वाचन, पाहणं, समजणं, आणि त्या प्रकारे वागणे या गोष्टीत खूप फरक असतो जे वाचले ते सर्वच समजत नसते, जे पाहिले ते सर्वच लक्षात येत नसते, आणि जे समजले ते दरवेळेस बरोबरच असते असेही होत नसते व या सर्व गोष्टी नीट आल्यावर आपली वागणूक योग्य होत असते त्यामुळे याच गोष्टींचा जीवनात नीट ताळमेळ लावता आला की जीवन सुखकर होत असते आणि याच गोष्टींमध्ये फरक झाला तर जीवन जगणं मुश्किल होत असते त्यामुळे जे वाचलंय ते सर्वच समजत असते, असा विश्वास ठेवू नका, जे पाहिले ते पूर्ण सत्य आहे असेही जीवनात समजत जाऊ नका, कारण दिसणं आणि असणं यातही फरक होत असतो म्हणूनच माणूस फसवणुकीची शिकार होत असतो व सर्वच गोष्टी समजल्या असे समजून जर वागताल तर अशा व्यक्तीला काहीच समजत नाही असेच मानावं लागतं कारण समज कोणत्याही गोष्टीची सहजासहजी येत नसते त्यातही खूप अभ्यास करावा लागतो व अभ्यास करूनही सर्व गोष्टी समजतात असेही होणं शक्य नसतं ,आणि ते आचरणात आणणेही फार अवघड असतं ,
🙏🌹
No comments:
Post a Comment