मुंबईपुरता विकास नाही; संपूर्ण महाराष्ट्र ‘ग्रोथ इंजिन’
महाराष्ट्र केवळ मुंबई-केंद्रित विकास न करता नागपूर, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, ठाणे, नवी मुंबई तसेच विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला विकासाच्या मुख्य प्रवाहाशी जोडत आहे. टियर-२ आणि टियर-३ शहरांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून ते स्वयंपूर्ण आर्थिक केंद्रे बनविण्याचा सरकारचा प्रयत्न आहे असे सांगून उपमुख्यमंत्री म्हणाले की, इंडस्ट्रियल पार्क, आयटी झोन, लॉजिस्टिक्स हब, मेट्रो कनेक्टिव्हिटी आणि रोजगार क्लस्टर्सच्या माध्यमातून या शहरांमध्ये गुंतवणूक आणि रोजगाराच्या संधी निर्माण केल्या जात आहेत. महाराष्ट्राला देशाच्या विकासाचे ‘ग्रोथ इंजिन’ बनविण्याचे उद्दिष्ट आहे
No comments:
Post a Comment