Thursday, 26 February 2026

दशावतार नाट्य महोत्सवाचे ठाणे येथे आयोजन

 दशावतार नाट्य महोत्सवाचे ठाणे येथे आयोजन

 

मुंबई, दि. 24 : शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयमुंबई यांच्या वतीने ‘दशावतार नाट्य महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन सचिन तेंडुलकर स्टेडियममहात्मा फुले नगरसावरकर गरठाणे येथे करण्यात आले आहे. हा सोहळा बुधवार25 फेब्रुवारी ते 1 मार्च 2026 रोजी या कालावधीत सायंकाळी 6:30 वाजताठाणे  येथे होणार आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार व सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हा दशावतार महोत्सव पार पडणार आहे.


पीएम विश्वकर्मा योजनेत महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक

 पीएम विश्वकर्मा योजनेत महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दोन वर्षांपूर्वी सुरू केलेल्या पीएम विश्वकर्मा योजनेत महाराष्ट्रने तिसरा क्रमांक पटकावला. आतापर्यंत 27 लाख अर्ज प्राप्त झाले. तीन लाख उमेदवारांनी नोंदणी यशस्वी केलीत्यापैकी अडीच लाख जणांना प्रमाणित करून दोन लाख उमेदवारांना 18 प्रकारातील ट्रेडनिहाय  प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती सभापती रविंद्र साठे यांनी दिली.

अधिक माहितीसाठी एमएसएमईचे उपसंचालक सुनील खुजनरे मुंबई (मो. ८३०८४०९०१९) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मुंबईत 27,28 फेब्रुवारीला पीएम विश्वकर्मा प्रदर्शन व व्यापार मेळावा

 मुंबईत 27,28 फेब्रुवारीला पीएम विश्वकर्मा प्रदर्शन व व्यापार मेळावा

- सभापती रवींद्र साठे

ग्रामीण कारागिरांना प्रोत्साहन देण्यासाठी वस्तू खरेदी कराव्यात

 

मुंबईदि. 24 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वदेशी उत्पादनांच्या वापराचे केलेले आवाहन तसेच पीएम विश्वकर्मा योजनेच्या प्रसारासाठी केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने मुंबईत 27 आणि 28 फेब्रुवारीला छोट्या  उद्योजकांच्या वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री  मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामीण कारागिरांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि सर्व कारागिरांचे उत्पादन अधिकाधिक लोकांपर्यंत जाण्यासाठी हे प्रदर्शन असून नागरिकांनी वस्तू खरेदी कराव्यातअसे आवाहन महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती (राज्यमंत्री दर्जा) रवींद्र साठे यांनी पत्रकार परिषदेत केले.

रविंद्र साठे यांनी सांगितले कीकेंद्र सरकारचे  सूक्ष्मलघु व मध्यम उद्योग मंत्रालय (एमएसएमई) आणि महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ यांच्या सहकार्याने हे प्रदर्शन सूक्ष्मलघु व मध्यम उद्योग मंत्रालययांचे कार्यालयघाटकोपर-अंधेरी लिंक रोडसाकीनाकाअंधेरी (पूर्व) येथे होणार आहे. हे प्रदर्शन आणि मेळावा सकाळी 10 ते संध्याकाळी या वेळेत सर्वांसाठी खुले  राहणार आहे. 

पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत महाराष्ट्रात आतापर्यंत 8 प्रदर्शनांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच कारागीर व शिल्पकारांच्या उत्पादनांच्या विपणन व ब्रँडिंगसंदर्भात जनजागृती करण्यासाठी 34 एकदिवसीय कार्यशाळाही आयोजित करण्यात आल्या आहेत. या प्रदर्शनात 100 स्टॉलद्वारे ग्रामीण भागातील छोट्या कारागिरानी तयार केलेल्या बांबू हस्तकलाफर्निचर साहित्यतयार कपडेमातीची भांडी (कुंभारकाम)दागिने तसेच इतर पारंपरिक हस्तकला उत्पादने ठेवण्यात येणार आहेत. खादी म्हणजे केवळ कापड नव्हेयामध्ये छोट्या उद्योजकांनी तयार केलेल्या विविध वस्तू आहेत. मुंबईतील नागरिकउद्योजकांनी प्रदर्शनास भेट देऊन स्वदेशी उत्पादनांची खरेदी करून स्थानिक कारागिरांना प्रोत्साहन द्यावेअसे आवाहन रविंद्र साठे यांनी केले आहे.

प्रदर्शनाचे उद्घाटन 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांच्या हस्ते होणार असून मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी गीतांजली बाविस्कर उपस्थित राहणार असल्याची माहिती एमएसएमईचे संचालक मिलिंद बारापात्रे यांनी दिली.

राष्ट्रीय मास्टर प्लॅन अंतर्गत तयार करण्यात आलेल्या या प्रकल्पांचा मुख्य उद्देश एकात्मिक नियोजन आणि विविध घटकांच्या

 प्रधानमंत्री गति शक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅन अंतर्गत तयार करण्यात आलेल्या या प्रकल्पांचा मुख्य उद्देश एकात्मिक नियोजन आणि विविध घटकांच्या सल्लामसलतीद्वारे बहुमार्गीय संपर्क मल्टीमॉडेल कनेक्टिव्हिटीर आणि वाहतूक कार्यक्षमता वाढवणे हा आहे. यामुळे लोक, वस्तू आणि सेवांची अखंडित वाहतूक सुनिश्चित होईल. या क्षमता वाढीमुळे देशातील अनेक महत्त्वाच्या पर्यटन स्थळांपर्यंत रेल्वे संपर्क सुधारेल, ज्यात जबलपूरचे कचनार शिव मंदिर, बालाघाटमधील कान्हा राष्ट्रीय उद्यान, पेंच राष्ट्रीय उद्यान, धुआंधार धबधबा आणि दलमा वन्यजीव अभयारण्य यांसारख्या प्रसिद्ध स्थळांचा समावेश आहे.

