Saturday, 2 May 2026

प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले असून तांत्रिकदृष्ट्या हा मार्ग अत्यंत प्रगत

 प्रकल्पाबाबत माहिती देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कीया प्रकल्पात प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले असून तांत्रिकदृष्ट्या हा मार्ग अत्यंत प्रगत आहे. यामध्ये अत्याधुनिक अग्निशमन यंत्रणावॉटर मिस्ट सिस्टीम आणि दर 50 मीटरवर आपत्कालीन दूरध्वनीची सोय करण्यात आली आहे. सुरक्षेचा विशेष उपाय म्हणून दर 300 मीटरवर दोन्ही बोगद्यांना जोडणारे 'कनेक्टर्सतयार करण्यात आले आहेतजेणेकरून एखाद्या बोगद्यात दुर्घटना घडल्यास दुसऱ्या बोगद्यातून प्रवाशांचे सुरक्षित स्थलांतर करता येईल. संपूर्ण मार्गावर 24 तास सीसीटीव्हीची देखरेख असूनलेनची शिस्त पाळली जावीयासाठी 'इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीमकार्यान्वित करण्यात आली आहे. नियम मोडणाऱ्या वाहनधारकांना आता थेट ई-चलान पाठवले जाईलअसा इशाराही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला.

        अतिशय कठीण भौगोलिक परिस्थितीतदऱ्याखोऱ्यांत आणि जंगलांमध्ये यंत्रसामुग्री नेऊन हे काम पूर्ण करणे मोठे आव्हान होतेअसे सांगताना मुख्यमंत्र्यांनी या कामात योगदान देणाऱ्या सात देशांतील तज्ज्ञ संस्थांचे आणि कंपन्यांचे आभार मानले.   

            कोविडच्या काळात आलेल्या अडचणींवर मात करत महायुती सरकारने या कामाला गती दिली आणि आज 7 हजार 181 कोटी रुपयांचा हा प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण झाला आहे. या प्रकल्पामुळे खोपोली ते कुसगाव दरम्यानचे अंतर 6 किलोमीटरने कमी होणार असून प्रवाशांचा किमान 25 ते 30 मिनिटांचा वेळ वाचणार आहे.   

     

मुंबई-पुणे प्रवासातील ‘मिसिंग लिंक’ म्हणजे आधुनिक अभियांत्रिकीचा आविष्कार मिसिंग लिंक नव्हे तर कनेक्टिंग लिंक..!

 मुंबई-पुणे प्रवासातील ‘मिसिंग लिंक’ म्हणजे आधुनिक अभियांत्रिकीचा आविष्कार

मिसिंग लिंक नव्हे तर कनेक्टिंग लिंक..!

                      - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

रायगड-अलिबाग,दि.01 (जिमाका) :- "मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील 'मिसिंग लिंकहा केवळ एक रस्ता नसून भारतीय अभियांत्रिकी कौशल्याचा जागतिक स्तरावरील अजोड नमुना आहे. या प्रकल्पामुळे केवळ प्रवासाचा वेळच वाचणार नाहीतर तो राज्याच्या अर्थव्यवस्थेला 70 हजार कोटींची गती देणारा 'इकॉनॉमिक मल्टिप्लायरठरेल," असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.   

             या प्रकल्पास मिसिंग लिंक पेक्षा 'कनेक्टिंग लिंकसंबोधणे जास्त संयुक्तिक असल्याचे सांगून या प्रकल्पाच्या लोकार्पणानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पाच्या तांत्रिक आणि सुरक्षिततेच्या पैलूंवर विशेष प्रकाश टाकला.

             या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसलेमहिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरेरोजगार हमी मंत्री भरत गोगावलेराज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकरखासदार सुनील तटकरेखासदार श्रीरंग बारणेगृह विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर-पाटणकरसार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकरविभागीय आयुक्त रुबल अग्रवालविशेष पोलीस महानिरीक्षक कोकण परीक्षेत्र डॉ.संजय दराडेजिल्हाधिकारी किशन जावळेएमएसआरडीसीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाडजिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसलेपोलीस अधीक्षक आंचल दलालसहव्यवस्थापकीय संचालक राजेश पाटीलएमएसआरडीसीचे इतर अधिकारी तसेच या प्रकल्पांतर्गत बोगद्याच्या बांधकामातील सहभागी नवयुगा कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

            प्रकल्पाबाबत माहिती देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कीया प्रकल्पात प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले असून तांत्रिकदृष्ट्या हा मार्ग अत्यंत प्रगत आहे. यामध्ये अत्याधुनिक अग्निशमन यंत्रणावॉटर मिस्ट सिस्टीम आणि दर 50 मीटरवर आपत्कालीन दूरध्वनीची सोय करण्यात आली आहे. सुरक्षेचा विशेष उपाय म्हणून दर 300 मीटरवर दोन्ही बोगद्यांना जोडणारे 'कनेक्टर्सतयार करण्यात आले आहेतजेणेकरून एखाद्या बोगद्यात दुर्घटना घडल्यास दुसऱ्या बोगद्यातून प्रवाशांचे सुरक्षित स्थलांतर करता येईल. संपूर्ण मार्गावर 24 तास सीसीटीव्हीची देखरेख असूनलेनची शिस्त पाळली जावीयासाठी 'इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीमकार्यान्वित करण्यात आली आहे. नियम मोडणाऱ्या वाहनधारकांना आता थेट ई-चलान पाठवले जाईलअसा इशाराही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला.

