Thursday, 27 August 2026

सायबर गुन्हे रोखण्यासाठी जनजागृती हा सर्वात प्रभावी उपाय,‘डिजिटल अरेस्ट’ या ४२ मिनिटांच्या जनजागृती

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सायबर गुन्हे रोखण्यासाठी जनजागृती हा सर्वात प्रभावी उपाय असून कलाकार, अभिनेते आणि गायकांच्या माध्यमातून हा संदेश नागरिकांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचू शकतो, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

डिजिटल अरेस्टया ४२ मिनिटांच्या जनजागृती चित्रपटासह विविध क्लिप्स आणि रील्सच्या माध्यमातून सोशल मीडियावर व्यापक अभियान राबवून हा संदेश प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविण्याची गरज आहे.

आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे व्हॉईस क्लोनिंग, डीपफेक तसेच बनावट ऑडिओ आणि व्हिडिओ तयार करण्याचे नवे आव्हान निर्माण झाले आहे. या आव्हानांचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र सायबरकडून सुरू असलेले कार्य प्रशंसनीय असून, भविष्यातही सर्वांच्या सहकार्याने व्यापक सायबर जनजागृती मोहीम यशस्वी होईल, असा विश्वास मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

सायबर गुन्हेगारांकडून पार्सलमध्ये ड्रग्ज सापडल्याचे सांगणे, ओटीपी फ्रॉड, बनावट फोन कॉल, पोलीस अथवा सीबीआयच्या नावाने धमकावणे अशा

 सायबर गुन्हेगारांकडून पार्सलमध्ये ड्रग्ज सापडल्याचे सांगणे, ओटीपी फ्रॉड, बनावट फोन कॉल, पोलीस अथवा सीबीआयच्या नावाने धमकावणे अशा विविध क्लृप्त्यांचा वापर केला जातो. स्क्रीनवर खाकी वर्दीतील व्यक्ती, पोलीस अधिकारी किंवा न्यायाधीशांचे रूप पाहून सामान्य नागरिक घाबरून जातो आणि त्यातून फसवणुकीला बळी पडतो. त्यामुळे अशा कोणत्याही दबावाला किंवा भीतीला बळी न पडण्याचे आवाहन मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केले.

सायबर फसवणुकीनंतरचा ‘गोल्डन अवर’ अत्यंत महत्त्वाचा

.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सायबर फसवणुकीनंतरचा गोल्डन अवरअत्यंत महत्त्वाचा असून, या काळात तक्रार नोंदविल्यास फसवणुकीची रक्कम रोखण्याची किंवा परत मिळविण्याची शक्यता अधिक असते. मात्र नागरिकांकडून तक्रार नोंदविण्यास तीन ते पंधरा दिवसांचा विलंब झाल्यास पैसे अनेक खात्यांमधून वळविले जातात आणि त्यांची रिकव्हरी अत्यंत कठीण होते. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात येताच विलंब न करता १९३० वर संपर्क साधणे आवश्यक आहे.

मोबाईल, ऑनलाइन व्यवहार, विविध पेमेंट गेटवे आणि डिजिटल माध्यमे ही दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग झाली आहेत. तंत्रज्ञानामुळे जीवन सुलभ झाले असले, तरी त्याचबरोबर नागरिक सायबर गुन्ह्यांना बळी पडण्याची शक्यताही वाढली आहे. या पार्श्वभूमीवर सायबर गुन्हेगारांचा मुकाबला करण्यासाठी पोलिस यंत्रणेला आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यासोबतच नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृती करणे आवश्यक असल्याचे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी नमूद केले.

डिजिटल अरेस्ट’ सारखा प्रकार नाहीच; सायबर फसवणूक झाल्यास तातडीने १९३० वर तत्काळ संपर्क साधा

 डिजिटल अरेस्टसारखा प्रकार नाहीच; सायबर फसवणूक झाल्यास तातडीने

१९३० वर तत्काळ संपर्क साधा

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सायबर गुन्हे रोखण्यासाठी जनजागृती हा सर्वात प्रभावी उपाय

'डिजिटल अरेस्टसायबर जनजागृती लघुपटाचे आणि १९३० महाराष्ट्र सायबर अँथमचे लोकार्पण

 

मुंबई, दि. २६ : सायबर गुन्हेगारांकडून पोलीस, सीबीआय किंवा न्यायाधीशांच्या नावाने नागरिकांना भीती दाखवून, घाबरवून फसवणूक केली जाते. त्यामुळे नागरिकांनी अशा कोणत्याही प्रकारांना बळी न पडता सायबर फसवणूक झाल्यास तातडीने १९३०या सायबर हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

सह्याद्री अतिथीगृह येथे महाराष्ट्र सायबरच्या वतीने आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते डिजिटल अरेस्टया सायबर जनजागृती लघुपटाचे आणि १९३० महाराष्ट्र सायबर अँथमचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

नेपाळमधील पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिक व पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने

 नेपाळमधील पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिक व पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक माहिती संकलित करण्यात येत आहे.


ठाणे जिल्ह्यातील जे नागरिक/पर्यटक सध्या नेपाळमध्ये अडकले आहेत, अथवा ज्यांचा त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क होत नाही, त्यांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी संबंधित व्यक्तीची माहिती महाराष्ट्र शासनाच्या खालील “सहायता” पोर्टलवर तातडीने नोंदवावी.


महाराष्ट्र शासन – Emergency Evacuation Registration Portal :


https://geospatial.mahaseoc.in/Sahayata_gulf/


सदर पोर्टलवर संबंधित व्यक्तीचे नाव, पासपोर्ट क्रमांक, मोबाईल/WhatsApp क्रमांक, महाराष्ट्रातील पत्ता व जिल्हा, आपत्कालीन संपर्क क्रमांक, सध्याचा देश/शहर व पत्ता, GPS Location, Visa Details, सोबत असलेल्या व्यक्तींची संख्या, जवळचे विमानतळ तसेच वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती असल्यास त्याबाबतची माहिती भरता येईल.


तसेच आवश्यकता असल्यास जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्र, जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे यांच्याशीही संपर्क साधावा.

 जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष


ठाणे जिल्ह्यातील संबंधित नागरिक व त्यांच्या नातेवाईकांनी घाबरून न जाता वरील पोर्टलवर अचूक व संपूर्ण माहिती तातडीने भरावी, जेणेकरून राज्य शासन व संबंधित यंत्रणांना आवश्यक समन्वय व पुढील कार्यवाही करणे सुलभ होईल.


— जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत महाराष्ट्राची उत्तुंग कामगिरी; ‘उमेद’ अभियानाला राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

 प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत महाराष्ट्राची उत्तुंग कामगिरी;

उमेदअभियानाला राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

 

नवी दिल्ली, 26 : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेतील (पीएमएफएमइई) 'बीज भांडवल' (Seed Capital) घटकाच्या अत्यंत प्रभावी अंमलबजावणीबद्दल महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाला (उमेद) राष्ट्रीय स्तरावरील ‘Best Performance State’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

 

नवी दिल्ली येथील 'इंडिया हॅबिटॅट सेंटर' (India Habitat Centre) येथे आयोजित विशेष पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय अन्नप्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान यांच्या हस्ते हा गौरवपूर्ण पुरस्कार प्रदान करण्यात आला. या प्रसंगी महाराष्ट्राचे कृषी मंत्री  दत्तात्रय भरणे यांची प्रमुख उपस्थिती होती. हा राष्ट्रीय पुरस्कार 'उमेद' अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीधर दुबे पाटील यांनी स्वीकारला. केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी उमेद अभियानाच्या सातत्यपूर्ण कामगिरीचे कौतुक केले.

चाकण परिसरातील गुंतवणुकीला मोठी चालना मिळणार ; उद्योजकांचा महाराष्ट्रावर पूर्ण विश्वास

 चाकण परिसरातील गुंतवणुकीला मोठी चालना मिळणार ; उद्योजकांचा महाराष्ट्रावर पूर्ण विश्वास उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत

चाकण परिसरातील वाढत्या औद्योगिक गुंतवणुकीचा उल्लेख करताना उद्योग मंत्री डॉ उदय सामंत यांनी सांगितले की, उद्योजकांनी मागितलेली जमीन वर्षभरातच अपुरी पडेल, एवढी मोठी गुंतवणूक या भागात अपेक्षित आहे. त्यानुसार पायाभूत सुविधांशी संबंधित प्रश्न प्राधान्याने सोडविण्यात येत असून, राज्य शासन उद्योजकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.

चाकण-भोसरी परिसरातील उद्योजक राज्याबाहेर स्थलांतरित होत असल्याच्या चर्चांना फेटाळून लावत, महाराष्ट्रातील एकही उद्योजक राज्याबाहेर गेलेला नसून उद्योजकांचा महाराष्ट्रातील गुंतवणूक वातावरणावर आणि राज्य शासनावर पूर्ण विश्वास असल्याचे मंत्री डॉ.सामंत यांनी स्पष्ट केले.

-------000-----

Featured post

Lakshvedhi