मंत्री विखे पाटील म्हणाले की, जुन्या कालव्यालगत सुमारे ३७० हेक्टर जागा उपलब्ध असून सध्या त्या भागातील अतिक्रमणे हटवून जागा सुरक्षित करण्याचे काम जलसंपदा विभागाने सुरू केले आहे. बोगद्याचे काम पुढील दोन वर्षांत पूर्ण होण्याची अपेक्षा असून त्यानंतर खालच्या भागातील शेतकऱ्यांनाही पाणी उपलब्ध होईल. कालव्याच्या उपयुक्ततेसंदर्भात धोरण तयार करणार आहोत.
मुळशी परिसरातील टाटा धरणातून पाणी उपलब्ध करून देण्याबाबत राज्य शासनाची टाटा पॉवरशी चर्चा सुरू असून तत्वतः पाणी उपलब्ध करून देण्याचे त्यांनी मान्य केले आहे. किमान सात ते आठ टीएमसी पाणी उपलब्ध करण्याचा शासनाचा प्रयत्न असून पुढील दोन-तीन महिन्यांत याबाबत ठोस निर्णय होईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
No comments:
Post a Comment