        अतिशय कठीण भौगोलिक परिस्थितीतदऱ्याखोऱ्यांत आणि जंगलांमध्ये यंत्रसामुग्री नेऊन हे काम पूर्ण करणे मोठे आव्हान होतेअसे सांगताना मुख्यमंत्र्यांनी या कामात योगदान देणाऱ्या सात देशांतील तज्ज्ञ संस्थांचे आणि कंपन्यांचे आभार मानले.   

‘महालक्ष्मी सरस 2026’ प्रदर्शनाचे बीकेसीत शनिवारी उद्घाटन

 महालक्ष्मी सरस 2026’ प्रदर्शनाचे बीकेसीत शनिवारी उद्घाटन

 

मुंबई, दि. 1 : ग्रामीण महिलांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित महालक्ष्मी सरस विक्री व प्रदर्शन 2026’ चा भव्य उद्घाटन सोहळा शनिवार (2 मे) रोजी बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील एमएमआरडीए मैदानावर पार पडणार आहे.

महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) (एमएसआरएलएम) यांच्या वतीने आयोजित या सोहळ्याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सकाळी 11 वाजता होणार आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे तसेच राज्यमंत्री योगेश कदम यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता समूहांच्या (एसएचजी) उत्पादनांना व्यापक बाजारपेठ उपलब्ध करून देण्याबरोबरच महिला उद्योजिकांना प्रोत्साहन देणेत्यांच्या उत्पन्नात वाढ करणे आणि लोकल टू ग्लोबल’ या संकल्पनेला चालना देणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.

महालक्ष्मी सरस 2026’ प्रदर्शन 2 ते 14 मे दरम्यान सर्वसामान्यांसाठी खुले राहणार असूनराज्यासह देशातील विविध भागांतील महिला उद्योजिकांची उत्पादनेखाद्यपदार्थ आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा अनुभव नागरिकांना येथे घेता येणार आहे.

या प्रदर्शनात एकूण 500 स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रातील 230इतर राज्यांतील 66नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या महिला गटांचे 68 तसेच महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांचे 34 स्टॉल्स आहेत. याशिवाय नाबार्डमाविमखादी व ग्रामोद्योग मंडळमुंबई महानगरपालिका आणि इतर शासकीय विभागांचे 22 स्टॉल्स सहभागी झाले आहेत.

प्रदर्शनातील 80 स्टॉल्सचा वातानुकूलित फूड कोर्ट हे एक प्रमुख आकर्षण ठरणार असूनराज्यातील विविध भागांतील पारंपरिक खाद्यपदार्थ येथे उपलब्ध असतील. तसेच हातमाग वस्त्रेवारली व बंजारा कलालाकडी खेळणीदागिने आणि इतर ग्रामीण उत्पादने खरेदीसाठी उपलब्ध करण्यात आली आहेत. नागरिकांच्या सोयीसाठी लॉकर्सची व्यवस्था25 किलोमीटर परिसरात मोफत होम डिलिव्हरी तसेच ज्येष्ठ नागरिकदिव्यांग आणि गर्भवती महिलांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात येणार असूनउमेद परिवारातील सुमारे 65 लाख सदस्यांना आपली कला सादर करण्याची संधी मिळणार आहे.

यंदाच्या महालक्ष्मी सरसमध्ये एआर फोटोग्राफीअ‍ॅनामॉर्फिक वॉल्स आणि इन्फोग्राफिक वॉल्ससारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. कंटेनर’ ही मध्यवर्ती संकल्पना असूनउद्योगनिर्यात आणि जागतिक संधींचे प्रतीक म्हणून उद्योग किल्ला’ उभारण्यात आला आहे.

Maharashtra and Gujarat State Foundation Day Celebrated at Lok Bhavan, Maharashtra

 Maharashtra and Gujarat State Foundation Day Celebrated at Lok Bhavan, Maharashtra

Lok Bhavan Resonates with the Procession of Young Warkaris

Padma Awardees Felicitated by the Governor

 

 

Mumbai, Dt. 1 : Maharashtra Lok Bhavan premises echoed with chants of ‘Dnyaneshwar–Tukaram’ rendered by young Warkaris. The dindi procession was organised on the occasion of Maharashtra State Foundation Day celebrated in the presence of Governor Jishnu Dev Varma and his wife Sudha Dev Varma.

The State Foundation Day was celebrated as part of the ‘Ek Bharat Shreshtha Bharat’ initiative of Government of India through cultural programmes.

Padma Awardees from Maharashtra were felicitated by the Governor on this occasion. 

On the occasion, the Governor stated that a nation is not merely defined by geographical boundaries, but is a beautiful confluence of diverse cultures. To understand a state, one must understand its culture. He noted that although each state has its distinct cultural identity, they are bound together by a thread of unity.

A cultural programme organised with the support of Amarvani Foundation featured performances by singer Shantanu Herlekar, singer Upagna Pandya, and artist Abhimanyu Herlekar, who presented melodious Marathi and Gujarati folk and devotional songs, earning appreciation from the Governor.

The Governor remarked that Maharashtra is the land of saints, and the work of saints promotes social equality.

On this occasion, the ‘TB-Free India’ campaign was launched at the Governor’s initiative. The Governor’s Secretary Dr Prashant Narnavare stated that the campaign will reach the slums in both urban and rural areas.

Padma Bhushan Uday Kotak, entrepreneur Padma Shri Ashok Khade, artist Padma Shri Bhiklya Dhinda, Padma Shri Jujhar Vasi, actor Padma Shri R Madhavan, late actor Padma Shri Satish Shah, and Padma Shri Satyanarayan Nuwal, among others, were felicitated by the Governor.

The cultural programme included performances of ‘Sur Niragas Ho’, Gujarati folk songs, ‘Vaishnav Jan To’, and the abhang ‘Teerth Vitthal, Kshetra Vitthal’. The traditional dance performed by young Warkaris captivated the audience.

The Secretary to the Governor Dr. Prashant Narnavare delivered the welcome address, while Protocol Officer Archana Gaikwad conducted the proceedings and delivered the vote of thanks.

Dr Madan Maharaj Gosavi, entrepreneur Nikhil Merchant, Commissioner  Fisheries  Prerna Deshbratar, Joint Secretary S Ramamoorthy, and Comptroller of the Governor's Households Dr Nishikant Deshpande, along with other dignitaries.

महाराष्ट्र लोकभवन में महाराष्ट्र एवं गुजरात राज्य स्थापना दिवस का आयोजन

 महाराष्ट्र लोकभवन में महाराष्ट्र एवं गुजरात राज्य स्थापना दिवस का आयोजन

बाल वारकरियों की दिंडी से लोकभवन गूंज उठा

राज्यपाल के हाथों पद्म पुरस्कार विजेताओं का सम्मान

 

 

मुंबई, दि. 1 : बाल वारकरियों द्वारा किए गए ज्ञानदेवतुकाराम’ के जयघोष से आज महाराष्ट्र लोकभवन परिसर गूंज उठा। राज्यपाल जिष्णु देव वर्मा तथा उनकी पत्नी सुधा देव वर्मा की उपस्थिति में महाराष्ट्र राज्य स्थापना दिवस मनाया गया। इस अवसर पर राज्यपाल का स्वागत बाल वारकरियों की दिंडी और नामस्मरण के साथ किया गया।

एक भारत श्रेष्ठ भारत’ पहल के अंतर्गत शुक्रवार (1 मई) को महाराष्ट्र राज्य स्थापना दिवस के साथ-साथ गुजरात राज्य स्थापना दिवस भी सांस्कृतिक कार्यक्रमों के माध्यम से मनाया गया। इस वर्ष पद्म पुरस्कार से सम्मानित विशिष्ट व्यक्तियों का राज्यपाल के हाथों अभिनंदन किया गया।

इस अवसर पर राज्यपाल ने कहा कि देश केवल भौगोलिक सीमाओं से घिरा क्षेत्र नहीं हैबल्कि विविध संस्कृतियों का सुंदर संगम है। किसी राज्य को समझने के लिए उसकी संस्कृति को समझना आवश्यक है। उन्होंने कहा कि प्रत्येक राज्य की संस्कृति भिन्न होने के बावजूद उनमें एकता का सूत्र विद्यमान है।

अमरवाणी  फाउंडेशन के सहयोग से आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम में गायक शंतनू हेर्लेकरगायिका उपग्ना पंड्या तथा कलाकार अभिमन्यू हेर्लेकर ने सुंदर मराठी एवं गुजराती लोकगीत और भक्तिगीत प्रस्तुत किएजिसकी राज्यपाल ने सराहना की।

राज्यपाल ने कहा कि महाराष्ट्र संतों की भूमि है और संतों का कार्य समाज में समता स्थापित करने का होता है।

इस अवसर पर राज्यपाल की पहल पर टीबी मुक्त भारत’ अभियान की शुरुआत की गई। राज्यपाल के सचिव डॉ प्रशांत नारनवरे ने बताया कि यह अभियान शहरी और ग्रामीण दोनों क्षेत्रों तक पहुंचाया जाएगा।

राज्यपाल के हाथों पद्मभूषण उदय कोटकउद्यमी पद्मश्री अशोक खाडेकलाकार पद्मश्री भिखल्या धिंडापद्मश्री जुझर वसीअभिनेता पद्मश्री आर माधवनदिवंगत अभिनेता पद्मश्री सतीश शहातथा पद्मश्री सत्यनारायण नुवाल सहित अन्य गणमान्य व्यक्तियों को सम्मानित किया गया।

