Saturday, 7 March 2026

पर्यटन उद्योगाला महाराष्ट्रात मोठा वाव आहे

 पर्यटन उद्योगाला महाराष्ट्रात मोठा वाव आहे. त्यादृष्टीने छोट्या छोट्या पर्यटन स्थळांचा विकास करून ग्रामीण भागातही अर्थव्यवस्थेला चालना देणेरोजगार वाढविणे शक्य होणार आहे. उद्योग क्षेत्राचे उत्पादन दीड हजार अब्ज डॉलर्सपर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट्य ठेवतांना त्यासाठी विविध धोरणे जाहीर करून सेवा क्षेत्र आणि तंत्रज्ञानाला देखील प्रोत्साहन देण्याचे नियोजन या अर्थसंकल्पात केले आहेअसे सांगून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले कीअटल सेतूच्या परिसरात तिसरी मुंबई उभारून एकूणच मुंबई महानगराला आणखी शक्तीशाली करण्याचा या अर्थसंकल्पात निर्धार व्यक्त केला आहे. देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रीलियन डॉलर्स करण्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे उद्दिष्ट्य आहे आणि यात महाराष्ट्राचे योगदान खूप मोठे असणार आहेयाचे सुतोवाच करणारा हा अर्थसंकल्प आहे, असेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

००००

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दीनिमित्त जनकल्याणाचे उपक्रमही

 हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दीनिमित्त जनकल्याणाचे उपक्रमही राज्यात हाती घेण्यात येणार आहेतत्याविषयी सविस्तर माहिती आणि नियोजन लवकरच जाहीर करण्यात येत आहे असे सांगून उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले कीराज्यातील नागरिकांना शासकीय योजनासेवा सहजपणेसुलभ आणि उत्तरदायी पद्धतीने देण्यासाठी तशी यंत्रणा उभारण्यात येत आहे. त्याचप्रमाणे शासनातली ७५ हजार रिक्त पदेही भरण्यात येणार असल्याने युवकांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराची संधीही उपलब्ध होणार आहे.

लाडकी बहीण योजना आम्ही अधिक चांगली राबवून महिलांचे सक्षमीकरण करणार

 लाडकी बहीण योजनेसंदर्भात सुद्धा विरोधकांनी अपप्रचार चालवला होता. मात्र अर्थसंकल्पात आम्ही या योजनेसाठी तरतूद करण्याचे स्पष्ट केल्याने ही योजना आम्ही अधिक चांगली राबवून महिलांचे सक्षमीकरण करणार आहोत असे सांगून उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले कीमहाराष्ट्रात ग्रामीण आणि शहरी भागांना व्यवस्थित जोडण्यासाठी अत्यंत सुयोग्य पद्धतीचे नियोजन या अर्थसंकल्पात करण्यात आले आहे.  यामध्ये रस्तेमेट्रोजलमार्गतसेच राज्यातील विविध विमानतळ यांना जोडणाऱ्या रस्त्यांचे मोठे जाळे निर्माण करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर पर्यटनासाठी पोषक असे राज्य बनविण्याचे उद्दिष्ट्य शासनाने समोर ठेवले आहे. मुंबई महानगरातील २० लाख झोपडीधारकांच्या घरांचा पुनर्विकास करण्यासाठी भाडे तत्वावरील घरांसह १० लाख परवडणारी घरे विकसित करण्यासाठी आराखडा तयार करण्यात येणार आहे असेही ते म्हणाले.  एकीकडे आर्थिक शिस्त लावतांना दुसरीकडे एआय आधारित शेतीचा मजबूत पाया रचून कृषी क्षेत्राला नवे दिवस दाखवणारा हा अर्थसंकल्प आहेत्याचप्रमाणे एकूणच विविध विभागांच्या योजनांच्या अंमलबजावणीत तंत्रज्ञानाचा उपयोग केल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचं दैनंदिन जीवन सहज सुलभ आणि सुखी करण्याकडे ठोस पावलं उचलणारा हा अर्थसंकल्प आहे असेही ते म्हणाले.

शेतकऱ्यांना कर्जमाफी हा मास्टरस्ट्रोक

 शेतकऱ्यांना कर्जमाफी हा मास्टरस्ट्रोक

-         उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

·         सामाजिक भान बाळगून अर्थव्यवस्थेला चालना देणारा अर्थसंकल्प

 

 मुंबई दि. ६:  ग्रामीण आणि शहरी महाराष्ट्राचा समतोल विकास साधणारा व्हिजनरी असा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला आहे. एकीकडे शेतकऱ्यांना कर्जमाफीलाडक्या बहिणीसाठी तरतूद करून सामाजिक भान ठेवले आहे तर दुसरीकडे राज्यातील कानाकोपऱ्यातील गावे आणि शहरे एकमेकांशी व्यवस्थित जोडून अर्थव्यवस्थेला चालना देण्याचे काम केले आहे अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. राज्याचा अर्थसंकल्प विधिमंडळात मांडण्यात आल्यानंतर उपमुख्यमंत्री यांनी शिंदे याचे स्वागत केले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सुद्धा अभिनंदन केले.

प्रगतीशीलशाश्वतसर्वसमावेशकसुशासन अशा चार स्तंभांवर विकसित महाराष्ट्र २०४७ ची उभारणी होणार असून एक निश्चित अशी विकासाची दिशा आता मिळाली आहे असेही उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर करून पात्र शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंत कर्जमाफी देण्याचा निर्णय म्हणजे राज्य शासनाचा मास्टरस्ट्रोक आहे असे सांगून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात कीबळीराजाच्या पाठीशी राज्य शासन कायम ठामपणे उभे आहे हे यातून सिद्ध होते. ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत पीक कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा याचा लाभ होणार आहे तसेच नियमित कर्ज परतफेड केली असल्यास ५० हजारापर्यंत प्रोत्साहनपर लाभ देखील शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. त्यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होईल याची खात्री वाटते.

सर्वसमावेशक विकासाचा स्पष्ट रोडमॅप मांडणारा असून राज्याच्या प्रगतीसाठी विविध क्षेत्रांना चालना देणारा

 सर्वसमावेशक विकासाचा रोडमॅप असलेला राज्याचा अर्थसंकल्प

-          मंत्री अतुल सावे

मुंबईदि.६ : राज्याचा यंदाचा अर्थसंकल्प हा सर्वसमावेशक विकासाचा स्पष्ट रोडमॅप मांडणारा असून राज्याच्या प्रगतीसाठी विविध क्षेत्रांना चालना देणारा असल्याची प्रतिक्रिया मंत्री अतुल सावे यांनी व्यक्त केले.

मंत्री अतुल सावे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेला अर्थसंकल्प प्रगतीशीलशाश्वतसर्वसमावेशक आणि सुशासित या चार स्तंभांवर आधारित असून शेतीउद्योगसामाजिक न्यायशिक्षणआरोग्यपायाभूत सुविधातंत्रज्ञान आणि पर्यावरणपूरक विकासाला प्राधान्य देण्यात आले आहे. अर्थसंकल्पातून हरित ऊर्जेला चालना देणारे निर्णयही घेण्यात आले आहेत. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० आणि मागेल त्याला सौर कृषीपंप योजना यांमुळे शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा उपलब्ध होण्याबरोबरच स्वच्छ आणि स्वस्त ऊर्जेचा आधार मिळत आहे. त्यामुळे महाराष्ट्र हरित ऊर्जेच्या दिशेने मोठी पावले टाकत असल्याचे त्यांनी सांगितले.

विकसित महाराष्ट्र 2047” या ध्येयाकडे नेणारा दूरदृष्टीचा आणि सर्वसमावेशक अर्थसंकल्प

 विकसित महाराष्ट्र 2047 या ध्येयाकडे नेणारा

 दूरदृष्टीचा आणि सर्वसमावेशक अर्थसंकल्प

- मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील

 

मुंबईदि. 6  : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेला 2026-27 चा अर्थसंकल्प हा विकसित महाराष्ट्र 2047 या ध्येयाकडे नेणारा दूरदृष्टीचा आणि सर्वसमावेशक अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिली.

