Sunday, 13 September 2026

खाणकाम अधिक सुरक्षित, कार्यक्षम आणि शाश्वत करण्यावर भर

 खाणकाम अधिक सुरक्षित, कार्यक्षम आणि शाश्वत करण्यावर भर

            मायनिंग डिव्हिजन बोर्डचे अध्यक्ष सुरेशचंद्र सुमन यांनी खनिजे ही आधुनिक उद्योग, पायाभूत सुविधा आणि भारताच्या विकासाची पायाभूत गरज असल्याचे सांगितले. एआय, ऑटोमेशन, ड्रोन, सेन्सर्स आणि रिअल-टाइम खाण निरीक्षणामुळे खाणकाम अधिक कार्यक्षम, सुरक्षित आणि शाश्वत करता येईल, असे त्यांनी नमूद केले.

 

            खाण कामगारांची सुरक्षितता कोणत्याही उत्पादनाच्या उद्दिष्टापेक्षा अधिक महत्त्वाची आहे, असे स्पष्ट करत त्यांनी खनिज सुरक्षा ही विकसित भारताची पायाभूत गरज असल्याचे सांगितले.

 

            डब्ल्यूसीएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. हेमंत शरद पांडे यांनी नागपूरला देशाची मायनिंग कॅपिटलम्हणून विकसित करण्याच्या उद्देशातून हे अधिवेशन आयोजित केल्याचे सांगितले. डब्ल्यूसीएलने १२ खाणींमध्ये १८ महत्त्वपूर्ण खनिजे आणि दुर्मीळ मृदा मूलद्रव्ये शोधून काढली असून, कोळशापलीकडे जाऊन महत्त्वपूर्ण खनिजांच्या उत्खनन व शुद्धीकरणाच्या दिशेने कंपनी विविधता आणत असल्याचे त्यांनी सांगितले.

गडचिरोलीसोबतच चंद्रपूर, भंडारा, नागपूर, गोंदिया आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये नव्या औद्योगिक परिसंस्थेचा विकास

 गडचिरोलीसोबतच चंद्रपूर, भंडारा, नागपूर, गोंदिया आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये नव्या औद्योगिक परिसंस्थेचा विकास होऊ शकतो. ग्रीन स्टील, स्वच्छ तंत्रज्ञान आणि सुधारित लॉजिस्टिक कनेक्टिव्हिटीमुळे या भागात मोठ्या प्रमाणावर रोजगार आणि आर्थिक संधी निर्माण होतील, असे फडणवीस म्हणाले.

 

            आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. संदीप शिरखेडकर यांनी प्रास्ताविकात खाण क्षेत्रासमोरील गंभीर आव्हानांवर प्रकाश टाकला. महत्वपूर्ण खनिजे, नवे तंत्रज्ञान आणि खाणी बंद करण्याची प्रक्रिया यांसारख्या विषयांवर व्यापक चर्चा आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. महत्त्वपूर्ण खनिजांच्या उत्खनन व वापरासाठी सक्षम परिसंस्था उभारण्यासोबतच कौशल्य विकास केंद्रे, लवाद सुविधा आणि चाचणी केंद्रांची गरज त्यांनी व्यक्त केली.

 

            देशभरात इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स (इंडिया)च्या माध्यमातून ४ हजारांहून अधिक खाण अभियंत्यांचे नेटवर्क असून, त्यापैकी सुमारे ३०० अभियंते नागपुरातील आहेत. खाण विकासाच्या उपक्रमांमध्ये महाराष्ट्र सरकार आणि वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (डब्ल्यूसीएल) ला संस्थेतर्फे सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. अधिवेशनातील तज्ज्ञांची व्याख्याने, तांत्रिक सादरीकरणे आणि २५ स्टॉल्सच्या प्रदर्शनाची माहितीही त्यांनी दिली.

विदर्भाची मायनिंग व ग्रीन स्टील हब बनण्याच्या दिशेने वाटचाल

 विदर्भाची मायनिंग व ग्रीन स्टील हब बनण्याच्या दिशेने वाटचाल

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

·         पुढील २० वर्षांत खाण क्षेत्र भारतीय अर्थव्यवस्थेत अर्धा ट्रिलियन डॉलरचे योगदान देणार

·         खाण अभियंत्यांच्या ३६व्या राष्ट्रीय अधिवेशनाचे उद्घाटन

 

            नागपूर, ११ : विदर्भामध्ये मायनिंगच्या माध्यमातून भारताच्या आर्थिक विकासाचे प्रमुख इंजिन बनण्याची क्षमता असून, ‘विकसित भारत @२०४७च्या संकल्पनेत विदर्भ महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतो, त्यासोबतच गडचिरोली येथे मायनिंग क्षेत्रात नवीन इको सिस्टिम तयार होत असून क्लीन ग्रीन स्टील रिव्होल्यूशन देशात प्रथमच होत आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

 

द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स (इंडिया) च्या नागपूर लोकल चॅप्‍टरतर्फे हॉटेल रॅडिसन ब्ल्यू येथे आयोजित दोन दिवसीय खाण अभियंत्यांच्या ३६व्या राष्ट्रीय अधिवेशन व मायनिंग फॉर विकसीत भारत @2047’ या विषयावरील राष्ट्रीय परिसंवादाच्‍या उद्घाटन प्रसंगी  मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.

 

            मायनिंग क्षेत्रातील नवीन  संशोधन या विषयावरील प्रदर्शनीचे  उद्घाटन  मुख्यमंत्री यांच्या हस्ते झाले. द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स (इंडिया)चे अध्यक्ष अभियंता मनीष कोठारी अध्यक्षस्थानी होते.

 

            

Children to Smile Again through Chief Minister Devendra Fadnavis’s Initiative Free Comprehensive Treatment for Children with Cleft Lip and Palate

 Children to Smile Again through Chief Minister Devendra Fadnavis’s Initiative

Free Comprehensive Treatment for Children with Cleft Lip and Palate

Three-year MoU signed between National Health Mission Maharashtra, Bajaj Finance and Smile Train India

Mumbai, September 12: With the vision of bringing a smile to every child’s face and making their lives happier, children suffering from congenital cleft lip and palate will now receive quality and comprehensive treatment free of cost under the initiative of Chief Minister Devendra Fadnavis.

At the initiative of Chief Minister Devendra Fadnavis, a Memorandum of Understanding (MoU) has been signed between the National Health Mission Maharashtra, Bajaj Finance and Smile Train India. The agreement will remain in effect for three years.


Saturday, 12 September 2026

मुंबई उपनगर जिल्ह्यात २९ सप्टेंबर रोजी १८ ठिकाणी रोजगार मेळाव्यांचे आयोजन

 मुंबई उपनगर जिल्ह्यात २९ सप्टेंबर रोजी १८ ठिकाणी रोजगार मेळाव्यांचे आयोजन

                                                       :- जिल्हाधिकारी सौरभ कटियार

 

                मुंबई, दि. १२ : मुंबई उपनगर जिल्ह्यात २९ सप्टेंबर २०२६ रोजी १८ ठिकाणी 'पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ-महाराष्ट्र' रोजगार मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत. या रोजगार मेळाव्यांमध्ये जिल्ह्यातील रोजगारइच्छुक युवक-युवती, उद्योजक तसेच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या आस्थापनांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले आहे.

                रोजगार महाकुंभ हा राज्यव्यापी उपक्रम असून युवकांना रोजगार, स्वयंरोजगार, कौशल्य विकास व उद्योजकतेच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत तो राबविण्यात येत आहे.मुंबई उपनगर जिल्ह्यातील युवक-युवतींनी त्यांच्या शैक्षणिक पात्रता, कौशल्य व आवडीनुसार उपलब्ध रोजगाराच्या संधींचा लाभ घ्यावा. तसेच जिल्ह्यातील प्रत्येक उद्योग, कंपनी व आस्थापनेने रिक्त पदांची नोंदणी करून या उपक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा, असे जिल्हाधिकारी कटियार यांनी सांगितले.

                मुंबई उपनगर जिल्ह्यातील प्रस्तावित रोजगार मेळाव्यांची ठिकाणे १. लालजी मेहरोत्रा टेक्निकल इन्स्टिट्यूट, जोगेश्वरी पूर्व, मुंबई  ४०००६०,२. एआयसीएमईयूज् प्रायव्हेट आयटीआय, ट्रॉम्बे, मानखुर्द पूर्व, मुंबई ४०००८८  ३. द चिल्ड्रेन्स एड सोसायटी आयटीआय, मानखुर्द पूर्व, मुंबई  ४०००८८  ४. सॅपिओ ॲनालिटिक्स, वांद्रे पश्चिम, मुंबई ४०००५०, ५. नवजीवन पॉलिटेक्निक, भांडुप पश्चिम, मुंबई  ४०००७८ ६. सोबती फाउंडेशन मुंबई, इंदिरानगर, कांजूरमार्ग पूर्व,  ७. क्वास्टेक, बोरिवली पश्चिम, मुंबई  ४०००९२  ८. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बोरिवली, कांदिवली पश्चिम, मुंबई  ४०००६७  ९. झगडू सिंग चॅरिटेबल ट्रस्टचे ठाकूर स्पेशलाइज्ड डिग्री कॉलेज, कांदिवली पश्चिम, मुंबई  ४०००६७  १०. ॲटलास स्किलटेक युनिव्हर्सिटी, कुर्ला पश्चिम, मुंबई ४०००७०  ११. के. जे. सोमय्या पॉलिटेक्निक, विद्याविहार पूर्व, मुंबई  ४०००७७  १२. श्री नारायण गुरु कॉलेज ऑफ कॉमर्स (स्वायत्त) १३. बीई३ ह्युमन रिसोर्सेस मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड, चेंबूर पश्चिम, मुंबई  ४०००८९  १४. असॉर्ट १ कॉर्प सर्व्हिसेस लिमिटेड, खैरानी रोड, साकीनाका, मुंबई  ४०००७२  १५. द बॉम्बे स्मॉल इंडस्ट्रीज असोसिएशन, अंधेरी पूर्व, मुंबई  ४०००९३  १६. एलए टेक्नॉलॉजीज, जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ, वांद्रे पूर्व, मुंबई  ४०००५१  १७. उषा मित्तल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सांताक्रूझ पश्चिम, मुंबई  ४०००४९  १८. श्रीमती पी. एन. दोशी महिला महाविद्यालय, कामा लेन, घाटकोपर पश्चिम   येथे रोजगार मेळावे आयोजित केले आहेत तरी रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर अथवा जिल्हा कार्यालयामार्फत नोंदणी करावी. मेळाव्याला उपस्थित राहताना शैक्षणिक प्रमाणपत्रे सोबत आणावीत, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई उपनगरचे सहायक आयुक्त शैलेंद्र भगत यांनी केले आहे.

मुंबई शहराच्या विविध छटा’ टिपण्याची छायाचित्रप्रेमींना संधी एमटीडीसीतर्फे छायाचित्रण स्पर्धा; २२ सप्टेंबरपर्यंत प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

 मुंबई शहराच्या विविध छटाटिपण्याची छायाचित्रप्रेमींना संधी

एमटीडीसीतर्फे छायाचित्रण स्पर्धा; २२ सप्टेंबरपर्यंत प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

 

मुंबई, दि. १२ : मुंबईची वैविध्यपूर्ण जीवनशैली, संस्कृती आणि दैनंदिन अनुभव छायाचित्रातून मांडण्याची संधी छायाचित्रप्रेमींना मिळणार आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी), पर्यटन विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई शहर यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई पर्यटनअंतर्गत मुंबई शहराच्या विविध छटाया विषयावर छायाचित्रण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी २२ सप्टेंबर २०२६ पर्यंत प्रवेशिका स्वीकारण्यात येणार आहेत.

            मुंबईतील संस्कृती, उत्सव, वारसा, निसर्ग, व्यक्ती, वास्तुकला आणि दैनंदिन जीवनातील अनुभव छायाचित्रणाच्या माध्यमातून सर्जनशीलपणे सादर करण्यास प्रोत्साहन देणे, हा या स्पर्धेचा उद्देश आहे. मुंबईतील केवळ प्रसिद्ध स्थळांपुरते मर्यादित न राहता शहरातील विविध पैलू, कथा, भावना आणि अनुभव वेगळ्या दृष्टिकोनातून एका छायाचित्रात मांडण्याचे आवाहन स्पर्धकांना करण्यात आले आहे.प्रत्येक स्पर्धकाला विषयाशी संबंधित एक मूळ छायाचित्र सादर करता येईल. छायाचित्र उच्च-रिझोल्यूशन   जेपीईजी व जेपीजी स्वरूपात आणि कमाल १० एमबी आकाराचे असावे. किरकोळ स्वरूपातील संपादनास परवानगी असेल; मात्र कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे तयार केलेली छायाचित्रे स्वीकारली जाणार नाहीत. छायाचित्रावर कोणताही मजकूर, बॉर्डर, लोगो किंवा वॉटरमार्क नसावा.

