Saturday, 2 May 2026

मत्स्यसंपदा योजनेमध्ये किनारी गावांचा विकास

 मत्स्यसंपदा योजनेमध्ये किनारी गावांचा विकास करण्यात यावा. मासेमारीसाठी पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यात यावी.  संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सध्या राहत असलेल्या नागरिकांकरिता मोबाईल टॉयलेटची व्यवस्था करावी.   या सुविधेचा पर्यटकांसाठीसुद्धा लाभ होऊ शकतोअसेही केंद्रीय मंत्री पियुष गोयल यावेळी म्हणाले.

राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाच्या माध्यमातून कौशल्य विकास केंद्र

 केंद्रीय मंत्री पीयूष गोयल म्हणालेराष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाच्या माध्यमातून कौशल्य विकास केंद्र उभारण्यात येत आहे. यामध्ये उत्तर मुंबईमधील शिंपोनी कौशल विकास केंद्र तयार असून ते कार्यान्वित करावे. कांदिवली भागामध्ये क्रीडाविषयक पायाभूत सुविधांची निर्मिती  पीपीपी तत्त्वावर करण्यात यावी. स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाच्या वतीने निर्माण करण्यात येणाऱ्या क्रीडाविषयक पायाभूत सुविधांमध्ये स्थानिक क्रीडा विभागाच्या प्रशासनाने सक्रिय सहभाग घ्यावा.  या भागातील मैदानांवर क्रीडाविषयक स्पर्धा आयोजित करण्यावर भर देण्यात यावा. केंद्र शासनाने देशाला 31 मार्च 2029 पर्यंत ड्रग फ्री इंडिया'  करण्याचा संकल्प केला आहे. या मोहिमेत पोलीस प्रशासनाने आपले योगदान द्यावे.

मुंबईत सुरू असलेल्या गावठाणांचे रेखांकन गतीने पूर्ण करावे. रेखांकन पूर्ण झाल्यानंतर गावठाणामधील

 मुंबईत सुरू असलेल्या गावठाणांचे रेखांकन गतीने पूर्ण करावे. रेखांकन पूर्ण झाल्यानंतर गावठाणामधील शेवटच्या नागरिकाला नागरी सुविधा मिळतीलयाची खबरदारी घ्यावी. गोराई भागात दिल्ली येथील भारत मंडपम च्या धर्तीवर कन्व्हेंन्शन  सेंटरनिर्माण करण्याकरिता कार्यवाही करावी. यासाठी बृहत नियोजन आराखडा बनवावा. या केंद्राचा उपयोग व्यावसायिक स्तरावर होईल,  अशा पद्धतीचे नियोजन करण्यात यावेअसे निर्देशही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील शेंद्रा- बिडकीन उद्योग क्षेत्रात नवीन उद्योग क्षेत्रासाठी जमिनीची

 छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील शेंद्रा- बिडकीन उद्योग क्षेत्रात नवीन उद्योग क्षेत्रासाठी जमिनीची आवश्यकता आहे. नॅशनल इंडस्ट्रियल कॉरिडॉर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन सोबत येथील जमिनीच्या उपलब्धतेबाबत पाठपुरावा करावा. दिघी औद्योगिक क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या कामांना गती द्यावी. मुंबई महापालिकेने शताब्दी आणि भगवती रुग्णालयामध्ये दर्जेदार रुग्णसेवेसाठी आधुनिक यंत्र सामुग्रीस्वच्छता आणि मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यावर भर द्यावाअसे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यावेळी दिले.

 

हाउसिंग स्टॉक' मधील घरांच्या प्रभावी उपयोगासाठी धोरण तयार करावे

 हाउसिंग स्टॉकमधील घरांच्या प्रभावी उपयोगासाठी धोरण तयार करावे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई उत्तर लोकसभा मतदार संघातील विविध प्रश्नांबाबत बैठक

 

मुंबईदि. २: मुंबई महानगर प्रदेशात विविध पायाभूत सुविधा निर्मितीचे प्रकल्प सुरू आहेत. या प्रकल्पांच्या पूर्णत्वामुळे मुंबईचे दळणवळण अधिक गतिमान होणार आहे.  या विकास प्रकल्पांमुळे बाधित होणाऱ्या नागरिकांकरिता घरांची व्यवस्था करण्यात येते. अशा 'हाऊसिंग स्टॉक'मधील घरांच्या प्रभावी उपयोगासाठी धोरण तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. वर्षा निवासस्थानी मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातील विविध प्रश्नांबाबत बैठक झाली.  बैठकीस केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल उपस्थित होते.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेमुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या विविध जागांवर विकासाची कामे सुरू आहेत. तसेच भविष्यातही विविध पायाभूत सुविधांचे प्रकल्प प्रस्तावित आहेत. केंद्रीय यंत्रणांशी समन्वय साधत अशा जागांचा संयुक्त सर्वे करण्यात यावा.  विकास कामांकरिता लागणाऱ्या जमिनींबाबत केंद्र शासनाशी संबंधित बाबींकरिता संपूर्ण जागांचा एकच प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात यावा. मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाच्या अंतर्गत असलेल्या जागांच्या न्यायप्रविष्ट प्रकरणांमध्ये न्यायालयाच्या निर्देशानुसार पाठपुरावा करून प्रकरणे तातडीने निकाली निघण्यासाठी नोडल अधिकारी नियुक्त करावा

