Showing posts with label . मार्गदर्शन केंद्र. Show all posts
Showing posts with label . मार्गदर्शन केंद्र. Show all posts

Sunday, 15 March 2026

ग्राहकांचे मूलभूत अधिकार

 ग्राहकांचे मूलभूत अधिकार

ग्राहक चळवळीमुळे ग्राहकांना काही मूलभूत अधिकार प्राप्त झाले आहेत. १९६२ मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन. एफ. केनीडी यांनी अमेरिकन काँग्रेससमोर ग्राहक हक्कांविषयी ऐतिहासिक भाषण करत चार मूलभूत अधिकार मांडले. त्यात पुढील अधिकारांचा समावेश होता 

सुरक्षेचा अधिकार (Right to Safety) – धोकादायक वस्तू किंवा सेवांपासून संरक्षण, माहितीचा अधिकार (Right to be Informed) – वस्तूची गुणवत्ताप्रमाणकिंमत आणि दर्जा याबाबत अचूक माहिती मिळण्याचा अधिकार, निवडीचा अधिकार (Right to Choose) – विविध पर्यायांमधून वस्तू किंवा सेवा निवडण्याचा अधिकार, मते मांडण्याचा अधिकार (Right to be Heard) – ग्राहकांचे मत शासन आणि धोरण प्रक्रियेत ऐकले जाणे.

यानंतर संयुक्त राष्ट्रांनी १९८५ मध्ये ग्राहक संरक्षणासाठी मार्गदर्शक तत्त्वे स्वीकारून ग्राहक शिक्षणतक्रार निवारणमूलभूत गरजांची पूर्तता आणि निरोगी पर्यावरणाचा अधिकार यांसारखे अतिरिक्त अधिकारही मान्य केले.

डिजिटल युगातील ग्राहक संरक्षणई-जागृती (e-Jagriti) पोर्टल ग्राहकांच्या तक्रारींचे जलद pl share

 डिजिटल युगातील ग्राहक संरक्षण

 ई-जागृती (e-Jagriti) पोर्टल ग्राहकांच्या तक्रारींचे जलद आणि पारदर्शक निवारण व्हावे यासाठी भारत सरकारने ग्राहक न्यायव्यवस्थेचे डिजिटलायझेशन केले आहे. यामध्ये ई-जागृती (e-Jagriti) पोर्टल महत्त्वाची भूमिका बजावतात.

e- Jagriti ही ग्राहक न्यायालयांना संगणकीकृत करून एकमेकांशी जोडणारी प्रणाली आहे. या माध्यमातून जिल्हाराज्य आणि राष्ट्रीय ग्राहक आयोगातील प्रकरणांची माहिती ऑनलाइन उपलब्ध होते. ग्राहकांना आपल्या तक्रारीची स्थितीसुनावणीची तारीखआदेश (orders) आणि कारणपत्र (cause list) इंटरनेटवर पाहता येते. त्यामुळे न्यायालयीन प्रक्रियेत पारदर्शकता वाढते आणि ग्राहकांना वेळेवर माहिती मिळते.

या पोर्टलद्वारे ग्राहकांना घरबसल्या ऑनलाइन तक्रार दाखल करणेआवश्यक कागदपत्रे अपलोड करणेशुल्क भरने आणि प्रकरणाची स्थिती पाहणे शक्य होते. तसेच SMS आणि ई-मेलद्वारे प्रकरणाबाबतची माहितीही मिळते.

या डिजिटल प्रणालीमुळे ग्राहक न्यायव्यवस्था अधिक सुलभवेगवान आणि पारदर्शक झाली आहे. ग्राहकांना न्याय मिळवण्यासाठीची तक्रार निवारण प्रक्रिया अधिक कार्यक्षम झाली आहे.

Friday, 13 March 2026

खासगी पूर्व-प्राथमिक शाळांची नोंदणी, नियमन आणि गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी अधिनियम आणणार

 खासगी पूर्व-प्राथमिक शाळांची नोंदणीनियमन आणि गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी अधिनियम आणणार

– शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

 

मुंबई,दि.१३ : राज्यातील तीन ते सहा वर्षे वयोगटातील बालकांना दर्जेदार व सुरक्षित पूर्व-प्राथमिक शिक्षण उपलब्ध व्हावेयासाठी खासगी पूर्व-प्राथमिक शाळांची पोर्टलवर अनिवार्य नोंदणीनियमनव गुणवत्ता सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने अधिनियम आणण्याची प्रक्रिया सुरू आहेअशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी विधानसभेत दिली.

राज्यातील खासगी पूर्व-प्राथमिक शाळांची नोंदणी पोर्टलवर अनिवार्य करण्याबाबत सदस्य मनीषा चौधरी यांनी प्रश्न उपस्थित केला. या चर्चेत सदस्य विक्रम पाचपुतेप्रवीण दटकेयोगेश सागर आणि अभिमन्यू पवार यांनी सहभाग घेतला.

मंत्री दादाजी भुसे म्हणाले कीपूर्व-प्राथमिक शिक्षण देणाऱ्या सर्व खासगी केंद्रांची माहिती राज्यजिल्हा प्रशासन आणि पालकांना एकत्रित स्वरूपात उपलब्ध व्हावीया उद्देशाने शालेय शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावरील प्री-स्कूल रजिस्ट्रेशन पोर्टलवर नोंदणी करणे २४ एप्रिल २०२५ च्या शासन परिपत्रकाद्वारे बंधनकारक करण्यात आले आहे.

या पोर्टलवर शाळेचे स्थानवर्गखोल्यांची संख्याव्यवस्थापनविद्यार्थ्यांची संख्यापायाभूत सुविधाशाळेची इमारतक्रीडांगणस्वच्छतागृहपिण्याच्या पाण्याची व्यवस्थासीसीटीव्ही तसेच शिक्षक व कर्मचारी याबाबतची माहिती देणे अपेक्षित आहे. राज्यात आतापर्यंत १२ हजार ७३३ खाजगी पूर्व-प्राथमिक शिक्षण देणाऱ्या केंद्रांची नोंदणी झालेली असून उर्वरित संस्थांनाही नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहेअसेही मंत्री भुसे यांनी सांगितले.

Thursday, 12 March 2026

कर्करोग उपचाराबाबत राज्याने त्रिस्तरीय (एल 1, एल 2 आणि एल 3) व्यवस्था

 कर्करोग उपचाराबाबत राज्याने त्रिस्तरीय (एल 1, एल 2 आणि एल 3) व्यवस्था तयार केली आहे. एल 1 स्तरावर टाटा मेमोरियल हॉस्पीटल सारखी विशेष संस्था ठेवण्यात आली आहेतर एल 2 स्तरावर सुमारे 10 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये कर्करोग उपचार सुविधा विकसित केल्या जात आहेत. L3 स्तरावर इतर रुग्णालयांमध्येही उपचार व्यवस्था मजबूत केली जात आहे. त्यामुळे राज्यात कर्करोगावरील उपचार अधिक प्रभावीपणे उपलब्ध होतीलअसा विश्वास मंत्री मुश्रीफ यांनी व्यक्त केला.

            याशिवाय हाफकीन इन्स्टिट्युट येथे पुन्हा मोठ्या प्रमाणावर लस उत्पादन सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. संस्थेच्या कामकाजाबाबत करण्यात आलेल्या तक्रारींची चौकशी करून आवश्यक ती कारवाई केली जाईलअसेही त्यांनी स्पष्ट केले.

Wednesday, 11 March 2026

*भारत कधी हारतो?* Pl share

 *भारत कधी हारतो?*


भारताने क्रिकेट सामना जिंकल्यानंतर भरपूर फटाके वाजवून आपण आनंद व्यक्त करतो. परंतु नेहमीच्या आपल्या रोजच्या जीवनात आपण भारताला अनेक वेळा स्वतःहून हरवत असतो. चला जाणून घेऊया आपण भारताला कुठे कुठे आणि कधी कधी हरवतो.


ज्यावेळी कचरा हा कचरा कुंडीत न टाकता कुठेही रस्त्यावर टाकतो तेव्हा भारत हारतो.


जेव्हा आपण बाहेर सार्वजनिक ठिकाणी, रेल्वे मध्ये, बस मध्ये, गाडी चालवत असताना पचापच पिचकाऱ्या मारतो तेव्हा भारत हारतो.


येथे थुंकू नये असा फलक लावलेला असतो तेथेच थुंकतो तेव्हा भारत हारतो.


कोर्ट, कचेरी, सार्वजनिक इमारती मधील सगळे जीने, कोपरे, स्वच्छता गृहे लाल बुंद करतो तेव्हा भारत हारतो.


थुंकू नये म्हणून देवाचे फोटो लावावे लागतात आणि तरीही थुंकतो तेव्हा भारत हारतो.


काढलेल्या कर्जाचे हप्ते वेळेवर न भरता कर्ज कसे बुडीत जाईल असा विचार करतो तेव्हा भारत हारतो.


ग्राहकांकडून वाजवी नफा घेऊन माल न विकता अवास्तव नफा घेतो तेव्हा भारत हारतो.


खरेदीसाठी बाहेर पडताना थैली न घेता जातो आणि भरपूर प्लास्टिक पिशव्या घेऊन घरी येतो तेव्हा भारत हारतो.


गर्दीच्या ठिकाणी रांगेत न जाता मध्येच घुसतो तेव्हा भारत हारतो. 


आंदोलन, मोर्चे काढताना सरकारी, सार्वजनिक संपत्तीचे नुकसान करतो तेव्हा भारत हारतो.


लोकांशी कठोरपणे अव्यवहाने वागतो तेव्हा भारत हारतो.


शेजारीपाजारी किरकोळ कारणावरून वाद घालतो तेव्हा भारत हारतो.


गरीब भाजीवाल्याकडे हुज्जत घालतो आणि हाॅटेलमध्ये गेल्यावर चार पाच हजारांचे झटक्यात ऑनलाईन पेमेंट करतो तेव्हा भारत हारतो. 


बसमध्ये, रेल्वेमध्ये प्रवास करताना कचरा आणि अस्वच्छता करतो तेव्हा भारत हारतो.


पर्यटनासाठी बाहेर निसर्गात गेल्यावर तेथे कचरा, बाटल्या फेकतो तेव्हा भारत हारतो.


वाहने चालवताना फोनवर बोलत गाडी चालवतो तेव्हा भारत हारतो.


वाहतुकीचे नियम न पाळता अत्यंत बेदरकारपणे वाहने चालवतो व आपल्या बरोबर दुसऱ्यांच्या जीवाला धोका उत्पन्न करतो तेव्हा भारत हारतो.


कायदे, नियम हे दुसऱ्यांनी पाळण्यासाठी आहेत असा विचार करतो व स्वतः बेदरकारपणे वागतो तेव्हा भारत हारतो.


गाडी पार्क करताना मोकळी जागा आहे म्हणून कशीही पार्क करतो तेव्हा भारत हारतो.


प्रत्यक्ष आणि फोनवर बोलताना शिष्टाचाराचे पालन करत नाही तेव्हा भारत हारतो.


आपला धर्म संस्कृती टिकावी वाढावी यासाठी काहीही करत नाही व फक्त मौजमजा करण्यासाठी जगतो तेव्हा भारत हारतो.


घरातील सदस्यांना नातेवाईकांना चांगली, सन्मानाने वागणूक देत नाही तेव्हा भारत हारतो.


दुसऱ्याचं वाईट चिंतन करतो, द्वेष मत्सर करतो तेव्हा भारत हारतो.


गैरमार्गाने भ्रष्टाचार करून घरात पैसा आणतो तेव्हा भारत हारतो.


समाजात वावरताना महिलांकडे वाईट नजरेने पाहतो तेव्हा भारत हारतो.


स्वदेशीचा आग्रह न धरता विदेशी वस्तू व वाहने खरेदी करतो तेव्हा भारत हारतो.


पाण्याचे हवेचे कसलाही विचार न करता प्रदूषण करतो तेव्हा भारत हारतो.


पाणी, वीज, पेट्रोल डिझेल यांचा अंधाधुंद वापर करतो तेव्हा भारत हारतो.


आपल्याला मिळणारा पगार, मानधन, मजुरी याचा योग्य परतावा न देता कामचुकारपणा करतो तेव्हा भारत हारतो.


आपल्याकडे असलेले पद, पैसा आणि प्रतिष्ठा यांचा वापर लोकांच्या मदतीसाठी न करता त्रास देण्यासाठी करतो तेव्हा भारत हारतो.


आपापसातील किरकोळ गोष्टी व वाद विवादावर समझोता न करता पोलीस स्टेशन आणि कोर्ट गाठतो तेव्हा भारत हारतो.


मुलांवर चांगले संस्कार करण्यासाठी आदर्श नागरिक घडवण्यासाठी प्रयत्न न करता व विचारांना गौण समजून फक्त पद, पैसा आणि प्रतिष्ठा मिळवण्यासाठी शिक्षण देतो तेव्हा भारत हारतो.


जगातून, समाजातुन फक्त घेतो आणि घेतो परंतु आणि सामाजिक जबाबदारी म्हणून काहीच परत देत नाही तेव्हा भारत हारतो.


कामाच्या वेळी मागे आणि श्रेय घेण्यासाठी पुढे पुढे करतो तेव्हा भारत हारतो.


देवाधर्मावर अनाठायी टिका करतो, आपल्या अर्धवट विचारांचे ओंगळवाणे प्रदर्शन करून जातीवाद करतो तेव्हा भारत हारतो.


वेळेवर नगरपालिका कर, घरपट्टी, शेतसारा, आयकर आपण भरत नाही तेव्हा भारत हारतो.


आपली परीस्थिती चांगली असताना आपण सरकारी योजनांचा फायदा घेत असतो तेव्हा भारत हारतो.


आपल्या कुटुंबाच्या, गावाच्या नावाला डाग लागेल असे जेव्हा काम करतो तेव्हा भारत हारतो.


आपण जाणीवपूर्वक शक्य असताना मतदान करत नाही तेव्हा भारत हारतो.


आपण देश हित लक्षात न घेता पैसे घेऊन मतदान करतो तेव्हा भारत हारतो.


छत्रपती शिवाजी महाराज व इतर महापुरुषांचा आदर्श न घेता त्यांच्या विचारांची अवहेलना करतो तेव्हा भारत हारतो. 


यातील ज्या गोष्टी करायला नकोत तरी आपण करत असलो आणि ज्या गोष्टी करायला हव्यात परंतु करत नसलो तर भारत जिंकला म्हणून फटाके वाजवण्याला काय अर्थ राहिला? तो ही एक पोरकटपणा, उथळपणा करुन परत भारत हरवला.


यामध्ये भारताची हार तर आहेच तत्पुर्वी अयोग्य, असंस्कारी, अविचारी असा ठप्पा आपण स्वतः आपल्यावर मारून घेतो. यामध्ये प्रथम आपण स्वतः मारतो आणि काही कारण नसताना देशाची मान खाली घालायला लावतो.


अजून अशा बऱ्याच गोष्टी असतील आपल्या वागणुकीने आपण भारताला रोज पराजित करत असतो. त्या गोष्टी आपले वैयक्तिक अनुभव आहेत त्यांचे आत्मपरीक्षण करा आणि भारताचे प्रामाणिक नागरिक म्हणून भारताला हरवणे बंद करा. कारण ते आपल्याच हातात 🫵 आहे.


◆◆◆

Tuesday, 10 March 2026

पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीमध्ये दृक श्राव्य माध्यमांचा व्यावसायिक प्रमाणपत्र अभ्यासक्रम · अर्ज करण्याची मुदत 22 मार्च 2026 पर्यंत

 पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीमध्ये

दृक श्राव्य माध्यमांच व्यावसायिक प्रमाणपत्र अभ्यासक्रम

·        अर्ज करण्याची मुदत 22 मार्च 2026 पर्यंत

 

            मुंबई दि. 9 : सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीप्रभादेवी येथे महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळाच्या संलग्नतेने 1 एप्रिल 2026 पासून दृकश्राव्य माध्यमांचे अल्पमुदतीचे व्यावसायिक प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात येत आहेत. स्क्रीनराईटींगफिल्म डायरेक्शनबेसिक सिनेमॅटोग्राफीफिल्म एडिटिंगसाऊंड रेकॉर्डिंगव्हॉइस ओव्हर आर्टिस्टलाईव्ह साऊंड रेकॉर्डिंगअसिस्टंट कोरिओग्राफरफिल्म प्रॉडक्शन असिस्टंटइव्हेंट प्रॉडक्शन अँड मॅनेजमेंटफिल्म प्रॉडक्शन अँड मार्केटिंग असे एकूण 11 अल्पमुदतीचे व्यवसायाभिमुख प्रमाणपत्र अभ्यासक्रम राबविण्यात येणार आहेत.

