Showing posts with label Yojna. Show all posts
Showing posts with label Yojna. Show all posts

Wednesday, 23 July 2025

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या धर्तीवर “कृषी समृद्धी योजना” राबविणार

 नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या धर्तीवर

कृषी समृद्धी योजना राबविणार

- कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

·         दरवर्षी सुमारे ५००० कोटी तर आगामी पाच वर्षासाठी २५ हजार कोटी रूपयांची गुंतवणूक

मुंबई, दि. २२ : कृषी यांत्रिकीकरणआधुनिक तंत्रज्ञानाचा वापरपाण्याचा सुयोग्य व किफायतशीर वापर करण्यासाठीनानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या धर्तीवरकृषि समृद्धी योजना राबविण्यात येणार आहे. कृषी समृद्धी योजनेत दरवर्षी सुमारे पाच हजार कोटींच्या गुंतवणुकीवर आधारित असून आगामी पाच वर्षासाठी २५ हजार कोटी रूपयांची गुंतवणूक करण्यात येणार असल्याचे कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी सांगितले.

शेतकऱ्यांचा शाश्वत विकास व्हावा आणि शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम  होण्यासाठी शेतीमध्ये भांडवली गुंतवणूक वाढवून पायाभूत सुविधा निर्मितीवर भर देणारी नवीन योजना राबविणे आवश्यक  होती. कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक वाढवून पायाभूत सुविधा निर्माण करणेउत्पादन खर्च कमी करणेउत्पादकता वाढविणेपीक विविधीकरण करणेमूल्य साखळी बळकट करणेतसेच हवामान अनुकूल आणि शाश्वत शेतीला प्रोत्साहन देऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणेहा कृषी समृद्धी योजनेचा मुख्य उद्देश आहे. सूक्ष्म सिंचनहवामान अनुकूल बियाणेपिकांचे वैविध्यजमिनीची सुपीकता व्यवस्थापनकमी खर्चीक यांत्रिकीकरण व मजबूत मूल्यसाखळी तयार करण्यावर भर दिला जाईल. डिजीटल शेतीकाटेकोर शेतीयंत्रसामग्री सेवाकृषी हवामान सल्ला सेवागोदाम व लॉजिस्टिक्सप्रक्रिया व निर्याततंत्रज्ञान प्रसारासाठी नवोन्मेष केंद्र (Innovation Hub) स्थापन करण्यावर भर दिला जाईल. निर्यात वृद्धीच्या दृष्टीने गुंतवणुकीस प्रोत्साहन दिले जाईल. जिल्हानिहाय खातेदार संख्याजिल्हानिहाय निव्वळ पेरणी क्षेत्रजिल्हा असुरक्षितता निर्देशांक आणि जिल्हानिहाय प्रति हेक्टरसकल सरासरी जिल्हा मूल्यवर्धन संयुक्त निर्देशांकावर आधारित जिल्हावार निधी वाटप करण्यात येईल.

             योजनेच्या सुरळीत अंमलबजावणीसाठी आणि दीर्घकालीन अवलंब सुनिश्चित करण्यासाठी क्षेत्रीय कर्मचारी आणि शेतकऱ्यांसाठी क्षमता बांधणीवर भर देण्यात येईल. जिथे प्रचलित मापदंड नाहीत किंवा आहे ते मापदंड अपुरे आहेतत्या ठिकाणी मापदंड निश्चिती ही राज्यस्तरीय समितीमार्फत करण्यात येईल. योजनेत भाग घेण्यासाठी सर्व शेतकऱ्यांना ॲग्रीस्टॅक नोंदणी क्रमांक आवश्यक राहील. वनहक्क कायद्यांतर्गत वैयक्तिक वनहक्क प्राप्त शेतकऱ्यांची ॲग्रीस्टॅक नोंदणीची सोय झालेली नाहीअशा वैयक्तिक वनहक्क प्राप्त शेतकऱ्यांसाठी पर्यायी व्यवस्था निर्माण करण्यात येईल. योजनेत प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर लाभ देण्यात येईल. योजनेंतर्गत शेतकरीमहिला गटउत्पादक कंपन्या यांना प्राधान्य देण्यात येईल. अल्पअत्यल्प भूधारकमहिला शेतकरीअनुसूचित जातीजमातीचे शेतकरी आणि दिव्यांग शेतकरी यांना प्राधान्य राहील. प्राधान्यक्रमाचा महा-डिबीटी आयटी प्रणालीमध्ये समावेश असेल. योजनांचे समवर्ती मूल्यमापन बाह्य संस्थेकडून करण्यात येईल. यातील प्रत्येक घटकाचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येईल. तसेच प्रधानमंत्री पीक विमा योजना ही राज्यात सन 2025-26 पासून नव्या स्वरुपात राबविण्यात येणार आहे. सन 2023-24 पासून राज्यात सुरु असलेल्या सर्वसमावेशक पीक विमा योजनेत सुधारणा करुनही सुधारित पीक विमा योजनापीक कापणी प्रयोगावर आधारित उत्पादनानुसार राबविली जाईल

Monday, 23 June 2025

वसई तालुक्यातील विरार पूर्व मधीलबांबू लागवड

 बांबू लागवड

वसई तालुक्यातील विरार पूर्व मधील खैरपाडा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री गणेश नाईक तसेच कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी बांबू लागवड अभियानांतर्गत बांबूची लागवड केली.

000


Saturday, 14 June 2025

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध २१ कामांचे भूमिपूजन व लोकार्पण अकोला जिल्ह्यातील विकासाचा प्रवाह गतिमान २ हजार ५८८ कोटी ५५ लाख रू. निधीतून विकासकामे

 मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध २१ कामांचे भूमिपूजन व लोकार्पण

  • अकोला जिल्ह्यातील विकासाचा प्रवाह गतिमान
  • २ हजार ५८८ कोटी ५५ लाख रू. निधीतून विकासकामे

 

अकोला दि. ११ : अकोला जिल्ह्यात सुमारे अडीच हजार कोटींहून अधिक म्हणजेच २ हजार ५८८ कोटी ५५ लाख रूपयांच्या निधीच्या विविध २१ विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज झाले. सिंचनरस्तेरूग्णालय सुधारणासांस्कृतिक भवनतरण तलावासह विविध प्रशासकीय इमारती अशा विकास कामांमुळे जिल्ह्यातील विकासाचा प्रवाह गतिमान होणार आहे.

विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसलेकामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकरखासदार अनुप धोत्रेआमदार सर्वश्री रवींद्र चव्हाणहरिष पिंपळेप्रकाश भारसाकळेवसंत खंडेलवालकिरण सरनाईकश्याम खोडेविभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघलपोलीस महानिरीक्षक रामराव पोकळेजिल्हाधिकारी अजित कुंभारपोलिस अधिक्षक अर्जित चांडक आदि मान्यवर उपस्थित होते.

            मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते सर्वप्रथम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीनअद्ययावत व सुसज्ज इमारतीचे लोकार्पण झाले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील स्वागत कक्षहिरकणी कक्षआनंदी कक्षआवश्यक दस्तऐवज मिळण्यासाठी किऑस्क सुविधा आदींचे निरीक्षण केले. त्यानंतर नियोजन भवनात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते एकाचवेळी ऑनलाईन पद्धतीने विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला.

            अकोला येथील तहसीलतसेच उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या अद्ययावत इमारतीचे तसेच महिला व बालविकास भवनाचे लोकार्पण झाले. पूर्णा नदीवरील काटीपाटी बॅरेज प्रकल्पाचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. सुमारे ४५४.६२ कोटी रूपयांच्या निधीतून सिंचनाची व्यवस्था निर्माण होऊन शेतकरी बांधवांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे. 

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून कृषी संशोधनाचा वारसा असलेल्या अकोला भूमीत २४९.४१ कोटी रूपये खर्चून बांधण्यात आलेल्या पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालयाच्या इमारतीचा कोनशिला समारंभही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने झाला.

अकोला शहरात अमृत 2.0 योजनेत 629.06 कोटी रू. निधीतून मलनि:सारण (टप्पा-1) चे काम, तसेच शहरासाठी १८.९९ कोटी रू. निधीतून प्रधानमंत्री ई-बस सेवा योजनेत ई-बस डेपो व चार्जिंग स्टेशनचे भूमिपूजन झाले. त्याचप्रमाणे१५ कोटी रू.निधीतून अद्ययावत सांस्कृतिक भवनसुमारे ९.९६ कोटी रू. निधीतून ऑलिंपिक दर्जाचा तरणतलावाचा कोनशिला समारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला. 

