Monday, 9 August 2021

 file:///C:/Users/abc/Downloads/Mandal%20Aayog%20-%20Kunbi%20Samajonnati%20Sangh.pdf

विविध दिव्यांची ओळख आज दीप पुजनाच्या नीमित्ताने 👆
 

 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वातंत्र्य संग्रामातील

वीरांना ऑगस्ट क्रांती दिना निमित्त अभिवादन

 

कोरोनाला हद्दपार करण्याची प्रतिज्ञा घेण्याचे आवाहन

          मुंबईदि. 9 :-  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑगस्ट क्रांती दिना निमित्त भारतीय स्वातंत्र्य संग्रामात त्यागसमर्पणाची परिसीमा करणाऱ्या क्रांतिकारीस्वातंत्र्यसैनिक यांच्यासह प्राणांची आहुती देणाऱ्या वीरांना अभिवादन केले आहे. तसेच कोरोना विषाणूला हद्दपार करण्याची प्रतिज्ञा घेऊन भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा आनंद द्विगुणित करूया असे आवाहनही केले आहे.

          मुख्यमंत्री संदेशात म्हणतातमुंबईतील गवालीया टँकवर 'करेंगे या मरेंगेअशी प्रतिज्ञा घेऊन ब्रिटीशांना 'चले जाव..! भारत छोडो !असा निकराचा इशारा देण्यात आला. क्रांतीच्या वणव्यातून स्वातंत्र्याची पहाट उगवली.  या संग्रामात त्यागसमर्पणाची परिसीमा करणाऱ्या क्रांतिकारीस्वातंत्र्यसैनिक यांच्यासह प्राणांची आहुती देणाऱ्या वीरांना विनम्र अभिवादन करूया. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आपण आपलं घर- कुटुंबपरिसरवाडी-वस्तीगाव-शहर कोरोनामुक्त करण्याची प्रतिज्ञा घेऊयात्यासाठी आणि ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

0000


Sunday, 8 August 2021

 India’s 🇮🇳 Olympics Medals 


1896🥈🥈

1928🥇

1932🥇

1936🥇

1948🥇

1952🥇🥉

1956🥇

1960🥈

1964🥇

1968🥉

1972🥉

1980🥇

1996🥉

2000🥉

2004🥈

2008🥇🥉🥉

2012🥈🥈🥉🥉🥉🥉

2016🥈🥉

2021🥇🥈🥈🥉🥉🥉🥉


This is highest #olympics  tally we ever got in any single edition

 *🌿अडुळसा औषधी वनस्पती उपयोग माहिती🌿*


        अडुळसा भारतामध्ये सर्वत्र प्रसिद्ध आहे. याची पाने मोठी भाल्याच्या आकारासारखी असतात. फळांना कवच असते. प्रत्येक फळामध्ये ४ बिया असतात. फुले पांढरी  किंवा जांभळी असतात. याचे वसाका हे नाव संस्कृत मध्ये आहे. ही वनस्पती भारतामध्ये सर्वत्र आढळते. अडूळशाचे मुळ स्थान भारत आहे.


औषधी गुणधर्म:


अडुळसाच्या मुळा, पाने, फुले, औषधी साठी वापरतात. सर्दी, खोकला दमा, इत्यादींवर अडुळसा खूप गुणकारी आहे.


विविध रोगांवर उपचार:


क्षय रोग:


आयुर्वेदामध्ये क्षय रोगासाठी अडूळशाच्या फुलांपासून तयार केलेला गुलकंद उपयोगी असल्याच सांगितल आहे. अडूळशाची पाने कुस्करून चीनी मातीच्या भांड्यात ठेवावी. त्यात खाडी साखर मिसळावी. आणि भांडे उन्हामध्ये ठेवावे. सकाळ संध्याकाळ हे मिश्रण हलवावे.


एक महिना नंतर हे मिश्रण वापरण्यायोग्य होते. पानांचा रस सुद्धा क्षय रोगावर गुणकारी आहे. अडुळसा इतका गुणकारी आहे कि जोवर अडुळसा आहे तोवर कोणत्याही प्रकारच्या क्षय रोगावर मात करता येऊ शकते.


खोकला:


अडूळसाची सात पाने पाण्यामध्ये उकळवावी, ती गाळून घेतल्या नंतर त्यात २४ ग्राम मध मिसळावे. हा काढा घेतल्याने खोकला थांबतो. तसेच अडुळसा ची फुले टाकून तयार केलेली मिठाई दर वेळी 12 ग्राम या प्रमाणे सकाळ संध्याकाळ खाल्ल्यास खोकला थांबतो. ६० ग्राम फुले १८० ग्राम गुळाच्या पाकात मिसळून ही मिठाई तयार करावी.


पोटातील जंत:


पाने, खोड आणि मुडाची साले, फळे, आणि फुले सर्वच भाग पोटातील जंत बाहेर काढण्यासाठी उपयुक्त आहेत. सालीचा काढा प्रत्येक वेळी ३० ग्राम या प्रमाणे दिवसातून 2-3 वळेस सलग ३ दिवस घ्यावा किवा ताज्या पानांचा रस दर वेळी 1 चमचा या प्रमाणे ३ दिवस ३ वेळा घ्यावा.


जुलाब आणि आव:


जुलाब किंवा आव झाला असल्यास पानांचा रस 2 ते 4 ग्राम घ्यावा.


त्वचारोग:


ताज्या जखमा, संद्यावरची आणि इतर ठिकाणची सूज यांवर पानाचे पोटीस लावले. खरुज आणि इतर त्वचारोग यांवर पानांचा गरम काढा घ्यावा.


*🌺वापरण्याची पद्धत आणि प्रमाण:🌺*


पानांचा रस, आल्याचा रस किवा मध यांसोबत दर वेडी १५ ते ३० ग्राम घ्यावा. वाळलेल्या पानांचे चूर्ण 2 ग्राम घेतले तरी चालेल. ताज्या पानांचा काढा करून घ्यावा. खोकल्या मध्ये अनेक आयुर्वेदिक औषधी मध्ये अडुळसा च्या पानांचा रस असतो. खोडाच्या सालीचा ही काढा ३० ते ६० मि.ली. च्या डोसात घेतला तरी चालतो.

🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺

   *( कॉपी पेस्ट )*

     *आरोग्य अणि समर्थ सोशल फाउंडेशन च्या मधुमेह मुक्ति व व्यसनमुक्ती कार्याची नवीन अपडेट्स मिळविण्यासाठी आजच जॉईन व्हा आम्हाला.*

   https://chat.whatsapp.com/EnPzcxplpwj27Wj3J1Fq8m

 गटार ( Gutter) नव्हे , गताहार    !   ...….                                 आपल्या सणांना बदनाम करायचे काम नेहमी केले जाते।

 आपल्या कडे आषाढी अमावस्या नंतर आहारात बदल केला जातो। या दिवसाला गताहारी(जो आहार गेला आहे तो)अमावस्या म्हणतात।

आपल्या प्रत्येक सणांचे नावे संस्कृतवर आधारित आहेत। Gutter हा इंग्रजी शब्द आपल्या सणाला खोडसाळ पणे जोडलेला आहे। आपली लायकी गटारात लोळायची आहे असे आपल्याला हिणवले गेले व दुर्दैव हे की आपण ते खरे ठरवण्याच्या मागे लागलोय।

आपल्या महान संस्कृतीची जाणीव ठेवा। आपल्या प्रत्येक सणाला मोठा अर्थ आहे। आपल्या सणांची बरोबरी कुणीही करू शकत नाहीं। आपले सण आपणच संस्कृतीने साजरे करू या।

गटार(Gutter) नव्हे, गताहार

गत=मागील, जुने, गेलेले, आता नाहीं ते

आहार= भोजन

गत+आहार=गताहार

जसे:-

शाक+आहारी=शाकाहारी

तसे:-

गत+आहारी=गताहारी

गत+आहारी+अमावस्या=गताहारी अमावस्या


या दिवशी दीप पुजन करतात


                येत्या रविवारी ८ऑगस्ट २०२१  रोजी दीप अमावस्या आहे. हिंदूंच्या सर्वाधिक कुचेष्टेचे, विकृत विनोदांचे  जे सण आहेत त्यात वटपौर्णिमेनंतर दीप अमावस्या हा सण येतो. व्यक्तिगत पातळीवर गटारी साजरी करण्याचा प्रत्येकाला हक्क आहे. पण दीपपुजेऐवजी केवळ गटारी म्हणून याला सर्वत्र  कुप्रसिद्धी मिळू नये असे वाटते.  जो आपला सणच नाहीये त्यासाठी आपण आपला धर्म,आपली संस्कृती का म्हणून बदनाम करायची ? उलट महाराष्ट्रातील सर्व जातींच्या लाखो घरांमध्ये मोठ्या भक्तिभावाने या दिवशी दीपपूजन केले जाते. त्यामुळे अशी आपलीच बदनामी टाळण्याची मी  गेली कित्येक वर्षे मी माझ्या पातळीवर ही विनंती अनेकांना करीत आहे. हळूहळू याचे चांगले परिणामही दिसू लागले आहेत. 


                     हजारो वर्षांची परंपरा असलेल्या आपल्या धर्मात याच्या मागचे विज्ञानही सामावलेले आहेच. पूर्वी या दिवशी मांसाहार करून गौरींच्या जेवणापर्यंत मांसाहार बंद ठेवला जात असे. प्राण्याच्या शरीरातून जगभर पसरलेला कोरोना लाखोंचे प्राण घेत सुटला आहे. किमान या पावसाळी दिवसांमध्ये मांसाहार बंद ठेवण्याची तीव्र गरज आणि आपली प्रथा किती दूरदर्शीपणे आपल्या पूर्वजांनी योजली आहे हे यावर्षी प्रकर्षाने अधोरेखित होते आहे.


**** आपण यामागची वैज्ञानिक कारणे जाणून घेऊया---


१) या ओलसर पावसाळी वातावरणात मांसाहार नीट पचत नाही.


२) बहुतेक प्राण्यांचा हा काळ म्हणजे विणीचा / प्रजननाचा काळ असतो. याच काळात प्राण्यांची हत्या केली  तर नवीन प्राणी जन्मालाच येणार नाहीत. मग वर्षभर खायला प्राणी मिळणार कुठून ? याचा  साऱ्या निसर्गचक्रावरच विपरीत परिणाम होतो.  त्यामुळे निसर्गपुत्र कोळीबांधव या काळात मासेमारी करीत नाहीत आणि सरकारी पातळीवरूनही मासेमारीवर बंदी घालण्यात येते. 


३) या दिवसात बाहेरच्या दमट वातावरणामुळे प्राण्यांच्या शरीराच्या आत आणि शरीरावरील त्वचेवर अनेक घातक जीवजंतू असण्याची शक्यता असते. शिजविताना त्यांचा पूर्ण नाश न झाल्यास त्याचाही खाणाऱ्याला त्रास होऊ शकतो.


४) वातावरणात ओलावा असतो. मांस किंवा मासे नीट न ठेवल्यास ते  हवेतील वाढलेल्या  जंतूंमुळे कुजण्याची प्रक्रिया अधिक वेगाने होते. 


५) आज विविध लसी, अत्यंत परिणामकारक प्रतिजैविके, औषधे उपलब्ध असूनसुद्धा, धुमाकूळ घालणाऱ्या विविध साथीना  आवर घालणे कठीण झाले आहे. अनेक  घातक रोगांच्या जीवघेण्या साथी, ह्या अस्वच्छ प्राण्यांच्या शरीरावर वाढणाऱ्या जंतुंमुळे पसरतात. म्हणून या दिवसात मांसाहार टाळल्यास जंतू संसर्गाचा धोका कमी होतो. 


 अशा सर्व कारणांमुळे या दिवसाला धार्मिक जोड दिली गेली आहे. त्यामुळे  आपोआपच निसर्गाचा तोल साधला जातो.


