Sunday, 19 July 2026

भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची’ आषाढी वारीतील ३.८३ लाखांहून अधिक वारकऱ्यांना आरोग्य सेवा

 भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची

आषाढी वारीतील ३.८३ लाखांहून अधिक वारकऱ्यांना आरोग्य सेवा

 

मुंबई, दि. १ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर तसेच सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आषाढी वारी २०२६ मध्ये सहभागी झालेल्या वारकरी भाविकांना सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत व्यापक आणि दर्जेदार आरोग्य सेवा पुरविण्यात येत असून, 'भक्ती विठोबाची... सेवा आरोग्याची' ही संकल्पना प्रत्यक्षात साकारली जात आहे. आजपर्यंत ३ लाख ८३ हजार ६४३ वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा देण्यात आली आहे. ३ लाख ८० हजार ४८५ बाह्यरुग्णांवर उपचार, ३ हजार १५८ रुग्णांना आंतररुग्ण सेवा आणि ८८३ रुग्णांना पुढील उपचारासाठी संदर्भित करण्यात आले आहे.

वारकऱ्यांच्या आरोग्य सुरक्षेसाठी पालखी मार्गावर ३५३ रुग्णवाहिका, ४३ सुसज्ज आयसीयू, १५६ 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना', २१५ आरोग्यदूत, ,०८७ वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी आणि ३०२ तज्ज्ञ डॉक्टर कार्यरत आहेत. पंढरपूरमध्ये २४ तास कार्यरत आयसीयू, ३ दिवसांचे महाआरोग्य शिबिर, तसेच यंदाच्या वारीचे विशेष आकर्षण असलेली एअर ॲम्बुलन्स सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

याशिवाय पालखी मार्गावरील पाणी स्रोतांचे सर्वेक्षण व निर्जंतुकीकरण, डेंग्यू-मलेरिया आदी कीटकजन्य आजारांवरील प्रतिबंधात्मक उपाययोजना, हॉटेल व धाब्यांमधील कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी, वारीनंतर विशेष स्वच्छता मोहीम, असंसर्गजन्य आजारांची तपासणी, आरोग्य जनजागृती तसेच 'आरोग्यसंपन्न वारी' डिजिटल ॲपच्या माध्यमातून तातडीच्या आरोग्य सुविधांची माहिती उपलब्ध करून देण्यात येत आहे.

राज्य शासनाच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक आरोग्य विभाग वारकऱ्यांना सुरक्षित, सुलभ आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देण्यासाठी पूर्ण क्षमतेने कार्यरत असून, वारीच्या संपूर्ण कालावधीत आरोग्य यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली आहे.

सूक्ष्म लघु व मध्यम उद्योगांमध्ये गुंतवणूकदार आणि उद्योजकांच्या आवश्यकतेनुसार क्षेत्रे

 मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, सूक्ष्म लघु व मध्यम उद्योगांमध्ये गुंतवणूकदार आणि उद्योजकांच्या आवश्यकतेनुसार क्षेत्रे निश्चित करावी. या क्षेत्रांच्या संभाव्यतेनुसार एमएसएमई उद्योगांच्या रोजगार निर्मिती व उत्पादन  क्षमतेमध्ये वाढ करावी. त्यासाठी विविध प्लॅटफॉर्म्स तयार करावीत.  या क्षेत्राच्या उत्थानासाठी नवनवीन तंत्रज्ञान आणावे. हे सर्वात मोठे रोजगार निर्मिती देणारे क्षेत्र असल्यामुळे या क्षेत्राच्या विकासासाठी काम करावे. एमएसएमई उद्योगांचे सर्वेक्षण करताना त्यांची सद्यस्थिती, रोजगार निर्मितीची क्षमता, सध्या असलेली रोजगार निर्मिती आणि उत्पादन या सर्वांचा अभ्यास करण्यात यावा.

 

सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांचे सर्वेक्षण करून उत्कृष्ट परिसंस्था निर्माण करा

 सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांचे सर्वेक्षण करून उत्कृष्ट परिसंस्था निर्माण करा

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

•       उद्योग विभाग आढावा बैठक

•       रोजगार निर्मितीची क्षमता असलेल्या क्षेत्रासाठी धोरणे आणावीत

 

मुंबई, दि. १७: देशामध्ये राज्यात सर्वाधिक गुंतवणूक येत आहे. या गुंतवणुकीचे रूपांतर उद्योगांमध्ये करण्यासाठी गुंतवणूकक्षम आणि रोजगार निर्मितीची क्षमता असलेल्या क्षेत्रांसाठी सर्वंकष धोरणे आणावीत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देत सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांचे सखोल सर्वेक्षण करून या क्षेत्राची उत्कृष्ट परिसंस्था निर्माण करण्याचेही सूचित केले.

 

            राज्याच्या उद्योग विश्वाच्या वाढीसाठी धोरण तयार करताना संबंधित क्षेत्रातील तज्ञ, यशस्वी उद्योजक यांच्याशी चर्चा करावी. संबंधित उद्योग क्षेत्रात असलेली कमतरता या धोरणातून दूर होईल याचा प्रयत्न करण्यात यावा. तसेच सध्या अस्तित्वात असलेल्या विविध उद्योग विषयक धोरणांची प्रभावी अंमलबजावणी करावी,  यामुळे संपन्न महाराष्ट्राची निर्मिती होईल असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

 

            

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, सूक्ष्म लघु व मध्यम उद्योगांमध्ये गुंतवणूकदार आणि उद्योजकांच्या आवश्यकतेनुसार क्षेत्रे निश्चित करावी. या क्षेत्रांच्या संभाव्यतेनुसार एमएसएमई उद्योगांच्या रोजगार निर्मिती व उत्पादन  क्षमतेमध्ये वाढ करावी. त्यासाठी विविध प्लॅटफॉर्म्स तयार करावीत.  या क्षेत्राच्या उत्थानासाठी नवनवीन तंत्रज्ञान आणावे. हे सर्वात मोठे रोजगार निर्मिती देणारे क्षेत्र असल्यामुळे या क्षेत्राच्या विकासासाठी काम करावे. एमएसएमई उद्योगांचे सर्वेक्षण करताना त्यांची सद्यस्थिती, रोजगार निर्मितीची क्षमता, सध्या असलेली रोजगार निर्मिती आणि उत्पादन या सर्वांचा अभ्यास करण्यात यावा.

 

वेव्हज परिषदेच्या नियोजनात कोणतीही कमतरता राहणार नाही याची काळजी घ्या

 वेव्हज परिषदेच्या नियोजनात कोणतीही कमतरता राहणार नाही याची काळजी घ्या

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

वेव्हज 2027 परिषदेच्या तयारीला वेग

 

मुंबई, दि. 17  : जागतिक दर्जाच्या वेव्हज् परिषदेच्या तयारीला आतापासूनच वेग देत कार्यक्रमाचे नियोजन, विभागनिहाय जबाबदाऱ्या, अर्थसंकल्प, प्रसिद्धी, वाहतूक, तांत्रिक व्यवस्था आणि विविध समन्वयाच्या बाबी वेळेत पूर्ण कराव्यात. वेव्ह्ज-2027 अधिक व्यापक, सुटसुटीत आणि प्रभावी आयोजन करण्यावर भर द्यावा, तसेच परिषदेच्या नियोजनात कोणतीही कमतरता राहणार नाही याची काळजी घ्या असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

 


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, पहिल्या वेव्हज् परिषदेने जागतिक स्तरावर प्रभावी छाप निर्माण केली असून महाराष्ट्राच्या ब्रँड मूल्यामध्ये भर पडली आहे. त्यामुळे पुढील आवृत्ती अधिक भव्य आणि दर्जेदार करण्यासाठी नियोजनबद्ध तयारी आवश्यक आहे. हवामानाचा विचार करून परिषद फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये घेण्याचा प्रयत्न करावा, असेही त्यांनी सुचविले.

मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाचा सुधारित कार्यक्रम जाहीर प्रारूप मतदार यादी १७ ऑगस्टला, अंतिम यादी १९ ऑक्टोबरला प्रसिद्ध होणार

 मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाचा सुधारित कार्यक्रम जाहीर

प्रारूप मतदार यादी १७ ऑगस्टला, अंतिम यादी १९ ऑक्टोबरला प्रसिद्ध होणार

 

मुंबई, दि. १७ : भारत निवडणूक आयोगाने राज्यातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision - SIR) कार्यक्रमाचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. अलीकडील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मूख्य निवडणूक अधिकारी , महाराष्ट्र राज्य यांनी मुदतवाढीची केलेली विनंती मान्य करून आयोगाने हा निर्णय घेतल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांनी दिली आहे.

 

सुधारित कार्यक्रमानुसार, मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत गृहभेटीची मोहीम ३० जून ते ८ ऑगस्ट २०२६ या कालावधीत राबविण्यात येणार असून, मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण व पुनर्रचना ८ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्यात येईल.

 

त्यानंतर १७ ऑगस्ट २०२६ (सोमवार) रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. १७ ऑगस्ट ते १६ सप्टेंबर २०२६ या कालावधीत मतदारांकडून दावे व हरकती स्वीकारण्यात येतील. तसेच १७ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत नोटिसा देणे, सुनावणी घेणे आणि दावे-हरकतींचा निपटारा करण्याची प्रक्रिया पार पडेल.

 

यानंतर १९ ऑक्टोबर २०२६ (सोमवार) रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

 

पात्र नागरिकांनी निर्धारित कालावधीत मतदार यादीत नाव समाविष्ट होण्यासाठी गणना प्रपत्र भरून देऊन निवडणूक प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन सह मुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर यांनी केले आहे.