 ‘हायब्रीड ॲन्युइटीअंतर्गत मुर्तिजापूर-दहिगाव-गुडधी-उमरी- अकोला राज्य महामार्ग २८४तसेच अकोला-मलकापूर- कानशिवणी-मोरगांव काकड- बोरगांव खुर्द जिल्हा प्रमुख मार्गाची सुधारणा ४१०.१० कोटी रू. निधीतून होणार आहे. त्याचे भूमिपूजन यावेळी झाले. त्याचप्रमाणेउकळी बाजार-नेर- नांदखेड- किनखेड राज्य महामार्ग २७८किनखेड ते दहिहंडा महामार्गाची सुधारणाअकोट मतदारसंघातील राज्यमार्ग क्र.४७ रावेरपातूर्डापिंपळगावखांडवीजळगाव जामोद- हिवरखेड- अकोट या मार्गावरील (रंभापूर ते हिवरखेड ते वारखेड भाग) सुधारणा ३११.४४ कोटी निधीतून होत आहे. बार्शिटाकळी शहरात ९.९९ कोटी रू. निधीतून मुख्य रस्ता होत आहे. या कामांचे भूमिपूजन झाले.

सर्वोपचार रुग्णालयात १५१.५६ कोटी रू. निधीतून नवीन वॉर्ड इमारतीचे बांधकाम करण्यात येणार आहे. यामुळे रुग्णांसाठी सुविधा निर्माण होणार असून त्याचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 

Thursday, 12 June 2025

मातंग समाजाच्या कल्याणासाठी शासनाचे सर्वतोपरी प्रयत्न,बार्टी’च्या धर्तीवर ‘आर्टी’ संस्थेचे सक्षमीकरण करण्याचे निर्देश

 मातंग समाजाच्या कल्याणासाठी शासनाचे सर्वतोपरी प्रयत्न

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘बार्टी’च्या धर्तीवर आर्टी’ संस्थेचे सक्षमीकरण करण्याचे निर्देश

 

 मुंबईदि. १२ : मातंग समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन विविध योजनांची अंमलबजावणी करीत आहे. या  समाजाच्या  सामाजिकशैक्षणिक आणि आर्थिक प्रगतीसाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बार्टीच्या धर्तीवर आर्टी’ संस्थेचे सक्षमीकरण  करण्याचे निर्देश दिले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे मातंग समाजाच्या मागण्यासंदर्भात बैठक झाली. या बैठकीस जलसंपदा मंत्री गिरीश महाजनमाजी मंत्री दिलीप कांबळेआमदार सर्वश्री सुनील कांबळेनामदेव ससानेअमित गोरखेजितेश अंतापुरकरमाजी आमदार सर्वश्री अविनाश घाटे,  रामभाऊ गुंडिलेतसेच मातंग समाजाच्या विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेअनुसूचित जातींच्या आरक्षणात उपवर्गीकरणासाठी निवृत्त न्यायमूर्ती अनंत बदर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीला लवकरात लवकर अहवाल सादर करण्याची विनंती करण्यात येणार असूनमातंग समाजाच्या संघटनांनी आपल्या मागण्या लेखी स्वरूपात बदर समितीकडे सादर कराव्यात. या समितीच्या अहवालात आपल्या मागण्या समाविष्ट करता येतील. सन २०२७ मध्ये होणाऱ्या जातनिहाय जनगणनेमध्ये लोकसंख्येच्या आधारे वर्गीकरणात आवश्यकतेनुसार बदल करण्यात येईलअसेही मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले.

  साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या कर्ज योजनेत जामीनदारासंदर्भातील अटी शिथिल करण्याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत सादर करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. आर्टी संस्थेसाठी वेगळे लेखाशीर्ष तयार करण्यात आले असून यासाठी पुरेसा निधी देण्यात येईलतसेच आर्टी संस्थेचे मुख्यालय पुणे येथे करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

 यावेळी सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ.हर्षदीप कांबळेबार्टीचे महासंचालक सुनिल वारेविविध विभागाचे सचिव उपस्थित होते.

*****

Featured post

Lakshvedhi