Sunday, 16 August 2026

राज्यात १,४४० डॉक्टरांची लवकरच नियुक्ती

 राज्यात १,४४० डॉक्टरांची लवकरच नियुक्ती

- आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

- आरोग्यमंत्र्यांनी साधला सहा लाखाहून अधिक नागरिकांची जनसंवाद

 

मुंबई, दि. १६ : राज्यात उपलब्ध झालेल्या १,४४० डॉक्टरांची येत्या काही दिवसांत नियुक्ती करण्यात येणार आहे. आणखी ६०० डॉक्टरांसाठी जाहिरात काढण्यात येत असून, सुमारे २५० दंतचिकित्सकही लवकरच आरोग्य सेवेसाठी उपलब्ध होतील, अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली. आरोग्य व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या महिला आरोग्य समिती, जन आरोग्य समिती आणि रुग्णकल्याण समितीच्या सदस्यांशी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी ऑनलाइन पद्धतीने जन आरोग्य संवादसाधला. आरोग्य समित्यांच्या माध्यमातून आतापर्यंत सहा लाखांहून अधिक नागरिकांशी संवाद साधण्यात आला आहे. भविष्यात आणखी चार लाख नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या आरोग्यविषयक समस्या जाणून घेत त्या सोडविण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री श्री. आबिटकर यांनी सांगितले.

या संवादात आरोग्य समित्यांच्या बैठका नियमित होतात का, डॉक्टर वेळेवर उपस्थित राहतात का, डॉक्टरांचा रुग्णांशी योग्य संवाद होतो का आणि रुग्णालयांमध्ये आवश्यक सेवा उपलब्ध आहेत का, याची थेट माहिती घेण्यात आली. स्थानिक पातळीवरील अडचणी समजून घेऊन त्यावर तातडीने उपाययोजना करण्यावर भर दिला जाणार आहे. आरोग्य व्यवस्था कागदावर नव्हे, तर प्रत्यक्ष रुग्णालयात आणि नागरिकांच्या अनुभवातून दिसली पाहिजे, असे आरोग्यमंत्री श्री. आबिटकर यांनी स्पष्ट केले.


राज्यातील १२४ आरोग्य संस्थांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण ‘निरोगी महाराष्ट्र-सुदृढ महाराष्ट्र’चा संकल्प -

 राज्यातील १२४ आरोग्य संस्थांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण

 

निरोगी महाराष्ट्र-सुदृढ महाराष्ट्रचा संकल्प

- सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

 

मुंबई, दि. १६ : ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या स्तरावर महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आर्थिक परिस्थितीमुळे राज्यातील कोणताही गरीब रुग्ण उपचारांपासून वंचित राहू नये, हा शासनाचा प्रयत्न आहे. खासगी रुग्णालयांमध्ये उपलब्ध असलेल्या आधुनिक सुविधांच्या धर्तीवर सार्वजनिक आरोग्य विभागातील रुग्णालये अद्ययावत करण्यात येतील. निरोगी महाराष्ट्र-सुदृढ महाराष्ट्रघडविण्यासाठी आरोग्य विभाग अधिक सक्षम व लोकाभिमुख केला जाईल, असे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले.

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत राज्यात नव्याने उभारण्यात आलेल्या १२४ आरोग्य संस्थांचे तसेच विविध रुग्णालये व आरोग्य सुविधांच्या बळकटीकरणाच्या कामांचे लोकार्पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने करण्यात आले. त्यावेळी आरोग्यमंत्री               श्री. आबिटकर बोलत होते. आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्यासह लोकप्रतिनिधी व आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी ऑनलाइन उपस्थित होते.

आरोग्यमंत्री श्री. आबिटकर म्हणाले, १२४ आरोग्य संस्थांचे लोकार्पण हा सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दृष्टीने संस्मरणीय क्षण आहे. वैद्यकीय यंत्रसामग्रीच्या अभावामुळे काही ठिकाणी आरोग्य संस्था पूर्ण क्षमतेने कार्यरत नव्हत्या. अशा संस्था पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी शासनाने विशेष प्रयत्न केले आहेत.

