Showing posts with label खट्टा-कट्टा. Show all posts
Showing posts with label खट्टा-कट्टा. Show all posts

Monday, 11 December 2023

येईल *चाळीशी येईल *पन्नाशी

 ⚜️🔱⚜️🔱⚜️🔱⚜️🔱⚜️

एक सुरेख कविता...


                   🌸जगणं 🌸

           

        येईल *चाळीशी

       येईल *पन्नाशी 

        करायची नाही 

        कुणीच *चिंता,*

        प्रत्येक दिवस 

      मजेत जगायचा

        वाढवायचा नाही 

        अपेक्षांचा *गुंता.* 


       वय झालं 

     म्हातारपण आलं,

       उगाच *कोकलत* 

       बसायचं नाही.

       विनाकारण *बाम* लावून,

       चादरीत *तोंड* खुपसायचं नाही.


       तुम्हीच सांगा 

      छंद जोपासायला,

      वयाचा संबंध* असतो कां ?

      रिकामटेकडं *घरात* 

              बसून

        माणूस *आनंदी* 

        दिसतो कां ?


        पोटा-पाण्यासाठी 

       *पोरं-सुना*

        *घर* सोडून जाणारच, 

         प्रत्येकाच्या 

        आयुष्या* मध्ये

         असे *रितेपण* 

         येणारच. 


         *करमत* नाही 

         *करमत* नाही

         सारखे-सारखे 

        *म्हणायचे* नाही,

       *आवडत्या कामात*

        *दिवस घालवायचा*

         उगाचच *कुढत* 

         बसायचं   नाही.


         घरातल्या *घरात* 

         वा *बागेत*

       *हिंडाय-फिरायला*  

        जायचं,

         वय जरी *वाढलं* 

        असलं तरी

         मनपसंत *गाणं* 

         मनमोकळं गायचं.


          *गुडघे* गेले,  

    *कंबर* गेली

          नेहमी नेहमी 

    *कण्हायचं* नाही,

          आता आपलं 

          काय    राहिलं?

          हे फालतू वाक्य कधीच        *म्हणायचं* नाही.


         पिढी दर पिढी *चालीरीतीत*

         थोडे फार *बदल* होणारच, 

         पोरं-पोरी त्यांच्या *संसारात* 

         कळत नकळत *गुंतणारच.* 


         तू-तू, मै-मै, जास्त *अपेक्षा*

         कुणाकडूनही *करायची*    नाही,

         मस्तपैकी *जगायचं* सोडून

         रोज थोडं थोडं *मरायचं* नाही.


          स्वत:च स्वत:ला *समजवायचं* असतं

          पुढे पुढे *चालत* 

  *राहायचं     असतं,*

          वास्तू *तथास्तू* 

        *म्हणत असते*

          हे उमजून निरामय *जगायचं* असतं.


  *चाळीशी पन्नाशी पर्याय पोहचलेल्या 

*सर्व  मित्रांमैत्रिणींना समर्पित. *

🌸🌸 🌹 🌸🌸

Tuesday, 21 November 2023

*👇 कर्माचा - सिद्धांत 👇* *कोणाचीही हाय लागून घेऊ नये, त्याचे भयंकर परिणाम भोगावे लागतात.* काही लोकांना नाही पटणार हा विषय, पण ज्यांनी अनेकांचा तळतळाट घेतलाय आणी त्याचे भोग ते भोगत असतात, त्यांना नक्कीच पटेल,!! .... अनेक कारणांनी तळतळाट दिलेला असतो, ... जसे की 1) शारिरीक, मानसिक, आर्थिक,... 2) अपमानास्पद वागणुक,... 3) कोणांचे मन दुखावले असू शकते,... 4) कोणावर अन्याय केला गेलेला असतो,... 5) कोणाची काही कारण नसताना सामाजिक बदनामी केलेली असते,..... 6) *छळ केलेला असेल,.....* 7) कोणाची हक्काची फसवून प्रॉपर्टी हडपली असेल..... 8) कोणाला अनिती करायला बळ दिल असेल...... 9) शारिरीक दुखापत केलेली असेल, ....... 10) विश्वासात गैरफायदा घेतला गेलेला असेल...... 11) ज्याने उपकार केले असतील आणि स्वार्थासाठी त्याच्याच पाठीत खंजीर खुपसला असेल..... त्रासाचे कुठलेही कारण असो... वरील गोष्टींचा समोरच्या व्यक्तीला प्रचंड त्रास होत असतो, तो खुप दुःखी होतो, त्याचे मनोबल कमकुवत होत असते, पर्यायाने ती व्यक्ती प्रचंड डिप्रेशनमध्ये देखील जाऊ शकते , जाणुन-बुजून त्रास देणाऱ्या व्यक्तीला हे समजत नसेल, पर्यायाने ज्या व्यक्तीला त्रास झालेला असतो त्या व्यक्तीकडुन चमत्कार होत नाही, किंवा देवदेखील शाप देत नाही किंवा काठीने मारत नाही , *पण त्या दुखावलेल्या व्यक्तीकडुन अतिशय तेजस्वी नकारात्मक उर्जा शक्ती निघते व समोरच्या व्यक्तीमध्ये शोषली जाते, मग समोरच्या व्यक्तीला हाय लागते त्यालाच तळतळाट अस म्हटले जाते.* मग ज्याने कोणी त्रास दिलेला असतो, त्याचे हे कार्य यशस्वी होत नाही, किंबहुना झाले तरी फार काळ टिकत नाही, सतत अपयश येणे, घरात आजारपण येणे, अश्या अनेक प्रकारची काहीही घटना घडू शकतात,.... *आपण किती खरे आहोत व किती खोटारडे आहोत* हे फक्त आपल्याला व *आपल्या अंतर्मनालाच माहीत असते.* समोरच्याचे मन दुखावले जाणे म्हणजेच पाप लागणे. त्याची परतफेड शक्यतो याच जन्मात करावी लागते, *तुम्ही आस्तिक असा किंवा नास्तिक,* चांगल्या-वाईट गोष्टींचा हिशोब सव्याज परत करावाच लागतो, मी एका पुस्तकात वाचले होते, राजा धृतराष्ट्राचे शंभरच्या-शंभर पुत्र युध्दात मारले गेले, *तेव्हा त्याने श्रीकृष्णाला विचारले की अस का व्हावे?* माझ्या संबंध जीवनात मी असे कोणतेही महान पातक केलेलं नाही, की ज्याच्या परिणामस्वरूप सर्वच्या-सर्वच पुत्रांचा मृत्यु आपल्या डोळ्यांसमोर पाहून त्याचे दुःख सोसणे माझ्या नशिबी यावे? तेव्हा भगवान श्रीकृष्णाने धृतराष्ट्र राजाला आपले पुर्व-जन्म पहाण्याची दिव्य-दृष्टि दिली. धृतराष्ट्र राजाने दिव्य-दृष्टिद्वारे पाहीले की साधारण पन्नास जन्मापुर्वी तो एक पारधी होता, आणि पक्षी पकडण्यासाठी त्याने एका वृक्षाला आग लावली होती. आग लागताच बरेचसे पक्षी उडून गेले. मात्र आगीची झळ लागल्याने त्यातील कित्येक पक्षी आंधळे झाले तर पक्षांची शंभरएक लहान पिल्ले उडू न शकल्याने आगीत होरपळून मृत्युमुखी पडली. धृतराष्ट्र राजाची *त्यावेळची ती क्रिया होती, त्याच्या कर्माचे फळ कित्येक जन्मानंतर धृतराष्ट्र राजाचे शंभर पुत्र युध्दात मारले गेले तेव्हाच ते पुर्ण झाले.* *कर्म हे फळ देऊनच शांत होते.* प्रत्येक चांगल्या-वाईट गोष्टींचा हिशोब हा होतोच, हा प्रत्येकाच्या कर्माचा सिध्दांतच आहे, चांगले कर्म,चांगले फळ देऊनच शांत होते. वाईट कर्म, वाईट फळ देऊनच शांत होते. फक्त वेळ आणि काळ मागे-पुढे होऊ शकते. हाच कर्माचा सिध्दांत आहे. आता आपणच ठरवायचे आहे,आपले कर्म कसे हवे. *"जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर॥* *क्षणीक सुखासाठी अपुल्या, कुणी होतो नितीभ्रष्ट".* 😊😊🙏🙏🙏

 *👇 कर्माचा - सिद्धांत 👇*

                

*कोणाचीही हाय लागून घेऊ नये, त्याचे भयंकर परिणाम भोगावे लागतात.*

काही लोकांना नाही पटणार हा विषय, 

पण ज्यांनी अनेकांचा तळतळाट घेतलाय आणी त्याचे भोग ते भोगत असतात, त्यांना नक्कीच पटेल,!! ....

