मीडिया अँड अरेना धोरणामध्ये मोठी ' कन्व्हेन्शन सेंटर' उभारण्यासाठी व्यवसाय सुलभता असावी. यामुळे राज्यातील मोठ्या शहरांमध्ये कन्व्हेन्शन सेंटर निर्माण होतील. प्रस्तावित केमिकल धोरणामध्ये राज्यात केमिकल पार्कचा समावेश असावा. या माध्यमातून रोजगार निर्मिती होईल. राज्यातील 'सर्कुलर इकॉनॉमी'च्या विकासासाठी सर्वंकष धोरण आणावे. धोरणाची अंमलबजावणी करताना ती उद्योग सहाय्यकारी ठरेल याची यंत्रणांनी दक्षता घ्यावी, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
जय हो ०१
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Friday, 17 July 2026
सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांचे सर्वेक्षण करून उत्कृष्ट परिसंस्था निर्माण करा
सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांचे सर्वेक्षण करून उत्कृष्ट परिसंस्था निर्माण करा
-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
• उद्योग विभाग आढावा बैठक
• रोजगार निर्मितीची क्षमता असलेल्या क्षेत्रासाठी धोरणे आणावीत
मुंबई, दि. १७: देशामध्ये राज्यात सर्वाधिक गुंतवणूक येत आहे. या गुंतवणुकीचे रूपांतर उद्योगांमध्ये करण्यासाठी गुंतवणूकक्षम आणि रोजगार निर्मितीची क्षमता असलेल्या क्षेत्रांसाठी सर्वंकष धोरणे आणावीत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देत सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांचे सखोल सर्वेक्षण करून या क्षेत्राची उत्कृष्ट परिसंस्था निर्माण करण्याचेही सूचित केले.
राज्याच्या उद्योग विश्वाच्या वाढीसाठी धोरण तयार करताना संबंधित क्षेत्रातील तज्ञ, यशस्वी उद्योजक यांच्याशी चर्चा करावी. संबंधित उद्योग क्षेत्रात असलेली कमतरता या धोरणातून दूर होईल याचा प्रयत्न करण्यात यावा. तसेच सध्या अस्तित्वात असलेल्या विविध उद्योग विषयक धोरणांची प्रभावी अंमलबजावणी करावी, यामुळे संपन्न महाराष्ट्राची निर्मिती होईल असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.
पहिल्या वेव्हज् परिषदेने जागतिक स्तरावर प्रभावी छाप निर्माण केली असून
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, पहिल्या वेव्हज् परिषदेने जागतिक स्तरावर प्रभावी छाप निर्माण केली असून महाराष्ट्राच्या ब्रँड मूल्यामध्ये भर पडली आहे. त्यामुळे पुढील आवृत्ती अधिक भव्य आणि दर्जेदार करण्यासाठी नियोजनबद्ध तयारी आवश्यक आहे. हवामानाचा विचार करून परिषद फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये घेण्याचा प्रयत्न करावा, असेही त्यांनी सुचविले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी परिषदेसाठी जबाबदाऱ्या निश्चित करून प्रत्येक कामासाठी निश्चित कालमर्यादा ठरविण्याचे निर्देश दिले. कार्यक्रमस्थळाचे नियोजन, उभारणी, ब्रँडिंग, तांत्रिक सुविधा, प्रोटोकॉल, वाहतूक, प्रसिद्धी आणि जनसंपर्क यामध्ये कोणतीही त्रुटी राहणार नाही, याची दक्षता घेण्यास सांगितले.
बैठकीत माहिती व प्रसारण मंत्रालय आणि महाराष्ट्र शासन यांच्यातील समन्वय अधिक बळकट करण्यासाठी सामंजस्य करार, संयुक्त समन्वय समिती, भागीदारी मॉडेल तसेच उद्योग क्षेत्राचा अधिकाधिक सहभाग वाढविण्याबाबत चर्चा झाली. तसेच एव्हीजीसी क्षेत्रात अधिक गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी परिषदेचा प्रभावी वापर करण्यावरही भर देण्यात आला. तसेच परिषदेच्या आयोजनासाठी तांत्रिक पायाभूत सुविधा, मोबाईल आधारित नोंदणी प्रणाली, एकात्मिक डिजिटल प्लॅटफॉर्म, आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींसाठी स्वतंत्र प्रोटोकॉल व्यवस्था, प्रसिद्धी आणि जनसंपर्कासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील धोरण राबविण्याचे नियोजन करण्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी निर्देश दिले.