स्पर्धकांनी छायाचित्रासोबत ते स्पर्धेच्या विषयाशी कसे संबंधित आहे, याचे थोडक्यात वर्णन द्यावे. प्रवेशिका सहभागीचे नाव आणि संपर्क तपशीलांसह mumbaitourism@maharashtratourism.gov.in या ई-मेलवर पाठवाव्यात.प्राप्त प्रवेशिकांची स्पर्धेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार प्राथमिक छाननी करण्यात येईल. त्यानंतर पात्र छायाचित्रांचे एमटीडीसीने नियुक्त केलेल्या परीक्षकांमार्फत मूल्यमापन केले जाईल. विषयाशी संबंधितता, नावीन्य, रचना, तांत्रिक गुणवत्ता आणि एकूण प्रभाव आदी निकषांचा मूल्यमापनात विचार केला जाईल. छायाचित्रातून मुंबईची कथा, भावना अथवा वेगळा दृष्टिकोन प्रभावीपणे सादर करण्याला विशेष महत्त्व दिले जाईल.

स्पर्धेतील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना पारितोषिक व प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल. तसेच पात्र प्रवेशिकांसाठी सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. विजेत्यांचा एमटीडीसीतर्फे अधिकृत समारंभात गौरव करण्यात येईल.स्पर्धेसाठी सादर करण्यात आलेल्या छायाचित्रांचे कॉपीराइट हक्क एमटीडीसीकडे राहतील. या छायाचित्रांचा मुंबई पर्यटनाचा प्रचार, प्रकाशने आणि अन्य संबंधित प्रयोजनांसाठी वापर केला जाऊ शकतो. अशा वापराच्या वेळी लागू असल्यास संबंधित छायाचित्राच्या कॉपीराइट धारकाला योग्य श्रेय देण्यात येईल.

एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक नीलेश आर. गटणे म्हणाले की, मुंबई हे असंख्य कथा आणि अनुभवांनी समृद्ध असे शहर आहे. प्रत्येक अनुभव मुंबईच्या वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्त्वाची वेगळी झलक दाखवतो. या स्पर्धेच्या माध्यमातून छायाचित्रप्रेमींनी आपल्या सर्जनशील नजरेतून हे क्षण टिपावेत आणि मुंबईची विविध रूपे जगासमोर आणावीत, असे आमचे आवाहन आहे.अधिक माहितीसाठी 94257-17529 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की पहल से बच्चों के चेहरों पर खिलेगी मुस्कान दुभंगले हुए होंठ और तालू वाले बच्चों को मिलेंगे निःशुल्क समग्र उपचार राष्ट्रीय स्वास्थ्य अभियान महाराष्ट्र, बजाज फाइनेंस और ‘स्माइल ट्रेन इंडिया’ के बीच तीन वर्ष का समझौता ज्ञापन

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की पहल से बच्चों के चेहरों पर खिलेगी मुस्कान

दुभंगले हुए होंठ और तालू वाले बच्चों को मिलेंगे निःशुल्क समग्र उपचार

राष्ट्रीय स्वास्थ्य अभियान महाराष्ट्र, बजाज फाइनेंस और स्माइल ट्रेन इंडियाके बीच तीन वर्ष का समझौता ज्ञापन

मुंबई, दिनांक 12 : प्रत्येक बच्चे के चेहरे पर मुस्कान खिले और उसका जीवन आनंदमय बने, इस उद्देश्य से मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की संकल्पना के तहत दुभंगले हुए होंठ और तालू (Cleft Lip and Palate) जैसे जन्मजात विकार से पीड़ित बच्चों को अब गुणवत्तापूर्ण और समग्र उपचार निःशुल्क उपलब्ध कराया जाएगा।

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की पहल पर राष्ट्रीय स्वास्थ्य अभियान महाराष्ट्र, बजाज फाइनेंस और स्माइल ट्रेन इंडियाके बीच इस संबंध में समझौता ज्ञापन किया गया है। यह समझौता तीन वर्षों के लिए प्रभावी रहेगा।

जन्मजात रूप से दुभंगले हुए होंठ और तालू के कारण कई मासूम बच्चों के चेहरे की मुस्कान फीकी पड़ जाती है। अपने बच्चे के चेहरे पर एक बार फिर मुस्कान देखने के लिए माता-पिता की चिंता और उपचार के लिए अस्पतालों के चक्कर लगाने की स्थिति बेहद पीड़ादायक होती है। इसके अलावा, इस विकार के उपचार का खर्च अधिक होने के कारण यह प्रत्येक अभिभावक के लिए वहन करना संभव नहीं होता। इस स्थिति को समझते हुए मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने दूरदर्शी दृष्टिकोण अपनाते हुए ऐसे अभिभावकों को बड़ी राहत प्रदान की है। राज्य का कोई भी बच्चा दुभंगले हुए होंठ और तालू के साथ उपचार से वंचित न रहे, यह सुनिश्चित करने के लिए इस पहल के माध्यम से प्रयास किए जाएंगे।

