Showing posts with label l. Show all posts
Showing posts with label l. Show all posts

Saturday, 9 March 2024

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दापोली उपजिल्हा रुग्णालयाच्या श्रेणीवर्धन, काळकाई देवी मंदिर जीर्णोद्धार आणि रस्त्यांचे भूमिपुजन

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दापोली उपजिल्हा रुग्णालयाच्या श्रेणीवर्धन,

काळकाई देवी मंदिर जीर्णोद्धार आणि रस्त्यांचे भूमिपुजन

 

रत्नागिरीदि. ९: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दापोली येथील उपाजिल्हा रुग्णालयाच्या १०० खाटांच्‍या श्रेणीवर्धन करणेश्री देव काळकाई मंदिर सभामंडप बांधकाम तसेच दापोली आणि मंडणगड येथील हॅब्रीड अन्युटी प्रकल्पांतर्गत रस्त्यांचे भुमिपुजन आज करण्यात आले.

        या भूमिपूजनप्रसंगी पालकमंत्री उदय सामंतखासदार सुनिल तटकरेआमदार योगेश कदममाजी मंत्री रामदास कदममाजी आमदार सदानंद चव्हाणकोकण विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडेजिल्हाधिकारी एम देवेंदर सिंहमुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजारपोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णीप्रशिक्षणार्थी आय ए एस डा जस्मीनअपर जिल्हाधिकारी जयश्री गायकवाड आदी उपस्थित होते.

        काळकाई मंदिर सभामंडप बांधकामासाठी २ कोटी ७५ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामाचा शुभारंभ कोनशिलेचे उद्घाटन करुन करण्यात आले.  दापोली येथील ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचे १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन करण्यासाठी २० कोटी २१ लाख निधी मंजूर करण्यात आला आहे. याही कामाचा शुभारंभ कोनशिलेचे उद्घाटन करुन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.

            हायब्रीड अन्युटी (एमआरआयपी) अंतर्गत खेड व दापोली तालुक्यातील दापोली वाकवली साखरोली खेड भरणे रस्ता सुधारणा करण्याच्या कामास १३८ कोटी ६ लक्ष एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे. याचा शुभारंभही कोनशिलेचे उद्घाटन करुन करण्यात आले.

 

हर्णे मच्छीबंदराचा विकास करणे कामाचा खासदार सुनिल तटकरे यांच्या हस्ते शुभारंभ

        २०५. २५ कोटी इतक्या किमतीच्या दापोली तालुक्यातील हर्णे येथील मच्छी बंदराचा विकास करणे या कामाचा शुभारंभ खासदार सुनिल तटकरे यांच्या हस्ते करण्यात आला. माजी मंत्री रामदास कदमबाबाजी जाधव उपस्थित होते.  या बंदरामुळे स्थानिक ५५० व बाहेरील ८०० नौका लावता येणार आहेत. दापोली तालुक्यातील २३ मच्छीमार संस्थांना याचा फायदा होणार आहे.

०००

 

Friday, 1 March 2024

इचलकरंजी शहर पाणीपुरवठा योजनेसाठी तज्ज्ञ समिती स्थापन करून एक महिन्यात अहवाल द्यावा

 इचलकरंजी शहर पाणीपुरवठा योजनेसाठी

तज्ज्ञ समिती स्थापन करून एक महिन्यात अहवाल द्यावा

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

            मुंबईदि. 1 : इचलकरंजी शहरासाठी पिण्याचे स्वच्छ पाणी मिळावेयासाठी पाणी पुरवठा योजना सुरू करण्यासंदर्भात तज्ञांची समिती नेमून एक महिन्यात अहवाल देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

            इचलकरंजी शहरासाठी सुळकुड उद्भव पाणीपुरवठा योजनेसंदर्भात आज विधानभवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफगृहनिर्माण मंत्री अतुल सावेखासदार संजय मंडलिकखासदार धैर्यशील मानेआमदार प्रकाश आवाडेआमदार सतेज पाटीलआमदार राजेंद्र पाटील-यड्रावकरप्रकाश आबिटकरमाजी खासदार राजू शेट्टीमाजी आमदार सुरेश हाळवणकरसंजय घाटगेजिल्हाधिकारी अमोल येडगेइचलकरंजी महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटेमाजी नगराध्यक्ष अलका स्वामीयांच्यासह कृती समितीचे शिष्टमंडळजलसंपदा विभागमहाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते.

            इचलकरंजी महानगरपालिकेसाठी कागल तालुक्यातील दूधगंगा नदीतून सुळकुड पाणी योजना मंजूर झाली आहे. परंतु येथून पाणी देण्यास विरोध असल्याने यासंदर्भात मार्ग काढण्यासाठी आज बैठक झाली.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले कीइचलकरंजी शहरासाठी पिण्याचे स्वच्छ पाणी मिळणे आवश्यक आहे. हे पाणी देताना कोणाचेही पाणी हिरावून घेतले जाणार नाही. या विषयावर मध्यममार्ग काढण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी तज्ज्ञांची समिती स्थापन करावी. यामध्ये कृती समितीचे प्रतिनिधीजलसंपदामहाराष्ट्र जीवन प्राधिकरणमहानगपालिकेचे अधिकारी तसेच तांत्रिक तज्ज्ञांचा समावेश करावा. या समितीने सर्वांची बाजू व सूचना ऐकून घ्याव्यात व तांत्रिक अभ्यास करून एक महिन्यात अहवाल सादर करावा.

            यावेळी पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांच्यासह लोकप्रतिनिधी व कृति समितीच्या सदस्यांनी बाजू मांडली.

Tuesday, 13 February 2024

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे तातडीने भरणार

 शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे तातडीने भरणार

- शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने मानले मंत्री श्री.केसरकर यांचे आभार

 

            मुंबईदि. 12 – संचमान्यता सुधारित करून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे तातडीने भरण्यात येतीलअसे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनांचे महामंडळच्या शिष्टमंडळाने मंत्री श्री.केसरकर यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्या विविध मागण्यांबाबत मंत्री श्री.केसरकर यांनी शालेय शिक्षण विभागाला निर्देश देऊन यापूर्वीच कार्यवाही सुरू केल्याबद्दल महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे आभार मानले.

            राज्यातील शिक्षकांची पदभरती प्रक्रिया सुरू झाली आहे. त्याचप्रमाणे संचमान्यता सुधारित करून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे देखील तातडीने भरण्यात येणार असल्याचे मंत्री श्री.केसरकर यांनी सांगितले. कर्मचाऱ्यांना वाढीव मानधन लागू करण्यात आले आहे. अर्धवेळ ग्रंथपालांचे पूर्णवेळ ग्रंथपालपदी उन्नयन करण्यात आले आहे. शिक्षण सेवकांच्या मानधनात देखील भरघोस वाढ करण्यात आली आहे. अन्य मागण्यांबाबत देखील शासन सकारात्मक असल्याचे मंत्री श्री.केसरकर यांनी सांगितले.

Saturday, 13 January 2024

तरूणाईच्या बहारदार सादरीकरणानं जिंकली उपस्थितांची मनं तरूणाई, उत्साह अन् जल्लोष; तपोवनात अवतरला तरुणाईचा मेळा

 तरूणाईच्या बहारदार सादरीकरणानं जिंकली उपस्थितांची मनं


तरूणाई, उत्साह अन् जल्लोष;


तपोवनात अवतरला तरुणाईचा मेळा


 


            नाशिक, दि. 12 : 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवात तरूणाईच्या कलाकौशल्याने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह उपस्थितांची मनं जिंकली. 'विकसित भारत @2047 - युवा के लिए – युवा द्वारा' या संकल्पनेवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमात तालबद्ध जिम्नॅस्टिक, मल्लखांब, योगासने, साहसी प्रात्यक्षिकांचे युवक-युवतींनी बहारदार सादरीकरण केले. राष्ट्रीय युवा महोत्सवातील देशभक्तीपर गीतांमुळे सांस्कृतिक कार्यक्रमात रंगत आली. राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्याचा पहिला दिवस तरूणाईच्या सळसळत्या उत्साहाने गाजला. एकाहून एक सरस, कलाकौशल्य दाखविताना तरूणाईची चपळता पहायला मिळाली‌.


            तपोवन मैदानावर स्वामी विवेकानंद जयंती युवा दिनानिमित्त 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे दिमाखदार उद्घाटन झाले. महाराष्ट्रासाठी 'सक्षम युवा-समर्थ भारत' या घोषवाक्यावर आधारित या महोत्सवात तरूणाईचा जल्लोष, उत्साह ओसंडून वाहत असून नाशिकमध्ये देशातील विविध राज्यातील तरूणाईचा मेळा अवतरला आहे.


            प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन झाल्यानंतर केंद्रीय क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री अनुराग ठाकूर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भाषणे झाली. त्यानंतर‌ भारताची विविधता, एकात्मता, संस्कृती, नृत्य व वेशभूषा यांचे दर्शन घडविणाऱ्या राज्य व केंद्रशासित प्रदेशाच्या चमूंचे प्रधानमंत्र्यांसमोर संचलन झाले.


            सांस्कृतिक कार्यक्रमाच्या सादरीकरणात जिम्नॅस्टिकमध्ये हूप, बॉल, रिबन आणि रोप अशा साधनांचा वापर करत युवकांनी आपले कौशल्य दाखवत तालबद्ध जिम्नॅस्टिक सादर केले. जिम्नॅस्टिकचे कौशल्य पाहून उपस्थित आवाक झाले. महाराष्ट्राच्या तरूणांनी मल्लखांबावरील चित्तथरारक कसरती करून दाखवत उपस्थितांना आपल्या कौशल्याचे दर्शन घडविले. ढोल, झांज, लेझीम यासह कथकली, भरतनाट्यम्, भांगडा या विविध राज्यातील लोकनृत्यांनी कार्यक्रमात रंगत आणली.


            तरूणांनी सादर केलेल्या साहसी शारीरिक कसरती, प्रात्यक्ष‍िकांच्या जोडीला सायकलिंग आणि स्केटिंगचे मनोवेधक सादरीकरण झाले. ‘भारत माता की जय, वंदे मातरम्, जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता‌.


नाशिकच्या ढोल‌ पथकानं वेधलं लक्ष


             संचालनात नाशिकच्या सहस्त्रनाद ढोल पथकातील युवक- युवतींनी ढोल वाजवत साथ-संगत केली. सुमारे 10 मिनिटे चाललेल्या संचलनात ढोल पथकाच्या निनादात आसमंत ढवळून निघाला होता‌. 50 युवक- युवतींचा समावेश असलेल्या या ढोल पथकाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतलं‌ होते.


००००

Monday, 1 January 2024

२२ जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करा आमदार अतुल भातखळकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

 २२ जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करा

आमदार अतुल भातखळकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

 

मुंबई : शतकानूशतकांच्या संघर्षानंतर प्रभू श्री राम जन्मभूमी आयोध्येमध्ये उभारण्यात आलेल्या भव्य अशा श्री राम मंदिरात सोमवार, २२ जानेवारी रोजी रामलला विराजमान होणार आहेत. सर्वच भारतीयांसाठी हा महत्वाचा आणि अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. त्या दिवशी सर्वत्र दिवाळी साजरी होणार आहे. या सोहळ्यात नागरिकांना सहभागी होता यावे, त्याचे साक्षीदार होता यावे, यासाठी २२ जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

या मागणीचे पत्र आमदार भातखळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे. २२ जानेवारी हा दिवस भारताच्या इतिहासातील ऐतिहासिक दिवस ठरणार आहे. सुमारे ५००-५५० वर्षांचा संघर्ष या प्रभू राम मंदिर उभारणीसाठी करण्यात आला आहे. शेकडो राम भक्तांनी यामध्ये आपल्या प्राणाची आहुती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात हे मंदिर उभारणीचे काम झाले आहे. प्रभू श्री राम मंदिरात विराजमान होणार या दिवसाची तमाम राम भक्तांना प्रतीक्षा आहे.

त्या दिवशी घरोघरी दिवे लावून दिवाळी साजरी करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. प्रत्यक्ष जाता येत नसले तरी त्या दिवशी आपापल्या भागात विविध कार्यक्रमाचे आयोजन सर्वत्र करण्यात आले आहे. या सर्व प्रकारच्या कार्यक्रमांना उपस्थित राहता यावे, सोहळ्यात सहभागी होता यावे, यासाठी त्या दिवशी शासनाने सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी तसेच खासगी आस्थापनांना अशा स्वरूपाचे निर्देश देण्यात यावेत, अशी मागणीही  आमदार भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे. 

Regard's

ATUL BHATKHALKAR
MLA-160 Kandivali East

नववर्ष प्रारंभ

 नववर्ष प्रारंभ

नवीन आशा, नवीन ध्येये

नव तरुणांना निर्मू दे.

रामचरित गुणगान गात गात

तसेच त्यांना होऊ दे.

मातृभक्ती, पितृभक्ती, राष्ट्रभक्ती

हृदयी त्यान्च्या वसू दे

कनकम्बेच्या कृपाप्रसादे

नव वर्षाला उजळू दे

Thursday, 14 December 2023

मुंबईतील दामोदर हॉलच्या पुनर्विकासाबाबत शासन सकारात्मक

 मुंबईतील दामोदर हॉलच्या पुनर्विकासाबाबत शासन सकारात्मक

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

            नागपूर दि. 13 : मुंबईतील हक्काचे मनोरंजन केंद्र असलेले व बऱ्याच कलाकारांना संधी देणारे परळ येथील दामोदर हॉल हा ऐतिहासिक वारसा आहे. त्याच्या पुनर्विकासासाठी विशेष तरतूद करण्यासाठी सरकार सकारात्मक असून  याबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक घेण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले.

