Saturday, 12 September 2026

गोंडवाना विद्यापीठाच्या भविष्यातील गरजा ओळखूनच आराखडा तयार करा

 गोंडवाना विद्यापीठाच्या भविष्यातील गरजा ओळखूनच आराखडा तयार करा

 -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

            नागपूर दि. ११ : गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाच्या नवीन परिसराची रचना करताना अत्याधुनिक शैक्षणिक सुविधा तसेच विद्यापीठाच्या भविष्यातील गरजा ओळखून त्यानुसार गोंडवास्तू कला व आधुनिक शैलीचा संगम असलेला परिसर विकसित करण्याला प्राधान्य द्या, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

गडचिरोली येथे गोंडवाना विद्यापीठासाठी १८६ एकर जागेत शैक्षणिक संकुल तसेच प्रशासकीय इमारत व विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह तयार करण्याच्या आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले, त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.

यावेळी वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, गोंडवाना विद्यापीठाचे प्र.कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता संभाजी माने, अधीक्षक अभियंता सोनाली चव्हाण वास्तुविशारद जगन्नाथ तावडेकर, विद्यापीठ अभियंता जितेंद्र अंबागडे, उमेश राठोड आदी यावेळी उपस्थित होते.

            गडचिरोली परिसरात औद्योगिक विकासाला पोषक वातावरण निर्माण होत असतानाच विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक व संशोधन उपक्रमांनाही प्रोत्साहन मिळणार आहे, यादृष्टीने राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा निर्माण होणे आवश्यक आहे.  विद्यापीठाची इमारत गोंड वास्तुकलेचा वारसा जपतानाच आधुनिक शैलीचा संगम असावा, देशातील व राज्यातील उत्कृष्ट शैक्षणिक परिसर असलेल्या इमारतींच्या अभ्यास करून त्यादृष्टीने सर्वोत्कृष्ट परिसर विकसित करावा, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

            गोंडवाना विद्यापीठ १८६ एकर जागेत विकसित करण्यात येत असून यासाठी २७ लाख चौ. फू. जागेची उपलब्धता झाली आहे, हा संपूर्ण परिसर शैक्षणिक व संशोधनाच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. या परिसरात विविध शैक्षणिक उपक्रमांसाठी अत्याधुनिक सुविधा निर्माण करताना पर्यावरणाच्या दृष्टीने हा परिसर समृद्ध असावा. या परिसराच्या विकासासाठी १ हजार १०० कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यापैकी केंद्र व राज्य शासनातर्फे १५७ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे.

            यावेळी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी विद्यापीठाची इमारत बांधताना या परिसरातील निसर्गाशी एकरूप असणारी व अत्याधुनिक सुविधा असलेले इमारत असावी अशी सूचना केली.

            सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता संभाजी माने यांनी विद्यापीठ परिसरात संकुल विकसित करताना येथील विद्यार्थ्यांसाठी सुविधा शैक्षणिक उपक्रम संशोधन आदींचा समावेश असलेली सुंदर इमारत बांधण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले. विद्यापीठाचा परिसर विकसित करताना वास्तू शैली चा अभ्यास करूनच त्याप्रमाणे मुख्य इमारतीचे बांधकाम करण्यात येणार आहे. 

या परिसरात पर्यावरणपूरक हरित इमारत, ऊर्जा बचतीसह विविध सत्तावीस शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी आवश्यक असणाऱ्या इमारतींमध्ये कृत्रिम पानवठे, सहा कोटी लिटर पाण्याची साठवण क्षमता मना औषधी उद्यान व विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यात प्राधान्य असल्याचे यावेळी सांगण्यात आले.


दुभंगलेले ओठ व टाळू असलेल्या बालकांना मिळणार मोफत सर्वसमावेशक उपचार · राष्ट्रीय आरोग्य अभियान

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून बालकांच्या चेहऱ्यावर फुलणार हसू

·         दुभंगलेले ओठ व टाळू असलेल्या बालकांना मिळणार मोफत सर्वसमावेशक उपचार

·         राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र, बजाज फायनांस आणि स्माईल ट्रेन इंडियायांच्यात तीन वर्षांचा सामंजस्य करार

            मुंबई, दि. ११ : प्रत्येक बालकाच्या चेहऱ्यावर हसू फुलावे आणि त्याचे जीवन आनंददायी व्हावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस यांच्या संकल्पनेतून दुभंगलेले ओठ व टाळू या जन्मजात विकाराने ग्रस्त बालकांना आता दर्जेदार व सर्वसमावेशक उपचार मोफत उपलब्ध होणार आहेत. 

            मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने  राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र, बजाज फायनान्स आणि स्माईल ट्रेन इंडियायांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. हा  करार तीन वर्षांसाठी लागू राहणार आहे.

            जन्मजात दुभंगलेले ओठ व टाळू यामुळे  निरागस बालकांच्या चेह-यावरील हसू मावळून जाते. आपल्या मुलाच्या चेह-यावर एकदा तरी तरी हसू बघावे यासाठी बालकांच्या आई-वडिलांची होणारी तगमग आणि त्यासाठी त्यांचे रुग्णालयाचे उंबरठे झिजवणे डोळ्यात पाणी आणते . शिवाय त्याचा उपचार खर्च मोठा असल्याने तो प्रत्येकच पालकाला परवडणारा नाही.  याची जाणिव असणा-या मुख्यमंत्र्यांनी दूरदृष्टीने  विचार करून अशा पालकांना मोठा दिलासा दिला आहे. आता राज्यातील एकही बालक दुभंगलेले ओठ व टाळू असलेले राहणार नाही याची काळजी राज्याचा पालक या नात्याने मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे.

            या सामंजस्य कराराद्वारे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत (आरबीएसके) तपासणीमध्ये आढळलेल्या अशा बालकांना जिल्हा नोडल अधिकाऱ्यांच्या औपचारिक संदर्भपत्राद्वारे स्माईल ट्रेन इंडियाच्या मान्यताप्राप्त रुग्णालयांमध्ये उपचारासाठी पाठविण्यात येईल. संबंधित जिल्ह्यांना विशिष्ट भागीदार रुग्णालयांशी जोडण्यासाठी दोन्ही संस्था समन्वयाने काम करणार आहेत.

            दुभंगलेले ओठ व टाळू यांच्या उपचारांविषयी अधिक माहितीसाठी १८००१०३८३०१ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

            या उपक्रमांतर्गत बालकांना शस्त्रक्रिया, रुग्णालयातील वास्तव्य, औषधे, पोषणविषयक सेवा, दंतव्यंगोपचार, वाचा उपचार तसेच गरजेनुसार प्रवासाची सुविधा मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहे. रुग्णांचे भोजन, निवास आणि प्रवासावरील खर्चही स्माईल ट्रेन इंडियाकडून करण्यात येईल. शस्त्रक्रियापूर्व तपासण्या आणि उपचारांशी संबंधित शस्त्रक्रियेनंतरच्या गुंतागुंतीवरील खर्चाची जबाबदारीही संस्थेकडे राहणार आहे.

            बालकांची ओळख व उपचाराची आवश्यकता निश्चित करण्यासाठी स्माईल ट्रेनची भागीदार रुग्णालये, आरबीएसके पथके आणि जिल्हा प्रारंभिक हस्तक्षेप केंद्रांच्या (डीईआयसी) समन्वयाने तपासणी शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. दुभंगलेले ओठ व टाळू असलेल्या बालकांची ओळख पटविण्यासंदर्भात शासकीय आरोग्य कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रशिक्षण व मार्गदर्शनही दिले जाईल.

            उपचारासाठी रुग्ण पाठविणे, त्यांच्या नोंदी ठेवणे आणि जिल्हा नोडल अधिकाऱ्यांशी समन्वय साधण्यासाठी प्रत्येक मान्यताप्राप्त रुग्णालयाचा प्रकल्प संचालक नोडल अधिकारी म्हणून काम करणार आहे. संबंधित जिल्ह्याचे जिल्हा शल्यचिकित्सक शस्त्रक्रियेपूर्वी रुग्णालयातील शस्त्रक्रियागृहाच्या सुविधा आणि भूलतज्ज्ञांची उपलब्धता यांची खातरजमा करतील.

