Saturday, 28 February 2026

मराठी भाषा जागतिक पातळीवर नेण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणार

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते चौथ्या विश्व मराठी संमेलनाचे शानदार उद्घाटन

मराठी भाषा जागतिक पातळीवर नेण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणार

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

कविवर्य कुसुमाग्रज नगरीत मराठीचा देखणा सोहळा

कविवर्य कुसुमाग्रजनगरी (नाशिक)दि. २७ : कृत्रिम बुद्धिमत्ता एआयमुळे अनेक आव्हानांसोबत निर्माण झालेल्या संधींचा वापर करून जागतिक पातळीवर मराठी साहित्य नेण्याचे कार्य मराठी भाषा विभागाच्या माध्यमातून करण्यात येईल. नव्या पिढीत मराठीतील संवाद कौशल्य विकसीत करण्यासाठी भाषेची प्रयोगशाळा (लँग्वेज लॅब) कार्यान्वित करण्यात येईलअसे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

केटीएचएम महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित चौथ्या विश्व मराठी संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारअन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळजलसंपदा मंत्री गिरीश महाजनसंमेलनाचे निमंत्रक तथा मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंतमहापौर हिमगौरी आहेर- आडकेखासदार डॉ. शोभा बच्छावखासदार राजाभाऊ वाजेविभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडामभाषा विभागाचे सचिव डॉ.किरण कुलकर्णी आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेविश्व मराठी संमेलनासाठी अमेरिकाजर्मनीफ्रान्सनॉर्वेसह जगातील विविध देशातून मराठी बांधव नाशिक नगरीमध्ये दाखल झाले आहेत. जगभरातील मराठी माणूस  मराठी भाषा आणि महाराष्ट्राचे तेथील सदिच्छा दूत (ब्रॅण्ड ॲम्बेसेडर) आहेत. यांच्या माध्यमातून महाराष्ट्राची संस्कृती आणि वैभव जगभरात पोहोचतेअसू सांगून मुख्यमंत्री फडणवीस यांनी परदेशस्थ मराठी बांधवांना पुढील वर्षी नाशिक त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याला येण्याचे निमंत्रण दिले.

मराठी भाषेत सर्वाधिक साहित्य तयार होते. देशात सर्वात समृद्ध रंगभूमी मराठी मुलुखात आहे. इथे नवनवीन नाट्याची निर्मिंती होते आणि त्याला प्रतिसाद देणारे रसिकही आहेत. साहित्यनाट्य आणि लोकगीतांची आवड या भूमीला आहे आणि त्याची जपणूक मराठीने केली आहे. मराठी भाषेमुळे तयार झालेल्या लोकपरंपरांमुळे आपले जीवन समृद्ध झाले आहे. कितीही आव्हाने निर्माण झालीतरी अभिजात साहित्याला आव्हान मिळू शकत नाहीअसे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. भाषेचा अभिमान बाळगण्यासोबत ती ज्ञानभाषा आणि व्यवहार भाषा होणे गरजेचे आहे. त्यासाठी मराठी विभाग चांगले प्रयत्न करीत आहेअसेही ते म्हणाले. 

आपल्या इतिहासात स्वभाषेचा अभिमान आणि भाषाशुद्धी सर्वप्रथम शिकवली. परकीय आक्रमकांनी आपल्यावर राज्य केल्याने आपल्या राज्य कारभारात फारसीअरबी शब्द होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रमाण भाषेचा कोष तयार केला. आधुनिक महाराष्ट्रात भाषा शुद्धीकरणाचे कार्य स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केले. त्यांनी मराठी भाषेला अनेक नवे शब्द दिले. मराठी भाषेच्या सेवेची ही महान परंपरा नाशिक जिल्ह्याने जोपासली आहेअसे  श्री.फडणवीस म्हणाले. तसेच  कांदा प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी लवकरच बैठकीचे आयोजन करूअशी ग्वाही त्यांनी शेतकऱ्यांना ‍दिली.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi