.: लक्षवेधी मास मीडिया तर्फे मुंबई शहर उपनगर, मीरा भाईंदर वसई विरार,पालघर,रत्नागिरी जिल्हा मधील रिपोर्टर
म्हणून श्री चंदन मयेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. परिसरातील नागरिकांच्या विविध समस्या, प्रश्न तसेच सामाजिक आणि विकासात्मक विषयांना माध्यमातून वाचा फोडण्याचा उपक्रम यानिमित्ताने सुरू करण्यात आला आहे.
या माध्यमातून औद्योगिक, सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, सण-महोत्सव, महिला व युवा प्रश्न, बचत गट, सहकारी संस्था, एकल महिला, ज्येष्ठ नागरिक. आणि कामगार संघटना यांच्याशी संबंधित विषयांना प्रसिद्धी देण्याचे काम करण्यात येणार आहे.
तसेच नागरिकांसाठी कायदे, शासकीय अनुदाने आणि आरोग्यविषयक, प्रदूषण अन्य समस्या, बाबत मार्गदर्शन केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. शासकीय योजना व उपलब्ध सुविधांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवून गरजू व्यक्तींना योग्य मार्गदर्शन मिळावे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
स्थानिक पातळीवरील प्रश्न आणि नागरिकांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचविण्यासाठी नागरिकांनी आपल्या परिसरातील समस्या लक्षवेधी मास मीडियाच्या माध्यमातून मांडावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
📞 संपर्क : चंदन मयेकर, रिपोर्टर , +91
99208 09457
🌐 संकेतस्थळ : lakshvedhimm.blogspot.com
“साथ हमारा, विकास तुम्हारा!”
|

No comments:
Post a Comment