सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Sunday, 15 August 2021
उत्कृष्ट सेवेकरिता महाराष्ट्राला चार ‘राष्ट्रपती पोलीस पदक’
राज्याला एकूण 74 पोलीस पदक
नवी दिल्ली, दि. 14 : पोलीस पदकांची आज घोषणा झाली, महाराष्ट्रातील एकूण ७४ पोलिसांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यातील ४ पोलीस अधिका-यांना उत्कृष्ट सेवेकरिता ‘राष्ट्रपती पोलीस पदक’, २५ पोलीस शौर्य पदक तसेच प्रशंसनीय सेवेकरिता ४५ ‘पोलीस पदक’ जाहीर झाली आहेत.
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून केंद्रीय गृह मंत्रालय दरवर्षी देशातील पोलिसांच्या शौर्यासाठी पोलीस पदक जाहीर करते. यावर्षी शौर्य पदक श्रेणीमध्ये ६३० व सेवा पदक श्रेणींमध्ये ७५० असे एकूण १ हजार ३८० पोलीस पदक जाहीर झाली आहेत. शौर्य पदक श्रेणीत २ ‘राष्ट्रपती पोलीस पदक’(पीपीएमजी), तर ६२८ पोलिसांना ‘पोलीस शौर्य पदक<span lang="EN-US" style="font-size: 12.0pt; font-family: DVOT-Surekh; mso-fareast-font-family: 'Times New Roman'; color: #222222; mso-ansi-lang
पुणे जिल्ह्यातील वक्फ मंडळाकडे नोंदणीकृत असलेल्या संस्थेच्या 7 कोटी 76 लाख रुपयांच्या रकमेचा अपहार केल्याप्रकरणी दोघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल
महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या पुढाकाराने कारवाई
--
वक्फ नोंदणीकृत संस्थांमधील गैरव्यवहार रोखण्यासाठी कठोर पावले उचलणार- मंत्री नवाब मलिक
मुंबई, दि. 14 : महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाकडे नोंदणीकृत असलेल्या पुणे जिल्ह्यातील एका ट्रस्टला शासनाकडून जमीन अधिग्रहणाच्या भरपाईपोटी मिळणाऱ्या रकमेचा परस्पर अपहार केल्याप्रकरणी तसेच यासाठी बनावट कागदपत्रे सादर करून शासनाची तसेच वक्फ मंडळाची फसवणूक केल्याप्रकरणी पुण्यातील दोघा जणांविरुद्ध बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. वक्फ मंडळाचे पुणे प्रादेशिक वक्फ अधिकारी यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी इम्तियाज महम्मद हुसेन शेख (रा. रामनगर, येरवडा, पुणे) आणि चांद रमजान मुलाणी (राहणार सदर) यांच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांनी आपसात संगनमत करून स्वतःला ताबूत इनाम इंडोमेंट ट्रस्टचे (मौजे माण, ता. मुळशी, जि. पुणे)अध्यक्ष आणि सचिव असल्याचे भासवून या रकमेचा अपहार केला आहे.
ताबूत इनाम इंडोमेंट ट्रस्ट ही संस्था महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाकडे नोंदणीकृत आहे. या मंडळाकडील 5 हेक्टर 51 आर क्षेत्राची जमीन एमआयडीसी अधिनियमान्वये राजीव गांधी तंत्रज्ञान टप्पा क्रमांक चारसाठी शासनामार्फत अधिग्रहित करण्यात आली होती. यासाठी 9 कोटी 64 लाख रुपये इतकी निवाडा रक्कम मंजूर झाली होती. परंतु बरेच दिवस ही रक्कम न मिळाल्याने ट्रस्टने वक्फ मंडळाला तसे कळविले. पुणे प्रादेशिक वक्फ कार्यालयाकडून याची दखल घेऊन भूसंपादन उपजिल्हाधिकारी यांचेकडे चौकशी करण्यात आली, त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला.
इम्तियाज महम्मद हुसेन शेख आणि चांद रमजान मुलाणी या दोघांनी स्वतःला संबंधित ट्रस्टचे अध्यक्ष व सचिव असल्याचे भासवून तसेच वक्फ बोर्डाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांचे बनावट नाहरकत पत्र पुणे भूसंपादन उपजिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केले. त्यानंतर या दोघांनी जमीन अधिग्रहणाच्या भरपाईपोटी मिळालेल्या 7 कोटी 76 लाख 98 हजार रुपये रकमेचा डिमांड ड्राफ्ट ट्रस्टच्या बँक खात्यावर जमा न करता तो वैयक्तिक बँक खात्यावर जमा केला आणि त्या माध्यमातून रकमेचा अपहार केला. तथापि, पुणे प्रादेशिक वक्फ कार्यालयाकडून उपजिल्हाधिकारी, भूसंपादन क्र. 13, पुणे यांच्याकडे याबाबत करण्यात आलेल्या तक्रारीची दखल न घेता उपजिल्हाधिकाऱ्यांकडून वक्फ कार्यालयाचा अर्ज फेटाळण्यात आल्याचेही पोलीस तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
ही बाब लक्षात आल्यानंतर पुणे प्रादेशिक वक्फ अधिकारी खुसरो खान यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्याची दखल घेत रकमेचा अपहार करणाऱ्या शेख आणि मुलाणी या दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वक्फ नोंदणीकृत संस्थांमधील गैरव्यवहार रोखण्यासाठी कठोर पाऊले उचलणार
- मंत्री नवाब मलिक
यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना अल्पसंख्याक विकास आणि औकाफ विभागाचे मंत्री नवाब मलिक म्हणाले की, वक्फ मंडळाकडे नोंदणीकृत असलेल्या ट्रस्ट आणि संस्थांकडून मुस्लिम समाजहिताचे कार्य केले जाते. पण काही अपप्रवृत्तींकडून याचा गैरफायदा घेतला जातो. अशा अपप्रवृत्तींना रोखण्यासाठी तसेच वक्फ मंडळाकडे नोंदणीकृत असलेल्या संस्थांमधील गैरव्यवहार रोखण्यासाठी शासनाकडून कडक पावले उचलली जातील. अशा अपप्रवृत्तींविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल. अशा गैरव्यवहारांचा शोध घेऊन त्याबाबत कठोर कारवाई करण्याच्या सूचना विभागाच्या तसेच वक्फ मंडळाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
0000
संयम आणि शिस्तीचे पालन करीत देश, राज्याला
कोरोनामुक्त करण्याचा निश्चय करुया
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन
मुख्यमंत्र्याच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण
· कोरोनायोद्ध्यांची भेट घेत केली आस्थेवाईकपणे चौकशी
· अनेकांचे बलीदान आणि समर्पणातून मिळालेल्या स्वातंत्र्याची जपणूक करुया, स्वातंत्र्याचे मूल्य जपुया
मुंबई, दि. 15 : कोरोनाला पराभूत करत आपल्याला कोरोनामुक्त व्हायचे आहे. आपण सर्वजण मिळून नक्कीच या संकटावर मात करू. मी माझा देश, राज्य कोरोनामुक्त करणारच आणि पुढील स्वातंत्र्यदिन कोरोनामुक्त वातावरणातच साजरा करणार असा सर्वजण मिळून निश्चय करुया, यासाठी संयम आणि शिस्तीचे पालन करुया, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे केले. स्वातंत्र्याच्या 74 व्या वर्धापनदिनानिमित्त मंत्रालय प्रांगणात आयोजित राष्ट्रध्वजारोहण समारंभात ते बोलत होते. भारतीय स्वातंत्र्य दिन आणि स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त मुख्यमंत्र्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या सर्व शहीदांना त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कोरोनाविषयक नियमांचे पालन करुन मर्यादीत उपस्थितीत कार्यक्रम साजरा करण्यात आला. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश दिपांकर दत्ता, राज्याचे गृह मंत्री दिलीप वळसे पाटील, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे, राजशिष्टाचार विभागाच्या प्रधान सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनिषा म्हैसकर, राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे, मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
ध्वजारोहणानंतर मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रमास उपस्थित असलेल्या कोरोना योद्ध्यांची भेट घेतली, त्यांची आस्थेवाईकपणे विचारपूस करून ते करत असलेल्या कामकाजाची माहिती घेतली. यानंतर मुख्यमंत्र्यांसह उपस्थित मान्यवरांनी मंत्रालयातील छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
राज्यातील राष्ट्रपती पदके मिळवलेल्या पोलिसांचा तसेच इतर पुरस्कार विजेत्यांचा नामोल्लेख करुन मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात त्यांचे अभिनंदन व कार्याचा गौरव केला.
मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी परकीयांचे आक्रमण परतवून लावत खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याची बीजे रुजवली. परकीयांविरुद्ध आपण लढून जिंकू शकतो, आक्रमण परतवून लावू शकतो हे छत्रपती शिवाजी महाराजांनी फक्त दाखवूनच नाही दिले तर तसा विश्वास आणि प्रेरणाही आपल्याला दिली. राजर्षी शाहू महाराज, महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील कुप्रथा, विषमता यांच्या बेड्या तोडल्या. विषमतेविरुद्ध लढा उभारून स्वातंत्र्य, समता म्हणजे काय हे सांगितले, त्यांनी स्वातंत्र्याचे महत्व आपल्याला पटवून दिले.
स्वतंत्र कला विद्यापीठासाठी बॉम्बे आर्ट सोसायटीने पुढाकार घ्यावा
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कलर्स ऑफ इंडिपेंडन्स, 75 इयर्स ऑफ आर्ट
या ऑनलाईन प्रदर्शनाचे उद्घाटन
मुंबई दिनांक 14: राज्यात कलेसाठी स्वतंत्र विद्यापीठ असावे ही आपली सुरुवातीपासूनची इच्छा असून हे विद्यापीठ स्थापन करण्यासाठी दि बॉम्बे आर्ट सोसायटीने पुढाकार घ्यावा, त्यास शासन पूर्ण सहकार्य करेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे केले.
दि बॉम्बे आर्ट सोसायटी आयोजित कलर्स ऑफ इंडिपेंडन्स: 75 इयर्स ऑफ आर्ट या ऑनलाईन कला प्रदर्शनाचे उद्घाटन आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी भारतीय स्वातंत्र्य अशाच सुंदर रंगांने बहरत जावे अशी अपेक्षाही व्यक्त केली. स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी होत असतांना दि बॉम्बे आर्ट सोसायटीचे नाव मुंबई आर्ट सोसायटी असे केले जावे, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.
कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, दि बॉम्बे आर्ट सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, उपाध्यक्ष रामदास फुटाणे, सचिव चंद्रजित यादव यांच्यासह विविध देशातील, भारताच्या विविध 29 राज्यातील आणि महाराष्ट्रातील कलाकार व इतर मान्यवर उपस्थित होते. या प्रदर्शनात चित्र, शिल्प, मुद्राचित्र, फोटोग्राफी, व्हिडिओ इन्स्टॉलेशन यासारख्या 5 कलाप्रकारातील 1645 कलाकृती सादर करण्यात आल्या आहेत. हे प्रदर्शन 15 ऑगस्ट ते 30 डिसेंबर 2021 या काळात ऑनलाईन पद्धतीने बॉम्बे आर्ट सोसायटीच्या संकेतस्थळावर पहाता येईल.
सोसायटीने ज्या दिग्गज कलाकारांच्या नावे पारितोषिके सुरु केली त्यातील काही कलावंतांना कलानगरमध्ये मला पहायला मिळाले ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, कलाकार आपल्या कलेतून स्वत: आनंद घेतोच परंतू प्रेक्षकाकडून त्याला जेंव्हा दाद मिळते तेंव्हा त्याचे समाधान त्याला अधिक मिळते. मागील दीड वर्षांपासून कोरोनाचा सामना करतांना कलाकारांची काही प्रमाणात कोंडी झाली असली तरी बॉम्बे आर्ट सोसायटीने देश विदेशातील कलाकारांसाठी ऑनलाईन व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याचा आपल्याला आनंद आहे. आज बॉम्बे आर्ट सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी, रामदास फुटाणे यांनी आर्ट कौन्सीलची स्थापना असेल, अनुदान देणे असेल किंवा मालमत्ता करात सवलत देण्याचा विषय असेल त्या संदर्भात ज्या अपेक्षा व्यक्त केल्या त्यासाठी येत्या आठ दिवसात बैठक आयोजित करून निर्णय घेऊ. यासंदर्भात जे जे करणे शक्य आहे ते करण्याचा प्रयत्न करू असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
कलाकाराचे स्वत:चे एक विश्व असते, त्याला कधी लॉकडाऊन लागू शकत नाही असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, आपली कला कशाप्रकारे सादर करायची याचे त्याला स्वातंत्र्य असते, कारण क्रियेटिव्हीटीला कुठलीच बंधने नसतात आणि नसावीत. कलाकारांना त्यांची कलाकृती लोकांसमोर आणायला सहज सोपा मार्ग असावा असेही ते म्हणाले.
कार्यक्रमात सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या या ऑनलाईन प्रदर्शनाचे स्वरूप, सहभागी कलाकार आणि त्याची वैशिष्ट्ये, सोसायटीतर्फे दिली जाणारी पारितोषिके याची माहिती दिली. उपाध्यक्ष रामदास फुटाणे यांनी आपल्या भाषणात एका कलाकाराच्या हस्ते या कला प्रदर्शनाचे उदघाटन होत असल्याचा आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, सोसायटीपुढे अनेक अडचणी आहेत, त्या दूर करणे गरजेचे आहे, इतर संस्थांप्रमाणे शासनाने या बॉम्बे आर्ट सोसायटीलाही अनुदान द्यावे.
प्रो. नरेंद्र विचारे यांनी आर्ट कौन्सील स्थापन केल्यास सर्व कला संस्थांच्या कामात सुलभता येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून पोलीस शौर्य, राष्ट्रपती पोलीस पदक,
अग्निशमन शौर्य पदक विजेत्यांचे अभिनंदन
केंद्रीय गृहमंत्रालयाची स्वातंत्र्यदिन पुर्वसंध्येला पदकांची घोषणा
मुंबई, दि. 14 : - पोलीस सेवेतील योगदानासाठी पोलीस शौर्य पदक, राष्ट्रपती पोलीस पदक आणि गुणवत्तापूर्ण सेवेसाठीचे पदक विजेत्या महाराष्ट्रातील 78 पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे.
“महाराष्ट्र पोलीस दलाचा आम्हाला अभिमान आहे. पोलीस दलाच्या ब्रिद वाक्याला जागून, या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कर्तव्य बजावून महाराष्ट्राच्या गौरवात भर घातली,” अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र पोलीस दलातील या अधिकारी कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयाने देशातील 1,380 पदक विजेत्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची यादी जाहीर केली. यात महाराष्ट्रातील तीन अधिकाऱ्यांनी उत्कृष्ट सेवेकरिता ‘राष्ट्रपती पोलीस पदक’, 25 अधिकाऱी, कर्मचाऱ्यांनी 'पोलीस शौर्य पदक' तसेच गुणवत्तापूर्ण सेवेसाठी 39 अधिकारी-कर्मचाऱ्यांनी ‘पोलीस पदक’ तसेच 11 पोलीस अधिकाऱ्यांनी ‘उत्कृष्ट तपासासाठीचे केंद्रीय गृहमंत्री पदक’ पटकावले आहे. याशिवाय राज्याच्या अग्निशमन दलातील आठ अग्निशन अधिकारी, कर्मचाऱ्यांना 'अग्निशमन सेवा शौर्य पदक' जाहीर झाले आहे. या सर्वांचेही मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले आहे, तसेच त्यांच्या धडाडीचे कौतुक केले आहे.
0000
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...