कोणताही मतदार मागे नको — भारतीय संविधानाचा मूलमंत्र
प्रत्येक मतदार महत्त्वाचा आहे, हे दाखवत ज्ञानेश कुमार यांनी सांगितले की पहिल्यांदा मतदान करणारे, ८५ वर्षांहून अधिक वयाचे ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग मतदार, तृतीयपंथी नागरिक आणि अतिदुर्गम भागातील मतदारांसाठी विशेष व्यवस्था करण्यात येते. हिमाचल प्रदेशातील ताशिगंगसारख्या उंचावरील मतदान केंद्रापासून एकाच मतदारासाठी उभारलेल्या बूथपर्यंत, "कोणताही मतदार मागे राहू नये" हे भारतीय निवडणूक आयोगाचे ब्रीद आहे.
आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि संवाद
परिषदेच्या अनुषंगाने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी मेक्सिको, इंडोनेशिया, मंगोलिया, दक्षिण आफ्रिका, स्वित्झर्लंड, मोल्दोवा, लिथुआनिया, मॉरिशस, जर्मनी, क्रोएशिया, युक्रेन आणि युनायटेड किंगडममधील त्यांच्या समकक्ष अधिकाऱ्यांसोबत द्विपक्षीय बैठका घेतल्या. यामध्ये मतदार सहभाग, निवडणूक तंत्रज्ञान, प्रवासी भारतीयांचे मतदान आणि संस्था क्षमतावृद्धी यावर चर्चा झाली.
भारताची निवडणूक प्रणाली ही केवळ जगातील सर्वात मोठी नाही, तर सर्वात विश्वासार्ह व समावेशक आहे, हे त्यांनी आपल्या भाषणातून स्पष्ट केले, असे निवडणूक आयोगाने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले आहे.
No comments:
Post a Comment