महाराष्ट्रात मोठ्या पायाभूत सुविधा
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग, वाढवण बंदर, अटल सेतू, दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉर आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांसारख्या प्रकल्पांमुळे महाराष्ट्राच्या विकासाला नवी गती मिळते आहे. या प्रकल्पांमुळे वाहतूक आणि मालवाहतुकीचा खर्च कमी होण्यास मदत होईल. मुंबईसह राज्यातील विविध भागांना देश-विदेशातील बाजारपेठांशी अधिक वेगाने जोडण्याचे काम सुरू असल्याचे ते म्हणाले. नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्ग, कोकण एक्स्प्रेस वे आणि कोकण किनारी मार्गासारख्या प्रकल्पांमुळे राज्यातील विविध विकास केंद्रे एकमेकांशी जोडली जातील. यामुळे पर्यटन, उद्योग आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
No comments:
Post a Comment