Wednesday, 22 July 2026

कृषी पंपांच्या वीजपुरवठ्याबाबत कोणतीही टंचाई नसून, नियमानुसार शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना आठ तास वीजपुरवठा

 राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या, कृषी पंपांच्या वीजपुरवठ्याबाबत कोणतीही टंचाई नसून, नियमानुसार शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना आठ तास वीजपुरवठा केला जात आहे.  कृषी पंपांच्या फीडरवर असलेल्या घरगुती ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित होऊ नये, यासाठी विशेष डिझाइनचे ट्रान्सफॉर्मर सबस्टेशनमध्ये बसविण्यात येत आहेत.   या व्यवस्थेमुळे कृषी पंपांसाठी स्वतंत्र वीजपुरवठा आणि घरगुती ग्राहकांसाठी आवश्यक त्या प्रमाणात वीज उपलब्ध राहते. काही ठिकाणी सिंगल फेजिंगसारख्या तांत्रिक अडचणी  असल्या तरी त्याचे निराकरण केले जात आहे. तांत्रिक अडचणी विहित कालावधीत न सोडविल्यास यासाठी मुख्य अभियंत्यांना थेट जबाबदार धरण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi