Showing posts with label उयोग रोजगर. Show all posts
Showing posts with label उयोग रोजगर. Show all posts

Thursday, 20 March 2025

मुंबईच्या विकासासह अनेक विषयांवर न्यूझीलँडच्या पंतप्रधानांची

 मुंबईच्या विकासासह अनेक विषयांवर न्यूझीलँडच्या पंतप्रधानांची

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा

·        बदलत्या मुंबईवर पंतप्रधानांकडून समाधान व्यक्त

मुंबई, दि. १९:  मुंबईच्या दौऱ्यावर आलेले न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टॉफर लक्सन यांनी मुंबईच्या बदलेल्या रूपाविषयी आणि सुरू असलेल्या विकास कामांविषयी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून उत्सुकतेने जाणून घेतले. राजभवनात राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी न्यूझीलँडच्या पंतप्रधानांच्या सन्मानार्थ स्नेहभोजनाचे आयोजन केले होते. यावेळी उपमुख्यमंत्र्यांबरोबर पंतप्रधानांनी विविध विषयांवर चर्चाही केली.

मुंबई झोपडीमुक्त करून या महानगरात सर्वसामान्यांना घरे उपलब्ध करून देणाऱ्या योजनात्याचप्रमाणे देशाचे ग्रोथ इंजिन असलेल्या मुंबईची आर्थिक क्षमता वाढविण्यासाठी उचलण्यात आलेल्या पावलांविषयी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधानांना माहिती दिली. प्रामुख्याने डीप क्लीनसारख्या मोहिमेतून मुंबईची अंतर्गत स्वच्छता कशी करण्यात येत आहे तेही पंतप्रधानांनी उत्सुकतेने जाणून घेतले. मुंबईतील कोस्टल रोडअटल सेतू यामुळे वाहतूक व्यवस्था कशी सुरळीत झाली आहे तसेच मेट्रोमुळे दैनंदिन प्रवासी वाहतूक कशी सुधारत आहे याविषयी उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. पर्यावरणाचा प्रश्न महत्त्वाचा असून यासंदर्भात करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची देखील न्यूझीलँडच्या पंतप्रधानांनी आस्थेवाईकपणे चौकशी केली. आरोग्याच्या दृष्टिकोनातून योगाचा प्रसार व्हायला पाहिजे यासारख्या विषयावर देखील दोघांमध्ये चर्चा झाली.

यावेळी पंतप्रधानांसमवेत आलेल्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाने देखील हरित ऊर्जाक्रीडाशिक्षणकृषी तंत्रज्ञानमत्स्यपालनयांसह विविध विषयांवर चर्चेत सहभाग घेतला.

यावेळी आयोजित स्नेहभोजन समारोहाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेराज्य विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदेविधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरपर्यटन मंत्री शंभूराज देसाईराजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावलतर न्यूझीलँडच्या वतीने भारतीय वंशाचे माजी गव्हर्नर जनरल सर आनंद सत्यानंदक्रिकेटपटू एजाज पटेलपंतप्रधान कार्यालयाचे माध्यम अधिकारी मायकेल फोर्ब्सअतिरिक्त मुख्य सचिव (राजशिष्टाचार) मनीषा म्हैसकरमुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसळकरन्यूझीलंड पंतप्रधानांचे प्रेस सेक्रेटरी मॅट यंगसमाजमाध्यम सल्लागार जेकब ओ'फ्लाहर्टीमार्क टॅलबोटन्यूझीलंडचे भारतातील उच्चायुक्त पॅट्रिक राटाजोआना केम्पकर्समॅथ्यू आयर्समुंबईतील उप-उच्चायुक्त ग्राहम राऊस व उद्योजक हे देखील उपस्थित होते.

Friday, 14 March 2025

उद्योगांमधील प्रदूषण कमी करण्यासाठी तज्ञांची समिती स्थापन करणार

 उद्योगांमधील प्रदूषण कमी करण्यासाठी तज्ञांची समिती स्थापन करणार

- पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे

चंद्रपूर जिल्ह्यातील प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न

मुंबईदि. ११ : उद्योगांमधून विविध प्रकारचे प्रदूषण होते. प्रदूषण कमी करण्यासाठी शासन विविध उपाययोजना करीत असून उद्योगांमधील प्रदूषण कमी करण्यासाठी तज्ञांची समिती स्थापन करण्यात येईल. या समितीच्या अहवालानंतर प्रदूषण कमी करण्यासाठी अधिक प्रभावीपणे उपाययोजना करण्यात येतील. चंद्रपूर जिल्ह्यातील प्रदूषण कमी करण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेलअसे पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले.

चंद्रपूर जिल्ह्यातील प्रदूषणाबाबत सदस्य सुधीर मुनगंटीवारसदस्य देवराव भोंगळे यांनी अर्धा तास चर्चा उपस्थित केली होती.

या चर्चेच्या उत्तरात पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्याप्रदूषण कमी करण्यासंदर्भात आमदारांची समितीही गठीत करण्यात येईल. चंद्रपूर देशातील सर्वाधिक प्रदूषित शहरांपैकी एक आहे. केंद्र शासनाकडून चंद्रपूर जिल्ह्यात 21 मार्च 2012 रोजी नवीन उद्योगांना बंदी करण्यात आली. मात्र चंद्रपूर जिल्ह्यातील प्रदूषण पातळी 83.88 टक्क्यांवरून 54 पर्यंत खाली आल्यामुळे केंद्र शासनाने उद्योगबंदी उठवली. त्यानंतर जिल्ह्यात उद्योगांचा विस्तारनवीन उद्योग वाढीस लागले. राज्यामध्ये स्टीलवस्त्रोद्योग व औष्णिक वीज उद्योगसारख्या अति प्रदूषण करणाऱ्या उद्योग समूहांची उपाययोजनांसंदर्भात बैठक घेण्यात येईल. तसेच अतिप्रदूषण करणाऱ्या उद्योगांची एक वेगळी सूची तयार करण्यात येईल. चंद्रपूर जिल्ह्यातील उद्योग या यादीमध्ये समाविष्ट करण्यात येतील.

पर्यावरण विभागाच्या माध्यमातून प्रदूषण करणाऱ्या उद्योगांना भेटी देऊन तपासणी करण्यात येते. अशा तपासण्याची संख्या वाढवण्यात येईल. अधिवेशन संपल्यानंतर चंद्रपूर जिल्ह्याचा दौरा करून या भागातील परिस्थितीचा आढावा घेण्यात येईल. वेकोली कोळसा खाणीबाबत अधिवेशन काळात बैठक घेण्यात येईल. चंद्रपूर जिल्ह्यात उद्योगामुळे झालेल्या शेती नुकसानीबाबत कृषी विभागाच्या अहवालानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल. प्रदूषण कमी करण्यासाठी कोळशाची वाहतूक कन्व्हेअर बेल्टमधून बंद स्वरूपात करणे. कार्बन फॉगरचा उपयोग करुन पाण्याची नियमित फवारणी करणे. तसेच वृक्ष लागवड करणे, यासारख्या उपाययोजना करण्यात येतील, असेही मंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितले.

0000

Friday, 21 June 2024

Featured post

Lakshvedhi