बियाणे, खते व कीटकनाशकसंदर्भात तक्रारींचे सात दिवसांत होणार निराकरण

 बियाणे, खते व कीटकनाशकसंदर्भात तक्रारींचे सात दिवसांत होणार निराकरण

- कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

 

तालुकास्तरीय तक्रार निवारण समितींची फेरररचना

 

मुंबई, दि. 18 : शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे, खते व कीटकनाशके उपलब्ध करून देण्यास राज्य शासनाचे सर्वोच्च प्राधान्य असून याबाबत आलेल्या तक्रारींचे जलद व पारदर्शक पद्धतीने निराकरण करण्यासही प्राथमिकता आहे. यासाठी तालुकास्तरीय तक्रार निवारण समित्यांची फेररचना करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पुढील सात दिवसांच्या आत प्रत्यक्ष शेतावर जाऊन तपासणी करून अहवाल अंतिम करण्यात येणार आहे, असे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.

महाराष्ट्राची समृद्ध वस्त्रपरंपरा दिल्लीकरांच्या भेटीला महाराष्ट्र सदन येथे तीन दिवसीय वस्त्रोद्योग प्रदर्शनाचे उद्घाटन

 महाराष्ट्राची समृद्ध वस्त्रपरंपरा दिल्लीकरांच्या भेटीला

महाराष्ट्र सदन येथे तीन दिवसीय वस्त्रोद्योग प्रदर्शनाचे उद्घाटन

 

नवी दिल्ली, दि.18 :  महाराष्ट्र राज्य हातमाग सहकारी महासंघ मर्यादित, नागपूर (महाटेक्स) आणि येथील महाराष्ट्र सदन यांच्या संयुक्त विद्यमाने कस्तुरबा गांधी  मार्गावरील नवीन महाराष्ट्र सदनात आयोजित विशेष वस्त्रोद्योग प्रदर्शनाचे उद्घाटन  महाराष्ट्र शासनाच्या निवासी आयुक्त तथा सचिव श्रीमती श्वेता सिंघल यांच्या हस्ते झाले.

            प्रगती मैदान येथील भारत मंडपममध्ये नुकत्याच झालेल्या 'भारत टेक्स २०२६' च्या धर्तीवर महाराष्ट्राच्या समृद्ध वस्त्रोद्योग परंपरेचा परिचय दिल्लीकरांना करून देण्यासाठी कस्तुरबा गांधी मार्गावरील नवीन महाराष्ट्र सदन येथे १८ ते २० जुलै २०२६ या कालावधीत या तीन दिवसीय वस्त्रोद्योग प्रदर्शन व विक्रीचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन निवासी आयुक्त तथा सचिव श्रीमती श्वेता सिंघल यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.

            यावेळी महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक हेमराज बागुल, सहायक निवासी आयुक्त नितीन शेंडे, सहायक निवासी आयुक्त स्मिता शेलार आणि व्यवस्थापक प्रमोद कोलापटे उपस्थित होते. तसेच रेशीम संचालनालयाचे उपसंचालक डॉ. महेंद्र ढवळे, रेशीम विकास अधिकारी संदीप आगवणे, अशोक वडवले, महाटेक्सचे गणेश ठाकूर, रूपेश खापेकर आदी  उपस्थित होते.

            दिल्लीतील नागरिकांनी या प्रदर्शनाला मोठ्या संख्येने भेट देऊन महाराष्ट्रातील विणकर आणि कारागिरांकडून दर्जेदार उत्पादने थेट खरेदी करून 'व्होकल फॉर लोकल' संकल्पनेला बळ द्यावे, असे आवाहन निवासी आयुक्त श्वेता सिंघल यांनी केले.

            'भारत टेक्स २०२६'मध्ये महाराष्ट्राच्या दालनाला देश-विदेशातील खरेदीदारांकडून मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील विणकर, कारागिर आणि स्वयं-सहायता गटांनी तयार केलेली उत्पादने दिल्लीसारख्या मोठ्या बाजारपेठेत थेट ग्राहकांपर्यंत पोहोचावीत, तसेच महाराष्ट्राच्या समृद्ध वस्त्रवारशाचा व्यापक प्रचार व्हावा, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.

या प्रदर्शनात महाराष्ट्राच्या पारंपरिक वस्त्रकलेचा समृद्ध वारसा अनुभवता येणार असून, अस्सल पैठणी, करवत काठी साड्या, पारंपरिक हिमरू, खण, सोलापूरच्या प्रसिद्ध चादरी, बांबू व टेरी टॉवेल्स तसेच जीआय (GI) टॅग प्राप्त कोल्हापुरी चपला यांसह विविध हातमाग व रेशीम उत्पादने थेट विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आली आहेत.हे प्रदर्शन १८ ते २० जुलै २०२६ या कालावधीत सकाळी ११ ते सायंकाळी या वेळेत सर्व नागरिकांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे.

000

Featured post

Lakshvedhi