अलिबाग मधील पीएनपी होली चाईल्ड शाळेत आज दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी थरावर थर रचून द
हीहंडी फोडली.
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
🌹 *माहेरचा बाळकृष्ण* 🌹
---------------------------------------------------
अशोककाका कुलकर्णी
९०९६३४२४५१
---------------------------------------------------
पूर्वीपासून लग्नामध्ये आई आपल्या मुलीला गणपती , बाळकृष्ण व अन्नपूर्णा यांच्या मूर्ती देत असे . त्याचे कारण खूप वेगळे आहे . पूर्वी खूप लहानपणी लग्न होत होती . बाल वयामध्ये लग्न झाल्यामुळे मुलींचे वय खूपच कमी आसे व पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती . घरामध्ये आजी-आजोबा , पणजोबा असे एकत्र कुटुंबातील सदस्य संख्या वीस ते पंचवीस असे . पण मग हे नवीन लग्न झाले की मुलगी घरात आल्यानंतर ती सर्वात लहान असल्यामुळे तिला सर्वांचा धाक वाटत असे . त्या काळात फोन नव्हते व पत्र लिहिणे सुद्धा अशक्य होते . त्यामुळे आपल्याला नवीन घरातील वातावरण किंवा आपल्याला असलेला धाक , आपल्याबद्दल सासरी झालेल्या घडामोडी , आई वडिलांना कळवण्याची काहीही सोय नव्हती . त्यामुळे आई मुलीला लग्नामध्ये गणपती देत असे , अन्नपूर्णा व बाळकृष्ण देत असे . तो बाळकृष्ण माहेरचा पाठीराखा म्हणून सासरी येत असे . ही मुलगी सकाळ संध्याकाळ देव घरामध्ये बसून आपल्या मनातले सगळं सुख दुःख बाळकृष्णाला कथन करत असे . तो एक माहेरचा पाठीराखा आहे असे समजून सर्व मनातील सुखदुःख त्याच्यापुढे उघड केली जात असे व आपले मन हलके केले जात असे . पूर्वी संपर्काची कोणती साधने नव्हती . आजकाल मोबाईल फोन मुळे एकमेकांशी संपर्क साधणे खूप सोपे झाले आहे . पण तरीही आपल्या देवघरातील बालकृष्ण अन्नपूर्णा आणि गणपती आपला माहेरचा आहे असं समजून प्रत्येक सासूरवाशिन त्या मूर्तींची आत्मीयतेने पूजा करते . कारण तो शेवटी माहेरची पाठीराखा असतो . गणपती याकरता दिला जात असे की नवीन संसाराची सुरुवात होण्यासाठी सुरुवातीपासून गणपतीचे पूजन करावे म्हणून गणपतीची मूर्ती दिली जात असे . पूर्वी सर्व कुटुंब शेतीवर अवलंबून असल्यामुळे अन्नपूर्णेची मूर्ती सुद्धा अन्नाचा सुकाळ व्हावा यासाठी मुलीला दिली जात असे . आपल्या मुलीला अन्नाची ददात कधी पडू नये म्हणून तिला अन्नपूर्णेची मूर्ती देऊन त्याचे पूजा करावी असे शास्त्रात सांगितले आहे . आजकाल सर्व बदलले आहे पण तरीही प्रत्येक घराघरांमध्ये अन्नपूर्णा बालकृष्ण आणि गणपती असल्यामुळे त्यांची आत्मीयतेने पूजा केली जाते .
जय श्री राम
विजेत्या - सौ. चैताली शिऊरकर, चाळीसगाव.
त्यांनी उपवासाचे तब्बल ८३ पदार्थ घरी केले होते.
गोड पदार्थ:
1 पनीर रसगुल्ला
2 रसमलाई
3 रताळ्याची खीर
4 केळीचा शिकरण
5 बासुंदी
6 साबुदाण्याची खीर
7 भोपळ्याची खीर
8 पनीरची खीर
9 अंजीर बासुंदी
10 सफरचंदाची बासुंदी
11 खजुराची खीर
12 बदाम हलवा
13 पायनापल शिरा
14 गुलकंद शिरा
15 अंजीर शिरा
16 शिंगाडा शिरा
17 रताळ्याचा शिरा
18 राजगिरा शिरा
19 साबुदाणा शिरा
20 सफरचंदाचा शिरा
21 वरई नारळीभात
22 बटाटा शिरा
23 लाल भोपळ्याचा शिरा
24 काजू चा लाडू
25 प्रोटीन लाडू
26 खजूर लाडू
27 किसमिस लाडू
28 राजगिरा पीठ लाडू
29 पिस्ता लाडू
30 शेंगदाणे लाडू
31 अक्रोड लाडू
32 मखाने लाडू
33 अंजीर लाडू
34 बदाम लाडू
35 साबुदाण्याचा लाडू
36 खसखशीचा लाडू
37 शिंगाडा पिठाचा लाडू
38 बेरीचा लाडू
39 वराईची लापशी
40 लाल भोपळ्याचे शंकरपाळे
41 रताळ्याची गोड टिक्की
42 बेरी रताळू बर्फी
43 प्रोटीन बार
44 ड्रायफ्रूटचा रोल
45 राजगिरा डोनट
46 शिंगाडा पिठाची पाकातली पुरी
47 गोड बटाटा चकती
48 पनीर बर्फी
49 रताळू ची चकती
50 ड्रायफ्रूट श्रीखंड
51 वेलची श्रीखंड
52 फ्रुटखंड
53 राजगिरा लही खीर
54 कलाकंद
55 फ्रुट सॅलड
56 थंडाई
57 एप्पल पाय
58 बनाना स्प्रिंग
59 राजगिरारलाही रताळे गोड दशमी
60 गोड साबुदाणे खिचडी
61 साखर आंबा
62 गुळ आंबा
63 केळाची कोशिंबीर
64 डाळिंबाची कोशिंबीर
तिखट पदार्थ:
65 हिरवी चटणी
66 वरई साबुदाणा पकोडे
67 प्राईड बटाटा
68 आलू टिक्की
69 भगर
70 आमटी
71 बर्गर
72 साबुदाणा वडे
73 तिखट खिचडी
74 पिझ्झा
75 बटाटा किस
76 वरई धिरडे
77 बटाटा भाजी
78 फ्रेंच फ्राईज
79 पोटॅटो स्प्रिंग
80 वरईची भाकरी
81 साबुदाणा थालीपीठ
82 शिंगाडा पीठ लॉलीपॉप
83 मठ्ठा
- कायप्पावरून साभार
*कल हम भी*
*बारिश में छपाके*
*लगाया करते थे...*
*आज इसी बारिश में*
*कीटाणु देखना सीख गये!!*
*कल बेफिक्र थे कि*
*माँ क्या कहेगी*
*आज बारिश से*
*मोबाइल बचाना सीख गये!!*
*कल दुआ करते थे कि*
*बरसे बेहिसाब*
*तो छुट्टी हो जाए...*
*अब डरते हैं कि रुके ये बारिश*
*कहीं दफ़्तर ना छूट जाये!!*
*किसने कहा कि*
*नहीं आती वो*
*बचपन वाली बारिश...*
*हम ख़ुद अब काग़ज़ की*
*नाव बनाना भूल गए!!*
*बारिश तो अब भी बारिश ही है*
*बस हम अपना ज़माना भूल गये ......*
सौ.सुधा मुर्ति म्हणतात...
बऱ्याच स्त्रियांना शारिरीक
सौंदर्याचा न्युनगंड असलेला,
मी समाजात वावरत असतांना
माझ्या निरीक्षणात येतो...
पण, खर सांगू मैत्रिणींनो...
पुरूषांना कांय आवडेल,
याचा विचार करून
स्वतःला घडवू नका...
"पुरूषी नजरेतून...
स्वतःचं सौंदर्य तोलणं...
म्हणजे स्वतः मधील स्त्रीत्वाचं अधःपतन करवून घेणं आहे..."
सकाळी उठून सडा-संमार्जन
झाल्यावर स्वतःच्या हातानं
काढलेली रेशीमरेषांची रेखीव
रांगोळी पाहिलीत, तर तुम्हाला
तुमच्या बोटातली सुंदरता दिसेल...
स्वच्छ- सुंदर आवरलेलं, स्वच्छ
स्वयंपाकघर तुम्हाला तुमच्या
गृहिणीपणाचं सौंदर्य सांगेल...!
तुम्ही शिक्षिका असाल, तर
तुमचं सौंदर्य फळ्यावर नीटपणे
लिहिलेल्या अक्षरात असेल.
विषयाचं आकलन झाल्यावर
दिसणारे विद्यार्थ्यांचे आनंदी चेहरे,
ही तुमचीच सुंदरता आहे...
सौंदर्य कपड्यात नाही,
कामात आहे....
सौंदर्य नटण्यात नाही,
विचारांमधे आहे...
