Showing posts with label .सामाजिक. Show all posts
Showing posts with label .सामाजिक. Show all posts

Thursday, 24 July 2025

आपलं मंत्रालय' गृहपत्रिका अंकाचे

 आपलं मंत्रालयगृहपत्रिका अंकाचे

प्रधान सचिव डॉ. अतुल पाटणे यांच्या हस्ते प्रकाशन

 मुंबईदि. २१ : महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित होणाऱ्या "आपलं मंत्रालय"  या  गृहपत्रिकेच्या जून २०२५ या अंकाचे प्रकाशन  प्रधान सचिव डॉ. अतुल पाटणे यांच्या हस्ते झाले.

यावेळी  सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव (मावज) अजय भोसलेमाहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे  संचालक (माहिती)(प्रशासन) हेमराज बागुलउपसंचालक(प्रशासन) गोविंद अहंकारी आदी मान्यवर उपस्थित होते.

            'आपलं मंत्रालयगृहपत्रिकेच्या अंकामध्ये पर्यावरण धोरण२०२४ अंतर्गत शासनाची भूमिका, पर्यावरण रक्षण व संवर्धनाच्या दृष्टीने शासनाच्या विविध योजनांची आणि उपक्रमांची माहिती, तसेचपर्यटनाशी निगडित आवश्यक पायाभूत सुविधापर्यावरणपूरक पर्यटन विकासव स्थानिक समुदायांच्या सहभागाची भूमिका यावर आधारित सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे.

मंत्रालयातील विविध विभागांतील अधिकारी व कर्मचारी यांनी स्वत: भेट दिलेल्या ठिकाणांची माहिती आणि त्यांच्या वैयक्तिक अनुभवांवर आधारित प्रवासवृत्तांताचा समावेश या विशेषांकात करण्यात आलेला आहे.                                                                          

जिवतीच्या प्रतिमेचे पुजन आणि त्याचा अर्थ कोण हि जिवती? हिच्या पूजनाचा हेतू काय?


जिवतीच्या प्रतिमेचे पुजन आणि त्याचा अर्थ

कोण हि जिवती? हिच्या पूजनाचा हेतू काय?


 जिवतीच्या प्रतिमेचे पुजन आणि त्याचा अर्थ

कोण हि जिवती? हिच्या पूजनाचा हेतू काय?


आषाढ महिन्याच्या अमावस्येला हे दीपपूजन केलं जातं आणि याच दिवशी जरा-जिवंतिका पूजन सुद्धा करतात. 


दिवा हे ज्ञानाचं, वृधिंगतेच प्रतीक आहे. अज्ञानाचा नाश करून ज्ञानाकडे जाणाऱ्या मार्गाचा मुख्य आधार आहे दीप. तुम्ही एक दिवा उजळा त्यावरून तुम्ही हजारो दिवे उजळू शकता त्यामुळेच याला वंश वृद्धीचं प्रतीक मानतात. या प्रतीकाचं पूजन म्हणजेच दीपपूजन


दुसरी पूज्य देवता म्हणजे जिवती. 


जिवतीची प्रतिमेच्या रूपात पूजा केली जाते. संपूर्ण श्रावण महिना या प्रतिमेच पूजन मातृशक्ती कडून केल्या जातं व आपल्या अपत्यांच्या मंगलतेची प्रार्थना केली जाते. ही प्रतिमा विशेष अर्थपूर्ण आहे. या एकाच प्रतिमेत चार वेगवेगळ्या देवतांच्या, वरवर पाहता परस्परांशी संबंध नसलेल्या स्वतंत्र प्रतिमा आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात याच प्रतिमेचे पूजन केले जाते. यातील एकही प्रतिमा बदललेली दिसत नाही. काय रहस्य असेल या प्रतिमा क्रमाचे?


जिवती प्रतिमेत प्रथम नरसिंह, नंतर कालियामर्दन करणारा कृष्ण, मध्यभागी मुलांना खेळवणाऱ्या जरा- जिवंतिका आणि सगळ्यात खाली बुध - बृहस्पती (गुरु) यांचा समावेश असतो. याच क्रमात त्यांना पुजले जाते त्याची कारण मिमांसा...


प्रथम भगवान नरसिंहचं का?


भगवान विष्णूंचा चवथा अवतार असलेले नरसिंह, आपल्या बाळ भक्तासाठी प्रगट  झाले. हि कथा आपल्या सर्वांना परिचयाची आहे. बाळ प्रल्हादाचे हिरण्यकशिपू पासून म्हणजेच दैत्यांपासून रक्षण करणे याच मूळ उद्देशाने भगवंताने हा अवतार धारण केला. बालकांचा रक्षक आणि बाल भक्तासाठी अवतार धारण केलेली देवता म्हणून भगवान नरसिंह या प्रतिमेत पुजले जातात. 


म्हणजेच...

 

नरसिंह घरात ओढवणाऱ्या आपत्तीपासून बाळाचा बचाव करतात जसे उंचावरून पडणे, अन्नातून कधी विषबाधा होणे, आगीपासून होणारी हानी इत्यादी  


त्यानंतर येतात कालियामर्दन करणारा श्रीकृष्ण-


यातील नाग आणि गोपाळकृष्ण दोन्हीपण श्रावणातील  आराध्य दैवत. मग नाग प्रतिमा वेगळी आणि कृष्ण प्रतिमा वेगळी न देता कालियामर्दन  करणारा श्रीकृष्णच का? आपण जर कालियामर्दन प्रसंगाचा विचार केला तर लक्षात येईल कि या प्रसंगात कृष्ण आणि त्याचे मित्र खेळात असतांना त्यांचा चेंडू यमुनेच्या डोहात गेला आणि कृष्णाने तो परत आणला. खेळणाऱ्या- बागडणाऱ्या मुलांवर आलेला वाईट प्रसंग कृष्णाने दूर केला. तसेच कालियाला न मारता त्यालाही अभय देऊन दूर जाण्याचा आदेश दिला. नाग हा सरटपटणाऱ्या प्राण्यांमध्ये मुख्य. सरपटणाऱ्या प्राण्यांपासून वाचवणारा, त्याचबरोबर महत्वाच्या प्राण्यांना अभय देणारा, खेळात बागडत असतांना बालकांवर आलेल्या वाईट प्रसंगातून वाचवणारा कृष्ण येथे कालियामर्दन रूपात पुजला जातो. 


म्हणजेच... 


कालियादमनक कृष्ण बाहेरच्या आपत्तीपासून जसे खेळतांना येणाऱ्या आपत्ती, पाण्यापासूनचे संकट, सरपटणाऱ्या प्राण्यांचे भय इत्यादींपासून बचाव करतात. घरात आणि घराबाहेर बाळांवर येणाऱ्या संकटांपासून हे दोन्हीदेव बालकांचे रक्षण करतात म्हणून जिवती प्रतिमेत त्यांचे प्रथम स्थान. 


