Monday, 23 February 2026

एक स्टेप फाउंडेशन आणि जागतिक बँक यांच्यातील महत्वपूर्ण त्रिपक्षीय सामंजस्य करारावर स्वाक्षरी

 एक स्टेप फाउंडेशन आणि जागतिक बँक यांच्यातील महत्वपूर्ण त्रिपक्षीय सामंजस्य करारावर स्वाक्षरी

एक  स्टेप फाउंडेशन आणि जागतिक बँक यांच्यातील महत्वपूर्ण त्रिपक्षीय सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. महाराष्ट्राच्या एआय-सक्षम डिजिटल सार्वजनिक पायाभूत व्यवस्था ‘महाविस्तार’ (MahaVISTAAR) यांच्या स्थापत्य रचना (Architectural Design), प्रशासकीय व शासन चौकट (Governance Frameworks), अंमलबजावणीतील अनुभव व धडे (Implementation Lessons) तसेच मुक्त मानके (Open Standards) यांचे पद्धतशीर दस्तऐवजीकरण व संकलन करण्यासाठी याचा उपयोग केला जाणार आहे. हा सामंजस्य करार कृषी, पशुसंवर्धन आणि मत्स्यव्यवसाय क्षेत्रासाठी उपयुक्त आहे.

Sunday, 22 February 2026

संपूर्ण भारतातील ८१ मंदिरांतील ८१ गणपतींचे ८१ सेकंदात दर्शन घ्या... ह्यात 🚩 मुंबईचा सिद्धिविनायक आणि बेंगळुरूचा दोड्डा गणेश यांच🚩

 संपूर्ण भारतातील ८१ मंदिरांतील ८१ गणपतींचे ८१ सेकंदात दर्शन घ्या... ह्यात 🚩 मुंबईचा सिद्धिविनायक आणि बेंगळुरूचा दोड्डा गणेश यांचा समावेश आहे 🚩 🙏🌹🙏🪷🙏💐


किती आहे हे महत्वाचे नसुन हक्काचे आहे ह्याला महत्व आहे

 आई, तु पण ना… काय हे? बाबांच्या फक्त १२,००० रुपयांच्या पेन्शनसाठी इतकी धावपळ कशाला? 😒

आपण आपल्या एका कर्मचाऱ्याला यापेक्षा जास्त पगार देतो…

मोहित चिडून आईला म्हणाला. State Bank of India च्या लांब रांगेत उभं राहण्यापेक्षा घरी जाऊ या असा तो आग्रह करू लागला.


मोहितचं म्हणणं काही अंशी खरंच होतं. त्यांचा कोट्यवधींचा व्यवसाय होता 💼💰. वर्षभरात लाखो रुपये पगार-भत्त्यांत जात होते. मग फक्त १२,००० रुपयांसाठी इतका वेळ का घालवायचा?

मोहितचे वडील एकनाथराव गेल्या महिन्यात अल्पशा आजाराने वारले होते 😔. ते सरकारी शाळेत प्राध्यापक होते आणि १२ वर्षांपूर्वी निवृत्त झाले होते. त्यांना पेन्शन मिळत होती. त्यांच्या निधनानंतर शासनाच्या नियमानुसार अर्धी पेन्शन त्यांच्या पत्नी सरला यांना मिळणार होती. त्यासाठीच आज त्या बँकेत औपचारिकता पूर्ण करण्यासाठी आल्या होत्या.


त्या दिवशी मोहितचा मुलगा कुशाग्रचा आठवा वाढदिवस होता 🎂🎉. त्याने आजीकडे सायकलची मागणी केली होती 🚲. सरलाताईंच्या खात्यात फारसे पैसे उरले नव्हते. म्हणून त्यांनी मोहितकडे १०,००० रुपये मागितले.

मोहित ऑफिसला निघायच्या तयारीत होता. थोडं आश्चर्याने पाहून त्याने पत्नी श्रेयाला आईला पैसे द्यायला सांगितले.

श्रेयाने पैसे देताना हलकंसं म्हणाली,

“आजकाल खूप मंदी आहे बरं का… जरा सांभाळून खर्च करा.” 💬


संध्याकाळी सरलाताईंनी त्या पैशांतून कुशाग्रसाठी सायकल घेतली 🚲😊 आणि घरात पुन्हा हशा-आनंद पसरला.

पण पुढच्या आठवड्यात मोहितची मोठी बहीण माहेरी आली. आधी एकनाथजी जिवंत असताना सरलाताईंना कधीच पैशांसाठी कुणाकडे पाहावं लागत नव्हतं. ते स्वतःच पेन्शनमधून त्यांना थोडेफार पैसे देत असत ❤️.


आता मात्र मुलीच्या निरोपासाठीही त्यांना सुनबाईकडे हात पसरावा लागला. श्रेयाचे तेच शब्द त्यांच्या मनात घुमत होते —

“मंदी आहे… जपून खर्च करा…” 😞

मन खट्टू करून त्या मुलीला रिकाम्या हाताने निरोप देऊ लागल्या, तेवढ्यात श्रेया स्वतः पुढे आली आणि २००० रुपये त्यांच्या हातात ठेवत म्हणाली,

“मुलीला रिकाम्या हाताने कसं पाठवणार?”

पण त्या शब्दांत आपलेपणा कमी आणि टोमणा जास्त होता… हे सरलाताईच्या मनाला जाणवलं 💔.


सरलाताईंच्या आयुष्यात पैशांची खरी कमतरता नव्हती. औषधं, रिचार्ज, छोट्या गरजा—मोहित लगेच पैसे देत असे. पण मंदिरात दान करायचं असो 🛕, सणासुदीला नोकरांना काही द्यायचं असो 🎁, नातेवाईकांना भेट द्यायची असो… प्रत्येक वेळी मागणं त्यांच्या स्वाभिमानाला टोचत होतं.


अलीकडे त्यांची बहीण आली होती. तिची आर्थिक परिस्थिती बेताची होती. तिला मदतीची अपेक्षा होती. पण सरलाताई स्वतःच पैशासाठी सुनेकडे पाहताना दिसल्यावर तिने काहीच मागितलं नाही 😔.

आणि मग एक दिवस… 📱

मोबाईलवर मेसेज आला — State Bank of India कडून.

सहा महिन्यांची पेन्शन — ७२,००० रुपये — त्यांच्या खात्यात जमा झाल्याचा संदेश होता 💳✨

सरलाताई जवळच्या ATM मधून १०,००० रुपये काढून घरी येत होत्या. त्यांच्या चालण्यातला आत्मविश्वास, चेहऱ्यावरचे तेज सांगत होतं — पेन्शनला “सन्मान निधी” का म्हणतात ते 💖🙏


कोट्यवधींच्या संपत्तीपेक्षा त्यांच्या पतींच्या त्या १२,००० रुपयांच्या पेन्शनमध्ये त्यांना अधिक वजन, अधिक आधार आणि सर्वात महत्त्वाचं — स्वाभिमान जाणवत होता.

एआयच्या यशासाठी धोरणात्मक संरचना आणि अर्थकारण महत्त्वाचे

 एआयच्या यशासाठी धोरणात्मक संरचना आणि अर्थकारण महत्त्वाचे

तंत्रज्ञाननिधी आणि इच्छाशक्ती सोबतच अंमलबजावणीसाठी सक्षम प्रशासनिक रचना आवश्यक असल्याचे नाबार्डचे मुख्य महाव्यवस्थापक संजीव डी. रोहिल्ला यांनी  यावेळी सांगितले. देशात डेटा अभावाचा प्रश्न नाही. कृषी विद्यापीठे आणि विस्तार यंत्रणा यामुळे मोठ्या प्रमाणावर माहिती उपलब्ध आहे. एआय ही केवळ त्या डेटावर आधारित पूरक प्रणाली आहे. मात्र एआयचा खरा उपयोग स्थानिक गरजा ओळखून त्यानुसार उपाय देण्यात होत आहे. एआय आणि कृषी सुधारणा हे व्यापक आर्थिक वास्तव आणि अर्थकारणाच्या चौकटीत पाहणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.


