Saturday, 1 August 2026

राज्यपालांच्या उपस्थ‍ितीत मुंबई मॅरेथॉन २०२७ नोंदणीचा शुभारंभ

 राज्यपालांच्या उपस्थ‍ितीत मुंबई मॅरेथॉन २०२७ नोंदणीचा शुभारंभ

मुंबई, दि. ३१ : राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत १७ जानेवारी २०२७ रोजी होणाऱ्या टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धेसाठी नावनोंदणी प्रक्रियेचा शुभारंभ आज मुंबई येथे करण्यात आला.  

मुंबई मॅरेथॉन जगातील सर्वात अधिक स्पर्धक असणारी समावेशक मॅरेथॉन झाल्याबद्दल राज्यपालांनी आयोजकांचे अभिनंदन केले तसेच मॅरेथॉनच्या माध्यमातून सामाजिक उपक्रमांना चालना दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

कार्यक्रमाला भारतीय नौदलाच्या पश्चिम विभागाचे मुख्य ध्वज अधिकारी व्हाईस ऍडमिरल संजय वात्सायन, महाराष्ट्र, गुजरात व गोवा विभागाच्या सैन्य दलाचे जनरल ऑफिसर कमांडिंग ले. जन. डी एस कुशवाह, मॅरेथॉन आयोजक संस्था प्रोकॅमचे व्यवस्थापकीय संचालक अनिल सिंह, सहसंचालक विवेक सिंह तसेच मॅरेथॉन प्रायोजक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.


आर्टी' से मातंग समाज के सर्वांगीण विकास को मिलेगा बढ़ावा -

 

आर्टी' से मातंग समाज के सर्वांगीण विकास को मिलेगा बढ़ावा

- केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले

केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले ने विश्वास व्यक्त किया कि 'लोकशाहीर अन्ना भाऊ साठे अनुसंधान एवं प्रशिक्षण संस्थान (ARTI)' मातंग समाज के सर्वांगीण विकास में महत्वपूर्ण भूमिका निभाएगा।

उन्होंने कहा कि 'बार्टी' की तर्ज पर स्थापित 'आर्टी' संस्था शिक्षा, प्रतियोगी परीक्षाओं का मार्गदर्शन, कौशल विकास, उद्यमिता तथा रोजगार के अवसर उपलब्ध कराकर युवाओं को सशक्त बनाएगी। उन्होंने मातंग समाज की लंबे समय से लंबित मांग पूरी करने के लिए राज्य सरकार का आभार भी व्यक्त किया।

इस अवसर पर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एवं अन्य गणमान्य व्यक्तियों के हाथों स्लम पुनर्विकास प्राधिकरण द्वारा प्रकाशित कॉफी टेबल बुक 'पारदर्शिता से परिवर्तन की ओर' का विमोचन किया गया। संघ लोक सेवा आयोग (UPSC) परीक्षा में सफलता प्राप्त करने वाली प्रेरणा कैलास खवले का सम्मान भी किया गया। साथ ही, अन्ना भाऊ साठे के परिवारजनों का भी सम्मान किया गया।

स्लम पुनर्विकास प्राधिकरण के मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर ने कार्यक्रम की प्रस्तावना प्रस्तुत की तथा सचिव दत्तात्रय नवले ने आभार व्यक्त किया।

Registration Under Sukanya Samriddhi and NPS Vatsalya Schemes

 Registration Under Sukanya Samriddhi and NPS Vatsalya Schemes

 

Under the Trust's initiative, girls below the age of ten were enrolled under the Sukanya Samriddhi Yojana, while girls above ten years of age were registered under the NPS Vatsalya Scheme. An amount of Rs. 20,000 has been deposited into each of the 1,000 accounts, and an equal amount will continue to be deposited annually for the next ten years.

 

During the programme, Chief Minister Devendra Fadnavis symbolically distributed cheques under the Sukanya Samriddhi Yojana to girl students and their mothers.

जिल्हा युवा पुरस्कार २०२५-२६ साठी अर्ज करण्याचे आवाहन

 जिल्हा युवा पुरस्कार २०२५-२६ साठी अर्ज करण्याचे आवाहन

 

मुंबई, दि. ३१ : राष्ट्र व राज्य निर्माणामध्ये युवकांची महत्वपूर्ण भूमिका असून मोठ्या संख्येने युवा वर्ग / संस्था जिल्ह्यात सामाजिक कार्य करीत आहेत. युवामध्ये असलेल्या सुप्तगुणांना वाव देणे. त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याला प्रोत्साहन देणे, त्यांचा गुणगौरव करणे आवश्यक आहे. राज्याचे युवा धोरण अंतर्गत युवांच्या सामाजिक कार्याचा गौरव करण्यासाठी जिल्हा युवा पुरस्कार शासन निर्णय दि. १२ जानेवारी २०१३ नुसार देण्यात येतात.

 

२०२५-२६ या वर्षात जिल्हास्तरावर जिल्हा युवा पुरस्कार प्रत्येक जिल्ह्यातील १ युवक, १ युवती व १ नोंदणीकृत संस्था यांना देण्यात येणार आहेत. या पुरस्काराचे स्वरुप युवक-युवती यांना रोख रु.१०,०००/- संस्थेस रु. ५०,०००/- तसेच गौरवपत्र, सन्मानचिन्ह असे राहणार आहे.

 

जिल्हा युवा पुरस्कारासाठी युवक अथवा युवा विकासाचे कार्य करणा-या संस्था यांची गत तीन वर्षामध्ये केलेल्या कामगिरीचे मूल्यांकन विचारात घेण्यात येणार असून राज्य युवा पुरस्कार २०२५-२६ साठी अर्ज १५ सप्टेंबर २०२६ रोजी पर्यत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात सादर करणे आवश्यक असणार आहे.

