सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Monday, 2 October 2023
Monday, 18 September 2023
वाचन, पाहणं, समजणं, आणि त्या प्रकारे वागणे या
वाचन, पाहणं, समजणं, आणि त्या प्रकारे वागणे या गोष्टीत खूप फरक असतो जे वाचले ते सर्वच समजत नसते, जे पाहिले ते सर्वच लक्षात येत नसते, आणि जे समजले ते दरवेळेस बरोबरच असते असेही होत नसते व या सर्व गोष्टी नीट आल्यावर आपली वागणूक योग्य होत असते त्यामुळे याच गोष्टींचा जीवनात नीट ताळमेळ लावता आला की जीवन सुखकर होत असते आणि याच गोष्टींमध्ये फरक झाला तर जीवन जगणं मुश्किल होत असते त्यामुळे जे वाचलंय ते सर्वच समजत असते, असा विश्वास ठेवू नका, जे पाहिले ते पूर्ण सत्य आहे असेही जीवनात समजत जाऊ नका, कारण दिसणं आणि असणं यातही फरक होत असतो म्हणूनच माणूस फसवणुकीची शिकार होत असतो व सर्वच गोष्टी समजल्या असे समजून जर वागताल तर अशा व्यक्तीला काहीच समजत नाही असेच मानावं लागतं कारण समज कोणत्याही गोष्टीची सहजासहजी येत नसते त्यातही खूप अभ्यास करावा लागतो व अभ्यास करूनही सर्व गोष्टी समजतात असेही होणं शक्य नसतं ,आणि ते आचरणात आणणेही फार अवघड असतं ,
🙏🌹
Friday, 25 August 2023
चांदोबा चांदोबा भागळास का, इस्त्रो chya याणातून येशील का
🧡🌕🤍
आज सारा देश शांतपणे समाधानाने झोपणार आहे. मुलीच्या लग्नात तिची पाठवणी केल्यावर दिवसभराच्या शिणवट्यातून थकलेला बाप जसा कृतार्थ भावनेतून झोपतो किंवा इंडिया - पाकिस्तानच्या सामन्यात त्यांना हरवल्यावर जल्लोष करून भागलेले जीव जसे निवांत पहुडतात तशी झोप आज लागणार आहे..
का? का वाटत असावं असं.? अब्जाधीश व्यावसायिकांपासून खेड्यापाड्यात राहणाऱ्या एखाद्या म्हाताऱ्याला सुद्धा चांद्रयान ३ च लँडिंग बघावस वाटलं अस काय होत त्यात.??
ऑर्बिटर, रोव्हर, लँडर ह्यातला फरक पण न कळणारे ह्या यशासाठी देव पाण्यात घालून बसले होते..!! का.?
कारण स्वातंत्र्य मिळाल्याच्या दिवसापासून ह्या देशाने केवळ आणि केवळ संघर्ष पाहिला आहे. स्वातंत्र्य मिळालं त्या आधी इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये विन्स्टन चर्चिल म्हणाला होता की "ह्या अर्धशिक्षित, गरीब..लोकांना स्वातंत्र्य दिले तर काही वर्षातच अराजक निर्माण होईल आणि हा देश गुंड मवाल्यांच्या ताब्यात जाऊन साऱ्यांची दुर्दशा होईल."
चर्चिल चुकीचा नव्हता..! फुटीरतावादी संस्थांनांचे विलीनीकरण, सर्वांना एका धाग्यात बांधू शकेल अशा संविधानाची निर्मिती, फाळणीतल्या विस्थापितांचे पुनर्वसन, भाषावार प्रांतरचना....ह्या एकेका प्रश्नाची व्याप्ती इतकी होती की देशाच्या पहिल्या काही पिढ्या त्यातच खर्ची पडल्या
फाळणीमुळे सुपीक प्रदेश पाकिस्तानात गेला होता, तर दुसऱ्या महायुध्दात जनता इतकी भरडली गेली होती की सगळी अर्थव्यवस्थाच जेरीस आली होती. त्यात अमेरिका - रशियाच्या शीतयुद्धात कोण्या एकाची बाजू घेतली असती तर स्वावलंबी राष्ट्र बनण्याच्या स्वप्नांना तिथेच सुरुंग लागून देश महासत्तांचे हातचे बाहुले झाला असता त्यामुळे देशाने अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला.
