Tuesday, 3 August 2021

 *साथरोग नियंत्रणासाठी चिपळूण मध्ये पाच फिरते दवाखाने*

जगद्गुरु नरेंद्र चार्य महाराज संस्थानाचा लोकोपयोगी उपक्रम,शहरात साफसफाई देखील सुरूच.

क्षेत्र नाणीज धाम जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज संस्थानातर्फे शनिवारपासून पाच फिरते दवाखाने सुरु करण्यात आले. संस्थानाच्या रुग्णवाहिका रूपांतरण दवाखान्यात करण्यात आले आहे. ते वेगवेगळ्या या ठिकाणी जाऊन उपचार करतील तसेच चिपळूण व परिसरातील वाड्या-वस्त्यांवर सुद्धा त्यांचा उपयोग होणार आहे.

महापुरानंतर चिपळूणची परिस्थिती अद्याप गंभीर आहे .गाळ, साचलेले पाणी, डास आदींमुळे रोगराई पसरण्याची शक्यता आहे. संस्थानाच्या फिरत्या दवाखान्याची सोय केली आहे त्यामध्ये डॉक्टर्स , नर्स,पुरेसा औषध साठा आहे वाड्या वस्त्यांवर जाऊन गरिबांवर मोफत उपचार होणार आहेत.

 [03/08, 08:56] Baby: *नागपूर हिवाळी अधिवेशनातील दुपारच्या सत्रात प्रचंड गोंधळ झाला....*


*२८८ आमदारांपैकी २८७ आमदारांनी सभागृहात घोषणाबाजी केली.फाईल्स फेकून दिल्या सभागृहाचे कामकाज चालूच दिलं नाही.गोंधळ घालणारया आमदारांनी सभागृहाची दयनीय अवस्था करून टाकली...*


*२८७ आमदार सभागृहाच्या बाहेर निघून गेले.त्या सभागृहात फक्त एकच आमदार होते ते म्हणजे आदरणीय #गणपतराव_देशमुख....*


*गणपतराव देशमुख सभागृहात मान खाली घालून दोन्ही हात डोक्याला लावून चिंताग्रस्त अवस्थेत बसलेले....*


*दुसऱ्या दिवशी #इंडियन_एक्सप्रेस या वर्तमानपत्रा मध्ये डोक्याला दोन्ही हात लावून बसलेल्या गणपतराव(आबा) देशमुखांचा फोटो छापून आला ती बातमी व फोटो पाहून लोकांना एक विलक्षण धक्का बसला....*


*२८७आमदारांनी अधिवेशनात गोंधळ का घातला असेल...?*


*महाराष्ट्रातील जनतेला वाटलं गरीबाच्या पुनर्वसनाचा अथवा या पुरोगामी महाराष्ट्रातील जनतेच्या लोकहितासाठी गोंधळ घातला गेला असेल ?*


*पण जेव्हा लोकांना कळलं की फायली भिरकावत कालचा गोंधळ हा #आमदारांची_पेन्शन_वाढ_करावी म्हणून घातला गेला होता....*


*त्या सभागृहात डोक्याला हात लावून बसलेले एकमेव आमदार गणपतराव देशमुख (आबा ) यांना पेन्शन वाढ नको होती....*


*नंतर पत्रकारांनी गणपतराव ( आबा ) देशमुख यांना विचारले तुम्हाला पेन्शन वाढ का नको आहे....?*


*पत्रकारांच्या ह्या प्रश्नाचे उत्तर देतेवेळी गणपतराव देशमुख यांनी सांगितले की....*


*महाराष्ट्रातील बहुतांश जनता ही आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही गरीब  हे आणखीनच गरीबच होत चाललेत.त्यांना रहायला घरे नाहीत.महाराष्ट्रात अनेक समस्या आहेत....*


*आपल्याला लोकांनी विकासकामं करण्यासाठी निवडून दिले आहे स्वतःची पेंन्शन वाढ करून घेण्यासाठी नव्हे....!*


*इतका गोंधळ होऊन देखील तिसऱ्या दिवशी पेन्शनवाढ मंजूर झाली........*😢


*कारण सभागृहात सर्वच नेते गणपतराव ( आबा ) देशमुख नव्हते....!*


*घरातून बाहेर पडल्यानंतर घरासमोर उभारून मिळेल त्या एस.टी.बसने प्रवास सुरू करून मतदारसंघ पिंजून काढणारे व मंत्रीपद जाताच क्षणी सरकारी गाडीचा त्याग करणारे तसेच जमिनीशी जोडली गेलेली नाळ तुटू न देणारे आदरणीय गणपतराव ( आबा ) देशमुख यांना....*


*_भावपूर्ण श्रद्धांजली व विनम्र अभिवादन !_*

     🌹🙏🌹

[03/08, 10:01] Baby: *आयुष्यात सुंदर क्षणांची वाट पाहण्यात  वेळ दड़वु नका,* *जो क्षण आयुष्यात  येईल त्याला  सुंदर करण्याचा प्रयत्न करा..*  *जीवनाचे दोन नियम आहेत, बहरा फुलांसारखे आणि पसरा सुंगधासारखे,,,*

*कुणाला प्रेम देणं, सर्वात मोठी भेट असते,,,* *आणि कुणाकडून प्रेम मिळविणे, सर्वात मोठा सन्मान असतो.....*

 🙏🌹* *शुभ दिन **🌹🙏

 टोकियो ऑलिम्पिकमधील पुरुषांच्या उंच उडीचा हा अंतिम सामना होता.  अंतिम फेरीत इटलीच्या *जियानमार्को टँपबेरी* चा सामना कतारच्या *मुताजएस्सा बार्शीम* शी होता.  दोघांनी 2.37 मीटर उडी मारली आणि बरोबरीवर होते!  त्यामुळे ऑलिम्पिक अधिकार्‍यांनी नियमानुसार प्रत्येकाला आणखी तीन प्रयत्न करायला सांगितले, परंतु त्यात ते दोघेही 2.37 मीटरपेक्षा जास्त गाठू शकले नाहीत.


 त्या दोघांना आणखी एक अतिरिक्त संधी देण्यात आली, पण पायाच्या गंभीर दुखापतीमुळे *टँपबेरी* ने शेवटच्या प्रयत्नातून माघार घेतली.  आता खरं तर *बार्शीम* समोर दुसरा विरोधक नव्हता, तो क्षण जेव्हा तो एकटा सुवर्ण पदकाचा मानकरी उरला होता!


 पण *बार्शीम* ने अधिकाऱ्याला विचारले "जर मी सुद्धा शेवटच्या प्रयत्नातून माघार घेतली तर काय होऊ शकते का?"  अधिकारी सर्व नियम  तपासतो आणि म्हणतो "मग अश्यावेळी सुवर्णपदक तुमच्या दोघांमध्ये वाटले जाईल".  त्यानंतर *बार्शीम* ने क्षणाचाही विलंब न करता शेवटच्या प्रयत्नातून माघार घेण्याची घोषणा केली.


 हे पाहून इटालियन प्रतिस्पर्धी *टँपबेरी* धावला आणि *बार्शीम* ला मिठी मारली आणि त्याला अतीहर्षामुळे रडू कोसळले!  

.... खेळाच्या अत्युच्च प्रकारात एका माणुसकीची, विश्वबंधुत्वाची ही झलक हृदयस्पर्शी आहे. खेळभावना आणि प्रेम याचा हा अद्भुत संगम हेच ऑलिम्पिक च्या जागतिक आयोजनाचे उद्दिष्ट परिपूर्ण साध्य झाले असे म्हणता येईल.

*तुला मनापासून सलाम बार्शीम.  तू मनं जिंकलीस लेका! ... म्हणजेच जग जिंकलास.*

🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

 महापारेषण कंपनीकडून नागपूर जिल्ह्यातील

कोरोना उपाययोजनांसाठी २ कोटींचा निधी

·       ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याकडून धनादेश सुपूर्द

·       मे महिन्यापासून आतापर्यत १८ कोटी निधीची उपलब्धता

 

            नागपूर, दि. २ : नागपूर जिल्ह्यातील कोरोना संदर्भातील विविध उपाययोजनांसाठी ऊर्जा विभागाच्या महापारेषण कंपनीकडून दोन कोटींचा सामाजिक उत्तरदायित्व निधी ऊर्जामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्द केला.

            जिल्हाधिकारी आर. विमला यांच्याकडे ऊर्जामंत्री डॉ.राऊत यांनी हा धनादेश दिला. यावेळी महापारेषणचे नागपूर झोनचे मुख्य अभियंता महेंद्र वाळकेनागपूर स्थापत्यचे अधीक्षक अभियंता अविनाश कजबेकरसहाय्यक महाव्यवस्थापक अभय रोहीकार्यकारी अभियंता स्थापत्य प्रवीण दामकेअतिरिक्त कार्यकारी अभियंता विलास रंगारीनिवासी उपजिल्हाधिकारी अविनाश कातडे उपस्थित होते.

            उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर कोरोना संदर्भातील वैद्यकीय उपाययोजना करण्यासाठी जिल्ह्यातील औद्योगिक व विविध क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांना सामाजिक उत्तरदायित्व निधीसाठी मागणी करण्यात आली होती. यासाठी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी विविध संस्था व औद्योगिक कंपन्यांना पत्र दिली होती. या संदर्भात पाठपुरावा करण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. यावेळी त्यांनी कोरोना संदर्भातील उपाययोजना करतांना ग्रामीण व शहरी भागात समपातळीवर पायाभूत सोयीसुविधा निर्माण व्हाव्यातअशी अपेक्षा व्यक्त केली.

            जिल्ह्यामध्ये गेल्या मे महिन्यापासून आत्तापर्यंत 18 कोटी रुपये सामाजिक उत्तरदायित्व निधीमध्ये मिळाले आहेत. यातून कोरोनासंदर्भातील पायाभूत सुविधा उपलब्ध केल्या जात आहेत. कोरोना प्रतिबंधतपासणीउपचार यासाठी तात्काळ प्रतिसाद मिळणारी यंत्रणा जिल्ह्यात उभारण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे, असे ऊर्जामंत्री डॉ.राऊत यांनी सांगितले.

 साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती करिता अर्ज करावेत

 

            मुंबईदि. २ : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ, मुंबई शहर - उपनगर जिल्ह्यात 'साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्तीकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत.

       मुंबई शहर - उपनगर जिल्ह्यातील मातंग समाजातील मांगमातंगमिनी मादीगमादींगदानखणी मांगमांग महाशीमदारीराधेमांगमांग गारुडीमांग गारोडीमादगीमादिगा या १२ पोटजातीतील विद्यार्थ्यांनी सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात शिक्षण घेवून व सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झालेल्या इयत्ता १० वी,१२ वीपदवीपदव्युत्तर वैद्यकीय व अभियांत्रिकी इ. करिता महामंडळाकडून सरासरी ६०% पेक्षा जास्त गुण असलेल्या विद्यार्थ्यांकडून 'साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्तीकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत.

         ज्येष्ठता व गुणानुक्रमांकानुसार प्रथम ०३ ते ०५ विद्यार्थ्यांची निधीच्या उपलब्धतेनुसार शिष्यवृत्ती वितरण करण्यात येणार आहे. अभ्यासक्रमामध्ये विशेष प्राविण्याने गुणवत्ता मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी जातीचा दाखलारेशनकार्डआधार कार्ड शाळेचा दाखला मार्कशीट २ फोटो पुढील वर्गात प्रवेश घेतल्याचा पुरावा यासह दोन प्रतित पुर्ण पत्यासह व भ्रमणध्वनी क्रमांकासह आपला अर्ज साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ (मर्या)मुंबई- गृहनिर्माणभवनकलानगरतळमजलारूम नं. ३३. बांद्रा (पू)मुंबई ४०००५१ या पत्त्यावर १५ ऑगस्ट २०२१ पर्यंत पाठवावाअसे जिल्हा व्यवस्थापक साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ (मर्या) जिल्हा कार्यालय मुंबई शहर उपनगर यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

 भौगोलिक मानांकनाच्या माध्यमातून

कृषीक्षेत्रात नव्या युगाचा आरंभ होईल

- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

 

            मुंबई, दि. 2 : बौद्धिक संपदा व भौगोलिक मानांकन शेतकऱ्यांकरिता महत्वाचे विषय असून याबाबत शेतकऱ्यांत जागरुकता निर्माण करणे गरजेचे आहे. भौगोलिक मानांकनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळेल तर ग्राहकांना अस्सल वस्तू व उत्पादने खरेदी करता येतील. यादृष्टीने बौद्धिक संपदा व भौगोलिक मानांकनाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत त्यांच्या मातृभाषेत पोहोचवणे अतिशय आवश्यक असून त्यातून कृषीक्षेत्रात नव्या युगाचा आरंभ होईलअसे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले. 

            बौद्धिक संपदा व भौगोलिक मानांकन या क्षेत्रात मौलिक कार्य करणाऱ्या प्रा. गणेश हिंगमिरे यांच्या 'इंटलेक्चुअल प्रॉपर्टी राईट्सया इंग्रजीव 'जीआय मानांकनया मराठी पुस्तकाचे तसेच डिजिटल आवृत्तीचे प्रकाशन राज्यपाल श्री.कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे झाले, त्यावेळी ते बोलत होते.

            राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले, महाराष्ट्रातील शेतकरी प्रगत असून देशातील शेतकरी येथील शेतीतील नवनवे प्रयोग पाहण्यास येत असतात. शेती हा भारताचा प्राण असून राज्यातील शेतकऱ्यांनी प्रगती केली तर देशातील शेतकरी त्यांचे अनुकरण करतील व त्यातुन देशाची प्रगती होईल शेतकऱ्यांच्या घरोघरी भौगोलिक मानांकनाचे उत्कृष्ट ज्ञान पोहोचविणारे श्री. हिंगमिरे जीआय क्रांतीचे आरंभकर्ता असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

            बौद्धिक संपदापेटंट व ट्रेडमार्क हे विषय जपानमध्ये सातव्या इयत्तेत शिकविले जातात. युरोपप्रमाणे आर्थिक प्रगती साधायची असेल तर हे विषय शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावे लागतील असे लेखक गणेश हिंगमिरे यांनी सांगितले. 

            यावेळी राज्यातील विविध विभागातून आलेल्या शेतकऱ्यांनी राज्यपालांना आपापली जीआय मानांकित कृषी उत्पादने भेट दिली. कार्यक्रमाला कर्नल (नि.) गिरीजा शंकर मुंगलीमहाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष सुधाकर आव्हाड,  प्रबोध उद्योगाचे संचालक रामभाऊ डिंबळेरश्मी हिंगमिरे व गणेश हिंगमिरे यांच्या आई उपस्थित होत्या. बुकगंगाच्या सुप्रिया लिमये यांनी आभार मानले.  

0000

Governor Koshyari releases books

‘Intellectual Property Rights’ and ‘GI Manakan’

 

      Mumbai :- 2 : Stating that Intellectual property rights and Geographical Indicator registration of agricultural products will revolutionalize the field of agriculture, Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari called for making the knowledge of Geographical Indicators accessible to farmers across the country in their mother tongue.

      The Governor was speaking at the launch of the books ‘Intellectual Property Rights’ (English) and ‘GI Manakan’ (Marathi) authored by Adv Prof Ganesh Hingmire at Raj Bhavan, Mumbai on Monday.

      Farmers from different parts of Maharashtra presented their GI registered agricultural products to the Governor. The books and their digital version have been published by Book Ganga.

      Retired Colonel Girija Shankar Mungli, former Chairman of the Bar Council of Maharashtra and Goa Sudhakar Avhad and Sanskrit Scholar and Director of Prabodh Udyog Rambhau Dimbale and farmers were present on the occasion.

००००

Monday, 2 August 2021

 राज्यातील ११ जिल्ह्यांमध्ये तिसऱ्या पातळीचे निर्बंध कायम

मुंबईमुंबई उपनगर आणि ठाणेबाबत स्थानिक प्रशासन निर्णय घेणार

------

·        उर्वरित २२ जिल्ह्यांमध्ये निर्बंधांत काही प्रमाणात सूट

·        नागरिकांनी अतिशय काटेकोरपणे आरोग्याचे नियम पाळण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

 

            मुंबई, दि. 2 : राज्यातील कोविड संसर्ग मोठ्या प्रमाणावर असलेल्या ११ जिल्ह्यांत ब्रेक दि चेन अंतर्गत तिसऱ्या पातळीचे निर्बंध कायम ठेवण्यात आले असून मुंबईमुंबई उपनगर आणि ठाणे या  जिल्ह्यांत स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण निर्बंधांबाबत ठरविणार आहे. अशा रीतीने हे १४ जिल्हे सोडून राज्यातील उर्वरीत जिल्ह्यांमध्ये निर्बंधांमध्ये काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे . आज सार्वजनिक आरोग्य विभागाने यासंदर्भात साथरोग कायदा आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत ब्रेक दि चेनचे आदेश जारी केले आहेत

