Thursday, 19 February 2026

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे फेडेक्स कार्गो हबमुळे महाराष्ट्रातील व्यापाराला नवी गती

 नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे फेडेक्स कार्गो हबमुळे

महाराष्ट्रातील व्यापाराला नवी गती

     – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

नवी मुंबईदि. १८ (विमाका): नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे फेडेक्सच्या समर्पित कार्गो हबचे भूमिपूजन हा भारतमुंबई आणि महाराष्ट्रासाठी पुरवठा व्यवस्थान खर्च क्षेत्रातील ऐतिहासिक टप्पा असूनया सुविधेमुळे राज्यातील उद्योगनिर्यात आणि व्यापाराला मोठी चालना मिळणार आहेअसा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. बदलत्या जागतिक व्यापार परिस्थितीत फेडेक्सने मुंबईत गुंतवणूक करण्याचा घेतलेला निर्णय हा भारताच्या आर्थिक सामर्थ्याचा आणि महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधांवरील जागतिक विश्वासाचे महत्त्वपूर्ण प्रतीक असल्याचे त्यांनी नमूद केले.

एआय क्रांती आणि पर्यावरणीय परिणाम

 एआय क्रांती आणि पर्यावरणीय परिणाम

एआय तंत्रज्ञान, हवामान अंदाजपूर व्यवस्थापनशेतीक्षमता वाढविणे यासाठी उपयुक्त ठरू शकतेमात्र येणाऱ्या काळात एआयमुळे रोजगार क्षेत्रात मोठे बदल घडतील. लाखो लोक विस्थापित होऊ शकतात. त्यामुळे सरकारांनी आतापासूनच याबाबत नियमन व धोरणात्मक तयारी करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. सोशल मीडियाच्या अनियंत्रित विस्तारातून घेतलेला धडा लक्षात घेऊनएआयसंदर्भात उशीर होण्यापूर्वीच योग्य पावले उचलावीतअसा सल्ला त्यांनी दिला.


हवामान बदल म्हणजे धोरणाचा नव्हे, तर आरोग्याचाही प्रश्न

 हवामान बदल म्हणजे धोरणाचा नव्हेतर आरोग्याचाही प्रश्न

हवामान बदल हा केवळ ऊर्जा धोरणाचा मुद्दा नसून तो सार्वजनिक आरोग्या संदर्भातीलही गंभीर विषय आहेअसे श्रीमती क्लिन्टन यांनी स्पष्ट केले. दिल्लीबीजिंगसारख्या शहरांतील प्रदूषणमहिलां व मुलांमधील श्वसनविकार यांचा उल्लेख करत त्यांनी स्वच्छ इंधन व पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाच्या प्रसाराची गरज मांडली. अमेरिकाब्रिटनसारख्या देशांसह चीनभारतासारख्या देशांनीही अक्षय ऊर्जेकडे संपूर्ण संक्रमण करणे आवश्यक आहे.

एआय

हवामान बदलात भारत नवकल्पना व अंमलबजावणीचे नेतृत्व करेल- हिलरी क्लिंटन

 हवामान बदलात भारत नवकल्पना व अंमलबजावणीचे नेतृत्व करेल- हिलरी क्लिंटन

हवामान बदलाच्या लढ्यातील आघाडीवर भारत आणि दक्षिणेकडील देश नवकल्पनांचे नेतृत्व करू शकतात. पर्यावरणासाठी आणि मानव जातीच्या कल्याणासाठी परिणामकारक उपायांकडे लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. यात भारताचीही भूमिका महत्वाची राहणार आहे. पर्यावरण रक्षणासाठी केवळ चर्चा नकोततर कृती करणेहीच खरी काळाची गरज आहेअसे श्रीमती क्लिंटन यांनी यावेळी नमूद केले.

          पर्यावरण कृती ही केवळ धोरणांची नव्हेतर राजकारणबाजारपेठ आणि उद्योग यांच्या वास्तवाची जाण ठेवून पुढे नेण्याची प्रक्रिया असल्याचे श्रीमती क्लिंटन यांनी नमूद केले. दक्षिणेकडील देशातील युवकांकडे स्थानिक पातळीवरील प्रभावी उपाय आहेतमात्र त्यांना भांडवलनेटवर्क आणि व्यासपीठाची कमतरता भासते. कल्पना कुठूनही येऊ शकतातफक्त त्यांना पाठबळ देणे आवश्यक आहे. सार्वजनिकखासगी आणि सामाजित उत्तरदायित्व क्षेत्रांनी एकत्र येऊन अंमलबजावणीसाठी सक्षम भागीदारी उभी करणे ही काळाची गरज आहे. यासाठी  क्लिन्टन ग्लोबल इनिशिएटीव्ह वर्षभर भागीदारांसोबत काम करून निधीतांत्रिक मदत आणि अंमलबजावणीची साखळी उभी करत असल्याचे त्यांनी सांगितले.

हवामान बदलाच्या लढ्यात भारत नवकल्पना व अंमलबजावणीचे नेतृत्व करेल

 हवामान बदलाच्या लढ्यात भारत नवकल्पना व अंमलबजावणीचे नेतृत्व करेल

- हिलरी क्लिंटन

कल्पनाभागीदारी आणि कृतीशिवाय पर्याय नाही - मुंबई क्लायमेट वीकमध्ये हिलरी क्लिंटन यांचा तरुणाईला संदेश

 

मुंबईदि. १८ - हवामान बदलाच्या लढ्यात युवकमहिला आणि स्थानिक समुदाय यांच्या कल्पना व कृती निर्णायक ठरणार असून दरवाजे ठोठावत राहाआवाज बुलंद ठेवा आणि उपाय मांडत राहाअसा स्पष्ट संदेश अमेरिकेच्या माजी परराष्ट्र सचिव हिलरी क्लिंटन यांनी दिला.

मुंबई क्लायमेट वीकमधील फायरसाइड चर्चेत त्या बोलत होत्या. श्लोका नाथ यांनी त्यांची मुलाखत घेतली. यावेळी पर्यावरण विभागाच्या सचिव जयश्री भोज उपस्थित होत्या.

श्री गुरू तेग बहादुर साहिबजी आणि संत नामदेव: भारतीय संत परंपरेतील धर्म, मानवता व बलिदानाचा संगम

 श्री गुरू तेग बहादुर साहिबजी आणि संत नामदेव:

 भारतीय संत परंपरेतील धर्ममानवता व बलिदानाचा संगम

२८ फेब्रुवारी आणि १ मार्च रोजी खारघरनवी मुंबई येथे आयोजित हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने श्री गुरू तेग बहादुर साहिबजी आणि संत नामदेव यांच्या भारतीय संत परंपरेतील धर्ममानवता व बलिदानाचा संगम याविषयी या लेखातून ऊहापोह करण्यात आला आहे.

            भारतीय आध्यात्मिक आणि संत परंपरा ही विविध काळातविविध प्रदेशात जन्मलेल्या थोर विभूतींनी समृद्ध झालेली आहे. या परंपरेत शीख धर्माचे नववे गुरूहिंद- दी -चादर म्हणून ओळखले जाणारे श्री गुरू तेग बहादुर साहिबजी आणि महाराष्ट्रातील म्हणजेच हिंगोली जिल्ह्यातील नरसी नामदेव येथील वारकरी संप्रदायातील महान संत नामदेव महाराज यांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. दोघांचे कार्यविचार आणि त्याग हे धर्मरक्षणमानवतासमता आणि नैतिक मूल्यांचे प्रतीक मानले जातात.

संत नामदेव महाराज हे १३ व्या-१४ व्या शतकातील महान संत असून त्यांनी विठ्ठल भक्तीच्या माध्यमातून समाजात समतानामस्मरण आणि सर्वधर्मसमभावाचा संदेश दिला. जात-पातउच्च-नीच भेद नाकारून त्यांनी सामान्य जनतेला ईश्वरभक्तीचा मार्ग मोकळा करून दिला. त्यांनी रचलेल्या अभंगांमधून मानवताकरुणा आणि सामाजिक ऐक्याचे तत्त्व प्रभावीपणे मांडले गेले. संत नामदेव महाराजांची कीर्ती महाराष्ट्राच्या सीमांपुरती मर्यादित न राहता उत्तर भारतापर्यंत पोहोचली. त्यांचे अनेक अभंग पंजाबी भाषेत आहेत

Wednesday, 18 February 2026

first MoU between the Environment Department and Coca-Cola for collection and recycling of PET bottles

 Country’s first MoU between the Environment Department and Coca-Cola for collection and recycling of PET bottles

  • Two key MoUs of the Environment Department and two guidance reports released at Mumbai Climate Week in the presence of Environment Minister Pankaja Munde

            Mumbai, Feb 18: To combat climate change and promote the circular economy, the Environment and Climate Change Department of the Government of Maharashtra and the State Climate Action Cell signed two important memorandums of understanding during Mumbai Climate Week 2026. At the programme held in the presence of State Environment and Climate Change Minister Pankaja Munde, the State Climate Action Cell signed an agreement with Climate Trade LLP, while the Environment and Climate Change Department signed an agreement with Hindustan Coca-Cola Beverages to implement the Maha-rPET campaign. For the first time in the country, Coca-Cola has entered into an MoU with a state government for the collection and recycling of PET bottles.

Featured post

Lakshvedhi