Showing posts with label मार्गदर्शन केंद. Show all posts
Showing posts with label मार्गदर्शन केंद. Show all posts

Wednesday, 23 April 2025

विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार 2023 जाहीर

 विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार 2023 जाहीर

 

मुंबई, दि. 22 : राज्य शासनाच्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाकडून दिले जाणारे कामगार भूषण व विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार 2023 कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी जाहीर केले.

कामगार भूषण पुरस्कारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील बजाज ऑटो लिमिटेडचे कामगार श्रीनिवास कोंडिबा कळमकर यांची निवड करण्यात आली आहे. कामगारांसाठी असलेल्या या सर्वोच्च पुरस्कारासाठी राज्यातून केवळ एका कामगाराची निवड केली जाते. विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कारासाठी राज्यभरातून ५१ कामगारांची निवड करण्यात आली आहे. नोकरी करत असतानाच विविध सामाजिकसांस्कृतिकशैक्षणिकक्रीडासंघटन आदी क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या कामगारांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. दरवर्षी एका कामगाराची कामगार भूषण पुरस्कारासाठी तर ५१ कामगारांची विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कारासाठी निवड करण्यात येते.

कामगार मंत्री अॅड.आकाश फुंडकरकामगार राज्यमंत्री अॅड.आशिष जयस्वालकामगार विभागाच्या प्रधान सचिव आय.ए.कुंदनकामगार कल्याण आयुक्त रविराज इळवे यांनी सर्व पुरस्कार्थींचे अभिनंदन केले आहे. हुतात्मा बाबू गेनू मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवनप्रभादेवीमुंबई येथे येत्या १३ मे रोजी या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

2024 च्या पुरस्कारासाठी अर्ज

सन २०२४ मधील विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार आणि कामगार भूषण पुरस्कारासाठी अर्ज मागवण्याची प्रक्रिया २८ एप्रिल २०२५ पासून सुरु करण्यात येत आहे. या पुरस्कारांचे अर्ज मंडळाच्या www.public.mlwb.in या संकेतस्थळावर तसेच राज्यातील विविध कामगार कल्याण केंद्रात उपलब्ध करून देण्यात येतील. हे अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत २३ मे २०२५ आहे.

पुरस्काराचे स्वरुप -

कामगार भूषण पुरस्कारासाठी रु.५० हजारस्मृतीचिन्ह आणि मानपत्र देऊन गौरवण्यात येतेतर गुणवंत कामगार कल्याण पुरस्कारासाठी रु.२५ हजारस्मृतीचिन्ह आणि मानपत्र प्रदान करण्यात येते.

पुरस्कार्थींची नावे - 

कामगार भूषण पुरस्कार :

श्रीनिवास कोंडिबा कळमकरमल्टिस्कील ऑपरेटरबजाज ॲटो लिमिटेडबजाजनगरछत्रपती संभाजीनगर.

विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार :

१) नेहा विलास भांडारकरभारतीय आर्युविमा महामंडळनागपूर,

२) महेश मधुकर सावंत-पटेलसीमेन्स लिमिटेड,ठाणे-बेलापूर रोडठाणे

३) चंद्रकांत महादेव कांबळेबजाज ॲटो लिमिटेड,वाळूजछत्रपती संभाजीनगर

४) दादासाहेब सुरेंद्र भंडेस्कोडा ॲटो फोक्सवॅगन इंडिया प्रा.लि.,छत्रपती संभाजीनगर

५) नरेंद्र शंकर गोखलेराष्ट्रीय केमिकल्स ॲण्ड फर्टिलायझर्स लिमिटेडथळता.अलिबागजि.रायगड.

६) विजय रामेश्वर बोराडेहिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड खामगांवजि.बुलडाणा

७) सचिन लक्ष्मण पिंगळेमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळविभागीय कार्यालयबुलडाणा

८) संदीप सतीश रांगोळेटाटा मोटर्स कंपनी लिमिटेडपिंपरीपुणे

९) उमेश रामचंद्र फाळकेटाटा मोटर्स कंपनी लिमिटेडपिंपरीपुणे

10) राजकुमार गुलाबराव किर्दतअल्फा लावल इंडिया लिमिटेड,सातारा

11) नामदेव रामसा उईकेसी.आय.ई. ॲटोमोटिव्ह इंडिया कास्टींग लि.उर्सेगांवता.मावळजि.पुणे

12) निमीषा नितीन मोहरीरभारतीय जीवन बिमा निगमनागपूर

13) दिगंबर शंकरराव पोकळेकमिन्स इंडिया लिमिटेडकोथरुडपुणे

14) दत्तात्रय सुखदेव दगडेस्कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडिया प्रा.लि.निघोजे म्हाळुंगे खराबवाडीता.खेडचाकणपुणे

15) संजय जयसिंग देशमुखथरमॅक्स लिमिटेडचिंचवडपुणे

16) विकास चंद्रकांत धुमाळमहाराष्ट्र स्कुटर्स लि.सातारा लि.आकुर्डीपुणे

17) बद्रिनाथ शिवनाथ भालगडेमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळसिल्लोडता.सिल्लोडजि. छत्रपती संभाजीनगर

18) प्रविण बबन जाधवगोदरेज ॲण्ड बॉईजमॅन्युफॅक्चरिंग कंपनी लि.,शिंदेवाडीशिरवळता.खंडाळाजि.सातारा

19) मनोज अनंत पाटीलटाटा स्टील लिमिटेडएम.आय.डी.सी.तारापूरजि.पालघर

20) सुनिता रविंद्र परमणेमहाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादितपोफळीता.चिपळूणजि. रत्नगिरी

21) प्रकाश बाबुराव चव्हाणटाटा मोटर्स पॅसेंजर्स व्हेईकल्स लिमिटेड चिखलीपुणे

22) शिवराज दादासो शिंदेप्रिमियम ट्रांन्समिशन प्रा.लिमिटेड,चिंचवडपुणे

23) कविता नरेश भोसलेमुंबई पोर्ट ट्रस्टमुंबई पोर्ट ट्रस्ट रुग्णालयवडाळा (पूर्व)मुंबई

24) मनोज देविदास गवळीमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळधुळे

25) रविंद्र बाबाजी जाधवविचारे एक्सप्रेस ॲण्ड लॉजिस्टीक प्रा.लि.कांदिवली (प)मुंबई

26) मारोती सदाशिव पिंपळशेंडेचंद्रपुर महाऔष्णिक विद्युत निर्मिती केंद्रमहाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित,ऊर्जानगर

27) साखरचंद मारुती लोखंडेमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळमध्यवर्ती कार्यशाळादापोडीपुणे

28) देविदास पंडीत पवारमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळधुळे

29) किसन दामोधर नागरकर,महाराष्ट्र राज्य विद्दुत पारेषण कंपनी मर्यादित बल्लारशाह

३०) रविंद्र किसनराव रायकरकमिन्स इंडिया लिमिटेडकोथरुडपुणे

31) वंदना अशोक मनपेचंद्रपुर महाऔष्णिक विद्युत निर्मिती केंद्रमहाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादितऊर्जानगरचंद्रपुर

32) विवेक सर्जेराव रावतेमहाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादितइस्लामपुर,ता.वाळवाजि.सांगली

33) देवकी ओमप्रकाश कोकासबिल्ट पेपर ग्राफिक्स प्रॉडक्ट लिमिटेडबल्लारपूरपेपर मिल्सचंद्रपूर

34) एकनाथ रमेश उगलेथरमॅक्स लिमिटेडचिंचवडपुणे

35) राजेंद्र ज्ञानदेव कांबळेदि कराड को-ऑप.बँक लिमिटेडकराड

36) संजय दगु गोराडेकिमप्लास पाईपिंग सिस्टीम प्रा.लिमिटेड,अंबडनाशिक

37) नितीन आनंदराव देडगेवनाझ इंजिनिअर्स लिमिटेडकोथरुडपुणे

38) सुनिल गुंडू दळवीविभाग नियंत्रक यांचे कार्यालय मध्यवर्ती बसस्थानककोल्हापूर

39) पोपट चंदु रसाळस्टरलाईट टेक्नॉलॉजीछत्रपती संभाजीनगर

40) अजित अनंत कामतेकरराष्ट्रीय केमिकल्स ॲण्ड फर्टिलायझर्स लिमिटेडथळता.अलिबागजि.रायगड

