Wednesday, 4 February 2026

मुंबई - अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्र. 48 वर सतत

 


@ चौकट :-
● मुंबई - अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्र. 48 वर सतत होणारी वाहतूक कोंडी यावर वने मंत्री तथा पालकमंत्री गणेश नाईक यांनी वाहतूक शाखेला उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहे.
● शिरसाड नाका ते अंबाडी कडे जाणारा रस्ता खोदलेला असून ग्रामस्थाना नाहक त्रास होत आहे.
● वसई विरार शहर महानगरपालिका हद्दीत गोखीवरे चौकावर असलेले झाडे स्थलांतरित करणे, तसेच पेल्हार येथे होणारी वाहतूक कोंडी
या विषयावर परखडपणे त्यांनी आपली मते मांडली.

--
Regards,

Shahrukh Mulani
Call / WhatsApp no :– 9867733766

भगवान बिरसा मुंडा यांचे स्मारक उभारण्याचा ऐतिहासिक निर्णय ; आमदार विलास तरे यांच्या ठरावस सर्वानुमते मंजुरी

 भगवान बिरसा मुंडा यांचे स्मारक उभारण्याचा ऐतिहासिक निर्णय ; आमदार विलास तरे यांच्या ठरावस सर्वानुमते मंजुरी




पालघर. (प्रतिनिधी) – पालघर जिल्ह्याच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक जडणघडणीत मोलाची भर घालणारा एक महत्त्वपूर्ण निर्णय पालघर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत घेण्यात आला. थोर आदिवासी स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक आणि क्रांतिकारक भगवान बिरसा मुंडा यांचे स्मारक पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर उभारण्याचा ठराव आमदार विलास तरे यांनी मांडला असून, या ठरावास सर्व सदस्यांनी एकमताने मंजुरी दिली. या ऐतिहासिक निर्णयामुळे आदिवासी समाजात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

आमदार विलास तरे यांनी ठराव मांडताना सांगितले की, भगवान बिरसा मुंडा यांनी ब्रिटिश सत्तेविरोधात केलेला संघर्ष, आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी दिलेले बलिदान आणि सामाजिक जागृतीचे कार्य हे आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे. मात्र, त्यांच्या स्मृती जतन करणारे ठोस स्वरूपाचे स्मारक पालघर जिल्ह्यात अद्याप अस्तित्वात नाही. आदिवासी बहुल असलेल्या पालघर जिल्ह्यात भगवान बिरसा मुंडा यांचे स्मारक उभारणे ही काळाची गरज असून, यामुळे त्यांच्या विचारांचा प्रचार-प्रसार होण्यास मदत होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. या ठरावास आमदार शांताराम मोरे यांनी अनुमोदन दिले. त्यांनीही भगवान बिरसा मुंडा यांच्या कार्याचे महत्त्व अधोरेखित करत, आदिवासी समाजाच्या इतिहासाला आणि स्वाभिमानाला चालना देणारा हा निर्णय असल्याचे मत व्यक्त केले. त्यानंतर उपस्थित सर्व सदस्यांनी या प्रस्तावास पाठिंबा दर्शविला आणि कोणताही विरोध न होता हा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.

बैठकीदरम्यान हा ठराव मंजूर होताच सभागृहात समाधानाची भावना व्यक्त करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात स्मारक उभारल्यास, जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांना, विद्यार्थी-युवकांना आणि पर्यटकांना भगवान बिरसा मुंडा यांच्या कार्याची ओळख होईल. तसेच आदिवासी समाजाच्या इतिहासाला शासकीय पातळीवर मान्यता मिळाल्याचा हा ठोस पुरावा ठरेल, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. या बैठकीत जिल्ह्याशी संबंधित इतर विकासात्मक व नागरी समस्यांवरही चर्चा झाली असली, तरी भगवान बिरसा मुंडा स्मारकाचा ठराव हा बैठकीचा केंद्रबिंदू ठरला. सामाजिक समरसता, ऐतिहासिक जाणीव आणि आदिवासी अस्मितेला बळ देणारा हा निर्णय पालघर जिल्ह्याच्या इतिहासात महत्त्वाचा टप्पा ठरेल, अशी प्रतिक्रिया विविध स्तरांतून व्यक्त होत आहे.

आमदार विलास तरे यांनी या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त करताना सांगितले की, हा ठराव केवळ स्मारक उभारण्यापुरता मर्यादित नसून, आदिवासी समाजाच्या संघर्ष, त्याग आणि स्वाभिमानाला दिलेला सन्मान आहे. प्रशासनाने तातडीने पुढील प्रक्रिया पूर्ण करून स्मारक उभारणीचे काम सुरू करावे, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

फ्लोटिंग सोलर पॉवर जनरेशन पॉलिसीचा आढावा

 फ्लोटिंग सोलर पॉवर जनरेशन पॉलिसीचा आढावा


जलसंपदा विभागाने तयार केलेल्या फ्लोटिंग सोलर पॉवर जनरेशन पॉलिसीच्या आराखड्याचा आढावा यावेळी घेण्यात आला. हा आराखडा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर सादर करण्याच्या दृष्टीने आवश्यक तयारी करण्याचे निर्देश जलसंपदा मंत्री विखे- पाटील यांनी दिले.