इस समझौता ज्ञापन के तहत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK) के अंतर्गत जांच के दौरान पाए गए बच्चों को जिला नोडल अधिकारियों के औपचारिक रेफरल पत्र के माध्यम से स्माइल ट्रेन इंडियाके मान्यता प्राप्त अस्पतालों में उपचार के लिए भेजा जाएगा। संबंधित जिलों को निर्धारित भागीदार अस्पतालों से जोड़ने के लिए दोनों संस्थाएं समन्वय के साथ कार्य करेंगी।

दुभंगले हुए होंठ और तालू के उपचार के संबंध में अधिक जानकारी के लिए 18001038301 हेल्पलाइन नंबर पर संपर्क करने की अपील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने की है।

इस पहल के अंतर्गत बच्चों को सर्जरी, अस्पताल में भर्ती एवं ठहरने, दवाइयां, पोषण संबंधी सेवाएं, दंत चिकित्सा, वाक् चिकित्सा तथा आवश्यकता के अनुसार यात्रा की सुविधा निःशुल्क उपलब्ध कराई जाएगी। मरीजों के भोजन, आवास और यात्रा का खर्च भी स्माइल ट्रेन इंडियाद्वारा वहन किया जाएगा। सर्जरी से पहले की जांच तथा उपचार से संबंधित सर्जरी के बाद होने वाली जटिलताओं का खर्च भी संस्था द्वारा वहन किया जाएगा।

बच्चों की पहचान और उपचार की आवश्यकता सुनिश्चित करने के लिए स्माइल ट्रेनके भागीदार अस्पतालों, RBSK टीमों और जिला प्रारंभिक हस्तक्षेप केंद्रों (DEIC) के समन्वय से जांच शिविर आयोजित किए जाएंगे। दुभंगले हुए होंठ और तालू वाले बच्चों की पहचान करने के संबंध में सरकारी स्वास्थ्य कर्मचारियों को आवश्यक प्रशिक्षण और मार्गदर्शन भी प्रदान किया जाएगा।

उपचार के लिए मरीजों को रेफर करने, उनका रिकॉर्ड रखने तथा जिला नोडल अधिकारियों के साथ समन्वय के लिए प्रत्येक मान्यता प्राप्त अस्पताल का परियोजना निदेशक नोडल अधिकारी के रूप में कार्य करेगा। संबंधित जिले के जिला सर्जन सर्जरी से पहले अस्पताल में ऑपरेशन थिएटर की सुविधाओं और एनेस्थीसिया विशेषज्ञों की उपलब्धता सुनिश्चित करेंगे।

राज्य के इन 15 अस्पतालों में होंगे उपचार

इस समझौते के तहत राज्य के 15 मान्यता प्राप्त अस्पतालों में इस विकार के उपचार की सुविधा उपलब्ध कराई जाएगी-

  1. आचार्य विनोबा भावे ग्रामीण अस्पताल, वर्धा
  2. आनंदऋषिजी हॉस्पिटल एंड मेडिकल रिसर्च सेंटर, अहिल्यानगर
  3. आस्था प्लास्टिक सर्जरी हॉस्पिटल, जलगांव
  4. बेंबडे हॉस्पिटल, छत्रपति संभाजीनगर
  5. एलीट कॉस्मो क्लिनिक एंड प्लास्टिक सर्जरी हॉस्पिटल, सोलापुर
  6. लहाने हॉस्पिटल, लातूर
  7. मीरा एनएक्स हॉस्पिटल, मुंबई
  8. एमआरआर चिल्ड्रन्स हॉस्पिटल, ठाणे
  9. पूना हॉस्पिटल, पुणे
  10. सहयोग हॉस्पिटल, गोंदिया
  11. श्रीराम हॉस्पिटल, अकोला
  12. शुश्रूषा सिटिजन्स को-ऑपरेटिव्ह हॉस्पिटल, मुंबई
  13. स्वामी विवेकानंद मेडिकल मिशन हॉस्पिटल, नागपुर
  14. वेदांत हॉस्पिटल प्रा. लि., नाशिक
  15. वेस्टर्न इंडिया इंस्टीट्यूट ऑफ न्यूरोसाइंसेस (WINS), कोल्हापुर।

कार्यक्रम की प्रगति की नियमित समीक्षा के लिए दोनों संस्थाओं के प्रतिनिधियों की एक संयुक्त समिति गठित की जाएगी। साथ ही, स्वास्थ्य सेवा आयुक्त तथा राष्ट्रीय स्वास्थ्य अभियान के निदेशक के माध्यम से इस परियोजना का नियमित तृतीय-पक्ष मूल्यांकन किया जाएगा।

Featured post

Lakshvedhi