झोपडपट्ट्या आणि संवेदनशील वस्त्यांमध्ये जनजागृतीचे अभियान अधिक व्यापक करण्याची आवश्यकता मुंबई विद्यापीठाचे एनएसएस स्वयंसेवक, बृहन्मुंबई महानगरपालिकेचा टीबी सेल, भामला फाउंडेशन, आरोग्य कर्मचारी आणि विविध स्वयंसेवी संस्थांच्या कार्याचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी विशेष कौतुक केले.
"ही पदयात्रा केवळ जनजागृतीचा कार्यक्रम नसून समाजात सकारात्मक परिवर्तन घडविण्याचे प्रभावी माध्यम आहे. शासन, स्वयंसेवी संस्था, आरोग्य यंत्रणा, विद्यार्थी, कलाकार आणि सामान्य नागरिक यांच्या संयुक्त प्रयत्नातून 'टीबीमुक्त महाराष्ट्र' आणि 'टीबीमुक्त भारत' हे राष्ट्रीय ध्येय निश्चितपणे साकार होईल," असा विश्वास राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी व्यक्त केला.
No comments:
Post a Comment