 

राज्यातील या १५ रुग्णालयांमध्ये होणार उपचार

या करारांतर्गत राज्यातील १५ मान्यताप्राप्त रुग्णालयांत या व्याधीवर  उपचार उपलब्ध होतील :

१. आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, वर्धा

२. आनंदऋषीजी हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटर, अहिल्यानगर

३. आस्था प्लास्टिक सर्जरी हॉस्पिटल, जळगाव

४. बेंबडे हॉस्पिटल, छत्रपती संभाजीनगर

५. एलिट कॉस्मो क्लिनिक अँड प्लास्टिक सर्जरी हॉस्पिटल, सोलापूर

६. लहाने हॉस्पिटल, लातूर

७. मीरा एनएक्स हॉस्पिटल, मुंबई

८. एमआरआर चिल्ड्रन्स हॉस्पिटल, ठाणे

९. पूना हॉस्पिटल, पुणे

१०. सहयोग हॉस्पिटल, गोंदिया

११. श्रीराम हॉस्पिटल, अकोला

१२. शुश्रूषा सिटिझन्स को-ऑपरेटिव्ह हॉस्पिटल, मुंबई

१३. स्वामी विवेकानंद मेडिकल मिशन हॉस्पिटल, नागपूर

१४. वेदांत हॉस्पिटल प्रा. लि., नाशिक

१५. वेस्टर्न इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोसायन्सेस (विन्स), कोल्हापूर.

           

 

            कार्यक्रमाच्या प्रगतीचा नियमित आढावा घेण्यासाठी दोन्ही संस्थांच्या प्रतिनिधींची संयुक्त समिती स्थापन करण्यात येणार आहे. तसेच आरोग्य सेवा आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक यांच्यामार्फत या प्रकल्पाचे नियमित त्रयस्थ मूल्यमापन करण्यात येईल.

दुभंगलेले ओठ व टाळू असलेल्या बालकांना मिळणार मोफत सर्वसमावेशक उपचार

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून बालकांच्या चेहऱ्यावर फुलणार हसू


· दुभंगलेले ओठ व टाळू असलेल्या बालकांना मिळणार मोफत सर्वसमावेशक उपचार


· राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र, बजाज फायनांस आणि ‘स्माईल ट्रेन इंडिया’ यांच्यात तीन वर्षांचा सामंजस्य करार


            मुंबई, दि. ११ : प्रत्येक बालकाच्या चेहऱ्यावर हसू फुलावे आणि त्याचे जीवन आनंददायी व्हावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून दुभंगलेले ओठ व टाळू या जन्मजात विकाराने ग्रस्त बालकांना आता दर्जेदार व सर्वसमावेशक उपचार मोफत उपलब्ध होणार आहेत. 


            मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र, बजाज फायनान्स आणि ‘स्माईल ट्रेन इंडिया’ यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. हा करार तीन वर्षांसाठी लागू राहणार आहे.


            जन्मजात दुभंगलेले ओठ व टाळू यामुळे निरागस बालकांच्या चेह-यावरील हसू मावळून जाते. आपल्या मुलाच्या चेह-यावर एकदा तरी तरी हसू बघावे यासाठी बालकांच्या आई-वडिलांची होणारी तगमग आणि त्यासाठी त्यांचे रुग्णालयाचे उंबरठे झिजवणे डोळ्यात पाणी आणते . शिवाय त्याचा उपचार खर्च मोठा असल्याने तो प्रत्येकच पालकाला परवडणारा नाही. याची जाणिव असणा-या मुख्यमंत्र्यांनी दूरदृष्टीने विचार करून अशा पालकांना मोठा दिलासा दिला आहे. आता राज्यातील एकही बालक दुभंगलेले ओठ व टाळू असलेले राहणार नाही याची काळजी राज्याचा पालक या नात्याने मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे.


            या सामंजस्य कराराद्वारे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत (आरबीएसके) तपासणीमध्ये आढळलेल्या अशा बालकांना जिल्हा नोडल अधिकाऱ्यांच्या औपचारिक संदर्भपत्राद्वारे ‘स्माईल ट्रेन इंडिया’च्या मान्यताप्राप्त रुग्णालयांमध्ये उपचारासाठी पाठविण्यात येईल. संबंधित जिल्ह्यांना विशिष्ट भागीदार रुग्णालयांशी जोडण्यासाठी दोन्ही संस्था समन्वयाने काम करणार आहेत.


            दुभंगलेले ओठ व टाळू यांच्या उपचारांविषयी अधिक माहितीसाठी १८००१०३८३०१ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.


            या उपक्रमांतर्गत बालकांना शस्त्रक्रिया, रुग्णालयातील वास्तव्य, औषधे, पोषणविषयक सेवा, दंतव्यंगोपचार, वाचा उपचार तसेच गरजेनुसार प्रवासाची सुविधा मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहे. रुग्णांचे भोजन, निवास आणि प्रवासावरील खर्चही ‘स्माईल ट्रेन इंडिया’कडून करण्यात येईल. शस्त्रक्रियापूर्व तपासण्या आणि उपचारांशी संबंधित शस्त्रक्रियेनंतरच्या गुंतागुंतीवरील खर्चाची जबाबदारीही संस्थेकडे राहणार आहे.


            बालकांची ओळख व उपचाराची आवश्यकता निश्चित करण्यासाठी स्माईल ट्रेनची भागीदार रुग्णालये, आरबीएसके पथके आणि जिल्हा प्रारंभिक हस्तक्षेप केंद्रांच्या (डीईआयसी) समन्वयाने तपासणी शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. दुभंगलेले ओठ व टाळू असलेल्या बालकांची ओळख पटविण्यासंदर्भात शासकीय आरोग्य कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रशिक्षण व मार्गदर्शनही दिले जाईल.

            उपचारासाठी रुग्ण पाठविणे, त्यांच्या नोंदी ठेवणे आणि जिल्हा नोडल अधिकाऱ्यांशी समन्वय साधण्यासाठी प्रत्येक मान्यताप्राप्त रुग्णालयाचा प्रकल्प संचालक नोडल अधिकारी म्हणून काम करणार आहे. संबंधित जिल्ह्याचे जिल्हा शल्यचिकित्सक शस्त्रक्रियेपूर्वी रुग्णालयातील शस्त्रक्रियागृहाच्या सुविधा आणि भूलतज्ज्ञांची उपलब्धता यांची खातरजमा करतील.रुग्णालयांत या व्याधीवर  उपचार उपलब्ध होतील :

१. आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, वर्धा

२. आनंदऋषीजी हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटर, अहिल्यानगर

३. आस्था प्लास्टिक सर्जरी हॉस्पिटल, जळगाव

४. बेंबडे हॉस्पिटल, छत्रपती संभाजीनगर

५. एलिट कॉस्मो क्लिनिक अँड प्लास्टिक सर्जरी हॉस्पिटल, सोलापूर

६. लहाने हॉस्पिटल, लातूर

७. मीरा एनएक्स हॉस्पिटल, मुंबई

८. एमआरआर चिल्ड्रन्स हॉस्पिटल, ठाणे

९. पूना हॉस्पिटल, पुणे

१०. सहयोग हॉस्पिटल, गोंदिया

११. श्रीराम हॉस्पिटल, अकोला

१२. शुश्रूषा सिटिझन्स को-ऑपरेटिव्ह हॉस्पिटल, मुंबई

१३. स्वामी विवेकानंद मेडिकल मिशन हॉस्पिटल, नागपूर

१४. वेदांत हॉस्पिटल प्रा. लि., नाशिक

१५. वेस्टर्न इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोसायन्सेस (विन्स), कोल्हापूर.

           

 

            कार्यक्रमाच्या प्रगतीचा नियमित आढावा घेण्यासाठी दोन्ही संस्थांच्या प्रतिनिधींची संयुक्त समिती स्थापन करण्यात येणार आहे. तसेच आरोग्य सेवा आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक यांच्यामार्फत या प्रकल्पाचे नियमित त्रयस्थ मूल्यमापन करण्यात येईल.

राज्यपालांच्या उपस्थितीत स्पिक-मॅके 'मीटिंग ऑफ माईंडस' बैठक संपन्न · शालेय विद्यार्थ्यांनी भारतीय बैठकीत बसून परवीन सुलतान यांचे गायन ऐकले

 राज्यपालांच्या उपस्थितीत स्पिक-मॅके 'मीटिंग ऑफ माईंडस' बैठक संपन्न

·         शालेय विद्यार्थ्यांनी भारतीय बैठकीत बसून परवीन सुलतान यांचे गायन ऐकले

 

मुंबई, दि. ११ : राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली सोसायटी फॉर द प्रमोशन ऑफ इंडियन क्लासिकल म्युझिक अँड कल्चर अमंगस्ट यूथ (स्पिक-मॅके) या संस्थेच्या  पदाधिकारी व सल्लागार सदस्यांची बैठक (मिटिंग ऑफ माइंड्स) लोकभवन येथे झाली. 

            स्पिक मॅके ही विद्यार्थी व युवकांना भारताच्या संस्कृतीशी जोडण्याचे काम करणारी राष्ट्रीय संस्था असून संस्थेचे कार्य आज अधिक प्रासंगिक असल्याचे राज्यपालांनी यावेळी सांगितले.

            आपण एका संगीत प्रेमी घराण्यातून आलो असून स्पिक मॅके व इंटॅच संस्थेसोबत अनेक वर्षांपासून जुळलो असल्याचे राज्यपालांनी सांगितले. या दोन संस्थांसोबत काम करण्याचा अनुभव समृद्ध करणारा असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

            १९७७ मध्ये स्थापन झालेल्या स्पिक मॅके संस्थेचे मुख्य आश्रयदाते होण्याचे मान्य केल्याबद्दल संस्थेच्या राष्ट्रीय अध्यक्ष कुंदा माहूरकर यांनी राज्यपालांचे आभार मानले. पुढील वर्षी २०२७ साली स्पिक मॅके स्थापनेचे सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करीत असून आयआयटी दिल्ली येथे व त्यानंतर आयआयटी मुंबई येथे सुवर्ण महोत्सवी शिबिराचे आयोजन केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

            शास्त्रीय संगीत व नृत्य विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढवते. आज मुलांची व पालकांचीही बुद्धी चंचल झाली असल्याचे सांगून आपण मुलांना जीवनातील संघर्षांना तोंड देण्यासाठी पुरेसे तयार करीत नसल्याचे निरीक्षण संस्थेचे संस्थापक डॉ किरण सेठ यांनी नोंदवले.

            स्पिक मॅके मुलांची व युवकांच्या सृजनात्मक शक्तीला शास्त्रीय कलांच्या माध्यमातून चालना देण्याचे काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

            बैठकीला उद्योगपती शेखर बजाज, सांस्कृतिक विभागाचे सचिव डॉ किरण कुलकर्णी, संजय कुमार यादव, सुशील कुमार जीवराजका, माया शहानी, सूचित नंदा, योगेश आंधळे, ममता भट्टाचार्य, आदी उपस्थित होते.

            बैठकीनंतर दरबार हॉल येथे राज्यपालांच्या उपस्थित झालेल्या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात विविध शाळांमधून आलेल्या विद्यार्थ्यांनी विख्यात शास्त्रीय गायिका परवीन सुलताना यांचे गायन ऐकले. सर्व मुलांनी भारतीय बैठकीत बसून गायन ऐकले. परवीन सुलताना यांना मुकुंदराज देव (तबला) व श्रीनिवास आचार्य (हार्मोनियम) यांनी साथसंगत केली.

0000

मराठी भाषकांसाठी मध्यवर्ती संस्था

 मराठी भाषकांसाठी मध्यवर्ती संस्था

यावेळी भावपूर्ण सत्काराला उत्तर देतांना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मराठी माणूस जगाच्या पाठीवर कुठेही गेला, तरी तो आपली माती, भाषा आणि संस्कृती कधीही विसरत नाही. नुकताच मराठी भाषेला केंद्र सरकारकडून 'अभिजात भाषेचा' दर्जा मिळाला आहे. मराठी भाषेचा हा डंका जगभरात गाजवण्यासाठी आणि जागतिक स्तरावर मराठी माणसांना मजबुतपणे जोडण्यासाठी  लंडनमध्ये विश्व मराठी साहित्य संमेलन भरवले जाईल तसेच जगभरातील मराठी भाषकांसाठी एक मध्यवर्ती संस्था स्थापन करण्याबाबतही विचार करीत असल्याचे ते म्हणाले.

