Showing posts with label सामाजिक. Show all posts
Showing posts with label सामाजिक. Show all posts

Sunday, 22 February 2026

किती आहे हे महत्वाचे नसुन हक्काचे आहे ह्याला महत्व आहे

 आई, तु पण ना… काय हे? बाबांच्या फक्त १२,००० रुपयांच्या पेन्शनसाठी इतकी धावपळ कशाला? 😒

आपण आपल्या एका कर्मचाऱ्याला यापेक्षा जास्त पगार देतो…

मोहित चिडून आईला म्हणाला. State Bank of India च्या लांब रांगेत उभं राहण्यापेक्षा घरी जाऊ या असा तो आग्रह करू लागला.


मोहितचं म्हणणं काही अंशी खरंच होतं. त्यांचा कोट्यवधींचा व्यवसाय होता 💼💰. वर्षभरात लाखो रुपये पगार-भत्त्यांत जात होते. मग फक्त १२,००० रुपयांसाठी इतका वेळ का घालवायचा?

मोहितचे वडील एकनाथराव गेल्या महिन्यात अल्पशा आजाराने वारले होते 😔. ते सरकारी शाळेत प्राध्यापक होते आणि १२ वर्षांपूर्वी निवृत्त झाले होते. त्यांना पेन्शन मिळत होती. त्यांच्या निधनानंतर शासनाच्या नियमानुसार अर्धी पेन्शन त्यांच्या पत्नी सरला यांना मिळणार होती. त्यासाठीच आज त्या बँकेत औपचारिकता पूर्ण करण्यासाठी आल्या होत्या.


त्या दिवशी मोहितचा मुलगा कुशाग्रचा आठवा वाढदिवस होता 🎂🎉. त्याने आजीकडे सायकलची मागणी केली होती 🚲. सरलाताईंच्या खात्यात फारसे पैसे उरले नव्हते. म्हणून त्यांनी मोहितकडे १०,००० रुपये मागितले.

मोहित ऑफिसला निघायच्या तयारीत होता. थोडं आश्चर्याने पाहून त्याने पत्नी श्रेयाला आईला पैसे द्यायला सांगितले.

श्रेयाने पैसे देताना हलकंसं म्हणाली,

“आजकाल खूप मंदी आहे बरं का… जरा सांभाळून खर्च करा.” 💬


संध्याकाळी सरलाताईंनी त्या पैशांतून कुशाग्रसाठी सायकल घेतली 🚲😊 आणि घरात पुन्हा हशा-आनंद पसरला.

पण पुढच्या आठवड्यात मोहितची मोठी बहीण माहेरी आली. आधी एकनाथजी जिवंत असताना सरलाताईंना कधीच पैशांसाठी कुणाकडे पाहावं लागत नव्हतं. ते स्वतःच पेन्शनमधून त्यांना थोडेफार पैसे देत असत ❤️.


आता मात्र मुलीच्या निरोपासाठीही त्यांना सुनबाईकडे हात पसरावा लागला. श्रेयाचे तेच शब्द त्यांच्या मनात घुमत होते —

“मंदी आहे… जपून खर्च करा…” 😞

मन खट्टू करून त्या मुलीला रिकाम्या हाताने निरोप देऊ लागल्या, तेवढ्यात श्रेया स्वतः पुढे आली आणि २००० रुपये त्यांच्या हातात ठेवत म्हणाली,

“मुलीला रिकाम्या हाताने कसं पाठवणार?”

पण त्या शब्दांत आपलेपणा कमी आणि टोमणा जास्त होता… हे सरलाताईच्या मनाला जाणवलं 💔.


सरलाताईंच्या आयुष्यात पैशांची खरी कमतरता नव्हती. औषधं, रिचार्ज, छोट्या गरजा—मोहित लगेच पैसे देत असे. पण मंदिरात दान करायचं असो 🛕, सणासुदीला नोकरांना काही द्यायचं असो 🎁, नातेवाईकांना भेट द्यायची असो… प्रत्येक वेळी मागणं त्यांच्या स्वाभिमानाला टोचत होतं.


अलीकडे त्यांची बहीण आली होती. तिची आर्थिक परिस्थिती बेताची होती. तिला मदतीची अपेक्षा होती. पण सरलाताई स्वतःच पैशासाठी सुनेकडे पाहताना दिसल्यावर तिने काहीच मागितलं नाही 😔.

आणि मग एक दिवस… 📱

मोबाईलवर मेसेज आला — State Bank of India कडून.

सहा महिन्यांची पेन्शन — ७२,००० रुपये — त्यांच्या खात्यात जमा झाल्याचा संदेश होता 💳✨

सरलाताई जवळच्या ATM मधून १०,००० रुपये काढून घरी येत होत्या. त्यांच्या चालण्यातला आत्मविश्वास, चेहऱ्यावरचे तेज सांगत होतं — पेन्शनला “सन्मान निधी” का म्हणतात ते 💖🙏


कोट्यवधींच्या संपत्तीपेक्षा त्यांच्या पतींच्या त्या १२,००० रुपयांच्या पेन्शनमध्ये त्यांना अधिक वजन, अधिक आधार आणि सर्वात महत्त्वाचं — स्वाभिमान जाणवत होता.

Saturday, 21 February 2026

श्रीलंकेत माजी अध्यक्ष आणि खासदारांचे पेन्शन रद्द.*

 *श्रीलंकेत माजी अध्यक्ष आणि खासदारांचे पेन्शन रद्द.*

-----------------------------

-- प्रमोद कुलकर्णी, पुणे

-----------------------------

श्रीलंकेच्या पार्लमेंट सदस्यांनी १७ फेब्रुवारी २०२६ रोजी इतिहास घडवला.

सरकारने, निवडणूकपूर्व प्रचाराचे एक महत्त्वाचे आश्वासन पूर्ण करण्यासाठी, संसदेच्या सर्व माजी सदस्यांचे पेन्शन रद्द करण्यासाठी एक बील संसदेत मांडले होते. १७ फेब्रुवारी, मंगळवारी, संसदेत त्यावर मतदान झाले. सदस्यांनी प्रचंड मताधिक्याने हे बील मंजूर केले. २२५ सदस्यांच्या सभागृहात १५४ मतांनी ४९ वर्षे जुना संसदीय पेन्शन कायदा रद्द करण्याचे विधेयक मंजूर केले गेले. फक्त दोन सदस्यांनी विरोधात मत दिले. बाकी सदस्य गैरहजर होते.

देशाच्या आर्थिक संकटावर जनतेचा रोष असल्याने हे पाऊल उचलण्यात आले.

श्रीलंकेत, पाच वर्षे संसद सदस्य म्हणून राहिल्यानंतर,आणि त्याच्या किंवा तिच्या मृत्यूनंतर त्यांच्या विधवेला/विधुराला पेन्शन मिळण्याचा अधिकार होता. नवीन कायद्यामुळे असे सर्व पेमेंट आणि पेन्शन बंद झाले आहे.

२०२४ मध्ये झालेल्या निवडणुकीत सत्तेत आलेले राष्ट्रपती अनुरा कुमार दिसानायके यांनी त्यांच्या निवडणूक प्रचारादरम्यान ही प्रथा बंद करण्याचे वचन दिले होते.

