Showing posts with label सामाजिक. Show all posts
Showing posts with label सामाजिक. Show all posts

Sunday, 18 May 2025

एकआपला परिसर प्लास्टिकमुक्त करण्याचा युवकांनी संकल्प करावा

 एक भारत श्रेष्ठ भारतउपक्रमांतर्गत राजभवन येथे सिक्कीम राज्य स्थापना दिवस

आपला परिसर प्लास्टिकमुक्त करण्याचा युवकांनी संकल्प करावा

- राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

 

मुंबई, दि. 16 : प्लास्टिक कचऱ्याने परिसर विद्रुप होत आहेत. मात्र सिक्कीम देशातील सर्वाधिक कमी प्रमाणात प्लास्टिकचा वापर करणारे राज्य ठरले आहे. ही गोष्ट महाराष्ट्रासह इतर सर्व राज्यांसाठी अनुकरणीय असून युवकांनी किमान आपला परिसर प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प केला तर देश अधिक सुजलाम सुफलाम होईलअसे प्रतिपादन राज्यपाल तथा राज्य विद्यापीठांचे कुलपती सी पी राधाकृष्णन यांनी केले.

सिक्कीम राज्याचा ५० वा राज्य स्थापना वर्धापन दिवस राज्यपाल राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत राजभवन येथे साजरा झाला. 'एक भारत श्रेष्ठ भारतउपक्रमांतर्गत राजभवनातर्फे शिवाजी विद्यापीठाच्या सहकार्याने सिक्कीम राज्य स्थापना दिनाचे आयोजन करण्यात आले.

साधारण तीन दशकांपूर्वी देशात प्लास्टिक - पॉलिथिन बॅग वापरण्याचे प्रचलन नव्हते. प्लास्टिक न वापरल्यामुळे कुणाचेही फारसे काम अडतही नव्हते. आज मात्र लोक खरेदीसाठी बाहेर जाताना कापडी पिशवी नेत नाही. प्रत्येक वस्तू प्लास्टिक बॅगमध्ये आणली जाते. या स्थितीचा विचार करून युवकांनी प्लास्टिकचा वापर कमी करावा व बाहेर पडताना नेहमी कापडी पिशवी सोबत बाळगावी असे आवाहन राज्यपालांनी यावेळी केली.

सिक्कीम व इतर उत्तरपूर्व राज्याचे सौंदर्य स्वित्झर्लंडपेक्षा तसूभर देखील कमी नाही. त्या देशापेक्षा कितीतरी पटीने नैसर्गिक सौंदर्य भारतात आहे. उत्तम मार्केटिंग मुळे  काही देश पर्यटनात पुढे गेले आहे.  लोकांनी सिक्कीमसह उत्तरपूर्व राज्ये तसेच जम्मू काश्मीरहिमाचल प्रदेश या राज्यांना भेट द्यावी असे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले.

आज सिंगापूर व थायलंड जगातील सर्वाधिक पर्यटक आकर्षित करतात. भारतात नद्यागडकिल्लेवारसा शिल्पे व निसर्ग संपदा आहे आपण जगातील अर्धे पर्यटक आकर्षित करू शकतो असा विश्वास राज्यपालांनी यावेळी व्यक्त केला.

संपूर्ण देशातील लोकांमध्ये असलेल्या ऐक्याच्या भावनेमुळे 'सिंदूरमोहिम प्रभावी ठरली. लोकांनी एकता टिकवून ठेवली तर भारत विकसित राष्ट्र म्हणून उदयास येईल, असे राज्यपालांनी सांगितले.

यावेळी शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी सिक्कीमचे लोकनृत्य  घोंटू व लोकगीत लेपचा तसेच सिक्कीमचे राज्यगीत उत्कृष्ट सादर केल्याबद्दल राज्यपालांनी विद्यार्थ्यांना कौतुकाची थाप दिली.

शिवाजी विद्यापीठाच्या कुलदीप जठार व श्रद्धा चराटकर या विद्यार्थ्यांनी रांगोळीच्या माध्यमातून सिक्कीम येथील तरुणीचे सुंदर चित्र साकारल्याबद्दल तसेच ओंकार गोमासे या विद्यार्थ्याने सिक्कीम येथील लोकजीवनाचे तैलचित्र काढल्याबद्दल राज्यपालांनी त्यांचे विशेष कौतुक केले. 

विद्यापीठाच्या वृत्तविद्या व जनसंवाद विभागातर्फे तयार करण्यात आलेला सिक्कीम राज्यावरील माहितीपट  'सिक्कीम या पॅराडाईज ऑफ इंडियायावेळी दाखविण्यात आला.

राज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले तर अवर सचिव सुशील  मोरे यांनी  आभार मानले.

कार्यक्रमाला शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. डॉ. डी. टी. शिर्केप्र-कुलगुरु पी. एस. पाटीलकुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदेव्यवस्थापन समितीचे सदस्य तसेच विद्यापीठाच्या सांस्कृतिक चमूचे सदस्य उपस्थित होते.

राज्यपालांच्या हस्ते कार्यक्रमामध्ये उत्कृष्ट कला सादरीकरण केल्याबददल विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. 


Wednesday, 30 April 2025

अक्षय तृतीया’च्या मुहूर्तावर होणारे बालविवाह रोखण्यासाठी संबंधित यंत्रणांनानी सतर्क रहावे

 अक्षय तृतीया’च्या मुहूर्तावर होणारे बालविवाह रोखण्यासाठी

संबंधित यंत्रणांनानी सतर्क रहावे

राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

 

मुंबईदि.२९ अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर  विवाह सोहळे आयोजित केले जात असून या मुहूर्तावर बालविवाह मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. या पार्श्वभूमीवर बालविवाह रोखण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी सतर्क राहावेअसे आवाहन महिला व बाल विकास विभागाच्या राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी केले आहे.

 

निर्मल भवन येथे अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर बालविवाह रोखणेबाबत करावयाच्या कार्यवाही संबंधित बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी राज्यमंत्री मेघना बोर्डीकर बोलत होत्या. यावेळी दुरदृश्य प्रणालीद्वारे महिला व बाल विकास आयुक्त नयना गुंडेसह आयुक्त राहुल मोरे व जिल्हाधिकारीपोलीस अधीक्षक आणि महिला व बाल विकास विभागाचे अधिकारी सहभागी झाले होते.

राज्यमंत्री श्रीमती साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या कीबालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार १८ वर्षांखालील मुली आणि २१ वर्षांखालील मुलांचे विवाह करणे बेकायदेशीर आहे. परंतु आजही अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बालविवाह होतांना दिसतात. त्यामुळे जिल्हाधिकारीपोलीस अधीक्षक यांनी याबाबत कार्यपद्धती ठरवून काम करावे. गावपातळीवर ग्रामसेवकअंगणवाडी सेविकाआशा वर्कर्सपोलीस प्रशासनमहिला व बाल विकास अधिकारी यांनी विशेष लक्ष ठेवून बालविवाह रोखण्यासाठी प्रयत्न करावेतअसेही  राज्यमंत्री श्रीमती साकोरे-बोर्डीकर यांनी सांगितले.

 

बालविवाह रोखणे ही केवळ शासनाची नव्हे तर समाजाचीही जबाबदारी असल्याचे सांगून बाल विवाहाबाबत तक्रार आल्यास त्यावेळी  सरपंचपोलीस पाटील यांना देखील जबाबदार धरण्यात यावे. आदिवासी भागातही बालविवाहाचे प्रमाण अधिक असून त्या भागात कार्यरत अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जनजागृती मोहीम राबवावी. तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी दर तीन महिन्याला आढावा घ्यावाअसेही राज्यमंत्री श्रीमती साकोरे-बोर्डीकर यांनी सांगितले.

 

परभणी जिल्ह्यात बालविवाहाचे प्रमाण अधिक दिसून येते त्यामुळे तिथे विशेष मोहीम राबवण्यात यावी,  अशी सूचनाही श्रीमती साकोरे-बोर्डीकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना 

Tuesday, 29 April 2025

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमच्या माध्यमातून अधिक सेवा देणार,pl share

 लोकसेवा हक्क अधिनियम हा केवळ कायदा नाही तर ती एक उदात्त भावना

- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले कीलोकशाहीत लोकांसाठी कर्तव्य भावनेने काम करायचे असते. लोकसेवा हा केवळ कायदा नाही तर ती एक उदात्त भावना आहे असे आपण म्हणतो या वाक्याला लोकसेवा हक्क आयोगाने खरा अर्थ मिळवून दिला आहे. हा कायदा म्हणजे खऱ्या अर्थाने लोकशाहीची गंगोत्री आहे. वर्धा, यवतमाळ आणि कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या जिल्ह्यात नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले त्यांचा सत्कार करण्यात आला. अशाच प्रकारे इतर जिल्ह्यातही काम केले जावे. हा कायदा  प्रशासन व नागरिकांमधला विश्वासाचा एक पूल आहे, म्हणून सर्वसामान्य जनतेच्या सक्षमीकरणाचा हा पाया अधिक मजबूत होऊन या अधिनियमाच्या माध्यमातून नागरिकांना तात्काळ सेवा मिळाव्यात असे त्यांनी यावेळी सांगितले.

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमच्या माध्यमातून अधिक सेवा देणार

- मुख्य सचिव सुजाता सौनिक

      अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जनतेला ऑनलाईन सेवा देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. मायक्रोसॉफ्ट सोबत देखील यासाठी करार केला आहे. महाराष्ट्र डिजिटल गव्हर्नन्समध्ये देशासाठी एक आदर्श मॉडेल ठरेल, असे मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी सांगितले.

यावेळी वर्ध्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचा सेवादूत प्रकल्पाची सुरुवात केल्याबद्दल, यवतमाळचे जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी अभिप्राय कक्ष सुरू केल्याबद्दल आणि कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी कोल्हापूर जिल्ह्यात पथदर्शी प्रकल्प सुरू केल्याबद्दल यावेळी मुख्यमंत्री यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमचे ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून पद्मश्री शंकर महादेवनसोनाली कुलकर्णी यांचाही सत्कार करण्यात आला.

यावेळी राज्य सेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त मनु कुमार श्रीवास्तव यांनी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ च्या अंमलबजावणीच्या गेल्या दहा वर्षातील वाटचालीबाबत माहिती दिली. तसेच या कायद्याच्या जनजागृतीसाठी आयोग व शासन अनेक सुनियोजित नावीन्यपूर्ण उपक्रम राबवणार असून भविष्यात आयोगाने हाती घेतलेल्या व शिफारस केलेल्या उपक्रमांची माहितीही त्यांनी यावेळी दिली. पुणेचे राज्य सेवा हक्क आयोगाचे आयुक्त दिलीप शिंदे यांनी आभार मानले.

मूल्याधारित शिक्षणासाठी शांतीलाल मुथ्था फाऊंडेशनबरोबर

 मूल्याधारित शिक्षणासाठी शांतीलाल मुथ्था फाऊंडेशनबरोबर

शालेय शिक्षण विभागाचा सामंजस्य करार

सामंजस्य कराराची तातडीने अंमलबजावणी करण्याचे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

 

मुंबईदि. 28 : शालेय विद्यार्थ्यांना मूल्याधारित शिक्षण मिळावेयासाठी शालेय शिक्षण विभागामार्फत शालेय अभ्यासक्रमात मूल्यवर्धन 3.0’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यासंदर्भात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शालेय शिक्षण व शांतीलाल मुथ्था फाऊंडेशन यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. मूल्यवर्धन 3.0 हा उपक्रम अतिशय चांगला उपक्रम असून विद्यार्थ्यांवर त्याचा चांगला परिणाम होईल. त्यामुळे तातडीने या सामंजस्य कराराची अमंलबजावणी करावीअसे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या या कार्यक्रमास शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसेजलसंधारण मंत्री संजय राठोडशांतीलाल मुथ्था फाऊंडेशनचे संस्थापक शांतीलाल मुथ्थावल्लभ भन्सालीअतुल चोब्रेप्रधान सचिव रणजितसिंह देओलशालेय शिक्षण आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंहमहाराष्ट्र शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार आदी उपस्थित होते.

 मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले कीमूल्यशिक्षण हा विषय विद्यार्थ्यांसाठी आवश्यक आहे. यापूर्वी शिक्षकांसाठी यासंबंधी दिलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमात त्यांचा मोठा उत्साह दिसून आला होता. आता या उपक्रमात आणखी सुधारणा करून मूल्यवर्धन 3.0’ हा उपक्रम राज्यात राबविण्यात येत असून त्यामुळे विद्यार्थी लोकशाहीचे जबाबदारसंवेदनशील व सक्षम नागरिक बनतील. या सामंजस्य कराराची अंमलबजावणी तातडीने करावीअसेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी श्री. मुथ्था यांनी मूल्यवर्धन उपक्रमाची माहिती देऊन उपक्रमाच्या अंमलबजावणीबाबत माहिती दिली.

मूल्यवर्धन 3.0ची वैशिष्ट्ये

 शांतीलाल मुथ्था फाऊंडेशनच्यावतीने राज्यातील शिक्षकांना प्रशिक्षण देऊन विद्यार्थ्यांपर्यंत मूल्यवर्धन उपक्रम पोचविणार

 राज्यातील 1 लाख शाळांतील 5 लाख शिक्षकांच्या माध्यमातून एक कोटी विद्यार्थ्यांना मूल्याधारित शिक्षण मिळणार

 राज्यात मूल्याधारित शिक्षणाची अधिकृत व व्यापक अंमलबजावणी या करारामुळे होणार आहे.

 मूल्य शिक्षणाचा हा उपक्रम देशातील सर्वात मोठा उपक्रम असून तो दिशादर्शक ठरणार आहे.

 मूल्यवर्धन उपक्रमाचे शिक्षकांच्या अध्ययन-अध्यापन पद्धतीत बदलउपक्रम पुस्तिका आणि मूल्य आत्मसात करण्याची संधी हे तीन प्रमुख पैलू आहेत.

 नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण आणि राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडानुसार मूल्यवर्धन उपक्रमात आवश्यक बदल करण्यात आले आहेत.

 राज्य अभ्यासक्रम आराखड्याशी सुसंगत उपक्रम

 इयत्ता 1 ली ते 8 वी साठी नवीन उपक्रम पुस्तिका मराठीहिंदीइंग्रजीमध्ये अद्ययावत करण्यात आली.

Monday, 21 April 2025

सालाबादप्रमाणे याही वर्षी रविवार दिनांक २०/४/२०२५ रोजी सहयोगनगर, जाधववाडी येथ्ील जागृत म्हसोबा व असारा मंदीराच्या भंडा-याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

 सालाबादप्रमाणे याही वर्षी रविवार दिनांक २०/४/२०२५ रोजी सहयोगनगर, जाधववाडी येथ्ील जागृत  म्हसोबा व असारा मंदीराच्या भंडा-याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.



Wednesday, 16 April 2025

श्री क्षेत्र चौंडी विकास आराखड्या संदर्भात तातडीने कार्यवाही करावी

 श्री क्षेत्र चौंडी विकास आराखड्या संदर्भात तातडीने कार्यवाही करावी

-  सभापती प्रा.राम शिंदे

 

मुंबई, दि. 16 :  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जयंती पुढील महिन्यात दिनांक 31 मे2025 रोजी येत आहे. त्यानिमित्त त्यांचे जन्मगाव चौंडीता.जामखेडजि.अहिल्यानगर येथे देशभरातील पर्यटक आणि इतिहासप्रेमींना त्यांच्या कार्यकर्तृत्वाची माहिती  देणाऱ्या श्री क्षेत्र चौंडी विकास आराखड्या संदर्भातील कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी दिले.

विधान भवन येथे सभापती श्री.शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली  झालेल्या बैठकीत त्यांनी संबंधितांना निर्दैशित केले. यावेळी  मुख्य सचिव श्रीमती सुजाता सौनिक यांची विशेष उपस्थिती होती. मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर तर दूरदृष्यप्रणालीद्वारे नाशिक विभागीय आयुक्त प्रवीण गेडामअहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशियाजिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकरसार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता भरतकुमार बावीस्कर यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

श्री क्षेत्र चौंडी विकास आराखडा हा सर्व दृष्टीने परिपूर्ण असावातसेच जिल्हाधिकारी यांनी आपल्या स्तरावर सर्व संबंधित विभागांची चौंडी येथे बैठक घेऊन आराखड्याच्या कामास गती द्यावीपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थळाचे सुशोभीकरण करणेत्यांनी संदेश दिलेल्या जलसंवर्धनवृक्षसंवर्धन संकल्पनांची जपणूक करण्याच्या दृष्टीने या आराखडयास प्राधान्य द्यावे.  चौंडी येथे देशभरातून येणाऱ्या पर्यटकांसाठी सुव्यवस्थित रस्तेसंग्रहालयमहादेव मंदिर आणि चौंडीश्वरी मंदिर जीर्णोद्वारनिवास व्यवस्थासुसज्ज वाहनतळस्थानिक उत्पादनेखाद्यपदार्थ यांची बाजारपेठ या सोयीसुविधांना प्राधान्याने उपलब्ध करुन  देण्यात याव्यायाबाबतचा प्रस्ताव तत्परतेने सादर करण्याबाबत  सभापती प्रा.राम शिंदे आणि मुख्य सचिव श्रीमती सुजाता सौनिक यांनी सूचित केले. बैठकीत प्रस्तावित आराखड्याबाबत सादरीकरण करण्यात आले..


Tuesday, 8 April 2025

सेवा आणि अहंकार* !! श्री स्वामी समर्थ!!

 !!*सेवा आणि अहंकार* !! श्री स्वामी समर्थ!!


*रावणाशी युद्धाच्या दरम्यान प्रभु श्री रामचंद्रांच्या सैन्यासाठी लागणारी रसद अन्नसामग्रीतले पीठ एकदा संपले होते. श्री राम हनुमंताला* म्हणाले *चित्रकूट पर्वतावर* जा तिथे तुला *अन्नपुर्णामाता दळण दळत* असल्याचा आवाज येईल. तीच्या कडून आपल्या सैन्यासाठी पीठ घेऊन ये. *हनुमंतांनी श्री रामाना* विचारले, "पण *अन्नपुर्णामाता* मला कशी काय ओळखणार ?"

*श्री राम म्हणाले,* "ओळख म्हणून ही माझी *अंगठी* तीला दे" आणि त्यांनी स्वतःची *अंगठी हनुमंतांना* दिली.

*हनुमंत* पर्वतावर पोहोचले, त्यांच्या मनात विचार आला मी जर पीठ नेले नाही तर *श्री रामांच्या सैन्याची* काय अवस्था होईल, शेवटी माझ्या शिवाय *प्रभु श्री रामचंद्रांचे* कोणतेही काम होणे अशक्यच. *हनुमंताना अहंकाराने* ग्रासले. 

एका मोठ्या गुहेतून *जात्यावर दळण्याचा* आवाज येत होता. त्या गुहेवर एक भली मोठी *दगडाची शिळा* होती. त्या गुहेसमोर जाऊन *हनुमंतांनी अन्नपुर्णामातेला* हाक मारली, म्हणाले *"माते मी प्रभु श्री रामचंद्रांचा सेवक हनुमंत, मला त्यांनी तुमच्याकडून सैन्यासाठी पीठ* आणण्यासाठी पाठविले आहे. गुहेतून *अन्नपुर्णामातेचा* आवाज आला, *"हे हनु ! गुहेवरची शिळा बाजूला करून आत ये".*

*हनुमंत* आपल्या शेपटीने *शिळा* बाजूला करू लागले, *शिळा* काही जागची हलेना. मग दोन्ही हातांनी *शिळा* बाजुला करायला लागले तरी शिळा काही तसूभरही हलली नाही. मग शरीरातील सर्व शक्तीनीशी जोर लावून *शिळा* बाजुला करायचा प्रयत्न करू लागले, घामाघूम झाले, काही केल्या *शिळा* बाजुला काही सरकत नव्हती. *हनुमंतांच्या* मनात विचार आला मोठे मोठे पर्वत उचलण्याची शक्ती माझ्यात असून देखील हा एवढासा यत्किंचित दगड मला बाजूला करता आला नाही. शेवटी *हार* मानून *हनुमंत* म्हणाले, "माते, ही *गुहेवरची शिळा* काही मला बाजूला करता येत नाही." 

*अन्नपुर्णामातेने* विचारले, *"हनु , तू अहंकार केलास का?"* तर *हनुमंत* म्हणाले, "होय माते !

"मला आता त्याचा *पश्र्चाताप* होतो आहे."

*अन्नपुर्णामाता* म्हणाली,

*"तुला पश्र्चाताप होतो आहे ना?* मग आता पुन्हा एकदा *शिळा* बाजुला करायचा प्रयत्न कर."

*अन्नपुर्णामातेने* सांगितल्याप्रमाणे *हनुमंतांनी* शिळा बाजुला करायचा प्रयत्न केला, तर काय शिळा अलगद बाजूला सरकली. गुहेमध्ये आत गेल्यावर *हनुमंतांनी अन्नपुर्णामातेला प्रभु श्री रामचंद्रांनी* दिलेली अंगठी दाखवली, *अन्नपुर्णामाता* म्हणाली, "त्या पलीकडे तो कोपरा आहे ना तीथे ही अंगठी टाक आणि तुला हवे तेवढे पीठ घेऊन जा". 

*हनुमंत* अंगठी ठेवायला गेले, पहातात तर काय तिथे अगणित अंगठी मुद्रांचा डोंगरच जणू खच पडला होता. हे पाहून *हनुमंतांनी अन्नपुर्णामातेला* विचारले "माते, हा इथे अंगठी मुद्रांचा खच कसा काय ?"

*अन्नपुर्णामाता* म्हणाली, "अरे हनु , प्रभुंनी तुझ्यासारखे कित्येक *हनुमंत* कित्येकदा माझ्याकडे अंगठी घेऊन पाठविले तेव्हापासूनच्या आहेत त्या मुद्रा अंगठ्या"

हे ऐकल्यावर मात्र *हनुमंतांचा गर्व* पुर्णपणे नाहीसा झाला.


*सद्गुरूंची* सेवा करताना कुठल्या गोष्टीचा *अहंकार* नसावा.*मी* करतो म्हणून सेवा होते, हा भ्रम आहे.परमेश्वर प्रत्येक कार्यासाठी कोणा न कोणाची निवड करतो.आपण असलो नसलो तरी ते कार्य ठरलेलंच असतं व ते कोणा न कोणाच्या हातून घडतचं. त्यामुळे सेवेची जी संधी मिळाली आहे तिचं भाग्य माना व संधीचं सोनं करा. अहंकार युक्त,*दिखावटी* केलेली सगळी सेवा व्यर्थ आहे.


          *💫!!श्री गुरूदेव दत्त!!✨*!! श्री स्वामी समर्थ!!

                       🙏🏻🌹

घराचे वास्तुशात्र*

 *घराचे वास्तुशात्र*


     जिथे आपण सर्वजण *एकत्र राहतो,* एकमेकांना *आधार* देतो, *सुखदुःखे* वाटून घेतो. *ती वास्तू* फक्त आनंदी नसावी तर *समाधानी* असावी. आनंद हा *भौतिक पातळीवर* असतो आणि समाधान *आत्मिक पातळीवर* असते.     

😁  *साखर, लिंबू, मीठ* हे सारे पदार्थ *आपापल्या* आनंदात एकत्र रहातात. पण जेंव्हा ते *एकमेकांत मिसळतात,* तेंव्हाच विलक्षण *मधुर चवीचे* सरबत तयार होते. त्यासाठी लिंबाला *कापून आणि पिळून* घ्यावे लागते तर *मीठ व साखरेला* पाण्यात *विरघळून* एकजीव व्हावे लागते.

☝️ *म्हणून पती-पत्नी एकमेकांना अनुरूप असण्यापेक्षा एकरूप असावेत.* कारण *गृहमंदिरात* जर पती-पत्नी मनाने एकरूप झाले, तर *चवदार सरबत* नाही तर *मधुर-अमृत* तयार होईल.

✌आपले *आईबाबा* एकमेकांशी किती प्रेमाने *वागताहेत* हे बघून मुलांच्या *मनावर आणि शरीरावर* अत्यंत *शुभ परिणाम* होतो.अन्यथ: ती मनातल्या मनात *कुढत* राहतात.

🙏मुले ही *अनुकरणप्रिय* असतात. आईचा *कडवट चेहरा,* वडिलांचा *आरडा-ओरडा* घराचा अक्षरशः उकिरडा करतो. आणि मग *वास्तुतज्ज्ञ* या समस्येच्या मुळाशी न जाताच फक्त *अतार्किक, अशास्त्रीय* आणि बिनबुडाचे उपाय सुखवितो. आणि आपण *निर्बुद्ध मंडळी* त्यावर हजारो रुपये खर्च करुन *पस्तावतो.*

🌞 अरे, *बाबांनो* कोणी बाहेरच्या माणसाने भरपूर *पैसे घेऊन* तुमच्या घरात *"शांती"* आणणे  शक्य आहे का.?!!! 

*तुम्ही घरातली सर्व मंडळी समंजसपणे वागून, एकमेकांवर प्रेम करून वास्तू समाधानी ठेवू शकता.* 

🤺ज्येष्ठ नागरिकांनी *प्रकृती साथ* देत असेल तर, *अर्थार्जन* करून मुलांना हातभार लावावा. 

*रिटायर्ड लाईफ म्हणजे निष्क्रियता नव्हे.* काहीही कारण नसताना सारखे *लोळत पडलेली* माणसे घरात हाॅस्पिटलचे वातावरण तयार करतात.

   🏌️‍♂️मुलांनीही *जन्मभर कष्ट* केलेल्या *आई-वडिलांशी* खूप *नम्रतेने* वागावे. त्यांच्या चुका काढत बसू नये. *सून* म्हणून आपले सारे विश्व सोडून आपल्या घरी आलेल्या मुलीला *खूप प्रेम आणि आधार* द्यावा. ती खूप पुढारलेल्या वातावरणात शिकलेली *आधुनिक मुलगी* आहे. आपणच *जनरेशन गॅप* कमी करावा. अर्थात *सुनेने सुद्धा* सासरी साऱ्यांना असा *लळा* लावावा, की सून माहेरी गेली की *सुनं-सुनं* वाटलं पाहिजे.

🍔घरात मेणबत्या *फुंकून* आणि *डोक्यावर कचरा* पाडून घेऊन वाढदिवसाचा *धांगडधिंगा* करण्यापेक्षा मुलाचे *निरांजन* ओवाळून *औक्षण* करावे. भोजनाचे वेळी *आनंदी वातावरण* ठेवावे. *पत्नी जेवली का* विचारपूस करावी. घरामध्ये सर्वांनी खूप *संयमाने* बोलावे.एकमेकांच्या चुका पदरात घ्याव्यात. एकजण *चिडला* तर दुसऱ्याने *शांत* बसावे. 

🤓पहा ना,गवत नसलेल्या जागी *पडलेला अग्नी* जसा *आपोआप शांत* होतो, तसे *सारे शांत* होईल. चालतानाही *घरात पाय आपटू नयेत.* शांतपणे वस्तू हाताळाव्यात.उगीचच *भांड्यांची* आदळ-आपट करु नये. *पुरुषांनीही* घरात *नीटनेटके* रहावे. सतत फक्त *बायकांनीच* सदाफुलीसारखे *टवटवीत* राहावे, ही अपेक्षा बरोबर नाही.

*⚘अशी राहते समाधानी वास्तु!*⚘

म्हणून म्हणतो, *तुम्हीच व्हा तुमचे वास्तुतज्ज्ञ* आणि करा आपली *वास्तुदेवता प्रसन्न.* !!

👇🏻घरातील प्रत्येकाच्या *मोबाईलमध्ये* हा मॅसेज गेला, तर प्रत्येक घर *सुखी व समाधानी* होऊ शकेल.👌👌👌👌👌👌       

अत्यंत भावनिक लेख   

Copy paste

आरोग्य सेवा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या आरोग्य संस्थांचा सन्मान...

 आरोग्य सेवा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या

आरोग्य संस्थांचा सन्मान...

* राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणारा जिल्हा - मोतीबिंदू शस्त्रक्रिया - प्रथम - बीडद्वितीय - धाराशिव

* कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेत उल्लेखनीय कामगिरी करणारा जिल्हा - प्रथम - नांदेडद्वितीय - पालघरलातूर महानगरपालिका

* मोठ्या (major) शस्त्रक्रिया करणारे १०० खाटाचे उपजिल्हा रुग्णालय - प्रथम - उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लजकोल्हापूरद्वितीय - उपजिल्हा रुग्णालय अचलपूरअधिकाधिक मोठ्या (major) शस्त्रक्रिया करणारे ५० खाटाचे उपजिल्हा रुग्णालय - प्रथम - उपजिल्हा रुग्णालय देगलूरजिल्हा नांदेडद्वितीय - उपजिल्हा रुग्णालय गंगाखेडपरभणी

अधिकाधिक मोठ्या (major) शस्त्रक्रिया करणारे ग्रामीण रुग्णालय प्रथम - ग्रामीण रुग्णालय अहमदपूरजिल्हा लातूरद्वितीय ग्रामीण रुग्णालय माहूरजिल्हा नांदेड

            गुणवत्ता आश्वासन कार्यक्रम अंतर्गत सर्वात जास्त संस्थांना राष्ट्रीय पातळीवर प्रमाणित करणारा जिल्हा प्रथम - लातुरद्वितीय धाराशिव

जास्त प्रसुती करणारे प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC) - प्रथम - प्राथमिक आरोग्य केंद्र साईवन ता. डहाणू जिल्हा पालघरद्वितीय - प्राथमिक आरोग्य केंद्रशेंदूर्णी ता. जामनेर जिल्हा जळगाव

जास्त प्रसुती करणारे नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र (महानगरपालिका) - नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र आकुर्डीपिंपरी चिंचवड महानगरपालिका

जास्त प्रसुती करणारे ग्रामीण रुग्णालय - प्रथम ग्रामीण रुग्णालय धडगावजिल्हा नंदुरबारद्वितीय ग्रामीण रुग्णालय स्पर्श सस्तूरता. लोहारा जिल्हा धाराशीव

आरबीएसके कार्यक्रमांतर्गत उल्लेखनीय कामगिरी करणारा जिल्हा (विद्यार्थी तपासणीहृदय शस्त्रक्रिया व इतर शस्त्रक्रिया). प्रथम कोल्हापूरद्वितीय - पुणे

असंसर्गजन्य आजार नियंत्रण कार्यक्रमामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारा जिल्हा प्रथम - सातारा द्वितीय वाशीम

सिकल सेल आजार नियंत्रण कार्यक्रमामध्ये उल्लेखनिय कामगिरी करणारा जिल्हा (सिकलसेल तपासणी) प्रथम नागपुर द्वितीय नाशिक

            उल्लेखनीय कामगिरी करणारे विशेष नवजात शिशु काळजी कक्ष (SNCU) - प्रथम डागा रुग्णालयनागपुर द्वितीय उपजिल्हा रुग्णालयजव्हार जिल्हा पालघर

उल्लेखनीय कामगिरी करणारे पोषण पुनर्वसन केंद्र (NRC) - प्रथम - उपजिल्हा रुग्णालय पांढरकवडाजिल्हा यवतमाळद्वितीय जिल्हा रुग्णालयहिंगोली

मोबाईल मेडिकल यूनिट (एमएमय) कार्यक्रमांतर्गत उल्लेखनीय कामगिरी करणारा जिल्हा प्रथम ठाणेद्वितीय नांदेड

पाच वर्षात सातत्याने बालमृत्यू कमी करणारा जिल्हा प्रथम धाराशीव

पाच वर्षात सातत्याने मातामृत्यू कमी करणारा जिल्हा - प्रथम रायगड

सर्वात जास्त In-house Dialysis करणाऱ्या आरोग्य संस्था प्रथम - डायलिसीस सेंटरचंद्रपुरद्वितीय - जिल्हा रुग्णालयगडचिरोली

उल्लेखनीय कामगिरी करणारे अतिदक्षता कक्ष (ICU) - जिल्हा रुग्णालय धुळे

राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत उल्लेखनीय कामगिरी करणारा जिल्हा प्रथम गोंदियाद्वितीय धाराशीव

राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत उल्लेखनीय काम करणारी महानगरपालिका: प्रथम मालेगावमहानगरपालिकाद्वितीय धुळे महानगरपालिका

कष्ठरोग निर्मलन कार्यक्रमांतर्गत उल्लेखनीय कामगिरी करणारा जिल्हा प्रथम चंद्रपुरद्वितीय सातारा

जिल्हा आरोग्य आधिकारी कार्यक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारा जिल्हा

जिल्हा आरोग्य अधिकारीअकोलाद्वितीय जिल्हा आरोग्य अधिकारीधाराशीव

जिल्हा शल्य चिकित्सक कार्यक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारा जिल्हा: प्रथम जिल्हा शल्य चिकित्सक वाशिमद्वितीय जिल्हा शल्य चिकित्सकनाशिक

वैद्यकीय आरोग्य अधिकारी कार्यक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारी महानगरपालिका - प्रथम वैद्यकीय आरोग्य अधिकारीसांगली महानगरपालिकाद्वितीय वैद्यकीय आरोग्य अधिकारी पिंपरी चिंचवड महानगरपालिका

उल्लेखनीय कामगिरी करणारे 100 खाटांचे रुग्णालय प्रथम उपजिल्हा रुग्णालय कराड जिल्हा साताराद्वितीय उपजिल्हा रुग्णालयशहापूर जिल्हा ठाणे

उल्लेखनीय कामगिरी करणारे महिला रुग्णालय प्रथम महिला अकोलाद्वितीय महिला रुग्णालयअमरावती

किडनी ट्रांसप्लांट मध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारे रुग्णालय - विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय अमरावती

आयुष्मान भारत डिजिटल मिशन अंतर्गत उल्लेखनीय कामगिरी - ग्रामीण भाग- हिंगोली जिल्हाशहरी भाग - पनवेल महानगरपालिका


Tuesday, 1 April 2025

*गृहिणीपणाचा उत्सव -चैत्रगौर*

 *गृहिणीपणाचा उत्सव -चैत्रगौर*

-विनय  मधुकर जोशी

#विनय_उवाच 

आज चैत्र शुद्ध तृतीया म्हणजे गौरी तृतीया.आज पासून वैशाख शुक्ल तृतीयेपर्यंत  गौरीची  पूजा करून महिनाभर हा उत्सव साजरा होतो.देवघरातली अन्नपूर्णा लख्ख करून तिची षोडशोपचारे पूजा केली जाते आणि तिला महिनाभर झोपाळ्यावर ठेऊन हा उत्सव साजरा होतो.अनेक शुभ चिन्हांची रांगोळी" चैत्रांगण " काढली जाते.


गौरी अन्नपूर्णा कशी झाली याची सुंदर कथा पुराणात येते.गौरी हि भौतिक समृद्धीची देवता.अन्नधान्य ,वात्सल्य ,धन संपती ,सौंदर्य ,मांगल्य ,कौटुंबिक सौख्य हे सारं काही तिचीच कृपा.आणि शिव म्हणजे विशुद्ध ज्ञान!.योग ,वैराग्य,ब्रह्मज्ञान यांचे ते अधिष्ठान. शिव पार्वती एकदा कैलाशी निवांत गप्पा मारत होते.बोलण्याच्या ओघात शिव म्हणाले ब्रह्म सत्यम जगत मिथ्या. फक्त ब्रह्म सत्य आहे बाकी सब झूट.


पार्वती म्हणाली अहो हे सुंदर विश्व ? 

शिव म्हणले साफ खोट आभासी आहे हे ,

 विश्वातील सौंदर्य ,मांगल्य , नातीगोती ???

ते हि असत्य

बर मग आपण खातो ते अन्न तरी ?

तेही खोट ,असत्य ,आभासीच ,फक्त ब्रह्म तत्वच सत्य !!

झालं ….गौरीला आला थोडा राग . ती म्हणाली बरं तुमचं ज्ञान वैराग्यच खर बाकी सगळ आभासी ना.या क्षणी मी अंतर्धान होते. 


गौरी गुप्त होताच जगातले मांगल्य लोपले ,नात्यांचा गोडवा उडाला ,घराचे घरपण हरपले ,सात्विक सौंदर्य विरले,आणि मुख्य म्हणजे जगातले सगळे अन्न धान्य सुद्धा अकस्मात संपले. शिवाना वाटले हरकत नाही..या वाचून जगाचे  काही बिघडत नाही. पण थोड्याच वेळात अख्या जगातले देव ,मानव ,ऋषी ,पशु पक्षी सारे प्राणीमात्र भुकेले होऊन शिवांपाशी आले. महादेव म्हणाले थांबा तुम्हाला जरा ज्ञान देतो. पण भुकेल्या पोटी कसलं  ब्रह्म कसलं ज्ञान.आधी अन्न द्या मग पुढ्च बोला.पण अन्न आणायचे कुठून??

कोणीतरी सांगितल अख्या विश्वात फक्त काशी नगरीत एक घर आहे तिथेच अन्न उपलब्ध आहे. सगळ्या प्राणिमात्रांच्या वतीने शिव याचक म्हणून तिथे भिक्षा मागायला गेले. 

ओम भवती भिक्षां देहि.


आतून एका गृहिणीचा नाजूक आवाज आला महादेवा भिक्षेत काय देऊ ज्ञान कि वैराग्य ??

महादेवानी पाहिलं ,आत सुवर्ण सिंहासनी साक्षात पार्वती बसली आहे ,मांगल्य लेवून ,पावित्र्य पांघरून ,समृद्धीचे अलंकार घालून आणि तिच्या हातात आहे अन्नाचे अक्षयपात्र ,वात्सल्याच्या पळीने ती प्रतेक जीवाला अन्न देऊन तृप्त करते आहे. प्रपंचाशिवाय  परमार्थ, प्रवृत्तीवाचून निवृत्ती ,शक्तीविना शिव अपूर्णच आहेत हा साक्षात्कार शिवांना झाला.

शिव म्हणाले  ज्ञान -वैराग्य प्राप्त होण्यासाठी आधी शरीरात शक्ती आणि मनात शांती हवी ,त्यासाठी सकस अन्न हवे, अन्न हे पूर्णब्रह्म .त्याचीच  भिक्षा दे !!! 

*ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थं भिक्षां देहि च पार्वती ।।*

पार्वती हसली , तिने आनंदने शिवांना भोजन दिले ,शिव तृप्त होताच जगातले सगळे जीव देखील तृप्त झाले .

त्या तृप्त अंतकरणाने महादेव म्हणाले तू  सदाशिवाला सुद्धा पूर्ण करणारी सदापूर्णा आहेस ,जगाची आई बनून अन्न पुरवणारी  तू अन्नपूर्णा आहेस.साध्या गृहिणीच्या रूपातली ती शंकराची प्राणवल्लभा अन्नपूर्णा म्हणून विख्यात झाली.


हि अन्नपूर्णा जगातल्या सगळ्या गृहिणींच प्रतिक आहे. सोनेरी महालात राहणाऱ्या रुख्मिणीवर देखील  द्वारकेतील सगळ्यांना अन्न देण्याची जबाबदारी होती आणि झोपडीत राहणारी सुदामाची बायको  सुद्धा मिळेल ते रांधून घराला जेऊ घालत होती.परिस्थितीचा फरक असेल पण कुटुंबाला तृप्त करण्याची वृत्ती सारखीच आहे.कदाचित ही आठवण राहावी म्हणून नववधूला लग्नात माहेरून अन्नपूर्णा देतात.तिची रोज पूजा करत गृहिणीने सकस अन्न शिजवावं ,नाती जपावीत ,घराला घरपण द्याव.हे सगळं करत असताना "गृहिणी कुठे काय करते?" असा प्रश्न कोणी विचारला तर गृहिणीच्या रुपात अवतीर्ण होऊन जगाचे पोषण करणाऱ्या अन्नपूर्णेची कथा आठवावी.


या गृहिणीपणाचा उत्सव ही चैत्रगौर.रोजची देवघरातली अन्नपूर्णा मखरात हिंदोळ्यात बसवली जाते.किंवा काही ठिकाणी पंचगौरचे छोटे झोपाळे पुजले जातात.त्यात मध्यभागी ही गौरी आणि सभोवताली तिचा परिवार -शिव, गणेश, नंदी वैगरे.गृहिणी हीच घराचा केंद्रबिंदू आहे हे यातून बिंबवलं जातं.


*स्वयं पञ्चाननः पुत्रौ गजाननषडाननौ।*

*दिगम्बरः कथं जीवेदन्नपूर्णा न चेद्गृहे॥*

पाच मुखे असणारे शंकर; गजमुख गणेश आणि सहा मुख असणारा कार्तिकेय अशी खाणारी बारा तोंडे घरी असताना भिक्षाटन करणाऱ्या दिगंबर शिवाचा संसार सुरळीत चालला आहे; कारण त्याच्या घरी अन्नपूर्णा गृहिणी म्हणून आहे.

 

शिवांपासून तर जगभरातल्या सगळ्यांचे संसार ज्यांच्यामुळे सुरळीत चालले आहेत अशा गृहिणींच्या रुपात असणाऱ्या अन्नपूर्णेला नमन

*अन्नपूर्णे सदापूर्णे शंकरः प्राणवल्लभे*|

*ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थं भिक्षां देहि च पार्वती ।।*


विनय मधुकर जोशी

#विनय_उवाच 

vinayjoshi23@gmail.com

(वरील लेख नावासह शेयर करायला हरकत नाही )

Saturday, 29 March 2025

केशवतीर्थ प्रयासराज !* होय.हे तीर्थस्थळ भारतात ,त्र्यंबकेश्वर तालुक्यात हिवाळी नावाच्या गावात . ठाणापाडा नावाच्या आदिवासी पाड्यावर आहे.

 *केशवतीर्थ प्रयासराज !*


होय.हे तीर्थस्थळ भारतात 

महाराष्ट्रात 

नाशिक जिल्ह्यात 

त्र्यंबकेश्वर तालुक्यात 

हिवाळी नावाच्या गावात .

ठाणापाडा नावाच्या आदिवासी पाड्यावर आहे.


ही जिल्हापरिषदेची बारा तास भरणारी बारमाही शाळा आहे.अगदी ३६५ दिवस अखंडपणे या शाळेचे विद्यार्थी आणि शिक्षक आनंदाने शाळेत येत असतात.रविवार नाही,दिवाळी नाही की कसलीही स्थानिक सुट्टी बिट्टी कुछ नही !

असं काय असतं या शाळेत ? 

यु ट्यूबवर या शाळेचा एक व्हीडीओ पाहण्यात आला.३६५ दिवस बारा तास भरणारी शाळा या थंबनेलने मला थांबवलं.मग एकच नव्हे तर या शाळेचे लागोपाठ अनेक व्हीडीओ समोर आले.आणि त्या शाळेबद्दल जे कळलं त्याने अनावरा उत्सुकता निर्माण झाली. 

याच अमाप कुतूहलाने मी या शाळेला भेट दिली.

या शाळेचे कर्ता करविता आहेत,

श्री.केशव गावित गुरूजी.

२००९ सालात डी.एड,होऊन या शाळेत शासनाकडून त्यांना 'टाकलं' गेलं.

बियाणं कसदार असलं की कुठल्याही मातीत टाकलं तरी जोमदारपणे वाढतं तसे गुरूजी स्वतः तर तिथे रूजलेच पण त्यांनी आजतागायत तिथे असंख्य रोपे फुलवली आहेत ;नव्हे तर नव्या पिकासाठी बियाणी तयार करण्याचा अखंड यज्ञ सुरू ठेवला आहे.

या शाळेत बालवाडी पासून सहावीपर्यंत विद्यार्थी आहेत.

शाळेला वेळापत्रक नाही पण बांधीव कृतिकार्यक्रम आहे.सकाळी साडेनऊ वाजता शाळा भरते ती रात्री साडेनऊला संपते.

शाळेचं बांधकाम पर्यावरण पूरक आहे.

या इमारतीत एकही खिडकी नाही पण दहा दिशातून येणारा उजेड वारा शाळेला मोकळा श्वास देतो,भिंती असलेल्या वर्गखोल्या नाहीत पण ज्ञानाच्या खोलीपर्यंत मुलं स्वतः उतरू शकतात.

या शाळेत अॕम्फी थिएटर आहे.

अद्ययावत वाचनालय आहे,

संगणककक्ष आहे.

बोलक्या भिंती आहेत,

गोशाळा आहे.परसबाग आहे.

या सा-यांशी जीवप्राण जोडलेले केशवगुरूजी आहेत,गावकरी आहेत आणि पासष्ट विद्यार्थी आहेत.

नेमलेला अभ्यासक्रम जून ते आॕक्टोबर पर्यंत पूर्ण होतो आणि नंतर सुरू होते ते अभ्यासक्रम मनात मुरवण्यासाठीचा कौशल्यविकास !


डावा आणि उजवा मेंदू सतत कार्यरत ठेवण्याचे

तो एकाच वेळी यशस्वी कार्यरत करण्याचे कौशल्य !


या शाळेतले विद्यार्थी दोन्हा हातांनी दोन वेगवेगळी कामं एकाचवेळी करतात.

दोन्ही हातांनी कितीही संख्येची उजळणी लिहितात.


म्हणजे डावा हात एक ते दहा लिहित असेल तर त्याच वेळी उजवा हात अकरा ते वीस पाढे लिहितो,


डावा हात मराठी शब्द लिहित असतो त्याच्याच समोर योग्य अंतरावर त्याच वेळी त्याच अर्थाचा इंग्रजी शब्द लिहिला जातो.


डाव्या हाताने लिहिलेल्या इंग्रजी किंवा मराठी शब्दांची दर्पण प्रतिमा ( mirror image )उजवा हात लिहितो.


डाव्या उजव्या हाताने कामं चाललेली असतांना तोंडाने संविधानाची कुठलीही  कलमे अचूक सांगता येतात.ही नुसती पाठांतराची पोपटपंची नसते.विद्यार्थी त्याचा अर्थही सांगू शकतात.(विचारून बघा ना,तुमची स्वतःची पाठ असली तर  संविधानातली कुठलीही कलमे नि पोटकलमे !)


रंगांची सुसंगत रचना करणारे ठोकळे  (  क्यूब साॕल्व्हर )  काही मिनिटात एका ओळीत सहज फिरवले जातात.

मुलं प्रश्न विचारतात.

यू ट्युबवर बघून वाद्य शिकतात,गाणी शिकतात,विविध भाषा शिकतात.

पाचवी सहावीचे विद्यार्थी खालच्या वर्गातल्या मुलांना शिकायला मदत करतात.त्यांची काळजी घेतात.

 

ही कौशल्ये माझ्याही अंगात नाहीत हे केशव गुरूजी मोकळळेपणी मुलांसमोरच कबूल करतात.कशी आत्मसात करता येतील त्याचे मार्ग ते दाखवतात आणि वर्षे तीन ते दहा बाराची पोरं पोरी त्या कौशल्यांचे बाप होतात.


गो पालन! यात गायीची काळजी घेणं,गोठा साफ करणं,शेणखत  तयार करणं ,गायीवर माया करणं याच शाळेतला अभ्यासक्रम आहे.

परसबाग फुलवणं,झाडांना पाणी घालणं ही या शाळेची दैनंदिनी आहे.शाळेच्या भोवती असलेल्या कुंडीत पाणी जास्त झालं आणि शाळेत ओघळ आले तर बालवाडीच्या मुलांचे चिमुकले हात फडक्याने ते पाणी टिपतात आणि झाडांच्या मुळांशी जाऊन पिळतात.


मी मुलांसाठी नेलेला केळी हा खाऊ खाऊन झाल्यावर सालपटांचा खाऊ लगोलाग गोमातेच्या मुखी घातला गेला.


केशव गुरूजींनी या शाळेत जी किमया केली तिचा सुरूवातीचा प्रवास खडतरच होता.तो वृत्तांत त्यांच्याशी केलेल्या संभाषणातून सोबतच्या व्हीडीओमधून  कळेल.

या शाळेला भेट दिल्यावर प्रभावित होणार नाही तो माणूसच नव्हे.

अनेक दानशुरांनी या शाळेला भरघोस मदत केली आहे.

श्री रमेश आणि उमा अय्यर या दांपत्याने या शाळेच्या दोन वेळच्या भोजनाची कायमस्वरूपी जबाबदारी उचललेली आहे.

विशेष म्हणजे नव्या ईमारतीच्या उद्घाटन सोहळ्यासाठी आलेल्या उपमुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे आणि शिक्षणमंत्र्यांसह इतर मंत्रीही भाषणात जास्त वेळ न दवडता संपूर्णपणे विद्यार्थ्यांच्या बरोबरच बोलत होते.


शासनाने गुरूजींच्या कामाची दखल घेऊन त्यांच्या कामाच्या स्वातंत्र्यासाठी  आणि स्वातंत्र्यासाठी त्यांची बदली केलेली नाही.


या विद्यार्थ्यांना भारताच्या राजधानी दिल्लीत येण्याचे निमंत्रण खुद्द मा.पंतप्रधान श्री.नरेन्द्र मोदीजींनी दिले आहे.

या शाळेतले माजी विद्यार्थी MPSC च्या परीक्षेची तयारी करत आहेत.

इथल्या चिमुकल्यांना शास्त्रज्ञ , शेतकरी, चित्रकार,भाषाअभ्यासक,शिक्षक व्हायची स्वप्ने आहेत,त्यांच्या स्वप्नांना आकार देणारा कुशल हात केशव गुरूजींच्या रूपाने मुलांच्या पाठीशी आहे.आॕनलाईन आणि आॕफलाईन शिक्षणपद्धतीची डोळस सांगड त्यांनी घातली आहे.


त्यांची एकूलती मुलगी अनन्या ही सुद्धा बालवाडीत सगळ्यांबरोबरच शिकते आहे.तिनेही सगळी कौशल्ये आत्मसात करायला सुरूवात केली आहे.


गुरूजींनी आजवर नाटक सिनेमा यांची चैन केलेली नाही.घरातील लग्न असो की विघ्न यात ते जरुरीपीरताच सहभाग घेतात.पत्नी सविता आणि आईवडील भावंडं यांचा पूर्ण पाठिंबा गुरूजींना आहे.

 


बाकी माझ्यासारख्या सामान्य निवृत्त शिक्षिकेने तासादोन तासांच्या भेटीत

राजकारण,जातीधर्मकारण ,या बाहेर जाऊन संविधानाचे मर्म मुलांच्या मनात रुजवून त्यांचे शेत पिकवणा-या

व्यावहारिक प्रलोभनांपसून आश्चर्यकारक रितीने लांब रहाणा-या

 या ऋषितुल्य श्री.केशल गावित या गुरूजींची स्तोत्रे 

किती गावित ?


नाशिकमधल्या पारंपरिक तीर्थक्षेत्रांहून परमपवित्र असे हे प्रयासराज तीर्थ प्रत्येक शिक्षकाने जाऊन पहायला हवेच असे !



वैशाली पंडित.

Friday, 28 March 2025

स्वादिष्ट आगीनफुलांची*

 🌹⚜️🌹🔆🌅🔆🌹⚜️🌹


      🌻 *li.आनंदी°पहाट.il* 🌻


         *स्वादिष्ट आगीनफुलांची*

                                       

🌸🥀😋🌺🌶️🌺😋🥀🌸

       

        *आमचे शेतकरी धार्मिक प्रवृत्तीचे.. कष्टाळू आहेत. उन.. वारा.. पावसातही शेतातील कामे आनंदाने करतात. त्याचे कष्ट जाणवत नाहीत उलट कामात आनंद शोधतात. शेतात पिके डोलतात तेव्हा त्यांचा आनंद व्दिगुणीत होतो. त्यांच्या कष्टानेच आमच्या ताटात चौरस.. आरोग्यदायी स्वादिष्ट आहार प्राप्त होतो.*

        *मिरची.. आमच्या अन्नातील महत्त्वाचा घटक. मिरची मग ती हिरवी.. पिवळी वा लाल असो पण हवीच. मिरचीने पदार्थाची चव.. लज्जत वाढते. एवढेच नाही तर मिरचीमध्ये शरीरास आवश्यक असे अ,ब,क आणि ई जीवनसत्त्वे आहेत. कॅल्शियम.. फॉस्फरस खजिने पण आहेत. मिरचीमधील कॅपसायसीन पदार्थामुळे तिखट चव प्राप्त होते. भारतात तर मिरची अत्यंत लोकप्रिय. ताटातील पदार्थात मिरचीचा वापर हवाच हा आग्रह.*

        *मिरचीच्या उत्पादनात भारत हा जगातील प्रथम क्रमांकाचा देश. १५ पेक्षा जास्त प्रकारच्या मिरचीचे उत्पादन होते. आंध्र प्रदेशात गुंटुर प्रमाणेच महाराष्ट्रात नंदुरबार, भिवापूर, मांडळ, पथरोट येथे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. शेतात लहान लहान झाडावर लागलेल्या या मिरच्या तोडून टोपल्यात जमा करुन.. उन्हात वाळवून बाजारात विक्रीस येतात.*

        *डोक्यावर सूर्य आग ओकतो. घामाच्या धारा लागतात. तेव्हा या जहाल मिरच्या तोडून वाळविण्यासाठी जमिनीवर पसरल्या जातात. मिरच्या तोडणे.. जमिनीवर दूरवर पसरलेले लाली लाल मिरच्याचे ढीग बघणे सुखद असले तरीही डोक्यावर उन आणि ठसका यामुळे हे काम अत्यंत कष्टाचे ठरते.*

        *पण तरीही या कामात शेतकरी भगिनी आनंद शोधतात हे सांगणारे हे गाणे.*


🌹🌼🌾😋🌶️😋🌾🌼🌹


  *भर उन्हात जळते धरती,*

  *तिच्या काळजाला चटकं बसती* 

  *त्या ठिणग्या मातीतून फुलती,* 

  *त्यांचा माणसाकडं ओढा*


  *आगीनफुलं ही तोडा बायांनो,*

  *आगीनफुलं ही तोडा* 

  *लाल लाल मिरची तोडा बायांनो,*

  *लवंगी मिरची तोडा* 


  *ही किमया ग मायाळू धरतीची*

  *ही जादूगिरी मातीच्या पिरतीची*

  *दर वर्षाला बाग-फुलं नवतीची*

  *तिखट मिरची हिकडं पिकली,*

  *तिकडं उसाचा पेढा*


  *आली वयात ग,*

  *तांबूस पिवळी झाली*

  *कशी किरणानं उन्हात*

  *चमके लाली*

  *वर पांघरल्या पानांच्या*

  *हिरव्या शाली*

  *हलक्या हाती पिकली वेचा,*

  *कवळी कवळी तोडा*


🌹🌾😋🔆🌶️🔆😋🌾🌹


  *गीत : जगदीश खेबूडकर*  ✍️

  *संगीत : राम कदम*

  *स्वर : जयवंत कुलकर्णी,*

  *बकुळ पंडित, केशर सोलापूरकर,*

  *आणि कांचन*

  *चित्रपट : कुंकू माझं भाग्याचं*

  *(१९७२)*


  🎼🎶🎼🎶🎼    🎧


    *🌹🙏सुमंगल प्रभात🙏🌹*

                *२८.०३.२०२५*


🌻🥀🌸🎼🌺🎼🌸🥀🌻

गुढीपाडव्याला श्रीखंडच का खावे?" आयुर्वेद आणि श्रीखंड काय संबंध*

 *"गुढीपाडव्याला श्रीखंडच का खावे?" आयुर्वेद आणि श्रीखंड काय संबंध*


मराठी वर्षाची सुरुवात चैत्र महिन्यात गुढीपाडव्याच्या दिवसाने होते.हिंदू कालदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवसाला गुढीपाडवा साजरा केला जातो. या दिवशी घरोघरी बांबू, रेशमी वस्त्र,तांब्या, आंब्याची डहाळी, कडुनिंबाची कोवळी पाने, बत्ताशाची माळ यासारख्या शंभर टक्के नैसर्गिक आणि आरोग्यास पूरक असलेल्या गोष्टी वापरून गुढी उभारून त्याची पुजा केली  जाते.  बत्ताशाचा प्रसाद वाटला जातो आणि कडुनिंबाची चटणी खाल्ली जाते... असे म्हटले जाते की जी गोष्ट पूर्ण वर्षभर करायची असेल, ती वर्षाच्या पहिल्या दिवशी नक्कीच करावी..  म्हणूनच काय ते गुढीपाडव्याच्या दिवशी आहारात आपण गोडा पासून ते कडू पर्यंत सर्व चवीचा समावेश केलेला असतो...


या दिवशी गुढीला श्रीखंड पुरी चा  नेवेद्य आवर्जून दाखवला जातो.. आज आपण या श्रीखंड बद्दल थोडंसं जाणून घेऊया. आयुर्वेदात श्रीखंडला "रसाला" किंवा "शिखरिणी" म्हणतात. श्रीखंड या पदार्थाला पौराणिक संबंध सुद्धा आहे. महाभारतामधील भीम जेव्हा बल्लव, या नावाने स्वयंपाक करीत होता. तेव्हा हा खाद्यपदार्थ सर्वप्रथम तयार केला. या पदार्थांच्या सेवनामुळे श्रीकृष्णाला झोप आली. श्रीच्या दैनंदिन व्यवहारात यामुळे खंड पडला, म्हणूनच हा पदार्थ श्रीखंड म्हणून ओळखला जातो.


"आता गुढी पाडव्याला श्रीखंडच का खायचे?"

उन्हाळ्यातील उष्णतेचा सामना करताना थकवा येऊ नये, शरीरशक्‍ती टिकून राहावी यासाठी श्रीखंड हे रसायना प्रमाणे काम करते. म्हणजेच काय तर उन्हाळ्यात कडक उन्हामुळे ज्याचे शरीर अगदी शुष्क बनले आहे, ज्यांना उत्साह नाही,ज्यांना शरीराची पुष्टी हवी असेल त्यांना श्रीखंड हे अगदी उत्तम होय.  श्रीखंड हे पचायला थोडे जड असते, शिवाय हा थोडा आंबवलेला पदार्थ आहे, या दृष्टीने आयुर्वेदाने श्रीखंडाला लागणारे घटक व ते बनविण्याची कृती व्यवस्थित सांगून ठेवली आहे. पण आजकाल बरेच जण आयुर्वेदिक विधी न वापरता श्रीखंड बनवतात   यामुळे श्रीखंड बाधते..


"आता आयुर्वेदानुसार श्रीखंड कसे बनवावे हे आपण पाहू या"


प्रथम छान दही लावावे ते कधीही आंबट असू नये. चांगले दही लागल्यानंतर सूती अथवा तलम वस्त्रात बांधून पुरचुंडी तयार करून ते 7-8 तासा साठी टांगून ठेवावे. जे काही जल रहीत दही तयार झाले आहे त्याला आपण चक्का म्हणतो. 

 

आयुर्वेदिक श्रीखंड मध्ये चक्का हा खडीसाखर (मिक्सर ला बारीक करून घेणे)बरोबर फेटायचा आणि फेटायच्या भांड्याला कापराने धुपवलेले जाते आणि श्रीखंड पचविण्यासाठी लागणारा अग्नी मधरूपाने समाविष्ट असतो, श्रीखंडाच्या अन्नशुद्धीसाठी त्यात तूप हि टाकलेले असते. नंतर त्यात दालचिनी, नागकेशर, वेलची, मिरीपावडर, तमालपत्र, सुंठ याची पावडर करून मिसळले जाते. वरून थोडं केसर दूध घाला म्हणजे तुमचे आयुर्वेदिक श्रीखंड तयार होते. वरील विधी वरून हे लक्षात येते कि श्रीखंड जरी कफ वाढविणारे असले तरी त्याबरोबरीने अशा पदार्थांची योजना केलेली आहे त्यामुळे श्रीखंड कफवर्धक ठरत नाही.

 

थोडक्यात काय तर गुढीपाडव्याच्या परंपरेचा आरोग्य अर्थ जाणून घेवून हा सण साजरा केला पाहिजे म्हणजे येणारे नवीन वर्ष सुख,समृद्धीने युक्त आणि आरोग्याने परिपूर्ण नक्कीच होईल.


 !!अवधूत चिंतन  श्रीगुरुदेव दत्त  !!

गुढीपाडवा* 🌸साडेतीन मुहूर्तांपैकी एक

 🌸 *गुढीपाडवा* 🌸



हिंदु वर्षातील पहिला सण अर्थात *‘गुढीपाडवा’*. हिंदु वर्षारंभाचा प्रारंभदिवस *‘चैत्र शुद्ध प्रतिपदा*’ हा आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदेस वर्षारंभ करण्यास अर्थात गुढीपाडवा साजरा करण्यास नैसर्गिक, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक कारणे आहेत.


गुढीपाडवा :-  साडेतीन मुहूर्तांपैकी एक

गुढीपाडवा, अक्षय्य तृतीया आणि दसरा म्हणजे प्रत्येकी एक अन् कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे अर्धा, असे साडेतीन मुहूर्त आहेत. या साडेतीन मुहूर्तांचे वैशिष्ट्य असे की, इतर दिवशी कोणत्याही शुभकार्यासाठी मुहूर्त पहावा लागतो; या दिवशी मात्र मुहूर्त पहावा लागत नाही. या दिवसांतील कोणतीही घटिका शुभमुहूर्तच असते.


*गुढीपाडव्याचे महत्त्व*


*अ. नैसर्गिक महत्त्व – वसंत ऋतूच्या प्रारंभाचा दिवस*


ज्योतिषशास्त्रानुसार पाडव्याच्या आसपासच सूर्य वसंतसंपातावर येतो *(संपात बिंदू म्हणजे क्रांतीवृत्त आणि विषुववृत्त ही दोन वर्तुळे ज्या बिंदूत परस्परांस छेदतात तो बिंदू होय.)* आणि वसंत ऋतू चालू होतो. सर्व ऋतूंत ‘कुसुमाकरी वसंत ऋतू ही माझी विभूती आहे’, असे भगवंतांनी श्रीमद्भगवद्गीतेत (१०:३५) म्हटले आहे. या वेळी हवामान समशीतोष्ण आणि उत्साहवर्धक असते. शिशिर ऋतूत झाडांची पाने गळून गेलेली असतात, तर पाडव्याच्या सुमारास झाडांना नवी पालवी येत असते. वृक्षवल्ली टवटवीत दिसतात.


*आ. गुढीपाडवा : ऐतिहासिक महत्त्व*


१. रामाने वालीचा वध केल्याचा दिवस


रामाने वालीचा वध या दिवशी केला.


२. शालिवाहन शक चालू झाल्याचा दिवस !


*शकांनी हुणांचा पराभव करून विजय मिळविला तोही हाच दिवस अर्थात् गुढीपाडवा. या दिवसापासूनच शालिवाहन शक सुरू झाले; कारण या दिवशी शालिवाहनाने शत्रूवर विजय मिळविला.*


ही गुढीपाडवा हा वर्षारंभ साजरा करण्यामागील ऐतिहासिक कारणे आहेत.


*इ. गुढीपाडवा : आध्यात्मिक महत्त्व*


१. सृष्टीची निर्मिती म्हणजेच सत्ययुगाच्या प्रारंभाचा दिवस


*ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली, म्हणजे सत्ययुगाला सुरुवात झाली, तो हा दिवस असल्याने या दिवशी वर्षारंभ केला जातो.*


२. गुढीपाडवा हा पृथ्वीचा वर्षारंभदिन


*‘गुढीपाडव्याला सुरू होणारे नवीन वर्षाचे कालचक्र हे विश्वाच्या उत्पत्तीकाळाशी निगडित असल्याने सृष्टी नवचेतनेने भारित झालेली असते.*


३. प्रजापति-संयुक्तलहरी पृथ्वीवर जास्त प्रमाणात येतात.


*गुढीपाडव्याच्या दिवशी करावयाच्या धार्मिक कृती*


१. गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून प्रथम अभ्यंगस्नान करावे. अभ्यंगस्नान करतांना देशकालकथन करतात.


२. स्नानानंतर आम्रपल्लवांची तोरणे सिद्ध करून प्रत्येक द्वाराशी लाल फुलांसहित बांधावी; कारण लाल रंग शुभदर्शक आहे.


३. प्रथम नित्यकर्म देवपूजा करतात. ‘वर्षप्रतिपदेला महाशांती करायची असते. शांतीच्या प्रारंभी ब्रह्मदेवाची पूजा करतात; कारण या दिवशी ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली.


४. या दिवशी विजयाचे प्रतीक म्हणून सूर्योेदयाच्या वेळी शास्त्रशुद्ध गुढी उभारली जाते.


५. याचकांना अनेक प्रकारची दाने द्यावीत, उदा. पाणपोईद्वारा उदकदान. याने पितर संतुष्ट होतात. ‘धर्मदान’ हे सर्वश्रेष्ठ दान आहे, असे शास्त्र सांगते. सध्याच्या काळात धर्मशिक्षण देणे, ही काळाची आवश्यकता आहे.


६. ज्योतिषाचे पूजन करून त्याच्याकडून किंवा ‘उपाध्याकडून नूतन वर्षाचे पंचांग अर्थात् वर्षफल श्रवण करतात.


७. पंचागश्रवणानंतर कडुनिंबाचे मिश्रण वाटायचे असते. या चूर्णामध्ये कडुलिंबाची पाने, फुले, मिरी, हिंग, मीठ, ओवा, साखर इत्यादी पदार्थ चूर्ण करून ते चिंचेत कालवून भक्षण करावे.


८. या दिवशी भूमीत नांगर धरावा.


९. नाना प्रकारची मंगल गीते, वाद्ये आणि पुण्यपुरुषांच्या कथा ऐकत हा दिवस आनंदाने घालवावा.


*▫️माहिती आणि संकलन :- महेश मयेकर*

👑 *•|| हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान राजापूर ||•* 🚩

Saturday, 22 March 2025

शिरसोनपाडा येथील दुर्घटनेसंदर्भात कंत्राटदारावर गुन्हा दाखल

 शिरसोनपाडा येथील दुर्घटनेसंदर्भात

कंत्राटदारावर गुन्हा दाखल

पाणी पुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे

 

मुंबईदि. २१ :-  डहाणू (जि. पालघर) तालुक्यातील शिरसोन पाडा येथे पाण्याच्या टाकीवरून पडून जिल्हा परिषद शाळेतील दोन मुलींचा मृत्यू व एक मुलगी जखमी झाली. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या दोन मुलींच्या कुटुंबीयांना दीड लाखाची मदत देण्यात येणार आहे. या पाण्याच्या टाकीचे काम केलेल्या कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहेअशी माहिती पाणी पुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या उत्तराप्रसंगी दिली.

राज्यमंत्री श्रीमती बोर्डीकर साकोरे यांनी सांगितले कीया दुर्घटनेची प्राथमिक चौकशी केली असता पाण्याचा टाकीचा प्लॅटफॉर्म कमकुवत असल्याचे निदर्शनास आले. या संदर्भात

दोषी  असलेल्या एका कंत्राटी अभियंत्याची सेवा समाप्त तर  उप विभागीय अभियंता यांच्यावर प्रशासकीय कारवाई आणि कार्यकारी अभियंता यांची  चौकशी  करण्यात येत आल्याचेही त्यांनी सांगितले.

पालघर जिल्ह्यातील पाणी पुरवठा संदर्भात राज्यमंत्री श्रीमती बोर्डीकर-साकोरे यांनी सांगितलेजिल्हा परिषद मार्फत राबविण्यात येत असलेल्या ५६२ नळ पाणी पुरवठा योजनांपैकी १५२ नळ पाणी पुरवठा योजनांची कामे १०० टक्के भौतिकदृष्ट्या पूर्ण झाली असून उर्वरित ४१० नळ पाणी पुरवठा योजनांची कामे विविध टप्प्यावर प्रगतीपथावर आहेत.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत राबविण्यात येत असलेल्या २६ प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनांपैकी एक योजनेचे काम पूर्ण झाले असून २५ नळ पाणीपुरवठा योजनेची कामे प्रगतीपथावर असल्याचेही त्यांनी सांगितले.

जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामांची निविदा प्रक्रिया राबवून कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत राबविण्यात येत असलेल्या २६ योजनांची कामे वेगवेगळ्या ६ कंत्राटदारांमार्फत  करण्यात येत आहेत. तसेच जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येत असलेली ५६२ योजनांची कामे वेगवेगळ्या ११० कंत्राटदारांमार्फत करण्यात येत आहेत.

वसई-विरार महापालिका क्षेत्रातील ५२ गावातील पाणी पुरवठाबाबत देखभाल  दुरुस्ती व्यवस्थापन महामालिकेमार्फत करण्यात येत आहे. तसेच उर्वरित ग्रामीण क्षेत्रातील १७ गावांसाठी जिल्हा परिषद महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व महापालिकेचे प्रतिनिधी मिळून संयुक्त समिती स्थापन करावी व या योजना कार्यान्वित करून जिल्हा परिषदकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्याचेही राज्यमंत्री श्रीमती बोर्डीकर साकोरे  यांनी सांगितले.

या संदर्भात सदस्य राजेंद्र गावित यांनी विधानसभेत लक्षवेधी उपस्थित केली होती.

Friday, 21 March 2025

हे स्टींग विष आहे लहान मुलांना सांगा, जनहित


 

आदिवासींचे स्थलांतर रोखण्यासाठी स्थानिक रोजगारनिर्मितीला प्राधान्य

 आदिवासींचे स्थलांतर रोखण्यासाठी स्थानिक रोजगारनिर्मितीला प्राधान्य

- आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके

 

मुंबईदि. 19 : आदिवासी बांधवांचे रोजगारासाठी होणारे स्थलांतर रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबविल्या जात आहेत. या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीमधून स्थानिक पातळीवर रोजगाराच्या अधिक संधी निर्माण करण्यावर भर दिला जात आहेअशी माहिती आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी दिली.

आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांच्या अध्यक्षतेखाली शूर झलकारी कातकरी एकता महासंघाच्या प्रमुख पदाधिकारी यांच्यासमवेत बैठक झाली. कातकरी समाजाच्या विविध मागण्याबाबत निवेदन यावेळी देण्यात आले.

यावेळी आमदार राजेंद्र गावितआमदार हरिश्चंद्र भोयेआदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त गोपीचंद कदम उपस्थित होते.

आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके म्हणालेराज्य शासन आदिवासी समाजाच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी विविध रोजगारनिर्मिती योजनाकौशल्यविकास उपक्रम आणि स्वयंरोजगार प्रकल्प राबवत आहे. स्थानिक स्तरावरच आदिवासी तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहेजेणेकरून त्यांना स्थलांतराची गरज भासू नये. कातकरी समाजाचे आर्थिक सक्षमीकरण तसेच त्यांचे स्थलांतर रोखण्यासाठी आगामी काळात नवीन योजना तयार करून त्यासाठी स्वतंत्र निधीची तरतूद करण्यात येईल. असेही डॉ उईके यांनी सांगितले.

0000

Thursday, 20 March 2025

अंतराळवीर सुनीता विल्यम yanc m यांचा थरार प्रवास

 *सुनीता विल्यम्ससह चारही अंतराळवीर परतले पृथ्वीवर; कसा होता परतीच्या प्रवासाचा थरार?*


भारतीय वंशांच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे दोघेही परतीच्या प्रवासासंदर्भातील सर्व प्रकारचे अडथळे दूर करत आता पृथ्वीवर परतले आहेत.


हे दोघेही तब्बल 9 महिने अंतराळात अडकून पडले होते.


'ड्रॅगन' या स्पेसएक्सच्या अंतराळयानामधून आणखी दोन अंतराळवीर त्यांना परत आणण्यासाठी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे झेपावले होते.


खरंतर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर या दोन अंतराळवीरांनी 5 जून 2024 रोजी परीक्षणयान असलेल्या स्टारलायनरमधून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे झेप घेतली होती.


तिथे आठ दिवस घालवल्यानंतर ते परतणार होते; मात्र, त्यांच्या अंतराळयानामध्ये बिघाड झाल्यामुळे हे दोघेही तिथेच अडकून पडले होते.


सरतेशेवटी, आज म्हणजेच भारतीय वेळेनुसार 19 मार्चच्या पहाटे सर्व अंतराळवीर सुखरुपपणे परतले आहेत.


*कसा झाला परतीचा प्रवास?*

खरं तर कोणतीही अंतराळ मोहिम ही जोखमीची असते. त्यात अंतराळात अडकून पडल्यानंतर या दोन अंतराळवीरांबद्दल काळजी वाटणं अगदीच स्वाभाविक होतं. संपूर्ण जगाचं लक्ष या मोहिमेकडे लागलेलं होतं.


सर्व प्रकारचे अडथळे दूर करत तब्बल नऊ महिन्यांनंतर त्यांना परत आणण्यासाठी स्पेसएक्स 'ड्रॅगन फ्रीडम'च्या लँडिंगसाठी समुद्रातल्या 8 लँडिग साईट्स ठरवण्यात आल्या होत्या.


फ्लोरिडाच्या समुद्रात होणारा अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवरचा हा शेवटचा स्प्लॅश डाऊन होता. 6 वर्षं फ्लोरिडाच्या समुद्रात स्प्लॅश डाऊन - रिकव्हरी केल्यानंतर पुढच्या मोहीम अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावरच्या समुद्रात स्प्लॅश झाला. टॅलाहासी हा निवडलेला लँडिंग झोन होता, कारण इथलं हवामान रिकव्हरीसाठी योग्य होतं.


पृथ्वीच्या वातावरणात शिरल्यानंतर कॅप्सूल भोवतीचं बाहेरचं तापमान वाढत असताना PICA 3.0 हीटशील्डने ड्रॅगन फ्रीडमला संरक्षण दिलं.


दरम्यानच्या काळात अंतराळवीरांनी घातलेल्या स्पेससूट्समधून थंड हवा खेळवली गेली, जेणेकरून त्यांच्या शरीराचं तापमान कमी राहायला मदत होते. ड्रॅगन फ्रीडमला सोसावं लागणारं सर्वोच्च तापमान 1926.667 सेल्शियस म्हणजे 3500 फॅरनहाईट् इतकं होतं.

फ्रीडम कॅप्सूल पृथ्वीच्या वातावरणातून जमिनीच्या दिशेने येत असताना मधला काही काळ कॅप्सूलसोबतचा संपर्क काही मिनिटांसाठी तुटला. हा सामान्य प्रक्रियेचा भाग असतो. काही काळाने हा संपर्क पुन्हा प्रस्थापित झाला.


वातावरणात शिरण्यापूर्वी क्रू ने खिडकीच्या झडपा बंद केल्या, त्यांच्या हातातले टॅब्लेट्स आणि इतर गोष्टी ठेवून दिल्या आणि हार्नेस घट्ट केली.


ड्रॅगन हे ऑटॉमॅटिक मोडवर प्रवास करत होतं. म्हणजे ते स्वतःचा मार्ग स्वतः ठरवतं. क्रू यावर फक्त लक्ष ठेवून होता.


WB57 हाय अल्टिट्यूड विमानाद्वारे ड्रॅगन फ्रीडमच्या पृथ्वी प्रवासाची दृश्यं दिसत होती.


ड्रॅगन फ्रीडम पृथ्वीच्या वातावरणात शिरल्यानंतर आपोआपच वेगवेगळ्या वेळी पॅराशूट्स उघडली. याने कॅप्सूलचा भाग वेगळा झाला. पॅराशूट्सची पहिली जोडी कॅप्सूल 18000 फुटांवर आल्यावर उघडलं. तर दुसरी मुख्य जोडी 6500 फुटांवर उघडली. यानंतर चार पॅराशूट्सच्या मदतीने ड्रॅगन फ्रीडम कॅप्सूल तरंगत खाली आलं.


भारतीय वेळेनुसार 19 मार्चच्या पहाटे 3 वाजून 27 मिनिटांनी स्प्लॅश डाऊन झाला.


*क्रू नाईन बॅक ऑन अर्थ... वेलकम होम'*

अंतराळवीरांचा स्पेस स्टेशन ते पृथ्वीवरचा प्रवास हा सुमारे 17 तासांचा होता.


"क्रू नाईन बॅक ऑन अर्थ... वेलकम होम" अशी घोषणा ग्राऊंड कंट्रोलने करत अंतराळवीरांचं स्वागत केलं.


ड्रॅगन कॅप्सूल समुद्रात कोसळल्यानंतर पॅराशूट्स ऑटोमॅटिकली कॅप्सूलपासून वेगळी झाली. असं केल्याने पॅराशूट्सोबत कॅप्सूल प्रवाहात ओढली जात नाही.


रिकव्हरी क्रू ड्रॅगन फ्रीडम पर्यंत पोहोचे पर्यंत ग्राऊंड कंट्रोल आणि कॅप्सूलमधल्या अंतराळवीरांमध्ये संवाद सुरू होता. मुख्य रिकव्हरी टीम्सना इथे पोहोचेपर्यंत 30 मिनिटांचा काळ लागला.


त्याआधी फास्ट बोट्स इथे पोहोचल्या त्यांनी समुद्रात पडलेली पॅराशूट्स गोळा केली. शिवाय समुद्रात तरंगणाऱ्या कॅप्सूलचे काही सेफ्टी चेक्सही करण्यात आले. पुढच्या रिकव्हरी टीमला स्पेसक्राफ्टपर्यंत येणं सोपं आहे का, हे तपासण्यात आलं.


त्यानंतर स्पेसएक्सच्या फ्लाईट सर्जननी कॅप्सूलमधल्या अंतराळवीरांशी संवाद साधला. अंतराळवीरांच्या तब्येतीबद्दल जाणून घेण्यात आलं.


मुख्य रिकव्हरी टीम येईपर्यंत आधी पोहोचलेल्या टीमने समुद्रातल्या तरंगणाऱ्या कॅप्सूलला उघडण्यासाठीची आणि ही कॅप्सूल उचलण्यासाठीची तयारी केली.


या तरंगणाऱ्या कॅप्सूलच्या आजूबाजूला डॉल्फिन्सही दरम्यानच्या काळात पहायला मिळाले.


मेगन नावाच्या रिकव्हरी जहाजाला ही कॅप्सूल जोडण्यात आली. नासाच्या अंतराळवीर मेगन आर्थर यांच्यावरून या जहाजाला हे नाव देण्यात आलंय. जवळ ओढल्यानंतर ही कॅप्सूल उचलून जहाजाच्या प्लॅटफॉर्मवर ठेवण्यात आली.


स्पेसक्राफ्टच्या बाहेरच्या बाजूला समुद्राचं खारं पाणी लागल्याने या पत्र्याची झीज होते. म्हणूनच कॅप्सूलवर गोडं पाणी मारून समुद्राचं पाणी काढलं जातं.


यानंतर ड्रॅगन कॅप्सूलच्या एका बाजूला असणारा दरवाजा 'साईड हॅच' उघडण्यात आला. पृथ्वीवरून उड्डाण करताना आत शिरण्यासाठी आणि पृथ्वीवर परतल्यानंतर अंतराळवीरांना बाहेर काढण्यासाठी या हॅचचा वापर केला जातो.


हॅच उघडल्यानंतर वैदयकीय टीमपैकी एकजण कॅप्सूलमध्ये गेला. तर रिकव्हरी टीमने अंतराळवीरांना बाहेर काढण्यासाठी कॅप्सूलमधून बाहेर येणारा रॅम्प बसवला.


ड्रॅगन फ्रीडम कॅप्सूलमध्ये मधल्या दोन सीट्सवर बसलेल्या अंतराळवीरांना आधी बाहेर काढण्यात आलं. सगळ्यात आधी नासाचे अंतराळवीर निक हेग यांना बाहेर काढलं गेलं. त्यानंतर रशियन कॉस्मोनॉट अलेक्झांडर गोर्बोनॉव्ह, नासा अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना कॅप्सूल बाहेर काढण्यात आलं.


क्रूला कॅप्सूलमधून बाहेर काढल्यानंतर अंतराळवीरांना स्ट्रेचरवर ठेवलं गेलं. हा नेहमीच्या प्रक्रियेचा भाग आहे. रिकव्हरी टीम्समध्ये डॉक्टर्सचाही समावेश असतो. हे डॉक्टर्स पृथ्वीवर परतलेल्या अंतराळवीराच्या तब्येतीची प्राथमिक तपासणी करतात. दीर्घकाळ अंतराळात घालवून पृथ्वीवर परतणाऱ्या अंतराळवीरांना बाहेर काढण्यासाठीची आणि त्यानंतरची प्रक्रिया ठरलेली असते.


ड्रॅगन स्पेसक्राफ्ट उचलून क्रूला बाहेर करण्यासाठी साधारण तासाभराचा काळ लागला. मेडिकल चेकअप नंतर चार तासांत क्रू जमिनीवर परतेल. आणि अधिकची वैद्यकीय मदत लागली नाही तर क्रू नासाच्या विमानाने ह्यूस्टनला जाईल आणि हे अंतराळवीर कुटुंबीयांना - मित्रमंडळींना भेटतील.



*समुद्रभाजी पुराण*

 *समुद्रभाजी पुराण*


मोदका पेक्षा *मोदकं* (एक लहान मासा) आवडणारे काही लोक असतात.


आंबटपणा नसून देखील कैरी, चिंच किंवा आवळ्याप्रमाणेच तोंडाला पाणी सुटवण्याची ताकद माशांमध्ये असते.


मांदेली, मोदकं या सारखे मासे मोजून खाल्ले तर गणित हमखास चुकतं.


कुठला काटा काढायचा, कुठला खाऊन टाकायचा आणि कुठल्या काट्याच्या वाट्याला जाऊ नये ही आयुष्यातील गणितं मासेच शिकवतात.


बोंबील वाढल्यावर जरा काटा काढून दे असं म्हणणारा ओरिजिनल फिशलव्हर नसतो.


पेग भरलेला असताना पेगकडे दुर्लक्ष करायला लावण्याची ताकद छोट्या छोट्या तळलेल्या कोलंबी मध्ये असते.


कितीही मासे खाल्ले तरी, आज खूप जेवण झालं, अंगावर आलंय वगैरे प्रकार होत नाहीत. 


'चार दिवस तेच खातोय, आता किमान आठवडा भर तरी नको' हे वाक्य मटण, चिकन, अंडी किंवा अगदी कडधान्यं, भाज्या खाऊन सुद्धा बोललं तरी चालतं, पण मासे खाऊन.......केवळ अशक्य. 


सुरमई ताजी नाही, आज रावस घेऊन जा असं सांगणाऱ्या व्यक्तीबरोबर घनिष्ठ मैत्री करावी.


आम्ही फक्त सुरमई, पापलेट, कोलंबी आणि हलवा खातो... हे आम्ही फिरायला फक्त लंडनलाच जातो म्हणण्यासारखं आहे.


टूरवर गेले असताना जेवण्याच्या वेळी ‘इथे मासे कुठे चांगले मिळतात हो?’ हा प्रश्न (कोणत्याही भाषेत) विचारणारे हे उत्तम सहप्रवासी असतात असा माझा अनुभव आहे. 


मासे शिजवायच्या आमटी, कालवण, रस्सा, तिखलं, करी किंवा भाजी अशा अनेक रेसिपी असतात. फक्त एकाच प्रकारची रेसिपी सगळ्या माशांना नाही चालत.


वांग्याच्या भाजीत जवळा, करंदी, सोडे घातले  तर चव सुधारते. पण जवळा, करंदी किंवा सोड्याच्या भाजीत वांगी मिक्स केली तर मजा कमी होते.


मोरी (शार्क) मटनासारखी बनवायची नसते. मोरी ही मोरी सारखीच बनवायची असते.


बोंबलाचा बदकाशी काही संबंध नाही. त्याला बॉम्बे डक हे नाव मुंबई वरून पोस्ट किंवा डाक ज्या ट्रेनने जायची त्या ट्रेन मधून नेले गेल्यामुळे पडले. बॉम्बे डक. दिल्ली, इंदोर, लखनौ सारख्या काही प्रदेशातल्या जेवणाला सर्वोत्तम समजणाऱ्या लोकांचा बहुदा जलचरांबरोबर परिचय झालेला नसतो. 


देशातल्या कुपोषणासारख्या भीषण समस्या फक्त माशांच्या आहारातल्या समावेशाने नियंत्रणात आणल्याच्या घटना नोंदल्या गेल्या आहेत. 


सुक्या माशांचं एक स्वतंत्र विश्व आहे. त्यांना 'तेच ते' म्हणणाऱ्यांनी फक्त हराभरा कबाब खावा.


🦈🐟🐠🦐🦞🦀


।। इति श्री मत्स्यपुराणम् समाप्तम् ।।

Featured post

Lakshvedhi