Showing posts with label सामाजिक. Show all posts
Showing posts with label सामाजिक. Show all posts

Monday, 20 October 2025

परिपक्व माणसाची ओळख तीन गोष्टी वरून

 *🌹 जय श्रीराम 🌹*

 *परिपक्व माणसाची  ओळख तीन गोष्टी वरून होते. प्रथम त्यात नम्रता असते, दुसरे त्याच्या बोलण्यात गोडवा असतो, आणि तिसरे म्हणजे त्याच्या चेह-यावर जबरदस्त आत्मविश्वास असतो.*

*जग कितीही डिजिटल होऊ द्या हो, पण, आयुष्य जगण्याचा सिद्धांत हा अनुभवाच्या  विद्यापीठात शिकावा लागतो. मनाला शांतता मिळेल असं काही तरी करत रहा,गरजाच पूर्ण  करत बसलात तर, आयुष्य असंच कधी संपुन जाईल कळणार नाही.*

 *भक्ती फक्त मंदिरापर्यंत नेते परंतु, मनातील सात्त्विकता, निष्ठा,त्याच्या प्रति असलेला विश्वास  माणसांला देवा पर्यंत नेतो,त्याच्या चरणी नतमस्तक व्हायला भाग पाडतो.*

*शुभ सकाळ, शुभ प्रभात*

🌹🙏🙏🌹

वामन जयंती २०२५:*


 *वामन जयंती २०२५:*





 बलिराजाच्या उद्धारासाठी महाविष्णूंचा अवतार, तीन पावलांत ब्रह्मांड व्यापले



श्रीभगवंत अत्यंत भक्तवत्सल आहेत. कधीच कोणाचेही अकल्याण करीत नाहीत, हे आपण नेहमीच पक्के लक्षात ठेवले पाहिजे!



*वामन जयंती २०२५: बलिराजाच्या उद्धारासाठी महाविष्णूंचा अवतार, तीन पावलांत ब्रह्मांड व्यापले*


मराठी वर्षातील अनन्य साधारण महत्त्व असलेला चातुर्मास सुरू आहे. गणेशोत्सवाचा उत्साह कायम आहे. गणेशोत्सव कालावधीत काही महत्त्वाची व्रते येतात. संपूर्ण मराठी वर्षात काही तिथी या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या गेल्या आहेत. प्रत्येक महिन्याच्या शुद्ध आणि वद्य पक्षात प्रतिपदेपासून चतुर्दशीपर्यंत येणाऱ्या या दिवसांत अनेक व्रते आचरली जातात. मात्र, त्यातील काही तिथींना ऐतिहासिक, पौराणिक घटना वा प्रसंगांमुळे वेगळे महत्त्व प्राप्त होते. वर्षभरातील या तिथींपैकी विशेष महत्त्व प्राप्त झालेली तिथी म्हणजे भाद्रपद शुद्ध द्वादशी. महाविष्णूंच्या दशावतारांपैकी पाचवा अवतार असलेल्या वामनाचा जन्म भाद्रपद द्वादशीला झाल्याचे मानले जाते. म्हणून भाद्रपद शुद्ध द्वादशी वामन जयंती म्हणून साजरी केली जाते.



 *आज गुरुवार, ०४ सप्टेंबर २०२५ रोजी वामन जयंती आहे. वामन जयंती*


 देशभरातील अनेक ठिकाणी साजरी केली जाते. विष्णूंच्या या वामन अवताराची एक पौराणिक कथा सांगितली जाते. श्रीमद भागवत पुराणात यासंदर्भात विस्तृत विवेचन करण्यात आले आहे. श्रीभगवंत अत्यंत भक्तवत्सल आहेत, त्यांचे आपल्या भक्तांवर स्वत:पेक्षाही जास्त प्रेम असते आणि विविध प्रसंगांनी आपले ते निखळ प्रेम श्रीभगवंत व्यक्त करतातच. अशीच एक निरतिशय प्रेमाची सुखद लीला म्हणजेच श्रीभगवंतांचा श्रीवामन अवतार होय!


*बलिराजाच्या उद्धारासाठी महाविष्णूंचा अवतार*


प्रात:स्मरणीय भक्तराज श्री बलिराजा यांच्या उद्धारासाठी आणि देवतांचे राज्य त्यांना पुन्हा प्रदान करण्यासाठी हा अवतार झाला. पण भक्तिशास्त्रात सांगितलेले भक्तांचे माहात्म्यच खरेतर या लीलेतून अधिक उजळून निघताना दिसते. भक्त कोणत्याही परिस्थितीत आणि कोणत्याही थराला जाऊनही आपल्या लाडक्या श्रीभगवंतांना धरूनच ठेवतात, त्यांची प्राप्ती करूनच घेतात, हेच या सुमधुर लीलेतून दृग्गोचर होते.



*आपल्या शेतकऱ्यांचा हा बळी राजा नाही!*


आपल्याकडे शेतकऱ्याला 'बळीराजा' म्हणतात, त्यात या दैत्यराज बळीचा काहीही संबंध नाही. शेतकऱ्यांचा राजा बळी म्हणजे हा दैत्यराज बळी नव्हे. भगवान श्रीकृष्णांचे ज्येष्ठ बंधू भगवान श्रीबलिभद्र, श्रीबलराम हे शेतकऱ्यांचे राजे मानले जातात. म्हणूनच तर त्यांचे आयुध हल किंवा नांगर आहे, जे सर्व शेतकऱ्यांचे अत्यंत आवश्यक असे हत्यार आहे. 'हलधर' हे त्यामुळेच श्रीबलरामांचे एक नाव आहे. भगवान श्रीवामन हे प्रत्यक्ष भगवान श्रीमहाविष्णू आहेत. श्रीभगवंत कधीच कोणाचेही अकल्याण करीत नाहीत, हे आपण नेहमीच पक्के लक्षात ठेवले पाहिजे!


