महाराष्ट्रातील १,३९९ आयटीआय विद्यार्थ्यांना ‘उन्नती’कडून
रोजगारक्षम कौशल्य प्रशिक्षण मिळणार
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. १४ : महाराष्ट्रातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये युवकांच्या रोजगारक्षमतेत वाढ करण्यासाठी ‘उन्नती’ संस्थेकडून व्यापक कौशल्य प्रशिक्षण उपक्रम राबविण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा प्रभावीपणे राबवत आहेत. या उपक्रमांतर्गत राज्यातील विविध शासकीय आयटीआय व शासकीय तंत्रनिकेतनांमधील १,३९९ युवकांना १६५ तासांहून अधिक काळ रोजगारक्षम कौशल्यांचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. या प्रशिक्षणामध्ये संस्थेच्या लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीमचा देखील समावेश आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय आयटीआयमधील ३२६ युवकांना या प्रशिक्षणाचा सर्वाधिक लाभ झाला आहे. त्यानंतर सोलापूर येथील २०४, आरटीएम शासकीय आयटीआय, मोजरी येथील ९३, जरिपटका येथील ८१, बुलडाणा व एससीपी आयटीआय, किले आर्क, छत्रपती संभाजीनगर येथील प्रत्येकी ७२, धामणगाव-अमरावती येथील ७१ आणि अक्कलकोट येथील ६८ युवकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.
याशिवाय बल्लारपूर ६७, कोल्हापूर ६३, सेलू ५६, मौदा ३९, पार्टूर ३०, कराड ३०, गोंदिया २९, शासकीय आयटीआय (महिला), अकोला २८, शासकीय तंत्रनिकेतन, सामनगाव, नाशिक २६, पिंपरी-चिंचवड २३ आणि अकोला येथील २१ युवकांनी प्रशिक्षण घेतले आहे. अशा प्रकारे १३९९ युवकांनी प्रशिक्षण घेतले आहे.
No comments:
Post a Comment