Thursday, 5 March 2026

महाराष्ट्रात आता नवी औद्योगिक क्रांती.. महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत ग्वाही

 महाराष्ट्रात आता नवी औद्योगिक क्रांती..

महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत ग्वाही

 

मुंबईदि.२६: राज्यात गेल्या सुमारे चार वर्षांपासून स्थगितीचे राजकारण संपून प्रगतीची घौडदौड सुरू झाली आहे. महाराष्ट्रात एक नवी औद्योगिक क्रांती होत असून महाराष्ट्राच्या विकासाची गती आता कुणीही थांबवू शकणार नाही. औद्योगिक गुंतवणुकीत महाराष्ट्र आजही देशात क्रमांक एकचे राज्य आहे. राज्यात सुरू असलेल्या विकासयात्रेचे प्रतिबिंब राज्यपालांच्या अभिभाषणात उमटले असून प्रगतसमृद्ध आणि सुरक्षित महाराष्ट्र घडवणे हेच राज्य शासनाचे प्रमुख ध्येय आहे.  विकास आणि लोककल्याणाची महाराष्ट्राची ही विकासयात्रा कधीही थांबणार नाहीअशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेत दिली.

 

राज्यपालांच्या अभिभाषणावर विधान परिषदेत झालेल्या चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. यावेळी त्यांनी भाषणाची सुरुवात दिवंगत नेते अजित पवार यांच्या आठवणीने केली. अजितदादांच्या निधनामुळे या अधिवेशनावर दुःखाचे सावट असून त्यांनी नेहमी विकासाचे राजकारण केल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.

Wednesday, 4 March 2026

महाराष्ट्रात आता नवी औद्योगिक क्रांती.. महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत ग्वाही

 अर्थसंकल्पीय अधिवेशन 2026

विधान परिषद कामकाज

                                                              दि26 फेब्रुवारी 2026

वृत्त क्र – 26

विधानपरिषद कामकाज :

महाराष्ट्रात आता नवी औद्योगिक क्रांती..

महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत ग्वाही

 

मुंबईदि.२६: राज्यात गेल्या सुमारे चार वर्षांपासून स्थगितीचे राजकारण संपून प्रगतीची घौडदौड सुरू झाली आहे. महाराष्ट्रात एक नवी औद्योगिक क्रांती होत असून महाराष्ट्राच्या विकासाची गती आता कुणीही थांबवू शकणार नाही. औद्योगिक गुंतवणुकीत महाराष्ट्र आजही देशात क्रमांक एकचे राज्य आहे. राज्यात सुरू असलेल्या विकासयात्रेचे प्रतिबिंब राज्यपालांच्या अभिभाषणात उमटले असून प्रगतसमृद्ध आणि सुरक्षित महाराष्ट्र घडवणे हेच राज्य शासनाचे प्रमुख ध्येय आहे.  विकास आणि लोककल्याणाची महाराष्ट्राची ही विकासयात्रा कधीही थांबणार नाहीअशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेत दिली.

 

राज्यपालांच्या अभिभाषणावर विधान परिषदेत झालेल्या चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. यावेळी त्यांनी भाषणाची सुरुवात दिवंगत नेते अजित पवार यांच्या आठवणीने केली. अजितदादांच्या निधनामुळे या अधिवेशनावर दुःखाचे सावट असून त्यांनी नेहमी विकासाचे राजकारण केल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.

 


डॉ. पंजाबराव देशमुख देशांतर्गत शिष्यवृत्ती योजनेतील सर्व लाभार्थ्यांना लाभ देणार

 डॉ. पंजाबराव देशमुख देशांतर्गत शिष्यवृत्ती योजनेतील सर्व लाभार्थ्यांना लाभ देणार

-राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल

 

मुंबई,दि. २६: सारथी संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या डॉ. पंजाबराव देशमुख देशांतर्गत शिष्यवृत्ती योजनेतील सर्व लाभार्थ्यांना लाभ देणार असल्याचे राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी विधानसभेत सांगितले.

            मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण पूर्ण करता यावे यासाठी  देण्यात येणारी डॉ. पंजाबराव देशमुख देशांतर्गत शिष्यवृत्ती योजनेतील सन २०२५-२६ साठी शिष्यवृत्तीबाबत सदस्‍य जयंत पाटील यांनी प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना ॲड.आशिष जयस्वाल बोलत होते.

            राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल म्हणाले कीसारथी संस्थेद्वारे डॉ. पंजाबराव देशमुख देशांतर्गत शिष्यवृत्ती योजना सन २०२१-२२ मध्ये सुरू करण्यात आली असूनही योजना सन २०२१-२२ ते २०२४-२५ या कालावधीत यशस्वीपणे राबविण्यात आली असल्याने मराठा समाजातील असंख्य विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक आधार मिळाला आहे. योजनेंतर्गत २०२५-२६ मध्ये ३८८ लाभार्थ्यांना ७.२४ कोटी इतकी शिष्यवृत्तीची रक्कम वितरित करण्यात आली असून ३७९ लाभार्थ्यांना ५.९६ कोटी इतकी शिष्यवृत्ती रक्कम वितरीत करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. संस्थेला वेगवेगळ्या योजना राबविण्यासाठी ३०० कोटींचा अर्थसंकल्पीय निधी मंजूर करण्यात आला असून संस्थेच्या मागणीनुसार अतिरिक्त खर्च भागविण्यासाठी पूरवणी मागणीद्वारे आणखी १०० कोटी रूपये मंजूर करण्यात आले आहेत. या निधीचे नियोजन करुन २०२५-२६ मध्येही सारथी संस्थेमार्फत लक्ष्यित गटातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणास प्रोत्साहन मिळावे यासाठी योजना राबविण्यात येत आहेत. मराठा समाजातील मुलांच्या हितासाठी शासन काम करत आहे. या योजनेसाठी मार्च २०२६ पूर्वी जाहिरात काढून लाभार्थ्यांना लाभ दिला जाईलअसे त्यांनी सांगितले.

या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य राजेश पवारअर्जुन खोतकरअभिजीत पाटील यांनी सहभाग घेतला.

 

विक्रोळीतील कन्नमवार नगर येथील क्रांतीवीर महात्मा ज्योतीबा फुले रूग्णालय १९९५

 राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या, विक्रोळीतील कन्नमवार नगर येथील क्रांतीवीर महात्मा ज्योतीबा फुले रूग्णालय १९९५ बांधले होते. त्यावेळी ते १३० खाटांचे होते. हे रूग्णालय जुने झाले असल्यामुळे लोकप्रतिनिधींची मागणी लक्षात घेऊन ही इमारत निष्काषित करून पुनर्बांधणी करण्यात येत आहे. या हॉस्पिटलची ५०० खाटापर्यंत क्षमता वाढविण्यात येत आहे. म्हाडाला प्रिमीयमचे १३ कोटी रूपये दिले आहेत तसेच जागेसाठी देखील २४ कोटी रुपये दिले आहेत. म्हाडाने जागेचा ताबा दिला असून वसतीगृहाचे काम सुरू आहे. ही इमारत २१ मजली असून यामध्ये वसतीगृह, प्रशासकीय कामकाज होणार आहे. सद्यस्थितीत १२ टक्के काम पूर्ण झाले असून सन २०२८ पर्यंत या हॉस्पिटलचे काम पूर्ण होईल असेही राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या.

या प्रश्नाच्या चर्चेत विधानसभा सदस्य अबू आझमी यांनी सहभाग घेतला.

कन्नमवार नगर येथील क्रांतीवीर महात्मा ज्योतीबा फुले रूग्णालयाचे काम २०२८ पर्यंत पूर्ण होणार

 कन्नमवार नगर येथील क्रांतीवीर महात्मा ज्योतीबा फुले

रूग्णालयाचे काम २०२८ पर्यंत पूर्ण होणार

-राज्यमंत्री माधुरी मिसाळ

 

मुंबईदि. २६ : विक्रोळीच्या कन्नमवार नगर येथील क्रांतीवीर महात्मा ज्योतीबा फुले रूग्णालयाचे खासगीकरण झालेले नाही. या हॉस्पीटलचे काम २०२८ पर्यंत पूर्ण होईल आणि पूर्वीप्रमाणेच इथे रूग्णांना आरोग्य सेवा मिळतील असे राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत सांगितले.

            कन्नमवार नगर येथील क्रांतीवीर महात्मा ज्योतीबा फुले रूग्णालयासंदर्भात सदस्य सुनिल राऊत यांनी विधानसभेत प्रश्न विचारला होता. या प्रश्नास उत्तर देताना राज्यमंत्री माधुरी मिसाळ बोलत होत्या.

महा-रेराअंतर्गत थकबाकी वसुलीसाठी कडक कारवाई

 महा-रेराअंतर्गत थकबाकी वसुलीसाठी कडक कारवाई

-मंत्री शंभूराज देसाई

 

मुंबईदि. २६ : महा-रेराअंतर्गत थकीत रकमेच्या वसुलीसाठी राज्य शासनाने कडक भूमिका घेतली असून वसुली ३४ टक्क्यांपेक्षा अधिक करणार असल्याची माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत दिली.

महाराष्ट्र स्थावर संपदा प्राधिकरणाने घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईपोटी जारी केलेल्या आदेशांची अंमलबजावणी होत नसल्याबाबत सदस्य अतुल भातखळकर यांनी प्रश्न विचारला होता.

            मंत्री शंभूराज देसाई म्हणाले कीघर खरेदीदारांच्या हितासाठी महा-रेराची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश केंद्र सरकारकडून देण्यात आले आहेत. महा-रेरा कायदा हा ग्राहकांच्या संरक्षणासाठी केंद्र सरकारने आणला असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांसोबत आढावा बैठक घेऊन वसुलीबाबत कठोर धोरण राबविण्याच्या सूचना दिल्या होत्या. राज्य शासनाने वसुली प्रक्रिया अधिक प्रभावी करण्यासाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना विशेष निर्देश दिले आहेत. बिल्डरांच्या मालमत्तेचा शोध घेण्यासाठी भूमी अभिलेखमुद्रांक विभागमालमत्ता कर विभागकंपनी नोंदणी विभागआरटीओ तसेच आवश्यकतेनुसार आयकर विभागाकडून अतिरिक्त माहिती घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. संबंधित विकासकांची इतर जिल्ह्यांतील मालमत्ता शोधून आरआरसी’ प्रक्रियेद्वारे वसुली केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्य सचिवांनी विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन वेळोवेळी आढावा घेतला आहे. कोल्हापूरमुंबई आणि पालघरसह ज्या जिल्ह्यांमध्ये वसुलीचे प्रमाण कमी आहे तेथे विशेष लक्ष दिले जाणार आहे.           

उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांनीही सर्व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन नियमित पुनरावलोकन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. वसुलीचे प्रमाण ३४ टक्क्यांवरून वाढविण्यासाठी पुढील काळात कठोर कारवाई केली जाईलअसे मंत्री देसाई यांनी स्पष्ट केले.

00000

नदीकिनारी असलेल्या गोठ्यांवर आत्तापर्यंत दंडात्मक कारवाई करण्यात

 राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले की, नदीकिनारी असलेल्या गोठ्यांवर आत्तापर्यंत दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. तथापि, अनेक गोठ्यांची नोंदणी अद्याप न झाल्याने कारवाईत विलंब होत आहे. दहिसर नदी प्रकल्पात १३०, पोयसरमध्ये २,५५४ आणि ओशिवरा नदी प्रकल्पात ७०० घरे व दुकाने बाधित असून, पात्र बांधकामांच्या पर्यायी सदनिकांअभावी अतिक्रमण हटविण्याची प्रक्रिया प्रलंबित असल्याचेही त्यांनी सांगितले.

या चर्चेत विधानसभा सदस्य मनिषा चौधरीयोगेश सागरदिलीप लांडेअस्लम शेख यांनी सहभाग घेतला.

Featured post

Lakshvedhi