            मुंबईतील दामोदर हॉल संबंधीच्या समस्याबाबत सदस्य प्रवीण दरेकर यांनी विधानपरिषदेत लक्षवेधी सूचना मांडली.

            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले कीनाट्यगृहे वाढली पाहिजे. मराठी सिनेमा अपेक्षित वेळेपेक्षा जास्त चालली पाहिजे. यासाठी विशेष सवलत देण्यात येईल. नाटकासाठी विजेचा खर्च जास्त असल्याने सोलरचा वापर करण्याची योजना आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे ही त्यांनी यावेळी सांगितले. 

            महानगरपालिकेतील नाट्यगृहांसाठी या अर्थसंकल्पामध्ये निधी ठेवण्यात आला आहे. तसेच जुन्या नाट्यगृहांसाठी सुद्धा निधी ठेवण्यात आला आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत आराखडा तयार केला आहे. जी नाट्यगृहे बंद पडली आहेत ती सुस्थितीत आणणेज्या ठिकाणी नाट्यगृह नाही त्या ठिकाणी बांधणे ही उद्दिष्टे असल्याचेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

            उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले कीदामोदर हॉल हा मराठी माणसाचा सांस्कृतिक केंद्र आहे. त्याचा आराखडा तयार करण्यात आला असून त्यामध्ये आठ मजली इमारतीमध्ये पार्किंगरिहर्सलसाठी जागा याचा समावेश केला आहे. कुठल्याही कामगारावर अन्याय होणार नाही. पुनर्विकासाबाबत ठेकेदार व संस्था यांच्या समन्वयाने मार्ग काढावा लागेल. अधिवेशन संपल्यानंतर पुनर्विकासांच्या प्रश्नाबाबत संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना बोलून बैठक घेतली जाईल, असेही श्री सामंत म्हणाले.

            या लक्षवेधी सूचनेच्या वेळेस सदस्य सर्वश्री एकनाथ खडसेप्रसाद लाड, कपिल पाटील, जयंत पाटील यांनी प्रश्न उपस्थित केले होते.

00000

पर्यटन संकुलामुळे मॉरिशसबरोबर सांस्कृतिक संबंध वृद्धिंगत होतील

 पर्यटन संकुलामुळे मॉरिशसबरोबर सांस्कृतिक संबंध वृद्धिंगत होतील

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मॉरिशसला बहुउद्देशीय पर्यटन संकुल उभारणीसाठी 8 कोटी रुपयांचा निधी वितरीत

 

            नागपरदि. 13 : मॉरिशसमध्ये मूळचे मराठी बांधव वास्तव्यास आहेत. मॉरिशस आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीत साम्य आहे. तेथे उभारण्यात येणाऱ्या बहुउद्देशीय पर्यटन संकुलाच्या माध्यमातून मॉरिशसबरोबरचे संबंध वृद्धिंगत होतील. त्याबरोबरच या संकुलाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील पर्यटनाला चालना मिळेलअसे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे केले.

            विधानभवनाच्या आवारातील कक्षात आज दुपारी मॉरिशस येथे बहुउद्देशीय पर्यटन संकुल उभारण्याकरीता आठ कोटी रुपयांचा निधी वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी मॉरिशसचे मंत्री ॲलन गानूराज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री अजित पवारपर्यटन मंत्री गिरीश महाजनमृद व जलसंधारण मंत्री संजय राठोडमुख्य सचिव मनोज सौनिकमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगेवित्त विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीरसार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकरनियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजयपर्यटन विभागाच्या सचिव जयश्री भोजपर्यटन विकास महामंडळाचे संचालक डॉ. बी. एन. पाटील,मॉरिशसचे हसन गानूउपमुख्यमंत्री  श्री. फडणवीस यांचे विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ धवसे आदी उपस्थित होते.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले कीप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची जगात नवी ओळख निर्माण होत आहे. त्यामुळे देशाच्या आर्थिक विकासाबरोबर पर्यटन क्षेत्राचा विकास होण्यास मदत होत आहे. मॉरिशसमध्ये उभारण्यात येणाऱ्या पर्यटन संकुलामुळे तेथे येणाऱ्या पर्यटकांना महाराष्ट्रातील विस्तीर्ण सागरी किनाऱ्यांसह ऐतिहासिकसांस्कृतिकधार्मिक स्थळांची माहिती होईल. यापुढेही मॉरिशसला आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल. या केंद्राच्या माध्यमातून महाराष्ट्राचे मॉरिशसबरोबरचे मैत्रीपूर्ण संबंध दृढ होतील आणि मैत्रीचा नवा अध्याय लिहिला जाईल.

            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले कीभारत आणि मराठी संस्कृतीची जोपासना करणारा सुंदर असा मॉरिशस हा देश आहे. तेथे महाराष्ट्रातील संस्कृती रुजली आहे. मॉरिशसच्या दौऱ्यावर असताना बहुउद्देशीय पर्यटन संकुलाची संकल्पना पुढे आली. त्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला. त्यानुसार या संकुलासाठी ८ कोटी रुपयांचा निधी देण्यात येत आहे. मॉरिशस हा पर्यटनासाठी प्रसिद्ध असा देश आहे. या संकुलामुळे राज्यातील पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे.

            मॉरिशसचे मंत्री श्री. गानू यांनी सांगितले कीमॉरिशस आणि महाराष्ट्रातील संस्कृतीत साम्य आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आमचे प्रेरणास्त्रोत आहे. मॉरिशसमधील मराठी मंडळी फेडरेशनचे कार्य कौतुकास्पद आणि अनुकरणीय आहे. मॉरिशसमधील बहुउद्देशीय पर्यटन संकुलाच्या माध्यमातून मॉरिशस आणि महाराष्ट्रातील सांस्कृतिकसामाजिककला क्षेत्रातील संबंध आणखी दृढ होतील. मॉरिशसमध्ये गणेशोत्सवशिवजयंतीसह विविध सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. मॉरिशसमधील बहुउद्देशीय पर्यटन संकुल वेळेत पूर्ण होण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले जातील. त्यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल. महाराष्ट्रातून मॉरिशसमध्ये येणाऱ्या पर्यटकांना विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेतअसेही त्यांनी सांगितले. पर्यटन विभागाच्या सचिव श्रीमती भोज यांनी प्रास्ताविकात बहुउद्देशीय पर्यटन संकुलाची माहिती दिली. पर्यटन विकास महामंडळाचे संचालक डॉ. पाटील यांनी आभार मानले. यावेळी राज्य आणि मॉरिशसचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

००००

Wednesday, 6 December 2023

 राज्यात 75 ठिकाणी नाट्यगृह उभारणार

386 कोटी रुपये निधी देणार

- मंत्री सुधीर मुनगंटीवार

                मुंबई दि. 4  :  कलेच्या क्षेत्रातील संस्थांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले पाहिजे. नोंदणीकृत संस्थेच्या माध्यमातून जे कलावंत प्रयत्न करत आहेत त्यांना प्रोत्साहन आणि संधी उपलब्ध व्हावी म्हणून तालुकास्तरावर 75 ठिकाणी नाट्यगृह उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी 386 कोटी रुपये निधी देण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे सांगितले.

