शिक्षकांचा प्रातिनिधीक सन्मान
बौद्धिक अक्षम मुलांसाठी भारतातील पहिला प्रमाणित व एकसमान अभ्यासक्रम असलेल्या 'दिशा अभियानाची' प्रभावी अंमलबजावणी केल्याबद्दल यामिनी काळे (नवजीवन मतीमंद मुलांची शाळा, छत्रपती संभाजीनगर), अण्णासाहेब कदम (पांडुरंग निवास मतीमंद विद्यालय, लातूर), वैशाली गायकवाड (नंदनवन दुर्बल मनस्क मुलांची शाळा, नागपूर), ज्ञानेश्वर काळे (कै. रावसाहेब निवासी मतीमंद विद्यालय, देवळी, वर्धा) आणि मानसी मुलाम, जय वकील स्कूल फॉर चिल्ड्रन इन नीड ऑफ स्पेशल केअर, मुंबई शहर या पाच विशेष शिक्षकांच्या उल्लेखनीय कार्याचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
दिव्यांग कल्याण विभागाचे आयुक्त सत्यजित बडे यांनी प्रास्ताविकाद्वारे विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाची तर अर्चना चंद्र यांनी जय वकील फाऊंडेशनच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या दिशा अभियानाची माहिती दिली. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विशेष कार्य अधिकारी प्रिया खान यांनी कार्यक्रमाचे संचालन केले.
No comments:
Post a Comment