Tuesday, 15 September 2026

घरगुती गणपती वर्षा कांबळे, विरार


 

यंग इंजिनिअर्स अवॉर्ड्स २०२६’

 यंग इंजिनिअर्स अवॉर्ड्स २०२६ने सीएसआयआर-सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ मायनिंग अँड फ्युएल रिसर्च, धनबादचे डॉ. देबाशीष मिश्रा, एनआयटी रायपूरचे सहायक प्राध्यापक डॉ. आशीष कुमार विश्वकर्मा आणि ईस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड, पश्चिम बंगालचे व्यवस्थापक (मायनिंग) डॉ. अली मुर्तझा शेख यांचा गौरव करण्यात आला. ही परिषद दोन दिवस असून देशातील नामवंत  अभियंते , अभ्यासक  व सशोधक सादरीकरण करणार आहे.

 

अंगणवाडी सेविका, मदतनीसांना ग्रॅच्युइटी देण्याबाबत शासन सकारात्मक,माझी अंगणवाडी, माझी जबाबदारी’ संकल्पनेतून सक्षम अंगणवाड्यांवर भर; मुंबईतील ८१७ अंगणवाड्या सुविधांनी सुसज्ज करण्यासाठी करार

 अंगणवाडी सेविका, मदतनीसांना ग्रॅच्युइटी देण्याबाबत शासन सकारात्मक

-महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

 

  • माझी अंगणवाडी, माझी जबाबदारीसंकल्पनेतून सक्षम अंगणवाड्यांवर भर; मुंबईतील ८१७ अंगणवाड्या सुविधांनी सुसज्ज करण्यासाठी करार

 

            मुंबई, दि. ११      : पोषण अभियानाची प्रभावी अंमलबजावणी, समाजातील शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. त्यांच्या माध्यमातून बालके, गरोदर माता आणि स्तनदा मातांपर्यंत पोहोचून सुदृढ महाराष्ट्र घडविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना उपदान (ग्रॅच्‍युइटी) देण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.

 

            एकात्मिक बालविकास सेवा प्रकल्प योजनेअंतर्गत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे ९व्या राष्ट्रीय पोषण माहाचा राज्यस्तरीय शुभारंभ माहिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते झाला. यंदाचा पोषण माह माझी अंगणवाडी, माझी जबाबदारीया संकल्पनेवर आधारित आहे.

 

            यावेळी महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव, एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या आयुक्त माधवी सरदेशमुख, सहआयुक्त संगिता लोंढे, विजय क्षीरसागर, आयुषचे सहायक संचालक सुश्रृत मुक्कावार यांच्यासह विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 

            माहिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, पोषण माहाच्या माध्यमातून बालके, गरोदर माता आणि स्तनदा मातांच्या आहार व आरोग्याबाबत जनजागृती करण्यासोबतच त्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यात येत आहे. यासाठी महिला व बालविकास, आरोग्य आणि आयुष विभागाने समन्वयाने काम करण्याची गरज आहे. बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी जन्मापासूनच योग्य पद्धतीने शिशु अभ्यंग मिळणे आवश्यक असून, त्यांचे महत्व मातांपर्यंत पोहोचविण्यासाठी आयुष विभागाचा सहभाग घेण्यात आला आहे. आयुषच्या माध्यमातून अंगणवाडी सेविका व मदतनीसांना आवश्यक मार्गदर्शन देऊन ही माहिती मातांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.

 

            यंदाच्या माझी अंगणवाडी, माझी जबाबदारीया संकल्पनेतून अंगणवाडी केंद्रे अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात येणार आहे. डिजिटल अंगणवाड्यांमधील स्क्रीनवर आयुष विभागाने तयार केलेले आरोग्य व पोषणविषयक व्हिडिओ नियमितपणे दाखवावेत आणि त्यातील माहिती गरोदर व स्तनदा मातांपर्यंत पोहोचवावी, असे मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.

Monday, 14 September 2026

मायनिंग फॉर विकसीत भारत @2047’ ही केवळ अधिवेशनाची संकल्पना नसून

 अधिवेशनाचे संयोजक डॉ. अनुपम खेर यांनी मायनिंग फॉर विकसीत भारत @2047’ ही केवळ अधिवेशनाची संकल्पना नसून राष्ट्रीय प्रेरणा असल्याचे सांगितले. कोळसा, लोहखनिज आणि चुनखडीची वाढती मागणी पूर्ण करतानाच लिथियम, ग्रेफाइट यांसारख्या महत्त्वपूर्ण खनिजांची वाढती गरज पूर्ण करणे, तसेच तंत्रज्ञान, शाश्वतता आणि सुरक्षितता यांचा समतोल साधणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

देशभरातून सुमारे ३०० प्रतिनिधी अधिवेशनात सहभागी झाले असून, ४० तांत्रिक संशोधन निबंध सादर करण्यात येणार आहेत. प्रगत ब्लास्टिंग तंत्रज्ञान, उतार निरीक्षण, डिजिटायझेशन, एआयचा वापर, इंटेलिजंट मायनिंग, खाण बंद प्रक्रिया, सर्क्युलर इकॉनॉमी, ऊर्जा कार्यक्षमता आणि महत्त्वपूर्ण खनिजे या विषयांवर विविध सत्रे होणार आहेत.

