Tuesday, 2 June 2026

पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकत एसटी

 पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकत एसटी परिवाराने यावर्षी ‘७८ हजार वृक्ष लागवडीचा संकल्प’ केल्याची माहिती देताना मंत्री सरनाईक म्हणाले की, राज्यातील प्रत्येक आगार, बसस्थानक आणि कर्मचारी या मोहिमेत सहभागी होणार आहे. पर्यावरण रक्षण ही केवळ शासनाची नव्हे तर समाजाची सामूहिक जबाबदारी असून ‘एक वृक्ष – एक जीवन’ हा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम एसटी करणार आहे.

यासोबतच “स्वच्छ एसटी – सुंदर एसटी” ही संकल्पना अधिक व्यापकपणे राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्यातील सर्व बसस्थानके, बसस्थानक परिसर, एसटी बसेस तसेच चालक-वाहकांच्या विश्रांतीगृहांची नियमित स्वच्छता आणि टापटीपपणा राखण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे. प्रवाशांना स्वच्छ, सुरक्षित आणि सुखकर प्रवासाचा अनुभव देणे ही एसटीची प्राथमिक जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.

महामंडळाच्या आर्थिक शिस्तीसाठी इंधन बचतीचे महत्व अधोरेखित करत मंत्री सरनाईक म्हणाले की, प्रत्येक आगाराने दररोज किमान पाच लिटर डिझेल बचत करण्याचा संकल्प केला आहे. छोट्या-छोट्या बचतीतून मोठी आर्थिक उभारणी शक्य होते. इंधन बचतीमुळे महामंडळाच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याबरोबरच प्रदूषण नियंत्रणालाही मोठा हातभार लागणार आहे. त्यामुळे सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जबाबदारीने काम करून ही मोहीम यशस्वी करावी, असे आवाहन त्यांनी केले.

७८ हजार वृक्ष लागवड आणि इंधन बचतीची व्यापक मोहीम

 ७८ हजार वृक्ष लागवड आणि इंधन बचतीची व्यापक मोहीम

-परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

·         स्वच्छ, हरित आणि सक्षम एसटी घडवण्याचा संकल्प;

·         एसटीचा ७८ वा वर्धापन दिन

 

मुंबई, दि. १  : महाराष्ट्राच्या जनमानसाशी अतूट नाळ जुळलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त संपूर्ण एसटी परिवाराने स्वच्छ एसटी, हरित एसटी आणि बचत करणारी सक्षम एसटी घडविण्याचा निर्धार करावा, असे आवाहन परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले.

 

एसटीच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त दिलेल्या शुभेच्छा संदेशात मंत्री सरनाईक म्हणाले की, बहुजन हिताय, बहुजन सुखाय हे ब्रीद अंगीकारून एसटीने गेली ७८ वर्षे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अखंड सेवा पोहोचवली आहे. डोंगर-दऱ्या, दुर्गम आदिवासी भाग, ग्रामीण क्षेत्रे, शहर आणि महानगरांना जोडणारी लालपरी ही केवळ वाहतुकीचे साधन नसून महाराष्ट्राच्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक जीवनाची जीवनवाहिनी बनली आहे.

 

एसटीच्या या गौरवशाली प्रवासामागे लाखो अधिकारी, कर्मचारी, चालक-वाहक, निवृत्त सेवक आणि प्रवाशांचे योगदान असल्याचे नमूद करत त्यांनी सर्वांचे अभिनंदन केले. अनेक संकटांच्या काळातही एसटी कर्मचाऱ्यांनी निष्ठेने आणि समर्पणाने सेवा देत समाजाप्रती आपले कर्तव्य पार पाडले असून अशा प्रत्येक कर्मचाऱ्याला आज सलाम करण्याची भावना असल्याचे त्यांनी सांगितले.

ई-बसों के लिए चार्जिंग स्टेशनों का नेटवर्क विकसित करें

 ई-बसों के लिए चार्जिंग स्टेशनों का नेटवर्क विकसित करें

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्रके तहत एसटी के 100 प्रतिशत बेड़े को ई-बसों में परिवर्तित करने का लक्ष्य

 

मुंबई, 1 जून : विकसित महाराष्ट्रके अंतर्गत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडल (एसटी) में वर्ष 2029 तक 50 प्रतिशत, 2035 तक 80 प्रतिशत तथा 2047 तक एसटी के 100 प्रतिशत बेड़े को ई-बसों में परिवर्तित करने का लक्ष्य निर्धारित किया गया है। इस संदर्भ में बसों के लिए आवश्यक चार्जिंग स्टेशनों की स्थापना के कार्य में तेजी लाने के निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने दिए।

 

मुख्यमंत्री फडणवीस की अध्यक्षता में वर्षा निवास पर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडल की ई-बसों के संबंध में बैठक आयोजित की गई। इस बैठक में परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (वीडियो कॉन्फ्रेंसिंग के माध्यम से), मुख्यमंत्री के अपर मुख्य सचिव लोकेश चंद्र, अपर मुख्य सचिव संजय सेठी, एसटी के उपाध्यक्ष एवं प्रबंध निदेशक डॉ. माधव कुसेकर, मुख्यमंत्री के निवेश सलाहकार कौस्तुभ धवसे, उप सचिव चेतन निकम तथा अन्य अधिकारी उपस्थित थे।