            हे अभ्यासक्रम सैद्धांतिकप्रात्यक्षिक आणि कौशल्य या त्रिसूत्रीवर आधारित असून प्रत्येक अभ्यासक्रम हा 3 महिने मुदतीचा असेल. माध्यम  तंत्रज्ञान क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांकडून गूगल फॉर्म द्वारे 22 मार्च 2026 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत. तसेच वरील 11 अभ्यासक्रमांसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी व्याख्यात्यांची नियुक्ती करावयाची असल्यामुळे संबंधित क्षेत्रातील शैक्षणिक अध्यापनाचा अनुभव असलेल्या उमेदवारांकडूनही आपला व्यक्तिगत तपशील व अनुभवाच्या दाखल्यासहीत अर्ज मागविण्यात येत आहेत. दोन्हीसाठींचे अर्ज अकादमीच्या www.pldeshpandekalaacademy.org (अभ्यासक्रम) या संकेतस्थळावर गूगल  फॉर्मद्वारे 22 मार्च 2026 सायं. 5 वाजेपर्यंत मागविण्यात येत आहेत. अधिक माहितीसाठी व्हॉट्सॲप क्र.9819824954  वर संपर्क साधता येईल.

ठळक वैशिष्ट्ये

*  दृक श्राव्य माध्यमांतील तांत्रिक विषयांचे 11 अल्पमुदतीचे अभ्यासक्रम

18,000 ते 52,500 रुपये इतक्या माफक शिक्षण शुल्कात आधुनिक काळाशी सुसंगत माध्यम शिक्षण घेण्याची संधी

*  थिअरी आणि प्रात्यक्षिके यांचा उत्तम समन्वय असलेले परिपूर्ण अभ्यासक्रम

दृकश्राव्य क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन

*  अद्ययावत उपकरणांवर प्रात्यक्षिके

*  प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेण्याची संधी

*  दृक श्राव्य क्षेत्रात रोजगाराची संधी

*  दृक श्राव्य क्षेत्रासाठी प्रशिक्षित व प्रमाणित मनुष्यबळाची उपलब्धता

*  सहकारी बँकांमार्फत गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना कर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्याचे सहकार आयुक्तांचे बँकांना आदेश

*  पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आणि राज्य कौशल्य विकास मंडळाचे उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र.

            राज्याच्या सांस्कृतिक कार्य  विभागातर्फे  प्रथमच पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीत अशा प्रकारचा शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत असून माध्यम प्रशिक्षण अभ्यासक्रमांत प्राविण्य मिळवून टेलिव्हिजनवेबचित्रपट  तसेच एकूणच दृकश्राव्य माध्यमांत करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी या सुसंधीचा लाभ घ्यावाअसे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी केले आहे.

विचार करा, विहित वेळेची

 👉🏿 जेव्हा मुलांची लग्नं २० व्या वर्षी होत होती, तेव्हा एका शतकात ५ पिढ्या असायच्या.

👉🏿 जेव्हा लग्नाचं वय २५ वर्षं झालं, तेव्हा एका शतकात ४ पिढ्या होत होत्या.

👉🏿 आता लग्नाचं वय साधारण ३३ वर्षं झालं आहे, त्यामुळे एका शतकात फक्त ३ पिढ्या उरतात.

👉🏿 विचार करण्यासारखी गोष्ट आहे…

आपला समाज पुढच्या शतकापर्यंत टिकेल का? 🤔

👉🏿 आज एक विचित्र अंधार पसरताना दिसतो आहे…

🏚️ गावं ओस पडत आहेत, आजूबाजूला रिकामी घरं आहेत.

👉 घरात मुलांच्या आवाजापेक्षा नवरा-बायकोचे आवाज जास्त ऐकू येतात.

👉 अनेक मुली ३०-३५ वर्षांपर्यंत अविवाहित आहेत.

👉 अनेक मुलगे ३५ वर्षांनंतरही अविवाहित फिरत आहेत.

👉 उशिरा लग्न…

👉 मग घटस्फोट…

👉 तुटलेली कुटुंबं…

👉 दुःखी आई-वडील…

👉 माता-पिता एकटे पडत आहेत 😔

👉 संपूर्ण पिढी रिकामेपण अनुभवते आहे.

👉 आपण याला “शिक्षित समाज” म्हणायचं का

की “स्वतःलाच नुकसान करणारा समाज”? ⚖️

👉 ही तर लोकसंख्या कमी करण्याची एक शांत प्रक्रिया वाटते.

👉 जर ५० जोडप्यांमध्ये फक्त १ मूल असेल,

तर पुढच्या पिढीत मुलांची संख्या खूपच कमी होईल.

👉 असंच चालू राहिलं तर तिसरी पिढी जवळजवळ नाहीशी होईल. 📉

👉 गाव आणि गल्ल्या रिकाम्या पडल्या आहेत,

लोक सगळे रस्त्यावर…

आयुष्याचा अर्धा भाग धावपळीतच जातो.

👉 गावं संपत चालली आहेत.

👉 शहरात मोठमोठ्या इमारती आहेत,

पण संयुक्त कुटुंब पद्धती संपत चालली आहे.

👉 नवीन सुना बहुतेक वेळा

“फक्त एकच मूल” असं म्हणतात.

👉 हा तोच समाज आहे का

👉 हीच आपल्या पूर्वजांची परंपरा आहे का? 🤔

👉 खरं सांगायचं तर आज मुलं प्रेमाची खूण राहिली नाहीत,

तर मुलं होणं जणू एक जबाबदारी किंवा मजबुरी वाटू लागलं आहे.

⚖️ सर्वात मोठी चूक — मुलीच्या वडिलांचीही आहे.

जे वडील स्वतः २०-२२ वर्षांत लग्न करून संसार केला,

तेच आज मुलीचं लग्न ३० वर्षांपर्यंत थांबवून शौर्य दाखवत आहेत.

👉 परिणाम…

👉 मुलं-मुली डिप्रेशनमध्ये जात आहेत. 😔

👉 ना योग्य वयात लग्न,

👉 ना योग्य वेळी नोकरी…

👉 समाज हळूहळू कमजोर होत चालला आहे.

👉 म्हणूनच अनेक तरुण

समाजासोबत नव्हे तर एकटे राहणं पसंत करतात.

👉 Single family…

👉 कधी कधी मुलंही नकोत असं म्हणतात.

👉 उशिरा लग्न

👉 उशिरा मूल

👉 एक मूल झाल्यावर मेडिकल कारणं सांगणं

हे आज सामान्य झालं आहे.

👉 हजारो तरुण-तरुणी लग्नाच्या वयातून जात आहेत.

🧘‍♂️ समाजातील समजदार लोक मात्र गप्प बसलेले आहेत.

🎈 लग्न, कुटुंब, मुलं — यांना आज ओझं समजलं जात आहे.

🎈 पण खरं म्हणजे लग्न हे केवळ नातं नाही,

ते घर, कुटुंब आणि समाजाचा आधारस्तंभ आहे.

🎈 संस्कृती आणि परंपरा पुढे नेण्याचा मार्ग आहे. 🚩

💥 आता समजून घेण्याची वेळ आली आहे.

🫵 मुलांना अतिप्रमाणात स्वातंत्र्य देताना आपण त्यांची समज कमी केली का?

🫵 लग्न पुढे ढकलत राहिलो…

आणि जेव्हा झालं, तेव्हा उशीर झाला होता.

👉 मग पुन्हा एकटेपण…


🫵 लग्नाचं योग्य वय

🔹 मुलांसाठी – २६ / २७ वर्षांपूर्वी

🔹 मुलींसाठी – २० ते २५ वर्षांदरम्यान

👉 लग्नाला प्राधान्य द्या.

🔹 योग्य वेळी लग्न

🔹 योग्य वेळी मुलं

🔹 २ किंवा ३ मुलं — समाजाप्रती आपली जबाबदारी

🔹 पालकांनो —

कृपया आपल्या मुलांच्या भावना, वय आणि भविष्य समजून घ्या.

📉 जर तरुणच नसतील

📉 मुलं नसतील

📉 संस्कृती नसेल

👉 तर समाजही नसेल… मंदिरही नसेल.

🚩 इतिहास कदाचित लिहील —

“तो समाज ज्याने शांतपणे स्वतःलाच संपवून टाकलं.”

✨ म्हणून विचार करा…

समजून घ्या…

आणि योग्य वेळी योग्य निर्णय घ्या.

👉 ज्या मुलींचं वय २०-२५ आणि मुलांचं २३-२७ झालं आहे,

कृपया जास्त वाट पाहू नका...

👉 मुलांची लग्नं योग्य वेळी करा...❤️

Saturday, 7 March 2026

कालभैरवअकरा भैरवांचे अधिपती

 ⛳ *🔸कालभैरव.🔸*⛳


*श्री काळभैरव हे अकरा भैरवांचे अधिपती. श्री काळभैरवाच्या अधीन काळ आणि वेळ आहे . काळवेळेच्या अधीन नियती आहे. ही सर्व सदगुरुंच्या अधीन आहेत. आणि श्री काळभैरव सदगुरुंचा दास आहे.  जगन्नियंत्या भगवान शिवाची ती प्रलयंकारी उजवी बाजु. त्यांचे महात्म्य धर्ममार्तंडानी लपवून ठेवलय. हा देव ज्याची वज्रदाढ दंत नीलवर्णीय आहे. ज्याची काया सर्वात मोठी आहे. जो प्रत्येक युगाचा अंत करणारा आहे. असा हा शामवर्ण भैरव ज्यास प्रत्येक कार्यात स्मरण करुन कार्यारंभ करतात.*


*काळभैरव साधनेमुळे प्रकृतीगर्भात मानवाला ग्रासणारे पितृदोष. नजरदोष, ग्रहबाधा, शत्रूबाधा, भुत प्रेत पिशाच्चबाधा, करणी, भानामती, तसेच ईंद्र, कलि, माया निर्मित संकट मालिकांपासुन मुक्तता मिळते. मायेची तोड फक्त श्री काळभैरवच आहेत. तो रुद्रच असल्याने आदिपुरूष म्हणता येईल. त्याची कठोर साधना साधकाला सर्व दैत्य, पिशाच्च शक्तींवर एक हुकुमी सत्ता मिळवुन देते. पण दासाचीही पात्रता तशीच असावी लागते. हे दैवत विधिलिखितही अडवतं. श्री काळभैरव शैतानी शक्तीना नाचविणारे एकमेव ज्वलंत दैवत आहे.  हे विवेकशील सय्यमी आणि पारदर्शी चारित्र्य ही प्राथमिक पात्रता. तिथे व्याभीचार लबाडी आणि खोटेपणास थारा नाही. अशा लोकांसाठी श्री काळभैरव उग्र दैवत आहे. मृत्युपेक्षाही भयानक आहेत. उलट सदगुरुदासांसाठी ते प्रेमळ आणि भक्तवत्सल आहेत. ते घरातील वास्तुपुरुषापासुन ते कुलदेवतेच्या दैत्यमुखापर्यंत कोणालाही कुठेही आणि कसेही क्षणात संपवु शकतात . गोस्वामी तुलसीदास यानी देखील भैरवयातना भोगल्या आहेत.  त्यांच्या निर्व्याज साधनेने गमावलेला आत्मविश्वास पुन्हा प्राप्त होतो. मनात भय रहात नाही. आंतरिक विचारात बळ येते. जीवनाचा दृष्टीकोण विशाल होतो. शैतानी शक्तीपासुन आत्मरक्षा होते. अंतर्बाह्य शत्रूच्या पकडीतुन मनुष्य दुर जातो .आध्यात्मिक जीवनात रुची निर्माण होते. कठिण कार्य सहज पूर्ण होतात. आपल्या जीवनावर आपले वर्चस्व निर्माण होते . काली मातेची साधना योग साध्य होतो. सदगुरु हे कामधेनु आहेत. श्री काळभैरव तत्व सदगुरु अधीन असल्याने सदगुरु प्रणित सूक्ष्म हस्तपादुका माळेने दश भैरवांची जप साधना केल्यास सर्व लक्ष्मींची प्राप्ती होते. पण श्री काळभैरवांच्या लेखी चुकीला माफी नाही.*


*श्री काळभैरव यांनी  मृत्यु , देवराज ईंद्र, ब्रम्हदेव, नृसिंहदेव आणि भगवान विष्णु यांचा गर्वहरण केले होते. लोकानाच काय तर साधु योगिजनाना देखील त्यांचा अभ्यास होवु शकला नाही. श्री काळभैरव हे मोक्षप्राप्तीसाठीचे श्री दत्त अधिष्ठान हृदयात तयार करतात. श्री काळभैरव स्वाधिष्ठानाला वळसा घालुन सदगुरुंकडे आणि त्यायोगे दत्त महाराजांकडे जाण्याचा मार्ग नाही. हा मार्ग अत्यंत कठीण . जिगर असेल तरच मार्गक्रमण शक्य आहे. शनी हा काळभैरव देवांचा सर्वात मोठा भक्त आहे. श्री काळभैरव देवांची रामदास स्वामी यानी आरती लिहिलेली आहे . पण आता ती शोधुनही सापडत नाही.*

 

*श्री काळभैरव जितका सिद्ध योग्यांचा तितकाच महाचांडाळांचाही आहे. म्हणुनच प्रामाणिक आणि पारदर्शी रहावे. श्री काळभैरव दैवत सुक्षम देहातील वासनेची कर्म नष्ट करतात . काळभैरवाना क्षेत्रपाल असेही म्हणतात. क्षेत्र म्हणजे शरीर. पाल म्हणजे पालन करणारा. तो कर्म आणि अकर्माच्या गोंधळातुनही सोडवितो . ॐ काळभैरवाय नम; हा देवाचा जपमंत्र आहे. जपासाठी रुद्राक्षमाळा वापरतात. स्फटिक माळही चालते . महिला देखील हा जप करु शकतात. प्रामाणिक असल्यावर देवापुढे स्त्री पुरुष हा भेद रहात नाही. भैरवप्रहर हा रात्री १२ ते पहाटे ३ असा आहे.  ह्या प्रहरात भैरवसाधना केल्यास अधिक प्रभावी आणि परिणामकारक ठरते.  तप, जप आणि ध्यान मार्गात अग्रेसर होत असताना प्रथमदर्शनी बाह्य आवरणात्मक शुद्र शक्ती विविध रुपं आणि स्वरुपाद्वारे साधकाला भटकाव उत्पन्न करतात. हे अतिशय भयानक मायाजाळ आहे. त्यातुन सहज योग्य मार्ग तदृप शक्ती कधीही सापडु देत नाही. याला आंतरिक चकवा असे म्हणतात. ह्या चकव्यापासुन साधकाला काळभैरव दुर ठेवतात. काळभैरवाची सेवा केल्यास मृत्युनंतर पिशाच्च योनी कशी मिळेल? त्यांची सेवा हा मृत्युवर विजयप्राप्तीची सुवर्णसंधी आहे.*


*पंचमहाभुतांपलिकडे शिवतत्व आहे. साधकाला श्री काळभैरवनाथ श्री दत्तकृपेने तिथे घेउन जातात. श्री काळभैरवाची सेवा केल्यास शिवाची साधना आवश्यकता नाही. ती आपोआप साध्य होते. श्री काळभैरव यांचे प्राचीन मंदीरात गेल्यावर देवाच्या मुर्तीकडे एकटक पहावे. सात्विकता डोळ्यात भरुन येईल. भैरवोत्थान केवळ पद्मासनातच साध्य होते. मोरगाव येथील गणेश मंदीराच्या अकरा पाय- या अकरा भैरवाच्या प्रतीक आहेत.*


*१ प्रमुख - श्री काळभैरव.*

*२ उपप्रमुख - बटुकभैरव.*

*३ समायोजक - स्वर्णाकर्षण भैरव.*

*४ अष्टभैरव - स्मशानभैरव.*

*५ नग्नभैरव.*

*६ मार्तण्डभैरव.*

*७ कपालभैरव.*

*८ चंडभैरव.*

*९ सन्हारभैरव.*

*१० क्रोधभैरव.*

*११ रुरुभैरव.*


*श्री काळभैरव पाताळवासी आहेत. त्याना दक्षिणेश्वर असेही म्हणतात. नक्षत्रे त्यांच्या आज्ञेची प्रकर्षाने वाट पहातात. त्याना प्रसन्न केल्यास नक्षत्रांचे फळ तुमच्या खिशात. श्री काळभैरवाच्या आज्ञेशिवाय कोणत्याही सूक्ष्मक्षेत्रात प्रवेश नाही. नकारात्मक उर्जा डोक्यात आणि शरीरास जाणवत असेल तर सलग सहा महिने श्री काळभैरव साधना करावी. त्याची साधना निर्गुणात सरस बनविते. आध्यात्मिक प्रगतीसाठी सगुणातुन निर्गुणात अनासक्तीने पदार्पण आवश्यक आहे. श्री काळभैरवांचा विनाअट ध्यास घेता आला पाहिजे. त्यांचा ध्यास लावाल तर कर्तव्यनिष्ठा देखील ठेवावी लागेल. धरसोडवृत्ती ठेवल्यास ते भाव देणार नाहीत . त्यावर जावुन जबरदस्ती विनवणी कराल तर उरली सुरली सुखशांती गमावुन बसाल. ईथे कधीही मानस स्तरीय मजामस्ती आणि ईतर अवहेलना करु नये. नेहमी जमेल तितके दत्तसाच्यात बसण्याचा प्रयत्न करावा. श्री काळभैरवांची अनुभूती येणे ही आत्ममार्ग निर्धोक सुरु असल्याची पुष्टी करते. श्री काळभैरवाच्या कक्षेत आल्याशिवाय नशिबाचे चक्र फिरत नाही. ईतर देव देवी बघ्याची भुमिका घेतात. पण भैरवनाथ प्रामाणिक आणि तळमळीला धावुन येतात. मन हृदय आणि नियती स्वच्छ हवी. सदगुरुभक्ती सुख दु:खाच्या पलीकडे गेल्यास दैव सदभक्ताला जीवनाच्या आपदास्थितीत पाठीशी घालतं . आध्यात्मिक जीवनात घोर साधना सात्विक वैराग्यपुर्ण व सदगुरु अधिष्ठानयुक्त असतात. ह्या साधना सहज समाधी ह्या अंतिम ध्येय  योगापर्यंत घेवुन जातात.


लेखक, संकलक अज्ञात। 


सोर्स व्हाट्सअप।

डिजिटल अरेस्ट"❓ तुम्हाला खरोखरच कोणी ऑनलाइन अटक करू शकते का? Pl share

 “डिजिटल अरेस्ट"❓ तुम्हाला खरोखरच कोणी ऑनलाइन अटक करू शकते का?


🚫 नाही. “डिजिटल अरेस्ट” हा सायबर फसवणुकीचा प्रकार आहे. फसवणूक करणारे आरबीआय, पोलीस किंवा सरकारी संस्थांची नावे वापरून लोकांना घाबरवतात आणि पैसे देण्यास किंवा वैयक्तिक माहिती शेअर करण्यास भाग पाडतात. 


🧠 नेहमी लक्षात ठेवा: 

• अटक ऑडिओ/व्हिडिओ कॉल किंवा संदेशांवर होत नाही 

• आर्थिक/वैयक्तिक माहिती शेअर करू नका 

• नेहमी कॉल करणाऱ्याची सत्यता तपासा 

• शंका असल्यास आपल्या बँकेशी संपर्क साधा 


🛡️ जागरूक रहा. सुरक्षित रहा. 

📞 1930 वर तक्रार नोंदवा किंवा www.cybercrime.gov.in भेट द्या. 


अधिक माहितीसाठी कृपया https://rbikehtahai.rbi.org.in/marathi/index.html वर क्लिक करा.


आरबीआय सांगते, जाणकार बना, सतर्क रहा !

WhatsApp सूचना थांबवायला 'stop' लिहा

Wednesday, 4 March 2026

डॉ. पंजाबराव देशमुख देशांतर्गत शिष्यवृत्ती योजनेतील सर्व लाभार्थ्यांना लाभ देणार

 डॉ. पंजाबराव देशमुख देशांतर्गत शिष्यवृत्ती योजनेतील सर्व लाभार्थ्यांना लाभ देणार

-राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल

 

मुंबई,दि. २६: सारथी संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या डॉ. पंजाबराव देशमुख देशांतर्गत शिष्यवृत्ती योजनेतील सर्व लाभार्थ्यांना लाभ देणार असल्याचे राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी विधानसभेत सांगितले.

            मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण पूर्ण करता यावे यासाठी  देण्यात येणारी डॉ. पंजाबराव देशमुख देशांतर्गत शिष्यवृत्ती योजनेतील सन २०२५-२६ साठी शिष्यवृत्तीबाबत सदस्‍य जयंत पाटील यांनी प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना ॲड.आशिष जयस्वाल बोलत होते.

            राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल म्हणाले कीसारथी संस्थेद्वारे डॉ. पंजाबराव देशमुख देशांतर्गत शिष्यवृत्ती योजना सन २०२१-२२ मध्ये सुरू करण्यात आली असूनही योजना सन २०२१-२२ ते २०२४-२५ या कालावधीत यशस्वीपणे राबविण्यात आली असल्याने मराठा समाजातील असंख्य विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक आधार मिळाला आहे. योजनेंतर्गत २०२५-२६ मध्ये ३८८ लाभार्थ्यांना ७.२४ कोटी इतकी शिष्यवृत्तीची रक्कम वितरित करण्यात आली असून ३७९ लाभार्थ्यांना ५.९६ कोटी इतकी शिष्यवृत्ती रक्कम वितरीत करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. संस्थेला वेगवेगळ्या योजना राबविण्यासाठी ३०० कोटींचा अर्थसंकल्पीय निधी मंजूर करण्यात आला असून संस्थेच्या मागणीनुसार अतिरिक्त खर्च भागविण्यासाठी पूरवणी मागणीद्वारे आणखी १०० कोटी रूपये मंजूर करण्यात आले आहेत. या निधीचे नियोजन करुन २०२५-२६ मध्येही सारथी संस्थेमार्फत लक्ष्यित गटातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणास प्रोत्साहन मिळावे यासाठी योजना राबविण्यात येत आहेत. मराठा समाजातील मुलांच्या हितासाठी शासन काम करत आहे. या योजनेसाठी मार्च २०२६ पूर्वी जाहिरात काढून लाभार्थ्यांना लाभ दिला जाईलअसे त्यांनी सांगितले.

या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य राजेश पवारअर्जुन खोतकरअभिजीत पाटील यांनी सहभाग घेतला.

 

Monday, 2 March 2026

रुग्णालयांनी दरपत्रक व रुग्ण हक्कांची माहिती प्रदर्शित करणे अनिवार्य

 रुग्णालयांनी दरपत्रक व रुग्ण हक्कांची माहिती प्रदर्शित करणे अनिवार्य

- राज्यमंत्री मेघना साकोरे- बोर्डीकर

 

मुंबई,दि. 28 : आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचारांचे दरपत्रक व रुग्णांच्या हक्कांची नोंदणी दर्शनी भागात लावणे अनिवार्य आहे. ज्या रुग्णालयांकडून हे नियम पाळले जात नाहीत. अशा रुग्णालयांवर कारवाई केली जाईलअसे आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला सांगितले.

राज्यात आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचारांचे दरपत्रक जाहीर करण्याबाबत शंकर जगताप यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला.

राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या राज्यात 1 जुलै 2024 पासून प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा फुले जन आरोग्य योजना एकत्रितपणे  राबवली जात आहे. योजनेअंतर्गत राज्यातील सुमारे अडीच कोटी कुटुंबांनाम्हणजेच 12 कोटी 50 लाख नागरिकांना रुपये 10 लाखांपर्यंतचा मोफत आरोग्य विमा कवच देण्यात आले आहे.

यापूर्वी या योजनेअंतर्गत 1369 रोगांवर उपचार उपलब्ध होतेआता ती संख्या 2299 पर्यंत वाढविण्यात आली आहे. तसेचनोंदणीकृत रुग्णालयांची संख्या 2000 वरून 4933 पर्यंत वाढली असून येत्या काळात ती 6947 रुग्णालयांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे. मुंबई आणि एमएमआर रिजनमधील मल्टीस्पेशालिटी रुग्णालये अजूनही योजनेत सामील नसल्याने त्यांना सहभागी करून घेण्यासाठी शासन पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. या रुग्णालयांचा अतिरिक्त उपचार खर्च शासन उचलण्याबाबतही विचार सुरू असल्याचे राज्यमंत्री बोर्डीकर यांनी सांगितले.

या चर्चेत विधानसभा सदस्य राहुल पाटीलअतुल भातखळकर वरुण सरदेसाईहेमंत ओगलेमनीषा चौधरी यांनी सहभाग घेतला.

Saturday, 28 February 2026

ऑनलाईन खाद्य वितरण कर्मचाऱ्यांची आस्थापनांनी चारित्र्य पडताळणी करावी

 ऑनलाईन खाद्य वितरण कर्मचाऱ्यांची आस्थापनांनी चारित्र्य पडताळणी करावी

- कामगार मंत्री आकाश फुंडकर

 

मुंबईदि. 28 : ऑनलाईन खाद्य वितरण करणाऱ्या कर्मचाऱ्यांची सर्व आस्थापनांनी चारित्र्य पडताळणी अनिवार्यपणे करणे आवश्यक आहे. आधार कार्डपॅन कार्डड्रायव्हिंग लायसन्सवाहन विमा व श्रम नोंदणी यांसह सर्व कागदपत्रांची तपासणी केली जावी. पोलीस पडताळणी न करता कामावर ठेवलेल्या कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येईल. असे  कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी सांगितले.

मुंबईसह राज्यात ऑनलाइन खाद्यपदार्थ वितरण करणाऱ्या कंपन्यांकडून वितरण कर्मचाऱ्यांची नियमित तपासणी करण्याबाबत विधानसभेत सदस्य भिमराव तापकीर यांनी प्रश्न उपस्थित केला..

कामगार मंत्री फुंडकर म्हणाले की,  सध्या काही  कंपन्या ऑनलाइन अ‍ॅप्लिकेशनद्वारे डिलिव्हरी पार्टनरची नियुक्ती करतात. ही प्रक्रिया त्रयस्त संस्थांमार्फत होत असल्याने कंपन्यांची थेट जबाबदारी मर्यादित दिसते. मात्र अलीकडच्या काळात काही ठिकाणी घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर गृहविभाग आणि कामगार विभाग यांनी याबाबत चर्चा केली आहेअसेही त्यांनी यावेळी सांगितले.

Wednesday, 25 February 2026

ऑनलाइन ट्रान्सफर सावधान्य

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की,  अलीकडे काही फसवे लोक स्वत:ला पोलीस अधिकारीकस्टम अधिकारी म्हणून ओळखवतात आणि नागरिकांना सांगतात की त्यांच्या नावावर आलेल्या पार्सलमध्ये ड्रग्स सापडले आहेत. त्यानंतर ते नागरिकांना सांगतात की त्यांना डिजिटल अरेस्ट’ करण्यात आले आहे आणि स्क्रीनसमोरून हलू नये. त्यानंतर ते लोकांना घाबरवून मोठी रक्कम  ऑनलाइन ट्रान्सफर करण्यास भाग पाडतात. या प्रकरणांत सामान्य नागरिकांसह उच्चपदस्थ निवृत्त अधिकारीही फसले आहेत. एका निवृत्त आयएएस अधिकारी आणि नौदलातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सुद्धा भीतीपोटी पैसे गमावले आहेत. या फसवणुकीचे जाळे विदेशातून चालवले जातेतर भारतातील लोक फक्त हँडलर’ म्हणून काम करतात.

            राज्यात सायबर गुन्ह्यांवर नियंत्रणासाठी व्यापक यंत्रणा उभारण्यात आली असूनजर कोणी चुकीने पैसे ट्रान्सफर केले असतील आणि तत्काळ १९३० वर कळविलेतर बँकांच्या समन्वयातून त्या रकमा गोठविणे शक्य असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

 राज्य आणि केंद्र शासनाकडून याबाबत  जनजागृती मोहीम राबवली जात आहे. टीव्ही जाहिरातीरिंगटोन आणि विविध माध्यमांतून डिजिटल अरेस्ट’ फसवणुकीबाबत सतत सूचना दिल्या जात आहेत. तरीही दररोज कोणी ना कोणी या जाळ्यात अडकत आहे. त्यामुळे नागरिकांनी अत्यंत जागरूक रहावेअसे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

 

          विधानसभा सदस्य अभिजित पाटील या प्रश्नाच्या चर्चेत सहभाग घेतला

डिजिटल अरेस्ट हा निव्वळ खोटेपणा ; फसवणुकीचा संशय आल्यास लगेच १९३० वर संपर्क करावा

 डिजिटल अरेस्ट हा निव्वळ खोटेपणा ;

फसवणुकीचा संशय आल्यास लगेच १९३० वर संपर्क करावा

-         मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबईदि.२४ : कोणालाही डिजिटल अरेस्ट करता येत नाही. अशा प्रकारचा कॉलमेसेज किंवा व्हिडिओ कॉल आल्यास तो फसवणूक असल्याने डिजिटल ॲरेस्टचा फोन आल्यास नागरिकांनी तत्काळ १९३० या सायबर हेल्पलाईनवर संपर्क साधावा. अशा प्रकरणात जनजागृतीसाठी राज्य आणि केंद्र शासनाकडून याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती मोहीम राबवली जात असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत प्रश्नोत्तरांच्या वेळी सांगितले.

            राज्यातविशेषतः मुंबई आणि अहिल्यानगर शहरांमध्ये डिजिटल अरेस्ट आणि ऑनलाईन फसवणुकीद्वारे होत असलेल्या लूट प्रकरणांबाबत आमदार अबू आझमी यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला.

Sunday, 22 February 2026

संपूर्ण भारतातील ८१ मंदिरांतील ८१ गणपतींचे ८१ सेकंदात दर्शन घ्या... ह्यात 🚩 मुंबईचा सिद्धिविनायक आणि बेंगळुरूचा दोड्डा गणेश यांच🚩

 संपूर्ण भारतातील ८१ मंदिरांतील ८१ गणपतींचे ८१ सेकंदात दर्शन घ्या... ह्यात 🚩 मुंबईचा सिद्धिविनायक आणि बेंगळुरूचा दोड्डा गणेश यांचा समावेश आहे 🚩 🙏🌹🙏🪷🙏💐


Thursday, 19 February 2026

सर जे जे रुग्णालय नव्याने सुरू करण्यात आलेल्या प्रमुख सुविधा pl share

 नव्याने सुरू करण्यात आलेल्या प्रमुख सुविधा

१. अत्याधुनिक न्यूरोसर्जरी ऑपरेशन थिएटर

मेंदूतील गाठी (ब्रेन ट्यूमर) व आघातजन्य शस्त्रक्रिया

मेंदूतील रक्तस्राव व मणक्यांशी संबंधित विकारांवरील उपचार

गंभीर डोक्याच्या दुखापतींचे आपत्कालीन व्यवस्थापन

सुरक्षित न्यूरोसर्जिकल हस्तक्षेपासाठी आधुनिक तंत्रज्ञान

२. ईएनटी (कान-नाक-घसा) ऑपरेशन थिएटर

काननाक व घसा विकारांवरील शस्त्रक्रिया

टॉन्सिलेक्टॉमी शस्त्रक्रिया

कर्णपटल दुरुस्ती

आपत्कालीन ईएनटी सेवा

३. बाल शस्त्रक्रिया ऑपरेशन थिएटर

अर्भक व बालकांसाठी विशेष शस्त्रक्रिया सेवा

जन्मजात विकृतींचे सुधारात्मक उपचार

हर्निया व अस्थिरोग विषयक शस्त्रक्रिया

बालस्नेही पायाभूत सुविधांसह आपत्कालीन सेवा

४. वॉर्ड क्रमांक ११ व १८ चे आधुनिकीकरण

वैद्यकीय व शस्त्रक्रिया रुग्णांसाठी सुधारित सुविधा

शस्त्रक्रियेपूर्व व शस्त्रक्रियेनंतरची सेवा अधिक सक्षम

निरीक्षणतपासणी व पुनर्वसनासाठी सुसज्ज व्यवस्था

५. केंद्रीय निर्जंतुकीकरण सेवा विभाग (सीएसएसडी)

शस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या उपकरणांचे प्रगत निर्जंतुकीकरण

संसर्ग प्रतिबंध व नियंत्रण प्रणाली बळकट

ऑपरेशन थिएटरसाठी निर्जंतुक साहित्य पुरवठा

रुग्णालयीन स्वच्छता व सुरक्षिततेत वाढ

६. रक्तपेढी आधुनिकीकरण

रक्त साठवण व वितरण अधिक सक्षम

आपत्कालीन रक्तपुरवठा उपलब्धता

रक्त तपासणी व घटक विभाजन सुविधा

रक्तदात्यांच्या नोंदणी व प्रक्रियेत सुधारणा

७. शैक्षणिक व प्रशिक्षण सुविधा

७ वा मजला सभागृह — शैक्षणिक कार्यक्रमपरिसंवाद व संस्थात्मक उपक्रम

C.B.M.E. स्किल लॅब — सिम्युलेशन आधारित आधुनिक वैद्यकीय प्रशिक्षण

 

वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय सुरासे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

0000

Wednesday, 18 February 2026

रजोनिवृत्ती क्लिनिकद्वारे महिलांना अखंडित आरोग्य सेवा द्यावी

 रजोनिवृत्ती क्लिनिकद्वारे महिलांना अखंडित आरोग्य सेवा द्यावी

- आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर-साकोरे

मुंबई, दि. 18 : देशातील पहिले रजोनिवृत्ती (मेनोपॉज) क्लिनिक महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात सुरू असून या क्लिनिकद्वारे राज्यातील महिलांना अखंडित सेवा द्यावी, या अनुषंगाने महिलांची आरोग्य तपासणी करण्याचे निर्देशही आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर-साकोरे यांनी दिले.

मुंबई येथे राज्यमंत्री बोर्डीकर-साकोरे यांच्या अध्यक्षतेखाली रजोनिवृत्ती (मेनोपॉज) क्लिनिकबाबत आढावा बैठक झाली. बैठकीस आरोग्य संचालक डॉ. नितीन अंबाडेकर तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

महिलांच्या आरोग्याला प्राधान्य देत आरोग्य विभागाने राज्यात रजोनिवृत्ती क्लिनिक उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी सुरू केली आहे. 14 जानेवारी 2026 रोजी सुरू झालेल्या या उपक्रमास अल्पावधीतच राज्यभरातून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे राज्यमंत्री बोर्डीकर-साकोरे यांनी यावेळी सांगितले.

 उपक्रमांतर्गत राज्यातील सर्व जिल्हा रूग्णालये, उपजिल्हा रूग्णालये, महानगरपालिका रूग्णालये तसेच निवडक ग्रामीण रूग्णालयांमध्ये रजोनिवृत्ती क्लिनिक सुरू करण्यात आले असून दर बुधवारी रजोनिवृत्ती बाह्य रूग्ण सेवा सुरू करण्यात आली आहे. 14 जानेवारी 2026 पासून 18 फेब्रुवारी 2026 पर्यंत राज्यात 580 ठिकाणी रजोनिवृत्ती क्लिनिक कार्यरत असून, सुमारे 31,288 महिलांनी या सेवांचा लाभ घेतला आहे. यापैकी 30,034महिलांना उपचार देण्यात आले असून, 82 प्रकरणे पुढील तपासणीसाठी शिफारस समितीकडे पाठविण्यात आली आहेत.

या क्लिनिकच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी स्वतंत्र मनुष्यबळ, औषध पुरवठा, क्लिनिकसाठी स्वतंत्र कक्ष, तसेच गोपनीयता आणि सुविधा उपलब्धतेचे मूल्यांकन करण्याचे निर्देश राज्यमंत्री बोर्डीकर-साकोरे यांनी दिले. तसेच तज्ज्ञ डॉक्टर, ‘एनएचएम’ अंतर्गत इम्पॅनल डॉक्टर आणि सेवाभावी तज्ज्ञांची मदत घेऊन क्लिनिकची संख्या वाढवण्यावर भर देण्याचेही निर्देश दिले.

नोंदी स्वतंत्रपणे ठेवण्यासाठी लाईन लिस्ट व रेकॉर्ड व्यवस्थापनाची व्यवस्था करून, भविष्यात आवश्यक मदत व उपचार सुलभ व्हावा, हा त्यामागील उद्देश असल्याचे असल्याचे सांगून या क्लिनिकसंदर्भात व्यापक जनजागृती व प्रसिद्धीसाठी स्थानिक स्तरावर प्रचार करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.


000

Friday, 6 February 2026

ईटीएस३६० सार्वजनिक / महिला सुरक्षा योजना

 

ईटीएस३६० सार्वजनिक / महिला सुरक्षा योजना

 योजनेविषयी माहिती :

• मुंबई व महाराष्ट्रातील इतर प्रमुख शहरांतील ऑटो रिक्षा व टॅक्सींसाठी ईटीएस३६० सार्वजनिक / महिला सुरक्षा योजना सुरू करण्यात आली आहे.

• ही योजना महाराष्ट्र मोटार वाहन विभाग तसेच मुंबई / महाराष्ट्र पोलीस विभाग यांच्या सहकार्याने, ETS360 सोबत करण्यात आलेल्या सामंजस्य करारांतर्गत राबविण्यात येत आहे.

• प्रवासी आसनासमोर तसेच चालकाच्या मागील बाजूस क्यूआर कोडसह चालक / वाहन ओळख पॅनल बसविण्यात आले आहे.

• दिग्सी अ‍ॅपच्या माध्यमातून क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर गुगल मॅपवर वाहनाचा मार्ग दिसतो.

या अ‍ॅपमध्ये एसओएस बटन असून ते सक्रिय केल्यास वाहनचालक व प्रवासी यांची माहिती थेट पोलीस  नियंत्रण कक्ष ११२ येथे पाठवली जाते.

त्यानंतर जवळची गस्त घालणारी पोलीस व्हॅन वाहनाचा मागोवा घेऊन सुमारे ५ ते ६ मिनिटांत मदत उपलब्ध करून देते.

• मुंबई हे भारतातील असे तंत्रज्ञान सुरू करणारे पहिले शहर असूनमहाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.

• ही सुविधा पुढीलप्रमाणे पूर्णतः मोफत उपलब्ध आहे.

– राज्य शासनासाठी कोणताही खर्च नाही

– चालकांसाठी कोणताही खर्च नाही

– नागरिकांसाठी कोणताही खर्च नाही

• या योजनेचा खर्च कॉर्पोरेट निधीदेणग्या व कॉर्पोरेट प्रायोजकत्वातून केला जात आहे.

• ही योजना २३ जानेवारी २०२६वसंत पंचमीदिनी अधिकृतपणे सुरू करण्यात आली आहे.

आर्थिकदृष्ट्या निर्धन, दुर्बल रूग्णांना धर्मादाय रूग्णालयांकडून आरोग्य सेवा पुरविणार धर्मादाय रूग्णालय योजनेची आदर्शकार्यप्रणाली जाहीर

 

Saturday, 24 June 2023

आर्थिकदृष्ट्या निर्धन, दुर्बल रूग्णांना धर्मादाय रूग्णालयांकडून आरोग्य सेवा पुरविणार धर्मादाय रूग्णालय योजनेची आदर्श कार्यप्रणाली जाहीर

 आर्थिकदृष्ट्या निर्धन, दुर्बल रूग्णांना धर्मादाय रूग्णालयांकडून आरोग्य सेवा पुरविणार

धर्मादाय रूग्णालय योजनेची आदर्श कार्यप्रणाली जाहीर

            मुंबई, दि. 23 : धर्मादाय आयुक्त यांचे अधिकार क्षेत्रात येणा-या रुग्णालयांत दाखल असलेल्या आर्थिकदृष्ट्या निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांना धर्मादाय रुग्णालयांकडून दि. 1 सप्टेंबर 2006 पासुन धर्मादाय योजना अंमलात आलेली आहे. या योजनेनुसार धर्मादाय रुग्णालयांकडून निर्धन व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांना अधिक प्रभावी व पारदर्शीपणे आरोग्य सेवा प्राप्त व्हावी, यासाठी आदर्श कार्यप्रणाली तयार करण्याबाबतचा निर्णय सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली 27 एप्रिल 2023 रोजी झालेल्या बैठकीमध्ये घेण्यात आला. त्यानुसार आदर्श कार्यप्रणाली तयार करण्यात आली असून आर्थिकदृष्ट्या निर्धन व दुर्बल घटकातील रूग्णांना धर्मादाय रूग्णालयांकडून आरोग्य सेवा पुरविण्यात येत आहे.


            धर्मादाय रूग्णालय योजनेच्या अनुषंगाने रुग्णालयांकडून पुरविण्यात येत असलेल्या रुग्णसेवेच्या संदर्भात वारंवार शासनास तक्रारी प्राप्त होत असतात. या तक्रारींच्या अनुषंगाने धर्मादाय रुग्णालयांवर शासनाचे नियंत्रण ठेवण्यात येऊन योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.


            धर्मादाय रुग्णालय योजनेनुसार आर्थिकदृष्ट्या निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांसाठी मोफत व 50 टक्के सवलतीच्या दरामध्ये राज्यातील एकुण 467 धर्मादाय रुग्णालयांकडून आरोग्य सेवा पुरविण्यात येत आहे. या 467 धर्मादाय रुग्णालयांची जिल्हा निहाय यादी धर्मादाय योजनेमध्ये नमुद करण्यात आली आहे. धर्मादाय रुग्णालय योजनेनुसार रुग्णालयाकडून त्यांच्या एकुण खाटांच्या प्रत्येकी 10 टक्के खाटा आर्थिकदृष्ट्या निर्धन तसेच दुर्बल घटकातील रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. निर्धन घटकासाठी 10 टक्के व दुर्बल घटकासाठी 10 टक्के राखीव खाटांची परिगणना करतेवेळी त्या रुग्णालयाच्या प्रत्येक श्रेणीतील खोली निहाय 10 टक्के खाटा सामान्य खोली व विशेष खोली याप्रमाणे करण्यात येणार आहे.


            धर्मादाय रुग्णालयांमध्ये वैद्यकिय सुविधेचा लाभ घेण्याकरिता मोफत उपचाराकरिता निर्धन व्यक्तींना वार्षिक उत्पन्नाची मर्यादा 1 लक्ष 80 हजार रूपये इतकी तर दुर्बल घटकातील रुग्णांना धर्मादाय योजनेनुसार 50 टक्के सवलतीच्या दराने उपचाराकरिता वार्षिक उत्पन्नाची मर्यादा 3 लक्ष 60 हजार रूपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. ही माहिती धर्मादाय रुग्णालयांनी त्यांच्या दर्शनी भागात तसेच ओपीडी/आयपीडी च्या ठिकाणी ठळक अक्षरात प्रसिद्ध करावी, याबाबतचे स्पष्ट निर्देश धर्मादाय रुग्णालयांना देण्यात आले आहेत. आर्थिकदृष्ट्या निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांच्या देयकात ज्या सेवांची किंमत आकारलेली आहे. अशा सेवा त्या रुग्णालयातील सर्वात खालच्या वर्गासाठी आकारलेल्या दरानेच आकारणे योजनेमध्ये नमुद आहे.


            औषधे व उपयोगात आणलेल्या वस्तु (कन्ज्युमेबल्स) व शरीराच्या आत लावलेल्या वस्तु (इंम्प्लांट्स) यांच्या दराची आकारणी मुळ खरेदी किंमतीच्या दराने देयकात आकारण्यात यावी. धर्मादाय रुग्णालयांमध्ये अवयव प्रत्यारोपण करण्याकरिता अथवा त्या सारख्या अन्य संवेदनशील आजारांवर उपचार करण्याकरिता दाखल असलेल्या रुग्णाला विशेष खोली उपलब्ध करुन देणे, त्याकरिता कोणतेही अतिरीक्त शुल्क न आकारणे. रुग्णाने तहसीलदाराकडून प्राप्त केलेला उत्पन्नाचा दाखला सादर केल्यानंतर धर्मादाय रुग्णालयांना रुग्णांच्या वैयक्तीक आर्थिक परिस्थितीची कोणत्याही प्रकारे चौकशी करता येणार नाही, याबाबतच्या सुचना आदर्श कार्यप्रणालीमध्ये नमुद आहेत.


            धर्मादाय योजनेनुसार रुग्णालयांकडून पुरविण्यात येत असलेल्या रुग्णसेवेची इत्यंभुत माहिती सर्वसामान्य जनतेला मिळण्यासाठी सार्वजनिकआरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री यांच्या कल्पनेतुन साकारण्यात येत असलेले मोबाईल अप्लिकेशन तयार करण्याचे कार्य अंतिम टप्प्यात असुन लवकरच त्याचे डिजीटल अनावरण लवकरच होणार आहे.


            या मोबाईल अप्लिकेशवर धर्मादाय रुग्णालय योजनेची प्रत, योजना प्रभावी पणे राबविण्याकरिता आरोग्य विभागाकडून तयार करण्यात आलेल्या आदर्श कार्यप्रणालीची प्रत मुख्य पृष्ठावर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच 467 धर्मादाय रुग्णालयांची जिल्हा निहाय यादी, रुग्णालयांच्या ठिकाणी कार्यरत असलेल्या डॉक्टर व आरोग्य सेवकांची नावे, रुग्णालय निहाय राखीव असलेल्या व त्यापैकी उपलब्ध असलेल्या खाटांची वेळोवेळी अद्ययावत (Update) असलेली संख्या अप्लिकेशच्या मुख्य पृष्ठावर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.


            धर्मादाय रुग्णालय अथवा इतर कोणत्याही संदर्भात तक्रार करावयाची असल्यास मोबाईल अप्लिकेशनवर तक्रार करण्याचा पर्याय देखील उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. रुग्णांना धर्मादाय रुग्णालय योजनेच्या अनुषंगाने मदत मिळणे सुलभ व्हावे याकरिता प्रत्येक रुग्णालयाच्या ठिकाणी आरोग्य सेवकाची नेमणूक करण्यात येत आहे. रुग्णांना योजनेची माहिती उपलब्ध करुन त्यांना त्यांच्या हक्काची रुग्णसेवा मिळवुन देण्यास मदत करण्याची महत्वाची जबाबदारी आरोग्य सेवकांवर सोपविण्यात आली आहे. त्याकरिता प्रत्येक रुग्णालयाच्या ठिकाणी आरोग्य सेवकासाठी स्वतंत्र कक्ष निर्माण करुन देण्यात येत आहे.


            धर्मादाय रुग्णालयांकडून योजनेमध्ये नमुद केल्यानुसार रुग्णसेवा उपलब्ध करुन देण्यात येत असल्याची पडताळणी करण्याकरिता तपासणी समिती तयार करण्यात आली आहे. ही तपासणी समिती वेळोवेळी धर्मादाय योजनेमध्ये व आदर्श कार्यप्रणाली (SOP) मध्ये नमुद केलेल्या नियमानुसार रुग्णालयांकडून रुग्णांना दर्जेदार रुग्णसेवा पुरविण्यात येत असल्याबाबतची रूग्णालयांची पडताळणी करणार आहे. रुग्णालयांकडून दर्जेदार रूग्णसेवा पुरविण्यात येत नसल्यास अशा रूग्णालयांवर कठोर कार्यवाही करण्याबाबतचा प्रस्ताव धर्मादाय व आरोग्य विभागास सादर करण्याचे अधिकार समितीस असणार आहेत.


            निर्धन व आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील रुग्णांना वैद्यकिय सेवा देण्यास दिरंगाई केल्यास विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांचा अवमान केल्याचे समजण्यात येईल, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री यांचेकडून दोन्ही सभागृहांच्या पटलावर ठेवण्यात आली आहे. त्यामुळे गरजवंतांना वैद्यकिय सेवा देण्यास धर्मादाय रुग्णालयांकडून अथवा कोणत्याही व्यक्तीकडून दिरंगाई करण्यात आल्यास संबंधीतांवर दोन्ही सभागृहांचा हक्कभंग केल्याचे समजण्यात येउन त्यांच्यावर शासनाच्या नियमानुसार कारवाई केली जाणार आहे. तरी धर्मादाय रुग्णालय योजना अधिक प्रभावीपणे व पारदर्शीपणे रुग्णांना प्राप्त व्हावी या हेतुने सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री यांचे कल्पनेतुन या योजनेबाबतची आदर्श कार्यप्रणाली (SOP) तयार करण्यात आली आहे.


००००

Featured post

Lakshvedhi