Friday, 10 July 2026

ठाणे जिल्ह्यातील कळवा पूर्व येथील भास्कर नगर परिसरातील

 ठाणे जिल्ह्यातील कळवा पूर्व येथील भास्कर नगर परिसरातील आदर्श चाळ येथे डोंगरावरून मोठ्या प्रमाणात पाणी खाली येत असल्याने घरे वाहून जाण्याची परिस्थिती निर्माण झाल्याची तक्रार जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाली होती. या तक्रारीची तातडीने दखल घेत जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत पाहणी करून आवश्यक ती मदत करण्याचे निर्देश दिले. घरांमध्ये पाणी शिरण्यास सुरुवात झाली होती. संभाव्य धोका लक्षात घेऊन संबंधित यंत्रणांनी तातडीने कार्यवाही सुरू केली. यामुळे सध्या कोणत्याही घरात पाणी नसून परिसरातील सर्व घरे सुरक्षित आहेत. या घटनेत कोणतेही घर पडलेले नाही. तसेच कोणत्याही प्रकारची जीवित वा वित्तहानी झालेली नाही.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi