Monday, 29 June 2026

कर्जखात्यांचे दोन स्वतंत्र गट करण्यात आले आहेत. आधार क्रमांक उपलब्ध असलेली कर्जखाती आणि आधार

 प्रत्येक बँकेने मुख्यालय स्तरावर दोन नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यापैकी एक अधिकारी योजना अंमलबजावणी समन्वयक, तर दुसरा माहिती तंत्रज्ञान समन्वयक म्हणून काम पाहणार आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी व जिल्हास्तरीय समिती (DLC) यांच्याशी समन्वय राखण्यासाठी स्वतंत्र जिल्हा नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

            कर्जखात्यांचे दोन स्वतंत्र गट करण्यात आले आहेत. आधार क्रमांक उपलब्ध असलेली कर्जखाती आणि आधार क्रमांक उपलब्ध नसलेली कर्जखाती. ज्या खात्यांमध्ये आधार क्रमांक उपलब्ध नाही, अशा खात्यांची स्वतंत्र यादी तयार करून ती बँक शाखा, विकास संस्था तसेच गावपातळीवर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. संबंधित शेतकऱ्यांना विविध माध्यमातून मोहीम राबवून शेतकऱ्यांचा आधार क्रमांक प्रमाणीकरण करण्याचे  आवाहन केले जात आहे.  यासाठी बँकांनी विशेष आधार-जोडणी मोहीम राबविण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

            आधार क्रमांक उपलब्ध असलेल्या कर्जखात्यांची माहिती शासनाने दिलेल्या नमुन्यानुसार तयार करून पोर्टल तातडीने अपलोड करावी लागणार आहे. दि३० सप्टेंबर २०२५ रोजी थकीत असलेली आणि ३१ मार्च २०२६ पर्यंत परतफेड न झालेली वैयक्तिक व संयुक्त पीककर्ज खाती यामध्ये समाविष्ट करण्यात येणार आहेत.

            संयुक्त कर्जखात्यांसाठी सर्व कर्जदारांचे आधार क्रमांक, आधार-जोडलेली बचत खाती तसेच प्रत्येकाचा कर्जातील हिस्सा नमूद करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मयत कर्जदारांच्या प्रकरणांमध्ये वारसांची नोंद करून त्यानुसार लाभ वितरित करण्यात येणार आहे.

            कर्जखात्यांची माहिती अपलोड करताना पोर्टलवरील निकषांचे पालन करणे आवश्यक राहील. त्रुटी आढळल्यास माहिती दुरुस्त करून पुन्हा अपलोड करावी लागणार आहे. आधार क्रमांक असलेल्या खात्यांची माहिती प्रथम अपलोड केली जाईल, तर नंतर आधार जोडणी झालेल्या खात्यांची माहिती पुढील टप्प्यांत स्वीकारली जाणार आहे.

कर्जमुक्ती प्रक्रियेला वेग : पात्र शेतकऱ्यांचा तपशील संकलनाची जबाबदारी बँकांवर निश्चित pl share

 कर्जमुक्ती प्रक्रियेला वेग : पात्र शेतकऱ्यांचा तपशील संकलनाची जबाबदारी बँकांवर निश्चित

 

            राज्य शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली  असून या योजनेचा लाभ ५६ लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे. सुमारे ३६ हजार ५०० कोटी रुपयांच्या या योजनेमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा आधार मिळणार आहे.

राज्यातील शेतकरी बांधवांना दिलासा देण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सहकार विभागाने कंबर कसली आहे. या योजनेची प्रभावी, पारदर्शक अंमलबजावणी आणि वेळेत लाभ देण्यासाठी  सर्व व्यापारी बँका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना सहकार विभागाकडून सविस्तर मार्गदर्शक सूचना  देण्यात  आल्या आहेत. 

