Tuesday, 23 June 2026

छत्रपती संभाजीनगरातील स्मार्ट सिटी रुग्णालयासाठी महानगरपालिकेमार्फत १० कोटी रुपये देण्यात येणार

 छत्रपती संभाजीनगरातील स्मार्ट सिटी रुग्णालयासाठी

महानगरपालिकेमार्फत १० कोटी रुपये देण्यात येणार

-मंत्री उदय सामंत

मुंबई, दि. २३ : छत्रपती संभाजीनगर येथील स्मार्ट सिटी अंतर्गत उभारण्यात आलेल्या रुग्णालयाच्या कार्यान्वयनासाठी आवश्यक निधी तातडीने उपलब्ध करून देण्याबाबत राज्य शासन सकारात्मक असून महानगरपालिकेला १० कोटी रुपये उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले जातील, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

सदस्य विक्रम काळे यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. तर सदस्य अनिल परब, अंबादास दानवे, चित्रा वाघ यांनी उपप्रश्न उपस्थित केले होते. त्यास उत्तर देताना सामंत बोलत होते.

उरण येथील ‘भारत मुंबई कंटेनर टर्मिनल’ला जोडणारा उड्डाणपूल सुरक्षित

 उरण येथील ‘भारत मुंबई कंटेनर टर्मिनल’ला जोडणारा उड्डाणपूल सुरक्षित

-सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

·         जुलैअखेर दुरुस्ती पूर्ण होणार

 

मुंबई, दि. 23 : उरण येथील ‘भारत मुंबई कंटेनर टर्मिनल’ला जोडणारा उड्डाणपूल सुरक्षित असून जुलैअखेर दुरुस्ती पूर्ण होणार आहे; तसेच पुलाच्या संरचनेला कोणताही धोका नाही, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विधानपरिषदेत स्पष्ट केले.

उरण (जि. रायगड) येथील भारत मुंबई कंटेनर टर्मिनलला जोडणाऱ्या उड्डाणपुलाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाल्याबाबत विधानपरिषद सदस्य अभिजात वंजारी यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी  झालेल्या चर्चेत सदस्य भाई जगताप, सतेज  पाटील यांनी सहभाग घेतला.

 

मंत्री भोसले म्हणाले की, संबंधित पुलामध्ये कोणतीही संरचनात्मक त्रुटी आढळलेली नाही. पुलालगतच्या भरावाचा काही भाग खालच्या मातीच्या थरात झालेल्या नैसर्गिक स्थिरीकरणामुळे (सेटलिंग); तसेच काही प्रमाणात अतिवजनाच्या वाहनांच्या वाहतुकीमुळे खचला असण्याची शक्यता आहे. मात्र, पुलाच्या सुरक्षिततेवर त्याचा कोणताही परिणाम झालेला नाही.

 

या दुरुस्तीच्या कामासाठी सुमारे तीन कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून तो संबंधित ठेकेदाराकडून देखभाल करारातील (मेंटेनन्स क्लॉज) तरतुदीनुसार करण्यात येत आहे. भरावाची दुरुस्ती; तसेच आवश्यक काँक्रीटीकरणाचे काम जुलै 2026 अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शिवभोजन केंद्रांना गॅस पुरवठ्याबाबत शासन सकारात्मक

 शिवभोजन केंद्रांना गॅस पुरवठ्याबाबत शासन सकारात्मक


- मंत्री छगन भुजबळ


· बंद केंद्रे लवकरच सुरू करणार

मुंबई, दि. 23 : शिवभोजन केंद्रांना व्यावसायिक गॅसचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी शासन सकारात्मक असून, काही कारणांमुळे बंद पडलेली शिवभोजन केंद्रे लवकरच पुन्हा सुरू करण्यात येतील, अशी माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी विधानपरिषदेत दिली.

राज्यातील विशेषतः पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील शिवभोजन केंद्रांना व्यावसायिक गॅस पुरवठा करण्याबाबत विधानपरिषद सदस्या उमा खापरे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री भुजबळ यांनी शासनाची भूमिका स्पष्ट केली.