तसेच महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रमांतर्गत पाटबंधारे नियम, १९७६ मध्ये प्रस्तावित बदल करण्याबाबतच्या तरतुदी मंत्रिमंडळ बैठकीत मांडण्यात येणार असून, त्यासंदर्भातही बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.


यावेळी गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळांतर्गत आर्थिक वर्ष २०२६-२७ मध्ये राबविण्यात येणाऱ्या विविध सिंचन प्रकल्प, विकासकामे तसेच नदीजोड प्रकल्पांसाठीच्या अर्थसंकल्पीय तरतुदींची माहिती सादर करण्यात आली.


-----------000---------

पाटबंधारे विकास महामंडळाच्या अखत्यारीतील अतिरिक्त जमिनी पर्यावरणपूरक व पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करून

 जलसंपदा मंत्री श्री. विखे पाटील म्हणाले कीपाटबंधारे विकास महामंडळाच्या अखत्यारीतील अतिरिक्त जमिनी पर्यावरणपूरक व पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करून महामंडळाचे उत्पन्नाचे स्रोत वाढविण्यात येणार आहेत. धरण क्षेत्रालगतच्या या जमिनी सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP) तत्त्वावर विकसित व व्यवस्थापित करण्यासाठी धोरण निश्चित करण्यात आले आहे. पुणे व सोलापूर जिल्ह्यांत  कार्यवाही सुरू झाली असून या धोरणानुसार पुढील कार्यवाही केली जाईल.

नदीजोड प्रकल्पांतील कामांचा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी घेतला आढावा

 नदीजोड प्रकल्पांतील कामांचा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी घेतला आढावा

 

मुंबईदि 4 :- राज्यात राबविण्यात येत असलेल्या महत्त्वाकांक्षी नदीजोड प्रकल्पांतील कामांना गती देण्याच्या अनुषंगाने जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे- पाटील यांनी सविस्तर आढावा घेतला.

 दमणगंगावैतरणागोदावरी नदीजोड प्रकल्पदमणगंगाएकदरे– गोदावरी नदीजोड प्रकल्प तसेच कृष्णा खोऱ्यातील पुराचे पाणी भीमा नदी खोऱ्यात वळविण्यासाठी सुरू असलेल्या कामांच्या प्रगतीचा आढावा यावेळी घेण्यात आला.

सह्याद्री अतिथीगृह येथे नदीजोड प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूरमहाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्र)चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशीनियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजयजलसंपदा सचिव संजय बेलसरेगोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक संतोष तिरमनवार यांच्यासह संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

कोकणातील जलसमृद्ध खोऱ्यांमधील अतिरिक्त पाणी गोदावरी खोऱ्यात वळवून नाशिक व मराठवाडा भागातील पाणीटंचाई दूर करणेहा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश असल्याचे जलसंपदा मंत्री श्री. विखे पाटील यांनी स्पष्ट केले.

राज्यात सुरू असलेले सर्व प्रकल्प येत्या तीन वर्षात पूर्ण होतील, असे नियोजन करावे.

 मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेराज्यात सुरू असलेले सर्व प्रकल्प येत्या तीन वर्षात पूर्ण होतीलअसे नियोजन करावे. यासाठी भूसंपादनाच्या प्रक्रियेला गती द्यावी. त्याचबरोबर वनक्षेत्र नसलेल्या जास्तीत जास्त सलग जागेचे भूसंपादन करुन ती उद्योजकांना उपलब्ध करुन द्यावीत. याशिवायविविध विभागाकडील शासकीय जमिनी औद्योगिक वापरासाठी विनामूल्य हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव सादर करावायामुळे उद्योजकांना कमी दरात भूखंड उपलब्ध होऊन राज्यातील औद्योगिक गुंतवणूक आणि रोजगारनिर्मितीला चालना मिळेलअसेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

विविध जिल्ह्यातील ‘एमआयडीसी’च्या भूसंपादनाबरोबरच ‘एमएसआरडीसी’कडील शक्तिपीठ एक्स्प्रेस

 विविध जिल्ह्यातील एमआयडीसीच्या भूसंपादनाबरोबरच एमएसआरडीसीकडील शक्तिपीठ एक्स्प्रेस वेविरार-अलिबाग मल्टिमोडल कॉरिडॉरनागपूर-गोंदिया एक्स्प्रेस वेभंडारा-गडचिरोली एक्स्प्रेस वेनागपूर चंद्रपूर एक्स्प्रेस वेनवेगाव-सुरजागड मिनरल कॉरिडॉरजालना नांदेड एक्स्प्रेस वे आदी प्रकल्पांच्या सुरू असलेल्या भूसंपादन प्रक्रियेचाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी आढावा घेतला.

Featured post

Lakshvedhi