Showing posts with label . मार्गदर्शन केंद्र. Show all posts
Showing posts with label . मार्गदर्शन केंद्र. Show all posts

Monday, 26 January 2026

26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट मधील मुख्य फरक ...*

 *26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट मधील  मुख्य फरक ...* 

 


                                   


1)  15 ऑगस्ट ला पंतप्रधान ध्वजारोहण करतात    तर ...   26 जानेवारीला राष्ट्रपती झेंडा फडकवतात 

कारण देश 15 ऑगस्टला स्वतंत्र झाला तेंव्हा राष्ट्रपती पद अस्तित्वातच आलेलं नव्हतं.                     

************                                                                      


2) 15 ऑगस्टला झेंडा      उघडलेल्या अवस्थेत दोरीने  वर चढवला जातो. त्याला ध्वजारोहण (flag hoisting) म्हणतात तर...    26 जानेवारीला झेंड्याची बंद घडी करून सरकफासाची दोरीची गाठ बांधून झेंडा अगोदरच वर नेलेला असतो. फक्त दोरी ओढून झेंडा फडकवला  जातो. त्याला (flag unfurling)  म्हणतात. 

************   


3)15 ऑगस्ट 1947 ला     इंग्रजांचा झेंडा खाली उतरला व भारताचा झेंडा वर चढला. म्हणून त्याला ध्वजारोहण म्हणतात.         तर... 26 जानेवारी 1950 ला भारताचा झेंडा होताच पण स्वातंत्र्या नंतरही स्वतःची राज्यघटना अस्तित्वात येईपर्यंत अडीच वर्षे इंग्रजांच्या कायद्यानेच राज्य चालले. याचे प्रतीक म्हणून झेंडा बंद घडीत बांधून वर नेउन दोरी ओढीत वरच्या वर गाठ सुटून झेंडा हवेत मोकळा केल्या जातो, म्हणून त्याला *झेंडा फडकवणे* म्हणतात.                              ***************    


4) 15 ऑगस्ट ला लाल किल्ल्यावर ध्वजारोहणहोते तर, 26 जानेवारीला राष्ट्रपती भवनासमोर राजपथावर झेंडा फडकवला जातो.             *************      


_आपण ज्या देशाचे नागरिक आहोत त्या देशाच्या इतिहासाबाबत काही महत्त्वाच्या गोष्टी माहीत असणे आवश्यक आहे. 

मूळात आपण स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिन यामधील फरकच समजावून घेतला नाही. प्रजासत्ताक दिनाच्या भाषणात इंग्रजांची राजवट,स्वतंत्र मिळविण्यासाठीचे लढे ही माहिती सांगणे अप्रस्तुत,चुकीचे ठरते.त्या ऐवजी या दिवशी संविधान निर्मितीची पार्श्वभूमी,संविधानामुळे देशाची झालेली प्रगती,संविधान निर्मात्याचे योगदान मांडणे अपेक्षित आहे.स्वातंत्र्यदिनी ज्या प्रमाणे देशाला स्वातंत्र मिळवून देणार्‍या स्वातंत्र्यसैनिकांच्या योगदानाचा गौरव होतो , त्याच प्रमाणे प्रजासत्ताक दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान निर्मितीचा गौरव होणे उचित ठरते.


      २६ जानेवारी १९५० पासून राज्यघटनेचा अंमल सुरू झाला आणि देश सर्व प्रजेची सत्ता असणारा प्रजासत्ताक बनला.प्रजासत्तकोत्तोर ७५ वर्षांत सर्वसमावेशी  राज्यघटनेच्या बळावर देशाने जी अतुलनीय प्रगती केली आहे,ती कौतुकास्पद आहे. 


    ७५ वर्षांपूर्वी साधी टाचणी बनविण्यास पात्र नसणारा देश आज चांद्र मोहीम,मंगळ मोहीम द्वारे आकाशाला गवसणी घालत आहेत.१९५० चे ईवलेसे लोकशाहीचे रोपटे आज जगात सर्वात मोठे संसदीय लोकशाहीवादी महावृक्ष म्हणून आदरणीय ठरत आहे. 


  राज्यघटनेमुळे देशात शैक्षणिक,सामाजिक, राजकीय,आर्थिक, सामाजिक,सांस्कृतिक क्रांती घडवून आली आहे.१९५१ साली देशाची साक्षरता १८.३३% होती २०११ साली ७४.४०% तर आज जवळपास ८५%  एवढी वाढली आहे. 

 (वन मॅन वन वोट

वन वोट वन व्हॅल्यू  )

    "एक व्यक्ति-एक मत" आणि राज्यघटनेतील मूलभूत अधिकारामुळे सर्व भारतीयांना विकासाची समान संधी उपलब्ध झाली आहे .राज्यघटनीय राजकीय अधिकारामुळे वंचित घटकांना ग्राम पातळीपासून राष्ट्रीय पातळीपर्यंत सत्तेत सर्वांना सहभागी होता आले आहे. स्वतःला एक साधा चहा विकणारे सांगणारे नरेंद्र मोदी आज देशाचे प्रधानमंत्री झालेत.हे सर्व बदल घडले ते राज्यघटनेमुळे.