पुढील विश्व मराठी साहित्य संमेलन लंडनमध्ये आयोजित करणार

 पुढील विश्व मराठी साहित्य संमेलन लंडनमध्ये आयोजित करणार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

  • महाराष्ट्र मंडळाच्या सोहळ्यात 'ग्लोबल प्राईड ऑफ महाराष्ट्र' पुरस्काराने उपमुख्यमंत्री सन्मानित

 

लंडन दि ११: जगभरात विखुरलेल्या मराठी बांधवांना, उद्योजकांना आणि मराठी संस्कृतीला एका वैश्विक व्यासपीठावर आणण्यासाठी पुढील 'विश्व मराठी साहित्य संमेलन' लंडनमध्ये आयोजित करण्यात येईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. लंडन येथील ऐतिहासिक अशा महाराष्ट्र मंडळाने त्यांचा 'ग्लोबल प्राईड ऑफ महाराष्ट्र पुरस्कार देऊन सन्मान केला. यावेळी महाराष्ट्र भवनातील वातावरण मराठीमय होऊन गेले होते. महाराष्ट्राच्या सामाजिक आणि आर्थिक उन्नतीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल उपमुख्यमंत्र्यांचा हा गौरव करण्यात आला. सातासमुद्रापलीकडे मराठी माणसाने झेंडा फडकवला आहे, त्यामुळे महाराष्ट्र मंडळाच्या पाठीशी सरकार आणि एकनाथ शिंदे म्हणून मी खंबीरपणे उभा आहे असा विश्वास त्यांनी दिला.

 

कार्यक्रमासाठी महाराष्ट्र भवनात मोठी गर्दी झाली होती. तरुणांनी ढोल-ताशांच्या गजरात आणि मराठी परंपरेनुसार उपमुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. यावेळी जय महाराष्ट्र, जय भवानी-जय शिवाजीच्या घोषणांनी आसमंत दणाणून गेला होता. उपमुख्यमंत्र्यांनीही या जोशपूर्ण स्वागताचे भाषणात कौतुक केले. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी लंडनस्थित सर्व मराठी जनाला गणेशोत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. आपली संस्कृती, आपला ठसा हा उमटवावाच लागेल असेही ते म्हणाले.

 

यावेळी निवृत्त सनदी अधिकारी भूषण गगराणी, ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर, महाराष्ट्र मंडळाचे ज्येष्ठ सदस्य डॉ गोविंद कानेगावकर, मंडळाचे अध्यक्ष वृषाल खांडके, मराठी भाषा संचालक श्यामकांत देवरे, मराठी चित्रपट निर्माते अभिनेते मंगेश देसाई त्याचप्रमाणे इतर मान्यवरांची उपस्थिती होती.

केंद्र सरकारने निश्चित केलेले ‘टीबी मुक्त भारत’ हे उद्दिष्ट केवळ सरकारचे अभियान नसून संपूर्ण समाजाची जबाबदारी

 केंद्र सरकारने निश्चित केलेले टीबी मुक्त भारतहे उद्दिष्ट केवळ सरकारचे अभियान नसून संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपली भूमिका बजावणे आवश्यक आहे. विशेषतः तरुणांनी आपल्या कुटुंबात, मित्रपरिवारात आणि समाजामध्ये टीबीविषयी अचूक माहिती पोहोचवावी, असे आवाहन राज्यपालांनी केले.

 

तरुणांनी टीबीमुक्तीच्या यशोगाथांवर आधारित लघुपट, पोस्टर्स, पॉडकास्ट आणि सोशल मीडिया मोहिमा तयार करून जनजागृतीला नवे माध्यम द्यावे, असेही राज्यपालांनी सुचविले. आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, स्वयंसेवी संस्था आणि सामाजिक संघटना हे या अभियानातील परिवर्तनाचे महत्वाचे दूत आहेत, असे त्यांनी नमूद केले.

 

सुरुवातीला राज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरे यांनी अभियानामागची भूमिका स्पष्ट केली. कुलगुरु रवींद्र कुलकर्णी तसेच बंट संघ शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष विश्वनाथ शेट्टी यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले

Featured post

Lakshvedhi