*वामन जयंतीची पौराणिक कथा*


भागवत पुराणातील वामन अवताराच्या कथेनुसार, देव व असुरांच्या युद्धामध्ये राक्षसांचा पराभव होण्यास सुरुवात होते. अशाने राक्षसकुळ संपून जाईल, या भीतीने असुरांचे गुरु शुक्राचार्य आपल्याला अवगत असलेली संजीवनी विद्या वापरून राक्षसांना पुन्हा जीवंत करतात. शुक्राचार्य हे असुरांचा राजा बळीराजासाठी मोठा यज्ञ करतात. बळीराजाला अग्नीकडून दिव्य रथ, बाण, अभेद्य चिलखत, विविध अद्भूत शक्ती मिळवून देतात. यानंतर असुरांची शक्ती अनेकपटीने वाढते. असुरांचे सैन्य इंद्रावर हल्ला करण्याची तयारी करतात. बळीचे शंभर यज्ञ पूर्ण झाल्यावर तो इंद्र होईल, अशी इंद्राला भीती वाटू लागते. म्हणून इंद्र श्रीविष्णूंना शरण जातात. श्रीविष्णू त्यांना मदत करण्याचे वचन देतात.



महर्षी कश्यप आणि आदिती यांच्या पोटी श्रीविष्णू बालकाच्या रुपात जन्म घेतात. महर्षी कश्यप आणि माता आदिती या बाळाचे वामन असे नामकरण करतात. महर्षी कश्यप ऋषींसह वामनावर यज्ञोपवीत संस्कार करतात. वामन बटुला महर्षी पुलह यज्ञोपवीत, अगस्त्य ऋषी मृगचर्म, मरिची ऋषी पलाश दंड, अंगिरसा ऋषी वस्त्र, सूर्य छत्र, भृगु ऋषी खडावा, गुरु देवांनी कमंडळु, माता अदितीने कॉपीने, सरस्वती देवी रुद्राक्षाची माळ आणि कुबेर भिक्षा पात्र देतात.


वामन वडिलांच्या आज्ञेने यज्ञा स्थळी जातात. राजा बळी नर्मदेच्या उत्तर किनाऱ्यावर अखेरचा यज्ञ करीत असतो. वामन अवतारातील श्रीहरी राजा बळीकडे भिक्षा मागण्यासाठी दाखल होतात. श्रीविष्णू भिक्षेमध्ये तीन पावले भूमी मागतात. शुक्राचार्यांना धोका लक्षात येतो. ते बळीला नकार देण्यास सुचवतात. परंतु, बळी तीन पावले जमीन देण्याचे वचन देतो. वामन रुपातील विष्णू एका पावलात स्वर्ग व दुसऱ्या पावलात पृथ्वी आणि तिसरे पाऊल कोठे ठेवू, असे विचारतात. 



शेवटी राजा बळी वामनासमोर आपले डोके धरतो व आपल्या डोक्यावर तिसरे पाऊल ठेवावे, अशी विनंती करतो. वामन अगदी तेच करतो आणि राजा बळीला पाताळात ढकलतो. सर्वकाही हरपून बसलेल्या बळीला आपल्या वचनाशी कटिबद्ध असलेले बघून वामनदेव प्रसन्न होतात. श्रीविष्णू बळीराजाला पाताळलोकाचे स्वामी करतात आणि द्वारपालपद स्वीकारतात.


॥ *ॐ ॐ तपरूपाय विद्महे, सृष्टिकर्ताय धीमहि, तन्नो वामनः प्रचोदयात् ॐ* ॥


॥ *ॐ नमो भगवते वासुदेवाय* ॥

Tuesday, 30 September 2025

दीनदयाळ सेवा प्रतिष्ठानने पारधी समाजाच्या विकासासाठीशिक्षण, आरोग्य आणि रोजगार यावर काम करून गुन्हेगार समाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या

 दीनदयाळ सेवा प्रतिष्ठानने पारधी समाजाच्या विकासासाठीही मोठं काम केलं आहे. शिक्षणआरोग्य आणि रोजगार यावर काम करून गुन्हेगार समाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या समाजाचं परिवर्तन घडवलं आहे. पंडित दीनदयाळजींनी समाजासाठी जे कार्य केलंते कोणत्या पुरस्कारासाठी नव्हतं. त्यांचे 'विचारअमर आहेत. जरी त्यांची हत्या झालीतरी त्यांचा विचार अधिक वेगाने पसरला आणि आज तोच विचार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून संपूर्ण जगाला दाखवला जात आहेअसेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

प्रारंभी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या स्मारकस्थळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी भेट देऊन पंडित दीनदयाळजींच्या पुतळ्यास पुष्प व खादीचा हार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले. यावेळी मूर्तीकार सुजीत गौड व पत्नी स्वाती सुजीत गौड यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Friday, 19 September 2025

जालना उत्कृष्ठ तर रत्नागिरी उत्तम : जळगाव आणि बीडने पटकावले प्रशंसनीय पारितोषिक

 


जालना उत्कृष्ठ तर रत्नागिरी उत्तम : जळगाव आणि बीडने पटकावले प्रशंसनीय पारितोषिक

मुंबई (प्रतिनिधी) । इतिहासातील प्रेरक व्यक्तिमत्वांचे आकर्षण प्रत्येकालाच असते. ऐतिहासिक व्यक्तिमत्वांचा आदर्श बालकांपुढे असावा व त्यातून त्यांनी बोध घेत सकारात्मक विचार करावा या उद्देशाने बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्ष ॲड.निलम शिर्के सामंत यांच्या संकल्पनेतून बालरंगभूमी परिषदेने ‘इतिहास महाराष्ट्राचा : श्री शिवजन्मोत्सव ते श्री शिवराज्याभिषेक’ या उपक्रमाचे आयोजन केले होते. राज्यभरात २६ ठिकाणी झालेल्या प्राथमिक फेरीतील विजेत्यांची महाअंतिम फेरी दि. १३ व १४ सप्टेंबर रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुल मुंबई येथे संपन्न झाली.
उपक्रमाचा उदघाटन सोहळा शनिवार (दि.१३) रोजी माटुंगा येथील यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुलातील मुख्य रंगमंचावर संपन्न झाला. उदघाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे अध्यक्ष विजय गोखले, ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर, ज्येष्ठ सिने अभिनेते विनयजी येडेकर, रंगमंच कामगार संघटनेचे अध्यक्ष रत्नकांतजी जगताप, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह अजित भुरे, स्पर्धेचे परीक्षक शाहीर नंदेश उमप, ज्येष्ठ अभिनेते सुनील गोडसे, शिवशाहीर प्रविण जाधव यांच्यासह बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्ष अॅड.नीलम शिर्के सामंत, कार्याध्यक्ष राजू तुलालवार, उपाध्यक्ष शैलेश गोजमगुंडे, डॉ.दीपा क्षीरसागर, प्रभारी प्रमुख कार्यवाह योगेश शुक्ल, प्रमुख कार्यवाह सतीश लोटके, कोषाध्यक्ष नंदकिशोर जुवेकर, सहकार्यवाह आसेफ अन्सारी, दिपाली शेळके, कार्यकारिणी सदस्य अनंत जोशी, वैदेही चवरे सोईतकर, नागसेन पेंढारकर, त्र्यंबक वडसकर, सीमा यलगुलवार, शिवाजी शिंदे, सुजय भालेराव, वैभव जोशी आदी उपस्थित होते. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते नटराज पूजन व श्री शिवछत्रपतींच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. प्रास्ताविकात अध्यक्ष अॅड.नीलम शिर्के सामंत यांनी उपक्रमाचा उद्देश स्पष्ट करत, आगामी उपक्रमांविषयी उपस्थितांना माहिती दिली.
शनिवारी महाराष्ट्रातील ३६ संघांनी आपले समूह सादरीकरण या उपक्रमात सादर केले. बालकलावंतांनी सादर केलेल्या विविध सादरीकरणाने उपस्थित प्रेक्षकांना शिवकाळातच नेले. सायंकाळी ७ वाजता स्पर्धेचा निकाल जाहीर करुन मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. समूह गटात सर्वोत्कृष्ठ - श्रीराम अॅकेडमी, कोल्हापूर, उत्कृष्ठ - श्री महावीर स्थानकवासी जैन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, जालना, उत्तम - न.प. शाळा क्रमांक १५ दामले विद्यालय, रत्नागिरी, प्रशंसनीय १ - गुरुवर्य परशुराम विठोबा विद्यालय, जळगाव, प्रशंसनीय २ - आर्ट ऑफ फन अॅकेडमी, बीड, विशेष नावीन्यपूर्ण सादरीकरण - ग्रॅव्हिटी डान्स इन्स्टिट्यूट, धुळे यांना पारितोषिक प्रदान करुन गौरविण्यात आले.

एकल सादरीकरणात बालकलावंतांचा जल्लोष

रविवारी (दि.१४) इतिहास महाराष्ट्राचा या उपक्रमातील एकल सादरीकरणाची स्पर्धा झाली. या स्पर्धेत वयोगट ५ ते १० व ११ ते १५ अशा दोन गटात राज्यभरातील ६७ बालकलावंतांच्या जोशपूर्ण सादरीकरणाने उपस्थित प्रेक्षक भारावले. सुरुवातीला परीक्षक शाहीर नंदेश उमप, ज्येष्ठ अभिनेते सुनील गोडसे, शिवशाहीर प्रविण जाधव यांच्या हस्ते नटराज पूजन व श्री शिवछत्रपतींच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. गटनिहाय स्पर्धा संपल्यानंतर स्पर्धेचे पारितोषिक वितरण मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. यात एकल सादरीकरण ५ ते १० वयोगटात सर्वोत्कृष्ट - आयांश जाधव, लातूर, उत्कृष्ठ - क्तस्तुरी कार्लेकर, नवी मुंबई, उत्तम - अनुष्का साठे, अहिल्यानगर, प्रशंसनीय १ - रुद्रप्रताप जाधव, मंगळवेढा, प्रशंसनीय २ - ध्वज मुणोत, अहिल्यानगर, विशेष प्रशंसनीय पारितोषिक - सिध्दी पाटील (बीड), मुद्रा दामले (ठाणे), हार्दिका दिनकर (कल्याण)  तर  ११ ते १५ वयोगटात सर्वोकृष्ठ - दुर्व दळवी, बृहन्मुंबई, उत्कृष्ठ - समर्थ मुंडे, परभणी, उत्तम - विधित भोसले, नवी मुंबई, प्रशंसनीय १ - इशा गोखले (रत्नागिरी), प्रशंसनीय २ - पार्थ पवार (बीड), विशेष उल्लेखनीय पारितोषिक - कौमुदी सालपेकर (नागपूर), स्वरेशा आखाडे (रत्नागिरी), ईश्वरी रंजन (नवी मुंबई), वैभवी बगाडे (जळगाव) या बालकलावंतांनी पारितोषिक पटकावले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैदेही चवरे सोईतकर, नागसेन पेंढारकर व त्र्यंबक वडसकर यांनी केले तर आभार प्रदर्शन उपाध्यक्ष डॉ.दीपा क्षीरसागर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बालरंगभूमी परिषदेची युथ टीम शहबाज गोलंदाज,  निरंजन सागवेकर, सागर सकपाळ, राहुल मंगळे, मोहित पाटील, दर्शील सोनुले, चेतन उपाध्याय, अभिषेक आयरेकर, सुरेखा मराठे यांनी परिश्रम घेतले.