मुंबई आणि परिसरातील व्यसनाधीन रुग्णांच्या पुनर्वसनासाठी

 मुंबई आणि परिसरातील व्यसनाधीन रुग्णांच्या पुनर्वसनासाठी विशेष केंद्रे उभारण्याकरिता जमीन उपलब्ध करून देण्याबाबत मुंबई महानगरपालिकेला निर्देश दिले जाणार आहेत. याशिवाय आरोग्य विभाग आणि सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात व्यसनमुक्ती केंद्रे उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

 

            चित्रपट आणि इतर माध्यमांमधून होणाऱ्या अमली पदार्थांच्या उदात्तीकरणाबाबतही शासन गंभीर असून त्यावर नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले.

शासन भाडेकरूंच्या बाजूने ठामपणे

 शासन भाडेकरूंच्या बाजूने ठामपणे उभे आहे. भाडेकरूंच्या हितासाठी करण्यात आलेल्या तरतुदींवरील उच्च न्यायालयाची स्थगिती उठविण्यासाठी प्रयत्न केले जातील; तसेच, सर्वोच्च न्यायालयातील प्रकरणाचा प्रभावी पाठपुरावा करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना कठोर सूचना देण्यात येतील आणि वर्ग-१ दर्जाचा अधिकारी या खटल्यावर सातत्याने देखरेख ठेवेल, असेही मंत्री देसाई यांनी सांगितले.

पागडी इमारतींच्या पुनर्विकासासाठी शासन सकारात्मक

 पागडी इमारतींच्या पुनर्विकासासाठी शासन सकारात्मक

- मंत्री शंभूराज देसाई

·         संबंधित अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेणार

 

मुंबई, दि. २३ : मुंबईतील मोडकळीस आलेल्या पागडी इमारतींमधील रहिवाशांना सुरक्षित निवास उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध असून पुनर्विकास प्रक्रियेला गती देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात येत आहे, अशी माहिती पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानपरिषदेत दिली.

 

विधानपरिषद सदस्य प्रसाद लाड यांनी मुंबईतील पागडी इमारतींच्या पुनर्विकासाबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. विधानपरिषद सदस्य, ॲड अनिल परब, प्रवीण दरेकर, मनीषा कायंदे यांनी यावेळी झालेल्या चर्चेत सहभाग घेतला. त्याला उत्तर देताना मंत्री देसाई बोलत होते.

 

            मंत्री देसाई म्हणाले की, पुनर्विकासाला गती देण्यासाठी कलम ७९-अ अंतर्गत मालक, भाडेकरू संस्था आणि शासन अशा तीन स्तरांवर पुनर्विकासाची संधी देण्यात आली होती. मात्र, या प्रक्रियेला काही मालकांनी न्यायालयात आव्हान दिल्याने उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. याविरोधात शासनाने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली असून २० जुलै रोजी सुनावणी होणार आहे.

 

उच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या निवृत्त न्यायाधीशांच्या समितीच्या कामकाजाला बाधा न आणता, महाराष्ट्राला सक्षम प्राधिकरण घोषित करण्याबाबत कायदेशीर बाबींचा अभ्यास केला जाईल. तसेच एलएनजीडी, म्हाडा आणि संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक अधिवेशन संपण्यापूर्वी घेण्यात येणार असल्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.

 

मागील अधिवेशनात दिलेल्या आश्वासनांबाबत नियमित आढावा बैठका घेण्यात आल्या आहेत. बैठकींची कार्यवृत्ते वेळेत अंतिम करण्याच्या सूचना विभागाला देण्यात आल्या असून, संबंधित प्रकरणांमध्ये त्रुटी आढळल्यास जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल. तसेच, म्हाडाला सक्षम प्राधिकरण घोषित करण्याबाबत निवृत्त न्यायाधीशांच्या समितीचा उद्देश आणि कायदेशीर बाबी लक्षात घेऊन महाधिवक्त्यांचे मत घेतले जाईल. कायदेशीर अडचण नसल्यास आणि म्हाडाकडून प्रस्ताव प्राप्त झाल्यास शासन त्यावर सकारात्मक निर्णय घेईल; असेही मंत्री देसाई यांनी सांगितले.