नंतर येतात त्या जरा व जिवंतिका -


जरा व जिवंतिका या यक्ष गणातील देवता. जरा या यक्षिणीबद्दल महाभारतात एक कथा येते. मगधनरेश बृह्दरथ याला दोन राण्या असतात. दोन्हीही राण्यांवर त्याचे सारखेच प्रेम असते. परंतु राजाला पुत्र/ पुत्री काहीही नसल्यामुळे राजा चिंतीत असतो. याच सुमारास नगरजवळील उपवनात ऋषी चंडकौशिक आल्याचे राजाला समजते. राजा त्यांचे दर्शन घेऊन आपली चिंता प्रगट  करतो. ऋषी राजाला प्रसादात आंबा देतात व राणीला खायला द्या म्हणून सांगतात. दोन्ही राण्यांवर समान प्रेम असल्यामुळे राजा आंब्याचे समान भाग करून राण्यांना देतो. कालांतराने दोन्ही राण्यांना पुत्र होतो परंतु केवळ अर्धा- अर्धा. अशा विचित्र आणि अर्धवट अभ्राकांना राजा जंगलात नेऊन टाकतो. त्याच वेळेस तेथून जरा नामक यक्षिणी जात असते. ती दोन्ही अभ्रक तुकड्यांना हातात घेते आणि आपल्या अवयव सांधण्याच्या कलेने दोनीही शकलं सांधते. जरा ते सांधलेले अभ्रक संध्यासमयास बृह्दरथ राजाला आणून देते. जरा यक्षिणीने सांधले म्हणून राजा त्याचे नाव जरासंघ ठेवतो आणि जरा यक्षिणीच्या उपकाराप्रीत्यर्थ नगरात देऊळ बांधून तिला मगधाच्या इष्टदेवतेचा मन देतो. त्याच प्रमाणे जारदेवतेचा वार्षिक महोत्सव सुरु करतो, अशी हि जरा देवी. जारेंचीच सखी जिवंतिका. जिवंतिका या शब्दाचा अपभ्रंश जिवती. जिवंतिकेचा अर्थ होतो दीर्घायू प्रदान करणारी. बालकाच्या दीर्घायुष्याची कामना करून या देवीची पूजा करतात. ही देवी पाळण्यात व आजूबाजूंनी बालकांना खेळवतो अशा रूपात दाखवतात. 


प्रतिमेत सगळ्यात शेवटी येतात बुध व बृहस्पती -


बुध हा ग्रह हत्तीवर बसलेला असून हाती अंकुश धारण करतो. तर बृहस्पती (गुरु) वाघावर बसलेला आणि हातात चाबूक घेतलेला दाखवतात. बुधाच्या प्रभावाने जातकाला अलौकिक बुद्धिमत्ता, आकर्षक व्यक्तिमत्व, वाक्पटुत्व इत्यादी गुण प्राप्त होतात. तर बृहस्पतीच्या प्रभावाने शैक्षणिक प्रगती, अध्यात्मिक उन्नती, विवेकबुद्धी जागृत होते. 


बुधाचं वाहन हत्ती - हत्ती हे उन्मत्ततेचं प्रतीक आहे. मानवी मनाला येणारी उन्मत्तता आपल्या बुद्धिमत्तेने, व्यक्तित्वाचा अंकुश घालून आवर घालावा हे बुध प्रतिमेवरुन लक्षात येते. 


बृहस्पतीचं वाहन वाघ - हे अहंकाराचा प्रतीक आहे. मानवी मनाला अहंकार लवकर चिटकतो. अहंकार मानवाच्या सर्व प्रकारच्या प्रगतीमध्ये व आध्यात्मिक साधनेतही बाधक ठरतो. त्यावर आपण ज्ञानाच्या, गुरुकृपेच्या आशीर्वादाने ताबा मिळवावा हे बृहस्पती प्रतिमा आपल्याला शिकवते. 


म्हणूनच बुध - बृहस्पती यांना सुद्धा जिवती प्रतिमेत स्थान मिळालं. 


प्रथम रक्षक देवता.


नंतर जन्मलेल्या बालकाचे रक्षण व दीर्घायुष्य देणारी देवता.


आणि नंतर व्यक्तिमत्व प्रभावित करणारे ग्रह देवता असा हा जिवती प्रतिमेचा क्रम. 


एका मातृशक्तीने दुसऱ्या रक्षक व पालक शक्तीचे केलेले पूजन म्हणजेच जिवती पूजन. जगातील सर्व प्राणिमात्रांच्या उज्वल भविष्याची, रक्षणाची प्रार्थना ...


म्हणजेच जिवती पुजन 


जरे जीवन्तिके देवी बालयुक्ते प्रमोदिनी।

रक्षाव्रते महाशक्ती पूर्णकामे नमोस्तुते।।


संग्रहित


।। इदं न मम ।।

🙏🏼 🌹 🙏🏼

Tuesday, 22 July 2025

देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त कांदिवली पूर्व विधानसभेत आयोजित रक्तदान संकल्प शिबिराचा शुभारंभ

 मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त कांदिवली पूर्व विधानसभेत आयोजित रक्तदान संकल्प शिबिराचा शुभारंभ


आमदार भातखळकर यांच्या हस्ते करण्यात आला.

           यावेळी आमदार भातखळकर म्हणाले कीदेवेंद्रजींच्या सक्षम आणि खंबीर नेतृत्वात महाराष्ट्र गतीने प्रगती करत आहे. त्यांच्या हातून असेच लोककल्याणाचे कार्य घडत राहो आणि आई जगदंबेच्या कृपेने त्यांना उदंड आयुष्य लाभो अशी प्रार्थन केली.

           सेवा आणि संघटन हे भारतीय जनता पक्षाचे वैशिष्ट्य आहे. सेवेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचणेत्यांचे प्रश्न समजावून घेऊन ते सोडवणे अशी विविध कामे आपण भाजपाच्या माध्यमातून करत असतो असे आमदार भातखळकर यांनी सांगितले.

           यावेळी आमदार भातखळकर यांच्या हस्ते रक्तदान केलेल्या रक्तदात्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. शिबिरात सहभागी झालेल्या सर्व रक्तदाते आणि आयोजकांचेही आमदार भातखळकर यांनी अभिनंदन केले.   

                              

Tuesday, 1 July 2025

बुड्ढीलेन सोशल ग्रुप ने घाटी अस्पताल के गरिब मरिजों के लिए जमा किया 777 रक्त

 बुड्ढीलेन सोशल ग्रुप ने घाटी अस्पताल के गरिब मरिजों के लिए जमा किया 777 रक्त


रक्तदान शिविर मंे दिखाई दी गंगा जमनी संस्कृति, पुरुषो सहित महिलाओं ने भी किया रक्तदान

 

शहर संवाददाता। छत्रपति संभाजीनगर

बुड्ढीलेन सोशल ग्रुप की ओर से पिछले साल की तरह इस साल भी घाटी अस्पताल मंे पिछले तीन महीने से रक्त की किल्लत के कारण गरिब मरिजों को दिक्कतो को परेशानी हो रही थी इस बात के मद्देनजर रविवार 29 जून को जामा मस्जिद के इनाम हॉल में रक्तदान शिविर आयोजित किया गया था । जिसमंे रात 10 बजे तक 777 रक्तदाताओं ने रक्तदान किया।

जानकारी अनुसार पिछले साल 605 युवाओं ने रक्तदान किया था। इस साल इसमें 172 की बढोतरी हुई। यानी 18 साल की आयु से 58 साल के वरिष्ठ नागरिक और 20 महिलाओं ने रक्तदान करने से इस बार 777 रक्तदान किया गया।

रक्तदान शिविर मंे गंगा जमनी संस्कृति दिखाई दी। हर जाती धर्म के नागरिक ने इसमें शामिल होकर केवल लोगों की जान बचाने के लिए रक्तदान करने की बात कही। सुबह 10 बजे से शुरु होने वाले शिविर के लिए डयुटी और दूसरे शहर जाने वालो ने जिम्मेदारो को सुबह 8.30 बजे ही फोन पर रक्तदान करने का अनुरोध किया। जिस पर तत्काल दो डाक्टरों को शिविर मंे पहुुंचाकर उनका रक्त लिया गया। शिविर के लिए घाटी अस्पताल के तीन टीम की व्यवस्था की गई थी। जिसमंे एक टीम ने दोपहर तक और दोपहर के बाद 2 टीम ने रक्त लिया। एक टीम में 10 से 12 सदस्य शामिल थे। शिविर में रक्तदान के लिए महिलाएं भी पहुंची । जिनके लि



ए पर्दे की व्यवस्था की गई थी।


कहां कहां से पहुंचे रक्तदाता

बुड्ढीलेन सोशल ग्रुप के रक्तदान शिविर में शहर के कोने कोने सहित दौलताबाद, खुलताबाद, गंगापूर और दिल्ली से आए हुए एक यात्री ने भी रक्तदान किया। शिविर मंे 18 से अधिक विभिन्न जाती के युवाओं ने भी केवल घाटी अस्पताल के गरिब मरिजों को रक्तदान करने के उद्देश से पहुंचे। युवाओं से शिविर मंे आने के बारे में पुछने पर बताया गया कि सोशल मीडिया पर पुलिस आयुक्त प्रवीण पवार सहित कई मान्यवरो की रक्तदान की अपील पर पहुंचे। रक्तदान शिविर को सफल बनाने के लिए सोशल ग्रुप के 150 से अधिक सदस्यो ने परिश्रम किया।

शिविर के दौरान घाटी अस्पताल के अधीष्ठाता डॉ शिवाजी सुक्रे, उप अधीष्ठाता डॉ सोनवणे, आईआरसी के अध्यक्ष एड फैज सैयद के अलावा मान्यवरो ने पहुंचकर युवाओं का हौसला बढाया।

Wednesday, 11 June 2025

पर्यावरणाला हो आणि प्लास्टिकला नो म्हणा -

 पर्यावरणाला हो आणि प्लास्टिकला नो म्हणा - पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे

श्रीमती मुंडे म्हणाल्या कीपर्यावरणाचे संवर्धन हा एक महत्त्वाकांक्षी विषय असून आपण सर्वांनीच  पर्यावरणाच्या संवर्धनाची आवड जोपासणे आवश्यक आहे. शासकीय व खासगी कार्यालयात सर्व कामकाजात कागद मोठ्या प्रमाणात वापरला जातोम्हणून पर्यावरण संवर्धनासाठी आपण सर्वप्रथम  मंत्रालयातील कामकाज कागद विरहित करून आपले पहिले पाऊल उचलूया. पर्यावरणाबद्दलची ही जनजागृती आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रभर पसरवायची आहे. इतरांना जागृत करण्यासाठी सर्वप्रथम आपण जागरूक राहायला हवे. 

पेपर व प्लास्टिकचा वापर  टाळायला हवा. प्लास्टिकच्या पिशवी ऐवजी कापडी पिशवी वापरात आणावी. प्लास्टिकला नो व पर्यावरणाला हो म्हणून आज पासून पर्यावरण संवर्धनाची शपथ घेण्याचे आवाहन मंत्री श्रीमती मुंडे यांनी केले.

Thursday, 5 June 2025

सिंगल यूज प्लास्टिक वापरास नकार, हाच पर्यावरण संवर्धनाला होकार

 सिंगल यूज प्लास्टिक वापरास नकारहाच पर्यावरण संवर्धनाला होकार

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

वातावरण बदल प्रचार मोहिमेचा शुभारंभ

मुंबईदि. ४: वातावरण बदलामुळे होणारी हानी पर्यावरण संवर्धनातून निश्चितच टाळता येणार आहे. पर्यावरणाचा सर्वात मोठा शत्रू प्लास्टिक असून सिंगल यूज प्लास्टिक वापरास नकारहाच पर्यावरण संवर्धनाला होकार असल्याचे उद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. या वर्षी शासनाच्यावतीने १० कोटी वृक्षलागवड मोहिमेत सर्वांनी सहभाग घेत पर्यावरण संवर्धनात आपले योगदान द्यावेअसे आवाहनही त्यांनी केले.

भामला फाऊंडेशन आणि मुंबई महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने बांद्रा येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वातावरण बदलावर जागतिक प्रचार मोहिमेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अँम्फी थिएटर येथे आयोजित कार्यक्रमात करण्यात आला. कार्यक्रमास गोवा राज्याचे परिवहन मंत्री मौविन गोडिन्होमुंबई महापालिका सह आयुक्त दिनेश पल्लेवाडभामला फाउंडेशनचे आसिफ भामला अभिनेत्री रवीना टंडनगोदरेज कंपनीचे नादिर गोदरेजगीतकार स्वानंद किरकिरे उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस म्हणालेकमीत कमी प्लास्टिक वापरून पर्यावरणाची होणारी हानी टाळावी. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहकार्याने विघटनकारी प्लास्टिक निर्माण करणे शक्य आहे. प्लास्टिकला पर्याय अशा विघटनकारी प्लास्टिक निर्मिती करावी. राज्यात राबविण्यात येणाऱ्या वृक्षलागवड मोहिमेत केवळ वृक्ष लागवड करण्यात येणार नसून वृक्ष जिवंत ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहकार्याने करण्यात येणार आहे. या मोहिमेत वृक्षांचे संवर्धनही करण्यात येईल.

देशातील सर्वात मोठे सांडपाणी प्रक्रियेचे जाळे मुंबईत तयार करण्यात येत असून भविष्यात मुंबईतील समुद्रात जाणारे संपूर्ण सांडपाणी प्रक्रिया केलेले असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे २०३० पर्यंत नेट झिरो चे उद्दिष्ट आहे. देशाच्या एकूण ऊर्जे गरजेपैकी ५० टक्के ऊर्जा पारंपरिक ऊर्जा स्त्रोतांकडून मिळविण्याचा मानसही आहे. यामध्ये महाराष्ट्र पुढे असून राज्याने २०२६ पर्यंत कृषी क्षेत्राची १६ हजार मेगावॉट ऊर्जा गरज सौर ऊर्जेपासून भागविण्यासाठी काम सुरू केले आहे. राज्यातील महानगरांमधील संपूर्ण सार्वजनिक परिवहन सेवा ग्रीन ऊर्जेवर आणण्यात येत आहे. मुंबईत याची सुरुवातही करण्यात आली आहे. तसेच मुंबई शहरातील संपूर्ण  परिवहन सेवेचे तिकीट सिंगल तत्वावर आणण्यात येत आहेअसेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

कार्यक्रमादरम्यान पर्यावरण संवर्धन आणि सिंगल यूज प्लास्टिक वापर बंदी जनजागृतीबाबत अभिनेता अजय देवगण यांच्यावर चित्रित प्यासा या प्रचार मोहिमेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते शुभारंभ करण्यात आला.

Sunday, 18 May 2025

वाघा बॉर्डरवर नवीन भारतीय ध्वज: 360 फूट उंच. त्याची किंमत 3.5 कोटी आहे. 55 टन स्टील

 🇮🇳🙏🌸

वाघा बॉर्डरवर नवीन भारतीय ध्वज: 360 फूट उंच. त्याची किंमत 3.5 कोटी आहे. 55 टन स्टील वापरले आहे. झेंडा-पोल बसविण्यासाठी क्रेनसाठी 60 लाख रुपये दिले. ध्वजाची रुंदी 120 फूट आणि उंची 80 फूट आहे.  ध्वज-पोल 360 फूट उंच आहे. 12 ध्वज सुटे ठेवण्यात आले आहेत. हा जागतिक विक्रम आहे.*

*हे आमच्या जमिनीवर 200 मीटर आत उभारलेले आहे. ध्वजारोहण प्रत्येक भारतीयासाठी कौतुकास्पद आहे. तुमच्या ग्रुपवर शेअर करा.*

 *अभिमान आहे भारतीय

 असल्याचा.*

*जय हिंद*


Wednesday, 7 May 2025

दशावतार नावाचे एक व्रत

 ❄❄❄❄❄🏵❄❄❄❄❄

     *🌹🙏।।श्री स्वामी समर्थ।।🙏🌹*

                  *🔸दशावतार.🔸*


*------------------------------------------*

*🔸संकलन: सदानंद पाटील, रत्नागिरी.*

*------------------------------------------*


*दुष्टांचा नाश, सज्जनांचे रक्षण आणि धर्माची स्थापना यांसाठी परमेश्वर युगायुगांत निरनिराळे अवतार घेतो, असे भगवद्‌गीतेत म्हटले आहे. हे दहा अवतार विष्णूचे आहेत. शिव, गणपती, देवी इ. देवतांनीही अवतार घेतले असल्याच्या अनेक कथा पुराणांत आहेत. विष्णूच्या दहा अवतारांपैकी मत्स्य, कूर्म, वराह, वामन व परशुराम या अवतारांची कथाबीजे वैदिक वाङ्‌मयात मिळतात. पुराणांनी विष्णूचे प्रमुख दहा अवतार मानले असले, तरी भागवतपुराणात विष्णूचे चोवीस अवतारही सांगितले आहेत.*


*पुराणांत दशावतारांच्या जन्मतिथी सांगितल्या आहेत. त्या अशा (१) मत्स्य—चैत्र शुद्ध तृतीया, (२) कूर्म—वैशाख पौर्णिमा, (३) वराह—भाद्रपद शुद्ध तृतीया, (४) नरसिंह—वैशाख शुद्ध चतुर्दशी, (५) वामन—भाद्रपद शुद्ध द्वादशी, (६) परशुराम—वैशाख शुद्ध तृतीया, (७) राम—चैत्र शुद्ध नवमी, (८) कृष्ण—श्रावण वद्य अष्टमी, (९) बुद्ध—आश्विन शुद्ध दशमी, (१०) कल्की—श्रावण शुद्ध षष्ठी.*


*विष्णूने हे दहा अवतार कशासाठी घेतले यासंबंधी पुराणांत अनेक कथा आढळतात. मत्स्यावतार- शंखासुराला मारण्यासाठी आणि प्रलयकाळी मनूचे रक्षण करण्यासाठी, कूर्मावतार- देव व दैत्य मंथन करीत असता मंदार पर्वताला आधार देण्यासाठी, वराहावतार- हिरण्याक्ष राक्षसाचा वध करून पाण्यात बुडणाऱ्या पृथ्वीला वर काढण्यासाठी, नरसिंहावतार- हिरण्यकशिपूचा वध करून प्रल्हादाचे रक्षण करण्यासाठी, वामनावतार- तीन पावलात बळीचे सर्वस्व हरण करून बळिराजाला पाताळात लोटून पृथ्वीचे रक्षण करण्यासाठी, परशुरामावतार- सहस्रार्जुनाला मारण्यासाठी आणि दुष्ट क्षत्रियांचा नाश करण्यासाठी, रामावतार- रावणादि राक्षसांचा नाश करण्यासाठी, कृष्णावतार–कंसादी दुष्टांचा वध करण्यासाठी, बुद्धावतार- यज्ञहिंसेचा अतिरेक थांबवून अहिंसेचे तत्त्व प्रतिपादन करण्यासाठी व कल्कीचा अवतार- म्लेंच्छांदी दुष्टशक्तींचा नाश करून धर्मस्थापना करण्यासाठी. हा शेवटचा कलियुगाच्या शेवटी होणार आहे, असे कल्कीपुराणात म्हटले आहे.*


*दशावतारांची ही कल्पना उत्क्रांतिवादावर आधारित आहे, असे एक मत आहे, तर ॲनी बेझंट यांनी आपल्या अवताराज  (१९२५) या पुस्तकात अवतारानुसार वेगवेगळी युगे मानली आहेत. गीतगोविंदकार जयदेवाने श्रीकृष्ण हा श्रेष्ठ देव मानून त्याचे दहा अवतार सांगितले आहेत. कृष्णाऐवजी तो बलराम हा आठवा अवतार मानतो.*


*दशावतार नावाचे एक व्रतही सांगितले आहे. अवतार ज्या दिवशी झाला त्या दिवशी त्या अवताराची मूर्ती तयार करून तिची पूजा, तीस खाद्यपदार्थांचा नैवेद्य असा याचा विधी आहे. या पदार्थांपैकी दहा देवाला, दहा ब्राह्मणाला देऊन दहा स्वतःसाठी ठेवतात.....*

*स्त्रोत: मराठी विश्वकोश,जोशी, रंगनाथशास्त्री...*

❄❄❄❄❄🏵❄❄❄❄❄

Wednesday, 16 April 2025

Pune Municipal Corporation* is ready to supply these plants to any societies who

 Punekars! 🙋🏻‍♀️


*Pune Municipal Corporation* is ready to supply these plants to any societies who want to plant them inside their compounds. . 

They will plant the saplings too , only maintainence will need to be done by the societies….


• Tabubiya yellow

• ⁠Tabubiya pink

• ⁠Palas pink, white, yellow 

• ⁠बहावा

• ⁠बकुळ 

• ⁠चाफा 

• ⁠करंज 

• ⁠कदंब 

• ⁠वड 

• पिंपळ 

• ⁠कडुनिंब 

• ⁠आंबा 

• ⁠चिंच 

• ⁠अर्जुन

• ⁠शिरीष 

• ⁠सदुंबर


Here is the format to share  while forwarding on your groups:


• Name of society / bunglow

• ⁠Type of saplings including number of each required.

• ⁠Contact person from society who will coordinate.


Interested?

Please message *Megha Lawand:*

+91 8149206443

Tuesday, 11 March 2025

*माझ्या वाढदिवसाला* -------------------------शेतकऱ्याचा फायदा.

 *माझ्या वाढदिवसाला*  

---------------------------


माझ्या वाढदिवसाला 

नाही कापणार केक.

शेतकऱ्यांचं हे फळ 

घरी आणीन रे एक.


वाढदिवसाला करा

शेतकऱ्याचा फायदा.


केक ऐवजी एकदा

करा फळाचा वायदा.


फळ कापून रे आता

वाढदिवस सजवा.

माझ्या शेतकऱ्यासाठी 

हात लावा रे उजवा.


पहा आधार देऊन

फळबाग पिकवेल.

जगण्याचं तत्त्वज्ञान

मग तोही शिकवेल.


येता सुगीचे दिवस

तेही स्वप्न आखतील.

शेतकरी बांधवांच्या

आत्महत्या रोखतील.


सफरचंद व पपई

कलिंगड,पेरू,आंबा.

अशी फळं घेऊनच

वाढदिवसाला थांबा.


किती स्वस्त आणि मस्त

असा फळांचा बाजार.

बघा कधीच कुणाला

नाही होणार आजार.


*****************




☘️🌹☘️🌹☘️🌹☘️

Wednesday, 5 March 2025

सायबर गुन्ह्यांमध्ये उकल होण्याच्या टक्केवारीत वाढ हेल्पलाईन क्रमांक १९३० वर संपर्क साधण्याचे आवाहन Pl share

 सायबर गुन्ह्यांमध्ये उकल होण्याच्या टक्केवारीत वाढ

हेल्पलाईन क्रमांक १९३० वर संपर्क साधण्याचे आवाहन

 

मुंबईदि. ०४ : माहे नोव्हेंबर २०२४ अखेर पर्यंत सायबर गुन्ह्यांची उकल होण्याची टक्केवारी २२ टक्के होती. ती वर्षाअखेर म्हणजेच माहे डिसेंबर २०२४ अखेर पर्यंत २५ टक्के इतकी झाली आहे. ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये ६१३ गुन्हे उघडकीस आणण्यात आले असून  ६८३ आरोपींना अटक करण्यात आली आहे. गुन्हे उकल होण्याची टक्केवारी १९ टक्के इतकी आहे. माहे डिसेंबर २०२४ अखेरपर्यंत ७५३ गुन्हे उघडकीस आणले व ७४८ आरोपींना अटक करण्यात आली आहे. गुन्हे उकल होण्याची ही टक्केवारी २२ टक्के इतकी आहे. यावरून सायबर गुन्ह्यांमध्ये उकल होण्याच टक्केवारीत वाढ झालेली दिसून येते.

एखादा सायबर गुन्हा घडल्यास तात्काळ स्थानिक पोलीस ठाणेसायबर पोलीस ठाणेकेंद्र शासनाचे सायबर गुन्ह्यांच्या तक्रारीचे पोर्टल व हेल्पलाईन क्रमांक १९३० येथे संपर्क साधून तात्काळ माहिती देण्यात यावी अथवा तक्रार करावीअसे आवाहनही पोलीसांकडून करण्यात येत आहे.

नोंद झालेल्या जास्तीत जास्त सायबर गुन्ह्यांची उकल करण्याच्या दृष्टीने पोलीस सतत प्रयत्नशील असतात. जास्तीत जास्त सायबर गुन्हे उघडकीस येण्याकरीता सायबर विभागात काम करणारे अधिकारी व अंमलदार यांना तांत्रिक तपासाचे वेळोवेळी अद्ययावत प्रशिक्षण देण्यात येते. सायबर गुन्ह्यांची उकल होण्याच्या टक्केवारीत वाढ झालेली आहे. सायबर गुन्हे रोखण्याकरीता दैनंदिन स्तरावर पोलीस ठाणे हद्दीत घेण्यात येणाऱ्या नागरिकांच्या कॉर्नर मिटींगसोसायटी मिटींगजेष्ठ नागरिकांचे क्लबझोपडपट्ट्या तसेच शाळामहाविद्यालय येथील विद्यार्थ्यांना सायबर गुन्ह्यांविषयी व त्याची कार्यपद्धतीसुरक्षा विषयक उपाय योजनांची माहिती देण्यात येत आहे. कोणत्याही आमिषाला बळी न पडता फसवणूक करणाऱ्या अॅपपासून सावधानता बाळगण्याचे आवाहनही पोलीसांकडून करण्यात येत आहे.

 मोहल्ला समित्या तसेच इतर जनतेच्या बैठकांमध्ये सायबर गुन्ह्यांची माहिती देवून वेळोवेळी चालणाऱ्या सायबर गुन्ह्यांच्या ट्रेंडविषयी जनजागृती करण्यात येत आहे. अनोळखी व्यक्तीकडून सोशल मीडियावर फ्रेन्ड रिक्वेस्ट’ स्वीकारू नये व त्याला कोणताही प्रतिसाद देवू नये. शाळा व महाविद्यालयाच्या सभेमध्ये आणि निर्भया पथकाच्या बैठकांमध्ये देखील अनोळखी व्यक्तींच्या फ्रेंड रिक्वेस्ट’ व प्रतिसाद न देण्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे.  हॅशटॅग #Thodasasochale अन्वये सायबर पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी स्वतः पुढाकार घेऊन तयार केलेल्या व्हिडीओ/चित्रफित इंस्टाग्रामट्विटरव्हॉट्सॲप व युट्यूबमार्फत प्रसारित करण्यात आल्या आहेतअसे सायबर गुन्हे शाखेचे पोलीस उपआयुक्त यांनी कळविले आहे.

००००

Friday, 14 February 2025

मध्यरात्री १२ वाजता वाढदिवस साजरा करता त्यामुळे सावधान...*

 *मध्यरात्री १२ वाजता वाढदिवस साजरा करता त्यामुळे सावधान...*


   आजकाल सुरू झालेली एक विचित्र परंपरा म्हणजे रात्री १२ वाजता वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे आणि साजरा करणे. पण तुम्हाला माहित आहे का?


 *भारतीय धर्मग्रंथ हे चुकीचे मानतात*.. 


आज आम्ही तुम्हाला असे करणे किती *मोठे नुकसान* आहे हे सांगणार आहोत.कारण मोठा अनर्थ* घडू शकतो..


आजकाल कुणाचा वाढदिवस असो, लग्नाचा वाढदिवस असो की, रात्री बारा वाजता केक कापण्याची फॅशन झाली आहे. रात्री बारा वाजता केक कापायचा असल्याने लोकांमध्ये खळबळ उडाली आहे.अनेकदा असे दिसून येते की लोक त्यांचा वाढदिवस १२ वाजता म्हणजेच निशीथ काल (भूत काळ) मध्ये साजरा करतात. , निशीथ काल ही रात्रीची वेळ असते जी *सामान्यतः मध्यरात्री १२ ते पहाटे ३ च्या दरम्यान असते*. सामान्य लोक याला *मध्यरात्र* किंवा अध्यरात्र म्हणतात.


शास्त्रानुसार हा काळ अदृश्य शक्ती, भूत आणि पिशाच यांचा काळ आहे. या काळात ही शक्ती अत्यंत मजबूत होते.


आपण कोठेही राहतो, अशा अनेक शक्ती असतात ज्या आपल्याला दिसत नाहीत, परंतु ज्यांचा आपल्यावर अनेकदा *विपरित* परिणाम होतो.