 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणजेच हा संविधान गौरव दिन आहे, हा संविधान गौरव दिन भारतातील कोणत्याही सण आणि उत्सवापेक्षा मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरा केला पाहिजे,

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले घटनेची माहिती असणे आवश्यक आहे आणि त्याचे पालन करणे आपले कर्तव्य आहे.

 आजच्या दिवशी कोणीही शहीद झाले नाही म्हणून शहिदांचे गाणे लावू नयेत संविधान गौरव गीते व संविधान उद्देशिका चे वाचन करून संविधानाबाबत व संविधान निर्माते 

 यांचे कृतज्ञता व्यक्त करून 

 संविधान गौरव दिवस साजरा करावा 

  विजय खरात

 पनवेल नवी मुंबई

Sunday, 25 January 2026

शहरीकरणाच्या प्रक्रियेत महिलांचा कामासाठीचा प्रवास वाढला असून त्यांच्या सुरक्षिततेबाबत

 परिवहन आयुक्त भिमनवार म्हणाले कीशहरीकरणाच्या प्रक्रियेत महिलांचा कामासाठीचा प्रवास वाढला असून त्यांच्या सुरक्षिततेबाबत कुटुंबीयांमध्ये कायम चिंता असते. दिल्लीतील निर्भया प्रकरणानंतर महिला सुरक्षेचा प्रश्न राष्ट्रीय स्तरावर गंभीरपणे घेतला गेला. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार प्रत्येक प्रवासी वाहनात व्हेईकल लोकेशन अँड ट्रॅकिंग डिव्हाइस’ (व्हीएलटीडीव पॅनिक बटन बसवणे बंधनकारक करण्यात आले.

याच पार्श्वभूमीवर इटीएस ३६० टेक्नोलॉजी सोल्यूशनचे संस्थापक प्रा.भट्ट आणि त्यांच्या टीमने सामाजिक जबाबदारीतून कोणताही आर्थिक भार न टाकता महिलांना सुरक्षा देणारा पर्यायी उपाय विकसित केला. कोरोना काळातील अडचणीप्रशासकीय नियमांचा अभाव आणि तांत्रिक आव्हाने असूनही त्यांनी हार न मानता हा प्रकल्प पुढे नेला. परिवहन विभागपोलीस यंत्रणा आणि कमांड कंट्रोल सेंटरशी एकात्मता साधत हा प्रकल्प प्रत्यक्षात आणण्यात आला असल्याचे आयुक्त  भिमनवार यांनी सांगितले.

हा उपक्रम सध्या ऐच्छिक असला तरी त्याची व्यापक जनजागृती करण्याचे आवाहन परिवहन आयुक्त भिमनवार यांनी केले. ऑटो रिक्षांच्या मागील बाजूस माहिती फलक लावणेअ‍ॅपचा वापर वाढवणे आणि प्रवासी व चालकांमध्ये विश्वास निर्माण करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. योग्य प्रतिसाद यंत्रणा आणि कमांड कंट्रोल सेंटरच्या सतत सज्जतेवरच या प्रकल्पाचे यश अवलंबून असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. महिला सुरक्षेसाठी हा उपक्रम देशासाठी आदर्श ठरेलअसा विश्वासही त्यांनी व्यक्त 

Saturday, 24 January 2026

झरे हे स्वच्छ, सुरक्षित आणि शाश्वत पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत आहेत. त्यामुळे त्यांचे पुनरूज्जीवन आणि संवर्धन करणे

 झरे हे स्वच्छसुरक्षित आणि शाश्वत पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत आहेतत्यामुळे त्यांचे पुनरूज्जीन आणि संवर्धन करणे गरजेचे असून शासनप्रशासनाबरोबर जनतेचीही ती सामूहिक जबाबदारी असल्याचे मत वसुंधरा पाणलोट विकास यंत्रणेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे यांनी व्यक्त केले.

प्रशिक्षणार्थींना झऱ्याचा संपूर्ण प्रवास समजावा यासाठी सातारा जिल्हयातील जावळी तालुक्यातील रानगेघर या गावातील तामकडा या झऱ्याचा ट्रान्झिट वॉक करण्यात आलायामध्ये झऱ्याच्या पाण्याच्या उगम बिंदूपासून ते खाली वाहणाऱ्या प्रवाहापर्यंतचा नैसर्गिक प्रवासपाणी जमिनीत मुरण्याची ठिकाणंपाण्याचा प्रवाह, मार्गझऱ्याची सध्यस्थितीआजूबाजूची भूगर्भीय व भौगोलिक माहिती, पाण्याची गुणवत्तास्प्रिंग बॉक्सपाणलोट विकासाची कामेमानवी हस्तक्षेप या सर्व गोष्टींचा प्रत्यक्ष भेट देन अभ्यास करण्यात आलायामध्ये ग्रामस्थांसोबत ॲक्वाडॅमचे मुकेश पाटीलमृत्युंजय विचारेग्रामपरीचे दिपक जाधवविकास जाधव यांनी तांत्रिक माहितीसह मार्गदर्शन केले.

प्रशिक्षणाची सुरुवात वसुंधरा पाणलोट विकास यंत्रणेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवेग्रामपरीच्या संचालक जयश्री राव  अर्चना राव यांच्या हस्ते जलपूजन करून करण्यात आले. एक्वाडॅमच्या भूवैज्ञानिकांनी महाराष्ट्रातील नैसर्गिक झऱ्यांची ओळखनोंदणीसंरक्षणपुनर्जीवनपाण्याची सातत्यपूर्ण उपलब्धता तसेच लोकसहभागातून शाश्वत व्यवस्थापन प्रणाली विकसित करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

झऱ्यांचे व्यवस्थापन या विषयावरील तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाच्या निमित्ताने 50 मास्टर ट्रेनर्स तयार करण्यात आलेमहाराष्ट्रामध्ये झऱ्यांचे धोरण राबविताना हे ट्रेनर्स दिशादर्शक म्हणून काम करतील.


शहरांतील ऑटो रिक्षा व टॅक्सींसाठी ईटीएस३६० सार्वजनिक / महिला सुरक्षा योजना

.

योजनेविषयी माहिती :

• मुंबई व महाराष्ट्रातील इतर प्रमुख शहरांतील ऑटो रिक्षा व टॅक्सींसाठी ईटीएस३६० सार्वजनिक / महिला सुरक्षा योजना सुरू करण्यात आली आहे.

• ही योजना महाराष्ट्र मोटार वाहन विभाग तसेच मुंबई / महाराष्ट्र पोलीस विभाग यांच्या सहकार्याने, ETS360 सोबत करण्यात आलेल्या सामंजस्य करारांतर्गत राबविण्यात येत आहे.

• प्रवासी आसनासमोर तसेच चालकाच्या मागील बाजूस क्यूआर कोडसह चालक / वाहन ओळख पॅनल बसविण्यात आले आहे.

• दिग्सी अ‍ॅपच्या माध्यमातून क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर गुगल मॅपवर वाहनाचा मार्ग दिसतो.

या अ‍ॅपमध्ये एसओएस बटन असून ते सक्रिय केल्यास वाहनचालक व प्रवासी यांची माहिती थेट पोलीस  नियंत्रण कक्ष ११२ येथे पाठवली जाते.

त्यानंतर जवळची गस्त घालणारी पोलीस व्हॅन वाहनाचा मागोवा घेऊन सुमारे ५ ते ६ मिनिटांत मदत उपलब्ध करून देते.

• मुंबई हे भारतातील असे तंत्रज्ञान सुरू करणारे पहिले शहर असूनमहाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.

• ही सुविधा पुढीलप्रमाणे पूर्णतः मोफत उपलब्ध आहे.

– राज्य शासनासाठी कोणताही खर्च नाही

– चालकांसाठी कोणताही खर्च नाही

– नागरिकांसाठी कोणताही खर्च नाही

• या योजनेचा खर्च कॉर्पोरेट निधीदेणग्या व कॉर्पोरेट प्रायोजकत्वातून केला जात आहे.

• ही योजना २३ जानेवारी २०२६वसंत पंचमीदिनी अधिकृतपणे सुरू करण्यात आली आहे.


राष्ट्रीय मतदार दिन आणि भारतीय नागरिकांचे. कर्तव्य

राष्ट्रीय मतदार दिन

 

राष्ट्रीय मतदार दिन आणि भारतीय नागरिकांचे.  कर्तव्य

25 जानेवारी हा दिवस भारतीय लोकशाहीच्या इतिहासात अत्यंत महत्त्वाचा आणि अभिमानाचा दिवस आहेयाच दिवशी, 25 जानेवारी 1950 रोजी भारत निवडणूक आयोगाची स्थापना झालीस्वतंत्र भारताने लोकशाहीची वाट स्वीकारल्यानंतरनिष्पक्ष आणि पारदर्शक निवडणूक प्रक्रिया राबविण्याची जबाबदारी या घटनात्मक संस्थेकडे सोपवण्यात आलीत्यामुळे भारतीय लोकशाहीत 25 जानेवारी या दिवसाला अतिशय महत्व आहेतथापिनागरिकांना आपल्या मताची किंमत उपयोगितामहत्व आणि कर्तव्य कळावे यासाठी 25 जानेवारी 2011 पासून हा दिवस राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा होतो.  2026 हे वर्ष राष्ट्रीय मतदार दिनाचे 16 वे वर्ष आहेनिवडणूक आयोगाने यावर्षी राष्ट्रीय मतदार दिनाचे ब्रीद वाक्य 'माझा भारत माझे मत ' हे ठेवले आहे

Thursday, 22 January 2026

औषध तुमचे आहे, पण कायदा त्यांचा आहे, परदेश प्रवास करणाऱ्यांना सूचना,pl share

 “औषध तुमचे आहे, पण कायदा त्यांचा आहे!”

परदेशात प्रवास करणाऱ्या भारतीय रुग्णांसाठी एक धोक्याची घंटा.**


*डॉ. मंथन शेठ*

हेल्थ टाइम्स, दर्पण, गुजरात मित्र, १४/०१/२०२६


गेल्या आठवड्यात एक बातमी माझ्या मनात घोळत राहिली. तीव्र पाठदुखीने त्रस्त असलेला एक सामान्य भारतीय नागरिक, भारतात त्याच्या डॉक्टरांनी लिहून दिलेले **ट्रॅमाडॉल** हे औषध घेऊन परदेशात गेला. विमानतळावर त्याला थांबवण्यात आले. चौकशी करण्यात आली. तपासणी झाली. आणि काही मिनिटांतच तो 'रुग्ण' वरून 'आरोपी' बनला. आज ती व्यक्ती तुरुंगात आहे.