          सांस्कृतिक कार्यक्रम में सूर निरागस हो’, गुजराती लोकगीत, ‘वैष्णव जन तो’ और तीर्थ विठ्ठलक्षेत्र विठ्ठल’ जैसे भजनों की प्रस्तुति दी गई। बाल वारकरियों के पारंपरिक नृत्य ने उपस्थित दर्शकों का मन मोह लिया।

कार्यक्रम में राज्यपाल के सचिव डॉ. प्रशांत नारनवरे ने स्वागत भाषण दियाजबकि राजशिष्टाचार अधिकारी अर्चना गायकवाड ने कार्यक्रम का संचालन एवं आभार प्रदर्शन किया।

इस अवसर पर डॉ मदन महाराज गोसावी उद्यमी निखिल मर्चंट मत्स्य विकास आयुक्त प्रेरणा देशभ्रतारसह सचिव एस राममूर्ती तथा परिवार प्रबंधक डॉ निशिकांत देशपांडे सहित अन्य गणमान्य व्यक्ति

टीबी मुक्त भारत' अभियानाची सुरुवात करण्यात आली. हे अभियान शहरी तसेच

 महाराष्ट्र ही संतभूमी आहे. संतांचे कार्य ही समतेची चळवळ असते असे त्यांनी सांगितले.


यावेळी राज्यपालांच्या पुढाकाराने 'टीबी मुक्त भारत' अभियानाची सुरुवात करण्यात आली. हे अभियान शहरी तसेच ग्रामीण भागातील लोकांपर्यंत पोहोचवण्यात येईल असे राज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरे यांनी यावेळी जाहीर केले.  


राज्यपालांच्या हस्ते पद्मभूषण उदय कोटक, उद्योजक पद्मश्री अशोक खडे, कलाकार पद्मश्री भिकल्या धिंडा, पद्मश्री जुझर वसी, कलाकार पद्मश्री आर माधवन, दिवंगत अभिनेते पद्मश्री सतीश शहा, पद्मश्री सत्यनारायण नुवाल आदींना यावेळी सन्मानित करण्यात आले.


सांस्कृतिक कार्यक्रमात 'सूर निरागस हो', गुजराती लोकगीत, 'वैष्णव जन तो' व तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल हा अभंग सादर करण्यात आला. बाल वारकरी मुलांनी सादर केलेल्या पारंपरिक नृत्याने उपस्थितांचे मन जिंकले.


राज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरे यांनी स्वागतपर भाषण व प्रास्ताविक केले, तर राजशिष्टाचार अधिकारी अर्चना गायकवाड यांनी सूत्र संचलन व आभार प्रदर्शन केले.


कार्यक्रमाला अमरवाणी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ मदन महाराज गोसावी, उद्योजक निखिल मर्चंट, आयुक्त मत्स्य विकास प्रेरणा देशभ्रतार, राज्यपालांचे सहसचिव एस राममूर्ती, राज्यपालांचे परिवार प्रबंधक डॉ निशिकांत देशपांडे उपस्थित होते.     

महाराष्ट्र लोकभवन येथे महाराष्ट्र व गुजरात राज्य स्थापना दिन साजरा बाल वारकऱ्यांच्या दिंडीने लोकभवन दुमदुमले राज्यपालांच्या हस्ते राज्यातील पदम पुरस्कार विजेते सन्मानित

 महाराष्ट्र लोकभवन येथे महाराष्ट्र व गुजरात राज्य स्थापना दिन साजरा

बाल वारकऱ्यांच्या दिंडीने लोकभवन दुमदुमले

राज्यपालांच्या हस्ते राज्यातील पदम पुरस्कार विजेते सन्मानित

 

मुंबई, दि. 1 : बाल वारकऱ्यांनी केलेल्या 'ज्ञानदेव - तुकारामगजराच्या सुरांनी आज महाराष्ट्र लोकभवन परिसर दुमदुमला.  राज्यपाल जिष्णु देव वर्मा व त्यांच्या पत्नी सुधा देव वर्मा यांच्या उपस्थितीत आज महाराष्ट्र राज्य स्थापना दिवस साजरा करण्यात आलात्यावेळी राज्यपालांचे स्वागत बाल वारकऱ्यांच्या दिंडीने व नामगजरात करण्यात आले.

एक भारत श्रेष्ठ भारत उपक्रमांअंतर्गत शुक्रवारी (दि. 1 मे) महाराष्ट्र राज्य स्थापनेसह गुजरात राज्य स्थापना दिवस देखील सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. यावर्षी पद्म पुरस्काराने सन्मानित झालेल्या मान्यवरांचा यावेळी राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

देश म्हणजे केवळ भागलिक सीमांनी वेढलेले क्षेत्र नसून देश हा विविध संस्कृतींचा सुंदर समूह असतो. एखाद्या राज्याला समजून घ्यायचे असेल तर तेथील संस्कृती समजून घेतली पाहिजेअसे यावेळी बोलताना राज्यपालांनी सांगितले.  प्रत्येक राज्याची संस्कृती भिन्न असली तरीही त्यांमध्ये एकात्मतेचा धागा जुळलेला आहे असे त्यांनी नमूद केले.

अमरवाणी फाउंडेशन या संस्थेच्या सहकार्याने आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात गायक शंतनू हेर्लेकरगायिका उपग्ना पंड्या व कलाकार अभिमन्यू हेर्लेकर यांनी सुंदर मराठी व गुजराती लोकगीते व भक्तिगीते सादर केल्याबद्दल राज्यपालांनी त्यांचे भरभरून कौतुक केले. 

Friday, 1 May 2026

आज 7 हजार 181 कोटी रुपयांचा हा प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण

 कोविडच्या काळात आलेल्या अडचणींवर मात करत महायुती सरकारने या कामाला गती दिली आणि आज 7 हजार 181 कोटी रुपयांचा हा प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण झाला आहे. या प्रकल्पामुळे खोपोली ते कुसगाव दरम्यानचे अंतर 6 किलोमीटरने कमी होणार असून प्रवाशांचा किमान 25 ते 30 मिनिटांचा वेळ वाचणार आहे.   

             विशेष म्हणजे हा प्रकल्प ज्या उंबरखिंडीच्या परिसरात साकारला आहेतिथेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी मुघलांचा पराभव केला होताया ऐतिहासिक संदर्भाची आठवणही मुख्यमंत्र्यांनी करून दिली.

        यावेळी मुख्यमंत्र्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या मुंबई पुणे महामार्गावरील वाहतूक कोंडी संदर्भातील व्हिडिओचा संदर्भ देत त्यांची व नागरिकांची दिलगिरी व्यक्त केली. "सुप्रिया ताईतुम्ही आज शेवटच्यांदा वाहतूक कोंडीत अडकलातआता 'मिसिंग लिंकसुरू झाल्यामुळे यापुढे तुम्हाला किंवा इतर कोणत्याही प्रवाशांना घाटात ट्रॅफिकमध्ये अडकण्याची वेळ येणार नाही," असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. तसेच कामगार दिनाचे औचित्य साधत त्यांनी या प्रकल्पासाठी घाम गाळणाऱ्या सर्व कामगारांचे आणि एमएसआरडीसीच्या चमूचे कौतुक केले. या 'कनेक्टिंग लिंक'मुळे मुंबई-पुणे हा नॉलेज आणि टेक्नॉलॉजी कॉरिडॉर अधिक सक्षम होऊन राज्याच्या अर्थव्यवस्थेला मोठी उभारी मिळेलअसा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले असून तांत्रिकदृष्ट्या हा मार्ग अत्यंत प्रगत

 प्रकल्पाबाबत माहिती देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कीया प्रकल्पात प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले असून तांत्रिकदृष्ट्या हा मार्ग अत्यंत प्रगत आहे. यामध्ये अत्याधुनिक अग्निशमन यंत्रणावॉटर मिस्ट सिस्टीम आणि दर 50 मीटरवर आपत्कालीन दूरध्वनीची सोय करण्यात आली आहे. सुरक्षेचा विशेष उपाय म्हणून दर 300 मीटरवर दोन्ही बोगद्यांना जोडणारे 'कनेक्टर्सतयार करण्यात आले आहेतजेणेकरून एखाद्या बोगद्यात दुर्घटना घडल्यास दुसऱ्या बोगद्यातून प्रवाशांचे सुरक्षित स्थलांतर करता येईल. संपूर्ण मार्गावर 24 तास सीसीटीव्हीची देखरेख असूनलेनची शिस्त पाळली जावीयासाठी 'इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीमकार्यान्वित करण्यात आली आहे. नियम मोडणाऱ्या वाहनधारकांना आता थेट ई-चलान पाठवले जाईलअसा इशाराही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला.

        अतिशय कठीण भौगोलिक परिस्थितीतदऱ्याखोऱ्यांत आणि जंगलांमध्ये यंत्रसामुग्री नेऊन हे काम पूर्ण करणे मोठे आव्हान होतेअसे सांगताना मुख्यमंत्र्यांनी या कामात योगदान देणाऱ्या सात देशांतील तज्ज्ञ संस्थांचे आणि कंपन्यांचे आभार मानले.   

मुंबई-पुणे प्रवासातील ‘मिसिंग लिंक’ म्हणजे आधुनिक अभियांत्रिकीचा आविष्कार मिसिंग लिंक नव्हे तर कनेक्टिंग लिंक..!

 मुंबई-पुणे प्रवासातील ‘मिसिंग लिंक’ म्हणजे आधुनिक अभियांत्रिकीचा आविष्कार

मिसिंग लिंक नव्हे तर कनेक्टिंग लिंक..!

                      - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

रायगड-अलिबाग,दि.01 (जिमाका) :- "मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील 'मिसिंग लिंकहा केवळ एक रस्ता नसून भारतीय अभियांत्रिकी कौशल्याचा जागतिक स्तरावरील अजोड नमुना आहे. या प्रकल्पामुळे केवळ प्रवासाचा वेळच वाचणार नाहीतर तो राज्याच्या अर्थव्यवस्थेला 70 हजार कोटींची गती देणारा 'इकॉनॉमिक मल्टिप्लायरठरेल," असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.   

             या प्रकल्पास मिसिंग लिंक पेक्षा 'कनेक्टिंग लिंकसंबोधणे जास्त संयुक्तिक असल्याचे सांगून या प्रकल्पाच्या लोकार्पणानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पाच्या तांत्रिक आणि सुरक्षिततेच्या पैलूंवर विशेष प्रकाश टाकला.

             या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसलेमहिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरेरोजगार हमी मंत्री भरत गोगावलेराज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकरखासदार सुनील तटकरेखासदार श्रीरंग बारणेगृह विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर-पाटणकरसार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकरविभागीय आयुक्त रुबल अग्रवालविशेष पोलीस महानिरीक्षक कोकण परीक्षेत्र डॉ.संजय दराडेजिल्हाधिकारी किशन जावळेएमएसआरडीसीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाडजिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी 

 १ ते ८ मे दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन

राज्यात थॅलेसेमिया मुक्त महाराष्ट्र’ संकल्प सप्ताह

-राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

मुंबईदि. ३० : सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी थॅलेसेमिया मुक्त महाराष्ट्र मोहिमेला सक्रिय प्रोत्साहन देत १ ते ८ मे २०२६ या कालावधीत राज्यभर संकल्प सप्ताह प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश दिले आहेत. या माध्यमातून थॅलेसेमिया प्रतिबंधतपासणी व जनजागृतीला अधिक गती देण्यावर भर देण्यात येणार असल्याचे  सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी सांगितले.

या मोहिमेच्या एक वर्षपूर्तीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या संकल्प सप्ताहात विविध विषयांवर आधारित उपक्रम राबविले जाणार असूननागरिकांचा व्यापक सहभाग नोंदविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ८ मे रोजी साजऱ्या होणाऱ्या जागतिक थॅलेसेमिया दिनाच्या अनुषंगाने आठवडाभर राज्यभर जनजागृती अभियान राबविण्यात येणार असून यामध्ये सहभाग नोंदवावा असे आवाहन त्यांनी केले आहे.

पडताळणी, पुष्टीकरण आणि तो अंतिमतः प्रत्येकाने योग्य यूआरएल, म्हणजेच https://se.census.gov.in,

 'घर-यादी आणि गृहगणनाया जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात प्रगणक ज्यावेळी घरी भेट देतील त्यावेळी स्व-गणना डेटाची पडताळणीपुष्टीकरण आणि तो अंतिमतः सादर करण्यासाठी एसई आयडी सामायिक करणे आवश्यक असेल. स्व-गणना पोर्टलद्वारे सादर केलेला सर्व डेटा एनक्रिप्ट केला जातो आणि कडक सायबर सुरक्षा आणि गोपनीयतेच्या उपाययोजनांसह सुरक्षित सरकारी सर्व्हरमध्ये संग्रहित केला जातो. प्रत्येकाने योग्य यूआरएलम्हणजेच https://se.census.gov.inला भेट देत असल्याची खात्री करावी आणि एसएमएस/ई-मेल संवादांची सत्यता पडताळून पाहावीअसा सल्ला देण्यात येत आहे.

स्वगणना करणाऱ्या नागरिकांनी हे सुनिश्चित करावे की ते https://se.census.gov.in या योग्य युआरएल ऍड्रेसलाच भेट देत आहेत तसेच ज्या एसएमएस /ई-मेल श्रेणीतून वन टाइम पासवर्ड (ओटीपी ) प्राप्त झाला आहेत्याची सत्यता पडताळून पाहावी.

एसएमएस /ओटीपी द्वारे प्राप्त झालेल्या जनगणनेशी संबंधित सर्व संदेशांमध्ये प्रेषकाच्या नावात RGICEN हा कीवर्ड असतोउदा. AD-RGICEN-S, BD-RGICEN-S, RGICEN-G, JK-RGICEN-G इत्यादी.

0000

जनगणनेत सहभागी होण्यासाठी एक सुरक्षितअधिकृत पोर्टल https://se.census.gov.in येथे पाहता येईल.

 मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेतमहाराष्ट्राच्या मुख्य प्रधान जनगणना अधिकारीडॉ. निरुपमा जे. डांगे यांनी माहिती दिली कीभारताच्या रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्त कार्यालयाने एक समर्पित वेब पोर्टल विकसित केले असून हे पोर्टल म्हणजे जनगणनेत सहभागी होण्यासाठी एक सुरक्षित आणि सुलभ माध्यम आहे. अधिकृत पोर्टल https://se.census.gov.in येथे पाहता येईल. 

कुटुंबातील कोणताही एक सदस्य अंदाजे 15-20 मिनिटांत स्व-गणना प्रक्रिया पूर्ण करून कुटुंबाचा तपशील देऊ शकतो अशी माहिती महाराष्ट्र जनगणना कार्य संचालनालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली. अर्ज यशस्वीरित्या सादर केल्यावरएक स्व-गणना ओळखपत्र (एसईआयडीतयार केले जाईल आणि नोंदणीकृत मोबाईल नंबर/ई-मेलवर पाठवले जाईल. स्व-गणना प्रक्रियेदरम्यान कोणतेही दस्तऐवज अपलोड करण्याची आवश्यकता नाही.

स्व-गणना करणे ऐच्छिक आहेअनिवार्य नाही. जर कोणी स्व-गणना केली नसेलतर काळजी करण्याची गरज नाहीमाहिती गोळा करण्यासाठी/नोंदवण्यासाठी प्रगणक 16 मे ते 14 जून 2026 दरम्यान प्रत्येक घरी भेट देतील असे डांगे यांनी सांगितले.

स्व-गणना पर्यायांतर्गत व्यक्ती त्यांची माहिती स्वतःच ऑनलाईन स्वरुपात https://se.census.gov.in येथे भरु शकतील. स्व-गणनेची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर एक एसई आयडी येईल. 16 मे ते 14 जून 2026 या कालावधीत जेव्हा गणनाकार तुमच्या घरी भेट देतीलतेव्हा हा एसई आयडी त्यांच्यासोबत सामायिक करणे आवश्यक आहे. गणनाकाराकडून एसई डेटाची पडताळणी/मान्यता झाल्यानंतरच घर-यादी आणि गृहगणनेसाठीची गणना पूर्ण मानली जाईल.

जनगणना 2027 मध्ये पहिल्यांदाच डिजिटल डेटा संकलन आणि स्व-गणना होणार

 जनगणना 2027 मध्ये पहिल्यांदाच डिजिटल डेटा संकलन आणि स्व-गणना होणार

 

•              महाराष्ट्राने जनगणना 2027 साठी 1 मे ते 15 मे 2026 कालावधी दरम्यान स्व-गणना पोर्टल केले सुरु

•        स्व-गणना ऐच्छिक असून बंधनकारक नाहीमहाराष्ट्राच्या मुख्य प्रधान जनगणना अधिकारी डॉ. निरुपमा जे. डांगे यांनी दिली माहिती

•              महाराष्ट्रात 16 मे ते 14 जून 2026 या कालावधीत प्रगणक प्रत्येक घरी देणार भेट

 

मुंबईदि. 30 : केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया उपक्रमाप्रती असलेल्या वचनबद्धतेनुसार माहिती संकलन आणि प्रसाराची गुणवत्ता तसेच कार्यक्षमता सुधारण्यासह निर्धारित वेळेत कार्य पूर्ण करण्याच्या उद्देशाने जनगणना 2027 व्यापक प्रमाणात डिजिटल तंत्रज्ञानाचा अवलंब करणार आहे. भारतीय जनगणनेच्या इतिहासात प्रथमच स्व-गणना पध्दत सुरु करण्यात आली असून त्या माध्यमातून व्यक्तींना जनगणनेशी निगडित त्यांचा कौटुंबिक तपशील स्वतंत्रपणे ऑनलाइन पूर्ण भरता येईलआणि सादर करता येईल.

देशात प्रथमच, 2027 च्या जनगणनेच्या माहितीचे संकलन डिजिटल पद्धतीने केले जाईलज्यामध्ये स्व-गणना हा देखील एक पर्याय असेल. महाराष्ट्र राज्यासाठीघर-यादी आणि गृहगणनेचा कालावधी सुरू होण्यापूर्वी स्व-गणना करण्यासाठी 15 दिवसांचा कालावधी निश्चित करण्यात आला असून तो 1 मे 2026 ते 15 मे 2026 असा आहे.

मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेतमहाराष्ट्राच्या मुख्य प्रधान जनगणना अधिकारीडॉ. निरुपमा जे. डांगे यांनी माहिती दिली कीभारताच्या रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्त कार्यालयाने एक समर्पित वेब पोर्टल विकसित केले असून हे पोर्टल म्हणजे जनगणनेत सहभागी होण्यासाठी एक सुरक्षित आणि सुलभ माध्यम आहे. अधिकृत पोर्टल https://se.census.gov.in येथे पाहता येईल. 

कुटुंबातील कोणताही एक सदस्य अंदाजे 15-20 मिनिटांत स्व-गणना प्रक्रिया पूर्ण करून कुटुंबाचा तपशील देऊ शकतो अशी माहिती महाराष्ट्र जनगणना कार्य संचालनालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली. अर्ज यशस्वीरित्या सादर केल्यावरएक स्व-गणना ओळखपत्र (एसईआयडीतयार केले जाईल आणि नोंदणीकृत मोबाईल नंबर/ई-मेलवर पाठवले जाईल. स्व-गणना प्रक्रियेदरम्यान कोणतेही दस्तऐवज अपलोड करण्याची आवश्यकता नाही.