            योजनेचा लाभ थेट आणि पारदर्शक पद्धतीने पात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी बँकांकडून शेतकऱ्यांचा सविस्तर तपशील मागवण्यात येत आहे. बँकांना युद्धपातळीवर काम करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले  आहेत. या प्रक्रियेत कोणतीही त्रुटी राहू नये म्हणून बँकांना मुख्यालय आणि जिल्हा स्तरावर विशेष नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या सूचनांनुसार पात्र शेतकऱ्यांची माहिती अचूक स्वरूपात संकलित करून पोर्टलवर अपलोड करण्यासह प्रत्येक टप्प्यावर समन्वयाची जबाबदारी बँकांवर निश्चित करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली दिल्ली–मुंबई द्रुतगती मार्ग प्रकल्पाची पाहणी दिल्ली–मुंबई द्रुतगती मार्गामुळे वाहतूक व मालवाहतुक होणार वेगवान

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली दिल्लीमुंबई द्रुतगती मार्ग प्रकल्पाची पाहणी

दिल्लीमुंबई द्रुतगती मार्गामुळे वाहतूक व मालवाहतुक होणार वेगवान

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

        पालघर दि. २८ जून २०२६:भारत सरकार मार्फत सुमारे १ लाख कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणारा  सुमारे  १,४०० किलोमीटर लांबीचा, ८ पदरी ग्रीनफिल्ड ॲक्सेस-कंट्रोल्ड द्रुतगती मार्ग हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र या पाच राज्यांना जोडणार आहे. हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर दिल्ली आणि मुंबई दरम्यानचा प्रवास मोठ्या प्रमाणात वेगवान होणार असून देशातील प्रमुख औद्योगिक पट्ट्यांमधील संपर्क अधिक सक्षम होणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

  देशातील सर्वात महत्त्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्पांपैकी एक असलेल्या दिल्लीमुंबई द्रुतगती मार्गाच्या (वडोदरामुंबई विभाग) कामांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  पाहणी करून प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करत त्यांनी प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासह दर्जेदार कामांवर भर देण्याच्या सूचना दिल्या.

   या प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण (JNPA) यांच्याशी थेट जोडणी. त्यामुळे उत्तर भारतातून जेएनपीएपर्यंत मालवाहतूक अधिक जलद, कार्यक्षम आणि कमी खर्चात होणार असून देशाच्या लॉजिस्टिक साखळीला मोठी बळकटी मिळणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील वडोदरामुंबई विभाग सुमारे १५७ किलोमीटर लांबीचा असून, त्यासाठी सुमारे २४ हजार कोटी रुपये खर्च करण्यात येत आहे. सात बांधकाम पॅकेजमध्ये विकसित होणाऱ्या या विभागातील पाच पॅकेजचे काम पूर्ण झाले असून ते वाहतुकीसाठी सज्ज आहेत, तर उर्वरित दोन पॅकेज ऑगस्ट २०२६ पर्यंत पूर्ण होणार  आहे. महाराष्ट्र राज्यातून जाणारा मार्ग ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

हा मार्ग सुरू झाल्यानंतर वडोदरा ते मुंबई प्रवासाचा कालावधी आठ तासांवरून सुमारे चार तासांपर्यंत कमी होणार आहे. यामुळे प्रवाशांना वेगवान, सुरक्षित आणि वाहतूक कोंडीमुक्त प्रवासाचा अनुभव मिळणार असून व्यावसायिक वाहतुकीलाही मोठी चालना मिळेल.

जेएनपीएकडे जाणाऱ्या मालवाहतुकीची कार्यक्षमता लक्षणीयरीत्या वाढणार आहे. सध्या ठाणे, भिवंडी आणि घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडीमुळे होणारा वेळ व इंधनाचा अपव्यय कमी होऊन मालवाहतुकीसाठी अधिक जलद आणि विश्वासार्ह पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहे.

