Showing posts with label .सामाजिक. Show all posts
Showing posts with label .सामाजिक. Show all posts

Wednesday, 16 April 2025

Pune Municipal Corporation* is ready to supply these plants to any societies who

 Punekars! 🙋🏻‍♀️


*Pune Municipal Corporation* is ready to supply these plants to any societies who want to plant them inside their compounds. . 

They will plant the saplings too , only maintainence will need to be done by the societies….


• Tabubiya yellow

• ⁠Tabubiya pink

• ⁠Palas pink, white, yellow 

• ⁠बहावा

• ⁠बकुळ 

• ⁠चाफा 

• ⁠करंज 

• ⁠कदंब 

• ⁠वड 

• पिंपळ 

• ⁠कडुनिंब 

• ⁠आंबा 

• ⁠चिंच 

• ⁠अर्जुन

• ⁠शिरीष 

• ⁠सदुंबर


Here is the format to share  while forwarding on your groups:


• Name of society / bunglow

• ⁠Type of saplings including number of each required.

• ⁠Contact person from society who will coordinate.


Interested?

Please message *Megha Lawand:*

+91 8149206443

Tuesday, 11 March 2025

*माझ्या वाढदिवसाला* -------------------------शेतकऱ्याचा फायदा.

 *माझ्या वाढदिवसाला*  

---------------------------


माझ्या वाढदिवसाला 

नाही कापणार केक.

शेतकऱ्यांचं हे फळ 

घरी आणीन रे एक.


वाढदिवसाला करा

शेतकऱ्याचा फायदा.


केक ऐवजी एकदा

करा फळाचा वायदा.


फळ कापून रे आता

वाढदिवस सजवा.

माझ्या शेतकऱ्यासाठी 

हात लावा रे उजवा.


पहा आधार देऊन

फळबाग पिकवेल.

जगण्याचं तत्त्वज्ञान

मग तोही शिकवेल.


येता सुगीचे दिवस

तेही स्वप्न आखतील.

शेतकरी बांधवांच्या

आत्महत्या रोखतील.


सफरचंद व पपई

कलिंगड,पेरू,आंबा.

अशी फळं घेऊनच

वाढदिवसाला थांबा.


किती स्वस्त आणि मस्त

असा फळांचा बाजार.

बघा कधीच कुणाला

नाही होणार आजार.


*****************




☘️🌹☘️🌹☘️🌹☘️

Wednesday, 5 March 2025

सायबर गुन्ह्यांमध्ये उकल होण्याच्या टक्केवारीत वाढ हेल्पलाईन क्रमांक १९३० वर संपर्क साधण्याचे आवाहन Pl share

 सायबर गुन्ह्यांमध्ये उकल होण्याच्या टक्केवारीत वाढ

हेल्पलाईन क्रमांक १९३० वर संपर्क साधण्याचे आवाहन

 

मुंबईदि. ०४ : माहे नोव्हेंबर २०२४ अखेर पर्यंत सायबर गुन्ह्यांची उकल होण्याची टक्केवारी २२ टक्के होती. ती वर्षाअखेर म्हणजेच माहे डिसेंबर २०२४ अखेर पर्यंत २५ टक्के इतकी झाली आहे. ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये ६१३ गुन्हे उघडकीस आणण्यात आले असून  ६८३ आरोपींना अटक करण्यात आली आहे. गुन्हे उकल होण्याची टक्केवारी १९ टक्के इतकी आहे. माहे डिसेंबर २०२४ अखेरपर्यंत ७५३ गुन्हे उघडकीस आणले व ७४८ आरोपींना अटक करण्यात आली आहे. गुन्हे उकल होण्याची ही टक्केवारी २२ टक्के इतकी आहे. यावरून सायबर गुन्ह्यांमध्ये उकल होण्याच टक्केवारीत वाढ झालेली दिसून येते.

एखादा सायबर गुन्हा घडल्यास तात्काळ स्थानिक पोलीस ठाणेसायबर पोलीस ठाणेकेंद्र शासनाचे सायबर गुन्ह्यांच्या तक्रारीचे पोर्टल व हेल्पलाईन क्रमांक १९३० येथे संपर्क साधून तात्काळ माहिती देण्यात यावी अथवा तक्रार करावीअसे आवाहनही पोलीसांकडून करण्यात येत आहे.

नोंद झालेल्या जास्तीत जास्त सायबर गुन्ह्यांची उकल करण्याच्या दृष्टीने पोलीस सतत प्रयत्नशील असतात. जास्तीत जास्त सायबर गुन्हे उघडकीस येण्याकरीता सायबर विभागात काम करणारे अधिकारी व अंमलदार यांना तांत्रिक तपासाचे वेळोवेळी अद्ययावत प्रशिक्षण देण्यात येते. सायबर गुन्ह्यांची उकल होण्याच्या टक्केवारीत वाढ झालेली आहे. सायबर गुन्हे रोखण्याकरीता दैनंदिन स्तरावर पोलीस ठाणे हद्दीत घेण्यात येणाऱ्या नागरिकांच्या कॉर्नर मिटींगसोसायटी मिटींगजेष्ठ नागरिकांचे क्लबझोपडपट्ट्या तसेच शाळामहाविद्यालय येथील विद्यार्थ्यांना सायबर गुन्ह्यांविषयी व त्याची कार्यपद्धतीसुरक्षा विषयक उपाय योजनांची माहिती देण्यात येत आहे. कोणत्याही आमिषाला बळी न पडता फसवणूक करणाऱ्या अॅपपासून सावधानता बाळगण्याचे आवाहनही पोलीसांकडून करण्यात येत आहे.

 मोहल्ला समित्या तसेच इतर जनतेच्या बैठकांमध्ये सायबर गुन्ह्यांची माहिती देवून वेळोवेळी चालणाऱ्या सायबर गुन्ह्यांच्या ट्रेंडविषयी जनजागृती करण्यात येत आहे. अनोळखी व्यक्तीकडून सोशल मीडियावर फ्रेन्ड रिक्वेस्ट’ स्वीकारू नये व त्याला कोणताही प्रतिसाद देवू नये. शाळा व महाविद्यालयाच्या सभेमध्ये आणि निर्भया पथकाच्या बैठकांमध्ये देखील अनोळखी व्यक्तींच्या फ्रेंड रिक्वेस्ट’ व प्रतिसाद न देण्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे.  हॅशटॅग #Thodasasochale अन्वये सायबर पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी स्वतः पुढाकार घेऊन तयार केलेल्या व्हिडीओ/चित्रफित इंस्टाग्रामट्विटरव्हॉट्सॲप व युट्यूबमार्फत प्रसारित करण्यात आल्या आहेतअसे सायबर गुन्हे शाखेचे पोलीस उपआयुक्त यांनी कळविले आहे.

००००

Friday, 14 February 2025

मध्यरात्री १२ वाजता वाढदिवस साजरा करता त्यामुळे सावधान...*

 *मध्यरात्री १२ वाजता वाढदिवस साजरा करता त्यामुळे सावधान...*


   आजकाल सुरू झालेली एक विचित्र परंपरा म्हणजे रात्री १२ वाजता वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे आणि साजरा करणे. पण तुम्हाला माहित आहे का?


 *भारतीय धर्मग्रंथ हे चुकीचे मानतात*.. 


आज आम्ही तुम्हाला असे करणे किती *मोठे नुकसान* आहे हे सांगणार आहोत.कारण मोठा अनर्थ* घडू शकतो..


आजकाल कुणाचा वाढदिवस असो, लग्नाचा वाढदिवस असो की, रात्री बारा वाजता केक कापण्याची फॅशन झाली आहे. रात्री बारा वाजता केक कापायचा असल्याने लोकांमध्ये खळबळ उडाली आहे.अनेकदा असे दिसून येते की लोक त्यांचा वाढदिवस १२ वाजता म्हणजेच निशीथ काल (भूत काळ) मध्ये साजरा करतात. , निशीथ काल ही रात्रीची वेळ असते जी *सामान्यतः मध्यरात्री १२ ते पहाटे ३ च्या दरम्यान असते*. सामान्य लोक याला *मध्यरात्र* किंवा अध्यरात्र म्हणतात.


शास्त्रानुसार हा काळ अदृश्य शक्ती, भूत आणि पिशाच यांचा काळ आहे. या काळात ही शक्ती अत्यंत मजबूत होते.


आपण कोठेही राहतो, अशा अनेक शक्ती असतात ज्या आपल्याला दिसत नाहीत, परंतु ज्यांचा आपल्यावर अनेकदा *विपरित* परिणाम होतो.


 ज्यामुळे आपले जीवन विस्कळीत होते.आणि आपण दिशाहीन होतो. हे अनेकदा वाढदिवसाच्या पार्टीत घडते.  अशा भुताटकीच्या काळात केक कापून, दारू आणि मांस सेवन केल्याने अदृश्य शक्ती माणसाचे वय आणि भाग्य कमी करतात आणि दुर्दैव दार ठोठावते असते.


वर्षातील काही दिवस जसे की दिवाळी, ४ नवरात्री, जन्माष्टमी आणि शिवरात्री वगळता, निशीथ काल महानशीठ काल बनतो आणि शुभ परिणाम देतो, तर इतर वेळी तो हानिकारक प्रभाव देतो.


*शास्त्रानुसार रात्री केलेल्या मनोकामना प्रतिकूल परिणाम देतात.आणि धर्मग्रंथानुसार अग्नी विझवून सण साजरे करणे म्हणजे अंधाराची देवता असुराचे आवाहन करण्यासारखे मानले जाते.*


*हिंदू धर्मग्रंथांनुसार दिवसाची सुरुवात सूर्योदयाने होते आणि हा काळ ऋषीमुनींच्या तपश्चर्येचाही असतो.त्यामुळे या काळात वातावरण शुद्ध आणि नकारात्मकतेपासून मुक्त असते. अशा परिस्थितीत, शास्त्रानुसार, एखाद्या व्यक्तीच्या वाढदिवसाच्या दिवशी सूर्योदयानंतरच शुभेच्छा दिल्या पाहिजेत कारण रात्रीच्या वेळी वातावरणात रज आणि तम कणांचे प्रमाण खूप जास्त असते आणि त्या वेळी दिलेल्या शुभेच्छा निष्फळ ठरतात. शुभेच्छा फलदायी होण्याऐवजी हानिकारक ठरतात.*


🙏🏻 *कृपया हा लेख तुमच्या जवळच्या जास्तीत जास्त लोकांना पाठवा*🙏🏻

*🌹💐सर्वांना शुभेच्छा 💐🌹*

विलेपार्ले येथे ‘उत्तुंग महाखादी प्रदर्शन’चे आयोजन pl share

 विलेपार्ले येथे ‘उत्तुंग महाखादी प्रदर्शन’चे आयोजन

           

मुंबईदि. १४ : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने ग्रामीण कारागीर व उद्योजकांनी तयार केलेल्या उत्पादनांना शहरी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी विलेपार्ले येथे "उत्तुंग महाखादी प्रदर्शन" आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन दि. १८ ते २३ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत महालक्ष्मी नारायण हॉल लॉन्ससुभाष रोडविलेपार्ले (पूर्व) येथे होणार असूनदररोज सकाळी १०.०० ते रात्री ८.०० वाजेपर्यंत नागरिकांना या प्रदर्शनाला भेट देता येणार आहेअशी माहिती मंडळाचे सभापती रवींद्र साठे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गीतांजली बाविस्कर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 या प्रदर्शनात खादी वस्त्रखादी साड्याशुद्ध सेंद्रिय ‘मधुबन’ मधहळदमसालेकोल्हापूरी चप्पलगूळ तसेच इतर ग्रामोद्योग उत्पादने यांसारख्या वस्तूंचे ५० स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत. खादीच्या स्वदेशी वस्त्रांबरोबरच आरोग्यासाठी लाभदायक सेंद्रिय उत्पादने आणि ग्रामीण भागातील कारागिरांनी साकारलेली दर्जेदार उत्पादने ग्राहकांना उपलब्ध होतील.

 ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी खादी व ग्रामोद्योग मंडळ मागील ६५ वर्षांपासून अविरतपणे कार्यरत आहे. राज्य शासनाच्या उद्योग विभागांतर्गत खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या विविध योजना राबवल्या जातात. पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रममुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रममधकेंद्र (मधमाशापालन)मधाचे गाव तसेच प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना अशा अनेक उपक्रमांद्वारे ग्रामीण कारागीर आणि उद्योजकांना आर्थिक मदत आणि व्यवसायवृद्धीसाठी संधी दिली जाते.

 ग्रामीण संस्कृती आणि पारंपरिक उत्पादने अनुभवण्याची तसेच खादी आणि ग्रामोद्योग वस्तूंची खरेदी करण्याची सुवर्णसंधी या प्रदर्शनात मिळणार आहे. या प्रदर्शनास अधिकाधिक मुंबईकर नागरिकांनी भेट द्यावीअसे आवाहन महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग सभापती साठे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती बाविस्कार यांनी मंडळाच्या वतीने केले आहे.

तत्काळ! तत्काळ! तत्काळ! सकाळच्या शुभेच्छा आणि रात्रीच्या शुभेच्छा असलेल्या चित्रांचा अधिक वापर करू नका.pl share

 तत्काळ!

तत्काळ!

तत्काळ!


सकाळच्या शुभेच्छा आणि रात्रीच्या शुभेच्छा असलेल्या चित्रांचा अधिक वापर करू नका. खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचा. हे सत्य आहे.


प्रिय कुटुंब आणि मित्रांनो,

उद्या पासून कृपया नेटवर्कवरील चित्रे पाठवणे किंवा स्वीकारणे थांबवा. खालील लेख वाचा आणि समजून घ्या. मीसुद्धा थांबवणार आहे.

कृपया सकाळच्या, संध्याकाळच्या शुभेच्छा, इतर ग्रीटिंग्स आणि धार्मिक संदेश असलेली सर्व चित्रे आणि व्हिडिओ शक्य तितक्या लवकर डिलीट करा. खालील माहिती वाचा आणि का हे महत्त्वाचे आहे ते समजून घ्या.

हे सर्वांना वाचा! कृपया हा संदेश शक्य तितक्या मित्रांना पाठवा जेणेकरून बेकायदेशीर हॅकिंग टाळता येईल.


ओल्गा निकोलायेव्हनाच्या वकिलाकडून इशारा:


लक्ष द्या! सकाळच्या शुभेच्छा, चांगला दिवस आहे, संध्याकाळच्या शुभेच्छा या प्रकारचे संदेश पाठवणाऱ्यांसाठी:

कृपया असे संदेश पाठवू नका.

आज शांघाय, चीन इंटरनॅशनल न्यूजने सर्व ग्राहक आणि तज्ञांना एसओएस इशारा दिला आहे – सूचना: शुभ सकाळ, शुभ रात्री यांसारख्या संदेशांसाठी चित्रे आणि व्हिडिओ पाठवू नका.


अहवालात असे दिसून आले आहे की हे चित्र आणि व्हिडिओ डिझाइन करणारे हॅकर्स यामध्ये फिशिंग कोड लपवतात. जेव्हा तुम्ही हे संदेश पाठवता, तेव्हा हॅकर्स तुमच्या डिव्हाइसचा वापर करून तुमची वैयक्तिक माहिती जसे की बँक कार्ड डिटेल्स आणि डेटा चोरतात व तुमच्या फोनमध्ये घुसखोरी करतात.


अहवालानुसार, 5 लाखांहून अधिक लोकांना यामुळे फसवले गेले आहे.

जर तुम्हाला दुसऱ्यांना शुभेच्छा द्यायच्या असतील, तर कृपया तुमच्या स्वतःच्या शब्दांत संदेश लिहा आणि तुमचे स्वतःचे चित्र किंवा व्हिडिओ तयार करून पाठवा. असे केल्याने तुम्ही स्वतःचे आणि तुमच्या कुटुंबाचे संरक्षण करू शकता.


महत्त्वाचे! सुरक्षिततेसाठी, तुमच्या फोनमधील सर्व शुभेच्छा संदेश आणि चित्रे डिलीट करा. जर कोणी तुम्हाला अशा प्रकारची चित्रे पाठवली असतील, तर ती डिव्हाइसवरून तात्काळ काढून टाका.

हॅकिंग कोड पूर्णपणे कार्यान्वित होण्यास थोडा वेळ लागतो, त्यामुळे जर तुम्ही तात्काळ पाऊल उचलले, तर कोणतीही हानी होणार नाही.


तुमच्या सर्व मित्रांना सांगा, जेणेकरून हॅकिंग होण्यापासून बचाव होऊ शकेल.


तुमच्या स्वतःच्या शब्दांत शुभेच्छा द्या आणि फक्त तुमच्या स्वतःच्या तयार केलेल्या चित्रांचा व व्हिडिओंचा वापर करा, जे सुरक्षित आहेत. प्रत्येकाकडे मोबाईलवर बँक कार्ड्स लिंक केलेले असते, आणि संपर्कसुद्धा असतात. या प्रकारच्या हॅकिंगमुळे तुम्हाला आणि तुमच्या मित्रांना मोठा धोका निर्माण होतो.


ही एक नवीन पद्धत आहे, ज्याद्वारे दहशतवादी तुमच्या सिम कार्डपर्यंत पोहोचून तुम्हाला त्यांचा साथीदार बनवू शकतात!!!


हा संदेश शक्य तितक्या नातेवाईक आणि मित्रांना पाठवा, जेणेकरून अनधिकृत घुसखोरी थांबवता येईल!!!

Thursday, 13 February 2025

अहिराणी बोली भाषावैज्ञानिक ओळख खानदेश प्रस्ताविक

 अहिराणी बोली भाषावैज्ञानिक ओळख

खानदेश प्रस्ताविक

अहिराणी ही खानदेश या भू प्रदेशात बोलली जाणारी बोली. महाराष्ट्रातील धुळे आणि जळगाव या दोन जिल्ह्यांच्या मिळून होणाऱ्या प्रदेशास आजही खानदेश म्हणून ओळखतात. पूर्वी खानदेश हा मुंबई इलाख्याचा एक जिल्हा होता. प्राचीन काळी खानदेश या प्रदेशाचा विस्तार सातपुडा पर्वतापासून दक्षिणेकडे सातमाळा व अजिठ्यांचे डोंगर येथ पर्यंत तर पूर्वेकडील वऱ्हाड प्रांत ते निमाड जिल्हा पासून पश्चिमेकडे बडोदे संस्थान व रेवाकाठ जहागिरी पर्यंत इतका होता. याचे अतिप्राचीन नाव ऋषिकदेश. यादवांच्या काळात हा भूभाग सेउनदेश म्हणून ओळखला जाई. मोगलांच्या काळात हा भाग खानदेश म्हणून ओळखला जाई. व्यवस्थापनाच्या दृष्टिने इ.स. १९०६ मध्ये खानदेश जिल्ह्याचे पूर्व खानदेश व पश्चिम खानदेश हे दोन भाग पाडण्यात आले. पुढे १९६० पासून पूर्व खानदेशास जळगांव जिल्हा व पश्चिम खानदेशास धुळे जिल्हा अशी नावे देण्यात आली.

खानदेश इतिहास :

रामायण- महाभारत यांतील उल्लेखलेल्या ऋषकदेश या भूप्रदेशाच्या वर्णनाशी खानदेशाचा भूभाग जुळतो. खानदेश या शब्दाची उत्पत्ती कान्हदेवकान्हेरदेवकान्हाचा देशकानबाई या शब्दांत शोधण्याचा आजवर प्रयत्न झालेला आहे. मात्र त्यात तथ्य वाटत नाही. खानदेश या भूप्रदेशाहून इतरत्र कान्हाचा किंवा श्रीकृष्णाचा संबंध अधिकचा आहे. तसेच खानदेशातील अनेक उत्सवांपैकी कानबाईकानुबाई हा एक उत्सव आहे. त्यामुळे एखाद्या भूप्रदेशाला त्या परिसरातील एका उत्सवाच्या नावाने ओळखले जाणे ही शक्यताही कमीच आहे. कान किंवा कानन म्हणजे अरण्यवनगवताळ प्रदेश. कान किंवा खान या शब्दाचा अर्थ खाणखदानथाळामध्ये खोल असणारा भागखनि किंवा उत्पत्तीस्थान. सातपुडांच्या रांगासह्याद्रीच्या रांगाचांदवडचे डोंगर आणि वाघूर नदी व परिसरातील डोंगर रांगा यामुळे हा परिसर खोल खदाणी सारखाखाणीसारखा आहेच. गिरणातापीनर्मदा या नद्यांच्या खोऱ्यांचा हा भाग दाट अरण्याचागुरांसाठी विपूल गवत असणारा प्रदेश. येथे विपुलता (खाण) होतीचौफेर नैसर्गिक तटबंदीमूळे (भेसळ मुक्त अशी) शुद्धताव शुद्ध वंश (खानखानदानी) होती. म्हणून खदाणीचा खाणीचा देशचांगल्या वंशाचा-खानदानीचा देशगवताचा-कानन देश यावरुन खानदेश हे नामाभिद्यान झाले असावेया व्युत्पत्तीचांही विचार करण्याजोगा आहे.

अशिरगड हे अश्वत्थाम्याचे स्थान होते. पांडवाविरुद्ध तोरणमाळचा राजा लढला होता ते तोरणमाळ धुळे जिल्ह्यात आहे असे महाभारतकालीन उल्लेख आढळतात. चाळीसगांव जवळील पाटणे परिसरात आद्य पराष्मयुग व तदनंतर अप्पर पराश्म युगात मानवी वस्ती होती हे उत्खननात सापडलेल्या पाच स्थरांवरुन सिद्ध होते. बहाळ येथे सापडलेली नाणीघटोत्कच लेण्यानागदमूंदखेडेमेहुनबारेबहुलवाड येथे सापडलेले ताम्रपटसारजादेवी मंदिरावरील शिलालेखअंजिठा लेण्याया पुराव्याआधारे खानदेशच्या इतिहासावर प्रकाश पडतो. खानदेशात इ.स.पूर्व चौथे ते इ.स. दुसरे शतकात मौर्याचे राज्य होते. पहिल्या शतकात सातवाहनांची सत्ता होती. ३ रे ते ५ वे शतकांत वाकाटकांची सत्ता होती (वर्षदेवस्वामीदासमुलंदा) चौथ्या शतकांत वाकाटकांसोबतच अभीरांचीही सत्ता होती. इ.स. ६५५ ते ७०२ या काळात सेद्रकांचे (निकुम्माल्लशक्तीनृपती जयशक्तीनृपती वैरसेन) राज्य होते. या सोबतच सहाव्या शतकांत कलचुरी तर सातव्या शतकांत पुलकेशीचे तर आठव्या शतकात त्रैकूटकांचे राज्य होते. त्यानंतर नवव्या ते बाराव्या शतका पर्यंत राष्ट्रकूटसोमवंशीआणि यादव यांचे राज्य होते. पुढे अल्लाउद्दीन खिलजीअकबरयांच्या सत्तेनंतर १८ व्या शतकांत (इ.स-१७२०) निजामांचे राज्य होते. १७६० ते १८१८ हा मराठ्यांचा काळ तर १८१८ ते १९४७ हा ब्रिटिशांचा काळ गणला जातो.

