Saturday, 15 August 2026

१९९१ ते १९९३ या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी घेतलेले अनेक निर्णय आजही दिशादर्शक ठरतात

 १९९१ ते १९९३ या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी घेतलेले अनेक निर्णय आजही दिशादर्शक ठरतात. ग्रामीण भागातील रोजगार निर्मिती आणि जलसंधारणाची कामे यांची सांगड घालून त्यांनी जलस्रोत निर्मितीला चालना दिली. जलसंधारण हे केवळ अभियांत्रिकीचे काम नसून गावागावातील नागरिकांच्या सहभागातून उभे राहणारे अभियान आहे, ही भूमिका त्यांच्या कार्यातून स्पष्ट झाली. आज जलयुक्त शिवार, भूजल पुनर्भरण, पाणलोट विकास यांसारख्या विविध उपक्रमांमध्ये त्यांच्या विचारांचे प्रतिबिंब दिसून येते.

            याच योगदानाची दखल घेत दिवंगत सुधाकरराव नाईक यांचा स्मृतिदिन १० मे हा २००३ पासून जलसंधारण दिन म्हणून साजरा केला जात होता. मात्र, स्मृतिदिनाऐवजी जन्मदिवस अधिक उत्साहपूर्ण आणि लोकसहभागातून साजरा व्हावा, या विचारातून मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी विभागातील अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि संबंधित घटकांशी चर्चा करून २१ ऑगस्ट हा दिवस जलसंधारण दिन म्हणून साजरा करण्यासाठी पुढाकार घेतला. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी यास मान्यता दिल्यानंतर शासनाने त्याबाबतचा निर्णय घेतला. त्यामुळे यापुढे दरवर्षी २१ ऑगस्ट हा दिवस महाराष्ट्राच्या जलसंधारण चळवळीचा महत्त्वपूर्ण दिवस ठरणार आहे.


माती वाचवा, पाणी जपा, सुरक्षित भविष्य घडवा

 माती वाचवा, पाणी जपा, सुरक्षित भविष्य घडवा

महाराष्ट्राच्या विकासाच्या वाटचालीत माती आणि पाणी या दोन नैसर्गिक संसाधनांचे अनन्यसाधारण महत्व आहे. शेती, ग्रामीण अर्थव्यवस्था, पर्यावरण आणि मानवी जीवन यांचा थेट संबंध या दोन्ही घटकांशी आहे. त्यामुळे मातीचे संवर्धन आणि पाण्याचे शाश्वत व्यवस्थापन ही केवळ शासनाची जबाबदारी न राहता ती व्यापक लोकचळवळ बनणे ही काळाची गरज आहे. याच विचारातून राज्यात यंदा २१ ऑगस्ट हा ‘जलसंधारण दिन’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे. माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त साजरा होणारा हा दिवस त्यांच्या जलसंधारणविषयक दूरदृष्टीला अभिवादन करण्याबरोबरच महाराष्ट्राच्या जलसुरक्षित भविष्यासाठी नव्या संकल्पाची सुरुवात ठरणार आहे.

दिवंगत सुधाकरराव नाईक यांनी मुख्यमंत्री म्हणून काम करताना राज्यासमोरील दुष्काळ आणि पाणीटंचाईचे आव्हान केवळ मोठ्या धरणांच्या माध्यमातून सोडविता येणार नाही, हे ओळखले. पावसाचा प्रत्येक थेंब अडविणे, तो जमिनीत मुरविणे आणि स्थानिक पातळीवरील जलस्रोतांचे पुनरुज्जीवन करणे आवश्यक आहे, या भूमिकेतून त्यांनी ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ हा मूलमंत्र दिला. पाणलोट विकास, भूजल पुनर्भरण, पाझर तलाव, गाव तलाव, नाला बांध, माती बंधारे आणि अन्य छोट्या जलसंधारण संरचनांवर त्यांनी भर दिला. जलसंधारणाला स्वतंत्र प्रशासकीय दिशा देत त्यांनी या विषयाला लोकसहभागाची जोड दिली.