 पोर्टल अधिक सुरक्षितस्थिर आणि वेगवान करण्यासाठी सुधारणा करण्यात येत असूनमायक्रोसॉफ्टडेल आणि कॉमवॉल्ट यांसारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तंत्रज्ञान कंपन्यांच्या भारतीय प्रतिनिधींशी समन्वय साधून मार्गदर्शन घेतले जात आहे. सर्व तांत्रिक यंत्रणा आणि तज्ज्ञ टीम्स २४x७ कार्यरत असल्याचेही मंत्री ॲड.शेलार यांनी सांगितले.

 

 दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात असून पोर्टल लवकरच पूर्ण क्षमतेने सुरू होईलअसा विश्वास व्यक्त करत नागरिकांनी सहकार्य करावे व सेवा केंद्रांशी संपर्कात राहावेअसे आवाहन विभागाने केले आहे.

 

आपले सरकार’ हे राज्यातील नागरिकांसाठी सेवा वितरणाचे महत्वाचे डिजिटल व्यासपीठ आहे. सध्या उद्भवलेल्या तांत्रिक अडचणींवर मात करण्यासाठी सर्व यंत्रणा युद्धपातळीवर काम करत असूनप्रणाली अधिक सक्षम व सुरक्षित करण्यावर भर दिला जात आहे. पोर्टल लवकरच पूर्ववत सुरू करून नागरिकांना अखंडित सेवा देण्याच्या सूचना मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिल्या आहेत.

आपले सरकार’ हे राज्यातील नागरिकांसाठी सेवा वितरणाचे महत्वाचे डिजिटल व्यासपीठ

 पोर्टल अधिक सुरक्षित, स्थिर आणि वेगवान करण्यासाठी सुधारणा करण्यात येत असून, मायक्रोसॉफ्ट, डेल आणि कॉमवॉल्ट यांसारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तंत्रज्ञान कंपन्यांच्या भारतीय प्रतिनिधींशी समन्वय साधून मार्गदर्शन घेतले जात आहे. सर्व तांत्रिक यंत्रणा आणि तज्ज्ञ टीम्स २४x७ कार्यरत असल्याचेही मंत्री ॲड.शेलार यांनी सांगितले

 दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात असून पोर्टल लवकरच पूर्ण क्षमतेने सुरू होईल, असा विश्वास व्यक्त करत नागरिकांनी सहकार्य करावे व सेवा केंद्रांशी संपर्कात राहावे, असे आवाहन विभागाने केले आहे.


‘आपले सरकार’ हे राज्यातील नागरिकांसाठी सेवा वितरणाचे महत्वाचे डिजिटल व्यासपीठ आहे. सध्या उद्भवलेल्या तांत्रिक अडचणींवर मात करण्यासाठी सर्व यंत्रणा युद्धपातळीवर काम करत असून, प्रणाली अधिक सक्षम व सुरक्षित करण्यावर भर दिला जात आहे. पोर्टल लवकरच पूर्ववत सुरू करून नागरिकांना अखंडित सेवा देण्याच्या सूचना मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिल्या आहेत

आपले सरकार’ वेबपोर्टल लवकरच पूर्ववत; तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी युद्धपातळीवर काम

 ‘आपले सरकार’ वेबपोर्टल लवकरच पूर्ववत;

तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी युद्धपातळीवर काम

– मंत्री ॲड.आशिष शेलार

 

मुंबईदि. ३० : राज्यातील नागरिकांसाठी अत्यावश्यक सेवा पुरविणारे आपले सरकार’ वेबपोर्टल तांत्रिक अडचणींमुळे तात्पुरते बंद असले तरी ते लवकरच पूर्ण क्षमतेने पूर्ववत सुरू करण्यात येणार असल्याची माहिती इलेक्ट्रॉनिक्समाहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाचे मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी दिली. या अडचणी दूर करण्यासाठी तज्ज्ञ समिती युद्धपातळीवर कार्यरत असूनप्रणाली अधिक सक्षम आणि सुरक्षित बनविण्यावर भर दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

 

२७ एप्रिलच्या रात्रीपासून तांत्रिक कारणास्तव बंद पडलेल्या या पोर्टलमुळे जात प्रमाणपत्ररहिवासी दाखलाउत्पन्न प्रमाणपत्रशिष्यवृत्ती अर्ज तसेच विविध स्पर्धा परीक्षांसाठी अर्ज यांसारख्या सेवांमध्ये अडथळे निर्माण झाले आहेत. दररोज लाखो नागरिक या पोर्टलचा वापर करत असल्याने निर्माण झालेली गैरसोय लक्षात घेऊन शासनाने तातडीने उच्चस्तरीय पावले उचलली आहेत.

 

या पार्श्वभूमीवर मंत्री ॲड. शेलार यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक पार पडली. बैठकीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच महाआयटीचे पदाधिकारी उपस्थित होते. तांत्रिक अडचणींचे मूळ कारण शोधून त्या कायमस्वरूपी दूर करण्यासाठी आयटी तज्ज्ञअभियंते आणि तंत्रज्ञान प्रमुखांची विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीने प्राथमिक तपासणी पूर्ण केली असून आवश्यक उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत.

Featured post

Lakshvedhi