Friday, 20 February 2026

पर्यावरण तज्ञांनी कृषी क्षेत्राकडेही लक्ष केंद्रित करण्याची गरज

 पर्यावरण तज्ञांनी कृषी क्षेत्राकडेही लक्ष केंद्रित करण्याची गरज

                                                - राज्यपाल आचार्य देवव्रत

राज्यपालांच्या उपस्थितीत मुंबई क्लायमेट वीकचा समारोप

 

            मुंबई, दि. 19 : कृषी क्षेत्रातील रसायनांच्या वाढत्या वापरामुळे शेती बरोबरच पर्यावरणाचीही मोठी हानी होत आहे. रासायनिक शेतीचे दुष्परिणाम घातक आहेत. त्यामुळे एकूणच पर्यावरण तर प्रदूषित होतच आहेशिवाय गंभीर आजारांचे संकटही वाढत आहे. त्यामुळे पर्यावरण तज्‍ज्ञांनी जागतिक पर्यावरण रक्षणाचा विचार करताना कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्थेचाही विचार करावा, असे आवाहन महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केले. 

            मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर येथे पार पडलेल्या मुंबई क्लायमेट वीकच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलारपर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडेमुंबईच्या महापौर रितू तावडेपर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव जयश्री भोजराज्यपालांचे सचिव प्रशांत नारनवरेसहसचिव एस. राममूर्थीप्रोजेक्ट मुंबईचे शिशिर जोशीजलज दानी आणि पर्यावरण प्रेमी उपस्थित होते.

उद्योगवृद्धीसाठी आधुनिक पायाभूत सुविधा, वेगवान

 उद्योगवृद्धीसाठी आधुनिक पायाभूत सुविधावेगवान आणि सुसंगत कनेक्टिव्हिटीएकल खिडकी प्रणालीद्वारे उद्योग सुलभता आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी करण्यात येणारे सामंजस्य करार हे महत्त्वाचे घटक ठरत आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा सेंटर क्षेत्रातील संधीऔद्योगिक समूह विकासलॉजिस्टिक सक्षमता आणि कौशल्य विकास या विषयांवरही परिषदेत सखोल चर्चा झाली.

राज्यात सुरू असलेल्या महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळअटल सेतू आणि हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग यांसारख्या उपक्रमांमुळे उद्योगांना सुलभ कनेक्टिव्हिटी मिळून गुंतवणुकीला चालना मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच MMRDA, CIDCO, MIDC आणि MSRDC यांच्या माध्यमातून विकसित होत असलेल्या औद्योगिक क्षेत्रांमुळे राज्यातील रोजगारनिर्मिती आणि आर्थिक प्रगतीला गती मिळत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

या परिषदेत मांडलेल्या विचारांतून राज्य शासनाच्या विविध विभागांमध्ये समन्वय साधून उद्योगांना जागतिक स्तरावर ओळख मिळवून देण्यावर भर देण्यात आला. पायाभूत सुविधातंत्रज्ञानशाश्वत विकास आणि गुंतवणूक अनुकूल धोरणे यांच्या बळावर महाराष्ट्र उद्योगनवकल्पना आणि आर्थिक प्रगतीच्या दिशेने अधिक वेगाने वाटचाल करेलअसा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.

000

विकसित महाराष्ट्र’साठी पायाभूत संस्थांची ठोस दिशा: ग्लोबल इकॉनॉमिक कोऑपरेशन परिषदेत विकासदृष्टी सादर

 विकसित महाराष्ट्रसाठी पायाभूत संस्थांची ठोस दिशा: ग्लोबल इकॉनॉमिक कोऑपरेशन परिषदेत विकासदृष्टी सादर

 

मुंबईदि. 19 : परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आयोजित ग्लोबल इकॉनॉमिक को-ऑपरेशन परिषदेत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या पायाभूत व औद्योगिक संस्थांच्या प्रमुखांनी राज्याच्या उद्योगविकासगुंतवणूक वाढ आणि विकसित महाराष्ट्र’ या ध्येयपूर्तीसाठी ठोस दिशा मांडली.