 

शासन भाडेकरूंच्या बाजूने ठामपणे उभे आहे. भाडेकरूंच्या हितासाठी करण्यात आलेल्या तरतुदींवरील उच्च न्यायालयाची स्थगिती उठविण्यासाठी प्रयत्न केले जातील; तसेच, सर्वोच्च न्यायालयातील प्रकरणाचा प्रभावी पाठपुरावा करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना कठोर सूचना देण्यात येतील आणि वर्ग-१ दर्जाचा अधिकारी या खटल्यावर सातत्याने देखरेख ठेवेल, असेही मंत्री देसाई यांनी सांगितले.

0000

उरण येथील ‘भारत मुंबई कंटेनर टर्मिनल’ला जोडणारा उड्डाणपूल सुरक्षित

 उरण येथील ‘भारत मुंबई कंटेनर टर्मिनल’ला जोडणारा उड्डाणपूल सुरक्षित

-सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

·         जुलैअखेर दुरुस्ती पूर्ण होणार

 

मुंबई, दि. 23 : उरण येथील ‘भारत मुंबई कंटेनर टर्मिनल’ला जोडणारा उड्डाणपूल सुरक्षित असून जुलैअखेर दुरुस्ती पूर्ण होणार आहे; तसेच पुलाच्या संरचनेला कोणताही धोका नाही, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विधानपरिषदेत स्पष्ट केले.

उरण (जि. रायगड) येथील भारत मुंबई कंटेनर टर्मिनलला जोडणाऱ्या उड्डाणपुलाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाल्याबाबत विधानपरिषद सदस्य अभिजात वंजारी यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी  झालेल्या चर्चेत सदस्य भाई जगताप, सतेज  पाटील यांनी सहभाग घेतला.

 

मंत्री भोसले म्हणाले की, संबंधित पुलामध्ये कोणतीही संरचनात्मक त्रुटी आढळलेली नाही. पुलालगतच्या भरावाचा काही भाग खालच्या मातीच्या थरात झालेल्या नैसर्गिक स्थिरीकरणामुळे (सेटलिंग); तसेच काही प्रमाणात अतिवजनाच्या वाहनांच्या वाहतुकीमुळे खचला असण्याची शक्यता आहे. मात्र, पुलाच्या सुरक्षिततेवर त्याचा कोणताही परिणाम झालेला नाही.

 

या दुरुस्तीच्या कामासाठी सुमारे तीन कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून तो संबंधित ठेकेदाराकडून देखभाल करारातील (मेंटेनन्स क्लॉज) तरतुदीनुसार करण्यात येत आहे. भरावाची दुरुस्ती; तसेच आवश्यक काँक्रीटीकरणाचे काम जुलै 2026 अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

मंत्री भोसले यांनी सांगितले की,  आयआरसीच्या निकषांनुसार राष्ट्रीय महामार्गांवरील पुलांचे आणि भरावांचे डिझाईन तयार केले जाते. अशा प्रकारच्या काही बाबी विविध ठिकाणी निदर्शनास आल्यानंतर संबंधित डिझाईनमध्ये आवश्यक सुधारणा करण्यात आल्या आहेत. नव्या डिझाईननुसार कामे करण्यात येत असून भविष्यात अशा प्रकारची समस्या उद्भवण्याची शक्यता कमी होणार आहे.

 

या कामासाठी कोणताही अतिरिक्त निधी मंजूर करण्यात आलेला नसून संबंधित एजन्सीवरच दहा वर्षांच्या देखभालीची जबाबदारी आहे. त्यामुळे पुढील कालावधीतही पुलाची देखभाल आणि आवश्यक दुरुस्तीची कामे संबंधित एजन्सीकडूनच करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर या प्रकरणी जबाबदार अधिकारी अथवा संबंधित बाबींची तपासणी करून आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असेही मंत्री भोसले यांनी यावेळी सांगितले.

Featured post

Lakshvedhi