Tuesday, 15 September 2026

गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांचीच

 गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांचीच

-         मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  • १० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांच्या हातांनी साकारले बाप्पा
  • पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मितीचा महाराष्ट्राचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी स्वतः मूर्ती घडवून दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश

 

ठाणे, दि.१० : गणेशमूर्तीच्या भव्यतेपेक्षा भक्ती आणि पर्यावरण संवर्धनाला अधिक महत्व असून, गणेशोत्सवासारखा सांस्कृतिक वारसा जपणारा सण पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करणे, ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

            वाशी येथील सिडको एक्झिबिशन अँड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आयोजित पर्यावरणपूरक महा गणेश मूर्ती कार्यशाळा २०२६मध्ये ते बोलत होते. या भव्य कार्यशाळेत एकाच वेळी तब्बल १० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी शाडूच्या मातीपासून पर्यावरणपूरक गणेशमूर्तींची निर्मिती करून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये महाराष्ट्राच्या नावावर नवा जागतिक विक्रम नोंदवला.

             या ऐतिहासिक सोहळ्याला पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे, वनमंत्री गणेश नाईक, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम, आमदार मंदा म्हात्रे, आमदार रवींद्र फाटक, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या सचिव जयश्री भोज, नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त कैलास शिंदे, ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ आणि कला संचालनालयाचे संचालक डॉ. नितीन इंगळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

             मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की, गणराया ही बुद्धीची देवता असून आपल्या संस्कृतीत पर्यावरणाला अनन्यसाधारण महत्व आहे. सृष्टीची निर्मिती करणाऱ्या पंचमहाभूतांचे रक्षण झाले तरच मानवी जीवन सुरक्षित राहू शकते.

            मोठ्या गणेशमूर्ती, प्लास्टर ऑफ पॅरिस आणि कृत्रिम रंगांमुळे जलस्रोतांचे होणारे नुकसान टाळण्याचे आवाहन करताना ते म्हणाले की, मूर्ती लहान असो वा मोठी, भक्ती सारखीच असते. ईश्वराचा आशीर्वाद हा मूर्तीच्या आकारावर नव्हे, तर आपण पर्यावरण आणि समाजाची किती निस्वार्थ सेवा करतो यावर ठरतो.

             गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या परीक्षकांनी निकाल जाहीर करताच मुख्यमंत्र्यांनी या यशाचे खरे शिलेदार सहभागी विद्यार्थी असल्याचे सांगत त्यांचे कौतुक केले. तसेच पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, पर्यावरण विभाग, जे. जे. स्कूल ऑफ आर्ट आणि कला संचालनालयाच्या प्रयत्नांची विशेष प्रशंसा केली.

पायाभूत सुविधांमध्ये महाराष्ट्र देशात अव्वल

 पायाभूत सुविधांमध्ये महाराष्ट्र देशात अव्वल

अटल सेतू, समृद्धी महामार्ग, मुंबई-पुणे मिसिंग लिंक टनेल आणि ७६ हजार कोटी रुपयांच्या वाढवण बंदराचा उल्लेख करत, महाराष्ट्र हे देशाचे 'ग्रोथ इंजिन' 'पावर हाऊस' बनले असून राज्य १.५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या दिशेने वेगाने वाटचाल करत असल्याचे त्यांनी नमूद केले.

 

समृद्धी महामार्गाचा अनुभव सांगताना त्यांनी विकास प्रकल्पांसाठी सरकार आणि जनतेमधील विश्वास किती महत्त्वाचा आहे, यावर भर दिला. समृद्धी महामार्गासाठी जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना मोबदला देताना आपल्या उपस्थितीत करार करण्यात आले आणि त्यानंतर काही तासांतच आरटीजीएसद्वारे त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले, असा अनुभव त्यांनी सांगितला. या विश्वासामुळे जमीन संपादनाची प्रक्रिया विक्रमी वेळेत पूर्ण होण्यास मदत झाली, असे ते म्हणाले.

शिवनेरीच्या बफर झोनमधील अनधिकृत बांधकामांवर सात दिवसांत कार्यवाही करा

 शिवनेरीच्या बफर झोनमधील अनधिकृत बांधकामांवर सात दिवसांत कार्यवाही करा

- सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार

 

  • नेत्रमॲपच्या माध्यमातून संरचनांच्या कालावधीची तपासणी करण्याचे निर्देश

 

मुंबई, दि. ८ : छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी असलेल्या शिवनेरी किल्ल्याचे ऐतिहासिक व जागतिक वारसा मूल्य लक्षात घेता किल्ला परिसरातील अनधिकृत बांधकामे, अन्य संरचनांबाबत तातडीने वस्तुनिष्ठ तपासणी करून कार्यवाही करण्याचे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिले.

 

शिवनेरी किल्ला व परिसरातील स्थितीबाबत सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. शेलार यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाचे (एएसआय) अधिकारी, पुरातत्त्व विभाग, तहसीलदार तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी यांची आढावा बैठक झाली.

 

शिवनेरी किल्ला हा जागतिक वारशाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असून, संबंधित वारसा वास्तूच्या संरक्षित व बफर झोनमध्ये कोणत्याही प्रकारचे अनधिकृत बांधकाम अथवा संरचना उभारली जाणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. शेलार यांनी दिले.

 

किल्ला परिसरातील संरचना नेमक्या कोणत्या कालखंडात निर्माण झाल्या, त्याबाबत महसूल अभिलेख, उपलब्ध ऐतिहासिक दस्तऐवज तसेच आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने वस्तुनिष्ठ अहवाल तयार करण्याचे निर्देश संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. या संरचना पूर्वीपासून अस्तित्वात होत्या की अलीकडच्या काळात निर्माण करण्यात आल्या, याची निश्चित पडताळणी करण्याचे निर्देश मंत्री शेलार यांनी दिले.

केंद्र सरकारने निश्चित केलेले ‘टीबी मुक्त भारत’ हे उद्दिष्ट

 केंद्र सरकारने निश्चित केलेले टीबी मुक्त भारतहे उद्दिष्ट केवळ सरकारचे अभियान नसून संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपली भूमिका बजावणे आवश्यक आहे. विशेषतः तरुणांनी आपल्या कुटुंबात, मित्रपरिवारात आणि समाजामध्ये टीबीविषयी अचूक माहिती पोहोचवावी, असे आवाहन राज्यपालांनी केले.

 

तरुणांनी टीबीमुक्तीच्या यशोगाथांवर आधारित लघुपट, पोस्टर्स, पॉडकास्ट आणि सोशल मीडिया मोहिमा तयार करून जनजागृतीला नवे माध्यम द्यावे, असेही राज्यपालांनी सुचविले. आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, स्वयंसेवी संस्था आणि सामाजिक संघटना हे या अभियानातील परिवर्तनाचे महत्वाचे दूत आहेत, असे त्यांनी नमूद केले.

मार्गदर्शक, गणेश महोत्सव साजरा करावयाचा


 

सामुदायिक पदयात्रा केवळ प्रतीकात्मक कार्यक्रम नसून

 टीबीबाबत समाजात आजही अनेक गैरसमज आणि अनावश्यक भीती आहे. सामाजिक कलंकाच्या भीतीमुळे अनेक जण वेळेवर तपासणी करून घेत नाहीत किंवा उपचार मध्येच थांबवतात. यामुळे रुग्णाचे आरोग्य धोक्यात येण्याबरोबरच संसर्ग इतर व्यक्तींपर्यंत पसरण्याची शक्यता वाढते. त्यामुळे टीबीच्या रुग्णांशी भेदभाव न करता त्यांना सहानुभूती, सहकार्य आणि सन्मानाची वागणूक देणे आवश्यक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

 

मुंबईच्या मोठ्या लोकसंख्येचा विचार करता झोपडपट्टी आणि दाट लोकवस्तीच्या भागांमध्ये विशेष जनजागृती करणे आवश्यक आहे. वेळेवर मिळणारी योग्य माहिती, निदान आणि उपचार हे टीबीचा प्रसार रोखण्याचे सर्वात प्रभावी साधन आहे, असे राज्यपालांनी सांगितले.

