थीम साँग, माहितीपटाद्वारे प्रचार-प्रसिध्दी
याशिवाय व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून २०० शाळा जोडण्यात आल्या असून, थीम साँग आणि माहितीपटाद्वारे विद्यार्थ्यांना कार्यक्रमाची माहिती देण्यात येत आहे. चेंबूर, देवनार आणि मानखुर्द येथून नवी मुंबईकडे जाणाऱ्या भाविकांसाठी वाहतूक व सुरक्षा व्यवस्थेची तयारी करण्यात आली आहे.
या शहीदी समागमाच्या निमित्ताने सिख, सिकलगर, बंजारा, लबाना, सिंधी, मोहयाल, वाल्मीकी, उदासीन आणि वारकरी संप्रदायातील प्रतिनिधी सुमारे ३०० वर्षांनंतर एकत्र येणार असून, राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश या कार्यक्रमातून दृढ होणार आहे. या कार्यक्रमासाठी येणाऱ्या भाविकांना सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने कार्य करावे, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. बैठकीत विविध विभागांकडून करण्यात येणाऱ्या तयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
यावेळी पश्चिम उपनगरचे उपविभागीय अधिकारी प्रशांत ढगे, सहा.जनसंपर्क अधिकारी बृह्न्मुंबई महानगरपालिका विवेक राठोड, उपविभागीय अधिकारी पूर्व उपनगर कल्पना गोडे, तहसिलदार (महसूल) युवराज बांगर, तहसिलदार बोरीवली मुंबई उपनगर इरेश चप्पलवार, शासकीय सदस्य, तहसिलदार अंधेरी स्नेहलता स्वामी, शासकीय सदस्य, नायब तहसिलदार कुर्ला सुनिल कापडनिस, मनमोहन सिंग, सुखविंदर सिंग चेंबुरकॅम्प, गुरपिंदर सिंग, गुरू नानक सभा आदिसंह अधिकारी उपस्थित होते.