Monday, 17 August 2026

शिवचातुर्य दिना’निमित्त आग्रा येथे विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

 शिवचातुर्य दिनानिमित्त आग्रा येथे विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

              शिवचातुर्य दिनानिमित्त आग्रा येथे विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ऐतिहासिक घटना जनमानसापर्यंत पोहोचविण्यासाठी विशेष टपाल आवरणाचे प्रकाशनही करण्यात आले आहे. या उपक्रमाला विविध संस्था, प्रशासन आणि नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे.या मोहिमेच्या निमित्ताने आग्रा येथील ऐतिहासिक सातवंती किल्ल्याच्या विहिरीतील पवित्र जल विशेष विधीपूर्वक संकलित करून आग्रा किल्ल्यासमोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यावर जलाभिषेक करण्यात आला. गोमंतकातील ऐतिहासिक वारशाचे पवित्र जल शिवरायांच्या चरणी समर्पित करून गोवा व महाराष्ट्र यांच्यातील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक नाते अधिक दृढ करण्याचाही उपक्रम यामाध्यमातून राबविण्यात येत आहे.यावेळी गोव्यातील ५० महिला कलाकार शिवशौर्यया ऐतिहासिक नाट्याविष्काराद्वारे शिवकालीन पराक्रम, जिजाऊंचे संस्कार आणि स्वराज्याची प्रेरणादायी गाथा सादर  करण्यात आली. या कार्यक्रमात गोव्यातील ५० महिला कलाकारांचा शिवशौर्यऐतिहासिक नाट्यप्रयोग, प्रसिद्ध कलाकार  सायली जोशी गोडबोले यांचे राष्ट्रमाता जिजाऊया विषयावरील एकपात्री नाटक, प्रसिद्ध हलगीवादक विनायक सोनावणे यांचे पारंपरिक हलगी वादन तसेच कराड येथील हिंदू तेज संस्थेकडून शिवकालीन युद्धकला, दांडपट्टा आणि शौर्यप्रात्यक्षिके सादर करण्यात आली आहेत. शिवचातुर्य  दिन व गरुडझेप मोहीम फ्लॅग ऑफ १७ ऑगस्ट २०२६ (सोमवार) रोजी आग्रा किल्ला परिसर, आग्रा येथे सकाळी ८.०० वा पार पडले.

गरुडझेप संस्थेमार्फत गेल्या सात वर्षापासून शिवचातुर्य मोहिमेचे आयोजन

 गरुडझेप संस्थेमार्फत गेल्या सात वर्षापासून शिवचातुर्य मोहिमेचे आयोजन

गरुडझेप संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष मारुती गोळे यांच्या संकल्पनेतून गेल्या सात वर्षांपासून आग्रा ते राजगड गडदुर्ग मोहीमआयोजित करण्यात येत आहे. ही मोहीम केवळ दुर्गभ्रमंतीपुरती मर्यादित नसून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, स्वराज्याची प्रेरणा, राष्ट्रीय एकात्मता, पर्यावरण संवर्धन आणि व्यसनमुक्त भारताचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य करीत आहे. या मोहिमेत सुमारे २,२०० मावळे, तसेच ६० सायकलस्वार सहभागी आहेत., उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या चार राज्यांमधून तसेच सुमारे ७८ शहरांमधून ही मोहीम मार्गक्रमण करणार आहे. आग्रा येथून सुरू झालेला हा ऐतिहासिक प्रवास ग्वाल्हेर, शिवपुरी, गुना, पाचोर, देवास, तिखरी, सेंधवा, धुळे, चांदवड, संगमनेर, भोसरी मार्गे राजगड येथे पोहोचणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटकेच्या घटनेचे ऐतिहासिक महत्व जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता आहे. गरुडझेप मोहीमही केवळ प्रवासाची मोहीम नसून, इतिहास, शौर्य, स्वराज्याची प्रेरणा आणि सांस्कृतिक वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न आहे, मोहिमेच्या समारोपावेळी राजगड येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे स्मरण करून त्यांच्या विचारांचा आणि स्वराज्याच्या इतिहासाचा जागर करण्यात येणार आहे.

 

आग्रा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक पराक्रमाची गाथा नव्या पिढीपर्यंत पोहोचविणार -राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल १७ ऑगस्ट हा दिवस ‘शिवचातुर्य दिन’ म्हणून साजरा करण्यात येणार

 आग्रा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक

पराक्रमाची गाथा नव्या पिढीपर्यंत पोहोचविणार

-राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल

१७ ऑगस्ट हा दिवस शिवचातुर्य दिनम्हणून साजरा करण्यात येणार

- पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

 

                मुंबई,दि.१७ : छत्रपती शिवाजी महाराजांची आग्रा येथील तत्कालीन बलशाली राजवटीच्या तावडतीतून  यशस्वी सुटका या ऐतिहासिक घटनेनिमित्त  शिवचातुर्य दिनआग्रा येथे साजरा करण्यात आला. या उपक्रमाची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी गरुडझेप संस्थेने शिवचातुर्य दिन’’ हा अभिनव उपक्रम सुरू केला असून, या माध्यमातून छत्रपती शिवरायांच्या शौर्याची,चातुर्याची आणि संयमाची प्रेरणा नव्या पिढीपर्यंत पोहोचण्यास मदत होईल, असे राजशिष्टाचार मंत्री तथा छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय स्मारक आग्रा चे समन्वयक जयकुमार रावल यांनी सांगितले.

 

               पर्यटन मंत्री शंभुराज देसाई  म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी १७ ऑगस्ट १६६६ रोजी आग्रा येथून सुटका करून स्वराज्याकडे परतण्याचा ऐतिहासिक पराक्रम केला. या घटनेच्या स्मरणार्थ दरवर्षी १७ ऑगस्ट हा दिवस शिवचातुर्य दिनम्हणून साजरा करण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. यानिमित्ताने गरुडझेप मोहीमपुणे येथील संस्थेच्या वतीने आग्रा ते राजगड अशी सुमारे १ हजार ३१० किलोमीटरची पायी व सायकल मोहीम आयोजित करण्यात आली आहे.


पर्यावरण व वन मंजुरीसाठी पाठपुरावा

 पर्यावरण व वन मंजुरीसाठी पाठपुरावा

केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील विविध महत्त्वपूर्ण प्रकल्पांच्या पर्यावरण व वनविषयक प्रलंबित मंजुरींचा आढावा घेण्यात आला.

 

वेगवेगळ्या टप्प्यांवर असलेल्या मंजुरींबाबतची सविस्तर माहिती केंद्रीय मंत्र्यांना देण्यात आली. या मंजुरींमुळे विकास कामांना विलंब होऊ नये, यासाठी त्यांचा जलदगतीने निपटारा करण्याची विनंती करण्यात आली. याबाबत केंद्रीय स्तरावर सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून, संबंधित प्रस्तावांना गती देण्याचे आश्वासन देण्यात आले.

0000

उत्तन-विरार कॉरिडोरसाठी निधी उभारणी

 उत्तन-विरार कॉरिडोरसाठी निधी उभारणी

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मुंबई-वाढवण एक्स्प्रेसवे कनेक्टिव्हिटी अर्थात उत्तन-विरार कॉरिडॉर या महत्वाकांक्षी प्रकल्पावर विशेष चर्चा झाली. सुमारे ५५ हजार कोटींच्या या प्रकल्पासाठी जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सीमार्फत (जायका)  वित्तीय सहाय्य मिळविण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाने सादर केला आहे.

 

प्रकल्पाचा मोठा आर्थिक आवाका लक्षात घेता, जायकासोबत आणखी एखाद्या बहुपक्षीय वित्तीय संस्थेला सहभागी करून संपूर्ण प्रकल्पासाठी आवश्यक निधी उभारता येईल का, याबाबत केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सकारात्मक पर्याय सुचविला. महाराष्ट्र शासनाने या पर्यायाला सकारात्मक प्रतिसाद दिला असून, पुढील काळात संबंधित संस्थांशी समन्वय साधून प्रस्ताव पुढे नेण्यात येणार आहे.

 

या प्रयत्नामुळे उत्तन-विरार कॉरिडॉरच्या वित्तीय व्यवस्थेबाबत नवा मार्ग उपलब्ध झाला असून, प्रकल्पाला गती देण्यासाठी पुढील कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे.

पुणे मेट्रो उद्घाटनासाठी पंतप्रधानांना निमंत्रण

 पुणे मेट्रो उद्घाटनासाठी पंतप्रधानांना निमंत्रण

पुणे मेट्रो-३ प्रकल्पाचे काम जवळपास पूर्ण झाले असून सध्या त्याची चाचणी सुरू आहे. टाटा समूहाच्या सहकार्याने उभारण्यात आलेली ही देशातील नवीन धोरणांतर्गत पहिली सार्वजनिक - खासगी भागीदारी पद्धतीची मेट्रो आहे. चाचण्या पूर्ण झाल्यानंतर या प्रकल्पाचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांना निमंत्रण दिले.

 

प्रधानमंत्री मोदी यांच्यासोबतची भेट अत्यंत सकारात्मक आणि फलदायी झाली. यापूर्वीही महाराष्ट्राने केंद्र सरकारकडे विविध प्रकल्पांसाठी सहकार्य मागितले असता केंद्राकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. त्याच धर्तीवर राज्यातील विविध महत्त्वपूर्ण प्रकल्पांना केंद्राच्या सहकार्याने अधिक गती देण्याचा प्रयत्न या दौऱ्यात करण्यात आला असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

पुणे मेट्रो उद्घाटनासाठी पंतप्रधानांना निमंत्रण

  पुणे मेट्रो उद्घाटनासाठी पंतप्रधानांना निमंत्रण

पुणे मेट्रो-३ प्रकल्पाचे काम जवळपास पूर्ण झाले असून सध्या त्याची चाचणी सुरू आहे. टाटा समूहाच्या सहकार्याने उभारण्यात आलेली ही देशातील नवीन धोरणांतर्गत पहिली सार्वजनिक - खासगी भागीदारी पद्धतीची मेट्रो आहे. चाचण्या पूर्ण झाल्यानंतर या प्रकल्पाचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांना निमंत्रण दिले.

 

प्रधानमंत्री मोदी यांच्यासोबतची भेट अत्यंत सकारात्मक आणि फलदायी झाली. यापूर्वीही महाराष्ट्राने केंद्र सरकारकडे विविध प्रकल्पांसाठी सहकार्य मागितले असता केंद्राकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. त्याच धर्तीवर राज्यातील विविध महत्त्वपूर्ण प्रकल्पांना केंद्राच्या सहकार्याने अधिक गती देण्याचा प्रयत्न या दौऱ्यात करण्यात आला असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

Featured post

Lakshvedhi