Showing posts with label खट्टा कट्टा. Show all posts
Showing posts with label खट्टा कट्टा. Show all posts

Saturday, 19 April 2025

सुंदर विचार

 सुंदर विचार –

लाखो क्षण अपूर्ण पडतात आयुष्याला दिशा देण्यासाठी…

आपली एक चूक कारणीभूत ठरते ते दिशाहीन होण्यासाठी..

किती कष्ट घ्यावे लागतात यशाचं शिखर चढण्यासाठी…

क्षणभर गर्व कारणीभूत ठरतो वरून खाली पडण्यासाठी…

कितीतरी उत्तरे अपूर्ण राहतात जीवनाचं गणित सोडवतांना..

कधी आळसही कारणीभूत ठरतो जिंकता जिंकता हरतांना.🙂🌞🌞🌞

Wednesday, 16 April 2025

आहेत कुठल्या भाषेत एवढी विशेषणं ? -:🤣:-

 -:🤣:- आहेत कुठल्या भाषेत एवढी विशेषणं ? -:🤣:-


|| लुसलुशीत, खुसखुशीत, भुसभुशीत, घसघशीत, 

|| रसरशीत, ठसठशीत, कुरकुरीत, चुरचुरीत, झणझणीत, 

|| सणसणीत, ढणढणीत, ठणठणीत, दणदणीत, चुणचुणीत, 

|| टुणटुणीत, चमचमीत, दमदमीत, खमखमीत, झगझगीत, 

|| झगमगीत, खणखणीत, रखरखीत, चटमटीत, चटपटीत, 

|| खुटखुटीत, चरचरीत, गरगरीत, चकचकीत, गुटगुटीत, 

|| सुटसुटीत, तुकतुकीत, बटबटीत, पचपचीत, खरखरीत, 

|| खरमरीत, तरतरीत, सरसरीत, सरबरीत, करकरीत, 

|| झिरझिरीत, फडफडीत, शिडशिडीत, मिळमिळीत, 

|| गिळगिळीत, बुळबुळीत, झुळझुळीत, कुळकुळीत, 

|| तुळतुळीत, जळजळीत, टळटळीत, ढळढळीत, 

|| डळमळीत, गुळगुळीत, गुळमुळीत. 


-:🔸 ह्या शब्दांना इंग्रजी, हिंदी अथवा कुठल्याही :----------- 

-:🔸 भाषेत प्रतिशब्द शोधून दाखवावा :------------ 


-:🔹 थोडी गम्मत :------------ 


|| 'मॅक्सिन बर्नसन' हा एक अमेरिकन भाषा तज्ज्ञ 

|| मराठीबद्दल त्यांनी लिहिले आहे कि...


|| ही मराठी भाषा खूप छान आहे, पण जीव घाबरा करणारी 

|| आहे. मराठी भाषेत बाळबोध लिपी पासूनच हिंसेचे 

|| बाळकडू पाजले जाते. 


-:🔹 उदा० :------------ 


|| अक्षरांचे पोट फोडणे, पाय मोडणे; 

|| इतिहासात तर 'ध' चा 'मा' सुद्धा केला जातो. 

|| यांच्या सामाजिक व्यवहारातही उघड उघड हिंसाचार 

|| दिसतो. :*


|| नाक दाबले, तर तोंड उघडणे. 

|| अमक्याचे खापर, तमक्याच्या माथी फोडणे, 

|| धारेवर धरणे, पाठीत खंजीर खुपसणे, 


|| बिन पाण्याने हजामत करणे, रक्त आटवणे, पाय ओढणे, 

|| पोटावर पाय देणे, कान उपटणे, डोक्यावर मिरे वाटणे. 

|| इत्यादी, इत्यादी... 


-:🔹 ही मराठी माणसे स्वत:बद्दलही हिंसक असतात. 

-:🔹 म्हणजे... 🤣😀😂


-:🔹 झोपेतून उठल्यावर :------------ 


|| अंग मोडतात, बोटे मोडतात, घसाफोड करतात, 

|| तोंड फाटेस्तोवर बोलतात, घर डोक्यावर घेतात, 

|| डोक्यात राख घालतात. 


-:🔹 आणि कांहीही खातात :------------ 


|| मार खातात, बोलणी खातात, डोके खातात, वेळ खातात, 

|| लिहितांना काना-मात्रा वेलांट्या खाऊन टाकतात. आणि 

|| कांही जण, तर पैसेही खातात... 🤪 🤪 


-:🔹 यांच्या शरीर शास्त्राच्या कल्पना तर काय :------------

-:🔹 विचित्र आहेत पाहा 😀 😅


|| यांचे हातपाय गळतात, काळजाचे पाणी होते, 

|| तोंडचे पाणी पळते. 


|| आता सांगा, परकियांना ही भाषा येणार कशी ? 

|| पण माझ्यावर या भाषेने कृपा केली आणि मला ती 

|| चांगली यायला लागली. 


   -:😂:-  आता "माझा जीव भांड्यात पडला"  -:😂:-

Thursday, 10 April 2025

वजनकाटा २ महिन्यासाठी ठेवला आहे झाकून..😀*

 *वजनकाटा २ महिन्यासाठी ठेवला आहे झाकून..😀* 


उन्हाळ्याच्या सुरवातीला खायची ओल्या काजूची उसळ....

चव बदलायला कधी तरी लागते मग मिसळ....


रसरशीत बिटक्या चोखताना  तोंड जातंय माखून.....

वजनकाटा २ महिन्यासाठी ठेवला आहे झाकून..😀


कैरीची डाळ आणि झकास पन्हं थंडगार....

रात्री पण आइस्क्रीमचा मारा चाललाय फार.....


व्यायाम करायचा निश्चय केलाय सोमवार पासुन... 

वजनकाटा २ महिन्यासाठी ठेवला आहे झाकून..😅


करवंद जांभळे कलिंगड 

खावी ताव मारून....

फणसाचे गरे आणि सांदण जरा थोडी जपून...


रिचवावा पायरीचा रस आणि हापूस थोडा कापून...

वजनकाटा २ महिन्यासाठी ठेवला आहे झाकून..😃


आमरस पुरीच जेवून करतो थोडा आराम...

वजन कमी करण्यासाठी 

कोणते करू मी व्यायाम...


हाताची बोटं पायांच्या बोटाला टेकतात अजून वाकून..

वजनकाटा २ महिन्यासाठी ठेवला आहे झाकून..

🤣🤣🤣

Saturday, 5 April 2025

८०-वर्ष-जुनी भिंत" नावाचे पुस्तक प्रकाशित केले.

 मित्रांनो,


आपल्याकडे सुद्धा average  आयुष्यमान 80 च्या आसपास गेले आहे असे वाटते. त्यामुळे आता आपल्याला 80 वर्षे आनंदात जगायचे असल्यास काय करायला पाहिजे ते माहित करुन घ्या. 


मानसोपचारतज्ज्ञ हिदेकी वाडा यांनी "८०-वर्ष-जुनी भिंत" नावाचे पुस्तक प्रकाशित केले. पुस्तक प्रकाशित होताच, त्याची विक्री ५,००,००० प्रतींपेक्षा जास्त झाली, जी सध्या सर्वाधिक विक्री होणारे पुस्तक ठरले. जर हाच दर कायम राहिला तर या पुस्तकाची विक्री १० लाख प्रतींपेक्षा जास्त होईल, ज्यामुळे ते या वर्षी जपानमधील सर्वाधिक विक्री होणारे पुस्तक बनेल.


या पुस्तकातील 60 ते 80 वर्षे वयाच्या लोकांना *"सुखी माणसं"* बनवण्याच्या 44 गोष्टी:👇


1.चालत राहा.


2.चिडल्यावर खोल श्वास घ्या.


3.शरीर आखडत नसेल ,इतपत व्यायाम करा.


4.उन्हाळ्यात एसी वापरत असाल तर ,भरपूर पाणी प्या.


5."डायपर" वापरल्याने हालचाली सोप्या होतात.


6.जास्त वेळा चालल्याने शरीर आणि मेंदू अधिक ऊर्जावान राहतो.


7.विसरणे हे वयामुळे नसून मेंदूचा दीर्घकाळ वापर न केल्यामुळे होते.


8.जास्त औषधं घेण्याची गरज नाही.


9.रक्तदाब आणि साखर पातळी कृत्रिमरीत्या कमी करण्याची गरज नाही.


10.एकटे असणे म्हणजे एकाकीपणा नव्हे, तर आनंदी वेळ घालवणे.


11.आळशी असणे लाजिरवाणे नाही.


12.वृद्धांसाठी वाहन चालवणे धोकादायक ठरू शकते, त्यामुळे परवाना न घेण्याचा विचार करा.


13.आवडते तेच करा, जे नकोसे वाटते ते करु नका.


14.वय झालं तरीही सर्व नैसर्गिक इच्छा कायम राहतात.


15.घरात बसून राहू नका.


16.जे हवे ते खा, किंचित जाडसर राहणे ठीक आहे.


17.प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक करा.


18.ज्यांना तुम्ही नकोसं समजता, अशा लोकांना टाळा.


19.सतत टीव्ही पाहू नका.


20.रोगाशी अखेरपर्यंत लढण्यापेक्षा त्याच्यासोबत जगायला शिका.


21."गाडी डोंगरावर गेली तरी वाट सापडते" हा जादूई मंत्र लक्षात ठेवा.


22.ताजे फळे आणि सॅलड खा.


23.आंघोळ 10 मिनिटांत पूर्ण करा.


24.झोप येत नसेल तर जबरदस्ती करू नका.


25.आनंदी गोष्टी केल्याने मेंदू सक्रिय राहतो.


26.मनातलं बोलून टाका, जास्त विचार करू नका,कसं बोलू वगैरे?


27.लवकरात लवकर "फॅमिली डॉक्टर" ठरवा.


28.फार सहनशील राहू नका, थोडेसे 

*"वाईट म्हातारे"*,व *नटखट* होण्यास हरकत नाही.


29.कधी कधी आपलं मत बदलायला व हट्ट सोडायला हरकत नाही.


30.आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यातील "डिमेन्शिया" हा देवाने दिलेला आशीर्वाद आहे.


31.शिकणं थांबलं की ,माणूस खरंच म्हातारा होतो.


32.कीर्तीचा हव्यास सोडा, जे आहे ते पुरेसं आहे.


33.निरागसपणा हा वृद्धांचा विशेषाधिकार आहे.


34.जितक्या समस्या, तितकं आयुष्य रंजक!


35.सूर्यप्रकाशात बसल्याने आनंद मिळतो.


36.दुसऱ्यांसाठी चांगल्या गोष्टी करा.


37.आजचा दिवस निवांत जगा.


38.इच्छा हाच दीर्घायुष्याचा स्रोत आहे.


39.नेहमी सकारात्मक राहा.


40.मोकळा श्वास घ्या.


41.जीवनाचे नियम तुमच्या हातात आहेत.


42.प्रत्येक गोष्ट शांतपणे स्वीकारा.


43.आनंदी माणसं नेहमी प्रिय असतात.


44.हसण्याने नशीब उजळतं.


*ही माहिती आपल्या सर्व ज्येष्ठ मित्रांपर्यंत जरूर शेअर करा!*

Monday, 24 March 2025

आजीला तिच्या नातीने अंडी बाटलीत घालायला आणि नंतर अंडी न फोडता बाहेर काढायला सांगितले. आजी कशी यशस्वी झाली ते पहा. (

 आजीला तिच्या नातीने अंडी बाटलीत घालायला आणि नंतर अंडी न फोडता बाहेर काढायला सांगितले. आजी कशी यशस्वी झाली ते पहा. (वरवर पाहता, आजी भौतिकशास्त्राच्या माजी शिक्षिका होत्या आणि त्यांची स्मरणशक्ती अजूनही उत्तम स्थितीत आहे.)

😄👍😀


Sunday, 23 March 2025

बायकोचे, नवऱ्याच्या, बाबतीतले "सप्तसूर"...🧏‍♀️🤦‍♀️🙅‍♀️🙆‍♀️(सहज सुचलेले....) *सा रे ग म प ध नी सा*

 बायकोचे, नवऱ्याच्या, बाबतीतले "सप्तसूर"...🧏‍♀️🤦‍♀️🙅‍♀️🙆‍♀️(सहज सुचलेले....)


*सा रे ग म प ध नी सा*


*सा*-ध कळत नाही ह्या माणसाला.....

*रे*- देवा कधी सुधारणार हा माणूस...

*ग*-प्प बसा... मला अक्कल शिकवू नका....

*म*-लाच सर्व करावे लागते...

*प*-टपट आवरणे ह्याला कधी जमलंच नाही...

*ध*-ड एक काम करत नाही हा माणूस...

*नि*-दान मी एखाद काम करीन अस म्हणेल तर शपथ...

*सा*-री  काम बायकोवर टाकून हा  गाव उंडारायला मोकळा...

😃😃😃😃

Friday, 14 March 2025

हास्यास्पद काम आणि ठेवलेली नाव

 नवस करून, 

9 महीने जीवापाड जपून, 

दिवस रात्र स्वप्न बघून 

जन्माला आलेल्या मुलाचे नाव 

त्याचे आई वडिल 

'विनोद' कसे काय ठेवतात मला आजवर नाही समजलय - 

 *पु. ल. देशपांडे*  


😧😧😧


'प्रताप' नावाबद्दल पण तेच...


'हा आमचा प्रताप' अशी ओळख 

आई—वडीलांनी करुन दिली 

तर कसे वाटेल?? 

 *—पु. ल. देशपांडे* 


😧😧😧


पणशीकरांना मुलगा झाला...

मुलाचे नाव "श्रीपाद" ठेवले...


त्याचे पूर्ण नाव:

'श्री पाद पण शी कर..!!


 *इति - पु. ल. देशपांडे* 


धन्य धन्य !

😂😂😂😂

Tuesday, 4 March 2025

आधुनिक तंत्रज्ञानाचा चमत्कार pl share

 आधुनिक तंत्रज्ञानाचा चमत्कार 

(AI  technology) 👌

स्वर्गवासी पिता मुलाच्या लग्नात हजेरी लावून खाऊन पिऊन गेला 😊


Sunday, 2 March 2025

सुप्रभात

 *रांगोळी ही पुसली जाणार आहे हे माहीत असून देखील आपण ती अतिशय सुबक आणी रेखीव व सुंदर काढण्याचा प्रयत्न करतो*


*तसेच आपलं आयुष्य हे*  *कधीतरी संपणारच  आहे*

*ते अधिक सुंदर आणी*

**सुंदरच जगण्याचा प्रयत्न* *करायला काय हरकत आहे!!!!*

      *🌹शुभ सकाळ*🌹


Wednesday, 26 February 2025

वेळकाढून जरूर वाचा.. _B+_ लघु कथा

 *वेळकाढून जरूर वाचा.. _B+_ 

✨ लघु कथा  - - १*

आईच्या नावे असलेली जागा आपल्या नावावर करून घेण्याची सुप्त इच्छा मनात धरून आईच्या ताब्यासाठी दोन भाऊ भांडत होते. आईला विचारल्यावर ती म्हणाली जो माझ्या तीन औषधाच्या गोळ्यांची नावे एका झटक्यात सांगेल त्याच्याकड़े मी जाईन. दोन्ही भाऊ खजील झाले.


*✨ लघु कथा ..२.*

शिक्षणासाठी दूर देशी गेलेल्या गरीब होतकरु मुलाने आईला पत्र पाठवले त्यात त्याने लिहिले, इथे माझी जेवणाची चंगळ आहे. काळजी करु नकोस. आईने ते पत्र वाचून एक वेळेचे जेवण सोडले कारण पत्राच्या शेवटी मुलाच्या अश्रुने शाई फुटली होती.


*✨ लघु कथा  - -३.*

आजोबाच्या काठीला हाताने ओढत नेणाऱ्या नातीला पाहून लोक म्हणाले, अग हळू हळू आजोबा पडतील ना. आजोबा हसून म्हणाले, पड़ींन बरा... माझ्याजवळ दोन काठया असताना.


*✨ लघु कथा  - - ४.*

आंब्याच्या झाडावर चढून चोरुन आंबे काढणाऱ्या मुलांच्या पाठीत रखवाल दाराने काठी घातली आणि थोडा वेळ धाक म्हणून त्यांना झाडाला बांधून ठेवले. का कुणास ठाऊक पण त्यानंतर त्या झाडाला कधीच मोहर आला नाही.


*✨लघु कथा  - -५.*

ऑफीसातून दमून आल्यावर बाबाने आजीचे पाय चेपून दिल्याचे पाहून नातीने न सांगता बाबाच्या पाठीला तेल लावून दिल्याचे पाहून आजी म्हणाली, "ताटातील वाटीत आणि वाटीतलं ताटात."


*✨लघु कथा  - -६.*

वडील गेल्यावर भावांनी संपत्तीची वाटणी केल्यावर म्हाताऱ्या आईला आपल्या घरी नेताना बहीण म्हणाली, मी खुप भाग्यवान..

माझ्या वाट्याला तर आयुष्य आलय...


*✨लघु कथा  - -७.*

काल माझा लेक मला म्हणाला बाबा मी तुला सोडून कधीच कुठे जाणार नाही कारण तू पण आजी आजोबांना सोडून कधी राहिला नाहीस. मला एकदम वडिलोपार्जित प्रॉपर्टी नावावर झाल्यासारखे फीलिंग आले .

   

*✨लघु कथा  - -८.*

तिच्या नवऱ्याचा मित्र भेटायला आला आज हॉस्पिटल मध्ये, तो खूपच आजारी होता म्हणून. जाताना बळेबळेच ५०००चे पाकीट तिच्या हातात कोंबून गेला. म्हणाला, लग्नात आहेर द्यायचाच राहिला होता. माझा दोस्त बरा झाला की छानसी साडी घ्या.

त्या पाकिटा पुढे आज सारी प्रेझेंट्स फोल वाटली तिला.


*✨ लघु कथा  - -९.*

आज भेळ खायची खूप इच्छा झाली तिला. ऑफिस सुटल्यावर पण घरी जायला उशीर होईल आणि सासूबाईंना देवळात जायचे असते म्हणून मनातली इच्छा मारून धावत-पळत घर गाठले तिने. स्वैपाकखोलीत शिरली तर सासूबाई म्हणाल्या हातपाय धू पटकन, भेळ केलीय आज कैरी घालून. खूप दिवस झाले मला खावीशी वाटत होती.


*✨  लघु कथा  -१०.*

तिन्हीसांजेला सुमतीबाई देवापाशी जपमाळ घेऊन बसल्या होत्या. तेवढ्यात मुलगा कामावरून आला. पाठोपाठ मोगऱ्याचा सुवास आला. सूनबाई च्या केसात फुलला असेल या विचाराने त्यांनी अजूनच डोळे घट्ट मिटून घेतले. थोड्यावेळाने जप झाल्यावर डोळे उघडून पाहतात तर काय मोगऱ्याची ओंजळभर फुले त्यांच्या बालकृष्णासाठी ओटीत वाट पहात होती. त्यांची कूस अजूनही सुगंधीच होती. देवघरातला खोडकर कान्हा मात्र गालात हसत होता.

 

*सकारात्मक रहा...*

*सध्या बाहेर इतके नकारात्मक विचार फैलावतायेत की लोकांचा माणसातल्या चांगुलपणा वरचा विश्वास उडत चाललाय. अशावेळी अशा सकारात्मक लघु कथांची आणि त्यांचा जास्तीत जास्त प्रसार करण्याची खरोखर आवश्यकता आहे.!!* 🙏


🚩🚩 राम कृष्ण हरी  🚩🚩

Tuesday, 25 February 2025

जपानमध्ये मोफत स्वयंपाकाचा गॅस, वीज, रेशन यांसारख्या कोणत्याही कल्याणकारी योजना नाहीत.

 जपानमध्ये मोफत स्वयंपाकाचा गॅस, 

वीज, रेशन यांसारख्या कोणत्याही 

कल्याणकारी योजना नाहीत.

तिथल्या लोकांचा बाणा आहे:

“ज्या गोष्टीची गरज आहे, तिच्यासाठी 

मेहनत करा; अन्यथा त्याशिवाय राहा.”


खाली दिलेली पाच विधाने कदाचित तुमच्या आयुष्यातील सर्वोत्तम विधाने ठरु शकतात, आणि ती भारतातही राबवायला हवीत:


*1.* गरीबांना श्रीमंत करण्यासाठी 

श्रीमंतांना गरीब करुन उपयोग नाही.


*2.* जो कोणी काम न करता काही मिळवतो, त्यासाठी दुसऱ्या कोणाला तरी मेहनत करावी लागते आणि त्याला त्याच्या कष्टाचे फळ मिळत नाही.


*3.* जगातील कोणतीही सरकार 

आपल्या नागरिकांना मोफत काहीही 

देऊ शकत नाही, जोपर्यंत ती 

ते दुसऱ्या नागरिकांकडून घेत नाही.


*4.* धनाचे विभाजन करुन

संपत्ती वाढवता येत नाही!


*5.* जेव्हा अर्धे लोक काहीतरी मोफत मिळवतात, तेव्हा ते काम करणे सोडून देतात. आणि जे काम करतात, त्यांच्या कष्टाचे फळ इतरांना मिळाल्यामुळे त्यांची मेहनत करण्याची इच्छाही कमी होते.


ही कोणत्याही समृद्ध राष्ट्राच्या

पतनाची सुरुवात आहे.

चांगल्या नागरिकांनी या

वेडेपणाला थांबवले पाहिजे.


आज सर्व राजकीय पक्ष 

या शर्यतीत सामील आहेत.

भविष्यात हे थांबवण्यासाठी

आपण सर्वतोपरी प्रयत्न करुया.


तुमच्या मनात हे शेअर करु नये

असे काही कारण आहे का.?

जर नाही, तर शेअर करा आणि

या जनजागृती मोहिमेत सक्रिय

सहभाग नोंदवा.🌹

Thursday, 20 February 2025

*विमान किती उंचावरून उडू शकतं ?* अपवाद मन, भरारी घेता येते

 🎴🎴🎴🎴🎴🎴🎴🎴🎴🎴🎴

       *विमान किती उंचावरून उडू शकतं ?*


*विमान हवेतून उडत जातं, त्यामुळे हवेचे हे गुणधर्मच ते जास्तीत जास्ती किती उंचीवरून उडू शकतं, हे निश्चित करत असतात. समुद्रसपाटीवर हवा जितकी दाट असते तितकी ती अधिक उंचीवर असत नाही. जसजसे आपण अधिक उंचीवर जाऊ तसतशी हवा विरळ होत जाते. तिचा दाब कमी होत जातो.*


*ज्या उंचीवर विमान साधारणपणे उडतं, तिथली हवा तर चांगलीच विरळ असते, आणि त्यामुळे तिचा दाब फारच कमी असतो. तो दाब त्या विमानातल्या प्रवाशांना सहन होणं शक्य नसतं. त्यामुळे सर्व नागरी विमानांमध्ये दाब नियंत्रित केलेला असतो. यालाच प्रेशराईज्ड इंटिरियर असं म्हणतात.*


*त्यामुळे प्रवाशांना प्रवास सुसह्य होत असला, तरी त्या विमानाच्या सांगाड्याला आतल्या आणि बाहेरच्या दाबातल्या फरकाला तोंड द्यावं लागतं, आतल्या हवेचा दाब जास्त असल्यामुळे बाहेरच्या दिशेनं काम करत असलेल्या बलाचा ताण त्या पत्र्याला सहन करावा लागतो. ज्या ऍल्युमिनियमच्या मिश्रघातूपासून विमानाचा सांगाडा तयार केला जातो, त्याच्या या ताण सहन करण्याच्या क्षमतेला मर्यादा असतात, त्यामुळे आतल्या आणि बाहेरच्या हवेच्या दाबातला फरक एका विशिष्ट मयदिपलीकडे जाऊन चालत नाही.*


*थोडक्यात, त्यापायी विमानाच्या उडण्याची कमाल उंची निर्धारित केली जाते. तरीही जितकी उंची अधिक, तितकी हवा विरळ असल्यामुळे तिचा विरोधही कमी होतो. त्यापायी वेग वाढवता येतो.*


*या दोन परस्परविरोधी घटकांचा विचार करून विमानाच्या आतला हवेचा दाब समुद्रसपाटी इतका न ठेवता साधारण पाच-सहा हजार फूट उंचीवर असणाऱ्या हवेच्या दाबाइतका ठेवला जातो. त्यामुळे विमानाला अधिक उंची गाठणं शक्य होतं. तरीही उंचीवर जसजशी हवा विरळ होते, तसतसं त्यातलं ऑक्सिजनचं प्रमाणही कमी होत जातं. विमानाच्या इंजिनातल्या जेट इंधनाच्या ज्वलनासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते. त्यामुळे अधिक उंचीवर गेल्यास त्या इंजिनाच्या कार्यक्षमतेतही घट होते. कमाल उंची निर्धारित करणारा हा दुसरा घटक आहे.*


*या दोन्हींचा विचार करता नागरी उड्डाणं साधारण २८००० ते ३५००० फूट म्हणजेच ९००० ते १२००० मीटर उंचीवरून उड़तात. कॉन्कॉड हे आता रद्द केलं गेलेलं स्वनातीत विमान त्याहूनही जास्त म्हणजे ५०००० फूट उंचीवरून उडत असे; पण ती कमाल उंची झाली.*


*उंचीची ही मर्यादा अर्थात नागरी विमानांना लागू आहे. लष्करी विमानं प्रेशराईज्ड नसतात. त्याऐवजी त्यातले वैमानिक दाबापासून संरक्षण करणारे विशिष्ट पोशाख घालतात, त्यामुळे ती विमानं अधिक उंचीवरून उडू शकतात. त्यांच्यावर फक्त ऑक्सिजनच्या उपलब्धतेची मर्यादा पडते. ती विमानं ९०००० फूट म्हणजेच ३०००० मीटरची उंची गाठू शकतात.....*


*डाॅ. बाळ फोंडके यांच्या 'किती ?' या पुस्तकातुन...*

🎴🎴🎴🎴🎴🎴🎴🎴🎴🎴🎴

Tuesday, 18 February 2025

तुज सगुण म्हणू की निर्गुण रे

 *आपला स्पष्ट स्वभाव समोरच्याला खटकत असेल तर ती त्यांची समस्या आहे... आपण फक्त आरश्याप्रमाणे रहायचं, काळजी तर त्यांनी करायची ज्यांचा मुखवटा नकली आहे.!*                                 *विचार करण्याची पद्धत सुपाप्रमाणे असावी,दोष तेवढे काढून टाकायचे आणि गुण तेवढे शिल्लक ठेवायचे...*      

*सत्य हेच आहे की,माणसांना माणसांचीच गरज आहे. श्रीमंती गेल्यावर पुन्हा मिळवता येते,पण हातातुनं निसटलेली चांगली माणसं "जशीच्या तशी" पुन्हा मिळवता येत नाही.*

 *सत्य मुक्त असतं....ते बंधनात ठेवता येत नाही............*

*आणि...प्रामाणिकपणा अमूल्य असतो....त्याची किंमत करता येत नाही......*

      *🌹शुभ सकाळ*🌹

Saturday, 15 February 2025

मध्यरात्री १२ वाजता वाढदिवस साजरा करता त्यामुळे सावधान...

 *मध्यरात्री १२ वाजता वाढदिवस साजरा करता त्यामुळे सावधान...*


   आजकाल सुरू झालेली एक विचित्र परंपरा म्हणजे रात्री १२ वाजता वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे आणि साजरा करणे. पण तुम्हाला माहित आहे का?


 *भारतीय धर्मग्रंथ हे चुकीचे मानतात*.. 


आज आम्ही तुम्हाला असे करणे किती *मोठे नुकसान* आहे हे सांगणार आहोत.कारण मोठा अनर्थ* घडू शकतो..


आजकाल कुणाचा वाढदिवस असो, लग्नाचा वाढदिवस असो की, रात्री बारा वाजता केक कापण्याची फॅशन झाली आहे. रात्री बारा वाजता केक कापायचा असल्याने लोकांमध्ये खळबळ उडाली आहे.अनेकदा असे दिसून येते की लोक त्यांचा वाढदिवस १२ वाजता म्हणजेच निशीथ काल (भूत काळ) मध्ये साजरा करतात. , निशीथ काल ही रात्रीची वेळ असते जी *सामान्यतः मध्यरात्री १२ ते पहाटे ३ च्या दरम्यान असते*. सामान्य लोक याला *मध्यरात्र* किंवा अध्यरात्र म्हणतात.


शास्त्रानुसार हा काळ अदृश्य शक्ती, भूत आणि पिशाच यांचा काळ आहे. या काळात ही शक्ती अत्यंत मजबूत होते.


आपण कोठेही राहतो, अशा अनेक शक्ती असतात ज्या आपल्याला दिसत नाहीत, परंतु ज्यांचा आपल्यावर अनेकदा *विपरित* परिणाम होतो.


 ज्यामुळे आपले जीवन विस्कळीत होते.आणि आपण दिशाहीन होतो. हे अनेकदा वाढदिवसाच्या पार्टीत घडते.  अशा भुताटकीच्या काळात केक कापून, दारू आणि मांस सेवन केल्याने अदृश्य शक्ती माणसाचे वय आणि भाग्य कमी करतात आणि दुर्दैव दार ठोठावते असते.


वर्षातील काही दिवस जसे की दिवाळी, ४ नवरात्री, जन्माष्टमी आणि शिवरात्री वगळता, निशीथ काल महानशीठ काल बनतो आणि शुभ परिणाम देतो, तर इतर वेळी तो हानिकारक प्रभाव देतो.


*शास्त्रानुसार रात्री केलेल्या मनोकामना प्रतिकूल परिणाम देतात.आणि धर्मग्रंथानुसार अग्नी विझवून सण साजरे करणे म्हणजे अंधाराची देवता असुराचे आवाहन करण्यासारखे मानले जाते.*


*हिंदू धर्मग्रंथांनुसार दिवसाची सुरुवात सूर्योदयाने होते आणि हा काळ ऋषीमुनींच्या तपश्चर्येचाही असतो.त्यामुळे या काळात वातावरण शुद्ध आणि नकारात्मकतेपासून मुक्त असते. अशा परिस्थितीत, शास्त्रानुसार, एखाद्या व्यक्तीच्या वाढदिवसाच्या दिवशी सूर्योदयानंतरच शुभेच्छा दिल्या पाहिजेत कारण रात्रीच्या वेळी वातावरणात रज आणि तम कणांचे प्रमाण खूप जास्त असते आणि त्या वेळी दिलेल्या शुभेच्छा निष्फळ ठरतात. शुभेच्छा फलदायी होण्याऐवजी हानिकारक ठरतात.*


🙏🏻 *कृपया हा लेख तुमच्या जवळच्या जास्तीत जास्त लोकांना पाठवा*🙏🏻

*🌹💐सर्वांना शुभेच्छा 💐🌹*

डिजिटल जिंदगी : मुझे नींद ना आये…*

 *डिजिटल जिंदगी : मुझे नींद ना आये…*


विनय जोशी


हिप्नोस, ग्रीक पुराणकथांमधला झोपेचा देव. रात्रीची देवी निक्स आणि अंधाराचा देव एरेबस यांचा हा पुत्र. कुठलाही प्रकाश पोहोचू शकणार नाही अशा एका गुहेत हा पत्नी, विश्रांती आणि शांतीची देवी पासिथिया हिच्यासोबत राहतो. रात्र काळोखात बुडाली की हा कामगिरीवर निघतो. सगळ्यांवर झोपेचं रसायन शिंपडतो आणि गाढ झोपवतो. याचा मुलगा, स्वप्नांचा देव मॉर्फियस सगळ्यांना स्वप्नांच्या जगात अलगद नेऊन सोडतो. पासिथिया सगळ्यांवर शांतीचं पांघरुण घालते. आणि मग दुसऱ्या दिवशी सूर्य देव हेलिओसच्या स्वागताला सगळी मंडळी ताजीतवानी असतात, अशी ग्रीक दंतकथांमध्ये मान्यता आहे.


आजही हा दर रात्री आपल्याला झोपवायला येतो म्हणे… पण सूर्य मावळला तरी मोबाइल स्क्रीनचा लखलखाट आहे. यात रात्र आणि अंधार दोन्ही हरवलेत. त्यांच्या शिवाय हिप्नोस पोरका. तरी हा प्रयत्न करत राहतो. आपल्याला झोपवू पाहतो, पण स्क्रीनशी चिकटलेल्या डोळ्यांवर झोपेच्या रसायनाचे हंडे रिकामे करूनही फरक पडत नाही. झोप काही येत नाही. परिणामी याची बायका पोरंदेखील आपल्यावर रुसतात. गाढ झोपेअभावी स्वप्नं पडत नाहीत. विश्रांती अभावी शांती मिळत नाही. यात बिचारा हिप्नोस तरी काय करणार?


झोप ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. बाल संप्ररेकतज्ज्ञ डॉ. तुषार गोडबोले म्हणतात, ‘आपल्या शरीरातील जैविक घड्याळ आणि झोप लागणे – जाग येणे यांचे चक्र यांचा परस्पर संबंध आहे. मेंदूच्या तळाशी असणाऱ्या ‘हायपोथॅलॅमस’ भागात ‘सुप्रा – कायसमॅटिक- केंद्र’ या घड्याळाला नियंत्रित करते. या दैनिक तालबद्धतेला (Circadian rhythm) अनुसरून शरीरात विविध संप्ररके स्रावतात. मेलॅटोनिन, सिरोटोनिन, डोपामिन आणि नॉरएपिनेफ्रिन ही संप्रेरके झोपेचं नियंत्रण करतात. दिवस मावळून रात्र होऊ लागताच आपल्या डोळ्यांमधल्या गँग्लियन पेशी अंधाराची नोंद घेतात. यातून रात्र झाल्याचा संदेश मेंदूला देतात. मेंदू स्लीप मोड ऑन करतो. ‘पिनिअल’ ग्रंथींमधून मेलॅटोनीन या संप्रेरकाची निर्मिती होऊ लागते. जसजशी याची पातळी वाढू लागते, तसतशी आपली कार्यक्षमता मंदावते. स्नायू शिथिल होऊ लागतात. डोळे जड पडू लागतात. शरीराचं तापमान कमी होऊ लागतं. रक्तदाब कमी होतो. मेलॅटोनीनने विशिष्ट पातळी ओलांडली की मेंदू झोपण्याचा हुकूम फर्मावतो आणि आपण झोपेच्या अधीन होतो. मध्यरात्री मेलॅटोनीनची सर्वोच्च पातळी असते. सकाळ होऊ लागताच ती कमी होऊ लागते. अधिवृक्क ग्रंथींमधून कॉर्टिसोल संप्रेरक स्रावू लागते. प्रकाश वाढू लागताच कॉर्टिसॉलची पातळी वाढते. याच्या वाढत्या पातळीबरोबरच रक्तदाब आणि हृदयाची गती वाढू लागते. शरीराचं तापमान वाढतं आणि आपलं जैविक घड्याळ आपल्याला झोपेतून उठवतं.


कॉर्टिसॉल, हे ‘स्ट्रेस हार्मोन’ आहे. नव्या दिवसासाठी शरीराला तयार करण्यासाठी झोपेतून जागं झाल्यानंतर पहिल्या ३० ते ४५ मिनिटांत कॉर्टिसोलच्या पातळीत एकदम मोठी वाढ होते. भरपूर विश्रांती घेऊन ताजातवाना झालेला मेंदू आणि शरीर दिवसभर काम करायला सज्ज होतं. संध्याकाळ होऊन प्रकाश कमी होऊ लागतो तशी कॉर्टिसॉलची पातळी कमी होते आणि पुन्हा मेलॅटोनीन पाझरू लागतं. गेली लक्षावधी वर्षं हे चक्र असंच सुरळीत चालू होतं. निसर्गातील दिवस-रात्र, प्रकाश-अंधार यांच्या चक्रावर आपलं जैविक घड्याळ उत्तमपणे टिकटिकत होतं. आजच्या डिजिटल जिंदगीत मात्र या प्रक्रियेत मोठा अडथळा येतो आहे. एकतर संध्याकाळ होताच कृत्रिम प्रकाशाचा भडिमार होतो, त्यामुळे झोपेआधी मेलॅटोनीनची पुरेशी निर्मिती होत नाही. झोपेच्या वेळी सगळे दिवे मालवले तरी मेंदू झोपण्याचा सिग्नल देत नाही आणि मग झोप येत नाही म्हणून हाती घेतला जातो मोबाइल.


झोपण्याआधी मोबाइल वेगवेगळ्या कारणांनी हातात येतो. कधी दिवसभर फार पाहणं झालं नाही, जरा झोपण्यापूर्वी पाच मिनिटं बघूया बरं… अशी सबब, तर कधी गजर लावण्याचं निमित्त. ५ मिनिटांसाठी घेतलेल्या मोबाइलची २५ मिनिटं कधी होतात कळतच नाही. काहींना लाइक्स आणि कमेंटचा मोह इतका की झोपेतून उठून मोबाइल पाहिला जातो. काही निशाचर मंडळींसाठी तर रोजचं हे स्क्रीन जागरण ठरलेलं. नाइट शिफ्ट्स, लेट नाइट वर्क, अभ्यास, सबमिशन, उगाच लेट नाइट चॅटिंग आणि करायला अगदीच काही नाही तर आवडत्या वेब सीरिजचं बिंज वॉचिंग. कारणं अनेक आणि मग जागते रहो म्हणत उगाच रात्री जागवल्या जातात. दिवसभर काम करून दमलेल्या शरीराला विश्रांती हवी असते. ‘ढल गया दिन हो गयी शाम’ म्हणत मेंदूसुद्धा सगळी झाकपाक करून स्लीप मोड ऑन करायच्या तयारीत असतो. तेवढ्यात स्क्रीनमधून पाझरणारा निळा प्रकाश पाहून डोळ्यांतल्या गँग्लियन पेशी या प्रकाशाची जाणीव मेंदूला करून देतात. मेंदू गडबडतो आणि तातडीने मेलॅटोनीनचं उत्पादन रोखतो.


झोपण्याआधी उत्कंठावर्धक काही पाहिलं तर कॉर्टिसॉल तसंच गेमिंगमधून एड्रेनालाइन असे ‘स्ट्रेस हार्मोन’ स्रावू लागतात. हे संप्रेरक शरीराला सज्ज करण्याचं कार्य करत असते. परिणामी, स्लीप मोड ऑफ होऊन जातो. मोबाइल बघत मध्यरात्र उलटून जाते. आता काही मेलॅटोनीन फार स्रावू शकत नाही. मोबाइल बघत डोळे आपले उगाच ताणलेले, मेंदू उगाच शिणलेला. झोपावं असं ठरवलं तरी मेलॅटोनीनअभावी लवकर झोप लागत नाही. ‘पहाटे पहाटे मला झोप आली, मोबाइलची मगरमिठी सैल झाली’ म्हणत कसंबसं झोपावं तर या झोपेला गुणवत्ता नसते. गाढ झोपेत होणाऱ्या अंतर्गत प्रक्रिया नीट होत नाहीत आणि दिवसभर मरगळ जाणवते. दिवसा फार वेळ मिळत नाही म्हणून झोपेआधी जरा रिलॅक्स व्हायला मोबाइल बघावा या सबबीखाली झोपण्याआधी १० – १५ मिनिटं मोबाइल बघितला जात असेल तरी सावध होण्याची गरज आहे. अमेरिकेतील स्लीप मेडिसिन एक्सपर्ट मिशेल ड्रेरुप यांच्या मते हल्ली झोपेची गुणवत्ता खालवायला स्क्रीनमधून पाझरणाऱ्या ब्ल्यू लाइटपेक्षा पाहिलेला कन्टेन्ट जास्त धोकादायक ठरतो आहे. १५ मिनिटांत २०-२५ रील्स पाहून आपण डोळे मिटतो, पण मेंदूला मात्र कामाला जुंपावं लागतं. आलेल्या सगळ्या माहितीचं पृथक्करण करणं हे त्याचं कार्य असल्याने पाहिलेल्या सगळ्या रील्सवर तो प्रक्रिया करत बसतो. वेगवेगळ्या कन्टेन्टमधून वेगवेगळ्या भावनांना सामोरं जाताना मेंदूला तशा प्रक्रिया कराव्या लागतात, परिणामी डोळे मिटले तरी मेंदू जागा राहतो आणि नीट झोप लागत नाही.


झोप आपली मूलभूत गरज आहे. दमलेलं शरीर आणि शिणलेलं मन झोपेच्या अधीन झाल्यावर शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक स्तरावर अनेक महत्त्वाच्या प्रक्रिया घडतात. झोपेत ‘ग्रोथ हॉर्मोन’चं कार्य जोमाने सुरू होतं. झोपेच्या दरम्यान शरीरातील पेशी, ऊती आणि स्नायूंची दुरुस्ती होऊन शरीराची झीज भरून काढली जाते. सगळ्या स्नायूंना विश्रांती मिळते. हे हॉर्मोन वाढीच्या वयात हाडांची आणि स्नायूंची वाढ करण्यास मदत करते. झोपेत स्निग्ध पदार्थांचं ज्वलन होतं. शांत झोप रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते. भूक आणि तृप्तता यांचे संप्रेरक असणाऱ्या लेप्टिन आणि घर्लिन यांचे स्राव नियंत्रित करण्यास झोपेची मदत होते. त्यामुळे आपली पचन प्रक्रिया निरोगी राहते. झोपेत मेंदू दिवसभर गोळा केलेल्या माहितीवर प्रक्रिया करतो. अनावश्यक माहिती टाकून दिली जाते, महत्त्वाची माहिती स्मृतीत साठवली जाते.


शांत झोपेत होणाऱ्या या सगळ्या महत्त्वपूर्ण शरीरांतर्गत प्रक्रियांसाठी झोपण्याआधीचा स्क्रीन टाइम घातक सिद्ध होतो आहे. दुसऱ्या दिवशी वाटणारी मरगळ आणि डोळ्याखाली डार्क सर्कल इतक्यापुरतंच हे प्रकरण मर्यादित नाही. झोपेआधीच्या स्क्रीन टाइममुळे कमी स्रावणारं मेलॅटोनीन इतरही अनेक समस्यांना आमंत्रण देतं. पुरेशा मेलॅटोनीन अभावी रोगप्रतिकार शक्ती कमकुवत होते. मेलॅटोनीनचा पचन प्रक्रियेवरदेखील प्रभाव असल्याने त्याच्या कमतरतेमुळे अॅसिडिटी, अल्सर, ‘इरिटेबल -बॉवेल -सिंड्रोम’ असे पचनसंस्थेचे विकार उद्भवू शकतात. उप्साला युनिव्हर्सिटी स्वीडनमधील स्लीप सायन्स लॅबमधल्या संशोधकांनी केलेल्या एका संशोधनानुसार शांत झोपेअभावी रक्तातील घर्लिनची पातळी वाढते आणि लेप्टिनची पातळी कमी होते. असे दीर्घकाळ होत राहिल्यास लठ्ठपणा वाढण्याची शक्यता असते. फीनबर्ग स्कूल ऑफ मेडिसीन, नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीमधील आयव्ही चेउंग मेसन यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या अभ्यासातील प्राथमिक निकालांनुसार रात्रीच्या स्क्रीन टाइमचा शरीरातील इन्शुलिन स्रावणावर देखील नकारात्मक परिणाम होतो. आणि यातून टाइप-२ मधुमेहाची शक्यता वाढते. कनेक्टिकट विद्यापीठाने २०१५ मध्ये केलेल्या एका अभ्यासातून असं दिसून आलं आहे की, रात्री कृत्रिम प्रकाशाच्या जास्त संपर्कात राहिल्याने स्तनाचा कर्करोग, मधुमेह, नैराश्य यांचा धोका वाढतो, तसंच याचे आरोग्यावर दीर्घकालीन गंभीर परिणाम संभवतात.


स्क्रीन टाइममुळे निद्रानाशाचे मानसिक आणि बौद्धिक परिणामदेखील आहेत. विस्कळीत जैविक लयबद्धतेमुळे नैराश्य, चिंता, स्मृतिभ्रंश, बोधनक्रियेमध्ये अडथळे अशा मानसिक आजारांची शक्यतादेखील बळावते. डॉ. तुषार गोडबोले म्हणतात, आपल्या जैविक तालबद्धतेचा (Circadian rhythm) ताल बेताल करणाऱ्या रात्री झोपेच्या वेळेतील स्क्रीन टाइमवर नियंत्रण ठेवण्याची तीव्र गरज आहे. यासाठी झोपण्याआधी कमीतकमी दीड तास तरी टीव्ही, मोबाइल, लॅपटॉप अशा सगळ्या स्क्रीन्सपासून लांब राहण्याचा सल्ला ते देतात. रात्री आपली सगळी कामं आटोपताना हळूहळू प्रकाश मंदावत नेल्यास मेलॅटोनीन स्रावण्याची प्रक्रिया योग्य रीतीने होऊ शकते, असं ते नमूद करतात. बेडरूमला नो स्क्रीन झोन घोषित करून गजर लावणं, मेल चेक करणं अशी कामं आधीच करून बेडरूममध्ये जाण्यापूर्वी मोबाइल स्क्रीन ऑफ करणं शक्य आहे. झोपण्याआधीच्या एक-दीड तासात मंद प्रकाशात कुटुंबासोबत गप्पा मारणं, शांत गाणं ऐकणं, थोडावेळ ध्यान करणं अशा उपायातून मेंदू झोपेसाठी तयार होऊ शकतो.


झोपण्याआधीच्या दोन तासांत स्क्रीनचा वापर अटळ असेल, तर यासाठी ब्ल्यू लाइट फिल्टर्स वापरता येऊ शकतील. मोबाइलची अॅडॉप्टिव्ह ब्राइटनेस सेटिंग कार्यरत केल्यास उगाच प्रखर स्क्रीन टाळता येऊ शकते. अशा अपरिहार्य स्क्रीन टाइमनंतर लगेच न झोपता काही मिनिटं डोळे बंद करून शांत बसल्यास किंवा ध्यान केल्यास मेंदूचं स्टिम्युलेशन कमी व्हायला मदत होऊ शकते.


निद्रादेव हिप्नोसच्या कथेतील प्रतीकं झोपेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरतात. रात्र आणि अंधार हे झोपेचे जनक. झोपण्यासाठी रात्र तर नैसर्गिकरीत्या होते, पण अंधार मात्र हल्ली जाणीवपूर्वक करावा लागतो आहे. या प्रयत्नात शहरभर उजळलेल्या दिव्यांपेक्षा हातातला इवलासा मोबाइल जास्त घातक. तो योग्यवेळी मालवला तर हिप्नॉस सहकुटुंब प्रसन्न व्हायला वेळ लागणार नाही. यासाठी बेड टाइम स्क्रीन टाइमविषयी जाग येणं गरजेचं ठरतं. म्हणून चैन से सोना हे तो जाग जाईये !!


viva@expressindia.com

OUT LET* NO cutlet

 *OUT LET* 


लाखो जीव घेणार्‍या क्रूर  *हिटलरने* शेवटी आत्महत्या केली !...


सुंदर विचार देणारे *साने गुरुजी* आत्मघात करुन घेतात.


मनशक्ती नावाचं मनाला खंबीर करण्याचं शिक्षण देणारे लोणावळ्याचे *स्वामी विज्ञानानंद* मंत्रालयावरुन उडी मारुन जीव देतात.


आध्यात्मिक गुरु अशी ओळख निर्माण केलेले व कित्येकांना आधार देणारे *भैय्युजी महाराज* आपलं जीवन आपल्या हातानं संपवतात.


पॉझिटिव्ह विचार देणारा चित्रपट करुनही *सुशांत सिंग राजपुतनं* नैराश्यातून आत्महत्या केली.


आणि आता सहा आठ महिन्यांपूर्वी नैराश्याशी लढा कसा द्यायचा हे शिकवणाऱ्या *शीतल (आमटे) करजगी* आपलं जीवन संपवतात. 


नागपूरची बातमी उच्च विद्याविभूषित, दिवंगत कुलगुरूच्या पत्नी तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभाग प्रमुख *डॉ. ज्योत्स्ना मेश्राम* यांनी नवव्या माळ्यावरून उडी घेऊन नैराश्यातून आत्महत्या केली.


या काही सेलिब्रिटींच्या उदाहरणातुन काय शिकायचं आपण?...


पाण्यात शांतपणे पोहोणारं *बदक वरुन शांत दिसत असलं* तरी पाण्याखाली त्याचे पाय वेगानं हलत असतात. शांत पोहोतोय हे दाखवण्यासाठी करावे लागणारे त्याचे कष्ट फक्त त्यालाच माहित असतात.


*माणुस वर वर दिसतो तितका आतून खंबीर असेलच असं नाही.* त्याच्या मनात वेगळी खळबळ असु शकते, जी आपल्यापर्यंत पोहोचत नसते किंवा तो त्या आनंदी आणि सुखी चेहर्‍याच्या आड लपवत असतो, लपवण्याचा प्रयत्न करत असतो. 


शेवटी काय...?? वर सुंदर ताजमहाल असला तरी खाली कबरच आहे हे विसरुन चालणार नाही.


भय्यूजी महाराजांनीआत्महत्या केल्या नंतर ABP माझा चॅनलने एक परिचर्चा घडवून आणली होती.

त्यात बोलताना भय्यूजी महाराजांचे मित्र *श्री. अशोक वानखेडे* यांनी मानवी स्वभावाचा फार चांगला पैलू सांगितला.


भैय्यूजी महाराज स्वतः एक *अध्यात्मीक गूरू* होते परंतू ते एक व्यक्ती पण होते. आपल्या मनातील *स्ट्रेस* बाहेर काढायला त्याच्या जवळ *outlet* नव्हता. *डॉ. शितल आमटे* (बाबा आमटे यांची नात - त्याचं ही अगदी भैयु महाराजासारखं झाले.)


*इतकं महत्वाचं असतं का हे outlet ?*


होय !!!


कोट्यावधी रूपये खर्च करून पाण्यासाठी विशाल *धरण* बांधलं आणि समजा त्याला outlet च दिले नाही तर काय होईल? निश्चितच धरण फुटेल. 


इतकं महत्वाचं असते हे *waste weir...* मानवी शरीर म्हणजे विविध पंचतत्वापासून सांधलेलं एक *धरणच* आहे. या शरीरात समस्यांची आवक अति प्रमाणात झाली तर हे *शरीररूपी धरण फुटेल की राहील ?*

              

*मुंबई का तुंबते?* पुरेसे outlets राहिले नाहीत.


म्हणून आपलं outlet सदैव सताड उघडं ठेवा. आपल्या तोंडाचे *outlet*  वापरून आपल्या समस्या आपल्या माणसांना सांगा. आपल्या अंर्तमनाचं outlet open करण्यासाठी meditation चा अवलंब करा आणि शक्य झाल्यास जगातील सगळ्यात मोठं *outlet* म्हणजे आपले डोळे, ते उघडा. फुटून जाऊ द्या अश्रूंचा बांध... वाहून जाऊ द्या... स्ट्रेस, दुःख, उपेक्षा... पिस्तुलच्या गोळीने डोक्याला छिद्र पाडण्यापेक्षा, पंख्याला लटकण्यापेक्षा... हे केव्हाही सोपं नाही का?


म्हणूनच *मित्र नावाच्या खांद्याचा आधार घ्या. मन मोकळं करा.*

*बेस्ट आउटलेट परीवार आणि मित्र!*


*हसा ! बोला ! रडा ! भांडा ! व्यक्त व्हा ! मुक्त व्हा !*


*काळजी घ्या....*


सोडून गेल्यावर *ᴍɪss ʏᴏᴜ* म्हणण्यापेक्षा सोबत आहे तोपर्यंत *ᴡɪᴛʜ  ʏᴏᴜ* म्हणा. आपुलकीची माणसं मिळायला खुप मोठं भाग्य लागतं. 

 

*समस्त मित्रांना समर्पित...*

Featured post

Lakshvedhi