शाश्वत विकासासाठी कटिबद्ध
पणनमंत्री श्री रावल म्हणाले, महाराष्ट्र हे देशाचे औद्योगिक आणि आर्थिक शक्तिकेंद्र आहे. जैवतंत्रज्ञान, नवकल्पना तसेच कृषी, अन्नप्रक्रिया, वस्त्रोद्योग आणि ऊर्जा क्षेत्रातील जैवआधारित उपायांच्या माध्यमातून राज्याचा विकास अधिक शाश्वत करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे.ऑस्ट्रेलियाकडे जागतिक दर्जाचे विज्ञान, तंत्रज्ञान, भांडवल आणि संशोधन क्षमता असून महाराष्ट्राकडे मोठी बाजारपेठ, कुशल मनुष्यबळ, सक्षम पायाभूत सुविधा आणि उत्पादन क्षमता आहे. या सामर्थ्यांच्या आधारे दोन्ही अर्थव्यवस्थांना लाभदायक ठरणाऱ्या मूल्यसाखळ्या विकसित करता येतील.
No comments:
Post a Comment