Friday, 24 April 2026

व्यावसायिक वाहनचालकांना मराठी भाषा शिकवण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार

 व्यावसायिक वाहनचालकांना मराठी भाषा शिकवण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार

— परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

 

मुंबईदि. २३ : रिक्षाटॅक्सी तसेच ई-बाईक टॅक्सी सेवांमधील व्यावसायिक वाहनचालकांना प्रवाशांशी मराठीतून संवाद साधता यावायासाठी मुंबई मराठी साहित्य संघ आणि कोकण मराठी साहित्य परिषदेशी निगडीत साहित्यिकांनी चालकांना व्यावहारिक मराठी शिकवण्यासाठी पुढाकार घेण्याची तयारी दर्शविली आहे. त्यासाठी आवश्यक अभ्यासक्रम लवकरच तयार करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

 

परिवहन मंत्री सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयीन दालनात यासंदर्भात बैठक झाली. बैठकीस परिवहन आयुक्त राजेश नार्वेकरमराठी भाषा विभागाचे उपसचिव नामदेव भोसलेराज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ.शामकांत देवरे तसेच तज्ज्ञसाहित्यिक उपस्थित होते.

 

वाहनचालकांना खेळीमेळीच्या वातावरणात व्यावहारिक मराठी शिकविण्यासाठी कोकण मराठी साहित्य परिषद आपल्या ७२ शाखांमधून शिकवणी वर्ग सुरू करण्याची तयारी दर्शवित आहे. तसेचमुंबई मराठी साहित्य संघाने आपल्या स्वयंसेवी शिक्षकांच्या माध्यमातून ऑनलाईन मराठी भाषा प्रशिक्षण देण्याची तयारी दर्शविली आहे. या प्रशिक्षणासाठी चालकांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाहीअसे परिवहन मंत्री सरनाईक यांनी सांगितले.

Thursday, 23 April 2026

उदंचन जलविद्युत प्रकल्पासाठी तात्यासाहेब कोरे वारणा नवशक्ती निर्माण संस्थेबरोबर ५ हजार २०० कोटींचा करार

 उदंचन जलविद्युत प्रकल्पासाठी तात्यासाहेब कोरे वारणा नवशक्ती निर्माण संस्थेबरोबर ५ हजार २०० कोटींचा करार

 

उदंचन प्रकल्पाच्या माध्यमातून राष्ट्रीय ग्रीड स्थिर ठेवण्याची राज्यात क्षमता निर्माण होणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

तीन प्रकल्पातून ११०० मेगावॅट वीज निर्मिती क्षमता स्थापित होणार

१११० रोजगार निर्मिती होणार

राज्यातील उदंचन प्रकल्पांची ८० हजार मे.वॅ. वीज निर्मिती क्षमता

 

मुंबईदि. २३ - जलसंपदा विभाग आणि तात्यासाहेब कोरे वारणा नवशक्ती निर्माण संस्था मर्यादित यांच्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत  तीन उदंचन जलविद्युत प्रकल्पांसाठी सुमारे ५ हजार २०० कोटी रुपयांचा आज  सामंजस्य करार करण्यात आला. महाराष्ट्राच्या ऊर्जा क्षमतेत वाढ करण्यासाठी हा करार महत्त्वाचा टप्पा ठरणार असून या माध्यमातून कमी खर्चात मोठ्या प्रमाणावर ऊर्जा साठवणूक करून राष्ट्रीय ग्रीड स्थिर ठेवण्याची क्षमता राज्यात निर्माण होईलअसा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

 

वर्षा या शासकीय निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमास जलसंपदा मंत्री गिरीश महाजनजलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूरजलसंपदा सचिव संजय बेलसरेआमदार डॉ. विनय कोरेनवशक्ती निर्माण संस्थेचे अध्यक्ष नामदेव एच. पाटीलमुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्राप्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी आदि उपस्थित होते.

Wednesday, 22 April 2026

मिशन लक्ष्यवेध अंतर्गत क्रीडा प्रतिभा चाचणी अर्जांची अंतिम तारीख २८ एप्रिलजिल्हास्तरीय क्रीडा प्रतिभा विकास केंद्राच्या निवड प्रक्रियेसाठी २८ एप्रिल २०२६ पर्यंत https://forms.gle/ix76WxCTeTtZFH6R8 या लिंकवर अथवा missionlakshyavedhmumcity

 मिशन लक्ष्यवेध अंतर्गत क्रीडा प्रतिभा चाचणी अर्जांची अंतिम तारीख २८ एप्रिल

मुंबईदि. 22 : क्रीडा व युवक सेवा संचालनालयामार्फत “मिशन लक्ष्यवेध” अंतर्गत मुंबई शहर जिल्हास्तरीय क्रीडा प्रतिभा विकास केंद्राच्या निवड प्रक्रियेसाठी २८ एप्रिल २०२६ पर्यंत https://forms.gle/ix76WxCTeTtZFH6R8 या लिंकवर अथवा missionlakshyavedhmumcity@gmail.com या ईमेलवर करावे, अशी माहिती मुंबई शहर जिल्ह्याच्या जिल्हा क्रीडा अधिकारी निलिमा अडसूळ यांनी दिली आहे.

या उपक्रमाचा मुख्य उद्देश जिल्ह्यातील गुणवंत खेळाडूंना उच्च दर्जाचे प्रशिक्षण, आवश्यक सुविधा व मार्गदर्शन उपलब्ध करून देत राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणारे खेळाडू घडवणे हा आहे. या उपक्रमांतर्गत शुटींग, टेबल टेनिस व वेटलिफ्टींग या क्रीडा प्रकारांसाठी जिल्हास्तरावर निवड चाचणी आयोजित करण्यात येत आहे.

या निवड चाचण्यांसाठी २१ वर्षांखालील खेळाडू पात्र ठरणार असून, जिल्हास्तर पदक प्राप्त व विभागस्तर, राज्यस्तर, राष्ट्रीयस्तर स्पर्धा सहभाग घेतलेले इच्छुक खेळाडुंनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा, असे आवाहन मुंबई शहर जिल्ह्याच्या जिल्हा क्रीडा अधिकारी  नीलिमा अडसूळ यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी  निलेश गराटे  (9702212925) साहिल उतेकर  (9702171004)  समृद्धी देवळेकर  (8779727571) यांच्याकडे संपर्क साधावा.


तंत्रशिक्षण विद्यार्थ्यांसाठी जागतिक रोजगाराच्या संधी; भाषा व कौशल्य प्रशिक्षणावर विशेष भर

 तंत्रशिक्षण विद्यार्थ्यांसाठी जागतिक रोजगाराच्या संधी;

भाषा व कौशल्य प्रशिक्षणावर विशेष भर

-उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

 

·         विद्यार्थ्यांना जर्मनी आणि जपान मध्ये रोजगारच्या संधी उपलब्ध

·         राज्य तंत्रशिक्षण मंडळ आणि सीआयआय यांच्यात सामंजस्य करार

 

मुंबईदि. 22:  विद्यार्थ्यांना परदेशात रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी संबंधित देशांची भाषा व संस्कृतीचे ज्ञान अत्यावश्यक असते. यासाठी जर्मनीजपान आणि रशिया या देशांच्या भाषांचे प्रशिक्षण देण्यावर विशेष भर देण्यात येत आहे. या भाषा प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये आंतरराष्ट्रीय कामकाज संस्कृतीशी जुळवून घेण्याची क्षमतासंवाद कौशल्ये आणि व्यावसायिक आत्मविश्वास वाढेल. परिणामीपरदेशातील रोजगाराच्या संधींमध्ये लक्षणीय वाढ होईलअसे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.

            आज मंत्रालयात महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ (एमएसबीटीई) आणि कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (सीआयआय) यांच्यात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या  उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डीतंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. विनोद मोहितकरमहाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे संचालक डॉ. प्रमोद नाईककॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (सीआयआय) चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत एन.सीआयआयचे राज्य प्रमुख पुष्कर हाथेतसेच सीआयआय आंतरराष्ट्रीय भाषा विभागाचे प्रमुख नवोनील डी. आणि दयाल कांगणे उपस्थित होते

लाईव्ह ट्रॅकिंग व पूर्ण पारदर्शकता - तक्रार नोंदल्यानंतर विद्यार्थ्याला एक विशिष्ट 'तक्रार क्रमांक' (Grievance ID) मिळतो

 काही वर्षांपासून परीक्षा निकालातील विलंबगुणपत्रिकांमधील त्रुटी तसेच तक्रार नोंदवण्यासाठी प्रत्यक्ष लोणेरे येथे उपस्थित राहण्याची अट यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी होती. या पार्श्वभूमीवर मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी विषयाची गंभीर दखल घेत सातत्याने आढावा बैठका घेतल्या आणि कायमस्वरूपी उपाययोजना राबवण्याचे निर्देश दिले. त्यानंतर अनुभवी शिक्षणतज्ज्ञ डॉ. राजनीश कामत यांची कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली. डॉ. कामत यांच्या नेतृत्वाखाली परीक्षा नियंत्रक डॉ. नरेंद्र जाधव आणि कुलसचिव डॉ. शेष यांच्या समन्वयातून विद्यापीठाने तब्बल 85 टक्के परीक्षा निकाल यशस्वीपणे जाहीर केले. या कामगिरीसह ई-निरसन’ प्रणालीमुळे तक्रार निवारणाची प्रक्रिया अधिक वेगवान आणि कार्यक्षम होणार आहे.

लाईव्ह ट्रॅकिंग व पूर्ण पारदर्शकता - तक्रार नोंदल्यानंतर विद्यार्थ्याला एक विशिष्ट 'तक्रार क्रमांक' (Grievance ID) मिळतो. या क्रमांकाच्या सहाय्याने विद्यार्थी ॲपवर आपल्या तक्रारीची सद्यस्थिती कधीहीकुठूनही तपासू शकतो. तक्रार कोणत्या विभागाकडे आहेकोण हाताळत आहे आणि कधी सोडवली जाईलया सर्व माहितीचे रियल-टाइम अपडेट मिळतात. प्रत्येक टप्प्यावर एसएमएस व ईमेलद्वारे विद्यार्थ्याला सूचना दिली जाते.

विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाच्या साह्याने सेवा अधिक सुलभ व पारदर्शक देण्याचा प्रयत्न -

  

विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाच्या साह्याने सेवा अधिक सुलभ व पारदर्शक देण्याचा प्रयत्न

-उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

·         ई-निरसन’ प्रणालीचा शुभारंभ

मुंबईदि. 22 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या तक्रार निवारणासाठी ई-निरसन’ ही अत्याधुनिक डिजिटल प्रणाली विकसित केली असून  विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाच्या साह्याने  सेवा अधिक सुलभ व पारदर्शक देण्याचा प्रयत्न असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

            उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांदादा पाटील यांच्या हस्ते मंत्रालयात ई-निरसन प्रणालीचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव वेणुगोपाल रेड्डीतंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकरप्रभारी कुलगुरू डॉ. राजनीश कामतपरीक्षा नियंत्रक डॉ. नरेंद्र जाधव तसेच कुलसचिव डॉ. शेष उपस्थित होते.

            मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले,  विद्यार्थ्यांना परीक्षा निकालगुणपत्रिकापुनर्मूल्यांकनप्रमाणपत्र आदी संदर्भातील तक्रारींसाठी प्रत्यक्ष लोणेरे येथे जाण्याची आवश्यकता भासू नयेयासाठी ई-निरसन’ प्रणाली विकसित करण्यात आली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानावर आधारित ही प्रणाली तक्रारींचे स्वयंचलित वर्गीकरण करून त्या संबंधित विभागाकडे तत्काळ पाठवते. तसेच विद्यार्थ्यांना तक्रारीची सद्यस्थिती लाइव्ह ट्रॅकिंगद्वारे पाहता येते. या प्रणालीमुळे तक्रार निवारण प्रक्रिया अधिक जलदपारदर्शक व कार्यक्षम होणार असून विद्यार्थ्यांचा वेळ व खर्च मोठ्या प्रमाणात वाचणार आहे.

मांडवा-मरीना व रेवस-मांडवा जेट्टी कामांना गती द्या

 मांडवा-मरीना व रेवस-मांडवा जेट्टी कामांना गती द्या

-मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

 

मुंबईदि. २१ :- अलिबाग तालुक्यातील मांडवा मरीना जेट्टी विकास तसेच रेवस-मांडवा प्रवासी जेट्टी दुरुस्ती व मजबूतीकरणाच्या कामांना गती देऊन ही कामे प्राधान्याने पूर्ण करावीतअसे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले.

 

मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीस आमदार महेंद्र दळवी यांच्यासह विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

 

मंत्री नितेश राणे म्हणालेया प्रकल्पामुळे अलिबाग- मुंबई सागरी प्रवास अधिक सुरक्षित व वेगवान होण्यास मदत होणार असूनपर्यटन व स्थानिक अर्थव्यवस्थेलाही मोठा फायदा होणार आहे. कोकणातील सागरी प्रवासी वाहतूक अधिक सुरक्षितसुलभ आणि सक्षम करण्यासाठी ही कामे पावसाळ्यापूर्वीच प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

 

या प्रकल्पांतर्गत अॅप्रोच जेट्टीस्लोपिंग जेट्टीमोठ्या व्यासाच्या पाइल्स बसविणेतसेच अॅप्रोच चॅनलमध्ये ड्रेजिंग व विद्युत सुविधांची उभारणी यासारखी महत्त्वाची कामे समाविष्ट आहेत. या प्रकल्पाच्या एकंदरीत कामाची सुमारे ५८ टक्के भौतिक प्रगती झाली असल्याचे बैठकीत सांगण्यात आले असता  या प्रकल्पाची उर्वरित कामे प्राधान्याने मार्गी लावण्याचे निर्देश मंत्री राणे यांनी  दिले. तसेच रेवस येथील जेट्टी मजबूतीकरणाचे कामही तातडीने मार्गी लावण्याबाबत त्यांनी सूचित केले.

 

मांडवा प्रवासी जेट्टीबाबतही बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. वाढती प्रवासी संख्या व बोटींची संख्या लक्षात घेता जेट्टीची दुरुस्ती व मजबूतीकरण आदी कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत. आयआयटी मुंबईच्या तांत्रिक अहवालानुसार जेट्टीच्या संरचनेत तातडीने दुरुस्तीची गरज असून प्राथमिक दुरुस्तीची कामे सुरू आहेत. दोन्ही प्रकल्पांची कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना मत्स्यव्यवसाय  व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

Featured post

Lakshvedhi