Wednesday, 20 May 2026

जागतिक संगीत दिनानिमित्त ‘आरोही’ युवा संगीत महोत्सवाचे आयोजन रवींद्र नाट्यमंदिर येथे २० व २१ मे रोजी शास्त्रीय गायन व

 जागतिक संगीत दिनानिमित्त आरोहीयुवा संगीत महोत्सवाचे आयोजन

रवींद्र नाट्यमंदिर येथे २० व २१ मे रोजी शास्त्रीय गायन व

वाद्यसंगीताची अनोखी मैफल युवा कलाकारांना व्यासपीठ

 

मुंबई, दि. १९ : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने जागतिक संगीत दिनानिमित्त आरोही अ फेस्टिव्हल ऑफ रायझिंग स्टार्स या विशेष सांगीतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रेस फाउंडेशनच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेला हा महोत्सव युवा आणि होतकरू संगीत कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारा महत्त्वपूर्ण सांस्कृतिक उपक्रम ठरणार आहे.

२००२ पासून सुरू असलेल्या आरोही’ या संगीत महोत्सवाने गेल्या २४ वर्षांत १३८ हून अधिक युवा संगीतकारांना आपली कला सादर करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. भारतीय शास्त्रीय संगीत, गायन आणि वाद्यसंगीताच्या परंपरेला प्रोत्साहन देत नवोदित कलाकारांना प्रेक्षकांसमोर सादरीकरणाची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा महोत्सव आयोजित करण्यात येतो.

हा संगीत महोत्सव बुधवार, २० मे २०२६ आणि गुरुवार, २१ मे २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजल्यापासून रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी, मुंबई येथील मिनी थिएटरमध्ये रंगणार आहे. कार्यक्रमास प्रवेश विनामूल्य असून संगीतप्रेमी नागरिकांसाठी ही एक विशेष सांगीतिक पर्वणी ठरणार आहे.

कसं काय?' या मोहिमेच्या माध्यमातून लोकसहभाग, स्वच्छता

 'कसं काय?' या मोहिमेच्या माध्यमातून लोकसहभाग, स्वच्छता, पोषण, निरोगी जीवनशैली आणि ग्रामस्तरावरील आरोग्य सक्षमीकरणाचा संदेश अत्यंत प्रभावी आणि आकर्षक पद्धतीने मांडण्यात आला आहे. त्यामुळे. 'कसं काय?' हे गाणे केवळ प्रचारगीत न राहता, ग्रामीण महाराष्ट्रातील आरोग्य जनजागृतीचे प्रतीक बनेल, असा विश्वास मंत्रिमंडळ बैठकीत व्यक्त करण्यात आला.

‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियानाच्या जनजागृतीसाठी 'कसं काय?' मोहिमेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ

 वृत्त 1797

माझं गाव, आरोग्यसंपन्न गावअभियानाच्या जनजागृतीसाठी

'कसं काय?' मोहिमेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ

 

मुंबई, दि. १९ : राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी माझं गाव, आरोग्यसंपन्न गावअभियानाच्या जनजागृतीसाठी कसं काय?’ या विशेष मोहिमेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आला. या निमित्ताने कसं काय?’ या जनजागृतीपर गाण्याचे तसेच पोस्टर्सचे प्रकाशन त्यांच्या हस्ते करण्यात आले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर तसेच सर्व विभागाचे मंत्री यावेळी उपस्थित होते.

 

 ग्रामीण महाराष्ट्रात आरोग्य जागृतीची नवी चळवळ निर्माण करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला आहे.सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या पुढाकारातून माझं गाव, आरोग्यसंपन्न गावहे अभियान राबविण्यात येत आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक तसेच वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते

कृष्णा-भीमा पूर वळण योजनांना गती द्या

 कृष्णा-भीमा पूर वळण योजनांना गती द्या

-         जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

 

मुंबई, दि. १९ : सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील पूरस्थितीवर दीर्घकालीन नियंत्रण मिळवण्यासाठी प्रस्तावित कृष्णा-भीमा पूर वळण योजनांना व्यापक जनहित लक्षात घेऊन या प्रकल्पांना गती देण्याचे निर्देश मंत्री विखे-पाटील यांनी दिले.