पासष्टी (६५) पार करतांना* *सर्वांनी अवर्जुन वाचाच*...

 *पासष्टी (६५)  पार करतांना* 

*सर्वांनी अवर्जुन वाचाच*...


एकदा एका साठी ओलांडलेल्या आणि सत्तरीच्या  वाटेवर असणाऱ्या मित्राला त्याच्या मित्राने विचारले, "मित्रा, तुझ्यात काय बदललंय असे तुला वाटतंय?" त्यानंतर त्या मित्राने जे उत्तर दिले ते आपल्यातील प्रत्येकाने समजून घेतलं तर प्रत्येकांसाठी आपले आयुष्य सुसह्य होईल हे निश्चित! त्याने जे उत्तर दिले ते असे.


१.आजवर मी माझ्या आईवडिलांवर, भावंडांवर, मुलांवर, बायकोवर, सहकाऱ्यांवर, शेजाऱ्यापाजाऱ्यांवर, मित्रांवर खूप प्रेम केले, त्यांची खूप काळजी घेतली. पण आता मी स्वतःवर प्रेम करायला लागलोय, आता मी स्वतःची काळजी घ्यायला सुरुवात केलीय.


२.मला याची जाणीव झालीय की, आता मी शारिरीक किंवा मानसिकदृष्ट्या इतका सक्षम राहिलो नाही की कुणीही यावं आणि त्यांनी आपले ओझे माझ्या खांद्यावर टाकावे.


३.आता मी भाजीवाल्याशी, फळविक्रेत्याशी, फेरीवाल्याशी घासाघीस करायचं सोडून दिलंय. उलट आता मला असं वाटतं की माझ्या काही पैश्याने त्यांच्या मुलांचे शिक्षण होणार असेल किंवा त्याची गरीबी दूर होणार असेल तर चांगलेच होईल ना! 


४.आता मी माझ्या जीवन संघर्षाच्या कहाण्या इतरांना सांगण्याचं आणि सल्ले देण्याचं बंद केलंय. कारण एकतर त्या सगळ्यांना सांगून झाल्या आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या आता कदाचित कालबाह्य झाल्या आहेत. माझ्या त्या संदर्भांचा आजच्या पिढीला किती उपयोग होईल हे माझे मलाच माहीत नाही.


५.आता मी कुणाला त्याच्या चुका सांगण्याच्या किंवा काय बरोबर आणि काय चुकीचे हे सांगण्याच्या भानगडीत पडत नाही.‌ कारण सगळ्यांना सुधारण्याची जबाबदारी माझी  एकट्याची नाही हे मला कळून चुकलंय. आता मला इतरांच्या परफेक्शनपेक्षा माझी शांतता अधिक महत्वाची वाटते.


६.आता मी समोरच्याच्या चांगल्या गोष्टीसाठी त्याला निखळ दाद द्यायला आणि त्याचे कौतुक करायला शिकलोय. त्याने समोरच्याला बरे वाटते, तो सुखावून जातो.


७.आता माझ्या अंगावरच्या कपड्यांची घडी चुरगाळलेली असेल किंवा शर्टावर एखादा डाग पडला असेल तर त्याचा मला खूप फरक पडत नाही. जे लोक मला अंतर्बाह्य ओळखतात त्यांच्यासाठी माझा पेहराव फार महत्वाचा नाही हे मला कळून चुकलंय.


८.ज्यांना माझी किंमत नाही अशांना मी आता दुर्लक्षित करतो. कारण त्यांना माहित नसली तरी मला माझी किंमत चांगली माहिती आहे.


९.आता माझं वय कुरघोड्या करण्याचं राहिलेलं नाही.


१०.आता मला माझ्या भावना व्यक्त करायची लाज वाटत नाही. भावना असणं हे जिवंतपणाचे लक्षण आहे. आता हसावंसं वाटलं की हसून घ्यायचं आणि रडावंसं वाटलं की रडून घ्यायचं. भावना लपवण्याच्या नादात उगाच घुसमटत रहायचं नाही.


११.आपला अहंकार आपल्या नात्याच्या आड येणार नाही याची मी पूर्ण काळजी घेतो. प्रसंगी मला थोडा कमीपणा घ्यायला लागला तरी मी एकवेळ तडजोड करतो, पण स्वतःचा स्वाभिमान सांभाळून! कारण नाते टिकवण्याची जबाबदारी कुणा एकाची असूच शकत नाही.


१२.आता मी येणारा प्रत्येक क्षण सर्वार्थाने जगण्याचा प्रयत्न‌ करतो. मला जे करावसं वाटत ते मी करतो. फक्त एवढंच की, माझ्या स्वछंदी जगण्याचा इतरांना त्रास होणार नाही याची मी काळजी घेतो.


१३.मला माहित आहे की, जे मी आजवर जगलोय त्यापेक्षा *आता माझ्याकडे वेळ फार कमी आहे त्यामुळे आज मी ना भूतकाळात जाऊन पश्चात्ताप करत बसत, ना भविष्यकाळात जाऊन  चिंता करत बसत*


*आता निख्खळ आणि निख्खळ जीवनाचा आनंद घ्यायचा आणि जेवढा इतरांना देता येईल तितका द्यायचा*


१४..आता माझं उर्वरित आयुष्य पैसे मिळवण्यासाठी नसून परोपकारासाठी असल्याची भावना मनात निर्माण झाली आहे.


खरंच, वर दिलेल्या एका मित्राच्या उत्तरातून आपण काही समजून घेतलं तर आपल्यातील प्रत्येकाला किती छान जीवन जगता येईल ना?


१५.आत्ता  कळले जीवन सुंदर आहे. पण ते सरळमार्गाने जगणाऱ्या व्यक्तीचे आहे.


१६.आपण आपल्या लोकांसाठी कितीही सम्पत्ती जमविली तरी एक वेळ अशी येते की तीच घरची लोक आपल्याला कंटाळून जातात, कटू आहे पण सत्य आहे कारण


१७.आपली मुले आपल्या पोटी जन्माला आली आहे पण आपल्यासाठी जन्माला आलेली नाही ते, आपण त्यांना लावलेल्या मजबूत पंखानी स्वतःचे नवीन घरटे बांधायला व आकाशात उडायला आलेली आहेत हे लक्षात ठेवावे व अपेक्षा रहित जीवन जगावे म्हणजे त्रास कमी होईल


*🌹खूप खूप शुभेच्छा (६०-७०) सत्तरीच्या, वाटेवर असणाऱ्या मित्रांना, स्वतःची काळजी घ्या, व आपल्या अर्धांगिनीची ची काळजी करा l* 🌹


            *राम    कृष्ण    हरी*

Wednesday, 12 February 2025

गंगा नदीच्या सुरुवातीपासून सागराला मिळेपर्यंतच्या प्रवासाचे सुरेख चित्र pl share

 *🙏गंगा नदीच्या  सुरुवातीपासून सागराला मिळेपर्यंतच्या प्रवासाचे सुरेख चित्र.. त्यात तीला येऊन मिळणार्या नद्या आणि ज्या ज्या राज्यातून ती जाते त्यातील तिचा किती प्रवास होतो हे ही आहे.  आपण सर्व या नदीला का पवित्र मानतो हे यातून कळतं* 👌


Tuesday, 11 February 2025

जिन्दगी का साथ निभाते चला......

 तीन मनोरंजक लघु कथा. या तीनही कथांना सखोल अर्थ आहे. या कथा वाचून आपल्याला नक्कीच हसायला येईल. तुम्हीही वाचा आणि आवडल्यास पुढे पाठवा.


१. "गहन"


मी लिफ्ट मध्ये एका लहान मुलाला आईस्क्रीम खात असलेलं बघितलं. त्याची काळजी वाटून मी त्याला सहज बोललो, "आज खूप थंडी आहे हे आईस्क्रीम खाऊन तू आजारी पडशील!"


तो मुलगा उत्तरला, "माझी आजी १०३ वर्षांपर्यंत जिवंत राहिली."


मी विचारलं, "आइसक्रीम खाल्यामुळे?"


तो म्हणाला, "नाही, कारण तिने कधीच दुसऱ्याच्या कामामध्ये नाक खूपसत नाही!"


किती खोल अर्थ दडला होता त्या उत्तरात! आता मला समजलं की मी इतक्या वेगाने का म्हातारा होत चाललोय - कारण नसताना मी दुसऱ्याच्या कामात केलेली ढवळाढवळ. दुसरं काय?


२. "थकलेला"


आज-काल जिथे तिथे घोटाळेबाज दिसून येतात. मी नुकताच बातम्यांमध्ये लोकांच्या बँक अकाउंट बद्दल बातम्या पाहात होतो - लोकांच्या खात्यांतून लाखो रुपये बघता बघता नाहीसे झाले होते आणि ते कुठे गेले याचा मागमुसही लागत नव्हता.


ती बातमी पाहून जाम घाबरलेलो मी माझ्या बाईकनं बँकेत गेलो. एटीएम मध्ये माझं कार्ड स्वाईप केलं, माझा पासवर्ड टाकला आणि माझ्या खात्यातली शिल्लक तपासली. माझ्या खात्यात शिल्लक असलेले साडेसातशे रुपये अजूनही माझ्या खात्यातच पडून होते मी सुटकेचा निश्वास टाकला.


बापरे, माझ्या मनावरचा ताण आता हलका झाला होता. आता यापुढे पुन्हा कधी बातम्या ऐकणार नाही असं मी मनोमन ठरवून टाकलं. नको पुन्हा तो भयंकर तणाव!


मात्र मी एटीएम मधून बाहेर पडलो तेव्हा हे बघून मी मनानं आणखीनच हबकून गेलो हे माझे साडेसातशे रुपये अजूनही तसेच माझ्या खात्यात शिल्लक असले तरी माझी मी नुकतीच पार्क केलेली बाईक मात्र आता जागेवर नव्हती.


३. "थांबा"


एक तरुणी ट्रेनमध्ये चढली आणि आपल्या सीटवर दुसराच कोणी माणूस बसल्याचं तीनं पाहिलं. विनम्रतेने आपलं तिकीट तपासून बघितलं आणि ती म्हणाली, "सर, मला वाटतंय आपण चुकून माझ्या सीटवर बसला आहात."


त्या माणसानं आपलं तिकीट काढलं आणि तिला ते दाखवत तो तिला रागान ओरडून म्हणाला, "हे तिकीट जरा नीट बघ. ही माझीच सीट आहे. तू आंधळी आहेस का गं ?"


त्या तरुणीने बारकाईने ते तिकीट तपासलं आणि तिने त्या माणसाशी वाद करणं थांबवलं. ती काही न बोलता त्या शिटापाशी उभी राहिली.


ट्रेन सुरू झाल्यावर काही वेळानं ती तरुणी खाली वाकून त्या माणसाला म्हणाली, "सर, तुम्ही चुकीच्या सीटवर नाही बसलात परंतु तुम्ही चुकीच्या ट्रेनमध्ये बसला आहात. ही ट्रेन मुंबईला जातेय आणि तुमचं तिकीट आहे अहमदाबादचं"


तात्पर्य, मनावर संयम असावा. आपण बोलण्यापूर्वी किंवा कृती करण्यापूर्वी विचार केला पाहिजे अन्यथा आपल्याला पश्चात्ताप करावा लागू शकतो. ओरडण्याने जर सगळेच प्रश्न सुटले असते तर कदाचित या जगावर गाढवांनीच राज्य केलं असतं. 


या तीन गंमतदार छोट्या गोष्टी इतक्या चांगल्या आहेत की तुम्ही त्यांना शेअर केल्याशिवाय राहूच शकणार नाही. मग उशीर कशाला? तुम्हीही द्या पाठवून पुढे, इतरांनाही थोडं हसू द्या. 😊

Monday, 10 February 2025

घाटकोपरमध्ये प्रथमच साई उत्सवात अश्व रिंगणाचा दिमाखदार सोहळा संपन्न

 घाटकोपरमध्ये प्रथमच साई उत्सवात अश्व रिंगणाचा दिमाखदार सोहळा संपन्न


दि. १० फेब्रुवारी, मुंबई- घाटकोपरमधील जांभळीपाडा येथील कैलास बाल मित्र मंडळातर्फे १६ व्या साई उत्सव वर्धापन दिनाच्या औचित्याने ७ ते ९ फेब्रुवारी असा तीन दिवसीय सोहळा नुकताच पार पडला.
‘शिर्डी माझे पंढरपूर’ या संकल्पनेवर आधारीत प्रवेशद्वारावरील नयनरम्य सजावट नागरीकांचे विशेष लक्ष वेधून घेत होती. ज्यात विठ्ठल रखुमाईची प्रतिकृती, ज्ञानेश्वर माऊलींनी रेड्यामुखी वेद वदविले ह्या दृष्याचा सुंदर देखावा साकारण्यात आला होता. यंदाच्या उत्सवात साई सच्चरित्र पारायण, महिलांचा हळदी-कुंकू समारंभ, गजर साईनामाचा भजन कार्यक्रम, जागरण-गोंधळ, आरोग्य तपासणी शिबीर, भव्य पालखी मिरवणूक सोहळा, महाप्रसाद असे विविध कार्यक्रम पार पडले.
भव्य पालखी मिरवणूकीत घाटकोपरमध्ये प्रथमच वर्षानुवर्षे पंढरीच्या वारीत जसा रिंगण सोहळा पार पडतो अगदी तसाच शेकडो वारकरी, टाळकरी, मृदुंगवादक आणि साईभक्तांच्या उपस्थितीत अश्व रिंगणाचा दिमाखदार सोहळा संपन्न झाला ज्याची सर्वत्र चर्चा झाली.


एक९४वर्शिय म्हातारा त्यांची दयनीय अवस्था , ओळखा पाहू

 घरमालकाने भाडे न दिल्याने ९४ वर्षीय वृद्धाला भाड्याच्या घरातून हाकलून दिले.  म्हातार्‍याकडे जुना पलंग, काही अॅल्युमिनियमची भांडी, एक प्लॅस्टिकची बादली आणि घोकंपट्टी वगैरे शिवाय काहीही सामान नव्हते.  म्हाताऱ्याने मालकाला भाडे देण्यासाठी थोडा वेळ देण्याची विनंती केली.  शेजाऱ्यांनाही म्हातार्‍याची दया आली आणि त्यांनी घरमालकाला भाडे देण्यासाठी थोडा वेळ दिला.  घरमालकाने अनिच्छेने त्याला भाडे भरण्यासाठी थोडा वेळ दिला.


 म्हातार्‍याने सामान आत घेतले.


 तेथून जाणाऱ्या एका पत्रकाराने थांबून सर्व दृश्य पाहिले.  ही बाब आपल्या वृत्तपत्रात प्रसिद्ध करणे उपयुक्त ठरेल असे त्यांना वाटले.  त्याने एक मथळा देखील विचारला, "क्रूर जमीनदार पैशासाठी म्हातार्‍याला भाड्याच्या घरातून बाहेर काढतो."  मग त्याने जुन्या भाडेकरूचे काही फोटो काढले आणि भाड्याच्या घराचे काही फोटोही काढले.


 पत्रकाराने जाऊन आपल्या प्रेस मालकाला घडलेला प्रकार सांगितला.  प्रेसच्या मालकाने चित्रे पाहिली आणि त्यांना धक्काच बसला.  त्यांनी पत्रकाराला विचारले, म्हाताऱ्याला ओळखते का?  पत्रकार नाही म्हणाला.


 दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर मोठी बातमी छापून आली.  "गुलझारीलाल नंदा, भारताचे माजी पंतप्रधान, एक दयनीय जीवन जगत" असे शीर्षक होते.  या बातमीत पुढे लिहिले आहे की, माजी पंतप्रधान कसे भाडे देऊ शकले नाहीत आणि त्यांना घरातून कसे हाकलून देण्यात आले.  आजकाल फ्रेशर्सही भरपूर पैसे कमावतात, अशी टिप्पणी केली गेली.  तर दोन वेळा माजी पंतप्रधान राहिलेल्या आणि दीर्घकाळ केंद्रीय मंत्री राहिलेल्या व्यक्तीकडे स्वतःचे घरही नाही.


 वास्तविक गुलझारीलाल नंदा यांना रु.  500/- प्रति महिना भत्ता, .परंतु स्वातंत्र्यसैनिकांच्या भत्त्यासाठी आपण लढलो नाही असे सांगून त्यांनी हे पैसे नाकारले होते.  नंतरच्या मित्रांनी त्याला असे सांगून स्वीकारण्यास भाग पाडले की त्याचे मूळ दुसरे कोणतेही स्त्रोत नाही.  या पैशातून तो घरभाडे देऊन गुजराण करत असे.


 दुसऱ्या दिवशी तत्कालीन पंतप्रधानांनी मंत्री आणि अधिकाऱ्यांना वाहनांच्या ताफ्यासह त्यांच्या घरी पाठवले.  एवढ्या व्हीआयपी वाहनांचा ताफा पाहून घरमालक थक्क झाला.  तेव्हाच त्याला कळले की त्याचे भाडेकरू श्री.  गुलझारीलाल नंदा हे भारताचे माजी पंतप्रधान होते.  घरमालकाने त्यांच्या गैरवर्तनाबद्दल लगेच गुलझारीलाल नंदा यांच्या चरणी नतमस्तक झाले.


 अधिकारी आणि व्हीआयपींनी गुलझारीलाल नंदा यांना सरकारी निवास आणि इतर सुविधा स्वीकारण्याची विनंती केली.  श्री.  गुलझारीलाल नंदा यांनी या वृद्धापकाळात अशा सुविधांचा उपयोग काय, असे सांगून त्यांचा प्रस्ताव स्वीकारला नाही.  शेवटच्या श्वासापर्यंत ते सामान्य नागरिकासारखे साधे जीवन जगले.  1997 मध्ये सरकारने त्यांचा भारतरत्न देऊन गौरव केला.


 त्यांच्या आयुष्याची तुलना सध्याच्या राजकारण्यांशी करा.


  *त्यांच्या 23 व्या पुण्यतिथीनिमित्त.*🙏

Saturday, 8 February 2025

असेच भवित्व्याल घडवा

 अद्भुत.....

ही छोटीशीच मुलगी गीतेचा. नववा अध्याय अस्खलित  म्हणते आहे.निश्चितच  हे पूर्व जन्माचे  सुकृत आहे.🙏🏽🙏🏽🚩


Thursday, 6 February 2025

मोदीसाहेब आणि त्यांचा खडतर प्रवास 🌹💕.

 मोदीसाहेब आणि त्यांचा खडतर प्रवास 🌹💕.


बडोद्यात, आमच्याकडे धनंजय बेहरे नावाचे पौरोहित्य करणारे कोकणस्थ ब्राह्मण होते ते सत्यनारायणाची पूजा, गणेशोत्सव पूजा किंवा उदक शांती वगैरे करायला अनेक वर्षां पासून येतात. त्यांचे वडील, या क्षेत्रात एक नावाजलेली व्यक्ती आहेत आणि त्या शिवाय ते संघांचे खूप जुने आणि सन्माननीय कार्यकर्ता आहेत. मोदीजी त्यांच्या वडिलांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद घ्यायला नेहमीच त्यांच्याकडे येत असत. बेहेरे गुरुजींनी सांगितलेली एक गोष्ट आज मी इथे share करीत आहे.....



साधारण 35 वर्षांपूर्वी, नरेंद्र मोदी गुजरातमध्ये संघाचे एक साधे कार्यकर्ता होते. संघांचे ऑफिस झाडणे, पुसणे, स्वच्छ ठेवणे, पाणी भरून ठेवणे असली कामे करत आणि संघांचे लोकल काम करत. त्यांच्याकडे एक कपड्याची झोळी आणि जुनी सायकल होती. तेवढाच त्यांचा संसार होता.


एकदा रात्री 10.30 वाजता, बडोद्याला आमच्या गुरुजींच्या घरी ते आले. तेव्हा गुरुजी आणि त्यांचे वृद्ध वडीलच तेवढे घरात होते. त्यांची आई बाहेरगावी गेली होती. आल्याबरोबर मोदीजींनी आधी गुरुजींच्या वडिलांना वाकून नमस्कार केला. ते थकलेले दिसत होते, म्हणून त्यांना जेवले आहात का? असं विचारले, तर ते नाही म्हणाले. मग बेहेरे गुरुजी स्वयंपाकघरात गेले. तर फक्त्त 5/6 इडल्या होत्या. सांभार किंवा चटणी देखील नव्हती. म्हणून त्यांनी त्या इडल्या दह्यात कुस्करून त्यात पिठीसाखर घालून एका वाडग्यात घालून मोदीजींना खायला दिल्या. मोदीजींनी त्या संपवून टाकल्या. त्यांना प्रचंड भूक लागली असावी. बोलता बोलता मोदीजी म्हणाले, *गोधऱ्याला एक कार्यक्रम होता, तो आटोपून, ९० किमी सायकलवर ते बडोद्याला आले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना डभोईला जायचे होते, की जे 50 किमी दूर होते*. त्यांनी बेहेरे गुरुजीं सोबत बराच वेळ गप्पा केल्या. रात्री 12.30 ला झोपले. आणि पहाटे लवकर उठून आंघोळ आटोपून ते सायकल मारत डभोईला निघून गेले.

त्यांच्याकडे फक्त्त एक टॉवेल, आणि एक जोडी कपडे असे. बाकी काही नाही. जेवण असेच कोणी दिलं तर, नाहीतर उपाशी देखील झोपत. हे असं आयुष्य त्यांनी अनेक वर्षे घालवले, असं गुरुजी म्हणाले. 


गरिबी काय असते, हाल अपेष्टा काय असतात, मेहनत काय असते आणि ती कशी करायची, ती या कर्मयोग्याने अनुभवलेली आहे.


देशभक्त आणि संघाचे संस्कार असलेला, घाम गाळत आणि मेहनत करीत, धगधगत्या मुशीतून निघालेला, एक देशभक्त नेता आपल्याला पंतप्रधान म्हणून मिळाले आहेत, हे आपल्या देशा च भाग्य🙏🏻


. मोदीजी, योगीजी आपल्या कुटुंबाचा त्याग करून, फक्त्त आपल्या आणि आपल्या पुढच्या पिढीसाठी सतत रक्त आटवत आहेत, याची आपण कायम आठवण ठेवली पाहिजे आणि त्यांची कदर केली पाहिजे एवढीच विनंती.

🙏🏻🌹💕🤗🙏🏻🌹💕🤗

Tuesday, 4 February 2025

निष्पापांचे रक्त 'अग्रलेख एक सडेतोड उत्तर

 श्री. संपादक,

म.टा.

तुमच्या आजच्या (जानेवारी ३१,२०२५) अंकातील 'गंगेतील निष्पापांचे रक्त 'अग्रलेख वाचला. खरं म्हणजे, हे पत्र मी माझ्या पूर्वीच्या सवयीनुसार तुमच्याकडे पाठवायला पाहिजे होते, पण अशा निर्भिड पत्रांना नेहमीच कचऱ्याची टोपली दाखवली जाते, ह्या स्वानुभवाने या वेळी सोशल मीडियाचा वापर करण्याचा निर्णय घेतला. कारण या मिडीयावर तुमची सेंन्सॉरशिप लागू होत नाही.

पूर्वी मी रोज कमीतकमी दोन मराठी वृत्तपत्रांचा नियमित वाचक होतो. पण नंतर मी टाईम्स (इंग्रजी) सोडून बाकी सगळी मराठी वृत्तपत्रे वाचणे बंद केले. पण सौ. च्या आग्रहास्तव आम्ही परत म.टा. ची वार्षिक वर्गणी भरून तो पेपर चालू केला, तो फक्त दोन कारणांस्तव- 

१). त्याच्यातील शब्दकोड्यासाठी आणि २). रविवारच्या अंकातील तंबी दुराई यांच्या उत्कृष्ट स्तंभ (कॉलम) साठी, पण हातात अंक पडला की एखादी तरी नजर इतर पानांवर पडतेच

तर अशी नजर आज तुमच्या आजच्या अग्रलेखावरही पडली. आणि तुम्हाला सांगतो की माझा अजिबात अपेक्षाभंग झाला नाही. त्याचं काय आहे, संपादक साहेब, मोदी-योगी जोडीने आयोजित केलेल्या या जगातील सर्वात मोठा मेळाव्याकडे सगळे जग अवाक् होऊन कौतुकाने पाहाते आहे. या मेळाव्यात सामील झालेल्या हजारो परदेशी पाहुण्यांनी तोंड भरून तेथील व्यवस्थेचे, स्वच्छतेचे आणि काटेकोर आयोजनाचे कौतुक करून योगींना १००/१०० मार्क दिले आहेत. हिंदुंच्या धार्मिक भावनांना ही भरभरून सन्मान दिला जातो आहे. अशावेळी 'काय करावे, काही सुचेना' अशा मानसिक अवस्थेमध्ये असणाऱ्या भारतातील पुरोगामी, बुद्धिवादी(?) लोकांना आणि त्यांच्या ताब्यात असणाऱ्या मिडियाला एक संधी या मेळाव्यात झालेल्या त्या दुर्दैवी घटनेने मिळाली आणि वेळ न घालवता त्यांनी त्या संधीचा वापर करण्याचा  प्रयत्न सुरू केला आहे. आजचा तुमचा अग्रलेख हा या प्रयत्नांचाच एक भाग आहे. 

प्रथम आपण या मेळाव्यातल्या भाविकांच्या श्रद्धेविषयी बोलू. तुम्ही गंगा काठावर राहूनही गंगास्नान न करणाऱ्या संत रोहिदासांचे उदाहरण दिले आहे. भारतीय परंपरेत संत ही उपाधी ज्याची परमेश्वरावर अनन्यसाधारण भक्ती आणि श्रद्धा आहे, त्याला दिली जाते. त्यामुळे संत रोहिदासांची परमेश्वरावर अत्यंत श्रद्धा होती, हे ओघाने आलेच. रोहिदास हे गंगाकिनारी राहात होते (ह्रूषिकेश ते बिहार पर्यंत कुठेही) तरी या काठावर अनेक तीर्थक्षेत्रे आहेत आणि गंगा किनारी राहात असल्याने ते गंगेत डुबकी मारीत नसले आणि घरीच बादलीतल्या पाण्याने अंघोळ करीत असले तरी ते गंगेचेच पाणी होते ना ? मग त्यांना आपो आपच गंगास्नानाचे पुण्य रोजच लाभत होते. गंगामातेवरील भारतीयांची श्रद्धा हजारो वर्षांपासून लवलेशाचाही फरक न होता आज २१व्या शतकातही अभेद्य राहिली आहे. अनेक सांस्कृतिक आक्रमणांनंतरही ती तसूभरही कमी झालेली नाही. आधुनिक विज्ञानाच्या आक्रमणाने ही ती नष्ट होण्याची सुतराम ही शक्यता नाही. उलट, परधर्मीय असणाऱ्या विज्ञानवादी विदेशी लोकांनाही आता गंगास्नानाचे महत्त्व पटते आहे. *आणि हीच तुमची पोटदुखी आहे*. 

दुसरे उदाहरण तुम्ही 'पुण्य ते उपकार,पाप ते परपीडा ' या तुकारामांच्या प्रसिद्ध उक्तीचे दिले आहे.आणि कुंभमेळ्यात हजेरी लावणाऱ्या बेछूट तथाकथित धार्मिकांना ही उक्ती माहीत नसावी, असे म्हटले आहे.

कोवीड महामारीच्या काळात जगातील बहुतेक गरीब राष्ट्रांना हजारो कोटी रुपयांची ( किंवा डॉलर्स) किंमतीची लस एक पैसाही न घेता मोदींनी (म्हणजेच धार्मिक भारतीयांनी) पुरविली. हा उपकार म्हणजे पुण्याची फार मोठी कमाई मोदींनी म्हणजेच भारतीयांनी केली, हे लक्षात ठेवूनच भारतीयांनी सलग तिसऱ्यांदा, असे पुण्य मिळवून देणाऱ्या मोदींना पंतप्रधान बनविले, हे तुम्ही विसरलेले दिसतात. आणि कुंभमेळाव्या सारख्या पवित्र ठिकाणी परपिडा करणे भाविकांच्या मनातही येणार नाही, हे जितके खरे तितकेच योगी - मोदींचे विरोधकही धजावणार नाही, इतकी चोख व्यवस्था योगींनी ठेवली आहे. 

जेंव्हा भारतीयांची लोकसंख्या आजच्या पेक्षा तुलनेने कमी होती त्या काळातही कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी होऊन शेकडो लोकांचे बळी गेले आहेत. स्वातंत्र्योत्तर काळात बिगर भाजपा सरकारांच्या काळातही सरकारी अनास्था आणि अव्यवस्थेमुळे शेकडो लोकांचे बळी गेले आहेत. कारण या सरकारांना कुंभमेळ्याचे धार्मिक महत्त्व कळलेच नव्हते. पण योगींनी भारतीयांची कुंभमेळ्याप्रती भारतीयांची श्रद्धा लक्षात घेऊन त्याला एखाद्या उत्सवाचे नीटनेटके रुप दिले. त्यांनी धार्मिक भावनांना योग्य सामाजिक रुपही देण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. मतदान करणाऱ्या सुमारे ८० कोटी लोकांपैकी निम्मे लोकांनी जातीपातीची सर्व बंधने झुगारून एकदिलाने या उत्सवात भाग घेतला. एकीकडे राहुल गांधी जातीच्या मुद्यावर भारतीयांमध्ये फूट पाडण्याचा उद्योग करीत असताना, सर्व भारतीयांची एकजूट करण्याचा यशस्वी प्रयत्न  योगी-मोदींनी कुंभमेळ्यातून साधला आहे, *हे तुमच्या पोटदुखीचे दुसरे कारण आहे*. एक लाखाची राजकीय सभा किंवा मेळावा आयोजित करताना पुढाऱ्यांना किती पैसै वाटावे लागतात, हे उघडे गुपीत आहे, पण इथे तर स्वखर्चाने कोट्यवधी गरीब लोक शेकडो मैलांचा प्रवास करत आनंदाने या उत्सवात सहभागी कसे होतात? असा प्रश्न *हे तुमच्या पोटदुखीचे आणखी एक कारण आहे*.

तसेच, एका धार्मिक उत्सवासाठी सहा, सात हजार कोटी रुपये खर्चून सरकारी तिजोरी मध्ये जवळपास दोन लाख कोटी रुपयांची भर कशी टाकू शकतात, हा ही तुम्हाला भेडसावणारा प्रश्न आहे.

शेवटी, एक अद्वितीय आणि डोळ्यांचे पांग फेडणाऱ्या या उत्सवातील एकूणच सर्व व्यवस्था, स्वच्छता, टापटीप, नियोजन यांचे कौतुक न करता, एका दुर्दैवी घटनेच्या निमित्ताने योगींना एका क्षणात हिरोचा झिरो करून त्यांना व्हिलन बनविण्याचा प्रयत्न तुम्ही आजच्या अग्रलेखातून केला आहे तो कोट्यवधी हिंदूंना मान्य होणार नाही, हे लक्षात ठेवा.


सतीश कुलकर्णी, (9822 064 709).

Monday, 3 February 2025

एकाच या जन्मी जणु फिरुनी नवी जन्मेन मी*

 अप्रतिम लिहिलंय  *सुधीर मोघेंनी...*


*एकाच या जन्मी जणु फिरुनी नवी जन्मेन मी*...."☺️


आयुष्य म्हटलं कि कष्ट आले, त्रास आला ,

मनस्ताप आला ,भोग आले आणि जीव जाई पर्यंत काम आलं...मग ते घरचं असो नाहीतर दारचं....

*बायकांना तर म्हातारपणा पर्यंत कष्ट करावे लागतात...*

75 वर्षाच्या म्हातारीने पण *भाजी तरी चिरुन द्यावी* अशी घरातल्यांची अपेक्षा असते....

हि सत्य परिस्थिती आहे.....

*आपण जोपर्यंत आहोत तोपर्यंत* हे रहाणारच......

त्यामुळे *हि जी चार भांडीकुंडी आपण आज निटनिटकी करतो*...ती मरेपर्यंत करावी लागणार...

ज्या किराणाचा हिशोब आपण आज करतो तोच *आपल्या सत्तरीतही* करावा लागणार....

" *मी म्हातारी झाल्यावर ,माझी मुलं खुप शिकल्यावर त्याच्या कडे खुप पैसे येतील मग माझे कष्ट कमी होतील" *हि *खोटी स्वप्न आहेत*😌....

मुलं , मुली कितीही श्रीमंत झाले तरी ..

" *आई बाकी सगळ्या कामाला बाई लाव पण जेवण तु बनव*.."

असं म्हटलं कि *झालं*...

*पुन्हा सगळं चक्र चालु*..


आणि त्या चक्रव्युहात आपण सगळ्या

अभिमन्यी....,❓🤔


पण..पण ..जर हे असंच रहाणार असेल..

*जर परिस्थिती बदलु शकत नसेल तर मग काय रडत बसायचं का* ??

तर नाही.....

*परिस्थिती बदलणार नसेल तर आपण बदलायला हवं.*....


मी हे स्विकारलय.... *खुप अंतरंगातुन* आणि आनंदाने....


*माझा रोजचा दिवस म्हणजे नवी सुरुवात असते*🌝..... खुप उर्जा आणि उर्मी नी भरलेली.....🧘‍♀️.


*सकाळी सात वाजता जरी कुणी मला भेटलं* तरी मी तेवढ्याच उर्जेनी बोलु शकते *आणि रात्री दहा वाजता* ही...👍

आदल्या दिवशी *कितीही कष्ट झालेले असु देत*....दुसरा दिवस हा *नवाच* असतो....


*काहीच नाही लागत* हो...

हे सगळं करायला🙏.....

*रोज नवा जन्म मिळाल्या सारखं उठा*...

छान आपल्या *छोट्याश्या टेरेस वर डोकावुन थंड हवा* घ्या🏡..आपणच प्रेमाने लावलेल्या झाडावरून हात फिरवा...🪴🌳.

*आपल्या लेकीला झोपेतच जवळ घ्या*👩‍❤️‍👩..

इतकं भारी वाटतं ना....

अहाहा....🤗.

सकाळी उठल की ब्रश करायच्या आधीच रेडिओ📸 लागतो माझा...

*अभंग एकत एकत मस्त डोळे बंद करून* ब्रश केला....ग्लास भरुन पाणी पिलं आणि मस्त...आल्याचा चहा पित.... *खिडकी बाहेरच्या निर्जन रस्त्याकडे बघितलं ना* 

*कि भारी वाटतंं*👌👍.....


*रोज मस्त तयार व्हा*....

आलटुन पालटुन स्वतःवर *वेगवेगळे प्रयोग करत* रहा😊....

कधी हे कानातले ..कधी ते गळ्यातले.....

कधी ड्रेस...*कधी साडी*....

कधी केस मोकळे...*कधी बांधलेले*....

*कधी हि* टिकली तर कधी ती....

*सगळं ट्राय करत रहा....नवं नवं नवं नवं*...

रोज नवं.....

*रोज आपण स्वतःला नविन दिसलो पाहिजे*....


स्वतःला बदललं कि.... आजुबाजुला *आपोआपच सकारात्मक उर्जा पसरत जाईल*........तुमच्याही नकळत......

आणि *तुम्हीच तुम्हाला हव्या हव्याश्या* वाटु लागाल......


मी *तर याच्याही पार पुढची पायरी* गाठलेली आहे....

*माझ्या बद्दल नकारात्मक कुणी बोलायला लागलं कि माझे कान आपोआप बंद होतात*....😃काय माहित काय झालंय त्या कानांना....😃


*आता मी कितीही गर्दीत असले तरी मी माझी एकटी* असते....

मनातल्या मनात मस्त टुणटुण उड्या मारत असते.....


*जे जसं आहे....ते तसं स्विकारते आणि पुढे चालत रहाते*...

कुणी आलाच समोर कि.." *आलास का बाबा*..बरं झालं ..म्हणायचं... *पुढे चालायचं*....

अजगरा सारखी...*सगळी परिस्थिती* गिळंकृत करायची....😃


*माहीत आहे मला*...

*सोपं नाहीये*....


*पण मी तर स्विकारले आहे*...

*आणि एकदम खुश आहे*....

आणि म्हणुनच रोज म्हणते....


" *एकाच या जन्मी जणु*...

*फिरुनी नवी जन्मेन मी*...

*हरवेन मी हरपेन मी*..

*तरीही मला लाभेन मी*....."🙏

Featured post

Lakshvedhi