Sunday, 6 September 2026

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

 महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

            मुंबई,दि. ५ : राज्य शासनाच्या वतीने सन २०२५ पासून महाराष्ट्रातील गणेशोत्सव हा 'महाराष्ट्राचा राज्य उत्सव' म्हणून साजरा करण्यात येत आहे. या राज्य उत्सवांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या 'महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६' साठी अर्ज सादर करण्याच्या मुदतीत वाढ करण्यात आल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केली आहे.

यावर्षीपासून देशभरातील आणि देशाबाहेरील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठीही स्वतंत्र बक्षिसे ठेवण्यात आली असून जास्तीत जास्त  गणेशोत्सव मंडळांना या स्पर्धेत सहभागी होता यावे, या उद्देशाने अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख शुक्रवार, ११ सप्टेंबर २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे.

या स्पर्धेसाठीचे अर्ज https://ganeshotsav.pldmka.co.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जात आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि तालुका, जिल्हा, राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील पारितोषिके पटकावावीत, असे आवाहन सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. शेलार यांनी केले आहे.

‘प्रकाशचित्रांतून लोककलावंतांचे स्मृतीवंदन’मधून लोककलेच्या समृद्ध वारशाला उजाळा डॉ. नितीन सोनवणे लिखित पुस्तकाचे ९ सप्टेंबर रोजी प्रकाशन शेखर निरंजन भाकरे व सहकलाकार सादर करणार सांस्कृतिक कार्यक्रम

 प्रकाशचित्रांतून लोककलावंतांचे स्मृतीवंदनमधून लोककलेच्या समृद्ध वारशाला उजाळा

डॉ. नितीन सोनवणे लिखित पुस्तकाचे ९ सप्टेंबर रोजी प्रकाशन

शेखर निरंजन भाकरे व सहकलाकार सादर करणार सांस्कृतिक कार्यक्रम

 

            मुंबई, दि. ५ : महाराष्ट्रातील समृद्ध लोककला, लोकपरंपरा आणि लोककलावंतांच्या कलाप्रवासाचे प्रकाशचित्रांच्या माध्यमातून दस्तऐवजीकरण करणाऱ्या डॉ. नितीन सोनवणे लिखित प्रकाशचित्रांतून लोककलावंतांचे स्मृतीवंदनया पुस्तकाचा प्रकाशन सोहळा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांच्या वतीने करण्यात आले आहे.

            बुधवार, ९ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ४ वाजता प्रभादेवी, मुंबई येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या करिष्मा सभागृह, ५ वा मजला येथे हा कार्यक्रम होणार आहे. या प्रसंगी डॉ. नितीन सोनवणे लिखित प्रकाशचित्रांतून लोककलावंतांचे स्मृतीवंदनया पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार असून, त्यानंतर शेखर निरंजन भाकरे आणि सहकलाकार यांच्याकडून विशेष सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे.

            महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये लोककला आणि लोकपरंपरांचे जतन व संवर्धन करणाऱ्या लोककलावंतांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांच्या कलासाधनेची, जीवनप्रवासाची आणि सांस्कृतिक योगदानाची प्रकाशचित्रांच्या माध्यमातून नोंद घेण्याचा प्रयत्न या पुस्तकातून करण्यात आला आहे. लोककलावंतांच्या कार्याचे स्मरण करण्यासोबतच महाराष्ट्राच्या लोककलेचा समृद्ध वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

            हा सांस्कृतिक उपक्रम सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील विविध लोककला, लोकपरंपरा आणि सांस्कृतिक वारशाचे दस्तऐवजीकरण, जतन, संवर्धन व प्रसार करण्याच्या उद्देशाने सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत सातत्याने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

            या कार्यक्रमास प्रवेश विनामूल्य आहे. कला, साहित्य, लोकपरंपरा आणि सांस्कृतिक क्षेत्रातील रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रकाशचित्रांतून लोककलावंतांचे स्मृतीवंदनया पुस्तक प्रकाशन सोहळ्यासह सांस्कृतिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक प्रशांत खेडेकर यांनी केले आहे

भारत-ब्राझील सांस्कृतिक संबंधांचे दृकश्राव्य सादरीकरण

 भारत-ब्राझील सांस्कृतिक संबंधांचे दृकश्राव्य सादरीकरण

            इतिहास आणि लोकजीवनाच्या समृद्ध परंपरेत संगीत, नृत्य, क्रीडा आणि उत्सव हे ओळख व सांस्कृतिक अभिव्यक्तीची प्रभावी माध्यमे ठरले आहेत. भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांच्या सांस्कृतिक परंपरांमध्ये असलेल्या साम्यस्थळांचे आणि दृढ भागीदारीचे दर्शन घडविणारे दृकश्राव्य सादरीकरण यावेळी उपस्थितांना दाखविण्यात आले.

            कार्यक्रमाच्या प्रभावी आयोजनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जान्हवी पवार आणि एपी ग्लोबल इम्पॅक्ट फोरम यांचे अभिनंदन केले. यावेळी विविध देशांचे राजदूत, उद्योग क्षेत्रातील वरिष्ठ प्रतिनिधी, अभ्यासक, समुदायाचे प्रतिनिधी, राजकीय नेते, विचारवंत तसेच उद्योग व व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

00000

ब्रिक्स राष्ट्रांमध्ये सहकार्याची नवी दालने खुली करण्याचा प्रयत्न

 ब्रिक्स राष्ट्रांमध्ये सहकार्याची नवी दालने खुली करण्याचा प्रयत्न

            संचालिका जान्हवी पवार यांनी ग्लोबल इम्पॅक्ट फोरमच्या व्यापक उद्दिष्टांची माहिती यावेळी दिली.

 सांस्कृतिक समानता आणि परस्पर सहकार्याच्या माध्यमातून ब्रिक्स राष्ट्रांमध्ये नव्या भागीदारीच्या संधी निर्माण करण्याबरोबरच जागतिक स्तरावर सकारात्मक आणि दीर्घकालीन परिणाम साध्य करण्यासाठी हा मंच महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

.

वसुधैव कुटुंबकम्’ ही भारताची जीवनदृष्टी

 वसुधैव कुटुंबकम्ही भारताची जीवनदृष्टी

            भारत हा जगातील प्राचीन संस्कृतींपैकी एक असून भारतीय संस्कृतीच्या मूलभूत विचारांचा पाया वसुधैव कुटुंबकम्या संकल्पनेत आहे. संपूर्ण विश्व एक असून संपूर्ण जग हे एक कुटुंब आहे, ही भारतीय जीवनदृष्टी आहे. भारताने आपल्या इतिहासात केवळ वस्तू आणि व्यापाराचा प्रसार केला नाही, तर विचार, ज्ञान आणि जीवनमूल्यांचाही जगभर प्रसार केला आहे, असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी नमूद केले.

            भारताचा जागतिक व्यापारातील ऐतिहासिक सहभाग महत्त्वपूर्ण राहिला असून व्यापाराबरोबरच भारतीय विचारांचा आणि जीवनमूल्यांचा विविध देशांवर प्रभाव पडलेला आहे. बौद्ध धर्म हे याचे महत्त्वपूर्ण उदाहरण आहे. भारतातून अनेक शतकांपूर्वी जगाच्या विविध भागांत पोहोचलेल्या या विचारधारेने मोठा प्रभाव निर्माण केला आहे. विशेष म्हणजे हा विचारांचा प्रसार युद्ध, संघर्ष किंवा हिंसेच्या माध्यमातून नव्हे, तर विचार आणि मूल्यांच्या प्रभावातून झालेला आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.

केवळ आर्थिक संबंध आणि व्यापाराच्या माध्यमातून जग अधिक चांगले होऊ

 मुख्यमंत्री म्हणाले की, सध्याच्या काळात जग अनेक स्तरांवर विखुरलेले असून जागतिक व्यवस्था विविध अर्थांनी असंतुलित झाल्याचे दिसून येते. अशा परिस्थितीत विविध देशांनी एकत्र येण्यासाठी उपलब्ध असलेल्या संधींचा शोध घेण्याची हीच योग्य वेळ आहे. संस्कृती ,मते आणि विचारधारा भिन्न असल्या तरी संवादाच्या माध्यमातून समान मूल्यांवर आधारित परस्पर समज वाढविणे शक्य आहे.

केवळ आर्थिक संबंध आणि व्यापाराच्या माध्यमातून जग अधिक चांगले होऊ शकत नाही. त्यासाठी मानवी मूल्यांवर आधारित संवाद, सांस्कृतिक देवाणघेवाण आणि परस्परांच्या अनुभवांतून शिकण्याची प्रक्रिया आवश्यक आहे. विविध देशांतील नागरिक, राजकीय नेते, राजनैतिक प्रतिनिधी, विचारवंत तसेच उद्योग व व्यावसायिक क्षेत्रातील नेतृत्वाने अशा व्यासपीठांवर एकत्र येऊन विचारांचे आदान-प्रदान करणे महत्त्वाचे आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

‘ग्लोबल इम्पॅक्ट फोरम २०२६’ (GIF) च्या दुसऱ्या पर्वाच्या

 ग्लोबल इम्पॅक्ट फोरम २०२६’ (GIF) च्या दुसऱ्या पर्वाच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी मुंबई येथील ब्राझीलचे महावाणिज्यदूत जोसे मौरो फोनेस्का कोस्टा कौटो, रशियाचे महावाणिज्यदूत इव्हान फेतिसोव्ह, चीनचे महावाणिज्यदूत किन ती, दक्षिण आफ्रिकाचे महावाणिज्यदूत गेडियन लाबाने यांच्यासह भारत, ब्राझील, रशिया, चीन आणि दक्षिण आफ्रिका या ब्रिक्स देशातील राजनैतिक प्रतिनिधी, उद्योगपती, अभ्यासक व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा देताना त्यांनी भगवान श्रीकृष्णांच्या सर्वसमावेशकता, धर्मनिष्ठा आणि सत्याच्या विजयाच्या संदेशाचा उल्लेख केला.

Featured post

Lakshvedhi