Thursday, 19 February 2026

श्री गुरू तेग बहादुर साहिबजी आणि संत नामदेव: भारतीय संत परंपरेतील धर्म, मानवता व बलिदानाचा संगम

 श्री गुरू तेग बहादुर साहिबजी आणि संत नामदेव:

 भारतीय संत परंपरेतील धर्ममानवता व बलिदानाचा संगम

२८ फेब्रुवारी आणि १ मार्च रोजी खारघरनवी मुंबई येथे आयोजित हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने श्री गुरू तेग बहादुर साहिबजी आणि संत नामदेव यांच्या भारतीय संत परंपरेतील धर्ममानवता व बलिदानाचा संगम याविषयी या लेखातून ऊहापोह करण्यात आला आहे.

            भारतीय आध्यात्मिक आणि संत परंपरा ही विविध काळातविविध प्रदेशात जन्मलेल्या थोर विभूतींनी समृद्ध झालेली आहे. या परंपरेत शीख धर्माचे नववे गुरूहिंद- दी -चादर म्हणून ओळखले जाणारे श्री गुरू तेग बहादुर साहिबजी आणि महाराष्ट्रातील म्हणजेच हिंगोली जिल्ह्यातील नरसी नामदेव येथील वारकरी संप्रदायातील महान संत नामदेव महाराज यांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. दोघांचे कार्यविचार आणि त्याग हे धर्मरक्षणमानवतासमता आणि नैतिक मूल्यांचे प्रतीक मानले जातात.

संत नामदेव महाराज हे १३ व्या-१४ व्या शतकातील महान संत असून त्यांनी विठ्ठल भक्तीच्या माध्यमातून समाजात समतानामस्मरण आणि सर्वधर्मसमभावाचा संदेश दिला. जात-पातउच्च-नीच भेद नाकारून त्यांनी सामान्य जनतेला ईश्वरभक्तीचा मार्ग मोकळा करून दिला. त्यांनी रचलेल्या अभंगांमधून मानवताकरुणा आणि सामाजिक ऐक्याचे तत्त्व प्रभावीपणे मांडले गेले. संत नामदेव महाराजांची कीर्ती महाराष्ट्राच्या सीमांपुरती मर्यादित न राहता उत्तर भारतापर्यंत पोहोचली. त्यांचे अनेक अभंग पंजाबी भाषेत आहेत

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi