Wednesday, 18 August 2021

 बीडीडी चाळीतील मूळ सदनिकाधारकांसाठी

नाममात्र मुद्रांक शुल्क

 

            बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पांतर्गत मूळ रहिवाशांना (सदनिकाधारकांना)  देण्यात येणाऱ्या पुनर्वसन सदनिकेचे करारनामेदस्तावर आकारावयाचे मुद्रांक शुल्क प्रति सदनिका नाममात्र एक हजार रुपये याप्रमाणे आकारण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. या निर्णयामुळे मुळ सदनिकाधारकांना दिलासा मिळेल शिवाय बीडीडी चाळीच्या विकासालाही गती मिळणार आहे.

            मुंबई विकास विभागामार्फत (बी.डी.डी.) सन 1921-1925 च्या दरम्यान मुंबई येथील वरळीनायगावना.म.जोशी मार्ग व शिवडी येथे एकूण 207 चाळी बांधण्यात आल्या आहेत. प्रत्येक चाळ ही  तळ + 3 मजल्यांची असून त्यात प्रत्येकी जवळपास 80 रहिवाशी गाळे आहेत. सदरच्या चाळी या जवळपास 96 वर्षे जुन्या झालेल्या असूनमोडकळीस आलेल्या आहेत. त्यामुळे बी.डी.डी. चाळींचा पुनर्विकास करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या मान्यतेने गृहनिर्माण विभागामार्फत दि.30.03.2016 च्या शासन निर्णयान्वये घेण्यात आलेला आहे. सदरहू निर्णयानुसार बी.डी.डी. चाळींचा पुनर्विकास म्हाडामार्फत करण्यात येणार असूनया पुनर्विकास प्रकल्पांमध्ये जवळपास 15,584 भाडेकरुंचे पुनर्वसन करणे नियोजित आहे.

            बी.डी.डी. चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पांतर्गत मूळ रहिवाशांना 500 चौ.फुट चटई क्षेत्रफळाची सदनिका मालकी तत्वावर विनामूल्य वितरीत करण्यात येणार आहे. बी.डी.डी. चाळींचा पुनर्विकास प्रकल्प आर्थिकदृष्ट्या वर्धनक्षम ठरण्याच्या दृष्टीनेमुंबईमधील वरळीनायगावना.म.जोशी मार्ग व शिवडी येथील एकूण 207  बी.डी.डी. चाळीतील पात्र भाडेकरुंचे पुनर्वसन करण्यासाठी त्यांना मालकी हक्काने देण्यात येणाऱ्या पुनर्वसन सदनिकेसाठी आकारण्यात येणारे करारनामे /दस्तावरील मुद्रांक शुल्क आज निश्चित करण्यात आले.

-----०-----

 

 संभाजीनगरमध्ये उद्योजकांवर होणारे हल्ले गंभीर!

तातडीने पाऊले उचलादेवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

 

मुंबई, 18 ऑगस्ट

उद्योगनगरी संभाजीनगरमध्ये सातत्याने उद्योजकांवर होत असलेले हल्लेत्यातून महाराष्ट्राबाहेर जाणारे विपरित चित्रयामुळे रोजगारांवर येणारी गदाइत्यादींचा गांभीर्याने विचार करून याबाबत तातडीने पाऊले उचलण्यात यावीत तसेच जलदगती न्यायालयात खटले चालवून आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा व्हावीअशी मागणी करणारे पत्र माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे.

 

मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात देवेंद्र फडणवीस म्हणतात कीउद्योगनगरी संभाजीनगरमध्ये सातत्याने उद्योजकांवर हल्ले होत असण्याच्या अनेक घटना अलिकडच्या काळात प्रकाशात आल्या आहेत. दि. ऑगस्ट रोजी भोगले उद्योग समूहाचे प्रबंध संचालक नित्यानंद भोगलेउत्पादन व्यवस्थापक श्री सोनगीरकरकार्मिक व्यवस्थापक भूषण व्याहाळकर या तिघांना बाहेरून आलेल्या 15-20 कथित गुंडांनी मारहाण केली. यासंदर्भातील संपूर्ण फुटेज पोलिसांकडे उपलब्ध आहे. कोणत्याही प्रकारची चिथावणी नसताना ही मारहाण झाली आहे. या प्रकरणातील काही आरोपींना अटक झाली तर काही फरार आहेत. दि. 10 ऑगस्ट रोजी वाळुज एमआयडीसी परिसरात असलेल्या श्री गणेश कोटिंग समूहावर हल्ला करण्यात आला. लेबर कॉन्ट्रॅक्ट आम्हाला द्याया मागणीसाठी हे लोक गेले होते. या दोन घटनांनंतर आता इतरही अनेक छोट्या उद्योगांच्या समस्या पुढे येत आहेत. पेट्रोल भरून पेट्रोलचे पैसे न देणेहॉटेलमध्ये जेवल्यावर त्याचे पैसे न देणेवाहनांची दुरूस्ती केल्यावर त्याचे पैसे न देणेअशा अनेक तक्रारी पुढे येत आहेत. विशेषत: अलिकडच्या 8-10 महिन्यात अशा तक्रारी वाढल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. अशा प्रकरणात पोलिसांत तक्रारी झाल्यानंतर सामान्य कलमांन्वये कारवाई होते. परिणामी वर्षोनुवर्षे न्यायालयात तक्रारी प्रलंबित राहतात आणि कितीतरी वर्षांनी शिक्षा सुनावली जाते.