त्याचा तस्करी करण्याचा कोणताही हेतू नव्हता.

तो अंमली पदार्थ विकत नव्हता.

तो फक्त आपली वेदना कमी करण्यासाठी औषध घेऊन जात होता.


पण त्या देशात, **ट्रॅमाडॉलला अंमली पदार्थ म्हणून वर्गीकृत केले आहे**.


यामुळे एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो:

आपल्यासाठी 'उपचार' असलेले औषध दुसऱ्या देशात **गुन्हा** ठरू शकते, हे आपल्याला खरोखरच माहीत आहे का?


देश बदलतात, कायदे बदलतात. औषधे बदलत नाहीत.

भारतात आपण औषधांकडे खूप सहजपणे पाहतो. डॉक्टर ती लिहून देतात, आपण मेडिकल स्टोअरमधून विकत घेतो, घरी ठेवतो आणि प्रवासातही सोबत नेतो. समस्या तेव्हा सुरू होते, जेव्हा आपण असे गृहीत धरतो की **भारताचा कायदेशीर दृष्टिकोन जगभर लागू होतो**. वास्तविक, भारताचे औषध नियंत्रण कायदे वेगळे आहेत; यूएई, जपान, सिंगापूर, सौदी अरेबिया, कतार, इंडोनेशिया - प्रत्येक देशाचे कायदे वेगळे आहेत.


भारतात जे औषध **शेड्यूल एच** किंवा **डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय न मिळणारे औषध** आहे, ते इतरत्र **अंमली पदार्थ** किंवा **मानसिक स्थितीवर परिणाम करणारा पदार्थ** मानले जाऊ शकते. कायदा औषधाकडे पाहत नाही - तो **धोक्याकडे** पाहतो.


अशी अनेक औषधे आहेत, पण **ट्रॅमाडॉल** हे एक उत्तम उदाहरण आहे. भारतातील लाखो रुग्ण ते वापरतात. तथापि, यूएई, इजिप्त, इंडोनेशिया आणि सौदी अरेबियामध्ये ते एक **ओपिओइड अंमली पदार्थ** आहे. केवळ जवळ बाळगल्यास तुरुंगवास होऊ शकतो. अलीकडील प्रकरणात, त्या व्यक्तीकडे फक्त १०-१५ गोळ्या होत्या. कोणताही व्यावसायिक हेतू नव्हता. तरीही कायद्यासाठी, **केवळ औषधाचे अस्तित्व पुरेसे होते**.


"माझ्या डॉक्टरांनी ते लिहून दिले आहे, माझ्याकडे प्रिस्क्रिप्शन आहे" हा युक्तिवाद परदेशात चालत नाही. अनेकांना वाटते की, "माझ्याकडे प्रिस्क्रिप्शन असेल, तर कोणतीही अडचण येणार नाही." पण अनेक देशांमध्ये, प्रिस्क्रिप्शन असूनही, ते औषध बेकायदेशीर असू शकते. का? कारण ते देश अशा औषधांकडे **मादक पदार्थांचा गैरवापर, अवैध व्यापाराचे धोके, तस्करी, सार्वजनिक सुरक्षेला धोका आणि नशा** या दृष्टिकोनातून पाहतात. कायदा तुम्हाला रुग्ण म्हणून पाहत नाही—तो तुम्हाला **नियंत्रित पदार्थाचा ताबा बाळगणारा** म्हणून पाहतो.

### 🔴 कोणत्या औषधांमुळे भारतीय प्रवासी सर्वाधिक अडचणीत येतात?

**होय—हा एक रेड अलर्ट आहे. परदेश प्रवासाला जाण्यापूर्वी ही औषधे काळजीपूर्वक तपासा.**


भारतीय प्रवाशांना अनेकदा अशा काही औषधांमुळे त्रास होतो, जी भारतात सामान्यपणे वापरली जातात, परंतु अनेक देशांमध्ये ती **मादक, नियंत्रित किंवा बेकायदेशीर** मानली जातात.


* **ट्रॅमाडॉल**: भारतात एक सामान्य वेदनाशामक औषध, परंतु अनेक देशांमध्ये मादक पदार्थ म्हणून वर्गीकृत आहे. केवळ जवळ बाळगल्यास तुरुंगवास होऊ शकतो.

* **कोडीन-आधारित खोकल्याची औषधे**: भारतात मोठ्या प्रमाणावर वापरली जातात, परंतु अनेक देशांमध्ये ओपिओइड औषधे म्हणून नोंदणीकृत आहेत आणि व्यसन लावणारे पदार्थ म्हणून त्यांच्यावर कठोर नियंत्रण आहे.

* **अल्प्राझोलम**: चिंता आणि झोपेसाठी वापरले जाते; अनेक देशांमध्ये सायकोट्रॉपिक औषध मानले जाते आणि सरकारी परवानगीशिवाय ते सोबत आणणे गुन्हा ठरू शकते.

* **डायझेपाम**: झोप आणि स्नायू शिथिल करण्यासाठी दिले जाते; अनेक ठिकाणी नियंत्रित औषध म्हणून वर्गीकृत आहे, ज्यासाठी विशेष परवानगी आवश्यक आहे.

* **झोलपिडेम**: निद्रानाशासाठी भारतात सर्रास वापरले जाते, परंतु काही देशांमध्ये ते पूर्णपणे **प्रतिबंधित** आहे.

* **प्रेगॅबॅलिन**: मज्जातंतूंच्या वेदना आणि डायबेटिक न्यूरोपॅथीसाठी वापरले जाते; अनेक देशांमध्ये प्रतिबंधित आहे आणि विशिष्ट मर्यादा व परवानगीशिवाय बेकायदेशीर आहे.

* याव्यतिरिक्त, काही **ADHD औषधे** जी डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनसह भारतात कायदेशीर आहेत, ती अनेक देशांमध्ये पूर्णपणे **बेकायदेशीर** आहेत.


आणि दुर्दैवाने, यापैकी अनेक औषधे आपल्या घरांमध्ये सहज आढळतात. ही फक्त काही उदाहरणे आहेत—ही संपूर्ण यादी नाही.

# ✈️ विमानतळावर काय होते?

तुमच्या सामानाची तपासणी केली जाते. जर एखादे औषध सापडले आणि त्याचे नाव मादक पदार्थांच्या यादीत असेल, तर तुम्हाला बाजूला नेले जाते. त्यानंतर चौकशी होते. मग तपास. अटक. आणि त्यानंतर, कायदेशीर प्रक्रिया सुरू होते.

तुम्ही कदाचित स्पष्टीकरण द्याल:

“मला वेदना होत होत्या.”

“कृपया माझ्या डॉक्टरांशी बोला—हे त्यांचे प्रिस्क्रिप्शन आहे.” पण कायद्याचा फक्त एकच प्रश्न असतो:

**“हे औषध आपल्या देशात कायदेशीर आहे का?”**


जर उत्तर “नाही” असेल, तर बाकी सर्व काही निरर्थक ठरते

### 🩺 एक डॉक्टर म्हणून मी हे का लिहित आहे?

माझ्या क्लिनिकमध्ये मी दररोज अनेक रुग्णांना भेटतो. मी त्यांच्या चिंता, द्विधा मनःस्थिती, कथा आणि संघर्षांचे ऐकतो. बरेच जण म्हणतात:

“डॉक्टर, आम्ही आमच्या मुलीला भेटायला दुबईला जात आहोत,” किंवा

“आम्ही काही महिन्यांसाठी आमच्या मुलासोबत राहायला अमेरिकेला जात आहोत.”

आणि त्यासोबतच, ते मला झोपेच्या गोळ्या, मज्जातंतूंची औषधे, वेदनाशामक औषधे सोबत घेऊन जाण्यासाठी लिहून देण्यास सांगतात. पण कोणीही एकदाही विचारत नाही:

**“हे औषध तिथे कायदेशीर आहे का?”**

हे अज्ञान सर्वात मोठा धोका आहे. फक्त पाच मिनिटांत तुम्ही स्वतःचे संरक्षण करू शकता.

### ✅ परदेश प्रवासापूर्वी पाळायची पाच पावले:


१️⃣ **गुगलवर शोधा.**

उदाहरणार्थ:

“युएईमध्ये ट्रॅमाडॉल कायदेशीर आहे का?”

प्रत्येक औषध आणि प्रत्येक देशासाठी असे करा.


२️⃣ **दूतावासाच्या वेबसाइटला भेट द्या.**

**“प्रतिबंधित औषधांची यादी”** शोधा.


३️⃣ **शंका असल्यास, औषध बदला.**

तुमच्या डॉक्टरांना अधिक सुरक्षित पर्यायाबद्दल विचारा.


४️⃣ **डॉक्टरांचे पत्र/प्रिस्क्रिप्शन सोबत ठेवा**

इंग्रजीमध्ये, ज्यामध्ये औषधाचे **जेनेरिक नाव** नमूद केलेले असेल.


५️⃣ **औषधे मूळ पॅकेजिंगमध्ये ठेवा.**

सुट्या गोळ्या किंवा स्ट्रिप्स सर्वात संशयास्पद दिसतात.

### 📌 लक्षात ठेवा:


औषध ​​शरीराचे रक्षण करते—पण चुकीच्या देशात, तेच औषध तुमचे स्वातंत्र्य हिरावून घेऊ शकते. परदेश प्रवास म्हणजे फक्त तिकिटे आणि व्हिसा नाही; तर तो कायदा समजून घेण्याबद्दल देखील आहे.

जर तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणी परदेश प्रवास करत असेल, तर कृपया त्यांना हा लेख वाचायला सांगा. एक छोटीशी माहिती आयुष्यभराच्या त्रासापासून वाचवू शकते.


कारण **औषध तुमचे आहे, पण कायदा त्यांचा आहे.**

Saturday, 17 January 2026

घरोघरी जाऊन प्रचार करण्याच्या तरतूदीसंदर्भातील आदेश जुनाच

 घरोघरी जाऊन प्रचार करण्याच्या

तरतूदीसंदर्भातील आदेश जुनाच

 

मुंबईदि. 14 : महानगरपालिका निवडणूकांच्या प्रचाराची समाप्ती झाल्यानंतर घरोघरी जाऊन प्रचार करण्यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने कुठलाही नवीन आदेश निर्गमित केलेला नाही. त्यासंदर्भातला आदेश जुनाच असून तो राज्य निवडणूक आयोगाने 14 फेब्रुवारी 2012 मध्येच निर्गमित केलेला आहे.

जाहीर प्रचाराच्या समाप्तीनंतर घरोघरी जाऊन प्रचार करण्यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने नवीन नियम लागू केला असल्याचे वृत्त समाजमाध्यमांसह विविध माध्यमातून प्रसारित होत आहेपरंतु हे वस्तुस्थितीला धरुन नाही. याबाबतचा आदेश जुनाच आहे. त्या 14 फेब्रुवारी 2012 रोजीच्या आदेशानुसार जाहीर प्रचार समाप्तीनंतर उमेदवार हे मतदान केंद्राच्या 100 मीटर बाहेर मतदारांना भेटून आणि घरोघरी जाऊन प्रचार करु शकतीलपरंतु माईकचा वापर करता येणार नाही आणि उमेदवारांना समूहानेदेखील फिरता येणार नाही.

0000

Sunday, 11 January 2026

दिव्यांग क्षेत्रात कार्य करण्यासाठी दिव्यांग हक्क अधिनियम २०१६ नुसार संस्थेची नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यानुसार मुंबई उपनगर जिल्ह्यातील ज्या संस्थांना दिव्यांग क्षेत्रात कार्य करायचे आहे, त्यांनी संस्थेच्या नोंदणीचा प्रस्ताव संबंधित जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी, मुंबई उपनगर कार्यालयाकडे सादर करावा. नोंदणी न करता कार्यरत असलेल्या संस्थांवर दिव्यांग हक्क अधिनियमनुसार कारवाई करण्यात येणार असल्याचेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे. 0000

 दिव्यांग क्षेत्रात कार्य करण्यासाठी दिव्यांग हक्क अधिनियम २०१६ नुसार संस्थेची नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यानुसार मुंबई उपनगर जिल्ह्यातील ज्या संस्थांना दिव्यांग क्षेत्रात कार्य करायचे आहे, त्यांनी संस्थेच्या नोंदणीचा प्रस्ताव संबंधित जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी, मुंबई उपनगर कार्यालयाकडे सादर करावा.

नोंदणी न करता कार्यरत असलेल्या संस्थांवर दिव्यांग हक्क अधिनियमनुसार कारवाई करण्यात येणार असल्याचेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

0000

Saturday, 10 January 2026

प्रत्येक अंगीकृत रुग्णालयात दर्शनी भागात योजनेचे कक्ष स्थापन करणे बंधनकारक करण्यात आले असून या कक्षात ‘आरोग्यमित्र’ नियुक्तकक्ष१५५३८८ / १८००२३३२२०० तसेच १४५५५ / १८००१११५६५ हे क्रमांक स्थापन

 प्रत्येक अंगीकृत रुग्णालयात दर्शनी भागात योजनेचे कक्ष१५५३८८ / १८००२३३२२०० तसेच १४५५५ / १८००१११५६५ हे क्रमांक स्थापन करणे बंधनकारक करण्यात आले असून या कक्षात ‘आरोग्यमित्र’ नियुक्तयोजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आणि तक्रार निवारणासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा संनियंत्रण व तक्रार निवारण समिती’ कार्यान्वित करण्यात आली आहे. तसेच या कामाचा आढावा घेऊन मार्गदर्शन करण्यासाठी पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय जन आरोग्य संरक्षण कार्यकारिणी’ गठित करण्यात आली आहे.

 

रुग्णांना माहिती मिळावी किंवा सेवा मिळण्यात अडचण आल्यास संपर्क साधण्यासाठी २४ तास कार्यरत टोल फ्री कॉल सेंटर सेवा सुरू करण्यात आली असून १५५३८८ / १८००२३३२२०० तसेच १४५५५ / १८००१११५६५ हे क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

 

प्रत्येक अंगीकृत रुग्णालयात दर्शनी भागात योजनेचे कक्ष स्थापन करणे बंधनकारक करण्यात आले असून या कक्षात आरोग्यमित्र’ नियुक्त करण्यात आले आहेत. आरोग्यमित्रांच्या माध्यमातून रुग्णांना योजनेबाबत माहिती देणेकागदपत्रांची पूर्तता करणे तसेच रोख विरहित उपचार मिळवून देण्यासाठी आवश्यक ते मार्गदर्शन केले जाणार आहे.

 

योजनेतून उपचार व सुविधा मिळण्यासंदर्भातील तक्रारींचे तात्काळ निराकरण करण्याची जबाबदारी जिल्हा समन्वयकक्षेत्रीय व्यवस्थापकअंमलबजावणी सहाय्य संस्थांचे जिल्हा व विभाग प्रमुख तसेच जिल्हा वैद्यकीय अधिकारी यांच्यावर निश्चित करण्यात आली आहे. संबंधित सर्व अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक रुग्णालयातील कक्षात ठळकपणे प्रदर्शित करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

 

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारीपदाच्या पूर्व प्रशिक्षणाबाबत आवाहन

 भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारीपदाच्या

 पूर्व प्रशिक्षणाबाबत आवाहन

 

मुंबईदि.५ : भारतीय सैन्यदलनौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना कंबाईन्ड डिफेन्स सर्विस (सीडीएस) परीक्षेची पूर्व तयारी करून घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रनाशिक रोडनाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्रातील नवयुवक नवयुवतींसाठी १९ जानेवारी २०२६ ते ३ एप्रिल २०२६ या कालावधीत सीडीएस कोर्स क्र. ६६ आयोजित करण्यात येत आहे. निवड केलेल्या प्रशिक्षणार्थीनी दि. १८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता प्रशिक्षण केंद्रात हजर रहावेअसे मुंबई शहर जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

कोर्स कालावधीत प्रशिक्षणार्थींना निःशुल्क प्रशिक्षणनिवास व भोजन दिले जाते. तरी. मुंबई शहर जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय मुंबई शहर येथे १२ ते १५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजेपर्यंत मुलाखतीस हजर रहावे. मुलाखतीस येतेवेळी त्यांनी सैनिक कल्याण विभागपुणे या वेबसाईट वर सर्च करून त्यामधील सीडीएस ६६ कोर्ससाठी (किंवा संबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेले) प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट घेऊन व ते पूर्ण भरून सोबत घेऊन यावे.

या सीडीएस वर्गामध्ये प्रवेश मिळण्यासाठी नमूद पात्रता असणे आवश्यक आहे व त्यासंबंधीचे पात्रता प्रमाणपत्र प्रशिक्षण वर्गाला येतांना सोबत घेऊन यावेत :-

अ) उमेदवार हा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा.

व) उमेदवार लोकसंघ आयोग (यूपीएससी) नवी दिल्ली यांचेमार्फत घेण्यात येणाऱ्या सीडीएस या परीक्षेकरिता ऑनलाईनद्वारे अर्ज केलेला असावा.

अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारीछात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रनाशिक रोडनाशिक यांचा ईमेल आय डीः training.petenashik@gmail.com व दूरध्वनी क्र. ०२५३-२४५१०३२ किंवा व्हाट्सअप क्र. ९१५६०७३३०६ (प्रवेशपत्र मिळविण्यासाठी) असून कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीवर संपर्क करावा असे आवाहनमुंबई शहरचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी  यानी प्रसिद्ध प्रसिद्ध पत्रकाद्वारे केले आहे.

सार्वजनिक वाय-फाय नेटवर्कवर बँकिंग किंवा आर्थिक व्यवहार कटाक्षाने टाळावेत, सूचना

 सार्वजनिक वाय-फाय नेटवर्कवर बँकिंग किंवा आर्थिक व्यवहार कटाक्षाने टाळावेत. अशा नेटवर्कवरून माहिती चोरीला जाण्याचा धोका अधिक असतो. व्यवहारानंतर खात्याचा तपशीलमेसेज व ई-मेल नियमित तपासणे गरजेचे आहे. फसवणुकीची शंका आल्यास किंवा पैसे चुकीने वजा झाल्यास तत्काळ बँकेशी संपर्क साधावा तसेच सायबर क्राईम हेल्पलाईनवर तक्रार नोंदवावी. लवकर तक्रार केल्यास नुकसान टाळण्याची शक्यता वाढते,असे बच्छाव यांनी सांगितले.

खबरदारी घेतल्यास ऑनलाईन आर्थिक व्यवहार सुरक्षितपणे करता येऊ शकतात. यादृष्टीने ग्राहकांनी pl share

 माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि भारतीय रिझर्व्ह बँक यांच्या वतीने मंत्रालयात आयोजित 'आर्थिक व्यवहाराविषयी जनजागृती’ सत्रात बच्छाव बोलत होते. यावेळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक गोविंद अंहकारीरिझर्व्ह बँकेच्या व्यवस्थापक शिल्पा छेडा यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना सहायक महाव्यवस्थापक बच्छाव म्हणाले की,  खबरदारी घेतल्यास ऑनलाईन आर्थिक व्यवहार सुरक्षितपणे करता येऊ शकतात. यादृष्टीने ग्राहकांनी कायम आपले ओटीपीपिनपासवर्ड किंवा सीव्हीव्ही क्रमांक दुसऱ्या कोणालाही  सांगू नयेत. तसेच बँक किंवा कोणतीही अधिकृत संस्था फोनमेसेज किंवा ई-मेलद्वारे अशी माहिती कधीही मागत नाही. अशा प्रकारचा फोन किंवा दूरध्वनी आल्यास तो फसवणुकीचा असण्याची शक्यता असते हे लक्षात घेऊन माहिती देऊ नये.  बँकिंगयूपीआयवॉलेटऑनलाईन खरेदी अशा व्यवहारांमध्ये थोडासा  निष्काळजीपणा ग्राहकांना मोठ्या आर्थिक नुकसानीकडे नेऊ शकतो. त्यामुळे ऑनलाईन व्यवहार करताना खबरदारी घेणे आवश्यक आहे.


सुरक्षित ऑनलाईन आर्थिक व्यवहारासाठी ग्राहकांची सतर्कता गरजेची

 सुरक्षित ऑनलाईन आर्थिक व्यवहारासाठी  ग्राहकांची सतर्कता गरजेची

      -सहायक महाव्यवस्थापक पंकज बच्छाव

 

मुंबई,दि.9: सध्याच्या काळात ऑनलाईन आर्थिक व्यवहारांचे  प्रमाण झपाट्याने वाढत असून ऑनलाईन आर्थिक व्यवहारांतील अपप्रकाराच्याफसवणुकीच्या घटनांमध्येही  वाढ होताना दिसत आहे. अशा प्रकारचे आर्थिक नुकसानीचे गैरप्रकार टाळण्यासाठी ग्राहकांनी ऑनलाईन आर्थिक व्यवहारात  खबरदारी घेत सर्तकतेने सुरक्षित व्यवहार करणे गरजेचे असल्याचे भारतीय रिझर्व्ह बँकेचे सहायक महाव्यवस्थापक पंकज बच्छाव यांनी सांगितले.

Tuesday, 6 January 2026

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारीपदाच्या पूर्व प्रशिक्षणाबाबत आवाहनtraining.petenashik@gmail.com व दूरध्वनी क्र. ०२५३-२४५१०३२ किंवा व्हाट्सअप क्र. ९१५६०७३३०६ pl share

 भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारीपदाच्या

 पूर्व प्रशिक्षणाबाबत आवाहन

 

मुंबईदि.५ : भारतीय सैन्यदलनौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना कंबाईन्ड डिफेन्स सर्विस (सीडीएस) परीक्षेची पूर्व तयारी करून घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रनाशिक रोडनाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्रातील नवयुवक नवयुवतींसाठी १९ जानेवारी २०२६ ते ३ एप्रिल २०२६ या कालावधीत सीडीएस कोर्स क्र. ६६ आयोजित करण्यात येत आहे. निवड केलेल्या प्रशिक्षणार्थीनी दि. १८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता प्रशिक्षण केंद्रात हजर रहावेअसे मुंबई शहर जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

कोर्स कालावधीत प्रशिक्षणार्थींना निःशुल्क प्रशिक्षणनिवास व भोजन दिले जाते. तरी. मुंबई शहर जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय मुंबई शहर येथे १२ ते १५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजेपर्यंत मुलाखतीस हजर रहावे. मुलाखतीस येतेवेळी त्यांनी सैनिक कल्याण विभागपुणे या वेबसाईट वर सर्च करून त्यामधील सीडीएस ६६ कोर्ससाठी (किंवा संबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेले) प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट घेऊन व ते पूर्ण भरून सोबत घेऊन यावे.

या सीडीएस वर्गामध्ये प्रवेश मिळण्यासाठी नमूद पात्रता असणे आवश्यक आहे व त्यासंबंधीचे पात्रता प्रमाणपत्र प्रशिक्षण वर्गाला येतांना सोबत घेऊन यावेत :-

अ) उमेदवार हा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा.

व) उमेदवार लोकसंघ आयोग (यूपीएससी) नवी दिल्ली यांचेमार्फत घेण्यात येणाऱ्या सीडीएस या परीक्षेकरिता ऑनलाईनद्वारे अर्ज केलेला असावा.

अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारीछात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रनाशिक रोडनाशिक यांचा ईमेल आय डीः training.petenashik@gmail.com व दूरध्वनी क्र. ०२५३-२४५१०३२ किंवा व्हाट्सअप क्र. ९१५६०७३३०६ (प्रवेशपत्र मिळविण्यासाठी) असून कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीवर संपर्क करावा असे आवाहनमुंबई शहरचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी  यानी प्रसिद्ध प्रसिद्ध पत्रकाद्वारे केले आहे.

Monday, 5 January 2026

कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षेसाठी आस्थापनांना ‘SHEBOX पोर्टल’वर नोंदणी करण्याचे आवाहन wcdmumupnagar@gmail.com

 कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षेसाठी आस्थापनांना

‘SHEBOX पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

 

मुंबई, दि. ५: महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने केंद्र सरकारने शीबॉक्स (SHEBOX) पोर्टल तयार केले असूनसर्व आस्थापनांनी या पोर्टलवर आपले कार्यालय नोंदवणे अनिवार्य आहे. मुंबई उपनगरातील सर्व आस्थापनांनी तात्काळ या पोर्टलवर नोंदणी करून अंतर्गत समितीची तसेच कार्यालयाची अद्ययावत माहिती सादर करावीअसे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी (मुंबई उपनगर) एस. टी. कुऱ्हाडे यांनी केले आहे.

 

कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षणप्रतिबंधमनाई व निवारण अधिनियम 2013 नुसार10 किंवा त्याहून अधिक अधिकारी-कर्मचारी असलेल्या सर्व आस्थापनांना अंतर्गत तक्रार निवारण समिती स्थापन करणे बंधनकारक आहे.  या अधिनियमाच्या कलम 19 अन्वये कार्यालय प्रमुखांची जबाबदारी निश्चित करण्यात आलेली आहे. जर कोणत्याही कार्यालयाने ही समिती स्थापन केली नसल्यास किंवा अधिनियमातील तरतुदींचे उल्लंघन केल्यासकलम 26 नुसार रु. 50,000/- पर्यंत दंडाची तरतूद आहे.

 

अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारीमुंबई उपनगर प्रशासकीय इमारतपहिला मजलादुसरा टप्पाआर.सी. मार्गचेंबूरमुंबई-७१ दूरध्वनी : ०२२-२५२३२३०८

E-mail : wcdmumupnagar@gmail.com यावर संपर्क करावाअसेही प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आहे.

संपूर्ण कॅलेंडर पहा एकच पेज वर


 

Featured post

Lakshvedhi