सौंदर्य भपक्यात नाही,
साधेपणांत आहे...
सौंदर्य बाहेर कशात नाही,
तर मनांत आहे...!!
आपण करत असलेलं
प्रत्येक काम म्हणजे सौंदर्याचंच
सादरीकरण असतं...!!
आपल्याला आपल्या कृतीतून
सौंदर्याची निर्मिती करता आली
पाहीजे...
प्रेमानं बोलणं
म्हणजे सुंदरता...!!
आपलं मत योग्य रीतीनं
व्यक्त करता येणं
म्हणजे सुंदरता...!!
नको असलेल्या गोष्टीला
ठाम नकार देण्याची हिंमत
म्हणजे सुंदरता...!!
दुसर्याला समजावून घेणं
म्हणजे सुंदरता...!!
आपल्या वर्तनातून, विचारातून
आपलं सौंदर्य बाहेर आलं पाहिजे.
हाती आलेला प्रत्येक क्षण
रसरशीतपणे जगण्यांत
खरी सुंदरता आहे...!!
आपण करीत असलेल्या
कामात कौशल्य प्राप्त झालं,
की आपोआपच आत्मविश्वास
वाढतो, आत्मसन्मानाची
जाणीव येते...
*अशी आत्मविश्वासानं*
*जगणारी स्त्री आपोआप*
*सुंदर होते, हा माझा*
*स्वानुभव आहे...*
इंदिरा गांधींचं सौंदर्य कणखर
निर्णयक्षमतेत होतं,...
मेरी कोमचं सौंदर्य तिच्या
ठोशात आहे...
बहिणाबाईंचं सौदर्य त्यांच्या
असामान्य प्रतिभेत होतं...
लतादीदींचं सौंदर्य त्यांच्या
अप्रतिम, दैवी आवाजात आहे...
वेळ प्रसंगी या सर्वजणींची
आठवणच आपलं जगणं
सुंदर करायला मदत करेल...
आपण जशा जन्माला आलो
आहोत...तशा सुंदरच आहोत.
ही खूणगाठ मनाशी बांधून
टाकली की...
सौंदर्याकरीता दुसर्या कुणाच्या पावतीची गरज पडत नाही
आणि
अवघं विश्व सुंदर भासतं...!!!
कांय...!!!
Forward to ur
every women
friends........👍🏻
_*"९०/१० तत्व "*_
फक्त १०% जीवन हे आपल्या सोबत काय घडलंय यावर आहे, आणि ९०% जीवन हे त्यावर आपल्या प्रतिक्रियावर अवलंबून आहे.
जे घडतंय त्या १०% वर आपला काहीही ताबा नसतो.
उदा. गाडी बंद पडणे, ट्रेन, विमान, बसला उशीर होणे, मुलांना यायला उशीर होणे, अचानक काहीतरी घडणे, आधीच उशीर झालाय आणि आपण जाण्या आधीच लाल सिग्नल पडणे वगैरे वगैरे.
या १०% गोष्टींसाठी आपण काहीही करू शकत नाही. पण आपण त्यावर कसे वागतो यावर पुढचं ९०% अवलंबून आहे.
उदाहरण द्यायचे तर, तुम्ही कामावर जाण्यासाठी पेहराव करून बसलात आणि चहा देण्यासाठी कन्या आतून आली, तिला ठेच लागली आणि कपातला चहा तुमच्या शर्टावर सांडला.
हे फक्त १०% झालं.
यावर तुमची प्रतिक्रिया काय असेल यावर पुढचं ९०% रामायण अवलंबून आहे.
तुम्ही चिडलात, तिला ओरडलात, ती दुःखी झाली, रडायला लागली. आता तुम्ही तुमचा मोर्चा पत्नीकडे वळवलात, "हे सगळं तुझ्या लाडामुळे झालंय, मुलांना अजिबात वळण लावलं नाहीस" असं म्हणून पत्नीलाही ओरडलात. तसंच घसरणारा ट्रे विकत आणतांना लक्ष दिलं नाही म्हणून तिला ऐकवलेत.
तुम्ही बेडरूम मध्ये जाऊन कपडे बदललेत. नंतर परत हॉल मध्ये आलात तर, मुलगी अजूनही रडतेच आहे. आत्तापर्यंत तिने न्याहारी करून शाळेला जाण्यासाठी तयार व्हायला हवे होते. उशीर झाल्यामुळे तिची स्कुलबस निघून गेली.
तुमच्या पत्नीलाही ताबडतोब कामावर जायला हवे.
तुम्ही कार बाहेर काढलीत आणि मुलीला शाळेत सोडायला गेलात. उशीर झाल्यामुळे तुम्ही गाडी वेगात चालवताय. नियम तोडल्यामुळे पोलिसांना दंड देऊन तुम्ही १५ मिनिटे उशिरा शाळेत पोहोचलात.
तुमची मुलगी तुम्हाला टाटा न करताच शाळेत पळत गेली.
२० मिनिटे उशिराने ऑफिसला पोहोचल्यावर बॅग घरीच विसरल्याचं तुमच्या लक्षात आलं.
तुमचा दिवस असा ताण तणावाने सुरू झाला.
दिवसभरात अशाच अजून काही घटना घडल्या आणि त्यामुळे संध्याकाळ पर्यंत वातावरण अजून वाईट झाले.
आता तुम्ही घरी आलात. घरात आल्यावर एक गोष्ट तुमच्या लक्षात आली, ती म्हणजे तुमच्या पत्नीशी आणि मुलीशी असलेल्या नात्यात थोडी दरी निर्माण झालीय.
*का ?*
कारण तुमचा सकाळचा प्रतिसाद.
तुमचा दिवस वाईट का गेला?
• त्याला कारण कॉफी होती?
• त्याला कारण मुलगी होती?
• त्याला कारण पोलीस होते?
• त्याला कारण तुम्ही स्वतः होता?
*उत्तर*
_तुम्ही स्वतः_
कॉफीचं काय झालं यावर तुमचं कसलंही नियंत्रण नव्हतं.
त्या ५ सेकंदात तुमचा जो प्रतिसाद होता त्यामुळे तुमचा दिवस खराब गेला.
*काय करायला हवे होते ?*
कॉफी तुमच्या शर्टावर सांडली, तुमची मुलगी घाबरून रडू लागली.
तुम्ही म्हणाला असतात "बेटा, आत्ता असुदेत. पुढच्या वेळी असं होऊनये यासाठी लक्ष दे"
आणि तुम्ही शर्ट बदलला असतात तर, तुमच्या मुलीला शाळेत जातांना हसतमुखाने तुम्हाला निरोप देता आला असता.
मुलीनेही नेहमीप्रमाणे हसतमुखाने निरोप घेतला असता.
तुम्हीही ५ मिनिटे आधी ऑफिसला पोहोचला असतात.
*फरक पहा....*
दोन वेगवेगळे प्रसंग. दोन्ही एकाच गोष्टी मुळे सुरू झाले. शेवट मात्र वेगवेगळा.
खरच, काय घडतंय त्या १०% प्रसंगांवर आपला काहीही ताबा नसतो.
उरलेलं ९०% मात्र आपण त्यावर काय प्रतिसाद देतो त्यावर अवलंबून असतं.
*९०/१० तत्वज्ञान कसे वापरावे ?*
• जर कुणी तुमच्याबद्दल वाईट बोललं तर तुम्ही ते मनावर घेऊ नका,
पालथ्या पातेल्यावर पाणी पडले तर काय होते, त्याप्रमाणे वागा.
त्यांच्या वाईट बोलण्याचा तुमच्या मनावर परिणाम होऊ देऊ नका.
तुम्ही चांगला प्रतिसाद देऊन तुमचा दिवस चांगला जाऊ द्या.
चुकीचा प्रतिसाद दिल्यास शब्दाला शब्द वाढेल आणि त्यामुळे मित्र किंवा जवळची व्यक्ती गमावू शकते.
• रस्त्यात कुणी आपल्या गाडीच्या आडवी गाडी मारली किंवा कट मारला किंवा चालतांना तुमच्या पुढे कुणी गेले किंवा तुमच्या कुणी आडवे गेले तर तुम्ही काय करता?*
तुम्हाला राग येतो?
तुम्ही दात ओठ खाता?
स्टीअरिंग वर जोरजोरात हात आपटता?
मुठी आवळता?
भांडायला जाता?
तुमचा श्वासोश्वास वाढतो?
*तुम्ही २-५ मिनिटे उशिरा पोहोचलात तर काय फरक पडणार आहे ?*
९०/१० तत्वज्ञान आठवा आणि सोडून द्या. त्या प्रसंगा आधी जसे होतात तसेच आनंदी रहा.