अनेक कारणांनी तळतळाट दिलेला असतो, ...

जसे की  

1) शारिरीक, मानसिक, आर्थिक,...

2) अपमानास्पद वागणुक,...

3) कोणांचे मन दुखावले असू शकते,...                     

4) कोणावर अन्याय केला गेलेला असतो,...

5) कोणाची काही कारण नसताना सामाजिक बदनामी केलेली असते,.....

6) *छळ केलेला असेल,.....*

7) कोणाची हक्काची फसवून प्रॉपर्टी हडपली असेल.....

8) कोणाला अनिती करायला बळ दिल असेल......

9) शारिरीक दुखापत केलेली असेल, .......

10)  विश्वासात गैरफायदा घेतला गेलेला असेल......                                       

11) ज्याने उपकार केले असतील आणि स्वार्थासाठी त्याच्याच पाठीत खंजीर खुपसला असेल.....


त्रासाचे कुठलेही कारण असो...

वरील गोष्टींचा समोरच्या व्यक्तीला प्रचंड त्रास होत असतो, तो खुप दुःखी  होतो, त्याचे मनोबल कमकुवत होत असते,  पर्यायाने ती व्यक्ती प्रचंड डिप्रेशनमध्ये देखील जाऊ शकते , 

जाणुन-बुजून त्रास देणाऱ्या व्यक्तीला हे समजत नसेल, 

 पर्यायाने ज्या व्यक्तीला त्रास झालेला असतो त्या व्यक्तीकडुन चमत्कार होत नाही, किंवा  देवदेखील शाप देत नाही किंवा काठीने मारत नाही , *पण त्या दुखावलेल्या व्यक्तीकडुन अतिशय तेजस्वी नकारात्मक उर्जा शक्ती निघते व समोरच्या व्यक्तीमध्ये शोषली जाते,  मग समोरच्या व्यक्तीला हाय लागते त्यालाच तळतळाट अस म्हटले जाते.*

मग ज्याने कोणी त्रास दिलेला असतो, त्याचे हे कार्य यशस्वी होत नाही, किंबहुना झाले तरी फार काळ टिकत नाही,  सतत अपयश येणे,  घरात आजारपण येणे, अश्या अनेक प्रकारची काहीही घटना घडू शकतात,....

*आपण किती खरे आहोत व किती खोटारडे आहोत* हे फक्त आपल्याला व 

*आपल्या अंतर्मनालाच माहीत असते.*

समोरच्याचे मन दुखावले जाणे म्हणजेच पाप लागणे. त्याची परतफेड शक्यतो याच जन्मात करावी लागते, 

*तुम्ही आस्तिक असा किंवा नास्तिक,*

 चांगल्या-वाईट गोष्टींचा हिशोब सव्याज परत करावाच लागतो,

मी एका पुस्तकात वाचले होते,

राजा धृतराष्ट्राचे शंभरच्या-शंभर पुत्र युध्दात मारले गेले,


*तेव्हा त्याने श्रीकृष्णाला विचारले की अस का व्हावे?*


 माझ्या संबंध जीवनात मी असे कोणतेही महान पातक केलेलं नाही,

की ज्याच्या परिणामस्वरूप सर्वच्या-सर्वच पुत्रांचा मृत्यु आपल्या डोळ्यांसमोर पाहून त्याचे दुःख सोसणे माझ्या नशिबी यावे? 

तेव्हा भगवान श्रीकृष्णाने धृतराष्ट्र राजाला आपले पुर्व-जन्म पहाण्याची दिव्य-दृष्टि दिली.

धृतराष्ट्र राजाने दिव्य-दृष्टिद्वारे पाहीले की साधारण पन्नास जन्मापुर्वी तो एक पारधी होता, आणि पक्षी पकडण्यासाठी त्याने एका वृक्षाला आग लावली होती. आग लागताच बरेचसे पक्षी उडून गेले. मात्र आगीची झळ लागल्याने त्यातील कित्येक पक्षी आंधळे झाले तर पक्षांची शंभरएक लहान पिल्ले उडू न शकल्याने आगीत होरपळून मृत्युमुखी पडली.             धृतराष्ट्र राजाची *त्यावेळची ती क्रिया होती, त्याच्या कर्माचे फळ कित्येक जन्मानंतर धृतराष्ट्र राजाचे शंभर पुत्र युध्दात मारले गेले तेव्हाच ते पुर्ण झाले.*


*कर्म हे फळ देऊनच शांत होते.*

प्रत्येक चांगल्या-वाईट गोष्टींचा हिशोब हा होतोच, 

हा प्रत्येकाच्या कर्माचा सिध्दांतच आहे, 

चांगले कर्म,चांगले फळ देऊनच शांत होते. वाईट कर्म, वाईट फळ देऊनच शांत होते. फक्त वेळ आणि काळ  मागे-पुढे होऊ शकते.

हाच कर्माचा सिध्दांत आहे.

आता आपणच ठरवायचे आहे,आपले कर्म कसे हवे.

*"जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर॥*

*क्षणीक सुखासाठी अपुल्या, कुणी होतो नितीभ्रष्ट".*

😊😊🙏🙏🙏

Friday, 3 November 2023

आणि मला दुर्गा सापडली*

 *आणि मला दुर्गा सापडली*


सिक्किमजवळच्या पेलिंगला नेमकी आमच्या यांची कॉन्फरन्स घोषित झाली. नवरात्राचे दिवस. यांच्या आग्रहामुळे मला जावच लागलं. मनात मात्र घरचं  नवरात्र हुकल्याची हुरहुर होती.  आमची गाडी त्या दिवशी सारखा त्रास देत होती.  गाडीच्या ड्रायव्हरच्या मावशीचं घर रस्त्यावरच होतं. वळणावळणाच्या त्या रस्त्यावर एका घराशेजारी गाडी थांबली. घरासमोर बरीच  मुलं  खेळत होती. लहान -मोठी, गोबर्‍या लाल गालांची, बसक्या नाकाची. गाडीचा आवाज ऐकून एक मध्यमवयीन बाई बाहेर आली आणि आमच्या  ड्रायव्हर भीमला म्हणाली,  ' ताबा तस खै ? ' कसा आहेस ? भीमने आमची ओळख करून दिली. ही कुंती, माझी मावशी. जरा कुरकुरणार्‍या   गाडीची डागडुजी  करायला   भीम गाडी घेऊन गेला.   कुंती अगदी चारचौघींसारखी दिसत होती. सिक्कीमी बायकांचा  गुडघ्यापर्यंत येणारा बाखू  तिने घातलेला. कान लोंबेपर्यंत, कानाची पाळी फाकवणारे कानातले झुमके, अकाली पडलेल्या सुरकुत्या आणि चेहेर्‍यावर हसू. तिचं  वय असेल सहज पन्नाशीला आलेलं. पण कुंती गरोदर होती. या वयाची बाई गरोदर बघून मला धक्काच बसला. एक बारकं  मूल तिच्या कडेवर होतं. एक पाठीशी झोळीत बसून तिच्या मागून वाकून मिचमिच्या डोळ्यांनी  आमच्याकडे बघत होतं. इतक्यात झोपडीतून नुकतीच चालायला लागलेली, नीट चालणारी पण शेंबूड पुसणारी आणखी दोन तीन पाठोपाठची मुलं  बाहेर आली. कुंतीनं  आमचं  स्वागत केलं. तिने हाक मारल्यावर झोपडीच्या मागच्या उतारावर शेतात काम करणारा एक चौदा पंधरा वर्षांचा मुलगा धावत आला. आणि आम्हाला बसायला त्यानं  एक बाक आडवा केला.  कुंतीला तोडकं  मोडकं  हिन्दी येत होत. पण तिथल्या एका मुलाला  नीट हिन्दी येत होती. त्याच्या मदतीने आमचा संवाद सुरू झाला. 

        माझ्या चेहर्‍यावरचं  आश्चर्य बघून कुंतीनेच संभाषणाची  सूत्र हातात घेतली. ' दीदी , ही सगळी माझीच मुलं. ' ' तुझी म्हणजे, तुझी स्वत:ची ? ' मी उडालेच. ' हो. माझी, माझ्या पोटची. ' पण .. आपला कायदा आहे ना ..दो या तीन .. 'कुंतीला या प्रश्नांची अपेक्षाच असावी. ' हो, आहे ना कायदा. आणि मुलांची संख्या वाढवली तर सरकारवर त्यांचा बोजा टाकायचा नाही, हे ही ठाऊक आहे. माझी मुलं  आणि आम्ही स्वावलंबी आहोत. आम्ही आमच्या शेतात राबतो, पिकवतो,  रोज कमावतो, रोज खातो, साठवून ठेवायला मात्र आमच्याकडे पैसे नाहीत. ' त्यापुढे कुंतीने  जे  सांगितलं, ते या पृथ्वीतलावरच वाटलंच  नाही मला. 

         कुंती आणि दोरजा, तिचा नवरा, दोघं  पेलिंगच्या कष्टकरी लेपचा जमातीतले. हिमालयाच्या  निसर्गरम्य पहाडात हातावर पोट  असलेलं त्यांचं कुटुंब.  दोरजा सैन्यासाठी लाकूडफाटा   सीमेवर पोचवण्याचं  काम करायचा. कुंती गावातल्या बायकांबरोबर लाकडं गोळा करायला जायची. देशाला आपली तेवढीच मदत. कुंती कधी दोरजासोबत मिरची - भाकरी सैनिकांसाठी पाठवायची.  त्यांचा मोठा मुलगा राम,  विसाव्या वर्षीच सैन्यात भरती झाला. कुंतीला त्याचं  कोण अप्रूप. सगळ्या गावाला तिने त्याचा गणवेष कौतुकाने फिरून दाखवला. दाजूमुळे ( मोठा भाऊ )  आणि घरातल्या देशप्रेमी वातावरणामुळे   धाकट्या दोघांना ही सैन्यात जायचे वेध लागलेले. राम काश्मीर सीमेवर तैनात असताना, अवघ्या बावीसाव्या वर्षी  त्याला वीरमरण आलं.  हिमालयातला बर्फ वितळेल, असा कुंतीचा शोक चालला होता.  तिला  मुलगा गेल्याचं दु:ख होतच. पण  मुलाची  देशसेवा अर्ध्यावर राहिली याची तिला  जास्त खंत होती. 

            कुंतीच्या धाकट्या दोघांनी दाजूचं  स्वप्न पूर्ण करण्याचं ठरवलं आणि कुंतीने आपला निर्णय दोरजाला सांगितला. मला देशासाठी लढणारे सैनिक निर्माण करायचे आहेत. नाहीतरी माझ्यासारखी स्त्री देशाची सेवा कशी करणार ? दोरजाने आधी तिला समजावलं. नातेवाईकांना वाटलं ती वेडी झालीये. पण नंतर दोरजाला कुंतीच्या ठाम निर्णयाचा अंदाज आला.  मुलांच्या लष्कर भरतीत कुंतीच्या संगोपनाचाच वाटा होता. दोरजाला फक्त कुंतीच्या प्रकृतीची काळजी वाटत होती. कुंती म्हणाली , दोरजा, तू फक्त साथ दे. आपण कष्ट करू, मुलांना स्वावलंबी बनवू. त्यांना देशासाठी घडवू आणि देशालाच अर्पण करू. मला शक्य आहे तोपर्यंत मला हे करू दे. दोरजा म्हणाला, पण एखाद्या मुलाला हे पटलं  नाही तर. ' ज्याला नाही पटणार, तो दोन वर्ष  देशसेवा करून नंतर आपलं  आयुष्य जगू शकतो.  माझ्या दुधाचं  हे मुलांवर असलेले कर्ज  त्यांनी फेडावं, असं  सांगेन मी त्यांना . ' आणि कुंतीच्या घरात वर्ष दोन वर्षात पाळणा हलू लागला. ' चांगल्या  कामाला निसर्ग ही साथ देतो दीदी. माझं  वय काय ठाऊक नाही. पण अजून तरी कूस फळतेय. मुलांना  अंगाई म्हणून ही  देशाचीच गाणी गाते. माझी मुलं ही फार  गुणी आहेत. माझं   ऐकतात. आमच्यासारखचं देशाचं  प्रेम त्यांनाही आहे. मध्यंतरी भीमाची बहीण वारली.  तिच्या नवर्‍याने दुसरं लग्न केलं. पोटच्या पोरांना परकं  केलं. मी म्हटलं, आण त्यांना इकडे. आता माझ्या पिल्लांसोबत  तिचीही मुलं  वाढताहेत. पण  अट त्यांनाही तीच. सैन्यात भरती व्हायचं. मुलांना  तायक्वंडोचं शिक्षण, रोज पहाडात दौड लावायचा सराव सक्तीचा केलाय मी. ' ती परत हसली. ' सैन्यात नंबर लागायला हवा ना, म्हणून जरा सक्ख्त आई झालेय. '  कुंती एकीकडे दोन मुलींना आणि एका मुलाला, सैनिकांसाठी  भाकर्‍या कागदात बांधायला सांगत  होती. दोरजाची गाडी सीमेकडे जायला निघेल म्हणून ती त्यांना घाई करत होती. शेतातल्या भाज्या आणि मिरच्यांचा वानवळा ही सोबत जायचा होता. 

          हिमालयाच्या कुशीतल्या, बर्फाळ पहाडावर,  एक निरक्षर आई, आपलं  मातृत्व  देशाला अर्पण करत होती. त्यासाठी तिनं  स्वत:चं शरीर पणाला लावलं होतं. मला माझीच  लाज वाटली. पण   माझं  नवरात्र हुकलं  नव्हतं.  आज  मनात चांगल्या विचारांची  घटस्थापना झाली होती.  कुंती हसली. तिच्या सुरकुत्या मला विलक्षण सुंदर दिसल्या.  माझी दुर्गा  माझ्यासमोर होती.  🙏🏻


*डॉ. स्मिता दातार*

 आगळी वेगळी देशभक्ती

Thursday, 2 November 2023

घर घर लागली

 *घरे गेली अंगणे गेली*

*नाती गोती फाटत गेली..*

*प्रेम, जिव्हाळा,माया, ममता*

*सारी सारी लुप्त झाली.*


*चार-चार बेडरूम्सची घरे झाली!*

*पण आई वडिल,वृद्धाश्रमी गेली..*

*आई-वडिलांचे कष्टं.. ऋणं..*

*सारे मुले विसरून गेली..*


*आजीआजोबांची नातवंडं*

*पाळणाघरातली children झाली*

*सोडायला बाई, आणायला बाई*

*घरच्या मायेला पारखी झाली..*


*सारी 'extremely busy' झाली*

*विचारपूस करी ना कोणी..😷*

*रक्ताचीही नाती आता*

*WhatsApp मध्ये बंद झाली..!*


*प्रत्येकाची वेगळी खोली*

*प्रत्येकाला स्पेस झाली*

*घरातल्याच माणसांमधल्या*

*संवादांची होळी झाली..*


*हॉटेलिंगची फॅशन आली*

*घरची जेवणे बंद झाली..*

*Modular च्या kitchen मध्ये*

*सगळी..बाहेरच जेवुन आली !*


*खोल्यांची संख्या वाढत गेली*

*माणसे मात्र कुढत गेली..*

*मी, मला, माझे माझे*

*स्वार्थामुळे ममता गेली*


*चिमुकल्यांची मनेच तुटली..*

*पैशामुळे नीती गेली..*

*नीतीमुळे मती गेली..*

*अहो पैशासाठी माणसाने*

*माणुसकी सोडून दिली*


*फेसबुक, गुगल, सगळे असून*

*का डिप्रेशन ची पाळी आली?*

*प्रत्येकाला शुगर, बीपी ..*

*हार्ट चीही गोळी आली !*


*इंटरनेट ने क्रांती केली !*

*मोबाईल ने जादू केली !*

*स्वत:च्याच कोषामध्ये*

*माणसे आता मग्न झाली..*


*माणसे जाऊन यंत्रे आली !🖥*

*यंत्रांची मग तंत्रे आली ! 🤕*

*यंत्रे-तंत्रे सांभाळताना*

*माणुसकीची फरफट झाली..*


*सुखं सांगायला कोणी नाही..*

*दु:ख ऐकायला कोणी नाही..*

*'Sharing' च्या या जमान्यात*

*माणुसकी मात्र उरली नाही*


*चला यंत्र थोडी बाजूला ठेवूया*

*विचारपूस करण्या घरी जाऊया*

*नाती गोती सांभाळुनी*

*आपण थोडे जवळ येऊया..🙏*

Saturday, 7 October 2023

मस्त आणि मस्ट !👌🏻 👇🏾 इस्त्री केलेलं म्हातारपण !

 मस्त  आणि मस्ट  !इस्त्री केलेलं म्हातारपण !


ट्रेनमधून लांबच्या प्रवासाला चाललो होतो. 

समोरच्या सीटवर एक काका होते. टी शर्ट, जीन्स, स्पोर्ट्स शूज, कानात pods, मनगटावर डिजिटल घड्याळ, पांढरे केस, सोनेरी काडीचा चष्मा, तुकतुकीत चेहरा.  


कुतूहल चाळवून मी त्यांच्याशी बोलायला सुरुवात केली. प्रवासात आमच्या गप्पा सुरु झाल्या. काका भलतेच गप्पिष्ट होते. आम्ही खूप वेगवेगळ्या विषयांवर बोललो. राजकारण, क्रिकेट, प्रवास…गंमत म्हणजे ते सोशल मीडियावर ऍक्टिव्ह होते. 

गप्पांमध्ये मी हळूच काकांना त्यांचं वय विचारलं. त्यांनी सांगितलं. मी उडालोच. 

‘सॉरी ! मी तुम्हाला आजोबा म्हणायला हवं होतं का?’ मी गमतीत म्हणालो. 

काका जोरात हसले. ‘तुम्ही मला रवि म्हटलंत तरी I am fine !’      

आम्ही दोघेही हसलो. 

काकांचं स्टेशन जवळ आलं. एक कडक शेकहॅण्ड करत काकांनी आमच्या दोघांचा एक सेल्फी घेतला. 


गाडी पुढे निघाली. मी ट्रेनमध्ये आजूबाजूला पाहिलं. सगळे म्हातारे खंगलेले ! इस्त्री गेलेल्या कपड्यासारखे. वैभव उडून गेलेल्या एखाद्या राजवाड्यासारखे ! 


योगायोग बघा. मी तेव्हा गुलज़ारच्या गाण्यांची प्लेलिस्ट ऐकत होतो. 

गाणी ऐकताना आपसूक गुलज़ारसाहेब डोळ्यासमोर येत होते. एका क्षणी एकदम मनात आलं, अरे या माणसाने इतकी वर्षं कशी सांभाळली असेल स्वतःची ‘इस्त्री’? 

आपण स्वतः कशी सांभाळणार आहोत स्वतःची इस्त्री? विचार ट्रेनच्या पुढे धावू लागले. 


एक म्हणजे स्वतःची तब्येत उत्तम ठेवणं. नियमित व्यायाम, योग्य आहार, पुरेशी झोप.

सध्याचं माहीत नाही, पण गुलज़ारसाहेब नियमित टेनिस खेळतात. काही वर्षांपूर्वी मुंबईतल्या एका स्पर्धेत ते जिंकले वगैरे होते. 


दुसरं म्हणजे, कार्यरत असणं. बँकेची पासबुकं भरायला स्टेट बँकेत लाईन लावणं याला मी कार्यरत नाही म्हणणार. आताच्या काळात तो वेळेचा अपव्यय आहे. टाईमपास आहे. कार्यरत म्हणजे तुमच्या आवडीच्या कामात creatively गुंतून राहणं. लिखाण, संगीत, शिकवणं, चित्रकला, स्वतःच्या गाडीचं सर्व्हिसिंग, बागकाम, वाचन… असं काहीही. रोजचं एक रुटीन असणं. रुटीन म्हणजे संध्याकाळी सात ते रात्री अकरा पर्यंत बिनडोक टीव्ही सिरियल्स बघणे नव्हे. स्वतःला enrich करणारं, बुद्धीला आव्हान देणारं काहीतरी करत राहणं. गुलज़ारसाहेब रोज नियमितपणे लिहितात. ते कोणी वाचो वा न वाचो. 


तिसरं म्हणजे कुतूहल टिकवून कालसुसंगत असणं. टी शर्ट- जीन्स घालून मॉडर्न होता येत नाही. काळाशी सुसंगत राहण्यासाठी बाहेरचा वारा आत येण्यासाठी मनाच्या खिडक्या उघड्या ठेवणे पण वाऱ्याने त्या खिडक्या उडून जाणार नाहीत याची काळजी घेणे. आमच्या - वेळी - असं - नव्हतं हे चार शब्द आपल्या डिक्शनरीमधून फाडून टाकणे म्हणजे कालसुसंगत राहणे. बिमल रॉय, सलील चौधरी, हेमंत कुमार यांच्याबरोबर काम केलेले गुलज़ारसाहेब विशाल भारद्वाज, रेहमान, शंकर-एहसान-लॉय यांच्याबरोबर तितक्याच सहजतेने काम करताना दिसतात. वेगवेगळ्या भाषांमध्ये काम करतात. जग बदललं. लोकांच्या sensibilities बदलल्या. तरीसुद्धा ऐंशी उलटून गेल्यावरही स्वतःचा दर्जा जराही घसरू न देता गुलज़ारसाहेब लिहिते राहिलेत. आपण आधुनिक आहोत हे दाखवण्यासाठी ना त्यांनी कधी जीन्स घातली ना त्यांना सोशल मीडियावर ऍक्टिव्ह राहण्याची गरज भासली. आधुनिक वाऱ्यांनी त्यांची पिंपळपाने सळसळत राहतात पण त्यांचा सोनेरी पिंपळवृक्ष आपली मुळे मातीत घट्ट पाय रोवून उभा आहे. 

      

शेवटचं म्हणजे, आर्थिक स्वातंत्र्य. पैशाचा लोभ नव्हे, तर पैशावर प्रेम असणे. उत्तम जगण्यासाठी पैसा हवाच आहे. गुलज़ार  साहेब फाळणीनंतर मुंबईत आले. खिशात पैसे नव्हते, पण स्वप्नं होती. लेखणीच्या आणि बुद्धीच्या बळावर एक कवी, लेखक, दिग्दर्शक पाली हिलमध्ये एका आलिशान बंगल्यात राहतो, याचं मला नेहमीच कौतुक वाटत आलंय.    

      

आपण सगळेच वयाने म्हातारे होण्याच्या मार्गावर आहोत. 

Growing old is mandatory but getting old is optional, असं म्हणतात. 

प्रत्येकाची आयुष्यं वेगवेगळी असतात. Circumstances वेगवेगळे असतात. त्यामुळे इच्छा असूनही काही लोकांच्या आयुष्याची इस्त्री बिघडतही असेल. पण बाकीच्यांनी आपलं म्हातारपण कडक इस्त्रीचं कसं राहील, याचा विचार आजपासूनच करायला काय हरकत आहे !    


गुलज़ार, राकेश मेहरा आणि विशाल भारद्वाज अशा तिघांचा एक कार्यक्रम Youtube वर आहे. कार्यक्रमाचं नाव होतं: 

कल आज और कल ! कार्यक्रमाच्या सुरुवातीला गुलज़ारसाहेब हातात माईक घेतात आणि म्हणतात, ‘कल आज और कल में ये दो कौन है पता नहीं, लेकिन वो ‘आज’ मै हूं !’ 

 

इस्त्री केलेल्या म्हातारपणाची इस्त्री कधीच मोडत नाही, ती अशी !

Thursday, 5 October 2023

सकारात्मक विचारांचे सामर्थ्य*

 *सकारात्मक विचारांचे सामर्थ्य*

*मनासारखा नवरा नाही मिळाला. करायचा म्हणून संसार करते, जगण्यात काही मजाच नाही सर, खूप नैराश्य येते, रोजचीच भांडणं, हेवे-दावे-तूतू मैं-मैं जीवन नकोसे वाटतंय, झोप येत नाही, जेवण जात नाही अस उदास व रडक्या आवाजत रडगाणं गाणार्‍या महिलेला पाहून वाटलं. त्या स्त्रीला कसा का होईना – नवरा बरोबर आहे. ज्यांच्या आयुष्यात पतीच नाही त्या बाईने काय करायचे? त्याच वेळी एक गाणं आठवलं.*


*‘‘चाँद मिलता नही – सबाके संसार मे ।है दिया ही बहोत रोशनी के लिए.’’*


*खरोखरच मित्रांनो आपलं संपूर्ण आयुष्य हे आपण कसा विचार करतो यावर अवलंबून आहे. मनात दररोज (24 तासांत) 60 हजार विचार येतात. यातील 60 ते 70% विचार हे नकारात्मक असतात. दर 15 ते 20 सेकंदाला नवीन विचार हे चक्र अव्हयातपणे चालू असतं.*


*ज्यावेळेस आपण नकारात्मक विचार करतो त्यावेळेस विश्‍वात जेवढी नकारात्मक तरंग आहेत त्याच्याशी आपण जोडले जाऊन नकारात्मक विचारांची गर्दी आपल्या भोवती उरते व उदासी – भय – यातून नैराश्याकडे वाटचाल सुरू होते. रेडिओ किंवा वाहिन्या ज्या ब्रँडवर आपण लावतो तेच प्रक्षेपण लगेच चालू होते. म्हणून नकारात्मक विचारांना – सकारात्मक करणे गरजेचे असते.*


*सकारात्मक विचार आपली शक्ती, आत्मविश्‍वास, मनोबल वाढवतात. नकारात्मक विचारांना – सकारात्मक करणे म्हणजे मनाचेच – मनाशी युध्द करणे होय. यालाच तुकाराम महाराज म्हणतात. ‘‘रात्रं दिनं आम्हां युदधाचा प्रसंग’’!*


*थॉमस् अल्वा एडिसनने 999 प्रयोग केले – हजाराव्या प्रयोगाच्या वेळेला विजेचा दिवा लागला. थॉमसला ज्यावेळेस पत्रकारांनी मुलाखतीत विचारलं. – थॉमस 999 प्रमाणे फसले याबाबत तुला काय वाटले ?*


*थॉमस म्हणाला – 999 प्रयोग फसले असे म्हणू नका. 999 वेळा मी हे सिध्द केलं, या मार्गाने विजेचा दिवा लागू शकत नाही.*


*नेपोलियन समुद्र किनार्‍यावर सैन्यासमोर जहाजातून उतरताना पाय चिखलावर घसरून छातीवर आडवा पडला, छाती चिखलाने माखली. तेव्हा अंधश्रध्दाळू सैनिकांना वाटलं. आपला सेनापती आडवा झाला म्हणजे आज आपला पराभव होणार, आपली मुंडकी उडणार – सैनिक भयभत झाले. नेपोलियनने ही बाब हेरली. तो उठताना छातीत झटकत म्हणाला, ‘मित्रांनो आजचे युध्द आपणच जिंकणार, जिथे जिथे आपण जाऊ तेथे – तेथे आपला विजय होणार’ कारण आल्या आल्या या भूमीने मला अलिंगन दिले आहे – मी तुझी आहे, मी तुझी आहे….*

*मित्रांनो सैनिकांचे मनोबल वाढले व सगळीकडे मोठी विजयश्री त्यांनी खेचून आणली. हे घडलं सकारात्मक दृष्टीकोनामुळे.*

   ,🙏 *धन्यवाद* 🙏,

Monday, 18 September 2023

वाचन, पाहणं, समजणं, आणि त्या प्रकारे वागणे या

 वाचन, पाहणं, समजणं, आणि त्या प्रकारे वागणे या गोष्टीत खूप फरक असतो जे वाचले ते सर्वच समजत नसते, जे पाहिले ते सर्वच लक्षात येत नसते, आणि जे समजले ते दरवेळेस बरोबरच असते असेही होत नसते व या सर्व गोष्टी नीट आल्यावर आपली वागणूक योग्य होत असते त्यामुळे याच गोष्टींचा जीवनात नीट ताळमेळ लावता आला की जीवन सुखकर होत असते आणि याच गोष्टींमध्ये फरक झाला तर जीवन जगणं मुश्किल होत असते त्यामुळे जे वाचलंय ते सर्वच समजत असते, असा विश्वास ठेवू नका, जे पाहिले ते पूर्ण सत्य आहे असेही जीवनात समजत जाऊ नका, कारण दिसणं आणि असणं यातही फरक होत असतो म्हणूनच माणूस फसवणुकीची शिकार होत असतो व सर्वच गोष्टी समजल्या असे समजून जर वागताल तर अशा व्यक्तीला काहीच समजत नाही असेच मानावं लागतं कारण समज कोणत्याही गोष्टीची सहजासहजी येत नसते त्यातही खूप अभ्यास करावा लागतो व अभ्यास करूनही सर्व गोष्टी समजतात असेही होणं शक्य नसतं ,आणि ते आचरणात आणणेही फार अवघड असतं ,

        🙏🌹

Friday, 25 August 2023

चांदोबा चांदोबा भागळास का, इस्त्रो chya याणातून येशील का

 🧡🌕🤍


आज सारा देश शांतपणे समाधानाने झोपणार आहे. मुलीच्या लग्नात तिची पाठवणी केल्यावर दिवसभराच्या शिणवट्यातून थकलेला बाप जसा कृतार्थ भावनेतून झोपतो किंवा इंडिया - पाकिस्तानच्या सामन्यात त्यांना हरवल्यावर जल्लोष करून भागलेले जीव जसे निवांत पहुडतात तशी झोप आज लागणार आहे..


का? का वाटत असावं असं.? अब्जाधीश व्यावसायिकांपासून खेड्यापाड्यात राहणाऱ्या एखाद्या म्हाताऱ्याला सुद्धा चांद्रयान ३ च लँडिंग बघावस वाटलं अस काय होत त्यात.??

ऑर्बिटर, रोव्हर, लँडर ह्यातला फरक पण न कळणारे ह्या यशासाठी देव पाण्यात घालून बसले होते..!! का.?


कारण स्वातंत्र्य मिळाल्याच्या दिवसापासून ह्या देशाने केवळ आणि केवळ संघर्ष पाहिला आहे. स्वातंत्र्य मिळालं त्या आधी इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये विन्स्टन चर्चिल म्हणाला होता की "ह्या अर्धशिक्षित, गरीब..लोकांना स्वातंत्र्य दिले तर काही वर्षातच अराजक निर्माण होईल आणि हा देश गुंड मवाल्यांच्या ताब्यात जाऊन साऱ्यांची दुर्दशा होईल." 


चर्चिल चुकीचा नव्हता..! फुटीरतावादी संस्थांनांचे विलीनीकरण, सर्वांना एका धाग्यात बांधू शकेल अशा संविधानाची निर्मिती, फाळणीतल्या विस्थापितांचे पुनर्वसन, भाषावार प्रांतरचना....ह्या एकेका प्रश्नाची व्याप्ती इतकी होती की देशाच्या पहिल्या काही पिढ्या त्यातच खर्ची पडल्या


फाळणीमुळे सुपीक प्रदेश पाकिस्तानात गेला होता, तर दुसऱ्या महायुध्दात जनता इतकी भरडली गेली होती की सगळी अर्थव्यवस्थाच जेरीस आली होती. त्यात अमेरिका - रशियाच्या शीतयुद्धात कोण्या एकाची बाजू घेतली असती तर स्वावलंबी राष्ट्र बनण्याच्या स्वप्नांना तिथेच सुरुंग लागून देश महासत्तांचे हातचे बाहुले झाला असता त्यामुळे देशाने अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला.


तेव्हा संपूर्ण जगासाठी भारत एक चेष्टेचा विषय होता. 

१९६२ च्या दुष्काळात अमेरिकेकडे गहू मागितला तर जनावरांना खायला घातला जाईल असा नित्कृष्ट दर्जाचा गहू त्यांनी पाठवून भुकेल्या भारतीयांची चेष्टा केली होती. 

चीनसोबत झालेल्या युद्धात पुरेशा शस्त्र - साधनाअभावी कडाक्याच्या थंडीत भारतीय सैन्य धारातीर्थी पडल होत. अवकाश मोहीम काढायची तरी रशियाची मदत घ्यावी लागे. कित्येक वर्षे ऑलिंपिकमध्ये पदकांचा दुष्काळ होता. मुठभर ७ - ८ देश जो क्रिकेटचा खेळ खेळतात त्यात विश्वविजेते म्हणवून घेताना आपल्यालाच कुठेतरी पटत नव्हत. कारगिलच्या युद्धात बोफोर्स तोफा ३ - ३ दिवस खोळंबून होत्या कारण देशाची स्वत:ची GPS सिस्टीम नव्हती आणि जी होती ती अमेरिकेच्या नियंत्रणाखाली...!!!


पण ह्या देशाच्या मातीत एक गुण आहे. कित्येक संकटे आली तरी पुन्हा शून्यातून उभ रहायचं. देश लढत राहिला. 

ज्या देशात एखाद्या राज्याला त्याच्या शेजारच्या राज्याची भाषा समजत नाही त्या देशात दोघांना एकत्र ठेवणार एक आदर्श संविधान लिहिलं गेलं. जिथे गहू मागायची वेळ आली होती तिथे हरित क्रांती होऊन देश गहू निर्यात करू लागला. शेजारच शत्रूराष्ट्र आम्हाला कमकुवत समजत असताना त्याला ९०००० सैन्यासह शरणागती पत्करायला लावली. 

पाश्चिमात्य देशांनी सुपर कॉम्प्युटर द्यायला नकार दिला तर स्वतः आमच्या तंत्रज्ञांनी परम कॉम्प्युटर घडवला. 


आणि आता ज्या मित्रराष्ट्राची अंतराळ मोहीम अपयशी होताना दिसली होती त्याच्याच समोर आपण अनुभव कमी असताना यशस्वी होताना दिसत आहोत हे यश खूप बोलके आहे. इंटरस्टेलर सारख्या साय - फाय सिनेमाच्या बजेटपेक्षा कमी बजेट मध्ये ही मोहीम आखण्यात आली होती.


चार वर्षांपूर्वी डॉ.सिवन रडले तेव्हा सगळा देश हळहळला होता. कारण त्यांच्या अश्रुंच्या मागे मोठा इतिहास आहे.

आज उदयोन्मुख महासत्ता असताना सुद्धा हा खर्च वारंवार परवडणारा नाही. त्यामुळे अपयश म्हणजे काय ह्याचा अर्थ त्यांना माहीत होता. त्यांचं यश - अपयश प्रत्येकाला आपलस वाटल कारण फक्त पैसाच नाही तर आपल्या गेल्या कित्येक पिढ्या हा दिवस बघायला खर्ची पडल्या आहेत ह्याची जाणीव सगळ्यांना आहे. शेकडो वर्षांच्या इतिहासात प्रथमच पृथ्वीची क्षितिजे पार करत एका दुसऱ्या भौगोलिक रचनेवर भारताची मोहोर उमटली जात आहे. हा प्रसंगच अभूतपूर्व आहे.


आज इस्रोचा तो प्रवास आठवतोय. 

दुसरी कोणतीच सोय नसल्याने सायकल, बैलगाडी वर लादलेले स्पेअर पार्टस, एका चर्चच्या आवारात सुरू केलेलं प्रक्षेपण केंद्र, बिशपच्या घरातच मांडलेल वर्कशॉप, हे घडवण्यासाठी परदेशातील मोठ्या पगाराच्या नोकऱ्या नाकारून भारतातच थांबलेले वेडे देशभक्त संशोधक, विन्स्टन चर्चिलच भाषण, पाश्चिमात्य कार्टूनिस्टनी इस्रोची उडवलेली खिल्ली, चांद्रयान २ च्या वेळेस पाकिस्तानी मंत्र्यांनी केलेले उपहासात्मक ट्विट........सगळ डोळ्यासमोर तरळल आहे.!!


आज झोपी जाताना रात्री दूर त्या चंद्राकडे पाहताना विलक्षण समाधान वाटत आहे. प्रज्ञान रोव्हर आता तिथे कामाला लागला असेल....आणि काळाच्या पटलावर कधीही पुसली जाणार नाही अशी भारताची मोहोर तिथे उमटली जाणार आहे..!!! जय हो इस्रो..!! 🇮🇳💐


-- Saurabh Ratnaparkhi

Monday, 24 July 2023

सन फ्लॉवर थिअरी..*🌻

 🌞 *सन फ्लॉवर थिअरी..*🌻


 *जसा जसा सूर्य पुढे पुढे सरकतो तसे हे सूर्य फुलं आपले तोंड त्या दिशेला करीत असतात. म्हणजेच सुर्य प्रकाश समोरून ग्रहण करीत असतात. हे आपल्या सर्वांना माहिती आहेच. पण याबाबतीतील एक रहस्य कदाचित आपणास माहिती नसावे. ढगाळ आणि पावसाळी वातावरणात जेव्हा सूर्य संपूर्ण झाकला जातो त्यावेळी काय घडते? तुम्हाला वाटेल की ती फुलं मिटत असतील किंवा जमिनीकडे तोंड करीत असतील, नाही कां?*


*नाही... तर काय घडते त्यावेळी?ही फुले खाली किंवा वरती नाहीवळत तर ती वळतात समोरासमोर एकमेकांना आपली साठवलेली ऊर्जा देण्यासाठी, इतरांनाही जगविण्यासाठी !!*


*निसर्गाचं परिपूर्ण तेच वरदान खरंच आश्चर्यकारक आहे!! माणसाने ही निसर्गाची प्रतिक्रिया आपल्या जीवनात आणणे आवश्यक आहे. समाजात अनेक लोक काळजीने, चिंतेने, परिस्थितीने ग्रासलेले असतात. तेव्हा ही सूर्यफूल थिअरी उपयोगात आणली पाहिजे. जसे एकमेकांना मदत करणे आणि ऊर्जा प्रदान करणे, मनोबल वाढविणे !*


*तर सर्वांना सदिच्छा देऊ या की आपणही सूर्य फुलासारखे वागूया, संकटाच्या, निराशेच्या ढगाळ वातावरणात एकमेकांना साथ देऊ या, आपल्या चांगुलपणाची साक्ष देऊ या !*🤝


🌞🌻🌼🌞🌻🌼🌻🌞

Monday, 17 July 2023

जगायचं कुणासाठी...?*

 *जगायचं कुणासाठी...?*

(अंतर्मुख करणारा लेख, वाचाच) 


माणूस जन्माला येतो, लहानाचा मोठा होतो. पुढे सुख दुःखाची अनेक वादळे झेलत आयुष्य जगतो. पण.. आयुष्य का जगतो? कशासाठी जगतो? आणि कुणासाठी जगतो? याची मात्र काहीच कल्पना नसते. पोटाची खळगी भरण्यासाठी आयुष्यभर काबाडकष्ट करतो. पैसा मिळवण्यासाठी कुठेतरी नोकरी करतो, लहान-सहान कामे करतो, अंगमेहनतिचीही कामे करतो. पूर्वी 80/90 वर्षांचे आयुष्य जगायचा, आता 60/70 वर्षे जगतो आणि मरून जातो. मेल्यानंतर कुटुंबीय, नातेवाईक चार दिवस रडतात आणि विसरून जातात. मेल्यानंतर पृथ्वीतलावरचं आपलं अस्तित्व मात्र कायमचंच संपुष्टात येतं...आपण कितीही चांगले असलो तरी मेल्यानंतर आपली आठवण ही फक्त 10/15 दिवसांपुरतीच असते... कारण आपण जगलेलो असतो ते केवळ आपल्या कुटुंबापुरतंच. मी, माझं कुटुंब एवढंच जग असतं आपलं.. 


 *सुंदर असा लेख आहे.सर्वांनी आवश्य* *वाचावा धन्यवाद* . मग...जगावं तरी कुणासाठी? ..


तर...जगावं तर ते समाजासाठी... तुम्ही जगाच्या कोणत्या समस्या सोडवता? तुम्ही काय उभारता ? तुम्ही कुणाच्या तरी कामी येता का? यालाच तुमच करियर म्हणतात. तर तुम्ही स्वतःच्या पलीकडे जाऊन जेव्हा विचार करता त्याला शिक्षण असं म्हणतात... करियर म्हणजे केवळ नोकरी मिळवणं किंवा व्यवसायात प्रगती करणं एवढाच संकुचित विचार नसावा... समाजाचा विचार करून जगणं म्हणजेच आयुष्य होय... 


*खूप पैसा, गाडी, बंगला, दागदागिने आहेत म्हणून एखादा माणूस श्रीमंत असतो असं मुळीच नाही. चांगल्या स्वभावाचा, चांगल्या विचारांचा माणूस हाच खरा सर्वात श्रीमंत असतो. पैसा, गाडी, बंगला ही तर केवळ क्षणिक व भौतिक सुखाची साधने आहेत... यातील एकही वस्तू तुम्ही मेल्यानंतर तुमच्या सोबत घेऊन जाऊ शकत नाहीत. सोबत नेता ते तुमचं कर्म, तुमच्याप्रति असलेली समाजाची आपुलकी, आणि वर्षानुवर्षे काढली जाणारी तुमची आठवण हिच आयुष्यभराची कमाई असते.*. 


आजवर पैशाने खूप श्रीमंत असणाऱ्या एखाद्या व्यक्तीची आपण आठवण काढतो असं मला तरी वाटत नाही तुम्ही पैसा कमवा आजच्या स्थितीत ती एक गरज आहे परंतु लोकांना फसवून मिळालेला पैसा कधीच चांगल्या कामासाठी उपयोगी पडत नाही ... पण समाजासाठी झटणारे दुसऱ्याच विचार करणारे साधु संत आणि अनेक थोर समाजसेवक आजही आपल्या स्मरणात आहेत. कारण ते जगले होते समाजासाठी लोकांसाठी . त्यांनी समाजाला काहीतरी दिलं म्हणूनच आजवर त्यांच्या आठवणी जिवंत आहेत. उदाहरण घ्यायचच झाल तर संत गाडगेबाबा... काय होतं त्यांच्याकडे... *फक्त हातात एक खराटा, डोक्यावर फुटलेल्या मडक्याच खापर आणि अंगावर फाटका सदरा...पैश्याचा तर विषयच नव्हता...चलनाचं एक नाणंसुद्धा खिशात नसायचं*. गाव झाडत फिरायचं आणि एखाद्याने दिलेला भाकर तुकडा खाऊन आयुष्य जगायचं. *पण त्यांनी जगाला अनमोल शिकवण दिली ती स्वच्छतेची आणि अंधश्रद्धा निर्मूलनाची. याच विचारांमुळे आज ते अजरामर झाले.*


आपणही समाजात असं काही करतो का? समाजाला आपण काही देणं लागतो का 

 का समाजाकडून काही घेणं लागतो? (आपल्याला कसं मिळेल ही प्रवृत्ती आज समाजात बघायला मिळते) समाजाच भलं करायचं की वाईट हे जर आपल्याला समजलं नाही तर माणूस म्हणून का जगतो आपण ? भले नसेल आपली महती साधुसंतांएवढी कि लोक आपल्याला वर्षानुवर्षे लक्षात ठेवतील. पण निदान एक पिढी तरी लक्षात ठेवेल एवढं कर्तुत्ववान व्हावं प्रत्येकाने.

ना की मढ्याच्या टाळू वरील लोणी खाणारे व्हावे 


*एकमेकांचा राग, द्वेष करत आयुष्य घालवण्यापेक्षा चांगलं रहायला शिका.* 

ज्या कुटुंबासाठी आज जगतोय आपण, ज्या मुलांना लहानाचं मोठं करतोय...तीच मुलं तुम्हाला म्हातारपणात सांभाळतीलच याची कुठलीही शाश्वती नाही... म्हातारे झाल्यावर आई-बाप काहीच काम करत नाहीत म्हणून त्यांना एखाद्या वृद्धाश्रमात नेवून ठेवलं जातं...


बालपणासारखंच तुमचं म्हातारपणही जाईल असंही नाही. बालपणी लाड होतात तर म्हातारपणी हाल-अपेष्टाही सहन कराव्या लागतात. ज्या मुलांसाठी जगलो तीच मुले एका क्षणात परके करून जातील... या सगळ्यानंतर जीवनाच्या शेवटच्या क्षणी प्रश्न पडतो कि आपण आयुष्यभर जगलो ते कुणासाठी?....इथे प्रत्येकाला चुकीच्या कर्मlचं फळ इथेच भोगाव लागत हे शाश्वत सत्य आहे 


*समाजासाठी जगा...*

*दान-धर्म करा, योग प्राणायम करा,ध्यान धारणा करा,भुकेल्या माणसांना अन्न द्या. आनंदात जगून घ्या... फिरावंस वाटलं तर भरपूर फिरून घ्या. म्हातारपणी फिरावंस वाटल तरी तुमच शरीर मात्र साथ देणार नाही म्हणून जोपर्यंत शरीर धडधाकट आहे तोपर्यंतच सर्व फिरून पाहून घ्या. येताना एकटे असलो तरी जाताना मात्र सर्वांचे होऊन जाण्यातच खरी मजा आहे...*🙏

चातुर्मास सुरू झाला

 चातुर्मास सुरू झाला चातुर्मासात सृष्टी चालक श्री विष्णू निद्रावस्थेत जातात मग  ह्या सृष्टीचा कार्यभार चार महिने कोणकोणत्या देवता चालवतात पहा 👆👆


Thursday, 8 June 2023

✊कां कुणास ठाऊक....* कांही कळलंच नाही..

 *✊कां कुणास ठाऊक....* 

*🤞कांही कळलंच नाही....*   

👍 *मन मात्र म्हणतंय तरुण आहे मी....🤔* 



*कसा संपला ०६ पासून ६० वयापर्यंतचा हा प्रवास,*

*कांही कळलंच नाही.*



*काय मिळवलं, काय कमावलं,*

*काय गमावलं,*

*कांही कळलंच नाही.*


*संपलं बालपण,*

*गेलं तारुण्य,*

*केव्हा आलं ज्येष्ठत्व,*

*कांही कळलंच नाही.*



*काल मुलगा होतो,* 

*केव्हा बाप आणि नंतर सासरा झालो,* 

*कांही कळलंच नाही.*


*केव्हा 'दादा' चा बाबा*

*नंतर 'बाबा' चा*

*'आबा' होऊन गेलो,*

*कांही कळलंच नाही.*


*कोणी म्हणतं साठी बुद्धी नाठी,*

*कोणी म्हणतं हाती आली काठी,*

*काय खरं आहे,* 

*कांही कळलंच नाही.*



*पहिले आई बापाचं चाललं,*

*मग बायकोचं चाललं,*

*मग चाललं मुलांचं,*

 *मग चाललं सुनेचं,* 

*माझं कधी चाललं*, 

*कांही कळलंच नाही*



*बायको म्हणते,* 

*आता तरी समजून घ्या* , 

*काय समजू,*

*काय नको समजू,* 

*मग इतकी वर्ष समजुतीने*

*कोणा बरोबर घेतली*

*कां कुणास ठाऊक*

*कांही कळलंच नाही.*

        


*मन म्हणतंय तरुण आहे मी,*

*वय म्हणतंय वेडा आहे मी,*

*या साऱ्या धडपडीत केव्हा* 

*गुडघे झिजून गेले,* 

*कांही कळलंच नाही.*



*झडून गेले केस,* 

*लोंबू लागले गाल,*

*लागला चष्मा,* 

*केव्हा बदलला हा चेहरा* 

*कांही कळलंच नाही.*



*काळ बदलला,*

*मी बदललो*

*बदलली मित्र-मंडळीही*

*किती निघून गेले,* 

*किती राहिले मित्र,*

*कांही कळलंच नाही.*



*कालपर्यंत मौजमस्ती*

*करीत होतो मित्रांसोबत,*

*केव्हा सीनियर सिटिझनचा* 

*शिक्का लागून गेला,* 

*कांही कळलंच नाही.*



*सून, जावई, नातू, पणतू,*

*आनंदीआनंद झाला,* 

*केव्हा हासलं उदास हे*

*जीवन,*

*कांही कळलंच नाही.*




*भरभरून जगून घे जीवा*

*मग नको म्हणूस की,*


*"मला कांही कळलंच नाही.*


*कवी-ना.धो.महानोर*

Tuesday, 6 June 2023

शेवटची सुट्टी'* last holiday

 *'शेवटची सुट्टी'*


असाच एक _English picture_ बघितलेला...


*'Last Holiday'*


'आयुष्याची शेवटची सुट्टी' जरा उशिरा लावलेला पण तरीही थोड्या वेळाने कथानक लक्षात यायला लागलं... 


त्यातली नायिका ही सर्वार्थाने सर्वसामान्य असणारी तरूणी. त्यामुळे अर्थातच आयुष्यही सर्वसाधारणच. मात्र एक दिवस तिला अचानक, असाध्य रोग असल्याचं निदान होतं. 


मग ती ठरवते की आपण नोकरी सोडून, अजून पर्यंत जी _'सुट्टी घेणं'_ परवडत नव्हतं, त्या _'मोठ्ठ्या सुट्टी'_ वर जायचं आणि शेवटच्या पै पर्यंत सगळे पैसे उधळून टाकायचे. 


ती उंची पोषाख खरेदी करते आणि एका पंचतारांकित हाॅटेल मध्ये... आपण श्रीमंत असल्याची बतावणी करत, उच्चभ्रू वर्तुळात वावरते. 


तिथे तिच्या नशिबाचे फासे पलटतात. जुगारात शंभर हजार डाॅलर्स जिंकते. आता बतावणी करायची गरज नाही. लक्ष्मी खरंच प्रसन्न झालेली असते. तिला आनंद तर होतो...पण ती देवाला विचारते....


_*"why now...?* आयुष्य संपताना का एवढा मेहेरबान झालास?"_


पण आता तिला कशाचच सोयर सुतक नसतं. तसंच तिला आता _'आणखी काही'_ गमावण्याचीही भिती नसते. म्हणून ती उरलेलं आयुष्य खरेपणाने जगायचं ठरवते. समाजात वावरताना लागणारा _'दांभिक सभ्यतेचा'_ बुरखा फाडून, स्वतःशी आणि इतरांशी निव्वळ प्रामाणिक रहाते... वागतेे... बोलते.


आणि तिला जाणवतं... 


*आतापर्यंत, आयुष्य गृहीत धरताना, आपण आयुष्य खऱ्या अर्थाने जगलोच नाही. केवळ 'भविष्य' आणि 'लोकं काय म्हणतील'....याची चिंता करण्यात हे सुंदर आयुष्य फुकट घालवलं."*


*_"I have wasted too much of time on assumptions.....now I have time only for reality!"_* 


राहिलेलं दोन आठवड्यांच आयुष्य सच्चेपणानं जगायला सुरवात करते. तिच्या _departmental store owner_ लाही खरी खोटी सुनावते... त्याच्या चुकीच्या वागण्याची जाणीव करून देते.


आणि अचानक तिला कळतं की तिचे reports चुकीचे आहेत... तिला कसलाही आजार नाही... ती एवढ्यात मरणार नाही. तिच्या आनंदाला पारावार रहात नाही. पण या last holiday नं शिकवलेला धडा, ती कधीच विसरत नाही. तिला तिची नोकरी आणि प्रियकर दोन्ही परत मिळतात... 


फिल्मी भाग सोडला, तर नायिकेच्या या आयुष्याचा प्रवास खरंच विचार करायला लावणारा होता. 


आपणही... आजचा/ आत्ताचा क्षण कधी भरभरून जगतंच नाही... 


मनात कायम उद्याची चिंता! काही तरी अशाश्वत मिळवण्या साठी... कायम हातचं सोडून पळत्या पाठी, जीवाच्या आकांताने पळत रहातो...


इतरांपेक्षा मागे पडू नये म्हणून मनाविरुद्ध जगाच्या् शर्यतीत सहभागी होतो. 


सगळा आनंद/सगळी मजा, एखाद्या 'सुट्टीत' उपभोगण्यासाठी, शिलकीत टाकत जातो....


आणि हे सगळं व्यर्थ आहे... जे खरच हवं होतं... आनंद/ समाधान... हे या कशात नव्हतंच... हेे कळायच्या आतच... *'शेवटची सुट्टी लागते'.* 


शिलकीतली _'पुंजी'_ तशीच राहून जाते... न वापरलेली... कोरीच्या कोरी... पण आता निरूपयोगी ! 


या *'शेवटच्या सुट्टी'* पर्यंत वाट न पाहता प्रत्येक क्षण , त्याच क्षणात, चिंता व भयमुक्त जगून घेतला तर? 


तर प्रत्येक क्षण त्या *'सुट्टी'* इतकाच आनंद देईल.

🌲🪴🌿🍁🍁🍀

Featured post

Lakshvedhi