Wednesday, 11 March 2026

२०१७ मध्ये या समस्येवर तोडगा म्हणून प्रत्येक घराला स्वतंत्र सौर ऊर्जा प्रणाली

 २०१७ मध्ये या समस्येवर तोडगा म्हणून प्रत्येक घराला स्वतंत्र सौर ऊर्जा प्रणाली देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार २०१८ मध्ये सौभाग्य’ योजनेअंतर्गत अनेक घरांना ऑफ-ग्रीड सोलर प्रणाली देऊन गावांचे विद्युतीकरण करण्यात आले. मात्र दुर्गम भागामुळे वार्षिक देखभाल करार (एएमसीप्रभावीपणे राबविणे शक्य झाले नाही. त्यामुळे अनेक सौर यंत्रणा बंद पडल्या किंवा निकामी झाल्या आणि काही गावांमध्ये पुन्हा अंधाराचे वातावरण निर्माण झाले. ही परिस्थिती लक्षात घेऊन आता सोलर मायक्रो ग्रीडद्वारे वीजपुरवठा करण्यात येणार आहे.

या योजनेंतर्गत दोन गावांमध्ये सोलर मायक्रो ग्रीडचे काम पूर्ण झाले आहे. पाच गावांमध्ये स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेतला असून त्यांच्या माध्यमातून काम सुरू आहे. चार गावांसाठी टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली आहे. उर्वरित गावांसाठी सुमारे २० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

या परिसरातील रस्ते सुविधांबाबतही कारवाई सुरू करण्यात आली आहे. सहा गावांमध्ये रस्ते उपलब्ध असले तरी चार गावांमध्ये खडीकरण व दुरुस्तीची आवश्यकता असून ते काम प्राधान्याने हाती घेतले जाईलअसेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

00000

Tuesday, 10 March 2026

राज्यात कांदा उत्पादनाच्या व्यवस्थापन करण्यासाठी विविध प्रयत्न

 मंत्री. सावकारे म्हणालेराज्यात कांदा उत्पादनाच्या  व्यवस्थापन करण्यासाठी विविध प्रयत्न सुरू आहेत. नाफेड व एनसीएफडीमार्फत सुमारे २.७७ लाख टन कांद्याची खरेदी करण्यात आली असून ४५० कोटींपैकी ४३० कोटी रुपयांचा परतावा शेतकऱ्यांना देण्यात आला आहे. आखाती देशांमध्ये  कांदा निर्यातीला काही अडचणी असल्या तरी अन्य देशात निर्यात सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

 

मंत्री संजय सावकारे म्हणाले,  देशातील ज्या राज्यांमध्ये कांद्याचे उत्पादन होत नाही अशा राज्यांमध्ये महाराष्ट्रातील कांदा विक्रीसाठी प्रयत्न सुरू आहेत. बाजार व्यवस्थापन आणि निर्यात वाढविण्याच्या उपाययोजनांमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना निश्चितच दिलासा मिळेलअसा विश्वासही मंत्री सावकारे यांनी यावेळी व्यक्त केला.

कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी शासनाचे सर्वोतोपरी प्रयत्न

 कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी शासनाचे सर्वोतोपरी प्रयत्न

-         वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे

 

मुंबईदि. १० :- राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासन विविध उपाययोजना करत आहे.  कांदा हे नाशवंत पीक असल्यामुळे हमी भाव योजनेत त्याचा समावेश नसला तरी शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी शासन सकारात्मक निर्णय घेत असल्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी विधान परिषदेत सांगितले.

 

सदस्य सदाभाऊ खोत यांनी याविषयी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य सतेज पाटीलप्रवीण दरेकरअमोल मिटकरीहेमंत पाटीलराजेश राठोडशिवाजीराव गर्जे यांनी उपप्रश्न विचारत सहभाग घेतला.

