परवडणारी घरे आणि झोपडपट्टीमुक्त मुंबई
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, विकासाचा खरा अर्थ सर्वसामान्यांच्या जीवनमानात सुधारणा होणे हा आहे. त्यामुळे पायाभूत सुविधांसोबत परवडणाऱ्या घरांनाही सरकारने प्राधान्य दिले आहे. मुंबई आणि एमएमआरमधील घरांची वाढती गरज लक्षात घेऊन नवीन गृहनिर्माण धोरण लागू करण्यात आले असून, २०३० पर्यंत ईडब्ल्यूएस आणि अल्प उत्पन्न गटांसाठी ३५ लाख घरे उभारण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. मुंबईला झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियान’ राबविण्यात येत आहे. झोपडपट्टी पुनर्विकासासोबतच नव्या झोपडपट्ट्या निर्माण होऊ नयेत यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे.
No comments:
Post a Comment