेळेमध्ये उत्तम काम करण्याची क्षमता त्यांच्यात विकसित झालेली असते. कोणत्याही गोष्टीचा आळस येत नाही. उत्साहवर्धक वाटते.

*---------------------*


*कंबर दुखी.....*🙂


*१. बाभळीची साल...*

 १.१ बाभळीची साल काढायची.

 १.२ पाण्यात टाकुन कडक उकळवा.

 १.३ त्या पाण्याने गुढघे किंवा पाय दुखत असेल तिथून धुवून टाखा. १० मिनटात फरक पडतो. 


*२. जवस...* 

 २.१ रोज सकाळ संद्याकाळी बडी सौफ झाल्यासारखे जेवण झाल्यावर जवस खा.

 २.२ जवस शरीरातील वंगण सारखे काम करते, गुडखे दुखी ला खूप फरक पडतो.


*३. पांढरे तीळ...* खात जा, हाडे मजबूत होतात.


*४. एरंडेल तेल...*

 ४.१ भाकरीचा गोळ्यात अर्धा चमचा एरंडेल तेल घाला.

 ४.२ त्याची भाकरी १५ दिवस रोज रात्री जेवताना खा.

 ४.३ पंधरा दिवस करा हे, याने गुढघे दुखी, कंबर दुखी बरी होते.


*५ तिळाचे तेल...*

 ५.१ गुडखे फारच दुखत असतील तर, तिळाचे तेल सकाळ - संद्याकाळ प्या.

 ५.२ त्या वर कोमट पाणी प्या.

 ५.३ पंधरा दिवसात गुडखे दुखी थांबते.


*संतोष ढगे,*

*डॉ. सुनील इनामदार.*


🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺


*(

Thursday, 15 June 2023

आरोग्य समस्येवर कोणत्या भाज्या गुणकारी आहेत,

 कोणत्या आरोग्य समस्येवर कोणत्या भाज्या गुणकारी आहेत, हे माहिती असल्यास योग्य त्या भाजीचा नियमित आहारात समावेश करणे शक्य होऊ शकते. यासाठी यासंबंधीची माहिती करून घेणे खुप गरजेचे आहे. तसे पाहता सर्वच भाज्या आरोग्यासाठी चांगल्या असतात. 


पालकचे सेवन केल्यास हिमोग्लोबिन वाढते. रक्ताची समस्या दूर होते.

 मटारमुळे शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढत नाही.

कोबीमध्ये कॅल्शिअम असल्याने शरीराची हाडे मजबूत होतात.


टोमॅटोच्या सेवनाने रक्तातील ग्लुकोज नियंत्रणात राहते.


बीट खाल्ल्याने मधुमेह आणि रक्तदाब नियंत्रणात राहतो.

गाजराचे सेवन केल्यास शरीराची ताकद वाढवते. मधुमेहाचा त्रास कमी होतो. चेहऱ्यावर तेज येते. मुरुमेदेखील कमी होतात. रोगप्रतिकारक क्षमता वाढते.


प्रमोद पाठक.



Thursday, 1 June 2023

हृदयाची दुर्बलता*

 *हृदयाची दुर्बलता*


◼️तुळशीच्या बियांचे अर्धा ते एक ग्रॅम चूर्ण तेवढ्याच खडीसाखरेबरोबर घेतल्याने किंवा मेथीच्या २० ते ५० मि.ली. काढ्यात (२ ते १० ग्रॅम मेथी १०० ते ३०० ग्रॅम पाण्यात उकळावी) मध घालून प्यायल्याने हृदयरोगात लाभ होतो.


◼️अर्जुनसालीचे १ चमचा चूर्ण व दोन चमचे धने पूड, १ ग्लास पाण्यात उकळून घ्यावे. प्यायल्याने खूप लाभ होतो. याशिवाय लसूण, आवळा, मध, आले, बेदाणा, द्राक्षे, ओवा, डाळींब इ. पदार्थांचे सेवन हृदयासाठी लाभदायक आहे.


◼️लिंबाच्या सव्वा तोळा (सुमारे १५ ग्रॅम) रसात आवश्यकतेनुसार खडीसाखर घालून प्यायल्याने हृदयाचे स्पंदन सामान्य होते तसेच स्त्रियांमध्ये हिस्टेरियामुळे वाढलेली हृदयाची धडधडदेखील दोन लिंबांचा रस पाण्यात घालून प्यायल्याने शांत होते.


◼️गुळवेलीचे चूर्ण मधाबरोबर घेतल्याने किंवा आल्याचा रस व पाणी समप्रमणात एकत्र करून प्यायल्याने हृदयरोगात लाभ होतो.


◼️उगवत्या सूर्याच्या शेंदरी किरणांमध्ये (सुमारे दहा मिनिटेपर्यंतच्या) हृदयरोग दूर करण्याची अपरिमीत शक्ती असते. म्हणून रुग्णाने प्रातःकाळी सूर्योदयाची वाट पहावी आणि सूर्याचा पहिला किरण त्याच्यावर पडेल असा प्रयत्न करावा.


◼️मोठ्या गाठीच्या हळकुंडाची वस्त्रगाळ पूड करून आठ महिने ठेवून द्यावी. नंतर दररोज देशी गाईच्या दूधतून किंवा तुपातून एक चमचा घालून प्यावी. हळदीत हा खास गुण आहे की ती रक्तवाहिन्यांमध्ये जमा झालेले रक्ताचे थर विरघळविते आणि रक्तवाहिन्या साफ करते. जेव्हा रक्तवाहिन्या साफ होतात तेव्हा तो कचरा म्हणजेच विजातीय द्रव्ये पोटात गोळा होतात व नंतर मलावाटे बाहेर टाकली जातात.


◼️रोहिणी हिरड्याचे वस्त्रगाळ चूर्ण करून ठेवून द्यावे. रोहिणी हिरडा न मिळाल्यास बेहड्याच्या आकाराचा कोणताही हिरडा घ्यावा. या हिरड्याचे सुमारे १ चमचा चूर्ण रात्री झोपण्यापूर्वी देशी गाईच्या दुधातून किंवा तूपाबरोबर घ्यावे. यामुळे विजातीय द्रव्ये मल, मूत्र व घाम इ. रूपात शरीरातून बाहेर टाकली जातात.


*संकलन-* 

*निसर्ग उपचार तज्ञ* 

*डॉ. प्रमोद ढेरे,



Wednesday, 31 May 2023

तुरटीचे फायदे- एकदा करूनच बघा

 तुरटीचे फायदे- एकदा करूनच बघा 

तुरटीचे काहीच फायदे आपल्याला माहीत असतात. पण आपल्या त्वचेसाठी आणि आरोग्यासाठी तुरटीचे अनेक फायदे होतात. पाहूया काय आहेत तुरटी चे फायदे


https://chat.whatsapp.com/JiMgPUBZHHo4naAcpzoMBB



निरोगी दात -

तुरटीचे दातासाठी खूपच फायदे आहेत. एका अभ्यासानुसार, जर तुरटीने दाताची स्वच्छता केली तर दाताची कॅव्हिटी आणि दात तुटण्याच्या समस्येपासून सुटका मिळू शकते. त्यासाठी तुम्ही तुरटीचा उपयोग माऊथवॉश म्हणूनही करू शकता. तुम्हाला दातांच्या काही समस्या असतील तर तुरटी हा त्यावर रामबाण उपचार आहे. तुम्हाला जास्त त्रास न होता तुम्ही याचा उपयोग करून घेऊ शकता. एका ग्लासात पाणी गरम करा आणि त्यात चिमूटभर मीठ आणि एक लहानसा चमचा तुरटी पावडर घालून मिक्स करा. थंड झाल्यावर तुम्ही या पाण्याचा वापर दातांसाठी करा.  


शरीराच्या दुर्गंधीपासून सुटका-

जर तुमच्या शरीराला घामामुळे खूपच दुर्गंधी येत असेल तर तुम्ही तुरटीचा वापर करू शकता. तसंच तुमच्या पायाला सतत दुर्गंधी येत असेल तरीही तुरटीचा उपयोग तुम्ही करून घेऊ शकता. ही दुर्गंधी हटविण्यासाठी तुम्ही आंघोळ करत असलेल्या पाण्यात तुरटीचा उपयोग करा अथवा दुर्गंधी घालवण्यासाठी तुम्ही आफ्टर शेव्ह, डिओ अथवा बॉडी लोशन अशा प्रकारेही वापर करू शकता. याचा तुमच्या शरीरावर कोणताही वाईट परिणाम होत नाही. तर शरीरावरील बॅक्टेरिया मरून दुर्गंधी कमी होते. 


माऊथवॉश म्हणून उपयोग - 

माऊथवॉश म्हणून तुरटी अत्यंत उपयोगी आहे. रोज जर तुम्ही तुरटीचा माऊथवॉश म्हणून उपयोग केला तर तुम्हाला तोंडाच्या दुर्गंधीपासून सुटका तर मिळेलच. त्याशिवाय तुमच्या दातांचे आरोग्यही चांगले राहील. विशेषतः मुलांच्या ओरल हेल्थसाठी तुरटी अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावते. मुलांना लहानपणापासूनच तुरटीच्या वापराची सवय लावल्यास, दातांच्या समस्याही उद्भवत नाहीत.


मांसपेशींसाठी -

तुरटी चे फायदे इतकेच नाहीत. तर तुम्हाला मांसपेशी आखडण्याचा त्रास असेल तर त्यासाठीही याचा उपयोग करून घेता येतो. पोटॅशियम अलम जर तुमच्या मांसपेशी आकुंचन पावल्या असतील तर त्या बऱ्या करण्यासाठी उपयोगी ठरते. त्यामुळे जर तुम्हाला असा त्रास असेल तर तुरटीचा उपयोग तुम्ही करून घेऊ शकता..


ताप, खोकला आणि दमा-

शहरांमध्ये ताप, खोकला आणि दमा यासारख्या समस्या आता खूपच कॉमन झाल्या आहेत. यासाठी तुम्ही तुरटीचा उपयोग करा. तुरटीच्या वापराने अलर्जीने आलेला तापही निघून जाण्यास मदत होते. तसेच खोकल्यासाठीही तुम्ही याचा उपयोग करू शकता. तुरटीचे पाणी तुम्ही पिऊन खोकला आणि दम्यावर उपाय करू शकता. तुम्ही 10 ग्रॅम तुरटी आणि 10 ग्रॅम साखर एकत्र वाटून त्याचे चूर्ण करा. रोज रात्री झोपण्यापूर्वी एक कप गरम दुधातून हे चूर्ण घालून प्या. त्यामुळे ताप, खोकला आणि दमा निघून जाईल. 


युरिनरी इन्फेक्शन-

युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनशी संबंधित समस्यांशी तुरटी दोन हात करू शकते. तुरटीमुळे मुत्राशयमुळे होणाऱ्या रक्तस्रावाला थांबवण्याचे काम करता येते. एखाद्या संक्रमणामुळे झालेला हा त्रास तुरटीमुळे बंद होऊ शकत. रक्तस्राव होणाऱ्या भागावर तुरटी प्रभावीपणे काम करते. 


केसांसाठी -

केसांसाठीही तुरटी अत्यंत उपयोगी आहे. केसांमध्ये ऊवा होणं ही शाळेत जाणाऱ्या विदार्थ्यांसाठी तर अगदी सामान्य समस्या आहे. ऊवा या लहान मुलांना जास्त प्रमाणात होतात. इतकंच नाही तर ऊवा एकाच्या केसातून दुसऱ्यांच्या केसांमध्ये पटकन जातात. यामुळे खाज आणि स्काल्प अशा समस्या उद्भवतात. पण यापासून सुटका मिळवण्यासाठी तुरटीचा उपयोग करा. तुरटीची पेस्ट तुम्ही केसांना लावली आणि नंतर केस धुतले तर तुम्हाला केसातून ऊवा काढण्यासाठी मदत मिळते. तुरटीमुळे केसातील ऊवा मरून तुमचे केस पुन्हा पहिल्यासारखे ऊवामुक्त होऊ शकतात. त्यामुळे इतर कोणत्याही तेलांचा वापर करण्यापेक्षा तुरटीचा वापर करा. 


जखम भरण्यासाठी 

शरीरावर एखादा घाव अथवा जखम झाली तर तुम्ही त्यावर तुरटीचा उपयोग करून घेऊ शकता. यामध्ये अस्ट्रिन्जन्ट आणि हेमोस्टेटिक गुण असल्याने जखम लवकर बरी करण्यास मदत मिळते. शरीरावर कोणतेही घाव, कापले असेल अथवा तोंड आले असेल तर लवकर भरण्याचं काम तुरटी करते. एका ग्लासात गरम पाणी घेऊन त्यात एक चमचा तुरटी पावडर मिक्स करा आणि कोमट झाल्यावर हे पाणी घेऊन जखम धुवा. असं दिवसातून दोन ते तीन वेळा केल्यास घाव वा जखम लवकर भरेल. 


पिंपल्सना ठेवते दूर - 

तुम्हाला सतत पिंपल्स येत असतील आणि सर्व उपाय करूनही पिंपल्स जात नसतील तर तुमच्यासाठी तुरटी गुणकारी ठरू शकते. तुरटीमध्ये अस्ट्रिन्जन्ट गुण आढळतात. ज्यामुळे पिंपल्स बरे करण्यासाठी त्याचा फायदा होतो. तुरटीची पेस्ट करून तुम्ही पिंपल्स आलेल्या ठिकाणी लावा आणि काही वेळाने थंड पाण्याने स्वच्छ धुवा. तुम्हाला याचा लवकरच योग्य परिणाम दिसून येईल.


सुरकुत्या आणि एजिंग -

तुरटीचा उपयोग बऱ्याच सौंदर्य प्रसाधनांमध्ये करण्यात येतो. यामध्ये असलेले गुणधर्म त्वचेमध्ये अधिक टाईटनेस आणण्याचे काम करतात. त्यामुळे चेहऱ्यावर येणाऱ्या सुरकुत्या आणि एजिंग पासून वाचण्यासाठी तुरटी प्रभावी आहे. तुम्ही याचा नियमित वापर केल्यास, हे एखाद्या अँटिएजिंगप्रमाणे काम करते. चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा आणि त्यावर तुरटीचा तुकडा पूर्ण फिरवा.  


त्चचा उजळवण्यासाठी -

तुरटीमध्ये असणाऱ्या गुणधर्मामुळे त्चचेमधून साचलेली घाण काढून टाकण्यास मदत मिळते. तसंच त्वचा टोन करण्यासाठीही याचा उपयोग होतो. म्हणून त्वचा उजळवण्यासाठी तुरटीचा उपयोग करण्यात येतो. चेहऱ्यावर पाणी मारून तुरटी नियमितपणे रोज चेहऱ्यावर फिरवावी. त्वचा उजळण्यास मदत मिळते. 


फाटलेल्या पायांसाठी -


पाय फाटण्याची समस्या बऱ्याच जणांना असते. पण त्यावर उपाय नक्की काय करायचा. तर त्यावर तुरटी हा सोपा उपाय आहे. तुम्ही नियमितपणे तुरटीचा तुकडा पाय ओले करून त्यावर घासला तर तुमची ही समस्या लवकरच बरी होईल. तसंच तुम्हाला त्रासही होणार नाही. 


तुरटीचा वापर कसा करावा 

तुरटीचा वापर कशासाठी करावा हे आम्ही तुम्हाला सांगितले. पण याचा वापर नक्की कसा करावा हेदेखील कळायला हवे. जाणून घेऊया तुरटीचा वापर कसा करावा 


जखम झाली असल्यास ती जखम तुरटीच्या पाण्याने दिवसातून दोन ते तीन वेळा धुतली तर त्याचा परिणाम लवकर होतो

पाणी स्वच्छ करण्यासाठी तुरटी त्यातून फिरवावी

त्वचेला दुर्गंधी येत असेल तर पाण्यातून तुरटी फिरवून त्या पाण्याने आंघोळ करावी अथवा गरम पाण्यात तुरटीची पावडर मिक्स करावी

दातांची समस्या असेल तर तुरटीच्या पाण्याने रोज चूळ भरावी 

चेहऱ्यावर मुरूमं असतील तर तुम्ही चेहरा ओला करून त्यावर रोज तुरटीचा तुकडा फिरवावा यामुळे मुरूमं जाण्यास मदत होते

खोकल्यासाठीही याचा उपयोग होतो पण त्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे

ऊवा घालवण्यासाठी तुरटीच्या पावडरमध्ये थोडे पाणी मिक्स करून पेस्ट करून घ्या आणि ही पेस्ट केसांना स्काल्पपासून लावा. ऊवा मरतात

मांसपेशींचा त्रास असल्यास, हळद आणि तुरटी पावडर मिक्स करून आखडलेल्या ठिकाणी लावा. त्यामुळे मांसपेशींचा त्रास कमी होतो

शेव्ह केल्यानंतर तुरटीचा खडा फिरवा यामुळे घाव झाला तर त्यात पस होण्याची शक्यता कमी होते

चेहरा नेहमी उजळ दिसण्यासाठी तुरटीचा खडा चेहऱ्यावरून फिरवा




Monday, 29 May 2023

आहार सेवनाविषयीचे नियम

 📌 आहार सेवनाविषयीचे नियम 📌


🍎अन्न नेहमी ताजे व गरम जेवावे.असे अन्न स्वादिष्ट तर असतेच शिवाय लवकर व चांगले पचते.फारच थंड वा फारच गरम अन्न मात्र कधीच खाऊ नये.


🍎अगदी कोरडे अन्न वा तेलातुपाने नुसते माखलेले अन्न खाऊ नये.अगदी कोरडे अन्न म्हणजे रुक्ष अन्न खावयास तर त्रास होतोच पण पचावयास देखील त्रास होतो.


🍎अन्नाचे प्रमाण भूक व पचनशक्ती यांच्या अनुमानाने योग्य तेवढे जर ठेवले तर त्रिदोषांना कोठेही न बिघडवता तीनही दोषांचे योग्य असे पोषण करण्यास ते सक्षम ठरते.


🍎भूक लागल्याशिवाय जेवू नये.भूक लागणे हे आधीचे जेवण पचले आहे असे समजण्याचे साधन आहे.


🍎आधी खाल्लेले अन्न नीट पचल्याखेरीज जेवू नये.अन्यथा अन्नपाचक रसांना,आतड्यांना ताण येतो व पचनसंस्था बिघडते.


🍎दोन परस्परविरोधी अशा प्रकारचे अन्न एकाच वेळी व एकामागून एक असे खाऊ नये.अशाने रोगाला आमंत्रण मिळते.


🍎अस्वच्छ जागी बसून जेवू नये.याने जंतुसंसर्ग वाढतो.


🍎खूप भराभर असे जेवू नये.अशाने ठसका लागण्याचा संभव निर्माण होतो व अन्नाचा तिटकारा वाटण्याची शक्यता निर्माण होते.


🍎अति सावकाश रेंगाळत देखील जेवू नये.असे केल्यास जेवण तर गार होतेच शिवाय पचन मंदावते,भूक नीट भागत नाही व जेवणाचे समाधान होत नाही.


🍎जेवताना टीव्ही, मोबाईल,लॅपटॉप,व्हिडीओ गेम्स हे काटेकोरपणे टाळावे.यामुळे जेवणात लक्ष राहत नाही.


🍎यासाठी जेवणासारखी अत्यंत महत्वाची गोष्ट पूर्णपणे लक्ष देऊन स्वतःसाठी काय योग्य आणि काय अयोग्य याचा विचार करून प्रसन्न मनाने करावी.


📚संदर्भ-- डॉक्टर मी काय खाऊ?


📝माहिती संकलन👇

डॉ.स्वाती पाटील

होमिओपॅथ|बॅच फ्लॉवर रेमेडी थेरपिस्ट|आहारतज्ज्ञ.



*सर्व ग्रुप मेंबर ना विनंती,* 

*तुम्ही ज्या दुसऱ्या इतर ग्रुप वर कार्यरत आसाल,* 

 *त्या सर्व ग्रुप वर आरोग्य विषयक माहिती फॉरवर्ड करा 🙏🏻*



Thursday, 18 May 2023

कुशल, रोजगारयुक्त महाराष्ट्र होण्यासाठीव्यवसाय समुपदेशन शिबिरं मोलाची भूमिका बजावतील

 


कुशल, रोजगारयुक्त महाराष्ट्र होण्यासाठीव्यवसाय समुपदेशन शिबिरं मोलाची भूमिका बजावतील


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


            मुंबई, दि. १८ : “जास्तीत जास्त रोजगार निर्मितीसाठी राज्यशासन प्रयत्नशील असून कुशल आणि रोजगारयुक्त महाराष्ट्र घडवण्यासाठी छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर मार्गदर्शन शिबिरं नक्कीच मोलाची भूमिका बजावतील”, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.


            प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिर येथे छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर मार्गदर्शन शिबिरात मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिबिराला ध्वनिचित्रफितीच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या.


            यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, कौशल्य, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार जे. पी. नड्डा, खासदार मनोज कोटक, आमदार ॲड. आशिष शेलार, आमदार मनीषा कायंदे, कौशल्य विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा, कौशल्य विकास विभागाचे आयुक्त एन.रामास्वामी, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगांबर दळवी, कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. अपूर्वा पालकर आणि आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.


            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, “युवा पिढीच्या ताकदीवर देश महाशक्तीकडे वाटचाल करतोय, यामुळेच संपूर्ण जगात देशाचे नाव अभिमानाने घेतले जाते. देशाची अर्थव्यवस्था ११ व्या स्थानावरून पाचव्या क्रमांकावर आणण्याचे काम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले आहे. सध्या देशात जी २० च्या बैठका सुरु आहेत. जी २०चे अध्यक्षपद भारताकडे आहे, ही देशासाठी गौरवाची बाब आहे. देशाचे भवितव्य युवा पिढीच्या हातात आहे त्यामुळेच युवा पिढीला मार्गदर्शन करण्याचे काम केले जात आहे.”


            “नव्या पिढीने परंपरागत शिक्षणाबरोबर काळाची पाऊले ओळखून नाविन्यपूर्ण शिक्षण घेणे गरजेचे आहे. युवा संवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून युवकांना त्यांच्या करिअरमध्ये मार्गदर्शन करण्याचा तसेच सरकारच्या विविध योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. सर्व युवकांनी या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,” असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले.


            मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले की, विद्यार्थ्यांना लागणारे शिक्षण, तसेच शिक्षणासाठी देण्यात येणारे अर्थसहाय्य, शिष्यवृत्ती तसेच रोजगाराच्या विविध संधी याची माहिती तसेच पालकांचे समुपदेशन या शिबिरात केले जाणार आहे. देशाच्या स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करत असताना राज्यात ७५ हजार नोकऱ्या देण्याचे शासनाचे उदिृष्ट आहे. बार्टी, सारथी व महाज्योती या माध्यमातून शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. १ लाख २५ हजार रोजगार उपलब्ध होण्यासाठी विविध संस्थांसोबत करार करण्यात आले आहेत. आगामी काळात तीन लाख रोजगार निर्माण करण्यात येतील. मुंबई महापालिका शाळांमध्ये कौशल्य विकास केंद्र सुरु करण्याची गरज असल्याचे मंत्री श्री.लोढा यांनी सांगितले. त्यानुसार लवकरच महापालिकेच्या १०० शाळांमध्ये कौशल्ययुक्त शिक्षण मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले.


युवा पिढीने कौशल्यपूर्ण शिक्षण घेणे गरजेचे - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ध्वनीचित्रफित माध्यमातून दिलेल्या संदेशात म्हणाले की, छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिर मार्गदर्शन आज राज्यातील सर्व मतदारसंघात आयोजित केले आहे.या मार्गदर्शन शिबिराचा युवक व युवतींना नक्की फायदा होईल. या शिबिरात केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांचीही एकत्रित माहिती मिळेल. पालकांनाही या शिबिराच्या माध्यमातून एक दिशा मिळेल. बदलत्या काळानुसार युवा पिढीला कौशल्यपूर्ण शिक्षण घेणे गरजेचे आहे असेही उपमुख्यमंत्री म्हणाले.


औद्योगिक क्षेत्रातील बदल लक्षात घेऊन शिक्षण घ्यावे - खासदार जे. पी. नड्डा


             खासदार जे.पी. नड्डा म्हणाले की, आज औद्योगिक क्षेत्रामध्ये झपाट्याने बदल होत आहेत. बदलत्या काळानुसार कौशल्य प्राप्त करणे ही काळाची गरज बनली आहे. पुरवठादारास औद्योगिक क्षेत्रातील नाविन्यपूर्ण बदल आणि तशी मागणी कळत नाही, त्यामुळे मागणी करणाऱ्याला काय हवे ते जाणून घ्या. तांत्रिक शिक्षण गरजेचे आहे. प्रत्येक क्षेत्रात अद्ययावत होत रहावे लागेल. १० लाख रोजगार देण्याची घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली आहे. २ लाखांहून अधिक उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रधानमंत्री यांनी दिले आहेत. १३ लाखांहून अधिक जणांना प्रशिक्षण दिले आहे. देशात कुशल मनुष्यबळाची गरज होती हे लक्षात घेऊन प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी कौशल्य विकास मंत्रालयाची स्थापना केली.


            खासदार श्री.नड्डा म्हणाले की, प्रधानमंत्री यांनी स्वप्नं पहिले आणि ‘स्क‍िल इंडिया मिशन’ सुरु झाले. युवा पिढी प्रशिक्षित होताना पुन:प्रशिक्षण गरजेचे आहे. पुन:प्रशिक्षणानंतर पुन्हा अद्ययावत होणे आवश्यक आहे. प्रशिक्षण दिलेल्या उमेदवारांत ६६ टक्के महिलांचा समावेश असून, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेत एक कोटींहून अधिक उमेदवारांनी प्रशिक्षण घेतले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कौशल्य विकासाला प्राधान्य देण्याचा कार्यक्रम राबवला. स्टार्ट अप मध्ये महाराष्ट्र आघाडीवर आहे. ५०० कोटी रुपये इको सिस्टीम तयार करण्यासाठी तरतूद केली आहे, त्यासाठी श्री. नड्डा यांनी राज्य शासनाचे कौतुक केले.


राज्यात अधिकाधिक रोजगाराच्या संधी निर्माण करणार


- कौशल्य, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा


             कौशल्य, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की, दहावी बारावीनंतर विद्यार्थ्यांना काय करावे, असा प्रश्न असतो तसेच कोणत्या क्षेत्रात आपल्याला कौशल्य प्राप्त करावे लागेल, याबाबत साशंकता असते विद्यार्थ्यांशी संवाद वाढून त्यांना योग्य वेळेत योग्य मार्गदर्शन मिळाले तर चांगले रोजगार मिळण्यासाठी त्याचा फायदा होऊ शकतो हे लक्षात घेऊन राज्यभरात २८८ मतदारसंघात असे रोजगार मिळावे आयोजित केले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभरात मेळावे आयोजित केले आहेत, अशी माहितीही श्री. लोढा यांनी दिली.


मान्यवरांनी केले व्यवसाय समुपदेशन


            ‘प्रेरणादायी मार्गदर्शन’ याविषयी मार्गदर्शक डॉ.दिनेश गुप्ता, ‘रोजगाराच्या विविध संधी’ या विषयी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे माजी संचालक सुरेश वांदिले, ‘करिअर कसे निवडावे’ या विषयी श्रीमती प्रिया सावंत, ‘व्यक्तिमत्व विकास’ या विषयी सुचिता सुर्वे तसेच ‘स्पर्धा परीक्षाविषयक मार्गदर्शन’ संतोष रोकडे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी विविध ३८ विविध संस्थांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर स्टॉ

ल लावले होते.


०००


संध्या गरवारे/विसंअ/


Featured post

Lakshvedhi