धारावी, ठाणे पुनर्विकास
शहरी विकास म्हणजे केवळ रस्ते आणि इमारती उभारणे नव्हे, तर लोकांचे जीवनमान सुधारणे होय, असे स्पष्ट करून उपमुख्यमंत्री शिंदे यांनी धारावी पुनर्विकास प्रकल्प, ठाणे क्लस्टर पुनर्विकास, मुंबईतील जुन्या चाळींचा पुनर्विकास ही उदाहरणे सांगितली.
विकासासोबत पर्यावरणाचे संरक्षण
मुंबईने दक्षिण आशियातील पहिले स्वतंत्र नेट-झिरो क्लायमेट अॅक्शन प्लॅन सुरू केले असल्याचे त्यांनी नमूद केले. २०३० पर्यंत राज्याच्या वीज गरजेपैकी ५० टक्के गरज स्वच्छ ऊर्जेतून पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईत दररोज मोठ्या प्रमाणात सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा औद्योगिक वापर केला जात आहे. सह्याद्री पर्वतरांगांमध्ये प्रस्तावित न्यू महाबळेश्वर प्रकल्पात मोठा भाग संरक्षित हिरव्या क्षेत्रासाठी ठेवण्यात येणार असून पर्यावरणपूरक पर्यटन आणि स्थानिक रोजगाराला चालना देण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment