Sunday, 26 July 2026

सायन येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद · २९ शासकीय कार्यालयांचा सहभाग; ९१ लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ

 सायन येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

·         २९ शासकीय कार्यालयांचा सहभाग; ९१ लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ

 

मुंबई, दि. २२ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जन्मदिवस आणि दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून सायन येथील समाज मंदिर हॉलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान झाले. या शिबिरात शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती देत पात्र लाभार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. रक्तदान व मोफत वैद्यकीय तपासणी शिबिरांचेही आयोजन यावेळी करण्यात आले.

 

यावेळी आमदार कॅप्टन आर. तमील सेल्वन,  मुंबई शहर जिल्हाधिकारी आंचल गोयल,  अप्पर जिल्हाधिकारी बप्पासाहेब थोरात, निवासी जिल्हाधिकारी शिवनंदा लंगडापुरे उपस्थित होते.

 

सायन कोळीवाडा हा गरीब घटकांचा मतदारसंघ असून येथे समाधान शिबिर आयोजित केल्याबद्दल आमदार कॅप्टन आर. तमील सेल्वन यांनी  प्रशासनाचे अभिनंदन केले. प्रास्ताविकात जिल्हाधिकारी गोयल यांनी छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र समाधान शिबिरहा उपक्रम लोकाभिमुख, पारदर्शक आणि गतिमान प्रशासन नागरिकांच्या दारी पोहोचवण्याचे प्रभावी माध्यम असल्याचे सांगितले.  हक्कांबरोबरच नागरिकांनी आपली कर्तव्येही पार पाडली पाहिजेत, असे सांगत त्यांनी रक्तदान शिबिरात सहभागी होऊन पावसाळ्यात रक्तपेढ्यांतील तुटवडा कमी करण्याचे आवाहन केले. महिलांनी आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष न करता मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी गोयल यांनी यावेळी केले. 

 

शिबिरामध्ये २९ शासकीय कार्यालयांनी सहभाग नोंदविला. त्यापैकी ९ विभागांमार्फत विविध योजनांचा प्रत्यक्ष लाभ देण्यात आला. एकूण ९१ लाभार्थ्यांना प्रमाणपत्रे, शिधापत्रिका, क्रीडा साहित्य तसेच विविध योजनांतील लाभ वितरित करण्यात आले. २० विभागांनी नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती, अर्ज प्रक्रिया आणि मार्गदर्शन उपलब्ध करून दिले. समाधान शिबिरात सायन परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला असून, विविध योजनांसाठी मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. आभारप्रदर्शन अप्पर जिल्हाधिकारी बप्पासाहेब थोरात यांनी केले.

 

शिबिरासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका आणि मुंबई पोलिसांचे सहकार्य लाभले. यावेळी वीर सावरकर ट्रस्टच्या वतीने विद्यार्थ्यांना सायकल तसेच दिव्यांग व्यक्तींना तीन चाकी सायकलचे वाटप करण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान' लोकाभिमुख प्रशासनाचा आदर्श; शासनाच्या २७ सेवा एकाच छताखाली

 छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान' लोकाभिमुख प्रशासनाचा आदर्श; शासनाच्या २७ सेवा एकाच छताखाली

मंत्री ॲड. आशिष शेलार

            मुंबई, दि. २२ : लोकाभिमुख सरकार आणि जनताकेंद्रित व्यवस्था कशी असावी, याचा आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिला. रयतेच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देणाऱ्या त्यांच्या विचारातून प्रेरणा घेऊन शासनाने या अभियानाला 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान' हे नाव दिले असून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शावर चालण्याचा महाराष्ट्र शासनाचा सातत्यपूर्ण प्रयत्न असल्याचे सांस्कृतिक कार्य, माहिती व तंत्रज्ञान मंत्री ॲड आशिष शेलार यांनी सांगितले.

            मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत २२ जुलै ते २ ऑगस्ट २०२६ या कालावधीत प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 'छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान अभियान' आयोजित करण्यात आले आहे. माहीम विधानसभा मतदारसंघातील अभियानाचा शुभारंभ प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे झाला.

            यावेळी मंत्री ॲड आशिष शेलार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेल्या जनतेकेंद्रित राज्यकारभाराच्या आदर्शावर चालत महाराष्ट्र शासन महसूल विभाग अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि गतिमान करण्यासाठी कटिबद्ध आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ तळागाळातील शेवटच्या नागरिकापर्यंत पोहोचविण्यासाठी राबविण्यात येत असलेले हे अभियान लोकाभिमुख प्रशासनाचे प्रभावी उदाहरण आहे. यावेळी मुंबई शहरच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या हस्ते १२३ लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांची प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली.

            या अभियानांतर्गत महसूल विभागासह विविध शासकीय विभागांच्या माध्यमातून महसुली दाखले, आधार सेवा, दिव्यांग सेवा, संजय गांधी निराधार योजना, रेशन कार्डविषयक सेवा, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध सेवा आदींसह एकूण २७ सेवा नागरिकांना एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात येत आहेत. मुंबई शहर जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्या विधानसभा मतदारसंघात आयोजित शिबिरात सहभागी होऊन या सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

Saturday, 25 July 2026

पोषण शिक्षणातून निरोगी पिढी घडविण्याचा प्रयत्न

 पोषण शिक्षणातून निरोगी पिढी घडविण्याचा प्रयत्न

            शालेय विद्यार्थ्यांमध्ये सकस आहार आणि आरोग्यदायी जीवनशैलीची सवय निर्माण करण्यासाठी पुणे, सिंधुदुर्ग आणि मुंबई जिल्ह्यातील २३५ शाळांमध्ये पोषण शिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला आहे. या माध्यमातून सुमारे ६० हजार विद्यार्थ्यांपर्यंत सुरक्षित आणि सकस आहाराचा संदेश पोहोचविण्यात आला.