मुंबई येथे आयोजित ग्लोबल इकॉनॉमिक कोऑपरेशन परिषदेत विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (MSRDC) उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाडशहर व औद्योगिक विकास महामंडळाचे (CIDCO) व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघलमहाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळचे (MIDC) सह मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.कुणाल खेमनार आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे मुख्य गुंतवणूक व नियोजन अधिकारी (MMRDA) डॉ.शंकर देशपांडे यांनी सहभाग घेत राज्यातील चालू व नियोजित विकास प्रकल्पांची माहिती दिली.

संयुक्त मोहिमेत गडचिरोली पोलीस दल, सी-६० कमांडो, सीआरपीएफ आणि विशेष पथकांच्या

 संयुक्त मोहिमेत गडचिरोली पोलीस दलसी-६० कमांडोसीआरपीएफ आणि विशेष पथकांच्या सुमारे ८०० जवानांनी नियोजनबद्ध शोध व तपासणी मोहीम राबवली. बीडीडीएस पथकाच्या सखोल तपासणीनंतर विविध जंगल परिसरातील ४४ स्मारके नेस्तनाबूत करण्यात आली. एटापल्लीहेडरी, भामरागडजिमलगट्टाधानोरा आणि पेंढरी उपविभागांतील अतिसंवेदनशील भागांत ही कारवाई यशस्वीपणे पार पडली.

ज्या ठिकाणी पूर्वी दहशतीचे प्रतीक उभे होतेत्या ठिकाणी आता प्रशासनावरील विश्वाससुरक्षिततेची भावना आणि विकासाची आशा दृढ होत असल्याचे चित्र आहे. ही कारवाई गडचिरोलीतील बदलत्या वास्तवाचे प्रतीक मानली जात असूनभीतीपासून विश्वासाकडे आणि हिंसेपासून विकासाकडे होत असलेल्या संक्रमणाचा हा महत्त्वपूर्ण टप्पा ठरत असल्याचे मुख्यमंत्री यांनी त्यांच्या संदेशात नमूद केले आहे

दहशतीच्या प्रतीकांचा शेवट; लोकशाहीचा निर्णायक विजय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पोलीस दलाचे अभिनंदन

 दहशतीच्या प्रतीकांचा शेवटलोकशाहीचा निर्णायक विजय

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पोलीस दलाचे अभिनंदन

 

गडचिरोली, दि. १९ : गडचिरोली जिल्ह्यात माओवाद्यांच्या दहशतीचे प्रतीक म्हणून उभारण्यात आलेली उरलेली शेवटची ४४ स्मारके सुरक्षा दलांनी यशस्वीरित्या उद्ध्वस्त केल्याने जिल्ह्यातील माओवादविरोधी लढ्याला मोठे यश मिळाले आहे. या कारवाईबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्स’ (X) या समाजमाध्यमावरून गडचिरोली पोलीस दलाचे मनापासून अभिनंदन करत ही कारवाई केवळ भौतिक संरचना हटवण्यापुरती नसूनअनेक वर्षे जनतेच्या मनात घर केलेल्या भीतीवर लोकशाहीने मिळवलेला निर्णायक विजय असल्याचे नमूद केले आहे.

मुख्यमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे कीदुर्गम व अतिदुर्गम भागात माओवाद्यांकडून उभारण्यात आलेली ही स्मारके स्थानिक नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी आणि आपले अस्तित्व दाखवण्यासाठी उभी केली होती. मात्रशासनाच्या सातत्यपूर्ण व ठाम माओवादविरोधी धोरणामुळे गडचिरोलीतील परिस्थितीत लक्षणीय बदल झाला आहे. सुरक्षा कारवायाप्रभावी आत्मसमर्पण धोरणपायाभूत विकास प्रकल्प आणि स्थानिक नागरिकांचा वाढता विश्वास यामुळे जिल्ह्यातील वातावरण सकारात्मक दिशेने बदलत आहे.

विवाहाची आमंत्रणपत्रिका देऊन अपमान करण्याची पद्धत म्हणजे लग्नातले स्वागत व सत्कार समारंभ!

 विवाहाची आमंत्रणपत्रिका देऊन अपमान करण्याची पद्धत म्हणजे लग्नातले स्वागत व सत्कार समारंभ!

लग्नकार्यात आलेल्या काही मोजक्या श्रीमंत पैसेवाले व मोठ्या लोकांचे स्टेजवरून नाव घेऊन स्वागत करण्याची पद्धत म्हणजेच आलेल्या इतर सर्व नातेवाईक व मित्रपरिवाराचा अप्रत्यक्षपणे अपमान समजावा का!  ते म्हणजे वेळात वेळ काढुन आले आणि बाकीचे येणारे काही रिकामटेकडे आहेत का?

वाटते


अशा फालतू प्रथा बंद करायला पाहिजेत, असे सुचवावेसे वाटते.


प्रतिष्ठित असोत की पुढारी, कुणाचेही शब्दसुमनानी स्वागत करणे हेही  बंद केलं पाहिजे. प्रतिष्ठित मान्यवरांचे नाव घेऊन स्वागत करायचे म्हणजे लग्नाला पैसे खर्चून येणारे बाकीचे हॉलमधील सगळे समाजबांधव अप्रतिष्ठीत  असतात का? नाही. 


निमंत्रणाचा स्वीकार करून वधु वरांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले सर्वच समाज बांधव आणि भगिनी, आप्तेष्ट तसेच मित्रपरिवार देखील आलेले असतात, जे विवाह सोहळ्यास वेळेवर उपस्थित राहून सोहळ्याची प्रतिष्ठा वाढवितात.


तेव्हा प्रारंभीच उपस्थित सर्व वऱ्हाडी मंडळींचे शाब्दिक स्वागत करून पुढील विवाह विधी नियोजित वेळेवर पार पाडण्याची काळजी घेतली पाहिजे, असे सुचवावेसे वाटते. 


आपले मामा काका आत्या मावश्या इतर नातेवाईक मित्र मंडळी जे गरीब आहेत परंतु तुमच्या लग्न कार्याला पहिल्यापासून व शेवटपर्यंत उपस्थिती दाखवतात ते नातेवाईक महत्त्वाचे नाही का?


खोट्या प्रतिष्ठेपायी आपण गरीब असलेले आपले नातेवाईक यांची अवहेलना करत नाही का ?


आमदार खासदार मोठी प्रतिष्ठित माणसे ज्यांना फेटे बांधून फुलहार गुच्छ देऊन त्यांची वाहवा करतात काही जनता तर लोटांगणच घालते ते फक्त फोटो काढणे पुरते मर्यादित असतात ते पुढे दुसरे लग्न आहे दुसरे काम दुसरी मीटिंग असे सांगून जेवण न करता निघून जातात. 


तुमच्या लग्नातील अन्नाचा अपमान करतात अशांना महत्व देणे टाळावे उलट जे तुमच्या कार्यात पहिल्यापासून शेवटपर्यंत हजर असतील त्यांनाच महत्व देणे गरजेचे आहे.


लेखक : अनामिक


तुम्हाला हे पटतंय का..?तुम्हाला काय वाटते....?

हे कंमेंट मध्ये नक्की सांगा...

जलवायु लचीलापन के लिए सामूहिक प्रयास आवश्यक – महापौर रितु तावडे

 जलवायु लचीलापन के लिए सामूहिक प्रयास आवश्यक – महापौर रितु तावडे

मुंबई की महापौर रितु तावडे ने कहा कि शहर का विकासवृद्धि और जलवायु जिम्मेदारी को अलग-अलग न रखकर समन्वय और समानांतर रूप से आगे बढ़ाना आवश्यक है। जलवायु लचीलापन केवल सरकार तक सीमित नहीं हैबल्कि सार्वजनिक संस्थानोंनिजी उद्योगोंवित्तीय भागीदारोंअनुसंधान संस्थानों और नागरिकों के संयुक्त प्रयासों से ही संभव है। इसके लिए मजबूत सार्वजनिक-निजी भागीदारीनवाचारपूर्ण वित्तपोषणतकनीकी सहयोग और नागरिकों के व्यवहार में सकारात्मक बदलाव आवश्यक हैं।

Featured post

Lakshvedhi