उत्तर आणि पश्चिम भारतातील औद्योगिक क्षेत्रांना मुंबईच्या बंदर व्यवस्थेशी अधिक सक्षम जोडणी मिळाल्याने निर्यात, उद्योग, गुंतवणूक आणि रोजगारनिर्मितीला चालना मिळणार आहे. तसेच हा प्रकल्प देशाची  राजधानी दिल्ली आणि आर्थिक राजधानी मुंबई यांना अधिक वेगवान व आधुनिक द्रुतगती मार्गाने जोडणारा महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार असून, भारताच्या पायाभूत सुविधा विकास आणि आर्थिक प्रगतीमध्ये मोलाचे योगदान देणारा ठरणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

यावेळी  वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक, मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे, खासदार डॉ. हेमंत सवरा, आमदार स्नेहा दुबेपंडित ,आमदार राजन नाईक तसेच कोकण विभागाचे पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मीना , महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष  कार्यकारी संचालक दीपक कपूर , JNPA चे अध्यक्ष गौरव दयाल , मीरा-भाईंदर वसईविरार पोलीस आयुक्त निकेत कौशिक, जिल्हाधिकारी डॉ.इंदु राणी जाखड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, डहाणू प्रकल्प अधिकारी विशाल खत्री तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी  उपस्थित होते.

0000

Sunday, 28 June 2026

भारतात येणाऱ्या एकूण वैद्यकीय पर्यटकांपैकी २७ टक्के पर्यटक महाराष्ट्रात येतात. विकसित देशांच्या तुलनेत

 दंत पर्यटनाच्या संदर्भात बोलताना डॉ. गवांदे म्हणाले की, भारतात येणाऱ्या एकूण वैद्यकीय पर्यटकांपैकी २७ टक्के पर्यटक महाराष्ट्रात येतात. विकसित देशांच्या तुलनेत भारतातील दंत उपचार आणि डेंटल इम्प्लांट्सचा खर्च ७० ते ८० टक्क्यांपर्यंत कमी आहे. देशात सुमारे चार लाख दंतवैद्य उपलब्ध असून त्यांचे कौशल्य आणि अनुभव जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त आहे. कमी खर्च, कमी प्रतीक्षा कालावधी, जागतिक दर्जाची उपचार सेवा आणि तज्ज्ञ मनुष्यबळ या बाबी महाराष्ट्राला दंत पर्यटनासाठी अत्यंत आकर्षक बनवतात, असे त्यांनी नमूद केले. राज्यातील दंत उपचार सेवांचे मानकीकरण करण्यासाठी इंडियन डेंटल असोसिएशनच्या सहकार्याने विशेष केंद्रांची उभारणी करण्यात येत असून त्यामुळे महाराष्ट्राची दंत पर्यटन क्षेत्रातील ओळख अधिक बळकट होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्रात दंत आरोग्य व दंत पर्यटन क्षेत्रात जागतिक केंद्र बनण्याची क्षमता ---- इंडियन डेंटल असोसिएशनने शासनाशी सहकार्यासाठी पुढे यावे

 महाराष्ट्रात दंत आरोग्य व दंत पर्यटन क्षेत्रात जागतिक केंद्र बनण्याची क्षमता

----

इंडियन डेंटल असोसिएशनने शासनाशी सहकार्यासाठी पुढे यावे

डॉ. राजेश गवांदे

 

मुंबई, दि. 28 : महाराष्ट्रात दंत आरोग्य सेवा, दंत पर्यटन, संशोधन व विकास तसेच दंत उपकरणांच्या उत्पादन क्षेत्रात जागतिक स्तरावरील गुंतवणुकीचे केंद्र बनण्याची क्षमता असून मौखिक आरोग्य क्षेत्रात नागरिकांना सेवा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन शासनाचे राजशिष्टाचार, परकीय थेट गुंतवणूक, प्रवासी भारतीय व्यवहार व जनसंपर्क विभागाचे सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी डॉ. राजेश गवांदे यांनी केले.


यावेळी महाराष्ट्र शासन आणि इंडियन डेंटल असोसिएशन यांच्यात दंत पर्यटनासंदर्भातील सामंजस्य करार करण्यात आला. त्याचबरोबर इंडियन डेंटल असोसिएशन आणि सायप्रस चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री यांच्यात तसेच इंडियन डेंटल असोसिएशनतर्फे दंत शिक्षण, दंत उपचारांचे मानकीकरण, मौखिक आरोग्य निरीक्षण व डेंटल हायपरसेन्सिटिव्हिटी व्यवस्थापनासंदर्भातील विविध राष्ट्रीय उपक्रमांचेही लोकार्पण करण्यात आले.

इझ ऑफ डुइंग बिझनेस’ आणि विविध प्रोत्साहन योजनांबाबत उद्योग प्रतिनिधींनी मांडलेल्या सूचनांचा

 इझ ऑफ डुइंग बिझनेस आणि विविध प्रोत्साहन योजनांबाबत उद्योग प्रतिनिधींनी मांडलेल्या सूचनांचा उल्लेख करताना डॉ. गवांदे म्हणाले, ‘मैत्री पोर्टलमुळे परवानग्या, मंजुरी आणि सुलभ व्यवसायासाठीचा प्रशासकीय मार्ग मोठ्या प्रमाणात सुलभ होईल. दंत उद्योगाला स्वतंत्र उद्योग म्हणून प्रोत्साहनांच्या परिघात आणण्याचा मुद्दा मांडताना डॉ गवांदे म्हणाले, या संदर्भात आयडीएने उद्योग विभागाशी सविस्तर चर्चा करून एकत्रित प्रस्ताव तयार करावा. उत्पादन युनिट्स भारतात, विशेषतः महाराष्ट्रात सुरू करण्यास शासन इच्छुक असून, यासाठी स्वतंत्र बैठक घेऊन पुढील रोडमॅप तयार करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली. उद्योग, इंडियन डेंटल असोसिएशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या समन्वयातून मौखिक आरोग्य, दंत उत्पादन निर्मिती, संशोधन, कौशल्यविकास आणि वैद्यकीय पर्यटनाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास डॉ गवांदे यांनी यावेळी व्यक्त केला.

 

कृषि विभागातील 12 हजार 111 व उमेद मधील समूह संसाधन व्यक्ति (ग्रामसखी ) 30359 यांचे

 कृषि विभागातील 12 हजार 111  व उमेद मधील समूह संसाधन व्यक्ति (ग्रामसखी ) 30359 यांचे फार्मर कप व गटशेतीचे महत्व यासाठी प्रशिक्षण घेण्यात आले. दुस-या टप्प्यामध्ये 45 हजार 190 शेतकरी व कृषिसखी यांना फार्मर कप उपक्रमाबद्दल माहिती देण्यात आली.तिसऱ्या महत्वाच्या टप्प्यात 36 प्रशिक्षण केंद्रावर शेतकरी व उमेद मधील समूह संसाधन व्यक्ति अशा 32 हजार 993 शेतकऱ्यांचे तीन दिवसीय निवासी प्रशिक्षण एप्रिल 2026 अखेर पूर्ण करण्यात आले.चौथ्या टप्प्यामध्ये गटशेतीतूनच शेतकऱ्यांचे प्रश्न सुटू शकतात.शेतीचा खर्च कमी होवून पिकाची  उत्पादकता  वाढवीता येते, कृषि विद्यापीठाच्या शेतीत प्रमाणित कार्यपद्धतीचा अवलंब केला , तर शेतकऱ्यांचा प्रवास समृद्धिकडे होईल. यासाठी शेतकरी गट बांधणी मध्ये शेतकऱ्यानी उत्कृष्ट प्रतिसाद दिला  व एक पीक, एक गट अंतर्गत 25 हजार 823  शेतकरी गट फार्मर कप उपक्रमासाठी सज्ज झाले आहेत.पाचव्या टप्प्यामध्ये शेतकरी गटाना ज्ञान मिळावे यासाठी कृषि विद्यापीठातील शात्रज्ञ यांच्या मदतीने खरीप हंगामामधील पिकासाठी दररोज  डिजिटल शेतीशाळा 25 मे 2026 पासून सुरू करण्यात आल्या आहेत. सहाव्या टप्पयामध्ये 25 हजार 823  शेतकरी गट शेतीत  येणाऱ्या समस्येवर मात करण्यासाठी  सत्यमेव जयते फार्मर कप 2026 साठी सज्ज झाले  आहेत, स्पर्धेसाठी त्यांनी सुरुवात केली आहे.

Featured post

Lakshvedhi