भारत ही जगातील सर्वात गतिमान अर्थव्यवस्थेपैकी एक आहे, तर युरोप ही जगातील सर्वात मोठी आणि स्थिर बाजारपेठ आहे. जगातील या दोन मोठ्या लोकशाही व्यवस्था एकत्र आल्यास सुमारे २ अब्ज लोकांची एक विशाल बाजारपेठ तयार होते. या भागीदारीमुळे दोन्ही देशांसाठी भविष्यात अनंत संधी उपलब्ध होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
प्रास्ताविक राष्ट्रीय शेअर बाजाराचे अध्यक्ष श्रीनिवास इंजेटी यांनी केले. त्यांनी राष्ट्रीय शेअर बाजारातील भांडवली गुंतवणुकीविषयी आणि सायप्रस - भारतातील गुंतवणूक संधीबद्दल भाष्य केले. कार्यक्रमाला सायप्रस व भारताचे राष्ट्रगीताने सुरुवात झाली. यावेळी सायप्रस देशातील प्रतिनिधी मंडळातील मंत्री, सदस्य, राष्ट्रीय शेअर बाजाराचे अधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment