हवामान बदलाच्या लढ्यात भारत नवकल्पना व अंमलबजावणीचे नेतृत्व करेल
- हिलरी क्लिंटन
कल्पना, भागीदारी आणि कृतीशिवाय पर्याय नाही - मुंबई क्लायमेट वीकमध्ये हिलरी क्लिंटन यांचा तरुणाईला संदेश
मुंबई, दि. १८ - हवामान बदलाच्या लढ्यात युवक, महिला आणि स्थानिक समुदाय यांच्या कल्पना व कृती निर्णायक ठरणार असून दरवाजे ठोठावत राहा, आवाज बुलंद ठेवा आणि उपाय मांडत राहा, असा स्पष्ट संदेश अमेरिकेच्या माजी परराष्ट्र सचिव हिलरी क्लिंटन यांनी दिला.
मुंबई क्लायमेट वीकमधील फायरसाइड चर्चेत त्या बोलत होत्या. श्लोका नाथ यांनी त्यांची मुलाखत घेतली. यावेळी पर्यावरण विभागाच्या सचिव जयश्री भोज उपस्थित होत्या.
No comments:
Post a Comment