Monday, 14 September 2026

मराठवाडा मुक्ती संग्राम : स्वातंत्र्य, लोकशक्ती आणि राष्ट्रीय एकात्मतेचा गौरवशाली अध्याय

 मराठवाडा मुक्ती संग्राम : स्वातंत्र्य, लोकशक्ती आणि राष्ट्रीय एकात्मतेचा गौरवशाली अध्याय

 

भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले; मात्र तत्कालीन हैदराबाद संस्थानातील जनतेला भारतीय संघात सहभागी होण्यासाठी आणखी तेरा महिने प्रतीक्षा करावी लागली. या संस्थानात आजच्या महाराष्ट्रातील मराठवाडा, तेलंगणाचा प्रदेश आणि कर्नाटकातील काही भागांचा समावेश होता. त्यामुळे १७ सप्टेंबर १९४८ हा दिवस केवळ एका प्रदेशाच्या मुक्तीचा दिवस नसून, भारताच्या राष्ट्रीय एकात्मतेच्या प्रक्रियेतील अत्यंत महत्त्वाचा टप्पा म्हणून स्मरणात राहिला आहे.

गणेश ज्ञानारती’ प्रदर्शनाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते उद्घाटन

 गणेश ज्ञानारतीप्रदर्शनाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते उद्घाटन

 

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई येथे गणेश ज्ञानारतीप्रदर्शनाचे उद्घाटन केले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रदर्शनाची पाहणी करून ऐतिहासिक व सांस्कृतिक ठेव्यांची माहिती जाणून घेतली. प्रदर्शनात मौर्य, सातवाहन, गुप्त आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील सुमारे 1300 दुर्मिळ सुवर्ण, रजत, कांस्य व तांब्याची ऐतिहासिक नाणी येथे प्रदर्शित करण्यात आली आहेत. भगवान गौतम बुद्धांच्या भिक्षापात्राचा अंश, बुद्ध प्रतिमा व बोधिसत्त्वाचे अवशेषही मांडण्यात आले आहेत. मुघलकालीन हिंदुस्तानाचा 1788 मधील नकाशा आणि नर्मदा नदीचा 1870 मधील नकाशाही प्रदर्शनाचे आकर्षण आहे. भारतीय राजे व जमीनदारांचा शाही दरबार अल्बमसह अनेक दुर्मिळ ऐतिहासिक ग्रंथ येथे ठेवण्यात आले होते. कोल्हापूर व कान्हेरी येथील पुरातत्त्वीय उत्खननातील वस्तू तसेच बुद्ध प्रतिमा यांच्यासह भारतीय इतिहास, संस्कृती आणि पुरातत्त्वीय वारशाचे समृद्ध दर्शन घडविणारे असे हे प्रदर्शन होते.

एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी प्रास्ताविक केले. आभार सचिव विनय गणपुले यांनी मानले.

 

एशियाटिक सोसायटीचे कार्य अधिक व्यापक व्हावे

 एशियाटिक सोसायटीचे कार्य अधिक व्यापक व्हावे

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एशियाटिक सोसायटीच्या कार्याला अधिक व्यापक स्वरूप देण्यासाठी राज्य शासनाचे पूर्ण सहकार्य राहील, अशी ग्वाही दिली. इतिहास हा केवळ भूतकाळ समजून घेण्याचे साधन नसून वर्तमानाला दिशा देणारा आणि भविष्याचा वेग निश्चित करणारा महत्त्वपूर्ण दुवा आहे, असे त्यांनी सांगितले. मानवतेचा प्रवास, विचारांची जडणघडण, अभ्यासपद्धती आणि विविध शास्त्रांची उत्क्रांती यांचे दस्तऐवजीकरण होणे अत्यावश्यक आहे. परकीय आक्रमणांमध्ये नालंदा विद्यापीठाच्या मोठ्या प्रमाणावर नष्ट झालेल्या ग्रंथसंपदेच्या घटनांतून ज्ञानसंपदेच्या जतनाचे महत्त्व अधोरेखित होते. मात्र अनेक विद्वानांनी उपलब्ध ग्रंथांचे संरक्षण करून ही समृद्ध ज्ञानपरंपरा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवली. या परंपरेचे जतन आणि संवर्धन करणे ही आजची मोठी जबाबदारी असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.

            नव्या कार्यकारिणीच्या प्रयत्नांमुळे संस्थेला नवसंजीवनी मिळाली असून एशियाटिक सोसायटी नव्या उमेदीने कार्यरत होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. सोसायटीच्या ग्रंथालय विभागाच्या मुख्य कार्यालयासाठी नवीन जागा तयार झाली आहे. या ठिकाणी मुख्य कार्यालय लवकरच सुरू करण्यासाठी शासनाकडून आवश्यक सहकार्य करण्यात येईल. सोसायटीच्या मुख्य कार्याला अधिक बळ मिळावे, तसेच येथे येणाऱ्या अभ्यासकांना आवश्यक ग्रंथ, संदर्भसाहित्य आणि ज्ञानसंपदा सहज उपलब्ध व्हावी, यासाठी शासन सकारात्मक भूमिका घेईल. मुख्यमंत्री कार्यालय, संबंधित अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्याकडून आवश्यक मदत केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी एशियाटिक सोसायटीच्या नूतन कार्यकारिणीला पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देत संस्थेच्या भविष्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या

भारतीय ज्ञानपरंपरेच्या जतन, संवर्धनासाठी एशियाटिक सोसायटीने पुढाकार घ्यावा

 भारतीय ज्ञानपरंपरेच्या जतन, संवर्धनासाठी एशियाटिक सोसायटीने पुढाकार घ्यावा

-केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईने ज्ञानाचे डिजिटायझेशन करून

देशभरातील ग्रंथालये व संशोधन संस्थांशी जोडावे

 

मुंबई, दि. 13 : भारतीय ज्ञानपरंपरेचे जतन, संवर्धन आणि प्रसार करण्यासाठी एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईने पुढाकार घ्यावा. संस्थेकडील ज्ञानसंग्रहाचे डिजिटायझेशन करून तो देशभरातील विद्यार्थी, संशोधक आणि अभ्यासकांना उपलब्ध करून द्यावा, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले.

          टाउन हॉल येथे एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईच्या नवनिर्वाचित समितीच्या परिचय कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, आमदार अमित साटम, प्रवीण दरेकर, एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे, सचिव विवेक गणपुले आदी उपस्थित होते. यावेळी सुप्रसिद्ध उद्योजक रमेश दंडवते यांनी एशियाटिकच्या बळकटीकरणासाठी 50 लाख रुपयांची मदत केली, याबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, राष्ट्राची स्मृती, इतिहास, संस्कार, भाषा, अभिलेख आणि परंपरांचे जतन महत्त्वाचे आहे. इतिहास आणि सांस्कृतिक परंपरांचे संरक्षण करणाऱ्या राष्ट्राची अस्मिता कधीही नष्ट होत नाही. भारतीय ज्ञानपरंपरा अनेक आव्हानांनंतरही टिकून राहिली आहे. ज्ञान कोणत्याही चौकटीत बंदिस्त न राहता मुक्त असले पाहिजे. या ज्ञानाचा उपयोग देशासह संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी व्हावा.

भारतीय इतिहास, पुरातत्त्व, भाषा, तत्त्वज्ञान, साहित्य आणि विज्ञानाचे पुनर्मूल्यांकन भारतीय दृष्टिकोनातून होणे आवश्यक आहे. सोसायटीने महाराष्ट्रातील विद्यार्थी व संशोधकांना संग्रहाच्या अभ्यासासाठी प्रोत्साहन द्यावे, ज्ञानसंग्रहाचे डिजिटायझेशन करावे आणि देशातील ग्रंथालये व संशोधन संस्थांना सामायिक व्यासपीठावर जोडावे. तसेच ज्ञान भारत राष्ट्रीय पांडुलिपी मिशनमध्ये सक्रिय सहभाग घेऊन गावागावांत आणि विद्वानांच्या घरांमध्ये जतन केलेल्या दुर्मीळ पांडुलिपींचा शोध, संकलन, संवर्धन व संशोधनासाठी विशेष अभियान राबवावे, असे आवाहनही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले.

 

महाराष्ट्र के राज्यपाल ने प्रिंस रहीम आगा खान पंचम का स्वागत किया पर्यावरण संरक्षण एवं सूक्ष्म वन निर्माण के लिए विश्वविद्यालयों के साथ सहयोग करेगा आगा खान डेवलपमेंट नेटवर्क

 महाराष्ट्र के राज्यपाल ने प्रिंस रहीम आगा खान पंचम का स्वागत किया

पर्यावरण संरक्षण एवं सूक्ष्म वन निर्माण के लिए विश्वविद्यालयों के साथ

सहयोग करेगा आगा खान डेवलपमेंट नेटवर्क

 

मुंबई, 13 सितंबर : शिया इस्माइली मुस्लिम समुदाय के 50वें इमाम एवं आगा खान डेवलपमेंट नेटवर्क (AKDN) के अध्यक्ष प्रिंस रहीम आगा खान पंचम का महाराष्ट्र के राज्यपाल जिष्णु देव वर्मा ने आज महाराष्ट्र लोकभवन, मुंबई में स्वागत किया।

प्रिंस रहीम आगा खान ने बताया कि आगा खान डेवलपमेंट नेटवर्क ने हजारों स्थानों पर सूक्ष्म वन’ (Micro Forest) विकसित करने की पहल की है। 

उन्होंने कहा कि महाराष्ट्र के विश्वविद्यालयों एवं शैक्षणिक संस्थानों में भी इस प्रकार के उपक्रमों की संभावनाओं का पता लगाया जा सकता है।

उन्होंने कहा कि महाराष्ट्र के विश्वविद्यालयों के साथ पर्यावरण संरक्षण, जलवायु कार्रवाई तथा इससे जुड़े अन्य विषयों पर सहयोग करने में आगा खान डेवलपमेंट नेटवर्क को प्रसन्नता होगी।

उन्होंने बताया कि जलवायु परिवर्तन की गंभीर चुनौतियों को देखते हुए आगा खान डेवलपमेंट नेटवर्क भारत के अनेक शहरों के लिए जलवायु कार्रवाई योजना पर कार्य कर रहा है तथा महाराष्ट्र के विभिन्न शहरों और नगरों में नवीन शीतलन (Cooling) उपायों को लागू कर रहा है। इन पहलों से स्थानीय समुदायों को काफी लाभ हुआ है।

आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या विकास उपक्रमांना राज्य शासनाचे पूर्ण सहकार्य

 आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या विकास उपक्रमांना राज्य शासनाचे पूर्ण सहकार्य

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 13 : आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्क महाराष्ट्रात राबवत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास आणि हवामान बदल प्रतिबंध संदर्भातील उपक्रमांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक करत राज्य शासनाकडून अशा सर्व प्रकल्पांना आवश्यक ते सहकार्य आणि पाठबळ दिले जाईल, अशी ग्वाही दिली.

पाचवे आगा खान म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या अधिकृत दौऱ्यावर आलेले प्रिन्स रहीम आगा खान यांनी शिष्टमंडळासह मुख्यमंत्री फडणवीस यांची येथील फेअरमाँट हॉटेल येथे भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे महाराष्ट्राच्या वतीने स्वागत केले. यावेळी विविध सामाजिक विकास प्रकल्प, आरोग्य सुविधा, हवामान कृती, जलव्यवस्थापन, वारसा संवर्धन आणि सार्वजनिक-खासगी भागीदारीच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांबाबत सविस्तर चर्चा झाली. कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, आमदार अमीन पटेल, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्र, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी आणि सचिव डॉ. राजेश गवांदे आदी यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील ग्रामीण भागात जलसंधारण आणि पर्यावरण संवर्धनासाठी आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कने केलेल्या कार्याचे कौतुक केले. जलटंचाईग्रस्त भागांमध्ये राबविण्यात आलेल्या उपक्रमांमुळे गावांमध्ये झालेला सकारात्मक बदल उल्लेखनीय असल्याचे सांगत त्यांनी अशा प्रकल्पांचा विस्तार अधिक मोठ्या क्षेत्रात करण्यासाठी राज्य शासन भागीदारी करण्यास तयार असल्याचे स्पष्ट केले. सार्वजनिक-खासगी भागीदारीच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणणाऱ्या उपक्रमांना शासनाचे पूर्ण सहकार्य राहील, असे त्यांनी सांगितले.

यावेळी राज्य शासन आणि आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्क यांच्यात सातत्यपूर्ण संवादासाठी संस्थात्मक यंत्रणा उभारण्याबाबतही चर्चा झाली. या माध्यमातून विविध प्रकल्पांचा आढावा घेऊन त्यांचा विस्तार करण्यावर दोन्ही बाजूंनी सहमती व्यक्त करण्यात आली. हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शहरी उष्णता कमी करण्यासाठी करण्यात आलेल्या अभ्यासाची माहिती शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांना दिली. हरित क्षेत्रवाढ, पर्यावरणपूरक नियोजन आणि हवामान कृतीसाठी राबविण्यात येणारे उपक्रम राज्यातील शहरांसाठी उपयुक्त ठरतील, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद; महाराष्ट्रातून ४३२ अर्ज सादर

 महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद;

महाराष्ट्रातून ४३२ अर्ज सादर

 

मुंबई, दि. १३ :  महाराष्ट्र शासनाच्या पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, सांस्कृतिक कार्य विभागाकडून आयोजित करण्यात आलेल्या 'महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६' साठी महाराष्ट्रभरातून ४३२ मंडळांनी अर्ज सादर केले आहेत. यात ठाणे जिल्ह्याचे सर्वाधिक ५२ अर्ज प्राप्त झाले आहेत. या स्पर्धेचा विस्तार मागील वर्षीपासून तालुकास्तरापर्यंत करण्यात आला होता. 