 ज्यामुळे आपले जीवन विस्कळीत होते.आणि आपण दिशाहीन होतो. हे अनेकदा वाढदिवसाच्या पार्टीत घडते.  अशा भुताटकीच्या काळात केक कापून, दारू आणि मांस सेवन केल्याने अदृश्य शक्ती माणसाचे वय आणि भाग्य कमी करतात आणि दुर्दैव दार ठोठावते असते.


वर्षातील काही दिवस जसे की दिवाळी, ४ नवरात्री, जन्माष्टमी आणि शिवरात्री वगळता, निशीथ काल महानशीठ काल बनतो आणि शुभ परिणाम देतो, तर इतर वेळी तो हानिकारक प्रभाव देतो.


*शास्त्रानुसार रात्री केलेल्या मनोकामना प्रतिकूल परिणाम देतात.आणि धर्मग्रंथानुसार अग्नी विझवून सण साजरे करणे म्हणजे अंधाराची देवता असुराचे आवाहन करण्यासारखे मानले जाते.*


*हिंदू धर्मग्रंथांनुसार दिवसाची सुरुवात सूर्योदयाने होते आणि हा काळ ऋषीमुनींच्या तपश्चर्येचाही असतो.त्यामुळे या काळात वातावरण शुद्ध आणि नकारात्मकतेपासून मुक्त असते. अशा परिस्थितीत, शास्त्रानुसार, एखाद्या व्यक्तीच्या वाढदिवसाच्या दिवशी सूर्योदयानंतरच शुभेच्छा दिल्या पाहिजेत कारण रात्रीच्या वेळी वातावरणात रज आणि तम कणांचे प्रमाण खूप जास्त असते आणि त्या वेळी दिलेल्या शुभेच्छा निष्फळ ठरतात. शुभेच्छा फलदायी होण्याऐवजी हानिकारक ठरतात.*


🙏🏻 *कृपया हा लेख तुमच्या जवळच्या जास्तीत जास्त लोकांना पाठवा*🙏🏻

*🌹💐सर्वांना शुभेच्छा 💐🌹*

विलेपार्ले येथे ‘उत्तुंग महाखादी प्रदर्शन’चे आयोजन pl share

 विलेपार्ले येथे ‘उत्तुंग महाखादी प्रदर्शन’चे आयोजन

           

मुंबईदि. १४ : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने ग्रामीण कारागीर व उद्योजकांनी तयार केलेल्या उत्पादनांना शहरी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी विलेपार्ले येथे "उत्तुंग महाखादी प्रदर्शन" आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन दि. १८ ते २३ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत महालक्ष्मी नारायण हॉल लॉन्ससुभाष रोडविलेपार्ले (पूर्व) येथे होणार असूनदररोज सकाळी १०.०० ते रात्री ८.०० वाजेपर्यंत नागरिकांना या प्रदर्शनाला भेट देता येणार आहेअशी माहिती मंडळाचे सभापती रवींद्र साठे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गीतांजली बाविस्कर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 या प्रदर्शनात खादी वस्त्रखादी साड्याशुद्ध सेंद्रिय ‘मधुबन’ मधहळदमसालेकोल्हापूरी चप्पलगूळ तसेच इतर ग्रामोद्योग उत्पादने यांसारख्या वस्तूंचे ५० स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत. खादीच्या स्वदेशी वस्त्रांबरोबरच आरोग्यासाठी लाभदायक सेंद्रिय उत्पादने आणि ग्रामीण भागातील कारागिरांनी साकारलेली दर्जेदार उत्पादने ग्राहकांना उपलब्ध होतील.

 ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी खादी व ग्रामोद्योग मंडळ मागील ६५ वर्षांपासून अविरतपणे कार्यरत आहे. राज्य शासनाच्या उद्योग विभागांतर्गत खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या विविध योजना राबवल्या जातात. पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रममुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रममधकेंद्र (मधमाशापालन)मधाचे गाव तसेच प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना अशा अनेक उपक्रमांद्वारे ग्रामीण कारागीर आणि उद्योजकांना आर्थिक मदत आणि व्यवसायवृद्धीसाठी संधी दिली जाते.

 ग्रामीण संस्कृती आणि पारंपरिक उत्पादने अनुभवण्याची तसेच खादी आणि ग्रामोद्योग वस्तूंची खरेदी करण्याची सुवर्णसंधी या प्रदर्शनात मिळणार आहे. या प्रदर्शनास अधिकाधिक मुंबईकर नागरिकांनी भेट द्यावीअसे आवाहन महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग सभापती साठे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती बाविस्कार यांनी मंडळाच्या वतीने केले आहे.

तत्काळ! तत्काळ! तत्काळ! सकाळच्या शुभेच्छा आणि रात्रीच्या शुभेच्छा असलेल्या चित्रांचा अधिक वापर करू नका.pl share

 तत्काळ!

तत्काळ!

तत्काळ!


सकाळच्या शुभेच्छा आणि रात्रीच्या शुभेच्छा असलेल्या चित्रांचा अधिक वापर करू नका. खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचा. हे सत्य आहे.


प्रिय कुटुंब आणि मित्रांनो,

उद्या पासून कृपया नेटवर्कवरील चित्रे पाठवणे किंवा स्वीकारणे थांबवा. खालील लेख वाचा आणि समजून घ्या. मीसुद्धा थांबवणार आहे.

कृपया सकाळच्या, संध्याकाळच्या शुभेच्छा, इतर ग्रीटिंग्स आणि धार्मिक संदेश असलेली सर्व चित्रे आणि व्हिडिओ शक्य तितक्या लवकर डिलीट करा. खालील माहिती वाचा आणि का हे महत्त्वाचे आहे ते समजून घ्या.

हे सर्वांना वाचा! कृपया हा संदेश शक्य तितक्या मित्रांना पाठवा जेणेकरून बेकायदेशीर हॅकिंग टाळता येईल.


ओल्गा निकोलायेव्हनाच्या वकिलाकडून इशारा:


लक्ष द्या! सकाळच्या शुभेच्छा, चांगला दिवस आहे, संध्याकाळच्या शुभेच्छा या प्रकारचे संदेश पाठवणाऱ्यांसाठी:

कृपया असे संदेश पाठवू नका.

आज शांघाय, चीन इंटरनॅशनल न्यूजने सर्व ग्राहक आणि तज्ञांना एसओएस इशारा दिला आहे – सूचना: शुभ सकाळ, शुभ रात्री यांसारख्या संदेशांसाठी चित्रे आणि व्हिडिओ पाठवू नका.


अहवालात असे दिसून आले आहे की हे चित्र आणि व्हिडिओ डिझाइन करणारे हॅकर्स यामध्ये फिशिंग कोड लपवतात. जेव्हा तुम्ही हे संदेश पाठवता, तेव्हा हॅकर्स तुमच्या डिव्हाइसचा वापर करून तुमची वैयक्तिक माहिती जसे की बँक कार्ड डिटेल्स आणि डेटा चोरतात व तुमच्या फोनमध्ये घुसखोरी करतात.


अहवालानुसार, 5 लाखांहून अधिक लोकांना यामुळे फसवले गेले आहे.

जर तुम्हाला दुसऱ्यांना शुभेच्छा द्यायच्या असतील, तर कृपया तुमच्या स्वतःच्या शब्दांत संदेश लिहा आणि तुमचे स्वतःचे चित्र किंवा व्हिडिओ तयार करून पाठवा. असे केल्याने तुम्ही स्वतःचे आणि तुमच्या कुटुंबाचे संरक्षण करू शकता.


महत्त्वाचे! सुरक्षिततेसाठी, तुमच्या फोनमधील सर्व शुभेच्छा संदेश आणि चित्रे डिलीट करा. जर कोणी तुम्हाला अशा प्रकारची चित्रे पाठवली असतील, तर ती डिव्हाइसवरून तात्काळ काढून टाका.

हॅकिंग कोड पूर्णपणे कार्यान्वित होण्यास थोडा वेळ लागतो, त्यामुळे जर तुम्ही तात्काळ पाऊल उचलले, तर कोणतीही हानी होणार नाही.


तुमच्या सर्व मित्रांना सांगा, जेणेकरून हॅकिंग होण्यापासून बचाव होऊ शकेल.


तुमच्या स्वतःच्या शब्दांत शुभेच्छा द्या आणि फक्त तुमच्या स्वतःच्या तयार केलेल्या चित्रांचा व व्हिडिओंचा वापर करा, जे सुरक्षित आहेत. प्रत्येकाकडे मोबाईलवर बँक कार्ड्स लिंक केलेले असते, आणि संपर्कसुद्धा असतात. या प्रकारच्या हॅकिंगमुळे तुम्हाला आणि तुमच्या मित्रांना मोठा धोका निर्माण होतो.


ही एक नवीन पद्धत आहे, ज्याद्वारे दहशतवादी तुमच्या सिम कार्डपर्यंत पोहोचून तुम्हाला त्यांचा साथीदार बनवू शकतात!!!


हा संदेश शक्य तितक्या नातेवाईक आणि मित्रांना पाठवा, जेणेकरून अनधिकृत घुसखोरी थांबवता येईल!!!

Thursday, 13 February 2025

अहिराणी बोली भाषावैज्ञानिक ओळख खानदेश प्रस्ताविक

 अहिराणी बोली भाषावैज्ञानिक ओळख

खानदेश प्रस्ताविक

अहिराणी ही खानदेश या भू प्रदेशात बोलली जाणारी बोली. महाराष्ट्रातील धुळे आणि जळगाव या दोन जिल्ह्यांच्या मिळून होणाऱ्या प्रदेशास आजही खानदेश म्हणून ओळखतात. पूर्वी खानदेश हा मुंबई इलाख्याचा एक जिल्हा होता. प्राचीन काळी खानदेश या प्रदेशाचा विस्तार सातपुडा पर्वतापासून दक्षिणेकडे सातमाळा व अजिठ्यांचे डोंगर येथ पर्यंत तर पूर्वेकडील वऱ्हाड प्रांत ते निमाड जिल्हा पासून पश्चिमेकडे बडोदे संस्थान व रेवाकाठ जहागिरी पर्यंत इतका होता. याचे अतिप्राचीन नाव ऋषिकदेश. यादवांच्या काळात हा भूभाग सेउनदेश म्हणून ओळखला जाई. मोगलांच्या काळात हा भाग खानदेश म्हणून ओळखला जाई. व्यवस्थापनाच्या दृष्टिने इ.स. १९०६ मध्ये खानदेश जिल्ह्याचे पूर्व खानदेश व पश्चिम खानदेश हे दोन भाग पाडण्यात आले. पुढे १९६० पासून पूर्व खानदेशास जळगांव जिल्हा व पश्चिम खानदेशास धुळे जिल्हा अशी नावे देण्यात आली.

खानदेश इतिहास :

रामायण- महाभारत यांतील उल्लेखलेल्या ऋषकदेश या भूप्रदेशाच्या वर्णनाशी खानदेशाचा भूभाग जुळतो. खानदेश या शब्दाची उत्पत्ती कान्हदेवकान्हेरदेवकान्हाचा देशकानबाई या शब्दांत शोधण्याचा आजवर प्रयत्न झालेला आहे. मात्र त्यात तथ्य वाटत नाही. खानदेश या भूप्रदेशाहून इतरत्र कान्हाचा किंवा श्रीकृष्णाचा संबंध अधिकचा आहे. तसेच खानदेशातील अनेक उत्सवांपैकी कानबाईकानुबाई हा एक उत्सव आहे. त्यामुळे एखाद्या भूप्रदेशाला त्या परिसरातील एका उत्सवाच्या नावाने ओळखले जाणे ही शक्यताही कमीच आहे. कान किंवा कानन म्हणजे अरण्यवनगवताळ प्रदेश. कान किंवा खान या शब्दाचा अर्थ खाणखदानथाळामध्ये खोल असणारा भागखनि किंवा उत्पत्तीस्थान. सातपुडांच्या रांगासह्याद्रीच्या रांगाचांदवडचे डोंगर आणि वाघूर नदी व परिसरातील डोंगर रांगा यामुळे हा परिसर खोल खदाणी सारखाखाणीसारखा आहेच. गिरणातापीनर्मदा या नद्यांच्या खोऱ्यांचा हा भाग दाट अरण्याचागुरांसाठी विपूल गवत असणारा प्रदेश. येथे विपुलता (खाण) होतीचौफेर नैसर्गिक तटबंदीमूळे (भेसळ मुक्त अशी) शुद्धताव शुद्ध वंश (खानखानदानी) होती. म्हणून खदाणीचा खाणीचा देशचांगल्या वंशाचा-खानदानीचा देशगवताचा-कानन देश यावरुन खानदेश हे नामाभिद्यान झाले असावेया व्युत्पत्तीचांही विचार करण्याजोगा आहे.

अशिरगड हे अश्वत्थाम्याचे स्थान होते. पांडवाविरुद्ध तोरणमाळचा राजा लढला होता ते तोरणमाळ धुळे जिल्ह्यात आहे असे महाभारतकालीन उल्लेख आढळतात. चाळीसगांव जवळील पाटणे परिसरात आद्य पराष्मयुग व तदनंतर अप्पर पराश्म युगात मानवी वस्ती होती हे उत्खननात सापडलेल्या पाच स्थरांवरुन सिद्ध होते. बहाळ येथे सापडलेली नाणीघटोत्कच लेण्यानागदमूंदखेडेमेहुनबारेबहुलवाड येथे सापडलेले ताम्रपटसारजादेवी मंदिरावरील शिलालेखअंजिठा लेण्याया पुराव्याआधारे खानदेशच्या इतिहासावर प्रकाश पडतो. खानदेशात इ.स.पूर्व चौथे ते इ.स. दुसरे शतकात मौर्याचे राज्य होते. पहिल्या शतकात सातवाहनांची सत्ता होती. ३ रे ते ५ वे शतकांत वाकाटकांची सत्ता होती (वर्षदेवस्वामीदासमुलंदा) चौथ्या शतकांत वाकाटकांसोबतच अभीरांचीही सत्ता होती. इ.स. ६५५ ते ७०२ या काळात सेद्रकांचे (निकुम्माल्लशक्तीनृपती जयशक्तीनृपती वैरसेन) राज्य होते. या सोबतच सहाव्या शतकांत कलचुरी तर सातव्या शतकांत पुलकेशीचे तर आठव्या शतकात त्रैकूटकांचे राज्य होते. त्यानंतर नवव्या ते बाराव्या शतका पर्यंत राष्ट्रकूटसोमवंशीआणि यादव यांचे राज्य होते. पुढे अल्लाउद्दीन खिलजीअकबरयांच्या सत्तेनंतर १८ व्या शतकांत (इ.स-१७२०) निजामांचे राज्य होते. १७६० ते १८१८ हा मराठ्यांचा काळ तर १८१८ ते १९४७ हा ब्रिटिशांचा काळ गणला जातो.

पासष्टी (६५) पार करतांना* *सर्वांनी अवर्जुन वाचाच*...

 *पासष्टी (६५)  पार करतांना* 

*सर्वांनी अवर्जुन वाचाच*...


एकदा एका साठी ओलांडलेल्या आणि सत्तरीच्या  वाटेवर असणाऱ्या मित्राला त्याच्या मित्राने विचारले, "मित्रा, तुझ्यात काय बदललंय असे तुला वाटतंय?" त्यानंतर त्या मित्राने जे उत्तर दिले ते आपल्यातील प्रत्येकाने समजून घेतलं तर प्रत्येकांसाठी आपले आयुष्य सुसह्य होईल हे निश्चित! त्याने जे उत्तर दिले ते असे.


१.आजवर मी माझ्या आईवडिलांवर, भावंडांवर, मुलांवर, बायकोवर, सहकाऱ्यांवर, शेजाऱ्यापाजाऱ्यांवर, मित्रांवर खूप प्रेम केले, त्यांची खूप काळजी घेतली. पण आता मी स्वतःवर प्रेम करायला लागलोय, आता मी स्वतःची काळजी घ्यायला सुरुवात केलीय.


२.मला याची जाणीव झालीय की, आता मी शारिरीक किंवा मानसिकदृष्ट्या इतका सक्षम राहिलो नाही की कुणीही यावं आणि त्यांनी आपले ओझे माझ्या खांद्यावर टाकावे.


३.आता मी भाजीवाल्याशी, फळविक्रेत्याशी, फेरीवाल्याशी घासाघीस करायचं सोडून दिलंय. उलट आता मला असं वाटतं की माझ्या काही पैश्याने त्यांच्या मुलांचे शिक्षण होणार असेल किंवा त्याची गरीबी दूर होणार असेल तर चांगलेच होईल ना! 


४.आता मी माझ्या जीवन संघर्षाच्या कहाण्या इतरांना सांगण्याचं आणि सल्ले देण्याचं बंद केलंय. कारण एकतर त्या सगळ्यांना सांगून झाल्या आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या आता कदाचित कालबाह्य झाल्या आहेत. माझ्या त्या संदर्भांचा आजच्या पिढीला किती उपयोग होईल हे माझे मलाच माहीत नाही.


५.आता मी कुणाला त्याच्या चुका सांगण्याच्या किंवा काय बरोबर आणि काय चुकीचे हे सांगण्याच्या भानगडीत पडत नाही.‌ कारण सगळ्यांना सुधारण्याची जबाबदारी माझी  एकट्याची नाही हे मला कळून चुकलंय. आता मला इतरांच्या परफेक्शनपेक्षा माझी शांतता अधिक महत्वाची वाटते.


६.आता मी समोरच्याच्या चांगल्या गोष्टीसाठी त्याला निखळ दाद द्यायला आणि त्याचे कौतुक करायला शिकलोय. त्याने समोरच्याला बरे वाटते, तो सुखावून जातो.


७.आता माझ्या अंगावरच्या कपड्यांची घडी चुरगाळलेली असेल किंवा शर्टावर एखादा डाग पडला असेल तर त्याचा मला खूप फरक पडत नाही. जे लोक मला अंतर्बाह्य ओळखतात त्यांच्यासाठी माझा पेहराव फार महत्वाचा नाही हे मला कळून चुकलंय.


८.ज्यांना माझी किंमत नाही अशांना मी आता दुर्लक्षित करतो. कारण त्यांना माहित नसली तरी मला माझी किंमत चांगली माहिती आहे.


९.आता माझं वय कुरघोड्या करण्याचं राहिलेलं नाही.


१०.आता मला माझ्या भावना व्यक्त करायची लाज वाटत नाही. भावना असणं हे जिवंतपणाचे लक्षण आहे. आता हसावंसं वाटलं की हसून घ्यायचं आणि रडावंसं वाटलं की रडून घ्यायचं. भावना लपवण्याच्या नादात उगाच घुसमटत रहायचं नाही.


११.आपला अहंकार आपल्या नात्याच्या आड येणार नाही याची मी पूर्ण काळजी घेतो. प्रसंगी मला थोडा कमीपणा घ्यायला लागला तरी मी एकवेळ तडजोड करतो, पण स्वतःचा स्वाभिमान सांभाळून! कारण नाते टिकवण्याची जबाबदारी कुणा एकाची असूच शकत नाही.


१२.आता मी येणारा प्रत्येक क्षण सर्वार्थाने जगण्याचा प्रयत्न‌ करतो. मला जे करावसं वाटत ते मी करतो. फक्त एवढंच की, माझ्या स्वछंदी जगण्याचा इतरांना त्रास होणार नाही याची मी काळजी घेतो.


१३.मला माहित आहे की, जे मी आजवर जगलोय त्यापेक्षा *आता माझ्याकडे वेळ फार कमी आहे त्यामुळे आज मी ना भूतकाळात जाऊन पश्चात्ताप करत बसत, ना भविष्यकाळात जाऊन  चिंता करत बसत*


*आता निख्खळ आणि निख्खळ जीवनाचा आनंद घ्यायचा आणि जेवढा इतरांना देता येईल तितका द्यायचा*


१४..आता माझं उर्वरित आयुष्य पैसे मिळवण्यासाठी नसून परोपकारासाठी असल्याची भावना मनात निर्माण झाली आहे.


खरंच, वर दिलेल्या एका मित्राच्या उत्तरातून आपण काही समजून घेतलं तर आपल्यातील प्रत्येकाला किती छान जीवन जगता येईल ना?


१५.आत्ता  कळले जीवन सुंदर आहे. पण ते सरळमार्गाने जगणाऱ्या व्यक्तीचे आहे.


१६.आपण आपल्या लोकांसाठी कितीही सम्पत्ती जमविली तरी एक वेळ अशी येते की तीच घरची लोक आपल्याला कंटाळून जातात, कटू आहे पण सत्य आहे कारण


१७.आपली मुले आपल्या पोटी जन्माला आली आहे पण आपल्यासाठी जन्माला आलेली नाही ते, आपण त्यांना लावलेल्या मजबूत पंखानी स्वतःचे नवीन घरटे बांधायला व आकाशात उडायला आलेली आहेत हे लक्षात ठेवावे व अपेक्षा रहित जीवन जगावे म्हणजे त्रास कमी होईल


*🌹खूप खूप शुभेच्छा (६०-७०) सत्तरीच्या, वाटेवर असणाऱ्या मित्रांना, स्वतःची काळजी घ्या, व आपल्या अर्धांगिनीची ची काळजी करा l* 🌹


            *राम    कृष्ण    हरी*

Featured post

Lakshvedhi