Friday, 5 September 2025

गौरी गणपती सण, करू या पर्यावरणाचे रक्षण

 Meena Natu Snehal: सौं स्नेहल राजेंद्र कोतवाल, नाशिक

[: पत्ता : पी अँड टी कॉलनी शरणपूर रोड, नाशिक


 


 



Thursday, 28 August 2025

पूजा, प्रसाद सामुग्रीसह बाप्पाला शैक्षणिक साहित्य अर्पण करा ९३७२३४३१०८ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा

 पूजा, प्रसाद सामुग्रीसह बाप्पाला शैक्षणिक साहित्य अर्पण करा 

गणेशोत्सव महासंघ आणि विदर्भ मंदीरचे गणेशोत्सव मंडळ व गणेशभक्तांना  आवाहन 
मुंबई,२६-(प्रतिनिधी )-  गणेशोत्सवात,  गणरायाचरणी पूजा प्रसादाच्या साहित्यासह ,  शैक्षणिक साहित्य अर्पण करून समाजातील गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी हातभार लावावा असे आवाहन गणेशोत्सव मंडळांचे विश्वव्यापी  संघटन असलेल्या अखिल सार्वजनिक गणेशोत्सव महासंघ आणि विदर्भ वैभव मंदिर यांनी  राज्यातील गणेशभक्त व गणेश मंडळांना केले  आहे.

 श्रीगणेशाचे उद्या  २७  ऑगस्ट २०२५ रोजी आगमन होत आहे महाराष्ट्रात १० दिवस गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. यावेळी आकर्षक रोषणाई, देखावे तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते. राज्यातील काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे व व पक्ष संघटनांकडून स्तुत्य असे उपक्रमदेखील राबविले जातात.याचाच एक भाग म्हणून गणेशभक्तांनी दर्शनाला जाताना पूजेच्या व प्रसादाच्या वस्तुसह आपापल्या परीने वह्या, पेन पेन्सिल स्कूल बॅग वापरात नसलेले जुने मोबाईल, टॅब पुस्तके, आदी शैक्षणिक साहित्य गणरायाचरणी अर्पण करावे, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी देखील आपल्या मंडळाच्या वतीने गणेशभक्तांना तसे आवाहन करावे गणेश मंडपात बॅनर लावावे , या माध्यमातून जमा झालेले शैक्षणिक साहित्य दुर्गम भागातील विद्यार्थी , आर्थिक दुर्बल तसेच ,आदिवासी विद्यार्थ्यांना वितरित करावे  असे आवाहन  अखिल सार्वजनिक गणेशोत्सव महासंघाचे कार्याध्यक्ष सुहास आडिवरेकर प्रमुख कार्यवाह सुरेश सरनोबत आणि विदर्भवासी मुंबईकरांची  शिखर संस्था ,विदर्भ वैभव मंदिर संस्थेचे अध्यक्ष अशोक बारब्दे,  सरचिटणीस गणेश नागे,संजीव बारब्दे,पुरुषोत्तम भुयार, प्रभाकर आडे यांच्या वतीने करण्यात आले आहे. दरम्यान .सदर या उपक्रमात सहभाग देण्यासाठी व सहकार्यासाठी  ९३७२३४३१०८ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन गरजू विद्यार्थ्यांसाठी मागील १० वर्षांपासून कार्यरत असलेल्या एक वही एक पेन अभियानचे प्रणेते  राजू झनके यांनी अभियानच्या वतीने केले आहे

Saturday, 23 August 2025

गणपती विशेष रेल्वे सेवागणेशोत्सव २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर दरम्यान साजरा

 गणपती विशेष रेल्वे सेवा

गणेशोत्सव २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर दरम्यान साजरा होणार असून११ ऑगस्टपासून गणपती विशेष रेल्वे सेवा सुरू झाल्या आहेत. या विशेष रेल्वे सेवांचा विस्तार कोकण रेल्वेमध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर झाला आहे. या विशेष रेल्वेगाड्यांचे थांबे  वाढविले आहेत.

             यामध्ये कोल्हापूरसोलापूरछत्रपती संभाजी नगरनांदेडपुणेमुंबईठाणेपनवेलकर्जतलोणावळाखान्देश्वररत्नागिरीसावंतवाडीथिवीमकरमाळीमडगावकाणकोणगोवावास्कोसांगलीमिरजकुडाळसिंधुदुर्गराजापूरनांदगाववलवईवेंगुर्लामालवणदेवगडनिपाणीसावर्डेकोलादतारकर्लीमालगुंडआचरावेंगुर्ला रोडसावर्डे रोडकणकवली रोडकुडाळ रोडसिंधुदुर्ग रोडराजापूर रोडनिपाणी रोड आदी ठिकाणांचा समावेश आहे.

या रेल्वे सेवांबाबत अधिक माहिती आयआरसीटीसी वेबसाईटरेल्वे वन ॲप आणि संगणकीकृत पीआरएस वर उपलब्ध आहे.

गडचिरोली, नागपूर व भंडारा जिल्ह्यांमध्ये वैविध्यपूर्ण विकास प्रकल्प

 

  • गडचिरोलीनागपूर व भंडारा जिल्ह्यांमध्ये वैविध्यपूर्ण विकास प्रकल्प

 

मुंबईदि. २२ : "आदिवासी समुदायाचे जीवनमान उंचावणे, त्यांच्या जीवनात शाश्वत विकास घडवून आणण्यासाठी सार्वजनिक आणि सामाजिक क्षेत्राचा सहभाग आवश्यक आहे. कृषी आधारित वैविध्यपूर्ण योजना राबवल्या जात असून त्यांच्या शाश्वत विकासासाठी मॉयल लिमिटेड’ चे योगदान महत्त्वपूर्ण आहे," असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

             मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "नीती आयोगाने (NITI Aayog) देशातील निवडक आकांक्षी जिल्ह्यांमध्ये गडचिरोलीचा समावेश केला आहे. स्वयंसेवी संस्थाचा सहभाग व 'मॉयल लिमिटेड’ च्या योगदानातून विविध जिल्ह्यातील आदिवासी समुदायासाठी शाश्वत परिणामकारक उपाययोजना राबविण्यात येतील. यात सहभागी सामाजिक क्षेत्रातील जलसंवर्धनकृषी व वन-आधारित उपजीविका या क्षेत्रात ‘बायफ’ संस्थेचे विकासात्मक दीर्घकालीन कार्यही चांगले आहे ," असे त्यांनी नमूद केले. या योगदानासाठी मॉयल लिमिटेड’ चे अभिनंदन केले.

पिठोरी पूजा फोटो रवींद्र गायकर,


 

Tuesday, 12 August 2025

सोशल मीडियावरील कोणत्याही मोहाला बळी पडू नका,

 गरुड दृष्टी’ सोशल मिडिया मॉनिटरिंग व सायबर इंटेलिजन्सच्या मदतीने तब्बल 10 कोटी रुपये संबंधीत लोकांना परत

सोशल मीडियावरील कोणत्याही मोहाला बळी पडू नका!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नागरिकांना आवाहन

गरुड दृष्टी’ एआय टूल्स बाबत सादरीकरण

 

नागपूरदि 10 :- काही समाज विघातक लोकांनी समाजमाध्यमांवरून जातीय द्वेषमूलक चिथावणी दिल्यामुळे दंगली उसळलेल्या आपण पहिल्या आहेत. अशा गुन्हेगारीला आला घालण्यासाठी आता जगातील सर्वोत्तम यंत्रणा व तंत्रज्ञान महाराष्ट्राकडे आहे. अशा लोकांना हुडकून त्यांच्यावर तात्काळ कारवाईसाठी 'गरुड दृष्टीहे टूल्स महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

नागपूर पोलीस विभागाच्या वतीने पोलीस भवन येथे गरुड दृष्टी’ सोशल मिडिया मॉनिटरिंग व सायबर इंटेलिजन्स प्रकल्पाबाबत सादरीकरण आणि विविध सायबर आर्थिक गुन्ह्यांच्या तपासातून प्राप्त झालेल्या तब्बल 10 कोटी रुपये रकमेच्या वितरण समारंभात ते बोलत होते. त्यांच्या हस्ते या रकमा फसवणूक झालेल्या संबंधित व्यक्तींना वितरित करण्यात आल्या. यावेळी पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगलसहपोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डीअतिरिक्त पोलीस आयुक्त सर्वश्री वसंत परदेशीराजेंद्र दाभाडेशिवाजी राठोड व वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

सोशल मिडीयाचा गैरवापर

 स्वतःचे विचार मांडण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून सोशल मीडियाचा होणारा वापर उत्तम असला तरी काही समाज विघातक प्रवृत्ती द्वेष पसरवणेधमक्या देणेहेट स्पीचफेक न्यूजअंमली पदार्थांची तस्करीसाठी या प्लॅटफॉर्मचा वापर करताना आपण पाहतो. यातील आर्थिक फसवणुकीचे प्लॅटफॉर्म बहुतांश परदेशी ऑपरेटर चालवतात.  त्यामुळे सर्वांनी सावध असले पाहिजे. आपल्या मोबाईलवर कोणत्याही प्रकारच्या येणाऱ्या ऑफर्स आर्थिक फसवणुकीसाठी टाकलेले जाळे आहे हे लोकांनी लक्षात घेतले पाहिजे. जर आपली आर्थिक फसवणूक झाली आहे हे लक्षात आल्यास शक्य तेवढ्या लवकर 1930 व 1945 या क्रमांकावर नागरिकांनी संपर्क साधावा असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

Monday, 11 August 2025

कुरेशी समाजाच्या व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही

 कुरेशी समाजाच्या व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही

- उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतर कुरेशी समाज संघटनांचा संप मागे

 

            मुंबई दि. 6 : कुरेशी समाज हा परंपरेने मांस व्यापाराशी जोडलेला असून महाराष्ट्राच्या कृषी आधारित अर्थव्यवस्थेचा एक भाग आहे. त्यामुळे या समाजाच्या व्यापाऱ्यांवर आणि जनावरांची वाहतूक करणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय होऊ दिला जाणार नाहीअशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

         उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या समिती कक्षात कुरेशी समाजाच्या विविध प्रश्नांसंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

Sunday, 10 August 2025

होमिओपॅथी, फिजिओथेरपी, पंचकर्म, अ‍ॅक्यूपंक्चर, सुजोक, न्यूट्रिशन थेरपी, योग व नैसर्गिक उपचार उपलब्ध

  

मानवी सेवा हीच ईश्वर सेवा मानून जीवनस्पर्श केंद्रात सेवाभावाने  उपचार करावेत

- उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

 

जीवनस्पर्श संयुक्त वैद्यकीय उपचारपद्धती केंद्राचे

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

 

मुंबई,दि.३० मानवी सेवा हीच ईश्वर सेवा मानून अत्याधुनिक तंत्रज्ञान व तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून मानवी कर्तव्य समजून सेवाभावाने या केंद्रात उपचार करावेत.  समाजातील गरजू व आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या रुग्णांना वैद्यकीय मदत कशी देता येईलयाबाबत संवेदनशील दृष्टिकोन ठेवावा, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

          गिरगाव परिसरातील चिराबाजार येतील जीवनस्पर्श या नावाने आधुनिक व पारंपरिक उपचारांचा संगम असलेल्या संयुक्त वैद्यकीय उपचारपद्धती केंद्राचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी डॉ. मानसी नागरेंकरडॉ.सुरेश नागरेंकर, डॉ. अमिता नागरेंकर उपस्थित होते.

कोणताही गरजू रुग्ण आर्थिक अडचणीमुळे उपचारांपासून वंचित राहू नये. अशा रुग्णांसाठी आवश्यक ठिकाणी मी स्वतः मदतीसाठी पुढे येईन, हे उपचार केंद्र व्यवसायिक दृष्टीकोन न ठेवता श्रद्धेचेसमतेचे आणि माणुसकीचे मंदिर असावे असे मंत्री श्री.पाटील यांनी यावेळी सांगितले.

          डॉ. मानसी सुरेश नागरेंकर यांच्या मार्गदर्शनाखाली होमिओपॅथीफिजिओथेरपीपंचकर्मअ‍ॅक्यूपंक्चरसुजोकन्यूट्रिशन थेरपीयोग व नैसर्गिक उपचार यांचा प्रभावी संगम या केंद्रात उपलब्ध करून देण्यात आला आहे.

Saturday, 9 August 2025

हिंदू परंपरेतील रक्षाबंधन सणाचे महत्त्व स्पष्ट करताना, मुख्यमंत्र्यांनी हा केवळ राखीचा धागा नाही, तर प्रेमाचा धागा

   हिंदू परंपरेतील रक्षाबंधन सणाचे महत्त्व स्पष्ट करतानामुख्यमंत्र्यांनी हा केवळ राखीचा धागा नाहीतर प्रेमाचा धागा आहे. बहीण भावावरचे प्रेम यातून व्यक्त होते. या धाग्यातून भाऊ बहिणीच्या रक्षणाची शपथ घेतो असे सांगितले. मात्रआता भावांनीमी माझ्या बहिणीला इतके सक्षम बनवेन की ती स्वतःचेच नव्हेतर कुटुंबाचेही रक्षण करू शकेलअसा संकल्प करण्याची वेळ आली असल्याचे सांगून महिलांच्या सामाजिक-आर्थिक सक्षमीकरणासाठी केंद्र व राज्य सरकार विविध योजनांच्या माध्यमातून प्रयत्न करत असल्याची माहिती त्यांनी दिली.

Wednesday, 6 August 2025

सोलर प्लेट पाण्याने ओल्या कपड्याने साफ करीत असता शॉक लागून युवकांचा मृत्यू pl share take care.

 सोलर प्लेट पाण्याने ओल्या कपड्याने साफ करीत असता शॉक लागून युवकांचा मृत्यू.

         तरी सर्व सोलर धारकांनी सतर्क व सजग राहणे आवशयक आहे.

सगळी माहिती लक्षात घ्या 🙏🏻

सोलर पॅनेलमध्ये वीज (DC करंट) सतत तयार होत असते

दिवसा सूर्यप्रकाशात ती पूर्णपणे Active असते…

जर हात ओले असतील, कपडे ओले असतील किंवा वायरिंगमध्ये काहीतरी गडबड असेल

तर लगेचच शॉक लागतो… आणि तो शॉक खूप जास्त धोकादायक असतो ⚡


DC करंटमध्ये हात पकडला गेला तर तो सुटत नाही…

म्हणूनच सोलर प्लेट सफाई करताना हे लक्षात ठेवा ⬇️


✅ सकाळी लवकर किंवा संध्याकाळीच साफ करा

✅ सोलर Disconnect स्विच बंद करूनच सफाई करा

✅ ओले कपडे, ओले हात वापरू नका

✅ लोखंडी ब्रश किंवा हाताने थेट पॅनेलला स्पर्श करू नका

✅ रबरचे ग्लोव्हज वापरा

✅ मुलांना सोलर सिस्टिमपासून दूर ठेवा

✅ दर 6 महिन्यांनी वायरिंग आणि कनेक्शन तज्ज्ञांकडून तपासून घ्या


⚠️ लक्षात ठेवा – सोलर वापरणं फायद्याचं आहे, पण योग्य काळजी घेतली तरच!

जरा चुकीनं हाताळलं, की जीव धोक्यात येतो…


👉🏻 सर्व शेतकरी व सोलर वापरणाऱ्यांना नम्र विनंती –

सतर्क राहा, सजग राहा…

श्रावण आला g सखी,


 




Tuesday, 5 August 2025

प्रो गोविंदा लीग 2025 वाराणसी महादेव असेंडर्स का 75 लाख रुपये मे हुआ अधिग्रहण 7 से 9 ऑगस्ट तक रोमांच

 प्रो गोविंदा लीग 2025 

वाराणसी महादेव असेंडर्स का 75 लाख रुपये मे हुआ अधिग्रहण

7 से 9 ऑगस्ट तक रोमांच 



मुंबई, 5 अगस्त 2025: 'ग्लोबल वेंचर्स' के तहत काम करने वाली 'अस्पेक्ट स्पोर्ट्स' ने 'प्रो गोविंदा लीग 2025' के लिए 'वाराणसी महादेव असेंडर्स' का अधिग्रहण कर लिया है। पहले यह टीम 'ओम ब्रह्मांड साई गोविंद पथक' (मालाड पश्चिम) के नाम से जानी जाती थी। यह अधिग्रहण ₹74 लाख में हुआ है।

अब यह टीम 'वाराणसी महादेव असेंडर्स' के नए नाम से 7 से 9 अगस्त तक मुंबई के वर्ली स्थित एनएससीआई डोम में होने वाली इस बहुप्रतीक्षित प्रतियोगिता में भाग लेगी।

अस्पेक्ट ग्लोबल वेंचर्स की कार्यकारी अध्यक्षा, श्रीमती अक्षा कंबोज ने इस अधिग्रहण पर बोलते हुए कहा, “हमें ऐसी टीम के साथ प्रो गोविंदा लीग 2025 में हिस्सा लेने पर बहुत गर्व है, जो धैर्य, अनुशासन और गहरी सांस्कृतिक जड़ों का प्रतीक है। वाराणसी महादेव असेंडर्स सिर्फ एक टीम नहीं, बल्कि भारत के युवाओं की भावना का प्रतिनिधित्व करती है, जो परंपरा और टीम वर्क के जरिए आगे बढ़ते हैं।”

यह लीग महाराष्ट्र सरकार द्वारा मान्यता प्राप्त है और यह परिवहन मंत्री प्रताप सरनाईक के विचारों से प्रेरित है। इस लीग का उद्देश्य दही हांडी की सदियों पुरानी परंपरा को एक सुरक्षित, प्रशिक्षित और प्रायोजित पेशेवर खेल में बदलना है।

इस साल के टूर्नामेंट की कुल पुरस्कार राशि ₹1.5 करोड़ है, जिसमें विजेता टीम को ₹75 लाख मिलेंगे। इसके अलावा, प्रत्येक टीम को भागीदारी प्रोत्साहन के रूप में ₹3 लाख दिए जाएंगे, जिससे यह लीग एक गंभीर प्रतिस्पर्धी मंच के रूप में स्थापित होगी। श्रीमती अक्षा कंबोज के स्वामित्व वाली वाराणसी महादेव असेंडर्स अपनी मजबूत भावना और विरासत को राष्ट्रीय स्तर पर पहचान दिलाने के लिए तैयार है।

----------------------

मुंबईत प्रो गोविंदा लीग २०२५ चा ७ ऑगस्ट पासून थरार pl share



 मुंबईत प्रो गोविंदा लीग २०२५ चा ७ ऑगस्ट पासून थरार 


मुंबई, ५ ऑगस्ट २०२५ : ' ग्लोबल व्हेंचर्स 'अंतर्गत कार्यरत असलेल्या ‘अस्पेक्ट स्पोर्ट्स'च्या वतीने बहुप्रतिक्षित 'प्रो गोविंदा लीग २०२५' साठी पूर्वी ओम ब्रह्डमांड साई गोविंद पथक (मालाड पश्चिम) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या संघाचे आता ७४ लाख रुपयात अधिग्रहण केले असून त्यानंतर या पथकाचे वाराणसी महादेव अॅसेन्डर्स नावाने रिब्रॅंड करण्यात आले आहे. मुंबईतील वरळी येथील एनएससीआय डोम येथे ७ ते ९ ऑगस्ट डार्विन ही स्पर्धा पार पडणार आहे.

या अधिग्रहणावर बोलताना अस्पेक्ट ग्लोबल व्हेंचर्सच्या कार्यकारी अध्यक्षा श्रीमती अक्षा कंबोज म्हणाल्या की, “धैर्य, शिस्त आणि सखोल मुळे असलेल्या सांस्कृतिक मूल्यांचे मूर्त स्वरूप असलेल्या संघासह प्रो गोविंदा लीग २०२५ मध्ये सहभागी होण्याचा आम्हाला अत्यंत अभिमान वाटतो. वाराणसी महादेव अॅसेन्डर्स म्हणजे निव्वळ संघ नसून परंपरा आणि सांघिक कार्याद्वारे उदयास येणाऱ्या भारताच्या युवकांच्या भावनेचे प्रतिनिधित्व करतो.

महाराष्ट्र सरकारची अधिकृत मान्यता लाभलेल्या प्रो गोविंद लीगचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही लीग, शतकानुशतके जुनी परंपरा सुरक्षितता, प्रशिक्षण आणि प्रायोजकत्वाद्वारे समर्थित व्यावसायिक, दूरचित्रवाणीवरील क्रीडा स्पर्धेत रूपांतरित करून दहीहंडीच्या खेळात क्रांती घडवून आणणार आहे.

या मोसमाचे एकूण बक्षीस मूल्य १.५ .कोटी रुपयांचे असून ज्यात विजेत्यांसाठी ७५ लाख रुपयांचा  समावेश करण्यात आला आहे. तसेच प्रत्येक संघासाठी ३ लाख रुपयांचा सहभाग प्रोत्साहन मूल्यासह, एक गंभीर स्पर्धात्मक व्यासपीठ म्हणून लीगची स्थिती मजबूत करते. श्रीमती अक्षा कंबोज यांच्या मालकीची वाराणसी महादेव अॅसेन्डर्स ही संस्था त्यांची प्रबळ भावना आणि वारसा राष्ट्रीय प्रकाशझोतात आणण्यासाठी सज्ज येत्या गोविदात सज्ज होत आहे.


मानवी सेवा हीच ईश्वर सेवा मानून ‘जीवनस्पर्श केंद्रात’ सेवाभावाने उपचार करावेत

 मानवी सेवा हीच ईश्वर सेवा मानून जीवनस्पर्श केंद्रात सेवाभावाने  उपचार करावेत

- उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

 

जीवनस्पर्श संयुक्त वैद्यकीय उपचारपद्धती केंद्राचे

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

 

मुंबई,दि.३० मानवी सेवा हीच ईश्वर सेवा मानून अत्याधुनिक तंत्रज्ञान व तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून मानवी कर्तव्य समजून सेवाभावाने या केंद्रात उपचार करावेत.  समाजातील गरजू व आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या रुग्णांना वैद्यकीय मदत कशी देता येईलयाबाबत संवेदनशील दृष्टिकोन ठेवावा, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

          गिरगाव परिसरातील चिराबाजार येतील जीवनस्पर्श या नावाने आधुनिक व पारंपरिक उपचारांचा संगम असलेल्या संयुक्त वैद्यकीय उपचारपद्धती केंद्राचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी डॉ. मानसी नागरेंकरडॉ.सुरेश नागरेंकर, डॉ. अमिता नागरेंकर उपस्थित होते.

कोणताही गरजू रुग्ण आर्थिक अडचणीमुळे उपचारांपासून वंचित राहू नये. अशा रुग्णांसाठी आवश्यक ठिकाणी मी स्वतः मदतीसाठी पुढे येईन, हे उपचार केंद्र व्यवसायिक दृष्टीकोन न ठेवता श्रद्धेचेसमतेचे आणि माणुसकीचे मंदिर असावे असे मंत्री श्री.पाटील यांनी यावेळी सांगितले.

          डॉ. मानसी सुरेश नागरेंकर यांच्या मार्गदर्शनाखाली होमिओपॅथीफिजिओथेरपीपंचकर्मअ‍ॅक्यूपंक्चरसुजोकन्यूट्रिशन थेरपीयोग व नैसर्गिक उपचार यांचा प्रभावी संगम या केंद्रात उपलब्ध करून देण्यात आला आहे.

Sunday, 3 August 2025

भटके विमुक्त दिवस’ ३१ ऑगस्ट रोजी साजरा करण्याचा निर्णय

 भटके विमुक्त दिवस’ ३१ ऑगस्ट रोजी साजरा करण्याचा निर्णय

-         इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे

मुंबईदि. ३१ : राज्य व जिल्हास्तरावर ३१ ऑगस्ट रोजी भटके विमुक्त दिवस’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे. याबाबतचा इतर मागास बहुजन कल्याण विभागाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असल्याची माहिती इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी दिली.

मंत्री श्री. सावे म्हणालेराज्य शासनाचा हा निर्णय केवळ प्रतीकात्मक नसून भटके विमुक्त समाजाच्या सामाजिक न्यायआत्मसन्मान आणि प्रतिष्ठेसाठी एक निर्णायक टप्पा आहे. या दिवशी होणाऱ्या कार्यक्रमातून या समुदायाचा संघर्षयोगदान आणि सामाजिक हक्क समाजातील अन्य घटकांपर्यंत पोहोचेल.

 या दिवशी भटक्या व विमुक्त समाजाच्या संस्कृतीतील जीवनमूल्येपरंपरा यांचे दर्शन घडविणारे सांस्कृतिकशैक्षणिक व माहितीपर उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

तसेच शासकीय व अनुदानित आश्रमशाळा तसेच शासकीय वसतिगृहांमध्ये विद्यार्थी आरोग्य तपासणीआधारकार्ड नोंदणीजातीचा दाखला आणि जात वैधता प्रमाणपत्रासाठी आवश्यक दस्तऐवजांची माहिती देणाऱ्या शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या विभागातील व जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये हा कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्याबाबत आवश्यक त्या सूचना निर्गमित कराव्यात व अंमलबजावणीची कार्यवाही सुनिश्चित करावी. ३१ ऑगस्ट रोजी सार्वजनिकसाप्ताहिक किंवा स्थानिक सुट्टी असली तरीही 'भटके विमुक्त दिवसयाच दिवशी साजरा करण्यात येणार असल्याचे शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे.

0000

Featured post

Lakshvedhi