यापूर्वी दिसानायके यांच्या सरकारने सप्टेंबर २०२५ मध्ये लोकांच्या मागणीला प्रतिसाद म्हणून माजी राष्ट्रपतींना देण्यात येणारे भत्ते रद्द केले होते. त्यामध्ये माजी राष्ट्रपती आणि त्यांच्या विधवांसाठी घरे, भत्ते, पेन्शन, सरकारी निधी असलेल्या इंधनासह लक्झरी वाहने, अंगरक्षक, कार्यालय आणि कर्मचारी यांचा समावेश होता. हे सर्व आता रद्द करण्यात आले आहे. सध्या पाच माजी राष्ट्रपती आणि एक विधवा या सोयी सुविधा उपभोगत होते.

न्यायमंत्री हर्षणा नानयक्कारा यांनी संसदेत पेन्शन रद्द करण्याचे विधेयक सादर केले आणि त्यावेळी म्हटले की निवडणुकीतील आश्वासन आता पूर्ण झाले आहे आणि देश सर्वात वाईट आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी संघर्ष करत असताना 

कायदेकर्त्यांना पेन्शन मिळण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. त्यांनी पुढे जे सांगितले ते अतिशय विचार करायला लावणारे आणि धाडसी होते. ते म्हणाले, *"जेव्हा लोक या सभागृहातल्या चर्चेचा दर्जा आणि सदस्य संसदेत काय बोलतात ते पाहतात तेव्हा त्यांना संसद सदस्य पेन्शन मिळण्यास पात्र वाटत नाहीत,"*

पेन्शन रद्द करण्याच्या विधेयकाला विरोध करणारे विरोधी पक्षनेते साजित प्रेमदासा यांची प्रतिक्रिया अत्यंत अनाकलनीय होती. त्यांनी आक्षेप घेतला आणि म्हटले की, पद सोडल्यानंतर आमदारांना सामाजिक सुरक्षा मिळावी यासाठी पेन्शन आवश्यक आहे. अन्यथा, निवृत्तीनंतर स्वतःचे भविष्य सुनिश्चित करण्यासाठी भ्रष्टाचाराद्वारे संपत्ती जमवण्याचा मोह त्यांना होऊ शकतो.

अश्या प्रकारे सर्व माजी अध्यक्ष, खासदार यांना मिळणारे पेन्शन आणि सुविधा श्रीलंकेत बंद झाल्या आहेत.

देशहिताचा विचार करून स्वतःचेच भविष्यातील आर्थिक फायदे रद्द करण्याचे विधेयक मंजूर करणारे श्रीलंकन संसद सदस्य नक्कीच अभिनंदनास पात्र आहेत.

-----------------------------

१९ फेब्रुवारी, २०२६.

Sunday, 15 February 2026

*हृदयपरीवर्तनी महाशिवरात्रीची*

 🚩⚜🚩🔆🕉🔆🚩⚜🚩


      🌻 *li.आनंदी°पहाट.il* 🌻


            ⚜️⚜️⚜️⚜️⚜️

    *हृदयपरीवर्तनी महाशिवरात्रीची* 

            ⚜️⚜️⚜️⚜️⚜️


🚩🔱🚩🔆🙏🔆🚩🔱🚩  

  

        *ॐ त्र्यम्बकं यजामहे*

        *सुगन्धिं पुष्टिवर्धनम् ।*

        *उर्वारुकमिव*

        *बन्धनान्मृत्योर्मुक्षीय*

        *मामृतात् ॥*


        *आज महाशिवरात्र. महाराष्ट्रात तर महाशिवरात्रीचा उत्साह आगळा. इथे गावॊगाव शिवमंदिर आहेत.. यात्रा भरल्यात. इथे त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर, भीमाशंकर, औंढा नागनाथ, परळी वैजनाथ अशी पाच ज्योतिर्लिंग आहेत. छत्रपती शिवरायांनी शिवाचे आशीर्वाद घेत हिंदवी स्वराज्याची प्रतिज्ञा केली होती जी पूर्ण केली.*

        *शिवोहम.. म्हणजे मीच सतचित आनंद.. प्रकाश स्वरुप 'शिव' आहे. तोच कृपाभाव, त्यागीवृत्ती, परमोच्च ज्ञान मला आहे. 'मी' आणि 'तो' एकच आहे. सृष्टीतील आदि शिवाप्रमाणेच मी पण समोरच्यामध्ये स्वतःला बघतो. तीच ज्योत माझ्यात आहे. तोच पवित्र 'शिव' भाव.. प्रेमभाव, समर्पणवृत्ती माझ्यात आहे.*    

        *आज हाच शिवभाव प्राप्त करण्यासाठी भक्त शिवाला शरण जाणार. ब्रह्मा.. विष्णू आणि महेश या जगाच्या त्रिमुर्तीपैकी सृष्टीचक्र सुरु ठेवण्यासाठी शिवाची ओळख संहारक देवता म्हणून आहे. सृष्टीसाठी ते आवश्यक..सत्य आहे. म्हणूनही शिव सत्य आहेत. त्यांच्या जवळ देव-दानव फरकच नाही. जो भक्ती करेल त्या भक्ताला मागेल तो वर देणारे.*

        *मनुष्याप्रमाणे प्राण्यांना जगायला स्वत:साठी अन्न पिकवता येत नाही. 'जीवो जीवस्य जीवनम्' हा सृष्टीनियम झाला. पण प्रत्येकाला कुटुंब प्रेम.. समाज.. देश प्रेम आहेच. अगदी प्राण्यामध्येही कुटुंब प्रेम आहेच. एकदा एका उपाशी पारध्याच्या हाती हरिणी सावज आले. मला एकदा कर्तव्यपालनासाठी घरी जावू द्या अशी हरिणीने विनंती करून परत येण्याचे वचन पारध्यास दिले.*

        *या पारध्याने त्या हरिणीवर बाण चालवला नाही. तिच्या पिल्लांना भेटण्यासाठी.. स्वतः उपाशी राहून हरिणीला जावू दिले. रात्रभर तो पारधी हरिणीची वाट बघत झाडावर बसला. रात्रभर त्या झाडाची पाने खाली फेकत होता. पहाटे ती हरणीच काय तर तिचे सारे कुटुंब दिलेल्या शब्दाप्रमाणे मरण स्वीकारायला समोर उभे राहिले.*

        *हरिणीच्या कुटुंबातील सारेच सदस्य "'तू मला मार या हरिणीचा जीव वाचवणे हे आमचे कर्तव्य आहे" असे म्हणू लागले. या कुटुंबाचे हे एकमेकांवरचे प्रेम.. त्यागवृत्ती बघून तो पारधी थक्क झाला. त्यांचे हृदयपरिवर्तन झाले. त्याने सर्वानाच जीवदान दिले. नकळत होणारी सत्कर्म.. पूजाही जीवनात उपयोगी पडतात. पारधी ज्या झाडाची पाने फेकत होता ते झाड होते बेलाचे. पाने खाली पडत होती ती शिवलिंगावर.*

        *हरिणी.. तिचे कुटुंबिय, पारधी या प्रत्येकाचा समर्पण भाव बघून तिथे शंकर।प्रकटले. त्यांनी मायाळू पारधी आणि सावज हरिणी या दोघांवरही कृपा करुन त्यांना 'मृग' व 'व्याघ्र' अशी दोन नक्षत्रे म्हणून नभोमंडळी विराजमान केले. पारध्याच्या हृदय परिवर्तनाची ही किमया घडली महाशिवरात्रीला.*

        *शिव म्हणजे कल्याण करणारे. सर्वांचे कल्याण व्हावे, शिवोहम व्हावे यासाठी आजचे व्रत. आजच्याच दिवशी शिवपार्वती विवाह झाला होता.*

        *निळकंठ.. भोळ्या शंकराचे एक नाव. जगात सदैव चांगले.. वाईट.. सत्प्रवृत्ती.. दुष्प्रवृत्ती. तसेच विष.. अमृत हे दोन्ही राहणारच. पण अमृत पिऊन अमर होण्याची प्रत्येकाची धडपड असते. पण विष मात्र कुणालाच नको असते. पण हे विष सुद्धा कुणाला तरी घ्यावेच लागेल. पण घेणार कोण ? मग अमृत मंथनातील हे विष घेतले ते भोळ्या शंकरांनी. त्या जहाल विषाने त्यांचा कंठ निळा झाला. दाह तर एवढा झाला की त्या दाहाच्या थयथयाटाने तांडव नृत्य घडले.*

        *जीवनातील विष अर्थातच भक्ताच्या मनातील काम.. क्रोध.. लोभ.. मोह.. मद.. मत्सर हे सारे षड्रिपू भाव. हे विष गळ्यातच ठेवा. पोटातही नको अन् मुखातून उच्चारही नको. अन्यथा युद्ध अटळच. हा संदेश देणारे हे भोलेनाथ. सर्वसत्ताधीश असूनही.. संहाराची शक्ती असूनही, कुठलाही सत्ता, संपत्ती, ऐषाराम याचा मोह त्यांना नाही. साधे जीवन जगण्याचा संदेश देणारे हे देवांचेही देव महादेव.*

        *"शिवो भूत्वा शिवं यजेत" अर्थात शिव भाव ठेवत आज शिवाचे पूजन होणार. विष कंठात धारण केल्याने शिवाच्या शरीरात दाह निर्माण झाला. त्यामुळे शिव रात्रभर जागे होते. त्यांच्या सोबत सारेच देवदेवताही जागे राहून त्यांची स्तुती करत होते. यामुळे भक्तही आज रात्रभर भक्तीजागरण करणार. आज जे त्याने दिले तेच जल.. दुध.. बेल पाने अंशरुपात त्याला वाहायचे. उपवास आणि संकीर्तनाने रात्र जागवायची.*

        *हे ज्ञान गंगा धारण.. ज्ञान वाटणारे भोलेनाथ म्हणजे भोळ्या.. सरळ लोकांचे नाथ अर्थात रक्षणकर्ते, म्हणून जे अन्यायी.. दुराचारीं आहेत त्यांच्यावर शिवाचे त्रिशूळ चालते.*

        *आज देशभर शिवलीलामृत.. काशीखंड आदिंचे वाचन होत.. 'ॐ नमः शिवाय' चा जप होतो. आज देशविदेशी शिवभक्तीचा हा आनंदोत्सव साजरा होणार.*

           *!! ॐ नमः शिवाय !!*


🔱🍁☘🍁🔱🍁☘🍁🔱

  1️⃣

  *सर्वात्मका सर्वेश्वरा*

  *गंगाधरा शिवसुंदरा*

  *जे जे जगी जगते तया*

  *माझे म्हणा करुणाकरा*


  *आदित्य या तिमिरात व्हा*

  *ऋग्वेद या हृदयात व्हा*

  *सुजनत्व द्या, द्या आर्यता*

  *अनुदारिता दुरिता हरा*


  *गीत : कुसुमाग्रज*  ✍️

  *संगीत : पं. जितेंद्र अभिषेकी*

  *स्वर : पं. जितेंद्र अभिषेकी*  

  *नाटक : ययाति आणि देवयानी*


🔱☘🌼🌸🙏🌸🌼☘🔱

  2️⃣

  *शिव तांडव स्तोत्र :*

  *जटाटवीगलज्जल*

  *प्रवाहपावितस्थले..*


  *रचना : लंकाधिपती रावण*  ✍️

  *स्वर : शंकर महादेवन*  


  🎼🎶🎼🎶🎼    🎧


        🚩  *ॐ नमः शिवाय* 🚩


    *🌹🙏सुमंगल प्रभात🙏🌹*

                *१५.०२.२०२६*


🌻🌸🔱☘🌼☘🔱🌸🌻

*आज श्री समर्थ रामदास स्वामी रचित श्री शंकराच्या आरतीचा भावार्थ पाहुयात...*

 *आज श्री समर्थ रामदास स्वामी रचित श्री शंकराच्या आरतीचा भावार्थ पाहुयात...*


लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा, वीषे कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा

लावण्य सुंदर मस्तकी बाळा, तेथुनिया जळ निर्मळ वाहे झुळझुळा॥१॥


जय देव जय देव जय श्रीशंकरा, आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा

जय देव जय देव ॥धृ॥


कर्पुरगौरा भोळा नयनी विशाळा, अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा

विभुतीचे उधळण शितकंठ नीळा, ऐसा शंकर शोभे उमा वेल्हाळा ॥२॥


जय देव जय देव जय श्रीशंकरा, आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा

जय देव जय देव ॥धृ॥


देवी दैत्यी सागरमंथन पै केले, त्यामाजी अवचित हळहळ जे उठले

ते त्वा असुरपणे प्राशन केले, नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले ॥३॥


जय देव जय देव जय श्रीशंकरा, आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा

जय देव जय देव ॥धृ॥


व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी, पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी

शतकोटीचे बीज वाचे उच्चारी, रघुकुलटिळक रामदासा अंतरी॥४॥


जय देव जय देव जय श्रीशंकरा, आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा

जय देव जय देव ॥धृ॥


पुणे जिल्ह्यात जेजुरी गडाजवळ लवथळेश्वराचे मंदीर आहे...

समर्थ जेंव्हा लवथळेश्वराच्या दर्शनास आले तेंव्हा त्यांना जी आरती सुचली तीच आपण रोज म्हणतो! बरेचदा केवळ पाठ झाल्याने आपण आरत्या गातो, तिचा अर्थ ठाऊक असेल तर मात्र ती अधीक आर्ततेने करता येईल!


लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा ।


ब्रह्मांडातील ग्रहता-यांच्या, आकाशमालांच्या माळा तुझ्या गळ्यात लवथवत आहेत, डोलत, वळवळत आहेत!


वीषें कंठ काळा त्रिनेत्रीं ज्वाळा ॥


समुद्रमंथनातून आलेले विष प्राशन करून तुझा कंठ काळवंडला आहे, तुझ्या तीन्ही नेत्रातून भयानक ज्वाळा बाहेर पडत आहेत!


लावण्यसुंदर मस्तकीं बाळा ।


अतीशय लावण्यवती, सुंदर अशी बाळा, कन्या, स्त्री तुझ्या मस्तकावर आहे (गंगा)


तेथुनियां जल निर्मळ वाहे झुळझूळां ॥ १ ॥


तिथून अतीशय निर्मळ अशा गंगाजलाचा झरा वाहातो आहे!


जय देव जय देव जय श्रीशंकरा ।


हे शंकरा तुझा जयजयकार असो!


आरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा ॥ ध्रु० ॥


कापरासाख्या गो-या वर्णाच्या तुझी आम्ही आरती ओवाळतो!


कर्पूरगौरा भोळा नयनीं विशाळा ।


हे कर्पुरगौर शंकरा, तु भोळा आहेस, विशाल नेत्र असलेला आहेस...


अर्धांगीं पार्वती सुमनांच्या माळा ॥


तुझी अर्धांगिनी पार्वती (शक्ती) ही जणु तुझे (शिवाचे) अर्धे अंगच आहे,

तुझ्या गळ्यात फ़ुलांच्या माळा आहेत.


विभुतीचें उधळण शितिकंठ नीळा ।


चिताभस्माची उधळण अंगभर केलेल्या तुझा कंठ विषप्राशनाने काळा-निळा (शिति) पडलेला आहे... 


ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा ॥ जय देव० ॥ २ ॥


असा तु उमेवर अत्यंत प्रेम करणारा शोभत आहेस!


देवीं दैत्यीं सागरमंथन पै केलें ।त्यामाजीं अवचित हलहल ते उठिलें ॥


देव आणि दैत्य यांनी जेंव्हा समुद्रमंथन केले तेंव्हा त्यातून अचानक हलाहल नामक विष बाहेर पडले...


तें त्वां असुरपणें प्राशन केलें ।नीळकंठ नाम प्रसिद्ध झालें ॥ जय देव० ॥ ३ ॥


ते तू आसुरी वृत्ती धारण करून प्राशन केल्यानेच तुला मिळकंठ या नावाने प्रसिद्धी मिळाली...


व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी ।


वाघाचे कातडे ल्यालेल्या, नागबंध धारण केलेल्या, सुंदर रुप असलेल्या, मदनाचा संहार केलेल्या...


पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी ॥


पाच मुखे असणा-या, मनमोहका, मुनीजनांना आनंद देणा-या...


शतकोटीचें बीज वाचे उच्चारी ।


शतकोटी नामांचा जो बीज मंत्र, तो "श्रीराम जय राम जय जय राम " हा मंत्र सतत वाचेने उच्चारणा-या...


रघुकुलतिलक रामदासा अंतरीं ॥ जय देव जय देव० ॥ ४ ॥


आणि त्या रामनाम उच्चारणाने साक्षात रामरूप झालेल्या हे शंकरा. रघुकुलतिलका, तुला रामदासाचा अंत:करण पूर्वक नमस्कार असो !!

Saturday, 20 December 2025

थोर आधुनिक संत गाडगे महाराज यांची तुलना होणे अशक्यच

 तळमळीचे,समाज सुधारक

दिनदलित,गोरगरीब उद्धारक

अस्पृश्यता,जातीभेद उच्चाटक

अस्वच्छता,अंधश्रद्धा,अज्ञान निर्मूलक

विज्ञान,सुधारणेचा अंगीकारक

कीर्तनकार प्रबोधनात्मक 

ऐसा जगावेगळा ,अवलिया

आधुनिक संत गाडगे महाराज !

 विनम्र अभिवादन🙏💐

       **************

   आज हस्तीदंती मनोऱ्यात सुख वैभवात राहाणारे, पैशात लोळणारे, अलिशान गाड्यामधून फिरणारे, केवळ शब्द पांडित्यावर जनतेला भुलविणारे, डोलविणारे अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणारे ,आपत्कालीन स्थितीत आपद्ग्रस्ताना प्रत्यक्षात तेथे जाउन त्यांना धीर न देणारे,त्यांचे अश्रू न पुसणारे, कोणतीही मदत न करणारे,त्यांना अंधश्रद्धेच्या नादी लावणारे  असे तथाकथित आध्यात्मिक बाबा,बुवा,महाराज यांची व  समाजसुधारणेसाठी,अंधश्रद्धा निर्मूलनासाठी ,स्वच्छतेसाठी तसेच बहुजन, मागासलेला वर्ग शिक्षण घेऊन साक्षर,शिक्षित व ज्ञानसंपन्न व्हावा,अस्पृश्यता, जातीभेद नष्ट व्हावा म्हणून संपूर्ण आयुष्य त्यासाठी  व्यतीत करणारे असे खरेखुरे ध्येयवादी कृतीशील,निस्वार्थी,निरपेक्ष समाजसुधारक, समाज प्रबोधक व साध्या राहाणीचा अंगीकार करणारे असे थोर आधुनिक संत गाडगे महाराज यांची तुलना होणे अशक्यच! आज संत गाडगे बाबा यांना


Thursday, 13 November 2025

संविधान जनजागृती प्रश्नमंजुषा उपक्रम व्यापक स्वरुपात राबवावाwww.yuvacareer.com

 संविधान जनजागृती प्रश्नमंजुषा उपक्रम व्यापक स्वरुपात राबवावा

राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम

मुंबई दि.१२ : 'संविधान जनजागृती प्रश्नमंजुषा २०२५’ उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शालेय जीवनापासूनच भारतीय संविधानाविषयी जागरूकता निर्माण होण्यास मदत होणार आहे. यासाठी सर्व संबंधित विभागांनी हा उपक्रम अधिक व्यापक स्वरुपात राबवावाअशा सूचना महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांनी दिल्या.

‘संविधान जनजागृती प्रश्नमंजुषा उपक्रम २०२५’ ची आढावा बैठक महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या कार्यालयात  झाली.  बैठकीस  शिक्षणसामाजिक न्याय,  इतर मागास बहुजन कल्याण विभागआदिवासीअल्पसंख्यांक विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांनी सांगितले कीया स्पर्धेचे प्रारूप लवकरच तयार केले जाणार आहे. संबंधित विभागांनी या स्पर्धेची संपूर्ण पूर्वतयारी करावी. प्रत्येक शाळेतून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी जनजागृती करावी. या स्पर्धेसाठी येणाऱ्या खर्चाची तरतूद शाळांना उपलब्ध करून दिलेल्या अनुदानातून करण्यात यावी.

शालेय शिक्षण विभागाने हा उपक्रम अधिक व्यापक प्रमाणात राबवण्यासाठी आवश्यक परवानगी त्यांच्या स्तरावर घ्यावी.  याबाबत तातडीने कार्यवाही करून अहवाल कार्यालयास सादर करावा, असेही धर्मपाल मेश्राम यांनी सांगितले.

आदिवासी विकास विभागाने त्यांच्या अखत्यारित असलेल्या वसतिगृहात हा उपक्रम राबवण्याची संपूर्ण तयारी केली असल्याचे सांगितले. सामाजिक न्याय विभागानेही शासकीय निवासी शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यासाठी  खर्चाची तरतूद केली जात असल्याचे सांगितले. इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत आश्रम शाळेमधील विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम राबविला जाणार असल्याचे सांगितले.

अल्पसंख्यांक विभागामार्फत अल्पसंख्यांक विभाग योजनेचे लाभार्थी मुलांची वसतिगृहशिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थी यांनाही उपक्रमात सहभागी करून घेतले जाईल असे सांगितले. प्रश्नमंजुषा उपक्रम www.yuvacareer.com या संकेतस्थळाद्वारे राबविण्यात येणार आहे.

Monday, 20 October 2025

परिपक्व माणसाची ओळख तीन गोष्टी वरून

 *🌹 जय श्रीराम 🌹*

 *परिपक्व माणसाची  ओळख तीन गोष्टी वरून होते. प्रथम त्यात नम्रता असते, दुसरे त्याच्या बोलण्यात गोडवा असतो, आणि तिसरे म्हणजे त्याच्या चेह-यावर जबरदस्त आत्मविश्वास असतो.*

*जग कितीही डिजिटल होऊ द्या हो, पण, आयुष्य जगण्याचा सिद्धांत हा अनुभवाच्या  विद्यापीठात शिकावा लागतो. मनाला शांतता मिळेल असं काही तरी करत रहा,गरजाच पूर्ण  करत बसलात तर, आयुष्य असंच कधी संपुन जाईल कळणार नाही.*

 *भक्ती फक्त मंदिरापर्यंत नेते परंतु, मनातील सात्त्विकता, निष्ठा,त्याच्या प्रति असलेला विश्वास  माणसांला देवा पर्यंत नेतो,त्याच्या चरणी नतमस्तक व्हायला भाग पाडतो.*

*शुभ सकाळ, शुभ प्रभात*

🌹🙏🙏🌹

वामन जयंती २०२५:*


 *वामन जयंती २०२५:*





 बलिराजाच्या उद्धारासाठी महाविष्णूंचा अवतार, तीन पावलांत ब्रह्मांड व्यापले



श्रीभगवंत अत्यंत भक्तवत्सल आहेत. कधीच कोणाचेही अकल्याण करीत नाहीत, हे आपण नेहमीच पक्के लक्षात ठेवले पाहिजे!



*वामन जयंती २०२५: बलिराजाच्या उद्धारासाठी महाविष्णूंचा अवतार, तीन पावलांत ब्रह्मांड व्यापले*


मराठी वर्षातील अनन्य साधारण महत्त्व असलेला चातुर्मास सुरू आहे. गणेशोत्सवाचा उत्साह कायम आहे. गणेशोत्सव कालावधीत काही महत्त्वाची व्रते येतात. संपूर्ण मराठी वर्षात काही तिथी या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या गेल्या आहेत. प्रत्येक महिन्याच्या शुद्ध आणि वद्य पक्षात प्रतिपदेपासून चतुर्दशीपर्यंत येणाऱ्या या दिवसांत अनेक व्रते आचरली जातात. मात्र, त्यातील काही तिथींना ऐतिहासिक, पौराणिक घटना वा प्रसंगांमुळे वेगळे महत्त्व प्राप्त होते. वर्षभरातील या तिथींपैकी विशेष महत्त्व प्राप्त झालेली तिथी म्हणजे भाद्रपद शुद्ध द्वादशी. महाविष्णूंच्या दशावतारांपैकी पाचवा अवतार असलेल्या वामनाचा जन्म भाद्रपद द्वादशीला झाल्याचे मानले जाते. म्हणून भाद्रपद शुद्ध द्वादशी वामन जयंती म्हणून साजरी केली जाते.



 *आज गुरुवार, ०४ सप्टेंबर २०२५ रोजी वामन जयंती आहे. वामन जयंती*


 देशभरातील अनेक ठिकाणी साजरी केली जाते. विष्णूंच्या या वामन अवताराची एक पौराणिक कथा सांगितली जाते. श्रीमद भागवत पुराणात यासंदर्भात विस्तृत विवेचन करण्यात आले आहे. श्रीभगवंत अत्यंत भक्तवत्सल आहेत, त्यांचे आपल्या भक्तांवर स्वत:पेक्षाही जास्त प्रेम असते आणि विविध प्रसंगांनी आपले ते निखळ प्रेम श्रीभगवंत व्यक्त करतातच. अशीच एक निरतिशय प्रेमाची सुखद लीला म्हणजेच श्रीभगवंतांचा श्रीवामन अवतार होय!


*बलिराजाच्या उद्धारासाठी महाविष्णूंचा अवतार*


प्रात:स्मरणीय भक्तराज श्री बलिराजा यांच्या उद्धारासाठी आणि देवतांचे राज्य त्यांना पुन्हा प्रदान करण्यासाठी हा अवतार झाला. पण भक्तिशास्त्रात सांगितलेले भक्तांचे माहात्म्यच खरेतर या लीलेतून अधिक उजळून निघताना दिसते. भक्त कोणत्याही परिस्थितीत आणि कोणत्याही थराला जाऊनही आपल्या लाडक्या श्रीभगवंतांना धरूनच ठेवतात, त्यांची प्राप्ती करूनच घेतात, हेच या सुमधुर लीलेतून दृग्गोचर होते.



*आपल्या शेतकऱ्यांचा हा बळी राजा नाही!*


आपल्याकडे शेतकऱ्याला 'बळीराजा' म्हणतात, त्यात या दैत्यराज बळीचा काहीही संबंध नाही. शेतकऱ्यांचा राजा बळी म्हणजे हा दैत्यराज बळी नव्हे. भगवान श्रीकृष्णांचे ज्येष्ठ बंधू भगवान श्रीबलिभद्र, श्रीबलराम हे शेतकऱ्यांचे राजे मानले जातात. म्हणूनच तर त्यांचे आयुध हल किंवा नांगर आहे, जे सर्व शेतकऱ्यांचे अत्यंत आवश्यक असे हत्यार आहे. 'हलधर' हे त्यामुळेच श्रीबलरामांचे एक नाव आहे. भगवान श्रीवामन हे प्रत्यक्ष भगवान श्रीमहाविष्णू आहेत. श्रीभगवंत कधीच कोणाचेही अकल्याण करीत नाहीत, हे आपण नेहमीच पक्के लक्षात ठेवले पाहिजे!


*वामन जयंतीची पौराणिक कथा*


भागवत पुराणातील वामन अवताराच्या कथेनुसार, देव व असुरांच्या युद्धामध्ये राक्षसांचा पराभव होण्यास सुरुवात होते. अशाने राक्षसकुळ संपून जाईल, या भीतीने असुरांचे गुरु शुक्राचार्य आपल्याला अवगत असलेली संजीवनी विद्या वापरून राक्षसांना पुन्हा जीवंत करतात. शुक्राचार्य हे असुरांचा राजा बळीराजासाठी मोठा यज्ञ करतात. बळीराजाला अग्नीकडून दिव्य रथ, बाण, अभेद्य चिलखत, विविध अद्भूत शक्ती मिळवून देतात. यानंतर असुरांची शक्ती अनेकपटीने वाढते. असुरांचे सैन्य इंद्रावर हल्ला करण्याची तयारी करतात. बळीचे शंभर यज्ञ पूर्ण झाल्यावर तो इंद्र होईल, अशी इंद्राला भीती वाटू लागते. म्हणून इंद्र श्रीविष्णूंना शरण जातात. श्रीविष्णू त्यांना मदत करण्याचे वचन देतात.



महर्षी कश्यप आणि आदिती यांच्या पोटी श्रीविष्णू बालकाच्या रुपात जन्म घेतात. महर्षी कश्यप आणि माता आदिती या बाळाचे वामन असे नामकरण करतात. महर्षी कश्यप ऋषींसह वामनावर यज्ञोपवीत संस्कार करतात. वामन बटुला महर्षी पुलह यज्ञोपवीत, अगस्त्य ऋषी मृगचर्म, मरिची ऋषी पलाश दंड, अंगिरसा ऋषी वस्त्र, सूर्य छत्र, भृगु ऋषी खडावा, गुरु देवांनी कमंडळु, माता अदितीने कॉपीने, सरस्वती देवी रुद्राक्षाची माळ आणि कुबेर भिक्षा पात्र देतात.


वामन वडिलांच्या आज्ञेने यज्ञा स्थळी जातात. राजा बळी नर्मदेच्या उत्तर किनाऱ्यावर अखेरचा यज्ञ करीत असतो. वामन अवतारातील श्रीहरी राजा बळीकडे भिक्षा मागण्यासाठी दाखल होतात. श्रीविष्णू भिक्षेमध्ये तीन पावले भूमी मागतात. शुक्राचार्यांना धोका लक्षात येतो. ते बळीला नकार देण्यास सुचवतात. परंतु, बळी तीन पावले जमीन देण्याचे वचन देतो. वामन रुपातील विष्णू एका पावलात स्वर्ग व दुसऱ्या पावलात पृथ्वी आणि तिसरे पाऊल कोठे ठेवू, असे विचारतात. 



शेवटी राजा बळी वामनासमोर आपले डोके धरतो व आपल्या डोक्यावर तिसरे पाऊल ठेवावे, अशी विनंती करतो. वामन अगदी तेच करतो आणि राजा बळीला पाताळात ढकलतो. सर्वकाही हरपून बसलेल्या बळीला आपल्या वचनाशी कटिबद्ध असलेले बघून वामनदेव प्रसन्न होतात. श्रीविष्णू बळीराजाला पाताळलोकाचे स्वामी करतात आणि द्वारपालपद स्वीकारतात.


॥ *ॐ ॐ तपरूपाय विद्महे, सृष्टिकर्ताय धीमहि, तन्नो वामनः प्रचोदयात् ॐ* ॥


॥ *ॐ नमो भगवते वासुदेवाय* ॥

Tuesday, 30 September 2025

दीनदयाळ सेवा प्रतिष्ठानने पारधी समाजाच्या विकासासाठीशिक्षण, आरोग्य आणि रोजगार यावर काम करून गुन्हेगार समाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या

 दीनदयाळ सेवा प्रतिष्ठानने पारधी समाजाच्या विकासासाठीही मोठं काम केलं आहे. शिक्षणआरोग्य आणि रोजगार यावर काम करून गुन्हेगार समाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या समाजाचं परिवर्तन घडवलं आहे. पंडित दीनदयाळजींनी समाजासाठी जे कार्य केलंते कोणत्या पुरस्कारासाठी नव्हतं. त्यांचे 'विचारअमर आहेत. जरी त्यांची हत्या झालीतरी त्यांचा विचार अधिक वेगाने पसरला आणि आज तोच विचार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून संपूर्ण जगाला दाखवला जात आहेअसेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

प्रारंभी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या स्मारकस्थळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी भेट देऊन पंडित दीनदयाळजींच्या पुतळ्यास पुष्प व खादीचा हार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले. यावेळी मूर्तीकार सुजीत गौड व पत्नी स्वाती सुजीत गौड यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Friday, 19 September 2025

जालना उत्कृष्ठ तर रत्नागिरी उत्तम : जळगाव आणि बीडने पटकावले प्रशंसनीय पारितोषिक

 


जालना उत्कृष्ठ तर रत्नागिरी उत्तम : जळगाव आणि बीडने पटकावले प्रशंसनीय पारितोषिक

मुंबई (प्रतिनिधी) । इतिहासातील प्रेरक व्यक्तिमत्वांचे आकर्षण प्रत्येकालाच असते. ऐतिहासिक व्यक्तिमत्वांचा आदर्श बालकांपुढे असावा व त्यातून त्यांनी बोध घेत सकारात्मक विचार करावा या उद्देशाने बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्ष ॲड.निलम शिर्के सामंत यांच्या संकल्पनेतून बालरंगभूमी परिषदेने ‘इतिहास महाराष्ट्राचा : श्री शिवजन्मोत्सव ते श्री शिवराज्याभिषेक’ या उपक्रमाचे आयोजन केले होते. राज्यभरात २६ ठिकाणी झालेल्या प्राथमिक फेरीतील विजेत्यांची महाअंतिम फेरी दि. १३ व १४ सप्टेंबर रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुल मुंबई येथे संपन्न झाली.
उपक्रमाचा उदघाटन सोहळा शनिवार (दि.१३) रोजी माटुंगा येथील यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुलातील मुख्य रंगमंचावर संपन्न झाला. उदघाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे अध्यक्ष विजय गोखले, ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर, ज्येष्ठ सिने अभिनेते विनयजी येडेकर, रंगमंच कामगार संघटनेचे अध्यक्ष रत्नकांतजी जगताप, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह अजित भुरे, स्पर्धेचे परीक्षक शाहीर नंदेश उमप, ज्येष्ठ अभिनेते सुनील गोडसे, शिवशाहीर प्रविण जाधव यांच्यासह बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्ष अॅड.नीलम शिर्के सामंत, कार्याध्यक्ष राजू तुलालवार, उपाध्यक्ष शैलेश गोजमगुंडे, डॉ.दीपा क्षीरसागर, प्रभारी प्रमुख कार्यवाह योगेश शुक्ल, प्रमुख कार्यवाह सतीश लोटके, कोषाध्यक्ष नंदकिशोर जुवेकर, सहकार्यवाह आसेफ अन्सारी, दिपाली शेळके, कार्यकारिणी सदस्य अनंत जोशी, वैदेही चवरे सोईतकर, नागसेन पेंढारकर, त्र्यंबक वडसकर, सीमा यलगुलवार, शिवाजी शिंदे, सुजय भालेराव, वैभव जोशी आदी उपस्थित होते. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते नटराज पूजन व श्री शिवछत्रपतींच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. प्रास्ताविकात अध्यक्ष अॅड.नीलम शिर्के सामंत यांनी उपक्रमाचा उद्देश स्पष्ट करत, आगामी उपक्रमांविषयी उपस्थितांना माहिती दिली.
शनिवारी महाराष्ट्रातील ३६ संघांनी आपले समूह सादरीकरण या उपक्रमात सादर केले. बालकलावंतांनी सादर केलेल्या विविध सादरीकरणाने उपस्थित प्रेक्षकांना शिवकाळातच नेले. सायंकाळी ७ वाजता स्पर्धेचा निकाल जाहीर करुन मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. समूह गटात सर्वोत्कृष्ठ - श्रीराम अॅकेडमी, कोल्हापूर, उत्कृष्ठ - श्री महावीर स्थानकवासी जैन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, जालना, उत्तम - न.प. शाळा क्रमांक १५ दामले विद्यालय, रत्नागिरी, प्रशंसनीय १ - गुरुवर्य परशुराम विठोबा विद्यालय, जळगाव, प्रशंसनीय २ - आर्ट ऑफ फन अॅकेडमी, बीड, विशेष नावीन्यपूर्ण सादरीकरण - ग्रॅव्हिटी डान्स इन्स्टिट्यूट, धुळे यांना पारितोषिक प्रदान करुन गौरविण्यात आले.

एकल सादरीकरणात बालकलावंतांचा जल्लोष

रविवारी (दि.१४) इतिहास महाराष्ट्राचा या उपक्रमातील एकल सादरीकरणाची स्पर्धा झाली. या स्पर्धेत वयोगट ५ ते १० व ११ ते १५ अशा दोन गटात राज्यभरातील ६७ बालकलावंतांच्या जोशपूर्ण सादरीकरणाने उपस्थित प्रेक्षक भारावले. सुरुवातीला परीक्षक शाहीर नंदेश उमप, ज्येष्ठ अभिनेते सुनील गोडसे, शिवशाहीर प्रविण जाधव यांच्या हस्ते नटराज पूजन व श्री शिवछत्रपतींच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. गटनिहाय स्पर्धा संपल्यानंतर स्पर्धेचे पारितोषिक वितरण मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. यात एकल सादरीकरण ५ ते १० वयोगटात सर्वोत्कृष्ट - आयांश जाधव, लातूर, उत्कृष्ठ - क्तस्तुरी कार्लेकर, नवी मुंबई, उत्तम - अनुष्का साठे, अहिल्यानगर, प्रशंसनीय १ - रुद्रप्रताप जाधव, मंगळवेढा, प्रशंसनीय २ - ध्वज मुणोत, अहिल्यानगर, विशेष प्रशंसनीय पारितोषिक - सिध्दी पाटील (बीड), मुद्रा दामले (ठाणे), हार्दिका दिनकर (कल्याण)  तर  ११ ते १५ वयोगटात सर्वोकृष्ठ - दुर्व दळवी, बृहन्मुंबई, उत्कृष्ठ - समर्थ मुंडे, परभणी, उत्तम - विधित भोसले, नवी मुंबई, प्रशंसनीय १ - इशा गोखले (रत्नागिरी), प्रशंसनीय २ - पार्थ पवार (बीड), विशेष उल्लेखनीय पारितोषिक - कौमुदी सालपेकर (नागपूर), स्वरेशा आखाडे (रत्नागिरी), ईश्वरी रंजन (नवी मुंबई), वैभवी बगाडे (जळगाव) या बालकलावंतांनी पारितोषिक पटकावले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैदेही चवरे सोईतकर, नागसेन पेंढारकर व त्र्यंबक वडसकर यांनी केले तर आभार प्रदर्शन उपाध्यक्ष डॉ.दीपा क्षीरसागर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बालरंगभूमी परिषदेची युथ टीम शहबाज गोलंदाज,  निरंजन सागवेकर, सागर सकपाळ, राहुल मंगळे, मोहित पाटील, दर्शील सोनुले, चेतन उपाध्याय, अभिषेक आयरेकर, सुरेखा मराठे यांनी परिश्रम घेतले.

Friday, 5 September 2025

गौरी गणपती सण, करू या पर्यावरणाचे रक्षण

 Meena Natu Snehal: सौं स्नेहल राजेंद्र कोतवाल, नाशिक

[: पत्ता : पी अँड टी कॉलनी शरणपूर रोड, नाशिक


 


 



Thursday, 28 August 2025

पूजा, प्रसाद सामुग्रीसह बाप्पाला शैक्षणिक साहित्य अर्पण करा ९३७२३४३१०८ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा

 पूजा, प्रसाद सामुग्रीसह बाप्पाला शैक्षणिक साहित्य अर्पण करा 

गणेशोत्सव महासंघ आणि विदर्भ मंदीरचे गणेशोत्सव मंडळ व गणेशभक्तांना  आवाहन 
मुंबई,२६-(प्रतिनिधी )-  गणेशोत्सवात,  गणरायाचरणी पूजा प्रसादाच्या साहित्यासह ,  शैक्षणिक साहित्य अर्पण करून समाजातील गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी हातभार लावावा असे आवाहन गणेशोत्सव मंडळांचे विश्वव्यापी  संघटन असलेल्या अखिल सार्वजनिक गणेशोत्सव महासंघ आणि विदर्भ वैभव मंदिर यांनी  राज्यातील गणेशभक्त व गणेश मंडळांना केले  आहे.

 श्रीगणेशाचे उद्या  २७  ऑगस्ट २०२५ रोजी आगमन होत आहे महाराष्ट्रात १० दिवस गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. यावेळी आकर्षक रोषणाई, देखावे तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते. राज्यातील काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे व व पक्ष संघटनांकडून स्तुत्य असे उपक्रमदेखील राबविले जातात.याचाच एक भाग म्हणून गणेशभक्तांनी दर्शनाला जाताना पूजेच्या व प्रसादाच्या वस्तुसह आपापल्या परीने वह्या, पेन पेन्सिल स्कूल बॅग वापरात नसलेले जुने मोबाईल, टॅब पुस्तके, आदी शैक्षणिक साहित्य गणरायाचरणी अर्पण करावे, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी देखील आपल्या मंडळाच्या वतीने गणेशभक्तांना तसे आवाहन करावे गणेश मंडपात बॅनर लावावे , या माध्यमातून जमा झालेले शैक्षणिक साहित्य दुर्गम भागातील विद्यार्थी , आर्थिक दुर्बल तसेच ,आदिवासी विद्यार्थ्यांना वितरित करावे  असे आवाहन  अखिल सार्वजनिक गणेशोत्सव महासंघाचे कार्याध्यक्ष सुहास आडिवरेकर प्रमुख कार्यवाह सुरेश सरनोबत आणि विदर्भवासी मुंबईकरांची  शिखर संस्था ,विदर्भ वैभव मंदिर संस्थेचे अध्यक्ष अशोक बारब्दे,  सरचिटणीस गणेश नागे,संजीव बारब्दे,पुरुषोत्तम भुयार, प्रभाकर आडे यांच्या वतीने करण्यात आले आहे. दरम्यान .सदर या उपक्रमात सहभाग देण्यासाठी व सहकार्यासाठी  ९३७२३४३१०८ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन गरजू विद्यार्थ्यांसाठी मागील १० वर्षांपासून कार्यरत असलेल्या एक वही एक पेन अभियानचे प्रणेते  राजू झनके यांनी अभियानच्या वतीने केले आहे

Saturday, 23 August 2025

गणपती विशेष रेल्वे सेवागणेशोत्सव २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर दरम्यान साजरा

 गणपती विशेष रेल्वे सेवा

गणेशोत्सव २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर दरम्यान साजरा होणार असून११ ऑगस्टपासून गणपती विशेष रेल्वे सेवा सुरू झाल्या आहेत. या विशेष रेल्वे सेवांचा विस्तार कोकण रेल्वेमध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर झाला आहे. या विशेष रेल्वेगाड्यांचे थांबे  वाढविले आहेत.

             यामध्ये कोल्हापूरसोलापूरछत्रपती संभाजी नगरनांदेडपुणेमुंबईठाणेपनवेलकर्जतलोणावळाखान्देश्वररत्नागिरीसावंतवाडीथिवीमकरमाळीमडगावकाणकोणगोवावास्कोसांगलीमिरजकुडाळसिंधुदुर्गराजापूरनांदगाववलवईवेंगुर्लामालवणदेवगडनिपाणीसावर्डेकोलादतारकर्लीमालगुंडआचरावेंगुर्ला रोडसावर्डे रोडकणकवली रोडकुडाळ रोडसिंधुदुर्ग रोडराजापूर रोडनिपाणी रोड आदी ठिकाणांचा समावेश आहे.

या रेल्वे सेवांबाबत अधिक माहिती आयआरसीटीसी वेबसाईटरेल्वे वन ॲप आणि संगणकीकृत पीआरएस वर उपलब्ध आहे.

गडचिरोली, नागपूर व भंडारा जिल्ह्यांमध्ये वैविध्यपूर्ण विकास प्रकल्प

 

  • गडचिरोलीनागपूर व भंडारा जिल्ह्यांमध्ये वैविध्यपूर्ण विकास प्रकल्प

 

मुंबईदि. २२ : "आदिवासी समुदायाचे जीवनमान उंचावणे, त्यांच्या जीवनात शाश्वत विकास घडवून आणण्यासाठी सार्वजनिक आणि सामाजिक क्षेत्राचा सहभाग आवश्यक आहे. कृषी आधारित वैविध्यपूर्ण योजना राबवल्या जात असून त्यांच्या शाश्वत विकासासाठी मॉयल लिमिटेड’ चे योगदान महत्त्वपूर्ण आहे," असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

             मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "नीती आयोगाने (NITI Aayog) देशातील निवडक आकांक्षी जिल्ह्यांमध्ये गडचिरोलीचा समावेश केला आहे. स्वयंसेवी संस्थाचा सहभाग व 'मॉयल लिमिटेड’ च्या योगदानातून विविध जिल्ह्यातील आदिवासी समुदायासाठी शाश्वत परिणामकारक उपाययोजना राबविण्यात येतील. यात सहभागी सामाजिक क्षेत्रातील जलसंवर्धनकृषी व वन-आधारित उपजीविका या क्षेत्रात ‘बायफ’ संस्थेचे विकासात्मक दीर्घकालीन कार्यही चांगले आहे ," असे त्यांनी नमूद केले. या योगदानासाठी मॉयल लिमिटेड’ चे अभिनंदन केले.

पिठोरी पूजा फोटो रवींद्र गायकर,


 

Tuesday, 12 August 2025

सोशल मीडियावरील कोणत्याही मोहाला बळी पडू नका,

 गरुड दृष्टी’ सोशल मिडिया मॉनिटरिंग व सायबर इंटेलिजन्सच्या मदतीने तब्बल 10 कोटी रुपये संबंधीत लोकांना परत

सोशल मीडियावरील कोणत्याही मोहाला बळी पडू नका!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नागरिकांना आवाहन

गरुड दृष्टी’ एआय टूल्स बाबत सादरीकरण

 

नागपूरदि 10 :- काही समाज विघातक लोकांनी समाजमाध्यमांवरून जातीय द्वेषमूलक चिथावणी दिल्यामुळे दंगली उसळलेल्या आपण पहिल्या आहेत. अशा गुन्हेगारीला आला घालण्यासाठी आता जगातील सर्वोत्तम यंत्रणा व तंत्रज्ञान महाराष्ट्राकडे आहे. अशा लोकांना हुडकून त्यांच्यावर तात्काळ कारवाईसाठी 'गरुड दृष्टीहे टूल्स महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

नागपूर पोलीस विभागाच्या वतीने पोलीस भवन येथे गरुड दृष्टी’ सोशल मिडिया मॉनिटरिंग व सायबर इंटेलिजन्स प्रकल्पाबाबत सादरीकरण आणि विविध सायबर आर्थिक गुन्ह्यांच्या तपासातून प्राप्त झालेल्या तब्बल 10 कोटी रुपये रकमेच्या वितरण समारंभात ते बोलत होते. त्यांच्या हस्ते या रकमा फसवणूक झालेल्या संबंधित व्यक्तींना वितरित करण्यात आल्या. यावेळी पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगलसहपोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डीअतिरिक्त पोलीस आयुक्त सर्वश्री वसंत परदेशीराजेंद्र दाभाडेशिवाजी राठोड व वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

सोशल मिडीयाचा गैरवापर

 स्वतःचे विचार मांडण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून सोशल मीडियाचा होणारा वापर उत्तम असला तरी काही समाज विघातक प्रवृत्ती द्वेष पसरवणेधमक्या देणेहेट स्पीचफेक न्यूजअंमली पदार्थांची तस्करीसाठी या प्लॅटफॉर्मचा वापर करताना आपण पाहतो. यातील आर्थिक फसवणुकीचे प्लॅटफॉर्म बहुतांश परदेशी ऑपरेटर चालवतात.  त्यामुळे सर्वांनी सावध असले पाहिजे. आपल्या मोबाईलवर कोणत्याही प्रकारच्या येणाऱ्या ऑफर्स आर्थिक फसवणुकीसाठी टाकलेले जाळे आहे हे लोकांनी लक्षात घेतले पाहिजे. जर आपली आर्थिक फसवणूक झाली आहे हे लक्षात आल्यास शक्य तेवढ्या लवकर 1930 व 1945 या क्रमांकावर नागरिकांनी संपर्क साधावा असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

Monday, 11 August 2025

कुरेशी समाजाच्या व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही

 कुरेशी समाजाच्या व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही

- उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतर कुरेशी समाज संघटनांचा संप मागे

 

            मुंबई दि. 6 : कुरेशी समाज हा परंपरेने मांस व्यापाराशी जोडलेला असून महाराष्ट्राच्या कृषी आधारित अर्थव्यवस्थेचा एक भाग आहे. त्यामुळे या समाजाच्या व्यापाऱ्यांवर आणि जनावरांची वाहतूक करणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय होऊ दिला जाणार नाहीअशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

         उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या समिती कक्षात कुरेशी समाजाच्या विविध प्रश्नांसंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

Sunday, 10 August 2025

होमिओपॅथी, फिजिओथेरपी, पंचकर्म, अ‍ॅक्यूपंक्चर, सुजोक, न्यूट्रिशन थेरपी, योग व नैसर्गिक उपचार उपलब्ध

  

मानवी सेवा हीच ईश्वर सेवा मानून जीवनस्पर्श केंद्रात सेवाभावाने  उपचार करावेत

- उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

 

जीवनस्पर्श संयुक्त वैद्यकीय उपचारपद्धती केंद्राचे

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

 

मुंबई,दि.३० मानवी सेवा हीच ईश्वर सेवा मानून अत्याधुनिक तंत्रज्ञान व तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून मानवी कर्तव्य समजून सेवाभावाने या केंद्रात उपचार करावेत.  समाजातील गरजू व आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या रुग्णांना वैद्यकीय मदत कशी देता येईलयाबाबत संवेदनशील दृष्टिकोन ठेवावा, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

          गिरगाव परिसरातील चिराबाजार येतील जीवनस्पर्श या नावाने आधुनिक व पारंपरिक उपचारांचा संगम असलेल्या संयुक्त वैद्यकीय उपचारपद्धती केंद्राचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी डॉ. मानसी नागरेंकरडॉ.सुरेश नागरेंकर, डॉ. अमिता नागरेंकर उपस्थित होते.

कोणताही गरजू रुग्ण आर्थिक अडचणीमुळे उपचारांपासून वंचित राहू नये. अशा रुग्णांसाठी आवश्यक ठिकाणी मी स्वतः मदतीसाठी पुढे येईन, हे उपचार केंद्र व्यवसायिक दृष्टीकोन न ठेवता श्रद्धेचेसमतेचे आणि माणुसकीचे मंदिर असावे असे मंत्री श्री.पाटील यांनी यावेळी सांगितले.

          डॉ. मानसी सुरेश नागरेंकर यांच्या मार्गदर्शनाखाली होमिओपॅथीफिजिओथेरपीपंचकर्मअ‍ॅक्यूपंक्चरसुजोकन्यूट्रिशन थेरपीयोग व नैसर्गिक उपचार यांचा प्रभावी संगम या केंद्रात उपलब्ध करून देण्यात आला आहे.

Featured post

Lakshvedhi