२० हजार युवकांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट

 २० हजार युवकांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट

             महाराष्ट्रातील विविध आयटीआयमध्ये हा उपक्रम अधिक व्यापक करून २० हजारांहून अधिक युवकांना रोजगारक्षम कौशल्यांचे प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट उन्नतीने ठेवले आहे. राज्यातील युवकांना रोजगारासाठी अधिक सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने हा उपक्रम पुढे नेण्याची अपेक्षा संस्थेने व्यक्त केली आहे. राज्यातील आयटीआयमध्ये या उपक्रमाचा विस्तार करण्यासाठी सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

000000

रोजगारक्षम कौशल्यांवर भर

 रोजगारक्षम कौशल्यांवर भर

              या उपक्रमात प्रामुख्याने रोजगारक्षम कौशल्यांवर लक्ष केंद्रित केले जाते. तांत्रिक कौशल्यांचे प्रशिक्षण संबंधित आयटीआय व संस्थांकडून दिले जात असल्याने उन्नतीकडून संवादकौशल्य, कार्यस्थळावरील आवश्यक कौशल्ये, व्यक्तिमत्त्व विकास, रोजगारासाठीची तयारी आदी रोजगारक्षम कौशल्यांच्या विकासावर भर दिला जात आहे. महाराष्ट्रातील विविध आयटीआयमध्ये राबविण्यात आलेल्या या प्रशिक्षण उपक्रमाबाबत संबंधित संस्थांकडून अभिप्राय घेऊन त्याच्या परिणामकारकतेचे मूल्यांकन करण्यात यावे, अशी अपेक्षा उन्नतीने व्यक्त केली आहे.

कंपन्यांकडून उपलब्ध होणाऱ्या निधीच्या माध्यमातून शासकीय संस्थांमधील युवकांना

 मोफत प्रशिक्षणाची सुविधा

            कंपन्यांकडून उपलब्ध होणाऱ्या निधीच्या माध्यमातून शासकीय संस्थांमधील युवकांना हे प्रशिक्षण पूर्णपणे मोफत दिले जात आहे. इन्फोसिस एक्समोबील यांसारख्या कंपन्यांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम व्यापक स्तरावर राबविणे शक्य होत असल्याचे संस्थेने नमूद केले आहे.

             ‘उन्नतीही सोशल स्टॉक एक्स्चेंजवर नोंदणी व सूचीबद्ध होणारी देशातील पहिली स्वयंसेवी संस्था असल्याचे संस्थेने स्पष्ट केले आहे. संस्थेच्या कार्यपद्धतीमध्ये पारदर्शकता असून, युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी त्यांच्या सक्षमीकरणावर विशेष भर दिला जात असल्याचे सांगण्यात आले.                  

महाराष्ट्रातील १,३९९ आयटीआय विद्यार्थ्यांना ‘उन्नती’कडून रोजगारक्षम कौशल्य प्रशिक्षण मिळणार

 महाराष्ट्रातील १,३९९ आयटीआय विद्यार्थ्यांना उन्नतीकडून

रोजगारक्षम कौशल्य प्रशिक्षण मिळणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

          मुंबई, दि. १४ : महाराष्ट्रातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये युवकांच्या रोजगारक्षमतेत वाढ करण्यासाठी उन्नतीसंस्थेकडून व्यापक कौशल्य प्रशिक्षण उपक्रम राबविण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा प्रभावीपणे राबवत आहेत. या उपक्रमांतर्गत राज्यातील विविध शासकीय आयटीआय व शासकीय तंत्रनिकेतनांमधील १,३९९ युवकांना १६५ तासांहून अधिक काळ रोजगारक्षम कौशल्यांचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. या प्रशिक्षणामध्ये संस्थेच्या लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीमचा देखील समावेश आहे.

       छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय आयटीआयमधील ३२६ युवकांना या प्रशिक्षणाचा सर्वाधिक लाभ झाला आहे. त्यानंतर सोलापूर येथील २०४, आरटीएम शासकीय आयटीआय, मोजरी येथील ९३, जरिपटका येथील ८१, बुलडाणा व एससीपी आयटीआय, किले आर्क, छत्रपती संभाजीनगर येथील प्रत्येकी ७२, धामणगाव-अमरावती येथील ७१ आणि अक्कलकोट येथील ६८ युवकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

          याशिवाय बल्लारपूर ६७, कोल्हापूर ६३, सेलू ५६, मौदा ३९, पार्टूर ३०, कराड ३०, गोंदिया २९, शासकीय आयटीआय (महिला), अकोला २८, शासकीय तंत्रनिकेतन, सामनगाव, नाशिक २६, पिंपरी-चिंचवड २३ आणि अकोला येथील २१ युवकांनी प्रशिक्षण घेतले आहे. अशा प्रकारे १३९९ युवकांनी प्रशिक्षण घेतले आहे.

माती आणि पाण्याच्या संवर्धनासाठी ‘रील’मधून जनजागृती 15 ते 19 ऑगस्टदरम्यान ‘रील फॉर सॉइल अँड वॉटर कॉन्झर्वेशन’ स्पर्धा - स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होणाचे आवाहन

 माती आणि पाण्याच्या संवर्धनासाठी रीलमधून जनजागृती

15  ते 19 ऑगस्टदरम्यान रील फॉर सॉइल अँड वॉटर कॉन्झर्वेशनस्पर्धा

-         स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होणाचे आवाहन

 

मुंबई, दि. १६ : माती आणि जलसंधारणाचा संदेश युवकांपर्यंत तसेच समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांत रील फॉर सॉइल अँड वॉटर कॉन्झर्वेशनही राज्यस्तरीय रील स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. १५ ते ३० वर्षे वयोगटातील युवक-युवतींना या स्पर्धेत सहभागी होता येणार असून १५ ते १९ ऑगस्टदरम्यान रील अपलोड करता येणार आहे

मृद व जलसंधारण विभागाचे https://www.instagram.com/mahawalkathon2026/?hl=en , Facebook- https://www.facebook.com/mahawalkathon2026/,Twitter https://x.com/MahaWalkathon26 हे सोशल मीडिया अकाऊंट आहेत.

स्पर्धकांनी ३० ते ६० सेकंदांची इन्स्टाग्राम रील तयार करून आपल्या पब्लिक इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करायची आहे. रीलच्या सुरुवातीला रीलचा उद्देश, स्वतःचे संपूर्ण नाव आणि जिल्ह्याचे नाव नमूद करणे आवश्यक आहे. मृद व जलसंधारण विभागाच्या अधिकृत https://www.instagram.com/mahawalkathon2026/?hl=en या इन्स्टाग्राम अकाउंटला टॅग करणे तसेच ‘#SaveSoilSaveWater’ हा हॅशटॅग वापरणे बंधनकारक आहे.

स्पर्धेसाठी अधिकृत क्यूआर तयार करण्यात आला आहे. क्यूआर स्कॅन केल्यानंतर नोंदणी रील लिंक सबमिट - जिल्हा निवडव्हेरिफिकेशन सहभाग प्रमाणपत्र अशी सोपी प्रक्रिया आहे. माती संवर्धन, पाणी बचत, मृदसंधारण, जलसंधारण, पावसाच्या पाण्याचे संकलन, शेततळे, बंधारे, पाणलोट क्षेत्र विकास, वृक्षारोपण, पर्यावरण संवर्धन तसेच गावातील यशस्वी मृद व जलसंधारणाची कामे या विषयांवर रील तयार करता येणार आहे.

स्टोरीटेलिंग, ॲक्टिंग, म्युझिक, डान्स, ॲनिमेशन, शॉर्ट फिल्म, बिफोर-आफ्टर आणि ड्रोन व्हिज्युअल्स यांसारख्या सर्जनशील पद्धतींचाही वापर करता येणार आहे. मात्र रीलचा मुख्य संदेश माती आणि पाणी संवर्धनाशी संबंधित असणे आवश्यक आहे.    

स्पर्धेचे परीक्षण विषय व संदेश, कल्पकता, प्रभावी सामाजिक संदेश, सादरीकरण व तांत्रिक गुणवत्ता तसेच इन्स्टाग्राम एंगेजमेंट या निकषांवर करण्यात येणार आहे. केवळ लाईक्स किंवा फॉलोअर्सच्या आधारे विजेत्यांची निवड केली जाणार नाही. तर संदेश महत्वाचा असणार आहे.

जिल्हास्तरावर प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे २५ हजार, १५ हजार आणि १० हजार रुपयांचे पुरस्कार देण्यात येणार आहेत. याशिवाय विजेत्यांना युवा मृद- जलदूतम्हणून सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देण्यात येणार असून उत्कृष्ट सहभागींना ई-सर्टिफिकेट देण्यात येणार आहे.

युवक, विद्यार्थी, इन्स्टाग्राम क्रिएटर्स, यूट्यूबर्स आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स यांनी या स्पर्धेत सहभागी होऊन माती आणि पाणी संवर्धनाचा संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवावा, असे आवाहन मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी केले.

Featured post

Lakshvedhi