Showing posts with label . आरोग्य. Show all posts
Showing posts with label . आरोग्य. Show all posts

Sunday, 31 May 2026

टीबीवर योग्य वेळी उपचार केल्यास तो पूर्णपणे

 टीबीवर योग्य वेळी उपचार केल्यास तो पूर्णपणे बरा होऊ शकतो. यासाठी शासनाकडून तपासणी व उपचाराच्या सुविधा मोफत उपलब्ध करून दिल्या जातात, याची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याची आवश्यकता आहे. विकसित भारताचे उद्दिष्ट गाठण्यासाठी देश टीबी मुक्त होणे आवश्यक असून त्या दृष्टीने टीबी मुक्त मुंबईअभियान महत्वाचे आहे. सरकार आणि समाजाने एकत्रित येऊन कार्य केल्यास हमखास यश लाभते असे राज्यपालांनी यावेळी सांगितले.

बृहन्मुंबई आणि आसपासच्या परिसराची लोकसंख्या जवळपास दोन कोटींच्या घरात पोहोचली आ

 बृहन्मुंबई आणि आसपासच्या परिसराची लोकसंख्या जवळपास दोन कोटींच्या घरात पोहोचली आहे. दाट लोकवस्तीमुळे टीबीसारख्या संसर्गजन्य रोगांचा प्रसार होण्याचा धोका अधिक आहे. त्यामुळे लोकभवनच्या पुढाकाराने टीबी मुक्त मुंबईअभियान सुरु करण्यात आले असून अभियानात लोकसहभाग आवश्यक असल्याचे राज्यपालांनी सांगितले. 

मुंबईला टीबीमुक्त करण्यात आपण यशस्वी झालो, तर ते केवळ भारतासाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी उदाहरण ठरेल. त्यामुळे मुंबईची प्रतिमा अधिक चांगली होईल. या अभियानाच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये विद्यापीठे आणि महाविद्यालयांतील विद्यार्थी, रेड क्रॉस सोसायटी, एनसीसी, ‘माय युवा भारतचे स्वयंसेवक, स्काऊट व गाईड, स्वयंसेवी संस्था तसेच विविध सामाजिक संघटनांना सहभागी केले जाणार आहे असे राज्यपालांनी यावेळी सांगितले.

राज्यपालांच्या उपस्थितीत ‘टीबी मुक्त मुंबई’ अभियानाला सुरुवात मुंबईला टीबीमुक्त करण्यासाठी लोकसहभाग आवश्यक

 राज्यपालांच्या उपस्थितीत टीबी मुक्त मुंबई अभियानाला सुरुवात

मुंबईला टीबीमुक्त करण्यासाठी लोकसहभाग आवश्यक

राज्यपाल जिष्णु देव वर्मा

 

मुंबई, दि. 26 :'टीबी मुक्त भारत अभियान' मुंबईच्या कानाकोपऱ्यात पोहचवण्याच्या दृष्टीने बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आयोजित या अभियानाचा शुभारंभ राज्‍यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत सायन येथील लोकमान्‍य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय येथे आज करण्यात आला. राज्यपालाच्या हस्ते राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमात सहभागी स्वयंसेवी संस्थांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला.

लोकभवनच्या पुढाकाराने आयोजित 'टीबी मुक्त मुंबई' मोहिमेच्या उद्घाटनला मुंबईच्‍या महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी, आमदार कॅप्टन तमिल सेल्वन, आमदार डॉ. ज्योती गायकवाड, आमदार सुनील शिंदे, महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य समितीचे अध्यक्ष हरीश भांदिर्गे, शिक्षण समितीच्या अध्यक्ष राजेश्री शिरवाडकर, मार्केट व गार्डन समितीचे उपाध्यक्ष भास्कर शेट्टी, महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त विपीन शर्मा, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, डॉक्टर्स, आशा सेविका आणि महानगरपालिकेचे  अधिकारी उपस्थित होते. यावेळी 'टीबी मुक्त मुंबई' च्या अभियानावर आधारित माहिती पुस्तकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

Thursday, 2 April 2026

शुगरफिट चे सह-संस्थापक शिवतोष कुमार यांनी लाइफस्टाइल आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी डेटा-

 शुगरफिट चे सह-संस्थापक शिवतोष कुमार  यांनी लाइफस्टाइल आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी डेटा-आधारित कृतीशील उपायांची आवश्यकता अधोरेखित केली. त्यांनी सांगितले की, फक्त डेटा गोळा करून उपयोग नाही, तर त्यावर आधारित योग्य जीवनशैली बदल आवश्यक आहेत.

त्वचारोग क्षेत्रातील AI चा वापर स्पष्ट करताना भारतीय

 एआर इंटरनॅशनल च्या संस्थापक डॉ. अलका मेहता  यांनी त्वचारोग क्षेत्रातील AI चा वापर स्पष्ट करताना भारतीय संदर्भातील मजबूत डेटा तयार करण्याची गरज व्यक्त केली. चुकीच्या निदानाचे धोके लक्षात घेता AI चा वापर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करावा, असे त्यांनी नमूद केले.

आयुर्वेदिक वनस्पती आणि घटकांच्या वैज्ञानिक पडताळणीवर भर

 हार्वर्ड मेडिकल स्कूल च्या शस्त्रक्रिया विषयातील व्याख्याता, कॅनोमिक्स इंक च्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) व सह-संस्थापक डॉ लीना प्रधान यांनी आयुर्वेदिक वनस्पती आणि घटकांच्या वैज्ञानिक पडताळणीवर भर दिला. तंत्रज्ञानाच्या साहाय्याने वनस्पतींचा मानवी शरीरावर होणारा परिणाम जनुकीय (gene level) पातळीवर समजून घेणे आणि ग्राहकांना वैज्ञानिक माहिती देणे अत्यंत आवश्यक असे त्या म्हणाल्या.

आरोग्य क्षेत्रातील वाढत्या बाजारपेठेचा आणि AI, वेअरेबल्स व डेटा-आधारित उपाययोजनांचा वेगाने

 हेल्थ इनोव्हेशन एक्स्चेंज चे सह-संस्थापक प्रदीप कक्कतील यांनी आरोग्य क्षेत्रातील वाढत्या बाजारपेठेचा आणि AI, वेअरेबल्स व डेटा-आधारित उपाययोजनांचा वेगाने होत असलेला विकास अधोरेखित केला. शासन खाजगी क्षेत्र, गुंतवणूकदार आणि तज्ज्ञ यांनी एकत्र येऊन दीर्घकालीन भांडवल व शाश्वत मॉडेल तयार करणे गरजेचे आहे. केवळ नफा किंवा युनिकॉर्न होण्यावर लक्ष केंद्रित न करता सर्वसामान्यांसाठी उपयुक्त उपाय विकसित करणे महत्त्वाचे आहे.

          

Monday, 30 March 2026

पल्स 2026 मुळे आरोग्य क्षेत्राला नवी दिशा; परिषदेत 15 सामंजस्य करार, 720 कोटींची गुंतवणूक –

 पल्स 2026 मुळे आरोग्य क्षेत्राला नवी दिशा;

परिषदेत 15 सामंजस्य करार720 कोटींची गुंतवणूक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबईदि.28: विकसित महाराष्ट्र 2047 च्या दिशेने राज्याने आरोग्य क्षेत्रात मोठी झेप घेतली आहेपल्स 2026 परिषदेमुळे आरोग्य सेवावैद्यकीय शिक्षण अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान व संशोधन आणि नवकल्पनांना चालना मिळाल्याची  माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसवैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफवैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी कार्यक्रमाच्या समारोपानंतर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी श्री.फडणवीस यांनी माहिती दिली.

Saturday, 28 March 2026

निवासी टॉवर (डॉक्टर व नर्सेससाठी), १३ मजली कॅन्सर केअर सुविधा, १५ मजली मुख्य रुग्णालय इमारत, १४ मजली आपत्कालीन विभाग, १३ मजली बाह्यरुग्ण विभाग

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कीया प्रकल्पासाठी सुमारे २,५०० कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार असूनयात २५ मजली निवासी टॉवर (डॉक्टर व नर्सेससाठी)१३ मजली कॅन्सर केअर सुविधा१५ मजली मुख्य रुग्णालय इमारत१४ मजली आपत्कालीन विभाग१३ मजली बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) आणि ४० हून अधिक ऑपरेशन थिएटर्सचा समावेश असेल. एमआरआयसीटी स्कॅनसह अत्याधुनिक निदान सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत. भविष्यात आरोग्यसेवेमध्ये तंत्रज्ञानाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असेल आणि या रुग्णालयात आधुनिक तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जाईल.

Friday, 27 March 2026

मोठ्या प्रमाणावर ‘मास ड्रग अ‍ॅडमिनिस्ट्रेशन’ (एमडीए) मोहीम राबवली जात असून, त्यामध्ये महाराष्ट्राचाही

  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेकेंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या माध्यमातून देशातील १२ राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर मास ड्रग अ‍ॅडमिनिस्ट्रेशन’ (एमडीए) मोहीम राबवली जात असूनत्यामध्ये महाराष्ट्राचाही समावेश आहे. या मोहिमेत पात्र नागरिकांना दरवर्षी प्रतिबंधात्मक औषधे दिली जातातज्यामुळे रोगाचा प्रसार रोखण्यास मदत होते. राज्यामध्ये विशेष म्हणजेकाही निवडक जिल्ह्यांमध्ये पारंपरिक दोन औषधांऐवजी ट्रीपल ड्रग थेरपी’ (आयडीए) वापरली जात आहे. ही उपचारपद्धती अधिक प्रभावी मानली जाते आणि कमी कालावधीत रोग नियंत्रणात आणण्यास मदत करते.

महाराष्ट्रातील विदर्भ विभागात हत्तीरोगाचा मोठा प्रादुर्भाव असूनगडचिरोलीभंडाराचंद्रपूर यासारख्या जिल्ह्यांमध्ये विशेष मोहिमा राबवण्यात येत आहेत. राज्यात सुमारे ५५ लाख नागरिकांना या औषधोपचाराचा लाभ देण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

Thursday, 26 March 2026

आयुर्वेद आणि ॲलोपॅथी यांचा समन्वय साधून एकात्मिक आरोग्य व्यवस्था विकसित

 आयुर्वेद आणि ॲलोपॅथी यांचा समन्वय साधून एकात्मिक आरोग्य व्यवस्था विकसित करण्यावर भर देण्यात येणार आहे. फार्मसी क्षेत्रातील नवीन संशोधनडॉक्टरांचे संशोधन पेपर आणि नवकल्पनांचे सादरीकरणही परिषदेत होणार आहे. या माध्यमातून राज्याच्या मेडिकल टूरिझम आणि वेलनेस पर्यटनाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. ही परिषद केवळ चर्चेपुरती मर्यादित न राहता ठोस निर्णयगुंतवणूक करार आणि धोरणात्मक बदल घडवून आणणारे व्यासपीठ ठरेल. त्यामुळे राज्यातील आरोग्य सेवा अधिक आधुनिकपरिणामकारक आणि सर्वसमावेशक होऊन ग्रामीण भागातही दर्जेदार सुविधा उपलब्ध होण्यास मदत होईलअसा विश्वास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी व्यक्त केला.

Saturday, 21 March 2026

Milet राज्यभरातून उत्पादक, प्रक्रियादार, नवउद्योजक सहभागी झाले असून या अभियानाची व्याप्ती वाढविण्याकरिता

 या महोत्सवात राज्यभरातून उत्पादकप्रक्रियादारनवउद्योजक सहभागी झाले असून या अभियानाची व्याप्ती वाढविण्याकरिता पणन मंडळामार्फत आगामी काळात राज्यात पुणेकोल्हापूरनाशिकनागपूरछत्रपती संभाजीनगरअमरावतीलातूर या ठिकाणी मिलेट महोत्सवाचे आयोजन करण्यात येईलअसे मंत्री रावल यांनी यावेळी जाहीर केले.

Wednesday, 18 March 2026

अमरावती जिल्ह्यातील दुर्गम भागातील नागरिकांना वेळेवर उपचार मिळावेत१०२ रुग्णवाहिका

 अमरावती जिल्ह्यातील दुर्गम भागातील नागरिकांना वेळेवर उपचार मिळावेत

-         सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर

 

मुंबई दि.१७ : अमरावती जिल्ह्यातील दुर्गम भागातील नागरिकांना वेळेवर उपचार मिळावेत आणि कोणतीही आरोग्य सुविधा कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे किंवा तांत्रिक कारणास्तव थांबू नयेयासाठी शासन स्तरावर सर्वतोपरी प्रयत्न केले जात असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.

अमरावती जिल्ह्यातील १०२ रुग्णवाहिका सेवेसंदर्भात निर्माण झालेल्या समस्यांवर सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार संजय खोडकेआमदार सुलभा खोडकेआरोग्यसेवा आयुक्त डॉ.कादंबरी बलकवडेआरोग्यसेवा संचालक डॉ. विजय कंदेवाडउपसंचालक ठाणे परिमंडळजिल्हा आरोग्य अधिकारी पालघरशल्यचिकित्सक तसेच आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यातील १०२ रुग्णवाहिका सेवेतील तांत्रिक अडचणी आणि इतर प्रलंबित प्रश्नांचा सविस्तर आढावा घेऊन मंत्री आबिटकर म्हणाले स्पर्श प्रणालीमधील त्रुटीचिखलदरा आणि धारणी येथील इंधन पुरवठ्याबाबतचे प्रश्न तसेच रुग्णवाहिकांच्या उपलब्धतेविषयी निर्णय घेऊ. धारणी आणि चिखलदरा सारख्या दुर्गम भागात आरोग्य सेवा विनाखंड सुरू राहण्यासाठी मानधनाचे प्रलंबित विषय तातडीने निकाली काढण्यात येतील तसेच जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालय आणि स्त्री रुग्णालयातील बालरोगतज्ज्ञ व स्त्रीरोगतज्ज्ञांची रिक्त पदे तातडीने भरण्याबाबत सकारात्मक पावले उचलण्याच्या सूचना संबंधित विभागाला देण्यात आल्या आहेत.

तपोवन कुष्ठरोग संस्थेच्या अहवालाबाबत आणि तेथील सुधारणांबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल तसेच जनसामान्यांच्या आरोग्याशी निगडित हे सर्व प्रश्न प्राधान्याने मार्गी लावूनएक सुदृढ आणि आरोग्यसंपन्न अमरावती घडवण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचा विश्वास यावेळी मंत्री आबिटकर यांनी व्यक्त केला.

Tuesday, 17 March 2026

क्षयरोग निर्मूलनासाठी एआयचा प्रभावी वापर

 या सामंजस्य करारामध्ये पुढील बाबींचा समावेश आहे.

क्षयरोग निर्मूलनासाठी एआयचा प्रभावी वापर

या उपक्रमांतर्गत क्षयरोग रुग्णांमध्ये उपचार सोडून देण्याचा धोकाउपचारातील अडथळे व मृत्यूची शक्यता उपचाराच्या सुरुवातीलाच ओळखण्यासाठी एआय आधारित प्रणाली वापरण्यात येणार आहे. त्यामुळे उच्च जोखमीच्या रुग्णांवर वेळेत लक्ष देऊन योग्य उपचार करता येणार आहेत.

‘Cough Against TB’ या एआय आधारित अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून खोकल्याच्या आवाजाचे विश्लेषण करून क्षयरोगाची प्राथमिक ओळख आरोग्य संस्थांमध्ये जलदगतीने करता येणार आहे.

याशिवायउपगाव पातळीवर (५०० मी. × ५०० मी.) क्षयरोगाचा धोका दर्शविणारे व्हल्नरेबिलिटी मॅपिंग तयार करण्यात येणार असूनलोकसंख्या घनताआरोग्य सुविधाप्रदूषणकुपोषण यांसारख्या घटकांचा अभ्यास करून सक्रिय रुग्ण शोध (ACF) मोहिमा अधिक परिणामकारक रितीने राबविता येणार आहेत.

Monday, 16 March 2026

मुंबई महानगर परिसरातील नामांकित खासगी रुग्णालयांनी एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेत सहभाग घ्यावा :

 मुंबई महानगर परिसरातील नामांकित खासगी रुग्णालयांनी एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेत सहभाग घ्यावा :

·         सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांचे आवाहन

 

मुंबई दि.13 : मुंबई महानगर परिसरातील नामांकित खासगी रुग्णालयांनी राज्य शासनाच्या एकत्रित आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत अधिक सक्रियपणे सहभागी व्हावेअसे आवाहन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.

मुंबई महानगर परिसरातील नामांकित खासगी रुग्णालयांनी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत सहभाग घ्यावा यासाठी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक पार पडली. यावेळी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकरआमदार ज्ञानेश्वर म्हात्रेआमदार शांताराम मोरेआमदार सुलभा गायकवाडआमदार चंद्रकांत पाटीलआमदार अभिजित पाटीलआमदार मनिषा चौधरीआमदार दिलीप लांडेआमदार संजय उपाध्याय

Thursday, 12 March 2026

रिचर्डसन ॲण्ड क्रूडास कंपनीच्या सुमारे 11 एकर जागेवर अत्याधुनिक कर्करोग संशोधन व उपचार केंद्र उभारण्याच्या

 विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांनी मुंबईतील रिचर्डसन ॲण्ड क्रूडास कंपनीच्या सुमारे 11 एकर जागेवर अत्याधुनिक कर्करोग संशोधन व उपचार केंद्र उभारण्याच्या प्रस्तावाबाबत शासनाने लवकरात लवकर प्रयत्न करावेत असे सांगितले. या संदर्भात राज्य शासन ही जागा प्राप्त करुन घेण्याबाबत केंद्र सरकारच्या अवजड उद्योग विभागाकडे पाठपुरावा करेलअसे मंत्री मुश्रीफ यांनी यावेळी सांगितले.

Thursday, 5 February 2026

वैद्यकीय क्षेत्रामध्ये अनेक स्टार्टअप कार्यरत

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेवैद्यकीय क्षेत्रामध्ये अनेक स्टार्टअप कार्यरत आहेत. अधिकाधिक स्टार्टअपला परिषदेत सहभागी करून घ्यावे. जेणेकरून परिषदेमध्ये या क्षेत्रात होणाऱ्या नवनवीन संशोधनावर आधारित चर्चांमधून कर्करोगासारख्या आजारांवर सहजसोपी आणि परवडणारी उपचार पद्धती विकसित करण्यात स्टार्टअपला मदत होईल.वैद्यकीय क्षेत्रातील जागतिक गुंतवणूकदार या परिषदेत सहभागी होतील याबाबत दक्षता घ्यावीत्यांच्या माध्यमातून राज्यात होत असलेल्या 'बल्क ड्रग पार्कमध्ये गुंतवणूक होईलयासाठी प्रयत्न करावे. परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी संबंधित विभागांनी नोडल अधिकारी नियुक्त करावेत. सबंधित विभागांनी समन्वयाने काम करीत परिषदेच्या आयोजनातून राज्याला वैद्यकीय क्षेत्रात मोठा लाभ मिळवून द्यावाअसे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.

 

पारंपरिक खर्चिक असलेल्या वैद्यकीय उपचाराऐवजी 'वेलनेस' उपचारांकडे नागरिकांचा ओढा

 पारंपरिक खर्चिक असलेल्या वैद्यकीय उपचाराऐवजी 'वेलनेसउपचारांकडे नागरिकांचा ओढा वाढत आहे. 'वेलनेसउपचार पद्धतीत राज्यात मोठ्या प्रमाणावर वाव आहे. त्यामुळे आयुषमधील उपचार पद्धतींना 'वेलनेसकडे वळविण्यात यावेअसे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

मुंबईत 27 व 28 मार्च रोजी वैद्यकीय परिषद 'पल्स' चे आयोजन 'पल्स' परिषदेच्या माध्यमातून वैद्यकीय वेलनेस पर्यटनाचा 'महाराष्ट्र ब्रँड' निर्माण करा

 मुंबईत 27 व 28 मार्च रोजी वैद्यकीय परिषद 'पल्सचे आयोजन

'पल्सपरिषदेच्या माध्यमातून वैद्यकीय वेलनेस पर्यटनाचा 'महाराष्ट्र ब्रँडनिर्माण करा

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबईदि. ५ : वैद्यकीय क्षेत्रात जागतिक स्तरावर महाराष्ट्राला ओळख निर्माण करून देणाऱ्या 'पल्सया वैद्यकीय परिषदेचे आयोजन मुंबईत जिओ वर्ल्ड सेंटरयेथे २७ व २८ मार्च २०२६ रोजी करण्यात येणार आहे. या परिषदेत देशातून आणि जगभरातून वैद्यक क्षेत्रातील २९०० पेक्षा जास्त तज्ज्ञअभ्यासक आणि मान्यवर सहभागी होणार आहेत.

 

'पल्सवैद्यकीय परिषदेचे भव्य दिव्य आयोजन करून परिषदेच्या माध्यमातून 'वेलनेसउपचारांचा  वैद्यकीय पर्यटनातील 'महाराष्ट्र ब्रँडनिर्माण करावाअसे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा निवासस्थानी परिषद आयोजनाच्या आढावा बैठकीत दिले. यावेळी वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ उपस्थित होत्या.

Monday, 26 January 2026

आधुनिक तकनीक के उचित उपयोग से स्वास्थ्य सेवाओं की गुणवत्ता में वृद्धि

 मुख्यमंत्री श्री फडणवीस ने कहा कि आधुनिक तकनीक के उचित उपयोग से स्वास्थ्य सेवाओं की गुणवत्ता में वृद्धि होगीउपचार अधिक सटीक और समय पर मिल सकेगा तथा ग्रामीण और दुर्गम क्षेत्रों के नागरिकों तक स्वास्थ्य सुविधाएँ प्रभावी रूप से पहुँचाई जा सकेंगी। आज के डिजिटल युग में स्वास्थ्य व्यवस्था का डिजिटलीकरण और एआई आधारित समाधान अत्यंत आवश्यक हैंयह उन्होंने स्पष्ट किया।

उन्होंने स्वास्थ्य संस्थानों की स्टार रेटिंगस्वास्थ्य सेवाओं की समीक्षा रिपोर्टस्वास्थ्य हेल्पलाइनस्वास्थ्य कर्मियों का प्रशिक्षण तथा सेवा गुणवत्ता की नियमित समीक्षा जैसे उपक्रमों का उल्लेख किया। इन पहलों से नागरिकों का स्वास्थ्य सेवाओं पर विश्वास और अधिक सुदृढ़ होगाऐसा मुख्यमंत्री ने कहा।

Featured post

Lakshvedhi