41) गुणवंत वसंतराव भारस्करमहाराष्ट्र राज्यल विद्युत वितरण कंपनी लि.वाशिम

42) नंदकुमार साहेबराव पाटीलगोदरेज ॲण्ड बॉईज मॅ.कंपनी लिमिटेडफिरोजशहा नगरविक्रोळीठाणे

43) संजय दिनकर चव्हाणकिर्लोस्कर ऑईल इंजिन लिमिटेडखडकीपुणे

44) सचिन मारुती पवारमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळठाणे आगारजि.ठाणे

45) विजय काशीराम नंदागवळीमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळनागपूर रोडभंडारा

46) भारत गोरख मांडेकेबल कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमाळेगावता.सिन्नरजि.नाशिक

47) शिवाजी नागनाथराव राऊतमेटलमॅन ऑटो प्रायव्हेट लिमिटेड,वाळुजछत्रपती संभाजीनगर

48) अमोल अशोक आळवेकरमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळकोल्हापूर आगारजि. कोल्हापूर

49) दिपक वसंतराव पाटीलहिंदुस्थान एरोनॉटीक्स लिमिटेड,ओझर (मिग)ता.निफाडजि. नाशिक

50) विलास मोरेश्वर पंचभाईमहिन्द्रा ॲण्ड महिन्द्रा लिमिटेडसातपूर नाशिक

51) अनंत अशोक शिंदेमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळजळगाव

0000

Tuesday, 8 April 2025

दिव्यांगांच्या रोजगारासाठी धोरण आणणार,स्वतंत्र घरकुल योजना,अंत्योदय योजनेत दिव्यांगांचा समावेश

 दिव्यांगांच्या रोजगारासाठी धोरण आणणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

  • दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी नवनवीन योजनाधोरणांची निर्मिती करावी
  • विशेष सहाय्य योजनेचे अर्थसहाय्य डीबीटी प्रणालीद्वारे जमा
  • घरकुलासाठी स्वतंत्र योजना

 

             मुंबईदि. ७ : जन्मजात किंवा काही कारणास्तव दिव्यांगत्व आलेल्या दिव्यांग बांधवांना आयुष्य जगत असताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. दिव्यांगत्वावर मात करीत आपल्या जीवनात उत्कर्षाचा मार्ग शोधावा लागतो. अशा दिव्यांग बांधवांच्या आयुष्यात समृद्धी निर्माण करण्यासाठी काल सुसंगत नवनवीन योजनाधोरणांची निर्मिती करण्याचे निर्देश देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या धोरणांची योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही दिल्या. 

सह्याद्री अतिथिगृह येथे दिव्यांग बांधवांच्या विविध समस्यांबाबत आयोजित आढावा बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारमाजी राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडूमुख्य सचिव सुजाता सौनिक उपस्थित होते.

दिव्यांगाच्या रोजगारासाठी धोरण

  राज्यातील दिव्यांगाना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असून त्यांना कौशल्य प्रशिक्षणरोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.दिव्यांगाच्या रोजगाराकरिता धोरण तयार करण्यात येणार असून रोजगार व स्टॉल बाबतचे धोरण तयार करण्याचे निर्देश कौशल्य विकास व उद्योग विभागाला दिले आहे.

लाडकी बहीण योजनेप्रमाणे दिव्यांग लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य बँक खात्यात जमा होणार

  राज्यातील दिव्यांग बांधवांना अधिक सुलभतेने लाभ मिळावा यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असूनलाडकी बहीण योजनेप्रमाणे दिव्यांग बांधवांचे अर्थसहाय्य थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.

            दिव्यांग लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य वाढवण्याबाबतही शासन सकारात्मक असून दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या जीवनमानात सुधारणा करण्यासाठी शासन सकारात्मक आहे.

विशेष सहाय्य योजनेच्या अर्थसाहाय्याचे वितरण डीबीटी प्रणालीद्वारे

राज्यातील दिव्यांग नागरिकांसाठी राबविण्यात येणाऱ्या विशेष सहाय्य योजनेचे अर्थसाहाय्य थेट लाभ हस्तांतरण (DBT) प्रणालीद्वारे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा झाले पाहिजे. ज्या लाभार्थ्यांचे बँक खाते आधार लिंक झाले नाही यासाठी जिल्हाधिकारी यांनी कालबद्ध कार्यक्रम हाती घ्यावा. योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी डीबीटी प्रणालीचा अवलंब करणे गरजेचे आहे.

दिव्यांग सर्वेक्षण प्रमाणपत्रासाठी विशेष मोहीम

   दिव्यांग सर्वेक्षण व प्रमाणपत्रासाठी एक विशेष मोहीम राबविण्यात यावी. दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या अपंगत्वाचं प्रमाणपत्र नसल्यामुळे शासकीय योजनासवलतीशिक्षणनोकरी आणि आरोग्यविषयक सुविधा मिळण्यासाठी अडचणी येतात. यासाठी आरोग्य विभाग व वैद्यकीय शिक्षण विभागाने दिव्यांग प्रमाणपत्र वाटपासाठी विशेष मोहीम राबवावी.

प्रत्येक विद्यापीठात दिव्यांगांसाठी स्वतंत्र व्यवस्था

            राज्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणात सुलभ व सन्मानपूर्वक प्रवेश मिळावा यासाठी प्रत्येक विद्यापीठात दिव्यांगांसाठी स्वतंत्र व्यवस्था तयार करण्यात यावी. यामध्ये दिव्यांग अनुकूल पायाभूत सुविधासहाय्यक उपकरणेविशेष मार्गदर्शन केंद्रे आणि समुपदेशन सेवा यांचा समावेश असावा.  शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात दिव्यांग विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावा यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत शासन सकारात्मक विचार आहे. याबाबत उच्च व तंत्र शिक्षण विभागाने प्रस्ताव तयार करून मंत्रिमंडळ बैठकीत सादर करावा.

अंत्योदय योजनेत दिव्यांगांचा समावेश

अंत्योदय अन्न योजनेत पात्र दिव्यांगांचा तातडीने समावेश केला जाणार असूनज्यांचा समावेश विद्यमान निकषांमध्ये होऊ शकत नाहीअशा दिव्यांग व्यक्तींसाठी राज्य शासन स्वतंत्र योजना तयार करणार आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागाने पात्र दिव्यांग व्यक्तींना शिधापत्रिका वाटप करण्यात येत आहेत.

दिव्यांगासाठी जिल्हा वार्षिक योजनेत एक टक्का निधी

राज्यातील दिव्यांग व्यक्तींच्या  सक्षमीकरणाकरिता जिल्हा वार्षिक योजनेत सन २०२५-२६ पासून प्रत्येक वर्षी नियमित योजनांसाठी अनुज्ञेय असलेल्या निधीमधून कमाल १ टक्का निधी राखीव ठेवण्यात येणार आहे. या निधीमधून दिव्यांग व्यक्ती साठीच्या सर्व सोयी सुविधा एका छताखाली उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हा दिव्यांग भवन उभारण्यात येईल.

स्वतंत्र घरकुल योजना

   दिव्यांग नागरिकांना हक्काचा निवारा मिळावा यासाठी राज्य शासन स्वतंत्र घरकुल योजना तयार करणार आहे. ज्यांच्याकडे स्वतःची जमीन नाहीअशा लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी आवश्यक जागेसाठीही शासन मदत करणार आहे.

            दिव्यांग महामंडळाच्या माध्यमातून कर्जमाफीसार्वजनिक आरोग्य विभागामार्फत शासकीय रुग्णालयात दर्जेदार औषधे मिळणेदिव्यांगाच्या कायद्यानुसार प्रत्येक विभागाने दिव्यांगावर पाच टक्के खर्च करणे,  प्रशिक्षण व स्वतंत्र क्रीडा स्टेडियमअति तीव्र दिव्यांगाचे संगोपनमानधन असलेल्या पदांमध्ये दिव्यांगाना प्राधान्यजिल्हास्तरावर तालुकास्तरावर विविध समितीमध्ये दिव्यांग सदस्यांची नियुक्तीराज्यस्तरावर दिव्यांगासाठी फेस्टिवलचे आयोजन करणे याबाबत बैठकीत सकारात्मक चर्चा करण्यात आली.

या बैठकीस विविध विभागाचे अपर मुख्य सचिवप्रधान सचिवसचिव उपस्थित होते.


Thursday, 27 March 2025

आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या वाढविणे आणि सेवा दरवाढीबाबत,pl share

 आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या वाढविणे आणि सेवा दरवाढीबाबत

माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांचे विधानसभेत निवेदन

 

मुंबई, दि. २६ : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा सुलभ आणि जलदगतीने उपलब्ध करून देण्यासाठी "आपले सरकार सेवा केंद्र" सुरू करण्यात आले आहे. आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या वाढविणे व या केंद्रांमार्फत देण्यात येणाऱ्या सेवांच्या दरवाढीबाबत माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी विधानसभेत निवेदन केले.

राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना विविध शासकीय सेवा,लाभ मिळविण्यासाठी लागणारा श्रमनिधी व वेळ यांचा अपव्यय टाळता यावा व त्यांना माहिती तंत्रज्ञानाच्या सहाय्याने विहित मुदतीत विविध विभागांच्या सुविधा मिळाव्यात यासाठी राज्यामध्ये आपले सरकार सेवा केंद्रांची स्थापना करण्यात आलेली आहे. परंतुलोकसंख्येच्या तुलनेत आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या कमी असल्या कारणाने  आपले सरकार सेवा केंद्रे स्थापन करण्याचे सुधारित निकष जाहीर केले आहेत.

सुधारित निकष

५ हजार पेक्षा कमी लोकसंख्या प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रात -सेवा केंद्रांची संख्या - २ज्या ग्रामपंचायतीची लोकसंख्या ५हजार  पेक्षा अधिक लोकसंख्या (२०११ च्या जनगणनेनुसार) - ४बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्र - १२हजार ५०० लोकसंख्येसाठी - २,

इतर महानगरपालिका व नगरपरिषद – १० हजार लोकसंख्येसाठी - २प्रत्येक नगरपंचायत क्षेत्रात - २

५ हजार पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या नगर पंचायतीत - ४ असे असणार आहेत.

सुधारित सेवा दर

 सेवा शुल्क सुधारित दर - ५० रुपये,राज्य सेतू केंद्राचा वाटा २.५ रू.(५%),महआयटीचा वाटा दर - १० रू. (२० %) जिल्हा सेतू सोसायटीचा वाटादर - ५ रू. (१० %),आपले सरकार सेवा केंद्र चालकाचा वाटा (VLE) दर - ३२.५० रू. (६५%) असे असणार आहेत.

तसेच आपले सरकार सेवा केंद्र चालकाद्वारे नागरिकांना घरपोच वितरण सेवा सुरू करण्यात येत असून प्रत्येक घरपोच भेटीसाठी प्रति नोंदणी प्रत्येकी 100 रुपये (कर वगळून) एवढे सेवाशुल्क आकारण्यात येईल दर सेवाशुल्क संबंधित केंद्र चालकांद्वारे अर्जदारांकडून आकारण्यात येईल या शुल्काची विभागणी  महा आयटीचा सेवा दर प्रत्येक ऑनलाईन सेवा बुकिंगसाठी २०% (एकूण दाराचा) वाटाआपले सरकार सेवा केंद्रचालकासाठी सेवा दर घरपोच भेटीसाठी ८०% (एकूण दाराच्या) वाटा.

वरील दर व्यतिरिक्त प्रती अर्ज फी ५० रुपये याप्रमाणे अर्जदारकडून सेवाशुल्क घेण्यात येणार असल्याचेही श्री.शेलार यांनी सांगितले.

Thursday, 27 February 2025

12 ज्योतिर्लिंग माहिती

 *🚩आज महाशिवरात्री २६ फेब्रुवारी २०२५🚩*



*🔺12 ज्योतिर्लिंग माहिती🔺*



सौराष्ट्रे सोमनाथं च श्रीशैले मल्लिकार्जुनम्। उज्जयिन्यां महाकालमोङ्कारममलेश्वरम् ॥१॥

परल्यां वैद्यनाथं च डाकिन्यां भीमशंकरम्। सेतुबन्धे तु रामेशं नागेशं दारुकावने ॥२॥

वाराणस्यां तु विश्वेशं त्र्यम्बकं गौतमीतटे। हिमालये तु केदारं घृष्णेशं च शिवालये ॥३॥

एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रातः पठेन्नरः। सप्तजन्मकृतं पापं स्मरणेन विनश्यति ॥४॥


    सोमनाथ (गुजराथ - वेरावळ)

    मल्लिकार्जुन (आंध्रप्रदेश - श्रीशैल्य)

    महांकालेश्वर (मध्यप्रदेश - उज्जैन)

    ओंकारेश्वर (मध्यप्रदेश - ओंकारेश्वर)

    वैजनाथ (महाराष्ट्र - परळी)

    भीमाशंकर (महाराष्ट्र - भीमाशंकर)

    रामेश्वर (तामिळनाडु - रामेश्वर)

    नागेश्वर (महाराष्ट्र - औंढा नागनाथ)

    विश्वेश्वर (उत्तर प्रदेश - वाराणसी)

    त्र्यंबकेश्वर (महाराष्ट्र - त्र्यंबकेश्वर)

    केदारनाथ (उत्तरांचल - केदारनाथ)

    घृष्णेश्वर (महाराष्ट्र *संभाजीनगर*)


१२ ज्योतिर्लिंगे अनेक धर्म व अनेक देवदेवता असणार्‍या भारत देशात अनेक देवदेवतांची तीर्थक्षेत्रे व तेथील यात्रा प्रसिद्ध आहेत. महादेवांच्या भारतातील प्रमुख १२ मंदिरांना १२ ज्योतिर्लिंगे म्हणतात. या १२ ज्योतिर्लिंगांपैकी महाराष्ट्रात ५ ज्योतिर्लिंगे आहेत.


१.  सोमनाथ  (गुजराथ - वेरावळ)-गुजरातमध्ये सौराष्ट्रात वसलेलेसोरटी सोमनाथ मंदिर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. देशातील प्राचीनतीर्थस्थळांत सोमनाथ मंदिराचा समावेश होतो. हे मंदिर गर्भगृह, सभामंडप आणि नृत्यमंडप या तीन प्रमुख भागांमध्ये आहे.याच्या शिखरावरील कलशाचे वजन दहा टन आहे. ध्वजाची उंची 27 फूट आहे.पुराणात या मंदिराच्या अनुषंगाने एककथा आहे. चंद्राचे सोम असे नाव होते. तो दक्षाचा जावई होता. एकदा त्यांनी दक्षाची अवहेलना केली. त्यामुळे राग येऊन दक्षाने त्यांचा प्रकाश दिवसादिवसाने कमी होत जाईल. असा शाप दिला. अन्य देवतांनी दक्षाला उःशाप देण्यास सांगितले. तेव्हा त्यांनी. सरस्वती नदी समुद्राला जिथे मिळते, तेथे स्नान केल्यास या शापाचा परिणाम रहाणार नाही, असे सांगितले. त्यानंतर सोमाने सौराष्ट्रातील या ठिकाणी येऊन येथे स्नान केले आणि भगवान शिवाची आराधना केली. शंकर येथे प्रकट झाले आणि त्यांनी त्याचा उद्धार केला. क्षय नाहींसा होण्याकरितां सोमानें लिंग स्थापून पूजा केलीम्हणून ते सोमनाथ या नावाने प्रसिद्ध झाले .


२. मल्लिकार्जुन(आंध्रप्रदेश - श्रीशैल्य)– गुंटकल बेसवाडा - या छोट्या लाइनवर नंद्याळ स्टेशन आहे. तेथून 28 मैलांवर असलेल्या आत्माकुमार गांवाला मोटारीने जावें लागतें. आत्माकुरहून मल्लिकार्जुन 43 मलै श्रीशैल्यपर्वतावर आहे. रागावून गेलेल्या कुमार कार्तिकेयाला भेटण्याक‍रीतां (मल्लिका) पार्वती व अर्जुन (शंकर) येथें आले म्हणून मल्लिकार्जुन या नावाने प्रसिद्ध झाले. मल्लिकार्जुनाच्या पलीकडे पांच मैलांवर पाताळगंगा (कृष्णा) आहे.