*तुम्ही उद्यापासून येऊ नका असे बॉसने तुम्हाला सांगितले, किंवा तुमची हक्काचे काम तुम्हाला न मिळता दुसऱ्याला दिले आहे असे तुम्हाला कळले तर ?*
• मन अशांत करून झोपमोड करून घेऊ नका
• तुमची काळजी घेणारी शक्ती कामाला लावा आणि तिचा दुसरे काम शोधण्यासाठी वापर करा.
*बस, कॅब, विमान, रेल्वे उशिराने येणार आहे असे तुम्हाला कळले तर ?*
• संबंधित कर्मचाऱ्यांना ओरडून काहीही होणार नाही कारण जे घडलंय त्यावर ते काहीही करू शकत नाहीत.
• पण तुमच्या दिवसाच्या नियोजनात त्यानुसार बदल करता येणार आहे
• वाट पाहण्यातला वेळ वाचनात, महत्वाची कामं फोनवर करण्यात घालवा
• आजूबाजूला असलेल्या माणसांच्या ओळखी करण्यात घालवा
_*मित्रांनो ९०/१० तत्वाचा वापर करून आपण आपले जीवन ताणतणाव मुक्त जगुयात*_ GN
कोणालातरी गहन प्रश्न पडलाय
धपाटे आणि थालीपीठ यात बेसिक काय फरक आहे?
कोणी जाणकार सांगू शकतील का?
आमचे ( जाणकाराचे😉)उत्तर:
धपाटे पोटाबरोबरच पाठीतपण घालतात. थालीपीठं मात्र फक्त पोटातच घालतात.हा अत्यंत बेसिक फरक आहे.😉
आणखी फरक असा आहे की 'तुला थालीपीठ देऊ का?असं विचारल्यावर कोणतीही व्यक्ती आनंदाने होsssssss चालेल असं बेधडकपणे म्हणते परंतु,
तुला धपाटे देऊ का?
हा प्रश्न समोरच्या व्यक्तीला जरा विचारातच पाडतो. हो म्हणू की नाही असा 'to be or not to be इतका गहन पेच पडतो.
सास-यांना किंवा सासूला तुम्हाला धपाटे देऊ का?
असं विचारणं (बहुतेक कुठल्याही😉) सुनेसाठी कठीण काम असू शकतं व ऐकणा-यांना ते एकदम scandalous वाटू शकतं.
तेच थालीपीठ हवं का? हे कसं एकदम सपक, प्रेमळ, आदरयुक्त वाटतं.
आता हेच पहा, सासूबाई माॅर्निंग वाॅकला गेल्यावर मैत्रीणीशी संवाद करताहेत' अगं आज जरा तब्येत नरमगरम वाटतेय.
येववतंच नव्हतं. चालायलाच होत नव्हतं. काल सुनेने ह्यांना तीन धपाटे दिले, मला दोन. तेव्हा पासूनच तब्येत बिघडलीय.
म्हातारपणी हे असलं काही सहन होत नाही हे कळत नाही या सुनांना'.
काय चित्र उभं राहतं डोळ्या समोर? तासाभरात, काकू सोसायटीत पोचायच्या आधी, काकूंची सून सासूसास-यांना धोपटते ही बातमी सोसायटीभर व्हायरल होऊन अख्खी सोसायटी आपापल्या ग्यालरीत, काकूंचं कीवभरल्या नजरेने स्वागत करायला उभी रहाते.
हाच तो बेसिक फरक हो.
आमची धपाटे /थालीपीठ संघटना
😄😄😄
Fwd
.
*भारतीय सेना के जूते की दास्तान*
जयपुर की कंपनी सेना के लिए
जूते बनाती है,
फिर वह जूते इजराइल को बेचते थे,
फिर इजराइल वही जूते
भारत को बेचता था.
और फिर वे जूते भारतीय सैनिकों को
नसीब होते थे.
भारत एक नग जूते के
Rs. 25,000/- देता था,
और यही सिलसिला काँग्रेस द्वारा
कई सालों से चल रहा था.
जैसे ही पूर्व रक्षामंत्री मनोहर पर्रिकर को
यह पता चला, वो चौंके और
आग बबूला हो गए.
और तुरंत जयपुर कंपनी के
CEO को मिले, कारण पूछा, तो ...
जवाब मिला :
*भारत को डायरेक्ट जूते बेचने पर*
*भारत का सरकारी तंत्र सालों तक*
*पेमेंट नहीं देता था.*
इसलिए
हम दूसरे देशों में एक्सपोर्ट करने लगे.
मनोहर पर्रिकर ने कहा :
*एक दिन, सिर्फ एक दिन भी*
*पेमेंट लेट होता है, तो आप मुझे*
*तुरंत कॉल कीजिए.*
बस .... आपको हमें
डायरेक्ट जूते बेचना है,
आप प्राइस बताएं.