यावर्षीपासून प्रथमच ही स्पर्धा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील विस्तारित करण्यात आली आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २५ सप्टेंबर आहे. अर्ज सादर करताना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मंडळांनी गेल्या वर्षभरातील आयोजित केलेल्या गणेशोत्सव व संबंधित सांस्कृतिक उपक्रमांची तसेच यावर्षीच्या गणेशोत्सवाची छायाचित्रे जिओ टॅग फोटोसहीत सादर करावयाची आहेत. आतापर्यंत राष्ट्रीय स्तरासाठी देशभरातील विविध शहरांतून अर्ज प्राप्त झाले आहेत. तर आंतरराष्ट्रीय स्तरासाठी जपान, श्रीलंका, जर्मनी, नायजेरिया, सिंगापूर इ. देशांतून अर्ज प्राप्त झाले असून, या स्पर्धेचा जागतिक विस्तार या राज्य महोत्सवाला 'ग्लोबल' ओळख मिळवून देताना दिसतो आहे.

सार्वजनिक गणेशोत्सवाचे पारंपरिक व सांस्कृतिक महत्त्व ओळखून शासनाकडून गणेशोत्सवाला 'राज्य महोत्सव' म्हणू घोषित करण्यात आले आहे. मागील वर्षी या स्पर्धा व संबंधित अन्य उपक्रम यांच्या आयोजनात व्यापक बदल करण्यात आले असून वर्षागणिक मंडळांचा व नोंदणीकृत संस्थांचा या स्पर्धेतील सहभाग वाढत आहे.  

      स्पर्धेचे परीक्षण अत्यंत पारदर्शक पद्धतीने करण्यात येते. सहभागी मंडळांना तालुकास्तरावरील व जिल्हास्तरावरील परीक्षण समिती प्रत्यक्ष भेट देणार असून, भेटीदरम्यान सहभागी मंडळांची सर्व कागदपत्रे, वर्षभरात राबविलेले उपक्रम, त्यांचे अहवाल, फोटो व व्हिडिओ तसेच सांस्कृतिक स्पर्धा, संस्कृती व सांस्कृतिक वारशाचे जतन व संवर्धन विषयक उपक्रम, भाविकांसाठी केलेल्या सोयी सुविधा, विविध स्पर्धा, विद्यार्थी महिला व ज्येष्ठ नागरिक यांसाठीचे कायमस्वरूपी व उत्सव काळातील उपक्रम, पर्यावरण पूरक मूर्ती व सजावट, प्रदूषणरहित वातावरण इ. विविध बाबींच्या आधारे परीक्षण करण्यात येणार आहे. हे परीक्षण ऑनलाईन स्वरूपातील असल्याने परीक्षकांना जिओ टॅग फोटो द्वारे आपला निकाल सादर करावयाचा आहे. यामुळे निकालात पारदर्शकता निर्माण होऊन स्पर्धेचे नियमन व नियंत्रण अधिक प्रभावीपणे करता येते.        

         तालुकास्तरीय प्रथम विजेत्याला २५ हजार, जिल्हास्तरीय विजेत्यांना अनुक्रमे ५० हजार ४० हजार व ३० हजार रकमेची पारितोषिके देण्यात येणार असून व राज्यस्तरीय तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रथम तीन विजेत्यांना ७.५ लाख, ५ लाख, २.५ लाखांची पारितोषिकांची घोषणा करण्यात आली आहे. 

तसेच घरगुती व सार्वजनिक गणपतीचे दर्शन घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने सर्वांना होण्यासाठी तयार करण्यात आलेले https://ganeshotsav.pldmka.co.in हे पोर्टल १४ सप्टेंबरपासून खुले होणार आहे. यावर सार्वजनिक मंडळे आपल्या गणपतीचे थेट मोफत दर्शन जगभरातील गणेशभक्तांसाठी उपलब्ध करून देऊ शकतात, तसेच घरगुती गणपतीची छायाचित्रे देखील सर्वांना पाहण्यासाठी उपलब्ध करून देऊ शकतात.

या राज्य महोत्सवातील सर्व उपक्रमांमध्ये मंडळांनी व नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घ्यावा, असे आवाहन राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले आहे.

 

Featured post

Lakshvedhi