३. महाकाळेश्वर  (मध्यप्रदेश - उज्जैन)-हे मंदिर मध्य प्रदेशच्या उज्जैन जिल्ह्यामध्ये आहे. हे ज्योतिर्लिंग व स्वयंभू असून रुद्रसागर तलावाच्या काठावर उज्जैन शहरात आहे.हे शहर क्षिप्रा नदीच्या किनारी वसले आहे. या शहराला ऐतिहासिक वारसा असून पूर्वी विक्रमादित्य राज्याची राजधानी येथे होती.दर बारा वर्षांनी भरणाऱ्या सिंहस्थ कुंभ मेळ्यातजगभरातून भाविक येथे जमा होतात.श्री महांकालेश्वर ज्योतिर्लिंगची प्रतिमा दक्षिणमुखी आहे. बारा ज्योतिर्लिंगात  दक्षिणमुखी पूजेचे महत्वामुळे फक्त महांकालेश्वर येथेच भस्म आरतीहोते. वर्षात केवळ एकदा महाशिवरात्रिच्या दुसर्या दिवशी भगवान श्री महांकालेश्वरांची दुपारी बारा वाजता भस्म आरती होते .


४. ओंकारेश्वर (मध्यप्रदेश - ओंकारेश्वर) -ॐकारेश्वर मध्य प्रदेशच्या खंडवा जिल्ह्यात आहे. हे नर्मदा नदीमध्ये शिवपुरी नामक बेटावर वसलेले असून मोरटक्का गाव पासून जवळपास २० कि.मी. अंतरावर आहे. हे द्वीप हिन्दू पवित्र चिन्ह ॐ च्या आकारामध्ये बनले आहे. येथे दोन मंदिरे आहेत,  ॐकारेश्वरआणि अमरेश्वर.

ॐकारेश्वर ची निर्मिती नर्मदा नदी पासून झाली आहे. ही नदी भारताची अत्यंत पवित्र नदी आहे. राजा मान्धाता ने येथे नर्मदा किनारी घोर तपस्या करून भगवान शिव ला प्रसन्न केले आणि त्यांच्याकडून येथेच निवास करण्याचे वरदान मागून घेतले.  येथे एकूण ६८ तीर्थ असून येथे ३३ कोटी देवता राहतात अशी कल्पना आहे. याशिवाय येथे २ ज्योतिस्वरूप लिंग यासहित १०८ प्रभावशाली शिवलिंग आहेत. शास्त्र मान्यता अशी आहे की कोणीही तीर्थयात्री देशाची भले ही सारे तीर्थ करून घेऊ दे परंतु जोपर्यंत तो ओंकारेश्वर येऊन केलेल्या तीर्थों चे जल आणून येथे नाही चढवत तोपर्यंत त्याचे सारे तीर्थ अधूरे मानले जातात.


५. परळी वैजनाथ (महाराष्ट्र - परळी)  - भारतातील १२ ज्योतिर्लिंगापैकी परळीच्या वैजनाथ ज्योतिर्लिंगाचे स्थान जागृत आहे. पुण्यश्लोक राणी आहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा जिर्णोद्धार केला. हे मंदिर चिरेबंदी असून भव्य स्वरूपाचे आहे. मंदिराच्या परिसरात लांबलचक असलेल्या पायर्‍या व भव्य प्रवेशद्वार ही लक्ष वेधून घेण्यासारखी ठिकाणे आहेत. मंदिराचा गाभारा व सभामंडप हे एकाच पातळीवर असल्यामुळे सभामंडपातून ज्योतिर्लिंगाचे दर्शन होऊ शकते. इतरत्र कोठेही नाहीपण फक्त वैजनाथ इथे देवाला स्पर्श करून दर्शन घेता येते. मंदिराच्या परिसरात तीन मोठी कुंडे आहेत.

मंदिरापासून जवळच तीन कि. मी. अंतरावर ब्रह्मनदीच्या किनारी ३०० फूट उंचावरील जिरेवाडी येथे सोमेश्वर मंदिर आहे. जवळच अंबाजोगाईचे योगेश्वरी देवीचे मंदिर आहे. परळी वैजनाथ परभणीपासून ६१ कि. मी. अंतरावर आहे .


६. भीमाशंकर  (महाराष्ट्र - भीमाशंकर)- भीमानदीच्या उगमस्थानी असलेले बारा ज्योतिर्लिंगापैकी एक महत्त्वाचे ज्योतिर्लिंग म्हणजे भीमाशंकर आहे. मंदिराबाबत असे म्हणतात की, १८ व्या शतकात नाना फडणीसानी हे मंदिर बांधलेले आहे. मंदिर हेमाडपंती आहे. मंदिरावर उत्कृष्ट कलाकुसरीचे नमुने पाहवयास मिळतात. `भीमा' नदीचा उगम आणि श्री महादेवाचे - शंकराचे स्थान, म्हणून याला `भीमा-शंकर' असे म्हणतात.

भीमाशंकर हे एक थंड हवेचे ठिकाण असून मंदिराच्या आजुबाजुचा परिसर - डोंगरदर्‍यांनी युक्त, दाट जंगलांचा असा - निसर्गरम्य आहे. हे जंगल अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. जवळच कोकणकडा व नागफणी हे दोन महत्त्वाचे कडे आहेत. या कड्यावरून कोकणाचे निसर्गसौंदर्य पाहावयास मिळते.

भीमाशंकर पुण्यापासून मंचर मार्गे १२८ कि.मी. अंतरावर आहे. भीमा नदीचा उगम हा राजगुरूनगर  तालुक्यात झालेला आहे. तर मंदिराच्या पायर्‍यांवरील गावाचा भाग हा आंबेगाव तालुक्यात आहे. श्रावण महिन्यात या ठिकाणी जास्त संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात.


७. रामेश्वर (तामिळनाडु - रामेश्वर)– हे भारताच्या तमिळनाडू राज्यातील रामेश्वरम बेटावरील एक शिवमंदिर आहे. प्रभू रामचंद्रांनि रावणाविरुद्ध झुंजलेल्या युद्धातील पापांचे क्षालन करण्यासाठी या ठिकाणी वाळूचे शिवलिंग बनवून भगवान शंकराची आराधना केली. त्यांच्यावर प्रसन्न होऊन भगवान शंकराने त्या ठिकाणी ज्योतिर्लिंगाच्या रूपात निवास करण्याचे वचन भगवान रामचंद्रांना दिले. हे तीर्थक्षेत्र बारा ज्योतिर्लिंगांपैकी व चार धामांपैकी एक मानले जाते. विशाल नंदी व १००० फुट लांब , ६५० फुट रुंद आणि १२५ फुट उंच असे रामेश्वर चे मंदिर आहे. वार्षिक उत्सवाच्या वेळेस भगवान शंकर व पार्वती ची सोन्या चांदीच्या रथातून भव्य मिरवणूक काढली जाते.


८.नागेश्वर (महाराष्ट्र - औंढा नागनाथ) -पांडवांच्या १४ वर्षाच्या अज्ञातवासात धर्मराज युधिष्ठीर याने औंढा नागनाथाचे मंदिर बांधल्याचे, त्याने महादेवाची स्थापना केल्याचे म्हटले जाते. हेमाडपंती शैलीचे हे नागनाथाचे मंदिर असून याचा विस्तार ६०,००० चौ. फूट एवढा प्रचंड आहे. महादेवाच्या पिंडीसमोर नंदीची मूर्ती नाही, तर नंदिकेश्वराचे स्वतंत्र मंदिर बाजूला आहे हे येथील वैशिष्ट्य आहे. मंदिराच्या आवारात १२ ज्योतिर्लिंगाची छोटी-छोटी मंदिरे असून, १०८ महादेवाची मंदिरे आणि आणखी ६८ महादेवाच्या पिंडी आहेत. याशिवाय वेदव्यासलिंग, भंडारेश्वर, नीलकंठेश्वर, गणपती, दत्तात्रय, मुरलीमनोहर, दशावतार यांची देखील मंदिरे आहेत.

मंदिरावर शिल्पकलेचे उत्कृष्ट काम केलेले आहे. परिसरात मोठे मैदान असून आठ खांबांचे मोठे दालन आहे. संत विठोबा खेचर हे इथलेच. संत नामदेव हे जवळच असलेल्या नरसीचे होते. असे समजले जाते, की, संत नामदेव जेव्हा कीर्तन करीत होते, त्या वेळी नागनाथ मंदिराने आपले तोंड त्या दिशेला फिरवले होते. 

औंढा नागनाथच्या शेजारील राजापूर गावातील उत्खननात प्राचीन काळच्या सुंदर व रेखीव अशा मूर्ती सापडल्या आहेत. सिद्धेश्र्वर व येलदरी ही प्रसिद्ध धरणे व पर्यटनाची ठिकाणे येथून जवळच आहेत. औंढा-नागनाथला जाण्यासाठी परभणीहून ४०-४५ मिनिटे लागतात. नांदेड या शहरापासून ६४ कि. मी. अंतरावर हे ठिकाण आहे. सध्याच्या हिंगोली जिल्ह्यात, औंढा नागनाथ हे स्थान आहे.


 


९. विश्वेश्वर (उत्तर प्रदेश - वाराणसी)–विश्वेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे.शंकराचे हे रूप काशीत पूजले जाते.पूर्वी वाराणसीत काशी विश्वनाथ मंदिर होते. वाराणसी भारताची सांस्कृतिक राजधानी असून ते भारताची पवित्र नदी गंगाच्या किनार्यावर वसलेले आहे. शहराच्या मध्यावर विश्वीनाथ मंदिर असून तेथे भगवान शिव, विश्वेतश्वगर किंवा विश्वेनाथ ज्याकतिर्लिंग स्थापलेले आहे. श्री विश्वेश्वर ज्योतिर्लिंग हे कोणाच्या तपस्येने तयार झाले नसून येथे साक्षात भगवान शिव हेच विश्वनाथ च्या रूपात प्रकट झाले. असे म्हणतात कि येथे मृत्यू येणार्या प्रत्येकास मोक्ष प्राप्ती होते.  


१०. त्र्यंबकेश्वर (महाराष्ट्र - त्र्यंबकेश्वर)– नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील ज्योतिर्लिंग हे भारतातील १२ ज्योतिर्लिंगापैकी एक महत्त्वाचे ज्योतिर्लिंग आहे. या ज्योतिर्लिंगाचे वैशिष्ट्य म्हणजे शिवलिंगास ब्रम्हा, विष्णू, महेश या तिघांच्या प्रतिमा आहेत.त्र्यंबकेश्वर ब्रह्मगिरी या पर्वताच्या पायथ्याशी वसले आहे. हा पर्वत म्हणजे शिवाचे एक रूप मानले जाते.याच पर्वतावर पवित्र गोदावरी नदी उगम पावते. या मंदिराचे बांधकाम इ. स. १७५५ साली पेशवे बाळाजी बाजीरावांनी केल्याचा उल्लेख आढळतो. दर १२ वर्षांनी नाशिकबरोबर त्र्यंबकेश्वरलाही कुंभमेळा भरतो. त्याचबरोबर निवृत्तीनाथांची यात्रा, त्र्यंबकेश्वराची रथयात्रा इ. महत्त्वाच्या यात्रा या ठिकाणी भरतात. त्रिपिंडी नारायण नागबळीचा विधी भारतात फक्त याच ठिकाणी होतो. जवळच ब्रम्हगिरी पर्वत असून या पर्वतावरून महाराष्ट्रातील सर्वार्थाने महत्त्वाची नदी गोदावरीचा उगम होतो. कुशावर्त तीर्थ, गंगाद्वार व मुक्ताई मंदिर, संत ज्ञानेश्वरांचे ज्येष्ठ बंधू निवृत्तीनाथ यांचे समाधी मंदिर इत्यादी महत्त्वाची स्थाने त्र्यंबकेश्वरपासून जवळच्या अंतरावर आहेत.. नाशिकपासून फक्त २८ कि. मी. अंतरावर त्र्यंबकेश्वर हे तीर्थक्षेत्र आहे.


११.केदारनाथ (उत्तरांचल - केदारनाथ) - हे हिमालयातउत्तराखंडच्यारुद्रप्रयाग जिल्ह्यामध्ये मंदाकिनी नदीच्या किनारी आहे. पुराणाप्रमाणे भगवान विष्णू जगाच्या कल्याणाकरिता पृथ्वीवर निवास करण्यासाठी आले.त्यांनी बद्रीनाथ मध्ये आपले पहिले पाउल ठेवले.हे अगोदर भगवान शिवाचे स्थान होते. परंतु भगवान विष्णू साठी त्यांनी या स्थानाचा त्याग केला आणि केदारनाथ मध्ये वास्तव्य केले. या ठिकाणी शंकराचार्यांनी वयाच्या ३२ व्या वर्षी समाधी घेतली. केदारनाथ हे ज्योतिर्लिंगा बरोबरच चार धामा पैकी एक धाम आहे. प्रतिकूल हवामानामुळे हे मंदिर एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीतच दर्शनासाठी खुले असते.


१२. घृष्णेश्वर (महाराष्ट्र -संभाजीनगर- बारा ज्योतिर्लिंगांपैकी घृष्णेश्र्वराचे एक महत्त्वपूर्ण ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहे. शिवशंकराच्या उपासकांसाठी पवित्रस्थान असलेल्या घृष्णेश्र्वर मंदिरात शिवभक्तांची खूप मोठी गर्दी होत असते. पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकरांनी इ.स. १७६५ ते १७९५ दरम्यान घृष्णेश्र्वराचे संपुर्ण मंदिर बांधून त्यावर नक्षीकाम करून घेतले. घृष्णेश्र्वराचे मंदिर संभाजीनगर जिल्ह्यात असून वेरूळपासून अगदी जवळ आहे. या मंदिरापासून जवळच श्रीगणेशाचे २१ आद्यपीठापैकी एक लक्षविनायक मंदिर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे यांच्या घराचे अवशेष (जुना वाडा) देखील मंदिराजवळ आहेत.                                                                   -


Wednesday, 26 February 2025

पर्यावरण रक्षणासाठी सह्याद्री वनराईचे काम प्रेरणादायी

 पर्यावरण रक्षणासाठी सह्याद्री वनराईचे काम प्रेरणादायी

 अभिनेते आणि सह्याद्री वनराई फाउंडेशनचे संस्थापक सयाजी शिंदे यांनी मंत्रालयामध्ये राज्यमंत्री जयस्वाल यांची भेट घेऊन सह्याद्री देवराई या संस्थेच्या उपक्रमाबाबत चर्चा केली. यावेळी सह्याद्री देवराईचे काम प्रेरणादायी असल्याचे श्री. जयस्वाल म्हणाले. राज्यातील विविध देवस्थांनांनी देवराई विकसीत करणे आणि प्रसाद म्हणून वृक्ष देणे याविषयी चर्चा करण्यात आली. राज्यमंत्री श्री. जयस्वाल म्हणाले कीप्रत्येक देवस्थानास देवराई विकसीत करण्यासाठी पत्र लिहावेयात्रा व तीर्थस्थळ विकास निधीमधून वृक्ष संवर्धनासाठी खर्च करावा अशा सूचना देवस्थान ट्रस्टना देण्यात याव्यात. जिल्हा नियोजनचा निधी पर्यावरण संवर्धनासाठी राखीव करण्याची तरतूद सामाजिक वनीकरण विभागाने करावी अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.


Tuesday, 25 February 2025

अहिल्यानगरच्या गणेश ढवणचा उपराष्ट्रपतींकडून गौरव संसदीय कार्यपद्धती संशोधनात विशेष कामगिरी

 अहिल्यानगरच्या गणेश ढवणचा उपराष्ट्रपतींकडून गौरव

 संसदीय कार्यपद्धती संशोधनात विशेष कामगिरी

 

नवी दिल्लीदि. 25 : अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील निघोज येथील गणेश ढवण यांनी नुकतीच राज्यसभा सचिवालयाची संशोधन इंटर्नशिप यशस्वीरित्या पूर्ण केली. त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांच्या हस्ते त्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. संसदीय कार्यपद्धती आणि धोरणात्मक बाबींच्या सखोल अध्ययनासाठी राज्यसभा सचिवालयातर्फे हा उपक्रम राबवला जातो.

संसदीय प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव

गणेश ढवण यांनी तीन आठवड्यांच्या या इंटर्नशिपदरम्यान संसदीय प्रक्रिया, संसदीय चर्चा, विविध समित्यांची कार्यशैली आणि धोरण निर्मिती प्रक्रिया यांचे सखोल प्रशिक्षण घेतले. या कार्यक्रमात संसद सचिवालयातील वरिष्ठ अधिकारी, खासदार आणि विषयतज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. देशभरातून 35 युवकांची या इंटर्नशिपसाठी निवड झाली होती, त्यामध्ये महाराष्ट्राचे एकमेव प्रतिनिधी म्हणून गणेश ढवण हे होते.