 


*** या दिवसात शाकाहार करण्यामागेही शास्त्रीय कारणे आहेतच--


१ ) अत्यंत दुर्मिळ आणि प्रकृतीला पोषक अशा अनेक भाज्या याच काळात उगवतात. संपूर्ण वर्षभरात या भाज्या पुन्हा पाहायलाही  मिळत नाहीत. 


२) शाकाहार केल्यामुळे अशा भाज्या आपोआपच खाल्ल्या  जातात. 


३) तुलनेने शाकाहाराचे या दिवसात नीट पचन होते.                                              


४) विविध उपासांच्या दिवशी खाल्ल्या  जाणाऱ्या कंदमुळांच्या आहारामुळे त्यातील अनेक दुर्मिळ खनिजे आणि उपयुक्त पोषक घटक अपोआप शरीराला लाभतात. 


५) कायम मांसाहार करणाऱ्यांच्या पचन संस्थेवर नेहेमी येणारा ताण, या शाकाहारी बदलामुळे कांही काळ कमी होतो.  


म्हणून विनंती करतो  " श्रावण जरूर पाळा, गटारीची कुप्रसिद्धी टाळा "!


( कृपया हे जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि आपल्या  संस्कृतीची अकारण होणारी कुचेष्टा थांबविण्यास हातभार लावावा, ही विनंती )

 *🌸ताटी उघडा ज्ञानेश्वरा...........१🌸*


                      *🙏आज मला संत मुक्तबाईंची, खरे पाहता त्यांच्या त्या 'ताटी उघडा ज्ञानेश्वरा' ह्या अभंगाची खूपच  आठवण येत होती. त्यांचा दादा, म्हणजे आमचे श्रीज्ञानेश्वर जेव्हा रागावून दार बंद करून बसले, तेव्हा त्यांनी त्यांना समजवण्यासाठी उत्स्फूर्तपणे एका पाठोपाठ एक असे बारा अभंग रचून म्हंटले, जे ताटीचे अभंग म्हणून प्रसिद्ध आहेत. ह्यापैकी पहिल्या अभंगाचे आज रसग्रहण करूया. पाठची बहीण असूनही जगावर रुसुन बसलेल्या आपल्या ज्ञानदादाला तिने अधिकारवाणीने समजावले. संत कोणाला म्हणावे, संताची वागणूक कशी असावी हे आपल्या ज्ञानदादाच्या मनावर बिंबवले. ताटीच्या अभंगात ज्ञानोबांच्या ह्या मुक्तेचे हळुवार, समंजस, प्रसंगावधानी, उच्च पातळीवरचे व्यक्तिमत्व साकार झाले आहे. त्यात मुक्ताईने जी संतत्वाची लक्षणे आपल्या दादाला सांगितली आहेत ती मूर्तिमंत तिच्या व्यक्तित्वात दिसून येतात.*


*-- १ --*

*संत जेणें व्हावें । जग बोलणे साहावें ॥*

*तरीच अंगी थोरपण । जया नाही अभिमान ॥*

*थोरपण जेथे वसें । तेथे भूतदया असें ॥*

*रागें भरावे कवणाशी । आपण ब्रम्ह सर्वदेशी ॥*

*ऐशी समदृष्टी करा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥*


         *मुक्ताबाई म्हणतात की संतांना जगाची बोलणी सहन करावीच लागतात. ज्याला संत बनायचे आहे, त्यांना जगाचे कटू बोल हे सहन करावेच लागतात, कारण संतांची विचारधारा आणि सामान्य जनांची विचारक्षमता ह्यामध्ये जमीन-अस्मानाचे अंतर असते. जगाच्या पाठीवर असा एकही संत झाला नसेल की ज्याला तत्कालीन समाजाने छळला नसेल. मग ते एकनाथ महाराज असोत वा तुकोबा. संतांचे महत्व समाजाला नेहमीच त्यांच्या पश्चात का जाणवते हे एक न सुटणारे कोडेच आहे. कदाचित ती त्यांची परमेश्वराने घेतलेली परीक्षा असावी.....जे ते सहजी पार करतात.*


