Tuesday, 25 August 2026

प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा २ लाख ४४ हजार लाभार्थ्यांना लाभ · प्रधानमंत्री मातृवंदना योजनेत पहिल्या अपत्यासाठी पाच हजार, दुसरे अपत्य मुलगी असल्यास सहा हजारांचा लाभ

 प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा २ लाख ४४ हजार लाभार्थ्यांना लाभ

·         प्रधानमंत्री मातृवंदना योजनेत पहिल्या अपत्यासाठी पाच हजार,

दुसरे अपत्य मुलगी असल्यास सहा हजारांचा लाभ

 

            मुंबई, दि. २४ : गर्भवती महिला व बालकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री मातृवंदना योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. महाराष्ट्रात या योजनेअंतर्गत २०२६-२७ या वर्षात आतापर्यंत २ लाख ४४ हजार ३५४ लाभार्थी महिलांना लाभ देण्यात आला असून, सर्व पात्र लाभार्थींना १०० टक्के लाभ मिळवून देण्यासाठी कार्यवाही सुरू आहे.

योजनेनुसार पात्र महिलेला पहिल्या अपत्यासाठी पाच हजार रुपये दोन हप्त्यांमध्ये देण्यात येतात. पहिल्या हप्त्यात तीन हजार रुपये, तर बाळाची जन्मनोंदणी आणि आवश्यक प्राथमिक लसीकरणाचे चक्र पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या हप्त्यात दोन हजार रुपये दिले जातात. दुसरे अपत्य मुलगी असल्यास जन्मानंतर एकाच हप्त्यात सहा हजार रुपयांचा लाभ देण्यात येतो. ही रक्कम लाभार्थीच्या आधार संलग्न बँक खात्यात किंवा पोस्ट ऑफिस खात्यात थेट लाभ हस्तांतरणाद्वारे जमा केली जाते.

राज्यात प्रधानमंत्री मातृवंदना योजनेची अंमलबजावणी १ जून २०२६ पासून महिला व बाल विकास विभागामार्फत करण्यात येत आहे. गर्भधारणेच्या शेवटच्या टप्प्यापर्यंतही आर्थिक परिस्थितीमुळे मजुरीचे काम करणाऱ्या महिलांना काही प्रमाणात आर्थिक आधार मिळावा आणि त्यांना सकस आहार व आवश्यक आरोग्यसेवा घेता यावी, हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे.


पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीत २६ ऑगस्टला ‘दृकश्राव्य माध्यम करिअर मेळावा,pl share

 पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीत २६ ऑगस्टला दृकश्राव्य माध्यम करिअर मेळावा

 

मुंबई, दि. २४ : पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या प्रभादेवी येथील अकादमी संकुलात राज्य गणेशोत्सवाचे औचित्य साधून बुधवार, २६ ऑगस्ट २०२६ रोजी अकादमी संकुलात दृकश्राव्य माध्यमातील अभ्यासक्रमांचा मार्गदर्शनपर मेळावा आयोजित करण्यात आला आहे. दृकश्राव्य माध्यमातील ११ व्यावसायिक अल्पमुदतीचे प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आले आहेत. या पहिल्या तुकडीचा कालावधी नुकताच पूर्ण झाला आहे.

अतिशय माफक शुल्कात, तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली हे अभ्यासक्रम घेण्यात येत आहेत.

 

मेळाव्यातील प्रमुख आकर्षणे व वैशिष्ट्ये :

मेळाव्यात उपस्थितांना प्रत्यक्ष स्टुडिओ भेट आणि अकादमीतील अत्याधुनिक डबिंग, क्रोमा, एडिटिंग, पॉडकास्ट आणि शूटिंग स्टुडिओ प्रत्यक्ष पाहण्याची व अनुभवण्याची संधी मिळणार आहे.

 

मार्गदर्शन: अकादमीतर्फे चालवल्या जाणाऱ्या ११ व्यावसायिक अभ्यासक्रमांची सविस्तर माहिती व करिअरच्या संधींबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाईल.

 

नवोदितांसाठी संधी: मीडिया, चित्रपट आणि दृकश्राव्य क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुण-तरुणींसाठी हा मेळावा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. या सर्व अभ्यासक्रमांना कौशल्य विकास विभागाची मान्यता असून अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर सहभागींना शासनाचे प्रमाणपत्र देण्यात येते. अकादमीच्या वतीने सर्व महाविद्यालयांतील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या मार्गदर्शनपर मेळाव्यास उपस्थित राहून संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन अकादमीकडून करण्यात आले आहे.

वाढीव काम व साहित्य उपलब्धतेबाबत तातडीने कार्यवाही

 वाढीव काम व साहित्य उपलब्धतेबाबत तातडीने कार्यवाही

            प्रकल्पाचे काम निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ, साहित्य आणि यंत्रसामग्री पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देण्यात यावी. कामाची गती कायम ठेवण्यासाठी आवश्यकतेनुसार २४ तास कामकाजाचे नियोजन करून विविध एजन्सींमध्ये समन्वय साधावा, तसेच वाढलेल्या कामाचा सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचे एमएमआरडीए प्राधिकरण यांना निर्देश देण्यात आले.

 

            स्मारक परिसर संपूर्ण हरित परिसर म्हणून विकसित करण्यात येणार असून, येथे सुमारे १ हजार व्यक्तींची आसनक्षमता असलेले सभागृह, संशोधन केंद्र, ध्यानधारणा केंद्र, ग्रंथालय आणि भूमिगत वाहनतळ यांसारख्या सुविधा उपलब्ध असणार आहेत. तसेच स्मारकाचे तीव्र वादळांसह नैसर्गिक आपत्तींपासून संरक्षण करण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहितीही यावेळी देण्यात आली.

या स्मारकाच्या कामासाठी आवश्यक निधी राज्य शासनाकडून उपलब्ध करून देण्यात येत असून, उर्वरित कामे गतीने आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी परस्पर समन्वयाने कार्यवाही करावी, असे निर्देश मंत्री शिरसाट यांनी दिले.

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक वेळेत पूर्ण करावे

 भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक वेळेत पूर्ण  करावे

- सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट

 

            मुंबई, दि. २४ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल, दादर येथील स्मारकाचे काम दर्जेदार पद्धतीने आणि निर्धारित कालावधीत पूर्ण करावे. कामाची गुणवत्ता, सुरक्षितता आणि वेळेचे नियोजन याला सर्वोच्च प्राधान्य देऊन संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिले.

 

            इंदू मिल येथे उभारण्यात येत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकाच्या कामाचा सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी आढावा घेतला. स्मारकाच्या विविध भागांमध्ये सुरू असलेली कामे, आवश्यक साहित्याची उपलब्धता, वाढीव कामे तसेच प्रकल्पाच्या पुढील टप्प्यांबाबत शासकीय निवासस्थानी आढावा घेतला.

 

जलसंधारण अभियानाला जनसहभागाचे बळ १५

 जलसंधारण अभियानाला जनसहभागाचे बळ

 १५ ऑगस्ट २०२६ ते २६ जानेवारी २०२७ या कालावधीत राज्यात जलसंधारण अभियानराबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून गावागावांत जलसंधारण, पाणलोट विकास, जलस्रोतांचे पुनरुज्जीवन, गाळ काढणे, भूजल पुनर्भरण आणि मृदसंवर्धनाच्या कामांना गती देण्यात येणार आहे. तसेच अभियानादरम्यान काही निवडक गावांमध्ये जलशोषक खड्डे तयार करण्याचे उद्दिष्ट देण्यात येणार आहे.

 

महा वॉकेथॉन वॉक फॉर वॉटरला मिळालेला प्रतिसाद या अभियानाला निश्चितच नवे बळ देणारा आहे. एका दिवसाच्या उपक्रमापुरता मर्यादित न राहता जलसंधारणाचा संदेश प्रत्येक गावापर्यंत आणि प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मंत्री संजय राठोड यांनी केले.

 

'माती वाचली तर शेती वाचेल, पाणी जपले तर भविष्यातील पिढ्यांचे जीवन सुरक्षित होईल. जलसंधारणाची जबाबदारी शासनासोबतच समाजाचीही आहे. वॉक फॉर वॉटरमधून महाराष्ट्राने दिलेला संदेश आता प्रत्यक्ष कृतीत उतरवून जलसंधारणाची लोकचळवळ अधिक व्यापक करूया,' असे मंत्री राठोड यांनी सांगितले.

0000

जलसंधारण अभियानाला जनसहभागाचे बळ १५

 जलसंधारण अभियानाला जनसहभागाचे बळ

 १५ ऑगस्ट २०२६ ते २६ जानेवारी २०२७ या कालावधीत राज्यात जलसंधारण अभियानराबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून गावागावांत जलसंधारण, पाणलोट विकास, जलस्रोतांचे पुनरुज्जीवन, गाळ काढणे, भूजल पुनर्भरण आणि मृदसंवर्धनाच्या कामांना गती देण्यात येणार आहे. तसेच अभियानादरम्यान काही निवडक गावांमध्ये जलशोषक खड्डे तयार करण्याचे उद्दिष्ट देण्यात येणार आहे.

 

महा वॉकेथॉन वॉक फॉर वॉटरला मिळालेला प्रतिसाद या अभियानाला निश्चितच नवे बळ देणारा आहे. एका दिवसाच्या उपक्रमापुरता मर्यादित न राहता जलसंधारणाचा संदेश प्रत्येक गावापर्यंत आणि प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मंत्री संजय राठोड यांनी केले.

 

'माती वाचली तर शेती वाचेल, पाणी जपले तर भविष्यातील पिढ्यांचे जीवन सुरक्षित होईल. जलसंधारणाची जबाबदारी शासनासोबतच समाजाचीही आहे. वॉक फॉर वॉटरमधून महाराष्ट्राने दिलेला संदेश आता प्रत्यक्ष कृतीत उतरवून जलसंधारणाची लोकचळवळ अधिक व्यापक करूया,' असे मंत्री राठोड यांनी सांगितले.

Monday, 24 August 2026

जलसंधारणाच्या योजनांना लोकसहभागाची जोड

 जलसंधारणाच्या योजनांना लोकसहभागाची जोड


राज्यात ‘जलयुक्त शिवार अभियान २.०’, ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’, ‘अमृत सरोवर’, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना आदी विविध माध्यमांतून जलसंधारणाची कामे राबविण्यात येत आहेत. या योजनांच्या उद्देशांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासोबतच जलसंधारणाच्या कामांमध्ये लोकसहभाग वाढविण्यासाठी ‘वॉक फॉर वॉटर’ प्रभावी माध्यम ठरले आहे.

पावसाचे पाणी अडविणे, जमिनीत मुरविणे, भूजल पुनर्भरण वाढविणे, जलस्रोतांचे संवर्धन करणे आणि मातीची धूप रोखणे यासाठी नागरिकांनी सक्रिय सहभाग घेणे आवश्यक आहे. शासनाच्या प्रयत्नांना लोकसहभागाची जोड मिळाल्यास जलसंधारणाची कामे अधिक परिणामकारक आणि शाश्वत होतील, असे मंत्री संजय राठोड यांनी सांगितले.


 

Featured post

Lakshvedhi