 

ही सामुदायिक पदयात्रा केवळ प्रतीकात्मक कार्यक्रम नसून   समाजामध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करणारे प्रभावी माध्यम आहे. नागरिक स्वतः पुढाकार घेऊन जनजागृतीमध्ये सहभागी झाले, तर त्याचे रूपांतर व्यापक लोकचळवळीत होऊ शकते. या पदयात्रेच्या माध्यमातून हजारो कुटुंबांपर्यंत टीबीला घाबरू नका, वेळेवर तपासणी करा आणि पूर्ण उपचार घ्याहा संदेश पोहोचेल, असा विश्वास राज्यपालांनी व्यक्त केला.

टीबीमुक्त मुंबईसाठी जनजागृतीला गती देण्याचे राज्यपालांचे आवाहन

 टीबीमुक्त मुंबईसाठी जनजागृतीला गती देण्याचे राज्यपालांचे आवाहन

 

मुंबई, दि. ११ : मुंबई महानगर आणि परिसराची लोकसंख्या सुमारे दोन कोटी असून लोकसंख्येची घनता मोठी असल्याने सार्वजनिक ठिकाणे आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण आहे. अशा परिस्थितीत क्षयरोगासारख्या संसर्गजन्य आजाराचा प्रसार रोखण्यासाठी व्यापक जनजागृती, वेळेवर निदान आणि पूर्ण उपचार अत्यंत महत्वाचे आहेत, असे प्रतिपादन राज्यपाल तथा कुलपती जिष्णु देव वर्मा यांनी केले.

 

राज्यपाल देव वर्मा यांच्या पुढाकाराने तसेच विविध संस्थांच्या माध्यमातून टीबी मुक्त मुंबई अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत राज्यपालांच्या उपस्थितीत अन्सारी नगर कुर्ला येथील अण्णा लीला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या जनजागृती फेरीचे आयोजन करण्यात आले, त्यावेळी राज्यपाल बोलत होते. महाविद्यालयाच्या १२०० विद्यार्थ्यांनी या जनजागृती फेरी सहभाग घेतला.

राज्यपालांच्या हस्ते टीबी मुक्त भारत या पोर्टलचे उद्घाटन करण्यात आले तसेच विद्यार्थ्यांना क्षयरोग जनजागृतीची प्रतिज्ञा देण्यात आली.

टीबी मुक्त मुंबई अभियान जनजागृती फेरीला मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर रवींद्र कुलकर्णी, प्र-कुलगुरू प्रा. अजय भामरे, बंट संघ शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष विश्वनाथ शेट्टी, मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर प्रसाद कारंडे, अण्णा लीला महाविद्यालयाचे प्राचार्य हिरेन दंड तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

टीबी हा केवळ आरोग्याचा प्रश्न नसून सामाजिक आणि आर्थिक आव्हानदेखील आहे. आजच्या प्रगत वैद्यकीय विज्ञानामुळे टीबी पूर्णपणे बरा होऊ शकतो. आजाराचे वेळेवर निदान होऊन रुग्णाने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नियमितपणे आणि पूर्ण उपचार घेतल्यास तो पूर्णपणे निरोगी होऊ शकतो, असे राज्यपालांनी सांगितले.

 

टीबीबाबत समाजात आजही अनेक गैरसमज आणि अनावश्यक भीती आहे. सामाजिक कलंकाच्या भीतीमुळे अनेक जण वेळेवर तपासणी करून घेत नाहीत किंवा उपचार मध्येच थांबवतात. यामुळे रुग्णाचे आरोग्य धोक्यात येण्याबरोबरच संसर्ग इतर व्यक्तींपर्यंत पसरण्याची शक्यता वाढते. त्यामुळे टीबीच्या रुग्णांशी भेदभाव न करता त्यांना सहानुभूती, सहकार्य आणि सन्मानाची वागणूक देणे आवश्यक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

 


Featured post

Lakshvedhi