Thursday, 23 July 2026

शाळांमध्ये पायाभूत सुविधा आणि हरित ऊर्जा उपक्रम

 शाळांमध्ये पायाभूत सुविधा आणि हरित ऊर्जा उपक्रम

            ग्रामीण भागातील शाळांमध्ये सुरक्षित पिण्याचे पाणी, स्वच्छता आणि सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी व्यापक पायाभूत सुविधा उभारण्यात आल्या आहेत. २७ आरओ पाणी शुद्धीकरण यंत्रणा, १२ स्वच्छतागृहे अनेक शाळांमध्ये संरक्षक भिंती, पेव्हिंग ब्लॉक आणि अन्य सुविधा उभारण्यात आल्या आहेत.

            हरित ऊर्जेला चालना देण्यासाठी ६० किलोवॅट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात आला असून, त्यामुळे ग्रामपंचायतीच्या वीज खर्चात दरवर्षी मोठी बचत होत आहे. तसेच विविध वाड्यांमध्ये सौर पथदिवे बसविण्यात आल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेतही वाढ झाली आहे.


ग्रामीण क्रीडा विकासाला नवी दिशा

 ग्रामीण क्रीडा विकासाला नवी दिशा

            'खेलो इंडिया' अभियानाशी सुसंगत 'शुभ आरंभ स्पोर्ट्स फॉर एक्सलन्स' या उपक्रमातून ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा संस्कृती रुजविण्याचे काम करण्यात आले आहे. फुटबॉल आणि कबड्डीसारख्या खेळांमध्ये विद्यार्थ्यांना नियमित प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षक, जीवनकौशल्य प्रशिक्षक आणि स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

            गेल्या दशकात सुमारे ९ हजार विद्यार्थ्यांना विविध क्रीडा प्रशिक्षणाचा लाभ मिळाला असून, त्यामध्ये मुलींचा सहभाग जवळपास ५० टक्के आहे. परिसरात १० क्रीडांगणे विकसित करण्यात आली आहेत. शालेय स्तरापासून राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांसाठी विद्यार्थ्यांना सक्षम करण्याचे कार्य सुरू आहे.n

Wednesday, 22 July 2026

ग्रामीण क्रीडा विकासाला नवी दिशा

 ग्रामीण क्रीडा विकासाला नवी दिशा

            'खेलो इंडिया' अभियानाशी सुसंगत 'शुभ आरंभ स्पोर्ट्स फॉर एक्सलन्स' या उपक्रमातून ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा संस्कृती रुजविण्याचे काम करण्यात आले आहे. फुटबॉल आणि कबड्डीसारख्या खेळांमध्ये विद्यार्थ्यांना नियमित प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षक, जीवनकौशल्य प्रशिक्षक आणि स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

            गेल्या दशकात सुमारे ९ हजार विद्यार्थ्यांना विविध क्रीडा प्रशिक्षणाचा लाभ मिळाला असून, त्यामध्ये मुलींचा सहभाग जवळपास ५० टक्के आहे. परिसरात १० क्रीडांगणे विकसित करण्यात आली आहेत. शालेय स्तरापासून राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांसाठी विद्यार्थ्यांना सक्षम करण्याचे कार्य सुरू आहे.

आरोग्य सुविधांचे बळकटीकरण; लाखो नागरिकांना लाभ

 आरोग्य सुविधांचे बळकटीकरण; लाखो नागरिकांना लाभ

            आरोग्य क्षेत्रात आयुष्मान भारत अभियानाशी सुसंगत पद्धतीने ५० हेल्थ अँड वेलनेस सेंटरचे आधुनिकीकरण व सक्षमीकरण करण्यात आले असून, त्याचा सुमारे ३.२ लाख नागरिकांना थेट लाभ झाला आहे. अॅनिमियामुक्त भारत अभियानाअंतर्गत महिलांमध्ये आणि किशोरवयीन मुलींमध्ये रक्तक्षय ओळखण्यासाठी विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. या माध्यमातून सुमारे ५ हजार उच्च जोखमीच्या गर्भवती महिलांची ओळख करून त्यांना विशेष उपचारासाठी संदर्भित करण्यात आले, तर एक हजारांहून अधिक पाच वर्षांखालील बालकांना प्रगत उपचारासाठी पाठविण्यात आले.

            २२६ आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन नवजात बालकांची घरपोच आरोग्य तपासणी, उच्च जोखमीच्या रुग्णांची ओळख आणि प्राथमिक आरोग्य सेवा अधिक प्रभावी करण्यात आली. आरोग्य जनजागृतीसाठी विविध विशेष आरोग्य शिबिरे तसेच जागतिक आरोग्य, क्षयरोग, मातृत्व आणि योग दिन साजरा करण्यात आला.

मोंडेलेज इंडियाच्या ‘शुभ आरंभ’ या प्रमुख सामाजिक

 मोंडेलेज इंडियाच्या शुभ आरंभया प्रमुख सामाजिक उपक्रमांतर्गत गेल्या १३ वर्षांपासून पुणे जिल्ह्यातील मावळ आणि खेड तालुक्यातील ६० गावांमध्ये स्थानिक गरजांनुसार आरोग्य, पोषण, शिक्षण, जलसंधारण, पर्यावरण संवर्धन, क्रीडा आणि समुदाय विकासासाठी विविध उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांमुळे हजारो कुटुंबांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडून आला असून, शासनाच्या विविध योजनांनाही प्रभावी पूरक बळ मिळाले आहे.

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ

 उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून विकसित महाराष्ट्रच्या ध्येयाला बळ

-         मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

·         पुणे जिल्ह्यातील मावळ व खेड परिसरात शुभ आरंभउपक्रमातून उल्लेखनीय परिवर्तन

 

            मुंबई, दि. २२ : राज्य शासनाच्या सर्वसमावेशक विकासाच्या धोरणाला उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वाची प्रभावी साथ लाभत आहे. शासन आणि उद्योग क्षेत्राच्या भागीदारीतून ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साध्य होत आहे. अशा उपक्रमांमुळे विकसित महाराष्ट्र २०४७ या राज्याच्या ध्येयाला बळ मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

            मुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस म्हणाले, राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांना पूरक ठरणारे उद्योगांचे सामाजिक उत्तरदायित्वाचे उपक्रम ग्रामीण भागातील नागरिकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवत आहेत. आरोग्य, पोषण, जलसुरक्षा, पर्यावरण संवर्धन, क्रीडा आणि शालेय पायाभूत सुविधा या क्षेत्रांमध्ये सातत्यपूर्ण काम करणारे उपक्रम समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत.

            मोंडेलेज इंडियाच्या शुभ आरंभया प्रमुख सामाजिक उपक्रमांतर्गत गेल्या १३ वर्षांपासून पुणे जिल्ह्यातील मावळ आणि खेड तालुक्यातील ६० गावांमध्ये स्थानिक गरजांनुसार आरोग्य, पोषण, शिक्षण, जलसंधारण, पर्यावरण संवर्धन, क्रीडा आणि समुदाय विकासासाठी विविध उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांमुळे हजारो कुटुंबांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडून आला असून, शासनाच्या विविध योजनांनाही प्रभावी पूरक बळ मिळाले आहे.

कंटूर सर्व्हे पूर्ण होताच भूसंपादन, रस्ते, पाणीपुरवठा आणि अन्य पायाभूत सुविधांच्या

 मंडणगड येथे प्रस्तावित औद्योगिक क्षेत्रासाठी सुरुवातीला १०० एकर क्षेत्राचा प्रस्ताव होता. त्यामध्ये वाढ करून सुमारे १५० एकर क्षेत्रात पहिल्या टप्प्यात औद्योगिक क्षेत्र विकसित करण्याचा निर्णय बैठकीत कायम ठेवण्यात आला. यासाठी करण्यात आलेल्या कंटूर सर्व्हेचा अंतिम अहवाल प्राप्त करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

 

डॉ. सामंत यांनी सांगितले की, कंटूर सर्व्हे पूर्ण होताच भूसंपादन, रस्ते, पाणीपुरवठा आणि अन्य पायाभूत सुविधांच्या विकासाची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात यावी. दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रकल्पाला आता गती देणे आवश्यक असून कोणत्याही प्रशासकीय कारणामुळे कामे रखडू नयेत, असेही त्यांनी सांगितले.

 

बैठकीत मंडणगडच्या भौगोलिक स्थानाचा लाभ घेत मोठ्या उद्योगांना आकर्षित करण्याबाबतही चर्चा झाली. रायगड जिल्ह्याच्या औद्योगिक पट्ट्याला लागून असल्याने मंडणगडमध्ये उद्योगविकासाची मोठी क्षमता असून गुंतवणूकदारांशी सकारात्मक संवाद साधून उद्योग उभारणीसाठी आवश्यक सर्व सहकार्य देण्यात येईल, असे डॉ. सामंत यांनी सांगितले. तसेच उद्योग उभारणीसाठी आवश्यक प्रोत्साहन, सवलती आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनामार्फत आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असेही उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी यावेळी स्पष्ट केले.

Featured post

Lakshvedhi