केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंग यांच्याशी झालेल्या सुमारे २५ मिनिटांच्या बैठकीत देशातील व राज्यातील सूतगिरण्यांच्या प्रश्नावर सविस्तर चर्चा झाली. कोविड-१९ कालावधीपासून अनेक सूतगिरण्या बंद असून, त्यामुळे उत्पादन ठप्प झाले आहे व कामगारांना देखील वेतन प्राप्त होत नाही सदर वेतनाबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी चर्चा करण्यात आली. एनटीसीच्या जागेवर असणाऱ्या चाळीतील रहिवाशांच्या पुनर्वसनाबाबत देखील चर्चा करण्यात आली.तसेच एनटीसीच्या ताब्यातील बंद पडलेल्या गिरणीच्या जमिनी या गिरणी कामगारांच्या पुनर्वसनाच्या अनुषंगाने म्हाडाच्या ताब्यात देण्याच्या अनुषंगाने देखील चर्चा करण्यात आली. एनटीसीच्या गिरण्यांच्या कामकाजाबाबत देखील चर्चा करण्यात आली.सदर विषय केंद्रीय मंत्रिमंडळासमोर मांडण्याचे आश्वासन वस्त्रोद्योग मंत्र्यांनी दिल्याची माहिती उपसभापती सचिन अहिर यांनी दिली.
No comments:
Post a Comment