भारतीय भाषांच्या सन्मानातूनच ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ची संकल्पना साकार होईल

 भारतीय भाषांच्या सन्मानातूनच एक भारत, श्रेष्ठ भारतची संकल्पना साकार होईल

                                                                 -केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

            हिंदी, मराठीसह सर्व भारतीय भाषांचा परस्पर आदर करण्याचा संकल्प करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

नवी मुंबईत हिंदी दिवस २०२६ आणि सहाव्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनाचा दिमाखदार शुभारंभ; विविध ॲप्स, पुस्तके आणि शब्दकोश उपक्रमांचे लोकार्पण

ठाणे,दि.14(जिमाका): भारतीय भाषांचे संवर्धन, सन्मान आणि विकास हा केंद्र शासनाचा प्रमुख आणि दृढ संकल्प असून सर्व प्रादेशिक भाषा या कमळाच्या विविध पाकळ्यांप्रमाणे सुंदर आहेत. या सर्व समृद्ध भाषांचा आदर राखत हिंदीला त्यांच्यामध्ये समन्वय साधणारा मध्यमणीबनवूया, असे आवाहन केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शाह यांनी केले.

    वाशी येथील सिडको एक्झिबिशन अँड कन्व्हेंशन सेंटरमध्ये केंद्रीय गृह मंत्रालयाच्या राजभाषा विभागाच्या वतीने आयोजित हिंदी दिवस २०२६आणि सहाव्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनाचे उद्घाटन अत्यंत उत्साहात संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते.

     यावेळी व्यासपीठावर केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय, खासदार नरेश म्हस्के, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा अजित पवार, राजभाषा विभागाच्या सचिव अंशुली आर्या, व्ही.एल. कांताराव, बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांचे वंशज जॉयदीप चट्टोपाध्याय, मिलिंद प्रभाकर सबनीस हे मान्यवर उपस्थित होते.

     केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले की, राजभाषा संमेलने केवळ राजधानी दिल्लीपुरती मर्यादित न ठेवता देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये नेण्याचा केंद्र शासनाचा निर्णय यशस्वी ठरला असून, या उपक्रमांतर्गत हे सहावे संमेलन महाराष्ट्रात होत आहे.    

खाणकाम अधिक सुरक्षित, कार्यक्षम आणि शाश्वत करण्यावर भर

 खाणकाम अधिक सुरक्षित, कार्यक्षम आणि शाश्वत करण्यावर भर

            मायनिंग डिव्हिजन बोर्डचे अध्यक्ष सुरेशचंद्र सुमन यांनी खनिजे ही आधुनिक उद्योग, पायाभूत सुविधा आणि भारताच्या विकासाची पायाभूत गरज असल्याचे सांगितले. एआय, ऑटोमेशन, ड्रोन, सेन्सर्स आणि रिअल-टाइम खाण निरीक्षणामुळे खाणकाम अधिक कार्यक्षम, सुरक्षित आणि शाश्वत करता येईल, असे त्यांनी नमूद केले.

 

            खाण कामगारांची सुरक्षितता कोणत्याही उत्पादनाच्या उद्दिष्टापेक्षा अधिक महत्त्वाची आहे, असे स्पष्ट करत त्यांनी खनिज सुरक्षा ही विकसित भारताची पायाभूत गरज असल्याचे सांगितले.

 

            डब्ल्यूसीएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. हेमंत शरद पांडे यांनी नागपूरला देशाची मायनिंग कॅपिटलम्हणून विकसित करण्याच्या उद्देशातून हे अधिवेशन आयोजित केल्याचे सांगितले. डब्ल्यूसीएलने १२ खाणींमध्ये १८ महत्त्वपूर्ण खनिजे आणि दुर्मीळ मृदा मूलद्रव्ये शोधून काढली असून, कोळशापलीकडे जाऊन महत्त्वपूर्ण खनिजांच्या उत्खनन व शुद्धीकरणाच्या दिशेने कंपनी विविधता आणत असल्याचे त्यांनी सांगितले

नागपूरच्या परंपरेला जागतिक स्वरूप देण्याचा प्रयत्न स्तुत्य-

 नागपूरच्या परंपरेला जागतिक स्वरूप देण्याचा प्रयत्न स्तुत्य-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

            नागपूरच्या या परंपरेला जागतिक स्वरुप देण्याचा हा प्रयत्न निश्चितपणे स्तुत्य आहे, या  शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेच्या वतीने आयोजित या महोत्सवाचे कौतूक केले. महोत्सवाच्या यशस्वी आयोजनाबद्धल त्यांनी महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्रातील सामान्य माणसांच्या जीवनात असणाऱ्या सर्व समस्या दूर व्हाव्यात, अशी इच्छा व्यक्त केली.

000

 

Featured post

Lakshvedhi