 

 मंत्रालयात जलसंपदा मंत्री तथा गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळाचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली याबाबत बैठक पार पडली. कृष्णा उपखोऱ्यातील पुराचे पाणी भीमा उपखोऱ्यात वळविण्याच्या प्रस्तावावर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. पूरनियंत्रणासोबतच दुष्काळी भागांना दिलासा देण्याच्या दृष्टीने या योजनेचे महत्त्व असाधारण असल्याचे मंत्री विखे-पाटील यांनी सांगितले.

 

महाराष्ट्राच्या वाट्याच्या पाण्याचा प्रभावी वापर, सर्वेक्षण व सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याच्या कामांचाही यावेळी मंत्री विखे पाटील यांनी आढावा घेतला. प्रकल्पासाठी आवश्यक तांत्रिक बाबी, प्रशासकीय मान्यता आणि पुढील कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी मंत्री विखे पाटील यांनी केल्या.

 

बैठकीस ग्राम विकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांच्यासह गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक, मुख्य अभियंते तसेच संबंधित विभागीय अधिकारी दूरदृश्य प्रणालीने उपस्थित होते. पूर नियंत्रण आणि जलसंपत्तीचे प्रभावी व्यवस्थापन करण्याच्यादृष्टीने या बैठकीत बैठक महत्त्वपूर्ण चर्चा झाली.

राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते लिडकॉमच्या कारागिरांचा सन्मान

 राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते लिडकॉमच्या कारागिरांचा सन्मान

 

मुंबई, दि. १९ : लोक भवन येथे आयोजित विशेष सोहळ्यात राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते लिडकॉमच्या कारागिरांचा सन्मान करण्यात आला. यावेळी राज्यपालांच्या पत्नी सुधा देव वर्मा उपस्थित होत्या.

 

जागतिक फॅशन ब्रँड प्राडाच्या सहकार्याने महाराष्ट्राच्या पारंपरिक कोल्हापुरी चप्पल कलेला जागतिक स्तरावर पोहोचविण्यात लिडकॉमने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तसेच राज्यातील पिढ्यानपिढ्यांचा वारसा जपणाऱ्या कारागिरांसाठी नवीन रोजगार आणि जागतिक बाजारपेठेतील संधी उपलब्ध करून दिली आहे.

 

या सत्कारप्रसंगी कारागीर प्रतिनिधी सौरभ पवार, सतीश सातपुते, विजय शिंदे, तानाजी कांबळे, संभाजी सातपुते, अनिता लोकरे, अरुण चापके, सुरेश आवळे, संदीप रोटे आणि अनिल पवार यांचा सन्मान करण्यात आला.

 

तसेच सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, लिडकॉमच्या व्यवस्थापकीय संचालक प्रेरणा देशभ्रतार, मुख्य वित्त अधिकारी आनंद ऐनवाड, कारखाना व्यवस्थापक अमोल शिंदे, विक्री सल्लागार वैभव खाटे आणि जिल्हा व्यवस्थापक एन. एम. पवार यांचाही गौरव करण्यात आला.

 

प्राडासोबतचे हे सहकार्य लिडकॉम टीम आणि कारागिरांच्या समन्वित प्रयत्नांमुळे शक्य झाले आहे. प्राडा मेड इन इंडिया इन्स्पायर्ड बाय कोल्हापुरी चपलाया विशेष प्रकल्पांतर्गत प्राडाने कोल्हापुरी चपलांपासून सँडल्सचा संग्रह जगभरातील ४० निवडक स्टोअर्स आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर उपलब्ध केला आहे. या सँडल्सची निर्मिती महाराष्ट्र आणि कर्नाटकातील कारागिरांकडून भारतातच केली जात आहे.

 

तसेच प्राडा संस्थेमार्फत नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी एनआयएफटी आणि कोल्हापूर इन्स्टिट्यूट ऑफ लेदर टेक्नॉलॉजी (केआयएलटी) येथे १८० कोल्हापुरी कारागिरांसाठी तीन वर्षांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाला पूर्ण आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे.