और इस तरह आखिर पर्रिकर ने
वही जूते सिर्फ *2200/-* में
फाइनल किया !!
सोचिए ... जूते के *25,000/-* देकर
काँग्रेस ने सालों तक
कितनी लूट मचा रखी थी !!
विश्वास नहीं हुआ ना ??
कोई बात नहीं.
RTI लगाइए या
Google खँगालिये.
😎 Google सर्च पर बस
इतना लिखिए 👇🏽
*भारतीय सेना के जूते की दास्तान*
सच सामने होगा.
सुंदर विचार –
लाखो क्षण अपूर्ण पडतात आयुष्याला दिशा देण्यासाठी…
आपली एक चूक कारणीभूत ठरते ते दिशाहीन होण्यासाठी..
किती कष्ट घ्यावे लागतात यशाचं शिखर चढण्यासाठी…
क्षणभर गर्व कारणीभूत ठरतो वरून खाली पडण्यासाठी…
कितीतरी उत्तरे अपूर्ण राहतात जीवनाचं गणित सोडवतांना..
कधी आळसही कारणीभूत ठरतो जिंकता जिंकता हरतांना.🙂🌞🌞🌞
-:🤣:- आहेत कुठल्या भाषेत एवढी विशेषणं ? -:🤣:-
|| लुसलुशीत, खुसखुशीत, भुसभुशीत, घसघशीत,
|| रसरशीत, ठसठशीत, कुरकुरीत, चुरचुरीत, झणझणीत,
|| सणसणीत, ढणढणीत, ठणठणीत, दणदणीत, चुणचुणीत,
|| टुणटुणीत, चमचमीत, दमदमीत, खमखमीत, झगझगीत,
|| झगमगीत, खणखणीत, रखरखीत, चटमटीत, चटपटीत,
|| खुटखुटीत, चरचरीत, गरगरीत, चकचकीत, गुटगुटीत,
|| सुटसुटीत, तुकतुकीत, बटबटीत, पचपचीत, खरखरीत,
|| खरमरीत, तरतरीत, सरसरीत, सरबरीत, करकरीत,
|| झिरझिरीत, फडफडीत, शिडशिडीत, मिळमिळीत,
|| गिळगिळीत, बुळबुळीत, झुळझुळीत, कुळकुळीत,
|| तुळतुळीत, जळजळीत, टळटळीत, ढळढळीत,
|| डळमळीत, गुळगुळीत, गुळमुळीत.
-:🔸 ह्या शब्दांना इंग्रजी, हिंदी अथवा कुठल्याही :-----------
-:🔸 भाषेत प्रतिशब्द शोधून दाखवावा :------------
-:🔹 थोडी गम्मत :------------
|| 'मॅक्सिन बर्नसन' हा एक अमेरिकन भाषा तज्ज्ञ
|| मराठीबद्दल त्यांनी लिहिले आहे कि...
|| ही मराठी भाषा खूप छान आहे, पण जीव घाबरा करणारी
|| आहे. मराठी भाषेत बाळबोध लिपी पासूनच हिंसेचे
|| बाळकडू पाजले जाते.
-:🔹 उदा० :------------
|| अक्षरांचे पोट फोडणे, पाय मोडणे;
|| इतिहासात तर 'ध' चा 'मा' सुद्धा केला जातो.
|| यांच्या सामाजिक व्यवहारातही उघड उघड हिंसाचार
|| दिसतो. :*
|| नाक दाबले, तर तोंड उघडणे.
|| अमक्याचे खापर, तमक्याच्या माथी फोडणे,
|| धारेवर धरणे, पाठीत खंजीर खुपसणे,
|| बिन पाण्याने हजामत करणे, रक्त आटवणे, पाय ओढणे,
|| पोटावर पाय देणे, कान उपटणे, डोक्यावर मिरे वाटणे.
|| इत्यादी, इत्यादी...
-:🔹 ही मराठी माणसे स्वत:बद्दलही हिंसक असतात.
-:🔹 म्हणजे... 🤣😀😂
-:🔹 झोपेतून उठल्यावर :------------
|| अंग मोडतात, बोटे मोडतात, घसाफोड करतात,
|| तोंड फाटेस्तोवर बोलतात, घर डोक्यावर घेतात,
|| डोक्यात राख घालतात.
