Tuesday, 28 July 2026

राष्ट्रीय कृषी विकास योजनेची प्रभावी अंमलबजावणी दुसऱ्या हप्त्यासाठी महाराष्ट्र देशात सर्वप्रथम पात्र केंद्रीय कृषीमंत्र्यांकडून प्रशंसा

 राष्ट्रीय कृषी विकास योजनेची प्रभावी अंमलबजावणी

दुसऱ्या हप्त्यासाठी महाराष्ट्र देशात सर्वप्रथम पात्र

केंद्रीय कृषीमंत्र्यांकडून प्रशंसा 

नवी दिल्ली, 27 : राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत (आरकेव्हीवाय)  मिळालेल्या निधीचा वेळेत आणि प्रभावी वापर करून महाराष्ट्राने देशात पुन्हा एकदा आदर्श निर्माण केला आहे. या कामगिरीमुळे योजनेचा दुसरा हप्ता मिळवण्यास पात्र ठरणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले असून, केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी राज्याच्या या उल्लेखनीय कामगिरीचे विशेष कौतुक केले आहे.

 

केंद्रीय कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृष्य संवादप्रणालीद्वारे झालेल्या आढावा बैठकीत महाराष्ट्राचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह केंद्र व राज्य शासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

बैठकीत केंद्रीय कृषी मंत्री चौहान म्हणाले की, केंद्र सरकारने आरकेव्हीवायअंतर्गत महाराष्ट्राला पहिल्या हप्त्यापोटी 335 कोटींचा निधी मंजूर केला होता. राज्याने निर्धारित 75 टक्के खर्चाचा टप्पा यशस्वीरित्या पूर्ण करत सुमारे 260 कोटींचा निधी वेळेत खर्च केल्याने महाराष्ट्र दुसरा हप्ता मिळवण्यासाठी पात्र ठरला.  उर्वरित 335 कोटींचा निधी वितरित करण्याची प्रक्रिया केंद्र सरकारने सुरू केली आहे.

नशामुक्त मुंबई अभियान हा केवळ एका दिवसाचा कार्यक्रम न ठेवता प्रत्येक शाळा आणि महाविद्यालयात

 वर्षभर विविध उपक्रमांचे आयोजन

नशामुक्त मुंबई अभियान हा केवळ एका दिवसाचा कार्यक्रम न ठेवता प्रत्येक शाळा आणि महाविद्यालयात विद्यार्थी सुरक्षा समितीच्या माध्यमातून नशामुक्त मुंबई करण्यासाठी वर्षभर विविध उपक्रम राबविण्याचे नियोजन करावे. वरळी डोम येथील मुख्य कार्यक्रमासाठी येणाऱ्या विद्यार्थी, शिक्षक, पालक यांच्या उपस्थितीचे योग्य नियोजन करावे. यामध्ये प्रामुख्याने सातवीच्या पुढील शालेय तसेच महाविद्यालयांच्या आणि आयटीआयच्या विद्यार्थ्यांना, शिक्षकांना, पालकांना सहभागी करुन घ्यावे. या अभियानाला व्यापक स्वरूप देण्यासाठी व्यसनमुक्तीच्या क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, मानसोपचारतज्ज्ञ, राष्ट्रीय सेवा योजना, एनसीसीच्या विद्यार्थ्यांना या मोहिमेत सामावून घेतले जावे. इतर विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी मुंबईतील सर्व शाळा, महाविद्यालयांमधून कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात यावे, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.

नशामुक्त मुंबई’ अभियानात सर्वांचा सहभाग महत्वाचा

 नशामुक्त मुंबईअभियानात सर्वांचा सहभाग महत्वाचा

-मंत्री मंगलप्रभात लोढा

·         नशामुक्त मुंबईअभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गुरुवारी शुभारंभ

 

मुंबई, दि. 27 : 'नशामुक्त मुंबई' अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते येत्या गुरुवारी होणार आहे. हा केवळ एक दिवसाचा कार्यक्रम नसून, वाढत्या अमली पदार्थांच्या विळख्यातून तरुण पिढीला वाचवण्यासाठी ते सातत्याने चालणारे लोकशिक्षणाचे आणि सार्वजनिक हिताचे अभियान आहे. या जनचळवळीत समाजातील सर्व घटकांनी आणि विशेषतः विद्यार्थी, शिक्षक व पालकांना सहभागी करून घ्यावे, असे प्रतिपादन कौशल्य विकास मंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे सह पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले. 

 

30 जुलै रोजी वरळी डोम येथे नशामुक्त मुंबईअभियानाचा शुभारंभ होत असून, त्या पार्श्वभूमीवर आयोजित पूर्वतयारीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मुंबई शहर जिल्हाधिकारी आंचल गोयल (ऑनलाइन) यांच्यासह बृहन्मुंबई महानगरपालिका, शालेय शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षण, बृहन्मुंबईतील विविध यंत्रणांचे अधिकारी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. बैठकीत मंत्री मंगलप्रभात लोढा आणि जिल्हाधिकारी कटियार यांनी संबंधित यंत्रणांना या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आणि आयोजनासाठी काटेकोर सूचना दिल्या. तंत्रज्ञानाचा वापर करून ऑनलाईन आणि व्हॉट्सॲपच्या माध्यमातून लाखो नागरिकांना व्यसनमुक्तीची सामूहिक शपथ दिली जाणार असल्याचेही बैठकीत सांगण्यात आले.

महाराष्ट्र सागरी व भूजल मच्छीमार कल्याणकारी महामंडळाच्या स्थापनेबाबत मंत्री नितेश राणे यांनी घेतला आढावा

 महाराष्ट्र सागरी व भूजल मच्छीमार कल्याणकारी महामंडळाच्या स्थापनेबाबत

 मंत्री नितेश राणे यांनी घेतला आढावा

 

मुंबई, दि. २७ : महाराष्ट्र सागरी व भूजल मच्छीमार कल्याणकारी महामंडळाच्या स्थापनेसंदर्भात मंत्रालयात मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण आढावा बैठक झाली.

 

बैठकीत सागरी आणि भूजल मच्छीमारांसाठी दोन स्वतंत्र कल्याणकारी महामंडळांची स्थापना, त्यासाठी आवश्यक पदनिर्मिती, निधीची उपलब्धता तसेच महामंडळांच्या कार्यक्षम अंमलबजावणीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. याशिवाय, महामंडळाच्या कार्यालयासाठी महानंदच्या जागेवर कार्यालय उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रस्तावही बैठकीत सादर करण्यात आला.

 

मच्छीमारांच्या सर्वांगीण कल्याणासाठी स्वतंत्र आणि सक्षम यंत्रणा उभारण्याच्या दृष्टीने आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया गतीने पूर्ण करण्याचे निर्देश मंत्री नितेश राणे यांनी दिले.

           

बैठकीस मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव एन. रामास्वामी, मत्स्य आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, मत्स्यव्यवसाय विभागाचे उपसचिव, सहआयुक्त (सागरी), सहआयुक्त (भूजल) तसेच विभागातील संबंधित अधिकारी उपस्थित होते.

००००

Monday, 27 July 2026

मच्छीमारांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत आढावा बैठक

 मच्छीमारांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत

आढावा बैठक

 

मुंबई, दि. २७ : रायगड जिल्ह्यातील थळ नवगाव, ता.अलिबाग येथील मच्छीमार बांधवांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी आरसीएफ कंपनीच्या अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतली.

 

बैठकीत मच्छीमार बांधवांच्या गरजा लक्षात घेऊन आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच संबंधित कामांचा समन्वय साधून आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने विविध बाबींचा आढावा घेण्यात आला.

 

या बैठकीस मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव एन. रामास्वामी, मत्स्यव्यवसाय आयुक्त प्रेरणा देशभ्रतार तसेच आरसीएफ कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

ससून डॉक येथील सामंजस्य करारानंतरच्या कार्यवाहीचा आणि मरोळ मच्छीमार मार्केट विकासकामांचा मंत्री नितेश राणे यांनी घेतला आढावा

 ससून डॉक येथील सामंजस्य करारानंतरच्या कार्यवाहीचा आणि मरोळ मच्छीमार मार्केट विकासकामांचा मंत्री नितेश राणे यांनी घेतला आढावा

 

मुंबई, दि. २७ : मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी मंत्रालयात महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळ, मुंबईच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन मुंबईतील ससून डॉक येथे झालेल्या सामंजस्य करारानंतर करण्यात आलेल्या कार्यवाहीचा तसेच मरोळ मच्छीमार मार्केटच्या विकासकामांच्या प्रगतीचा आढावा घेतला.

 

ससून डॉक परिसरातील मच्छीमार बांधवांसाठी करण्यात येणाऱ्या विविध सुविधा, पायाभूत विकासकामे आणि सामंजस्य करारानुसार सुरू असलेल्या कामांच्या सद्यस्थितीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच मरोळ मच्छीमार मार्केटच्या विकासकामांना गती देण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबतही आढावा घेण्यात आला.

 

मच्छीमार महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांना हॅन्ड ग्लोव्हज व गमबूट उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा करण्यात आली. मच्छीमार समुदायाच्या दैनंदिन कामकाजात आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित विभागांनी प्रभावीपणे कार्यवाही करावी, असे निर्देश मंत्री नितेश राणे यांनी दिले.

 

या बैठकीस  मत्स्यव्यवसाय विभागाचे आयुक्त प्रेरणा देशभ्रतार तसेच आरसीएफ कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

गाव तलावांमध्ये मत्स्यसंवर्धनाला चालना देण्यासाठी डीपीडीसी निधीबाबत सविस्तर प्रस्ताव सादर करावा

  

गाव तलावांमध्ये मत्स्यसंवर्धनाला चालना देण्यासाठी

डीपीडीसी निधीबाबत सविस्तर प्रस्ताव सादर करावा

मंत्री नितेश राणे

 

मुंबई, दि. २७ : राज्यातील गाव तलाव, साठवण तलाव, पाझर तलाव, शिवकालीन तलाव, मालगुजारी तलाव, बॅरेज, देवडोह तसेच इतर नैसर्गिक तलाव व जलाशयांमध्ये ग्रामपंचायती आणि स्थानिक मच्छीमारांच्या सहभागातून मत्स्यबीज संचयन व मत्स्यसंवर्धनाला चालना देण्यासाठी डीपीडीसीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्याबाबत सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले.

 

मंत्रालयात मत्स्यव्यवसाय मंत्री राणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत राज्यातील तलावांमध्ये मत्स्यसंवर्धनाला चालना देण्यासाठी विविध उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला.

 

मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे म्हणाले की, ग्रामपंचायती आणि स्थानिक मच्छीमारांच्या सहभागातून गाव तलावांचा शाश्वत व प्रभावी वापर करण्यावर भर देणे आवश्यक आहे. या उपक्रमामुळे स्थानिक मच्छीमारांना मत्स्यव्यवसायासाठी अधिक संधी उपलब्ध होतील आणि त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणास चालना मिळेल. या अनुषंगाने डीपीडीसीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्याबाबत सविस्तर प्रस्ताव तातडीने सादर करावा, तसेच संबंधित विभागांनी समन्वयाने आवश्यक कार्यवाही करावी.

 

यावेळी जिल्हा परिषदांच्या अखत्यारित असलेले तलाव मत्स्यव्यवसाय विभागाकडे हस्तांतरित करून त्यामध्ये मत्स्यसंवर्धनासाठी आवश्यक उपाययोजना करण्याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच तलावांमधील गाळ काढणे, अतिक्रमण हटविणे आणि जलसाठ्यांची क्षमता वाढविण्यासंदर्भातही विविध बाबींचा आढावा घेण्यात

Featured post

Lakshvedhi