         *हे बोलणे सहन करायचे तर त्यासाठी अहंकार त्यजावा लागतो आणि अहंकार त्यागल्याशिवाय थोरपण कसे येईल? संतांचे जीवन हे अज्ञ जनांच्या उद्धारासाठीच असते ना? अज्ञानी समाजाकडून अजून कसली वेगळी अपेक्षा ठेवावी? पण म्हणून त्या समाजाला सोडून, त्यांच्या वागणुकीने रुसून जर संत समाजापासून दूर निघून गेला, तर त्या समाजाचा उद्धार कसा होईल? अजाण समाजाचे हे पोरपण जाणून अभिमान गळून पडताच हृदयात भूतदया जागृत होते आणि आपोआप थोरपण येते....त्यासाठी अजून वेगळे असे काही करावे नाही लागत.*


         *त्या भूतदयेने त्यांची दृष्टी इतकी विशाल झालेली असते की त्यांना आपल्या ब्रह्मस्वरूपाची पूर्ण जाणीव होते आणि हेच ब्रह्म जर साऱ्या चराचराला व्यापून राहिले आहे, तर मी कुणाहूनही आणि कुणीही माझ्याहून वेगळा नाहीच ही सर्वश्रेष्ठ अनुभूती होते.....म्हणून तर तीर्थक्षेत्री जाऊन आणलेले गंगाजल आमचे एकनाथ महाराज तहानलेल्या गाढवाच्या मुखी रिते करू शकतात. मुक्ताबाई म्हणतात की ब्रह्मस्वरूपात जर सर्वत्र मीच आहे, तर आपण कुणावर आणि कसे रागवावे?*


        *ह्या भावंडांच्या आयुष्यातील ही घटना ही एक ईश्वरी लीला आहे. ज्ञानस्वरूप ज्ञानेश्वर महाराज काय हे सर्व जाणत नव्हते? पण असे काही नाट्यपूर्ण घडल्याशिवाय आम्हा सामान्य जनांसाठी ज्ञानगंगा प्रवाहित कशी होईल? म्हणून हे त्या ईश्वराने घडविलेले एक नाटक आहे. वेळप्रसंगी आपल्याहून लहान असलेलाही जर आपल्याला काही योग्य असे समजावीत असेल, तर आमच्यासारखा सामान्य माणूस म्हणेल की, तुझ्यापेक्षा जास्त पावसाळे मी पाहिले आहेत, मला नको शिकवूस...... पण आमची माऊली असे नाही म्हणत. खरा थोर कसा असतो हे आम्हाला समजविण्यासाठी हे सगळे नाट्य आहे. हे जर निवृत्तीनाथांनी सांगितले असते तर.....तर वेळप्रसंगी योग्य असल्यास लहानाचेही ऐकावे ही शिकवणूक आम्हाला नसती मिळाली ना?*


           *अभंगाच्या अखेरीस ही धाकटी बहीण आपल्या दादाला सांगते की, 'ऐशी समदृष्टी करा। ताटी उघड ज्ञानेश्वरा।।' ही ओळ साधीसुधी नाही, ती 'ताटी उघडा दादा' असे नाही म्हणत. का? कारण हा संवाद आता बहीण-भावाचा उरलेला नाही. आता एक ज्ञानी आत्मा अधिकारवाणीने एक तुल्यबळ अशा, पण क्रुद्ध झालेल्या आत्म्याला पुनःजागृत करीत आहे....समत्वबुद्धि धारण करण्यास सांगत आहे....क्रोधविकाराने अल्पकाळासाठी का होईना, पण बंद झालेले बुद्धीचे कवाड उघडण्याचे आदेश दिला जात आहेत असे जाणवते. हे जे ज्ञानियांच्या बाबतीत घडू शकते, ते माझ्यासारख्या सामान्यांच्या बाबतीत घडले तर नवल ते काय?.. पण तेव्हा मुक्ताईचा हाच आदेश माझ्यासाठी असणार............ताटी उघडा ज्ञानेश्वरा. हरि🕉️*

Featured post

Lakshvedhi