            मंत्री मुनगंटीवार यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृह येथे प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रातील नोंदणीकृत 41 संस्थांना सहाय्यक अनुदान धनादेश वाटप करण्यात आलेत्यावेळी ते बोलत होते.

            मंत्री मुनगंटीवार म्हणालेशासन प्रयोगात्मक कलेचे जतन व संवर्धन करणाऱ्या संस्थांच्या पाठीशी आहे. नोंदणीकृत संस्थेच्या माध्यमातून जे कलावंत प्रयत्न करत आहेत त्यांना मदतीचा हात शासनाकडून  दिला जात आहे. आज विज्ञान युगात माहिती तंत्रज्ञानाचा प्रभाव आहे पण सुख समृद्धीचा अभाव दिसत आहेसमाधान लोप पावत आहे. कलावंतांनी राज्याचा सांस्कृतिक जपत आपले काम सुरू ठेवावे.

प्रधान सचिव विकास खारगे म्हणालेमहाराष्ट्राच्या संस्कृतीचे जतन व संवर्धन करण्याचे काम कलेच्या क्षेत्रातील या संस्था करतात आपले कौतुक करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव जपण्याचे काम शासनासोबत आपणही करत आहात.

 कार्यक्रमाची सुरुवात राज्य गीताने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक कार्य संचालक विभीषण चवरे यांनी केले. कार्यक्रमास सांस्कृतिक कार्य विभागाच्या उपसचिव नंदा राऊत तसेच     प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रातील कार्य करणाऱ्या नोंदणीकृत संस्थाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

धनादेश वाटप संस्थेची यादी खालील प्रमाणे

पटेल कल्चर फाउंडेशन मुंबईवैभव सांस्कृतिक कला मंडळ नागपूरअजित बालक मंडळ नागपूरजय भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती रामटेक नागपूर या संस्थांना (प्रत्येकी 2 लाख रुपये.), अय्यर फाउंडेशन मुंबईसंक्रीता फाउंडेशन मुंबईप्रारंभ कला अकादमी ठाणेतक्षशिला नृत्य कला मंदिर ठाणेशाहीर शामराव खडके सांस्कृतिक लोककला मंडळ सावर्डी सोलापूरजय भवानी कलापथक सांस्कृतिक मंडळ जवळा सोलापूर,सुंदरी सम्राट कै. सिद्राम जाधव सांस्कृतिक कला मंडळ सोलापूरसप्तरंग थिएटर्स अहमदनगरस्वानंद सांस्कृतिक मंडळ नागपूरआदित्य बहुउद्देशीय संस्था रामटेक नागपूरपिराजी बहुउद्देशीय संस्था नागपूरऑरेंजसिटी बहुउद्देशीय संस्था नागपूरप्रेरणा अल्पसंख्यांक महिला बाल व युवक कल्याण सांस्कृतिक कला बहुउद्देशीय संस्था वाशिम या संस्थांना (प्रत्येकी एक लाख रुपये).

बोधी नाट्य परिषद मुंबईश्री. वल्लभ संगीतालय मुंबईविश्राम ठाकर आदिवासी कला अंगण चारीटेबल ट्रस्ट पिंगळी गुढीपूर सिंधुदुर्गमराठी साहित्य सांस्कृतिक व कला मंडळ नवी मुंबईस्वप्निल सपना लोककला विकास मंडळ मानेगाव सोलापूरस्व.वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान जळगावचंदन युवक शिक्षण व्यायाम विकास क्रीडा मंडळ छत्रपती संभाजीनगरश्रीकृष्ण सांस्कृतिक व ग्रामीण विकास संस्था नादरपूर छत्रपती संभाजीनगर जय साई नटराज नाट्य चित्रपट कला व सांस्कृतिक संस्था छत्रपती संभाजीनगर सामाजिक जनजागृती कला विकास छत्रपती संभाजीनगरबालगंधर्व सांस्कृतिक कला क्रीडा व युवक मंडळ परभणीस्वप्नरंग सांस्कृतिक संस्था सिने स्टार अकादमी नांदेडमानवसेवा सामाजिक प्रतिष्ठान बीडप्रगती सेवाभावी संस्था पाडळी बीड,

नटराज क्रीडा मंडळ नागपूररखुमाई सेवा मंडळ नागपूरपंचरंगी निशाण  खडीगंमत मंडळ नागपूर, जनजागृती कलंगी शाहीर मंडळ नागपूरनागरी सांस्कृतिक व बहुसंस्था गोंदिया,स्व. विनायक राखोंडे प्रतिष्ठान पातुरसाने गुरुजी कला व सांस्कृतिक कार्य क्रीडा बहु मंडळ अकोलाशाहू फुले आंबेडकर फाउंडेशन बुलढाणा, लोकसेवा राष्ट्रीय सांस्कृतिक नाट्य मंडळ वाशिमजय तुळजाई ग्रामीण बहु संस्था उमरसा यवतमाळ या संस्थांना (प्रत्येकी 50 हजार) रुपयांचा धनादेश देऊन अनुदान वाटप करण्यात आले.

*****

Thursday, 30 November 2023

घडी मोडणे*.. साडी ची छान परंपरा

 *घडी मोडणे*..

  *पूर्वी नवी साडी घेतली की बायका कोणाला तरी घडी मोडायला द्यायच्या*..

    *किती प्रेमळ रिवाज होता* ना तो.. आतासारखी वारंवार साड्यांची खरेदी नसायची तेव्हा..वर्षाला एखाद - दोन साड्यांपर्यंतच मध्यमवर्गीयांची फार तर मजल असायची..त्याच त्याच साड्या नेसाव्या लागत..पण तरीही आपली *नवी-कोरी साडी, नणंदेला, जावेला, शेजारणीला घडी मोडायला द्यायला, मन मोठंच असावं लागत असेल*.. 

    *नात्यागोत्यातली एखादी गरीब बाई पण घडी मोडायला चालायची...* त्यानिमित्ताने तिच्या अंगाला कोरं कापड लागायचं..तिला *कान-कोंडं* वाटू नाही म्हणून...*, "तुम्ही नेसल्या की मला पटपट नव्या साड्या मिळतात"* असंही वरून म्हणायचं..आणि *गरिबीनं पिचलेल्या त्या माऊलीला तिचा पायगुण चांगला असल्याचा आनंद बहाल करायचा*....🥰🥰🥰🥰

      *मनांच्या श्रीमंतीचा काळ होता तो!* 🌹🙏✔️💯🌹🙏

   🙏🏻🌸


Wednesday, 29 November 2023

धरमतर, बाणकोट खाडीपुलाला तात्काळ ना-हरकत प्रमाणपत्र द्यावे

 धरमतर, बाणकोट खाडीपुलाला तात्काळ ना-हरकत प्रमाणपत्र द्यावे


उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश


 


            मुंबई, दि. २९ :- पर्यटन विकासासह कोकणच्या सर्वांगीण विकासात महत्त्वाची भूमिका बजावू शकणाऱ्या रेवस ते रेड्डी सागरी महामार्गाच्या कामास गती देण्यात यावी. त्या अनुषंगाने धरमतर आणि बाणकोट खाडीवरील पुलाच्या बांधकामासाठी आवश्यक असणारे ‘नौकावहनासाठी गाळ्याची उंची व रुंदी’ साठीचे ना-हरकत प्रमाणपत्र तत्काळ उपलब्ध करून देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाला आज दिले.


            उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी रेवस ते रेड्डी सागरी महामार्गाच्या कामकाजाचा आढावा मंत्रालयातील त्यांच्या दालनात घेतला. या बैठकीस खासदार सुनील तटकरे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, गृह (बंदरे) विभागाचे प्रधान सचिव पराग जैन, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. माणिकराव गुरसळ, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड उपस्थित होते.


            रेवस ते रेड्डी सागरी महामार्गाला गती देण्यासंदर्भात मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, या महामार्गाचे काम गेल्या चार दशकांहून अधिक काळ रखडले आहे. महामार्गाच्या कामाला गती देण्यासाठी मार्च २०२२ मध्ये प्रकल्पाच्या अंतिम आखणीस शासनस्तरावरून मंजुरी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे रेवस ते कारंजा खाडीदरम्यानच्या धरमतर खाडी पुलासाठी ३ हजार ५७ कोटी रुपयांच्या अंदाजित खर्चाच्या बांधकामास देखील प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. मात्र, मेरिटाईम बोर्डामार्फत नौकावहनासाठी आवश्यक असणाऱ्या गाळ्याची उंची व रुंदीसाठीचे ना-हरकत प्रमाणपत्र प्रलंबित असल्याने या पुलाच्या निविदेबाबतची पुढील कार्यवाही करता आली नाही. त्यामुळे धरमतर आणि बाणकोट खाडीवरील पुलाचे काम तत्काळ सुरु होण्यासाठी मेरिटाईम बोर्डाने आवश्यक बाबींची पूर्तता करून गतीने कार्यवाही करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी दिले.


            महाराष्ट्राला ७२० किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला असून या किनारपट्टीवर १४ लहान बंदरे व २ प्रमुख बंदरे आहेत. पर्यटन विकासासह कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी रेवस ते रेड्डी महामार्गाची नव्याने आखणी करण्याचे ठरले आहे. त्यानुसार सर्व्हेक्षण व सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळामार्फत करण्यात येत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.


---

----०००------


महिला सक्षमीकरणासाठी राज्यात 'पिंक रिक्षा' ही योजना लवकरच सुरू करणार

 महिला सक्षमीकरणासाठी राज्यात 'पिंक रिक्षा' ही योजना लवकरच सुरू करणार


- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे


 


               मुंबई, दि. 28 : महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात तसेच सुरक्षित प्रवास करता यावा यासाठी राज्यातील महत्वाच्या शहरात पिंक रिक्षा ही योजना लवकरच सुरू करणार असल्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.


           मंत्रालयातील दालनात महिला व बालविकास विभागाच्या योजनांचा आढावा घेताना मंत्री कु. तटकरे बोलत होत्या. यावेळी महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ.अनुपकुमार यादव, महिला व बालविकास आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक डॉ.इंदू जाखड, सह आयुक्त राहुल मोरे यावेळी उपस्थित होते.


            मंत्री कु. तटकरे म्हणाल्या की, ही योजना परिपूर्ण करावी. यामध्ये लाभार्थी निवड, ई-रिक्षाला प्राधान्य देणे, बँका निवड तसेच प्रशिक्षण या सर्व बाबी तपासून घ्याव्यात. राज्यातील महत्वाच्या शहरांमध्ये ही योजना सूरू करणार असून प्रायोगिक तत्वावर मुंबई, नवी मुंबई, पनवेल, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर व ठाणे या ठिकाणी ही सुरू करण्याचा मानस आहे.


                   महिलांना सॅनिटरी पॅड पुरविण्यासाठी शासनाच्या सर्व विभागांशी समन्वय साधून गरजू लाभार्थी निवड निकष तपासून ही देखील योजना यशस्वीपणे राज्यात राबवावी. महिला व बालविकास विभागाने शाळा, महाविद्यालये, गरीब व गरजू लाभार्थी महिला निवड यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करून शेवटच्या घटकातील महिलांना सॅनिटरी नॅपकिन्स पुरविण्याबाबत चोखपणे योजना राबवावी, अशा सूचना मंत्री कु. तटकरे यांनी दिल्या.

Sunday, 26 November 2023

अंजली कुल्थे: 20 मुलांची आई!,maa तुझे सलाम

 अंजली कुल्थे: 20 मुलांची आई!

14 वर्षांपूर्वी आजच्याच तारखेला....26/11/2008 च्या रात्री नराधम अतिरेकी 'अजमल कसाब' त्याच्या एका सहकाऱ्यासोबत 'कामा हॉस्पिटल'च्या आवारात शिरला आणि त्यांनी अंधाधुंद गोळीबार सुरु केला..

हॉस्पिटलचे दोन्ही सेक्युरिटी गार्ड्स जागीच ठार झाले.. ते दोघं रक्ताच्या थारोळ्यात पडले होते.. जरा पुढे एक नर्स जखमी अवस्थेत पडली होती.. कसाब व त्याचा साथीदार पोर्च ओलांडून पहिल्या मजल्याचा जिना वेगानं चढत होते...

'अंजली कुल्थे' नावाची 50 वर्षांची नर्स, हे भयानक दृश्य पहिल्या मजल्यावरून पहात होती... 26/11 ला ती 'नाईट शिफ्ट'ला होती.. ती 'प्रसूती कक्षाची इन-चार्ज' होती.. तिच्या वॉर्ड मध्ये 20 गर्भवती महिला होत्या....

... हातात बंदूका घेतलेले दोन अतिरेकी जिन्यावरून आपल्याच वॉर्डच्या दिशेनं येतायत हे पाहून अंजली जिवाच्या करारानिशी पुढे सरसावली.. आणि तिनं तिच्या वॉर्डाचे दोन जाडजूड दरवाजे कसेबसे बंद केले..

सर्व 20 महिलांना आणि त्यांच्या काही नातेवाईकांना तिनं त्या मजल्याच्या टोकाला असलेल्या छोट्या 'पॅन्ट्री'च्या खोलीत हलवलं.. वीस गर्भवती महिलांना अशा आणीबाणीच्या वेळी शिफ्ट करणं ही किती नाजूक आणि जोखमीची गोष्ट होती...

कसाब व त्याचा साथीदार हॉस्पिटलच्या टेरेसवर गेले होते व तिथून खाली जमलेल्या पोलिसांवर गोळया झाडत होते.. ग्रेनेड टाकत होते... ते पाहून अंजलीनं, बाहेर येऊन, 'जखमी होऊन पडलेल्या नर्सला' कॅज्युअल्टी मध्ये नेलं आणि तिच्यावर योग्य उपचार सुरु झाले..

इतक्यात वीस पैकी एका महिलेला प्रसववेदना सुरु झाल्या.. अंजलीनं तिला हाताला धरून, भिंतीला चिकटून चालत चालत डिलिव्हरी रूम मध्ये नेलं आणि तिथल्या डॉक्टरच्या साहाय्यानं प्रसूती सुखरूप पार पाडली..

हल्ल्याचा हा थरार संपल्यावर अनेक दिवस अंजली झोपेतून घाबरून उठत असे.. एका महिन्यानी तिला पोलिसांनी पाचारण केलं.. कसाबची ओळख पटवण्यासाठी... नंतर त्याच्या खटल्यात तिला साक्षीला बोलावण्यात आलं.. तिनं कोर्टाला एक विनंती केली... "माझा 'युनिफॉर्म' घालून येण्याची परवानगी मिळावी!"..

'कारण, त्या भीषण रात्री या युनिफॉर्म वर असलेल्या जबाबदारीची मला जाणीव झाली आणि त्यामुळेच मी हे धाडस करू शकले..' असं तिचं म्हणणं होतं...

अंजली कुल्थे यांनी त्या रात्री फक्त वीस महिलांचेच नव्हे तर, 'ही दुनिया पाहण्याआधीच मृत्युच्या जबड्यात पोहोचलेल्या' वीस बालकांचेही प्राण वाचवले. आज ही मुलं चौदा वर्षांची असतील... त्यांना कदाचित ठाऊकही नसेल की त्यांच्या 'दोन जन्मदात्री' आहेत... त्यांना नऊ महिने पोटात वाढवून  प्रत्यक्ष जन्म देणारी एक आई आणि  अंजली कुल्थे ... जन्माआधीच जीवदान देणारी दुसरी आई! 

अंजलीताई तुमच्या अतुलनीय धैर्याला आणि प्रसंगावधानाला सविनय प्रणाम!

🌹🌹🌹🌹🌹🌹

©️ धनंजय कुरणे

26/11/22

Thursday, 23 November 2023

पंढरपुरची वारी आपली संस्कृती, कार्तिकी एकादशी निर्विघ्नपणे पार पडेल

 पंढरपुरची वारी आपली संस्कृतीकार्तिकी एकादशी निर्विघ्नपणे पार पडेल

– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज्यातील जनतेलाही दिल्या कार्तिकी एकादशीच्या शुभेच्छा

            मुंबईदि. 22 : - पंढरपूरची वारी ही आपली संस्कृती आहे. त्यामुळे कार्तिकी एकादशी निर्विघ्नपणे पार पडेलयासाठी आपण सर्वचजण प्रयत्न करत आहोत. आमचे प्रशासन मनापासून काम करत आहेअसे सांगतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्तिकी एकादशी निमित्ताने पंढरपूर येथे येणाऱ्या वारकऱ्यांसाठीच्या विविध सोयी-सुविधांचा आढावा घेतला. विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या वारकरी बांधवाच्या सोयी-सुविधांसाठी सर्वतोपरी दक्षता घेण्यात यावी असे निर्देशही त्यांनी दिले.

            उद्या गुरुवारी (दि. २३) उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणारी विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा निर्विघ्नपणे पार पडेलअसा विश्वास व्यक्त करून मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला कार्तिकी एकादशीच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सह्याद्री राज्य अतिथीगृह येथून दृकश्राव्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून कार्तिकी एकादशीच्या तयारीचा आढावा घेतला. या संवादात मंदिर समितीचे गहिनीनाथ अवसेकर महाराज यांच्यासहपुणे विभागीय आयुक्त सौरभ रावसोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वादपोलीस प्रशासनजिल्हा परिषदेचे वरिष्ठ अधिकारीआरोग्य विभाग तसेच विविध यंत्रणांचे अधिकारी आदी सहभागी झाले होते.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले कीपंढरीची वारी हा आपल्या सगळ्यांच्याच आस्थेचाजिव्हाळ्याचा विषय आहे. विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या आपल्या वारकरी बांधवाच्या सोयी-सुविधांसाठी सर्वच यंत्रणांनी प्रयत्नपूर्वक नियोजन करावे. कार्तिकी एकादशी निर्विघ्नपणे पार पडावी यासाठी विविध घटकांनी समंजसपणे पुढाकार घेतला आहे. ही चांगली बाब आहे. पंढरपूरची वारीही आपली संस्कृती आहे. ती आपण सगळ्यांनी मिळून जतन केली पाहिजे.  आपण राज्यातील ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत एसटी बस प्रवास आणि महिलांना तिकीट दरात पन्नास टक्के सवलत दिली आहे. त्यामुळे या वारीसाठी मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक आणि भगिनी येतील. त्यांना विठुरायाचे दर्शन घेता येईल. ही एक प्रकारे सेवाच आहे. त्यामुळे आमचे प्रशासन देखील वारकऱ्यांच्या सेवेसाठी मनापासून प्रयत्न करत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी म्हणाले. यासाठी पोलीस प्रशासनासहविविध यंत्रणांचा आढावा घेतल्याचेही त्यांनी सांगितले.

            यावेळी जिल्हाधिकारी श्री. आशीर्वाद यांनी पंढरपुरातील स्वच्छता या घटकाविषयी विशेष काळजी घेतली जात असल्याचे सांगितले. प्रदक्षिणा मार्गदर्शन रांगतसेच चार विश्रांती कक्षांची उभारणीपोलीस बंदोबस्तसीसीटीव्हीनदी किनाऱ्याची स्वच्छतापाण्याची उपलब्धताआरोग्य शिबिरांचे आयोजन याविषयीही त्यांनी माहिती दिली.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी वारकरी आणि पंढरपूर वारीबद्दल आस्थेने पूर्वतयारीचा आढावा घेतल्याबद्दल श्री. अवसेकर महाराज यांनी आभार मानले.

००००


 

वृ

Sunday, 19 November 2023

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने इंदिरा गांधी जयंती पर किया अभिवादन एकता दिवस की दिलाई शपथ मुंबई,

 Chief Minister Eknath Shinde Commemorates Indira Gandhi's Birth Anniversary and National Unity Day

          Mumbai, November 19: Today, Chief Minister Eknath Shinde honored the birth anniversary of former Prime Minister Indira Gandhi by paying floral tributes at his official residence, Varsha.

          The Chief Minister also led the administration of the pledge for National Unity Day, commemorating this significant occasion.

                                                  000

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने इंदिरा गांधी जयंती पर किया अभिवादन

 एकता दिवस की दिलाई शपथ

          मुंबई


नवंबर १९:- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने आज पूर्व प्रधानमंत्री श्रीमती इंदिरा गांधी को उनकी जयंती पर श्रद्धांजलि अर्पित की. उन्होंने इसी दिन मनाए जाने वाले राष्ट्रीय एकता दिवस की शपथ भी दिलाई.

          मुख्यमंत्री श्री शिंदे ने अपने अधिकृत आवास वर्षा पर दिवंगत पूर्व प्रधानमंत्री गांधी   को पुष्पांजलि अर्पित की. इस समय उन्होंने वहां पर उपस्थित लोगों को राष्ट्रीय एकता दिवस  की शपथ भी दिलाईइंदिरा गांधी की जयंती को राष्ट्रीय एकता दिवस मनाया जाता है.

000

Friday, 1 September 2023

गोविंदा खेळाडूंना शासकीय सेवेत घेण्यासाठी प्रयत्न करणार

 गोविंदा खेळाडूंना शासकीय सेवेत घेण्यासाठी प्रयत्न करणार


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


प्रो गोविंदाचा ब्रॅण्ड ॲम्बेसिडर म्हणून अभिषेक बच्चन यांच्या नावाची घोषणा


          मुंबई, दि. ३१ : दहीहंडी गोविंदा या खेळास साहसी खेळाचा दर्जा देण्यात आला आहे. आता या दहीहंडी खेळातील गोविंदांना अन्य खेळांच्या खेळाडूंना लागू असलेल्या नियमानुसार शासकीय सेवेत घेण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.


          वरळी येथील एनएससीआय डोम येथे देशातील पहिली प्रो गोविंदा लीग २०२३ या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, उद्योग मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार राहुल शेवाळे, आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, बाळा नांदगावकर, नितीन देसाई, अभिनेते अभिषेक बच्चन, पूर्वेश सरनाईक, दहीहंडी समन्वय समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.


          मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, राज्य शासनाने 50 हजार गोविंदांना विमा कवच दिले होते. 50 हजार नोंदणी पूर्ण झाली आणि अनेक गोविंदांना नोंदणी करता आली नाही. त्यामुळे आणखी 25 हजार गोविंदांना विमा कवचाला तत्काळ मंजुरी दिली. आता ७५ हजार गोविंदांना विमा संरक्षण दिले आहे. दहीहंडी उत्सव स्व.आनंद दिघे यांनी ठाणे शहरात प्रथम मोठ्या उत्साहात साजरा करण्यास सुरुवात केली. थरांचे विक्रमही ठाण्यातील गोविंदांनी केले. प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा आली आहे.


          राज्यातील सर्व नागरिकांनी आता गणेशोत्सव, नवरात्री असे सन उत्साहात साजरा करावेत. पूर्वीचे सर्व निर्बंध आता काढून टाकले आहेत. राज्यातील परंपरा सण, उत्सव, एकता, बंधूभाव निर्माण करण्यासाठी महत्त्वाचे असतात. प्रो कबड्डीसारखे प्रो गोविंदासाठी अभिनेते अभिषेक बच्चन यांनी काम करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.


          उद्योग मंत्री श्री. सामंत म्हणाले की, देशात पहिल्यांदा गोविंदाचा विमा उतरविण्यात आला आहे. इतर राज्यातील गोविंदा पथकांनी आपल्या राज्यात विमा घेण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. त्यांनाही सहकार्य करण्यात आले आहे.यापुढे ही स्पर्धा राष्ट्रीय पातळीवर घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.


          क्रीडा मंत्री श्री. बनसोडे म्हणाले की, मुख्यमंत्री महोदयांचे प्रो गोविंदा लीगचे स्वप्न होते ते आज साकार होत आहे. हा खेळ जागतिक पातळीवर घेवून जाण्यासाठी शासन प्रयत्न करील. पारंपरिक खेळांना जागतिकस्तरावर नेण्यासाठी आयपीएल, प्रो कबड्डी यासारख्या लोकप्रियता या स्पर्धेच्या निमित्ताने वाढणार आहे. या स्पर्धेसाठी एमआयडीसी आणि दहीहंडी समन्वय समितीचे सहकार्य केले असल्याचे त्यांनी सांगितले.


          या स्पर्धेचे थीम 'घेवून टाक' ही आहे. तीन फेऱ्यांमध्ये स्पर्धा होणार आहे. प्रो गोविंदा स्पर्धेमध्ये एकूण १६ संघ सहभागी झाले आहेत. पहिले बक्षीस ११ लाख रुपये, दुसरे बक्षीस ७ लाख रुपये, तिसरे बक्षीस ५ लाख रुपये आणि चौथे बक्षीस ३ लाख रुपये ठेवण्यात आले आहे. याचबरोबर महिला संघ आणि अंध गोविंदा पथकांनाही सहभागाबद्दल एक लाखांचे बक्षीस देण्यात येणार आहे.


0000


राजू धोत्रे/विसंअ/

Tuesday, 15 August 2023

दिलखुलास’ कार्यक्रमात नेत्ररोग तज्ज्ञ डॉ.वर्षा रोकडे यांची मुलाखत

 ‘दिलखुलास’ कार्यक्रमात नेत्ररोग तज्ज्ञ डॉ.वर्षा रोकडे यांची मुलाखत

            मुंबई, दि. 14: राज्यात सध्या डोळे येणे या आजाराची साथ सुरू आहे. डोळे येऊ नये म्हणून तसेच डोळे आल्यावर नागरिकांनी काय खबरदारी घ्यावी या विषयावर नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. वर्षा रोकडे यांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालाय निर्मित 'दिलखुलास' कार्यक्रमातून माहिती दिली आहे.


            माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत बुधवार दि.16, गुरूवार दि. 17 आणि शुक्रवार दि. 18 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व 'न्यूज ऑन एआयआर' या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. निवेदक सुषमा जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे.

Friday, 11 August 2023

गाय आणि म्हशीच्या दुधात फरक फार कमी लोकांना माहीत आहे.*

 *गाय आणि म्हशीच्या दुधात फरक फार कमी लोकांना माहीत आहे.*


 😡म्हैस आपल्या मुलापासून दूर पाठ करून बसते, जरी तिचे मूल कुत्र्यांनी खाल्ले तरी ती त्याला वाचवणार नाही.


🔴 तर गाईच्या पिल्लाकडे अनोळखी व्यक्ती आल्यास ( वाघ सुद्धा )जीव देईल पण तो जिवंत असताना बाळावर आच येऊ देणार नाही.

 त्यामुळेच त्याच्या दुधात आपुलकीचा गुण मुबलक आहे.

 

 म्हशीला घाण आवडते, चिखलात देखील बसेल ,

 पण गाय शेणावरही बसणार नाही, तिला स्वच्छता आवडते.

 

 म्हशीला घरापासून 2 किमी अंतरावर तलावात सोडून या, ती घरी येऊ शकत नाही, तिची स्मरणशक्ती शून्य आहे.


 गायीला घरापासून ५ किमी अंतरावर सोडा.

 तिला घरचा रस्ता माहित आहे, ती येईल.गायीच्या दुधात स्मरणशक्ती तीक्ष्ण असते.

 

 दहा म्हशी बांधा आणि त्यांच्या पिल्लांना 20 फूट दूर सोडा, एकही मूल आईला ओळखू शकत नाही.


 तर गोशाळांमध्ये दिवसभर गाई-वासरांना स्वतंत्र शेडमध्ये ठेवले जाते, संध्याकाळी जेव्हा प्रत्येकजण आईला भेटतो तेव्हा सर्व मुले (हजारोच्या संख्येने) आपल्या आईला ओळखतात आणि दूध पितात, ही गाईच्या दुधाची आठवण आहे.

 

 म्हशीचे दूध काढल्यावर म्हैस सर्व दूध देते,


 पण गाय थोडं दूध शिल्लक ठेवतर आणि जेव्हा ती आपली पिल्लं दूध पाजायला घेते तेव्हा शिल्लक दूध पाजते.

 हे गुण आईचे आहेत जे म्हशीत नाहीत.

 

 रस्त्यावर मुले खेळत असतील आणि म्हैस धावत आली तर ती नक्कीच मुलांवर पाय ठेवते.


 पण गाय आली तर ती मुलांवर कधीच पाय ठेवत नाही.

 

 म्हशीला सूर्य आणि गरमी सहन होत नाही...


 तर गाय मे-जूनमध्येही उन्हात बसू शकते.

 

 म्हशीचे दूध तामसिक असते.गाईचे सात्विक असताना.

 

 म्हशीच्या दुधात आळस भरलेला असतो, तिचे पिल्लू दिवसभर भांग खाल्ल्यासारखे पडून असते.

 जेव्हा दूध काढण्याची वेळ येईल तेव्हा मालक ते उचलतो ...


 पण गायीचे वासरू एवढी उडी मारेल की तुम्ही दोरी सोडू शकणार नाही.

 

 तरीही लोक म्हशी खरेदीसाठी लाखो रुपये खर्च करतात. तर गाईचे दूध हे अमृतसारखे आहे.


 *संकलनः रविंद्र प्रभाकरराव घोडके आर्किटेक्चर कन्सल्टंट ओझर* 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻


🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺


*(

Sunday, 4 June 2023

आंघोळीच्या पाण्यात टाका लिंबाचा रस टाकण्याचे फायदे वाचाल तर व्हाल अवाक्.....*

 *आंघोळीच्या पाण्यात टाका लिंबाचा रस टाकण्याचे फायदे वाचाल तर व्हाल अवाक्.....*


उन्हाळा सुरू झालाय, अशात लिंबाच्या रसाचे काय काय फायदे होतात हे तुम्हाला चांगलंच माहीत आहे. लोक गॅस दूर करण्यासाठी किंवा थकवा घालवण्यासाठी लिंबाच्या रसाचं सेवन नेहमी करतात. बॉडी डिटॉक्स करण्यासाठी म्हणजे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी लिंबाचा रस किती फायदेशीर आहे हेही सगळ्यांना माहीत आहे. पण अनेकांना हे माहीत नाही की, लिंबाचा रस आंघोळीच्या पाण्यात टाकल्यावर त्याचे काय फायदे होतात. चला जाणून घेऊ याचे फायदे....


*शरीराची दुर्गंधी होते दूर...*

वाढत्या वयासोबत वाढत्या वजनाचा संकेत तेव्हा मिळतो जेव्हा तुमच्या शरीरातून दुर्गंधी येऊ लागते. जर कुणाच्या शरीरातून दुर्गंधी येऊ लागते तेव्हा समजून घ्या की, भविष्यात तुम्ही एखाद्या गंभीर आजाराचे शिकार होणार आहात. पण अनेकदा घामामुळेही शरीराची दुर्गंधी येऊ लागते. अशात तुम्ही आंघोळीच्या पाण्यात लिंबाच्या रसाचा वापर करावा.


*सुरकुत्यासाठी होतील दूर...*

आपलं शरीर एका गाडीप्रमाणे आहे. जसे आपण एखादी गाडी खरेदी करतो, तेव्हा ती सुरूवातीला चांगला मायलेज देते आणि वेळेनुसार तिच्याकडे लक्ष दिलं नाही तर ती खराब होते. त्याचप्रमाणे आपल्या त्वचेचं आहे. वाढत्या वयासोबत जेव्हा आपण आपल्या शरीराला चांगलं पौष्टिक जेवण देत नाही तर त्वचेसंबंधी समस्या निर्माण होऊ लागतात. या ठीक करण्यासाठी तुम्ही रोज आंघोळीच्या पाण्यात लिंबाचा रस टाकू शकता.


*त्वचेसाठी फायदेशीर...*

हा एक आयुर्वेदिक घरगुती उपाय आहे. गेल्या अनेक वर्षांपासून लोक हा उपाय वापरतात. जो शरीरासाठी फायदेशीर मानला जातो. लिंबामध्ये व्हिटॅमिन सी चं प्रमाण भरपूर असतं. त्यामुळे याने त्वचेसंबंधी समस्या होत नाहीत. अशात केमिकलयुक्त साबणाऐवजी लिंबाच्या रसाच्या रसाचा वापर करू शकता. 


*कुमार चोप्रा,*

*डॉ. सुनील इनामदार.*


🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺

Featured post

Lakshvedhi