Showing posts with label सामाजिक. Show all posts
Showing posts with label सामाजिक. Show all posts

Tuesday, 12 August 2025

सोशल मीडियावरील कोणत्याही मोहाला बळी पडू नका,

 गरुड दृष्टी’ सोशल मिडिया मॉनिटरिंग व सायबर इंटेलिजन्सच्या मदतीने तब्बल 10 कोटी रुपये संबंधीत लोकांना परत

सोशल मीडियावरील कोणत्याही मोहाला बळी पडू नका!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नागरिकांना आवाहन

गरुड दृष्टी’ एआय टूल्स बाबत सादरीकरण

 

नागपूरदि 10 :- काही समाज विघातक लोकांनी समाजमाध्यमांवरून जातीय द्वेषमूलक चिथावणी दिल्यामुळे दंगली उसळलेल्या आपण पहिल्या आहेत. अशा गुन्हेगारीला आला घालण्यासाठी आता जगातील सर्वोत्तम यंत्रणा व तंत्रज्ञान महाराष्ट्राकडे आहे. अशा लोकांना हुडकून त्यांच्यावर तात्काळ कारवाईसाठी 'गरुड दृष्टीहे टूल्स महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

नागपूर पोलीस विभागाच्या वतीने पोलीस भवन येथे गरुड दृष्टी’ सोशल मिडिया मॉनिटरिंग व सायबर इंटेलिजन्स प्रकल्पाबाबत सादरीकरण आणि विविध सायबर आर्थिक गुन्ह्यांच्या तपासातून प्राप्त झालेल्या तब्बल 10 कोटी रुपये रकमेच्या वितरण समारंभात ते बोलत होते. त्यांच्या हस्ते या रकमा फसवणूक झालेल्या संबंधित व्यक्तींना वितरित करण्यात आल्या. यावेळी पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगलसहपोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डीअतिरिक्त पोलीस आयुक्त सर्वश्री वसंत परदेशीराजेंद्र दाभाडेशिवाजी राठोड व वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

सोशल मिडीयाचा गैरवापर

 स्वतःचे विचार मांडण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून सोशल मीडियाचा होणारा वापर उत्तम असला तरी काही समाज विघातक प्रवृत्ती द्वेष पसरवणेधमक्या देणेहेट स्पीचफेक न्यूजअंमली पदार्थांची तस्करीसाठी या प्लॅटफॉर्मचा वापर करताना आपण पाहतो. यातील आर्थिक फसवणुकीचे प्लॅटफॉर्म बहुतांश परदेशी ऑपरेटर चालवतात.  त्यामुळे सर्वांनी सावध असले पाहिजे. आपल्या मोबाईलवर कोणत्याही प्रकारच्या येणाऱ्या ऑफर्स आर्थिक फसवणुकीसाठी टाकलेले जाळे आहे हे लोकांनी लक्षात घेतले पाहिजे. जर आपली आर्थिक फसवणूक झाली आहे हे लक्षात आल्यास शक्य तेवढ्या लवकर 1930 व 1945 या क्रमांकावर नागरिकांनी संपर्क साधावा असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

Monday, 11 August 2025

कुरेशी समाजाच्या व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही

 कुरेशी समाजाच्या व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही

- उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतर कुरेशी समाज संघटनांचा संप मागे

 

            मुंबई दि. 6 : कुरेशी समाज हा परंपरेने मांस व्यापाराशी जोडलेला असून महाराष्ट्राच्या कृषी आधारित अर्थव्यवस्थेचा एक भाग आहे. त्यामुळे या समाजाच्या व्यापाऱ्यांवर आणि जनावरांची वाहतूक करणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय होऊ दिला जाणार नाहीअशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

         उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या समिती कक्षात कुरेशी समाजाच्या विविध प्रश्नांसंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

Sunday, 10 August 2025

होमिओपॅथी, फिजिओथेरपी, पंचकर्म, अ‍ॅक्यूपंक्चर, सुजोक, न्यूट्रिशन थेरपी, योग व नैसर्गिक उपचार उपलब्ध

  

मानवी सेवा हीच ईश्वर सेवा मानून जीवनस्पर्श केंद्रात सेवाभावाने  उपचार करावेत

- उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

 

जीवनस्पर्श संयुक्त वैद्यकीय उपचारपद्धती केंद्राचे

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

 

मुंबई,दि.३० मानवी सेवा हीच ईश्वर सेवा मानून अत्याधुनिक तंत्रज्ञान व तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून मानवी कर्तव्य समजून सेवाभावाने या केंद्रात उपचार करावेत.  समाजातील गरजू व आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या रुग्णांना वैद्यकीय मदत कशी देता येईलयाबाबत संवेदनशील दृष्टिकोन ठेवावा, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

          गिरगाव परिसरातील चिराबाजार येतील जीवनस्पर्श या नावाने आधुनिक व पारंपरिक उपचारांचा संगम असलेल्या संयुक्त वैद्यकीय उपचारपद्धती केंद्राचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी डॉ. मानसी नागरेंकरडॉ.सुरेश नागरेंकर, डॉ. अमिता नागरेंकर उपस्थित होते.

कोणताही गरजू रुग्ण आर्थिक अडचणीमुळे उपचारांपासून वंचित राहू नये. अशा रुग्णांसाठी आवश्यक ठिकाणी मी स्वतः मदतीसाठी पुढे येईन, हे उपचार केंद्र व्यवसायिक दृष्टीकोन न ठेवता श्रद्धेचेसमतेचे आणि माणुसकीचे मंदिर असावे असे मंत्री श्री.पाटील यांनी यावेळी सांगितले.

          डॉ. मानसी सुरेश नागरेंकर यांच्या मार्गदर्शनाखाली होमिओपॅथीफिजिओथेरपीपंचकर्मअ‍ॅक्यूपंक्चरसुजोकन्यूट्रिशन थेरपीयोग व नैसर्गिक उपचार यांचा प्रभावी संगम या केंद्रात उपलब्ध करून देण्यात आला आहे.

Saturday, 9 August 2025

हिंदू परंपरेतील रक्षाबंधन सणाचे महत्त्व स्पष्ट करताना, मुख्यमंत्र्यांनी हा केवळ राखीचा धागा नाही, तर प्रेमाचा धागा

   हिंदू परंपरेतील रक्षाबंधन सणाचे महत्त्व स्पष्ट करतानामुख्यमंत्र्यांनी हा केवळ राखीचा धागा नाहीतर प्रेमाचा धागा आहे. बहीण भावावरचे प्रेम यातून व्यक्त होते. या धाग्यातून भाऊ बहिणीच्या रक्षणाची शपथ घेतो असे सांगितले. मात्रआता भावांनीमी माझ्या बहिणीला इतके सक्षम बनवेन की ती स्वतःचेच नव्हेतर कुटुंबाचेही रक्षण करू शकेलअसा संकल्प करण्याची वेळ आली असल्याचे सांगून महिलांच्या सामाजिक-आर्थिक सक्षमीकरणासाठी केंद्र व राज्य सरकार विविध योजनांच्या माध्यमातून प्रयत्न करत असल्याची माहिती त्यांनी दिली.

Wednesday, 6 August 2025

सोलर प्लेट पाण्याने ओल्या कपड्याने साफ करीत असता शॉक लागून युवकांचा मृत्यू pl share take care.

 सोलर प्लेट पाण्याने ओल्या कपड्याने साफ करीत असता शॉक लागून युवकांचा मृत्यू.

         तरी सर्व सोलर धारकांनी सतर्क व सजग राहणे आवशयक आहे.

सगळी माहिती लक्षात घ्या 🙏🏻

सोलर पॅनेलमध्ये वीज (DC करंट) सतत तयार होत असते

दिवसा सूर्यप्रकाशात ती पूर्णपणे Active असते…

जर हात ओले असतील, कपडे ओले असतील किंवा वायरिंगमध्ये काहीतरी गडबड असेल

तर लगेचच शॉक लागतो… आणि तो शॉक खूप जास्त धोकादायक असतो ⚡


DC करंटमध्ये हात पकडला गेला तर तो सुटत नाही…

म्हणूनच सोलर प्लेट सफाई करताना हे लक्षात ठेवा ⬇️


✅ सकाळी लवकर किंवा संध्याकाळीच साफ करा

✅ सोलर Disconnect स्विच बंद करूनच सफाई करा

✅ ओले कपडे, ओले हात वापरू नका

✅ लोखंडी ब्रश किंवा हाताने थेट पॅनेलला स्पर्श करू नका

✅ रबरचे ग्लोव्हज वापरा

✅ मुलांना सोलर सिस्टिमपासून दूर ठेवा

✅ दर 6 महिन्यांनी वायरिंग आणि कनेक्शन तज्ज्ञांकडून तपासून घ्या


⚠️ लक्षात ठेवा – सोलर वापरणं फायद्याचं आहे, पण योग्य काळजी घेतली तरच!

जरा चुकीनं हाताळलं, की जीव धोक्यात येतो…


👉🏻 सर्व शेतकरी व सोलर वापरणाऱ्यांना नम्र विनंती –

सतर्क राहा, सजग राहा…

श्रावण आला g सखी,


 




Tuesday, 5 August 2025

प्रो गोविंदा लीग 2025 वाराणसी महादेव असेंडर्स का 75 लाख रुपये मे हुआ अधिग्रहण 7 से 9 ऑगस्ट तक रोमांच

 प्रो गोविंदा लीग 2025 

वाराणसी महादेव असेंडर्स का 75 लाख रुपये मे हुआ अधिग्रहण

7 से 9 ऑगस्ट तक रोमांच 



मुंबई, 5 अगस्त 2025: 'ग्लोबल वेंचर्स' के तहत काम करने वाली 'अस्पेक्ट स्पोर्ट्स' ने 'प्रो गोविंदा लीग 2025' के लिए 'वाराणसी महादेव असेंडर्स' का अधिग्रहण कर लिया है। पहले यह टीम 'ओम ब्रह्मांड साई गोविंद पथक' (मालाड पश्चिम) के नाम से जानी जाती थी। यह अधिग्रहण ₹74 लाख में हुआ है।

अब यह टीम 'वाराणसी महादेव असेंडर्स' के नए नाम से 7 से 9 अगस्त तक मुंबई के वर्ली स्थित एनएससीआई डोम में होने वाली इस बहुप्रतीक्षित प्रतियोगिता में भाग लेगी।

अस्पेक्ट ग्लोबल वेंचर्स की कार्यकारी अध्यक्षा, श्रीमती अक्षा कंबोज ने इस अधिग्रहण पर बोलते हुए कहा, “हमें ऐसी टीम के साथ प्रो गोविंदा लीग 2025 में हिस्सा लेने पर बहुत गर्व है, जो धैर्य, अनुशासन और गहरी सांस्कृतिक जड़ों का प्रतीक है। वाराणसी महादेव असेंडर्स सिर्फ एक टीम नहीं, बल्कि भारत के युवाओं की भावना का प्रतिनिधित्व करती है, जो परंपरा और टीम वर्क के जरिए आगे बढ़ते हैं।”

यह लीग महाराष्ट्र सरकार द्वारा मान्यता प्राप्त है और यह परिवहन मंत्री प्रताप सरनाईक के विचारों से प्रेरित है। इस लीग का उद्देश्य दही हांडी की सदियों पुरानी परंपरा को एक सुरक्षित, प्रशिक्षित और प्रायोजित पेशेवर खेल में बदलना है।

इस साल के टूर्नामेंट की कुल पुरस्कार राशि ₹1.5 करोड़ है, जिसमें विजेता टीम को ₹75 लाख मिलेंगे। इसके अलावा, प्रत्येक टीम को भागीदारी प्रोत्साहन के रूप में ₹3 लाख दिए जाएंगे, जिससे यह लीग एक गंभीर प्रतिस्पर्धी मंच के रूप में स्थापित होगी। श्रीमती अक्षा कंबोज के स्वामित्व वाली वाराणसी महादेव असेंडर्स अपनी मजबूत भावना और विरासत को राष्ट्रीय स्तर पर पहचान दिलाने के लिए तैयार है।

----------------------

मुंबईत प्रो गोविंदा लीग २०२५ चा ७ ऑगस्ट पासून थरार pl share



 मुंबईत प्रो गोविंदा लीग २०२५ चा ७ ऑगस्ट पासून थरार 


मुंबई, ५ ऑगस्ट २०२५ : ' ग्लोबल व्हेंचर्स 'अंतर्गत कार्यरत असलेल्या ‘अस्पेक्ट स्पोर्ट्स'च्या वतीने बहुप्रतिक्षित 'प्रो गोविंदा लीग २०२५' साठी पूर्वी ओम ब्रह्डमांड साई गोविंद पथक (मालाड पश्चिम) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या संघाचे आता ७४ लाख रुपयात अधिग्रहण केले असून त्यानंतर या पथकाचे वाराणसी महादेव अॅसेन्डर्स नावाने रिब्रॅंड करण्यात आले आहे. मुंबईतील वरळी येथील एनएससीआय डोम येथे ७ ते ९ ऑगस्ट डार्विन ही स्पर्धा पार पडणार आहे.

या अधिग्रहणावर बोलताना अस्पेक्ट ग्लोबल व्हेंचर्सच्या कार्यकारी अध्यक्षा श्रीमती अक्षा कंबोज म्हणाल्या की, “धैर्य, शिस्त आणि सखोल मुळे असलेल्या सांस्कृतिक मूल्यांचे मूर्त स्वरूप असलेल्या संघासह प्रो गोविंदा लीग २०२५ मध्ये सहभागी होण्याचा आम्हाला अत्यंत अभिमान वाटतो. वाराणसी महादेव अॅसेन्डर्स म्हणजे निव्वळ संघ नसून परंपरा आणि सांघिक कार्याद्वारे उदयास येणाऱ्या भारताच्या युवकांच्या भावनेचे प्रतिनिधित्व करतो.

महाराष्ट्र सरकारची अधिकृत मान्यता लाभलेल्या प्रो गोविंद लीगचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही लीग, शतकानुशतके जुनी परंपरा सुरक्षितता, प्रशिक्षण आणि प्रायोजकत्वाद्वारे समर्थित व्यावसायिक, दूरचित्रवाणीवरील क्रीडा स्पर्धेत रूपांतरित करून दहीहंडीच्या खेळात क्रांती घडवून आणणार आहे.

या मोसमाचे एकूण बक्षीस मूल्य १.५ .कोटी रुपयांचे असून ज्यात विजेत्यांसाठी ७५ लाख रुपयांचा  समावेश करण्यात आला आहे. तसेच प्रत्येक संघासाठी ३ लाख रुपयांचा सहभाग प्रोत्साहन मूल्यासह, एक गंभीर स्पर्धात्मक व्यासपीठ म्हणून लीगची स्थिती मजबूत करते. श्रीमती अक्षा कंबोज यांच्या मालकीची वाराणसी महादेव अॅसेन्डर्स ही संस्था त्यांची प्रबळ भावना आणि वारसा राष्ट्रीय प्रकाशझोतात आणण्यासाठी सज्ज येत्या गोविदात सज्ज होत आहे.


मानवी सेवा हीच ईश्वर सेवा मानून ‘जीवनस्पर्श केंद्रात’ सेवाभावाने उपचार करावेत

 मानवी सेवा हीच ईश्वर सेवा मानून जीवनस्पर्श केंद्रात सेवाभावाने  उपचार करावेत

- उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

 

जीवनस्पर्श संयुक्त वैद्यकीय उपचारपद्धती केंद्राचे

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

 

मुंबई,दि.३० मानवी सेवा हीच ईश्वर सेवा मानून अत्याधुनिक तंत्रज्ञान व तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून मानवी कर्तव्य समजून सेवाभावाने या केंद्रात उपचार करावेत.  समाजातील गरजू व आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या रुग्णांना वैद्यकीय मदत कशी देता येईलयाबाबत संवेदनशील दृष्टिकोन ठेवावा, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

          गिरगाव परिसरातील चिराबाजार येतील जीवनस्पर्श या नावाने आधुनिक व पारंपरिक उपचारांचा संगम असलेल्या संयुक्त वैद्यकीय उपचारपद्धती केंद्राचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी डॉ. मानसी नागरेंकरडॉ.सुरेश नागरेंकर, डॉ. अमिता नागरेंकर उपस्थित होते.

कोणताही गरजू रुग्ण आर्थिक अडचणीमुळे उपचारांपासून वंचित राहू नये. अशा रुग्णांसाठी आवश्यक ठिकाणी मी स्वतः मदतीसाठी पुढे येईन, हे उपचार केंद्र व्यवसायिक दृष्टीकोन न ठेवता श्रद्धेचेसमतेचे आणि माणुसकीचे मंदिर असावे असे मंत्री श्री.पाटील यांनी यावेळी सांगितले.

          डॉ. मानसी सुरेश नागरेंकर यांच्या मार्गदर्शनाखाली होमिओपॅथीफिजिओथेरपीपंचकर्मअ‍ॅक्यूपंक्चरसुजोकन्यूट्रिशन थेरपीयोग व नैसर्गिक उपचार यांचा प्रभावी संगम या केंद्रात उपलब्ध करून देण्यात आला आहे.

Sunday, 3 August 2025

भटके विमुक्त दिवस’ ३१ ऑगस्ट रोजी साजरा करण्याचा निर्णय

 भटके विमुक्त दिवस’ ३१ ऑगस्ट रोजी साजरा करण्याचा निर्णय

-         इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे

मुंबईदि. ३१ : राज्य व जिल्हास्तरावर ३१ ऑगस्ट रोजी भटके विमुक्त दिवस’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे. याबाबतचा इतर मागास बहुजन कल्याण विभागाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असल्याची माहिती इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी दिली.

मंत्री श्री. सावे म्हणालेराज्य शासनाचा हा निर्णय केवळ प्रतीकात्मक नसून भटके विमुक्त समाजाच्या सामाजिक न्यायआत्मसन्मान आणि प्रतिष्ठेसाठी एक निर्णायक टप्पा आहे. या दिवशी होणाऱ्या कार्यक्रमातून या समुदायाचा संघर्षयोगदान आणि सामाजिक हक्क समाजातील अन्य घटकांपर्यंत पोहोचेल.

 या दिवशी भटक्या व विमुक्त समाजाच्या संस्कृतीतील जीवनमूल्येपरंपरा यांचे दर्शन घडविणारे सांस्कृतिकशैक्षणिक व माहितीपर उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

तसेच शासकीय व अनुदानित आश्रमशाळा तसेच शासकीय वसतिगृहांमध्ये विद्यार्थी आरोग्य तपासणीआधारकार्ड नोंदणीजातीचा दाखला आणि जात वैधता प्रमाणपत्रासाठी आवश्यक दस्तऐवजांची माहिती देणाऱ्या शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या विभागातील व जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये हा कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्याबाबत आवश्यक त्या सूचना निर्गमित कराव्यात व अंमलबजावणीची कार्यवाही सुनिश्चित करावी. ३१ ऑगस्ट रोजी सार्वजनिकसाप्ताहिक किंवा स्थानिक सुट्टी असली तरीही 'भटके विमुक्त दिवसयाच दिवशी साजरा करण्यात येणार असल्याचे शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे.

0000

Saturday, 26 July 2025

34 सेकंदाचा हा अती सामान्य व्हीडिओ pl share

 *34 सेकंदाचा हा अती सामान्य व्हीडिओ अतिमहत्वाचा वाटतोय *विषारी भविष्यातुन सुटकेचा मार्ग* *याला जगभरातून मान्यता मिळण्यास हरकत नाही 👌👌👍👌*


विमा संस्थांनी जनजागृती, विश्वासार्ह सेवावर भर द्यावा - राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे आवाहन

 विमा संस्थांनी जनजागृतीविश्वासार्ह सेवावर भर द्यावा

- राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे आवाहन

आयबीएआयच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त स्थापना दिन कार्यक्रम

मुंबई, दि. २५ : विमा हा केवळ आर्थिक उत्पादन नसून तो सामाजिक सुरक्षाजोखीम व्यवस्थापन आणि आर्थिक स्थैर्य यासाठी अत्यावश्यक साधन आहे. भारतीय विमा ब्रोकर संघटनेसारख्या संस्थांनी नागरिकांना केवळ विमा पॉलिसीची विक्री न करता जनजागृतीसुलभ माहिती आणि विश्वासार्ह सेवा देण्यावर भर द्यावा, असे आवाहन राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी केले.

कफ परेड येथे भारतीय विमा ब्रोकर संघटनेच्या (आयबीएआय) रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त स्थापना दिन कार्यक्रमात राज्यपाल श्री. राधाकृष्णन बोलत होते. भारतीय विमा ब्रोकर संघटनेचे अध्यक्ष नरेंद्रकुमार भरिंदवालराज्यपालांचे उपसचिव एस. रामामूर्तीभारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणचे सदस्य सत्यजित त्रिपाठीविमा समितीच्या सदस्या श्रीमती टी.एल. अलामेलूआयबीएआयचे उपाध्यक्ष मोहन एससचिव निर्मल बजाज आदींसह शासकीय व नियामक संस्थांचे वरिष्ठ अधिकारीविमा व वित्तीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

राज्यपाल श्री. राधाकृष्णन म्हणाले कीही संस्था रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत असल्याने हा आनंदाचा क्षण आहे. विमा दलाल (ब्रोकर) हे विमाधारक व विमा कंपनी यांच्यातील दुवा आहेत. ते ग्राहक केंद्रित आणि उपयोगी उपाय सूचवितात. भारत देश पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था होण्याच्या मार्गावर आहेत्यामध्ये कॉर्पोरेट विमा सेवांचे महत्व अधोरेखित होते. ते सूक्ष्मलघु व मध्यम उद्योग क्षेत्राच्या विमा उद्योगातील विस्ताराशीही संबंधित आहेत. हे सर्व राष्ट्रीय प्राधान्याचे विषय असून सुरक्षिततेची व्याप्ती आणि परस्पर सहकार्य विमा क्षेत्रातही महत्वाचे आहे. भारत क्षमतेचा विकासज्ञानाचे वाटपआणि तंत्रज्ञानाचा स्वीकार यामध्ये सक्रियपणे सहभागी होत आहे. विम्याचे भविष्य डेटा उपक्रमांमध्येग्राहकांच्या सूचीबद्धतेमध्ये असल्याने आयबीएआयने यामध्येही सहभागी होवून भविष्यातील अर्थव्यवस्थेचे प्रेरणास्थान बनावे,असेही राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांनी सांगितले.

राज्यपालांची राजभवन येथील कर्करोग जनजागृती शिबिराला भेट

 राज्यपालांची राजभवन येथील कर्करोग जनजागृती शिबिराला भेट

 

मुंबई, दि.25 : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी राजभवन येथे अधिकारीकर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी आयोजित कर्करोग जनजागृती  शिबिराला भेट देऊन तपासणी आणि जनजागृती उपक्रमाची माहिती घेतली.

महिलांनी व मुलींनी कर्करोगासंदर्भातील पूर्व चाचणी नियमितपणे करून घ्यावी. तसेचकर्करोगाविषयी जनजागृतीसाठी अशा शिबिरांचे आयोजन सातत्याने करण्यात यावे. पूर्व तपासणीतून रोग लवकर लक्षात आल्यास वेळेवर निदान व उपचार शक्य होतात. त्यामुळे अधिकाधिक लोकांनी अशा शिबिरांमध्ये सहभागी होऊन चाचणी करून घ्यावीअसे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले.

राजभवनमुंबई डिस्पेंसरी आणि कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने कर्करोग जनजागृती शिबिर व व्याख्यानाचे आयोजन राजभवन क्लब येथे करण्यात आले.

कर्करोग पूर्व निदानासाठी मोफत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरातही ९ ते ४५ वयोगटातील मुली आणि महिलांसाठी गर्भाशयाच्या कर्करोग प्रतिबंधक लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली. CBC, मॅमोग्राफीपॅप स्मिअर, HPV टेस्ट, ENT तपासणी आणि प्रोस्टेट (PSA) टेस्ट यांचा समावेश हेाता. एकूण ११० व्यक्तिंना ह्यूमन पॅपिलोमाव्हायरस (एचपीव्ही) प्रतिबंधक लस देण्यात आली. तपासणी शिबीराचा १७१ कर्मचाऱ्यांनी लाभ घेतला.

यावेळी आरोग्य तपासणी कार्यक्रमात कॅन्सर पेशंट एड असोसिएशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. अलका सप्रू बिसेनकॅन्सर स्क्रिनिंग सेवा विभागाच्या कार्यकारी संचालिका सौ. नीता मोरे स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. तृप्ती पोयरेकरतसेच जनरल सर्जन डॉ. सत्येंद्र मेहरा यांनी त्यांच्या तज्ज्ञ टीम व कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशनचे पदाधिकारी व राजभवन दवाखान्यातील डॉक्टरकर्मचारीउपस्थित होते.

Friday, 25 July 2025

माझी माती, माझा बाप्पा कार्यशाळा३ ऑगस्ट २०२५Call/WhatsApp : ९८१९८२५४०२, ८१६९८८२८९८ pl share

 माझी मातीमाझा बाप्पा" – गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास कार्यशाळा

पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीची उपक्रमशील संकल्पना

 

मुंबईदि. २४ : गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग असून अलीकडेच त्याला राज्य उत्सव म्हणून घोषित करण्यात आले आहे. पर्यावरणपूरकतेचा संदेश देणाऱ्या गणेशोत्सवाची तयारी आता अधिक अर्थपूर्ण आणि सर्जनशील बनवण्याचा प्रयत्न पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी करत आहे. माझी मातीमाझा बाप्पा’ या नावाने एक विशेष कार्यशाळा ३ ऑगस्ट २०२५ रोजी आयोजित करण्यात आली आहे.

या उपक्रमात सहभागी होणाऱ्यांना त्यांच्या घरासाठी शाडू मातीपासून आपला गणपती स्वतः तयार करण्याची संधी मिळणार आहे. या कार्यशाळेत प्रख्यात शिल्पकार विशाल शिंदे आणि किरण थोरात मार्गदर्शन करणार असून सहभागी होणाऱ्यांसाठी कोणत्याही पूर्वानुभवाची अट नाही.

कार्यशाळेचा कालावधी :

🗓️ ३ ऑगस्ट २०२५

🕚 सकाळी ११ ते दुपारी २

 

प्रवेश शुल्क :

️ ₹१५०० – वय ५ ते ११ वर्षे

️ ₹१८०० – वय १२ वर्षांपासून पुढे

 

कार्यशाळेत १० इंचांपर्यंतच्या मूर्ती तयार करण्यावर भर दिला जाणार असूनसर्व साहित्य आयोजकांकडून पुरवले जाईल. शाडू मातीच्या मूर्ती घरी नेऊन सुकविल्यानंतर रंगभरणी करता येईलयासाठीही मार्गदर्शन मिळणार आहे.

 

या उपक्रमामुळे सर्वांनाच  पर्यावरणाविषयी जागरूकतेचा अनोखा अनुभव मिळणार आहे. घरचा गणपती स्वतःच्या हाताने घडवण्याचे समाधान आणि आनंद हाच या कार्यशाळेचा खरा गाभा आहे. मर्यादित जागा उपलब्ध. आजच नोंदणी करून आपली उपस्थिती निश्चित करावी व कलात्मक आणि पर्यावरणपूर्वक गणेशमूर्ती घडवण्यात सहभागी व्हावेअसे आवाहन पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीकडून करण्यात येत आहे.

नोंदणीसाठी संपर्क :

📞 Call/WhatsApp : ९८१९८२५४०२८१६९८८२८९८

💳 QR कोडद्वारे पेमेंट करून आपली जागा आरक्षित करा.

📧 पेमेंटचा स्क्रीनशॉट pldeshpande111@gmail.com  या इमेलवर पाठवावा.

***

Thursday, 24 July 2025

दिव्यांच्या मंगल अमावस्येला गटारी म्हणू नका ! ( वैज्ञानिक आणि धार्मिक कारणे )Pl share

 दिव्यांच्या मंगल अमावस्येला गटारी म्हणू नका !

( वैज्ञानिक आणि धार्मिक कारणे )


 गुरुवारी २४ जुलै रोजी आषाढ अमावस्या म्हणजेच दीप अमावस्या आहे ! या निमित्ताने ही विनंती मी दरवर्षी सर्वांना आवर्जून पाठवितो. कृपया एक गोष्ट लक्षात घ्या की मुंबईत, महाराष्ट्रात राहणारे अन्य भाषिक हिंदू आपापल्या अनेक प्रथा खूप दिमाखात साजऱ्या करतात. महाराष्ट्रातही या दिवशी सर्व घरांमध्ये मोठ्या भक्तिभावाने दीपपूजन केले जाते. पण हल्ली तर या दिवसाला “गटारी” म्हणून, आपल्याला लाज वाटावी इतकी कुप्रसिद्धी मिळत आहे. दिव्यांच्या या अस्सल मंगल मराठी सणाला आपण गटारात नेण्याचे पाप करू नये, असे वाटते. ती कशी साजरी करायची हा ज्याच्या त्याच्या आवडीचा प्रश्न आहे आणि त्याला तसे स्वातंत्र्यही आहे. पण गटारी ही आपली संस्कृतीच नसताना, आपण त्याची विकृत प्रसिद्धी कशासाठी करायची ? दारूच्या बाटल्या, कोंबड्या, बोकड यांची चित्रे " शुभेच्छा "म्हणून एकमेकांना पाठविणे, हॅपी गटारी म्हणून शुभेच्छा देणे या गोष्टी आपण कृपया कटाक्षाने टाळाव्यात. प्रसार माध्यमे, वृत्तवाहिन्यांवर या दिवशी किती लाख बाटल्या मद्यविक्री झाली, किती किलो मटण फस्त झाले याच्या बातम्या पुन्हा पुन्हा दाखविल्या जातात. दीपपूजे ऐवजी गटारी म्हणून याला कुप्रसिद्धी मिळू नये, ही काळजी आपण घ्यायला नको का ?

पूर्वी या दिवशी मांसाहार करून गौरींच्या जेवणापर्यंत मांसाहार बंद ठेवला जात असे.

**** आपण यामागची वैज्ञानिक कारणे जाणून घेऊया---

१) या ओलसर पावसाळी वातावरणात मांसाहार नीट पचत नाही.

२) बहुतेक प्राण्यांचा हा काळ म्हणजे विणीचा / प्रजननाचा काळ असतो. याच काळात प्राण्यांची हत्या केली तर नवीन प्राणी जन्मालाच येणार नाहीत. मग वर्षभर खायला प्राणी मिळणार कुठून ? याचा साऱ्या निसर्ग चक्रावरच विपरीत परिणाम होतो. हल्ली मत्स्यदुष्काळ वगैरे शब्द ऐकू येऊ लागले आहेत. त्यामुळे निसर्गपुत्र कोळीबांधव या काळात मासेमारी करीत नाहीत . सरकारी पातळीवरूनही मासेमारीवर बंदी घालण्यात येते.

३) या दिवसात बाहेरच्या दमट वातावरणामुळे प्राण्यांच्या शरीराच्या आत आणि शरीरावरील त्वचेवर अनेक घातक जीवजंतू असण्याची शक्यता असते. शिजविताना त्यांचा पूर्ण नाश न झाल्यास त्याचाही खाणाऱ्याला त्रास होऊ शकतो.

४) वातावरणात ओलावा असतो. मांस किंवा मासे नीट न ठेवल्यास ते हवेतील वाढलेल्या जंतूंमुळे कुजण्याची प्रक्रिया अधिक वेगाने होते.

५) आजच्या प्रगत काळात अत्यंत परिणामकारक प्रतिजैविके, औषधे उपलब्ध असूनसुद्धा, धुमाकूळ घालणाऱ्या विविध साथीना आवर घालणे कठीण होते. लेप्टोस्पायरोसीस, चिकनगुनिया, बर्ड्स फ्लू अशा घातक रोगांच्या जीवघेण्या साथी, ह्या अस्वच्छ प्राण्यांच्या शरीरावर वाढणाऱ्या जंतूंमुळे पसरतात. म्हणून या दिवसात मांसाहार टाळल्यास जंतू संसर्गाचा धोका कमी होतो.

६) आजवर मानव जातीचा सर्वाधिक संहार करणाऱ्या विविध साथी या रोगजंतूंमुळेच होतात, हे आपण पाहत आलो आहोत. अशा प्रकारे आपण जंतुसंसर्गाची शक्यता टाळली तर आपल्या शरीरातील प्रतिकारशक्ती वाढण्यास थोडा अधिक वाव मिळतो.

अशा सर्व कारणांमुळे या दिवसाला धार्मिक जोड दिली गेली आहे. त्यामुळे आपोआपच निसर्गाचा तोल साधला जातो.

*** या दिवसात शाकाहार करण्यामागेही शास्त्रीय कारणे आहेतच-----

१ ) अत्यंत दुर्मिळ आणि प्रकृतीला पोषक अशा अनेक भाज्या याच काळात उगवतात. संपूर्ण वर्षभरात या भाज्या पुन्हा पाहायलाही मिळत नाहीत.

२) शाकाहार केल्यामुळे अशा भाज्या आपोआपच खाल्ल्या जातात.

३) तुलनेने शाकाहाराचे या दिवसात नीट पचन होते.

४) विविध उपासांच्या दिवशी खाल्ल्या जाणाऱ्या कंदमुळांच्या आहारामुळे त्यातील अनेक दुर्मिळ खनिजे आणि उपयुक्त पोषक घटक अपोआप शरीराला लाभतात.

५) कायम मांसाहार करणाऱ्यांच्या पचन संस्थेवर नेहेमी येणारा ताण, या शाकाहारी बदलामुळे कांही काळ कमी होतो.

अन्य धर्मांमध्ये अत्यंत कडक उपास केले जातात. आपल्याकडे कुठल्याही प्रकारच्या उपासाचे बंधन तर नाहीच पण केवळ आहारबद्दल करूनही उपास करता येतो.

पुढे ४ महिने साजऱ्या होणाऱ्या अनेक सणांसाठी, पूजांसाठी तयारी म्हणून पूर्वींच्या मोठमोठ्या घरातून विविध दिवे शोधून ते साफसूफ करून या दिवशी अत्यंत भक्तिभावाने पूजले जात असत. आजही या दिवशी महाराष्ट्रातील लाखो मराठी घरात असेच मनोभावे दीपपूजन करून, अत्यंत वैशिष्ठ्यपूर्ण नैवेद्य दाखवतात. दिव्यांच्या व्रताची कहाणी वाचली जाते. दिव्यांची आरती म्हटली जाते. या दिवशी अनेक जातीनिहाय काही खास पक्वान्न करण्याची एक छान खाद्य संस्कृती महाराष्ट्रात आहे. परंतु खूप आनंददायी आणि मंगलमय अशा या सोहोळ्याची माध्यमांकडून दखलच घेतली जात नाही.

पूर्ण श्रावण महिनाभर आणि गौरी जेवणापर्यंत कडक शाकाहार पाळला जात असे. म्हणून मग त्याआधी या दिवशी मांसाहार केला जात असे. हा सण नसून ही एक सामाजिक प्रथा होती. मग मुळात अस्तित्वातच नसलेल्या गटारी 'सणा'चे आपण उदात्तीकरण करायचे की लाखो मराठी घरातील मंगलमय दीपपूजनाची लोकांना माहिती करून द्यायची ?...आपण हा निर्णय आता घ्यायलाच हवा.

गेली कित्येक वर्षे मी माझ्या पातळीवर ही विनंती अनेकांना करीत आहे. हळूहळू याचे चांगले परिणामही दिसू लागले आहेत. आपल्याला माझी नम्र विनंती आहे की आपण सर्वांनी या दिवशी आपल्या घरातील दिव्यांची पूजा करून आपली मंगलमय संस्कृती जपूया ! या मांगल्याचा प्रचार करूया !!

सर्वांना दीप अमावास्येच्या हार्दिक शुभेच्छा !

( हे जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि आपल्या संस्कृतीची अकारण होणारी कुचेष्टा थांबविण्यास हातभार लावावा, ही विनंती )


माहिती साभार ✍🏻 © मकरंद करंदीकर.


Wednesday, 23 July 2025

आ. आव्हाड - आ. पडळकर राडा रोखल्याबद्दल मार्शल सुरक्षा रक्षकांना सभापती राम शिंदेंकडून शाबासकी..!

 आ. आव्हाड - आ. पडळकर राडा रोखल्याबद्दल मार्शल सुरक्षा रक्षकांना सभापती राम शिंदेंकडून शाबासकी..!


मुंबई. (प्रतिनिधी) – विधानभवनाच्या प्रांगणात झालेल्या आक्रमक व तणावपूर्ण घटनेत आमदार जितेंद्र आव्हाड आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांमध्ये जोरदार वादावादी व धक्काबुक्की झाल्याने क्षणभर वातावरण तापले होते. यावेळी उपस्थित सुरक्षा रक्षकांनी तत्काळ हस्तक्षेप करत दोन्ही गटांना वेळीच बाजूला करत परिस्थिती आटोक्यात आणली. त्यांच्या धाडसी आणि दक्षतेमुळे मोठा अनुचित प्रकार टळला.

या घटनेदरम्यान सुरक्षा विभागातील मार्शल उमेश पवार, मुबारक पठाण, सचिन पाटणे आणि गोडसे यांनी अत्यंत तत्परता आणि शिस्त दाखवून दोन्ही गटांना वेगळे केले. घटनेचा पुढील अनर्थ टाळण्यात त्यांचा निर्णायक वाटा होता. सदर रक्षकांनी ना केवळ गोंधळ नियंत्रणात आणला, तर संपूर्ण परिसराची सुरक्षा आणि शांती कायम राखली. तसेच, विधिमंडळाच्या सन्मानाचाही जप केला. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी विशेष कौतुक करत सुरक्षा रक्षकांना वैयक्तिकरित्या शाबासकी दिली. त्यांनी सांगितले की, "विधानभवन हे महाराष्ट्राच्या लोकशाही व्यवस्थेचे मंदिर आहे. येथे कोणत्याही प्रकारची असंविधानिक किंवा असभ्य वर्तनाची परवानगी दिली जाणार नाही.

सभापतींच्या या प्रशंसेमुळे सुरक्षारक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, विधिमंडळाच्या कार्यवाहीदरम्यान शिस्त आणि सुरक्षिततेचे भान राखणारे हे मुंबई पोलीसचे कर्मचारी खऱ्या अर्थाने "शिलेदार" ठरत आहेत. विधानभवन परिसरात सुरक्षा कडक करण्याची मागणीही या निमित्ताने पुढे येत आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा विधानभवनातील सुरक्षा व्यवस्थेचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. सुरक्षा विभागातील कर्मचारी केवळ शरीराने नव्हे, तर मनाने आणि विवेकबुद्धीने कार्य करत असून, त्यांनी राजकीय व सामाजिक समन्वय राखण्यासाठी केलेले कार्य वाखाणण्याजोगे आहे.

महिला आणि मुलींच्या बेपत्ता प्रकरणांबाबत राज्य सरकारकडून गंभीरपणे दखल,ऑपरेशन मुस्कान' आणि 'ऑपरेशन शोध'मुळे

 ऑपरेशन मुस्कानआणि 'ऑपरेशन शोध'मुळे

हजारो महिलांचा आणि बालकांचा शोध घेण्यात यश

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  • महिला आणि मुलींच्या बेपत्ता प्रकरणांबाबत राज्य सरकारकडून गंभीरपणे दखल

मुंबईदि. १६ : राज्यातील बेपत्ता झालेल्या बालकांच्यामहिला व मुलींचा शोध घेण्यासाठी ऑपरेशन मुस्कान आणि ऑपरेशन शोध सुरू केले असून या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर बेपत्ता बालकेमुली आणि महिलांचा शोध घेण्यात यश आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली.

सदस्य सुनील शिंदे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला. यावेळी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवेसदस्य चित्रा वाघप्रज्ञा सातव यांनी चर्चेमध्ये सहभाग घेतला.

राज्यात महिला आणि मुलींच्या बेपत्ता होण्याच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कठोर पावले उचलली असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले कीसर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आता कोणतीही व्यक्ती बेपत्ता झाल्यास तत्काळ गुन्हा दाखल करणे बंधनकारक आहे. जर लहान मुले बेपत्ता झालीतर अपहरणाचा गुन्हा नोंदवला जातो.

नागपूर शहरात एकूण 5897 बेपत्ता प्रकरणांपैकी 5210 व्यक्तींचा शोध लागला असून हे प्रमाण 90 टक्क्यांहून अधिक आहे. हे प्रमाण 96-97% पर्यंतही पोहोचते. लहान मुलांसाठी ऑपरेशन मुस्कान’ राबवण्यात आले. या मोहिमेअंतर्गत 4193 मुला-मुलींचा शोध लागला. याची दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतली असून अनेक राज्यांनीही ही योजना स्वीकारली आहे. महिलांसाठी स्वतंत्र ऑपरेशन शोध’ राबवण्यात आले. एका महिन्यात 4960 हरवलेल्या महिला आणि 1364 बालकांचा शोध लावण्यात आला. याशिवाय106 महिला व 703 बालके अशी सापडली की ज्यांची कोणतीही तक्रार दाखल झालेली नव्हतीमात्र ते बेपत्ता होतेअशी माहितीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले कीप्रत्येक पोलीस ठाण्यात मिसिंग सेल’ स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या सेलमध्ये महिला पोलीस अधिकारी प्रमुख असतील. महिलांच्या सुरक्षेसाठी एडीजे’ दर्जाच्या आयपीएस अधिकारी नेमण्यात आल्या आहे. काही महिला-मुली मानवी तस्करीच्या विळख्यात अडकतात. त्यामुळे सरकारने यासंदर्भात ठोस उपाययोजना सुरू केल्या आहेत. तसेच "भरोसा" हे वन स्टॉप केंद्र महिलांना समुपदेशनसंरक्षण व कायदेशीर मदत पुरवते. घरगुती हिंसाचारकौटुंबिक वाद यामुळे घर सोडलेल्या महिलांना या केंद्राचा उपयोग होतो. शालेय स्तरावर 'पोलीस काका-दीदीउपक्रमांतर्गत लैंगिक शिक्षणचांगला/वाईट स्पर्श यावर जनजागृती केली जाते. आता यामध्ये 'मिसिंग पर्सनबाबतची माहितीही समाविष्ट केली जाणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

Tuesday, 22 July 2025

आरोग्य क्षेत्रात सामाजिक संस्थांचे योगदान मोलाचे,गांधार फाउंडेशनच्या मोफत डायलिसिस सेंटरचे उद्घाटन

 आरोग्य क्षेत्रात सामाजिक संस्थांचे योगदान मोलाचे

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

गांधार फाउंडेशनच्या मोफत डायलिसिस सेंटरचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

 

मुंबईदि. 21 :-  राज्यात आरोग्यसेवा अधिक सक्षम करत सामान्य माणसाला दर्जेदार आरोग्य सेवा मिळाव्यातयासाठी शासन विविध योजनाउपक्रम राबवत आहे. शासनाच्या या योजना उपक्रमाबरोबरच सामान्य माणसाला अत्यावश्यक आरोग्य सेवा मिळण्यासाठी सामाजिक संस्थांचे योगदान मोलाचे ठरत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

गांधार फाउंडेशनतर्फे डीएचएल पार्क, गोरेगाव पश्चिम येथे उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक मोफत डायलिसिस सेंटरचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेराज्यातील कोणताही रुग्ण आरोग्यसेवेपासून वंचित राहू नयेत्याला वेळेत उपचार मिळावेत हा शासनाचा प्रयत्न आहे. यासाठी राज्यात महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून पाच लाखांपर्यंतचे उपचार मोफत दिले जातात. किडनी विकार असलेल्या रुग्णांना वेळेवर आणि अत्याधुनिक उपचार उपलब्ध करून देण्यासाठी गांधार फाउंडेशनने मोफत डायलिसिस सेंटर सुरू करून आरोग्यसेवेत उचलेले पाऊल अत्यंत कौतुकास्पद आहे. सामाजिक उत्तरदायित्व जपत मोफत डायलिसिस सेंटरच्या माध्यमातून रुग्ण सेवेचा घेतलेला हा वसा सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

गांधार फाउंडेशनमार्फत या डायलिसिस सेंटरमधून दररोज 30 रुग्णांना मोफत डायलिसिस उपचार देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

यावेळी आमदार विद्या ठाकूर आणि आमदार योगेश सागर यांनी मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमात गांधार फाउंडेशनच्यावतीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 21 लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

कार्यक्रमास आमदार विद्या ठाकूरआमदार योगेश सागरआमदार अतुल भातखळकरप्रवीण दरेकरगांधार ग्रुप ऑफ कंपनीचे चेअरमन रमेश पारेखडॉक्टर श्याम अग्रवालसमीर पारेख आदी उपस्थित होते.


Monday, 21 July 2025

मदतःमुख्य मंत्री सहायता निधी सहा महिन्याच्या काळातील pl share

 सहा महिन्याच्या काळातील मुख्यमंत्री सहाय्यता निधीची मदतः

१ जानेवारी ते ३० जून २०२५ पर्यंत मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षातून १४ हजार ६५१ रूग्णांना १२८ कोटी ६६ लाख ६८ हजार रूपयांची मदत करण्यात आली. तर, धर्मादाय रूग्णालय मदत कक्षातून १ जानेवारी ते ३१ मे २०२५ दरम्यान २ लाख ३२ हजार २६५ रूग्णांना १६५ कोटी ४ लाख २४ हजार ८५७ रूपयांची मदत करण्यात आली.


Featured post

Lakshvedhi