 

अशा घटना सातत्याने घडत राहिल्यास त्याचा राज्यात गुंतवणूक येण्याच्या प्रक्रियेवर प्रतिकूल परिणाम होतोशिवाय एक वेगळे चित्र गुंतवणूकदारांच्या मनात उभे राहते. त्यामुळे महाराष्ट्रात अधिकाधिक गुंतवणूक यावीयातून मोठ्या संख्येने रोजगारनिर्मिती व्हावीयासाठी अशा घटनांकडे अतिशय गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. या सर्व घटनांमध्ये कठोरातील कठोर कलमे लावूनहे खटले जलदगती न्यायालयात चालवून आरोपींना कठोर शिक्षा होत नाहीतोवर या कथित गुंडांवर जरब बसणार नाही. आपण स्वत: यात

लक्ष घालून तातडीने कारवाई करालही आशा करतोअसेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

 उत्तर मुंबई विभागातील ज्येष्ठ नागरिकांना

राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत नोंदणी करण्याचे आवाहन

 

       मुंबईदि. 18 : मुंबई उपनगर जिल्ह्यातीलउत्तर मुंबईमधील सहा मतदारसंघात राष्ट्रीय वयोश्री योजनेद्वारे दि. 25262730 ऑगस्ट व 12 सप्टेंबरया दिवशी ज्येष्ठ नागरिकांना साधने आणि उपकरणे यांचे नि:शुल्क वाटप करण्यासाठी चाचणी शिबिर खासदारगोपाल शेट्टी यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात येणार आहे. या शिबिरात ज्येष्ठ नागरिकांना छडीवॉकरव्हिलचेअरकानाचे मशीनचष्मेकृत्रिम दातव्हिल चेअर कमोड सहितट्रायपॉड व पेट्रापॅाड इ. यंत्रे व उपकरणे देण्यात येतील. तरी या विभागातील ज्येष्ठ नागरिकांनी आपले सरकार केंद्र (Common Sservice Centre) येथे राष्ट्रीय वयोश्री योजनेत नावनोंदणी करावी. नोंदणीसाठी  आधार कार्डरेशन कार्ड किंवा उत्पन्नाचा दाखला व  पासपोर्ट साईज फोटो कागदपत्रे अनिवार्य आहे.

         तरी जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांनी नावनोंदणी करुन या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन सहाय्यक आयुक्तसमाज कल्याणमुंबई उपनगर श्री. प्रसाद खैरनार यांनी केले आहे.

 *विचार करण्यायोग्य पोस्ट*


 रशिया येथे पत्रकार बैठकीत पत्रकाराने अध्यक्ष पुतीन यांना विचारले की, तुम्हाला फक्त *डॉक्टर व शिक्षकांनाच कोरोनाची लस द्यायची इच्छा का आहे?  उर्वरित 300 दशलक्ष सामान्य लोकांचे काय?  देशाला त्यांची आणि प्रशासकांची गरज नाही काय?*


यावर संबंधित पत्रकाराला पुतीन यांनी दिलेले उत्तरः त्यांचे संरक्षण करून मला *सर्वसामान्यांचेच* रक्षण करायचे आहे.

 जर एक *डॉक्टर* मरण पावला तर आपल्याला दुसरा डॉक्टर बनवण्यासाठी *30 वर्षे* लागतील आणि शासनाला *कोट्यावधी रुपये खर्च करावे लागतील, हे लोकांचे पैसे आहेत.*


 आणि *डॉक्टरांना* घडवतात फक्त

   *शिक्षक.* 

म्हणूनच

 जर डॉक्टर,प्रशासक, या सगळ्यांना घडवणाऱ्या शिक्षकांचा मृत्यू झाला तर *डॉक्टर/प्रशासक कोण तयार करेल ?*

 शिक्षक, डॉक्टर हे दोन्ही घटक देशांच्या *अतुलनीय संपत्ती* आहेत.  

म्हणून डॉक्टरांबरोबरच शिक्षक देखील माझ्यासाठी *महत्वाचे आहेत.*

  सलाम, अशा प्रकारे शिक्षकांची कदर करणाऱ्या पुतीन यांच्या सारख्या महान व्यक्तिमत्त्वाला🙏🏻.

आणि

आमच्याकडे मात्र अशीही माकडं आहेत, की ज्यांना शिक्षकांची अवहेलना करण्यात धन्यता वाटते.


 *शिक्षक या जगात एक जिवंत देव आहे.*, असे मानणाऱ्या पुतीन यांना व त्यांच्यासारखा विचार करणाऱ्या भारतातील अनामिक व्यक्तीमत्वांना त्रिवार वंदन🙏🏻


 चिनी लाइटची माळ एक दिवाळी पण नीट टिकत नाही ......😢😢😢

.....

.....

....

....

...


.


व्हायरस मेल्यांनी तीन चार दिवाळ्या टिकेल असा आणलाय ... 

😡 😡 😡

 वांद्रेविलेपार्लेसांताक्रुझ येथील लसीकरण शिबिरांतून

नऊ हजार नागरिकांचे लसीकरण

--

·       कोविड विषयक नियमांचे पालन करण्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे आवाहन

 

            मुंबईदि. 18 : वांद्रेविलेपार्ले आणि सांताक्रुझ येथे आयोजित मोफत लसीकरण  शिबिरांतून नऊ हजार नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी या शिबिरांना भेट देऊन पाहणी केली.

            एच एन रिलायन्स हॉस्पिटलच्या सहकार्याने विविध भागांमध्ये लसीकरण शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. याअंतर्गत वांद्रे पूर्व येथील समाज मंदिरविलेपार्ले येथील पार्ले इंटरनॅशनल हॉल आणि सांताक्रुझ येथील साने गुरूजी शाळेत प्रत्येकी तीन हजार लसींचे डोस देण्यात येत आहेत.

            मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाचे कोविड प्रतिबंधक लसीकरण पूर्ण करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. लसीकरण शिबिरांचे आयोजन करताना कोविडविषयक नियमांचे पालन करण्याच्या सूचना श्री.ठाकरे यांनी केल्या. यावेळी परिवहन मंत्री ॲङ अनिल परबआमदार सुभाष सावंतमाजी महापौर विश्वनाथ महाडेश्वरनगरसेवक सदा परबशेखर वायंगणकरश्रीमती रोहिणी कांबळेसंदीप नाईकवरूण सरदेसाई आदी उपस्थित होते.

 यंत्रमाग कामगार कल्याणकारी महामंडळ

स्थापन करण्यास तत्वत: मान्यता

- कामगार मंत्री हसन मुश्रीफ

 

          मुंबईदि. 18: महाराष्ट्रात जवळपास साडेनऊ लाख यंत्रमाग आहेत. तर यंत्रमागाशी निगडीत साडेचार लाख कामगार असुन ते असंघटीत कामगार म्हणुन गणले जात असल्याने आजपर्यंत त्यांना कोणतेही लाभ मिळत नाही. अनेक वर्षापासून यंत्रमाग कामगारांची यंत्रमाग कामगार महामंडळ व्हावे, अशी मागणी प्रलंबित होती. त्यानुसार यंत्रमाग कामगार कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्यास तत्वत: मान्यता देण्यात येत असल्याची माहिती कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

          मंत्रालयात राज्यातल्या यंत्रमाग  मालक संघटना व कामगार संघटना तसेच वस्त्रोद्योगातील तज्ज्ञ मंडळींच्या उपस्थितीत बैठक झाली.

          या बैठकीसाठी  कृषी मंत्री दादाजी   भुसे आमदार प्रणिती शिंदे ,  आमदार अनिल बाबर,  आमदार प्रकाश आवाडेआमदार सुभाष देशमुखआमदार मुनीफ इस्माईलकामगार विभागाच्या प्रधान सचिव  विनिता वेद सिंगलविकास आयुक्त  (असंघटीत कामगार)  डॉ.अश्विनी जोशी,  कामगार आयुक्त सुरेश  जाधव यांच्यासह मदन कारंडे,माजी आमदार सुरेश हाळवणकरमाजी आमदार नरसिंह आडमअमित गाताडेसतीश कोष्टीविनयजी  महाजन महादेव गौडबंडुपंत मुसळेराजीव पारीख,  सुनील  शिंदेउदयसिंग पाटीलकामगार नेते दत्ता माने,  भरमा कांबळेतसेच  मालेगाव,  भिंवंडीसोलापूरसांगलीव इचलकरंजी  येथील मालक संघटना व कामगार संघटनेचे प्रतिनिधी  हजर होते.

0000  


Featured post

Lakshvedhi