"राज्यसभा सचिवालय संशोधन इंटर्नशिप पूर्ण करणे हा माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा अनुभव ठरला. संसदीय कामकाज आणि प्रक्रिया जवळून समजून घेता आली. सार्वजनिक सेवा आणि धोरणनिर्मितीबाबत सविस्तर अभ्यास करण्याची संधी मिळाली. संसद सदस्यांशी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधता आला. इंटर्नशिप पूर्ण केल्यानंतर उपराष्ट्रपतींकडून प्रमाणपत्र मिळणे, ही माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय घटना आहे. या संपूर्ण प्रवासात खासदार डॉ. फौझिया खान यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो," असे गणेश ढवण यांनी सांगितले.

*****************

Friday, 14 February 2025

तत्काळ! तत्काळ! तत्काळ! सकाळच्या शुभेच्छा आणि रात्रीच्या शुभेच्छा असलेल्या चित्रांचा अधिक वापर करू नका.pl share

 तत्काळ!

तत्काळ!

तत्काळ!


सकाळच्या शुभेच्छा आणि रात्रीच्या शुभेच्छा असलेल्या चित्रांचा अधिक वापर करू नका. खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचा. हे सत्य आहे.


प्रिय कुटुंब आणि मित्रांनो,

उद्या पासून कृपया नेटवर्कवरील चित्रे पाठवणे किंवा स्वीकारणे थांबवा. खालील लेख वाचा आणि समजून घ्या. मीसुद्धा थांबवणार आहे.

कृपया सकाळच्या, संध्याकाळच्या शुभेच्छा, इतर ग्रीटिंग्स आणि धार्मिक संदेश असलेली सर्व चित्रे आणि व्हिडिओ शक्य तितक्या लवकर डिलीट करा. खालील माहिती वाचा आणि का हे महत्त्वाचे आहे ते समजून घ्या.

हे सर्वांना वाचा! कृपया हा संदेश शक्य तितक्या मित्रांना पाठवा जेणेकरून बेकायदेशीर हॅकिंग टाळता येईल.


ओल्गा निकोलायेव्हनाच्या वकिलाकडून इशारा:


लक्ष द्या! सकाळच्या शुभेच्छा, चांगला दिवस आहे, संध्याकाळच्या शुभेच्छा या प्रकारचे संदेश पाठवणाऱ्यांसाठी:

कृपया असे संदेश पाठवू नका.

आज शांघाय, चीन इंटरनॅशनल न्यूजने सर्व ग्राहक आणि तज्ञांना एसओएस इशारा दिला आहे – सूचना: शुभ सकाळ, शुभ रात्री यांसारख्या संदेशांसाठी चित्रे आणि व्हिडिओ पाठवू नका.


अहवालात असे दिसून आले आहे की हे चित्र आणि व्हिडिओ डिझाइन करणारे हॅकर्स यामध्ये फिशिंग कोड लपवतात. जेव्हा तुम्ही हे संदेश पाठवता, तेव्हा हॅकर्स तुमच्या डिव्हाइसचा वापर करून तुमची वैयक्तिक माहिती जसे की बँक कार्ड डिटेल्स आणि डेटा चोरतात व तुमच्या फोनमध्ये घुसखोरी करतात.


अहवालानुसार, 5 लाखांहून अधिक लोकांना यामुळे फसवले गेले आहे.

जर तुम्हाला दुसऱ्यांना शुभेच्छा द्यायच्या असतील, तर कृपया तुमच्या स्वतःच्या शब्दांत संदेश लिहा आणि तुमचे स्वतःचे चित्र किंवा व्हिडिओ तयार करून पाठवा. असे केल्याने तुम्ही स्वतःचे आणि तुमच्या कुटुंबाचे संरक्षण करू शकता.


महत्त्वाचे! सुरक्षिततेसाठी, तुमच्या फोनमधील सर्व शुभेच्छा संदेश आणि चित्रे डिलीट करा. जर कोणी तुम्हाला अशा प्रकारची चित्रे पाठवली असतील, तर ती डिव्हाइसवरून तात्काळ काढून टाका.

हॅकिंग कोड पूर्णपणे कार्यान्वित होण्यास थोडा वेळ लागतो, त्यामुळे जर तुम्ही तात्काळ पाऊल उचलले, तर कोणतीही हानी होणार नाही.


तुमच्या सर्व मित्रांना सांगा, जेणेकरून हॅकिंग होण्यापासून बचाव होऊ शकेल.


तुमच्या स्वतःच्या शब्दांत शुभेच्छा द्या आणि फक्त तुमच्या स्वतःच्या तयार केलेल्या चित्रांचा व व्हिडिओंचा वापर करा, जे सुरक्षित आहेत. प्रत्येकाकडे मोबाईलवर बँक कार्ड्स लिंक केलेले असते, आणि संपर्कसुद्धा असतात. या प्रकारच्या हॅकिंगमुळे तुम्हाला आणि तुमच्या मित्रांना मोठा धोका निर्माण होतो.


ही एक नवीन पद्धत आहे, ज्याद्वारे दहशतवादी तुमच्या सिम कार्डपर्यंत पोहोचून तुम्हाला त्यांचा साथीदार बनवू शकतात!!!


हा संदेश शक्य तितक्या नातेवाईक आणि मित्रांना पाठवा, जेणेकरून अनधिकृत घुसखोरी थांबवता येईल!!!

Saturday, 8 February 2025

मोटार वाहन विभाग, महाराष्ट्र (https://transport.maharashtra.gov.in) यांनी दि. ०४ डिसेंबर २०२४

 मोटार  वाहन विभाग, महाराष्ट्र (https://transport.maharashtra.gov.in) यांनी दि. ०४ डिसेंबर २०२४ रोजी अध्यादेश काढून महाराष्ट्रातील जुन्या/नव्या सर्वच वाहनांना HSRP (High Security Registration Plate) बंधनकारक केली आहे. ३१ मार्च २०२५ ही शेवटची तारीख आहे. मात्र इतका महत्वाचा निर्णय असूनही सर्वसामान्य लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी या निर्णयाची कोठेही जाहिरात केली जात नाही. मुंबई, पुणे, नाशिक व इतरही शहरातील वाहतूक पोलीस हा निर्णय जनसामान्यांना पोहोचवण्यासाठी काहीही प्रयत्न करत नाहीत.

मुदत संपल्यावर मात्र म्हणजे १ एप्रिल २०२५ पासून हेच इ-चलान मशीन घेऊन फौज रस्त्यावर उतरवतील आणि धडाधड चलान मारतील! त्यांना HSRP चे चलान फाडण्याची संधी देऊ नका. मुदतीपूर्वीच आपापल्या गाड्यांना HSRP बसवून घ्या आणि ही माहिती आपले मित्र, नातेवाईक, ओळखीचे यांच्यापर्यंत पोहोचवा.


शासन आदेश पाहण्यासाठी:- https://transport.maharashtra.gov.in/Site/Upload/GR/HSRP-SOP-13122024.pdf


HSRP बुक करण्यासाठी भेट द्या :- https://transport.maharashtra.gov.in/ZoneWiseWebsiteRedirect.html


अधिक माहितीसाठी video :

https://www.youtube.com/watch?v=mna7XdZCoQc

https://www.youtube.com/watch?v=M5J5OC_owr4

https://www.youtube.com/watch?v=N5H5fFUCigs

१ एप्रिल २०१९ पुर्वीच्या जुन्या वाहनांना 'हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट' बसवावी प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे आवाहन

 १ एप्रिल २०१९ पुर्वीच्या जुन्या वाहनांना 'हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेटबसवावी

प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे आवाहन

 

मुंबईदि. ७ केंद्रीय मोटार वाहन नियम१९८९ आणि केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्रालयाच्या नियमानुसार १ एप्रिल २०१९ पासून उत्पादित होणाऱ्या सर्व नवीन वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट' (उच्च सुरक्षित नोंदणी क्रमांक पाटी) बसवण्याची तरतूद आहे. यामुळे वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरी करुन होणारे गुन्हे कमी करणेरस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटविणे शक्य होणार आहे.