तेव्हा संपूर्ण जगासाठी भारत एक चेष्टेचा विषय होता.
१९६२ च्या दुष्काळात अमेरिकेकडे गहू मागितला तर जनावरांना खायला घातला जाईल असा नित्कृष्ट दर्जाचा गहू त्यांनी पाठवून भुकेल्या भारतीयांची चेष्टा केली होती.
चीनसोबत झालेल्या युद्धात पुरेशा शस्त्र - साधनाअभावी कडाक्याच्या थंडीत भारतीय सैन्य धारातीर्थी पडल होत. अवकाश मोहीम काढायची तरी रशियाची मदत घ्यावी लागे. कित्येक वर्षे ऑलिंपिकमध्ये पदकांचा दुष्काळ होता. मुठभर ७ - ८ देश जो क्रिकेटचा खेळ खेळतात त्यात विश्वविजेते म्हणवून घेताना आपल्यालाच कुठेतरी पटत नव्हत. कारगिलच्या युद्धात बोफोर्स तोफा ३ - ३ दिवस खोळंबून होत्या कारण देशाची स्वत:ची GPS सिस्टीम नव्हती आणि जी होती ती अमेरिकेच्या नियंत्रणाखाली...!!!
पण ह्या देशाच्या मातीत एक गुण आहे. कित्येक संकटे आली तरी पुन्हा शून्यातून उभ रहायचं. देश लढत राहिला.
ज्या देशात एखाद्या राज्याला त्याच्या शेजारच्या राज्याची भाषा समजत नाही त्या देशात दोघांना एकत्र ठेवणार एक आदर्श संविधान लिहिलं गेलं. जिथे गहू मागायची वेळ आली होती तिथे हरित क्रांती होऊन देश गहू निर्यात करू लागला. शेजारच शत्रूराष्ट्र आम्हाला कमकुवत समजत असताना त्याला ९०००० सैन्यासह शरणागती पत्करायला लावली.
पाश्चिमात्य देशांनी सुपर कॉम्प्युटर द्यायला नकार दिला तर स्वतः आमच्या तंत्रज्ञांनी परम कॉम्प्युटर घडवला.
आणि आता ज्या मित्रराष्ट्राची अंतराळ मोहीम अपयशी होताना दिसली होती त्याच्याच समोर आपण अनुभव कमी असताना यशस्वी होताना दिसत आहोत हे यश खूप बोलके आहे. इंटरस्टेलर सारख्या साय - फाय सिनेमाच्या बजेटपेक्षा कमी बजेट मध्ये ही मोहीम आखण्यात आली होती.
चार वर्षांपूर्वी डॉ.सिवन रडले तेव्हा सगळा देश हळहळला होता. कारण त्यांच्या अश्रुंच्या मागे मोठा इतिहास आहे.
आज उदयोन्मुख महासत्ता असताना सुद्धा हा खर्च वारंवार परवडणारा नाही. त्यामुळे अपयश म्हणजे काय ह्याचा अर्थ त्यांना माहीत होता. त्यांचं यश - अपयश प्रत्येकाला आपलस वाटल कारण फक्त पैसाच नाही तर आपल्या गेल्या कित्येक पिढ्या हा दिवस बघायला खर्ची पडल्या आहेत ह्याची जाणीव सगळ्यांना आहे. शेकडो वर्षांच्या इतिहासात प्रथमच पृथ्वीची क्षितिजे पार करत एका दुसऱ्या भौगोलिक रचनेवर भारताची मोहोर उमटली जात आहे. हा प्रसंगच अभूतपूर्व आहे.
आज इस्रोचा तो प्रवास आठवतोय.
दुसरी कोणतीच सोय नसल्याने सायकल, बैलगाडी वर लादलेले स्पेअर पार्टस, एका चर्चच्या आवारात सुरू केलेलं प्रक्षेपण केंद्र, बिशपच्या घरातच मांडलेल वर्कशॉप, हे घडवण्यासाठी परदेशातील मोठ्या पगाराच्या नोकऱ्या नाकारून भारतातच थांबलेले वेडे देशभक्त संशोधक, विन्स्टन चर्चिलच भाषण, पाश्चिमात्य कार्टूनिस्टनी इस्रोची उडवलेली खिल्ली, चांद्रयान २ च्या वेळेस पाकिस्तानी मंत्र्यांनी केलेले उपहासात्मक ट्विट........सगळ डोळ्यासमोर तरळल आहे.!!
आज झोपी जाताना रात्री दूर त्या चंद्राकडे पाहताना विलक्षण समाधान वाटत आहे. प्रज्ञान रोव्हर आता तिथे कामाला लागला असेल....आणि काळाच्या पटलावर कधीही पुसली जाणार नाही अशी भारताची मोहोर तिथे उमटली जाणार आहे..!!! जय हो इस्रो..!! 🇮🇳💐
-- Saurabh Ratnaparkhi
Saturday, 22 July 2023
Friday, 21 July 2023
फक्त एक छान सखी हवी 💓
फक्त एक छान सखी हवी 💓
४०/५०चीच स्त्री आता सर्वात तरुण असते.
अनुभवांच्या शिदोरी सकट बोल्डसुद्धा असते
कुरकुरणाऱ्या गुडघ्यांना ती
सहज adjust करते.
मुलांबरोबर लहान होते,
मुलीचीही मैत्रीण होते.
संसारात राहूनही स्वतःची स्पेस जपते.
गाणी, गोष्टी, मूव्ही, नाटक हवे तेव्हा बघते.
४०/५०ची स्त्री सर्वात स्मार्ट म्हणणे काही वावगं ठरणार नाही.
बाहेर जाण्यासाठी आता परवानगी लागत नाही.
लोक काय म्हणतील याची काळजी करत नाही.
साडी आणि सासू आता discussion उरले नाही.
विमानाचे पंख लावून तिला जग फिरायचे असते.
अंगभर दागिन्यांना केव्हाच सुट्टी देते.
डायमंडचं मंगळसूत्र तेवढं दिमाखात मिरवते.
जगायचच राहून गेलेलं ती आता जगत असते.
४०/५०चीच स्त्री आता सर्वात तरुण असते.
देवाला मी आज निवांत पाहीलं आणि लगेच एक फूल वाहिलं
देवाने हसून म्हटलं "मागा, काय जे मनात साठलं."
"देवा मला नको काही, कोऱ्या कागदावर सही घे "
"एक मिनिट, एक मिनिट ... विचारलेच आहेस म्हणून मागतेय.
एक छानशी मैत्रीण दे.
हवे तर अजुन एखादे फुल घे.
दिसायला छान नसली तरी चालेल.
पण बोलायला छान असायला हवी.
डोळे सुंदर नसले तरी चालेल,
पण नजरेतून बोलणारी हवी,
केस लांब नसले तरी चालेल,
पण सोबत लांब चालणारी हवी
माझ्या प्रत्येक दुःखात रडली नाही तरी चालेल,
फक्त माझ्या सुखात थोडे हसणारी हवी.
यातलेही काही कमी असेल तरी चालेल,
फक्त एक छान मैत्रीण हवी.
.. मैत्रीण ..
किती गोड असते हो आपल्या आयुष्यात एक मैत्रीण असणे,
कारण ती मैत्रीण नाही तर आपल्या प्रत्येक सुख दुःखामध्ये आपल्या सोबत असणारी आणि देवाने आपल्याला आधाररुपी दिलेली एक मागणी असते.
ती मैत्रीण नसते तर आपल्यावर निस्वार्थ प्रेम करणारी एक व्यक्ती असते.
४०/५०च्या स्त्रियाचें अगदी नेटकं वर्णन, खरेच पन्नाशी नंतर स्त्रियांना पंख फुटल्याचे जाणवते आहे,
मैत्रिणीबद्दल खुपच छान लिहीले. वाचून अगदी मन भरुन आले.
मैत्रिणीची पण आपल्या आयुष्यात एक वेगळीच भूमिका असते. तिच्या सोबतीने कुठल्याही वयात आयुष्याचा स्वच्छंदपणे आस्वाद घेता येतो.
आपापल्या छान मित्र - मैत्रीणीं साठी पाठवा.😊🙏🌹🌹🌹🌹
Thursday, 6 July 2023
Tuesday, 4 July 2023
❤️ fail hoil बर,काय पण लैच भारी असतात
: बँकेच्या पेन्शन पेमेंट विभागाचा बॉस बेशुद्ध झाला .
तपासल्यावर कळले की
एका पेन्शनधारकाने त्याला विचारले होते- की......
*अधिक महिन्याची पेंशन*
या महिन्याच्या पेन्शनसोबतच मिळणार की वेगळी...?
😃😃😃😂😂😂😂: बांगडी भरतांना त्या ताईला दुकानदाराने बांगड्यांबद्दल सांगितले की ...
एकवेळ आमदार फुटतील;पण आमच्या दुकानातील बांगड्या फुटणार नाहीत...😀😂
Saturday, 24 June 2023
Sunday, 11 June 2023
Sunday, 21 May 2023
घटना
आजोबांनी कष्ट करून विकत घेतलेली, कसलेली, माझ्याच आज्याची शेती माझ्या बापाच्या नावावर करावी म्हणून तलाठी सज्जात गेलो . . .
तलाठ्यानं सांगितलं -
काम करू पण,
देणार किती ?
मला वाटलं शेती आमची,
बाप माझा,
आजा माझा.
मग याला का पैसे द्यायचे ?
तलाठ्याची तक्रार करावी म्हणून पोलिस स्टेशनला गेलो.
पोलीस म्हणाले -
गुन्हा दाखल करू, तपास करू पण . . .
आमच्या चहा पाण्याचं काय ?
मला पुन्हा राग आला.
यांना तर, सरकार म्हणजेच मी पगार देतोय मग पुन्हा हे चिरीमिरी का मागत असतील.
म्हटलं हे आमदारांच्या कानावर टाकू,
आमदार म्हटले . . .
त्याची गडचिरोलीला बदली करू,
त्याला निलंबित करू,
मंत्र्यांना भेटू पण . . .
वजन ठेवल्या शिवाय फाईल पुढं जातच नाही.
मला वाईट वाटलं.
यांना तर मी मतदान केलं होतं.
वाटलं कोर्टात जाऊ . . .
गेलो.
तिथं गेल्यावर कळलं की,
तिथं एक आज-उद्या मरेल अशी म्हतारी आली आहे.
तिच्यावर तरुणपणी अत्याचार झाला होता. त्या मॅटरची तारीख होती.
अजून निकाल लागला नव्हता.
शिवाय निकाल कसा लागेल याची खात्री नव्हती.
म्हटलं हे एखाद्या . . . पत्रकार,
लेखक,
कवीला सांगावं . . .
*मन हलकं करावं !* आपल्या प्रश्नांना ते आवाज देतील.
तिकडे गेलो s s
तर सगळेच म्हणाले,
पेन आमच्या हातात असला तरी,
त्यातली शाई आम्ही विकली आहे.
आम्ही तसं लिहू शकत नाही.
आमचे हात अन . . .
पेन बांधलेले आहेत.
मला याचा प्रचंड राग आला होता.
म्हणून एका साधू कडे गेलो.
वाटलं तेवढीच आत्मशांती मिळेल.
मठावरचे सेवेकरी म्हणाले . . .
*उद्या या !*
सध्या भाऊसाहेब,
P I साहेब,
आमदार साहेब,
पत्रकार साहेब,
लेखक,
कवी आले आहेत.
महाराज त्यांच्यासोबत बिझी आहेत,
नंतर . . .
त्यांच्या सोबत जेवायला बसणार आहेत.
आज ते तुम्हाला टाईम देणार नाहीत.
माझा सगळ्यांवरचा विश्वास उडाला होता.
