विमा न घेतलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीत वाढ करण्याचा विचार
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, कोकणातील आंबा व काजू उत्पादकांना हवामान बदलाचा फटका बसला आहे. नुकसानग्रस्तांना विमा योजनांतून भरपाई दिली जाणार असून, विमा नसलेल्या शेतकऱ्यांनाही मदत देण्यात येणार आहे. किमान मदत 15 हजारांवरून 22 हजार रुपयांपर्यंत वाढविण्याचा विचार आहे. पंचनाम्यानंतर तातडीने मदत जाहीर केली जाईल.
‘नमो शेतकरी महासन्मान’ योजनेअंतर्गत 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 1800 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. केंद्र व राज्य मिळून आतापर्यंत 54 हजार कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. धानाला बोनस देण्याबाबतचा निर्णय लवकरच घेतला जाणार आहे, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
No comments:
Post a Comment