हे प्रकल्प कोळसापोलादलोखंड खनिजसिमेंटअन्नधान्य आणि खते यांसारख्या अत्यावश्यक वस्तूंच्या वाहतुकीसाठी महत्त्वाचे मार्ग उपलब्ध करून देतील. या रेल्वेमार्गांच्या विस्तारामुळे दरवर्षी 52 दशलक्ष टन (MTPA) अतिरिक्त मालवाहतूक शक्य होईल. रेल्वे हा पर्यावरणपूरक आणि ऊर्जा-कार्यक्षम पर्याय असल्यानेहे प्रकल्प देशाच्या हवामान उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी सहायक ठरतील. यामुळे तेल आयातीत सुमारे 6कोटी लिटरची बचत होईल आणि 30 कोटी किलोग्रॅम कार्बन उत्सर्जन घटणार आहेजे सुमारे कोटी वृक्ष लागवडीइतके परिणामकारक ठरेल.

केंद्रीय मंत्रिमंडळाकडून महाराष्ट्रासह 8 जिल्ह्यांतील रेल्वे मार्गवाढीच्या तीन मल्टी-ट्रॅकिंग प्रकल्पांना मंजुरी · गोंदिया -जबलपूर मार्ग दुहेरीकरणाला मंजुरी

  

केंद्रीय मंत्रिमंडळाकडून महाराष्ट्रासह 8 जिल्ह्यांतील रेल्वे मार्गवाढीच्या

तीन मल्टी-ट्रॅकिंग प्रकल्पांना मंजुरी

·         गोंदिया -जबलपूर मार्ग दुहेरीकरणाला मंजुरी

 

नवी दिल्ली, 24 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीने रेल्वे मंत्रालयाच्या सुमारे 9,072 कोटी रुपयांच्या तीन महत्त्वाच्या रेल्वे मार्गवाढीच्या प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. या प्रकल्पांमध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रातील गोंदिया – जबलपूर मार्ग दुहेरीकरणाचा समावेश आहे.

महाराष्ट्रमध्य प्रदेशबिहार आणि झारखंड या चार राज्यांतील8 जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येणाऱ्या या प्रकल्पांमुळे भारतीय रेल्वेच्या विद्यमान जाळ्यात सुमारे 307 कि.मी.ची भर पडणार आहे. यामध्ये गोंदिया-जबलपूर दुहेरीकरणासोबतच पुनारख-किऊल आणि गम्हरिया-चांडिल या मार्गांच्या तिसऱ्या आणि चौथ्या लाईनच्या कामांचा समावेश आहे.

या प्रस्तावित मल्टी-ट्रॅकिंग प्रकल्पामुळे सुमारे 5,407 गावे आणि जवळपास 98 लाख लोकसंख्येचा रेल्वे संपर्क अधिक सुधारेल. रेल्वे मार्गांची वाढलेली क्षमता वाहतूक व्यवस्थेत लक्षणीय सुधारणा घडवून आणेलज्यामुळे भारतीय रेल्वेची कार्यक्षमता आणि सेवा विश्वसनीयता वाढेल. या निर्णयामुळे रेल्वे संचालन अधिक सुलभ होईल आणि प्रवासी तसेच मालवाहतुकीतील गर्दी कमी होण्यास मोठी मदत होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नवीन भारत’ दृष्टिकोनानुसार हे प्रकल्प प्रादेशिक सर्वांगीण विकास साधण्यावर भर देतातज्यातून स्थानिक स्तरावर रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी वाढून नागरिक आत्मनिर्भर बनतील.

विद्यार्थी आणि पालकांच्या योगदानातून बालभवनचे कार्य

 विद्यार्थी आणि पालकांच्या योगदानातून बालभवनचे कार्य अधिकाधिक उत्तम होत आहे. बालभवनची नवीन वास्तू आता आकार घेत आहे. ही नवी वास्तू नवतंत्रज्ञानाने सुसज्ज अशी राहणार असून त्यामध्ये वातानुकुलीत ई-लॅबभव्य प्रेक्षागृह आदी सर्वच सुविधा राहणार असल्याचे बालभवनच्या संचालिका निता पाटील यांनी प्रास्ताविकात सांगितले.

 

वर्धापन दिनानिमित्त निबंध लेखनकाव्यलेखनचित्रकलारंगभरणगायन व नृत्य अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. राज्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये सहभाग नोंदविला. या स्पर्धेतील विजेत्यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात सन्मानित करण्यात आले.

Wednesday, 25 February 2026

जवाहर बालभवनमध्ये चित्रकला, संगीत, नृत्य, नाटक, विज्ञान, योग तसेच विविध सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून

 शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे म्हणाले, देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी २४ फेब्रुवारी १९५२ रोजी बालभवनाच्या इमारतीचे उदघाटन केले. या बालभवनाला आता ७४ वर्षे पूर्ण होत आहेत. जवाहर बालभवनमध्ये चित्रकलासंगीतनृत्यनाटकविज्ञानयोग तसेच विविध सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व कौशल्यांना चालना दिली जाते. येथे केवळ कला शिक्षणापुरते मर्यादित न राहता जीवनमूल्येशिस्तसंघभावना आणि नेतृत्वगुणांचीही जोपासना केली जातेअसे प्रशंसोद्गार शालेय शिक्षण मंत्री श्री भुसे यांनी यावेळी काढले.

Featured post

Lakshvedhi