 

मंत्री मकरंद जाधव - पाटील म्हणाले कीया अर्थसंकल्पातून शेतीउद्योगसेवा क्षेत्र आणि पर्यटन या महत्त्वाच्या क्षेत्रांना चालना देत राज्याच्या सर्वांगीण विकासाचा स्पष्ट रोडमॅप मांडण्यात आला आहे.

 

मंत्री मकरंद जाधव - पाटील म्हणाले कीस्वर्गीय अजित पवार यांच्या ध्येय धोरणांना पुढे नेणारा हा संकल्प आहे. या अर्थसंकल्पामध्ये शेतकरीग्रामीण भागपायाभूत सुविधाउद्योग आणि रोजगार निर्मिती यांना प्राधान्य देणाऱ्या विविध योजनांमुळे राज्याच्या आर्थिक विकासाला नवी गती मिळणार आहे. विशेषतः नैसर्गिक शेती अभियानग्रामीण रस्ते विकासउद्योग गुंतवणूक धोरण आणि पर्यटन विकास यांसारख्या निर्णयांमुळे राज्यातील सर्व घटकांचा विकास साधला जाणार आहे.

 

तसेच मदत व पुनर्वसन आणि ग्रामीण भागाच्या सक्षमीकरणासाठी शासनाने घेतलेल्या निर्णयांमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईलअसा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हा अर्थसंकल्प प्रगतिशीलशाश्वतसर्वसमावेशक आणि सुशासन या चार स्तंभांवर आधारित असून राज्याला विकासाच्या नव्या उंचीवर नेणारा ठरेल असेही मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी नमूद केले.

पायाभूत सुविधा, रोजगार, उद्योग, शेतीविकास, ग्रामविकास, उद्योग, ऊर्जा, विमानतळे, रस्ते, मेट्रो, रेल्वे असा वाहतूक विकास

 दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संसदीय कारकिर्दीची दखल म्हणून 'गतिमान नागरी सेवा पुरस्कारदेण्याची घोषणा आपल्या कर्तव्यदक्ष नेत्याला वाहिलेली अनोखी आदरांजली आहे.

पायाभूत सुविधारोजगारउद्योगशेतीविकासग्रामविकासउद्योगऊर्जाविमानतळेरस्तेमेट्रोरेल्वे असा वाहतूक विकासआधुनिक तंत्रज्ञानाचा प्रशासनात वापररोजगाराभिमुख विकसित पर्यटनपरवडणारी घरेतिसरी मुंबईरामटेकजवळ तिसरी चित्रपट नगरीनवीन नागपूरविद्यार्थ्यांसाठी आर्थिक सवलतविविध महामंडळासाठी योजनास्टार्टअपला प्रोत्साहनसर्वसामान्यांना आरोग्यसांस्कृतिक वारसाक्रीडा गुणवत्ता विकास केंद्रेराज्याचा प्रशासकीय दर्जा उन्नतपारदर्शकगतिमान व उत्तरदायी करण्यासाठी प्रयत्न करणारशासनात ७५ हजार नवीन पदभरतीनागरिकांच्या मालमत्तांच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी धोरणस्मार्ट पोलिसिंगमहसूल प्रणालीचे आधुनिकीकरणमहाराष्ट्र सार्वजनिक खासगी भागीदारी धोरणपर्यावरण संरक्षणमुद्रांक अधिनियमातील सुधारणा म्हणजे वेगवान सरकारची धडाकेबाज कामगिरी आहे.

महाराष्ट्रातील नागरिकांच्या जीवनात हा अर्थसंकल्प नक्कीच सकारात्मक बदल घडवेल असेही महसूलमंत्री बावनकुळे यांनी म्हटले आहे.

Featured post

Lakshvedhi