 

मुख्यमंत्री फडणवीस ने कहा कि जिन मार्गों पर पर्यावरण-अनुकूल ई-बसें चलाई जानी हैं, उनका कृत्रिम बुद्धिमत्ता (एआई) तकनीक के माध्यम से अध्ययन किया जाए। आपूर्तिकर्ता से बसें प्राप्त होते ही अगले सात दिनों के भीतर उनका निरीक्षण किया जाए। इन बसों के लिए एक समग्र इकोसिस्टम विकसित किया जाए। जिन मार्गों पर निजी बसें संचालित होती हैं, उनका भी अध्ययन कर ई-बसों का विकल्प तैयार रखा जाए।

 

राज्य सरकार की वर्तमान ई-वाहन नीति के अंतर्गत सार्वजनिक परिवहन व्यवस्था में ई-बसों के उपयोग को बढ़ावा देने के लिए प्रोत्साहन दिया जा रहा है। इस नीति के अनुसार 1,500 ई-बसों के लिए बस की लागत का 10 प्रतिशत अथवा अधिकतम 20 लाख रुपये तक की सब्सिडी प्रदान करने का प्रावधान किया गया है। राज्य में पर्यावरण-अनुकूल और टिकाऊ सार्वजनिक परिवहन व्यवस्था विकसित करने के उद्देश्य से यह नीति महत्वपूर्ण है।

 

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडल वर्तमान में जीसीसी (ग्रॉस कॉस्ट कॉन्ट्रैक्ट) मॉडल पर 5,150 ई-बसों की महत्वाकांक्षी परियोजना लागू कर रहा है। मुख्यमंत्री फडणवीस ने कहा कि इस परियोजना के माध्यम से राज्य के यात्रियों को आधुनिक, आरामदायक और प्रदूषण-मुक्त यात्रा की सुविधा उपलब्ध होगी।

रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी

 रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट सांस्कृतिक सादरीकरण केल्याबद्दल राज्यपालांनी त्यांना कौतुकाची थाप दिली. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या 'मारिया पिता शे' या गोव्याच्या गीत-नृत्याला उपस्थितांनी दाद दिली.

कार्यक्रमात सिक्कीमचे राज्यपाल ओम प्रकाश माथूर व गोव्याचे राज्यपाल अशोक गजपती राजू पुसपति यांचे व्हिडीओ संदेश दाखविण्यात आले, तसेच दोन्ही राज्यांचा इतिहास, वारसा, पर्यटनस्थळे दाखविणारे लघुपट दाखविण्यात आले.

रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ अपूर्वा पालकर यांनी यावेळी राज्यपालांचा सत्कार केला.

कार्यक्रमाला राज्यपालांचे सहसचिव एस राममूर्ती, परिवार प्रबंधक डॉ निशिकांत देशपांडे व मुंबईत शिक्षण व्यवसायानिमित्त स्थायिक झालेले सिक्कीमचे लोक उपस्थित होते. सहायक प्रशासकीय अधिकारी संजय करंगे यांनी आभार प्रदर्शन केले. 


Monday, 1 June 2026

महाराष्ट्र लोकभवन येथे सिक्कीम व गोवा राज्य स्थापना दिवस संपन्न

 महाराष्ट्र लोकभवन येथे सिक्कीम व गोवा राज्य स्थापना दिवस संपन्न

 

मुंबई, दि. 1 : राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र लोकभवन येथे सिक्कीम व गोवा राज्य स्थापना दिवस आज सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला.

रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या सहकार्याने आयोजित या कार्यक्रमात विद्यापीठाच्या तांत्रिक व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी सिक्कीम व गोवा राज्यांची लोकगीते व लोकनृत्ये सादर केली.

विविध राज्यांमध्ये राज्य स्थापना दिवस साजरे केल्यामुळे त्या - त्या राज्यांच्या संस्कृती, वेशभूषा, नृत्य व सांस्कृतिक परंपरेचे दर्शन होते व त्यातून राष्ट्रीय एकात्मता बळकट होते, असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी यावेळी केले.

सिक्कीम व गोवा राज्य परस्परांपासून शेकडो मैल दूर असली तरीही दोन्ही राज्यांच्या विविधतेतून एकात्मता दिसून येते असे राज्यपालांनी सांगितले.

सिक्कीम राज्य सुंदर गिरीरांगांनी नटलेले आहे तर गोव्याला सुंदर समुद्र किनारा लाभला आहे. दोन्ही राज्ये राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पर्यटकांच्या पसंतीची राज्ये ठरली आहेत. 

'एक भारत श्रेष्ठ भारत' हा एकसमानता साजरे करणारा उपक्रम नसून तो विविधता साजरा करणारा उत्सव आहे, असे राज्यपालांनी सांगितले.

भारत हा केवळ भौगोलिक सीमांनी बांधलेला प्रदेश नसून तो विविधांगी संस्कृतीनी सजलेला देश आहे असे त्यांनी सांगितले. गोवा महाराष्ट्राचा शेजारी आहे, आणि दोन्ही राज्यांमध्ये सांस्कृतिक देवाण घेवाण होते. मुंबईत कामानिमित्त आलेल्या सिक्कीमच्या लोकांनी आपली संस्था निर्माण करावी व परस्परांना सहकार्य करावे असे राज्यपालांनी सांगितले.   

रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट सांस्कृतिक सादरीकरण केल्याबद्दल राज्यपालांनी त्यांना कौतुकाची थाप दिली. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या 'मारिया पिता शे' या गोव्याच्या गीत-नृत्याला उपस्थितांनी दाद दिली.

कार्यक्रमात सिक्कीमचे राज्यपाल ओम प्रकाश माथूर व गोव्याचे राज्यपाल अशोक गजपती राजू पुसपति यांचे व्हिडीओ संदेश दाखविण्यात आले, तसेच दोन्ही राज्यांचा इतिहास, वारसा, पर्यटनस्थळे दाखविणारे लघुपट दाखविण्यात आले.

रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ अपूर्वा पालकर यांनी यावेळी राज्यपालांचा सत्कार केला.

कार्यक्रमाला राज्यपालांचे सहसचिव एस राममूर्ती, परिवार प्रबंधक डॉ निशिकांत देशपांडे व मुंबईत शिक्षण व्यवसायानिमित्त स्थायिक झालेले सिक्कीमचे लोक उपस्थित होते. सहायक प्रशासकीय अधिकारी संजय करंगे यांनी आभार प्रदर्शन केले.

एक भारत श्रेष्ठ भारत' हा एकसमानता साजरे करणारा उपक्रम

 एक भारत श्रेष्ठ भारत' हा एकसमानता साजरे करणारा उपक्रम नसून तो विविधता साजरा करणारा उत्सव आहे, असे राज्यपालांनी सांगितले.

भारत हा केवळ भौगोलिक सीमांनी बांधलेला प्रदेश नसून तो विविधांगी संस्कृतीनी सजलेला देश आहे असे त्यांनी सांगितले. गोवा महाराष्ट्राचा शेजारी आहे, आणि दोन्ही राज्यांमध्ये सांस्कृतिक देवाण घेवाण होते. मुंबईत कामानिमित्त आलेल्या सिक्कीमच्या लोकांनी आपली संस्था निर्माण करावी व परस्परांना सहकार्य करावे असे राज्यपालांनी सांगितले.   

रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट सांस्कृतिक सादरीकरण केल्याबद्दल राज्यपालांनी त्यांना कौतुकाची थाप दिली. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या 'मारिया पिता शे' या गोव्याच्या गीत-नृत्याला उपस्थितांनी दाद दिली.

कार्यक्रमात सिक्कीमचे राज्यपाल ओम प्रकाश माथूर व गोव्याचे राज्यपाल अशोक गजपती राजू पुसपति यांचे व्हिडीओ संदेश दाखविण्यात आले, तसेच दोन्ही राज्यांचा इतिहास, वारसा, पर्यटनस्थळे दाखविणारे लघुपट दाखविण्यात आले.

रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ अपूर्वा पालकर यांनी यावेळी राज्यपालांचा सत्कार केला.

कार्यक्रमाला राज्यपालांचे सहसचिव एस राममूर्ती, परिवार प्रबंधक डॉ निशिकांत देशपांडे व मुंबईत शिक्षण व्यवसायानिमित्त स्थायिक झालेले सिक्कीमचे लोक उपस्थित होते. सहायक प्रशासकीय अधिकारी संजय करंगे यांनी आभार प्रदर्शन केले. 

००००

महाराष्ट्र लोकभवन येथे सिक्कीम व गोवा राज्य स्थापना दिवस संपन्न

 महाराष्ट्र लोकभवन येथे सिक्कीम व गोवा राज्य स्थापना दिवस संपन्न

 

मुंबई, दि. 1 : राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र लोकभवन येथे सिक्कीम व गोवा राज्य स्थापना दिवस आज सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला.

रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या सहकार्याने आयोजित या कार्यक्रमात विद्यापीठाच्या तांत्रिक व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी सिक्कीम व गोवा राज्यांची लोकगीते व लोकनृत्ये सादर केली.

विविध राज्यांमध्ये राज्य स्थापना दिवस साजरे केल्यामुळे त्या - त्या राज्यांच्या संस्कृती, वेशभूषा, नृत्य व सांस्कृतिक परंपरेचे दर्शन होते व त्यातून राष्ट्रीय एकात्मता बळकट होते, असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी यावेळी केले.

सिक्कीम व गोवा राज्य परस्परांपासून शेकडो मैल दूर असली तरीही दोन्ही राज्यांच्या विविधतेतून एकात्मता दिसून येते असे राज्यपालांनी सांगितले.

सिक्कीम राज्य सुंदर गिरीरांगांनी नटलेले आहे तर गोव्याला सुंदर समुद्र किनारा लाभला आहे. दोन्ही राज्ये राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पर्यटकांच्या पसंतीची राज्ये ठरली आहेत. 

Featured post

Lakshvedhi