मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात मोतीबिंदूमुळे येणारे टाळता येण्याजोगे अंधत्व दूर करण्यासाठी व्यापक स्वरूपात प्रयत्न सुरू आहेत. ‘मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्र’ हे केवळ शासकीय अभियान न राहता प्रत्येक पात्र नागरिकाला वेळेत उपचार मिळवून देणारे प्रभावी आरोग्य अभियान म्हणून राबविण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. निर्धारित कालावधीत मोतीबिंदू शस्त्रक्रियांचा अनुशेष पूर्ण करून २०२७ पर्यंत मिशन यशस्वी करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
मोतीबिंदू शस्त्रक्रियांचा हा अनुशेष निर्धारित कालावधीत पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्यात येईल, असा विश्वास डॉ. रवी चव्हाण यांनी व्यक्त केला असून, राज्याचे नोडल अधिकारी म्हणून जबाबदारी सोपविल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री व राज्य शासनाचे आभार मानले आहेत.
No comments:
Post a Comment