आरबीआय मार्गदर्शक तत्त्वांचे पुनरावलोकन
बँक कर्जाबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमावलीचा सखोल अभ्यास केला जाईल. बँकांकडून महिलांना त्रास होऊ नये यासाठी आरबीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी प्रत्यक्ष चर्चा करून धोरणात्मक तोडगा काढला जाईल. तसेच राज्यांच्या अधिकाऱ्यांसोबत संपूर्ण अभियानाचा आढावा घेऊन महिलांनी मांडलेल्या सर्व अडचणी तातडीने दूर करण्याचे स्पष्ट निर्देश मंत्र्यांनी दिले.
महिलांचे आर्थिक सक्षमीकरण हेच सरकारचे मुख्य ध्येय असून, देशात ६ कोटी लखपती दीदी तयार करण्याचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करण्यासाठी सर्व यंत्रणांनी मिशन मोडवर काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे म्हणाले, देशातील ६ कोटींच्या उद्दिष्टात महाराष्ट्रात सध्या ५० लाख लखपती दीदी असून, राज्य शासनाने १ कोटी लखपती दीदी घडवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. राज्यात सध्या ६ लाख ७२ हजार बचत गट व ३४ हजार ८८५ ग्रामसंघ कार्यरत आहेत; नवीन बचत गट स्थापन करणे आणि बँक खाती उघडणे या प्रक्रियेला गती दिली जात आहे. बचत गटांचा कर्ज परतफेडीचा इतिहास उत्तम आणि एनपीए अत्यंत कमी असल्याने बँकांनी महिला उद्योजकतेला बळ देण्यासाठी कर्ज प्रक्रिया सुलभ व गतिमान करावी, असे आवाहन ग्रामविकास मंत्र्यांनी केले.
राज्यमंत्री योगेश कदम यांनी आदिवासी बहुल भागात विशेष लक्ष देणे, महिलांचे डिजिटल व्यवहार नोंदवणे आणि लखपती दीदी उद्दिष्टपूर्तीसाठी महिलांना वैयक्तिक कर्ज उपलब्ध करून देण्यावर भर दिला.
केंद्र सरकारच्या ग्रामीण विकास विभागाचे सहसचिव अमित शुक्ला यांनी 'दीनदयाळ अंत्योदय योजना - राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान' अंतर्गत 'आर्थिक समावेशन २.०', 'बीसी सखी' उपक्रम आणि वित्तीय साक्षरतेचा कृती आराखडा सादर केला.
ग्रामीण भागातील महिला बचत गटांचे रूपांतर यशस्वी वैयक्तिक उद्योगांत करण्यासाठी सुलभ व जलद कर्जपुरवठा करण्यावर बैठकीत एक
No comments:
Post a Comment