 

या अर्जाचा नमुना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय किंवा https://sports.maharashtra.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध राहतील. राज्यातील जास्तीत जास्त युवा व युवा विकासाचे कार्य करणा-वा संस्था यांनी पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन मा. जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई उपनगर यांनी केले आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना : राज्यात आधार प्रमाणीकरणाला वेग; ८.३३ लाखांहून अधिक शेतकऱ्यांचे ई-केवायसी पूर्ण

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना :

राज्यात आधार प्रमाणीकरणाला वेग; ८.३३ लाखांहून अधिक शेतकऱ्यांचे ई-केवायसी पूर्ण

 

पुणे, दि. ३१ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना (२०२६) अंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण (ई-केवायसी) अभियान राज्यभर वेगाने सुरू असून, ३१ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजेपर्यंत राज्यातील एकूण १६,९६,२०१ लाभार्थींपैकी ८,३३,२२३ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे. ही प्रगती ४९.८४ टक्के इतकी आहे.

 

विभागनिहाय आढाव्यानुसार अमरावती विभागात ५४.१५ टक्के, नाशिक विभागात ५४.९३ टक्के, पुणे विभागात ६०.२६ टक्के, कोल्हापूर विभागात ६४.२६ टक्के, नागपूर विभागात ४८.४८ टक्के, कोकण विभागात ४९.१५ टक्के, लातूर विभागात ३९.७७ टक्के, तर छत्रपती संभाजीनगर विभागात ३५.०६ टक्के आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे.

 

जिल्हानिहाय प्रगतीमध्ये अहमदनगर (७३.४७ टक्के), भंडारा (६९.८९ टक्के), वाशीम (६७.४८ टक्के), ठाणे (६७.४२ टक्के), सांगली (६७.३४ टक्के), सातारा (६६.५८ टक्के), पुणे (६५.४४ टक्के) आणि नाशिक (६४.८६ टक्के) या जिल्ह्यांनी उल्लेखनीय प्रगती नोंदविली आहे.

 

योजनेचा लाभ वेळेत मिळण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण (ई-केवायसी) तातडीने पूर्ण करावे, तसेच संबंधित यंत्रणांनी प्रलंबित लाभार्थ्यांशी संपर्क साधून हे काम गतीने पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

स्त्रोत: सहकार आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य,पुणे

00000


भिवंडी येथील दुर्घटनाग्रस्त इमारतीची आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी केली पाहणी. · मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाखाची मदत

 भिवंडी येथील दुर्घटनाग्रस्त इमारतीची

आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी केली पाहणी.

·        मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाखाची मदत

 

मुंबई, दि.३१ :- भिवंडी येथे घडलेल्या दुर्दैवी इमारत दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

 

यावेळी त्यांनी बचाव आणि मदतकार्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून घेतली तसेच  प्रभावीपणे बचावकार्य राबविण्याच्या सूचना देत, प्रभावित नागरिकांना आवश्यक ती सर्व मदत तातडीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश संबंधित यंत्रणेला दिले.

 

मंत्री गिरीश महाजन म्हणाले, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घटनेची संपूर्ण माहिती दिली असून त्यांच्याशी चर्चा केली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी शासनाच्या वतीने सर्वतोपरी मदत कार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. शासनाच्या वतीने दुर्घटनेतील मृत झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५  लाखाची मदत यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी जाहीर केली. तसेच जखमींना सर्वोत्तम वैद्यकीय उपचार मिळावेत आणि आपत्तीग्रस्तांना शासनाकडून सर्वतोपरी मदत करण्यात येईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. यावेळी दुर्घटनेतील मृत व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आपण सहभागी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

 

आपत्तीच्या काळात प्रशासन, बचाव पथके आणि स्थानिक यंत्रणांमध्ये समन्वय ठेवून नागरिकांना तातडीने मदत पोहोचविण्यावर भर देण्याचे आवाहनही मंत्री गिरीश महाजन यांनी केले.

 

सदर इमारतीच्या शेजारील इमारतीतील नागरिकांचे देखील स्थलांतर करण्यात आले असून त्यांची सर्वतोपरी व्यवस्था करण्यात यावी असे निर्देश त्यांनी यावेळी प्रशासनास दिले. यावेळी खासदार सुरेश म्हात्रे, माजी मंत्री कपिल पाटील, आमदार महेश चौगुले, महापौर नारायण चौधरी, जिल्हाधिकारी श्रीकांत पांचाळ, यांच्यासह आपत्ती व्यवस्थापन, महापालिका प्रशासन, तसेच सर्व शासकीय यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

Friday, 31 July 2026

ट्रस्टच्या उपक्रमाअंतर्गत 'सुकन्या समृद्धी योजने' अंतर्गत नोंदणी

 ट्रस्टच्या उपक्रमाअंतर्गत 'सुकन्या समृद्धी योजने' अंतर्गत नोंदणी

ट्रस्टच्या वतीने या उपक्रमाअंतर्गत दहा वर्षांखालील मुलींची 'सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत तर दहा वर्षांवरील मुलींची 'एनपीएस वात्सल्य योजना' अंतर्गत नोंदणी करण्यात आली. एक हजार खात्यांमध्ये प्रत्येकी २० हजार रुपये जमा करण्यात आले असून पुढील दहा वर्षे दरवर्षी तेवढीच रक्कम जमा केली जाणार आहे.

 

कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'सुकन्या समृद्धी योजने' अंतर्गत विद्यार्थिनी आणि त्यांच्या मातांना प्रातिनिधिक स्वरूपात धनादेशांचे वितरण करण्यात आले.

Featured post

Lakshvedhi