राज्य शासनाने १ एप्रिल २०१९ पुर्वी उत्पादित झालेल्या जुन्या नोंदणीकृत वाहनांना ही नंबर प्लेट बसविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मुंबई मध्य प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील सर्व वाहनधारकांनी त्यांच्या वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवावीअसे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातूनही सर्व वाहनांना ही नंबर प्लेट बसविणे अत्यावश्यक असून १ एप्रिल २०१९ पुर्वीच्या जुन्या वाहनांनाही हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

प्रादेशिक परिवहन कार्यालयमुंबई (मध्य) कार्यालयाच्या कार्यक्षेत्राकरिता रियल मेझॉन इंडिया लिमिटेड ही एजंसी निश्चित करण्यात आली आहे. ही नंबर प्लेट बसविण्याकरिता बुकींग पोर्टल https://hsrpmhzone2.in कार्यान्वित करण्यात आले आहे. वाहनधारकांनी या पोर्टलवर बुकींग करुन अपॉईंटमेंट घ्यावी आणि नंबर प्लेट बसवून घेण्यात यावी.

 वाहन धारक प्रादेशिक परिवहन कार्यालयमुंबई (मध्य) कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील नोंदणी धारक नसलातरी काही कामा निमित्त या कार्यक्षेत्रामध्ये वाहन वापरत असेल तरी देखील वाहनास ही नंबर प्लेट बसविणे आवश्यक आहे. वाहनधारकांना त्यांच्या वाहनांवर नंबर प्लेट बसविण्यासंदर्भात काही तक्रार असल्यास संबंधीत सेवापुरवठा धारकांच्या पोर्टलवर तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालयमुंबई (मध्य) कार्यालयात तक्रार दाखल करावी.

             प्रादेशिक परिवहन कार्यालयमुंबई (मध्य) कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील वाहन धारकांनी त्यांच्या वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट न बसविल्यास वाहनाचे मालकी हस्तांतरणपत्ता बदलवित्त बोजा उतरविणे चढविणे दुय्यम आरसी विमा अद्ययावत करणे इत्यादी कामकाज थांबविण्यात येतील याची नोंद घेण्यात यावी. हाय सिक्युरीटी नंबर प्लेट नसलेली वाहनेबनावट हाय सिक्युरिटी नंबर प्लेट असलेली वाहने आदी वाहनांवर या कार्यालयाकडून भविष्यात दंडात्मक कारवाई करण्यात येईलयाची नोंद घेण्यात यावीअसेही परिवहन कार्यालयाने कळविले आहे.

०००

निलेश तायडे/विसंअ


 


Tuesday, 4 February 2025

सर्व बंदरांवर मासेमारीसाठी जाताना खलाशांनी आधार कार्ड बाळगणे अनिवार्य

 सर्व बंदरांवर मासेमारीसाठी जाताना

खलाशांनी आधार कार्ड बाळगणे अनिवार्य

 

मुंबईदि. 31 : राज्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने सागरी सुरक्षा ही अत्यंत महत्वाची आहे. सागरी सुरक्षा भक्कम करण्याच्या दृष्टीने मत्स्यव्यवसाय विभागाने महत्वाचे पाऊल उचलले आहे. राज्यातील सर्व बंदरांवर  मासेमारीसाठी जाणाऱ्या प्रत्येक खलाशाने क्यूआर कोडेड आधार कार्ड जवळ बाळगणे आवश्यक असल्याचे निर्देश मत्स्यव्यवसाय विभाग आयुक्त किशोर तावडे यांनी दिले आहेत.

            मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी नुकतीच ससून डॉकला भेट दिली होती. त्यावेळी बहुसंख्य खलाशांकडे आधार कार्ड नसल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आली होती. त्यावेळी मासेमारीसाठी जाणाऱ्या खलाशांकडे आधारकार्ड असणे आवश्यक असल्याचे आदेश काढण्याच्या सूचना मंत्री श्री. राणे यांनी दिल्या होत्या. त्याअनुषंगाने  हा निर्णय घेण्यात आला आहे.

            या सागरी क्षेत्रात मासेमारीसाठी जाणाऱ्या प्रत्येक खलाशाकडे क्यूआर कोडेड आधारकार्ड जवळ बाळगणे आवश्यक आहे. तसेच इंडियन मर्चंड शिपींग ॲक्ट 1958 च्या 435(एच) मधील तरतूदीनुसार व महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम 1981 (सुधारित 2021) मधील कलम 6(4) नुसार देशातील मासेमारी नौकेचा नोंदणी क्रमांक नौकेवर कायम स्वरुपी दिसेल असे रंगविणे आवश्यक आहे. नौकेचा नोंदणी क्रमांक नौकेच्या मागील (वरच्या) भागात दोन्ही बाजूने स्पष्टपणे दिसेल तसेच नौकेच्या केबीनच्या छतावर कोरून रंगविणे बंधनकारक राहील.

            याप्रमाणे कार्यवाही केल्यानंतरच नौकांच्या मासेमारी परवान्यांचे नुतनीकरण व मासेमारी टोकन निर्गमित करण्यात येणार आहेत. तसेच या कार्यवाही न करणाऱ्या नौकांच्या मालकांवर महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम 1981(सुधारीत 2021) अंतर्गत मासेमारी परवाना अटी – शर्ती भंग म्हणून मासेमारी परवाना रद्द करून योग्य ती कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती, आयुक्त श्री.तावडे यांनी दिली.

00000

राष्ट्रीय नमूना पाहणीच्या आरोग्यविषयक सर्वेक्षणात परिपूर्ण माहिती देण्याचे आवाहन

 राष्ट्रीय नमूना पाहणीच्या आरोग्यविषयक सर्वेक्षणात

परिपूर्ण माहिती देण्याचे आवाहन

 

            मुंबईदि. ३१ : भारत सरकारच्या अधिपत्याखालील राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या धर्तीवर 'कुटुंबांचा आरोग्यविषयक होणारा खर्चया विषयावर राष्ट्रीय पातळीवर होणा-या पाहणीत राज्यात अर्थ व सांख्यिकी संचालनालय सहभागी होत आहे. या पाहणीमध्ये जानेवारी ते डिसेंबर २०२५ या कालावधीत माहिती गोळा करण्यात येणार आहे. निवड झालेल्या कुटुंबांकडून मागील ३६५ दिवसांमध्ये कुटुंबाच्या आरोग्यविषयक होणाऱ्या खर्चाबाबत विस्तृत माहिती संकलित करण्यात येत आहे. उपरोक्त पाहणीचे निष्कर्ष आरोग्य सेवा क्षेत्रात सुधारणा तसेच केंद्र व राज्य शासनाला नियोजनासाठी व धोरणे राबविण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.

नमूना तत्वावर निवडण्यात आलेल्या घटकातील कुटुंबाकडून प्राप्त माहितीवर आधारित निष्कर्ष हे राज्यातील लोकसंख्येकरिता अंदाजित केले जातील. सर्वेक्षणाकरीता घरी येणाऱ्या अधिकारी/कर्मचारी यांच्याकडून कुटुंब निवडीचं प्रक्रियासर्वेक्षणाची महत्त्वाची माहिती समजून घेण्याची आणि आरोग्यविषयक खर्चासंबंधी योग्य व परिपूर्ण माहिती देण्यासाठी सर्व संबंधित कुटुंबीयांनी पूर्ण सहकार्य करण्याचे आवाहन आयुक्तअर्थ व सांख्यिकी व संचालकअर्थ व सांख्यिकी संचालनालयमुंबई यांनी केले आहे.

ही पाहणी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये होणार असून या सर्वेक्षणाचा मुख्य उद्देश म्हणजे शासकीय आणि खाजगी रुग्णालय/दवाखान्यातून मिळणाऱ्या उपचारांवर होणारा खर्चकुटुंबांचा आरोग्यविषयक होणारा खर्चसर्व वयोगटातील लसीकरणगर्भवती महिलांना मिळणाऱ्या सुविधांचा तपशील इत्यादी बाबींची माहिती गोळा करणे हा आहे. या सर्वेक्षणाअंतर्गत कुटुंबाची निवड 'एक वर्ष किंवा एक वर्षापेक्षा कमी वयाचे मूल असणारे कुटुंबआणि 'मागील ३६५ दिवसांमध्ये रुग्णालयामध्ये दाखल असणारी कुटुंबातील व्यक्तीयामधून करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणाच्या निष्कर्षांचा उपयोग आरोग्य सेवा क्षेत्रात सुधारणा आणि सरकारच्या धोरणात्मक निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठी होतो. राष्ट्रीय तसेच राज्य पातळीवर प्रभावी निर्णय घेणे शक्य व्हावेयासाठी सर्वेक्षणाच्या माहितीची सत्यता व गुणवत्ता अत्यंत महत्वाची आहे.

त्या अनुषंगाने माहिती संकलित करणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. क्षेत्रीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्यात आले असून हे प्रशिक्षित कर्मचारी फेब्रुवारी २०२५ ते डिसेंबर २०२५ दरम्यान निवडलेल्या कुटुंबांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन विहित नमुन्यातील माहिती संकलित करतीलअसे आयुक्तअर्थ व सांख्यिकी व संचालकअर्थ व सांख्यिकी संचालनालयमुंबई यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले

Friday, 31 January 2025

हनुमान चालिसा महत्त्व

 👆🏻☺️


सत्य घटना


8.15 मिनिट की हनुमान चालीसा के बारे में बहुत ही रोचक जानकारी मुझे ऐसा लगता है कि ये जानकारी सभी को पहली बार प्राप्त हो रही होगी। घर के सभी लोगो को सुनाने लायक ये रोचक वीडियो ।  🌹💐👏🏻

Thursday, 30 January 2025

आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आरोग्य संस्थांना नियमित भेटी द्याव्यातगर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र (लिंग निवडीस प्रतिबंध) कायद्याची कडक

 आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी

आरोग्य संस्थांना नियमित भेटी द्याव्यात

– आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

 

मुंबईदि. 29 : सार्वजनिक आरोग्य विभागातील राज्य व विभागीय स्तरावरील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आरोग्य संस्थांना नियमित भेटी द्याव्यातअशा सूचना सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिल्या.

आरोग्य सेवा आयुक्तालयात आयोजित केलेल्या राज्यातील सर्व परिमंडळातील आरोग्य सेवेच्या आढावा बैठकीत श्री. आबिटकर बोलत होते. यावेळी आरोग्य सेवा आयुक्तालय तथा राष्ट्रीय आरोग्य अभियान संचालनालयाचे संचालक अमगोथू श्री रंगा नायकआरोग्य सेवा संचालनालयाचे संचालक डॉ. नितीन अंबाडेकरआरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ. कंदेवाड  डॉ. बाविस्कर यांच्यासह आठ विभागांचे उपसंचालक आदी उपस्थित होते.

सार्वजनिक आरोग्य मंत्री श्री. आबिटकर म्हणालेआरोग्य संस्थाच्या भेटी वेळी रुग्णालयातील स्वच्छतासुरक्षापरिसर स्वच्छतारुग्णाच्या आहाराचा दर्जारुग्णाना मिळणारी वागणूकऔषधांची उपलब्धताबाह्य संस्थेद्वारे नेमलेल्या कर्मचाऱ्यांना मिळणारे मानधन या बाबींची काटेकोर पाहणी करण्यात यावी. आरोग्य संस्थांच्या कामात अनियमितता आढळल्यास संबंधितावर तातडीने कारवाई करावी. वेळेनुसार मी स्वतः देखील आरोग्य संस्थांना भेटी देईनअसेही श्री. आबिटकर यांनी यावेळी सांगितले.

 प्रत्येक शासकीय दवाखान्यात दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून द्याव्यात. सामाजिक बांधिलकी म्हणून वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची पहिली नियुक्ती झालेला दवाखाना दत्तक घेवून तेथे उत्तम आरोग्य सुविधा देण्याबाबत प्रयत्न करावेत. आरोग्य संस्थांच्या सेवांवरील लोकांचा विश्वास दृढ होण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करण्याचे निर्देश श्री. आबिटकर यांनी दिले.

 गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र (लिंग निवडीस प्रतिबंध) कायद्याची कडक अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. याबाबत माहिती देणाऱ्याला एक लाखाचे बक्षीस देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे स्टिंग ऑपरेशन पथकात सहभागी सदस्याना मानधन देण्यात येईलयाविषयी लोकांमध्ये जागृती करावीतसेच संबंधित समित्याना प्रोत्साहीत करावेसामाजिक जाणीव असलेल्या लोकांचासेवाभावी संस्थाचा सहभाग वाढवावाअसेही श्री. आबिटकर यांनी सांगितले.

0000

ल्ह्स्त्यावर राहणाऱ्या मुलांना शिक्षणाच्यासह,महिला, बालक व दिव्यांगांना सर्वतोपरी , राज्यभर अहिल्या भवन उभारण्याच्या कार्यवाहीस गती द्यावी

 १८ जिल्ह्यांसह राज्यभर अहिल्या भवन उभारण्याच्या कार्यवाहीस गती द्यावी

महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे

महिलांना रोजगार देण्यासाठी पिंक रिक्षा योजनेअंतर्गत

५ हजार महिलांना लवकरच रिक्षा वाटप करणार

 

              मुंबई दि. २९ : महिला आणि बालकांच्या सुरक्षेसाठीत्यांच्या सबलीकरणासाठी अहिल्या भवनाच्या माध्यमातून अतिशय महत्वाचे काम सुरू होणार आहे. १८ जिल्ह्यात अहिल्या भवनचे कार्य सुरू असूनराज्यातील उर्वरित जिल्ह्यासाठी मध्यवर्ती ठिकाणी अहिल्या भवन उभारण्यासाठीच्या प्रक्रियेस गती देण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.

              मंत्रालय येथील दालनात महिला व बालकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी विभागामार्फत सुरू असलेल्या योजनांचा आढावा घेण्यात आला. यावेळी विभागाचे सचिव अनुपकुमार यादवआयुक्त कैलास पगारे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. लवकरच ४ जिल्ह्यातील अहिल्या भवनचे लोकार्पण करण्यासंदर्भातील कार्यवाही करण्याच्या सूचनाही महिला व बालविकास मंत्री तटकरे यांनी यावेळी दिल्या.

              महिला व बालविकास मंत्री तटकरे म्हणाल्या कीप्रत्येक जिल्ह्यात उभारण्यात येणारे हे अहिल्या भवन महिलाबालक व दिव्यांगांना सर्वतोपरी सहकार्य करण्यासाठी सज्ज असणार आहे. तसेच अहिल्या भवन उभारण्यासंदर्भातील पायाभूत सुविधा उभारण्याचे निर्देशही तटकरे यांनी यावेळी दिले.

              महिला व मुलींना रोजगार मिळावात्यांचे आर्थिकसामाजिक सक्षमीकरण व्हावेआणि महिला वर्गाचा प्रवास सुरक्षित व्हावायासाठी राबविण्यात येणाऱ्या 'पिंक ई-रिक्षाच्या योजनेसंदर्भात संबंधितांना तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. प्राप्त अर्जापैकी पाच हजार पात्र महिलांना लवकरच या योजनेअंतर्गत रिक्षाचे वितरण करण्यात येणार आहे.

              याचबरोबर रस्त्यावर राहणाऱ्या मुलांना शिक्षणाच्या व समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी फिरते पथक कार्यरत असूनआजतागायत तीन हजारपेक्षा जास्त मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम विभागाने या पथकाच्या माध्यमातून केले आहे. प्रायोगिक तत्वावर सुरू असलेल्या हा उपक्रम व्यापक स्वरूपात सुरू करण्यासाठीची कार्यवाही करण्यासंदर्भातही महिला व बालविकास मंत्री तटकरे यांनी सूचना दिल्या.

              नोकरी करणाऱ्या महिलांच्या मुलांसाठी पाळणाघर आवश्यक असल्याने गरजु महिलांच्या मुलांसाठी अंगणवाडी केंद्रासोबत पाळणाघर सुरू करण्यात येणार आहे. पाळणाघर से‍विका व मदतनिस यांचे मानधन तसेच निर्भया समुपदेशन केंद्रावरील समन्वयकाचे मानधन वाढविण्यासंदर्भातही सकारात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याचेही तटकरे यांनी यावेळी उपस्थित समन्वयक महिलांना सांगितले. तसेचमाध्यमिक शिक्षणाकडे वळणाऱ्या मुलींचे प्रमाण वाढविण्यासाठी शिक्षण विभागाशी समन्वय साधुन उपाययोजना आखण्यासंदर्भातही निर्देश तटकरे यांनी यावेळी दिले.

Featured post

Lakshvedhi