 

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव मिळावा हीच शासनाची भूमिका असल्याचे सांगत मंत्री संजय सावकारे म्हणालेकांद्याला योग्य बाजारपेठ मिळावी यासाठी पाशा पटेल यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीचा अहवाल आल्यानंतर याबाबत निर्णय घेतला जाईल.

 

महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचा परिचय

 महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचा परिचय

 

महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा हे त्रिपुराच्या माणिक्य राजघराण्यातून आलेले एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आहेत. माणिक्य राजघराणे हे भारतातील सर्वात प्राचीन राजघराण्यांपैकी एक असून ते प्रगत विचारसरणीसाठी ओळखले जाते. या राजघराण्याने १९४१ मध्ये त्रिपुरासाठी पहिली लिखित राज्यघटना लागू केली होती. नागरिकांमध्ये स्वावलंबनसहकार्य आणि राज्यनिष्ठा यासारख्या मूल्यांना प्रोत्साहन देणे हे राज्यघटनेचे उद्देश होते. या राज्यघटनेचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे अल्पसंख्याकमागासवर्गीय आणि कामगारांसाठी विधानसभेत जागांचे आरक्षण देण्यात आले होते. देशभरात आरक्षणाची संकल्पना रुजण्यापूर्वीच त्रिपुराच्या प्रगती आणि समृद्धीसाठी आधुनिक विचारांचा अवलंब करण्यात आला होता.

राजघराण्याची पार्श्वभूमी असूनही जिष्णु देव वर्मा अत्यंत विनम्रसहज उपलब्ध आणि सर्व स्तरांतील लोकांशी संवाद साधण्यास उत्सुक असलेले व्यक्तिमत्त्व आहे. त्यांनी १९९३ मध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश करून आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात केली आणि त्रिपुराचे राष्ट्रीय परिषदेचे सदस्य म्हणून निवडून आले. त्यांनी त्रिपुरा प्रदेश भाजपचे सरचिटणीस म्हणूनही कार्य केले आणि पक्षाच्या संघटनात्मक कामकाजाची जबाबदारी सांभाळली.

२०१८ मध्ये त्यांनी १९ चारिलाम (अनुसूचित जमाती) विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि तब्बल  ८९.३३ टक्के मते मिळवत अभूतपूर्व विजय मिळवला.

२०१८ मध्ये त्रिपुरात२५ वर्षांच्या डाव्या आघाडीच्या कारकिर्दीनंतर भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेत आले आणि  जिष्णु देव वर्मा यांनी उपमुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला. या काळात त्यांनी वित्तग्रामीण विकास आणि ऊर्जा यांसारख्या महत्वाच्या खात्यांची जबाबदारी सांभाळली.

आपल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध प्रकल्पांची अंमलबजावणीआर्थिक संसाधनांची उपलब्धता आणि ठरलेल्या वेळेत कामे पूर्ण करण्यावर विशेष भर दिला.

त्रिपुरामध्ये यशस्वीपणे राबविण्यात आलेला बायो व्हिलेज 2.0 हा त्यांचा एक अभिनव उपक्रम आहे. कृषीऊर्जा आणि उपजीविकेच्या क्षेत्रात पर्यावरणपूरक पद्धतींचा अवलंब करून ग्रामीण भागात शाश्वत विकासाला चालना देणे हा या उपक्रमाचा उद्देश होता.

समुदायाच्या सक्रिय सहभागावर आधारित या उपक्रमामुळे स्थानिक शेतकरी आणि कुटुंबांनी हरित तंत्रज्ञान व शाश्वत पद्धती स्वीकारल्या. त्यामुळे शाश्वत ग्रामीण विकासाच्या क्षेत्रात त्रिपुराने अग्रस्थान मिळवले. पुढे या उपक्रमाला आंतरराष्ट्रीय स्तरावरही उत्कृष्ट उपक्रम म्हणून मान्यता मिळाली.

ईशान्य भारताच्या विकासासाठी धोरण निर्मितीमध्ये जिष्णु देव वर्मा यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. १९८९ ते १९९३ या काळात ते नॉर्थ ईस्टर्न कौन्सिलच्या सल्लागार समितीचे प्रमुख सदस्य होते. त्यांनी इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेजच्या त्रिपुरा विभागाचे संयोजक म्हणून कार्य केले आणि ईशान्य भारतातील उपक्रमांचे समन्वयक म्हणून  केले.

अनेक कलागुणांनी संपन्न असलेले जिष्णु देव वर्मा यांना आधुनिक कलाचित्रकला आणि शिल्पकलेची विशेष आवड आहे. त्यांच्या सर्जनशील कलाकृतींमध्ये विविध कलागुणांची अभिव्यक्ती दिसून येते. संस्कार भारतीच्या सहकार्याने त्यांच्या अनेक कलाकृती विविध पर्यटनस्थळेमंदिरे आणि सार्वजनिक ठिकाणी मांडण्यात आल्या आहेत.

ते एक प्रख्यात कवी आणि लेखकही आहेत. बंगाली आणि इंग्रजी भाषेतील त्यांच्या कवितांनी अनेकांच्या मनाला स्पर्श केला आहे. त्यांच्या Children of Water Goddess आणि Master of Time या पुस्तकांमधील साहित्यिक अभिव्यक्ती प्रभावी आणि भावस्पर्शी मानली जाते.

त्यांच्या मते जीवन हा एक गहन प्रवास आहेज्यात प्रत्येक क्षण हा एक पवित्र आहुती आहे आणि प्रत्येक आव्हान हे ज्ञान व धैर्य वाढविण्याची संधी आहे. त्यांच्या कवितेतील शब्दांत ते असे म्हणतात

Let us carry hope in our souls,

Not only for ourselves,

But for those too,

Who look upon us with hope.

 

आदिवासी विकासशिक्षणआरोग्य तसेच कला आणि संस्कृती यांप्रती त्यांची अत्यंत निष्ठा आणि बांधिलकी आहे.

३१ जुलै २०२४ रोजी जिष्णु देव वर्मा यांची  तेलंगणाचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर १० मार्च २०२६ रोजी त्यांनी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ घेतली.

आपल्या स्नेहपूर्ण स्वभावामुळे ते सर्व स्तरांतील लोकांशी सहजतेने संवाद साधतात आणि सामान्य नागरिकांसाठी नेहमी उपलब्ध असतात. 

समाजातील उपेक्षित व वंचित घटकांना आधार देऊन त्यांच्या जीवनात आशेचा किरण निर्माण करणे यातच जीवनाचे सार्थक आहे असे ते मानतात. 

००००

जिष्णू देव वर्मा ने महाराष्ट्र के राज्यपाल पद की शपथ ली

 जिष्णू देव वर्मा ने महाराष्ट्र के राज्यपाल पद की शपथ ली

 

मुंबई, 10 मार्च: महाराष्ट्र के नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा ने राज्यपाल पद की शपथ ली। मुंबई उच्च्‍ा न्यायालय के मुख्य न्यायमूर्ति चंद्रशेखर ने राजभवन के दरबार हॉल में आयोजित शपथग्रहण समारोह में उन्हें पद और गोपनीयता की शपथ दिलाई।

शपथ ग्रहण के बाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार ने राज्यपाल जिष्णू देव वर्मा को पुष्पगुच्छ देकर उनका अभिनंदन किया। जिष्णू देव वर्मा महाराष्ट्र के 22वें राज्यपाल बने हैं।

कार्यक्रम की शुरुआत में राज्य के मुख्य सचिव राजेश अग्रवाल ने भारत की राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू द्वारा जारी जिष्णू देव वर्मा की नियुक्ति संबंधी अधिसूचना पढ़कर सुनाई।

समारोह की शुरुआत राष्ट्रगान और राज्यगीत से हुई तथा समापन राष्ट्रगान के साथ हुआ। शपथ ग्रहण के बाद राज्यपाल को इंडियन नेव्ही की ओर से मानवंदना दी गई।