१५ ऑगस्ट रोजी दुपारी १.३० वाजता होणाऱ्या या जनसंवादातून गावागावातील आरोग्यविषयक प्रश्न, सूचना आणि अपेक्षा थेट

 १५ ऑगस्ट रोजी दुपारी १.३० वाजता होणाऱ्या या जनसंवादातून गावागावातील आरोग्यविषयक प्रश्न, सूचना आणि अपेक्षा थेट आरोग्यमंत्री यांच्यापर्यंत पोहोचणार असून त्याचवेळी राज्यातील विविध नवीन आरोग्य संस्थांचे ऑनलाइन उद्घाटनही करण्यात येणार आहे. निरोगी महाराष्ट्रासाठी शासन, आरोग्य यंत्रणा आणि समाज यांची भागीदारी अधिक मजबूत करण्यासाठी होणारा जनसंवाद आरोग्य क्षेत्रातील लोकसहभागाला नवी दिशा देणारा ठरणार आहे.

स्वातंत्र्यदिनी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांचा गावागावातील आरोग्य समित्यांच्या सदस्यांशी थेट ऑनलाइन जनसंवाद

 स्वातंत्र्यदिनी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांचा गावागावातील

आरोग्य समित्यांच्या सदस्यांशी थेट ऑनलाइन जनसंवाद

·         आरोग्य व्यवस्थेमध्ये लोकसहभाग वाढविण्यावर भर

·         राज्यातील १२४ आरोग्य संस्थांचे होणार ऑनलाईन उद्घाटन

 

मुंबई, दि. १४ :- गावपातळीवरील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम, लोकाभिमुख आणि प्रभावी करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्यभरातील विविध आरोग्य समित्यांच्या अशासकीय सदस्यांशी थेट ऑनलाइन जनसंवाद साधणार आहेत. या माध्यमातून आरोग्य व्यवस्थेमध्ये लोकसहभाग वाढविण्यावर भर राहणार असून राज्यातील १२४ आरोग्य संस्थांचे ऑनलाईन उद्घाटनही आरोग्यमंत्री करणार आहेत.

 

१५ ऑगस्ट रोजी दुपारी १.३० वाजता होणाऱ्या या जनसंवादातून गावागावातील आरोग्यविषयक प्रश्न, सूचना आणि अपेक्षा थेट आरोग्यमंत्री यांच्यापर्यंत पोहोचणार असून त्याचवेळी राज्यातील विविध नवीन आरोग्य संस्थांचे ऑनलाइन उद्घाटनही करण्यात येणार आहे. निरोगी महाराष्ट्रासाठी शासन, आरोग्य यंत्रणा आणि समाज यांची भागीदारी अधिक मजबूत करण्यासाठी होणारा जनसंवाद आरोग्य क्षेत्रातील लोकसहभागाला नवी दिशा देणारा ठरणार आहे.

 

आरोग्य सेवांची गुणवत्ता, विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी, नागरिकांचा आरोग्य व्यवस्थेतील सहभाग आणि स्थानिक पातळीवरील आरोग्यविषयक अडचणी याबाबत या जनसंवादातून थेट चर्चा होणार आहे. निवडक पाच समिती सदस्यांना आपले मनोगत मांडण्याची संधी मिळणार असून, त्यानंतर आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर मार्गदर्शन करणार आहेत.

 

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या ग्राम आरोग्य, स्वच्छता व पोषण समिती, जन आरोग्य समिती, रुग्ण कल्याण समिती आणि एकात्मिक आरोग्यवर्धिनी समिती या समित्या शासन आणि नागरिक यांच्यातील महत्त्वाचा दुवा आहेत. या समित्यांमध्ये आरोग्य यंत्रणांसोबत ग्रामपंचायत प्रतिनिधी, महिला प्रतिनिधी, युवक, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध घटकांचा सहभाग असतो.