देशाच्या इतिहासातील १६ वी जनगणना ही अत्यंत व्यापक आणि महत्त्वपूर्ण प्रक्रिया मानली जात असून, ती केवळ लोकसंख्येची मोजणी

 मुंबई महानगरपालिकेचे सह-आयुक्त विश्वास शंकरवार तसेच पी साऊथ वॉर्डाचे सहायक आयुक्त अनिरुद्ध कुलकर्णी यांनी आज कांदिवली पूर्व मतदारसंघाचे आमदार मा. अतुल भातखळकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेत ‘स्व-जन गणना मोहिमे’चा शुभारंभ आमदार भातखळकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आमदार अतुल भातखळकर यांनी स्वतः नोंदणी करून या महत्त्वपूर्ण मोहिमेत सहभाग नोंदवला.


देशाच्या इतिहासातील १६ वी जनगणना ही अत्यंत व्यापक आणि महत्त्वपूर्ण प्रक्रिया मानली जात असून, ती केवळ लोकसंख्येची मोजणी नसून देशाच्या भविष्यातील विकासाचा रोडमॅप ठरवणारी प्रक्रिया आहे. शिक्षण, आरोग्य, रोजगार, पायाभूत सुविधा, शहरी विकास, गरीब कल्याण योजना तसेच विविध संसाधनांचे प्रभावी नियोजन करण्यासाठी अचूक जनगणना अत्यंत आवश्यक ठरणार असून, डिजिटल आणि तंत्रज्ञानाधारित पद्धतीने जनगणना प्रक्रिया राबविण्यात येत असल्यामुळे ही मोहीम अधिक पारदर्शक, वेगवान आणि प्रभावी होणार असल्याचे भातखळकर यांनी सांगितले. 

“प्रत्येक नागरिकाची अचूक माहिती देशाच्या विकासाला नवी दिशा देण्यास महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. ही जनगणना केवळ आकडेवारीपुरती मर्यादित नसून नागरिकांच्या गरजा, सुविधा आणि देशाच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने या मोहिमेत सहभागी होऊन आपल्या घराची अचूक नोंदणी करावी आणि योग्य माहिती देऊन प्रशासनाला सहकार्य करावे.” असे आवाहन आमदार अतुल भातखळकर केले. 

प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले असून तांत्रिकदृष्ट्या हा मार्ग अत्यंत प्रगत

 प्रकल्पाबाबत माहिती देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कीया प्रकल्पात प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले असून तांत्रिकदृष्ट्या हा मार्ग अत्यंत प्रगत आहे. यामध्ये अत्याधुनिक अग्निशमन यंत्रणावॉटर मिस्ट सिस्टीम आणि दर 50 मीटरवर आपत्कालीन दूरध्वनीची सोय करण्यात आली आहे. सुरक्षेचा विशेष उपाय म्हणून दर 300 मीटरवर दोन्ही बोगद्यांना जोडणारे 'कनेक्टर्सतयार करण्यात आले आहेतजेणेकरून एखाद्या बोगद्यात दुर्घटना घडल्यास दुसऱ्या बोगद्यातून प्रवाशांचे सुरक्षित स्थलांतर करता येईल. संपूर्ण मार्गावर 24 तास सीसीटीव्हीची देखरेख असूनलेनची शिस्त पाळली जावीयासाठी 'इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीमकार्यान्वित करण्यात आली आहे. नियम मोडणाऱ्या वाहनधारकांना आता थेट ई-चलान पाठवले जाईलअसा इशाराही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला.

        अतिशय कठीण भौगोलिक परिस्थितीतदऱ्याखोऱ्यांत आणि जंगलांमध्ये यंत्रसामुग्री नेऊन हे काम पूर्ण करणे मोठे आव्हान होतेअसे सांगताना मुख्यमंत्र्यांनी या कामात योगदान देणाऱ्या सात देशांतील तज्ज्ञ संस्थांचे आणि कंपन्यांचे आभार मानले.   

            कोविडच्या काळात आलेल्या अडचणींवर मात करत महायुती सरकारने या कामाला गती दिली आणि आज 7 हजार 181 कोटी रुपयांचा हा प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण झाला आहे. या प्रकल्पामुळे खोपोली ते कुसगाव दरम्यानचे अंतर 6 किलोमीटरने कमी होणार असून प्रवाशांचा किमान 25 ते 30 मिनिटांचा वेळ वाचणार आहे.   

     

Featured post

Lakshvedhi