-:🔹 आणि कांहीही खातात :------------
|| मार खातात, बोलणी खातात, डोके खातात, वेळ खातात,
|| लिहितांना काना-मात्रा वेलांट्या खाऊन टाकतात. आणि
|| कांही जण, तर पैसेही खातात... 🤪 🤪
-:🔹 यांच्या शरीर शास्त्राच्या कल्पना तर काय :------------
-:🔹 विचित्र आहेत पाहा 😀 😅
|| यांचे हातपाय गळतात, काळजाचे पाणी होते,
|| तोंडचे पाणी पळते.
|| आता सांगा, परकियांना ही भाषा येणार कशी ?
|| पण माझ्यावर या भाषेने कृपा केली आणि मला ती
|| चांगली यायला लागली.
-:😂:- आता "माझा जीव भांड्यात पडला" -:😂:-
*वजनकाटा २ महिन्यासाठी ठेवला आहे झाकून..😀*
उन्हाळ्याच्या सुरवातीला खायची ओल्या काजूची उसळ....
चव बदलायला कधी तरी लागते मग मिसळ....
रसरशीत बिटक्या चोखताना तोंड जातंय माखून.....
वजनकाटा २ महिन्यासाठी ठेवला आहे झाकून..😀
कैरीची डाळ आणि झकास पन्हं थंडगार....
रात्री पण आइस्क्रीमचा मारा चाललाय फार.....
व्यायाम करायचा निश्चय केलाय सोमवार पासुन...
वजनकाटा २ महिन्यासाठी ठेवला आहे झाकून..😅
करवंद जांभळे कलिंगड
खावी ताव मारून....
फणसाचे गरे आणि सांदण जरा थोडी जपून...
रिचवावा पायरीचा रस आणि हापूस थोडा कापून...
वजनकाटा २ महिन्यासाठी ठेवला आहे झाकून..😃
आमरस पुरीच जेवून करतो थोडा आराम...
वजन कमी करण्यासाठी
कोणते करू मी व्यायाम...
हाताची बोटं पायांच्या बोटाला टेकतात अजून वाकून..
वजनकाटा २ महिन्यासाठी ठेवला आहे झाकून..
🤣🤣🤣
मित्रांनो,
आपल्याकडे सुद्धा average आयुष्यमान 80 च्या आसपास गेले आहे असे वाटते. त्यामुळे आता आपल्याला 80 वर्षे आनंदात जगायचे असल्यास काय करायला पाहिजे ते माहित करुन घ्या.
मानसोपचारतज्ज्ञ हिदेकी वाडा यांनी "८०-वर्ष-जुनी भिंत" नावाचे पुस्तक प्रकाशित केले. पुस्तक प्रकाशित होताच, त्याची विक्री ५,००,००० प्रतींपेक्षा जास्त झाली, जी सध्या सर्वाधिक विक्री होणारे पुस्तक ठरले. जर हाच दर कायम राहिला तर या पुस्तकाची विक्री १० लाख प्रतींपेक्षा जास्त होईल, ज्यामुळे ते या वर्षी जपानमधील सर्वाधिक विक्री होणारे पुस्तक बनेल.
या पुस्तकातील 60 ते 80 वर्षे वयाच्या लोकांना *"सुखी माणसं"* बनवण्याच्या 44 गोष्टी:👇
1.चालत राहा.
2.चिडल्यावर खोल श्वास घ्या.
3.शरीर आखडत नसेल ,इतपत व्यायाम करा.
4.उन्हाळ्यात एसी वापरत असाल तर ,भरपूर पाणी प्या.
5."डायपर" वापरल्याने हालचाली सोप्या होतात.
6.जास्त वेळा चालल्याने शरीर आणि मेंदू अधिक ऊर्जावान राहतो.
7.विसरणे हे वयामुळे नसून मेंदूचा दीर्घकाळ वापर न केल्यामुळे होते.
8.जास्त औषधं घेण्याची गरज नाही.
9.रक्तदाब आणि साखर पातळी कृत्रिमरीत्या कमी करण्याची गरज नाही.
10.एकटे असणे म्हणजे एकाकीपणा नव्हे, तर आनंदी वेळ घालवणे.
11.आळशी असणे लाजिरवाणे नाही.
12.वृद्धांसाठी वाहन चालवणे धोकादायक ठरू शकते, त्यामुळे परवाना न घेण्याचा विचार करा.
13.आवडते तेच करा, जे नकोसे वाटते ते करु नका.
14.वय झालं तरीही सर्व नैसर्गिक इच्छा कायम राहतात.
15.घरात बसून राहू नका.
16.जे हवे ते खा, किंचित जाडसर राहणे ठीक आहे.
17.प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक करा.
18.ज्यांना तुम्ही नकोसं समजता, अशा लोकांना टाळा.
19.सतत टीव्ही पाहू नका.
20.रोगाशी अखेरपर्यंत लढण्यापेक्षा त्याच्यासोबत जगायला शिका.
21."गाडी डोंगरावर गेली तरी वाट सापडते" हा जादूई मंत्र लक्षात ठेवा.
22.ताजे फळे आणि सॅलड खा.
23.आंघोळ 10 मिनिटांत पूर्ण करा.
24.झोप येत नसेल तर जबरदस्ती करू नका.
25.आनंदी गोष्टी केल्याने मेंदू सक्रिय राहतो.
26.मनातलं बोलून टाका, जास्त विचार करू नका,कसं बोलू वगैरे?
27.लवकरात लवकर "फॅमिली डॉक्टर" ठरवा.
28.फार सहनशील राहू नका, थोडेसे
*"वाईट म्हातारे"*,व *नटखट* होण्यास हरकत नाही.
29.कधी कधी आपलं मत बदलायला व हट्ट सोडायला हरकत नाही.
30.आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यातील "डिमेन्शिया" हा देवाने दिलेला आशीर्वाद आहे.
31.शिकणं थांबलं की ,माणूस खरंच म्हातारा होतो.
32.कीर्तीचा हव्यास सोडा, जे आहे ते पुरेसं आहे.
33.निरागसपणा हा वृद्धांचा विशेषाधिकार आहे.
34.जितक्या समस्या, तितकं आयुष्य रंजक!
35.सूर्यप्रकाशात बसल्याने आनंद मिळतो.
36.दुसऱ्यांसाठी चांगल्या गोष्टी करा.
37.आजचा दिवस निवांत जगा.
38.इच्छा हाच दीर्घायुष्याचा स्रोत आहे.
39.नेहमी सकारात्मक राहा.
40.मोकळा श्वास घ्या.
41.जीवनाचे नियम तुमच्या हातात आहेत.
42.प्रत्येक गोष्ट शांतपणे स्वीकारा.
43.आनंदी माणसं नेहमी प्रिय असतात.
44.हसण्याने नशीब उजळतं.
*ही माहिती आपल्या सर्व ज्येष्ठ मित्रांपर्यंत जरूर शेअर करा!*
आजीला तिच्या नातीने अंडी बाटलीत घालायला आणि नंतर अंडी न फोडता बाहेर काढायला सांगितले. आजी कशी यशस्वी झाली ते पहा. (वरवर पाहता, आजी भौतिकशास्त्राच्या माजी शिक्षिका होत्या आणि त्यांची स्मरणशक्ती अजूनही उत्तम स्थितीत आहे.)
😄👍😀
बायकोचे, नवऱ्याच्या, बाबतीतले "सप्तसूर"...🧏♀️🤦♀️🙅♀️🙆♀️(सहज सुचलेले....)
*सा रे ग म प ध नी सा*
*सा*-ध कळत नाही ह्या माणसाला.....
*रे*- देवा कधी सुधारणार हा माणूस...
*ग*-प्प बसा... मला अक्कल शिकवू नका....
*म*-लाच सर्व करावे लागते...
*प*-टपट आवरणे ह्याला कधी जमलंच नाही...
*ध*-ड एक काम करत नाही हा माणूस...
*नि*-दान मी एखाद काम करीन अस म्हणेल तर शपथ...
*सा*-री काम बायकोवर टाकून हा गाव उंडारायला मोकळा...
😃😃😃😃
नवस करून,
9 महीने जीवापाड जपून,
दिवस रात्र स्वप्न बघून
जन्माला आलेल्या मुलाचे नाव
त्याचे आई वडिल
'विनोद' कसे काय ठेवतात मला आजवर नाही समजलय -
*पु. ल. देशपांडे*
😧😧😧
'प्रताप' नावाबद्दल पण तेच...
'हा आमचा प्रताप' अशी ओळख
आई—वडीलांनी करुन दिली
तर कसे वाटेल??
*—पु. ल. देशपांडे*
😧😧😧
पणशीकरांना मुलगा झाला...
मुलाचे नाव "श्रीपाद" ठेवले...
त्याचे पूर्ण नाव:
'श्री पाद पण शी कर..!!
*इति - पु. ल. देशपांडे*
धन्य धन्य !
😂😂😂😂