महिलांसाठी प्रशिक्षण आणि शाश्वत रोजगार

 महिलांसाठी प्रशिक्षण आणि शाश्वत रोजगार

आयपीई ग्लोबलचे मुख्य संचालन अधिकारी एम. के. पद्म कुमार

महिलांचे आर्थिक सक्षमीकरण केवळ कौशल्य विकासाने साध्य होऊ शकत नाही, तर त्यासाठी प्रशिक्षण आणि शाश्वत रोजगार यांच्यात जाणीवपूर्वक, सुसूत्रपणे जोडलेला दुवा असणे आवश्यक आहे असं आम्ही आयपीई ग्लोबलच्या पातळीवर नेहमीच मानत आले आहोत. आयपीई ग्लोबल आणि महाराष्ट्र शासन यांच्यातील ही भागीदारी त्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. भारतभरातील राज्य सरकारांसोबत जवळून काम करण्याच्या आमच्या अनुभवातून आम्हाला हे दिसून आले आहे की, जेव्हा विविध विभाग एका समान उद्दिष्टाभोवती एकत्र येतात, आणि योग्य तांत्रिक सहाय्य व उत्तरदायित्वाआर्थिक स्थैर्याबरोबरच   त्यांना सुरक्षित, सन्मानजनक आणि दीर्घकाळ टिकणारा रोजगार मिळावा, यासाठी राज्यासोबत काम करण्यास आम्ही उत्सुक आहोत.

0000

महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करणे शासनाचे उद्दिष्ट:

 महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करणे शासनाचे उद्दिष्ट:

कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नावीन्यता विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा

अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा म्हणाल्या की,महिलांचे आर्थिक सक्षमीकरण आणि त्यांना शाश्वत रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हे राज्य शासनाचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. आयपीई ग्लोबल लिमिटेडसोबतची ही भागीदारी महाराष्ट्रातील तरुणींना कौशल्य प्रशिक्षणापासून रोजगारापर्यंतचा प्रभावी मार्ग उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरेल. राज्यातील विविध विभागांमध्ये समन्वय साधून महिलांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्यावर भर दिला जाईल. खासगी क्षेत्रातील उद्योगांनी महिलांना रोजगार देण्याबरोबरच सुरक्षित, सर्व समावेशक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. प्रशिक्षण, वसतिगृहे सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी  शासन प्रयत्नशील आहे. २०३० पर्यंत तीन लाख तरुणींना  रोजगार उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्व संबंधित घटकांचे सहकार्य घेतले जाईल. या अभियानामुळे महिलांचा रोजगारात सहभाग वाढून त्यांच्या आर्थिक स्वावलंबनाला आणि राज्याच्या सर्वसमावेशक विकासाला चालना मिळेल.

मराठवाड्याला दुष्काळमुक्त करु

 मराठवाड्याला दुष्काळमुक्त करु

                                                        -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली
  • युवाशक्तीच्या योगदानातून घडेल विकसित भारत;

 

छत्रपती संभाजीनगर, दि.१४- युवाशक्तीचे नवसंशोधनात मोठे योगदान आहे. त्या सामर्थ्यावर उद्याचा विकसित भारत, विकसित महाराष्ट्र घडेल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आपला देश बलशाली व संपन्न देश म्हणून जगात लौकीक प्राप्त करीत आहे. मराठवाडासुद्धा सुजलाम सुफलाम करुन दुष्काळमुक्त करु, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

 

            हर घर तिरंगा अभियानअंतर्गत महात्मा जोतिबा फुले पुतळा संभाजीपेठ ते क्रांती चौक दरम्यान आयोजित भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. त्यात मुख्यमंत्री फडणवीस सहभागी झाले होते.  या रॅलीत विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, इमाव कल्याण मंत्री अतुल सावे, रोहयो व पणन मंत्री जयकुमार रावल, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, खा. अशोक चव्हाण, खा.स्मिता वाघ, आमदार रवींद्र चव्हाण, आ. प्रशांत बंब,आ. अनुराधा चव्हाण, आ.मंगेश चव्हाण, आ. राम भदाणे तसेच महापौर समीर राजुरकर आदी मान्यवर तसेच उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यातील लोकप्रतिनिधी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

महात्मा फुले व सावित्रीमाई फुले यांच्या पुतळ्यास मुख्यमंत्री फडणवीस यांनी अभिवादन केले. त्यानंतर रॅलीस सुरुवात झाली. रॅलीचा समारोप क्रांती चौकात झाला. तेथे उपस्थित जनसमुदायास संबोधित करतांना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, तिरंगा आमची आन बान आणि शान आहे. ह्या तिरंग्यासाठी हजारो लोकांनी बलिदान दिले. हा तिरंगा हिच आमची खरी ओळख आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी संदेश दिला, ९ ते १५ ऑगस्ट पर्यंत तिरंगा यात्रा काढून देशप्रेमाने ओत प्रोत मातृभूमीचे दर्शन घडवू. त्यानुसार आज हा जनसमुदाय तिरंग्याच्या प्रेमासाठी एकत्र आला आहे.आज छत्रपती संभाजीनगर मध्ये तिरंगा रॅली गर्दीचे रेकॉर्ड तोडले, तिरंग्याचे वादळ मला दिसते आहे,अशा शब्दात त्यांनी छत्रपती संभाजीनगरवासियांचे कौतुक केले.

 

मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, प्रधानमंत्री मोदींच्या नेतृत्वात गेल्या दशकात देशाला प्रगतीपथावर नेले. जगात बलशाली देश म्हणून ओळख निर्माण झाली, जगात ४ थ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून स्थान निर्माण केलं. आपल्या राज्याची अर्थ व्यवस्था ५० लाख कोटीपर्यंत नेली. देश बदलतोय, राज्य बदलतंय, मराठवाडाही बदलतोय. आमचा संकल्प आहे मराठवाड्याच्या पुढच्या पुढीला दुष्काळ पाहू देणार नाही. कोकणातून समुद्रात वाहून जाणारे पाणी उजनी मार्गे मराठवाड्यात आणून इथला भाग सुजलाम सुफलाम करू. आपण तिसरी स्टार्ट अप इको सिस्टीम तयार केली. त्यात तरुणाईचे योगदान मोठे आहे. नव संशोधनात तरुणाई अग्रेसर आहे. त्याबळावरच आपला भारत विकसित भारत म्हणून वाटचाल करीत आहे, असा संदेश त्यांनी दिला.

 

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सर्वोत्तम संविधान दिलं. आपल्या हक्कासोबत कर्तव्य लक्षात ठेवावी आणि उत्तम नागरिक बनावे, असे उत्तम नागरिक बनून समाजाची ताकद बना. आपल्या मराठवाड्याला देशापेक्षा १३ महिने उशिरा स्वातंत्र्य मिळालं. निजामच्या राजवटीतून मोकळा श्वास घेण्यासाठी हजारो देशभक्तांनी बलिदान दिलं. त्यांचे स्मरण आपण करू. आज आपण एकप्रतिज्ञा करू. आपल्या देशासाठी, राज्यासाठी समाजासाठी जगू.

 

सभास्थानी प्रारंभी वंदेमातरम, राज्यगीत झाले व राष्ट्रगीताने सभेचा समारोप झाला. या रॅलीत मोठ्या संख्येने स्वातंत्र्य सैनिक, राजकीय सामाजिक कार्यकर्ते, युवक, युवती सहभागी झाले होते. रॅलीत सहभागी विविध कलापथक, ढोल लेझीम पथकांनी, संबळ वाद्य पथकांनी लक्ष वेधून घेतले. देशभक्तीपर घोषणांनी रॅली मार्गाचा परिसर दुमदुमून गेला होता.

0000

 


 

Featured post

Lakshvedhi