रोजगारक्षम कौशल्यांवर भर
या उपक्रमात प्रामुख्याने रोजगारक्षम कौशल्यांवर लक्ष केंद्रित केले जाते. तांत्रिक कौशल्यांचे प्रशिक्षण संबंधित आयटीआय व संस्थांकडून दिले जात असल्याने ‘उन्नती’कडून संवादकौशल्य, कार्यस्थळावरील आवश्यक कौशल्ये, व्यक्तिमत्त्व विकास, रोजगारासाठीची तयारी आदी रोजगारक्षम कौशल्यांच्या विकासावर भर दिला जात आहे. महाराष्ट्रातील विविध आयटीआयमध्ये राबविण्यात आलेल्या या प्रशिक्षण उपक्रमाबाबत संबंधित संस्थांकडून अभिप्राय घेऊन त्याच्या परिणामकारकतेचे मूल्यांकन करण्यात यावे, अशी अपेक्षा ‘उन्नती’ने व्यक्त केली आहे.
No comments:
Post a Comment