म्हटलं जनतेच्या दरबारात जाऊ ...!
लोकांसमोर गेलो, लोकांना हे सांगितलं.
लोकं म्हटली हा येडा झालाय् . . . . .
हल्ली काही बरळतोय् !
नंतर कळलं . . .
*लोकं गुलाम झाली आहेत !*
लाचार झाली आहेत !
क्षणभर वाईट वाटलं.
मी करणार तरी काय होतो.
त्यांच्यात सामील व्हावं कि मरावं ?
कि मारावं यांना . . .
😢 😢
*- मी एक मतदार !*
( या देशाचा मालक ? )
पिंजऱ्यातील बाप"*🌹
🌹"पिंजऱ्यातील बाप"*🌹🌿
✍️ प्रत्येक बापाची थोड्याफार फरकाने घरात साधारण हीच परिस्थिती असते.
वाढलेल वय,मानसिक ताण सहन होत नसतानाही त्या आरोपांसाठी सामोरं जावं.
तुंम्ही आमच्यासाठी काय करुन ठेवले?
हा एक सर्वसाधारण आरोप असतोच, आणि तो सगळ्याच बापांच्या विरुध्द केला जातो. काय केलं याची यादी जर एखादा बाप चुकूनमाकून द्यायला लागलाच तर, ”त्यात वेगळं काय केलंत तुंम्ही, ते तर सगळेच बाप करतात” असं टोकलं जातं आणि सगळी सफाई देण्यापूर्वीच संपवलेली असते.
तुंम्ही आंम्हाला प्रोत्साहनच दिलं नाही! असा आणखी एक आरोप असतो. प्रोत्साहन द्यायचं म्हणजे काय करायचं? मुलाने जसा परफॉरमन्स दाखवला असेल त्यानुसार त्याने आपलं करीयर निवडलेलं असतं.
अगदी इंजिनियर जरी झाला तरी मुलगा असा आरोप करतो. त्यावेळी विचारच करत नाही की बापाने इंजिनियरिंगची फी भरताना किती ओढाताण करुन घेतली होती.
तुंम्हाला दूरदृष्टीच नाही!
ज्यावेळी घरं स्वस्त होती, तेंव्हा चार खोल्या आणि कार पार्कींग असलेला ब्लॉक घ्यायला काय हरकत होती, अशा प्रकारचा आणखी एक आरोप असतो. तीन खोल्या घेताना अधिकचे पैसे भरण्यासाठी बापाने काढलेलं कर्ज फेडण्यासाठी आणखी एक पार्टटाईम नोकरी केलेली असते हे मुलगाही विसरतो आणि त्याची आई पण.
माझा एक मित्र आहे. वकिली करतो. वकिली ठीक सुरु आहे. त्याने लग्न केलं त्यावेळी त्याची बायको बी,कॉमच्या शेवटच्या वर्षाला नापास झाली होती. आपल्याला कुठे बायकोला नोकरीला लावायचंय? असं म्हणत त्याने ती पसंत केली. दिसायला चारचौघींसारखीच होती. त्याने लग्नानंतर तिची इच्छा नसतानाही, तिला "बी.कॉम". करायला प्रोत्साहन दिलं.
पुढे ती "एम कॉम" ही झाल्यावर एका कॉलेजात प्राध्यापिका. म्हणून रुजू झाली. तुंम्हाला माहितच आहे प्राध्यापकांना पगार किती आहे तो? तिला भरपूर पगार मिळायला लागला. लग्नानंतर, वीस वर्षांनी तिला जाणवायला लागलं की आपण एक वकील पसंत केला, खरं तर ही चूकच झाली. याच्यापेक्षा चांगलं स्थळ शोधायला हवं होतं. याचं कारण आता तिचं क्षितीज रुंदावलं होतं, हाती भरपूर पगार येत होता. समाजात एक वेगळा स्टेटस् , दर्जा निर्माण झाला होता, राहणीमान उंचावले होते, काॅलेजात व बाहेर मॅडम म्हणून संबोधले जाऊ लागले.
आता ती हा विचार मात्र करत नाही की, तिला शिकायला नवर्यानेच प्रवृत्त केलं, मदत केली, नोकरी मिळण्यासाठी ओळखीचा वापर केला. आज तिलाच आपला नवरा आपल्याला मॅच होत नाही, शोभत नाही, असं वाटायला लागलं. अजूनही दोघे एकत्रच आहेत आणि संसारही सुरु आहे. पण तिने कुठे तरी कुणाकडे तरी चुकून बोललेलं याच्या कानावर आल्यामुळे मात्र हा आतल्या आत खचून मात्र गेला आहे.
मुलगा ज्यावेळी बापावर आरोपपत्र ठेवतो, त्यावेळी अनेक वेळा मुलाची आई आणि बापाची सहचारिणी, बापाविरोधात साक्षिदार बनलेली पाहायला मिळते. ”तो काय चुकीचं बोलतो आहे ?” हे एक वाक्य बापाच्या आयुष्यावर ’नापास’ किंवा ’पराभूत’ असा शिक्का मारायला पुरेसं असतं.
तुंम्ही हे करायला हवं होतं, ते करायला नको होतं अशा अनेक गोष्टींचे अध्याय रोजच वाचले जातात.
विशेषत: बाप निवृत्त झाल्यावर आणि मुलगा कमवायला लागल्यावर अशा आरोपांची संख्या आणि फ्रिक्वेन्सी वाढतीच असते. अनेकांना समजत नाही की, आपण. सेवेत असताना, एक हुशार गुणवंत कर्मचारी, प्रामाणिक, कष्टाळू माणूस अशा उपाध्या मिळवलेले, निवॄत्ती नंतर खरंच आपण इतके कसे मूर्ख बनलो.
जे आपलं कर्तव्य आहे असं समजत होतो आणि जे करण्यासाठी आपण आपल्यावरच अन्याय करत होतो, ते आपले गुन्हे कसे बनले. याचं सगळ्यात महत्वाचं आणि एकमेव कारण म्हणजे आता बापावरचं अवलंबित्व संपलेलं असतं, मुलांचं आणि बायकोचंही. आता तिला, तिचा मुलगा आधार द्यायला सिध्द झालेला असतो. बापाकडे जरी निवृत्ती वेतन असले, थोडीफार शिल्लक असली तरी जर त्यावाचून कुणाचं अडणार नसेल तर बापाची ही अवस्था ठरलेलीच आहे.
आता बापांनी काय करायच तर.... आपण चुकीच्या लोकांसाठी, चुकीच्या कारणांसाठी आपलं आयुष्य वापरलं आहे असा पश्चात्ताप करायचा नाही. हाल सोसताना, कष्ट करताना, त्याग करताना आपल्याला "कर्तव्यपूर्तीचा आनंद" मिळत होता ना, तो आठवायचा.
जग राहाटी अशीच असणार आहे. प्रत्येक 'बापाला आरोपीच्या पिंजर्यात, उभं रहायला लागणारच आहे. आता असे आरोप झाले तर लगेच कबुली जबाब द्यायचा, आणि पुढचा वाद टाळायचा.
मित्रांनो, ज्यांच्यासाठी त्याग केला, कष्ट सोसले त्यांच्याशी वाद घालायचे प्रसंग टाळणे तर आपल्या हाती आहे ना.
एका त्रयस्थ भूमिकेतून या आरोपांकडे पाहायचं आणि बोध घेत पुढचं आयुष्य आपल्याच धुंदीत, मस्तीत व्यतीत करायचं.
सकाळ संध्याकाळ मित्रांसमवेत व्यतीत करायचे, त्यांचेशी समक्ष तर कधी फोनवर गप्पा गोष्टी करायच्या, छोट्या मोठ्या सहलीचा आनंद लुटण्याचा प्रयत्न केला पाहिजे, पुस्तके वाचायची, टीव्ही मोबाईल वर वेळ घालवायचा, आपले छंद जोपासायचे, नातेवाईकांच्या सुख दुःखात सहभागी व्हायचा प्रयत्न करायचा, नोकरीत असताना हे राहून गेले होते. हाच शहाणपणा आहे.
मित्रांनो !!😊
शेवटी आपल्या नजरे समोर एक वाक्य दिसेल असे लिहून ठेवायचे आहे , "चलो,ये भी दिन जायेंगे", "ये तो होना ही था"
माझ्या सर्व मित्रांनो, आपल्याला हे पिंजऱ्यातील जीवन तितकेच आनंदात जगायचं आहे. जमेल मित्रांनो,पहा प्रयत्न करुन !!!
🌹*सामान्य बाप.*🌹🌿🌾🌾
Saturday, 20 May 2023
अमेरिकन करतात आता पौरहित्य
आपण भारतीयांनी आयटी क्षेत्रातील नोकरी हिसकवल्या म्हणून अमेरीकन असा बदला घेत आहेत
Wednesday, 10 May 2023
Sunday, 7 May 2023
Tuesday, 2 May 2023
खऱ्याची दुनिया* राहिली नाही.
तुम्हाला म्हणून सांगतो! *खऱ्याची दुनिया* राहिली नाही. त्यात बहुतेक सर्व जाहिराती या फसव्याच असतात. त्याचं झालं असं की, दोन महिने झालं माझ्याकडे असलेला पांढरा शुभ्र शर्ट मी स्वतःच (चोरून) धूतोय. कारण बायकोकडे जर दिला तर ती आकाश-पाताळ एक करेल .
*'एकाच धुलाईत डाग गायब' असा दावा करणाऱ्या दोन तीन नामांकित कंपन्याचे डिटर्जंट, साबण वापरले. पण काही केल्या शर्टवरचा लिपस्टिक चा डाग जाता जाईना.*
आता बोला कसा विश्वास ठेवायचा .... ---------------👄 😜
Monday, 1 May 2023
१मे कांसाठी
१ *मे* कांना सांभाळून घ्या.
१ *मे* कांची काळजी घ्या.
१ *मे* कांच्या संपर्कात राहा.
१ *मे* कांना मदत करा.
१ *मे* काशी विवाद टाळा
१ *मे* कांना गोड बोला.
१ *मे* कांना उपदेश देने बंद करा.
१ *मे* कांचे विचार समजून घ्या.
१ *मे* कांशी चांगले संवांद करा.
१ *मे* कांत संघर्ष होणारी वक्तव्य टाळा.
१ *मे* कांशी गोडीगुलाबीने वागुया.
१ *मे* कांची आपुलकी ठेवुया.
१ *मे* *महाराष्ट्र दिनाच्या*
*हार्दिक शुभेच्छा*
🚩🙏🏻 🌹🙏🏻🚩
बहू असोत सुंदर संपन्न कीं महा! प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा!
१मे काना भरवा.
Saturday, 8 April 2023
Thursday, 30 March 2023
सुप्रभात
: *शुभ सकाळ*
*आपण गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर उरलेले दिवस आनंदाने जगण्यासाठी जन्माला आलो आहे, म्हणून आपलं आयुष्य मनोसोक्त जगा *Don't close the book when bad things happen in your life, just turn the page and begin a new chapter.*
*A successful relation doesn’t depend on how good understanding we have?*
*But it depends on how better we avoid ‘Miss-understandings'….......*
*Good Morning*
: *नई सुबह इतनी सुहानी हो जाए;*
*आपके दुखों की सारी बातें पुरानी हो जाएं;*
*दे जाए इतनी खुशियां ये दिन आपको;*
*कि ख़ुशी भी आपकी मुस्कुराहट की दीवानी हो जाएं ।*
🌹सुप्रभात🌹
Tuesday, 28 March 2023
Tuesday, 14 March 2023
Featured post
-
कोण होता 'चेन्दरू मडावी'...? (विदेशी फिल्म ला ऑस्कर मिळवून देणारा जगातला एकमेव भारतीय आदिवासी मोगली चेन्दरू मडावी...) एक ...
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव विरेंद्र सिंह म्हणाले की , कर्करोगाविरुद्ध जो लढा आहे , त्यामध्ये प्रत्येकाच्या वाटा फार महत्त्वाचा आहे. ...