वेव्हज परिषदेच्या नियोजनात कोणतीही कमतरता राहणार नाही याची काळजी घ्या
वेव्हज परिषदेच्या नियोजनात कोणतीही कमतरता राहणार नाही याची काळजी घ्या
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
• वेव्हज 2027 परिषदेच्या तयारीला वेग
मुंबई, दि. 17 : जागतिक दर्जाच्या वेव्हज् परिषदेच्या तयारीला आतापासूनच वेग देत कार्यक्रमाचे नियोजन, विभागनिहाय जबाबदाऱ्या, अर्थसंकल्प, प्रसिद्धी, वाहतूक, तांत्रिक व्यवस्था आणि विविध समन्वयाच्या बाबी वेळेत पूर्ण कराव्यात. वेव्ह्ज-2027 अधिक व्यापक, सुटसुटीत आणि प्रभावी आयोजन करण्यावर भर द्यावा, तसेच परिषदेच्या नियोजनात कोणतीही कमतरता राहणार नाही याची काळजी घ्या असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान वर्षा येथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वेव्हज् 2027 च्या तयारीचा आढावा घेण्यात आला. यावेळी मुख्य सचिव राजेश अग्रवाल, माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव चंचल कुमार, मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती, मुंबई महानगर पालिका आयुक्त अश्विनी भिडे, मुंबई महानगर आयुक्त डॉ.संजय मुखर्जी, माहिती व जनसंपर्क प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ.पी.अन्बळगन, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिपेंद्रसिंह कुशवाह, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ.किरण कुलकर्णी, मुख्यमंत्र्यांचे गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे यांच्यासह केंद्र शासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते
क्वांटम तंत्रज्ञानामुळे अभियांत्रिकी, वैद्यकीय, अवकाश, उद्योग, संरक्षण अशा सर्वच क्षेत्रांत मोठी क्रांती
क्वांटम तंत्रज्ञानामुळे अभियांत्रिकी, वैद्यकीय, अवकाश, उद्योग, संरक्षण अशा सर्वच क्षेत्रांत मोठी क्रांती होणार असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पुढील काही वर्षात रोजगार क्षेत्राचे स्वरूप झपाट्याने बदलणार आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि प्राध्यापकांना भविष्यातील तंत्रज्ञानासाठी आजपासूनच सक्षम करणे आवश्यक आहे.
महाराष्ट्रात आयसर, सी-डॅक, टीआयएफआर, आयआयटी मुंबई, सीओईपी, व्हीएनआयटीसारख्या संस्थांमध्ये क्वांटम क्षेत्रातील क्षमता विकसित होत असून, या सर्व संस्थांची ताकद एकत्रित करून राज्याचे क्वांटम मिशन अधिक प्रभावीपणे पुढे नेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. प्रशिक्षणासाठी विकसित करण्यात आलेले अभ्यासक्रम, एलएमएस आणि 'चंद्र' व 'सूर्य' हे चॅटबॉट्स विद्यार्थ्यांच्या मूलभूत संकल्पना स्पष्ट करण्यात उपयुक्त ठरत असल्याचे नमूद करून या उपक्रमात सहभागी सर्व संस्था, तज्ज्ञ आणि प्राध्यापकांचे त्यांनी अभिनंदन केले.
राष्ट्रीय क्वांटम मिशनसाठी सुमारे सहा हजार कोटी रुपयांची तरतूद
राष्ट्रीय क्वांटम मिशनसाठी सुमारे सहा हजार कोटी रुपयांची तरतूद
ते म्हणाले की, केंद्र सरकारने राष्ट्रीय क्वांटम मिशनसाठी सुमारे सहा हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्र शासन राज्याचे स्वतंत्र क्वांटम मिशन राबवत असून, प्रशिक्षित प्राध्यापकांच्या माध्यमातून राज्यात मजबूत क्वांटम इकोसिस्टीम उभारण्याचा प्रयत्न सुरू आहे. पुढील टप्प्यात ५०० प्रशिक्षक आणि त्यानंतर किमान ५ हजारांहून अधिक क्वांटम प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्याचे उद्दिष्ट आहे.
क्वांटम तंत्रज्ञानामुळे अभियांत्रिकी, वैद्यकीय, अवकाश, उद्योग, संरक्षण अशा सर्वच क्षेत्रांत मोठी क्रांती होणार असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पुढील काही वर्षात रोजगार क्षेत्राचे स्वरूप झपाट्याने बदलणार आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि प्राध्यापकांना भविष्यातील तंत्रज्ञानासाठी आजपासूनच सक्षम करणे आवश्यक आहे.
अतिशय वेगाने बदलत असून डेटा-आधारित अर्थव्यवस्थेपासून आता उच्च गतीच्या
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जग अतिशय वेगाने बदलत असून डेटा-आधारित अर्थव्यवस्थेपासून आता उच्च गतीच्या डेटा प्रोसेसिंगच्या युगात प्रवेश होत आहे. भविष्यातील जागतिक स्पर्धेत एआय, सेमीकंडक्टर आणि क्वांटम तंत्रज्ञान निर्णायक भूमिका बजावणार आहेत. माहिती तंत्रज्ञान क्षेत्राप्रमाणेच क्वांटम क्षेत्रातही भारताने कुशल मनुष्यबळाच्या बळावर जागतिक नेतृत्व मिळविण्याची संधी साधली पाहिजे
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...