            ज्या ११ जिल्ह्यांमध्ये तिसऱ्या पातळीचे निर्बंध लागू राहतील ते पुढीलप्रमाणे आहेत : कोल्हापूरसांगलीसातारापुणेरत्नागिरीसिंधुदुर्गसोलापूरअहमदनगरबीडरायगडपालघर. या जिल्ह्यांपैकी सिंधुदुर्गसाताराअहमदनगर येथे मोठ्या प्रमाणावर पॉझिटीव्हिटी दर आणि दैनंदिन वाढती रुग्णसंख्या पाहता या जिल्ह्यांतील स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्रशासन किती प्रमाणात कडक निर्बंध लावायचे त्याचा निर्णय घेतील.

            मुंबईमुंबई उपनगर आणि ठाणे या 3 जिल्ह्यांत आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण निर्बंधांबाबत निश्चित ठरवतील.

उर्वरित जिल्ह्यातील निर्बंधांमध्ये खालीलप्रमाणे सूट राहील

            सर्व प्रकारचे जीवनावश्यक वस्तू तसेच जीवनावश्यक वस्तू विक्री न करणारी दुकाने तसेच मॉल्स सोमवार ते शुक्रवार रात्री ८ वाजेपर्यंत आणि शनिवारी दुपारी 3 पर्यंत सुरु राहतील. रविवारी जीवनावश्यक वगळता इतर सर्व दुकाने आणि मॉल्स बंद राहतील.

            सर्व सार्वजनिक उद्यानेमैदाने व्यायामचालणेधावणेसायकलिंग आदींसाठी खुले करण्यात आले आहेत

            सर्व शासकीय व खासगी कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरु ठेवणार. प्रवासाची गर्दी टाळण्यासाठी कार्यालयीन वेळांची विभागणी करण्याची सूचना

            जी कार्यालये वर्क फ्रॉम होम पद्धतीने सुरु ठेवता येऊ शकतात ती तशी सुरु ठेवण्याची सूचना

            सर्व प्रकारची शेतीविषयक कामेबांधकामवस्तूंची वाहतूकउद्योग हे पूर्ण क्षमतेने सुरु राहतील.

            जिमव्यायामशाळायोगा केंद्रब्युटी पार्लर्सकेश कर्तनालय यांनी वातानुकूलन वापरायचे नसून सोमवार ते शुक्रवार रात्री ८ वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेने सुरु ठेवता येतील शनिवारी दुपारी ३ पर्यंत आणि रविवारी पूर्ण बंद राहतील.

            चित्रपटगृहेनाट्यगृहेतसेच मॉल्समधील मल्टीप्लेक्स हे बंद राहतील. यात कोणतीही सुट नाही.

            राज्यातील सर्वधर्मियांची प्रार्थनास्थळे बंदच राहतील.

            शाळामहाविद्यालयांच्याबाबतीत शालेय शिक्षण व उच्च शिक्षण विभाग निर्णय घेईल.

            सर्व उपाहारगृहे ५० टक्के आसन क्षमतेसह सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरु राहतील. मात्र आरोग्याच्या कोविडविषयक नियमांचे पालन करावे लागेल. टेक अवे किंवा पार्सल सेवा सध्याप्रमाणे सुरु ठेवता येईल.

            रात्री ९ ते सकाळी ५ या वेळेत अत्यावश्यक कारणांशिवाय बाहेर पडता येणार नाही.

            गर्दीमुळे संसर्ग वाढू नये म्हणून वाढदिवस समारंभराजकीय, सामाजिकसांस्कृतिक समारंभनिवडणुकाप्रचारमिरवणुकानिदर्शन मोर्चे यांच्यावरील निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत 

            मास्क वापरणेसुरक्षित अंतर यासारखे कोरोना प्रतिबंधक नियम सर्व नागरिकांनी पाळणे गरजेचे आहे. या नियमांचे उल्लंघन केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५साथरोग कायदाआणि भारतीय दंड संहितेमधील तरतुदीनुसार कारवाई केली जाईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

००००

Featured post

Lakshvedhi