Friday, 26 June 2026

विदर्भातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी ३० जून रोजी

 विदर्भातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी ३० जून रोजी आश्रमशाळांमध्ये 'प्रवेशोत्सव' साजरा करण्याचे निर्देशही बैठकीत देण्यात आले. यंदा शाळा सुरू होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना पुस्तके आणि गणवेशासोबतच मोजे आणि बूट देखील वेळेत मिळतील, याची काटेकोर दक्षता प्रशासनाने घ्यावी, असे सांगत या प्रवेशोत्सव कार्यक्रमाला स्थानिक लोकप्रतिनिधींना सन्मानपूर्वक निमंत्रित करावे, असे आवाहनही मंत्री प्रा. अशोक वुईके यांनी केले.


शैक्षणिक योजनांचा आढावा घेताना

 शैक्षणिक योजनांचा आढावा घेताना मंत्री प्रा. वुईके यांनी अनुदानित आश्रमशाळांमधील शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या बिंदूनामावली (रोस्टर) पडताळणीचे काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. या प्रक्रियेला गती देण्यासाठी आयुक्त स्तरावरून तात्काळ अधिकृत पत्र निर्गमित करण्यात यावे. तसेच, अनुसूचित जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी विद्यापीठांमध्ये येत्या ४ जुलैपर्यंत जागा निश्चित करण्यात याव्यात. ही जागा सर्व सोयींनी युक्त आणि चांगल्या दर्जाची असावी, जेणेकरून विद्यार्थ्यांना कोणताही त्रास होणार नाही, याची काळजी घेण्याचेही त्यांनी सूचित केले.

Thursday, 25 June 2026

राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण योजनेची प्रभावी अंमलबजावणी करा

 राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण योजनेची प्रभावी अंमलबजावणी करा

-आदिवासी विकास मंत्री प्रा. अशोक वुईके

 

मुंबई, दि. २५: राज्यातील आदिवासी महिलांचे आर्थिक व सामाजिक सक्षमीकरण करण्यासाठी 'राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण' योजनेची अंमलबजावणी अत्यंत प्रभावीपणे करून आदिवासी भागात महिला बचत गटांचे जाळे निर्माण करावे, असे निर्देश आदिवासी विकास मंत्री प्रा. अशोक वुईके यांनी दिले.


बैठकीत प्रामुख्याने राणी दुर्गावती योजनेच्या माध्यमातून महिला बचत गट निर्मिती करण्याची रुपरेषा करण्याबाबत आदिवासी विकास मंत्री प्रा. उईके म्हणाले, या योजनेअंतर्गत स्थापन करण्यात येणारे आदिवासी महिला बचत गट हे 'उमेद' (महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान) च्या धर्तीवर अत्यंत सुव्यवस्थित आणि कार्यक्षम असावेत. या अभियानाला गती देण्यासाठी आणि स्थापन झालेल्या महिला बचत गटांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी ९ ऑगस्ट २०२६ रोजी प्रकल्प अधिकारी कार्यालय स्तरावर विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे.

नागपूर जिल्ह्यातील कन्हान परिसरातील सार्वजनिक वाहतूक मजबूत करण्यासाठी नागपूर मेट्रो रेल टप्पा-२ अंतर्गत

 नागपूर जिल्ह्यातील कन्हान परिसरातील सार्वजनिक वाहतूक मजबूत करण्यासाठी नागपूर मेट्रो रेल टप्पा-२ अंतर्गत कन्हान नदी ते कन्हान शहर या उन्नत विस्तारीत मेट्रो रेल्वे मार्गिकेस मान्यता देण्यात आली. ही मार्गिका सुमारे १.४० कि.मी. असून त्यावर १ उन्नत स्थानक असणार आहे. एकूण रु. ३१०.३५ कोटी इतक्या प्रकल्प पूर्णत्व किंमतीच्या या प्रकल्पाची अंमलबजावणी महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. (महामेट्रो) मार्फत करण्यास मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पास केंद्रशासनाची मान्यता प्राप्त झाल्यानंतर प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

००००

नागपूर मेट्रो टप्पा-२ विस्तारास व सागरी सेतू-वांद्रे किल्ला कनेक्टरला मान्यता

 नागपूर मेट्रो टप्पा-२ विस्तारास व सागरी सेतू-वांद्रे किल्ला कनेक्टरला मान्यता

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समिती बैठक

§  नागपूर व मुंबईतील दोन प्रकल्पांना मंजुरी

 

मुंबई, दि. २५ : नागपूर मेट्रो रेल टप्पा २ अंतर्गत कन्हान नदी ते कन्हान शहर या दरम्यान विस्तारीत उन्नत मेट्रो मार्गिका उभारण्यास तसेच मुंबईतील स्वातंत्र्यवीर सावरकर सागरी सेतू वांद्रे किल्ल्याशी जोडण्यासाठी कनेक्टर उभारण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

 

 

          स्वातंत्र्यवीर सावरकर सागरी सेतूपासून वांद्रे किल्ल्यापर्यंत अतिरिक्त जोडरस्ता तयार करण्यात येणार आहे. यासाठी १७२२.४० कोटी रुपयांचा प्रस्ताव पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मांडण्यात आला होता. हा जोडरस्ता सागरी सेतूपासून वांद्रे किल्याजवळ जोडली जाणार असून तो ३.५५ किमी लांबीचा असणार आहे. या कनेक्टरमुळे २० ते ४५ मिनिटांचा प्रवास हा १० मिनिटांपर्यंत येणार आहे. या जोडरस्त्याचे काम महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळामार्फत हाती घेण्यास बैठकीत मान्यता देण्यात आली.

राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त २६ जूनला ‘जागर समतेचा’

 राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त २६ जूनला जागर समतेचा

 

मुंबई, दि. २५: सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त जागर समतेचाया विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवार, २६ जून २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता राजर्षी शाहू सभागृह, छत्रपती शिवाजी नाट्य मंदिर इमारत, दादर (प.), मुंबई येथे करण्यात आले आहे.

या कार्यक्रमात विष्णू शिंदे आणि सहकलाकार समता, सामाजिक परिवर्तन आणि मानवतेचा संदेश आपल्या प्रभावी कलासादरीकरणातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचविणार आहेत. राजर्षी शाहू महाराज हे सामाजिक न्याय, समता, शिक्षणाचा प्रसार आणि सर्वसमावेशक समाजव्यवस्थेचे प्रणेते होते. शिक्षण, आरक्षण, सामाजिक सुधारणा आणि वंचित घटकांच्या उन्नतीसाठी त्यांनी केलेले कार्य भारतीय समाजजीवनात अतुलनीय मानले जाते. त्यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

पाणीटंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी

 

 

पाणीटंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी नगरविकास, पाणीपुरवठा आणि जलसंपदा विभागांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात येणार आहे. संबंधित लोकप्रतिनिधींनाही त्यासाठी निमंत्रित करण्यात येईल. भविष्यात मुंबई महानगर प्रदेशातील नागरिकांना पाण्याची कमतरता भासू नये यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे राज्यमंत्री मेघना साकोरे- बोर्डीकर यांनी सांगितले.

0000

Featured post

Lakshvedhi