 

या सन्मानामुळे महाराष्ट्र पारंपरिक कारागिरांचा वारसा जपणारे आणि त्यांना जागतिक स्तरावर प्रोत्साहन देणारे राज्य म्हणून अधिक सक्षमपणे समोर आले आहे.

Tuesday, 19 May 2026

ई-चलन संदर्भातील मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेऊ

 ई-चलन संदर्भातील मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेऊ

-         परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

वाहतूकदारांना न्याय देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करणार

                                                                                   

मुंबई, दि. १९ : कोल्हापूर जिल्हा वाहतूकदार समन्वय समितीच्या शिष्टमंडळाने मंत्रालयात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीत भेट घेऊन ई-चलन प्रणाली, वेगमर्यादा नियम, एएनपीआर कॅमेरे तसेच दंड आकारणी संदर्भातील विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी वाहतूकदारांच्या मागण्यांबाबत सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

बैठकीला परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर, माजी आमदार सुजित मिणचेकर यांच्यासह कोल्हापूर जिल्हा वाहतूकदार समन्वय समितीचे अध्यक्ष  प्रदीप राठोड, सदस्य मनोज चौगुले, महेंद्र काळभोर, पंकज त्रिपाठी, अशोक शिंदे, गौरव कुसाळे, रफिक रावथर, अशोक कुचकोरवी, राजु ढाले, सुनील मगदुम आदी उपस्थित होते.

शिष्टमंडळाने सादर केलेल्या निवेदनात जुन्या ई-चलनांची सरसकट रद्दबातल, मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वेगमर्यादेचा पुनर्विचार, एएनपीआर कॅमेऱ्यांच्या कार्यपद्धतीत सुधारणा, वाहनांमधील अंतराच्या नियमांमध्ये व्यवहार्य बदल तसेच दंडावरील चक्रवाढ पद्धत रद्द करण्याची मागणी करण्यात आली.

यावेळी मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, वाहतूक व्यवसाय हा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे वाहतूकदारांच्या अडचणी शासन गंभीरपणे ऐकत असून, नियमांची अंमलबजावणी करताना अन्याय होणार नाही याची काळजी घेतली जाईल. ई-चलन आणि वेगमर्यादा संदर्भातील तक्रारींबाबत संबंधित विभागांकडून सविस्तर अहवाल मागवून आवश्यक त्या सुधारणा करण्याबाबत सकारात्मक विचार केला जाईल. तसेच, रस्ते सुरक्षा अबाधित ठेवत वाहतूकदारांना दिलासा मिळेल, अशा पद्धतीने धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले.

कोल्हापूर जिल्हा वाहतूकदार समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी या मागण्यांवर तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली

करारामुळे होणारी अणुऊर्जा व रोजगार निर्मिती

 करारामुळे होणारी अणुऊर्जा व रोजगार निर्मिती

अदानी पॉवर लिमिटेड कंपनी राज्यात १ लाख ५० हजार कोटींची गुंतवणूक करणार असून त्यातून ६ हजार मेगावॅट ऊर्जा निर्मिती होईल. तसेच प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या १२ हजार रोजगार निर्मिती अपेक्षित आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीज २ लाख कोटी रुपयांचीगुंतवणूक करणार आहे. यामधून ७२०० मेगावॅट ऊर्जा निर्मिती व एक लाखाच्यावर रोजगार उपलब्ध होणार आहे. तसेच एनटीपीसी लिमिटेड १ लाख कोटींची गुंतवणूक करणार असून ७२०० मेगावॅट ऊर्जा निर्मिती अपेक्षित आहे. यामध्ये ५ हजार रोजगार निर्मिती होईल. ललितपुर पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड (बजाज उद्योग समूह) राज्यात २ लाख  कोटींची गुंतवणूक करणार  आहे. यामधून  पाच हजार मेगावॅट ऊर्जा निर्मिती आणि ३ हजार रोजगार निर्मिती होणार आहे.  अशाप्रकारे राज्यात एकूण ६ लाख ५० हजार कोटींची गुंतवणूक होणार असून २५ हजार ४०० मेगावॅट इतकी ऊर्जा निर्मिती आणि १ लाख २३ हजार ५०० रोजगार निर्मिती अपेक्षित आहे.

Featured post

Lakshvedhi