            ४७० शिक्षकांना 'हेल्थ अँड वेलनेस अॅम्बेसेडर' म्हणून प्रशिक्षित करण्यात आले असून, सर्व शाळांमध्ये 'सेहत क्लब' स्थापन करण्यात आले आहेत. अन्न सुरक्षा, स्वच्छता आणि पोषणविषयक जनजागृतीसाठी पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करण्यात आला आहे.

पोषण शिक्षणातून निरोगी पिढी घडविण्याचा प्रयत्न

 पोषण शिक्षणातून निरोगी पिढी घडविण्याचा प्रयत्न


            शालेय विद्यार्थ्यांमध्ये सकस आहार आणि आरोग्यदायी जीवनशैलीची सवय निर्माण करण्यासाठी पुणे, सिंधुदुर्ग आणि मुंबई जिल्ह्यातील २३५ शाळांमध्ये पोषण शिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला आहे. या माध्यमातून सुमारे ६० हजार विद्यार्थ्यांपर्यंत सुरक्षित आणि सकस आहाराचा संदेश पोहोचविण्यात आला.


            ४७० शिक्षकांना 'हेल्थ अँड वेलनेस अॅम्बेसेडर' म्हणून प्रशिक्षित करण्यात आले असून, सर्व शाळांमध्ये 'सेहत क्लब' स्थापन करण्यात आले आहेत. अन्न सुरक्षा, स्वच्छता आणि पोषणविषयक जनजागृतीसाठी पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करण्यात आला आहे.

जलसंधारणातून शेतीला दिलासा

 जलसंधारणातून शेतीला दिलासा

            जलसंधारण क्षेत्रात सहा जलसाठा संरचनांची निर्मिती व दुरुस्ती करण्यात आली आहे. त्यामुळे २,००० लाख लिटर अतिरिक्त पाणी साठवण क्षमता निर्माण झाली आहे. याचा लाभ ३०० एकरांहून अधिक शेती आणि ५०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांना झाला आहे.

            याशिवाय, पुढील दोन वर्षांत २० हून अधिक नवीन जलसंधारण प्रकल्प उभारून सुमारे २,५०० लाख लिटर भूजल पुनर्भरण क्षमता निर्माण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये शेततळी, बंधारे, बोअरवेल रिचार्ज आणि पर्जन्यजल संधारणासारख्या उपाययोजनांचा समावेश आहे.

शाळांमध्ये पायाभूत सुविधा आणि हरित ऊर्जा उपक्रम

 शाळांमध्ये पायाभूत सुविधा आणि हरित ऊर्जा उपक्रम

            ग्रामीण भागातील शाळांमध्ये सुरक्षित पिण्याचे पाणी, स्वच्छता आणि सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी व्यापक पायाभूत सुविधा उभारण्यात आल्या आहेत. २७ आरओ पाणी शुद्धीकरण यंत्रणा, १२ स्वच्छतागृहे अनेक शाळांमध्ये संरक्षक भिंती, पेव्हिंग ब्लॉक आणि अन्य सुविधा उभारण्यात आल्या आहेत.

            हरित ऊर्जेला चालना देण्यासाठी ६० किलोवॅट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात आला असून, त्यामुळे ग्रामपंचायतीच्या वीज खर्चात दरवर्षी मोठी बचत होत आहे. तसेच विविध वाड्यांमध्ये सौर पथदिवे बसविण्यात आल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेतही वाढ झाली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत रेशीम संचालनालय आणि बाएफ यांच्यात सामंजस्य करार · गडचिरोली जिल्ह्यात टसर विशेष विकास प्रकल्प उभारणार

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत रेशीम संचालनालय आणि

बाएफ यांच्यात सामंजस्य करार

·         गडचिरोली जिल्ह्यात टसर विशेष विकास प्रकल्प उभारणार

 

मुंबई, दि. २१ : गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी शेतकरी कुटुंबांना शाश्वत रोजगार आणि उत्पन्नवाढीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी रेशीम संचालनालय आणि बाएफ (बीएआयएफ) यांच्या संयुक्त विद्यमाने टसर विशेष विकास प्रकल्प राबविण्यात येणार आहे. मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या उपस्थितीत या प्रकल्पाच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

 

यावेळी वस्त्रोद्योग विभागाच्या प्रधान सचिव अन्शु सिन्हा, रेशीम संचालक विनय मून, उपसचिव डॉ. तुषार पवार, सहायक संचालक हेमंत लाडगावकर, बाएफचे अध्यक्ष डॉ. भारत काकडे, प्रादेशिक संचालक डॉ. रविराज जाधव, सुधीर वागळे, मुख्य कार्यक्रम अधिकारी शैलेश भगत तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Featured post

Lakshvedhi