शाश्वत व्यवसायासाठी एआयचा संदर्भ महत्त्वाचा

 शाश्वत व्यवसायासाठी एआयचा संदर्भ महत्त्वाचा

कोणताही कृषी व्यवसाय शाश्वत आणि ‘युनिट इकॉनॉमिक्स’दृष्ट्या व्यवहार्य असणे गरजेचे आहे. मोठ्या भांडवली गुंतवणुकीची गरज असलेल्या सेवांसाठी शासनाची भूमिका महत्वाची ठरत असल्याचे अॅक्यूमनचे सहयोगी संचालक (पोर्टफोलिओ) पराग सभलोक यांनी यावेळी सांगितले. भारत सरकारने ॲग्रीस्टॅक (AgriStack) आणि विस्टा (VISTA) सारख्या पायाभूत प्रणाली उभारून दूरदृष्टी दाखवली आहे. आता मत्स्यव्यवसायफळभाज्या आणि सुका मेवा यासारख्या उच्च-मूल्य पिकांवर भर दिला जात आहे. एआय ही जादूची काठी नसूनयोग्य संदर्भ आणि विद्यमान प्रणालीत छोटे पण प्रभावी बदल करून वापरल्यास त्याचे खरे फायदे मिळू शकतात. भविष्यात उपग्रह प्रतिमाजमीन नकाशांकन आणि पीक नोंद यासारख्या क्षेत्रात एआयमुळे स्टार्टअप्सना अधिक संधी उपलब्ध होणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

 


एआय तंत्रज्ञान स्वीकारण्यासाठी ठोस पुराव्यांची गरज

 एआय तंत्रज्ञान स्वीकारण्यासाठी ठोस पुराव्यांची गरज

गेल्या पंधरा वर्षांत सुमारे तीस हजार बागायती शेतकऱ्यांसोबत काम करताना ड्रिप सिंचनफवारणी यंत्रे व आयओटी (IoT) उपकरणांसारखी अनेक तंत्रज्ञाने प्रसारित झाली. काही शेतकऱ्यांनी ती स्वीकारली असलीतरी अनेकजण अद्याप सावध भूमिकेत असल्याचे सह्याद्री फार्म्स चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे यांनी यावेळी सांगितले. तंत्रज्ञानामुळे उत्पादन वाढते काखर्च व जोखीम कमी होते का आणि विक्रीत अधिक लाभ मिळतो का हे स्पष्ट झाल्याशिवाय शेतकरी गुंतवणूक करण्यास तयार होत नाहीत. केवळ कंपन्यांच्या दाव्यांपेक्षा प्रत्यक्ष यशस्वी शेतकऱ्यांचे उदाहरण आणि ‘पीअर व्हॅलिडेशन’ अधिक प्रभावी ठरते. लहान भूधारकांच्या पार्श्वभूमीवर सर्वसाधारण धोरणाऐवजी लक्षित गटांमध्ये प्रात्यक्षिके राबवणे आवश्यक आहे. शेतकरी उत्पादक कंपन्या आणि तंत्रज्ञान पुरवठादार यांच्यात समन्वय साधल्यास एआयचा वापर अधिक परिणामकारक ठरू शकतो. ऊस शेतीतील आयओटी वापरामुळे उत्पादकता व गुणवत्ता वाढल्याची उदाहरणे यासाठी मार्गदर्शक ठरत असल्याचे मत यांनी व्यक्त केले.


बाजारपेठेची स्‍थिरता कृषी विकासाची किल्ली

 बाजारपेठेची स्‍थिरता कृषी विकासाची किल्ली

 

·         संस्थात्मक वित्तीय संरचनेद्वारे एआय फॉर अॅग्रीला गती देणारे ‘ट्रस्ट इंजिन’ या परिसंवादात तज्ज्ञांचे मत

·         कृषी क्षेत्रात शासनाची भूमिका, सक्षम बाजारपेठ आणि व्यवस्थापनासाठी नाविन्यपूर्ण साधनांची गरज

 

मुंबई, दि. 22 : कृषी क्षेत्रात शासनाची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. यासोबतच बाजारपेठ मजबूत राहणेही गरजेचे आहे. उत्पादनाचे प्रमाणअधिशेष आणि अपयश याबाबत बाजारातून मिळणारे संकेत हे शेकडो वर्षांपासून कृषी व्यवस्थेचा अविभाज्य भाग राहिले आहेत. त्यामुळे बाजारपेठेची स्‍थिरता ही कृषी विकासाची किल्ली असल्याचे मत संस्थात्मक वित्तीय संरचनेद्वारे एआय फॉर अॅग्रीला गती देणारे ‘ट्रस्ट इंजिन’ या परिसंवादात तज्ज्ञांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र कृषी-कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण २०२५-२०२९’ अंतर्गत ‘जागतिक कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता परिषद आणि गुंतवणूकदार शिखर संमेलन’(एआय फॉर अॅग्री २०२६) आयोजित करण्यात आले आहे. या परिषदेतील संस्थात्मक वित्तीय संरचनेद्वारे एआय फॉर अॅग्रीला गती देणारे ‘ट्रस्ट इंजिन’ या परिसंवादात सह्याद्री फार्म्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदेनाबार्डचे मुख्य महाव्यवस्थापक संजीव डी. रोहिल्ला, अॅक्यूमनचे सहयोगी संचालक (पोर्टफोलिओ) पराग सभलोकनेदरलँड्स दूतावासच्या कृषी सल्लागार श्रीमती मॅरियन व्हॅन शायक यांनी सहभाग घेतला. या परिसंवादाचे समन्वयक म्हणून अन्न व कृषी संघटना (एफएओचे वरिष्ठ धोरण सल्लागार रमन आहुजा यांनी संवाद साधला. कृषी व अन्नप्रणाली विषयक चर्चासत्रात शासनाची निर्णायक भूमिकासक्षम आणि सशक्त बाजारपेठेची आवश्यकता तसेच कृषी क्षेत्रातील जोखमींचे व्यवस्थापन यावर विशेष भर देण्यात आला.

जगातील सुमारे निम्मी लोकसंख्या उदरनिर्वाहासाठी कृषी-अन्न प्रणालीवर अवलंबून असल्याने ती विविध नैसर्गिक व आर्थिक जोखमींना सामोरी जाते. हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर या जोखमी अधिक तीव्र होण्याची शक्यता असते. त्यामुळे जोखीम व्यवस्थापनासाठी नाविन्यपूर्ण आर्थिक व तांत्रिक साधने विकसित करण्याची गरज यावेळी अधोरेखित करण्यात आली. या प्रक्रियेत शासकीय उपक्रमगुंतवणूकदार आणि उद्योजक यांची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

चर्चेदरम्यान दक्षिणेतील देशांच्या कृषी क्षेत्रातील अनुभवांचा उल्लेख करताना वर्तन बदलाची गरज अधोरेखित करण्यात आली. केवळ धोरणात्मक उपाय पुरेसे नसून मूल्यसाखळीतील सर्व घटकांमध्ये मानसिकतेत बदल आवश्यक आहे. उद्योजक दृष्टीकोनवित्तीय उत्पादनांची नव्या पद्धतीने रचना आणि गुंतवणुकीची तयारी या बाबींवर भर देण्यात आला. बँकिंग व्यवस्थेतही अधिक सक्रिय आणि परिणामाभिमुख दृष्टिकोन आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. कृत्रिम बुद्धिमत्ता या बदलाला चालना देऊ शकतेमात्र ती डिजिटल व भौतिक या दोन्ही माध्यमांचा समन्वय साधणारी असावीअसेही नमूद करण्यात आले. मानवी स्पर्श आणि प्रत्यक्ष संवाद यांचे महत्व कायम असल्याचे सहभागी तज्ञांनी यावेळी सांगितले.


 

Featured post

Lakshvedhi