इस अवसर पर विधान परिषद के सभापति प्रा.राम शिंदेविधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकरविधान परिषद की उपसभापति डॉ.नीलम गोऱ्हेपूर्व मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदेउच्च व तंत्र शिक्षा मंत्री चंद्रकांत पाटीलकौशल विकास मंत्री मंगल प्रभात लोढाखाद्य व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळखाद्य व नागरी आपूर्ति मंत्री छगन भुजबळबृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भुषण गगराणीपुलिस महानिदेशक सदानंद दातेमुंबई पुलिस आयुक्त देवेन भारतीमुख्य राज्य शिष्टाचार अधिकारी राजेश गवांदे सहित अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित थे।


Jishnu Dev Varma Takes Oath as Governor of Maharashtra

 Jishnu Dev Varma Takes Oath as Governor of Maharashtra

 

Mumbai, March 10: Newly appointed Governor of Maharashtra Jishnu Dev Varma took the oath of office today. The oath was administered by Chandrashekhar, Chief Justice of the Bombay High Court, at a ceremony held in the Durbar Hall of Raj Bhavan.

 

Following the oath ceremony, Chief Minister Devendra Fadnavis, Deputy Chief Minister Eknath Shinde, and Deputy Chief Minister Sunetra Ajit Pawar congratulated Governor Jishnu Dev Varma by presenting him with bouquets. With this, Jishnu Dev Varma has become the 22nd Governor of Maharashtra.

 

Earlier, Chief Secretary Rajesh Agarwal read out the official notification issued by the President of India Droupadi Murmu regarding the appointment of Jishnu Dev Varma as the Governor.

 

The ceremony began with the National Anthem and the State Song, while it concluded with the National Anthem. After the oath-taking ceremony, the Governor was accorded a ceremonial guard of honour by the Indian Navy.

 

Among those present at the ceremony were Legislative Council Chairman Ram Shinde, Legislative Assembly Speaker Rahul Narwekar, Legislative Council Deputy Chairperson Neelam Gorhe, former Chief Minister Sushilkumar Shinde, Higher and Technical Education Minister Chandrakant Patil, Skill Development Minister Mangal Prabhat Lodha, Food and Drugs Administration Minister Narahari Zirwal, Food and Civil Supplies Minister Chhagan Bhujbal, Bhushan Gagrani, Director General of Police Sadanand Date, Mumbai Police Commissioner Deven Bharti, Chief State Protocol Officer Rajesh Gavande, and other senior officials.

जिष्णू देव वर्मा यांनी घेतली राज्यपालपदाची शपथ

 जिष्णू देव वर्मा यांनी घेतली राज्यपालपदाची शपथ

 

मुंबईदि. १०: महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी राज्यपाल पदाची शपथ घेतली. लोकभवनातील दरबार सभागृह येथे झालेल्या शपथविधी सोहळ्यात मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर यांनी त्यांना राज्यपालपदाची शपथ दिली.

 

शपथविधीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. जिष्णू देव वर्मा  हे महाराष्ट्राचे २२ वे राज्यपाल आहेत.

 

सुरुवातीला मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी जिष्णू देव वर्मा यांच्या नियुक्तीसंदर्भातील राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काढलेली अधिसूचना वाचून दाखवली. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत व राज्यगीताने झाली तर सांगता राष्ट्रगीताने झाली. शपथविधी नंतर राज्यपालांना भारतीय नौदलातर्फे मानवंदना देण्यात आली.

 

शपथविधी सोहळ्याला विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदेविधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकरविधान परिषद उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हेमाजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेउच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटीलकौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढाअन्न व औषध प्रशासन नरहरी झिरवळअन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळबृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणीपोलीस महासंचालक सदानंद दातेपोलीस आयुक्त देवेन भारतीमुख्य राज्य शिष्टाचार अधिकारी राजेश गवांदे व  इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Featured post

Lakshvedhi